Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

बँकांचे कार्डक्लोन रोखणार

$
0
0

सायबर आर्मीची उच्चस्तरीय बैठक; नाशिकच्या तज्ज्ञाचाही सहभाग

fanindra.mandlik@timesgroup.com

Tweet @FanindraMT

नाशिक : संपूर्ण देशातील बँकिंग व्यवस्थेला हादरवणाऱ्या कार्डक्लोन प्रकरणाबाबत दिल्ली येथे सायबर आर्मीची उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. या प्रकरणाचे मूळ शोधण्याचे काम समिती करीत आहे. या समितीत देशातील नामवंत हॅकर्स व सायबर सिक्युरिटीतील तज्ज्ञ काम करीत असून, त्यात नाशिकच्या अमर वझरे या युवकाचाही समावेश आहे.

देशातील नामवंत बँकांच्या ग्राहकांचे पैसे त्यांच्या खात्यातून परस्पर काढण्याचे प्रकार होत असून, यात कार्डचे क्लोन करून ग्राहकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार सुरू आहे. या प्रकरणात अनेक बॅँकांचा महत्त्वाचा डाटादेखील करप्ट झाला आहे. यामध्ये अॅक्सिस, एसबीआय, आयसीआयसीआय, एचडीएफसी, एस बॅँक आदी बॅँकांचा समावेश आहे. या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी दिल्लीत सायबर आर्मीची एक उच्चस्तरीय बैठक बोलविण्यात आली असून, त्यात देशातील नामवंत तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे.

नाशिक शहरातील सर्व एटीएममध्ये आपल्या खात्याचा पीन बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यावी, असे आवाहन सायबर तज्ज्ञ अमर वझरे यांनी केले आहे. यातील मास्टर कार्ड आणि विजा कार्ड यांना सर्वात जास्त धोका असून, या कार्डधारकांचा डेटा मेलवेअर टाकून अॅक्सेस केला आहे. यातील लॉगफाईल चोरीला गेल्या आहेत. ग्राहकांनी आपल्या एटीएमचा पीन तातडीने बदलणे आवश्यक असून, त्यानंतर बॅँकेकडून कार्ड बदलणे गरजेचे आहे. ग्राहकांना कुणाचाही फोन आल्यास बँकेचे डिटेल देऊ नये, त्याचप्रमाणे जे कार्ड ब्लॉक झाले आहेत त्यांचा सीव्हीव्ही नंबर हॅकर्सकडे आहेत, अशा ग्राहकांनी कार्ड बदलणे गरजेचे आहे. यामुळे ग्राहकांना फक्त पीन बदलून चालणार नाही. कॅस्पर स्काय नावाच्या एका कंपनीने भारतातील एका नामांकित कंपनीला तुमचा डेटा चोरी होत आहे, याची कल्पना दिली होती. त्याच कंपनीच्या ग्राहकांचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. अनेकजण ऑनलाइन व्यवहार करताना ती साईट सिक्यूअर आहे, की नाही याची खातरजमा करीत नाहीत. ज्या साईट्ची सुरुवात hppps या अद्याक्षरांनी होते त्याच साईट्सवरून व्यवहार करावेत, असे सांगण्यात आले आहे. वायफाय सुरू आहे, अशा ठिकाणाहून ऑनलाइन बॅँकिंगचे व्यवहार करू नये. हा सायबर हल्ला चीनकडून होत असल्याचा संशय असून, जास्तीत जास्त नागरिकांनी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे.

येथे करा तक्रार

बॅँक व्यवहाराबाबत काही संशयास्पद हालचाल वाटत असेल, कुणी अनोळखी व्यक्ती बॅँकेचे डिटेल्स विचारत असतील किंवा बॅँकेतून पैसे गहाळ झाले असतील, तर याबाबत तक्रार करायची असल्यास ९७६२१००१०० या क्रमांकावर तक्रार करावी. नाशिक पोलिसांचा हा व्हॉट्सअॅप क्रमांक असून, त्याची दखल घेऊन तातडीने कार्यवाही केली जाणार आहे.

ही घ्या काळजी

एटीएमचा पीन तातडीने बदलणे आवश्यक, कुणाचाही फोन आल्यास बँकेचे डिटेल देऊ नये, वायफाय सुरू आहे तेथे ऑनलाइन बॅँकिंगचे व्यवहार करू नये, बॅँकेकडून कार्ड बदलणे गरजेचे

ऐन सणासुदीच्या काळात बॅँक ग्राहकांचे कार्ड बंद झाल्याने मोठा अनर्थ ओढावला आहे. ग्राहकांनी व्यवहाराबाबत सावधानता बाळगावी. तातडीने एटीएमचा पीन बदलावा. त्यानंतर बंद झालेले कार्ड बदलून घ्यावे.

- अमर वझरे, संचालक, सायबर आयटी सिक्युरिटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोदावरी, नंदिनीचा पूरप्रभाव होणार कमी!

$
0
0

अभ्यास समितीची स्थापना; महिनाभरात अहवाल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोदावरी व नंदिनी नदीला वारंवार येणाऱ्या पुराचा प्रभाव कमी करण्यासाठी महापालिका आता पाटबंधारे विभागाच्या मदतीने अहवाल तयार करणार असल्याची माहिती आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी दिली. पूरप्रभाव कमी करण्यासाठी नदीकाठावरील बंधारे हटविण्यासह नदीतील गाळ काढणे व पुलांची उंची वाढविण्याचा त्यात समावेश आहे. पूररेषेमुळे बाधित झालेल्या हजारो मिळकतींना या अहवालामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आयुक्तांसह मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती फरांदे यांनी दिली असून, यासाठी सुमारे शंभर कोटी रुपये खर्च येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गोदावरी व नंदीनीला सन २००८ व २०१६ मध्ये आलेल्या महापुरात नदीकाठावरील रहिवाशी भाग हा पूर्णतः पाण्याखाली गेला होता. त्यामुळे हजारो मिळकतींचेही नुकसान झाले होते. सन २००८ मध्ये आलेल्या महापुरानंतर पूररेषा तयार करण्याचा निर्णय झाला होता. यासाठी महापालिका, जलसंपदा व केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्राच्या पुणे कार्यालयाकडून सर्व्हेक्षण करण्यात आले होते. त्यातून दोन्ही नदीकाठावर निळी व लाल रेषा निश्चित करून या दरम्यान येणाऱ्या मिळकतींना परवानगीच नाकारण्यात आल्याने जवळपास साडेतीन हजार मिळकती अडचणीत सापडल्या आहेत. यावेळी पूररेषा तयार करण्यासह अनेक उपाययोजनाही या संशोधन केंद्राने सुचविल्या होत्या. परंतु, या उपाययोजनांकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप फरांदे यांनी पत्रकार परिषदेत केला. गोदावरी व नासर्डी नदीपात्राची शहर परिसरातील पूर वाहून नेण्याची क्षमता कमी असल्याने तत्कालीन लोकप्रतिनीधींनी पूररेषेची व पूरप्रभावित क्षेत्राची व्याप्ती कमी करण्यासाठी काही उपाययोजना सुचवून त्याची अंमलबजावणी करण्याबाबत जलसंपदा व महानगरपालिकेला सूचना केल्या. नदीपात्रात आवश्यक त्या उपाययोजनांनंतर जसे नदीपात्राची रुंदी न वाढविता नदीपात्रातील बंधारे, केटीवेअर बंधारे काढणे, नदीपात्रातील तळातील गाळ काढणे ही कामे २५ वर्षांत झाली नाहीत. त्यामुळे स्वतः पाहणी केली असून, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यासोबत चर्चा केली आहे. आयुक्तांनी पूरप्रभाव क्षेत्र कमी करण्यासाठी एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती त्यांनी दिली. दोन पालिकेचे अधिकारी व जलसंपदाचे दोन अभियंते हा अहवाल तयार करणार असल्याचे फरांदे यांनी सांगितले.

