Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पाचशेच्या नोटा छापूनही शहरात ‘दर्शनदुर्लभ’

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

येथील करन्सी नोट प्रेसमध्ये पाचशेच्या लाखो नव्या नोटा छापण्यात आल्या आहेत. मुंबईसह देशातील विविध भागात या नोटा व्यवहारात आल्या आहेत. मात्र, प्रेसच्या मायभूमीतील नाशिककरांनाच अद्याप या नोटांचे दर्शन झालेले नाही. त्यामुळे सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर नाशिकरोड करन्सी नोट प्रेसमध्ये पाचशेच्या नव्या नोटा छापण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पाचशेसह अन्य नोटा छापण्यासाठी प्रेस कामगार दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. त्यांनी दोन रविवार जादा काम केले. मात्र, त्यांनाही या नोटा उपलब्ध झालेल्या नाहीत, तसेच नाशिककरांना त्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. पाचशेच्या १२४ दशलक्ष नव्या नोटा एकट्या नाशिकरोड प्रेसमध्ये छापून रिझर्व्ह बॅंकेला पाठविण्यात आल्या आहेत. मात्र, तरीही त्यांचे नाशिककरांना दर्शन झालेले नाही.



प्रेसमध्ये पाऊस!

केंद्र सरकारने ८ नोव्हेंबरला पाचशे व एक हजाराची नोट चलनातून बाद करून पाचशे आणि दोन हजारांच्या नवीन नोटा व्यवहारात आणण्याचे जाहीर केले. त्यामुळे देशभरात नोटांची तीव्र टंचाई झाली होती. ती दूर करण्यासाठी नाशिकसह देशातील चारही प्रेसमध्ये युद्धपातळीवर एक, वीस, पन्नास, शंभर, पाचशे आणि दोन हजारांच्या नोटांची छपाई सुरू आहे. एकट्या नाशिकरोड प्रेसमधून १३ ते २४ नोव्हेंबरदरम्यान सर्व प्रकारच्या मिळून तीनशे दशलक्ष नोटा छापून पाठविण्यात आल्या आहेत. त्यात पाचशेच्या १२४ दशलक्ष नोटा आहेत.


पाचशे रुपयांची नवीन नोट कशी आहे, याबाबत माझ्याही मनात उत्सुकता होती. मुंबईहून ग्राहकांच्या मुलाने ती आणून दिल्यानंतर माझी उत्सुकता भागली. ही नोट दोन हजाराप्रमाणेच सुंदर आहे. पाचशेच्या नोटा नागरिकांना उपलब्ध करून दिल्यास नोटा टंचाईची समस्या बऱ्याच अंशी सुटेल.

- दिलीप बोराडे

---
दोन हजार उपलब्ध

देशात पाचशेपेक्षा दोन हजारांच्या नव्या नोटा अगोदर छापून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आल्या. त्या बॅंका व एटीएममधून मिळताच नागरिकांनी नोटेबरोबर फोटो काढून घेतले. ते मित्र व नातेवाईकांना उत्साहाने पाठवले. मात्र, पाचशेची नोट नाशिकमध्ये छापूनही ती मिळत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दोन हजाराची नोट लवकर कोणी स्वीकारत नाही. पाचशेची नोट उपलब्ध झाल्यास व्यवहारात सुलभता येणार आहे. त्यामुळे ती त्वरित उपलब्ध करावी, अशी मागणी होत आहे.

दिलीप बोराडे लकी!

जेलरोड येथील पंचकमधील किराणा दुकानदार दिलीप बोराडे यांच्या एका ग्राहकाचा मुलगा मुंबईत कामाला आहे. त्याने बोराडे यांच्याकडून किराणा सामान घेतले होते. मुंबईहून त्याने पाचशे रुपयाची नोट आणून ती बोराडे यांना उपलब्ध केली. त्यामुळे पाचशेची नवी नोट मिळवणारे बोराडे हे परिसरातील पहिलेच लकी नाशिककर ठरल्याची चर्चा रंगत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरातील एटीएम बनलेत ईटीएम…

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नोटाबंदीनंतर केवळ नावालाच सुरू असलेल्या शहरातील ‘एटीएम’मध्ये दोन दिवस बँकांना सुटी असल्यामुळे शनिवारीच खडखडाट दिसून आला. शहरातील बहुतांश अॅटोमेटेड टेलर मशिन (एटीएम) अक्षरशः एमटी टेलर मशिन (ईटीएम) बनल्याचे दिसून आले. बँकेच्या शाखेजवळ असलेल्या ‘एटीएम’वरही कॅशचा तुटवडा जाणवल्यामुळे ‘एटीएम’ची सेवा जिल्ह्यात जणू नावापुरतीच उरल्याची स्थिती आहे. अगोदरच कॅशचा प्रॉब्लेम सहन करणाऱ्या ग्राहकांना खरं तर ‘एटीएम’चा पर्याय होता. पण, तोदेखील कुचकामी ठरला आहे.

जिल्ह्यात ९०३ एटीएम असून, त्यातील काही बँकांचे एटीएम सोडल्यास बहुतांश बँकांच्या एटीएममध्ये रिकॅलिब्रेशन झाले नसल्याच्या स्थितीचा फटका नागरिकांना बसत आहे. नव्या दोन हजारांच्या नोटा ‘एटीएम’मध्ये रिकॅलिब्रेशन न झाल्यामुळे टाकता आल्या नसल्याने मोठा अडसर निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. ‘एटीएम’मध्ये शंभराच्या नोटा टाकल्यामुळे काही तासांत त्या संपत असल्याच्या अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे असे मोजकेच ‘एटीएम’देखील नेहमीच चालू-बंद अवस्थेत सर्वत्र दिसत होते.



करन्सी चेस्टने गैरसोय

जिल्ह्यातील अनेक बँकांतील ‘एटीएम’चे पैसे बाहेरच्या जिल्ह्यातील करन्सी चेस्टमधून आणले जातात. त्यामुळे त्यातील वेळ व एकूणच पद्धत यामुळे हा प्रश्न गंभीर झाला आहे. काही बँकांचे एटीएम सुरूच झाले नाहीत, तर काही ठिकाणी एटीएम हे १ डिसेंबरनंतरच सुरू होतील, असे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे एटीएम मशिनचा हा घोळ केव्हा संपणार, हाही प्रश्न आहे. एकूणच एटीएम सुरू होण्यासाठी व त्यातून सुरळीत कॅश मिळण्यासाठी डिसेंबरची वाट ग्राहकांना बघावी लागण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भगूरचा विकास महापालिकांना लाजविणारा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

भगूरच्या विकासात शिवसेनेने केलेले विकासकार्य अफाट आहे. आज गावातील परिस्थिती पाहता एखाद्या महानगरपालिकेला लाजवेल असे काम उभे केले आहे. त्यामुळे शिवसेनेचा विजय निश्चित आहे, असा दावा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी केला.

