Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

संघर्ष मोर्चासाठी मोटारसायकल रॅली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

अॅट्रॉसिटी कायदा संरक्षण समितीच्यावतीने आज शनिवारी (दि. २६) रोजी शहरात अॅट्रॉसिटी संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय सहभागी होणार आहे. त्यासाठी मोर्चाची संपूर्ण तयारी झाली असून सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात येणार आहे.

या मोर्चासाठी गेल्या तीन महिन्यांपासून नियोजन व तयारीचे काम सुरू होते. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी, शहरातील विविध भागातून मोटारसायकल रॅली काढून मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यामुळे समाजबांधवामध्ये मोठा उत्साह संचारला असून तर मोर्चामध्ये कोणताही अनूचित प्रकार घडू नये, याची दक्षता घेण्यात येत आहे. तर मोर्चा शांततेच्या मार्गाने पार पाडावा, असे आवाहनही संघर्ष मोर्चा समितीतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सहा पालिकांसाठी उद्या मतदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील सहा नगरपालिकांसाठी रविवारी मतदान होणार असून, त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. नगरसेवकपदाच्या १७८ जागांसाठी ५६५ उमेदवार रिंगणात असून २६४ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. एकूण एक लाख ९३ हजार ९७१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून जिल्ह्यातील २८ मतदान संवेदनशील केंद्रांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. जिल्ह्यात तब्बल अडीच हजार पोलिस बंदोबस्तावर असणार आहेत.

जिल्ह्यातील मनमाड, येवला, नांदगाव, सटाणा, सिन्नर आणि भगूर या सहा नगरपालिकांमध्ये निवडणुक प्रक्रीया राबविण्यात येणार आहे. २६४ मतदान केंद्रांवर ३४३ कंट्रोल, तर ६९३ बॅलेट युनिटची व्यवस्था करण्यात आली आहे. सहाही नगरपालिकांमध्ये दोन हजार १६२ इतके टपाली मतदान असून, त्यासाठी दोन हजार ७९० टपाली मतपत्रिका छापण्यात आल्या आहेत.

येथे होणार मतमोजणी

२८ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने मतमोजणी केंद्रेही अंतिम केली आहेत. भगूरची मतमोजणी माऊली समाजमंदिर हॉल, विहितगाव, नाशिकरोड येथे होईल. मनमाडची मोजणी कै. वर्धमान बरडिया सार्वजनिक वाचनालयात होईल. नांदगावची मतमोजणी शासकीय इमारत हॉल, नवीन तहसील कार्यालयात होईल. सिन्नरला जीएमडी कॉलेज, सटाण्यातील नवीन प्रशासकीय इमारत आणि येवल्यात नगर परिषद कार्यालयाच्या सभागृहात मतमोजणी होणार आहे.

उमेदवारांनाही समज

येवला (१४ उमेदवार), मनमाड(८), नांदगाव(४), आणि सटाणा(७) येथील काही उमेदवार हे गुन्हेगारी पार्श्वभूमिचे आहेत. त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी अशा ३२ उमेदवारांवर प्रतिबंधात्म कारवाई केली आहे.

२८ केंद्र संवेदनशील

जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभाग यांच्यात झालेल्या बैठकांमध्ये आतापर्यंत सहापैकी चार नगरपालिकांमध्ये २८ मतदान केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. यात भगूर २, सिन्नर १२, सटाण्यात ५, येवला ९ केंद्रांचा समावेश आहे. मनमाड, नांदगावात संवेदनशील केंद्र नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ शेड्सवरील कारवाई अटळ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्यामागील संकटाची मालिका कमी होत नसल्याचे चित्र आहे. विस्तारित बाजार समितीच्या शेडवरील अतिक्रमणासंदर्भात बाजार समितीने दाखल केलेल्या अर्जावरील स्थगिती न्यायालयाने उठवली आहे. त्यामुळे समिती जिल्हा न्यायालयात जाऊन पुन्हा स्थगिती मिळवण्याची शक्यता असल्याने नगररचना विभागाने जिल्हा न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. त्यामुळे पुन्हा स्थगिती मिळण्याची शक्यता कमीच असल्याने या शेडवर हातोडा पडण्याची दाट शक्यता आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शरदचंद्र पवार या विस्तारीत समितीत व्यापाऱ्यांसाठी समितीने पालिकेची परवानगी न घेताच शेड उभारले आहे. यासाठी नगररचना विभागाची परवानगी आवश्यक होती. परंतु ती घेतली नसल्याने पालिकेने हे अतिक्रमण काढण्यासंदर्भातील नोटीस बजावली होती. बाजार समितीने या नोट‌िसीविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयानेही त्याला एकतर्फी स्थगिती दिली होती. त्यामुळे पालिकेने त्याच न्यायालयात धाव घेत, स्थगिती उठवण्याची मागणी केली होती. पालिकेची मागणी न्यायालयाने मान्य करत, कारवाईवरील स्थगिती आता उठवली आहे. तसेच समितीवरील न्यायालयात जाण्यासाठी पाच दिवसांची मुदत दिली आहे.


पालिकेकडून आधीच दक्षता

समिती या स्थगिती उठवण्याच्या निर्णयाविरोधात जिल्हा न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगररचना विभागाने आधीच दक्षता घेत, जिल्हा न्यायालयात या विरोधात कॅव्हेट दाखल केले आहे. त्यामुळे पालिकेची बाजू ऐकल्याशिवाय स्थगिती मिळण्याची शक्यता कमीच आहे. न्यायालयाने स्थगितीचा अर्ज फेटाळल्यास या शेड्सवर तत्काळ बुलडोझर चालविले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील २० उमेदवार कोट्यधीश

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सहा नगरपलिकेच्या निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांपैकी २० उमेदवाराचे नाव कोट्यधीशांच्या यादीत झळकले आहेत. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर १०० करोडपतींची नावे देण्यात आली असून, त्यात ही नावे आहेत. मनमाड, येवला, नांदगाव, भगूर, सिन्नर व सटाणा येथे निवडणुका आहेत. यात मनमाड, येवला, भगूर व सटाणाच्या उमेदवारांची नावे आहेत.

मनमाड नगरपालिका

पदमावती धात्रक - १७ कोटी

गणेश धात्रक - ५ कोटी

कुसुम दराडे - ३ कोटी

सविता गिडगे - ३ कोटी

विजय सगळे - ३ कोटी

सचिन दराडे - ३ कोटी

भगूर नगरपालिका

मोहन करंजकर - १५ कोटी

अनिता करंजकर - ११ कोटी

विजय करंजकर -११ कोटी

मनीषा कस्तुरे - ६ कोटी

भाऊसाहेब गायकवाड - ५ कोटी

दीपक बलकवडे -३ कोटी

येवला नगरपालिका

प्रणिताराजे शिंदे -२० कोटी

संकेत शिंदे - ५ कोटी

चंदा दुगड - ४ कोटी

उषाताई शिंदे - ४ कोटी

प्रवीण बनकर -३ कोटी

संदेश पाटील - ३ कोटी

सटाणा नगरपालिका

विजय पाटील - ७ कोटी

साहेबराव सोनवणे - ३ कोटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एसपीव्ही’चे कामकाज प्रभारी सीईओंकडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटीच्या घोषणेनंतर आता स्थापन झालेल्या स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही)च्या कामकाजाला गती मिळाली आहे. एसपीव्हीची पहिली बैठक अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्यानंतर आता दुसऱ्या बैठकीची तयारी सुरू आहे. परंतु शासनाने अद्यापही एसपीव्हीच्या सीईओपदी कोणत्याही सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे आयुक्तांनी सीईओपदाचा तात्पुरता पदभार हा प्रशासन उपायुक्त विजय पगार यांच्याकडे सोपविला आहे. त्यामुळे आता स्मार्ट सिटीच्या नियोजनाला चालना मिळण्याची शक्यता आहे.

स्मार्ट सिटीच्या घोषणे अगोदरच नाशिकमध्ये एसपीव्हीची स्थापना झाली होती. त्यापाठोपाठ नाशिकचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये झाला होता. स्मार्ट सिटीमध्ये सर्व विकासकामांची अंमलबजावणी ही एसपीव्हीच्या मार्फत केली जाणार आहे. त्यामुळे घोषणेनंतर अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या महिन्यात पहिली बैठक झाली होती. त्यांनी एसपीव्हीच्या प्रशासकीय कामकाजाचे सर्व अधिकार आयुक्तांना देत, एसपीव्ही स्थापनेची कारवाई पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. एसपीव्हीचे कार्यालय हे महापालिकेतच असले तरी, एसपीव्हीचा कारभार पाहणारे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची अद्याप नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे एसपीव्हीच्या कामकाजाला गती आलेली नाही.

