Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

भुसेंची भाजपवर टीका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

राज्यभरात नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांदरम्यान मुख्यमंत्र्यांनाही पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उतरावे लागले होते. यावेळी त्यांनी विकासासाठी कोरे चेक देण्याचे आश्वासन देऊनही जनतेने त्यांना नाकारले, अशा शब्दांत राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी आपला मित्र पक्ष भाजपचा पाणउतारा केला. त्यांच्या उपरोधिक टीकेमुळे राज्याच्या सत्तेत भागीदार असलेले भाजप व शिवसेनेतील दुफळी नाशिककरांसमोर आली.

नाशिकमध्ये आयोजित शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. मंत्री दादा भुसे शनिवारी नाशिकच्या शासकीय दौऱ्यावर आलेले असतांना त्यांनी या मेळाव्यालाही हजेरी लावली. यावेळी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुखांचा शब्द खरा ठरावा यासाठी नाशिक मनपा व जिल्हा परिषदेच्या येत्या निवडणुकीत भगवा फडकवण्यासाठी जीवाचे रान करा. नाशिकच्या जनतेला शिवसेनेकडून मोठी अपेक्षा आहे. पक्षाची ध्येयधोरणे सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे कामही निष्ठेने करा. येत्या निवडणुकीत इच्छुकांची संख्या मोठी असली तरी गाफिल राहू नका, असा इशाराही त्यांनी दिला.

नाशिकमध्ये शिवसेनेत स्थानिक पातळीवर कोणतीही गटबाजी नसल्याचा खुलासा जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी केल्याने गटबाजीचा मुद्दा चांगलाच रंगला. ‘कुणी आमच्यावर कुदलं तर आम्ही सर्व एक होतो’, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. एका अर्थाने त्यांनी अंतर्गत खदखदच व्यक्त केली. या मेळाव्यास उपस्थित शिवसैनिकांना दत्ता गायकवाड, सत्यभामा गाडेकर यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी सर्व नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी या मेळाव्यात शिवसेनेत प्रवेश केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धरणांच्या सुरक्षेसाठी तज्ज्ञ समिती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील तब्बल ४०० धरणे असुरक्षित असल्याचा अहवाल महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (मेरी) राज्य सरकारला सादर केल्यानंतर सरकारला जाग आली असून, आता नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी राज्यातील विविध तज्ञांची १० जणांची समिती तयार केली आहे. त्यात नाशिकच्या अविनाश शिरोडे यांचा व्यावसायिक तज्ज्ञ म्हणून समावेश केला आहे. शिरोडे यांनी जलसंपदेसाठी चांगले काम करायला मिळेल याबाबत आनंद व्यक्तज केला आहे.

गेल्या कित्येक वर्षांत धरणांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर जलसंपदा विभाग काम करीत आहे. पण ही कामे कुचकामी ठरत असल्यामुळे नवीन धरण बांधणे व दुरुस्ती करणे यासाठी या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे. वर्षानुवर्षे जलसंपदा विभाग आपल्या पारंपरिक पद्धतीतत अडकल्यामुळे अनेक कामे धोकादायक व खर्चिक होत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने कात टाकत हा नवा निर्णय घेतला आहे. तंत्रज्ञान नवीन असले तरी ते व्यावहारिक व शाश्वत आहे का त्यांचा किती फायदा होईल, याबाबत ही समिती निर्णय घेणार आहे.
या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष मेरीचे महासंचालक असतील. मुख्य अभियंता सह सचिव असतील. त्यात व्यावसायिक तज्ज्ञ म्हणून शिरोडे यांच्यायह मुंबईचे मेहश तेंडुलकर, राज्य व केंद्र सरकारमधील निवृत्त कर्मचारी व जलसंपदाचे अधिकारी यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ कुटुंबाला मिळणार आर्थिक मदत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
मुलाला स्वेटरसाठी आलेले नऊशे रुपयांचे अनुदान काढण्यासाठी बँकेबाहेर रांगेत जीव गमवाव्या लागणाऱ्या दिनेश जाधव यांच्या कुटुंबीयाला आर्थिक मदतीचे आश्वासन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिले. स्वेटरच्या पैशांसाठी जीव गमावलेल्या दिनेशचे वृत्त ‘मटा’त प्रसिद्ध झाल्यानंतर आमदार जयंत जाधव यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसपरिषेदत उपस्थित केला होता. त्यावर सभापतींच्या आदेशानंतर सभागृह नेते चंद्रकात पाटील यांनी संबंधित जाधव यांच्या कुटुंबीयाना आदिवासी विभागामार्फत मदत देण्याचा सरकार प्रयत्न करेल, असे आश्वासन दिले. त्यामुळे या कुटुंबाला काही अंशी दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

आदिवासी विभागातील दिरंगाईमुळे दोन वर्षांपासून आदिवासी मुलांना स्वेटर मिळाले नाहीत. जेमतेम चालू वर्षी आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे पडले. परंतु नोटाबंदीचा फटका त्यांना बसला आहे. जव्हार तालुक्यातील झोप येथील दिनेश जाधव हा आपला मुलगा श्रावणच्या स्वेटरचे पैसे बँकेतून काढण्यासाठी गेला होता. परंतु रांगेतच चक्कर येऊन तो पडला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यांसदर्भातले वृत्त ‘मटा’ने गुरुवारी (दि. ८) प्रसिद्ध केले होते. नोटाबंदी आणि आदिवासी विभागाच्या दिरंगाईने दिनेशचा जीव गेल्याने संपूर्ण कुटूंबच रस्त्यावर आले होते. आमदार जयंत जाधव यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत औचित्याच्या आधारे हा मुद्दा उपस्थित केला. सभापती रामराजे निंबाळकर यांनी दखल घेण्याचे आदेश दिले. मंत्री चंद्रकात पाटील यांनी या घटनेची सरकार गंभीर दखल घेईल असे आश्वासन दिले. संबंधित कुटूंबीयांना आर्थिक मदत देण्यांसदर्भात सरकार निर्देश देईल, असे आश्वासन पाटील यांनी दिल्याचे आ. जाधव यांनी सांगीतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारूबंदी मसुदा मंजूर होणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मांडलेला दारूबंदी मसुद्यातील काही मागण्या मंजूर करण्यासाठीचा मसुदा विधानसभेत मंजूर करून त्याचे कायद्यात रुपांतर करण्याचे आश्वासन उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य दारूबंदी जनआंदोलन समितीला दिले आहे.

अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात दारूबंदी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य दारूबंदी जनआंदोलन समितीच्या वतीने राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. मागील आठवड्यात राज्य उत्पादन आयुक्त व्ही. राधा आणि उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दारूबंदी मसुदा हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यासाठी नागपूर येथे बैठक घेण्याचे आश्वासन दारूबंदी जन आंदोलन समितीला दिले होते. त्यानुसार त्यांनी विधानसभेतील कार्यालयात शुक्रवारी समितीचे अध्यक्ष गणेश कदम व त्यांच्या सहका-यांसमवेत बैठक घेतली. मंगळवारी विधानसभेत दारूबंदी संबंधीच्या काही मागण्या मंजूर करण्यासाठीचा मसुदा मांडला जाईल, असे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले. दारूबंदीच्या दिशेने आश्वासक पावले टाकण्याबाबतही या वेळी सहमती दर्शविण्यात आली. बैठकीस सचिव श्रीवास्तव, आयुक्त व्ही. राधा, समितीचे अध्यक्ष गणेश कदम, संदीप मुठाळ, यश बच्छाव, अनिल गायकवाड, संतोष टिळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गटबाजी रोखली; विकासाचे काय?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक नगरपालिकेत टोकाला गेलेले गटबाजीचे राजकारण नुकत्याच झालेल्या उपनगराध्यक्ष निवडणुकीच्या निम‌ित्ताने काहीसे थांबले आहे. सर्व सतरा नगरसेवक एकत्र आले तसे यापुढे राहतील आणि शहर विकासाचा गाडा वेगाने धावेल, असे मत शहरातील ज्येष्ठ नागरिक व्यक्त करत आहेत. या पंचवार्षिकचे पहिले वर्ष वगळता वारंवार नगराध्यक्षांच्या निवडणुका आणि त्यामुळे झालेली गटबाजी आता थांबली आहे.

दरम्यान झालेल्या पक्षांतराने पाल‌िकेत भाजप आणि शिवसेना हे दोन मोठे गट तयार झाले आहेत. आता हे दोन्ही गट एकत्र आले तर खऱ्या अर्थाने युतीच्या माध्यमातून शहराचा विकास साध्य होणार आहे. आगामी निवडणुकीवर डोळा ठेऊन सर्व एकत्र आले, असे म्हंटले जात असेल मात्र जे हाते ते चांगल्यासाठी होते असे आजची परिस्थिती सांगत आहे. शहराच्या प्रलंब‌ित समस्या मार्गी लावणे गरजेचे ठरले आहे. वाढते अतिक्रमण आणि सिंहस्थाच्या निम‌ित्ताने बेरोजगार झालेल्या व्यवसाय‌िकांचा प्रश्न आता निकाली काढण्याची आवश्यकता आहे. एक वर्षापेक्षा कमी कालावधीत त्र्यंबक नगरपालिकेची सार्वत्र‌िक निवडणूक होईल तिला सामोरे जातांना सर्वच राजकीय पक्ष त्यांचे उमेदवार व समर्थक यांना प्रलंब‌ित समस्यांचा जाब विचारला जाणार आहे. याचा करत आज त्र्यंबक नगरपालिकेत समन्वयाचे सुरू असलेले राजकारण हे देर आये दुरूस्त आहे, असे म्हणावे लागेल. सिंहस्थसारखा विश्वमेळा झाला मात्र आपसातील वादाने नगर परिषदेचा म्हणावा असा ठसा यावेळेस उमटला नाही. त्यानंतर विद्यमान नगराध्यक्षा विजया लढ्ढा यांची वर्षभरातील कामगिरी तशी बऱ्यापैकी राह‌िली आहे. उन्हाळ्यात झालेले तलाव आणि धरणांच्या गाळ काढण्याचे काम अथवा अन्य महत्त्वपूर्ण योजना येथे राबविण्यासाठी केलेले प्रयत्न पाहता विरोधी गट आणि त्यांचे समर्थक यांनीदेखील या कामास सहकार्य करत आपली जबाबदारी निभावली आहे. एकूणच यापुढे पालिकेत सुरू झालेले सहमतीचे राजकारण यापुढे त्र्यंबकच्या राजकारणास नवी दिशा देणारे ठरणार आहे. अर्थात सभागृहात सतरा विरुद्ध शून्य असे चित्र पहायला मिळाल्यास ते नगरिच्या विकासासाठी उत्साहवर्धक ठरणार आहे. नागरिकांमधून याबाबत समाधान व्यक्त होत आहे.

शहराच्या प्रलंब‌ित समस्यांमध्ये अग्न‌िशमन बंब शोभेचा ठरला आहे. येथे अग्न‌िशमन अस्थापना निर्माण करण्यासाठी पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे. कचरा डेपोचा प्रलंब‌ित प्रश्न अद्याप सुटलेला नाही. हातावर व्यवसाय करणारे टपरी धारक, मासळी व मटन मार्केट यांच्या जागा अद्याप निश्च‌ित झालेल्या नाहीत, असे एक ना अनेक प्रलंब‌ित समस्या यापुढील कालावधीत निकाली निघतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

गुरुवारी रात्री कुत्र्याची शिकार करताना विहिरीत पडालेला मादी जातीचा बिबट्याला वनविभागाने सुखरूप बाहेर काढले. शिंगवे येथील साहेबराव डेर्ले यांच्या शेतातील विहिरीत ही मादी पडली होती.

एक ते दीड वर्षाची ही मादी येवला वनविभाग आणि स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नाने विहिरीतून जिंवतपणे बाहेर काढण्यात आली. शिंगवे येथे साहेबराव रंगनाथ खंडेराव डेर्ले हे शेतात वस्ती करून राहतात. गुरुवारी सायंकाळी डेर्ले कुटुंबीय हे जेवण करीत असताना अचानक मोठा आवाज झाला. डेर्ले कुटुंबाने विहिरीकडे धाव घेतली तेव्हा बिबट्या विहिरीत पडल्याचे लक्षात आले. येवला वन विभागाला कळविल्यानंतर बी. आर. ढाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंजरा टाकून बिबट्याला बाहेर काढण्यात आले. बिबट्या विहिरीत विद्युत पंपाच्या पाइपला आणि वायररोपाच्या आधाराने पाण्यात थांबून होता. बिबट्या जिथे आधाराला पकडून होता त‌िथपर्यंत दोरखंडाच्या सहाय्याने पिंजरा सोडण्यात आला. रात्री अकरा वाजता त्याल बाहेर काढण्यात आले. निफाड तालुक्यात बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वन विभागाने १५ पिंजरे लावलेले आहेत. परंतु गेल्या काही महिन्यांपासून बिबटे पिंजऱ्यात जेरबंद होण्याचे प्रमाण खूपच कमी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मौजे सुकेणेत ‘परवड’चे चित्र‌ीकरण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

महाराष्ट्रात होत असलेल्या शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावर मराठीत येत असलेल्या ‘परवड’ या चित्रपटाचे शूटिंग निफाड तालुक्यातील मौजे सुकेणे गावात सुरू आहे. शेतकरीने आत्महत्या केल्यानंतर कुटुंब‌ीयांची होणारी होरपळ आणि सावकाराकडून होणारी पिळवणूक याविरूद्ध कुटुबीयांचा लढा यावर भाष्य करणारा हा मराठी सिनेमा आहे.

