Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मनसे पदाधिकाऱ्याकडून व्यावसायिकास मारहाण

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुकानासमोरील बोर्ड का हटवला, या किरकोळ कारणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्याने कम्प्युटर व्यावसायिकास बेदम मारहाण केल्याची घटना अशोकस्तंभ परिसरात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये परस्पर विरोधी तक्रार देण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेचा निषेध करीत शुक्रवारी शहरातील कम्प्युटर व्यावसायिकांनी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व निवेदन सादर करून संबंधीत पदाधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

सत्यम खंडाळे, असे संशयित मनसे पदाधिकाऱ्याचे नाव आहे. खंडाळे मनसेच्या शहर सरचिटणीस पदाचे काम पाहतात. अशोक स्तंभ भागातील संचेती टॉवर्समध्ये फिर्यादी अमीत पवार यांचे फोनिक्स कॉम्प्युटर नावाचे दुकान आहे. संचेती टॉवर्स सोसायटीचे पदाधिकारी म्हणून पवार काम पाहतात. संचेती टॉवर्समध्ये संशयित सत्यम खंडाळे यांनी काही बॅनर्स व गणेशोत्सवाचे साहित्य ठेवलेले होते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अमृत पवार यांनी सदरच्या वस्तू साफ-सफाईसाठी इतरत्र हलविल्याने वादाला सुरूवात झाली.

खंडाळे व त्याच्या काही साथिदारांनी गुरूवारी सकाळी पवार यांचे दुकानात येऊन भांडण सुरू केले. यावेळी दोघा साथीदारांच्या मदतीने व्यावसायिक पवार यांना बेदम मारहाण केली. यानंतर पवार व खंडाळे या दोघांनी सरकारवाडा पोलिस स्टेशन गाठून एकमेकांविरोधात तक्रार दिली. दरम्यान, शहरातील कम्प्युटर व्यावसायिकांच्या नाशिक कॅम्प्युटर असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी या घटनेचा निषेध करीत सरकारवाडा पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज सादर केले. तसेच पवार यांना मारहाण झाल्याचे फुटेजमधून स्पष्ट होत असल्याने संबंधीतावर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

खंडाळे आणि आमच्या सोसायटीचा काही संबंध नाही. सार्वजनीक गणेशोत्सवा दरम्यान आमच्याकडून बळजबरी पैसे वसूल केले जातात. खंडाळे यांचे काही सामान अडचण होती म्हणून हलवले तर गुरूवारी त्याच्या काही साथिदारासमवेत मला बेदम मारहाण केली. त्याचा पुरावा म्हणून सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या स्वाधीन केले आहेत.
- अमित पवार, तक्रारदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हयातीच्या दाखल्याऐवजी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

निवृत्तीवेतनधारकांना दरमहा प्राप्त होणारे निवृत्तीवेतन नियमितपणे सुरू राहण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबरमध्ये हयातीचे प्रमाणपत्र बँकेत अथवा थेट जिल्हा कोषागारमध्ये जमा करावे लागते.पण आता हे हयातीचे प्रमाणपत्र घेण्याची गरज राहणार नाही. ओळख व जिवंत असल्याचे प्रमाण देण्यासाठी बायोमेट्रिक व आयरीस यंत्राचा वापर करून बोटाचे ठसे व डोळ्यांची प्रतिमा घेतल्यानंतर वेतन थेट बँकेत जमा होणार आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबतचे काम आता पूर्णत्वाच्या मार्गावर असून येत्या काही महिन्यात डिजिटल लाईफ सर्टिफिकेटने आता वेतन मिळणार आहे.

केंद्र सरकारने डिजिटल लाईफ सर्टिफिकेट संगणकीय पध्दतीने हयातीचे दाखले स्वीकारण्याची योजना केली. त्यासाठी जीवन प्रमाण (www.jivanpramaan.gov.in) या नावाने वेबपोर्टल तयार केले आहे. आता या वेबपोर्टलला राज्य सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांना देखील हयातीचे दाखले देण्यासाठी संलग्न करण्यात आले आाहे. त्यामुळे येत्या काही दिवसात हयातीचे दाखल्याचा विषय सोपा होणार आहे.या वेबपोर्टलमुळे राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांना हयातीचे दाखले देण्यासाठी बायोमेट्रिक म्हणजे त्यांच्या बोटांचे ठसे किंवा त्यांच्या डोळ्यातील आयरीस या यंत्रावर ठेवून संबंधित निवृत्तीवेतनधारकाची ओळख पटविण्याते येणे शक्य होणार आहे. त्यासाठी आधार कार्ड बनवतांना दिलेले बोटाचे ठसे किंवा डोळ्यातील आयरीस यांच्या प्रतिमांचा मेळ घालून ही ओळख पटविण्याची सुविधा या योजनेमध्ये वापरण्यात आलेली आहे. अहमदनगरसह इतर ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाने ही सुविधा सुरू केली आहे. नाशिकमध्ये सुध्दा ती लवकरच सुरू होणार आहे.

स्मार्टफोनचाही वापर शक्य
डिजिटल लाईफ सर्टिफिकेट योजनेत बोटाचे ठसे घेण्यासाठी बायोमेट्रिक यंत्राचा वापर केला जाणार असून हे यंत्र जिल्हा कोषागार किंवा तालुकास्तरावरील उपकोषागार कार्यालयामध्ये बसविण्यात येणार आहे. पुढे हेच यंत्र बँकेतसुध्दा वापरले जाणार आहे. त्यामुळे हयातीच्या दाखल्याचा विषय निकाली निघणार आहे. बायोमेट्रिक व आयरीस यंत्रे असलेल्या निवृत्तीधारकांना ही सर्व प्रक्रिया अॅन्ड्रॉइड स्मार्टफोन, टॅब किंवा कॉम्प्युटर्सद्वारे पूर्ण करता येणार आहे. ही आधुनिक सुविधा किचकट वाटत असेल तर पूर्वीप्रमाणेच हयातीची दाखले देता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ विचारवंत वसंत पळशीकर यांचं निधन

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणारे ज्येष्ठ विचारवंत व लेखक वसंत पळशीकर यांचं आज पहाटे प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. नाशिक येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे मुलगा माधव पळशीकर व परिवार आहे.

वसंत पळशीकर हे गेल्या अनेक वर्षांपासून अर्धांगवायूनं आजारी होते. या आजारपणातच त्यांचं निधन झालं. पळशीकर हे 'समाज प्रबोधन पत्रिका' व 'नवभारत' या नियतकालिकांचे संपादक होते. लोकशाही समाजवाद व त्या अनुषंगानं येणाऱ्या अनेक विषयांवर त्यांनी पुस्तकं लिहिली होती. मार्क्सवाद, समाजवाद तसेच फुले-आंबेडकरी विचारांच्या भूमिकांची त्यांनी केलेली अभ्यासपूर्ण मांडणी अनेकांना वेगळी दृष्टी देणारी ठरली. त्यांच्या निधनामुळं महाराष्ट्रातील एक स्वतंत्र विचार करणारा व करायला लावणारा मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

