Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

दिमाखदार सोहळ्यात ‘रणजी’चा शुभारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बीसीसीआय आणि नाशिक डिस्ट्रीक्ट क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने अनंत कान्हेरे मैदानावर आयोजित रणजी क्रिकेट स्पर्धेला बुधवारी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमीतसिंग बग्गा, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल, दोन्ही संघाचे कर्णधार इरफान पठाण व सुरेश रैना यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडण्यात आले.

प्रमुख पाहुण्यांचे स्वागत नाशिक जिल्हा क्रिकेट असोसीएशनचे अध्यक्ष विनोद शहा यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी दोन्ही कर्णधार आपल्या संघांसह उपस्थित होते. यानंतर सामन्याला सुरुवात झाली. सकाळचा गारवा आणि मैदानावर सुरू असलेले संगीत यामुळे वातावरण अधिकच खुलले होते. सुरेश रैना, इरफान पठाण, प्रवीण कुमार हे आघाडीचे खेळाडू या सामन्यात सहभागी झाल्याने क्रिकेट रसिकांनी गर्दी केली होती. मैदानात खेळाडूंनी प्रवेश करताच प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. या सामन्यासाठी शुल्क नसल्यामुळे खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नाशिककरांनी उपस्थित रहावे असे आवाहन विनोद शहा यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऑनलाइनसाठी मोबाइल असुरक्षित

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

इंटरनेट युझर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्यामुळे सायबर क्राईमदेखील वाढत आहे. त्यासाठी ऑनलाइन खरेदी आणि ऑनलाइन बँकिंग करताना स्वतः काळजी घेणे गरजेचे आहे. ऑनलाइन बँकिंगमध्ये मोबाइल वापरण्यापेक्षा लॅपटॉप किंवा डेस्कटॉपचा वापर करणे सुरक्षित आहे. कारण मोबाइलमध्ये सर्व डिटेल्स तत्काळ घेतो, त्यामुळे छोटीशी चूक त्रासदायक ठरू शकते, असे मत विकास नाईक यांनी व्यक्त केले.

रोटरी हॉल गंजमाळ येथे मंगळवारी (दि. ६) ‘ऑनलाइन बँकिंग व्यवहार’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. या वेळी व्यासपीठावर सायबर तज्ज्ञ विकास नाईक, अॅड. नागनाथ गोरवाडकर, विजय दिनानी, राधेय येवले, राजेश्वरी वालजीवाले, स्मिता अपशंकर हे उपस्थित होते .

नाईक यांनी, तंत्रज्ञानात रोज नवनवीन बदल होत असल्याने आपण स्वतःचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी नवीन अॅप्लिकेशन व तंत्रज्ञानाची सखोल माहिती ठेवण्याचे सांगितले. कारण अपूर्ण माहितीमुळे तुम्ही अडचणीत येऊ शकतात. आता तर नोट बंदीमुळे ऑनलाइन बँकिंग व खरेदीमध्ये मोठी वाढ झालेली आहे. सोबतच आपल्या देशाची लोकसंख्या मोठी असल्याने या ऑनलाइन शॉपिंगवर हॅकर्सची नजर असणार आहे. परिणामी, प्रत्येकाने ऑनलाइन व्यवहार करताना सावधानता बाळगावी. अनेकदा फोन कॉल्सद्वारे माहिती मिळवण्याचा प्रयत्नही केला जातो. त्यामुळे कोणतीही गोपनीय माहिती कोणालाही सांगू नये आणि मोठी रक्कम जिंकल्याचे फेक मेसेज येतात त्यांना बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी उपस्थिताना केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरण वसाहत धूळ खात

$
0
0

टवाळखोरांचा वावर; इमारतीला उपयोगात आणण्याचे साकडे

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या १३२ के. व्ही. विज उपकेंद्राच्या महावितरण कंपनीची वसाहत गेल्या अनेक वर्षांपासून धूळ खात पडून आहे. एकीकडे उद्योजकांना भुखंड उपलब्ध होत नसताना पडून असलेला भुखंड उपयोगात आणण्याची मागणी उद्योजकांनी केली आहे.

अंबड व सातपूर औद्योगिक वसाहत स्थापन झाल्यावर महावितरण कंपनीलाही मोठा भुखंड मिळाला होता. यानंतर महावितरण कंपनीने याठिकाणी कारखान्यांना वीजपुरवठा करण्यासाठी १३२ के. व्ही. उपकेंद्राची उभारणी केली होती. या उपकेंद्रावर काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी सुंदर अशा इमारतीही महावितरण कंपनीने बांधल्या होत्या. तसेच उपकेंद्रावर काम करणारे कर्मचारी, अधिकारी महावितरणाने उभालेल्या वसाहतीत अनेक वर्ष वास्तव्यासदेखील होते. परंतू, महावितरणाच्या वसाहतीच्या बाजूलाच झोपडपट्टीचे मोठे अतिक्रमण झाल्याने अनेक कर्मचारी व अधिकारी यांनी वसाहतीतून काढता पाय घेतला. तर बदली होऊन गेलेल्या अनेकांची इमारतीतील घरे आता ओसाड पडली आहेत. पडून असलेल्या इमारतींचे मोठे नुकसान काही टवाळखोरांकडून झाले आहे.

अनेक वर्षांची मागणी

दरम्यान अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीत उद्योगांना भुखंड मिळावा यासाठी नेहमीच उद्योजक मागणी करत असतात. परंतू महावितरणाचा मोक्याच्या जागी असलेल्या भुखंड गेल्या अनेक वर्षांपासून पडून असल्याने त्याचा योग्य उपयोग करावा अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीच्या वाटेत अडथळ्यांची शर्यत

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वेगाने विकसित होणाऱ्या शहरात नाशिकची गणना होत असली, तरीही अद्याप मूलभूत सुविधांमध्येच त्रुटी दिसत आहेत. केवळ प्रमुख रस्ते चकचकीत आहेत, तर अंतर्गत भागात रस्त्यांच्या खड्ड्यांची समस्या कायम आहे. याशिवाय एकवेळ पाणीपुरवठा, घंटागाडी सेवा आदी मुद्यांविषयी नाशिककरांनी सकारात्मक मत व्यक्त केल्याची बाब महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केलेल्या सर्वेक्षणातून अधोरेखित झाली आहे.

एचपीटी आणि आरवायके कॉलेजच्या मास कम्युनिकेशन अॅण्ड जर्नालिझम विभागातर्फे ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यांत ही पाहणी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी केलेल्या या पाहणीत शहर विकासाशी संबंधित अनेक बाबी उघड झाल्या. शहरातील साडेचार हजार नागरिकांशी संपर्क साधून प्रश्नावलीद्वारे माहिती भरून घेण्यात आली. महापालिकेच्या पूर्व, पश्चिम, पंचवटी, सिडको, सातपूर आणि नाशिकरोड अशा सहा विभागांतील नागरिकांशी संपर्क साधण्यात आला. महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, विभागप्रमुख प्रा. डॉ. वृन्दा भार्गवे, डॉ. हेमंत राजगुरू, पत्रकार संजय पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली ही पाहणी करण्यात आली.

शहरात निर्माण झालेली पाण्याची समस्या, पाणीकपात, एकवेळ पाणीपुरवठा या पार्श्वभूमीवर शहरात एकवेळ पाणीपुरवठा करण्यास ७३ टक्के नागरिकांनी अनुकूलता दर्शविली. महापालिकेचे पाणी वाया जात असल्याचे मत ४७ टक्के नागरिकांचे आहे. नळाच्या तोट्या सुरूच ठेवणे, वाहने धुणे, टाक्यांतून पाणी वाहत जाणे आणि जलवाहिन्यांना गळती इत्यादी कारणेही नागरिकांनी नमूद केली.

वाहतूक समस्या बिकट

रस्त्यांवरील खड्ड्यांकडे महापालिका दुर्लक्ष करीत असल्याचे मत ८१ टक्के नागरिकांनी नोंदविले आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सक्षम नाही, असे ५८ टक्के लोकांचे मत आहे. बहुमजली वाहनतळ असावेत, असे मत सुमारे ७६ टक्के लोकांनी व्यक्त केले आहे. पे अॅड पार्क सेवा सोयीची वाटते, या मताशी ६३ टक्के लोकांनी सहमती दर्शवली आहे. फूटपाथचा वापर केला जातो, असे म्हणणाऱ्यांचे प्रमाण ५६ टक्के आढळून आले आहे. अतिक्रमणे, अस्वच्छता, जनावरांचा राबता आदी कारणांनी फुटपाथचा वापर करता येत नाही, असे ३२ टक्के नागरिकांचे मत आहे. शहरात हॉकर्स झोन अस्तित्वात आल्यानंतर अतिक्रमणांचा प्रश्न सुटेल, असे ६२ टक्के लोकांचे मत आहे. या सर्व परिस्थितीत मोकाट आणि भटक्या जनावरांचा बंदोबस्त करण्यात महापालिकेची यंत्रणा सक्षम नसल्याचा अभिप्राय ६४ टक्के लोकांनी नोंदविला आहे.