मौजे सुकेणे येथील राजू परभणीकर यांच्या वस्तीवर या चित्रपटाच्या चित्र‌ीकरणास प्रारंभ झाला आहे. दिग्दर्शक दिनेश परसावत, जीतू वायकर, विनय गिरकरक यांची ही निर्मिती असून चित्रपटाचे लेखक व गीतकार पुणे येथील आसाराम कसबे हे आहेत. सुबोध चांदवडकर आणि मधुसूदन ओझा यांचे संगीत आहे.

कर्जबाजारी शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची समाजात होणारी परवड आणि त्याविरुद्ध जागी झालेली स्त्रीशक्ती यातून शेतकरी आत्महत्येपासून कसे परावृत्त होतील, कर्जबाजारी शेतकरी कुटुंबीयांनी संघटीतपणे केलेला प्रतिकार या चित्रपटातून प्रेक्षकांना दिसणार असल्याचे दिग्दर्शक दिनेश परसावत यांनी सांग‌ितले. पुणे येथे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या निवासस्थानी परवडच्या शूटिंगचा मुहूर्त झाला. या चित्रपटात गणेश कंबे, प्रीया जाधव, मधू ओझा, पूजा भागवत वैष्णवी काळे, सार्थक कसबे शशिकला काळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चार दिवस मौजे सुकेने येथे शूटिंग केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रब्बीची १०० टक्के पेरणी

$
0
0

कडाक्याच्या थंडीचा मालेगाव तालुक्यातील पिकांना फायदा

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

यंदा पावसाने मेहरबानी केल्याने खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामातदेखील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. मालेगाव तालुक्यात रब्बी हंगामातील पेरणीची कामे पूर्ण झाली असून, दोन वर्षांनंतर प्रथमच शंभर टक्के पेरणी झाली आहे. यंदा थंडीचा जोर चांगला वाढल्याने रब्बी पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, कांदा पिकांची लागवड झाल्याने शेत पुन्हा हिरवीगार दिसू लागली आहेत. रब्बी हंगामासाठी कृषी विभागाने ८ हजार ५१० हेक्टर इतके सर्व साधारण पेरणी उद्दिष्ट निश्चित केले होते. प्रत्यक्ष पेरणीत मात्र ८ हजार ६०८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्याने दोन वर्षांनंतर पेरणीचा आकडा १०१ टक्क्यांवर गेला आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी गोकुळ अहिरे यांनी दिली.

हरभरा पिकाची प्रत्यक्ष ४ हजार ११३ हेक्टरवर पेरणी झाली असून, ३१३ हेक्टर इतकी वाढ झाली आहे. त्या खालोखाल गव्हाचे क्षेत्र आहे. यात ३ हजार ८०० हेक्टरवर लागवड करण्यात आली असून, गव्हाचे क्षेत्रदेखील ३०० हेक्टरने वाढले आहे.

मंडळनिहाय विचार करता दाभाडी मंडळ क्षेत्रात सर्वाधिक ९८५ हेक्टरवर गहू लागवड करण्यात आली आहे. झोडगे मंडळ क्षेत्रात हरभरा पिकाची सर्वाधिक १ हजार ५७ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. गहू, हरभरासोबत मक्याची ६९५ हेक्टरवर लागवड पूर्ण झाली आहे. कांदा पिकाचे खरीब व रब्बी हंगाम मिळून एकूण १५ हजार हेक्टरवर लागवड होते. यातील ४ हजार हेक्टर लागवड या रब्बी हंगामात झाली आहे. पावसाने यंदा चांगली साथ दिल्याने रब्बी हंगामातील पिकाचे उत्पादन चांगले येईल. यामुळे शेतकरीदेखील समाधानी आहे.

तापमान टिकून

यंदा थंडीत कमालीची वाढ झाली आहे. पारा ९ ते १३ अंश सेल्सिअसदरम्यान राहत असल्याने या कडक्याच्या थंडीने रब्बी पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे यंदा सर्वच पिके जोमात असून, उत्पन्नातही वाढ होण्याची अपेक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील दोन विवाहित महिलांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. निमगुले येथील शीतल प्रशांत कदम (वय २५), तर जेऊर येथील रोहिणी बाबाजी सांगळे (वय २२) अशी या मृत विवाहितांची नावे आहेत. निमगुले येथील मृत विवाहितेच्या नातेवाईकांनी मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यास नकार दिल्याने, तर जेऊर येथील मृत विवाहितेच्या नातेवाईकांनीही गर्दी केल्याने रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला होता. यामुळे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

तालुक्यातील खायदे येथील शरद कौतिक देवरे यांची कन्या शीतल हिचा २०१३ मध्ये निमगुले येथील पोलिसपाटील प्रशांत गंगाधर कदम याच्याशी विवाह झाला होता. मात्र सुरुवातीपासूनच त्यांच्या वैवाहीक जीवनात तणाव निर्माण झाले होते. शनिवारी (१० डिसेंबर) रात्री शीतल हिची प्रकृती खराब झाल्याचे कारण देत उपचारासाठी तिला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. याबाबत शीतलच्या बहिणीस फोनवरून माहिती दिली. यानंतर तिचे आईवडील अन्य नातेवाईक रुग्णालयात रात्री उशिरा पोहोचले असता, डॉक्टरांनी उपचार सुरू असल्याचे सांगत तिला भेटण्यास नकार दिला. या दरम्यान शीतलने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे सासरच्या मंडळीकडून सांगण्यात आले. रात्री उशिरा डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

दरम्यान, रविवारी (११ डिसेंबर) सकाळी तिचा मृतदेह सासरच्या मंडळीने शवविच्छेदानासाठी मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात आणला. यावेळी मृत महिलेचे नातेवाईक व सासरच्या मंडळीत वादावादी झाली. मृत विवाहितेचे वडील, आई, मावशी यांनी सासरच्या लोकांनी शीतलला फास लावून खून केल्याचा आरोप करीत तिचा नवरा व सासरच्या मंडळीना अटक करावी. शवविच्छेदन करू नये, अशी भूमिका घेत ठिय्या मांडला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल बडगुजर यांनी मृत महिलेच्या नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, तसेच मृत्यूचे खरे कारण समजण्यासाठी शवविच्छेदन करू द्यावे असे सांगितले. यानंतर नातेवाईकांनी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंदण्याचे काम सुरू होते.