पळशीकर यांचा जन्म हैदराबादमधला. महात्मा गांधींच्या चळवळीतील वडिलांच्या संस्कारात ते वाढले. इंटरनंतर शिक्षण सोडून ते सामाजिक कार्याकडे वळले. गांधींजींच्या विचारांचा चिकित्सक स्वीकार त्यांनी केला. आचार्य विनोबा भावे, अण्णासाहेब सहसबुद्धे, साने गुरुजी, रावसाहेब आणि अच्युतराव पटवर्धन, बाबा आमटे अशा दिग्गजांचा सहवास त्यांना लाभला. भूदान आंदोलन, आनंदवन, ओरिसातील कोरापूर येथे सर्वसेवासंघाच्या कामात त्यांचा सक्रिय वाटा होता. सन १९५९मध्ये ते महाराष्ट्रात परतले आणि प्रबोधनाच्या कामाला त्यांनी वाहून घेतले होते. कार्यकर्त्यांची शिबिरे, वैचारिक परिषदा-संमेलने यात त्यांनी वेळोवेळी कळकळीने मार्गदर्शन केले. देशभरातील परिवर्तनवादी गट, प्रयोगशील संस्थांना त्यांची मांडणी नेहमीच मार्गदर्शक ठरली होती. संथ, अनाक्रमक शैली, पण ठाम युक्तिवाद हे त्यांचे वैशिष्ट्य होते. एकांगीपणा, साचेबद्ध गृहितांवर आधारित भोवतालच्या घटितांचा अर्थ लावण्याची खटपट, दुसऱ्याला निरुत्तर करण्यातील आनंद यापासून त्यांचे लेखन आणि संवाद कायम दूर राहिला.

पळशीकर यांची ग्रंथसंपदा

चौकटी बाहेरचे चिंतन
परिवर्तन विचार : चिंतन आणि चिकित्सा
जिहाद, गुलाल आणि सारीपाट
धर्म, धर्मश्रद्धा आणि अंधश्रद्धा
जमातवाद
पारंपारिक आणि आधुनिक शेती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मेड इन चायना’ धुळ्यातून हद्दपार

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

भारतातील दहशतवादी कारवायांना खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला चीनकडून सहकार्य मिळत असल्याने संतप्त भारतीयांनी चीनविरोधात बहिष्काराचे अस्त्र उपसले आहे. त्याचा एक भाग म्हणून धुळ्यातून चायना मेड फटाके, लायटिंग आणि शोभेच्या अनेक वस्तू हद्दपार करण्यात आल्या आहेत. फटाके विक्रेत्यांनी तर ‘चायना मेड’ खरेदी न करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. चीनला लक्षात राहील असा धडा शिकविण्यासाठी धुळेकर सरसावले आहेत. त्यासाठी त्यांनी बहिष्काराचे अस्त्र उपसत चायना मेड फटाक्यांना नाकारले आहे. यंदा हे फटाके स्पष्टपणे नाकारले जात आहे. फटाके कुठे तयार झाले आहेत याची चौकशी करून मगच ग्राहक ते खरेदी करत आहेत. फटाका विक्रेते संघटनेचे अध्यक्ष विजय काकंरिया यांनी सांगितले की, यंदा आम्ही चीनमधील फटाके विक्रीसाठी ठेवलेले नाहीत. अन्यत्र कुठे हे फटाके मिळत असतील, तर नागरिकांनीही ते नाकारावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा फटाक्यांच्या किंमतीत वाढ झाली नसल्याची माहिती विक्रेत्यांकडून देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयारामांमुळे निष्ठावंतांत चलबिचल

0
0


म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

महापालिकेच्या २०१७ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभागरचना व आरक्षण जाहीर झाल्यानंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या प्रभाग क्रमांक १८ मध्ये उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांत आयाराम-गयारामांमुळे निष्ठावंतांत चलबिचल सुरू झाली असून, उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्याने जवळपास सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची इच्छुकांची मनधरणी करताना दमछाक होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. असंख्य इच्छुकांनी आपली उमेदवारी पक्की समजून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न सुरू केले आहेत.

बंडास ठरणार कारणीभूत

ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर केलेल्यांना पक्षाने उमेदवारी दिल्यास निष्ठावान कार्यकर्त्यांची फरफट होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या प्रभागात बंडाचे निशाण फडकण्याची शक्यता जास्त आहे. आतापासुनच आयाराम-गयारामांसह पक्षाशी प्रामाणिक इच्छुकांनी आपली उमेदवारी निश्चित मानून प्रचाराचा श्रीगणेशाही केलेला आहे. त्यामुळे उमेदवारी देताना खासकरून भाजप व शिवसेना या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांपुढे पेच निर्माण होणार आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमीचा मुद्दा

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांनीही आपल्या उमेदवारीचा दावा केला असल्याने या प्रभागात मोठी चुरस राहणार आहे. मात्र, अशा इच्छुकांना कोणता राजकीय पक्ष उमेदवारी देतो याकडे सर्वच मतदारांचे लक्ष लागून राहणार आहे.

भाजपला दावेदारीचे ग्रहण

या प्रभागात भाजपला उमेदवारीच्या दावेदारीचे ग्रहणच लागणार आहे. भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून पक्षात आपली निष्ठावान कार्यकर्ता अशी ओळख निर्माण केलेल्या सचिन हांडगे व ओबीसी आघाडीचे शहराध्यक्ष विश्वजित शहाणे यांच्यात उमेदवारीसाठी संघर्ष सुरू झाला आहे. शहाणे यांनी महिलांच्या खुल्या जागेवरही उषा शहाणे यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे. विशाल संगमनेरे यांनीही भाजपत एंट्री मारली आहे. पक्षाच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षा मंदा फड, पोटनिवडणुकीत विजय मिळविलेल्या विद्यमान नगरसेविका मंदा ढिकले, निशा निरगुडे यांनीही उमेदवारीसाठी प्रबळ दावेदारी केली आहे. अनुसूचित जातीच्या आरक्षित जागेसाठीही प्रचंड वादग्रस्त व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले पवन पवार व भाजपचे राज्य कार्यकारिणी पदाधिकारी प्रा. शरद मोरे यांच्यात दावेदारी रंगणार आहे.

रुसलेले मनसेच्या जाळ्यात?

मनसेकडून वंदना बोराडे, शंकर बोराडे, संतोष पिल्ले यांनी जोरदार तयारी केली आहे. याशिवाय इतर राजकीय पक्षांत उमेदवारी न मिळालेले दुसऱ्या फळीतील इच्छुक मनसेच्या जाळ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. त्यात भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह काही पदाधिकारीही मनसेच्या संपर्कात आहेत.

राष्ट्रवादी, काँग्रेसमध्ये शांतता

राष्ट्रवादीकडून गौतम पगारे यांनी मोर्चेबांधणी सुरू केली असली, तरी या पक्षांच्या इच्छुकांची संख्या घटली आहे. या पक्षातील मातब्बरांनी पक्षाला ऐनवेळी सायोनारा केल्याने हे पक्ष अडचणीत आले आहेत.


