Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘मटा’तर्फे आज फराळ स्पर्धा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे वाचकांसाठी नेहमीच विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात. दरवर्षी प्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त फराळ स्पर्धा आयोजित केली असून ही स्पर्धा चित्पावन मंगल कार्यालय एकमुखी दत्त मंदीर, अहिल्यादेवी होळकर पुलाजवळ येथे आज दुपारी ३ ते ५ यावेळेत होणार आहे.

स्पर्धा म्हटली की, स्पर्धेच्या ठिकाणी जाऊन पदार्थ बनविणे आलेच, त्यासाठी लागणारा सर्व लवाजमा कसा जमा करायचा असा प्रश्न पडला असेल ना, स्पर्धकांची ही अडचण ओळखून पदार्थ घरी करून आणायची सवलत स्पर्धकांना देण्यात आली आहे. स्पर्धकांनी या स्पर्धेत फक्त खुसखुशीत, खमंग, चविष्ट आणि जरा हटके अशी शेव बनवून आणायची आहे. घरून तयार करून आणलेली शेव या ठिकाणी प्रदर्शित केली जाणार आहे.

सहभागी झालेल्या स्पर्धकांनी ही शेव आपण कशी बनवली याचे साहित्य, कृती एका कागदावर सुवाच्य अक्षरात लिहायची आहे. या कागदावर आपले नाव, पत्ता, फोन नंबर लिहणे गरजेचे आहे. स्पर्धा ३ ते ५ या कालावधीत जरी असली तरी स्पर्धकांनी वेळेआधी तेथे उपस्थित राहणे आवश्यक आहे. एस.आर. केटरर्स, रविवार कारंजा यांच्या व्यवस्थापनाखाली असलेले चित्पावन मंगल कार्यालय हे या स्पर्धेचे व्हेन्यू पार्टनर आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. ज्यांना कल्चर क्लबचे सभासद व्हायचे आहे किंवा नूतनीकरण करायचे आहे अशांनी १९९ रुपयांचा चेक घेऊन यावा. या स्पर्धेची नाव नोंदणी पूर्ण होत आली असून ज्यांनी नाव नोंदणी केलेली नाही अशा स्पर्धकांनी वेळेवर नाव नोंदणी केली तरी चालेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आई-वडिलांनी मुलांचे बालपण जपावे’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुलांचे बालपण त्यांच्या कायम लक्षात राहावे याची काळजी आई-वडिलांनी घेण्याची गरज आहे. यासाठी बालभवनसारख्या विविध उपक्रमांमध्ये सातत्याने त्यांना सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांनी केले.

सार्वजनिक वाचनालय बालभवन साने गुरुजी कथामालेचा पहिल्या सत्राच्या पावसाळी कविता गायन, शुद्धलेखन, हस्ताक्षर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, आकाशकंदील, भेटकार्ड इत्यादी स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून झळके यांची उपस्थिती होती. ते पुढे म्हणाले की, आपल्या या उपक्रमात इतक्या मोठ्या संख्येने मुलांनी पारितोषिके मिळवली याचा अतिशय आनंद होत आहे. सार्वजनिक वाचनालयासारख्या संस्थेने बाल भवनचा उपक्रम नेटाने चालविला आहे. त्याबद्दल आजची मुले भविष्यकाळात सावानाबद्दल नेहमीच कृतज्ञ राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या शंकाचे निरसन करून त्यांनी छोट्या छोट्या गोष्टीतून विद्यार्थ्यांना प्रबोधन केले.अनेक विनोद सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना हसवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दुर्ग संवर्धन’ला मिळाली दीडशे वर्षांपूर्वीची बखर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

किल्ल्यांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या दुर्ग संवर्धन प्रतिष्ठानतर्फे दुर्मिळ वस्तू जमा करून जतन करण्याचा उपक्रम सुरू आहे. यात नाशिकच्या निसर्गप्रेमी प्रमिला पाटील यांनी त्यांच्याकडे परंपरेने चालत आलेली दीडशे वर्षांपूर्वीची दुर्मिळ बखर या उपक्रमासाठी भेट दिली.

शिवकालीन वस्तू, पुस्तके, नाणी, दगड, संकलन करून त्याचे संग्रह करून या वस्तू शाळांमधील विद्यार्थांना दाखवून गड किल्ल्यांची माहिती देण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम दुर्ग संवर्धन तर्फे सुरू करण्यात आला आहे. दुर्ग संवर्धनने आतापर्यंत जिल्ह्यातील ३४ किल्ल्यांवर श्रमदान मोहीम राबविली आहे. यावेळी अनेक दुर्गप्रमींनी शिवराय मधील दुर्मीळ वस्तू ज्या विविध ठिकाणी विखुरल्या गेल्या आहेत. त्या गोळा करून त्याचा संग्रह करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या दिशेने संस्थेने एक पाऊल पुढे टाकले आहे. या उपक्रमात त्यांना ही बखर मिळाली आहे.

विविध घराण्यांची माहिती

बखर बघितल्यावर ती इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी लिहिली असावी असा अंदाज आहे. मूळ हस्त लिखितावरून ही प्रिंटिंग त्याकाळी केली गेली असावी. यामध्ये अनेक महत्त्वाच्या विषयावर माहिती दिली गेली आहे. या बखरीची मोठी रक्कम मिळत असतानादेखील पाटील यांनी ती विकली नाही. या बखरीमध्ये छत्रपती घराणे, बडोद्याच्या घराण्याची माहिती आहे.

तसेच शेवटच्या पेशव्यांचे झालेले हालदेखील या बखरीत वाचायला मिळतात. सन सव्वाशे पंचाहत्तरपासून ते एकूणऐंशी पर्यंतचे या बखरीत वाचावयास मिळते. या बखरीचे ३१ भाग असून हा भाग अठरावा आहे. शिवकालीन वस्तू, पुस्तके, नाणी, अवजारे किंवा इतर वस्तू असतील तर त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन आनंद बोरा यांनी केले आहे.

विश्रामगडावर दुर्गदर्शन

नाशिक : शिवकार्य गडकोट मोहिमेच्या वतीने ४० वी दुर्गदर्शन मोहीम शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले विश्रामगड येथे पार पडली. यावेळी दुर्ग संवर्धकांनी किल्ले वाचवा, आपला इतिहास वाचवा असा संदेश किल्ल्यावर दुर्गप्रेमी व पर्यटकांना दिला.

या विश्रामगड (पट्टागड) दुर्गदर्शन मोहिमेच्या प्रारंभी सिन्नर येथील हजारो वर्षापूर्वीचे गोंदेश्वर महादेव मंदिराची गडकोट संवर्धकांनी पाहणी केली. यावेळी संकेत नेवकर यांनी ‘जेव्हा गड बोलू लागला’ हे एकपात्री सादर केले. मोहिमेत राम खुर्दळ, प्रा.सोमनाथ मुठाळ, डॉ. अजय कापडणीस, के. सी. विसपुते, योगेश अहिरे आदी गडकोट संवर्धक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हंडाभर चांदण्या ‘भारंगम’ महोत्सवात

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्राची मराठी रंगभूमी गाजवत असलेल्या नाशिकच्या ‘हंडाभर चांदण्या’ या दत्ता पाटील लिखित व सचिन शिंदे दिग्दर्शित प्रायोगिक नाटकाच्या शिरपेचात आंतरराष्ट्रीय सन्मानाचा तुरा खोवला गेला आहे. दिल्लीच्या एनएसडी अर्थात राष्ट्रीय नाट्यशाळेच्या वतीने १ फेब्रुवारी २०१७ पासून सुरू होणाऱ्या १९ व्या भारत रंग (भारंगम) महोत्सवासाठी या नाटकाची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून या वर्षीच्या ‘भारंगम’साठी निवड झालेले हे एकमेव मराठी प्रायोगिक नाटक आहे.