जेऊर येथेही विवाहितेचा

दुसरी घटना जेऊर येथे घडली. विवाहित रोहिणी बाबाजी सांगळे (वय २२) हिचा देखील विहिरीत पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला.तिचा मृतदेह शवविच्छेदानासाठी सामान्य रुग्णालयात आणण्यात आला होता. यावेळी पिंपळकोठे येथील माहेरच्या नातेवाईकांनी रुणालयात गर्दी केली होती. दुपारी उशिरा तिचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांवर आली टोमॅटो फेकण्याची वेळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर, नाशिक आणि इगतपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात लागवड झालेल्या टोमॅटोला दर मिळत नसल्याने वाहतूक खर्चही सुटत नसल्याची परिस्थिती आहे. यामुळे शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकण्याची वेळ आली आहे. बाजार सुधारेल केवळ या आशेवर झाडे जगवण्यासाठी शेतकरी आटापिटा करीत आहेत.

गतवर्षी टोमॅटोला चांगला भाव मिळाला होता. यावर्षी पाऊस चांगल्या झाल्याने सिंचनासाठी पाणी उपलब्ध आहे. या भरवशावर मोठ्या प्रमाणात टोमॅटो लागवड झाली. बाजारात टोमॅटो व्रिकीसाठी आले आणि नोटाबंदी झाली. परिणामत: बाजारात टोमॅटोसह सर्वच शेतमालाचे दर कोसळले आहेत. टोमॅटोच्या प्रति जाळीला १० ते २० रुपये मजुरी खर्च तर वाहतूक खर्च २० रुपये येतो. अशा प्रकारे टोमॅटोची जाळी बाजारात नेईपर्यंत किमान ४० रुपये खर्च होता. मात्र बाजारात एका जाळीला अवघा १० ते २० रुपये भाव मिळत आहे. एकूणच वाहतूक खर्चदेखील निघत नसल्याने टोमॅटो जागेवर फेकले जात आहेत. टोमॅटो पीक लागवडीसह देखभाल करताना खर्चिक आहे. बाजारात औषधांच्या किंमती भरमसाट वाढल्या आहेत. यामुळे खर्च वाढला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाच्या खूनप्रकरणी दोघांना पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पेठरोडवरील तुळजाभवानी नगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली. त्यापैकी दोघांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, एका अल्पवयीन संशयिताला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

परिसरातील अ‍ॅक्वा इमारतीसमोर शनिवारी रात्री दहाच्या सुमारास अक्षय नाना घुले (रा. उगले चाळ, हमालवाडी, पेठरोड) धारदार हत्याराने निर्घृणपणे वार करण्यात आले. या हल्ल्यात अक्षयचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी रात्री उश‌िरा सागर रामेश्वर आंबेकर, आकाश सुभाष खैरनार आणि अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले. त्यांना रविवारी कोर्टात हजर करण्यात आले. सागर आणि आकाश यांना सात दिवस पोलिस कोठडी तर अल्पवयीन संशयिताला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अल्पवयीन संशयित आरोपींपैकीच एकाचा भाऊ आहे.

तुमचा मित्र आमच्या बहिणीची छेडछाड काढतो आणि तुम्ही त्याला मदत करता, असे म्हणत संशयितांनी अक्षय याच्यासोबत वाद घातला. हा वाद वाढल्याने त्यांनी अक्षयवर धारधार शस्त्राने वार केले. पूर्वीही त्यांची आपापसात भांडणेही झाली होती, अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेली हत्यारे जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालेय वेळेनंतर बँक सुरू ठेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हजार आणि पाचशेच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना गेल्या महिनाभरापासून अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शिक्षक वर्गही या समस्येने हैराण झाला असून बँकेत पगार जमा झाला असूनही हातात पैसा नसल्याने दैनंदिन खर्चावरही बंधने येत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. दैनंदिन कामकाज सोडून बँकांच्या रांगांमध्ये उभे राहणे शक्य नसल्याने शालेय वेळेनंतर बँकांची सुविधा शिक्षकांना मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेने केली आहे.

डिसेंबरच्या १-२ तारखेलाच शिक्षकांचे पगार वर्ग होऊनही आपलेच पैसे काढण्यासाठी बंधने येत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. शालेय अध्यापनाचे दैनंदिन कामकाज सोडून तास न् तास बँकेच्या रांगेत उभे राहणे शक्य होत नसल्याने जिल्हा बँकेच्या दैनंदिन कामकाजाच्या वेळेत बदल करून शालेय वेळेनंतर शिक्षकांना आर्थिक व्यवहारासाठी सायंकाळचा वेळ देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष प्रा शाम पाटील, जिल्हाध्यक्ष अनिल निकम, कोष्याध्यक्ष मधुकर पवार, एनडीएसटी सोसायटीचे अध्यक्ष हेमंत देशमुख आदींनी केली आहे. सरकारच्या सातत्याने बदलणाऱ्या शैक्षणिक धोरणांमुळे दैनंदिन कामाचा अतिरिक्त भार शिक्षकांना सांभाळने एकीकडे अवघड झाले असतांना त्यामध्ये बँकेतून पगार काढण्यासाठी शालेय वेळेत बँकेत जाऊन रांगेत पैसे काढणे शक्य होत नसल्याने, पगार खात्यावर जमा असूनही हाताशी मिळणे दुरापास्त झाले आहे. यामुळे दैनंदिन जीवनात अनेक आर्थिक संकटाना तोंड द्यावे लागत असल्याने शिक्षक वर्गात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. याला पर्यायी व्यवस्था म्हणून बँकेच्या वेळेत बदल करून कर्मचाऱ्यांचा पगार अदा करण्याची व्यवस्था करावी अन्यथा जिल्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तीव्र आंदोलन पुकारुन रस्त्यावर येतील असा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जीवदया’तून होतेय पक्षी संवर्धन

$
0
0

वडनेर खाकुर्डीत केली घरटे आणि दाणापाण्याची सोय

तुषार देसले, मालेगाव

खाकी वर्दीतील माणुस म्हटले, की अत्यंत कठोर आणि कायद्याचे रक्षक अशी एक प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते. पण याच खाकीवर्दीतही संवेदनशील माणूस दडलेला असू शकतो. अशाच एका खाकीवर्दीतील माणसाच्या संकल्पनेतून पोलिस ठाण्याच्या परिसरातील पक्षांना हक्काचे घरटे आणि दाणापाणी देणारा जीवदया उपक्रम सुरू झाला आहे. यामुळे कायद्याचे रक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलिसांची निसर्ग आणि पर्यावरणाचे रक्षक अशी नवीन ओळख निर्माण झाली आहे.