शहरात झोपडपट्ट्यांची संख्या वाढत असल्याचे मत सुमारे ६९ टक्के लोकांनी नोंदविले आहे. राजकीय सोय म्हणूनही झोपडपट्ट्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. परवडणारी घरे उपलब्ध होत नसल्याने झोपडपट्ट्या वाढतात आणि रोजगारीचा प्रश्नही यामागे कारण असल्याचे पाहणीमध्ये निदर्शनास आले आहे.

इंग्रजी शाळांना पसंती

मराठी भाषेचा जप करण्याचा सर्वत्र प्रयत्न केला जात असला, तरी महापालिकेने इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू कराव्यात, असे मत सुमारे ७९ टक्के लोकांचे आहे. याचाच अर्थ इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे लोकांचा कल वाढत असल्याचे दिसते.

‘अॅप’ला प्रतिसाद नाही

महापालिकेचे मोबाइल अॅप अस्तित्वात असले आणि डिजिटल इंडियाचा मोठा डांगोरा पिटला जात असला, तरी अॅप वापरणाऱ्यांचे प्रमाण मात्र तुलनेत कमीच आहे. मोबाइल अॅप वापरत नसल्याचे सुमारे ७६ टक्के लोकांनी नमूद केले.

आरोग्य अन् स्वच्छता...

नागरिकांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी महापालिका सार्वजनिक स्वच्छतेसाठी पुरेसे प्रयत्न करत नाही असे ५५ टक्के लोकांचे मत आढळून आले. दुसरीकडे मात्र घंटागाडीप्रभावी आहे, असे मत ५६ टक्के लोकांनी नोंदविले आहे. खासगी वैद्यकीय सेवेच्या तुलनेत महापालिकेची वैद्यकीय सुविधा चांगली नसल्याचे मत सुमारे ६५ टक्के लोकांनी व्यक्त केले. आरोग्य आणि पर्यावरणासाठी शहरात आणखी उद्यानांची गरज ७२ टक्के लोकांनी व्यक्त केली.


नागरिकांनी केलेल्या काही सूचना...

रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत.

अतिक्रमणे काढावीत.

चांगले फूटपाथ असावेत.

वाहनचालकांनी झेब्रा क्रॉसिंगचे उल्लंघन केल्यास त्याला जबर दंड करण्यात यावा.

रस्ता दुभाजक आणि गतिरोधक वाढवावेत.

डास निर्मूलन करावे.

सीसीटीव्हींची संख्या वाढवावी.

पथदीपांची देखभाल करावी, प्रकाश क्षमता वाढवावी.

वीजतारा भूमिगत कराव्यात.

महापालिकेने जनसंपर्क वाढवावा.

सांडपाण्यासाठी गटार व्यवस्थेत सुधारणा करावी.

नियमित स्वच्छता हवी.

उघड्यावरील मांसविक्री बंद करावी.

वाहतूक पोलिसांना मास्क पुरवावेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलनांनी वाहतुकीचा फज्जा

$
0
0


टीम मटा

शहरात बुधवारी झालेल्या आंदोलनांमुळे वाहतुकीचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. नोटाबंदीच्या निर्णयानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्यवहारांवरील मर्यादांच्या निषेधार्थ बँकेच्या अध्यक्षांसह पदाधिकारी रस्त्यावर उतरले होते. सीबीएससारख्या वर्दळीच्या परिसरात त्यांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने सुमारे दोन तास वाहतुकीचा फज्जा उडाला. आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलक ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने पोलिसांशी त्यांची वादावादी झाली. दुसरीकडे भटके विमुक्त समाज विकास परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयावर पुकारलेल्या हल्लाबोल आंदोलनात समाजबांधवांनी रस्त्यावरच आपले पारंपरिक व्यवसाय थाटून रास्ता रोकोचा प्रयत्न केल्याने वाहतुकीचे तीनतेरा वाजल्याचे दिसून आले. या सर्व गोंधळामुळे वाहनचालकांची मात्र प्रचंड गैरसोय झाली.

--

जिल्हा बँकेकडून नोटांसाठी रास्ता रोको!

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नोटाबंदीच्या निर्णयानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्यवहारांवर प्रचंड मर्यादा आल्या असून, या निषेधार्थ जिल्हा बँकेच्या अध्यक्षांसह अनेक पदाधिकारी बुधवारी रस्त्यावर उतरले. सीबीएससारख्या

वर्दळीच्या परिसरात त्यांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने सुमारे दोन तास वाहतुकीचा फज्जा उडाला. बँकेत जमा ३४९ कोटी १७ लाख ७७ हजार रुपयांची रोकड बदलून द्यावी, तसेच रब्बी हंगामासाठी पीककर्ज वितरणास निधी उपलब्ध करून द्यावा, आदी मागण्या करण्यात आल्या.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जिल्ह्याची अर्थवाहिनी समजले जाते. ८ नोव्हेंबर रोजी पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर अनेक बंधने घातली आहेत. परिणामी बँकांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. या निषेधार्थ बुधवारी बँकेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह संचालक मंडळ, ठेवीदार आणि शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. सुरुवातीला त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. या निवेदनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ५०० व १००० रुपयांच्या नोटबंदीच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला आहे.

निवेदनात म्हटल्यानुसार, जिल्हा बँकेच्या माध्यमातून विविध कार्यकारी सेवा संस्थांद्वारे शेतकरी सभासदांपर्यंत कर्जपुरवठा व सवलती पुरवून सभासदांचे जीवनमान उंचावण्याचे काम केले जाते. परंतु, विनाकारण आयकर विभागाकडून चौकशीचा ससेमिरा लावून बँकेची बदनामी केली जात आहे. केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने नोटारद्दचा निर्णय घेतल्यानंतर जिल्हा बँकेच्या २१२ शाखांमध्ये १० ते १३ नोव्हेंबर या कालावधीत तब्बल ३२४ कोटी १० लाख ६१ हजार रुपयांची रक्कम जमा झाली. त्यामध्ये ५०० च्या नोटांची संख्या ४१ लाख २५ हजार ७०२, तर एक हजार रुपयांच्या नोटांची संख्या ११ लाख ७८ हजार २१० होती. कोट्यवधी रुपये आजही बँकेकडे पडून आहेत. या नोटा रिझर्व्ह बँकेकडून बदलून मिळत नसल्याने ठेवीदारांना त्यांचे पैसे देण्यास आणि रब्बी हंगामातील पीककर्ज वितरण करण्यास बँकांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. ठेवीदार व ग्राहकांमध्ये बॅँकेची बदनामी होत आहे.

केंद्र सरकारने तत्काळ नवे चलन उपलब्ध करून द्यावे, बँकांमध्ये जमा झालेली रक्कम बदलून द्यावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी दिला आहे. उपाध्यक्ष सुहास कांदे, नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष भास्कर कोठावदे, संचालक शिरीष कोतवाल, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, दिलीप बनकर आदींसह शेकडो जण आंदोलनात सहभागी झाले.

--


पोलिसांशी वाद

धरणे देण्यासाठी बसलेले आंदोलक अचानक आक्रमक झाले. आंदोलनासाठी उभारलेला मंडप अपुरा ठरू लागल्याने आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. त्यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. आंदोलनाचे नेतृत्व करणारे पदाधिकारीही आंदोलकांना पाठबळ देण्यासाठी रस्त्यावर येऊन बसले. पूर्ण रस्ता गर्दीने भरून गेला. आंदोलकांनी बाजूला बसावे, वाहनांना मार्गस्थ होण्यासाठी जागा करून द्यावी, असे आवाहन पोलिस अधिकाऱ्यांनी केले. परंतु, आंदोलक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यामुळे पोलिस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक वादावादी झाली. या सर्व गोंधळामुळे वाहनचालकांची मात्र प्रचंड गैरसोय झाली.

---


...तर निवडणुकांवर टाकणार बहिष्कार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जागे व्हा, जागे व्हा महाराष्ट्र शासन जागे व्हा, भटके विमुक्त कलाकारांना मानधन मिळालेच पाहिजे, यांसारख्या घोषणा देत भटके विमुक्त समाज विकास परिषदेने जिल्हा प्रशासनाचे मागण्यांकडे लक्ष वेधले. मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला.

भटक्या विमुक्त समाजाच्या उन्नतीसाठी स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती करावी, जातीचे प्रमाणपत्र काढताना लागू करण्यात आलेल्या जाचक अटी शिथिल कराव्यात, स्थानिक स्वराज्य संस्थेत ११ टक्के आरक्षण लागू करण्यात यावे यांसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला.