एनएसडीचा यंदाचा १९ वा ‘भारंगम’ महोत्सव असून, तो १९९९ मध्ये सुरू झाला आहे. आशिया खंडातील हा सर्वात मोठा नाट्योत्सव आहे. दि. १ ते २१ फेब्रुवारीदरम्यान नवी दिल्लीत होणाऱ्या या फेस्टिवलमध्ये ५ फेब्रुवारी २०१७ रोजी दुपारी ४ वाजता दिल्लीतील एसआरसी अर्थात श्रीराम सेंटर ऑडिटोरियम येथे नाशिकच्या ‘हंडाभर चांदण्या’चा प्रयोग रंगणार आहे. प्रश्नांसह जगणाऱ्या आणि त्यातही लय, ताल शोधत जगणं सहज करून घेणाऱ्या आपल्या ग्रामीण भागातील हुंकार आता राजधानीतही उमटणार असून, यातील मास्तर, संभासकट डफडी-तुणतुण्याचे सूरही दिल्लीकरांच्या काळजात घर करणार आहेत.

‘हंडाभर चांदण्या’ने मुंबईतील आविष्कार, साहित्य संघ आणि चाळीसगावमधील महोत्सव गाजवला आहे. नुकताच नाट्यनिर्माता संघाच्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट नाटकाचा एक लाख रुपयांचा कै. मोहन वाघ पुरस्कारही पटकावला असून, लेखन दिग्दर्शनासह सात वैयक्तिक पारितोषिकेही पटकावली आहेत.

भारत आणि विदेशातून आलेल्या तब्बल ६०० प्रस्तावांतून भारतीय ५०, तर विदेशातील १९ नाटकांची यंदा निवड झाली आहे. भारतातील रंगभूमीवरील ३२ तज्ज्ञ, समीक्षक आणि ज्येष्ठ अभ्यासकांच्या निवड समितीने ही निवड केली. ‘हंडाभर चांदण्या’च्या या यशाचे श्रेय खऱ्या अर्थाने संपूर्ण टीमवर्कला असल्याची प्रतिक्रिया लेखक दत्ता पाटील व दिग्दर्शक सचिन शिंदे यांनी व्यक्त केली.

या दीर्घांकात प्राजक्त देशमुख, प्रणव प्रभाकर, गीतांजली घोरपडे, नूपुर सावजी, अरुण इंगळे, राहुल गायकवाड, राजेंद्र उगले, दत्ता अलगट, धनंजय गोसावी यांच्या भूमिका आहेत. निर्मितीप्रमुख लक्ष्मण कोकणे असून, नेपथ्य ईश्वर जगताप व राहुल गायकवाड, प्रकाशयोजना प्रफुल्ल दीक्षित, वेशभूषा श्रद्धा देशपांडे, रंगभूषा माणिक कानडे, संगीत रोहित सरोदे यांचे आहे. निर्मितीव्यवस्था सदानंद जोशी व कैलास पाटील यांची आहे.

असे आहे कथानक

नाटकात पाण्याचा अत्यंत भीषण प्रश्न वेगळ्या पद्धतीने मांडला आहे. पाण्याच्या टँकरची डोळ्यात प्राण आणून वाट पाहण्यासाठी माळावर जमलेल्या छोट्याशा दुष्काळी गावातील विलक्षण गोष्ट यात मांडली आहे. लोकसंगीताच्या प्रभावी माध्यमातून सद्यःस्थितीवर साध्या जगण्यातून उपहासात्मक आणि टोकदार भाष्य करणारा हा दीर्घांक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्के वैरी आता सख्खेे मित्र!

0
0


म. टा. वृत्तसेवा, सिडको

नाशिक महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून प्रभाग रचना व आरक्षण जाहीर झाल्यानंतर सिडको व इंदिरानगर परिसरात झालेल्या पक्षांतरांमुळे गेल्या निवडणुकीत एकमेकांविरोधात लढणारे आता गळ्यात गळे घालून एकत्र लढणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पूर्वीचे विरोधक आता मित्र झाल्याचे चित्र मतदारांना दिसत आहे.

मागील महापालिका निवडणुकीत सिडकोत ११ प्रभाग असून २२ नगरसेवक कार्यरत आहेत. तसेच इंदिरानगर भागात तीन प्रभाग असून येथे सहा नगरसेवक कार्यरत आहे. आता सिडकोत सहा प्रभाग झाले असून इंदिरानगरमध्ये तीन प्रभाग झाले आहे. त्यामुळे सिडको व इंदिरानगर परिसरात नऊ प्रभाग मिळून ३६ नगरसेवक या भागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. यंदा चार उमेदवारांचा प्रभाग असल्याने व प्रभागाचे भौगोलिक क्षेत्रही मोठे असल्याने अनेकांनी आपल्या सोयीने पक्षप्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. मनसेसह अन्य पक्षातून शिवसेना व भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये चढाओढ सुरू झाल्याचे दिसत आहे. या पक्षप्रवेशामुळे मात्र मागील निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात रिंगणात उतरणारे आता गळ्यातगळे घालून निवडणूक लढणार असल्याचे ‘सख्ये वैरी पक्‍के मित्र’ असे काहीसे चित्र सिडको इंदिरानगर भागात निर्माण झाले आहे.

डॉ. हिरेंचे शहाणेंना बळ!
सिडकोत स्थायीचे माजी अध्यक्ष शिवाजी चुंभळे यांच्या विरोधात दोनदा लढणारे रमेश उघडे हे यंदाही शिवसेनेकडून इच्छुक आहेत. मात्र, आता चुंभळे यांनी शिवसेनत प्रवेश केल्यामुळे उघडे आणि चुंभळे एकाच पक्षाचा प्रचार करणार; हे मात्र निश्चित आहे. तसेच माजी नगरसेविका सुमन सोनवणे यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे त्यांच्या विरोधात लढणाऱ्या विद्यमान नगरसेविका कल्पना चुंभळे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. सध्याच्या प्रभाग ४६ मधून मनसेचे उमेदवार मुकेश शहाणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मागील निवडणूक डॉ. अपूर्व हिरे यांच्या विरोधात लढल्यानंतर आता शहाणे डॉ. हिरे यांच्यासोबत निवडणुकीत उतरू शकतात.

---

डॉ. कुलकर्णी-पाटील सोबत

इंदिरानगरच्या सध्या प्रभाग ४० मधून निवडून आलेल्या मनसेच्या डॉ. दीपाली कुलकर्णी यांच्या विरोधात भाजपकडून असलेल्या राजश्री शौचे यांनी निवडणूक लढविली होती. आता मात्र डॉ. कुलकर्णी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने कुलकर्णी व शौचे एकत्र प्रचार करतांना दिसणार आहे. अशी परिस्थिती सध्याच्या प्रभाग ५३ मध्ये आहे. तेथे गेल्या वेळी विजयी झालेले सतीश सोनवणे यांच्या विरोधात भाजपचे गोपाळ पाटील रिंगणात होते. आता मात्र नगरसेवक सोनवणे यांनीही भाजपात प्रवेश केल्याने दोघे विरोधात एकाच पक्षात आल्याचे या भागात दिसून येत आहे.