भगूर नगरपालिकेसाठी प्रचाराच्या अंतिम दिवशी शिवसेनेच्यावतीने प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी छत्रपती शिवाजी चौकात आयोजित करण्यात आलेल्या सभेत शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, आमदार अनिल कदम, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सत्यभामा गाडेकर, अजय बोरस्ते, शिवाजी सहाणे आदींसह सर्व उमेदवार उपस्थित होते. शनिवारी दुपारी शेकडो शिवसैनिक व महिलांच्या उपस्थितीत करंजकर गल्ली येथून रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील प्रत्येक रस्ता व चौकातून उघड्या जीपद्वारे त्यांनी नागरिकांना सेनेच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. त्यांच्या समवेत जिल्हाप्रमुख विजय करंजकर, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अनिता करंजकर, आमदार योगेश घोलप आदी उपस्थित होते.

..अन् नगराध्यक्षा गरजल्या

'मी अहों ना विचारून सांगते, असे म्हणणाऱ्या विरोधकांचा अनिता करंजकर यांची चांगलाच समाचार घेतला. मलादेखील बोलता येते. मी एकत्र कुटूंब पद्धतीत वाढली असून, एकत्र कुटुंबातच नांदत आहे. आमच्या घराण्यात सर्व कामे मोठ्यांना सांगून केली जातात. त्यासाठी त्यांचा आशीर्वादही मिळतो. त्यामळे जे कधी व्हीआयपी गाडीतून उतरून पायी चालले नाही त्यांनी मला पालिकेच्या कारभार शिकव‌िण्याची भाषा करू नये. त्यापेक्षा विकासकामांचा आलेख पाहिला तर त्यांना त्यांचे उत्तर मिळेल, असे त्यांनी ठणकावताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाट केला.


भगूरला पर्यटन स्थळाचा दर्जा!

अर्धवट माहितीच्या आधारे विकासाला खीळ बसवू पाहणाऱ्यांच्या बोलणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका. विजय करंजकर यांच्या माध्यमातून भगूरचा कायापालट झाला आहे. पालिकेवर भगवा फडकल्यास येत्या सहा महिन्यात ग्रामीण रुग्णालयासह स्वा. सावरकर उद्यानाचे काम पूर्ण केले जाईल व भगूरला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळवून देईल, अशी शपथ राज्याचे सहकार मंत्री दादा भुसे यांनी घेतली. भगूर येथे शुक्रवारी सायंकाळी झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक पदाचे उमेदवार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुकेणे योजना रखडली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुकणे पाणीपुरवठा योजनेचे काम मुकणे धरणातील पाणीसाठ्यामुळे ठप्प आहे. यंदा वर्षी चांगला पाऊस झाल्याने मुकणे धरणात सद्यस्थितीत पाच टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे धरणात एलअॅण्डटी कंपनीने तयार केलेले स्टोरेजच पाण्याखाली गेले असून, चार महिन्यांपासून काम बंद आहे. संबंधित कंपनीला अठरा महिन्यांची मुदत देण्यात आली असून, कंपनीकडे आता केवळ पंधराच महिने शिल्लक आहेत. काम वेळेत व्हावे यासाठी पालिकेने आता जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले आहे. अहमदनगरसह शेतीच्या पाण्यासाठी दारणाऐवजी मुकणेतून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुथ्थान अभियानातंर्गत मुकणे धरणातून पाइपलाइनद्वारे शहरासाठी पाणीपुरवठा करण्याचा प्रकल्प राबविण्यात येत प्रस्तावित आहे. धरणातून १८ किलोमीटर अंतरावरून नाशिकसाठी पाणीपुरवठा केला जाणार आहे. सन २०३१ पर्यंतची शहराची लोकसंख्या गृहीत धरून चारशे एमएलडी इतके पाणी दररोज अतिरिक्त उपलब्ध होणार आहे. सन २०१३पासून ही योजना रखडलेली आहे. तत्कालीन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी आपल्या कारकिर्दीत ती मार्गी लावली होती. सन २०१४ मध्ये जाहीर निविदाप्रक्रिया राबविली असता मे. लार्सन अ‍ॅण्ड टुर्बो लिमिटेड, चेन्नई या कंपनीची २६९ कोटी रुपये इतक्या रकमेची निविदा मान्य करण्यात आली होती. अनेकांच्या आक्षेपानंतर व राज्य सरकारने क्लीनचीट दिल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी या योजनेचे काम सुरू झाले होते. परंतु लगेच पावसाळा सुरू झाल्याने कंपनीने सुरू केलेले कामही पाण्यात गेले आहे.

धरणाची पाणी साठवण क्षमता ७ टीएमसी आहे. सध्या धरणात ५ टीएमसी साठा शिल्लक आहे. त्यामुळे तीन महिन्यांपासून काम ठप्प आहे. कंपनीची मश‌िनरीही धरणावरच रिकामी पडली आहे. त्यामुळे कंपनीने पालिकेचा पाणीसाठा कमी करण्याची विंनती केली आहे. पालिकेने अहमदनगर व शेतीसाठी सोडण्यात येणारे आवर्तने ही दारणातून सोडण्याऐवजी प्रथम मुकणेतून सोडावीत, अशी मागणी जिल्हा प्रशासन, जलसंपदाकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विभागीय आयुक्तांकडून रुग्णालयांची पाहणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील नागरिकांना आरोग्यसेवा देणारे सामान्य रुग्णालय तसेच मनपाचे रुग्णालयांची व्यवस्था कोलमडली असून, विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या उपस्थितीत ‌कमिटीने येथील सामान्य रुग्णालय, वाडिया रुग्णालय यांची पाहणी केली.

येथील राकेश भामरे यांनी जोनवारी २०१५ मध्ये हायकोर्टात याचिका दाखल केली होती. कोर्टाने आरोग्य यंत्रणेची पाहिणी करण्यासाठी कमिटी नेमली होती. या याचिकेत भामरे यांनी शहरातील आरोग्यसेवेच्या उडालेल्या बोजवाराबाबत सविस्तर माहिती दिली होती. सामान्य रुग्णालयात अनेक पदे रिक्त आहेत, विविध उपकरणे बंद आहेत, अस्वच्छता, अपुरा औषधपुरवठा या समस्या न्यायालयापुढे मांडल्या होत्या. यावर सुनावाणी दरम्यान शहरातील आरोग्यसेवेची स्थिती जाणून घेण्यासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमण्यात आली होती. या कमिटीला पाहणीकरून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कमिटीत विभागीय आयुक्त एकनाथ डवले, मनपा आयुक्त रवींद्र जगताप, महापौर हाजी मोह. इब्राहीम, वैद्यकीय अधिकारी डॉ. डांगे, नीलेश पोफळे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. पाहणी दौऱ्यात प्रथम कॅम्प नागरी सुविधा केंद्रास भेट देण्यात आली. आयुक्त डवले यांनी प्रत्यक्ष रुग्णांची विचारणा केली असता रुग्ण व नातेवाइकांनी रुग्णालयातील गैरसोय, अपुऱ्या सुविधांबाबत तक्रारींचा पाढा वाचला. दोन डिसेंबरपर्यंत कमिटी अहवाल सादर करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटाबंदीवर अनोखी श्रद्धांजली

$
0
0

हुतात्मा स्मारकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून भाजप व पंतप्रधानांचा निषेध

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशभरात नोटबंदीमुळे सुमारे ६० ते ७० जणांचा मृत्यू झाला. नोटाबंदीमुळे एकीकडे निष्पाप नागरिकांचा बळी पडत असताना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने या बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांकडे काणाडोळा केला आहे. त्यामुळे अशा निष्पाप नागरिकांना शनिवारी (दि. २६) सीबीएस येथील हुतात्मा स्मारक येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी श्रद्धांजली वाहून भाजप व मोदींचा अनोखा निषेध केला.