समाजबांधवांनी रस्त्यावरच पारंपरिक व्यवसाय थाटत आंदोलन केले. निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन देण्यात आले. समाजाच्या मागण्या हिवाळी अधिवेशनात मान्य करण्यात याव्यात, अशी अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली आहे. आंदोलकांनी रास्ता रोकोचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. परिषदेचे अध्यक्ष रतन सांगळे, मांगुलाल जाधव, सोमनाथ मोहीते, बापू बैरागी, संतोष रोडगे, नवनाथ मोहिते, शिवाजी ढगे, संजय चव्हाण आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

--

प्रमुख मागण्या अशा

रेणके आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात.

अर्थसंकल्पात १० टक्के निधी द्यावा.

समाजातील कलाकारांना दरमहा ३ हजार रुपये मानधन द्यावे.

वसंतराव नाईक महामंडळाला हजार कोटींचे भांडवल द्यावे.

सुशिक्षित बेरोजगारांना उद्योगासाठी प्लॉट द्यावेत.

मेंढपाळांसाठी चराऊ कुरणे उपलब्ध करून द्यावीत.

--

...यांनी वेधले लक्ष

पारंपरिक व्यवसाय आणि अंगमेहनत करून चरितार्थ चालविणारे हे लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. पारंपरिक व्यवसायाचे बिऱ्हाड त्यांनी येथे मांडले. यात कडकलक्ष्मीकडून मरिआईला आवाहन केले जात होते. स्वतःच्या अंगावर चाबकाचे फटके मारत पोतराजही या आंदोलनात सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भंगार बाजार टार्गेटवर

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील गुन्हेगारांचा अड्डा असलेल्या अंबड लिंकरोडवरील अनधिकृत भंगार बाजारवर बुलडोझर चालविण्याची नाशिककरांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. भंगार बाजारचे अतिक्रमण काढण्यासाठी हायकोर्टात दिवाणी अर्जाची गरज नसल्याचा सल्ला हायकोर्टाच्या वकिलांनी दिला आहे. त्यामुळे हा भंगार बाजार हटवण्यासाठी महापालिकेने आता पंधरा दिवसांची सार्वजनिक जाहीर नोटीस काढण्याची तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात पोलिस आयुक्तांसोबत महापालिका आयुक्त चर्चा करणार असून, हिवाळी अधिवेशनानंतर पोलिस बंदोबस्त उपलब्ध होताच भंगार बाजारवर बुलडोझर फिरवला जाईल, अशी माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली. भंगार बाजारावरील कारवाईसाठी राज्य राखीव दलाच्या तुकड्या मागविल्या जाणार आहेत.

या बाजारात भंगार व्यावसायिकांची जवळपास चारशेच्या वर अनधिकृत दुकाने असून, ही दुकाने गुन्हेगारांचे अड्डे बनली आहेत. येथे परप्रांतीय कामगारांची संख्या मोठी आहे. हायकोर्टाने संबंधित भंगार बाजारधारकांना स्थलांतर करण्यासाठी चार महिन्यांची मुदत दिली होती. हायकोर्टाने मुदत देऊन दीड वर्ष लोटले, तरीदेखील अद्यापही बाजाराचे स्थलांतर झालेले नाही. त्यामुळे महापालिकेने आता या बाजारवर बुलडोझर फिरविण्याची तयारी केली आहे. हायकोर्टाच्या आदेशाचीही व्यावसायिकांनी अंमलबजावणी केेलेली नाही. त्यामुळे महापालिकेने यापूर्वी कारवाई करण्यासाठी हायकोर्टात दिवाणी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू केली होती. त्यासाठी हायकोर्टाच्या वकिलांचा सल्ला मागितला होता. हायकोर्टाच्या वकिलांनी आता दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल करण्याची गरज नसल्याचा सल्ला दिला आहे. महापालिकेने पंधरा दिवसांची सार्वजनिक नोटीस जाहीर करून अतिक्रमण काढता येणार असल्याचा सल्ला वकिलांनी दिला आहे. त्यामुळे महापालिकेने आता भंगार बाजार हटवण्याची कारवाई सुरू केली आहे. यासाठी पोलिस आयुक्तांसोबत बंदोबस्तासाठी चर्चा केली जाणार आहे. पोलिसांनी बंदोबस्ताचे आश्वासन दिल्यानंतर लगेच १५ दिवसांची जाहीर अंतिम नोटीस दिली जाणार आहे. त्यानंतर कोणत्याही क्षणी बुलडोझर चालविला जाणार असल्याने नाशिककरांची या भंगार बाजाराच्या त्रासातून सुटका होणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली आहे.

----

‘एसआरपीएफ’ची गरज

भंगार बाजार गुन्हेगारांचा अड्डा असून, या ठिकाणी भंगारही मोठ्या प्रमाणावर आहे. हे अतिक्रमण काढताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या कारवाईसाठी महापालिकेला थेट राज्य राखीव दलाची गरज भासणार आहे. सध्या विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून, ‘एसआरपीएफ’ व पोलिस नागपूरमध्ये तैनात आहेत. त्यामुळे अधिवेशन सुरू असेपर्यंत या तुकड्या महापालिकेला उपलब्ध होणार नाहीत. अधिवेशन संपताच ‘एसआरपीएफ’च्या तुकड्या उपलब्ध होणार असून, लगेच कारवाई केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुडत्याला सहकारी बँकांचा आधार?

$
0
0

मटा सीरिज : ज्ञान मंदिरातील काळी माया!


Jitendra.tarte@timesgroup.com /Tweeter: @jitendratartemt

शिक्षण, सहकार आणि राजकारण या कुबड्यांच्या आधारावर पिढ्यान् पिढ्या समाजकारणाचा प्रपंच चालविणाऱ्या शिक्षणसम्राटांच्या सहकारी अन् खासगी बँकाही पावसाळ्यातील छत्रीप्रमाणे राज्यभरात उगवल्या आहेत. चलनबदलाचा निर्णय जाहीर होताच सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या या बँकांमधील घडामोडी बघून आरबीआय (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया)ने या बँकांवरील बंधने कडक केली अन् पहिल्या टप्प्यात अर्जित पैशांची रात्रीतून चांदी करणाऱ्या काही दिग्गजांना मात्र चांगलाच चाप बसला.

नाशिकसारख्या १५ तालुके असणाऱ्या जिल्ह्यात अनुदानित शाळांमधील सुमारे १६ हजार प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या पगारावर सुमारे ६३ कोटी रुपये वेतनापोटी महिन्याकाठी जमा होतात. त्यांचे हे वेतन जिल्हा बँकेत जमा होत असले, तरीही ते नोकरी करत असलेल्या बहुतांश संस्थांच्या खासगी अन् सहकारी बँकाही जोमाने कार्यरत आहेत. वर्षभरातील या बँकांचे ऑडिटही लाभार्थी शिक्षकांच्या अर्थकारणाचे साक्षीदार आहे. चलनबदलाच्या निर्णयांनतर हक्काच्यां बँकांनीही काही प्रमाणात काही संस्थाचालकांना साथ दिली. मात्र, आरबीआयने मुसक्या आवळल्यानंतर ‘तेरी भू चूप... मेरी भी चूप’ या म्हणीचे अनुकरण करण्यातच त्यांनी धन्यता मानली आहे. नाशिकसारख्या जिल्ह्यात पाऊण अब्जांची उलाढाल करणाऱ्या गुरुजींचाही शिक्षणसम्राटांच्या सहकारी बँकांना मोलाचा आधार आहे, तर पुणे, सोलापूर, मुंबई यांसारख्या जिल्ह्यांतील गुरुजींच्या अर्थकारणाचे बजेटही डोळे दीपवणारे आहे.

कायदेतज्ज्ञांना साकडे

सहकाराच्या आधाराने शिक्षण अन् राजकारणातील पैसा सांभाळण्याचे साधनच सद्यःस्थितीत गोंधळलेल्या स्थितीत अडकले आहे. यामुळे चलनबदलाच्या निर्णयाच्या रात्रभर शिक्षण संस्थांचा कायदेशीर अन् आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या काही कायदेतज्ज्ञ, सीए अन् अर्थ सल्लागारांचे फोन कॉल्स अखंड बिझी होते. यानंतरही या तज्ज्ञांकडे दरम्यानच्या कालावधीत त्या अर्थकारणाच्या फायलींचे ढिगारेही दाखल झाले आहेत. आरबीआय पुढील टप्प्यात सहकारबाबत काय नेमके काय धोरण अवलंबते, यावर या ‘पाचरात अडकलेल्या शेपटीची’ मदार अवलंबून राहणार आहे. यासाठी बड्या कायदेतज्ज्ञांना रात्रीतून पाचारण करत राज्यभरातील काही सम्राटांनी कोर्टाचीही पायरी गाठली आहे. आरबीआयने सहकारविषयक धोरणे शिथिल करून खातेदारांना दिलासा द्यावा, अशा शीर्षकाखाली हा लढा आता राज्यात आकार घेत आहे. मात्र, या धोरणांमध्ये शिक्षक-शिक्षकेतरांसारखे तटस्थ घटकही अकारण भरडले गेले आहेत.