शिवसेनेत रंगणार चुरस

विद्यमान नगरसेवक अशोक सातभाई, रंजना बोराडे, माजी नगरसेवक सुनील बोराडे, प्रकाश बोराडे यांनी उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठीच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्यापैकी उमेदवारी कोणाच्या पदरात गेल्यास शिवसेनेतील प्रामाणिक कार्यकर्त्यांची फळी नाराज होणार आहे. सुनील बोराडे यांच्या उमेदवारीला निफाडचे शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांचाही जोरदार पाठिंबा असल्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. सॉफ्ट राजकारणासाठी प्रसिद्ध असणाऱ्या रंजना बोराडे यांचीही उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तसे झाले, तर अशोक सातभाईंना मनसे सोडल्याचा पश्चाताप पदरात पाडून घेतल्याशिवाय गत्यंतर राहणार नाही. त्यामुळे या नाराज कार्यकर्त्यांची शिवसेना पदाधिकाऱ्यांना दाढी धरावी लागणार आहे. त्यांच्याशिवाय शिवसेनेतून विक्रम पोरजे, प्रदीप बोराडे, शिवराज्य पक्षातून शिवसेनेत आलेले संजय ढिकले, गेल्यावेळी पराभूत झालेल्या सिंधू ताकाटे, चित्रा ढिकले, डॉ. वृषाली नाठे, लता ढिकले, अनुसूचित जागेसाठी सुरेंद्र शेजवळ, विलास गायकवाड आदींनी उमेदवारीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. गेल्या वेळी मनसेच्या तिकिटावर निवडून आलेल्या व महापौरपदाच्या निवडीत पक्षाचा व्हीप झुगारून विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मत दिल्याचे सिद्ध झाल्याने नगरसेवकपदावर पाणी सोडावे लागलेल्या शोभना शिंदे यांच्यावर निवडणूक लढविण्यासाठी बंदी असली, तरी त्यांचे पती संजय शिंदे यांनीही उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हॉट्सअॅप युगात‘बल्क मेसेजस’!

0
0



कॉलेज क्लब रिपोर्टर

दिवाळीच्या सोशल मेसेजेससोबतच आता बल्क मेसेजही मोबाइलवर येत आहेत. सोशल मीडियाच्या जगात या बल्क मेसेजला प्राधान्य दिले जात आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांकडून हे बल्क मेसेज पाठवले जात आहेत. शहरातील प्रत्येक प्रभागात चार नगरसेवक निवडले जाणार आहेत. त्यामुळे अनेक जण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. याचे पडसाद आतापासून उमटत आहेत. प्रभागात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या मोबाइलवर दिवाळीच्या शुभेच्छा पाठवून इच्छुक उमेदवार आपली छाप पाडत आहेत. यासाठी बल्क मेसेजसची मदत घेतली जात असल्याचे दिसून आले आहे. नागरिकांचे इच्छुकांना मिळालेले मोबाइल क्रमांक व्हॉट्सअॅपचे असतीलच असे नाही, याच सोबत अनेकांकडे स्मार्टफोन नसेलही या हेतूने हे बल्क मेसेज पाठवले जात आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या मोबाइलवर ‘दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, आपला...!’ असे टेक्स्ट मेसेज दिवाळीनिमित्त येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नाशिककरांना पुन्हा एकदा चार वर्षांपूर्वीच्या दिवाळी मेसेजची आठवण झाली आहे. व्हॉट्सअॅप, तसेच सोशल मीडियाचे जाळे फोफावण्यागोदर याच पद्धतीने मेसेजद्वारे शुभेच्छा दिल्या जात असत. व्हॉट्सअॅपच्या युगात बल्क मेसेज पाठवण्यासाठी इच्छुकांनी मेसेज पॅक खरेदी केले आहेत. ऑनलाइन टेक्स्ट मेसेजेस वेबसाइटवरील पॅकेजेस, तसेच काही मोबाइल कंपन्यांची एसएमएस पॅकेज खरेदी करण्याकडे उमेदवारांचा कल दिसून आला आहे. दिवाळी सणाचे औचित्य साधून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा हा नवा फंडा अनेक उमेदवार आजमावून बघत आहेत.

ग्रीटिंग्सचाही होतोय वापर

दिवाळीनिमित्त अनेक इच्छुकांकडून ग्रीटिंग कार्ड वाटप होताना दिसत आहेत. दिवाळीच्या शुभेच्छा देणाऱ्या ग्रीटिंगवर इच्छुक उमेदवाराचा फोटो आणि माहितीदेखील छापण्यात आली आहे. नाशिककरांना एकाच वेळी अनेक इच्छुकांचे ग्रीटिंग मिळत आहेत. पंचवार्षिक जवळ आल्यावर इच्छुकांची होणारी गर्दी आतापासूनच नाशिककर अनुभवत आहेत.



सर्व्हेतून मिळवला डाटा

गेल्या काही माहिन्यांपासून शहरातील प्रत्येक प्रभागात अनेक पक्षांचे कार्यकर्ते मतदार नोंदणी अर्ज, तसेच मतदारयादी तपासून घेत होते. यावेळी घराघरांत जाऊन मतदारांची माहिती घेतली जात होती. या माहितीतून मोबाइल क्रमांक मिळवले गेले होते. या मोबाइल क्रमांकांवर आता दिवाळीचे बल्क मेसेज पाठवण्याची तयारी इच्छुक उमेदवारांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपट्टी बिले आता दरमहा!

0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाणीबिलांच्या वाटपाचे खासगीकरण केल्यानंतर प्रशासनाने आता पाणीबिल रचनेतही बदल केला आहे. ग्राहकांना पाणीबिल हे तीन महिन्यांऐवजी महावितरणच्या धर्तीवर दर महिन्याला देण्याचा निर्णय घेतला असून, त्याला आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी मंजुरी प्रदान केली आहे. शहरातील व्यावसायिक मिळकती व मोठ्या सोसायट्यांना दरमहा पाणीबिल पाठविले जाणार असून, संपूर्ण प्रक्रियेची चाचपणी सध्या महापालिकेत सुरू आहे. त्यामुळे बिल वसुलीत पारदर्शकता येऊन ग्राहकांनाही दरमहा ऑनलाइन केली जाणार आहे. ग्राहकांना ऑन दी स्पॉट बिलिंग देण्यासह जागेवरच पैसे भरण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील दीड लाख ग्राहकांना याचा फायदा होणार आहे.

शहरात सद्यस्थितीत एक लाख ९५ हजार पाण्याचे ग्राहक आहेत. त्यातील ६० हजार ग्राहक हे सोसायट्या व अपार्टमेंटमध्ये राहतात. या सर्वांचे पाणीबिल कॉमन असून, अशा ग्राहकांची संख्या ही एक लाख दहा हजारांच्या वर आहे. व्यावसायिक मिळकतींची संख्या ५ हजार ८९७ एवढी आहे. पाणीपट्टीची बिले ही आता तीन महिन्यांतून एकदा ग्राहकांना दिले जातात. परंतु, महापालिकेची पाणीबिले ग्राहकांना वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या. विविध कर विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने महापालिकेने नुकताच पाणीबिले आउटसोर्सिंगद्वारे देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यानुसार शहरातील ग्राहकांना पाणीबिले देण्याचे काम खासगी कंपनीला दिले आहे. त्यात प्रशासनाने मोठे फेरबदल केले आहेत. नव्या प्रस्तावात आता पाणीबिल तीन महिन्यांऐवजी दरमहा दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील सोसायट्या, अपार्टमेंट यांना हा निर्णय लागू करण्यात आला आहे. त्यात व्यावसायिक मिळकतींचाही समावेश केला असून, त्यांना दरमहा त्यांच्या सोसायटीतच बिल उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. झोपडपट्ट्या, शासकीय कार्यालये, चाळी, शाळा यांना दर तीन महिन्यांनी बिले दिली जाणार आहेत. संबंधित निर्णयाची अंमलबजावणी लगेच केली जाणार असल्याने नागरिकांना आता बिलांसाठी वाट पाहण्याची, तसेच बिल भरण्यासाठी शासकीय कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही.