---

उमेदवारीबाबत अस्पष्टता

पक्षात नव्याने आलेले व सध्या पक्षात असलेले हे एकमेकांबरोबर एकाच प्रभागात लढणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही निश्चितता नाही. पूर्वीचे विरोधक आता एकाच पक्षात आल्याने येत्या काळात विरोधक मित्र झाल्याचे चित्र येत्या प्रचारात दिसणार आहे. अजूनही बरेच जण प्रवेश करू शकतात. गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपचा एकही उमेदवार निवडून आला नसला तरी डॉ. अपूर्व हिरे यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपचा सिडकोत एक नगरसेवक गणला जातो, तर शिवसेनेची ही नगरसेवक संख्या सातवरून १२ पर्यंत गेली आहे.

---

निष्ठावंतांची वाढती खदखद

निवडणुकीपर्यंत अजून कोण कितीतरी पक्षांतर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या पक्षप्रवेशांमुळे वर्षांनुवर्षे निष्ठावंतांवर अन्याय होणार असल्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. पक्षश्रेष्ठींनी भेदभाव न करता उमेदवारी देतांना आपला कौल द्यावा, असे मत आता निष्ठावान कार्यकर्ते व्यक्‍त करीत आहेत. तसेच अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी सध्या सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी चर्चा करून पक्षांतर करावे की काय याबाबतच्या बैठका सुरू केल्याचे दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूर मलनिस्सारण केंद्रासाठी २९ कोटी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या अनेक दिवसांपासून निधीअभावी रखडलेल्या गंगापूर गाव येथील १८ दशलक्ष लिटर क्षमतेचा मलनिस्सारण केंद्राचा समावेश केंद्राच्या अमृत योजनेत झाला आहे. सोमवारी मंत्रालयात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितीने या एसटीपी केंद्रासाठी २९ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे १९ दशलक्ष लिटर क्षमतेचा हा प्रकल्प कार्यान्वीत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पासाठी मार्च २०१५ मध्येच जागा ताब्यात घेण्यात आली आहे. हा प्रकल्प कार्यान्वीत झाल्यास गोदावरीच्या प्रदूषणमुक्तीत मोठा वाटा उचलला जाणार आहे.
गंगापूर येथील १८ दशलक्ष क्षमतेच्या मलजल शुद्ध‌िकरण केंद्रासाठी मार्च २०१५ मध्ये तब्बल साडेनऊ कोटी रुपये देऊन भूसंपादन करण्यात आले. परंतु निधीअभावी हा प्रकल्प रखडला होता. मध्यंतरी सिंहस्थाच्या शिल्लक निधीतून हा प्रकल्प करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. परंतु राज्य सरकारने तो फेटाळला होता. त्यामुळे अमृत योजनेत या प्रकल्पाचा समावेश व्हावा यासाठी प्रयत्न केला जात होता. सोमवारी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली अमृत योजनेची बैठक झाली. त्याला आयुक्त अभिषेक कृष्णा व अधीक्षक अभियंता यू. बी. पवार उपस्थित होते.
या बैठकीत अमृत योजनेत गंगापूर एसटीपीचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्याला उच्चाधिकार समितीने मंजुरी दिली. हे केंद्र उभारण्यासाठी २९ कोटींच्या खर्चालाही मान्यता देण्यात आली. अमृत योजनेत हे केंद्र उभारण्यासाठी राज्यसरकार १७ टक्के तर केंद्र सरकार ३३ टक्के वाटा उचलणार आहे. तसेच ५० टक्के वाटा महापालिकेला उचलावा लागणार आहे. या भागात एमआयडीसीचे दूषित पाणी येते. त्यामुळे नदीचे प्रदूषण होते. आता हा प्रकल्प मार्गी लागल्यास नदीचे प्रदूषणही कमी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील पुलांच्या ऑडिटचा धडाका

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मान्सून परतल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे काम हाती घेतले आहे. महाड येथील दुर्घटनेनंतर अशा प्रकारच्या ऑडिटची घोषणा करण्यात आली होती. जिल्ह्यातील एक हजाराहून अधिक पुलांचे ऑडिट झाल्यानंतर त्यांची सद्यःस्थिती स्पष्ट होणार आहे.
महाड येथील पूल दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्ट्रक्चरल ऑड‌िटचे आदेश दिले. त्यानंतर धोकादायक पुलासह इतर पुलांचीसुध्दा तपासणी सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केली. त्याला दोन महिनेही उलटत नाही तोच आता पोस्ट मान्सूनमुळे पुन्हा त्याच पुलांची तपासणी करण्याची वेळ सार्वजनिक बांधकाम विभागावर आली आहे. त्यात मायनर, मेजर व लाँग ब्र‌िजचा समावेश आहे. ऑक्टोबरअखेरपर्यंत ही तपासणी पूर्ण केली जाणार आहे.
पुलाबाबत दुर्लक्ष केल्यामुळे महाडची दुर्घटना घडली व त्यानंतर संपूर्ण शासकीय यंत्रणाच कामाला लागली. कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास एखाद्या दुर्घटनेची जबाबदारी आपल्यावर येऊ शकते, ही जाणीव सार्वजनिक बांधकाम विभागाला झाल्यानंतर खाते आता जागृत झाले आहे. दरवर्षी प्री-मान्सून आणि पोस्ट मान्सून अशी पुलांची तपासणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जात असली, तरी तो सोपस्कारच होता. पण आता याबाबत शासनानेसुध्दा निधीसाठी हात ढिला सोडल्यामुळे धोकादायक पुलांचे काम करणे आता अधिकाऱ्यांना सोपे जाणार आहे.
नाशिक जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागात नाशिक विभागात मायनर ८९४ ब्र‌िज आहेत, तर मेजर ब्र‌िजची संख्या १४२ आहे. त्यानंतर लाँग ब्र‌िजची संख्या तीन आहे. यात नऊ पूल ब्रिट‌िशकालीन आहेत. त्यामुळे या सर्व पुलांबरोबरच छोट्या पुलांचीही तपासणी केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे आता पुढील वर्षात हीच तपासणी करण्यासाठी स्वतंत्र विभाग होणार असून, त्यानंतरही या पुलांची नियमित तपासणी केली जाणार आहे. त्यात नियमित निरीक्षणे, संरचनात्मक व बांधकाम या विभागामार्फत सद्यस्थितीविषयक तपासणी, नवीन पुलांचे काम केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीच्या सुट्या घटल्या; विद्यार्थी, पालक नाराज

0
0

शाळा यंदा केवळ पंधरा दिवसच राहणार बंद

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीच्या सुट्यांमध्ये घट झाल्याने यंदा विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. सोमवारी, शाळेच्या शेवटच्या दिवशीही शाळांबाहेर पालक व विद्यार्थ्यांमध्ये याबाबतच चर्चा असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे यंदा वेगवेगळ्या शिबिरांवरदेखील त्याचा परिणाम होणार आहे.

वर्षभरात सहामाही परीक्षेनंतर मिळणाऱ्या दिवाळीच्या सुट्या व वार्षिक परीक्षेनंतर मिळणाऱ्या उन्हाळ्याच्या सुट्यांचे विद्यार्थ्यांना विशेष आकर्षण असते. दरवर्षी साधारणपणे बावीस दिवस दिवाळीच्या सुट्या दिल्या जातात. या सुट्यांचा अंदाज घेऊनच कुटूंबांचे सहली, शिबिरे यांचे नियोजन केले जाते. मात्र, यंदा या सुट्या तेरा ते पंधरा दिवसांवर आल्या आहेत. दरवर्षीच्या तुलनेत सुट्यांचे प्रमाण कमी झाल्याने ही नाराजी आहे.