तालुक्यातील वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्याच्या परिसरात सध्या जागोजागी लावण्यात आलेली कृत्रिम घरटी आणि दाणादानी (बर्ड फिडर) अनेकांच्या कौतुकाचा विषय ठरली आहेत. या पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांच्या संकल्पनेतून वेगळ्या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. नुकतेच वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्याच्या आवारात उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक नखाते यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

करंजगव्हाण येथील एका गोशाळेला भेट दिल्यावर येथील पक्षांचा वावर आणि चिवचिवाटाने सुखावलेल्या बोरसे यांना आपल्या कार्यक्षेत्रातदेखील पक्षांसाठी आपण काही तरी करायला हवे असे वाटले. पोलिस ठाण्यातील उद्यानाचे उद्घाटन तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्या हस्ते करण्यात आले आणि त्यांनी यासाठी प्रेरणा दिली. यातूनच मग जीवदया या उपक्रमाला सुरुवात झाली.

पक्षांसाठी कृत्रिम घरटे तयार करण्यासाठी डाळिंबासाठी लागणारे कागदी खोके शेतकऱ्यांनी दिली. त्यांचा पुनर्वापर करून यातून छानशी घरटी तयार करण्यात आली. यावर पक्षी वाचवण्यासंबंधीची बोधवाक्य लिहून ते अधिक आकर्षक बनविण्यात आली. बाजारात रेडिमेड दाणादाणी(बर्ड फिडर) उपलब्ध होत असतात. त्याचेच डिझाइन घेत वापरात नसलेल्या वॉटर बॉटलचा वापर करून ही दाणादाणी तयार करून घेतली. आज वडनेर खाकुर्डी गावातील गणेश मंदिर, महादेव मंदिर, शासकीय दवाखाना परिसरात हे शंभरहून अधिक घरटे व दाणी लावण्यात आल्या आहेत.

या उपक्रमाचे गावकऱ्यांनी स्वागत केले असून, यासाठी गावातील डॉ. गणेश पाटील, चेतन देवरे, प्रफुल्ल जैन, पवन ठाकरे, जितू पाटील, चेतन देवरे, संजय पवार, अनिल शोरोळे, डाळिंब उत्पादक शेतकरी, पोलिसमित्र यांनी सहकार्य केले आहे. यामुळे परिसरातील पक्षांचा वावर हळूहळू वाढू लागला आहे.

विज्ञान युगात माणूस निसर्गापासून दुरावत चालला आहे. याचा फटका प्राणी-पक्षांनादेखील बसला आहे. कावळा, चिमणी यासारखे पक्षीदेखील दुर्मिळ होत आहेत. या विचारातून पर्यावरण आणि पक्षीसंवर्धन व्हावे, यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे.

- संदीपकुमार बोरसे, सहाय्यक पोलिस निरीक्षक

गावपरिसरात कायदा सुव्यवस्था सांभाळताना भूतदया भावनेतून पोलिसांनी सुरू केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. यासाठी गावकऱ्यांनीदेखील योगदान दिले आहे. यामुळे परिसरातील पक्षांचा वावरदेखील वाढला आहे.- चेतन देवरे, ग्रामस्थ

बोधवाक्यांनी आवाहन

या उपक्रमात तयार करण्यात आलेली बोधवाक्यदेखील अर्थपूर्ण आहेत. तुमच्या प्रगतीने आमची पिढी कमी झाली, तुमच्या मुलांना पुन्हा चिवचिवाट ऐकवायचा असेल तर आम्हाला जगावा अशी वाक्य घरट्यांवर लावण्यात आली आहेत. हा उपक्रम सोशल मीडियावरही व्‍हायरल झाला असून, बोधवाक्याच्या इमेज अनेकांनी शेअर करून सेव्ह ट्री, सेव बर्ड असे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुट्यांमुळे एटीएम कॅशलेस!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तीन दिवसांच्या सलग सुट्या आल्यामुळे एटीएमवर भिस्त असलेल्या कार्डधारकांची रविवारी घोर निराशा झाली. शहरातील बहुतांश एटीएममध्ये कॅश नसल्यामुळे खडखडाट होता. काही एटीएमवर कॅश असली तरी तेथे मोठ्या रांगा होत्या. त्यामुळे सुटीच्या दुसऱ्याच दिवशी शहरात कॅश शॉर्टेजमुळे अडचणींत भर घातली. शनिवारी सुरू असलेले एटीएम रविवारी बंद असल्यामुळे ग्राहकांनी संताप व्यक्त केला.

सुटीच्या काळात ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून स्टेट बँकेसह काही बँकांनी एटीएम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. पण तो दुसऱ्याच दिवशी फोल ठरला. पाचशे व हजारांच्या नोटा रद्द झाल्यानंतर रिकॅलिब्रेशनच्या नावाखाली जिल्ह्यातील ९०३ एटीएमपैकी बँकांच्या शाखांजवळ असलेली एटीएम सुरू झाली. त्यानंतर काही एटीएमचे रिकॅलिब्रेशन झाले पण बँकांतील कॅश शॉर्टेजमुळे १० टक्केच एटीएम सुरू होऊ शकले. त्यानंतर हे एटीएम पुन्हा बंद पडल्यामुळे ग्राहकांचा संताप वाढला आहे. एटीएम केंद्रात दोन वेळा कॅश टाकली तर एटीएम केंद्र दिवसभर सुरू असते. पण बहुतांश एटीएम केंद्रांवर एकाच वेळेस कॅश टाकली जात होती. त्यामुळे ती लवकर संपून जात होती.

नोटा रद्द झाल्यानंतर पहिल्याच पगाराचे बँकेत पुरेशी कॅश नसल्यामुळे वेतनदारांना रेशनिंगने पैसे मिळाले. त्यामुळे कॅशची चणचण सर्वांना भासत असताना सर्वांनाच एटीएमचा आधार होता. त्यात रविवार असल्यामुळे अनेकांकडे पैसे काढण्यासाठी वेळ होता. पण एटीएमची स्थिती बघून त्यांचाही हिरमोड झाला. सोमवारी ईदमुळे सुटी आहे. त्यानंतर मंगळवारी बँका सुरू होणार असून, त्यावेळीही प्रचंड गर्दी असणार आहे. त्यामुळे कॅशलेस व्यवहारावरच आता सर्वांची भिस्त असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक-पुणे मार्गावर वाहतूक तीन तास ठप्प

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

राख वाहून नेणाऱ्या ट्रकचा पाटा चेहेडी येथील दारणा नदीच्या पुलावर तुटल्याने नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतूक रविवारी दुपारी तीन तास ठप्प झाली. यामुळे प्रवाशी आणि वाहनचालकांचे हाल झाले.