एसपीव्हीच्या कामकाजाला गती देण्यासाठी आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसेच आपल्या अधिकारात एसपीव्हीच्या प्रभारी सीईओपदी प्रशासन उपायुक्त विजय पगार यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता एसपीव्हीच्या कामकाजाला सुरूवात होणार असून, दुसऱ्या बैठकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. एसपीव्हीच्या सीईओकडूनच इतर कार्यालयीन कामकाजाच्या नियुक्त्या केल्या जातात. त्यामुळे रखडलेल्या नियुक्त्या मार्गी लागणार आहे.

जानेवारीपासून कामकाज

जानेवारीपासून या स्मार्ट सिटीच्या कामकाजाला प्रत्यक्षात अंमलबजावणीला सुरूवात होण्याची शक्यता आहे. स्मार्ट सिटीतल्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी एसपीव्हीचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू होणे अपेक्ष‌ित आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये एसपीव्हीची आणखीन एक बैठक होऊन नियोजनाचा आराखडा तयार केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यभर ‘फुलटाइम’ गुंडागर्दी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

भाजपचे मुख्यमंत्री सांगतात, मी ओव्हरटाइम मुख्यमंत्री आहे. मात्र त्यांच्या राज्यात गुंड मात्र फुलटाइम आहेत, असा जोरदार चिमटा काढत राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी येवल्यात थेट हल्ला चढविला. गुंडांना बरोबर घेऊन राज्य करणाऱ्या या शासनाला आता त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहनही विखे पाटील यांनी केले.

येवला नगरपालिका निवडणुकीचा अंतिम टप्प्यांत प्रचार आता शिगेला पोहचला आहे. येवल्यात जाहीर प्रचारासाठी राज्यातील विविध पक्षांच्या नेतेमंडळींची हेल‌िकॉप्टर घिरट्या घालू लागली आहेत.

येथील निवडणुकीत रिंगणात उतरलेल्या काँग्रेसच्या नगराध्यक्ष अन् नगरसेवकपदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राधाकृष्ण विखे पाटील यांची जाहीर सभा झाली. शहरातील केशवराव पटेल मार्केटसमोर झालेल्या या प्रचारसभेत विखे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडतानाच शिवसेनेला चिमटे घेतले. या देशात विकास फक्त रामदेव बाबाचा झाला, बाकी शेतकरी, कष्टकरी यांचे वाटोळे या सरकारने केले. अचानक नोटाबंदी करून सामान्य जनतेचे हाल केले. लोकांना कामधंदे सोडून बँकेच्या समोर रांगेत उभे केले. भाजपचा एकही आमदार रांगेत दिसला नाही, असा टोला विखेंनी लगावला. केवळ घोषणाबाजी करणारे अन् प्रत्येक घोषणेचे मार्केटिंग करणारे हे सरकार आहे. सर्वत्र गुंड पोसण्याचे काम हे सरकार करीत आहे. यांच्या राज्यात दाभोलकर, पानसरेंचे हत्यारे खुलेआम फिरत आहेत. पोल‌िस अधिकारी आत्महत्या करीत आहेत. सामाजिक व कायदा सुव्यवस्थेची या सरकारने वाट लावली आहे. जातीय दंगे भडकवले जात आहेत, असा आरोपही विखे यांनी केला. राज्य प्रगतीकडे नव्हे तर अधोगतीकडे सरकार घेऊन जात आहे. गुन्हेगारी, बलात्कार वाढले आहेत. सर्व गुंडांना प्रवेश दिले जात आहेत.

एकिकडे आदिवासी, अल्पसंख्यांकांच्या योजनेत मोठी कपात आणि दुसरीकडे उद्योगपतींना कर्ज माफ केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही विखे यांनी दिला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाने, येवला शहराध्यक्ष राजेश भंडारी, तालुकाध्यक्ष अरुण आहेर, नगराध्यक्षपदाचे उमेदवार एजाज शेख यांची भाषणे झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दावा नाकारणाऱ्या कंपनीला दणका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वाहन विकत घेतल्यानंतर आरटीओ कार्यालयात रीतसर नाव लागले असताना केवळ पॉलिसी ट्रान्सफर झाली नाही म्हणून विमा दावा नाकारणाऱ्या इन्शुरन्स कंपनीला ग्राहक न्यायमंचाने दणका दिला आहे.

अर्जदारास नुकसान भरपाईचे २ लाख ३७ हजार ९४६ रुपये देण्याचे आदेशही मंचाने दिले आहेत. त्याचप्रमाणे सेवा देण्यास कमतरता केल्याचे कारण सांगत त्रासापोटी ५ हजार व अर्जाचा खर्च ३ हजार असा आठ हजारांचा दंड ठोठावला. वाहन विकत घेतल्यानंतर त्याची रीतसर कागदपत्रांची नोंद करण्यात आली व त्याच रात्री वाहनाचा अपघात झालेल्या या प्रकरणात न्यायमंचाने हा निकाल दिला आहे.

नाशिकरोड येथील नंदू सखाराम लवटे यांनी याबाबत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात तक्रार दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे की, विलास मारुती सांगळे यांच्याकडून मी टोयोटा कार विकत घेतली. त्यानंतर सदर वाहनाचे आरटीओ कार्यालयात नाव ट्रान्सफर करण्यात आले. त्याचदिवशी रात्री १० च्या सुमारास सदर वाहनास नाशिकरोड येथे अपघात झाला. त्या वाहनाचे २ लाख ३७ हजार ९४६ रुपये नुकसान झाले. सदर खर्च मिळावा म्हणून मी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी, अहमदनगर येथे दावा दाखल केला. मात्र, त्यांनी भरपाई दिली नाही. त्यानंतर मूळ मालक विलास सांगळे यांनी दावा दाखल केला, तोही फेटाळण्यात आला. त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली. या तक्रारीवर इन्शुरन्स कंपनीने प्रथम तर न्यायमंचाच्या अधिकारात हा दावा येत नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर तक्रारदाराने वाहन विकत घेतल्यानंतर विमा पॉलिसी आपल्या नावावर ट्रान्सफर करून घेतलेली नाही. तक्रादारांचा इन्शुरेबल इंटरेस्ट नसल्यामुळे वाहनाच्या नुकसानीची भरपाई देण्याची त्यांची कोणतीही जबाबदारी नाही. त्यामुळे तक्रारदाराचा अर्ज फेटाळण्यात यावा, असे सांगितले. या दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायमंचाने वाहनाचा अपघात न्यायमंचाच्या कार्यक्षेत्रात झाल्यामुळे ही केस चालवण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर मोटार टेरिफ जीआर क्र. १७ नुसार वाहन ट्रान्सफर झाल्याच्या दिनांकापासून १४ दिवसांच्या आत विमा पॉलिसी आपल्या नावे करण्यासाठी विमा कंपनीकडे अर्ज केला पाहिजे.

पण या केसमध्ये आरटीओकडे नाव ट्रान्सफर झाल्यानंतर त्याच दिवशी अपघात झाला आहे. त्यामुळे तक्रारदाराचा इन्शुरेबल इंटरेस्ट नव्हता, या विमा कंपनीच्या म्हणण्यात आम्हाला तथ्य वाटत नाही. या केसमध्ये इन्शुरन्स कंपनीने अटीशर्तीही दाखल केलेल्या नाहीत. त्यामुळे इन्शुरन्स कंपनीने सेवा देण्यास कमतरता केलेली आहे. त्यामुळे त्यांनी नुकसान भरपाई व दंडाची रक्कम द्यावी, असे सुनावले. हा निकाल न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, प्रेरणा काळुंखे-कुलकर्णी, कारभारी जाधव यांनी दिला आहे. तक्रारदाराकडून अॅड. डी. बी. डावकर यांनी युक्त‌िवाद केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवल्यात विकासाचा नुसताच ठणठणाट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

गेल्या दहा-अकरा वर्षांत येवल्यात एका ठराविक पक्षाची सत्ता आणि अनेक वर्ष मंत्रीपद लाभूनही शहरात विकासाचा ठणठणाट आहे. आता केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने विकासाची संधी तुमच्यापुढे चालून आली आहे. सत्ता द्या, शहराचा दोन वर्षात कायापालट करून दाखवतो, असे भारीभक्कम आश्वासन राज्याचे जलसंपदामंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी येवलेकरांना दिले.

पालिका निवडणुकीतील भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार बंडू क्षीरसागर व प्रभागातील भाजपा-शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पालकमंत्री गिरीश महाजन यांची शहरातील पहाड गल्लीत सभा झाली. या सभेत महाजन यांनी येवला पालिकेत गेल्या दहा वर्षांपासून अधिक काळ सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.

