Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

टोलवसुली सुरळीत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशभरातील टोल नाक्यांबरोबरच जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील तीन टोल शुक्रवारी मध्यरात्री पोलिस बंदोबस्तात सुरू झाले. शनिवारी दिवसभर या टोलनाक्यावर गर्दी असली, तरी वाहन टोल देऊन पटकन कसे बाहेर पडतील याची विशेष काळजी घेतली जात होती. या टोलनाक्यावर सर्वत्र स्वाइप मशिन व सुटे पैसे असल्यामुळे वसुली सुरळीत सुरू होती.

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंतच्या टोल नाक्यावर १४, घोटी टोल नाक्यावर १० तर चांदवडजवळील टोल नाक्यावर १० स्वाइप मशिन असल्यामुळे कॅशलेस व्यवहाराला चांगला प्रतिसाद मिळाला.

शुक्रवारीच राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक प्रशांत खोडस्कर यांनी टोलच्या कर्मचाऱ्यांची बैठक घेवून त्यांना वाहनधारकांशी सभ्यतेने वागण्याच्या सूचना दिल्या. त्याचा परिणामही सर्वत्र दिसत होता. आतापर्यंत टोल नाक्यावर उर्मट वागणुकीचा प्रकार तीलनही टोलप्लाझात कोठेही दिसला नाही. सुट्या नोटांचा प्रश्न येऊ नये यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात झाली होती. त्यानंतर बँकेलाही निर्देश देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हा बँक कर्मचाऱ्यांकडून निषेध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाचशे व हजार नोटाबंदीच्या निर्णयानंतर आरबीआयने जिल्हा बँकांबाबत घेतेलेल्या सापत्न भूमिकेचा निषेध करण्यासाठी जिल्हा बँकेतील कर्मचारी संघटनांनी शनिवारी काळ्या फिती लावून कामकाज केले. आरबीआयकडून जिल्हा बँकेला नवीन चलन उपलब्ध करून दिले जात नसल्याने शेतकरी आक्रमक होवून कर्मचाऱ्यांनाच कोंडत आहेत. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी आरबीआयने तातडीने जिल्हा बँकेला नवीन चलन उपलब्ध करून देण्याची मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे.

जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांना सध्या अभूतपूर्व स्थितीचा सामना करावा लागत आहे. आरबीआयने जिल्हा बँकेला नवीन चलन पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिलेले नाही. जिल्ह्यातील मोठी बँक असतानाही, बँकेला सापत्न वागणूक दिली जात आहे. एक‌िकडे लहान बँकाना मदत तर, दुसरीकडे शेतकऱ्यांच्या बँकेला ठेगा दाखवला जात आहे. जिल्हा बँकेला रोकड उपलब्ध करून दिली जात नसल्याने शेतकरी संतप्त होवून त्यांचा राग कर्मचाऱ्यांवर काढत आहेत. अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांना कोंडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आरबीआयने तातडीने रोकड उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच आरबीआयकडून दिल्या जाणाऱ्या दुजाभावाच्या वागणुकीचा निषेध करण्यासाठी व रोकड उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यालयासह जिल्ह्यातील २२३ शाखांमध्ये कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष रतन जाधव यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पार्किंगसाठी मोबाइल अॅप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

महापालिका प्रशासनाने शहरातील पार्किग व्यवस्था सुधारण्यासाठी तीन टप्प्यात नियोजन केले असून, दुचारी व चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली आहे. सुनियंत्र‌ित, सुत्रबद्ध पार्किंगसाठी ऑनट्रीट पार्किंग, ऑफट्रीट पार्किंग, रोटरी पार्किंग सिस्टीम अशा तीन प्रकारात पार्किंगचे विभाजन केले असून, या पार्किंग स्थळांचे पूर्ण नियंत्रण मोबाईल पार्किंग अॅपने केले जाणार आहे. पालिकेच्या या नियोजनामुळे शहरात ३४ रस्त्यांवर तर पाच खुल्या मैदानांवर पार्किंगची व्यवस्था होणार आहे. तसेच ११ ठिकाणी बहुमजली पार्किंगची सुविधा होणार असून, वाहतुकीच्या कटकटीतून नाशिककरांची सुटका होणार असल्याचा दावा आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी केला आहे.

शहरातील सध्या जवळपास सात लाख चारचाकी व दुचाकी वाहने आहेत. या वाहनामुळे शहरात वाहतुकीची कोंडी होत असून, ध्वनी व वायु प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे महापालिकेने शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासह पार्किंगच्या व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी एक नियोजनबद्ध आराखडा आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आला आहे. पालिकेने पार्किंगचे तीन प्रकारात विभाजन केले आहे.

ऑनट्रीट पार्किंग प्रकारात शहरातील ३४ प्रमुख रस्त्यांवर चारचाकी व दुचाकीसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र लांबीचा पट्टा व दुचाकीसाठी स्वतंत्र पट्टा असणार आहे. सदर जागेतच वाहनचालकांने वाहने पार्किंग करायची असून त्यामध्ये गंगापूर रोड, भद्रकाली, पंटवटी, त्र्यंबक रोडवरील रस्त्यांचा समावेश आहे. गजबजलेल्या ३४ ठिकाणी या पार्किंगची व्यवस्था असणार आहे. त्यानंतर दुसऱ्या प्रकारात ऑफट्रीट पार्किंग असणार आहे. शहरातील पाच मैदानांमध्ये ही सुविधा असणार आहे. बीडी भालेकरसह रामकुंड परिसर, इंदिरानगर जॉगिंग ट्रक येथे २३ हजार ४४५ चौरस मीटर जागा उपलब्ध होणार आहे. तसेच शहरातील प्रमुख शासकीय कार्यालयांसह ११ ठिकाणी बहुमजली पार्किंग करण्याचा प्रस्ताव आहे.

कॅशलेस पार्किंग सुविधा
महापालिकेकडून तयार केलेल्या या तीनही पार्किंग व्यवस्था या मोबाइल पार्किंग अॅपने नियंत्रीत होणार आहे. प्रत्येक पार्किंगस्थळी क्युआर सांकेतिक कोड असणार आहे. या कोडसमोर वाहन उभे करून त्याचा फोटो वाहनधारकाने काढल्यानंतर त्याच्या खात्यातून कॅशलेश पद्धतीने रक्कम वजा होणार आहे. मोबाइल पार्किंग अॅप हे जीपीएस प्रणालीवर आधारीत असणार आहे. वाहनधारकाला हे मोबाइल पार्किंग अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. या अॅपमध्ये पार्किंग जागा शोधणे, पेमेंट करणे, इ-बील मिळवणे व वाहनांचा शोध घेता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीसाठी हवेत व्यवस्थापन सल्लागार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्यानंतर महापालिकेने स्मार्ट सिटीच्या अंमलबजावणीसाठी नाशिक म्युन्सिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनची(एसपीव्ही) स्थापना केली आहे. या कंपनीच्या सीईओपदी विजय पगार यांच्या नियुक्तीनंतर आता पालिकेने कंपनीसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पालिकेने निविदा प्रसिद्ध केल्या असून या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारावर स्मार्ट सिटीच्या नियोजनासह अंमलबजावणीची जबाबदारी असणार आहे.