देशात ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद झाल्याच्या निर्णयामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबध असणारे सुमारे ६० ते ७० लोक देशभरात आजपर्यंत मृत्यूमुखी पडले आहे. यात काहीजण लांब रांगेत तासनतास उभे राहून दमल्यामुळे मृत्यूमुखी पडले, तर काहींना हृदयविकाराचा झटका आला. राज्यातील नांदेडमधील दिगंबर कसबे, शहादा येथील सिकंदर पठाण, भाईंदर येथील दीपकभाई शहा यांचा बँकेतील रांगेत उभे राहून हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. तर शेतकरी पहिलेच नापिकीमुळे आत्महत्या करीत असताना आता या नोटबंदीमुळे त्यांच्यावरही मरणाची वेळ आली आहे. यात बँकेतील कर्मचारीसुद्धा हृदयविकाराने मृत्यूमुखी पडले आहेत. या सर्वात राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात, नोटबंदीचा त्रास सहन करणे म्हणजे खरी देशभक्ती आहे. परंतु जो व्यक्ती या त्रासाबद्दल बोलेल त्यास तुम्ही देशद्रोहाचा आरोप करून देशद्रोही ठरवाल का, असा सवाल शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केला.

नोटबंदीचा निर्णय हा चांगला आहे यात दुमत नाही. परंतु हा निर्णय घेण्याआधी यासंबंधीच्या उपाययोजना करणे गरजेचे होते. जेणेकरून आज या ६० ते ७० निष्पाप गरीब जनतेचा बळी गेला नसता. त्यामुळे अशी अनोखी श्रद्धांजली वाहून भाजपचा निषेध केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तसेच शनिवारी २६/११ च्या घटनेला ८ वर्ष पूर्ण झाले असून यात हल्ल्यात मरण पावलेल्या शहिदांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

या वेळी चिन्मय गाढे, किरण पानकर, मितेश राठोड, राहुल तुपे, अमोल नाईक, सनी ओबेरॉय, भूषण गायकवाड, रोहित जाधव, जॉनी सोळंकी, अमन रंधवा आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांद्याचे अनुदान त्वरित अदा करा

$
0
0

राष्ट्रवादी काँग्रेसकडून तहसीलदारांना निवेदन

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सरकारने ठरवून दिलेल्या हमीभावाने देवळा येथे मका खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्यात यावे तसेच जाहीर केलेले कांद्याचे अनुदान शेतकऱ्यांना त्वरित अदा करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदार कैलास पवार यांना देण्यात आले.

या देण्यात आलेल्या निवेदनात, राज्य सरकारने संपूर्ण राज्यात हमीभावाने मका खरेदी केंद्र सुरू केले आहेत. सरकारने मक्याचा १,३६५ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. मात्र देवळा येथे मका खरेदी केंद्र सुरू न झाल्याने खासगी मका व्यापारी १,००० ते १,१०० रुपयांनी मका खरेदी करीत आहेत. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नाहक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

तसेच सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन महिन्यांपासून तूटपुंजे अनुदान जाहीर केले आहे. मात्र ते अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेले नाही. तरी शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनात शेवटी देण्यात आला आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष पंडितराव निकम, योगेश आहेर, जगदीश पवार, अनंत अहिरराव, सुनील आहेर आदींसह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी सभापती अशोक आहेर, साहेबराव सूर्यवंशी, चंद्रकांत आहेर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​आधी पोलिसच, मग सर्वसामान्य !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात हेल्मेट सक्ती लागू झाली असली तरी तुर्तास ती पोलिसांपुरती मर्यादीत ठेवण्यात आली आहे. दुचाकी वापरणाऱ्यांना मात्र हेल्मेटचा वापर न करणाऱ्या पोलिसांकडूनच चक्क दंड वसूल केला जातो आहे. वाहतूक नियमांचे पोलिसांनीच काटेकोर पालन केल्यानंतर सर्वसामान्यांसाठी हेल्मेट सक्तीचा दंडक लावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वाहतूक नियमांचे पालन व्हावे, यासाठी आग्रही असलेल्या पोलिस आयुक्त रविंद्रकुमार सिंघल यांच्या आदेशानुसार हेल्मेट घातल्याशिवाय दुचाकीवरून येणाऱ्या पोल‌िस कर्मचाऱ्यांना आयुक्तालयासह त्यांच्याच पोलिस स्टेशनमध्ये प्रवेश देण्यात येत नाही. शुक्रवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून, यामुळे अनेकांना आर्थिक फटका बसला आहे.

कोर्टाच्या आदेशानंतर राज्यात अनेकदा हेल्मेट सक्तीचा प्रयोग राबवण्यात आला. मात्र, वेळोवेळी ठराविक दिवसानंतर सदर आदेश धाब्यावर बसवण्यात येतो. काही महिन्यांपूर्वी प्रादेश‌िक परिवहन विभागाने जोरदार मोहीम हाती घेत वेगवेगळ्या महामार्गावर कारवाई केली होती. हेल्मेटचा वापर न करणाऱ्या वाहनचालकांना एक डाक्युमेंटरी दाखवत त्यांचे समुपदेशन करण्यात येत होते. मात्र, आरटीओची कारवाई थंडावली तसे हा निर्णय मागे पडला. आता, पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांनी वाहतूक व्यवस्थेत आमुलाग्र बदल करण्याचे ठरवले आहे. वाहतूक दंडात मोठी वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय सिंगल यांनी काही दिवसांपूर्वी घेतला. आता, हेल्मेट सक्तीच्या दिशेने त्यांनी पाऊल उचलले आहे. मात्र, कायदा समान असून, प्रथम पोलिसांनी हेल्मेट सक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले. थेट हेल्मेट सक्ती करण्याऐवजी त्यांनी पोलिसांपासून त्यांची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. दुचाकी वापरणारे पोलिसच हेल्मेटचा वापर करणार नसेल तर सर्वसामान्यांवर कारवाई कशी करायची, या हेतूने पोलिस आयुक्तांनी हा निर्णय घेतला. यामुळे दुचाकी वापरणाऱ्या वाहनचालकास पोलिस स्टेशन तसेच पोलिस आयुक्तालयात प्रवेश नाकारला जातो आहे. एवढेच नव्हे; तर अशा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते आहे. पोलिस आयुक्तांच्या या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यादृष्टीने सूचना देण्यात आल्या आहेत. यासह पोलिस आयुक्तालय, वाहतूक कार्यालय, उपआयुक्त कार्यालय तसेच सर्व पोलिस स्टेशनच्या प्रवेशद्वारावर हेल्मेटशिवाय प्रवेश नसल्याचे सूचना फलक लावण्यात आले आहेत.