केंद्रातील मोदी सरकारने दोन वर्षांत जनतेच्या हितासाठी १०० योजना सुरू केल्या. भारताचा आवाज जगात पोहचला आहे. एका ठराविक पक्षाची सत्ता आणि अनेक वर्ष मंत्रीपद लाभूनही येवला शहरात विकासाचा ठणठणाट आहे. आता केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असून, विकासाची संधी तुमच्या पुढे चालून आली आहे. अनेक वर्ष सत्ता आणि पालकमंत्रीपदी असतानाही जिल्ह्यात पायाभूत सुविधादेखील मिळालेल्या नाही. मनमाडला २५ दिवसांनी पाणी मिळते, हा विकास आहे का? असा सवाल करून स्मार्ट सिटी ही मोदींची संकल्पना येथे राबवून शहराचा चेहरा-मोहरा बदलवण्यासाठी तुम्ही जे-जे मागाल ते-ते दिले जाईल. दिल्लीत सत्ता आहे, आता गल्लीतही सत्ता द्या, असे महाजन म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालेगाव मनपा कोट्यधीश!

$
0
0

नोटाबंदी निर्णयानंतर ७ कोटींहून अधिक कर जमा

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

पाचशे आणि हजाराच्या नोटा बाद करण्याच्या निर्णयानंतर मनपाचे थकित कर भरण्यासाठी या हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार दि. ९ नोव्हेंबरपासून या नोटांद्वारे नागरिकांकडून रक्कम स्वीकारण्यास सुरुवात झाली. नोटाबंदीच्या निर्णयाने महसूल विभागाचे करवसुलीचे काम सुलभ झाल्याने एरवी खडखडाट असलेल्या मनपाच्या तिजोरीत यामुळे मोठी रक्कम जमा झाली आहे. गेल्या १५ दिवसांत येथील महापालिकेच्या तिजोरीत ७ कोटी ७२ लाख इतका कर वसूल झाला आहे, अशी माहिती सहाय्यक कर आयुक्त इकलाख शेख यांनी दिली.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर शहरातील नागरिकांनी जुन्या पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा बदलून घेण्यासाठी दोन आठवड्यापासून विविध बँक आणि पोस्टाबाहेर रांगा लावल्या होत्या. मात्र या नोटा व्यवहारातून रद्द करण्यात आल्याने त्या कोणीही स्वीकारत नसल्याने अनेकांची चिंता वाढली होती. राज्यसरकारने मात्र या नोटांद्वारे मनपाचे थकित कर भरण्यासाठी सूट दिल्याने अनेकांनी बँक किंवा पोस्टात जाण्यापेक्षा कर भरणे पसंत केले.

याबाबत मनपा आयुक्त रवींद्र जगताप, कर उपायुक्त इकलाख शेख तसेच महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यासाठी नागरिकांना कर भरण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी प्रत्येक प्रभाग कार्यालय व मनपा कार्यालयात व्यवस्था करण्यात आली होती. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

महापालिकेकडून दरवर्षी राबविल्या जाणाऱ्या वसूली मोहिमेत करांच्या पोटी एकूण ४० ते ५० टक्के वसूली होत असते. या आर्थिक वर्षात चालू तसेच थकित अशी एकूण ५१ कोटी वसूली होणे अपेक्षित आहे. यात आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू झाल्यापासून आतापर्यंत १२ कोटी १३ लाख २६ हजार रुपयांची वसूली झाली आहे. मात्र यातील लक्षणीय बाब म्हणजे ७ कोटी ७२ लाख ७२ हजार ५६९ रुपयांची करवसुली ही नोटाबंदी निर्णयानंतर झाली आहे. सर्वाधिक करभरणा प्रभाग क्रमांक एकमध्ये ३,२३,७७,४६२ रुपये इतका कर नागरिकांनी हजार आणि पाचशेच्या नोटांद्वारे भरला आहे. यामुळे यंदा वसुलीचा आकडा ७० टक्क्यांपर्यंत पोहचू शकतो, असा अंदाज महसूल अधिकारी व्यक्त करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उतारे, ऑनलाइन दुरुस्तीला अग्रक्रम

$
0
0

मागण्या मान्यतेनंतर तलाठी कार्यालये गजबजली

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तलाठी संघटनेच्या काही मागण्या मान्य केल्यामुळे नाशिकमधील तलाठ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या दहा दिवसांपासून सामूहिक रजेवर गेलेले तलाठी, तलाठी संवर्गातील मंडळ अधिकारी तसेच अव्वल कारकून कामावर रूजू झाले असून, तलाठी कार्यालये आता गर्दीने गजबजून गेली आहेत. शुक्रवारी (दि. २५) शेतकऱ्यांना उतारे देण्यास प्राधान्य देण्यात आले.

प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १६ नोव्हेंबरपासून तलाठी सामुदायिक रजेवर गेले होते. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून तलाठी कार्यालयाशी संबंधित सर्व कामकाज ठप्प झाले होते. वारंवार निदर्शने करूनही सरकार दखल घेत नसल्याने तलाठी संघटनांनी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला होता. महसूल गोळा करण्यापासून उतारे वाटपापर्यंतची सर्वच कामे रखडल्याने नागरिकांचे विशेषत: शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होऊ लागले. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी मुंबईत तलाठी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांच्या सजांच्या पुनर्रचनेबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेण्याचे तसेच संगणकीय कामकाज करताना येणारे तांत्रिक दोष दूर करून प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र सर्व्हर देण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले. तलाठ्यांना संगणक, लॅपटॉप, प्रिंटर्सबाबत येणाऱ्या अडचणी जानेवारी अखेरपर्यंत सोडविण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. ऑनलाइन कामकाजात येणाऱ्या अडचणींबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी महिन्यातून एकदा तलाठ्यांची बैठक घेऊन त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, असे आदेशही महसूल मंत्र्यांनी दिले. आंदोलन करणाऱ्या तलाठ्यांवर कारवाई केली जाणार नाही तसेच त्यांच्या रजा धरण्यात याव्यात, ही मागणीही मान्य करण्यात आली आहे. महसूल मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे संप मागे घेण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष नीळकंठ उगले यांनी दिली.

सायंकाळी उशिरापर्यंत महसूल मंत्र्यांशी मागण्यांबाबत चर्चा सुरू होती. त्यांनी आमच्या मागण्या मान्यतेबाबत सकारात्मकता दर्शविली. त्यामुळे जिल्ह्यात आजपासून ५६३ कामावर रूजू झाले. याखेरीज तलाठी संवर्गातील मंडळ अधिकारी आणि अव्वल कारकून असे २०० जण देखील कामावर रूजू झाले आहेत.

- नीळकंठ उगले,

जिल्हाध्यक्ष, नाशिक जिल्हा तलाठी संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचरंगी लढतीत कोण मारणार बाजी?

$
0
0

कैलास येवला, सटाणा

सटाणा नगरपालिका थेट नगराध्यक्षपदासाठी अत्यंत काट्याची लढत होत असून, कोण बाजी मारणार हे सांगणे कठीण झाले आहे. साम, दाम, दंड, भेद या रणनीतीचा वारेमाप वापर या दोन दिवसात होणार असल्याने विजयाचा पुष्पहार कुणाच्या गळ्यात पडतो व थेट नगराध्यक्ष निवडणुकीच्या धक्कादायक निकालाची परंपरा कायम राहणार का, याबाबत आता उत्कंठा वाढली आहे.

थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक ही सटाणा शहराला नव्याने नाही. या पूर्वीही शहरवासियांनी सन १९७६ व २००१ मध्ये अशा निवडणुकीचा थरार अनुभवला आहे. १९७६ मध्ये लोकनेते पंड‌ितराव धर्माजी पाटील व २००१ मध्ये अर्जुनराव अहिरे यांनी विजय संपादन केला आहे. त्यामुळे यदांची थेट नगराध्यक्षपदाची निवडणूकदेखील ऐतिहासिक व धक्कादायक निकाल देणारी ठरल्यास वावगे ठरणार नाही.

अर्ज माघारी नंतर १२ नोव्हेंबरपासून थेट नगराध्यक्षपदाचे चित्र स्पष्ट झाल्यांनतर तब्बल पंधरा दिवस प्रचाराला संधी मिळालेल्या उमेदवारांनी घराघरात जाऊन थेट संपर्क साधला. यंदाच्या निवडणुकीत सटाण्यात हायटेक प्रचाराने रंग भरल्याने कधी नव्हे तो इतक्या मोठ्या प्रमाणात ‘आर्थिक’ चुराडा या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत झाल्याने काही करोडोंची उलाढाल शहरात या निमित्ताने झाली आहे.