नाशिकचा समावेश स्मार्ट सिटी योजनेत झाल्यानंतर आता योजनेच्या अंमलबजावणीसाठी एसपीव्हीची स्थापना केली आहे. या एसपीव्ही कंपनीची एक बैठक संपन्न झाली असून, दुसऱ्या बैठकीची तयारी सुरू आहे. आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी कंपनीच्या सीईओपदी उपायुक्त विजय पगार यांची नियुक्ती केली आहे. आता पाठोपाठ कंपनीच्या कामकाजाला वेग देण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीचे काम सुरू केले असून यासाठी पालिकेने जाहीरात प्रसिद्ध केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरा ठिकाणी होणार सिग्नल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील वाहतुकीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने शहरात नव्याने ११ ट्रॅफिक सिग्नल बसवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या संदर्भात पालिकेने निवादा काढल्या असून, यासाठी एक कोटी १२ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. या सिग्नल्समधून बहुचर्चेतील इंद‌िरानगरचा अंडरपास टाळण्यात आला आहे. तसेच ज्या चौकांमध्ये हे सिग्नल बसव‌िण्याची तयारी सुरू असली त्या चौकांचे आधीच काही खासगी विकासकांनी सुशोभीकरण केले आहे. त्यामुळे पालिकेसमोरही सिग्नल उभ्या करण्याच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.

शहरातील वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस कठीण होत चालला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी पालिकेने आतापर्यंत शहरात ३४ ठिकाणी सिग्नल बसविले आहेत. परंतु पोलिसांनी पालिकेला अजून १९ ठिकाणी सिग्नल बसविण्याची मागणी केली आहे. स्मार्ट सिटी योजनेत पालिकेनेही वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर दिला आहे. त्यामुळे महासभेने सकारात्मक भूमिका घेत, १९ पैकी ११ चौकांमध्ये सिग्नल बसविण्याची परवानगी दिली आहे. त्यासाठी पालिकेने निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यासाठी एक कोटी १२ लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला असून, तीन महिन्यात हे काम पूर्ण करावयाचे आहे. या नव्या सिग्नल्समध्ये त्र्यंबकरोड व गंगापूर रोडवरील चौकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे एकट्या गंगापूर रोडवरील पाच चौकांचा यात समावेश आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहनचालकांच्या वेगाला काही अंशी ब्रेक लागणार आहे.


सुशोभीकरणाची अडचणी

महापालिकेने नुकतेच खासगी विकासकांच्या मदतीने सीएसआर उपक्रमांतून प्रमुख चौकांचे सुशोभीकरण केले आहे. नव्याने सिग्नल बसविण्याच्या यादीत या प्रमुख सुशोभीकरण केलेल्या चौकांचा समावेश आहे. या ठिकाणी सिग्नल बसवल्यास चौकांमधील सुशोभिकरण काढावे लागणार आहे. त्यामुळे विकासकांनी केलेला लाखोंचा खर्च वाया जाणार असून, शहराच्या सौंदर्यालाही नुकसान पोहाचणार आहे. त्यामुळे सिग्नल कसे बसवायचे असा पेच पालिकेसमोर आहे.

या ठिकाणी होणार सिग्नल

जेहान सर्कल

प्रसाद सर्कल

विद्याविकास सर्कल

पाइपलाइन रोड चौक

मायको सर्कल

एबीबी सर्कल

सिबल हॉटेल चौक

निलगिरी बाक चौक

सारडा सर्कल

बिगबाजार सर्कल

एचडीएफसी सर्कल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ध्वनीप्रदूषणाची तक्रार करा व्हॉट्स अॅप, ट्विटरवर!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सणांनिम‌ित्त होणाऱ्या आतषबाजीमुळे तसेच सध्या लग्नसराईमुळे होणारे ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि नाशिक पोलिसांनी ठोस पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून ध्वनी प्रदूषणाची तक्रार नागरिकांना थेट करता यावी यासाठी नाशिक पोलिसांनी व्हॉटसअॅप, ट्विटर तसेच १०० हा तक्रार क्रमांक उपलब्ध करुन दिला आहे.

ध्वनीप्रदूषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास, श्रवणशक्तीवर दुष्परिणाम, वातावरणातील नैसर्गिक समतोल बिघडण्याच्या अनेक शक्यतांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत चांगल्या आरोग्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक आहे. ध्वनीप्रदूषण नियम व नियमांचे उल्लंघन म्हणजेच नागरिकांच्या मुलभूत हक्कांचे उल्लंघन आहे. याचीच दखल घेऊन मुंबई हायकोर्टाने ध्वनी प्रदूषणाच्या विविध याचिकांच्या सुनावणीत अतिशय स्पष्ट असे विविध निर्देश दिले आहेत. कोर्टाच्या या निर्देशांचे पालन होण्यासाठीच नागरिकांनी पोल‌िसांत तक्रार करावी व पोल‌िसांनी तातडीने कारवाई करावी, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. सध्या लग्नसराई जोरात असून या दरम्यान डीजेचा वापर तसेच ध्वनी प्रदूषणाच्या उल्लंघनाच्या अनेक घटना घडतात. हीच बाब लक्षात घेऊन नाशिक शहर पोलिसांनी ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठीच नाशिककरांनी थेट तक्रार करावी यासाठी नाशिक पोलिसांनी विविध हेल्पलाईन उपलब्ध करुन दिली आहे.

उल्लंघन केल्यास

ध्वनीप्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्यास पाच वर्षांचा कारावास अथवा एक लाख दंड अथवा दोन्हीही शिक्षेची तरतूद असून यासंदर्भात कठोर कार्यवाहीचे आदेश राज्य सरकारने सरकारने पोलीस नियंत्रणास दिले आहेत.

अशी आहे ध्वनी मर्यादा

ध्वनीप्रदूषण अधिनियमानुसार औद्योग‌िक क्षेत्रात दिवसा ७५ डेस‌िबल तर रात्री ७० डेस‌िबल एवढी ध्वनीमर्यादा असावी. व्यापारी क्षेत्रात दिवसा ६५ डेस‌िबल तर रात्री ५५ डेस‌िबल एवढी, रहिवासी क्षेत्रात दिवसा ५५ डेस‌िबल तर रात्री ४५ डेस‌िबल आणि शांतता क्षेत्रात दिवसा ५० डेस‌िबल ते रात्री ४० डेस‌िबल पर्यंत ध्वनीमर्यादा आहे.