पूरप्रभावित क्षेत्र कमी करण्यासाठी उपाययोजना

दोन्ही नद्यांवरील जुन्या पुलांची उंची वाढविणे, आनंदवल्लीचा बंधारा हटवणे, होळकर पुलाखालील बंधारा हटवून बॅरेज गेट उभारणे, दोन्ही नद्यांमधील गाळ उपसणे, खोल पात्रातील भागात संरक्षक भिंत उभारणे, फॉरेस्ट, आसाराम बापू, रामवाडी, उंटवाडी पूल उंच व नवीन करणे, मल्हारखान येथे संरक्षक भिंत बांधणे, नंदीनीवरील तिडके कॉलनी, पखालरोड, वडाळारोड, नासर्डी पुलाची उंची वाढविणे, बलून टाईपची बंधारे उभारणे, उंटवाडी पुलाच्या स्लॅबखालील बीमची खोली कमी करणे, पुराचे सुयोग्य नियोजनासाठी संगणीकृत पूरपूर्वानुमान केंद्रांची निर्मिती

पूरप्रभाव क्षेत्र कमी करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी शंभर कोटींचा खर्च येणार आहे. परंतु, त्यामुळे हजारो मिळकतींना संरक्षण मिळणार असून, भविष्यातील पुराचा धोकाही टळणार आहे.

- प्रा. देवयानी फरांदे, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळी महाराज देवस्थानची दानपेटी सील

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

पंचवटी येथील जागृतस्थान असलेल्या श्री क्षेत्र बळी महाराज देवस्थान मंदिराची दानपेटी सील करण्याचे आदेश धर्मादाय उपायुक्त राहुल मामू यांनी दिले आहेत. या आदेशात यापुढील व्यवहार धर्मादाय आयुक्तालयातील निरीक्षक सुभाष हळदे यांच्या मार्फत केले जातील व मंदिराचे स्वतंत्र खाते उघडले जाणार असल्याचेही म्हटले आहे.

बळी महाराज मंदिराच्या नोंदणीवरून धर्मादाय आयुक्त कार्यालयात वाद सुरू असून, वाळू शिंदे, अनंता सूर्यवंशी व विजय अभंग यांनी आपणच विश्वस्त असल्याचा दावा करीत नोंदणीची मागणी केली आहे. दरम्यानच्या काळात या मंदिरात गोळा होणारी वर्गणी व दानपेटीवरूनही वाद होता. त्यामुळे विजय अभंग यांनी दानपेटी सील करण्याची मागणी करणारा अर्ज दिला. त्यावर धर्मादाय उपायुक्त यांनी हे आदेश दिले. अभंग यांच्यातर्फे अॅड. एम. डी. कुलकर्णी, अॅड. यू. पी. वाळुंज व अॅड. भाऊसाहेब गंभीरे यांनी युक्तिवाद केला.

सर्वांना वाटते ट्रस्टी व्हावे

बळी महाराज देवस्थान मंदिर राष्ट्रीय महामार्गालगत येत असल्याने नवीन मंदिर रासबिहारी शाळे जवळील मोकळ्या जागेत विस्तारण्यात आले. नवीन मंदिराचे काम सुरू झाल्यापासून हा वाद सुरू झाला. आपसातील मतभेदांमुळे व भाऊबंदकीच्या वादामुळे या परिसरातील प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याला ट्रस्टी व्हाव, यासाठी चाढाओढ सुरू झाली. त्यामुळे सर्व एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकले. हा वाद स्थानिक पातळीवर न मिटता तो तीन वर्षांपूर्वी धर्मादाय आयुक्त कार्यालयात जाऊन पोहोचला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभाग रचनेवर आठ हरकती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या नव्याने जाहीर झालेल्या प्रभाग रचनेवर सध्या हरकती व सूचना दाखल केल्या जात असून, आतापर्यंत आठ हरकती विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्यात विशेषतः प्रभागांची मोडतोड करण्यावर आक्षेप घेण्यात आले आहेत. कौस्तुभ परांजपे यांनी संपूर्ण प्रभाग रचनेवरच आक्षेप घेतला आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने दिवाळीमुळे हरकतींवरील सुनावणीला ९ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. सुनावणींसाठी कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांची आयोगाने नियुक्ती केली आहे.

मनपा निवडणुकीसाठी जाहीर प्रभार रचनेवर सध्या हरकती व सूचना मागविल्या जात आहेत. येत्या २५ ऑक्टोबरपर्यंत या हरकती व सूचना दाखल करायच्या आहेत. आतापर्यंत शैलेश ढगे (प्रभाग १७), अजिंक्य साने (प्रभाग १३), सत्यभामा गाडेकर (प्रभाग १९), नितीन चिडे (प्रभाग २१), संजय भालेवराव (प्रभाग १७), परेश लोखे (प्रभाग २०), करणसिंग बावरी (प्रभाग १५) यांच्या हरकती प्राप्त झाल्या आहेत. कौस्तुभ परांजपे यांनी संपूर्ण प्रभाग रचनेवरच आक्षेप घेतला आहे. आयोगाने या हरकतींवर सुनावणीसाठी ४ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली होती. परंतु, दिवाळीमुळे ही मुदत वाढवली आहे. आता ४ नोव्हेंबर ऐवजी ९ नोव्हेंबरपर्यंत सुनावणी केली जाणार आहे.

दीपक कपूर यांची नियुक्ती

या हरकती व सूचनांवर सुनावणी घेण्यासाठी निवडणूक आयोगाने नाशिक महापालिकेसाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांची नियुक्ती केली आहे. कपूर हे हरकतींवर सुनावणी घेऊन त्या संदर्भातील स्पष्ट अहवाल महापालिका आयुक्तांमार्फत राज्य निवडणूक आयोगाला सादर करणार आहेत. त्यासाठी महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी त्यांना या सुनावणी घेण्यास मदत करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत अधिकारीच उदासीन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भ्रष्टाचाराबाबतच्या तक्रारींवर कारवाई करायला हवी, तक्रारदारांचे आरोप खोडून काढायला हवेत, असे प्रशासनाच्या विविध कार्यालयांमधील सक्षम अधिकारीच भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत उदासीन असल्याचे शुक्रवारी पुन्हा एकदा स्पष्ट झाले. या विषयावरील बैठकीला दांडी मारून मुजोर अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्याच आदेशाला केराची टोपली दाखविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सरकारी परिपत्रकाचा अवमान केला म्हणून संबंधितांना नोटीस काढण्याचा निर्णय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक घेण्यात आली. तब्बल तीन महिन्यांनी आयोजित या बैठकीत १४ तक्रारींवर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र त्यापैकी निम्म्याहून अधिक तक्रारींवर संबंधित विभागांकडून कार्यवाहीच झाली नसल्याचे या बैठकीत स्पष्ट झाले. बैठकीला त्या त्या विभागाच्या सक्षम अधिकाऱ्यांनी हजर राहाणे अनिवार्य असताना लिपिक किंवा तत्सम कर्मचाऱ्यांना पाठवून अधिकाऱ्यांनी स्वत:च्या निष्क्रियतेचाच पुरावा दिला. अनेक तक्रारींवर ठोस कार्यवाहीच झाली नसल्याचे लक्षात आल्यानंतर बगाटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बैठकीबाबत सूचना देऊनही सक्षम अधिकाऱ्यांनी उपस्थित न राहाणे हा सरकारी परिपत्रकाचा अवमान असून, संबंधितांना नोटीस काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