मागील वर्षीही कुंभमेळ्यात दिलेल्या सुट्या भरून काढण्यासाठी दिवाळीच्या सुट्यांमध्ये घट करण्यात आली होती. तर यंदाही विविध कारणांनी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. यामध्ये पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेखातर दोन दिवस सुटी, मराठा मोर्चा, औरंगाबादला विनाअनुदानित शाळा शिक्षकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ, नाशिक विभागातील शिक्षकांच्या मोर्चामुळे, तळेगाव येथील बालिका अत्याचार प्रकरण यांचा समावेश होता. तसेच प्राथमिक शाळांसाठी वर्षभरात २१० दिवस व माध्यमिक शाळांसाठी २३० ते २४५ दिवस कामकाज बंधनकारक आहेत. हे दिवस भरून काढण्यासाठी ही घट करण्यात आली असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगितले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयफोनचा विमा नाकारणे महागात

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

चोरीला गेलेल्या मोबाइलचा विमा नाकारणाऱ्या इन्शुरन्स कंपनीला ग्राहक न्यायमंचाने दणका देत ४४ हजार ४४२ रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, पाच हजारांचा अतिरिक्त दंडही ठोठावला आहे. त्यामुळे विमा काढूनही त्याचा क्लेम नाकारणाऱ्या कंपन्यांना आता जरब बसणार आहे. विशेष म्हणजे आपली बाजू मांडण्यासाठी इन्शुरन्स कंपनीकडून कोणीच न आल्यामुळे न्यायमंचाने हा एकतर्फी निर्णय दिला आहे.

नाशिक जिल्ह्यातील ओढाजवळील शिलापूर येथील दिगंबर हरिश्चंद्र कहांडळ यांनी ग्राहक न्यायालयात तक्रार दिल्यानंतर हा निकाल देण्यात आला आहे. कहांडळ यांनी अॅमेझॉन इनमार्फत अॅपल कंपनीचा आयफोन ४४ हजार ४४२ रुपयात घेतला. त्यानंतर त्यांनी सिस्का गेज सिक्युर कंपनीकडे १४९९ रुपये भरून विमा काढला. मात्र, ओढा येथे भाजीबाजारात त्यांचा आयफोन चोरीला गेला. त्याबाबत उगाव पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली व सिस्का कंपनीला त्याबाबत टोल फ्री क्रमांकावर कळवले. त्यानंतर कागदपत्राची पूर्तता सुध्दा करून दिली. पण सिस्का कंपनीने मेसेजद्वारे क्लेम नामंजूर केल्याचे कळविले. त्याविरोधात कहांडळ यांनी तक्रार केली.

तक्रारीनंतर ग्राहक न्यायमंचाने कोणतेही सबळ कारण नसतांना क्लेम नामंजूर केल्याचा निष्कर्ष काढत हा निर्णय दिला आहे. कहाडंळ यांच्याकडून अॅड. टी. एस. थेटे यांनी युक्तीवाद केला. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्य प्रेरणा काळुंखे-कुलकर्णी, कारभारी जाधव यांनी निकाल दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सलग तीन दिवसांत भूकंपाचे सात धक्के

0
0

कळवण तालुक्यातील ओतूरकर धास्तावले

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कळवण तालुक्यातील ओतूर येथे गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने भूकंपाचे सौम्य धक्के बसत असल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. नाशिक शहरापासून सरासरी ८४ किलोमीटरवर हे धक्के बसले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सलग सात वेळा धक्के बसल्याने परिसरातील रहिवाशांनी भूकंपादरम्यान विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

तालुक्यातील जिरवाडा, चिंचपाडा, अभोणा, कनाशी, जामले, हातगड, करंभेळ, शिंगाशी, बोरगाव, खिराड, वेरुळे, बापखेडा, देसगाव, जामले, बोरदैवत, देवळीवणी आदी गावांमध्ये अनेकदा भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. दळवट आणि ओतूर येथे तर नेहमीच भूकंपाचे सौम्य धक्के बसत असतात. गेले तीन दिवस ओतूर गाव आणि आसपासच्या परिसरात सातवेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. शुक्रवार (दि.२१) रोजी सायंकाळी ६ वाजून १६ मिनिटांनी २.३ रिश्टर स्केलचा भूकंपाचा पहिला धक्का जाणवला. दुसऱ्या दिवशी दुपारी साडेबारा ते रात्री अकरा या कालावधीत भूकंपाचे तीन धक्के बसले. २.१ ते २.८ रिश्टर स्केलचे हे धक्के होते, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी दिली. पुन्हा रविवारी पहाटे सव्वातीन ते पहाटे चार या वेळेत दोन, तर दुपारी एकच्या सुमारास भूकंपाचे धक्क्यांची भूकंप आधार सामग्री पृथ्थकरण कक्षाने नोंद केली आहे. अनुक्रमे २.७, २.१ आणि २.७ ‌रिश्टर स्केलचे हे धक्के होते. नाशिक शहरापासून ७६ ते ९६ किलोमीटर या अंतरात हे धक्के जाणवल्याची नोंद मेरी येथील भूकंपमापन वेधशाळेने केली आहे.

भूकंपात ही काळजी घ्या

भूकंप जाणवल्यास मोकळया जागी जावे. भूकंपादरम्यान वाहनात थांबू नये. गॅस सिलिंडरचे रेग्युलेटर बंद करावे. बॅटरी, टॉर्च, प्रथोमोपचार पेटी जवळ बाळगावी. भूकंपादरम्यान फोटो फ्रेम व जड वस्तुंजवळ उभे राहू नये.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ साक्षीदारांची साक्ष आजपासून

0
0

सरकारी पक्षाच्या अर्जास विशेष न्यायालयाची मंजुरी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

घरकुल घोटाळा खटल्यात पूर्वी तपासलेल्या आठ साक्षीदारांची साक्ष पुन्हा तपासणीबाबत सरकारी पक्षाने न्यायालयात अर्ज केला होता. त्याला विशेष न्यायालयाने मंजुरी दिली. मात्र, या निर्णयाविरुद्ध बहुसंख्य आरोपी उच्च न्यायालयात गेले होते. मात्र, त्यांचा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे सरकार पक्षाकडून आजपासून या आठ साक्षीदारांची साक्ष नोंदविली जाण्याची शक्यता आहे. याप्रकरणी सर्व आरोपींना हजर राहण्याचे आदेशही न्यायाधीशांनी आरोपींच्या व‌किलांना दिले आहेत.

सरकार पक्षाच्या अर्जावर दिलेल्या निर्णयाविरुद्ध बहुसंख्य आरोपींकडून उच्च न्यायालयात अपील करण्यात आले होते. त्यावर २४ व २५ ऑक्टोबरला कामकाज झाले. मात्र, आरोपीचा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावला.