रविवारी दुपारी नाशिकरोडहून सिन्नरकडे राख वाहून नेणाऱ्या ट्रकचा दारणा नदीच्या पुलावर पाटा तुटल्याने तो जागेवरच थांबला. चालकाला ट्रक पुढे नेणे अवघड झाले. पुलावरच ट्रक अडकल्याने नाशिक-पुणे महामार्गावरील दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती. चेहेडी पूल ते सिन्नर फाटा, शिंदे, पळसेपर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. नाशिकरोड पोलिस, वाहतूक शाखेचे कर्मचारी व बीट मार्शल यांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. तब्बल तीन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे खासगी वाहनांतील तसेच एसटी बसच्या प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. ट्रकच्या दुरुस्तीचे काम झाल्यानंतर तब्बल तीन तासांनंतर वाहतूक सुरळीत झाली. दारणावरील हा पूल जुना झाला असून, त्याचे आयुष्य संपले आहे. त्यामुळे शेजारीच नवा पुल उभारला जात आहे. तथाप‌ि, त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने वाहतुकीची कोंडी नेहमीचीच झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘समृद्ध जीवन’वर नाशकातही गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यभर गाजत असलेला समृद्ध जीवन मल्ट‌ि स्नेहसृष्टी कंपनीच्या विरोधात ३६ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रल्हाद गारला पांडू दोंदे होके (रा. वृंदावन नगर, डीजीपीनगर, कामटवाडा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीने वेळोवेळी समृद्ध जीवन मल्ट‌ि स्नेहसृष्टी पर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी या कंपनीमध्ये १३ महिन्यांच्या गुंतवणुकीवर १२ टक्के व्याजदराच्या परताव्याच्या आमिषाने ३६ लाख ४० हजार ६५५ रुपये गुंतविले. परंतु कंपनी व संचालकांनी व्याजासह मुद्दल रक्कम परत न करता तिचा अपहार केल्याची फिर्याद देण्यात आली आहे. संशयित महेश मोतेवार, सचिन देवरे (समृद्ध जीवन सोसायटी, मंजिल प्लाझा, दुसरा मजला, गोंविंदनगर) यांच्या विरोधात मुंबई नाका पोल‌िसांनी गुन्हा दाखल केला आहे.


गंगापूर रोडवर चेन स्नॅचिंग

गंगापूररोडलगतच्या पंपिंग स्टेशन परिसरात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दोघा चोरट्यांनी हिसकावून नेले. वंदना विलास लोखंडे (रा. शालिमार सोसायटी, गंगापूर रोड) यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास त्या पंपिंग स्टेशन परिसरातील एका खासगी हॉस्पिटलसमोरून चालल्या होत्या. पायी आलेल्या दोघा संशयितांनी त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. त्यानंतर चोरटे मोटारसायकलवरून पळून गेले. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


इंदिरानगरात मोबाइल चोरी

इंदिरानगर परिसरातील इमारतीच्या फ्लॅटमधून चोरट्याने मोबाइल चोरून नेला. आकाश दीपक जाधव (रा. लक्ष्मी दर्शन अपार्टमेंट, रथचक्र चौक, इंदिरानगर) याने फिर्याद दिली आहे. शनिवारी रात्री ८ ते ९ च्या सुमारास चोरट्याने फ्लॅटचा दरवाजा उघडा असताना १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

जादूटोणाप्रकरणी तिघांवर गुन्हा

नाशिकरोड येथील विवाहितेला तिच्या नवऱ्याविरोधात फितवून लग्नासाठी धमकावणे व जादूटोणा केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित रिजवान सादीक मन्सुरी उर्फ पिंजारी (वय २५, रा. इरम प्लाझा, वडाळा-अशोका रोड, नाशिक), शोएब (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुझा नवरा तुझ्यावर जादूटोणा करतो. तो तुला मारून टाकेन असे सांगून संशयितांनी तिचा विश्‍वास संपादन केला. तसेच, सतत पैशांची मागणी करून लग्न करण्याबाबतही धमकावले. वणी येथील जादूटोणा करणाऱ्या बाबाकडे तिला घेऊन गेले. मंतरलेला ताईत व पाणी देऊन शरीरसंबंध व लग्नासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु विवाहितेने त्यास नकार दिल्यानंतर त्यांनी तिच्या नवऱ्याचा खून करण्यासाठी सुपारी देण्याचीही धमकी दिली. याप्रकरणी वणी येथील जादूटोणा करणाऱ्या बाबासह तिघांविरोधात नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


सराफ दुकानातून दागिने चोरीस

सराफ बाजारातील आडगावकर ज्वेलर्स या दुकानात सोने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोघींनी कामगाराची नजर चुकवून २७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. प्रसाद गजानन आडगावकर यांनी फिर्याद दिली आहे. गेल्या १८ ऑक्‍टोबर रोजी दुपारी अडीच ते सायंकाळी साडेसातच्या सुमारास दोन महिला सोने खरेदीसाठी आल्या होत्या. यापैकी बॉयकट असलेल्या महिलेने गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला होता तर दुसरीने निळ्या रंगाची जिन्स व त्याच रंगाचा टॉप परिधान केला होता. या दोघींनी दुकानातील कामगार पंकज कुलकर्णी याची नजर चुकवून २७ हजार ४०० रुपयांचे सोन्याचे गंठन चोरून नेले. ही बाब आता लक्षात आल्यामुळे सरकारवाडा पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे.


विजेच्या धक्क्याने युवक ठार

औरंगाबाद नाका येथील हॉटेलसमोर डेकोरेशन करीत असताना विजेचा धक्का बसल्याने युवकाचा मृत्यू झाला. कुलदीप राधेशाम पासवाल (वय २१, रा. औरंगाबाद नाका) असे मृत युवकाचे नाव आहे. तो शनिवारी (दि. १०) रोजी सायंकाळी सातच्या सुमारास डेकोरेशनचे काम करीत होता. त्यावेळी त्याला विजेचा धक्का बसला. त्याला तातडीने सिव्ह‌िल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.