भ्रष्टाचाराच्या पाच नवीन तक्रारी

बगाटे यांच्या दालनात झालेल्या या बैठकीत भ्रष्टाचारासंबंधी पाच नवीन तक्रारी करण्यात आल्या. पेठ तालुक्यातील निरगुडे येथील आश्रमशाळेत बोगस नोकर भरतीद्वारे आठ लाख १६ हजार रुपयांच्या रकमेचा अपहार करण्यात आल्याची तक्रार बापू बैरागी यांनी केली आहे. याखेरीज महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेबाबत सटाणा तालुक्यात अपहार झाल्याची तक्रारही जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. याखेरीज अन्य तीन तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत.

अधिकाऱ्यांना आदेश

वर्षभरापूर्वी दाखल प्रकरणे त्वरित निकाली काढावीत, भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीत तोंडी माहिती न देता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, त्याची एक प्रत संबंधित तक्रारदारालाही दिली जावी. कार्यवाहीनंतर सेवापुस्तकात नोंद घेतली असेल, तर त्याचे पुरावेही अधिकाऱ्यांनी सादर करावेत, असे आदेश या बैठकीत देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यपालांच्या दौऱ्याची प्रशासनाकडून चोख तयारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ एज्युकेटर्स फॉर वर्ल्ड पीस’ यांच्या परिषदेच्या निमित्ताने राज्यपाल सी. विद्यासागर राव नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या सुरक्षेसह एकूणच व्यवस्थेबाबत चोख तयारी करा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी संबंधित विभागांना दिल्या.

या दौऱ्यात राज्यपालांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलाविण्यात आली होती. अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्या मुख्य उपस्थितीत झालेल्या या बैठकीला सहायक पोलिस आयुक्त डॉ. राजू भुजबळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर आदींसह सार्वजनिक बांधकाम विभाग, बीएसएनएल, महावितरण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सकाळी पावणेदहाच्या सुमारास राज्यपालांचे पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे. गोखले एज्युकेशन सोसायटी या संस्थेत होणाऱ्या परिषदेचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते होणार आहे. सकाळी सव्वाअकराच्या सुमारास ते पुन्हा मुंबईकडे मार्गस्थ होणार आहेत. राज्यपालांच्या सुरक्षेसह एकूणच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेण्याबाबत पोलिसांना सूचित करण्यात आले. राज्यपाल जातील त्या मार्गावर स्वच्छता राहील, याची खबरदारी घेण्यास महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. राज्यपालांची गैरसोय होऊ नये, यासाठी विविध विभागांना त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रात काळजी घेण्याबाबतच्या सूचना दिल्याचे खेडकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाडकरांच्या आरोग्याशी खेळ

$
0
0

पंचायत समितीच्या बैठकीला आरोग्य अधिकाऱ्यांची दांडी

म. टा. वृत्तसेवा, निफाड

डेंग्यूसदृश आजाराने तालुक्यात नुकताच एका जणाचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत निफाड तालुक्यातील आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी असलेले अधिकारीच आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. निफाड पंचायत समितीच्या मासिक सभेला आरोग्याविषयी प्रश्नांना सामोरे जायला नको या धाकाने अधिकाऱ्यांनी दांडी मारली, असा आरोप सदस्यांकडून करण्यात आला.

आरोग्य विभाग जनतेच्या आरोग्याबाबत गंभीर नसल्याचे पंचायत समितीच्या बैठकीत समोर आले आहे. या बैठकीला एकही आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित नव्हता. विशेष म्हणजे गेल्या अनेक मिटिंगपासून या विभागाचे अधिकारी उपस्थित राहत नसल्याचे पंचायत समिती सदस्यांनी लक्षात आणून दिले. या सभेत अनेक विषयांवर चर्चा झाली. शासकीय योजना या केवळ कागदावरच असतात, प्रत्यक्षात येत नाहीत. त्यामुळे लाभार्थी यापासून वंचितच राहतात, असा आरोप सदस्यांनी केला

गेल्या वर्षी ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना सायकल देण्यात येणार होत्या. मात्र अद्यापही लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे आता प्रशासन केवळ योजना राबविते मात्र त्या केवळ कागदावरच राहतात की काय असाही प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. या संदर्भात सदस्य प्रकाश पाटील यांनी कामचुकार आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. आरोग्य विभागचे डॉ. चव्हाण आतापर्यंत एकाही मिटिंगला उपस्थित राहिलेले नाहीत, असे ते म्हणाले. जेव्हा वीज हवी होती तेव्हा भारनियमन केले आता ८ तांसावरून वीजपुरवठा १२ तास करण्यात आला. परंतु, आता याचा काही एक उपयोग नसून, डिसेंबरनंतरही १२ तासही वीजपुरवठा ठेवावा, अशी मागणी सदस्यांनी केली. टाकळी-विंचूर येथील बंधाऱ्याच्या कामासाठी निधी मंजूर का नाही झाला असा प्रश्न उपस्थित केला. तसेच ज्या ठिकणी एकही काम झाले नाही त्याठिकाणी पूर्ण निधी पोहोचला मात्र ज्या ठिकाणी अर्ध्या टप्यात काम झालेले आहे, तिथे अद्यापही एकही रुपया पोहोचलेला नाही. याचा अर्थ काय समजायचं असा प्रश्न पाटील यांनी अधिकारीवर्गाला विचारला.

संपूर्ण सभेत सर्वाधिक प्रश्ने ही प्रकाश पाटील, राजाभाऊ दरेकर, संदीप सोनवणे, लक्ष्मीबाई खरात यांनी उपस्थित केले. तसेच रखडलेले प्रकरण त्वरित अंमलात आणावे. लाभार्थ्यांना त्याचा फायदा मिळावा, अशी एकमुखी मागणी केली. गटशिक्षण अधिकाऱ्यांनी पिंपळगाव येथील शाळेतील एका या शिक्षकाला परस्पर सक्तीच्या रजेवर पाठवले. याबाबत सभापतींना कुठल्याही प्रकारची माहिती न दिल्याचे यावेळी समोर आले. यावर सदस्यांनी आक्षेप घेतला.

सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणी

डेंग्यूचा विळखा ग्रामीण भागापर्यंत आला असताना आरोग्यविभाग मात्र सुस्त आहे. त्यावर कारवाई ही झालीच पाहिजे आणि डॉ. चव्हाण यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे, अशी मागणी यावेळी सदस्यांनी केली. सदस्य प्रकाश पाटील यांनी आरोग्य विभागाला फैलावर घेतले. याआधी झालेल्या सभेत आरोग्य विभागाकडून अहवाल मागविण्यात आला परंतु, अनेक महिने उलटून गेले तरीदेखील अहवाल सादर करण्यास आरोग्य अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ होत आहे. तसेच कृषी अधिकारी शेतकऱ्यापर्यंत योजना का पोहोचवत नाही, असे खडेबोल पाटील यांनी सुनावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मत्स्य व्यवसाय अडचणीत

$
0
0

निविदा प्रक्रिया राबविण्यास दिरंगाई

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक जिल्ह्यातील एकूण १३० तलावांपैकी चालूवर्षी एकाही तलावाचा मत्स्य व्यवसायासाठी ठेका देण्यासाठी निविदा कार्यक्रम अद्यापही राबविण्यात न आल्याने जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाची तडफड सुरू झाली आहे. विशेष म्हणजे सुमारे साडेआठ लाख रुपयांची गेल्या वर्षीचीच थकबाकी अद्यापही वसूल होणे बाकी आहे.

नाशिक जिल्ह्यात २०० हेक्टरवरील एकूण १६ तलाव, तर २०० हेक्टरखालील ११४ तलाव आहेत. त्यापैकी ६७ तलावांच्या मत्स्य व्यवसायाची जबाबदारी हे तलाव ज्या ग्रामपंचायतींच्या हद्दीत आहेत त्या ग्रामपंचायतींवर पेसा कायद्यांतर्गत देण्यात आलेली आहे. गेल्या वर्षी केवळ ११ तलावातील मत्स्य व्यवसायासाठी मत्स्य व्यवसाय विभागामार्फत निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. परंतु, ही प्रक्रिया पूर्ण होईस्तोवर या तलावांनी तळ गाठला होता. त्यामुळे शासनाचा मोठा महसूल वाया गेला होता. त्यानंतर १ मे २०१६ रोजी राज्य शासनाने काढलेल्या आदेशामुळे चालू वर्षीही नाशिक जिल्ह्यातील तलावांची मत्स्य व्यवसायाची निविदाप्रक्रिया अडचणीत आल्याने चालू वर्षी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. परिणामी दोन वर्षांपूर्वी ज्या मत्स्य व्यवसाय करणाऱ्या सहकारी संस्थांना या तलावांचा ठेका देण्यात आला होता, त्याच सहकारी संस्थांना चालू वर्षासाठी ठेका कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शासनाच्या लाखो रुपयांच्या महसुलावर दुसऱ्यांदा पाणी फिरले आहे. नाशिक जिल्ह्यातील २०० हेक्टरवरील १६ तलावांपैकी सध्या सहकारी संस्थांना १३ व खासगी संस्थांना तीन तलाव मत्स्य व्यवसायासाठी ठेक्याने दिलेले आहेत. त्यांच्याकडे गेल्या वर्षाचीच अद्यापही ७, ६३, ९९१ रुपये इतकी थकबाकी आहे. तर २०० हेक्टरखालील तलावांपैकी पेसा कायद्यान्वये स्थानिक ग्रामपंचायतींना मत्स्य व्यवसायासाठी हस्तांतरीत ६७ तलाव वगळता ४७ तलावांचा ठेका दिलेल्या सहकारी व खासगी संस्थांकडे ७३,९२९ रुपये इतकी थकबाकी आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसायाची तडफड वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कारवाईच्या धाकाने सतरा स्पा सेंटरना टाळे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूररोड, सरकारवाडा तसेच मुंबई नाका या परिमंडळ एक हद्दीतील २० पैकी १७ स्पाला पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने टाळे लागले आहे. पोलिसांनी कॉलेजरोडवर एन्जी या स्पावर केलेल्या कारवाईनंतर हा चमत्कार घडला. स्पाआडून अनैतिक व्यवसायाचा बाजार भरू पाहणाऱ्या समाजकंटकांना ब्रेक लागला असून, पोलिसांनी सातत्याने यासाठी प्रयत्नशील राहावे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जाते आहे.

कॉलेजरोडवरील ठक्कर मॅजेस्टी इमारतीत सुरू असलेल्या एन्जी या स्पावर ४ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी कारवाई केली. या ठिकाणी वेश्या व्यवसाय करणाऱ्या पाच मुलींची सुटका करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी हेमंत अशोक परिहार आणि त्याची साथीदार निलोफर तैय्यब शेख यांच्यासह जागामालक भालचंद्र राजाराम सावळे अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. सावळे यांनी गाळा भाड्याने दिल्यानंतर परिहार आणि शेखने तो गाळा हडप करण्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पण्ण झाले. सध्या परिहारसह शेख न्यायालयीन कोठडीत आहे; तर सावळे यांची जाम‌िनावर मुक्तता झाली आहे.

दरम्यान, गतवर्षी पोलिसांनी याच ठिकाणी छापा मारून स्पाआड सुरू असलेला वेश्या व्यवसायाचा अड्डा उध्दवस्त केला होता. त्यामुळे स्पाआड अनैतिक व्यवसायाचे रॅकेट चालवणाऱ्यांना पोलिसांनी रडारवर घेतल्याचे दिसून येत आहे. परिमंडळ एकमधील गंगापूर, सरकारवाडा आणि मुंबई नाका या पोलिस स्टेशन हद्दीत सर्वात जास्त स्पा कार्यरत आहेत. ४ ऑक्टोबर रोजी झालेल्या कारवाईनंतर पोलिसांनी परिमंडळ एकमधील या तीन पोलिस स्टेशनसह भद्रकाली, आडगाव, पंचवटी व म्हसरूळ पोलिस स्टेशन हद्दीत स्पा सेंटर्सची ठिकाणे शोधून काढली. पोलिसांनी कारवाई केली त्यापूर्वी २० सेंटर्स सुरू होते. सध्या फक्त तीन सेंटर्स सुरू असल्याचे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले.

सदर सेंटर्समध्ये सीसीटीव्ही कार्यरत असून, संशयास्पद हालचाली आढळून आल्या नाहीत. उर्वरीत सेंटर्स बंद असून, काहीतरी काळंबेरं असल्यानेच त्यांनी सेंटर्स बंद केले असावेत, अशी शंका उपायुक्त पाटील यांनी उपस्थित केली. सदर स्पा सेंटर्समध्ये पिंपळगाव, ओझर, निफाड या सधन भागातील तरुणांचा मोठ्या प्रमाणावर राबता होता, असे प्राथमिक चौकशीत समोर येत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

इंटरनेटवर अशा प्रकारच्या जाहिराती मोठ्या प्रमाणावर दाखवल्या जातात. प्रत्यक्षात मात्र तरुणांची आर्थिक फसवणूक केली जाते. पैसे गेलेले तरुण पोलिसांकडे येत नाहीत. सध्या आम्ही अशा काही गुन्ह्यांचा तपास करीत असून, त्याचे सूत्रधार परराज्यातून आपले काम चालवतात असे दिसते. त्यामुळे नागरिकांनीदेखील सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

-लक्ष्मीकांत पाटील, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात मद्यधुंद पित्याची मुख्याध्यापकाला मारहाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,धुळे