येथे करा तक्रार

व्हॉट्सअॅप – ८३९०१८९५८४, ८३९०२०९५१८, ९०७५०११२२२

हेल्पलाइन – १००, ९७६२१००१००, ९७६२२००२००

शहर पोलिस वेबसाइट - http://nashikpolice.com/

नाशिक शहर पोलिस ट्विटर - @nashikpolice

डॉ. रवींद्र सिंघल, पोलिस आयुक्त ट्विटर - @ravindersingal

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकांनो, यांच्याकडे लक्ष द्या!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
कॉलेज कॅम्पसमध्ये नसेल एवढी विद्यार्थ्यांची गर्दी आसाराम पुलाजवळील गोदापार्कवर होत असते. या ठिकाणी मंगळवारी पोलिसांनी हजेरी लावल्याने झाडाझुडपांत बसलेल्या मुला-मुलींची एकच धावपळ उडाली. कॉलेज बंक करून भविष्याची दिशा बिघडू पाहणाऱ्या या मुलांच्या पालकांशी संपर्क करून मुलांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले.
सिडको परिसरातील एका तेरा वर्षांच्या मुलीवर सहा जणांनी सामूह‌िक बलात्कार केल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर अंबड, सातपूर इंदिरानगर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी विविध शाळांमध्ये भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दुसरीकडे परिमंडळ दोनमध्ये पोलिसांनी कॉलेजरोड, आसाराम बापू पूल परिसर, कृषीनगर जॉग‌िंग ट्रॅक, गंगापूर रोडवरील अन्य काही ठिकाणी कारवाई केली. याबाबत बोलताना सहायक पोलिस आयुक्त राजू भुजबळ म्हणाले की, कॉलेज किंवा शाळा बंक करून शेकडो विद्यार्थी दररोज या भागात टवाळकी करतात. यामुळे त्यांच्या पालकांची फसवणूक तर होतेच, मात्र मुलांचे भविष्यही खराब होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या विविध पथकांनी वरील ठिकाणी कारवाई केली. संबंध‌ित मुलांना शाळा किंवा कॉलेज बंक केल्याने होणाऱ्या नुकसानीची माहिती देण्यात आली. मुलांचे आयकार्ड तपासण्यात आले. एवढेच नव्हे तर संबंध‌ित मुलांच्या पालकांना मुले बाहेर फिरतात, हे मोबाइलद्वारे कॉल करून अवगत करून देण्यात आल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले. मुलांवर कारवाई करणे हा उद्देश आमचा नाही. मात्र, आपली मुले काय करतात, हे त्यांच्या पालकांना ठाऊक असायला हवे म्हणून पुढाकार घ्यावा लागत असल्याचे भुजबळ म्हणाले.

पालकांनी आपल्या पाल्याचे मित्र होणे हा एकमेव पर्याय आहे. मुलांचे काहीतरी चुकतेय याची जाणीव पालकास झाल्यास अनेक गंभीर समस्यांवर उत्तर सापडेल. दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. मुले दोन ते तीन दिवस कॉलेजला दांड्या मारतात, याची खंत कॉलेज व्यवस्थापनला वाटत नाही. आपला पाल्य काय करतो, याची माहिती पालकांनी ठेवायला हवी.
- राजू भुजबळ, सहायक पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दिवाणी’च्या आदेशालाच पालिकेचे आव्हान

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या प्रभागरचनेला नाशिकच्या दिवाणी न्यायालयात आव्हान दिले असले तरी, दिवाणी न्यायालयाला यावर सुनावणी घेण्याचा अधिकारच नसल्याचा दावा पालिकेने केला आहे. त्यामुळे पुढील ९ डिसेंबरच्या सुनावणीत पालिका दिवाणी न्यायालयाच्या कार्यक्षेत्रालाच आव्हान देणार आहे. प्रभागरचना ही राज्य निवडणूक आयोगाच्या गाइडलाइन प्रमाणेच तयार करण्यात आल्याचा दावाही पालिकेने केला आहे. त्यामुळे प्रभाग रचनेसंदर्भातील अर्ज निकाली काढला जाण्याचीच शक्यता अधिक आहे. दरम्यान दिवाणी न्यायालयाचा आदेश राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला आहे.

महापालिकेच्या प्रभाग रचनेसंदर्भात हर्षल जाधव यांनी नाशिकच्या दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला असून, दिवाणी न्यायाधिशांनी यांसदर्भात महापालिका, जिल्हाधिकारी व राज्य निवडणूक आयोगाला विचारणा केली आहे. तसेच येत्या ९ डिसेंबरला आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे प्रभाग रचनेसंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. परंतु या अर्जावर पालिकेने खुलासा केला असून, प्रभागरचना ही राज्य निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या दिशानिर्देशानुसारच तयार केली आहे. गुगल मॅपच्या आधारे प्रगणक गट तयार केले असून, त्याची माहिती सार्वजनिक करण्याची गरजच नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे या अर्जाला अर्थच नाही असा दावा प्रशासनातर्फे केला जात आहे. तसेच येत्या ९ डिसेंबरला दिवाणी न्यायालयाच्या आदेशालाच आव्हान दिले जाणार आहे. संबंधित विषय हा दिवाणी न्यायालयाच्या न्यायकक्षेत येत नाही, तरीही न्यायालयाने आदेश दिला असल्याने प्रथम या आदेशालाच महापालिका आव्हान देणार आहे. त्यामुळे हा अर्ज फेटाळला जाण्याची शक्यता आहे. संबधित प्रभाग रचनेला हायकोर्टात आव्हान देण्याऐवजी दिवाणीत आव्हान देण्यात आल्याबद्दल प्रशासनानेही आश्चर्य व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अर्जुन पगारे अखेर गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
तळेगाव दंगल प्रकरणात फरार असलेला रिपाइंचा शहराध्यक्ष अर्जुन पगारे यास नाशिक ग्रामीण पोल‌िसांनी मंगळवारी चाळीसगाव येथून ताब्यात घेतले. पगारेला आज (दि.७) कोर्टासमोर हजर केले जाणार आहे. पगारेविरोधात दंगलीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, मागील महिन्यापासून तो फरार होता.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी (तळेगाव) येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक गावांत दंगल उसळली होती. पोलिसांनी दंगल परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, यानंतर दसऱ्याच्या दिवशी धार्मिक कार्यक्रमानंतर अर्जुन पगारेसह इतर समाजकंटकांनी पुन्हा दगडफेक, गाड्यांची तोडफोड व गावा-गावांमध्ये जाऊन शिवीगाळ केली. यामुळे पुन्हा दोन समाजांत वाद निर्माण होऊन दंगल भडकली होती. या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी पगारेसह शेकडो जणांवर दंगल, शासकीय कामात अडथळा आणणे, जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले. पगारेने कोर्टात अटकपूर्व जामीन सादर केला. मात्र, कोर्टाने पगारेचा अर्ज फेटाळून लावला. पोलिस अटक करतील या भीतीने पगारेने शहरातून पलायन केले. नाशिक ग्रामीण पोलिसांचा शोध सुरू होता. मात्र, त्याचा ठावठिकाणा मिळत नव्हता. दरम्यान, २८ नोव्हेंबरला चाळीसगाव पोलिसांनी शिताफीने पगारेच्या मुसक्या आवळल्या. चाळीसगाव शहरातील ब्रिज कॉर्नर हॉटेलमधे छापा टाकून चाळीसगाव पोलिसांनी अर्जुन पगारेसह इतर सहा संशयितांना अटक केली आहे. दरोड्याच्या प्रयत्नात काही जण असल्याची माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव पोलिसांनी हा छापा मारला होता. पोलिसांनी संशयितांकडून गावठी कट्टा, पाच काडतुसे, धारदार शस्त्रे, दोर, मिरचीची पूड, लोखंडी रॉड, एमएच १५ डीसी २०५९ क्रमांकाची स्कॉर्पिओ कार असा ४ लाख १२ हजार ६०० रुपयांचा ऐवज जप्त केला होता. त्यांच्याविरोधात दरोडापूर्व तयारी, शासकीय कामात अडथळा आणणे आणि मुंबई पोल‌िस आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. चाळीसगाव कोर्टाने अर्जुन पगारेसह त्याच्या इतर साथीदारांना पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने नाशिक ग्रामीण पोलिसांच्या पथकाने चाळीसगाव गाठून संशयितांचा ताबा घेतला. संशयितांना बुधवारी कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धार्मिक स्थळांबाबत १३ला सुनावणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्यांसदर्भात महापालिकेने सुरू केलेल्या कारवाई विरोधात शिवसेनेच्यावतीने दिलीप दातीर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मंगळवारी न्या. नरेश पाटील यांच्या पीठासमोर सुनावणी झाली असून, कोर्टाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ डिसेंबरला ठेवली आहे.