व्हॉटसअॅपवरून विनयभंग

सोशल मीडियावर अल्पवयीन मुलीविषयी अश्‍लिल शब्दप्रयोग करून विनयभंग केल्याप्रकरणी नाशिकरोडच्या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित १५ वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे. संशयित स्वप्निल संजय वाघ (वय २१, रा. साईकृपा सोसायटी, नाशिकरोड) याने अंकुश सोमनाथ घरावणे याच्या मोबाइलवर व्हॉटस्‌ऍप या सोशल मीडियावर पीडित मुलीस उद्देशून अश्‍लिल शब्दप्रयोग केला. अंबड पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमधील २११ शाळा मुख्याध्यापकांविनाच

$
0
0

ashwini.kawale@timesgroup.com
tweet : @ashwinikawaleMT

नाशिक : विद्यार्थी, शिक्षक, शिक्षणसंस्था यांसाठी मुख्याध्यापक हे पद महत्त्वाचे असले तरी मनपा कार्यक्षेत्रातील २११ खासगी विनाअनुदानित शाळांमधील मुख्याध्यापक केवळ बाहुले म्हणून त्या पदावर असल्याचे समोर येत आहे. शहरातील या शाळांना मान्यताप्राप्त मुख्याध्यापकच नसून, शाळा प्रशासन व मुख्याध्यापकांची बेजबाबदारी या प्रश्नास कारणीभूत असल्याचे मत याविषयी मनपा शिक्षण समितीकडून व्यक्त करण्यात आले आहे, तसेच या शाळांना याप्रश्नी नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.

शिक्षण क्षेत्रासमोर आज एक ना अनेक प्रश्न आजमितीला उभे असून, खासगी शाळांचे व प्रामुख्याने इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे अनेक प्रश्न समोर येत आहेत. शाळांना मान्यता नसणे, अव्वाच्या सव्वा फी आकारणे आदी बाबी यातून वेळोवेळी समोर येत आहेत. याबरोबरच मुख्याध्यापकही मान्यताप्राप्त नसल्याने शाळांमध्ये शैक्षणिक विषयाबद्दल खरेच गांभीर्य आहे का, हा प्रश्नदेखील पुढे आला आहे. मुख्याध्यापक व संस्थांच्या बेजबाबदारपणा यासाठी कारणीभूत ठरला आहे. केवळ आर्थिक अहवालांवर, तसेच पद भरण्यापुरती मुख्याध्यापकांची भरती करण्यात आली असून, त्यांना कोणतेही अधिकार शिक्षण संस्थांनी बहाल केलेले नाहीत. मुख्याध्यापकही केवळ वेतन वेळेत होते, म्हणून मान्यतेच्या फंदात पडत नसून, त्यांचा निष्काळजीपणा त्यांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. याप्रश्नी शिक्षण संस्थांशी संवाद साधला असता, हल्ली शाळेशी निगडित शालेय पोषण आहार, वाहतूक, शिष्यवृत्ती आदी प्रत्येक बाबीशी मुख्याध्यापकालाच जबाबदार धरण्यात येत असल्याने आहे त्या स्थितीत पदावर काम करण्याची तयारी मुख्याध्यापकच दर्शवित आहेत, तर शिक्षण विभागाकडूनही दोन वर्षांपासून मान्यता प्रक्रियेसाठी कोणतेही कॅम्प लावले जात नसल्याची खंत मुख्याध्यापकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

ते केवळ नामधारीच

मुख्याध्यापकपदासाठी सरकारची मान्यता घेतल्यास त्या दर्जाचे वेतन संस्थांना देणे बंधनकारक ठरते. हे पैसे वाचविण्यासाठी व यापासून पळ काढण्यासाठी संस्थाचालकही मान्यता घेण्याचे टाळत असल्याचे सूत्रांनी सांगितले. याचा अप्रत्यक्ष परिणाम विद्यार्थ्यांवर होत असून, ज्या बाबींची जबाबदारी मुख्याध्यापकावर देण्यात आली आहे तेदेखील मान्यता नसल्याच्या नावाखाली अशा जबाबदारींमधून पळ काढत असल्याची गंभीर बाबही समोर येत आहे.

मान्यताप्राप्त मुख्याध्यापक नसलेल्या शाळा खासगी विनाअनुदानित असून, अनुदानित शाळांमध्ये ही समस्या नाही. शाळा प्रशासन आणि स्वतः मुख्याध्यापकांच्या बेजबाबदारपणामुळे ही परिस्थिती आहे. या विषयाचे गांभीर्य त्यांना समजण्यासाठी शाळांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. हे प्रमाण एकूण शाळांच्या ८७ टक्के आहे.
- नितीन उपासनी, प्रशासनाधिकारी, मनपा शिक्षण समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज पुन्हा उसळणार गर्दी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पैशांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून बँका बंद असल्यामुळे एटीएमच्या बाहेर रांगा लागल्या आहेत. उद्या, मंगळवारी बँका सुरू होणार असल्याने पुन्हा एकदा गर्दी उसळणार असल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी पैसे काढण्यासाठी शहरातील स्टेट बँकेकेच्या एटीएमसमोर नागरिकांची रांगा लावल्या होत्या.

शनिवारपासून सुटी असल्याने सोमवारपर्यंत नागरिकांना केवळ एटीएमचा आधार घ्यावा लागला. मात्र तेथेही कदी नेकवर्ट प्रॉब्लेम तर कधी रोकड संपणे अशा अचडणी आल्यामुळे नागरिकांचा मनस्ताप झाला.

नोटबंदीचा निर्णय जाहीर होऊन महिनाभराचा कालावधी लोटला आहे. या काळात नागरिकांना बँकेत असलेला आपलाच पैसा काढण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. १० ते १२ डिसेंबर या काळात बँकांना सलग सुट्या आल्या. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या दैनंदिन व्यवहारासाठी लागणारा पैसा उपलब्ध होण्यात अडचणी आल्या. पैसे काढण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना केवळ दोन हजार रुपये हाती येत असल्याने अनेकांचा हिरमोड झाला. काही एटीएममधील रोकड काही तासांत संपली. रविवारी एसबीआयच्या एटीएममध्ये पैसे मिळत असल्याने तेथे दिवसभर नागरिकांची रांग लागल्याचे दिसून आले. बहुतेक एटीएम केंद्रावर एटीएम बंद असल्याचा फलक झळकत होता. वास्तविक सुट्यांच्या कालावधीत एटीएममध्ये रोकड उपलब्ध करून देण्यात येईल, असे बँकांच्या वतीने शुक्रवारीच सांगण्यात आले होते. तरीही या एटीएममधून केवळ दोन हजार रुपयेच उपलब्ध होत आहेत. त्यातही काही ठराविक ठिकाणी असलेल्या एटीएमवर नागरिकांची जास्त गर्दी झाल्याने त्या ठिकाणी असलेली रक्कम लगेच संपली. मात्र, त्यानंतर बराच वेळ वाट पाहूनही त्या एटीएममध्ये रक्कम टाकण्यात आली नाही.

त्यामुळे त्या ठिकाणी रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना अन्य एटीएमच्या शोधात वेळ घालवावा लागला.