चितळे माध्यमिक विद्यालयाच्या काही विद्यार्थ्यांनी चौथीतील विद्यार्थिनीची छेड काढल्याचा आरोप करीत या मुलीच्या वडिलांनी मद्यधुंद अवस्थेत मुख्याध्यापकांना मारहाण केली. या प्रकरणी देवपूर पश्चिम ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवपुरातील रामचंद्र चितळे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अनारसिंग दुर्गासिंग पावरा (वय ४९) यांनी देवपूर पोलिस ठाण्यात दिलेलया फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवार २१ रोजी सकाळी साडेअकरा वाजता ते शाळेत गेले असता, दुपारी दोन वाजेच्या सुमारास उदय शिरसाठ व त्यांच्यासह एक व्यक्ती कार्यालयात मद्यधुंद अवस्थेत आले. इयत्ता चौथीतील त्यांच्या मुलीची काही विद्यार्थी छेड काढत असल्याचा आरोप करीत त्यांनी मुख्याध्यापक पावरा यांना शिवीगाळ व दमदाटी केली. चपलेने त्यांच्या डोक्यावर मारहाण केली. शिक्षकांनी मध्यस्थी करून भांडण सोडविले. या घटनेची माहिती शाळेचे पर्यवेक्षक अमोद जोग यांनी देवपूर पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी उदय शिरसाठ याला अटक करून त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर संप्तत शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. डॉक्टरांप्रमाणे शिक्षकांनाही संरक्षण कायदा मंजूर करावा यासह इतर मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. शालेय पसिरात नेहमीच काही वाईट प्रवृत्तीच्या मुलांचा नेहमीच त्रास होतो. त्याबाबत पोलिस व प्रशासनाकडे पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष होत आहे. या प्रकरणी योग्य ती दखल घ्यावी, अशी मागणी करण्यातक आली आहे. शिक्षक परिषदेचे संजय पवार, एस. डी. मोरे, सी. आर. देसले, नितीन ठाकूर, किशोर पाटील व शिक्षक या मोर्चात सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीत हवे स्वतंत्र वाहनतळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळाली मध्ये येत्या आठवड्याभरात कपडे खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीमुळे शहरात वाहतुकीचा खोळंबा होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर लेव्हिट मार्केटच्या लगतच्या जागेची निवड करत त्या ठिकाणी प्रशासनाने मोफत वाहनतळाची व्यवस्था करून दिली. तरी कॅन्टोन्मेंट हायस्कूल समोरील मोकळ्या जागेतदेखील स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यासाठी जागा उपलब्ध असून, त्या ठिकाणी कायमस्वरूपी अधिकृत वाहनतळ असावा, अशी मागणी नगरसेवक भगवान कटारिया यांनी केली आहे.

दिवाळीनिमित्त खरेदीसाठी येणाऱ्या लोक सोबत वाहनेही घेऊन येणार असल्याने लेव्हीट मार्केट परिसराचा आवाका लक्षात घेता त्या ठिकाणी पार्किंग सुविधा मोजकीच आहे. त्यामुळे बोर्डाने शहरातील बोहरा मशिद

शेजारील जागा, हौसन रोडवरील शाळा, गुरुनानी कॉम्पलेक्समागील, देना बँकशेजारील व आठवडे बाजाराची जागा वाहनतळ म्हणून एक आठवड्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. तसेच बाहेरील गाड्यांची पार्किंग आढळून आल्यास प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार यांनी अधिकृत सूचना पत्रात नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिसेलची वाहने सुसाट

$
0
0

शहर परिसरात तब्बल १२५ वाहन बाजार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीत नव्या वस्तूंबरोबरच सेकंड हँड गाड्यांनाही मोठी मागणी असून, त्यांच्या विक्रीतही वाढ झाली आहे. शहरात १२५ हून अधिक वाहन बाजार असून, त्यांची उलाढाल कोट्यवधी रुपयात आहे. या वाहन बाजारात ३० हजारांपासून एक कोटी रुपयांपर्यंतच्या गाड्याही विक्रीला आहेत. त्यामुळे या गाड्या सध्या ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहेत. विविध मॉडेल व कंपन्यांच्या गाड्या या मार्केटमध्ये बघायला मिळत असल्यामुळे ग्राहकांचा ओढाही वाढला आहे.

बदललेले राहणीमाण, वाढलेले कुटुंब व चारचाकी गाड्यांची गरज आता प्रत्येकाला वाटू लागली आहे. त्यातच चारचाकी गाडी असणे हे प्रतिष्ठेचे असल्यामुळे अनेकांना वाहन खरेदीची इच्छा असते. पण नव्या गाड्यांच्या वाढलेल्या किमतीमुळे ते मध्यम कुटुंबीयांना शक्य नसते, त्यामुळे सेंकड हॅण्ड गाड्या हा सर्वांसाठी पर्याय आहे. विशेष म्हणजे सेंकण्ड हॅण्ड मार्केटनेही आपली विश्वासार्हता निर्माण केली असून, ऑल इंडिया कार असोसिएशन त्यासाठी स्थापन केली आहे. नाशिकमध्ये या असोसिएशनचे ५५ सदस्य असून, त्यांनी आपली सर्व माहिती वेबसाईटवर टाकली आहे. त्यामुळे वाहन खरेदी करताना या असोसिएशनच्या सदस्यांना त्याचा फायदा होऊ लागला आहे. वाहन खरेदी करताना आता सहज बँक कर्ज उपलब्ध करून देत असल्यामुळे कार घेणे आता सोपेही झाले आहे. ऑनलाइनवर विकल्या जाणाऱ्या कारमध्ये ग्राहक व विकणाऱ्यांची फारशी ओळख नसते. त्यामुळे बऱ्याच वेळा फसवणूक होते. पण वाहन बाजारात ग्राहकांची फसवणूक होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेतली जाते. कमिशनवर बेसवर केला जाणारा हा व्यवसाय नाशिकमध्ये मोठया प्रमाणात वाढला आहे. ठिकठिकाणी दिसणारे हे सेंकण्ड कार विकणाऱ्यांचा वाहन बाजार चकचकीत गाड्यांनी सर्वांचे लक्षही वेधते. या वाहन बाजारात मारुती, महिन्द्रा, टाटा, ह्युंदाई, जनलर मोटर्स, होन्डा, फोर्ड, टोयोटा अशा सर्वच प्रमुख वाहन कंपन्यांनाचे सेकंड हॅण्‍ड वाहने उपलब्ध आहेत. सेकंड हॅण्‍ड गाड्यांची विक्री करताना वाहन तांत्रिकदृष्ट्या फिट करतानाच विकल्यानंतरही त्यांना मदत करीत असल्यामुळे या कार विक्रीला चांगले मार्केट निर्माण झाले आहे.

दिवाळीत सेकण्ड हॅण्ड कारला चांगली मागणी आहे. आम्ही कार विकताना सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर ती ग्राहकांना विकतो. त्यासाठी विश्वासार्हता महत्त्वाची आहे. चोरीच्या कारबाबत आम्ही दक्षता पाळतो. ऑल इंडिया लेवलवर आमची संघटना असल्यामुळे माहिती देवाण-घेवाणसाठी फायदा होतो.

- महेश जोशी, वरिष्ठ उपाध्यक्ष, आल इंडिया कार असोसिएशन

वाहन बाजारात विविध प्रकारच्या गाड्या असल्यामुळे दिवाळीत आपल्या घरीही कार असावी, यासाठी गेल्या काही दिवसांत मार्केटमध्ये चैतन्य आहे. कार विक्री करताना मार्केटने विश्वासार्हता तयार केल्यामुळे आता ग्राहकांचा ओढाही वाढला आहे.