हायकोर्टाच्या आदेशानुसार महापालिकेने पहिल्या टप्प्यात शहरातील ८४ अनधिकृत धार्मिक स्थळे जमीनदोस्त केली आहेत. तर दुसऱ्या टप्प्यांतील १३३ स्थळांवर कारवाई सुरू केली आहे. परंतु या कारवाईला शिवसेनेसह भाजपनेही विरोध केला आहे. शिवसेनेने तर या आदेशालाच आव्हान देत, हायकोर्टात जनहीत याचिका दाखल केली आहे. शिवसेनेने माजी सभागृहनेते दिलीप दातीर यांनी याचिका दाखल केली असून, यावर मंगळवारी न्या. पाटील व एम. एस. कर्णिक यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. न्यायाधिशांना दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर पुढील सुनावणी आता १३ डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे. या दिवशी या कारवाइला स्थगिती मिळेल, असा दावा याचिकाकर्त्यांच्या वतीने केला जात आहे.

आज महासभेत लक्षवेधी

शिवेसनेने हायकोर्टात याचिका दाखल केल्यानंतर बुधवारच्या महासभेत लक्षवेधी मांडली आहे. अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाईला शिवसेनेने विरोध केला असून, पालिकेलाही आव्हान दिले आहे. त्यामुळे बुधवारच्या महासभेत या कारवाईवर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एका दिवसात तीन विनयभंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सोमवारी दिवसभरात विनयभंगप्रकरणी तीन वेगवेगळ्या घटनांची नोंद संबंध‌ित पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.
विनयभंगाची एक तक्रार भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये दाखल आहे. तक्रारीनुसार उपनगर येथे राहणारी पीड‌ित मुलगी शालेय विद्या‌र्थिनी असून, सोमवारी सायंकाळी ती मित्र-मैत्र‌िणींसमवेत नेहरू गार्डन येथे चायनीज गाड्यांवर गेली असता अन्नपदार्थ अंगावर पडल्याने ती बाजूला गेली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या आकाश अशोक बनसोडे (रा. आम्रपाली झोपडपट्टी) व त्याच्या तीन साथीदारांनी युवतीची छेड काढली. यावेळी दुसरी मैत्र‌िण पीड‌ित मुलीच्या मदतीला धावून गेली. मात्र, संशय‌ितांनी दोघींना पकडून ठेवले. ही घटना दोन्ही मुलींच्या शालेय मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी वाद मिटविण्यासाठी धाव घेतली. यावेळी संशय‌ितांपैकी एकाने युवतीस दोन किलो वजनाच्या लोखंडी मापाने तर तिच्या मदतीला धावून आलेल्या मित्रांना लाथाबुक्यांनी मारहाण करीत युवतींचा विनयभंग केला. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी मारहाणीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहाय्यक निरीक्षक लोखंडे करीत आहेत.
दरम्यान, अल्पेश लुंकड व त्याच्या एका साथीदाराने आनंदवली परिसरातील काळेनगर भागात राहणाऱ्या ३२ वर्षीय महिलेचा घरात घुसून विनयभंग केल्या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास संशयित आरोपी पीड‌ित महिलेच्या घरात घुसले. राजेंद्र कानतोडे याच्यावर दाखल केलेली पोलिस तक्रार मागे घे, नाहीतर तुम्हाला बरबाद करून टाकेल असा दम देत संशयितांनी महिलेचा विनयभंग केला. पीड‌ित महिलेच्या तक्रारीनुसार गंगापूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.
विनयभंग प्रकरणी पंचवटी पोलिसांनी सुध्दा गुन्ह्याची नोंद केली आहे. पेठरोड भागातील १६ वर्षीय युवतीसोबत सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मनपाच्या पंचवटी विभागीय इमारतीसमोर हा प्रकार घडला. पीड‌ित मुलगी आपल्या मैत्र‌िणीसमवेत पायी जात असताना संशयित आरोपी सोनू विठ्ठल चौघुले (२५ रा. शनिमंदिरामागे, नवनाथनगर) याने आपल्या ताब्यातील रिक्षा त्यांना आडवी लावली. यावेळी चौघुलेने मुलीच्या हातात चिठ्ठी देत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी विनयभंग आणि लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक मुंढे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकारी कार्यालयात बसवले स्वाइप मशिन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सरकारी कर्मचाऱ्यांना बँक खात्यातून पैसै काढण्यासाठी रांगेत ऊभे राहावे लागू नये यासाठी स्टेट बँकेने पुढाकार घेतला आहे. सरकारी कार्यालयांमध्ये स्वाईप मशिनद्वारे दोन हजार रुपये मिळणार असून जिल्हाधिकारी कार्यालयातही अशा प्रकारचे मशिन बसविण्यात आले आहे. मंगळवारी दिवसभरात कर्मचाऱ्यांना सुमारे दोन लाखांचे चलन वाटप करण्यात आले.
चलन तुटवड्याचा परिणाम सरकारी कार्यालयांमधील दैनंदिन कामकाजावर होऊ नये, यासाठी रिझर्व्ह बँकेने सरकारी कार्यालयांमध्ये स्वाइपद्वारे दोन हजार रुपये उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश स्टेट बँकेला दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबविण्यात येत असून, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्याच दिवशी २२१ कर्मचाऱ्यांनी २ लाख १३ हजारांचे चलन वाटप केले. जिल्ह्यातील महत्वाच्या सरकारी कार्यालयांमध्ये स्वाइप मशिन्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खो-खोत जय हिंद, शिवभक्त जेते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा खो-खो संघटना व समर्पण नाशिकतर्फे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर सुरू असलेल्या अखिल भारतीय आमंत्रितांच्या खो-खो स्पर्धेत पुरुषांमध्ये इचलकरंजीचा जय हिंद, तर महिलांमध्ये बदलापूरचा शिवभक्त संघाने विजेतेपद मिळविले. येथील शिवछत्रपती शिवाजी स्टेडियमवर ही स्पर्धा झाली. प्रियंका भोपी, विजय हजारे या खेळाडूंना सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूचा बहुमान मिळाला.