हाती पैसे, तरीही डोकेदुखी

शनिवारी आणि रविवारी बऱ्याच ठिकाणी एटीएममधून केवळ दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा हाती येत होत्या. त्यामुळे आता या दोन हजार रुपयांचे सुटे कोठून आणायचे, असा प्रश्न अनेकांपुढे निर्माण झाला होता. बऱ्याच ठिकाणी व्यावसायिकही ग्राहकांकडे सुटे आहेत, काय याची खातरजमा करूनच साहित्य विक्री करत असल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे दोन हजारांच्या नोटेचे सुटे करण्यासाठी अनेकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

नियोजन कोडलमडले

नागरिकांकडे असलेले पाचशे आणि हजारच्या नोटा जमा करण्यासाठी आता काही दिवसचीच मुदत आहे. त्यातच गेल्या तीन ‌दिवसांपासून बँकांना सुटी आल्याने नागरिकांनी उधार उसणवारीवर दिवस काढावे लागले. उद्या मंगळवारी बँका पुन्हा सुरू होणार असल्याने तेथे गर्दी उसळण्याची शक्यता आहे. लग्नसराई, सुट्यांचा मोजम, बाहेरगावी जाण्यचे नियोजन आणि त्यातच काही दिवसांवर येवून ठेवलेला ३१ डिसेंबर यामुळे रोकड मिळविण्यासाठी नागरिक अनेक युक्ती लढवित आहेत. त्यामुळे मंगळवारी बँक‌ेतून पैसे काढण्यासाठी गर्दी उसळणार आहे.

भेटवस्तूंचे प्रमाण वाढले
नोटाबंदीनंतर झालेल्या विवाहसोहळ्यांवर या मंदीचे सावट दिसून आले. परिसरातील लॉन्सवर झालेल्या अनेक विवाहांमध्ये वधू वरांना पाकिटातून आहेर ‌देण्याचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे कार्डद्वारे भेटवस्तू खरेदी करूनच वधूवधरांच्या हातात गिफ्ट बॉक्स देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन दिवसात नऊ लाखांची देणगी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

सलग शासकीय सुट्यांनी त्र्यंबकनगरी गजबजली असून, भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. देवस्थान ट्रस्टला देणगी दर्शनाने तीन दिवसात जवळपास ९ लाख रुपये मिळाले आहेत. नोटाबंदीच्या महिन्यानंतर प्रथमच देणगी दर्शनासाठी रांग लागली होती.

१० डिसेंबरला १ लाख ८० हजार, ११ डिसेंबर ५ लाख, १२ डिसेंबर २ लाख रुपये देणगी मिळाल्याचे देवस्थान ट्रस्ट यांचेकडून सांगण्यात आले. वाहनतळ ते मंदिर परिसर येथील व्यवसाय‌िकांचादेखील व्यवसायाला गती मिळाली. अर्थात सुट्या नोटा नसल्यामुळे व्यवसायात थोडा घाटा आला. जर पुरेसे चलन हाताशी असते तर यया तीन दिवसांत चांगला व्यवसाय झाला असता असे व्यापाऱ्यांनी सांगितले. किरकोळ विक्री, चहापान आदी दुकांनाना मात्र नोटाबंदीचा चांगलाच फटका बसला आहे. तरीदेखील मंदिराचे समोरील रस्त्याला गेल्या तीन दिवसांपासून चौपाटीचे स्वरूप आले आहे.

वाहनतळ गजबजले
गेल्या महिनाभरापासून तुरळक प्रमाणातच वाहने असणारे वाहनतळ गेल्या तीन दिवसात ओव्हर फ्लो झाले आहे. येथे वाहन लावण्यास जागाच शिल्लक राहत नाही. नगर पाल‌िकेला वाहनतळ फी माध्यमातून बरघोस उत्पन्न मिळत असून, गेल्या महिनाभरापासून यात चांगलीच घट आली होती. त्यामुळे येणारा नाताळ आणि ३१ डिसेंबरची सुटी पाहता त्र्यंबकेश्वर येथील व्यवसाय वाढीस लागणार असल्याचे जाणकारांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन हजाराची नोट झालीय नकोशी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, घोटी

बँका आणि एटीएममधनू हातात पडणारी दोन हजार रुपायांची नोट आता नागरिकांना नकोश झाली आहे. सुरुवातीला आकर्षण वाटणारी ही दोन हजाराची नोट आता पाकिटात जड होत आहे. कोणीही सुटे देण्यास तयार नसल्याने नागरिकांची असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. घोटी सारख्या ग्रामीण भागात सुट्यांसाठी सगळीकडेच शोधाशोध सुरू आहे.

केंद्र सरकार व अर्थ मंत्रालयाने नोटबंदीचा निर्णय जाहीर करुन सामान्य जनतेच्या अडचणीत भर घातली आहे. हा निर्णय स्तुत्य व चांगला असला तरी सामान्य जनतेला मात्र त्रासदायक ठरू पाहत आहे. शासनाने दोन हजार रुपयांची नोट चलनात आणली तरी पाचशेची नोट मात्र अद्यापही व्यवहारात आली नसल्याने आर्थिक व्यवहारांना गती मिळत नाही.

इगतपुरी सारख्या आदिवासी तालुक्याला व प्रख्यात घोटी सारख्या बाजारपेठांना या आर्थिक नोटबंदीची झळ बसली आहे. बाजारात सुटे मिळत नसल्याने दोन हजाराची नोट नकोशी वाटू लागली आहे. व्यवहारांना गती मिळण्यासाठी पाचशेची नोट हवीहवीशी वाटू लागली आहे. मात्र या तालुक्याच्या बाजारपेठेत अद्यापही पाचशेच्या नोटा न आल्याने जनता हवालदिल झाली आहे.

बँकामध्येही रांगा अन् एटीएमला शटरच

नोटबंदीचा निर्णय होऊन महिना लोटला तरीही बँक आणि एटीएमबाहेरची गर्दी कमी झालेली नाही. बाजारपेठेतील आर्थिक उलाढालीवर कमालीचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. अजूनही पहाटेपासूनच सामान्य खातेदार बँकेच्या दारात आपले पैसे घेण्यासाठी उभे राहिलेले दिसत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांनाही आर्थिक उसनवारी करुण घोटी-इगतपुरीला बँकेत यावे लागत आहे. त्यातही पैसे काढण्यासाठी संपूर्ण दिवस खर्ची घालावे लागत असल्याने या तापदायक स्थितीचे समर्थन कसे करावे असा प्रश्न व्यक्त केला जात आहे. घोटी शहरात अनेक बँका व वित्तीय संस्थांच्या अनेक एटीएम अस्तांनाही केवळ स्टेट बँकेचेच एटीएम सुरू आहे. अन्य बँकांचे एटीएम अनेक दिवसापासून बंद आहेत. एटीएमचेही शटर खाली असल्याने नागरिकांचा हिरमोड होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images