आजमितीस हेल्मेट सक्तीचा निर्णय पोलिसांपुरता मर्यादीत आहे. सर्वसामान्यांवर तशी सक्ती करण्यात आलेली नाही. मात्र, शहर पोलिस दलातील दुचाकीचालकांनी १०० टक्के हेल्मेटचा वापर सुरू केला की, टप्प्याटप्प्याने शहरात हेल्मेटसक्ती लागू करण्यात येईल. सक्ती करण्यापेक्षा वाहनचालकांनी उत्स्फुर्तपणे हेल्मेट वापरावे.

- जयंत बजबळे, सहायक पोलिस आयुक्त
मटा भूमिका
दुसऱ्या सांगे ब्रम्हज्ञान स्वत: मात्र कोरडे पाषाण, या उक्तीचा प्रत्यय शासकीय कामकाजात नेहमीच येतो. पण नाशिक पोलिसांनी हा समज खोटा ठरविण्याचा केलेला प्रयत्न स्तुत्य आहे. हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करतांना सर्वप्रथम ती कायद्याचे रक्षक या नात्याने पोलिसांपासूनच करण्याचा पोलिस आयुक्तांचा निर्णय सर्वसामान्यांच्यादृष्टीनेही अनुकरणीय आहे. वाहतूक नियमांचे पोलिसांनीच कठोर पालन केले तर त्याचा योग्य तो संदेश जनतेपर्यंत जातो. त्याचदृष्टीने पोलिसांनी हेल्मेटशिवाय दुचाकी चालवायची नाही, अन् नियमभंग केला तर दंड भरावा लागेल या आदेशाची पहिल्याच दिवशी यशस्वी अंमलबजावणी झाल्याने बोले तैसा चाले या उक्तीचाही प्रत्यय आला. आता याबाबतीत आरंभशूरपणा न करता ही सक्ती कोणत्याही कारणास्तव शिथिल होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनिल पाटील यांची प्रकृती स्थिर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

अमळनेरमधील आर. के. नगरात आमदार शिरीष चौधरी यांनी केलेल्या मारहाणीत जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील जखमी झाल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी धुळ्यातील आस्था या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी पाटील हे बेशुद्ध अवस्थेत होते. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थ‌रि असल्याचे सांगण्यात आले.

वाहनांची तोडफोड

जमावाने एम.एच. ३९ अर्थात नंदुरबार जिल्ह्यातील नोंदणी असलेल्या गाड्या अडवून त्या फोडण्यास सुरुवात केली. जमावाने १५ ते २० गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. शहरात इतर ठिकाणाही तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला. जमाव एकूण घेण्याच्या परिस्थित नव्हती. आर. के. नगर विश्रामगृह, सुखांजनी दवाखाना या भागात पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासींची ‘शिक्षणसेविका’

$
0
0


fanindra.mandlik@timesgroup.com

Tweet : @FanindraMT

नेत्याचा मुलगा नेता, अभिनेत्याचा मुलगा अभिनेता, उद्योगपतीचा मुलगा उद्योगपती असे चित्र समाजात नेहमीच पाहायला मिळते. मात्र, समाजसेवकाचा मुलगा समाजसेवक झाल्याचे उदाहरण क्वचितच पाहायला मिळते. अदिवासी भागातील मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याचे काम करणाऱ्या दादासाहेब बीडकर यांच्या स्नुषा हेमलता बीडकर यांनी आपल्या सासऱ्यांचा वसा वयाच्या ६८ व्या वर्षी जपला आहे. आदिवासी पाड्यांवर शिक्षणाची गंगा घरोघर पोहोचवण्याचे काम डांग सेवा मंडळाच्या माध्यमातून आजही त्या करीत आहेत.

हेमलता बीडकर यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात झाला. तेथेच त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. दादासाहेब बीडकर हे स्वातंत्र्यसेनानी असल्याने अनेकदा त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. दादासाहेबांच्या पत्नीने हेमलता पाठकांच्या वडिलांना भाऊ मानल्याने दोन्ही घरांचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे होते. पुढे कालांतराने दादासाहेब बीडकर यांच्या मुलाशी म्हणजेच डॉ. विजय बीडकरांशी हेमलता पाठक यांचा विवाह झाला व त्या हेमलता बीडकर झाल्या. विजय बीडकर डॉक्टर असल्याने हेमलता बीडकरांनी नर्सिंगचे शिक्षण पूर्ण करून समाजसेवेसाठी त्यांच्यासोबत पेठ तालुक्यातील दुर्गम भागात सेवा करण्यास सुरुवात केली. या भागात जाण्यासाठीही त्यांना अनेक कष्ट करावे लागले. हेमलता बीडकरांचे सासरे दादासाहेब यांचे डांग सेवा मंडळाच्या माध्यमातून सुरू असलेले काम त्यांनी लहानपणापासून पाहिलेले असल्याने नकळत त्या दादांच्या कार्याकडे ओढल्या गेल्या. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ या कार्याला वाहून घेतले. २००८ पासून डांगसेवा मंडळाच्या अध्यक्षा म्हणून त्या काम पाहत आहेत. नोकरीत असताना त्यांच्या कार्याबद्दल अनेक पुरस्कार मिळाले. आदिवासी मुलांना शिक्षणासाठी अनेक अडचणी येतात. सरकारकडून पुरेसे अनुदान मिळत नाही, त्याकरिता आजही त्या अनेक संस्थांकडून देणग्या जमा करून शाळांचा कारभार चालवीत असतात. डांग सेवा मंडळाच्या माध्यमातून ३३ शैक्षणिक संस्था चालवण्याचे काम त्या करीत आहेत. जी मुले शाळांमध्ये येत नाहीत, अशा मुलांच्या पालकांना भेटून शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचे काम त्या करतात, तसेच विद्यार्थ्यांची गळती थांबावी यासाठी पालकांशी सातत्याने संवाद ठेवण्याचे काम त्यांनी केले आहे. आदिवासी मुलांना शहरातील मुलांप्रमाणे शिक्षण मिळावे यासाठी सातत्याने शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित करीत असतात. मुलांना वाचनाची गोडी लागावी यासाठी प्रत्येक शैक्षणिक संस्थेत त्यांनी अद्ययावत ग्रंथालये साकारली असून, मुलांना मराठीच नव्हे, तर इंग्रजी माध्यमाची पुस्तकेदेखील उपलब्ध करून दिली आहेत. आदिवासी भागात व्यसनाधिनतेचे प्रमाण अधिक आहे. पालकांना व्यसनाधिनतेचे परिणाम सांगण्यासाठी सातत्याने विविध प्रकारच्या प्रदर्शनांचे आयोजन केले जाते. गाडगे महाराजांनी दिलेला स्वच्छतेचा मंत्र घराघरांत पोहोचावा यासाठी महिन्यातून एकदा ग्राम स्वच्छता अभियानाचेदेखील आयोजन केले आहे. पाण्याद्वारे अनेक साथींचे विकार पसरत असल्याने मुलांना स्वच्छतेचे महत्त्व समजण्यासाठी पालकांचे प्रबोधन करण्याचे कामदेखील त्यांनी केले आहे. डांग सेवा मंडळाच्या माध्यमातून सुरू असलेल्या ३३ शैक्षणिक संस्थांमधील वातावरण प्रसन्न राहावे यासाठी प्रत्येक संस्थेत त्यांनी विविध प्रकारची झाडे लावली आहेत. त्यांनी साकारलेल्या प्रत्येक आश्रमशाळेत शुद्ध पाण्यासह आरोग्यदायी बाथरूम, शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे औषधी वनस्पतींचीदेखील लागवड करण्यात आली आहे. आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आढळून येतात, त्याविरुद्ध त्यांचे कार्य सातत्याने सुरू असून, भूतबाधा होऊन अंगात येणे याविरुद्ध त्यांनी सातत्याने कार्य केले आहे. अनेकदा एखाद्या महिलेला चेटकीण समजावून मारण्यात येते, त्याविरुद्धदेखील त्यांनी लढा दिला आहे. शिक्षणाने मुली बिघडतात, असा आदिवासी भागात समज आहे. त्याविरुद्धही त्यांनी जनजागृती केली असून, मुली जास्तीत जास्त कशा शिकतील, याबाबत त्यांनी प्रबोधन केले आहे. बालकांचे कुपोषण होऊ नये यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीत त्या कार्यरत असून, त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात त्या फिरत असतात. या कामातून जे बळ मिळते ते इतर कोणत्याही कामातून मिळत नाही, असे त्या म्हणतात. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांचे कार्य तरुणांनाही लाजवेल असे आहे. सकाळपासून सुरू झालेला दिवस रात्री कसा संपतो, हेदेखील आठवत नाही, असे त्या सांगतात.