अखेरच्या सेकंदांत हुकला मुंबईचा विजय

पुरुषांच्या सुपरलीग गटातील पुण्याचा नवमहाराष्ट्र संघ विरुद्ध मुंबईचा महात्मा गांधी संघ यांच्यातील लढत उत्कंठावर्धक झाली. महात्मा गांधी संघाने पहिल्या सत्रात आक्रमणात नऊ गडी टिपले, तर पुण्याच्या नवमहाराष्ट्र संघाने ८ गडी टिपले. मुंबईकडे अवघ्या एका गुणाचे अधिक्य होते. दुसऱ्या सत्रात सामन्याला नाट्यमय कलाटणी मिळाली. मुंबईने ७ गडी बाद केल्यानंतर पुण्याच्या नवमहाराष्ट्र संघाला जिंकण्यासाठी मुंबईचे नऊ गडी बाद करावे लागणार होते. मात्र, सात गडी बाद केल्यानंतर पुण्याकडे अखेरचे ४० सेकंद शिल्लक होते, तर मुंबईकडे जिंकण्यासाठी फक्त ४० सेकंद हुलकावणी देणे एवढेच हातात होते. मात्र, पुण्याने अखेरची काही सेकंद शिल्लक असताना एक गडी बाद केला आणि सामना १६-१६ असा बरोबरीत सुटला. ठाण्याचा विहंग मंडळ व इचलकरंजीचा जय हिंद क्रीडा मंडळ यांच्यातील सामनाही १५-१५ असा बरोबरीत सुटला.

प्रियंकाची सात मिनिटांची विक्रमी ‘बॅटिंग’

महिला गटातील सुपरलीगमध्ये बदलापूरच्या शिवभक्त मंडळाच्या प्रियंका भोपीने स्पर्धेतील सर्वोच्च ७ मिनिटांची पळतीची नोंद करीत स्पर्धाविक्रम केला. इचलकरंजीच्या जय हिंद संघाविरुद्ध तिने ही कामगिरी केली. विशेष म्हणजे दुसऱ्या सत्रातही तिने ४.१० मिनिटांची नोंद करीत ‘जय हिंद’च्या आक्रमणाची हवाच काढून घेतली. पहिल्या सत्रात ‘जय हिंद’ने पाच गडी गमावल्यानंतर बदलापूरविरुद्ध आक्रमण रचले. बदलापूरच्या प्रियंका भोपीसह तीन खेळाडूंची पहिली बॅच मैदानात उतरली. ‘जय हिंद’ने सुरुवातीलाच प्रियंकावर आक्रमण रचले. मात्र, त्यांची ही सर्वांत मोठी चूक ठरली. प्रियंकाने ‘जय हिंद’च्या खेळाडूंना तब्बल सात मिनिटे झुंजवले. अखेर प्रचंड थकवा आल्याने प्रियंका बाद झाली. उर्वरित दोन मिनिटे अन्य खेळाडूंनी आरामात खेळून काढले. प्रियंकाच्या सर्वांगसुंदर खेळाच्या जोरावर बदलापूरच्या शि‍वभक्तने जय हिंदवर दणदणीत विजयाची नोंद केली.

स्पर्धेचा निकाल

पुरुष गट ः प्रथम- जय हिंद क्रीडा मंडळ, इचलकरंजी, द्वितीय (विभागून)- नवमहाराष्ट्र संघ (पुणे) व महात्मा गांधी क्रीडा मंडळ (मुंबई), चतुर्थ- विहंग क्रीडा मंडळ (ठाणे) (द्वितीय क्रमांक विभागून दिल्याने तृतीय क्रमांक जाहीर केला नाही)

महिला गट ः प्रथम- शिवभक्त, बदलापूर, द्वितीय- आर. एफ. नाईक, ठाणे, तृतीय- आर्यन क्रीडा मंडळ, रत्नागिरी, चतुर्थ- जय हिंद क्रीडा मंडळ, इचलकरंजी.

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट

संरक्षक ः प्रांजल मगर, हर्षद हटनकर.
आक्रमक ः ऐश्वर्या सावंत, सुयश गरगटे.
अष्टपैलू ः प्रियंका भोपी, विजय हजारे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रांगेतील आणखी एकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नोटाबंदीमुळे देशभरात रांगांचे सत्र सुरू असतानाच नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात दोन वेगवेगळ्या घटनात दोन जणांचा बळी गेला आहे. नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील निवृत्त कृषी अधिकारी केशवराव देवरे आणि जव्हार येथील दिनेश जाधव (४०) यांचा त्यात समावेश आहे.

निवृत्त कृषी अधिकारी केशवराव देवरे (६८) यांना बँक अधिकाऱ्यांनी कर्जावरील फॉर्मवर सही करण्यासाठी बँकेत बोलावले होते. त्यानुसार देवरे हे नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील बँकेच्या शाखेत गेले. बँकेत मोठी गर्दी असल्याने त्यांना बँकेतच अस्वस्थ वाटू लागले. त्याचवेळी त्यांना चक्कर आली. ते बँकेच्या आवारातच कोसळल्याने त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोल‌िस ठाण्यात या घटनेबाबत बाबत सोमवारी रात्री उशिरापर्यंत कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती.
दिनेश जाधव (४०) हे जव्हार येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेमध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. पैसे काढण्यासाठी असलेल्या रांगेत ते उभे राहिले. मात्र, याचवेळी ते अचानक बेशुद्ध पडले. त्यांना जव्हारच्या ग्रामीण हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ तातडीने दाखल करण्यात आले. मात्र, पुढील उपचारासाठी त्यांना तातडीने नाशिकच्या सिव्हिलमध्ये आणण्यात आले. मात्र, मंगळवारी दुपारी १२ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी नोंद केली आहे. नोटाबंदीच्या या घडामोडीत नाशिकमध्ये दोन दिवसात दोन जणांचा बळी गेल्याने चिंतेचे वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चलनबदलानंतर शिक्षणसम्राटांची कोंडी

$
0
0

jitendra.tarte@timesgroup.com

Tweet : @jitendratarteMT

शिक्षणाच्या नावाखाली नफेखोर शिक्षणसम्राटांना चलनबदलाच्या निर्णयाने चांगलाच दणका दिला. या निर्णयाच्या पंधरवड्यानंतर आता ज्ञानमंदिरात लपलेल्या काळ्या मायेचे किस्से हळूहळू बाहेर येत आहेत. आजवरच्या ‘अर्थ’ व्यवस्थापनाची घडी पुढे उसवेल काय, या चिंतेने या क्षेत्रातील काही बड्या मोहऱ्यांचीही झोप उडाली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया नुकतीच पार पडली असतानाच पाचशे अन् हजाराच्या नोटा रद्द झाल्याचा दणका केंद्राने दिला. यामुळे अल्पावधीत काळ्याचे पांढरे करण्यासाठी काही बड्या शिक्षण संस्थांमधील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या चलनाचा खुबीने वापर केला गेला आहे.