ऑन दी स्पॉट बिलिंग

नव्या निर्णयात संबंधित एजन्सीकडून पाणीपट्टीचे बिल हे ऑन दी स्पॉट दिले जाणार आहे. एजन्सीचे प्रतिनिधी सोसायटी किंवा अपार्टमेंटमध्ये जाऊन मीटर रीडिंगनुसार बिल तयार करतील. संबंधित सोसायटीला बिल दिल्यानंतर त्यांना बिल भरण्याची सुविधा जागेवरच उपलब्ध करून दिली जाणार आहे. चेक, कॅश किंवा क्रेडिट कार्डनेही ग्राहकांना आता बिल भरता येणार आहे. पाणीपट्टीचे बिल सोसायटीला तीन महिन्यांनी एकदा आल्याने ती रक्कम मोठी वाटते. परंतु, दरमहिन्याला बिल दिल्यास ग्राहकांवरील आर्थिक बोजाही कमी होणार आहे.


मीटरही मिळणार बदलून

पाणीमीटर खराब असल्याच्या बहुसंख्य ग्राहकांच्या तक्रारी आहेत. सद्यस्थितीत असंख्य ग्राहकांकडे असलेले मीटर निकृष्ट दर्जाचे आहेत. त्यामुळे बिलांबाबत लोकप्रतिनिधी व ग्राहकांच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर आता महापालिकेने चांगल्या कंपनीचे मीटर ग्राहकांना पुरविण्याची तयारी दर्शवली आहे. संबंधित एजन्सीलाच टेस्ट लॅब उभारण्याचे निर्देश देण्यात आले असून, कंपनी ग्राहकांना मीटर उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे बिलाबाबतच्या तक्रारीही कमी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेकडो फटाका स्टॉल्स अनधिकृत

0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

औरंगाबाद येथे फटाक्यांच्या दुकानांना लागलेल्या आगीच्या दुर्घटनेची महापालिकेने गंभीर दखल घेतली असून, शुक्रवारी थेट शहरातील फटाके स्टॉल्सचे सर्वेक्षण करीत कारवाईची मोहीम हाती घेतली. अग्निशमन विभाग व विविध कर विभागाने केलेल्या सर्वेक्षणात तीशने फटाका स्टॉल्सपैकी केवळ १८ फटाका स्टॉल्सधारकांनी हायकोर्टाच्या अटी व शर्तींचे पालन केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जवळपास पावणेतीनशे फटाके स्टॉल्स अनधिकृत असल्याचा अहवाल महापालिकेने तयार केला असून, हा अहवाल कारवाईसाठी आता पोलिसांकडे टोलवण्यात आला आहे.

औरगांबाद येथे शनिवारी फटाका स्टॉल्सला आग लागून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तेथील फटाका स्टॉल्सधारकांनी हायकोर्टाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे अग्निकांडाची झळ संपूर्ण औरंगाबादला बसली. या दुर्घटनेची गंभीर दखल नाशिक महापालिकेेनेही घेतली असून, या घटनेच्या पार्श्वभूमीवर आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी तातडीने अतिक्रमण, विविध कर व अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. विविध कर विभागाचे उपायुक्त व अग्निशमन दल अधिकारी यांना संयुक्तपणे या स्टॉल्सला भेटी देऊन वस्तुस्थिती अहवाल देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार उपायुक्त रोहिदास बहिरम व अग्निशमन दल अधिकारी अनिल महाजन यांनी संयुक्त पाहणी केली. महापालिकेने शहरात १९३ स्टॉल्सला परवानगी दिली आहे, तर डोंगरे वसतिगृहावर ६० गाळे विनापरवाना सुरू आहेत. जवळपास ५० स्टॉल्स शहरात परवानगी न घेताच सुरू करण्यात आले आहेत. दोन गाळ्यांमध्ये तीन मीटरचे अंतर, महावितरणची वायर फायरप्रूफ, तसेच आपत्ती काळात गाळ्यातून बाहेर पडण्याची व्यवस्था असण्याचे बंधन हायकोर्टाने केले आहे. परंतु, या स्टॉल्सधारकांनी या नियमांचे पालन केले नसल्याचे समोर आले आहे. या तीनशेपैकी केवळ १८ स्टॉल्सधारकांनीच नियम पाळले आहेत, तर उर्वरित २८२ स्टॉल्स अनधिकृत असल्याचे महापालिकेने जाहीर केले असून, या स्टॉल्सधारकांवर कारवाई करण्याचा अहवाल पोलिस आयुक्तालयाला पाठविला आहे. अनधिकृत स्टॉल्सवर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांकडे आहेत. त्यामुळे आता पोलिसांच्या कारवाईकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.


कारवाईची टोलवाटोलवी

महापालिकेने या अगोदरच १९३ स्टॉल्सला परवानगी देऊन त्यांच्याकडून जवळपास ५४ लाखांचा कर वसूल केला आहे. पोलिसांच्या परवानगीनंतर विविध कर विभागाची व अग्मिशमन दलाची परवानगी आवश्यक आहे. परंतु, केवळ पोलिस व विविध कर विभागाची परवानगी घेतल्यानंतर अग्निशमन दलाची परवानगी घेतलेली नाही. त्यांसदर्भातील अहवाल अग्निशमन दलाने महापालिका आयुक्तांना दिला आहे. परंतु, या घटनेनंतर ही यंत्रणा खडबडून जागी झाली असून, आता कारवाईची टोलवाटोलवी सुरू झाली आहे. महापालिकेने पोलिसांना कारवाई करण्याचे सांगून आपली जबाबदारी झटकली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिवाळीनिमित्त सर्वच मार्गांवरील एसटी फुल्ल!

0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या शनिवार दुपारनंतर वाढल्यामुळे सर्व बसस्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी होऊन सर्वच मार्गांवरील बस फुल्ल झाल्याचे चित्र दिसून आले. एसटी प्रशासनाने जादा बसेसचे नियोजन केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय काहीअंशी टळली. मात्र, काही बसेसमध्ये अनेकांना उभे राहूनच प्रवास करावा लागला. अॅडव्हान्स बुकिंगसाठी नव्या सीबीएस बसस्थानकावर रांगा लागल्याचेही चित्र होते. इतर बसस्थानकांवरही सर्वत्र गर्दी होती. खासगी वाहनांनाही मोठा प्रतिसाद असल्याचे शनिवारी दिसून आले.

सणानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता एसटीचे जिल्ह्यातील सर्व १३ आगारांना याअगोदर जादा बसेसचे नियोजन करण्यास सांगितले होते. ज्या ठिकाणी जादा प्रवासी आहेत, तेथे या बस सोडल्या जात होत्या. नाशिक आगार क्रमांक १ व २ येथून शिर्डी मार्गावरही प्रवाशांसाठी जादा बसेस सोडण्यात आल्या. जळगाव, धुळे, पुणे या मार्गावरही मोठ्या प्रमाणात प्रवाशांसाठी बसेस उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखाचा झाला. एसटीबरोबरच ही गर्दी खासगी बस वाहतुकीकडेही दिसून आली. एसटीप्रमाणेच सणानिमित्त त्यांनीही प्रवासी भाड्यात मोठी वाढ केल्यामुळे प्रवाशांची नाराजी असली, तरी पर्याय नव्हता. त्यामुळे जे लवकर मिळेल त्या वाहनांकडे प्रवाशांचा कल दिसत होता.

सरकारी व खासगी कार्यालयांबरोबरच शाळांना लागलेल्या सुट्यांमुळे ही गर्दी प्रचंड वाढली. आगामी दहा दिवस अशीच गर्दी राहणार असल्याचे बोलले जात आहे. दिवाळीत कर्मचाऱ्यांना तीन ते चार दिवस सुटी असली, तरी शाळांना आठ ते पंधरा दिवस सुटी असल्यामुळे हा आेघ कायम राहणार आहे. दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाने आयटीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खास बसेस उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे एसटीचा हा प्रयोगही यशस्वी ठरला.