---

नाशिककरांनो लिहिते व्हा

ज्येष्ठ नागरिक म्हटलं की वयाचा उत्तरार्ध आणि त्यामुळे कमी झालेला अॅक्टिव्हनेस असाच बऱ्याच जणांचा समज असतो. पण, अनेक ज्येष्ठ हे केवळ वयाने वृद्ध असतात, त्यांचं मन मात्र तरुणच असतं. त्यांच्या कामातून, समाजेसेवेतून किंवा अन्य अॅक्टिव्हिटीजमधून ते आपण अजूनही तरुण आहोत हे दाखवून देतात. अशाच ज्येष्ठांसाठीचं हे व्यासपीठ म्हणजे आमचा ‘यंग सीनिअर्स’ कॉलम. चला तर मग तुम्ही जर असे यंग सीनिअर असाल, तर थेट आमच्याशी संपर्क करा किंवा तुमच्या ओळखीत, पाहण्यात असं कोणी असेल तर त्यांचं नाव सुचवा. योग्य व्यक्तींना या सदरातून नक्कीच प्रसिद्धी दिली जाईल.

आमचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर बिल्डिंग, तिसरा मजला, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड, ना‌शिक

समन्वय : फणिंद्र मंडलिक- ९४२३१७४४९५

ई-मेल : fanindra.mandlik@timesgroup.com

(पाकीट आणि ई-मेलवर ‘यंग सीनिअर्स’ उल्लेख करावा.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाइपलाइनवर प्लॉटधारकांची वक्रदृष्टी

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा करणारी जुनी पाइपलाइन काढण्याचा घाट काही प्लॉटधारकांनी घातला आहे. ‘एमआयडीसी’च्या विभागीय पाणीपुरवठा विभागाने पाइपलाइन काढण्याची मागणी केली होती. परंतु, अतिरिक्त पाणीपुरवठ्याची व्यवस्था असावी म्हणून ‘एमआयडीसी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही पाइपलाइन काढण्यास नकार दिलेला आहे. मात्र, असे असतानाही काही नेत्यांकडून प्लॉटधारकांशी संगनमत करून पाइपलाइन काढण्याचा घाट घातला जात आहे. याप्रश्नी उद्योगमंत्र्यांनीच लक्ष घालावे, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.

औद्योगिक वसाहत स्थापन झाल्यावर कारखान्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी गोदावरी नदीवर ‘एमआयडीसी’ने पंपिंग स्टेशनची उभारणी केली होती. सातपूर व अंबडला वाढत्या कारखान्यांची संख्या पाहता मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी पुन्हा दुसरे पंपिंग स्टेशन ‘एमआयडीसी’ने उभारले. गोदावरी नदीवर बंधारा बांधून पाणी अडवून ते पंपिंग स्टेशनद्वारे कारखान्यांना पुरविले जात असे. यात हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने जलसिंचन विभागाचे अतिरिक्त पाणीबिल ‘एमआयडीसी’ला भरावे लागत होते. आनंदवली गावालगत कारखान्यांसाठी पाणीपुरवठा करणारी जुनी पाइपलाइनच काही सत्ताधारी नेत्यांकडून प्लॉटधारकांना हाताशी धरून अर्थकारणातून काढण्याचा घाट घातला जात असल्याचे बोलले जात आहे. पुढील वर्षी होऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत आपल्याकडे आर्थिक गंगाजळी असावी या हेतूनेच पाइपलाइन काढण्याचा घाट घातला जात आहे. विशेष म्हणजे यासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या ‘एमआयडीसी’च्या अधिकाऱ्यांनीदेखील जुनी पाइपलाइन काढण्याबाबत वरिष्ठ कार्यालयास अहवाल सादर केला आहे. परंतु, गंगापूर धरणातून पाणीपुरवठा करताना काही अडचण झाल्यास अतिरक्त सुविधा उपलब्ध असावी, या हेतूने वरिष्ठ कार्यालयाने पाइपलाइन काढण्यास नकार दिला आहे. असे असतानादेखील कार्यरत असलेली पाण्याची लाइन तोडण्याचा घाट अनेकांनी घातला आहे. याकडे उद्योगमंत्र्यांनीच लक्ष घालावे, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे. पाइपलाइन काढण्याचा घाट घालणारे नेते व अधिकारी यांच्यावरदेखील कारवाई करावी, अशी मागणीही उद्योजकांकडून केली जात आहे.

ठोस उपायांची गरज

सध्या सुस्थितीत असलेली पाइपलाइनी काढण्याचा घाट का घातला जात आहे, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. याप्रश्नी ठोस उपाययोजनांची मागणी उद्योजकांकडून करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टुरिस्ट परवानाधारक सुसाट

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोड रेल्वे स्टेशन व बस स्टॅण्ड परिसरात टुरिस्ट परवानाधारक सर्रासपणे अनधिकृत प्रवासी वाहतूक करीत असून, त्यांच्या वाहनांचा परिसराला कायमच विळखा पडत असल्याची स्थिती दिसून येत आहे. अनधिकृत प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडे स्थानिक पोलिसांकडूनही काणाडोळा केला जात असल्याने अधिकृत प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त करून याप्रश्नी ठोस उपाययोजना करण्याची मागणी अधिकृत प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

नाशिकरोड रेल्वे स्टेशन व बस स्टॅण्ड येथे प्रवाशांची कायमच मोठी गर्दी असते. येथील बस स्टॅण्डमधून शहरी व ग्रामीण अशा दोन्हीही बससेवा उपलब्ध असतात. याशिवाय रेल्वे स्टेशनजवळ अधिकृत रिक्षा थांबाही आहे. प्रीपेड रिक्षा सुविधाही काही प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे स्टेशन व बस स्टॅण्ड परिसरात अनधिकृत प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे पेवच फुटले आहे. याचा परिणाम अधिकृत वाहतूक करणाऱ्यांवर झाला आहे.