हा तर शोषणाचा दाखलाच!

‘ज्ञान मंदिरातील काळी माया’ या वृत्त मालिकेचा पहिला भाग प्रसिद्ध होताच शोषणाचा अन्याय बिनबोभाट सहन करणाऱ्या शिक्षणक्षेत्रातील काही घटकांनी अत्यंत संवेदनशील प्रसंग ‘मटा’जवळ व्यक्त केले. एका प्रातिनिधिक घडामोडीचा दाखला देताना शहरातील एका नामवंत संस्थेतील प्राध्यापकावर गुदरलेला प्रसंग अत्यंत गंभीर आहे. महिन्याकाठी पूर्ण वेतन हाती घेण्यासाठी या प्राध्यापकांना दर महिन्यास संस्थेला देणगी रूपात एकूण पगाराच्या २० ते ५० टक्के रक्कम सक्तीने भरावी लागते. हा ‘शेअर’ भरण्यासाठी एका प्राध्यापकांना नुकतेच पत्नीचे दागिने मोडावे लागल्याचा अंगावर शहारे आणणारा प्रकार घडला. हे वास्तव अत्यंत दाहक आहे. हे शोषण नाही तर काय?

(क्रमश:)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपुल्याचसाठी उद्या फुलंल आशेची पहाट...

$
0
0

मटा सीरिज : आता ‘संघर्षा’ची बात

--

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT


नाशिक : शिक्षणाने जगण्याचा हरवलेला विश्वास पुन्हा मिळवून दिला. दुर्धर आजाराने होरपळलेलं जगणं सुसह्य बनवलं अन् प्रगतीच्या संकोचलेल्या वाटा पुन्हा खुल्या करून दिल्या... हे बोल आहेत एड्ससारख्या दुर्धर आजाराशी दोन हात करून नव्याने प्रगतीच्या विश्वात झेपावू पाहणाऱ्या आशावादी मनांचे.

शिक्षणाने त्यांना आत्मविश्वास दिलाय. जीवन जगण्याची कला शिकविली आहे. आज कुणी कॉलेजमध्ये इंजिनीअरिंग शिकतेय, तर कुणी मुक्त विद्यापीठात पदवी घेण्यात गुंतले आहे. पुनर्वसन केंद्रातील अनुभवाला शिक्षणाची जोड मिळाल्याने काही जण तर शहरातील नामांकित संस्थांमध्ये समुपदेशक म्हणूनही काम करताहेत. आपण एचआयव्ही पॉझिटिव्ह आहोत हे कळल्यानंतर सुरुवातीला त्यांच्यातील त्राणच गेले होते. सुरुवातीचा काही काळ अत्यंत नैराश्यात गेला. जीवन अंधःकारमय झाले. आत्महत्येचा विचार कितीतरी वेळा मनाला स्पर्शून गेला, नव्हे काहींनी आत्महत्येचा प्रयत्नही करून पाहिला. आपल्याच माथ्यावर या दुर्धर आजाराचा शिक्का का? हा प्रश्न त्यांना वारंवार डिवचू लागला. मात्र, काही व्यक्ती सहकारी म्हणून भेटल्या अन् एच.आय.व्ही बाधितांचे दु:ख कुठल्या कुठे पळून गेले.

नाशिकमध्ये अनुसया शिक्षण प्रसारक मंडळ, प्रवरा मेडिकल ट्रस्ट, डॉट्स सामजिक संस्था, मॅग्मो वेल्फेअर, बागलाण सेवा समिती, मनमीलन बहुउद्देशीय सामाजिक संस्था, विहान आणि यश फाउंडेशन अशा अनेक स्वयंसेवी संस्था एच.आय.व्ही बाधितांसाठी काम करीत आहेत. अशा संस्थांकडून मिळणाऱ्या पाठबळामुळे एचआयव्हीग्रस्तांच्या जगण्याला नवीन अर्थ मिळू लागला आहे. यश फाउंडेशन आणि महिन्द्रा अॅण्ड महिन्द्राने तर एक पाऊल पुढे टाकत एच.आय.व्ही.ग्रस्तांसाठी पुनर्वसन केंद्र सुरू केले आहे. फाइल, हातमोजे, बॅग्ज इतकेच नव्हे, तर सणांसाठीचे साहित्य बनविणाऱ्या एडसग्रस्तांना स्वावलंबी बनविले आहे. समदु:खी व्यक्ती एकाच ठिकाणी आल्याने विचारांची देवाणघेवाण सुरू झाली अन् त्यामुळे नैराश्याला पळवून लावण्यास मदत झाली. कधीकाळी केवळ गृहिणी म्हणून समाजात वावरणाऱ्या अनेक महिलांना या पुनर्वसन केंद्राने स्वावलंबी बनविले आहे. इतकेच नव्हे, तर शिक्षण अर्ध्यावर सोडणाऱ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. काहींनी शिक्षण पूर्ण करून समुपदेशक म्हणून नामांकित संस्थांमध्ये कामही सुरू केले आहे.

--

एच.आय.व्ही.ग्रस्तांचे पुनर्वसन काळाची गरज आहे. त्यामुळे या बाधितांमधील एकटेपणाची भावना दूर होण्यास मदत मिळेल. पुनर्वसन केंद्राने अनेक एच.आय.व्ही.ग्रस्तांना जगविले. त्यांना आयुष्य जगायला शिकविले. त्यांना आत्मविश्वास मिळवून दिला. राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात अशी केंद्रे सुरू करायला हवीत. एच.आय.व्ही.ग्रस्त बनवित असलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळाली, तर त्यांना आर्थिक आधार मिळू शकेल.

-रवींद्र पाटील, अध्यक्ष, यश फाउंडेशन

(समाप्त)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कांदा उत्पादकांची कोंडी सुरूच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

दुष्काळी परिस्थितीवर मात करून मोठ्या हिमतीने पिकवलेला उन्हाळ कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेवर उत्पादकांनी चाळीत कांदा साठवून ठेवला. मात्र व्यापाऱ्यांनी केवळ गोणीतीलच कांदा खरेदीची आडमुठी भूमीका घेतल्याने दीड महिना बाजार समितीत कांदा लिलाव प्रकिया बंद होती. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी झाली.

शासनाने ठणकावल्यानंतर मोकळा कांदा खरेदीला सुरूवात झाली खरी मात्र व्यापाऱ्यांच्या अवास्तव मागण्यामुळे शेतकरी वेठीस धरले जाऊन चाळीत कांदा सडू लागल्याने शेतात किंवा उकीरड्यावर हा कांदा फेकण्याची वेळ आली आहे. दोन महिन्यानंतर बाजार समित्या सुरू झाल्या. कांद्याची आवक वाढली अन् भाव कोसळले. त्यातच ८ नोब्हेंबरला पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा केली. या निर्णयाचा थेट बाजार समितीवर परिणाम होऊन शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला. बाजार समित्या चलनाच्या तुटवड्यामुळे बंद पडल्या. सध्याच्या काळात लिलाव बंद तर कधी सुरू अशी अवस्था आहे. परिणामी कांद्याची आवक वाढली. व्यापारी कांदा खरेदी केल्यानंतरही कांद्याला वांदा पुकारत शेतकऱ्यांना कोंडीत पाडत असल्याचे दिसते. चार ते पाच दिवस वाहन बाजारात आणल्यानंतर व्यापाऱ्यांकडून पन्नास रुपये प्रतिक्विंटलला भाव पुकारला जातो. त्यामुळे गाडीभाडेही सुटत नसल्याने साठवण केलेला कांदा थेट शेतात व उकिरडयावर फेकून देत आहेत. शासनाने जुलै-ऑगस्टमध्ये विक्री झालेल्या कांद्याला १०० रुपये प्रतिक्विंटल अनुदान देण्याचे जाहीर केले होते. मात्र अजूनही त्याचा प्रत्यक्ष कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला नसल्याने नेहमीच अनुदानावरच बोळवण का केली जाते, असा सतंप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतेसाठी सरसावले हजारो हात

$
0
0

मालेगाव शहरात महास्वच्छता अभियान; ३०० टन कचऱ्याचे संकलन

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेल्या मालेगाव शहर स्वच्छता अभियानाला गुरुवारी (दि. ८) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील विविध भागात सुमारे पाच हजार नागरिकांनी शहर स्वच्छता उपक्रमात सहभाग घेत दुपारपर्यंत ३०० टन कचरा संकलित केल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून मिळाली. शहरात प्रथमच एवढ्या व्यापक प्रमाणात मोहीम राबविण्यात आली.