काँग्रेसचे अ‍ॅड. विजय पाटील व शहर विकास आघाडीचे सुनील मोरे हे दोघेही नगराध्यपदासाठी नवीन आहेत. तर भाजपचे बाळासाहेब सोनवणे यांनी तब्बल तीन वेळा नगराध्यक्षपद भूषविले आहे. तसेच राष्ट्रवादीचे बाळासाहेब रौंदळ, शिवसेनेचे अरविंद सोनवणे यांनी थेट नगराध्यक्षपदाचा उमेदवारीचा अनुभव घेतला आहे. यामुळे पाचही उमेदवारांना ही निवडणूक नवी नसली तरी मोठ्या हिमतीने ते रिंगणात उतरले आहेत.

राष्ट्रीय पक्षाच्या तिघाही प्रदेशाध्यक्षांनी या निवडणुकीच्या निमित्ताने सटाण्यातील प्रचार सभांना हजेरी लावली. तर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुरेश धस यांनी सभा घेत चुरस निर्माण केली आहे. शिवसेनेकडून स्टार प्रचारक कुणीही या ठिकाणी आले नाहीत. ‘शविआ’चे सर्वेसर्वा सुनील मोरे यांनी डिजिटल सभा घेवून आपल्या अस्त्विाची चुणूक दाखवून दिली.

भाजपने केंद्र व राज्यात आपली सत्ता असल्याने कोणत्याही परिस्थितीत यंदा पालिकेत परिवर्तन घडवून पालिका ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली आहे. तर राष्ट्रवादीने सलग दोन निवडणुकीत मिळविलेल्या एकहाती विजयाची आता हॅट्रीक करण्यासाठी चंग बांधला आहे. यासाठी विद्यमान आमदार दीपीका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण यांनी मोठे परिश्रम घेतले आहे. आमदार चव्हाण यांचे सासू-सासरे प्रभागात उमेदवार असल्याने त्यांनादेखील या रिंगणात उतरावे लागले आहे. काँग्रेसने शहरात पहिल्यांदाच आपल्या अस्तित्त्वाची जाणीव करून देत अन्य पक्षीय उमेदवारांना दमछाक करण्यास भाग पाडले आहे. लोकनेत दलितमित्र पंड‌ितराव पाटील यांच्या माध्यमातून शहरात मोठी आघाडी घेतली आहे. शिवसेनेचे शिलेदार अरविंद सोनवणे यांनी एक हाती किल्ला लढविला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे या ठिकाणी तळ ठोकून आहेत. अरविंद सोनवणे यांच्या सौभाग्यवतीदेखील प्रभागात रिंगणात असल्याने त्यांना तिकडे लक्ष द्यावे लागत आहे.

शहरात मराठा समाजाची मते मोठ्या प्रमाणात असून, समाजाची चारही उमेदवार रिंगणात आहेत. तर उर्वरित बाराबलुतेदारांची संख्या त्या बरोबरीची असल्याचे जाणकार सांगतात. त्यात शहर विकास आघाडीचे सुनील मोरे हे एकमेव उमेदवार माळी समाजाचे आहे. मत विभागणीच्या पाठबळावर विजयश्री खेचण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. तर ‘एक मराठा लाख मराठा’ हे कार्ड कोणता रंग दाखविणार यावरच खऱ्या अर्थाने निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे. तसेच पंचरंगी असलेला सामना अखेरच्या टप्प्यात चौरंगीवरून तिरंगी झाल्यास नवल वाटायला नको.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नरमध्ये रात्र वैऱ्याची

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर नगरपालिका निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसह अपक्षांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यांत झालेल्या सभामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झाडल्या. नंतर मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर देण्यात आला. एक, एका मतदाराला पुन्हा पुन्हा भेटून निवडणुकीतील प्रचार शिगेला पोहोचवला आहे.

भाजपचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी आपली शक्ती पणाला लावली असून, नगरपालिकेवर पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी आखलेले डावपेच परतवून लावण्यासाठी शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे यांनीही आपली ताकद पणाला लावली आहे. पालिकेत बोकाळलेला भ्रष्टाचार थांबवण्यासाठी परिवर्तन करण्याचे आवाहन केले आहे. कोकाटे यांनी मुख्यमंत्र्याची सभा घेवून प्रचारात आघाडी घेतली असताना वाजे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ खडसे, ग्रामविकास राज्य मंत्री दादा भुसे, आमदार अनिल कदम यांच्या सभा घेवून निवडणुकीत मोठी रंगत आणली. त्याचप्रमाणे काँग्रेस आघाडीने आमदार जितेंद्र आव्हाड यांची सभा घेऊन सिन्नरचा विकास काँग्रेसच्या काळात झाल्याचा प्रचारातील मुद्दा घेत मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला. मनसेचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार राजेंद्र बोरसे व इतर उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेऊन आम्हीही रिंगणात असल्याचे स्पष्ट केले. सिन्नरच्या राजकारणात सभेत पोलखोल करण्याऱ्यांमध्ये प्रसिद्ध असलेले वयोवृद्ध नेते अॅड. झुंजार आव्हाड यांनी नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार वसंत बाबा नाईक यांच्या प्रचारार्थ सभा घेवून सर्वच नेत्याच्या चांगलीच खिल्लह उडवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभाग रचना अखेर जैसे थे

$
0
0

३० हरकती फेटाळल्या; केवळ तीन दुरुस्त्या

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या प्रभाग रचनेवर दाखल झालेल्या ३२ पैकी ३० हरकती राज्य निवडणूक आयोगाने फेटाळल्या आहेत. केवळ प्रभाग क्रमांक २० व २७ संदर्भातील हरकतींमुळे त्यात तांत्रिक बदल करण्यात आले असून, मुद्रणातील काही दोष दूर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

प्रभाग रचनेतील सीमारेषा, लोकसंख्या, आरक्षणांसदर्भातील सर्व हरकती फेटाळल्याने महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध केल्यानंतर ती राजपत्रासह महापालिकेच्या वेबसाईट प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे अनेकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांवर पाणी फेरले गेले आहे.

महापालिकेच्या प्रभाग रचनेवर एकूण ३२ हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. या हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी दीपक कपूर यांची नियुक्ती केली होती. सर्वाधिक तक्रारी या प्रभागांच्या तोडफोडी, लोकसंख्येच्या होत्या. त्यामध्ये शिवसेनेचे माजी सभागृहनेते भगवान भोगे यांनी संपूर्ण प्रभाग रचनेवर आक्षेप घेतला होता.

कपूर यांनी हरकतींवर सुनावणी घेत अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला होता. राज्य निवडणूक आयोगाने कपूर यांच्या अहवालानंतर शुक्रवारी अंतिम प्रभारचना प्रसिद्ध केले असून, ३२ पैकी ३० हरकती फेटाळल्या. प्रभाग क्रमांक २० मध्ये नितीन चिडे यांनी घेतलेल्या हरकतीची दखल घेत, प्रभागाचे विस्तृत वर्णन देण्याच्या सूचना कपूर यांनी केल्या. प्रभाग २७ मध्ये बदल करण्यात आला.

कोर्टात जाण्याचा पर्याय

भगवान भोगे यांनी पूर्ण प्रभाग रचनेवर आक्षेप घेतला होता. आता त्यांच्यासह सर्वांच्याच हरकती फेटाळण्यात आल्याने त्यांच्याकडे कोर्टात जाण्याचा शेवटचा मार्ग शिल्लक आहे. त्यामुळे भोगेंसह अन्य हरकतदार काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून आहे.

भाजपला दिलासा

महापालिकेची प्रभागरचना भाजपच्या प्रभावाखाली तयार केल्याचा आरोप शिवसेनेसह अन्य पक्षांनी केला होता. भोगे यांनी तर निवडणूक आयोगाकडे थेट तक्रार दाखल करीत, काही अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली होती. आमदार बाळासाहेब सानप, माजी आमदार वसंत गिते यांच्यासह महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर हस्तक्षेप केल्याचा आरोप केला होता. परंतु, राज्य निवडणूक आयोगाने या सर्व हरकती फेटाळून लावल्याने भाजपसह पदाधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुकानांमधून मिनी बँक‌िंग सेवा

$
0
0

अन्न व पुरवठा विभाग अन् बँकांची संयुक्त योजना

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आता खेड्यापाड्यातही मिनी बँकिंगची सुविधा उपलब्ध होणार असून, छोट्या-मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी ग्रामस्थांना तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी धाव घेण्याची गरज भासणार नाही. त्या त्या भागातील रेशन दुकाने मिनी बँक म्हणून कार्यान्वित करण्याची योजना अन्न व पुरवठा विभाग, तसेच काही बँकांनी संयुक्तरित्या हाती घेतली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात नाशिक विभागातील धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगरसह नाशिक या पाच जिल्ह्यांच्या पुरवठा विभागाची बैठक पार पडली. यावेळी पुरवठा विभागाचे उपायुक्त रघुनाथ गावडे, नाशिकच्या जिल्हा पुरवठा अधिकारी सरिता नरके, अन्य जिल्ह्यांचे पुरवठा अधिकारी, तसेच एस बँकेचे व्यवस्थापक केदार देशपांडे, सचिन डहाळे, आयडीएफसी बँकेचे सचिन पेडेकर, रुपेचे अनुराग मिश्रा, अॅक्सिस बँकेचे सुदीप मुळे आदी उपस्थित होते.