टुरिस्ट परवान्याचा गैरवापर

अनधिकृत प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडे टुरिस्ट परवाना असतो. अशा परवानाधारक वाहनांना स्थानिक प्रवासी वाहतूक करण्यास बंदी असूनही ही वाहने सर्रासपणे स्थानिक पातळीवर रिक्षाचालकांप्रमाणे प्रवासी वाहतूक करीत असतात.

वाहतूक पोलिस मात्र या प्रकाराकडे सर्रासपणे दुर्लक्ष करीत आहेत.

वाहतुकीला अडथळा

बस स्टॅण्डकडे येणाऱ्या सर्वच रस्त्यांवर अनधिकृत प्रवासी वाहतूक करणारी वाहने मोठ्या संख्येने तासन् तास उभी राहत असल्याने सार्वजनिक रहदारीला अडथळा ठरत आहेत. नाशिकरोड बस स्टॅण्डवर नाशिकरोड पोलिस स्टेशनअंकित पोलिस चौकी आहे. परंतु, बऱ्याचदा या पोलिस चौकीलाच अनधिकृत प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा गराडा पडलेला असतो. याशिवाय डॉ. आंबेडकर पुतळा ते शिवाजी पुतळा, बस स्टॅण्ड ते देवी चौक या दोन्ही रस्त्यांच्या दुतर्फा अनधिकृत प्रवासी वाहतूक करणारी वाहने पार्क केलेली असतात. अशा प्रकारची अनधिकृत प्रवासी वाहतूक पोलिसांच्या डोळ्यासमोर सुरू असते. त्यामुळे या प्रकाराला त्यांचा वरदहस्त तर नाही ना, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

नंबरची दिवसभर प्रतीक्षा

रेल्वे स्टेशनवरील बहुसंख्य रिक्षाचालकांना नंबरसाठी दिवसभराची प्रतीक्षा करावी लागत आहे. बऱ्याचदा कमी पैशात अनधिकृत प्रवासी वाहतूक करणाऱ्यांकडून प्रवासाची सुविधा मिळत असल्याने प्रवासीवर्गही अशा वाहनांतून प्रवासास प्राधान्य देत आहे. या प्रवासी पळवापळवीमुळे पट्ट्यावरील अधिकृत रिक्षाचालकांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या समस्येप्रश्नी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी संबंधित वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

---

नाशिकरोड रेल्वे स्टेशन व बस स्टॅण्ड परिसरात टुरिस्ट परवानाधारक वाहनांचा वापर स्थानिक प्रवासी वाहतुकीसाठी केला जात असल्याचे दिसून येत आहे.पोलिसांच्या वरदहस्ताशिवाय हे अशक्य आहे, असे वाटते.

-शिवाजी भोर, महाराष्ट्र शिव वाहतूक सेना

टुरिस्ट परवानाधारक वाहनांना स्थानिक पातळीवर रिक्षा प्रवासी वाहतुकीप्रमाणे प्रवासी वाहतूक करता येत नाही. असे होत असल्यास शहर वाहतूक शाखेशी थेट संपर्क करावा.

-के. बी. चौधरी, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, नाशिकरोड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोस्टात तब्बल ९१ कोटी जमा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

नोटाबंदीनंतर जिल्हाभरातील विविध पोस्ट कार्यालयांमधून सुमारे २४ कोटी रुपयांच्या पाचशे व हजार रुपयांच्या जुन्या नोटा विनाखाते बदलून देण्यात आल्या. पोस्टात बचत खाते असलेल्या नागरिकांनी सुमारे ४७ कोटी रुपये काढले, तर सर्वसाधारण बचत खात्यांत तब्बल ९१ कोटी रुपये जमा केले आहेत.

नोटाबंदी लागू करण्यात आल्यानंतर गेल्या १३ दिवसांमध्ये नागरिकांनी नोटा बदलणे, जुन्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यास पोस्ट विभागाला प्राधान्य दिले. यामुळे पोस्टाच्या डिपॉसिझटमध्ये तब्बल साडेनिनशे टक्क्यांनी रक्कम जमा झाली. पोस्टात सुमारे ६८ कोटी १५ लाख रुपये जुन्या पाचशेच्या नोटेच्या रुपातून तर ४७ कोटी ७४ लाख रुपये जुन्या हजार रुपयाच्या नोटेतून प्राप्त झाले.

बँकांपेक्षा पोस्ट फायद्यात

नोटाबंदीचा निर्णयाने बँकापेक्षा सर्वाधिक फायदा पोस्टास झाला. पोस्टातील सर्वसाधारण बचत खात्यात अवघ्या काही दिवसांतच साडे‌तिनशे टक्क्यांपेक्षा अधिक डिपॉझिट वाढले आहेत हे विशेष. नाशिक जिल्ह्यात नाशिक व मालेगांव असे दोन मुख्य विभाग आहेत. यात नाशिक, नाशिकरोड व मालेगांव असे तीन हेड पोस्ट ऑफिस असून त्यांना सुमारे ९७ उपपोस्ट ऑफिस जोडलेले आहेत.



नवीन खात्यास गर्दी

हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर नागरिकांनी सुरुवातील पोस्टात प्रचंड गर्दी केली होती. मात्र, आता पोस्ट कार्यालयांमधील गर्दी ओसरली आहे. तुरळक प्रमाणात नागरिक पोस्टातील खात्यात आपल्याकडील पाचशे हजारांच्या नोटा खात्यावर जमा करतांना दिसत भरत आहेत. पोस्टात नवीन खाते उघडण्यासही आता गर्दी होऊ लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजस्थानमधील नृत्यसंस्कृतीचे घडले दर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राजस्थान आणि पाकिस्तानच्या सीमेवर राहणाऱ्या बंजारांचे खंजरी नृत्य, राजस्थानी होळीमध्ये प्रसिद्ध असलेले स्त्री-पुरुषांचे डांगलीला, हंड्यांवर हंडे ठेवून केले जाणारे मनमोहक भवई नृत्य यांबरोबरच घुमर, गोरबंद, बाजूबंद, ढोलकडी, आगचरी, कालबेलिया, फुलचरी, हासामारी, हरिओ रुमाल यांसारख्या राजस्थानमधील प्रचलित नृत्यांच्या सादरीकरणाने राजस्थानमधील पारंपरिक नृत्यसंस्कृतीचे दर्शन घडविले. निमित्त होते नाशिक जिल्हा अग्रवाल महिला मंडळ प्रस्तुत ‘राजस्थानी लोकनृत्य’ या कार्यक्रमाचे. गंगापूर रोड येथील रावसाहेब थोरात सभागृहात रविवारी हा कार्यक्रम झाला.