कार्यालयीन कर्मचारीही बसस्थानकावर
एसटींतील गर्दी लक्षात घेऊन कार्यालयीन कर्मचाऱ्यांनासुद्धा बसस्थानकावर ड्युटी लावण्यात आली. जादा बसेस सोडण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांचे नियोजन करणे व प्रवाशांच्या तक्रारी सुटाव्यात, यासाठी हे कर्मचारी काम करीत होते. या कर्मचाऱ्यांबरोबरच सिटी बसच्या कर्मचाऱ्यांनाही काही बाहेरगावच्या बसेसमध्ये पाठवण्यात येत होते. एकूणच गर्दीचे नियोजन करण्यासाठी कार्यालयीन कर्मचारी ठिकठिकाणी दिसत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१२४७ अर्ज; गोंधळाची परिस्थिती

0
0

सहा नगरपालिकांसाठी शेवटच्या दिवशी अर्जांचा पाऊस

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नगरपालिका निवडणुकीत राजकीय भविष्य आजमावण्यासाठी शेकडो इच्छुकांनी कंबर कसली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांनी शनिवारी (दि. २९) शेवटच्या दिवशी गर्दी केली. सहा नगरपालिका निवडणुकांसाठी एकूण १२४७ अर्ज दाखल झाले. त्यापैकी नगरसेवकपदासाठी ११५०, तर नगराध्यक्षपदासाठी ९७ अर्ज दाखल झाले.

नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रे भरण्यासाठी शनिवारपर्यंत (दि.२९) मुदत होती. ऑनलाइन पध्दतीने अर्ज भरताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस उमेदवारांना अर्जच भरता आले नाहीत. याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची आयोगाने दखल घेऊन पारंपरिक पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सहमती दर्शवली. मात्र त्यासाठी शेवटचा एकच दिवस मिळाल्याने शनिवारी सकाळपासूनच इच्छुकांची गर्दी झाली. अर्ज स्वीकृतीची मुदत दुपारी चारपर्यंतची असली तरी सायंकाळी उशिरापर्यंत प्रशासकीय यंत्रणेला अर्ज स्वीकारावे लागले. त्यातही पक्षांच्या तिकीट वाटपाच्या गोंधळामुळेही उमेदवारांना अर्ज भरण्यास उशीर झाला. परिणामी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया रेंगाळली. मनमाडमध्ये इच्छुकांची संख्या सर्वाधिक असल्याने तेथे सायंकाळी उशिरापर्यंत गोंधळाची परिस्थिती होती.

जागा कमी आणि इच्छुक अधिक असल्याने या निवडणुका अत्यंत चुरशीच्या होणार हे स्पष्ट झाले आहे. मनमाड आणि सटाणा या दोन नगरपालिकांमध्ये अर्ज भरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. सटाण्यात नगरसेवक पदासाठी २७६ उमेदवारांनी तर नगराध्यक्ष पदासाठी २२ उमेदवारांनी अर्ज सादर केले. मनमाडमध्ये नगरसेवकपदासाठी २९१ आणि नगराध्यक्षपदासाठी १८ उमेदवारांनी अर्ज सादर केले. नांदगावमध्ये सर्वात कमी अर्ज प्राप्त झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. नगराध्यक्षपदासाठी १२ तर नगरसेवकपदासाठी ९२ अर्ज दाखल झाले. विशेष म्हणजे शेवटच्या दिवशीच सर्वाधिक अर्ज दाखल झाले असून, आयोगाच्या आदेशानुसार पारंपरिक पध्दतीने (ऑफलाइन) प्राप्त झालेले अर्ज संगणक प्रणालीमध्ये भरण्याचे काम यंत्रणेला रात्री उशिरापर्यंत करावे लागले.


११ नोव्हेंबरपर्यंत माघारीसाठी मुदत

सहा नगरपालिकांमधील १३८ जागांसाठी २७ नोव्हेंबरला ही निवडणूक होत आहे. मनमाडमध्ये सर्वाधक ३१, सिन्नरमध्ये २८, येवल्यात २४, सटाण्यात २१ तर नांदगाव आणि भगूर येथे प्रत्येकी १७ जागांसाठी ही मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. २ नोव्हेंबरला सकाळी अकरापासून नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे. नामनिर्देशन पत्रे मागे घेण्यासाठी ११ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरपालिकेत युतीचा फज्जा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यात २९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सहा नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीचा फज्जा उडाला आहे. येवला नगरपरिषद सोडल्यास पाच नगरपरिषदेत भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांनी एकमेकांविरुध्द नामनिर्देशन पत्र दाखल केल्यामुळे या निवडणुकीत युतीचे प्रयत्न असफल ठरले आहेत. दोन ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्र छाननी आहे. त्यानंतर ११ नोव्हेंबरपर्यंत माघारीची मुदत असल्यामुळे युतीसाठी पुन्हा प्रयत्न केले जाणार असल्याचे दोन्ही बाजूने सांगण्यात येत आहे. पण नामनिर्देशनपत्र भरताना उमेदवारांनी पक्षाचा एबी फॉर्म भरल्यामुळे उमेदवारी माघार घेणे आता अवघड होणार आहे.

विधानसभा निवडणुकीत २५ वर्षांची भाजप-सेना युती तुटल्यानंतर राज्यभरात नोव्हेंबरपासून होणाऱ्या २१२ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी दोन्ही सत्ताधारी पक्षांनी पुन्हा युती करण्याचा निर्णय २५ ऑक्टोबरला घेतला. त्यानंतर चार दिवस उलटत नाही तोच जिल्ह्यात युतीचा फज्जा उडाला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही युती तुकड्या तुकड्यांमध्ये नको तर अखंड महाराष्ट्रात होण्याचे पक्षनेतृत्वाचे मत होते, असे सांगितले होते. पण नाशिक जिल्ह्यात या युतीला कोणतेही सकारात्मक चित्र न मिळाल्यामुळे दोन्ही पक्षांचे उमेदवार एकमेंकाविरुध्द उभे ठाकले आहेत. जिल्ह्यात मनमाड, नांदगाव, सटाणा, भगूर व सिन्नर येथे भाजप-शिवसेना युती झाली नाही. राष्ट्रवादी व काँग्रेसनेही नांदगाव व सिन्नर सोडल्यास मनमाड, येवला, सटाणा व भगूर येथे स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

युतीचा राज्यपातळीवर निर्णय झाला. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांना समजावणे अवघड होते. पाच ठिकाणी स्वबळावर लढणार आहोत. माघारीला वेळ आहे.

- दादा जाधव, जिल्हाध्यक्ष, भाजप

शिवसेना-भाजपने एकमेकांविरुध्द नामनिर्देश पत्र दाखल केले असले तरी ११ ऑक्टोबरपर्यंत माघारीसाठी वेळ आहे. त्यात युतीसाठी प्रयत्न केले जातील.