शिक्षक नव्हे; प्यादी!

जिल्ह्यात हजारो शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा फौजफाटा काही बड्या शिक्षण संस्थांमध्ये नोकरीस आहे. बहुतांश संस्थांनी विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि विद्यापीठांचे कर्मचारी नियुक्तीचे नियम धाब्यावर बसवून हुकमाची ताबेदारी करणाऱ्या अन् व्यवस्थापनाच्या हातचे बाहुले बनू शकणाऱ्या मोहऱ्यांनाच महत्त्वाची पदे बहाल करण्यात धन्यता मानली आहे. या निवडीची तपासणी करणाऱ्या यंत्रणाही या सम्राटांच्या दबावतंत्रापुढे गुढघे टेकतात. एरव्ही निवडणुकांच्या प्रचारासाठी शाळा सोडून झेंडे खांद्यावर घेणारे हे कर्मचारी उन्हातान्हात संस्थाचालकांच्या नोटा घेऊन बँकांच्या रांगेतही उभे राहिले. यामुळे त्यांना बुद्धिबळाच्या पटावरील प्याद्यांची उपमाही शिक्षण संस्थेच्या एका पदाधिकाऱ्याने दिली.

एकाच संस्थेतील अनेक कर्मचारी सारख्या रकमा घेऊन बँकांच्या रांगेत उभे राहिल्यानंतर या प्रकरणाची चर्चाही दबक्या आवाजात रंगली. काहींनी कर्मचाऱ्यांना रात्रीतून ऋणमुक्त करण्याचाही फंडा अवलंबला.

गुंतवणूकही कॅशलेस

शिक्षणासारख्या पवित्र कार्यासाठी कायदेशीर तरतुदींचा शंभर टक्के लाभ उचलत काही संस्थांनी नाममात्र मोबदल्यावर बड्या जमिनीही संपादित केल्या आहेत. अवैध शिक्षण संस्थांचा इमारत निधी, व्यवस्थापन खर्च, परीक्षा फी, पुस्तक खर्च अन् देणग्यांची हरप्रकारे घडवून आणली जाणारी बरसात अशा वेगवेगळ्या शीर्षकाखाली लाटलेल्या ‘कॅपिटेशन फी’च्या गोंडस नावाने बहुतांश संस्था कधीच गब्बर बनल्या आहेत. काळ्या मायेतून काही शिक्षणसंस्थांनी जमिनी, इमारती, वाहने आदी प्रकारातून इन्फ्रा स्ट्रक्चरमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. यामुळे केंद्राच्या या निर्णयाने १०० पैकी ३ ते ५ टक्के काळ्या पैशाला चाप बसणार असल्याचा अंदाज या विषयातील अभ्यासकांनी ‘मटा’शी बोलताना मांडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मका उत्पादकांवर आली संक्रांत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील नामपूर येथील नामपूर सोसायटी व मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. मात्र आठ दिवसांत उलटूनही केवळ २८ क्विटंल मका खरेदी करण्यात आला झाला आहे. मका ओला असल्याची कारणे देवून व्यापारी शेतकऱ्यांच्या ‌मालाला नाकारत असल्यामुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

राज्य व केंद्र सरकार दर वर्षी शेतमालाची आधारभूत किंमत ठरवत असते. शेतकऱ्यांच्या मालास चांगला भाव मिळावा हा यामागचा हेतू असतो. यावर्षी शासनाने मक्यास एक हजार ३६५ रुपये प्रति क्विंटल ही आधारभूत किंमत ठरवली आहे. चालू वर्षी मकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये आवक वाढली असून, व्यापारी कमी दरात मका खरेदी करीत आहेत.

नामपूर सोसायटीचे संचालक बाजीराव सांवत यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून नामपूरला मका खरेदी केंद्र सुरू केले. महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनमार्फत हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे आठ दिवस उलटून अवघा २८ क्विंटल मका खरेदी करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. मका खरेदी केंद्रातील कर्मचारी व स्थानिक बाजार समितीतील व्यापारी यांच्यात साटेलोटे असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक सांवत, भाजप गटप्रमुख किरण सावंत, सोमनाथ सोनवणे, दिनेश सावळा यांनी केला आहे.

कितीही सुका, कोरडा, वाळलेला मका विक्रीससाठी आणला तरी तो ओला असल्याचा बनाव अधिकारी करतात. या ठिकाणी अजून मक्यातील पाण्याचे प्रमाण तपासणारे मशिन उपलब्ध नाही. पैसेही रोख मिळत नाहीत. या सर्व समस्यांना कंटाळून शेतकरी खासगी व्यापाऱ्याला मका विक्री करीत आहेत. व्यापारी कमी भावात माल खरेदी करून मका उत्पादकाची लूट करीत असल्यामुळे शेतकरी अक्षरशः भरडले जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प ठरतोय शोपीस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

गोदावरी नदी प्रदूषणाकडे त्र्यंबक पालिकेचे दुर्लक्ष झाले असून, नदीकाठाला असलेल्या कचरा डेपो आणि नदीपात्रात सोडलेले सांडपाणी यामुळे नदी प्रदूष‌णात वाढ होत आहे. एकिकडे नदीचे प्रदूषण वाढत असताना दुसरीकडे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प केवळ नावालाच उरला आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पावर पालिका दर महिन्याला किमान ८० ते ९० हजार रुपये खर्च करीत आहे.

त्र्यंब‌क शहराला गौतमी बेझे धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. शहराची लोकसंख्या १२ ते १३ हजारांपर्यंत पोहचली आहे. दररोजच्या पाण्याचा वापर वाढलेला असतांना बारा वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेला हा एकमेव सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प येथे नावाला अस्त‌ित्त्वात आहे. सन २००३ च्या सिंहस्थ नियोजनात गोदावरी कृती आराखड्यातून बांधण्यात आलेल्या या प्रकल्पाची क्षमता एक एमएलडी इतकी आहे. अर्थात शहरास अंबोली, अहिल्या आणि गौतमी अशा तीन धरणांमधून पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पाण्याचा निचरा मोठ्या प्रमाणात होतो. मुळातच सांडपाणी प्रकल्पाची कार्यक्षमता यापूर्वीही निर्दशनास आली आहे. पालिका प्रशासनासह आणि लोक्रपतिनिधींनीही याकडे दुर्लक्ष केले आहे. ठेके पद्धतीने चालविण्यात येणाऱ्या या प्रकल्पावर अवघे दोन कर्मचारी आहेत. तर यामधील केवळ एक वॉटर पंप सुरू आहे. नादुरूस्त वॉटरपंप दुरुस्त करण्यास पालीकेचे पाणीपुरवठा विभागाचे ठेकेदार तयार नाहीत. एकूणच या प्रकल्पाला पूर्ण क्षमतेने चालव‌िणे गरजेचे आहे. मात्र प्रकल्पाकडे सातत्याने झालेल्या दुर्लक्षामुळे नदीपात्र दूष‌ित होत आहे. शहराची लोकसंख्या वाढली आहे. मंदिराच्या पूर्व बाजूस असलेला हा सांडपाणी प्रकिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवला तरी देखील शहराची अर्धी वस्ती या प्रकल्पाच्या पुढील बाजूस आहे. त्यामुळे तेथील प्रदूषण कायम राहणार आहे. नवीन बस स्थानकाच्या बाजूने शहराच्या उत्तर भागातील ड्रेनेज लाइन थेट नदीपात्रात सोडली आहे.