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबच्या सदस्यांना या कार्यक्रमाचे मोफत पासेस देण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी १३ दिवस राजस्थानमधील प्रख्यात नृत्यांगणा पंडित गुरूमाँ शकुंतला पवार यांनी महिलांना विविध राजस्थानी नृत्यप्रकारांचे प्रशिक्षण दिले होते. यामध्ये शिकविण्यात आलेल्या नृत्यप्रकारांचे सादरीकरण या भव्य कार्यक्रमात करण्यात आले. नाशिकमध्ये पहिल्यांदाच राजस्थानी नृत्याचे आयोजन करण्यात आले होते. ‘एकदंताय वक्रतुंडाय’ या गणेशवंदनेने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. त्यानंतर ब्रज की होली, तिरंगा, धमाल, रुणझुण अशा विविध १४ नृत्य प्रकारांच्या सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली. सहा वर्षीय मुलींपासून ६० वर्षांपर्यंतच्या महिलांपर्यंत सर्व वयोगटातील महिलांनी या नृत्यप्रकारांचे सादरीकरण केले. या वेळी गुरू शकुंतला पवार यांनी प्रत्येक नृत्यप्रकाराचा परिचय करून दिला. पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव आपल्याकडे वाढत आहे. अशा वेळी राजस्थानी लोकनृत्यातून भारतीय संस्कृती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न यामार्फत करीत असल्याचे शकुंतला पवार या वेळी म्हणाल्या.

महापौर अशोक मुर्तडक यांनी मनोगत व्यक्त करताना, अग्रवाल महिला मंडळाच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. मनपा शाळांमध्येही त्यांनी शालेय साहित्याचे वाटप करून गरजूंसाठी मदतीचा हात दिला असल्याचे सांगत त्यांच्या कार्यास मुर्तडक यांनी प्रोत्साहन दिले. या वेळी नेमिचंद पोद्दार, पत्रकार किरण अग्रवाल, मंडळाच्या जिल्हाध्यक्ष सपना अग्रवाल, जिल्हा महामंत्री ममता अग्रवाल, अलका अग्रवाल, संगीता अग्रवाल आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडील रागावल्याने मुलाची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वडील रागावल्याने १६ वर्षीय मुलाने इमारतीच्या टेरेसवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी समोर आली. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. रोहित सुभाष अग्रहरी (वय १६) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.

पंचवटी पोलिस स्टेशन परिसरातील लोकसहकारनगर येथील पंचवटी आंनद मंडळ संकुलात फ्लॅट क्रमांक ९ मध्ये सुभाष अग्रहरी यांचे कुटुंब राहते. त्यांचा रोहित हा मुलगा दहावीमध्ये शिक्षण घेत होता. दोन दिवसांपूर्वी रोहितचा काही मित्रांसमवेत वाद झाला. या घटनेची माहिती सुभाष अग्रहरी यांना समजल्यानंतर त्यांनी रोहितला सुनावले, तसेच असे पुन्हा होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना केली. मात्र, रोहितला त्याचा राग आला. रविवारी पहाटेच्या सुमारास रागाच्या भरात रोहितने पंचवटी आनंद मंडळ या इमारतीच्या टेरेसवर जाऊन उडी घेतली. यात रोहित जागीच गतप्राण झाला. या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इन्शुरन्स कंपनीला दणका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

डेंग्यूच्या पेशंटचा क्लेम नाकारणारी इन्शुरन्स कंपनी व हॉस्पिटलचे जादा बिल आकारणाऱ्या डॉक्टरला दणका देत जिल्हा ग्राहक न्यायमंचाने ४५०० रुपयाचा दंड ठोठावला आहे. त्याचप्रमाणे पेशंटला इन्शुरन्स कंपनीने ३२ हजार ४२५ रुपये, तर डॉक्टरांनी १०,५०० रुपये द्यावेत, असे आदेशही दिले आहेत. विशेष म्हणजे या पेशंटला या रकमेवर १२ फेब्रुवारी २०१४ पासून रक्कम हाती मिळेपर्यंत १० टक्के व्याज देण्याचेही सांगितले आहे.

रामवाडीत राहणाऱ्या पौर्णिमा मनेश येलमामे यांनी ग्राहक न्यायमंचात तक्रार केल्यानंतर हॉस्पिटलने जास्त बिल आकारल्यामुळे दावा नाकरल्याची बाब समोर आली आहे. या तक्रारीत येलमामे यांनी नमूद केले आहे, की डेंग्यू आजार झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये मी भरती झाले. त्यानंतर उपचाराचा खर्च ४८ हजार २२५ रुपये आला. त्यात वेगवगेळ्या तपासण्या व औषधाकामी २५०० रुपये खर्च आहे. खर्च झालेल्या या पैशांची मागणी केल्यानंतर नॅशनल इन्शुरन्स कंपनीने हॉस्पिटलच्या रूमचा चार्ज १२००, डॉक्टर व्हिजिट ५००, नर्सिंग चार्जेस २०० रुपये प्रतिदिवस असताना रूमचा चार्ज २००० हजार, डॉक्टर व्हिजिट १००० हजार व नर्सिंग चार्ज ५०० रुपये दर्शवल्याचे कारण पढे करत विमा दावा नाकारला. त्यात मिस-रिप्रेझेंटेनशन केलेले नसतानाही हा दावा नाकारल्यामुळे मला दाव्याची रक्कम मिळावी, अशी मागणी केली.

तक्रारीनंतर इन्शुरन्स कंपनीने युक्तिवाद करताना दरामध्ये तक्रारदाराने मिस-रिप्रेझेंटेनशन केल्याचे म्हटले, तर या दाव्यात रजनी हॉस्पिटलचे संचालक विनोद उद्धव महाले यांनी न्याय मंचात हजेरी लावली; पण जबाब दाखल केला नाही.

या दोन्ही युक्तिवादानंतर न्याय मंचाने निकाल देताना नमूद केले आहे, की इन्शुरन्स कंपनीने सरसकट तक्रारदारांचा विमा दावा नाकारून, तर हॉस्पिटलने जास्तीचे चार्जेस लावून सेवा देण्यास कमतरता केली. हॉस्पिटलने १०,५०० रुपये जास्तीचे घेतले आहे. त्यामुळे इन्शुरन्स कंपनीने २२,९०० रुपये व औषधांचा खर्च ९५२५ रुपये असा एकूण ३२,४२५ रुपये द्यावा व हॉस्पिटलने १०,५०० रुपये द्यावेत, असे आदेश दिले. त्याचबरोबर दंड व व्याजही आकारले आहे. हा निकाल न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्य प्रेरणा काळुंखे- कुलकर्णी, कारभारी जाधव यांनी दिला आहे. तक्रारदाराकडून अॅड. बी. एम. भडांगे यांनी युक्तिवाद केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात वीज परिमंडळ

$
0
0

जिल्हानिर्मितीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल; आज होणार उद््घाटन

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक जिल्ह्याचे विभाजन करून मालेगाव या नव्या जिल्ह्याच्या निर्मितीचे घोंगडे गेल्या अनेक वर्षांपासून भिजत पडले आहे. त्या दृष्टीने महत्त्वाच्या कार्यालयांची विभागणी सुरू झाली आहे. त्यामध्ये नाशिक वीज परिमंडळांतर्गत मालेगाव या नव्या मंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. या मंडळाच्या कार्यालयाचे उद््घाटन आज (दि. २८) होत आहे. हे उद््घाटन म्हणजे, मालेगाव जिल्हा निर्मितीच्या दिशेने टाकलेले हे एक पाऊल आहे.