- विजय करंजकर, जिल्हाप्रमुख, शिवसेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दिवाळी’ऑनड्युटीच

0
0

अरविंद जाधव

खासगी संस्था, कारखाने, सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी कुटुंबीयांसमवेत दिवाळीचा आनंद साजरा करतात. लाखो रुपयांची काही मिनिटांत उलाढाल होते. सोने-चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीला शब्दशः उधाण येते. या आर्थिक उलाढालीवर चोरटेही लक्ष ठेवून असतात. दोन समाजातील तेढ, तर आपल्या पाचवीलाच पुजलेली आहे. नागरिकांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, दिवाळीच्या सणाला कोठेही गालबोट लागू नये यासाठी पोलिसांना दिवाळी ‘ऑन ड्युटी’च साजरी करावी लागते. दिवाळीची चाहूल लागली की, शाळेसह इतर शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्या मिळतात. या सरकारी कर्मचाऱ्यांना कुटुंबासोबत चार क्षण फुरसतीचे घालवता येतात. या पलीकडे सरकारचा खरा चेहरा असलेल्या पोलिसांना मात्र, कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागतो. दर दिवाळीत हे चित्र असते. यंदा, पोलिस आयुक्तांनी पोलिस कर्मचाऱ्यांना वेगवेगळे सरप्राइज दिले. मुलांसोबत पिक्चर पाहायला जाणे, असा विचार स्वप्नातही आला नव्हता, असे शहर पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने सांगितले. दोन ते चार वर्षांपूर्वी शहर पोलिसांनी उपनगर येथील एका जीममध्ये अंधारात थांबलेल्या टोळीला लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी जेरबंद केले होते. उपनगर भागातील एका बिल्डरकडे लक्ष्मीपुजनाच्या दिवशी दरोडा टाकण्याचा त्यांचा प्लॅन होता. दिवाळीला सुरुवात झाली होतीच. मात्र पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही या कर्मचाऱ्यांना काम करावे लागलेच असेल. हा एक किस्सा पोलिसांच्या योगदानाची व दिवाळी सणात पोलिसांची उपस्थिती किती महत्त्वाची हे सांगण्यास पुरेशी असल्याचे मत, दुसऱ्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केले. शहर पोलिस दलात अडीच ते तीन हजार पोलिस अधिकारी कर्मचारी असून, विनातक्रार ते आपली जबाबदारी पार पाडत आहेत.

दिवाळी दरम्यान सर्वांना आप्तांकडे जाण्याचा ओढा असतो. परिवारासमवेत आनंदाने दिवाळी साजरा करता यावी, यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. कामासाठी दुसरीकडे राहणारे नागरिक आपल्या घरी परतात. या धामधुमीत पोलिसांना मात्र या सणाचा आनंद घेता येत नाही. दिवाळी म्हंटले की, गर्दी आलीच, त्यामुळे बसस्थानके, रेल्वे स्टेशन, मंदिरे, मॉल्स, मुख्य बाजारपेठ अशा गर्दी होणाऱ्या ठिकाणी पोलिसांच्या बंदोबस्ताशिवाय पर्याय नसतो. या काळात समाजकंटकांना, चोरट्यांना रोखून सर्वसामान्यांच्या आनंदावर विरजण पडणार नाही, याची काळजी बंदोबस्तावरील पोलिसाला करावी लागते. अगदी काश्मिरमध्ये घडलेल्या एखाद्या घटनेचा अलर्ट देखील घरी जाणाऱ्या पोलिसांची वाट काही तासासाठी अडवू शकतो. तो दिवस दिवाळीचा असेल की, लग्नाच्या वाढदिवसाचा असा फरक यात दिसून येत नाही.

शहर पोलिस दलात महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. विशेषतः चार ते पाच वर्षांत पोलिस दलात असलेल्या महिलांची संख्या जास्त ठरते. दिवाळीनिमित्त घरात फराळ बनविण्याचे मुख्य काम गृहिणींना पार पाडावे लागते. मात्र, पोलिसांचे कर्तव्य श्रेष्ठ असल्याने त्यापलीकडे महिला कर्मचाऱ्यांचा विचार होत नाही. अर्थात, हे आता अंगवळणी पडते आहे. सासू- सासरे किंवा माहेरचेही आमची अनुपस्थिती ग्राह्य मानतात, अशी ठोस प्रतिक्रिया एका महिला कर्मचाऱ्याने व्यक्त केली. पोलिस खात्यात रुजू होण्याआधी म्हणजेच प्रशिक्षणा दरम्यान २४ तास ‘ऑन ड्युटी’ ही संकल्पना डोक्यात भिनली जाते. शिस्त, कायद्याचे पालन, कर्तव्य यापेक्षा कुटुंब मोठे नाही, असा संस्कार आपसूकच होतो. एखाद दुसऱ्या भ्रष्ट व्यक्तींमुळे संबंध पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका, असे एका कर्मचाऱ्यांच्या ग्रुपने केलेले आवाहन देखील खूप काही सांगून जाणारे आहे.

arvind.jadhav@timesgroup.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिघांची दिवाळी कोठडीतच

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तीन कर्मचाऱ्यांच्या पोलिस कोठडीत विशेष कोर्टाने दोन दिवसांची वाढ केली. संशयितांकडून अद्याप समाधानकारक माहिती समोर आलेली नसून, या गुन्ह्यात आणखी काही व्यक्तींचा तपास करण्यासाठी संशयितांची पोलिस कोठडी आवश्यक असल्याचा मुद्दा एसीबीने कोर्टासमोर मांडला.

बाजार समितीचे लेखापाल अरविंद हुकूमचंद जैन, टंकलेखक विजय सीताराम निकम आणि लिपिक दिगंबर हिरामण चिखले यांना २५ ऑक्टोबर रोजी एसीबीच्या पथकाने अश्वमेधनगर ते आरटीओ चौक या रस्त्यात कौशल्य सुमंगल हॉलसमोर सापळा रचून अटक केली होती. हे तिघे प्रवास करीत असलेल्या कारमध्ये ५७ लाखांच्या रोकड सापडली होती. बाजार समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या देयक व इतर बिलांवर जबरदस्तीने स्वाक्षऱ्या करून ही रक्कम पेठरोडवरील नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतून परस्पर काढून घेतल्याची माहिती एसीबीला मिळाल्यानंतर कारवाई झाली. रात्रीच्या वेळी इतकी मोठी रक्कम संशयास्पद पध्दतीने हाताळली जात असल्याने एसीबीचा संशय बळावला. या तिघांविरोधात म्हसरूळ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करीत कोर्टात हजर करण्यात आले. त्यांना २९ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीची मुदत शनिवारी संपल्याने त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले. कर्मचाऱ्यांची ही रक्कम बाजार समितीत सुरक्षित ठेवण्यात येणार होती, असा युक्तिवाद संशयित आरोपींनी केला. वास्तविक बाजार समितीमध्ये इतकी मोठी तिजोरीच नसल्याचे समोर आले आहे. ५० हजारांपेक्षा अधिक रक्कम काढताना बँकेत पॅनकार्ड सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, ५७ लाखांची रक्कम काढताना या तरतुदीलाच हरताळ फासण्यात आल्याचे एसीबीच्या तपासात समोर आले.