गेल्या महिन्याभरापासून यासाठी जिल्हा तसेच स्थानिक प्रशासनाकडून या मोहिमेसाठी पूर्वतयारी व जनजागृती केली जात होती. स्वतः जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. यांनीच हातात झाडू घेत शहर स्वच्छतेसाठी पुढाकार घेतल्याने या मोहिमेत सहभागी झालेले ५ हजारहून अधिक अधिकारी, कर्मचारीदेखील उत्साहाने सहभागी झाले. शहरातील वेगवेगळ्या २५ ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आल्याने पहिल्यांदाच एवढ्या प्रमाणात कचरा हटवण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. यांचे हस्ते पोलिस कवायत मैदानावर स्वच्छता अभियानाचे उद््घाटन करण्यात आले. यावेळी महापौर हाजी मोहम्म्द इब्राहीम, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त रवींद्र जगताप, अपर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल, डॉ. रईस रिजवी, उपायुक्त रघुनाथ गावडे, उपविभागीय अधिकारी अजय मोरे, शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे, तहसीलदार डॉ. सुरेश कोळी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना राधाकृष्णन् यांनी, देशाच्या सर्वांगिण विकासासाठी स्वच्छता आणि आरोग्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले. हे स्वच्छता अभियान एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता आठवड्यात किमान दोन तास स्वच्छतेसाठी देण्यात यावे, असे आवाहनही त्यांनी केले. आपले घर स्वच्छ ठेवणे हा संस्काराचा भाग असतो त्याप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठी इतरांना प्रोत्साहित केल्यास जिल्ह्यातून मालेगाव तालुका प्रथम हगणदारीमुक्त होण्याचा मान मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी स्वच्छतेची शपथ घेऊन अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. पुष्पाताई हिरे महिला कॉलेजच्या विद्यार्थिनींनी पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश दिला.

प्रास्ताविकात अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी, स्वच्छतेची निरंतर सवय लागावी यासाठी स्वच्छता अभियानाचे आयोजन केल्याचे सांगितले. नदीपात्रालगत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणदेखील करण्यात आले. यानंतर नियोजित २५ ठिकाणावर नेमण्यात आलेले नियंत्रण अधिकारी, समन्वयक व कर्मचारी रवाना झालेत. त्या त्या विभागात या अधिकारी कर्मचारी यांच्यासमवेत स्थानिकांनी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी यात सक्रिय सहभाग घेत आपापला परिसरातील कचरा हटवण्यासाठी हातभार लावला.

सकाळपासूनच शहरातील रस्त्या रस्त्यावर उभारण्यात आलेले नियंत्रण कक्ष आणि परिसरात सुरु असलेले स्वच्छता अभियान असेच चित्र पाहायला मिळाले. शहराच्या मुस्लीमबहुल पूर्व भागात देखील चांगला प्रतिसाद मिळाला. विशेषतः उर्दू शाळातील शिक्षक , विद्यार्थी यात उत्साहाने उतरले. स्वतः जिल्हाधिकारी यांनी देखील येथे उपस्थितांशी संवाद साधला व त्यांच्या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. विविध संस्था संघटनांतर्फे अभियानात सहभागी होणाऱ्यांसाठी चहापानाची व्यवस्था करण्यात आली. संपूर्ण शहरात अभियानाबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत होते. अभियानात सातत्य राहण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याच्या प्रतिक्रीयादेखील यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

तणावपूर्ण, संवदेनशील व कमालीचे बकाल शहर म्हणून आजपर्यंत मालेगावची ओळख आहे. निरक्षरता, अस्वच्छता, प्रदूषण, गुन्हेगारी यातही शहराचा सतत उल्लेख होतो. यंत्रमागाद्वारे होणारी उलाढाल आणि ऐतिहास‌िक पार्श्वभूमी ही त्यातल्या त्यात समाधान देणारी ओळख. या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या महास्वच्छता मोहिमेत प्रशासनासह, विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांसह सामान्य मालेगावकरांनी जो सहभाग नोंदविला तो दखलपात्र तर ठरलाच; शिवाय मालेगाव आता कूस बदलू पहातेय, याचीही साक्ष पटली. अशा एका दिवसाच्या मोहिमेने शहराच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली ही समस्या मुळापासून उखडून काढणे अवघड आहे. परंतु स्वच्छ, सुंदर मालेगावकडे एक पाऊल पडले, त्याचे स्वागत करायला हवे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंड पगारेची शहरातून धिंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक
आरपीआय आठवले गटाचा शहराध्यक्ष आणि पोलिसांना अनेक गंभीर गुन्ह्यांत हवा असणारा कुख्यात गुंड अर्जुन पगारे याची पोलिसांनी त्याच्या राहत्या परिसरातून गुरुवारी धिंड काढली. तपासासाठी त्याला सोबत घेत गंगापूर रोडवरील मल्हारखाण परिसरातील त्याच्या घरात घुसून पोलिसांनी झाडाझडती घेतली.
तळेगाव (त्र्यंबकेश्वर) येथील बालिकेवरील अत्याचार प्रकरणानंतर तेथे जाऊन अशांतता माजविण्याचा आरोप पगारेवर आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकरोड येथे झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केलेला गुंड पवन पवारसह भाजप नेत्यांबरोबरची त्याची ऊठबसही वादाचा विषय ठरली होती. चाळीसगाव येथे दरोड्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला नुकतीच अटक केली. चाळीसगाव पोलिस स्टेशनमध्ये पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला नाशिक ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले होते. गुरुवारी त्याला पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तात मल्हारखाण झोपडपट्टीतील त्याच्या घराच्या परिसरात आणले. पोलिसांचा ताफा येऊन थांबताच या परिसरात बघ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
अर्जुन पगारे याला नाशिक ग्रामीण पोल‌िसांनी मंगळवारी चाळीसगाव येथून ताब्यात घेतले होते. पगारेविरोधात दंगलीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तळेगाव दंगलीनंतर तो महिनाभरापासून फरार होता. तळेगाव येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक गावांत दंगल उसळली होती. यानंतर दसऱ्याच्या दिवशी अर्जुन पगारे आणि समाजकंटकांनी पुन्हा दगडफेक, गाड्यांची तोडफोड व गावात जाऊन शिवीगाळ करून अशांतता निर्माण केली. यामुळे पुन्हा दोन समाजांत तेढ निर्माण होऊन दंगल भडकली होती. या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी पगारेसह शेकडो जणांवर दंगल घडविणे, शासकीय कामात अडथळा आणणे, जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले होते. पगारेने कोर्टात अटकपूर्व जामीन सादर केला. मात्र, कोर्टाने पगारेचा अर्ज फेटाळून लावला. पोलिस अटक करतील या भीतीने पगारेने शहरातून पलायन केले. नाशिक ग्रामीण पोलिसांचा शोध सुरू होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धर्मस्थळांसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचा आकडा फुगवण्यास तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम कारणीभूत असल्याचा ठपका महासभेत सदस्यांनी ठेवला आहे. प्रशासनाने सर्वेक्षण करताना लोकभावनेचा विचार केला नसल्याचा आरोप करीत शिवसेनेसह भाजपने डॉ. गेडाम यांच्यावर कारवाईचे खापर फोडले आहे. उर्वरित धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी आता महापौरांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेऊन त्यांना विनंती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारवाई थांबवण्याबाबत महापौरांच्या वतीने सर्वपक्षीय गटनेत्यांचे पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार असून, सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करण्याची विनंती करण्यात येणार आहे. प्रशासनाने मात्र संबंधित विषय न्यायप्रविष्ट असल्याने सांगत चर्चेपासून स्वतःला दूर ठेवले.

महापौर अशोक मुर्तडक यांच्या अध्यक्षतखाली गुरुवारी महासभा झाली. या महासभेत सदस्यांच्या विकासकामांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्यानंतर शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांनी अनधिकृत धार्मिक स्थळांवरील लक्षवेधीवर चर्चा करण्याची मागणी केली. परंतु, प्रशासनाने संबंधित विषय न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर चर्चा करता येणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले. अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, विधी विभागप्रमुख बी. यू. मोरे व आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी संबंधित कारवाई ही सुप्रीम कोर्ट व हायकोर्टाच्या आदेशाने सुरू आहे. त्यामुळे सदरच्या विषयात महासभेत चर्चा केली जाऊ शकत नसल्याचे स्पष्टीकरण दिले. परंतु, सदस्यांनी आम्हाला सर्वेक्षणावर चर्चा करायची असल्याचा खुलासा केला. त्यानंतर महापौरांनी चर्चेला परवानगी दिली.