सिंहस्थातही नाराजी
सिंहस्थ कालावधीसाठी घाट बांधले. मात्र सांडपाणी थेट नदीत सोडले जात आहे. सिंहस्थ नियोजनात राज्याचे प्रधान सचीव येथे आले असता त्यांनी हे दृष्य पाहून ‘येथे कोण स्नान करणार?’ असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर स्थानिक यंत्रणांचा बराच मोठा खलही झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रैनाकडून नाशिककरांची निराशा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सुरू असलेल्या उत्तर प्रदेश आणि बडोदा यांच्यातील रणजी सामन्याच्या पहिल्या दिवशी उत्तर प्रदेश संघाने ९० षटकांत सात गडी गमावून ३७० धावा केल्या. अवघ्या नाशिकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला सुरेश रैना अवघ्या सहा धावांवर तंबूत परतल्याने क्रिकेट रसिकांचा हिरमोड झाला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कुलदीप यादव ७७ धावांवर तर सौरभ कुमार ८५ धावांवर खेळत होते.

बडोदा संघाचा कर्णधार इरफान पठाण याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. उत्तर प्रदेश संघाकडून शिवम चौधरी आणि अलमास शौकत या जोडीने डावाची सुरुवात केली. बडोद्याच्या सागर मंगळुरकर यांच्या गोलंदाजीवर शिवम पायचीत बाद झाला. शिवमने आपल्या ३५ मिनीटाच्या खेळीत २९ चेंडूत ३ चौकार ठोकत १६ धावा केल्या. अशीच काहीशी परिस्थिती अल्मस शौकतच्या खेळाबाबत झाली. तोही बाबा सैफी पठाणचा शिकार झाला. पठाणने टाकलेल्या चेंडून शोकतही पायचीत झाला. त्याने ५५ चेंडूत ५ चौकारांसह २८ धावा केल्या. दोन गडी बाद झाल्यानंतर आकाशदीप याने डावाला सावरत सावध खेळी केली. मात्र तो अर्धशतकापासून पाच धावा दूर असताच रिशी आरोटेने टाकलेल्या चेंडूवर तो झेलबाद झाला. आकाशदीपने ७९ चेंडूत ७ चौकार लगावत ४५ धावा केल्या. बडोदा संघाचा आदित्य वाघमोडे याने त्याचा झेट टिपला. त्यानंतर रैनाही अवघ्या सहा धावांवर बाद झाला.

रिंकू सिंगकडून फटकेबाजी
रैनानंतर रिंकू सिंग हा बाबा सैफी पठाणने टाकलेल्या चेंडूवर त्रिफळाचित झाला. त्याने ५८ चेंडूत ५ चौकार लगावत ४० धावा केल्या. त्यानंतर उपेंद्र यादव हा मैदानात उतरला. रिशी आरोटेने टाकलेल्या बॉलवर तोही झेल देवून तंबूत परतला. दिपक हुड्डाने त्याचा झेट टिपला. त्याने २३ धावा केल्या. उत्तर प्रदेश संघाचा उपकर्णधार कुलदीप यादव हा पहिल्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा १३६ बॉलध्ये ७ चौकारांसह ७७ धावांवर नाबाद होता. त्याच्या जोडीला असलेला प्रवीण कुमार मात्र सागर मंगळुरकर याने टाकलेल्या चेंडूवर झेलबाद झाला. प्रवीणने ३३ चेंडूत ३ चौकार आणि एक षटकार लगावत २३ धावा केल्या. पहिल्या दिवशी षटकार मारणारा तो एकमेव खेळाडू ठरला. सौरभ कुमार १३२ म‌नि‌टिाच्या खेळात १२ चौकार मारत ८५ धावा करून नाबाद आहे. बडोदा संघाने १७ अतिरिक्त धावा दिल्या. पहिल्या दिवशी कुलदीप व सौरभने १६२ धावांची भागीदारी केली.


रैना आला अन् गेला...
आकाशदीप बाद झाल्यानंतर मैदानवर टाळ्यांचा कडकडाट होण्यास सुरुवात झाली. संपूर्ण नाशिककर ज्याच्या खेळाची वाट पहात होते तो सुरेश रैना मैदानात प्रवेश करत असतांना प्रेक्षकांनी अक्षरशः रैना रैना..असे म्हणत जल्लोष केला. परंतु मैदानावर आलेला रैना बाबा सैफी पठाणने टाकलेल्या चेंडूचा शिकार झाला आणि मैदानावर सकाळपासून जमलेले त्याचे फॅन स्तब्ध झाले. रैना झेलबाद झाला. पिनल शहाने त्याचा झेट टिपला. रैनाने ९ चेंडूत अवघा एक चौकार लगावत सहा धावा केल्या.


दोघेही शतकाच्या उंबरठ्यावर
उत्तर प्रदेश संघाने ९० षटकांत सात गडी गमावून ३७० धावा केल्या असल्या तरी त्यांचे दोनही खेळाडू शतकाच्या उंबरठ्यावर आहेत. कुलदीप ७७ धावांवर तर सौरभ ८५ धावांवर खेळत आहेत. त्यामुळे गुरुवारी सकाळच्या सत्रात हे दोघूही खेळाडू शतक ठोकण्याच्या इराद्याने उतरतील. नाशिकच्या क्रिकेट रसिकांना उद्या दोन गोल्फ मैदानावर दोन शतक साजरे होतांना पाहण्याची संधी मिळू शकते. अर्थात बडोद्या संघांने भेदक गोलंदाजी करत उत्तर प्रदेश संघाच्या रैनासह सात गडी तंबूत पाठविल्याने सौरभ आणि कुलदीप कसे करतात हे उद्याचा खेळच ठरविणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विदिशा महोत्सव उद्यापासून

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटेरिअर डिझायनर्स (ट्रीपल आयडी) या संस्थेच्या नाशिक शाखेला यंदा २५ वर्षे पूर्ण होत आहेत. रौप्य महोत्सवानिमित्त संस्थेने शहरात ‘विदिशा’ या नाविन्यपूर्ण महोत्सवाचे आयोजन केले आहे. शुक्रवार ते रविवार (९ ते ११ डिसेंबर) असे तीन दिवस हा महोत्सव होणार असून, यात देशभरातील नामांकीत आर्किटेक्ट सहभागी होणार आहेत.