मात्र, या प्रकरणातील सिंधू कोल्हे यांच्याविरुद्ध स्वतंत्र खटला चालविण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्या खटल्याला नवीन क्रमांक दिला जाणार आहे. यासाठी पुन्हा सर्व आरोपींना न्यायालयात आज, बुधवारी उपस्थित राहण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. न्यायालयाकडून आरोप मान्य आहे किंवा नाही हे यावेळी ऐकून घेतले जाईल. यामुळे बुधवारी न्यायालयात सरकार पक्षाकडून या साक्षीदारांची साक्ष नोंदविली जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात विशेष न्यायालयाचे न्या. आर. आर. कदम यांच्यासमोर काम झाले. या वेळी सरकारी वकील निर्मलकुमार सूर्यवंशी व आरोपीत गुलाबराव देवकर, राजेंद्र मयूर हेच आरोपी न्यायालयात उपस्थित होते. बुधवारी मात्र, सर्व आरोपींनी न्यायालयात उपस्थित राहावे, अशी सूचना न्या. कदम यांनी आरोपींच्या वकिलांना केली आहे.

सिंधू कोल्हेंचा खटला स्वतंत्रपणे

घरकुल घोटाळ्यात न्यायालयासमोर माजी नगराध्यक्षा सिंधू कोल्हे यांनी माफीचा साक्षीदार म्हणून कबुली जबाब देण्यात नकार दिल्याने त्यांना आरोपी करण्यात आले. मात्र त्याबाबतचा कोल्हे यांचा खटला स्वतंत्रपणे चालवण्यासाठी त्यांच्या वकिलांकडून अर्ज दाखल करण्यात आला होता. अखेर तो मंजूर करून या खटल्याच्या स्वतंत्र गुन्हा क्रमांकासाठी आज कामकाज होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोइंग कारवाईत दुजाभाव का?

0
0



म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शहरातील उंटवाडी परिसरातील सिटी सेंटर मॉलसमोरच्या रस्त्यावर टोइंग व्हॅनचालकांकडून केवळ दुचाकींवरच कारवाई केली जात असून, येथे उभ्या राहणाऱ्या चारचाकी वाहनांकडे सर्रास डोळेझाक केली जात असल्याचा आरोप दुचाकी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. येथे कारवाई करताना दुजाभाव का केला जातो, असा सवाल करून पोलिस प्रशासनाने शहरातील सर्वच रस्त्यांवर वाहने उभी करणाऱ्यांवर सरसकट कारवाई करावी, अशी मागणी त्रस्त दुचाकीचालकांकडून केली जात आहे.

उंडवाडी पुलाला लागून असलेल्या या रस्त्यावर वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, असे असतानाही असंख्य चारचाकी व दुचाकी वाहने सर्रासपणे येथे उभी केली जात असल्याचे चित्र आहे. येथील दुभाजकांच्या दोन्ही बाजूंना सर्वाधिक चारचाकी वाहनांच्याच रांगा लागलेल्या असतात. मनाई असतानादेखील उभ्या केलेल्या चारचाकी वाहनांकडे पोलिस प्रशासनाने नेमलेल्या टोइंग व्हॅनचालकांकडून काणाडोळा केला जात असून, त्या ठिकाणी दुचाकी वाहने उभी राहिल्यास त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली जात असल्याचा आरोप होत आहे. दुचाकी वाहनांपेक्षा अधिक जागा चारचाकी वाहनांना लागत असताना दुचाकी वाहनांवरच कारवाई का? असा सवाल दुचाकीचालकांकडून उपस्थित केला जात आहे. शहरात अन्यत्रदेखील थोड्याफार फरकाने अशीच स्थिती असून, पोलिस प्रशासनाने सरसकट सर्वच वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

कारवाई केवळ नावालाच

उंटवाडी परिसरातील या रस्त्याच्या दुभाजकांच्या दोन्ही बाजूंना चारचाकी वाहने रस्त्यांवर उभी राहत असतात. यात अनेकदा वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते खरी. परंतु, ती केवळ नावापुरतीच असल्याचा आरोप दुचाकीचालकांकडून केला जातो. दुचाकींप्रमाणेच चारचाकीदेखील या रस्त्यावर उभ्या असल्यास पोलिसांनी कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

---

या रस्त्यावर सुटीच्या दिवशी मोठी गर्दी असते. अनेक जण जागा मिळेल तिथे दुचाकी पार्क करतात. परंतु, येथे कारवाई करताना टोइंग व्हॅनकडून केवळ दुचाकी उचलल्या जातात. त्यामुळे चारचाकी वाहनांवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न पडतो.

-गणेश पाटील, दुचाकीचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार घरफोड्यांत लाखोंचा ऐवज लंपास

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीची लगबग सुरू असताना चोरटे सक्रिय झाले आहेत. सोमवारी दिवसभरात म्हसरूळ, तसेच जेलरोड परिसरातील दोन सोसायट्यांमधील चार फ्लॅट फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. भरदिवसा आणि अल्पवधीत झालेल्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांच्या मनात धास्ती निर्माण झाली असून, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.

दिंडोरीरोडवरील प्रभातनगर भागात भरदिवसा झालेल्या वेगवेगळ्या दोन घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सुमारे दीड लाख रुपयांचे सोन्याचे अलंकार चोरून नेले. ही घरफोडी एकाच इमारतीतील दोन फ्लॅटमध्ये झाली असून, या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. जितेन सुरेश विचारे (शिवदशर्न अपा. वरद विनायक मंदिराजवळ, प्रभातनगर) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. विचारे कुटुंबीय व त्यांच्या शेजारी राहणारे कुटुंबीय सोमवारी दुपारी कामानिमित्त घराबाहेर पडल्यानंतर चोरट्यांनी हात साफ केले. चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला होता. विचारे यांच्या घरातील बेडरूममधील कपाटातून रोकड व सोन्या-चांदीचे दागिणे असा सुमारे एक लाख ५३ हजार रुपयांचा ऐवज, तर फ्लॅट क्रमांक तीनमधील कपाटातून दहा हजार रुपयांची रोकड चोरून नेली.

जेलरोडला दोन ठिकाणी

भीमनगर येथील एकाच इमारतीतील दोन घरे फोडून चोरट्यांनी दीड लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. ही घटना सोमवारी भरदिवसा घडली. या प्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवीदास दत्तू रणशूर (श्रीराम सोसायटी, बेला डिसुझारोड, भिमनगर) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सोमवारी रणशूर व शेजारी राहणारे विजय मुरलीधर जाधव यांचे कुटुंबीय कामानिमित्त घराबाहेर गेले असता चोरट्यांनी दोन्ही घरांचा कडी कोयंडा कापून कपाटातील रोकडसह सुमारे एक लाख ६० हजार ५०० रुपये किमतीचे दागिणे चोरून नेले.

कुरिअर बॅगवर चोरट्यांचा डल्ला

दुचाकीस लावलेली कुरिअरची बॅग चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना गंगापूररोड भागात घडली. या बॅगेत ग्राहकांचा सुमारे १२ हजार ६०४ रुपयांचा ऐवज होता. प्रवीण अंबादास बोराडे (पारिजातनगर, जेलरोड) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. व्हेनेक्स कुरिअर कंपनीत कामास असलेले बोराडे सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास आपले काम करीत असताना ही घटना घडली. नेर्लेकर हॉस्पिटल परिसरातील साईदर्शन सोसायटीत ते पार्सल देण्यासाठी गेले असता चोरट्यांनी दुचाकीस लावलेली व्हेनेक्स कंपनीची कुरिअर पार्सल बॅग चोरून नेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदवीधर मतदार नोंदणीत अहमदनगरची आघाडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणी करण्यास आता दहाच दिवसांचा अवधी शिल्लक आहे. उत्तर महाराष्ट्रात आतापर्यंत ५८ हजार ६०४ पदवीधरांनी नोंदणी केली असून, नाशिकपेक्षाही अहमदनगर जिल्ह्यात मोहिमेला प्रतिसाद चांगला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पदवीधर मतदारसंघासाठी नववर्षाच्या सुरुवातीला निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी जुन्या मतदार याद्या रद्द ठरविण्यात आल्या असून, नव्याने मतदार नोंदणीचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. १ ऑक्टोबरपासून नावनोंदणीला सुरुवात झाली. नोंदणी ५ नोव्हेंबरपर्यंत करता येणार असून, मोहिमेला अद्याप अपेक्षित प्रतिसाद मिळू शकलेला नाही. म्हणूनच २२ आणि २३ ऑक्टोबरला प्रशासनाने विशेष मोहीम राबविली. उत्तर महाराष्ट्रात या विशेष मोहिमेत १० हजार १६ अर्ज जमा झाले. त्यापैकी ४ हजार ३१५ अर्ज नगर जिल्ह्यात जमा झाले. त्या खालोखाल जळगावात एक हजार ९०६ अर्ज जमा झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात मात्र एक हजार ६९० अर्ज जमा झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. धुळ्यात १२९०, तर नंदुरबारमध्ये ८१५ पदवीधरांनी मतदार नोंदणी केली.