अनधिकृत धर्मस्थळांसंदर्भात शिवसेनेचे अजय बोरस्ते यांनी तत्कालीन प्रशासनप्रमुखांनी केलेल्या सर्वेक्षणावरच आक्षेप घेतला. नाशिकची धर्मभूमी ही ओळखच पुसण्याचे पातक सुरू आहे. तत्कालीन प्रशासनाने केलेले सर्वेक्षण अत्यंत चुकीचे आहे. अनधिकृत स्थळांसदर्भात शासनाने काढलेल्या आदेशाचीही पायमल्ली केली गेली आहे. अनधिकृत धार्मिक स्थळांसदर्भात लोकभावना डावलली गेली आहे. प्रशासनाने जो उत्साह धार्मिक स्थळांबाबत दाखवला, तोच उत्साह भंगार बाजाराबाबत का दाखवला नाही, असा सवाल केला. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात ही कारवाई थांबवावी व तसा ठराव शासनाला पाठवावा, अशी मागणी केली.


चीफ बेंचपुढेच करा अपील

उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी हा प्रश्न सोडवायचा असेल, तर चर्चा करून उपयोग नाही. सुप्रीम कोर्टाचा हा विषय असल्याने त्या घटनात्मक बेंचपुढेच आपल्याला अपील करावे लागेल. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन राज्य सरकारकडे धाव घेतली पाहिजे. महापौरांच्या पत्रावर गटनेत्यांनी सह्या कराव्यात व मुख्यमंत्र्यांचा वेळ घेऊन त्यांनाच कारवाई थांबवण्यासाठी विनंती करणे गरजेचे आहे. नागरिकांच्या भावना तीव्र असून, याप्रश्नी सुप्रीम कोर्टच स्थगिती देऊ शकते. त्यामुळे स्वतःच्या समाधानापेक्षा समस्येची सोडवणूक होणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


‘अतिक्रमणांकडे दुर्लक्ष अन् धर्मस्थळांवर कारवाई’

दिनकर पाटील यांनी अतिक्रमणांकडे दुर्लक्ष अन् धार्मिक स्थळांवर कारवाईबाबत आक्षेप व्यक्त केला. संबंधित कारवाईविरोधात महापालिकेने हायकोर्टात बाजू मांडावी, अशी मागणी संजय चव्हाण यांनी केली. नाशिक ही षड््यंत्र भूमी झाल्याचा ठपका प्रकाश लोंढे यांनी ठेवला. संभाजी मोरुस्कर यांनी, ज्यांनी हे सर्वेक्षण केले त्यांची मानसिकता तपासण्याची गरज असल्याचे सांगत संतांची मंदिरे व समाजमंदिरे कारवाईतून वगळावीत, अशी मागणी केली. स्थायी समितीचे सभापती सलिम शेख यांनाही या कारवाईला विरोध केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यायामशाळांना बूस्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क्रीडा संस्कृतीची वाढ व्हावी यासाठी नाशिक महापालिकेतर्फे शहरातील व्यायामशाळांना क्रीडा साहित्य देण्याचे ठरवले असून ७० लाख रुपयांच्या खरेदीला मान्यता दिली आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे व्यायामशाळांना चांगले दिवस येणार असून, तरुणाई जीमकडून पुन्हा व्यायामशाळेकडे परतेल असा विश्वास व्यक्त होत आहे.

नाशिक महापालिकेच्या शहरात अनेक व्यायामशाळा आहेत. या व्यायामशाळांच्या इमारतीत साहित्य नसल्याने त्या बकाल अवस्थेत पडून आहेत. त्यामुळे व्यायाम करावा तरी कसा, असा प्रश्न तरुणांना सातत्याने प्रश्न पडत होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यतीन वाघ हे महापौर असताना त्यांनी क्रीडा धोरण तयार केले होते. मात्र त्याची कधीच अंमलबजावणी झाली नसल्याने ते धोरण कागदावरच राहीले. या धोरणात क्रीडा विभागावर किती खर्च करावा याचे निश्चितीकरण करण्यात आले. मात्र त्याचीही अंमलबजावणी झालेली नाही. व्यायामशाळांबाबत राज्य सरकारचेही धोरण उदासिन आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने व्यायाम शाळांच्या नुतनीकरणासाठी व क्रीडा साहित्य खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र कागदपत्रांची पूर्तता करणे कठीण असल्याने पदाधिकारी फारसे त्या वाटेला जात नाही. राज्य सरकार व महापालिका दोन्ही संस्था फारसे लक्ष देत नसल्याने अनेक व्यायामप्रेमींनी स्वतःच्या खर्चाने दुरुस्ती करून घेतली होती. शहरातील व्यायाम शाळांची दुरुस्ती करावी, व्यायामाची अद्यावत साधने उपलब्ध करुन द्यावीत, अशी मागणी स्थानिक तरुणांनी नगरसेवकांकडे केली होती. या मागणीची दखल स्थायी समितीच्या सभेत क्रीडा साहित्य खरेदीला मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील प्रत्येक व्यायाम शाळांना क्रीडा साहित्य देण्यात येणार आहे. हे क्रीडा साहित्य काटोकोर तयार केलेले असावे यासाठी ते उत्पादकांकडूनच खरेदी केले जाणार आहे.

महापालिका व्यायाम शाळांना क्रीडा साहित्य देणार असल्याची बातमी समजली. ही आनंदाची बाब आहे. शहारीतल सर्व व्यायामशालांना अशा साहित्याची गरज होती.

- रमेश काळे, व्यायामपटू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोसायटीतील भांडणातून अॅट्रॉसिटी!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
एकाच सोसायटीत राहणाऱ्या दोन कुटुंबांच्या वादातून पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील एका कुटुंबा विनयभंगाचा तर दुसऱ्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अ‍ॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन्ही कुटुंबातील चौघांना अटक करण्यात आली आहे.
लामखेडे मळ्यातील शिवशक्ती सोसायटीत राहणाऱ्या शर्मा आणि बेंडकुळे या दोन शेजाऱ्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहेत. या वादाचे पर्यावसन झटापटीत झाल्याने पोलिसांनी दोन्ही कुटुंबांतील सदस्यांविरुध्द परस्परविरोधी गुन्हा दाखल केला आहे. बेंडकुळे कुटूंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार, धनवंती मुकेश शर्मा, चेलाराम सच्चानंद शर्मा व प्रकाश चेलाराम शर्मा आदी गेल्या सहा वर्षांपासून बेंडकुळे दाम्पत्यास जाता-येता जातीवाचक बोलून हिणवत असल्याचे, तसेच सोसायटीतून निघून जा, अन्यथा ज‌ीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघा संशय‌िताना अटक केली आहे. तर शर्मा कुटुंबा‌तील महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, योगेंद्र नामदेव बेंडकुळे दारात उभा राहून अश्लिल वर्तन करीत असून, याबाबत जाब विचारला असता त्याने घर सोडून निघून जा अन्यथा जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार विनयभंगाचा असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, योगेंद्र बेंडकुळे यास अटक करण्यात आली आहे. अ‍ॅट्रॉसिटीचा तपास सहाय्यक आयुक्त विजयकुमार चव्हाण तर विनयभंगाचा तपास उपनिरीक्षक देवरे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभासद व्हा अन् मिळवा नाटकाची तिकिटे

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’ला दोन वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने नवीन सभासद होणाऱ्यांसाठी, तसेच हे सदस्यत्व पुन्हा घेणाऱ्यांसाठी धमाकेदार ऑफर देण्यात आली आहे. महाकवी कालिदास कलामंदिरात येत्या रविवारी (दि. ११) होणाऱ्या ‘तीन पायांची शर्यत’ या नाटकाची तिकिटे चक्क मोफत दिली जाणार आहेत.

‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’अंतर्गत गेल्या दोन वर्षांपासून अनेकविध कार्यक्रम राबविण्यात येत असतात. नाविन्यपूर्ण आणि विविध विषयांवर आधारित सेमिनार, वर्कशॉप, स्पर्धा, मनोरंजनात्मक कार्यक्रम यामुळे क्लबच्या सभासदांना विशेष आनंद, उत्साह आणि अनुभव मिळतोच. शिवाय विविध प्रकारच्या धमाकेदार ऑफर्समुळे आर्थिक बचतही होत असते. यावर्षीही क्लबचे कार्यक्रम सुरू राहणार आहेत. नवनवीन विषय आणि आशयांवर आधारित कार्यक्रमांची मेजवानी यानिमित्ताने सभासदांना मिळणार आहे.