ट्रीपल आयडी ही राष्ट्रीय पातळवर काम करणारी आर्किटेक्टसची नामांकीत संस्था आहे. या संस्थेच्या नाशिक शाखेची स्थापना १९९१मध्ये करण्यात आली. त्यामुळे यंदा संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष असून यानिमित्ताने संस्थेने विदिशा या वैशिष्ट्यपूर्ण महोत्सवाचे आयोजन केल्याची माहिती अध्यक्ष हेमंत दुगड यांनी दिली. यानिमित्ताने नाशिककरांना आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या डिझानर्ससोबत संवाद साधण्याची संधीही मिळणार असल्याचे सचिव तरन्नुम काद्री यांनी सांगितले. विदिशा उत्सवात डिझाइन्सच्या विविध पैलूंची माहिती देतानाच त्यावर चर्चा होणार आहे. तसेच सर्वसामान्यांच्या जीवनात असणारे डिझाइनचे महत्त्व विषद करण्यासाठी कथा, संवाद, सचिंतन, अनुनाद, रौप्य परिक्रमा, प्रभातफेरी अशा वैविध्यपूर्ण संकल्पनांचा वापर केला जाणार असल्याचे माजी अध्यक्षा राखी टकले यांनी सांगितले. प्रख्यात आर्किटेक्ट पलिंगा कंनांग्रा (श्रीलंका), रफिक आझम (बांगलादेश), ट्रीपल आयडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रताप जाधव, राष्ट्रीय सचिव जबीन झकारीस हे उत्सवात सहभागी होऊन मार्गदर्शन करणार असल्याचे सुप्रिया नाथे म्हणाल्या. या उत्सवाची संकल्पना आर्किटेक्ट रितू शर्मा यांची असून, इनटॅक्टचे सहकार्य त्यास लाभत असल्याचे समीर बटाविया यांनी सांगितले आहे.

असा असेल महोत्सव

प्रदर्शन, मार्गदर्शन ः रौप्य महोत्सवी विदिशा उत्सवाला शुक्रवारी (९ डिसेंबर) सायंकाळी ५.३० वाजता प्रारंभ होणार आहे. ‘कथा’ या नाशिक शहराच्या इतिहास सांस्कृतिक परंपरा दर्शविणाऱ्या प्रदर्शनाचे उदघाटन गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारक येथे होईल. हे प्रदर्शन तीन दिवस सुरू राहणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता हॉटेल एमराल्ड पार्क येथे शाश्वत वास्तुकला या विषयावर प्रख्यात आर्किटेक्ट पलिंगा कंनांग्रा, रफिक आझम हे संवाद साधणार आहेत.

मिरवणूक – नाशिकची सांस्कृतिक परंपरा जोपासणाऱ्या व नाशिकची ओळख असलेल्या नाशिक ढोल आणि बोहडा मिरवणुकीचे शनिवारी (१०डिसेंबर) सायंकाळी ४.३० वाजता कुसुमाग्रज स्मारक येथे आयोजन करण्यात आले आहे.

प्रभातफेरी – रविवारी (११ डिसेंबर) सकाळी जुन्या नाशिकमधील फुलबाजारपासून प्रभात फेरी काढली जाणार आहे. गोदाघाट परिसरातील जुने वाडे, मंदिरे यांसारख्या पुरातन वास्तूंना भेट दिली जाणार आहे. त्यानंतर पारंपरिक मंगळागौरीच्या खेळाचाही आनंद घेता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रिकेटसाठी नाशिक पोषक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरातील वातावरण क्रिकेटला पोषक असून, जिल्ह्याच्या ठिकाणी रणजी सामन्याचे आयोजन केल्याने क्रिकेट वाढीसाठी व नवीन खेळाडू तयार होण्यासाठी ही स्पर्धा पुरक ठरणार, असे प्रतिपादन भारतीय संघाचे पूर्व यष्टीरक्षक किरण मोरे यांनी केले.
अनंत कान्हेरे मैदानावर बुधवारपासून सुरू झालेल्या सामन्याच्यावेळी मोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मोरे म्हणाले की, भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी रणजी सामन्याचे आयोजन केल्याने नवीन खेळाडू तयार होण्यास मदत होणार आहे. नाशिकमधील वातावरण क्रिकेटला पोषक असून नाशिक डिस्ट्रक्ट क्रिकेट असोसिएशनने उत्तम व्यवस्था केली आहे. ग्राऊंडही उत्तम प्रकारे तयार केले असून, येथे सामने निश्चित रंगतील अशी आशा आहे. रणजी सामन्यांच्यावेळी फारसा प्रेक्षक वर्ग लाभत नाही, असा आमचा अनुभव आहे. परंतु नाशिककर क्रिकेटप्रेमींनी अभूतपूर्व प्रतिसाद दिल्याने खेळाडूंनाही खेळण्यास हुरुप आला आहे. बडोदा आणि उत्तर प्रदेश हे दोन्ही संघ अत्यंत संतुलीत आहेत. रणजी सामन्याच्या वेळी दोन पिच तयार करावे व दोन बॉल्सच्या सहाय्याने मॅचेस घ्यावात, असे सचिन तेंडुलकर यांनी बीसीसीआयला सुचवले होते. त्यावर मोरे म्हणाले की, हा निर्णय ज्युनिअर क्रिकेटसाठी १६ व १९ वयोगटासाठी योग्य ठरेल. मात्र रणजीसाठी महत्त्वाचा तो तितकासा योग्य ठरणार नाही. त्यामुळे दोन पिच तयार करू नये असे मत त्यांनी मांडले. इतर खेळांना प्रोत्साहन मिळावे यासाठी काही खेळांची प्रात्यक्षिके मध्यंतरात करावी असे देखील सुचवण्यात आले होते. त्यावर ते म्हणाले की, हा निर्णय उत्तम आहे. यामुळे इतर खेळाडूंचा खेळ पहाण्याची संधी प्रेक्षकांना उपलब्ध होणार आहे. क्रिकेट बरोबरच त्याही खेळांना निश्चित चांगले दिवस येतील.

भारतीय टीम सर्वोत्तम

सध्या भारताची टीम कसी आहे यावर मोरे म्हणाले, सध्याची टीम ही जगातील सर्वोच्च अशी टीम आहे. टीमच्या कामगिरासाठी जलदगती गोलंदाजांचे योगदान मोठे असते. भारतीय संघात ५ जलद गोलंदाज आहेत प्रत्येकाचा स्पीड १४५ ते १५० असा आहे. त्यामुळे आपल्या टीमच्या तोडीची टीम सध्यातरी कुठली दिसत नाही.

इरफानचे कमबॅक

नाशिकमध्ये होणारी रणजी मॅच ही इरफान पठाणच्या पुनरागमनासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. सध्या त्याचा परफॉर्मन्स चांगला आहे. आणखी थोडा जोर लावल्यास त्याचे कमबॅक होऊ शकते. नुकतेच अशिष नेहरा व पार्थिव पटले यांचे पुनरागमन झाले आहे. आशिष नेहरा यांचे आठ वर्षानंतर पुनरागमन म्हणजे फार मोठी बाब आहे. आज तो पुन्हा नव्या उत्साहात खेळतांना दिसतो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images