सरकारच्या बदलत्या धोरणांमुळे माफक दरात अन्नधान्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे रेशन दुकानदारांनाच मिनी बँक म्हणून उत्पन्नाचे अन्य पर्याय उपलब्ध करून द्यावेत आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या गावातच बँक‌िंगसंदर्भातील आर्थिक व्यवहार करता यावेत, या उद्देशाने रेशन दुकानदार बँकांचे बिझनेस करस्पॉडंट म्हणून काम करणार आहेत. त्यामुळे रेशनव्यवस्था सशक्त होईल, असा विश्वास पुरवठा विभागाचे उपसचिव बी. बी. पाटील यांनी व्यक्त केला.

लाभार्थीलाच रेशन

लाभार्थीच्या रेशन कार्डवर अन्य व्यक्ती अन्नधान्य खरेदी करीत असल्याचे प्रकार सर्रास घडतात. असे प्रकार रोखण्यासाठीे ‘पॉइंट ऑफ सेल’ उपकरण बसविण्याचा निर्णय अन्न व पुरवठा विभागाने घेतला आहे. तसेच भ्रष्टाचार रोखण्यासाठी पीओएस व्यवस्थाच ‘आधार’शी जोडून ती बायोमेट्रिक केली जाणार आहे. लाभार्थ्यांचे आधार क्रमांक संलग्नित केले असून, बायोमेट्र‌िक पद्धतीने ओळख पटवून शिधावस्तूंचे वाटप केले जाईल. राज्यातील ५१ हजार ७२५ रास्तभाव दुकानांमध्ये हे उपकरण बसविण्यात येईल. संबंधित कार्डधारक, तसेच कार्डवर नावे असलेल्या तीन व्यक्तींची या पीओएसवर नोंद असेल. त्यापैकी कुणीही व्यक्ती धान्य खरेदी करून आणू शकेल.

ही कामे करू शकणार
बँकांच्या लहान ठेवी गोळा करणे, बँकांच्या लहान ठेवी गोळा करणे, ग्राहकांच्या पॉल‌िसी काढून देणे, बँकांची थकीत वसुली तसेच बँक लोनचे हप्ते भरून घेणे, बचतगटांना बँकांमार्फत अर्थसहाय्य पुरविणे, पेन्शन काढून देणे, मोबाइल, टीव्ही रिचार्ज करणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संघर्ष मोर्चात लाखोंचा जनसमुदाय

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

गावाबाहेर राहत असलेले दलित आदिवासी, भटके विमुक्त हे जसे जाती व्यवस्थेचे बळी आहेत. त्याचप्रमाणे गावामधील माळी, साळी, कोळी, लोहार ओबीसी जातीदेखील व्यवस्थेचे बळी ठरले आहेत. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या वंचित असलेल्यांसाठी घटनात्मक तरतूद करून ठेवली आहे. त्यानुसारच मंडल आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र गेल्या चाळीस वर्षांत मंडल आयोगाची संपूर्ण अंमलबजावणी होऊ शकली नाही. म्हणूनच आज दलित आदिवासींवर अन्याय व अत्याचार होत आहेत, अशा प्रतिक्रिया मोर्चात व्यक्त करण्यात आल्या.

आता परिवर्तनाची आणि प्रबोधनाची लढाई करावी लागणार आहे. तसेच रस्त्यावर उतल्याशिवाय व संघर्ष करून मागण्या मागाव्या लागत आहेत. जर अॅट्रॉसिटी कायदा प्रभावीपणे राबविला गेला तर दलित आदिवासींनाच नाही तर इतरांनादेखील न्याय मिळणार आहे. धुळ्यात शनिवारी (दि. २६) दलित अॅट्रॉसिटी संघर्ष मोर्चाच्या निमित्ताने भाषणातून या प्रतिक्रिया समोर आल्या. यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन प्रातिनिधिक स्वरूपात मोर्चातील पाच युवतींनी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना दिले. शहरातील निघालेल्या या मोर्चात जिल्ह्यातून सुमारे दोन लाख मोर्चेकरी सहभागी झाले होते.

अॅट्रॉसिटी कायदा संरक्षण समितीतर्फे शनिवारी सकाळी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून महामोर्चाला सुरुवात झाली. तत्पूर्वी २६/११ हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अत्यंत शिस्तीने मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चाचे रूपांतर जिल्हा मध्यवर्ती कारागृहसमोर दुपारी एक वाजता सभेत झाले. मोर्चात दलित आदिवासींसह समाजातील लोकांसह स्थानिक राजकीय नेते, वकील, डॉक्टर, प्राध्यापक यांची सहभाग होता. जिल्हा पोलिस प्रशासनाकडून नऊशे पोलिस अधिकारी व कर्मचारी शहरात तैनात करण्यात आले होते. तर शहरातील पंधरा शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रचारतोफा थंडावल्या; आज मतदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील सटाणा, सिन्नर, नांदगाव, मनमाड, येवला आणि भगूर या सहा नगरपालिकांसाठी रविवारी मतदान होणार आहे. यावेळी थेट नगराध्यक्ष निवडणुकीसाठी सहा नगरपालिकांतून एकूण ३२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे ३२ पैकी कोणते सहा उमेदवार थेट नगराध्यक्ष होतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सोमवारी ‌मतमोजणी होणार आहे.

गेल्या दीड दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील या सहाही ‌शहरांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आरक्षण सोडत निघाल्यानंतर अनेकांनी आपापल्या परीने जनसंपर्क आणि पक्ष श्रेष्ठींशी जवळीक साधत उमेदवारी पदरात पाडून घेतली. थेट नगराध्यक्षपदीसाठी ‌या सहाही शहरांपैकी सर्वाधिक उमेदवार मनमाड नगरपालिकेत रिंगणात उभे आहेत. येथे तब्बल आठ उमेदवार थेट नगराध्यक्षपदासाठी ‌उभे आहेत. भ्गूर नगरपालिकेत तीन, येवल्यात सहा, सटाण्यात पाच, सिन्नरमध्ये पाच, नांदगावमध्ये पाच असे एकूण ३२ उमेदवार रिंगणात आहेत.

प्रचारादरम्यान भाजपने मतदारांना आपल्याकडे ओढण्यासाठी शहराच्या विकासाकरिता तब्बल २०० कोटींच्या पॅकेजचे आश्वासन दिले आहेत. तर शिवसेनाकडून अनेक दिग्गजांनी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण असे समिकरण मांडत विकासाचे स्वप्न ‌दाखवले आहे. काँग्रेसकडून अनेक ठिकाणी भाजपला टार्गेट करत प्रचारसभांमध्ये थेट आरोप करण्यात आले.

तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचे आयते कोलीत हातात सापडल्यामुळे सगळ्याच पक्षांकडून भाजपवर चांगलीच चिखलफेक करण्यात आली. राष्ट्रवादीकडूनही ग्रामीण भागाशी आपली नाळ अधिक जोडली गेल्याचे सांगून मतदारांच्या हृदयाला हात घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

येथे होणार मतमोजणी
भगूर माऊली समाजमंदिर हॉल, विहितगाव, नाशिकरोड

मनमाड वर्धमान बरडिया सार्वजनिक वाचनालय, मनाड

नांदगाव शासकीय इमारत हॉल, नवीन तहसील नांदगाव

सिन्नर जीएमडी कॉलेज, सिन्नर

सटाणा नवीन प्रशासकीय इमारत, सटाणा

येवला नगरपालिका सभागृह, येवला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेशिस्तीला दंडाचा उतारा !