- अनिरुध्द सप्तश्री, कार विक्रेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिमुकलीवरील उपचारांसाठी जोपासली सामाजिकता...

$
0
0

कार्तिकेय नगरवासीयांचे रक्तदान शिबिर


म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शाळेत शिकणाऱ्या गायत्री राजेंद्र गरूड या मुलीला अचानक थॅलेसेमिया या आजाराने ग्रासले होते. संबंधित आजारामुळे तिच्या शरीरात नवीन रक्तच तयार होत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. याबाबत कामडवाडे शिवारातील कार्तिकेयनगर वासीयांना माहिती मिळाल्यावर त्यांनी गायत्रीसाठी पुढे येत रक्तदान शिबिराचे आयोजन केले. याद्वारे त्यांनी सामाजिकतेचे दर्शनच घडविले.

या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून ५० रक्ताच्या पिशव्यांचे संकलन करण्यात आले. याप्रसंगी उद्योजक प्रदीप पेशकार यांनी कार्तिकेयनगर वासियांचे आभार मानत रक्ताला जात नसल्याचे दाखवून दिल्याचे सांगितले. शिबिरात परिसरातील महिलांसह रहिवाशांनी सहभाग नोंदविला. गायत्रीच्या शिक्षकांनीदेखील यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

पेठे हायस्कूल शाळेत शिकणाऱ्या गायत्री गरूड या सातवीच्या विद्यार्थिनीला अचानक थॅलेसेमिया आजार झाला. तिचे वडील रिक्षा चालवून घरातील कुटुंबाचे पालनपोषण करतात. मात्र आपल्या मुलीला थॅलेसेमिया आजाराने ग्रासल्याने गरूड कुटुंब चिंतेत होते. त्यातच महिन्यातून अनेकदा गायत्रीचे रक्त बदलावे लागत असल्याने येणारा खर्च राजेंद्र गरूड यांना परवडत नव्हता.

समाजाचे ऋण फेडले

आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने कार्तिकेय नगर रहिवाशांनी गायत्रीसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. त्यांनी यासाठी अर्पण रक्तपेढीला तब्बल ५० पिशव्यांचा साठा दिला आहे. येथील श्वास फाऊंडेशन व साईबाबा मित्रमंडळाच्या वतीने गायत्रीला लागणाऱ्या रक्त पुरवठ्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात श्वास फाऊंडेशनचे विजय पाळेकर व मकरंद वाघ तर साईबाबा मित्रमंडळाचे दत्तू वाळे यांनी पुढाकार घेतला. गेल्या वर्षीही गायत्रीसाठी ७० पिशव्यांचा रक्त पुरवठा संकलित करण्यात आला होता. शिबिरासाठी डॉ. तापडे यांचे सहकार्य लाभले. भविष्यातही गायत्रीसाठी सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येईल, असे श्वास फाऊंडेशन व साईबाबा मित्र मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समस्यांप्रश्नी अधिकाऱ्यांची सारवासारव

$
0
0

नाशिकरोड प्रभाग बैठकीत नगरसेवक आक्रमक

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

दिवाळी सण अगदी जवळ येऊन ठेपला असूनही शहरातील बहुतांश भागातील बंद पथदिप व शहराच्या विविध भागात निर्माण झालेले कचऱ्याचे साम्राज्य या विषयांवर शुक्रवारी नाशिकरोड प्रभाग समितीची सभा चांगलीच गाजली. या वेळी अधिकाऱ्यांनी सारवासारव करताच प्रभाग सभापती सूर्यकांत लवटे यांनी सभागृहात दैनिकांत आलेल्या समस्यांच्या बातम्याच दाखविल्याने अधिकाऱ्यांची गोची झाली.

नाशिकरोड प्रभाग समितीची सभा शुक्रवारी (दि. २१) दुपारी नाशिकरोड विभागीय कार्यालयात प्रभाग सभापती सुर्यकांत लवटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी नगरसेवक अशोक सातभाई, शोभा आवारे, कोमल मेहरोलिया, हरिष भडांगे, ललिता भालेराव यांनी शहरातील अस्वच्छता, बंद पथदिप, दूषित पाणी पुरवठा या विषयांवर अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

शहरातील स्वच्छता नियमितपणे केली जात असल्याचा दावा स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांनी करताच स्वतः प्रभाग सभापतींनी कचऱ्याच्या समस्याच्या एका दैनिकात छापून आलेल्या बातम्याच सभागृहात दाखविल्याने अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली.

दिवाळी निमित्ताने नागरिक घरांची स्वच्छता करित असल्याने जास्त वेळ पाणीपुरवठा करावा, शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, झोपडपट्टी विभागात स्वच्छता मोहिम राबवावी, शहरातील बंद पथदिप तत्काळ सुरू करावेत, झाडांच्या वाढलेल्या फांद्या कमी कराव्यात, दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने त्यावर उपाययोजना करावी यासारख्या मागण्या नगरसेवकांनी सभागृहात मांडल्या. याप्रसंगी नगरसेविका मंगला आढाव, सुनिता कोठुळे, नयना घोलप, सुनंदा मोरे, मंदा ढिकले, सविता दलवाणी आदींसह विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

गार्डन्सची दुरवस्था

शहरातील गार्डनच्या देखभालीचा ठेका एका ठेकेदाराला दिला असला तरी त्याची वर्क ऑर्डर न झाल्याने संबधित ठेकेदाराने गार्डन्सच्या देखभालीचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. न झाल्याने त्यांची प्रचंड दुरवस्था झाली असल्याच्या प्रश्नावर नगरसेविका शोभा आवारे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

महिलांचा मोर्चा

प्रभाग क्र.५७ मधील गायकवाड मळा, गोरेवाडी या भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याने या भागातील सुमारे १५० ते २०० महिलांनी पालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. त्यांनी यावेळी निषेध व्यक्त करत सभापती सूर्यकांत लवटे यांना आपल्या समस्यांचे निवेदन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाले बुजविण्याची लागली स्पर्धा

$
0
0

सातपूर भागात खासगी विकसकांचे अतिक्रमण; मनपा यंत्रणा सुस्त

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शहरातील अनेक भागात असलेले नैसर्गिक नाले बुजविण्याची स्पर्धा सातपूरला लागली की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशोकनगर रस्त्यावरील मौले हॉलशेजारील नैसर्गिक नाला बुजविल्याने पावसाचे पाणी साचून वाहनचालकांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. त्यातच समृद्धनगरला लागून असलेल्या नाल्यावर खासगी विकसकाने चक्क बांधकामच सुरू केले. असे असताना दुसरीकडे गणेशनगरमध्ये एमआयडीसीतून बाहेर पडणाऱ्या नाला बुजविण्याचा घाट बांधकाम व्यावसायिकाने घेतला आहे. या सर्व परिस्थितीकडे महापालिकेच्या यंत्रणेने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सातपूर भागात नंदिनी नदीच्या तीरावर अनधिकृत झोपड्यांचे अतिक्रमण असताना दुसरीकडे नैसर्गिक नाल्यांवरही खासगी विकसकांनी अतिक्रमण केले आहे. अशोकनगर रस्त्यावरील मौले हॉलजवळील नाला गेल्या काही वर्षापूर्वी बुजविण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात नेहमीच रस्त्यांवर पाणी साचत असते. तसेच अशोकनगर भागातील नालादेखील बुजविण्यात आल्याने रस्त्यांवरून वाहणाऱ्या पाण्याचा वाहनचालकांसह पादचाऱ्यांनादेखील नेहमीच त्रास सहन करावा लागतो.