वीज मंडळाच्या नाशिक परिमंडळात यापूर्वी नाशिक शहर, नाशिक ग्रामीण व नगर असे तीन मंडळ कार्यरत होते. आता नाशिक शहर व नाशिक ग्रामीण या मंडळांची फेररचना करण्यात आली आहे. त्यामुळे मालेगाव हे नवीन मंडळ अस्तित्वात आले आहे. या मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांचे कार्यालयही मालेगावी स्थलांतरीत झाले आहे. याच मंडळाच्या कार्यालयाचे उद््घाटन सोमवारी दुपारी १२ वाजता सोयगावला ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

कार्यक्रमास खासदार हरिश्चंद्र चव्हाण, मालेगावचे महापौर हाजी मोहम्मद इब्राहिम, आमदार शेख आसिफ शेख रशिद, डॉ. राहुल आहेर, कॉ. जे. पी. गावीत, पंकज भुजबळ, दीपिका चव्हाण तसेच नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता शैलेंद्र राठोर आदी उपस्थित राहणार आहेत.

मालेगाव जिल्हा निर्मितीची तयारी-

मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळला आहे. सुरुवातीला मालेगाव मनपा व आता वीज परिमंडळाच्या सर्कलची भावी काळातील नियोजन डोळ्यासमोर ठेऊनच निर्मिती करण्यात आलेली आहे. चांदवड तालुक्याचा मालेगाव जिल्ह्यात समावेशास सुरुवातीपासूनच कडक विरोध राहिलेला आहे. त्यामुळे हा तालुका वीज मंडळाच्या मालेगाव सर्कलमधून वगळला आहे. यावरून मालेगाव या स्वतंत्र सर्कलच्या निर्मितीकडे मालेगाव जिल्हा निर्मितीची तयारी म्हणूनच पाहिले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामार्गावरील ‘ते’ खड्डे अखेर बुजवले

$
0
0

‘मटा’च्या वृत्तानंतर दखल; झोडगेतील रखडलेले काम पूर्ण

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील अनेक गावांना मालेगाव शहाराशी जोडणारा राष्ट्रीय महामार्ग तीनवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता.

प्रशासनाने याची दखल घेत महामार्गवरील हे जीवघेणे खड्डे अखेर बुजण्याचे काम सुरू केले आहे. यासोबतच तालुक्यातील झोडगे गावालगत खोळंबलेले दुरुस्तीचे कामदेखील पूर्ण करण्यात आले आहे. महामार्गवरील या खड्ड्याबाबत दि. २१ ऑक्टोबर रोजी ‘मटा’मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. मालेगाव शहराच्या बाहेरून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गवर पावसाळानंतरदेखील इरकोम सोमा टोल प्रा. लि. या कंपनीकडून खड्डे बुजवण्यात आले नव्हते. तालुक्यातील झोडगे गावासह विविध गावांची वाहतूक याच मार्गावरून होत असल्याने नियमित प्रवास करणार्‍या अनेकांना त्रास सहन करावा लागत होता. अनेकवेळा खड्ड्यामुळे अपघाताचे प्रसंगदेखील ओढवले हाेते. सुरुवातीला हे खड्डे बुजण्यासाठी माती आणि पेव्हरब्लॉकचा वापर करण्यात आला. मात्र त्यानंतर महामार्गची चाळण झाली होती. अखेर या रस्त्याची देखभाल जबाबदारी असलेल्या इरकोम सोमा टोल प्रा. लि. या कंपनीला जाग आली असून महामार्गवरील खड्डे डांबरीकरण करून बुजविण्यात येत आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भगूरला ७९ टक्के मतदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

भगूर येथील नगरपरिषदेसाठी नगराध्यक्षपदासाठी ३ तर नगरसेवकपदाच्या १७ जागांसाठी भगूरवासियांनी मतदान करीत ५२ उमेदवारांचे नशिब बंदिस्त केले. असून ७९.४७ टक्के मतदान झाले आहे. भगूर नगरपालिकेकरीता ११,१८७ एकूण मतदार असून त्यापैकी ८,८९१ मतदारांनी मतदान केले. मतमोजणी आज (दि.२८) रोजी सकाळी १० वाजता विहितगाव येथील माऊली समाजमंदिर येथे होणार आहे.

प्रभाग २ ब ठरला महत्त्वाचा

भगूरमध्ये होत असलेली निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केल्याने आज भगूर परिसरात गर्दीचे साम्राज्य पाहायला मिळले, त्यात सर्वचं राजकीय पुढाऱ्यांसह जिल्हाभरातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावल्याने भगूरला आज जत्रेचे स्वरूप प्राप्त झाल्याचे पाहायला मिळाले. त्यातही सर्वच पक्षांचे प्रमुख राजकीय पुढाऱ्यांनी येथील प्रभाग क्रं. २ समोर मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. कारण त्या प्रभागातून शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर हे निवडणूक लढवित असल्याने त्या ठिकाणी प्रमुख राजकारण्यांनी दिवसभर ठाण मांडले होते.

सावरकर स्मारकात गर्दी

निवडणुकीमुळे अनेक कार्यकर्त्यांचे प्रथमच भगूरमध्ये येणे झाले. यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला भेट देण्याची चालून आलेली संधी अनेक पुढाऱ्यांसह बाहेरगावाहून आलेल्या कार्यकर्त्यांनी साधत स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीला भेट देत वंदन केले. दिवसभर स्मारकात गर्दीच गर्दी होती. दिवसभरात हजारोहून पर्यटकांनी या ठिकाणी भेट दिल्याचे चित्र दिवसभरात पाहायला मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्यात ७५.४५ टक्के मतदान

$
0
0

ऐतिहासिक मतदानाने सत्ताधाऱ्यांनी घेतली धसकी

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अटीतटीच्या लढतीसाठी झालेल्या मतदानात पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वाधिक ७५.४५ टक्के इतके मतदान झाले आहे. यामुळे विजयाचे समीकरणे बदलण्याची दाट शक्यता आहे. वाढलेल्या या मतदानामुळे सत्ताधारी पक्षाला डोकेदुखी ठरते की काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. कोणत्याही स्वरूपाचे गालबोट न लागता अत्यंत शांततेत व सुरळीत मतदान पार पडले.

या निवडणुकीत शहरातील सुमारे एकुण २८,२९२ मतदारांपैकी २१,७४३ मतदारांनी मतदानाचा आपला हक्क बजावला. पालिकेसाठी एकूण ७५.४३ टक्के मतदान झाले आहे. पालिकेच्या थेट नगराध्यक्षपदाच्या एका जागेसाठी पाच तर प्रभागातील २१ जागांसाठी ९२ उमेदवार रिंगणात उभे होते.

येथील तहसील कार्यालयाच्या आवारातील नवीन प्रशासकीय इमारतींमध्ये मतमोजणीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मतमोजणी करिता १० टेबल लावण्यात आले असून सकाळी १० वाजेपासून मतमोजणीस प्रांरभ करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रवीण महाजन यांनी दिली.

सटाण नगरपरिषदेच्या निवडणूकसाठी ३९ मतदान केंद्रांमध्ये सकाळी ७.३० वाजेपासून मतदानास सुरुवात झाली. एकूण मतदारांपैकी २१,७४३ मतदान झाले. सर्वात कमी मतदान प्रभाग क्र. २ मध्ये २,२९० तर सर्वाधिक मतदान प्रभाग क्र. ८ मध्ये झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images