कल्चर क्लब सभासदांसाठी येत्या रविवारी (दि. ११) महाकवी कालिदास कलामंदिरात ‘तीन पायांची शर्यत’ या नाटकाच्या प्रयोगाचे सायंकाळी ५.३० वाजता आयोजन करण्यात आले आहे. या नाटकाच्या तिकिटासाठी कल्चर क्लब सभासदांसाठी विशेष ऑफर देण्यात आली आहे. कल्चर क्लबच्या सभासदांसाठी नाटकाचे तिकीट ५० टक्के डिस्काउंटमध्ये उपलब्ध होणार आहे. म्हणजेच २०० रुपयांचे तिकीट केवळ १०० रुपयांत सभासदांना मिळणार आहे, तर जे सभासद नव्याने होणार आहेत किंवा ज्यांना सभासदत्व पुन्हा घ्यायचे आहे त्यांना नाटकाचे पासेस मोफत मिळणार आहेत. त्यासाठी तातडीने ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड येथील ऑफिसमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत येऊन नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ‘बीसीसीएल’ या नावे २९९ रुपयांचा चेक देऊन सभासद होता येणार आहे. तसेच, यासंदर्भात अधिक माहितीसाठी ६६३७९८७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


आजच सभासद होणाऱ्यांसाठी...

कल्चर क्लबचे सभासदत्व शुक्रवारी घेणाऱ्यांसाठी विशेष ऑफर आहे. यातील काही लकी सभासदांना नाटकाच्या कलाकारांबरोबर भेटण्याची आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याची संधीही क्लबच्या वतीने मिळणार आहे. त्यामुळे आजच सभासदत्व घेऊन ऑफरचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


कल्चर क्लब सदस्य होण्यासाठी

फेसबुक लिंक - https://www.facebook.com/MTCultureClub

टि्वटर लिंक - https://twitter.com/MTCultureClub

टीप - कल्चर क्लबच्या वेबसाइटवर जाण्यासाठी हा कोड तुमच्या मोबाइलवर स्कॅन करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एनजीटी’च्या जाचातून अखेर सुटका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय हरित लवादाच्या (एनजीटी) पुणे खंडपीठाने नाशिकमधील नव्या बांधकामांवर टाकलेले जाचक निर्बंध गुरुवारी उठविल्याने गेल्या वर्षभरापासून जवळपास बंद पडलेल्या नाशिकच्या बांधकाम व्यवसायाने सुटकेचा नि:श्वास टाकला. राज्य सरकारकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेला विकास आराखडा, प्रलंबित असलेली बांधकाम नियमावली आणि कपाटाचा प्रश्न यामुळे बांधकाम उद्योग ठप्प झाला होता. त्याचा फटका शहराच्या विकासप्रक्रियेला बसला होता.

‘एनजीटी’च्या निर्णयामुळे काही प्रश्न सुटले असले तरी विकास आराखडाही लवकरात लवकर मार्गी लागला तरच नाशिकच्या विकासाची कोंडी फुटणार आहे. शहरातील कचरा डेपोच्या प्रश्नामुळे ‘एनजीटी’ने गेल्या वर्षी अत्यंत कठोर होत जोपर्यंत खत प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत कोणत्याही नव्या बांधकामांना परवानगी देण्यास मनाई केली होती. परिणामी, नाशिकमधील बांधकाम व्यवसाय ठप्प होऊन काही लाख लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. महापालिका, तसेच सरकारचेही उत्पन्न घटले होते. प्रारंभी फारसे गंभीर नसलेल्या महापालिका प्रशासनाने नंतर मात्र या प्रश्नाची तीव्रता ओळखून लवादाकडे योग्य बाजू मांडल्याने व खत प्रकल्पाचे काम सुरू करण्यास सुरुवात केल्याने हा दिलासा मिळाला आहे.

मटा भूमिका

‘एनजीटी’च्या ‘बाप दाखव नाही तर श्राद्ध कर’ अशा खमक्या पवित्र्यामुळे गेली दोन वर्षे बंद पडलेला नाशिकचा बांधकाम उद्योग नव्याने उभारी धरण्याची शक्यता आहे. खत प्रकल्पाच्या समस्येमुळे उद्भवलेला आरोग्याचा प्रश्न थेट विकासप्रक्रियेशी जोडून लवादाने पालिका प्रशासनाचे नाक दाबले होते. खत प्रकल्प सुरू करा, कचऱ्याच्या प्रश्नाची विल्हेवाट लावा एवढी साधी अपेक्षा लवादाची होती. मात्र, पालिकेने त्याकडे केलेले दुर्लक्ष हे साऱ्या शहरालाच महागात पडले. बांधकाम उद्योगावर काही लाख लोकांचे जीवनमान अवलंबून असते. ते बाधित झाले. व्यवहार थंडावले. उत्पन्नावर गदा आली. आता लवादाने निर्बंध उठविल्याने मोठाच दिलासा मिळाला आहे. विकासाचा रुतलेला गाडा आता तरी मार्गी लागेल अशी अपेक्षा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचशे रुपयांसाठी तीन वर्ष तुरुंगवारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
अवघ्या पाचशे रुपयांसाठी लाचखोरी करणाऱ्या एका शासकीय कर्मचाऱ्यास ही लाच भलतीच महागात पडली आहे. पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना पाच वर्षांपूर्वी रंगेहाथ पकडलेला हा कर्मचारी आता तीन वर्ष तुरुंगवासात जाणार आहे.
याबाबत माहिती अशी की, आपल्याच खात्यातील कर्मचाऱ्याची वार्षिक वेतनवाढ आकारून त्याप्रमाणे त्याची वेतनाची आकारणी करण्यासाठी शहरातील उपवन संरक्षण कार्यालय, पश्चिम विभागात शरद किसन आहेर हे लेखापाल म्हणून कार्यरत होते. त्यांनी आपल्याच खात्यातील कर्मचाऱ्याच्या वार्षिक वेतनवाढीसाठी ५०० रुपयांची लाच मागितली होती. यावर कर्मचाऱ्याने अॅण्ट‌ि करप्शन विभागाकडे तक्रार नोंदविल्यानंतर विभागाने २ सप्टेंबर २०११ रोजी केलेल्या कारवाईत आहेर याला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले होते. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल होता. कोर्टात आहेर विरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या संदर्भात गुरुवारी न्यायमूर्ती एन. के. ब्रह्मे यांच्या न्यायालयाने निकाल दिला. यानुसार आहेर याला लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७ नुसार एक वर्ष सक्त मजुरी व हजार रुपये दंड आणि कलम १३ नुसार दोन वर्षे सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता के. एन. निंबाळकर यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आडगावात तीन मंदिरे फोडली

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, आडगाव
आडगावातील मारुती मंदिर, महालक्ष्मी मंदिर, शनी मंदिर गाभाऱ्यातील दान पेट्यांचे कुलूप तोडून चोरट्यांनी पैसे चोरल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. पोलिस पाटील एकनाथ मते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी महालक्ष्मी मंदिरात मूर्तीची चोरी झाली होती. त्या घटनेनंतर लगेच गावातील सर्व मंदिरांतील दानपेट्या फोडून चोरट्यांनी रोख रक्कम लांबवली. आडगाव परिसरात भुरट्या चोऱ्यांचे प्रकार वाढत आहेत. त्याकडे आडगाव पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे बाजारात आर्थिक चणचण असताना चोरांनाही त्याचा फटका बसलेला दिसतो. त्यामुळे चोरांनी मंदिरांच्या दानपेट्या लक्ष्य केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनियमित ऑडिटमुळे ब्लॅक मनी वाढला