उत्तर महाराष्ट्रात १ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत ५८ हजार ६०४ पदवीधरांनी मतदार नोंदणी केली आहे. सर्वाधिक १९ हजार ६४९ मतदार नोंदणी नगर जिल्ह्यात झाली असून, खालोखाल नाशिक जिल्ह्यात १४ हजार ५०८ जणांनी नोंदणी केली आहे. सर्वात कमी ६ हजार ३६८ मतदारांची नोंदणी नंदुरबार जिल्ह्यात झाली आहे. अधिकाधिक पदवीधरांनी जिल्हाधिकारी कार्यालये, तहसील कार्यालये तसेच मंडल अधिकारी कार्यालयांत पोहोचून मतदार नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कार प्रकरणी डॉक्टरला सक्तमजुरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खासगी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असताना परिचारिकेवर बलात्कार करून तिचा गर्भपात केला, तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पंचवटीतील डॉ. चेतन सुभाष तांबे यास सत्र न्यायाधीश सुचेता घोडके यांनी दहा वर्षे सक्तमजुरी, तसेच पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली.

या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार जुलै २०१३ मध्ये पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये बलात्कार, तसेच अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती अत्याचार (प्रतिबंध) कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलिस आयुक्त गणेश शिंदे यांनी केला. पीडित मुलीच्या तक्रारीनुसार, पंचवटीतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या पीडित तरुणीला आरोपी तांबेने लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी संबंध प्रस्थापित केले. गर्भधारणा झाल्यानंतर तांबेने पीडित मुलीचा गर्भपात घडवून आणला. मुलीने वेळोवेळी लग्नाची मागणी केली. मात्र, आरोपीने ती धुडकावून लावत तिला जातीवाचक शिवीगाळ केली. पीडित मुलीने पंचवटी पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दिली होती. न्यायाधीश सुचेता घोडके यांच्या कोर्टात सदर खटल्याची सुनावणी पूर्ण झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ एकलहरे प्रकल्पग्रस्तांना १५ हजारांची वेतनवाढ

0
0


एकलहरे प्रकल्पग्रस्तांना १५ हजारांची वेतनवाढ

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

एकलहरे येथील प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थींना १५ ते १८ हजार रुपयांची वेतनवाढ देण्याची मागणी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच मान्य केली आहे. तसेच या प्रकल्पग्रस्तांच्या अन्य काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.

एकलहरे प्रकल्पग्रस्त व कामगारांच्या प्रश्नावर राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत मंत्रालयात आमदार बाळासाहेब सानप यांच्या

नेतृत्वाखाली एकलहरे प्रकल्पग्रस्त कृती समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीस प्रधान सचिव बिपीन श्रीमाळी, कार्यकारी संचालक बोंद्रे आदी

अधिकारीही उपस्थित होते. महानिर्मितीच्या नवीन भरतीत प्रगत कुशल प्रशिक्षणार्थिंना ५० टक्के आरक्षण देणे, बीटीआयआय विद्यार्थ्यांचा

आयटीआयमध्ये समावेश करून घेणे, प्रकल्पग्रस्त कुशल प्रशिक्षणार्थींना वयाच्या ५८ वर्षांपर्यंत सेवेत ठेवणे, प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या शैक्षणिक अहर्तेप्रमाणे

महावितरणच्या वित्त वा इतर आस्थापनांत सामावून घेणे आदी विषयांवर चर्चा होऊन त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात आला. तंत्रज्ञ-३ ची परीक्षा

पास न होणाऱ्या प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थींना कंत्राटी कामगार म्हणून सेवेत समाविष्ट करून घेणे, महानिर्मिती कंपनीच्या वसाहतीतील व

प्रकल्पबाधीत गावांतील विद्यार्थ्यांसाठी सीबीएससी बोर्डाची शाळा सुरू करणे, जानेवारी २०१७ मध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी महावितरणमध्ये १००० जागांची भरती होत असल्याने या भरतीत सर्व प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देणे आदी निर्णय घेण्यात आले.

या बैठकीस नाशिकरोड भाजप मंडलाध्यक्ष बाजीराव भागवत, कोटमगावचे सरपंच दिनेश म्हस्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तानाजी गायधनी, हेमंत

गायकवाड, कृती समितीचे अध्यक्ष प्रशांत म्हस्के आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी नगरसेवकांचे गुडघ्याला बाशिंग

0
0

निवडणूक रंग : पंचवटी

---

रामनाथ माळोदे, पंचवटी

नाशिक महापालिकेच्या १९९२ ते २००७ या चार पंचवार्षिकच्या काळात एकदा, दोनदा किंवा तीन वेळा नगरसेवकपद भूषविणारे अनेक जण आहेत.

वेगवेगळ्या कारणांनी त्यांना सत्तेपासून दूर राहावे लागले होते. त्यातील काहींना आरक्षणामुळे संधी मिळाली नाही, तर काहींनी पुन्हा पुन्हा प्रयत्न

करूनही मतदारांनी त्यांना नाकारले. मात्र, चार सदस्यीय प्रभाग रचनेत निवडणूक लढण्याची संधी उपलब्ध झाल्याने असे अनेक माजी नगरसेवक

गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत. नशीब आजमावण्यासाठी त्यांनी सारी शक्ती पणाला लावण्याची तयारी केली आहे.

पहिल्या दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये वॉर्डस्तरीय रचना होती. नंतर तिसऱ्या पंचवार्षिकला त्रिसदस्यीय प्रभाग रचना झाली. चौथ्या पंचवार्षिकला पुन्हा

वॉर्डरचना झाली, पाचव्या पंचवार्षिकला दोन सदस्यांची प्रभाग रचना झाली होती आणि आता थेट चार सदस्यीय प्रभाग रचना झाल्याने प्रभागाचा

विस्तार आणि मतदारांची वाढलेली संख्या यांना तोंड देण्यासाठी परिचित उमेदवारांना चांगली संधी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गेली काही

वर्षांपासून पदापासून वंचित राहिलेल्या माजी नगरसेवकांनी जय्यत तयारी करण्याच्या दृष्टीने चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे.

दहा वर्षांनंतर पवार

२००२ च्या त्रिसदस्यीय प्रभाग रचनेत अरुण पवार निवडून आले होते. त्यानंतर त्यांचा भाग हा महिलांसाठी राखीव झाला. त्यामुळे त्यांच्या पत्नी

शालिनी पवार यांनी दहा वर्षे या भागाचे प्रतिनिधित्व केले. येत्या २०१७ च्या निवडणुकीत प्रभाग एकमधील एक जागा सर्वसाधारण खुल्या गटासाठी

असल्याने अरुण पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

भोगे, कोशिरे यांचे काय?