सचिवांचीही चौकशी

तिघा संशयिताव्यतिरिक्त एसीबीने बाजार समितीचे सचिव अरुण काळे यांचीही चौकशी केली आहे. मात्र, या गुन्ह्यात आणखी काही व्यक्तींचा सहभाग असल्याचा एसीबीचा अंदाज आहे. बाजार समितीचे पदाधिकारी, बँकचे अधिकारी तसेच सहकार विभाग अशी गुन्ह्याची व्याप्ती असून, संशयितांकडे याची सखोल चौकशी करणे क्रमप्राप्त असल्याचा एसीबीचा मुद्दा कोर्टाने उचलून धरत संशयितांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरोगामी पिढीचा शिल्पकार हरपला

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणारे ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक वसंत पळशीकर (वय ८०) यांचे प्रदीर्घ आजाराने शनिवारी पहाटे निधन झाले. अनेक वर्षे ते नवभारत मासिकाचे संपादक होते. नाशिक येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. धार्मिक विधींना फाटा देत शनिवारी दुपारी पंचवटीतील शवदाहिनीत त्यांच्या पार्थिवाचे दहन करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा माधव पळशीकर, दोन मुली असा परिवार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून ते अर्धांगवायूने आजारी होते. त्यांनी शनिवारी सकाळी सात वाजता अखेरचा श्वास घेतला. लोकशाही समाजवाद या विषयावर पळशीकर यांनी अनेक पुस्तके लिहिली. मार्क्सवाद, समाजवाद तसेच फुले-आंबेडकरी विचारांच्या भूमिकांची त्यांनी अनेक पुस्तकांतून अभ्यासपूर्ण मांडणी केली होती. त्यांचा जन्म हैदराबादमधील. गांधीजींच्या चळवळीतील वडिलांच्या संस्कारात ते वाढले. गांधींजींच्या विचारांचा चिकित्सक स्वीकार त्यांनी केला. आचार्य विनोबा भावे, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, साने गुरुजी, रावसाहेब आणि अच्युतराव पटवर्धन, बाबा आमटे यांच्या कार्यात वेळोवेळी सहभागी होत त्यांनी स्वत:ला समृद्ध केले. भूदान आंदोलन, आनंदवन, ओडिशातील कोरापूर येथे सर्वसेवासंघाच्या कामात त्यांचा सक्रिय वाटा होता. सन १९५९ मध्ये ते महाराष्ट्रात परतले आणि प्रबोधनाच्या कामाला वाहून घेतले. मात्र हे काम व्रत म्हणून पार पाडत आले. समाजप्रबोधन पत्रिका, नवभारत यांच्यासारख्या वैचारिक नियतकालिकांचे संपादन त्यांनी दीर्घकाळ केले. कार्यकर्त्यांची शिबिरे, वैचारिक परिषदा, संमेलने यांतही तेवढ्याच कळकळीने मार्गदर्शन केले. संथ, अनाक्रमक शैली, पण ठाम युक्तिवाद हे त्यांचे वैशिष्ट्य. राजकारण, समाजकारण, शिक्षण, साहित्य, कला, विज्ञान, संस्कृती, स्त्री-पुरुष संबंध, चिरंजीवी विकास यासारख्या क्षेत्रांत त्यांनी मूलगामी लेखन केले आहे. समग्रतेचे भान हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते. त्यांना १९९७ चा महाराष्ट्र फाउंडेशनचा गौरव पुरस्कार देण्यात आला होता.

पळशीकरांचे साहित्य

वैचारिक ग्रंथ : सत्याग्रही सॉक्रेटिसचे वीरमरण, जमातवाद, धर्म, धर्मश्रध्दा आणि अंधश्रध्दा.

अनुवाद : बी. आर. नंदा लिखित गोपाळकृष्ण गोखले यांच्या चरित्राचा अनुवाद, थिओडोर शुल्टझ यांच्या शेतीविषयक पुस्तकाचा अनुवाद

संपादन : सोविएत रशियाची पन्नास वर्षे (खंड १ व २), विवेकवाद, विज्ञान आणि श्रध्दा : मे. पुं. रेगे यांचा लेखसंग्रह

महाराष्ट्रात पुरोगामी तरुणांची पिढी त्यांच्या मार्गदर्शनामुळे निर्माण झाली. ते नव्या पुरोगामी पिढीचे शिल्पकार आहेत.

- रावसाहेब कसबे, ज्येष्ठ विचारवंत

महाराष्ट्राला पुरोगामी बनविण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लेखन, चिंतन केले. त्यांच्या पिढीतील बहुतेक ते शेवटचा संदर्भ असावेत.

- उत्तम कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम परवानग्यांचे दिवाळीत मिळणार गिफ्ट!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

खत प्रकल्पाच्या दुरवस्थेमुळे राष्ट्रीय हरित लवादाने लावलेल्या बांधकामांवरील बंदीसंदर्भातील महापालिकेच्या पुनर्विलोकन अर्जावर आता ३१ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. यावेळी महापालिकेच्या वतीने खत प्रकल्प व वेस्ट टू एनर्जीसंदर्भातील अपडेट न्यायालयात सादर केले जाणार आहेत. त्यामुळे एनजीटीकडून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बांधकाम परवानग्यांचेही गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे.

पुनर्विलोकन याचिकेवेळी पालिकेतर्फे खत प्रकल्प व पर्यावरणासंदर्भात केलेल्या उपाययोजनांची माहिती सादर केली जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली. खत प्रकल्पाच्या दुरवस्थेमुळे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एनजीटीने शहरातील नवीन बांधकामांना जाचक अटीशर्तींमुळे बंदी घातली होती. एनजीटीच्या अटीशर्तींची पूर्तता करणे शक्य नसल्याने बांधकाम परवानग्या ठप्प आहेत. महापालिकेने या अटीतून शिथिलता मिळावी, यासाठी एनजीटीत पुनर्विलोकन अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर आता सोमवारी (३१ ऑक्टोबर) सुनावणी होणार आहे. यावेळी महापालिकेने खत प्रकल्प चालवण्यासंदर्भात केलेल्या कारवाईचा तपशील एनजीटीत सादर करण्यात येणार आहे. खत प्रकल्पाची वर्कऑर्डरच लवादात सादर केली जाईल. ठेकेदाराकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती सादर केली जाणार आहे. सोबतच वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचीही माहिती दिली जाणार आहे. घंटागाडीचा प्रकल्पही मार्गी लागला असून, त्याचाही तपशील दिला जाणार आहे. त्यामुळे बांधकाम परवानग्यांवरील शुक्लकाष्ठ हटण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या उपाययोजना या सकारात्मक असल्याने बांधकाम परवानग्यांबाबत अंशतः शिथिलता मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीत बांधकाम व्यावसायिकांना आणखी एक गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या पुनर्विलोकन अर्जावर एनजीटीत येत्या ३१ ऑक्टोबरला सुनावणी होणार असून, महापालिकेने खत प्रकल्पासंदर्भात केलेल्या उपाययोजनांचा तपशील लवादात सादर केला जाणार आहे. त्यामुळे काही दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

- अभिषेक कृष्णा, आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२८ फटाके दुकानदारांवर कारवाई

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विनापरवना तसेच नियमांकडे दुर्लक्ष करून फटाके विक्री करणाऱ्या २८ दुकानदारांवर शहर पोलिसांनी शनिवारी कारवाई केली. फटाका साठ्यांच्या नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या दोन गोडावूनवरदेखील कारवाई झाली असून, गोडावून मालकांकडील परवाना रद्द करण्याच्या हालचाली पोलिसांनी सुरू केल्या आहेत.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाके खरेदी-विक्रीची मोठी उलाढाल होते. मात्र, दरवेळी स्फोटक पदार्थ कायद्याकडे दुर्लक्षदेखील होते. यामुळे छोट्या मोठ्या दुर्घटना होतात. औरंगाबाद शहरात जवळपास २०० फटाके दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. नाशिक शहरानेदेखील यापूर्वी फटाक्यांची दहशत अनुभवली आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी फटका विक्री, साठा तसेच वाजवण्यासंदर्भांत काही निर्देश जारी केले होते. या निर्देशांकडे दुर्लक्ष करणाऱ्या फटका विक्रेत्यांचा पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे व लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शोध घेण्यात आला. शनिवार दिवसाअखेर तब्बल २८ फटका विक्रेत्यांविरोधात पोलिसांनी कारवाई केली.