$
0
0


कर्तव्य आणि अधिकार यांची सांगड निसटत चालली आहे. अधिकारांची जाणिव ठेवणारे, त्यासाठी सदैव दक्ष असणारे मात्र कर्तव्याचे पालन करायचे म्हटले की, हात झटकून मोकळे होतात. व्यक्ती अधिकारांचा थेट संबंध स्वातंत्र्याशी जोडला जातो. तर, कर्तव्य भावना मात्र, जबाबदारीतून निर्माण होते. बेजबाबदारपणा वाढला की कायद्याची सक्त अंमलबजावणी करून समाज व्यवस्था कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. नाशिक शहर पोलिसांचे सध्या हेच सुरू आहे. जबर दंड, स्वयंशिस्त या माध्यमातून बेशिस्तीला आळा बसवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जबर दंडाचा हा उतारा कसा आणि किती प्रभावशाली ठरतो, हे आगामी काळातच स्पष्ट होईल.

अरविंद जाधव

वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजले की, त्या शहरात भोंगळ कारभार सुरू होतो. शहराचे नाव बदनाम होते. सुदैवाने नाशिक शहरात मुंबई किंवा पुणे या शहरांसारखी परिस्थिती नाही. पण, आपली वाटचाल मात्र त्या दिशेने सुरू झाली आहे, हे तेवढेच खरे. दरवर्षी लाखो नवीन वाहने रस्त्यावर येत असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील ताण कायम आहे. रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भक्कम करायलाच हवी. आज शहरातील द्वारका, कॅनडा कॉर्नर, शालिमार, इंदिरानगर अंडरपास, सातपूर गाव, अशोक स्तंभ, किंवा जेहान सर्कल, नाशिकरोड, उपनगर जंक्शन तसेच नव्याने विकस‌ित झालेला गोविंदनगर रस्ता अशा कोणत्या ठिकाणी कधी आणि काय अडथळा निर्माण होईल, याची शाश्वती राहिलेली नाही. सकाळ किंवा संध्याकाळच्या सुमारास काही मिनीटातच वाहनांच्या लांबच रांग लागतात. ‘शहाणे’ म्हणणारे वाहनचालक आपली ‘हुशारी’ दाखवत वाहन पुढे दामटण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर होणारा जॅम मात्र, कित्येक तास हलत नाही. यात, शाळेतून परतणारा विद्यार्थी असो की, पेशंटला घेऊन जाणारी अॅम्ब्युलन्स, सगळेच अडकून पडतात. शहरातील वाहतुकीचे हे चित्र वाहनचालकांच्या अंगवळणी पडण्याची भीती वाटू लागली आहे. बेशिस्त, नियमांची मोडतोड करून काही वर्षे चालणाऱ्या वाहतुकीला पुन्हा शिस्त लागण्याची सुतराम शक्यता नसते. बेशिस्तीतून मिळणारे अधिकार हेच स्वातंत्र्य असल्याची अनभुती म्हणून उपभोगले जातात. त्याला विरोध झाला की, मोठा गट विरोध करण्यास सज्ज होतो. नाशिक शहरात बेशिस्त वाहतुकीचे ओंगळवाणे चित्र दिसत असले तरी त्यावर पोलिसांचा किमान कंट्रोल आहे. पोलिसांना या धाकातूनच वाहतुकीला शिस्त लावण्याचे मोठे काम पार पाडावे लागणार आहे.

काही दिवसांपूर्वी शहर पोलिसांनी वाहतूक परिषदेचे आयोजन केले होते. सर्वसामान्य नागरिकांबरोबर, विविध क्षेत्रातील मान्यवरांना बैठकीत पाचारण करण्यात आले होते. त्यांच्याकडून आलेल्या सूचनांचा पाऊस झेलताना पोलिसांची भंबेरी उडाली. अर्थात, वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी मोठ्या दंडाची तरतूद करण्याची पोलिसांची योजना यामुळे सिध्द झाली. ‘वाहतूक बेशिस्त आहे ना मग मोठ्या रक्कमेचा दंड भरण्यास तयार रहा,’ असा इशारा देत पोलिसांनी आपली कारवाई सुरू देखील केली. नोटाबंदीच्या नावाखाली शहाणपणा करणाऱ्या वाहनचालकांना वाव मिळू नये, याची पोलिसांनी खबरदारी घेतली. यासाठी १० ते १२ स्वाईप मशिनही उपलब्ध करून घेण्यात आल्या. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना आर्थिक दंडामुळे चाप बसेल काय हे आगामी काळात स्पष्ट होईल. मात्र, नियम सर्वांना समान असतात, हे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दाखवून देण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांनीच वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केले तर कारवाई कोणावर करायची, असा त्यामागील त्यांचा हेतू आहे. गस्ती पथकावरील पोलिसांनी चारचाकीत बसताना शीट बेल्ट लावावा. सिग्नलचे नियम पाळावेत, दुचाकीवर फिरणाऱ्या पोलिसांनी हेल्मेट परिधान करावे, अशा सूचनांचा मोठा डोसच पोलिस आयुक्तांनी दिला आहे. वर्दीवरील पोलिस जे करतील, त्याचे अनुकरण करण्याचा एक दबाव सर्वसामान्य नागरिकांवर यामुळे निर्माण होईल. पोलिसांना शिस्त लागली की, सर्वसामान्यांना वाहतूक नियमांच्या उल्लंघनावरून वादविवाद करण्यास वाव राहणार नाही, अशी पोलिस आयुक्तांची भूमिका असावी.

वास्तविक, वाहतूक व्यवस्था कोलमडून पडण्यामध्ये महापालिकेची भूमिका सर्वांत महत्त्वाची ठरते. रस्ते तयार करताना वाहतूक मॅनेजमेंटचा कोणताही विचार केला जात नाही. एकदा रस्ता तयार झाला की त्यावर महापालिकेच्या ‘कृपेने’ अतिक्रमण केले जाते. इमारतींच्या पार्किंगमध्ये सर्वांसमक्ष गाळे तयार केले जातात. कम्पलिशन सर्टिफिटेक देणाऱ्या नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संमतीने हे होत नाही, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरेल. वाहनचालकांच्या दृष्टीने आज सर्वांत महत्त्वाचा मुद्दा पार्किंगचा असून, महापालिका प्रशासनाने एक विशेष मोहीम म्हणून त्याकडे लक्ष पुरवायला हवे. सर्व प्रकारच्या सुविधा पुरविल्यानंतर पार्किंगसारखी समस्या उभी राहिली तर एक हजारच काय दहा हजार रूपये दंडाची तरतूद करणे उचित ठरेल. आज, शहरातील बहुतांश ठिकाणी पार्किंगच आढळून येत नाही. रस्त्यावर वाहने पार्क झाली की टोईंग व्हॅनवरील कर्मचारी वाहन घेऊन जातात. टोईंग व्हॅन हा देखील एक गंमतीचा विषय आहे. सर्वसामान्यांच्या मनात कायद्याबाबत भीती निर्माण व्हावी, केलेला गुन्हा पुन्हा होणार नाही याची जाणीव निर्माण व्हावी, या हेतूने सुरू झालेली एखादी मोहीम समजण्यासारखी आहे. मात्र, टोईंग व्हॅन हा वाहतूक पोलिसांसह सर्वसामान्यांना मनस्ताप देणारा विषय ठरतो आहे. अत्यंत चुकीच्या पध्दतीने वाहने जमा करून वाहन चालकांच्या खिशाला चाट देण्याचा हा प्रकार त्वरीत बंद होणे अपेक्षित आहे. अगदी गळीबोळातील वाहने उचलून त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. यामुळे वाहतूक व्यवस्थेबाबत आदर निर्माण होण्याऐवजी सर्वसामान्य व्यक्ती शिव्यांची लाखोली वाहून कायद्याला आव्हान देण्यास सज्ज होतात. कधी चार चाकी वाहनांना रस्त्यावरून हटवले जाते तर कधी त्याची दखलही कोणी घेत नाही. कारवाईतील हा सावळा गोंधळ वाहनचालकांनी का सहन करावा? वाहतूक विभाग मागील काही वर्षांपासून कात टाकतो आहे. नवनवीन योजना, आधुनिक उपकरणे, तंत्रज्ञान यामुळे बेशिस्त वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नव्याने अनेक प्रस्ताव तयार केले जात असून, या कारवाईत पारदर्शकता निर्माण करण्याची जबाबदारी पोलिस आयुक्तांनी पार पाडायला हवी. टोईंग केलेले वाहन रस्त्यावर अडथळा निर्माण करीत होते, याचे सबळ पुरावे ठेकेदाराने सादर केले तर वाहनचालक वाद घालणारच नाही. मात्र, चक्कर मारल्यानंतर डिझेल तरी सुटायला हवे, या मानसिकतेतून काम होते. त्यातून आपसूकच भ्रष्टाचाराचा भस्मासूर तयार होतो आहे. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई व्हायलाच हवी. बेशिस्त वाहनचालकांची संख्या कमी झाल्यास वाहतुकीला शिस्त लागेल. शहरात चांगले चित्र निर्माण होईल. मात्र, त्यासाठी पोलिसांनी कारवाईत पारदर्शकता निर्माण करणे आवश्यक आहे. दुसरीकडे महापालिकेने आपली जबाबदारी एक मशिन म्हणून पार पाडल्यास नाशिकची वाटचाल खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने होईल.

arvind.jadhav@timesgroup.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​अस्तित्वाची लढाई

$
0
0


अनिल पवार

जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत. भुजबळ यांच्या मतदारसंघातील मनमाड, नांदगाव व येवला येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (भुजबळ) अस्तित्वाची लढाई आहे, तर स्‍थानिक स्वराज्य संस्‍थांमध्ये भाजप भक्कम पाय रोवणार का? या दोन्ही गोष्टींचा फैसला करणारी ही निवडणूक आहे. यामुळे सर्वच पक्षांनी प्रचारात भाजपला टार्गेट केले. याशिवाय आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक सर्व पक्षांसाठी रंगीत तालिम ठरणार आहे.