गणेशनगरमध्ये एमआयडीसीतून बाहेर पडणारा नाला बुजविण्याचे काम बांधकाम व्यावसायिकांकडून केले जात आहे. हे सर्व प्रकार उघडपणे घडत असताना महापालिकेची यंत्रणा काय करते, असा सवाल सुज्ञ नागरिकांनी उपस्थित केला आहे. तरी तातडीने या नाल्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर महापालिकेने कारवाई करावी, अशी मागणी सातपूरकरांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


असमर्थ ‘पर्यटन’मुळे अधिकारी वाऱ्यावर!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापकपदी उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांच्या नियुक्तीचे आदेश महसूल विभागाकडून काढण्यात आले असले, तरी पर्यटन विभागाने तब्बल दोन आठवड्यांनी हा आदेश टोलवून लावला आहे. मूव्हमेंट ऑर्डरची प्रतीक्षा करणाऱ्या मुंडावरे यांना प्रादेशिक व्यवस्थापक म्हणून रुजू करून घेण्यास पर्यटन विभागाने असमर्थता दर्शविली असून, दोन विभागांमधील असमन्वयाचा फटका अधिकाऱ्यांना बसत आहे.

उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक म्हणून रूजू व्हावे, असे आदेश महसूल विभागाने ७ ऑक्टोबरला काढले होते. जळगावचे जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून काढण्यात आलेल्या आदेशाला मुंडावरे यांनी मॅटमध्ये आव्हान दिल्याने महसूल विभागाने ही प्रतिनियुक्ती दिली होती. दोन महिन्यांपासून प्रतिनियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंडावरेंना या निर्णयामुळे दिलासा मिळाला होता. मात्र आता पर्यटन विभागानेही त्यांना रूजू करून घेण्यास नकार दिल्याने एकाच सरकारमधील वेगवेगळ्या विभागांमधील असमन्वयाचा फटका त्यांना बसला आहे.

ऑक्टोबर २०१५ मध्ये मुंडावरे जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी (प्रशासन) या पदावर रुजू झाले. एका वर्षाच्या आतच २० ऑगस्टला त्यांच्या बदलीचे आदेश निघाले. ते मुळचे नाशिक जिल्ह्यातील रहिवाशी असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांची जळगाव येथे बदली करण्यात आली होती. मात्र या आदेशाला त्यांनी मॅटमध्ये आव्हान दिले. निवडणुकीशी संबंधित काम नसेल, अशा नाशिकमधील कोणत्याही पदावर नियुक्ती द्या, अशी विनंती त्यांनी प्राधिकरणाला केली होती. कोर्टाने जिल्हा प्रशासनाची कानउघडणी केल्यानंतर त्यांना प्रादेशिक व्यवस्थापक पर्यटन विकास महामंडळ नाशिक या पदावर महसूलने नियुक्ती दिली. मात्र या पदावर रूजू करून घेण्यास पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने असमर्थता दर्शवली आहे.

पर्यटन विभागाचे स्पष्टीकरण

मुंडावरे यांच्या नियुक्तीबाबत पर्यटन विभागाने महसूल विभागाकडे मागणी, तसेच शिफारस केलेली नाही. त्यामुळे त्यांना या पदावर रूजू करून घेता येणार नाही, असे पर्यटन विभागाचे अवर सचिव सं. मु. भांडारकर यांनी महसूल विभागाच्या प्रधान सचिवांना काढलेल्या पत्रात नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागतिक शांतता परिषद सोमवारी

$
0
0

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची उपस्थिती

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दहशतवादाचे आव्हाने जगातील प्रत्येक देशासमोर उभे ठाकले असताना शिक्षणाच्या माध्यमातून यावर उपाययोजना सांगू पाहणाऱ्या तीनदिवसीय जागतिक शांतता परिषदेस सोमवारपासून (दि. २४) येथे सुरुवात होणार आहे. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एसएमआरके कॉलेज मैदानावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते सकाळी १० वाजता या परिषदेचे उद््घाटन होईल. जगभरातील दीडशे तज्ज्ञ या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत.

संयुक्त राष्ट्रांद्वारे ही परिषद पुरस्कृत करण्यात आली आहे. इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ एज्युकेटर्स फॉर वर्ल्ड पीस व गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एचपीटी आणि एसएमआरके कॉलेजतर्फे या १९ व्या जागतिक शांतता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सुशासन आणि अहिंसेसाठी शांतता शिक्षण’ या विषयावर देश-विदेशातील तज्ज्ञ यावेळी मांडणी करणार आहेत. संयुक्त राष्ट्रांचा वर्धापनदिन, नामदार गोपालकृष्ण गोखले यांची १५१ वी जयंती, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या शतकमहोत्सवपूर्व २५ महिन्यांच्या कालखंडाचा शुभारंभ, संस्थेचे सचिव, शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य सर डॉ. मो. स. गोसावी यांचे सहस्त्र चंद्रदर्शन तसेच ‘सर डॉ. एम. एस. गोसावी एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान अशी विविध औचित्य साधत परिषद आयोजित करण्यात आली आहे. अणू आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांना पहिला डॉ. गोसावी पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर हे अध्यक्षस्थान भूषवतील. विधानपरिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर विशेष अतिथी आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन आणि खासदार चिंतामण वनगा प्रमुख पाहुणे असतील. सहस्त्रचंद्रदर्शनानिमित्त डॉ. गोसावी यांचा राज्यपालांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात येईल.

नऊ तांत्रिक सत्रे

परिषदेत एकूण ९ तांत्रिक सत्रे व गटवार चर्चा होणार आहे. तैवानमधील चेन्गाची विद्यापीठाचे कुलगुरू डेव्हिड ब्लन्डेल, शांततावादी कार्यकर्ते हु जी वांग, अमेरिकेतील शांततावादी कार्यकर्ते डॉ. लज उतरेजा, मुलांसाठी काम करणाऱ्या डॉ. नीना मेयरहॉफ, हवाईतील शांततावादी लेखिका डेम मेबेल कात्झ असे अनेक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ तसेच नागालँडमधील खुल्या जागतिक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रियरंजन त्रिवेदी, अणुशास्त्रज्ञ शंकरराव गोवारीकर, न्या. जयंतराव चित्रे, न्या. ए. एस. अग्वैर असे देशातील नामवंत सहभागी होत आहेत. कॉलेजच्या प्राचार्य डॉ. दीप्ती देशपांडे, एचपीटी चे प्राचार्य व्ही. एम. सूर्यवंशी, निमंत्रक डॉ विवेक बोबडे, परिषद यशस्वीततेसाठी प्रयत्नशील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांनी अनुभवली नाटकाची मजा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी शनिवारी मराठी बाणा या कार्यक्रमाची मजा लुटली. पोलिस आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना भद्रकाली पोलिस स्टेशन येथे हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अधिकारी हजर झाले. मात्र, यानंतर सर्व फौजफाटा कालिदास कलामंदिर येथे पोहोचला. चार दिवसांपूर्वी अशाच पध्दतीने पोलिस कर्मचाऱ्यांना एमएस धोनी या पिक्चरसाठी धाडण्यात आले होते.

पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील वाढत्या ताणाबाबत सर्वच स्थरातून चिंता व्यक्त करण्यात येते. त्यामुळे कामाच्या रहाटगाड्यात पिचलेल्या पोलिसांचा ताण कमी व्हावा, या उद्देशाने हा प्रयोग राबवला जात आहे. शहर पोलिस दलातील २०० पोलिसांना आरोग्य तपासणीनंतर १८ ऑक्टोबर रोजीदेखील थेट मल्टीफ्लेक्समध्ये नेण्यात आले. यानंतर, पुन्हा अशी संधी मिळेल की नाही, या विचारात असताना शनिवारी सायंकाळी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी सर्व पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षकांना भद्रकाली पोलिस स्टेशन येथे जमा होण्यास सांगितले. बरहुकूम कार्यवाही झाली. यानंतर, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा सर्व फौजफाटा थेट कालिदास कलामंदिर येथे पोहोचला. तिथे साता समुद्रापार पोहोचलेला मराठी बाणा या कार्यक्रमाची सर्वांनी मजा लुटली. कर्मचाऱ्यांपाठोपाठ पोलिस अधिकाऱ्यांनाही सुखद धक्का मिळाला असून, अशा विरंगुळ्यामुळे पोलिसांच्या एकूण कार्यपध्दतीत सुधारणा होण्याची अपेक्षा सर्वसामान्यांना आहे.

आज ‘एलएसओएम’

शहर पोलिसांनी आयोजित केलेल्या लास्ट संडे ऑफ मंथ (एलएसओएम) या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. रविवारी (२३ ऑक्टोबर) सकाळी सहा वाजेपासून गंगापूररोडवरील आसारामबापू पुलाजवळील गोदापार्क येथे कार्यक्रमास सुरुवात होईल. सदर कार्यक्रम नागरिकांसाठी असून, विविध खेळ तसेच सांस्कृतीक कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी नोकरभरती रद्दचा ठराव

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विकास महामंडळातील नोकरभरती ही महामंडळाच्या संचालक मंडळाची मंजुरी न घेताच करण्यात आली आहे. त्यामुळे ही वादग्रस्त नोकरभरती रद्द करावी, असा ठराव महामंडळाच्या संचालक मंडळाने केला आहे. त्यामुळे ही नोकरभरती पुन्हा वादात सापडली असून, आतापर्यंत निवड झालेल्या उमेदवारांचेही भविष्य टांगणीला लागले आहे. या भरतीसाठी संचालक मंडळासह सरकारचीही परवानगी नसल्याचा दावा संचालकांनी केला असून, यामुळे आता तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक बाजीराव जाधवांसह बड्या अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत.

आदिवासी विकास महामंडळात ५८४ पदांसाठी झालेली नोकरभरती गेल्या वर्षभरापासून गाजत आहे. या नोकरभरतीची सध्या विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्यामार्फत चौकशी सुरू आहे. या भरतीत जवळपास तीनशे कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचेच खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यानीच ती चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आता या भरतीसंदर्भात महामंडळाच्याच संचालक मंडळाने मोठा खुलासा केला आहे. नागपूरमध्ये आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्या उपस्थितीत झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या नोकरभरतीला संचालक मंडळाची परवानगीच घेतली नसल्याचा आरोप संचालकांनी केला. सरकारचे व्यवस्थापन महामंडळ असून, त्याचा कार्यभार संचालक मंडळामार्फत चालविला जातो. त्यामुळे या भरतीला महामंडळाची परवानगी आवश्यक होती. त्यामुळे संचालकांनी संतप्त होऊन ही भरतीच रद्द करण्याचा ठराव मांडला. त्याला इतर संचालकांसह आदिवासी मंत्र्यांनीही संमती दिल्याचा दावा संचालकांनी केला आहे.

दोनशेवर उमेदवारांचे भविष्य अधांतरी

आदिवासी विभागाचे सचिव राजगोपाल देवरा यांनी संबंधित भरती रद्दचा ठराव करून तो विभागीय आयुक्तांकडे पाठविण्याच्या सूचना केल्या आहेत. भरती रद्द करण्याची शिफारस विभागीय आयुक्त करू शकतात. त्यांनी रद्दची शिफारस केल्यास शासन रद्द करण्याचा निर्णय घेईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे आतापर्यंत निवड झालेल्या दोनशेवर उमेदवारांचेही भविष्य टांगणीला लागले आहे. या सर्व प्रकारामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे आता सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

भ्रष्टाचार होईल उघड

या भरतीत कोट्यवधीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला जात आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून दहा ते पंधरा लाख रुपये घेतल्याचा आरोप केला गेला. ही भरती रद्द झाल्यास पैसे देऊन भरती झालेले उमेदवार बाहेर येतील, तसेच त्यांनी कोणाला पैसे दिले, याचीही माहिती बाहेर येईल. त्यामुळे यातील भ्रष्टाचार थेट उघड होईल, असा दावा काही संचालकांकडून केला जात आहे. ही भरतीप्रक्रिया राबविणारे तत्कालीन एमडी बाजीराव जाधव, प्रशासन अधिकारी नरेंद्र मांदळे यांच्यासह अनेकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेंट्रल गोदावरीच्या अध्यक्षपदी वाघ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूरच्या सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या निवडणुकीत खासदार देविदास पिंगळे गटाचे ज्ञानेश्वर वाघ यांची अध्यक्षपदी, तर उपाध्यपदी अरुण पाटील यांची बहुमताने निवड झाली. या निवडणुकीत दिनकर पाटील गटाचे दोन्ही उमेदवार पराभूत झाले.

दीड वर्षापूर्वीच या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक झाली होती. त्यानंतर पिंगळे गटाने वर्चस्व मिळवत आपल्या समर्थकांना निवडून आणले. या संस्थेचे नाशिक तालुक्यातील पश्चिम भागातील २७ गावांचे कार्यक्षेत्र असून, पाच हजार सभासद आहेत. विशेष म्हणजे या संस्थेची सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही अधिकोश बँक असून, या बँकेकडून संस्था कर्ज घेऊन ते सभासदांना वाटते. संस्थेने आतापर्यंत १३ कोटी रुपये अल्प व मध्यम मुदतीचे कर्ज सभासदांना वाटप केले आहे.

संस्थेच्या अध्यक्षपदी दिनकर पाटील होते. त्यांच्या कार्यकाळात मनमानी काम करण्यात आल्याचा आरोप नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्षांनी केला. त्यामुळे आम्ही सर्वांनी एकत्र येऊन देविदास पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवत बहुमत प्राप्त केले. निवडणुकीत पाटील गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार मधुकर खांडबहाले व उपाध्यक्षपदाच्या उमेदवार शीलाताई पाटील यांचा पराभव केला. नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांना संस्थेचे ज्येष्ठ संचालक तानाजी पिंगळे, पंडितराव पाटील, रामदास पिंगळे, पुंजाजी थेटे, अनिल काकड आदींनी सत्कार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images