१९९२ च्या पहिल्या पंचवार्षिकनंतर ज्या काही निवडणुका लढविल्या त्यात भगवान भोगे यांना पराभवाचेच धनी व्हावे लागले. मात्र, त्यांच्या पत्नी (कै.)

आशा भोगे आणि कन्या रिमा भोगे यांच्या हाती मतदारांनी सत्ता दिली. २०१२ च्या निवडणुकीत अनपेक्षितपणे पराभूत झालेले शरद कोशिरे यांनी पुन्हा

लढण्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. मात्र, ते ज्या भागातून निवडणूक लढवित आहेत. त्या भागातील महापालिका निवडणुकीचा इतिहासाकडे वळून

बघितले असता या भागात राहणाऱ्या नगरसेवकाला पराभवच पत्करावा लागलेला आहे.

कर्डक-धोत्रे-भोगे पुन्हा एकदा

एकेकाळी काँग्रेसचा प्रभाव असलेल्या फुलेनगरसारख्या झोपडपट्टीच्या भागात भाजपच्या तिकिटावर रुख्मिनी कर्डक यांनी १९९७ मध्ये विजय मिळविला

होता. त्यानंतर मात्र त्या पराभव पत्करावाला लागला. लक्ष्मण धोत्रे हे काँग्रेसचे नगरसेवक होते. त्यांनी येत्या निवडणुकीची तयारी अगोदरपासून सुरुवात

करताना भाजपची वाट धरली आहे. रिमा भोगे या भागातून पुन्हा निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागल्या आहेत.

संधीचे सोने करण्याची आस!

२०१२ च्या निवडणुकीसाठी महिला राखीवतेमुळे कमलेश बोडके यांची संधी हुकली. मात्र, तेथून त्यांनी मातोश्री फुलावती बोडके या निवडून आल्या. येत्या

निवडणुकीत त्यांना संधी मिळणार असल्याने त्यांची तयारी सुरू झाली आहे. पहिल्या आणि तिसऱ्या पंचवार्षिकमध्ये हरिभाऊ लासूरे नगरसेवक होते.

त्यांना या निवडणुकीत लढण्याची जय्यत तयारी केली आहे. २००२ च्या त्रिसदस्यीय प्रभाग रचनेत उल्हास धनवटे आणि वॉर्डरचनेत महिला राखीव

झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नी जयश्री धनवटे यांनी विजय मिळविला होता. त्यानंतर झालेल्या पक्षबदलामुळे त्यांना तिकिटापासून वंचित राहावे लागले

होते. चार सदस्यीय प्रभाग रचनेत त्यांना संधी मिळणार आहे.

तांदळे, खोडे, बागूल यांना संधी

२०१२ च्या निवडणुकीसाठी अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी जागा राखीव झाल्यामुळे डॉ. जगन्नाथ तांदळे यांची संधी हुकली होती. येत्या निवडणुकीत

ही संधी चालून आलेली आहे. दोनदा नगरसेवक झालेले पुंडलिक खोडे हे १० वर्षांपासून सत्तेपासून दूर आहेत. त्यांच्या २०१२ मध्ये पराभवाचा धक्का

बसलेले संजय बागूल यांना प्रभाग सहामधून निवडणूक लढण्याची संधी प्राप्त झाली आहे.


शिंदे, खेताडे, सूर्यवंशी यांच्याकडे लक्ष

शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर तिनवेळा नगरसेवक झालेले अॅड. जे. टी. शिंदे यांनी १९९२, १९९७ आणि २००७ या पंचवार्षिकमध्ये आडगावचे

प्रतिनिधित्व केले. या तिन्हीही निवडणुका वॉर्डस्तरीय होत्या. २००२ च्या त्रिसदस्यीय प्रभाग निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. तसेच २०१२

च्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी पुष्पावती शिंदे यांचा पराभव झाला होता. प्रभागरचनेत त्यांचा प्रभाव कमी पडत असल्याचे दिसते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या

स्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच पोटनिवडणुकीत सुरेश खेताडे यांनी विजय मिळवून राष्ट्रवादीचे खाते उघडले. त्यानंतर २००२ च्या निवडणुकीतही त्यांचा

विजय झाला होता. २०१२ च्या निवडणुकीत पराभूत झालेले अनंत सूर्यवंशी हे देखील तयारीला लागले आहेत. त्यांच्यासह खेताडे, अॅड. शिंदे या माजी

नगरसेवकांकडे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेवटच्या दिवशी हरकतींचा पाऊस

0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने नव्याने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेवर मंगळवारी शेवटच्या दिवशी २२ हरकती व सूचना दाखल करण्यात आल्या. त्यामुळे हरकतींची संख्या आता ३२ झाली आहे. या हरकतींवर सुनावणींसाठी कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांची आयोगाने नियुक्ती केली असून, सुनावणीची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.

विद्यमान नगरसेविका वैशाली भागवत यांच्यासह शिवसेनेचे माजी सभागृहनेते भगवान भोगे यांनी हरकत घेतली आहे. महापालिका निवडणुकीसाठी जाहीर प्रभार रचना जाहीर झाल्यानंतर सध्या हरकती व सूचना मागविल्या आल्या होत्या.

चार सदस्यीय प्रभागरचनेवर आक्षेप घेण्यासह प्रभागांमधील अदलाबदल तसेच संपूर्ण प्रभागरचनेवरच हरकतींचा समावेश आहे. शेवटच्या दिवशी भगवान भोगे यांनी पूर्ण प्रभागरचनेवरच आक्षेप घेतले

असून प्रभाररचना ही जातीच्या आधारे व राजकीय दबावाखाली केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर रमेश कडलग (प्रभाग क्र. ८), सुरेश देवरे (प्रभाग क्र. २१ व २९), सुधीर डोळस (संपूर्ण प्रभागरचना), राजेंद्र जाधव (प्रभाग क्र. २०), निवृत्ती अरिंगळे (प्रभाग क्र. १९), वैशाली भागवत (प्रभाग क्र. २२), बंडू जाधव (प्रभाग क्र. २२ व ३१), अमोल कांदे (प्रभाग क्र. ६), कल्पना पाठक (चार सदस्यीय प्रभागरचना), तेजस गायकवाड (प्रभाग क्र. ७), नंदन भास्करे (प्रभाग क्र. ७ व १४), तेज शिरसाठ (प्रभाग क्र. १४), उद्धव वाघुळे (प्रभाग क्रं. १७) यांनी दाखल केल्या आहेत. या हरकतींच्या सुनावणीसाठी दीपक कपूर यांची नियुक्ती झाली आहे.