‌थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळे यंदाच्या नगरपालिका निवडणुका लक्षवेधी ठरल्या आहेत. जिल्ह्यात मनमाड, नांदगाव, येवला, सिन्नर, सटाणा व भगूर या सहा नगरपालिकांसाठी मतदान होणार आहे. या सहाही नगरपालिका निवडणुका भाजपसाठी लक्षवेधी ठरल्या आहेत. कारण ग्रामीण भागात भाजपची ताकद वाढणार की काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना आपला जनाधार टिकून ठेवणार याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे. केंद्र व राज्यात सत्ता मिळविल्यानंतर भाजपने ग्रामीण भागात पक्ष वाढीवर भर दिला आहे. त्यादृष्टीने नगरपालिका निवडणुका व आगामी जिल्हा परिषद निवडणुकांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

ग्रामीण भागात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेइतकी भाजपची ताकद नाही. असे असूनही सर्व पक्षांनी नगरपालिका निवडणुकीत भाजपला टार्गेट केले आहे. विरोधी पक्षांच्या स्टार प्रचारकांनी फक्त नोटाबंदी आणि मोदी व फडणवीस सरकार कसे सर्वसामान्यांच्या विरोधातले आहे, यावर जोर दिला. नोटाबंदी करून सरकारने सर्वसामान्यांची कशी अडचण केली, या किस्स्यांवर प्रचाराचा जोर राहिला. मात्र भाजपच्या स्टार प्रचारकांनी नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन करण्याबरोबरच विकासकामांवर भर देण्याचा मनसुबा व्यक्त केला. यामुळे सेना असो की काँग्रेस-राष्ट्रवादी यांचे पहिले ध्येय हे भाजपला रोखण्याचे असल्याचे दिसून आले आहे.

नाशिक शहरात भाजपचे तीन आमदार असले तरी ग्रामीण भागाचा विचार केला तर एकच आमदार आहे. विशेष करून सिन्नर व भगूर क्षेत्रात शिवसेनेचे, तर मनमाड, नांदगाव, येवला व सटाणा येथे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. यामुळे शिवसेना व राष्ट्रवादीच्या या सत्तास्थानावर भाजपने लक्ष केंद्रित केल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे या नेत्यांनी जिल्ह्यात हजेरी लावून भाजपतर्फे प्रचारात कुठलीच कसर ठेवली नाही. मनमाड, नांदगाव येथील पाणीप्रश्नावर भाजपने बोट ठेवत राष्ट्रवादीच्या अपयशाचा पाढा वाचण्याबरोबरच आमच्याशिवाय हा प्रश्न सुटूच शकणार नाही, असा सूर आळवला. यामुळे मतदार या आश्वासनांना कितपत साथ देतात, यावर भाजपच्या यशाचे गणित ठरणार आहे. याशिवाय नोटाबंदीच्या विषयावरही मंत्रीमहोदयांनी जनतेचा कौल घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे नोटाबंदीचा निर्णय भाजपला तारक ठरणार की मारक हे निवडणुकीत दिसून येणार आहे.

ताकद कमी असूनही येवला वगळता भाजप सर्वत्र स्वबळावर लढत आहे. विशेष म्हणजे भाजपने सर्व जागांवर उमेदवार दिले, तर इतर विरोधी पक्षांना उमेदवारांची शोधाशोध करावी लागली, हे विशेष. स्‍थानिक सत्ताधारी पक्षांवर काही अपक्षांना पुरस्कृत करण्याची वेळ आली. यावरून ग्रामीण भागात भाजपची ताकद वाढत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे जिल्ह्यातील सहापैकी किती नगरपालिकांमध्ये कमळ फुलेल हे पक्षवाढीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. विरोधी पक्षांकडून उरल्यासुरल्या स्‍थानिक स्वराज्य संस्थाही काबीज करण्यात भाजप कितपत यशस्वी होतो, याचा निकाल लागणार आहे.

सिन्नर व भगूर वगळता मनमाड, नांदगाव, येवला व सटाणा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून, नगरपालिकांमधील सत्ताधारी पक्ष आहे. मात्र भुजबळांच्या जेलवारीमुळे राष्ट्रवादीचे बरेच मोहरे गळाले असून, भाजप व सेनावासी झाले आहेत. यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या घटली आहे. नांदगावमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असली तरी मनमाड व येवल्यात ते आमनेसामने आहेत. माजी मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ हे तुरुंगात असल्याने छोट्या भुजबळांवर म्हणजे पंकज भुजबळांच्या खांद्यावर प्रचाराची जबाबदारी होती. पंकज भुजबळांनी मनमाड, नांदगाव व येवल्यात प्रचाररॅली व सभा घेऊन मतदारांना पाठीशी राहण्याचे भावनिक आवाहन केले. स्वतःला भुजबळ समजून जोमाने कामाला लागा, असे आवाहनही केले. आमदार पंकज भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस प्रथमच निवडणूक लढवित असल्याने मतदार त्यांच्या भावनिक आवाहनाला कितपत दाद देतात, हे या निवडणुकीवरून स्पष्ट होणारच आहे. मनमाड, नांदगाव व येवला व सटाणा या ठिकाणी काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण या दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. राष्ट्रवादीतर्फे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जितेंद्र आव्हाड, प्रवक्ते नवाब मलिक, निरंजन डावखरे, फौजिया खान या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी प्रचारसभांमध्ये रंग आणण्याचा प्रयत्न केला. मात्र वरिष्ठ नेत्यांचा दुष्काळ दिसून आला. भुजबळांच्या अनुपस्थितीत जणू वरिष्ठ नेत्यांनी नाशिककडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. याशिवाय पक्षांतराचा फटका राष्ट्रवादीला बसला आहे. यामुळे सत्ता राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कितपत यशस्वी होते हे निकालानंतर स्पष्ट होईल. मात्र लढाई सोपी नाही, हे राष्ट्रवादीला कळून चुकले आहे. जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी वेळोवेळी राष्ट्रवादीला बळकट करण्याचे प्रयत्न केले खरे पण कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचा अभाव दिसून आला. सेनापतीच तुरुंगात असल्याने राष्ट्रवादीला मरगळ आल्याचे दिसून आले.

भगूरमध्ये गेल्या वीस वर्षांपासून शिवसेनेची वर्चस्व असून, सत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. येथे भाजप-सेना नेहमी आमनेसामने असल्या तरी सेनेचीच हुकूमत राहिली आहे. याशिवाय आघाडीच्या उमेदवारामुळे तिरंगी सामना होत आहे. शिवसेनेतर्फेही ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे, प्रा. नितीन बानगुडे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, हाजी अराफत यांनी प्रचाराचे रण तापविण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठ्या नेत्यांनी जिल्ह्याकडे दुर्लक्ष केले. ग्रामीण भागात शिवसेना नेहमीच आघाडीवर राहिली आहे. मात्र, यावेळी त्यांना भाजपचा सामना करावा लागत आहे.

सिन्नरमध्ये माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पहिल्यांदा निवडणूक लढत आहे. आमदार राजाभाऊ वाजे विधानसभेप्रमाणे कोकाटेंना शह देण्यात यशस्वी होणार का? याबाबत उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. येथे होणारी निवडणूक ही पक्षाऐवजी व्यक्तिसापेक्ष होत आहे. यामुळे सेना-भाजपपेक्षा कोकाटे की वाजे यावर लक्ष लागले आहे. सिन्नरमध्ये सेना-भाजप आमनेसामने असले तरी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी करून आव्हान निर्माण केले आहे. तथापि, कोकाटेंच्या माध्यमातून भाजपला सिन्नर तालुक्यात भक्कम पाय रोवण्याची मोठी संधी मिळाली आहे, हे नाकारून चालणार नाही. याचमुळे मुख्यमंत्र्यांची सभा येथे लक्षवेधी ठरली.