$
0
0

Jitendra.tarte@timesgroup.com
Twitter : @jitendratarteMT
दीर्घकालीन सत्तेत राहताना राज्यात अनेक मंत्र्यांनी स्वत:सह नातेवाईक आणि मर्जीतील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या नावे शिक्षण संस्था तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परवान्यांची बरसातच केली. अवघ्या दशकभरात लाखो संस्था पावसाळ्यातील छत्रीप्रमाणे रात्रीतून साकारल्या. पण यातील अनेक संस्था अनियमित ऑडिटद्वारे काळ्या पैशाला ज्ञानमंदिरात आश्रय देत असल्याची बाबही ‘अँटी ब्लॅक मनी कम्पेन’ने उघड केली आहे.
केवळ दहा वर्षांच्या कालावधीत हजारो नव्या शैक्षणिक संस्थांचा जन्म झाला. या संस्थांनी राजकीय अभय मस्तकावर असल्याच्या समजामधून अनेक नियम धाब्यावर बसविले आहेत. कर्मचारी निवडीच्या निकषांपासून तर विद्यार्थ्यांसाठी इन्फ्रास्ट्रक्चरची उपलब्धता, विविध तपासणी समित्यांच्या अपेक्षा, विद्यार्थी प्रवेशाचे निकष, शुल्क वसुलीचे निकष इतकेच नाही तर स्कॉलरशीपवरही काहींनी मारलेले हात आदी बाबी या पार्श्वभूमीवर उघडकीला येत आहेत.
... तरीही मिळतात प्रवेश
वैद्यकीय अभ्यासक्रमांसारख्या क्रीम शाखांना काही संस्थाचालकांनी दुभती गायच बनविले आहे. उत्तर महाराष्ट्रातही अशा संस्थांनी गेल्या काही वर्षांत डोके वर काढले. पुरेसे इन्फ्रास्ट्रक्चर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी पुरविण्याचीही क्षमता नसणाऱ्या या संस्थांची मान्यताच विद्यापीठाकडून वारंवार धोक्यात आली. तर काही प्रतापी संस्थांनी संभाव्य वाढीव सीट मिळण्याचे काल्पनिक अंदाज बांधून ‘एमबीबीएस’ सारख्या क्रीम अभ्यासक्रमांचे प्रवेशही रिझर्व्ह करून टाकले. यामागे कोट्यवधींचे अर्थकारण असल्याचेही बोलले जाते. ही घटना चालू शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीची आहे. ते कॉलेजही उत्तर महाराष्ट्रातील आहे. एमसीआयकडून (मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया) अंतिम मान्यता मिळालेली नसतानाही काही वाढीव सीटवर बड्या घरातील विद्यार्थ्यांचे सर्रास प्रवेश करून घेतले गेले. त्यावेळी विद्यार्थ्यांना सावध करण्याच्या सूचनाही सीईटी एन्टरन्स सेलला द्याव्या लागल्या.
ऑडिटला फाटा
संस्था चालविताना विद्यार्थ्यांच्या तुलनेत तज्ज्ञ प्राध्यापक किंवा शिक्षकांची संख्या, त्यांचे क्वॉलिफिकेशन, त्यानुसार त्यांना देण्यात येणारा पगार आदी बाबींचे ऑडिटच काही संस्थांमध्ये वर्षानुवर्षे होत नसल्याच्या बाबी शिक्षणातील भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या काही संघटनांनी मिळविलेल्या
माहितीत उघड केल्या आहेत. ऑडिटला फाटा देण्याच्या बाबीमुळे बेहिशेबी प्रवृत्तीला ज्ञानमंदिरात आश्रय मिळणे सोपे जात आहे. ऑडिट न करता नव्या शैक्षणिक वर्षात अनेक शाळा मनमानीपणे तब्बल ४० ते ८० टक्के फी वाढही केल्याचेही दाखले ‘मटा’ च्या
हाती आहेत.
शासकीय नियमांचा असाही फायदा
‘स्वयं अर्थसहाय्य‌ित’ किंवा ‘अल्पसंख्याक’ यांसारख्या तरतुदींचा आधार घेऊन चालणाऱ्या शाळांचे काही संस्थाचालकांनी दुकानच बनविले आहे. या तरतुदींच्या आधारावर स्थानिक प्रशासनास या शाळा अजिबात जुमानत नाहीत. शासनाकडून अनुदान न घेता संस्थाचालकांच्या गुंतवणुकीनुसार हवे तसे रिटर्न्स मिळविण्याचा काहींचा फंडा शहरातील पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात दाखल तक्रारींमध्येही दिसून येतो आहे. स्थानिक प्रशासनाचा पत्रव्यवहार किंवा नोट‌िसांनाही उत्तरे देताना त्यांचा निर्देश सातत्याने कोर्टाच्या पायऱ्या चढण्याचा असतो. या प्रकारच्या दबावतंत्राने अनेक शाळांनी शिक्षण खात्यावरही दबदबा टिकवल्याचे वास्तव आहे.
(क्रमश:)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैशांचा मुहूर्त चुकला अन् तो जिवाला मुकला

$
0
0

vinod.patil@timesgroup.com

नाशिक : गेल्या दोन वर्षांपासून भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात अडकलेले मुलाच्या स्वेटरचे नऊशे रुपये मिळविण्यासाठी त्यांनी तब्बल दोन वर्षे प्रतीक्षा केली. नशिबाने दीर्घ प्रतीक्षेनंतर हे पैसे एकदाचे खात्यावर जमाही झाले; पण नियोजनशून्य असलेल्या आदिवासी विभागाचा पैसा जमा करण्याचा मुहूर्त चुकला अन् स्वेटर मिळवण्याच्या गर्तेत मात्र सातवीतल्या श्रावणाचे डोक्यावरचे छत्रच कायमचे हरवले. नोटबदलाच्या पार्श्वभूमीवर ढेपाळलेल्या यंत्रणेचे बळी ठरलेल्या दिनेश जाधव या आदिवासीची कथाच विदारक आहे. मुलाच्या स्वेटरचे स्वप्न बाळगणाऱ्या बापाने अखेरीला या नोटांच्या रांगेतच प्राण सोडल्याने लालफितीचा अनुभव घेतलेले जाधव कुटुंब आज अक्षरशः रस्त्यावर आले आहे.

राज्यातील शासकीय आश्रमशाळांमधील मुलांना स्वेटर देण्याचा निर्णय दोन वर्षांपासून गाजत आहे. ठेकेदार व मंत्रालयातील बाबूंच्या लागेबांधीतून पाच वर्षांपासून आदिवासी मुलांना स्वेटरच मिळाले नाहीत, तर दोन वर्षांपासून ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या भांडणात खरेदीच झाली नाही. माध्यमांच्या दबावानंतर आदिवासी विभागाने अखेरीस हिवाळ्याच्या तोंडावर ५५४ आश्रमशाळांमधील एक लाख ८७ हजार विद्यार्थ्यांना स्वेटर देण्याऐवजी त्यांच्या खात्यात रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या नादात विभाग नोटाबंदीचा निर्णयच विसरले. एकीकडे नागरिकांना दैनंदिन गरजांसाठी बँकांमध्ये पैसा मिळत नसताना आदिवासींना कुठून मिळणार, याचा सारासार विचारही विभागाने केलेला नाही. आदिवासी विभागाच्या भ्रष्ट यंत्रणेने योजना पोहोचविण्यात दिरंगाई केल्याने त्याचेही बळी जात असल्याचे चित्र आहे.

जव्हार तालुक्यातील झोप आश्रमशाळेतील श्रावण जाधव हा सातवीच्या वर्गात शिकतो. त्याचे वडील दिनेश जाधव मोलमजुरी करतात. त्याच्या कुटुंबात दिनेशची आई, पत्नी, दोन मुले व मुलगी असे सदस्य आहेत. श्रावणला आदिवासी विभागाकडून दिले जाणारे स्वेटर पाचवीपासून मिळालेच नाही. मात्र, आदिवासी विभागाने रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतल्याने त्याच्या खात्यात नोव्हेंबर महिन्यात घेतला. त्यानुसार त्याचे वडील दिनेश जाधव यांच्या महाराष्ट्र बँकेच्या खात्यात ९०० रुपये विभागाने जमा केले. मात्र, नोटाबंदीच्या निर्णयामुळे सध्या बँकांमध्ये असलेल्या चलनटंचाईचा फटका त्याच्या पालकांना बसला. गेल्या आठवड्यात तीनदा तो बँकेत गेला. मात्र, नंबर लागत नसल्याने तो जव्हारहून परत घरी जात होता. थंडीत कुडकुडणाऱ्या मुलाकडे बघवले जात नसल्याने अखेरीस सोमवारी (५ डिसेंबर) त्यांनी जव्हारची महाराष्ट्र बँक सकाळी सात वाजताच गाठली. पहिला नंबरही लावला. मात्र, इथेही दुर्दैव आड आले. इंटरनेटअभावी बँकेचा व्यवहारच ठप्प पडला. नंबर जाऊ नये म्हणून रांगेतच उभे राहिले; मात्र मुलासाठीची ही तळमळ अखेरीस त्यांच्या जिवावर बेतली अन् चक्कर येऊन ते खाली पडले. त्यात ते गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना जव्हार रुग्णालयात दाखल केले. मात्र, पुरेसे उपचार मिळत नसल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दुर्दैवाने अखेरीस त्यांच्यावर मृत्यूने झडप घातली.

...तर अंगावर काटे!

स्वेटरच्या नादात श्रावणने त्याच्या वडिलांनाच गमावले तर संपूर्ण कुटुंबाचा तारणहारच आज नसल्याने जाधव कुटुंबीय रस्त्यावर आले आहे. भ्रष्टाचारात त्याला दोन वर्षे स्वेटरच मिळाले नाही. शेवटी पैसे खात्यावर जमा झालेही, मात्र त्याच्यासाठी वडिलांचे छत्र गमावले आहे. आता त्याला पैसे मिळतीलही, मात्र ज्या स्वेटरमुळे वडील गेले, ते स्वेटर परिधान करताना त्याच्या अंगावर काटेच उभे राहतील. भ्रष्टाचार व नोटाबंदीचा एकत्रित ठरलेला श्रावण हा एकटाच बळी नसून, आजही असंख्य आदिवासींना स्वेटरसाठी बँकाच्या चकरा माराव्या लागत असल्याचे दुर्दैवी चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images