---

भगवान भोगेंचा भाजपवर वार

शिवसेनेचे माजी सभागृह नेते भगवान भोगे यांनी संपूर्ण प्रभागरचनेवरच आक्षेप घेत, ही प्रभागरचना जातीय आधारावर व राजकीय दबावाखाली तयार केल्याचा आरोप केला. पंचवटीतील काही प्रभागांमध्ये विशिष्ट जाती, भाषिक मतदारांचा समावेश केला आहे. काही ठिकाणी नैसर्गिक तत्वे पाळण्यात आलेली नाहीत. छोट्या प्रभागांचा फायदा भाजपला मिळावा, यासाठी प्रयत्न करण्यात आले आहे. प्रभाग क्र. १५ हा माजी आमदार वसंत गिते यांच्यासाठी लहान करण्यात आला आहे. निवडक पदाधिकाऱ्यांना निवडून येणे सोपे होण्यासाठी काही ठिकाणी स्लमचे विभाजन करण्यात आले. प्रभागरचना ही अगोदरच फोडण्यात आल्याचा आरोप भोगे यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खाद्यभेसळीवर नजर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विविध सणांच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनामार्फत (एफडीए) अन्न पदार्थ उत्पादक आणि विक्रेत्यांच्या तपासणीची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत २९ ठिकाणी कारवाई करण्यात येऊन अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

मोहिमेअंतर्गत खवा, मावा, बर्फी, मिठाई, खाद्यतेल, वनस्पती तूप आदि अन्न पदार्थाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येत आहेत. नाशिक विभागात खवा, मावा आणि मिठाईचे ८५ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. त्यापैकी १२ ठिकाणी १२ लाख ८ हजार किमतीचा १० हजार ५९८ किलो साठा जप्त करण्यात आला. खाद्यतेल, वनस्पती आणि तुपाचे १०४ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. त्यापैकी १७ ठिकाणी कारवाई करून ४४ लाख ६९ हजार रुपयांचा २४ हजार ८८५ किलो साठा जप्त करण्यात आला. मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. नागरिकांनी मिठाई ताजी असल्याची खात्री करून खरेदी करावी. माव्यापासून तयार केलेली मिठाई २४ तासाच्या आत तर बंगाली व तत्सम मिठाई ८ ते १० तासाच्या आत सेवन करावी. खराब मिठाई नष्ट करावी. तेल-तूप खरेदी करताना त्यावरील दिनांक पाहूनच खरेदी करावे, असे आवाहन ‘एफडीए’ने केले आहे.

अन्नपदार्थांविषयी करा तक्रार
अन्नपदार्थ खरेदी करताना शंका असल्यास सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, उद्योग भवन, ५ वा मजला कक्ष क्रमांक २१ सातपूर रोड नाशिक येथे प्रत्यक्ष किंवा २३५१२००, २३५१२०१, २३५१२०४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

वजनमापांसंबंधी तक्रार
दुकानदारांविषयी तक्रार असल्यास विभागीय महसूल कार्यालयातील वैध मापन यंत्रणा विभागात लेखी तक्रार अथवा कार्यालयीन वेळेत ०२५३-२४५५६९६ या नंबरवर संपर्क साधून तक्रार करू शकतात. नाशिकसाठी मेरी येथील कार्यालयात किंवा कार्यालयीन वेळेत ०२५३-२५३१९३९ या क्रमांकावर तक्रार दाखल करू शकतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम परवानगी फास्ट ट्रॅकवर

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या नगररचना विभागातील बांधकाम परवानगीचा संथ प्रवास नवीन वर्षापासून संपणार आहे. ‘नगररचना’च्या सर्व परवानग्या फास्ट ट्रॅकवर येणार आहे. ऑनलाइन परवानग्यांसाठीची ऑटो डीसीआर यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. विशेष म्हणजे ‘नगररचना’मधील बांधकाम परवानगी फाइल्सचा प्रवास १५ दिवसांत संपेल. तसेच आपल्या फायलींचा प्रवास व त्यासंदर्भातील माहिती बिल्डरांसोबतच ग्राहकांनाही ऑनलाइन पाहता येणार आहे.

महापालिका क्षेत्रात बांधकाम परवानगी, अभिन्यास मंजुरी, भोगवटा प्रमाणपत्रासह अनेक परवानगर ‘नगररचना’तर्फे दिल्या जातात. परंतु, या विभागात केवळ ‘वजनदार’ फाइलींचाच प्रवास सुसाट होत असल्याची ओरड आहे. फाइल्स मंजूर करण्यासाठी वेगवेगळे फंडे या विभागात अवलंबले जातात. त्यामुळे हा विभाग नेहमीच वादात असतो. त्यामुळे या विभागातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी परवानगी या ऑनलाइन देण्याचा निर्णय आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी घेतला आहे. स्थायी समितीने यासाठी एक कोटी ३३ लाखांचे काम दिले आहे. पुण्यातील सॉफ्टेक इंजिनीअर्स प्रा. लि. कंपनीला काम देण्यात आले आहे. संबंधीत कंपनीकडून या प्रणालीचे आयुक्तांच्या उपस्थितीत मंगळवारी सादरीकरण करण्यात आले.

ऑटो डीसीआर प्रणाली इमारत आराखडा अर्ज व नकाशे ऑनलाइन सादर करता येणार आहे. बिल्ड‌िंग बायलॉजनुसार आपोआप मंजुरी मिळणार आहे. तसेच एफएसआय तपासणी संगणकाद्वारेच केली जाणार आहे. इमारत आराखड्याची छाननी, मंजुरी प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर एसएमएस व इमेल अलर्ट, साईट व्हिजिट, सर्व शुल्क ऑनलाइन जमा होणार अशा सुविधा असणार आहे. त्यामुळे बिल्डरांची व सर्वसामान्यांची ‘नगररचना’च्या जाचातून सुटका होणार आहे. एखाद्या अभियंत्याने कामाला उशीर केल्यास ऑटोमॅटिक अलर्ट जनरेट होऊन संबंधीताला नोटिसही बजावली जाणार आहे. त्यामुळे ‘नगररचना’च्या कामात गतिमानता, पारदर्शकता येऊन महसुलाचे उद्दिष्ट साध्य करता येणार आहे.

नागरिकांनाही कळणार स्टेट्स
महापालिकेची ऑटो डीसीआर यंत्रणा आता सर्वसामान्य नागरिकांसाठीही खुली राहणार आहे. निश्चित कालावधीत प्रकरण मंजुरीची जबाबदारी अधिकाऱ्यांवर राहणार आहे. सर्वसामान्यांना घरबसल्या आपल्या संगणकावर गुगल मॅपिंगद्वारे बिल्डींगचे आराखडे पाहता येणार आहेत. तसेच संबंधित बिल्डिंगची स्थिती, बिल्डरांना टाकलेला प्लॅन याची इत्यंभूत ग्राहकांना पाहता येणार आहे. त्यासाठीची एरिया सर्च ही स्वंतत्र व्यवस्था या प्रणालीत करण्यात येणार असल्याने बिल्डरांकडून ग्राहकांची होणारी फसवणूक टळणार आहे.

ऑटो डीसीआर यंत्रणा स्वंयचलित असून त्यामुळे कारभार पारदर्शक होणार आहे. प्रक्रिया एका क्लिकसरशी आपल्या मोबाइल व कॉम्प्युटरवर पाहता येणार असल्याने सर्वसामान्यांची होणारी फसवणूक टळणार आहे.
- अभिषेक कृष्णा, आयुक्त, महापालिका

प्रणालीचा असा होणार फायदा
बिल्डिंग नकाशांची स्वयंचलित छाननी
परवानग्या ६० ऐवजी १६ दिवसांत मिळणार
महापालिकेच्या उत्पन्नात होणार वाढ
बिल्डिंग नकाशे व आराखडे ऑनलाइन सादर होणार
गुगलबेस मॅपिंग होणार
नागरिकांना ऑटो सर्चची सुविधा
बिल्डिंगचे स्टेटस नागरिकांना वेळोवेळी समजणार
बिल्डर, अधिकाऱ्यांसाठी एसएमसएस अलर्ट सुविधा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images