सटाणा नगरपालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला सर्व जागांवर उमेदवार उभे करता येऊ नये, ही मोठी खेदाची बाब आहे. याउलट भाजपने पहिल्यांदाच सर्वच्या सर्व जागा लढवत आव्हान निर्माण केले आहे. यामुळे दहा वर्षांची सत्ता टिकविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पर्यायाने माजी आमदार संजय चव्हाण व विद्यमान आमदार दीपिका चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. माजी मंत्री सुनील तटकरे यांनी सटाण्यात सभा घेऊन वातावरण निर्मिती केली. मात्र भाजपचे केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी या निवडणुकीवर विशेष लक्ष केंद्रित करीत राष्ट्रवादीला रोखण्यासाठी कुठलीही कसर ठेवलेली नाही. अगदी सुरुवातीपासूनच डॉ. भामरे यांनी या निवडणुकीत लक्ष घातले. यामुळे सटाण्यात भाजप विरुध्द राष्ट्रवादी असा सामना रंगला आहे. एकूणच ग्रामीण भागात पाय रोवण्यासाठी भाजपला नगरपालिका निवडणुकीमुळे संधी मिळाली आहे. या संधीचे भाजप सोने करणार का याचा फैसला लवकरच लागणार आहे.

anil.pawar@timesgroup.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चलनबंदीने व्यवहारकोंडी!

$
0
0

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : @PravinbidveMT
नाशिक : पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाचा फटका मुद्रांक विक्रेत्यांनाही बसला असून, गेल्या तीन आठवड्यांपासून मुद्रांकांद्वारे होणारे व्यवहार ठप्प झाले आहेत. राज्यातील चार हजार मुद्रांक विक्रेते आणि तेवढ्याच दस्तलेखकांकडे नागरिकांनी पाठ फिरविली असून, कोट्यवधींचे व्यवहार खोळंबले आहेत. परिणामी चलनबंदी नव्हे, दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती दिसून येत आहे.

हजार रुपयांहून अधिक व शंभर रुपयांहून कमी किमतीचे मुद्रांक सरकारने व्यवहारातून यापूर्वीच कायमचे बाद केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर व्यवहारात शंभर आणि पाचशेच्या नोटांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. नाशिकसह राज्यात अनेक ठिकाणी अद्याप पाचशेच्या नोटेचे नागरिकांना दर्शनच झालेले नाही. चलनबंदी आणि चलन तुटवड्यामुळे राज्यात मुद्रांक व्यवसायालाही खीळ बसली आहे. उपलब्ध शंभराच्या नोटा मुद्रांकाच्या खरेदीत घालविण्यापेक्षा मुद्रांकाशी संबंधित कामे पुढे ढकलण्यासच नागरिक पसंती देऊ लागले आहेत. मुद्रांकांची विक्रीच मंदावल्याने दस्तलेखक, अर्ज लेखक, पिटिशन रायटर्सच्या हाताचे काम हिरावले गेले आहे. त्यामुळे ‘दुष्काळात तेरावा’ या उक्तीचा अनुभव या व्यावसायिकांना घ्यावा लागतो आहे. राज्य सरकारने २३ जानेवारी २०१५ रोजी काढलेल्या एका परिपत्रकानुसार १ हजार रुपये व त्यापुढील मुद्रांकांची छपाई, पुरवठा आणि विक्री कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहे. याखेरीज शंभर रुपयांच्या आतील स्टॅम्पही बंद झाले असून, मुद्रांक व्यवसायाची सर्व भिस्त शंभर आणि पाचशे रुपये किमतीच्या मुद्रांकांवर अवलंबून आहे. हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्याने नाशिक जिल्ह्यातील अडीचशे, तर राज्यातील साडेचार हजार मुद्रक, तसेच तेवढ्याच दस्तलेखकांचा व्यवसाय अडचणीत आला आहे.

घरभाडे करार, महापालिका व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित करार, विवाह नोंदणी, जात पडताळणी कार्यालये, कोर्ट, बँका, पतसंस्था आणि जेथे जेथे अफेडेव्हिट करून देणे बंधनकारक आहे, अशी सर्वच कामे पुढे ढकलण्यास नागरिकांकडून प्राधान्य दिले जात आहे.


मुद्रांकांची विक्री रखडली

एकट्या नाशिक जिल्ह्यात एक मुद्रांक परवानाधारक दररोज सरासरी २५ मुद्रांकांची विक्री करतो. जिल्ह्यात २५० मुद्रांकविक्रेते असून, दररोज सहा ते साडेसहा हजार मुद्रांकांची विक्री होते. मुद्रांक विक्रीचे तुरळक व्यवहार सुरू असले, तरी एकट्या नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांत सुमारे एक लाख मुद्रांकांची विक्री होऊ शकली नसल्याचा दावा विक्रेत्यांकडून केला जातो आहे. राज्यात दररोज काही लाख मुद्रांकांची विक्री होते. ही विक्री ठप्प झाली असून, विक्रेते आणि दस्तलेखकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

शंभराच्या नोटांच्या तुटवड्यामुळे लोकांनी कामाचा प्राधान्यक्रम बदलला आहे. मुद्रांक खरेदी व तत्सम कामे पुढे ढकलली जात असल्याने विक्रेते व दस्तलेखक बसून आहेत. दोन हजार रुपयांची नोट देणाऱ्यांना सुटे देणे शक्य होत नसल्यानेदेखील व्यवसायावर विपरित परिणाम झाला आहे.

-सलीम काझी, राज्याध्यक्ष, शासकीय परवानाधारक मुद्रांक विक्रेता आणि दस्तलेखक संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या नोटा मुंबईकरांच्या खिशात

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात ५२५ राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांमध्ये बहुतांश बँका कॅश शाॅर्टेजच्या प्रश्नामुळे ठप्प पडल्या असताना जिल्ह्यातून काही बँकांनी मात्र मुंबईच्या कॅशचा प्राॅब्लेम सोडवण्यासाठी ३०५ कोटी रुपये शिल्लक रकमतेून पाठवल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात कॅश शाॅर्टेजच्या प्रश्नामुळे ग्राहकही त्रस्त असतानाच्या स्थितीत ही रक्कम कशी पाठवण्यात आली, असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे. पण, हा बँकांचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगत इतर जण या विषयावर बोलणे टाळत आहेत.

मुंबईला पाठवलेल्या या नोटांमध्ये करन्सी प्रेसच्या नोटांचा कोणताही संबंध नाही. पाचशे व हजारांच्या नोटा बाद झाल्यानंतर जिल्ह्यात काही बँकांकडे मोठ्या प्रमाणात कॅश होती, तर काही बँकांत मात्र खडखडाट होता. त्यामुळे ज्या बँकेत शिल्लक कॅश होती त्यांनी ती मुंबईला पाठवून तेथील प्रश्न तात्पुरता सोडवला. ही कॅश पाठवण्यासाठी जिल्ह्यातील काही बँकांच्या शाखांतून ती गोळा केल्याचेही बोलले जात आहे. त्यासाठी विशेष सुरक्षा घेण्यात आली होती.

विशेष म्हणजे नोटा बाद झाल्यानंतर पाचव्या-सहाव्या दिवशीच हे पैसे पाठवण्यात आले. त्यामुळे मुंबईचा प्रश्न काहीअंशी सुटला, पण नाशिककरांचा प्रश्न मात्र कायम राहिला. एकीकडे मुंबईत पैसे पाठवले जात असताना दुसऱ्या एका बँकेने आपल्याकडे असणारे अतिरिक्त पैसे दुसऱ्या बँकेच्या करन्सी चेस्टमध्ये टाकले. त्यानंतर ते दुसऱ्या जिल्ह्यातील शाखेत मिळाले की नाहीत, हे कळू शकले नाही. पण, जिल्ह्यात नोटा रद्द होण्याअगोदरच मोठी कॅश होती हेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.



पद्धतीचा फटका

कॅश शाॅर्टेज झाल्यानंतर त्याचे समान वाटप होत नसल्याचा मुद्दा समोर ठेवून जिल्हाधिकाऱ्यांनी समान वाटपाचे अधिकार मिळावेत, यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. पण, बँकांवर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण असल्यामुळे तो अधिकार मिळेल की नाही हा प्रश्न असला, तरी जिल्ह्यातील बँकेत पैसे असमान पद्धतीने आले ही गोष्ट मात्र लपली नाही. त्यामुळे अनेक बँकांना ग्राहकांचा रोष सहन करावा लागला. त्यातून हा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यानंतरही ही कॅश मुंबईला पाठवणे ही गोष्ट संतापात भर टाकणारी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images