अशी झाली कारवाई
अंबड - १०, सातपूर - २, उपनगर - ४, ना.रोड - ६, सरकारवाडा, भद्रकाली, दे.कॅम्प, प्रत्येकी - २

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभ्यंगस्नान हुडहुडीतच

0
0

नाशिकचा पारा ११.४ अंशावर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नरकचतुर्दशीच्या निमित्ताने घराघरात शनिवारी (दि. २९) पहाटे अभ्यंगस्नानाचे वातावरण होते. याचवेळी नाशिकचा पारा ११.४ अंशांवर गेल्याने नाशिककरांना हुडहुडीतच अभ्यंगस्नान करावे लागले. गेल्या काही दिवसांपासून पारा घसरल्याने नाशिककरांना थंडीचे दिवाळी गिफ्ट मिळाले आहे.

शहर परिसरासह जिल्ह्यात दिवाळीचा उत्साह आहे. शुक्रवारी धनत्रयोदशीची पुजा केल्यानंतर सर्वांना शनिवारी असलेल्या नरकचतुर्दशीच्या दिवसाचे वेध लागले होते. नरकचतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नानाची परंपरा आहे. तसेच, पहाटे उठून घराघरात रोषणाई करणे आणि फटाके फोडण्याचीही प्रथा आहे. नाशिककरांची शनिवारची पहाटच थंडीच्या कडाक्याने सुरू झाली. पहाटेच्या सुमारास हवेत असलेला गारवा तसेच धुके यामुळे नाशिककरांना दिवाळीतच थंडीचा अनुभव मिळत आहे. शहर परिसरातील तापमान ११.४ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. विशेष म्हणजे, हे तापमान राज्यातील सर्वात कमी होते. दिवसभरही तापमानात तसा गारवा होता. सर्वसाधारणपणे ऑक्टोबरमध्ये अधिक तापमान राहते. ऑक्टोबर हीटचा कुठलाही प्रभाव न राहता दिवाळीतच तापमान घसरल्याने नाशिककरांच्या दिवाळीच्या उत्साहात भरच पडली आहे. येते काही दिवस तापमानातील चढ-उतार असेच राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. शुक्रवारच्या तुलनेत नाशिकचे किमान तापमान २ अंश सेल्सिअस घटले. त्यामुळे थंडीचा कडाका नाशिककरांना जाणवत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशयितांना आज कोर्टात हजर करणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संशयास्पद पद्धतीने कारमध्ये ५७ लाख रुपयांची रोकड घेऊन जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तीन कर्मचाऱ्यांना सोमवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे. या तिघांच्या कोठडीत २९ ऑक्टोबर रोजी कोर्टाने वाढ केली होती.

बाजार समितीचे लेखापाल अरविंद हुकूमचंद जैन, टंकलेखक विजय सीताराम निकम आणि लिपिक दिगंबर हिरामण चिखले यांना २५ ऑक्टोबर रोजी एसीबीच्या पथकाने अश्वमेधनगर ते आरटीओ चौक या रस्त्यात कौशल्य सुमंगल हॉलसमोर सापळा रचून अटक करण्यात आली. हे तिघे प्रवास करीत असलेल्या कारमध्ये ५७ लाखांची रोकड सापडली होती. बाजार समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या देयक व इतर बिलांवर जबरदस्तीने स्वाक्षऱ्या करून ही रक्कम पेठ रोडवरील नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतून परस्पर काढून घेतल्याची माहिती एसीबीला मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. संशयितांना २९ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर यात पुन्हा दोन दिवसांची वाढ करण्यात आली. दरम्यान, या गुन्ह्यात आणखी काही व्यक्तींना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात असून, बाजार समितीशी संबंधित, तसेच राजकीय पक्षांचे याकडे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फटाके विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फटाक्यांचा साठा आणि त्याची विक्री याबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशांचे पालन न करणाऱ्या डोंगरे वसतिगृह आणि गोल्फ क्लब मैदानावरील सर्वच फटाका विक्रेत्यांविरोधात सरकारवाडा आणि मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रविवारी पोलिसांनी या व्यवसायिकांना नोटिसाही बजावल्या आहेत.

फटाक्यांमुळे वायू, तसेच ध्वनिप्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते. याची गंभीर दखल घेत सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले आहेत. या निर्देशांचे पालन करण्याची जबाबदारी महापालिका आणि पोलिसांना पार पाडावी लागते. अनेकदा सुरक्षा बाबींकडे दुर्लक्ष करीत आठ-दहा दिवस व्यवसाय केला जातो. आर्थिक नुकसान नको, या दृष्टिकोनातून पोलिस, तसेच महापालिका प्रशासन थेट कारवाई करण्याचे टाळते. यंदा मात्र मुंबई हायकोर्टाने नव्याने काही आदेश दिले असून, औरंगाबाद शहरात सुमारे दीडशे फटाके दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या प्रकरणाची गंभीर दखल थेट राज्य सरकारने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिस व महापालिकेने शनिवारपासून संयुक्त पद्धतीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. यातील २८ दोषी विक्रेत्यांवर शनिवारी सायंकाळपर्यंत कारवाई करण्यात आली. शनिवारी रात्री सरकारवाडा पोलिसांनी डोंगरे वसतिगृह मैदानावरील सुमारे ५० ते ६० विक्रेत्यांवर कलम २८६ प्रमाणे गुन्हा दाखल केला. यानंतर मुंबई नाका पोलिसांनीदेखील गोल्फ क्लब मैदानावरील ४० विक्रेत्यांवर याच कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शहर परिसरात आणखी काही गुन्हे दाखल होण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, रविवारी पोलिसांनी व महापालिका प्रशासनाने संबंधित व्यवसायिकांना नोटिसा पाठवल्या आहेत.

फटाके विक्रेते कात्रीत

फटाक्यांची सर्वांत जास्त विक्री होण्याचे ठिकाण म्हणून गोल्फ क्लब मैदान व डोंगरे वसतिगृह या दोन ठिकाणांकडे पाहिले जाते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही येथे नागरिकांची तुरळक गर्दी होती. गेल्या वर्षीपर्यंत लक्ष्मीपूजनापर्यंत फटाके स्टॉल्स गर्दीने ओसंडून वाहायचे. एकीकडे खरेदीदारांनी फिरवलेली पाठ व दुसरीकडे दाखल होणारे गुन्हे अशा कात्रीत फटाके विक्रेते सापडले असून, यंदा विक्रेत्यांचे आर्थिक दिवाळे निघाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीक विमा योजनेसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

२०१६-१७ मधील रब्बी हंगामासाठी राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत असून, या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. हा पीकविमा कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक असून, बिगरकर्जदार शेतकऱ्यांसाठी मात्र तो ऐच्छिक असेल. या योजनेसाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनीला कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

कर्जदार शेतकऱ्यांचा विमा हप्ता बँकेमार्फत भरला जाणार आहे. मात्र, बिगरकजर्दार शेतकऱ्यांना विहित अर्जासह बचत खाते असलेल्या बँकेत हा हप्ता भरावा लागणार आहे. ३१ डिसेंबरपूर्वी अधिकाधिक शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे. त्यासाठी जवळील विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात, तसेच जवळच्या बँकेशी आणि संबंधित विमा कंपनीशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images