October 13, 2016, 2:54 pm
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
ठेकेदारांच्या प्रतिसादाअभावी गेल्या आठ महिन्यापासून शहरात रखडलेली वृक्षलागवड अखेरीस मार्गी लागली आहे. स्थायी समितीच्या गुरूवारी झालेल्या बैठकीत शहरात १५ हजार २०० वृक्षलागवड करण्यास मंजुरी देण्यात आली. यासाठी तीन कोटी ६५ लाखांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे शहरात २१ हजार वृक्षलागवडाची टप्पा पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, वनविकास महामंडळानेही कमी खर्चात वृक्षलागवड करून देण्याची तयारी दर्शवली होती. परंतु, वन विकास महामंडळ पुन्हा दुसऱ्याला काम देणार असल्याने महापालिकेना वनविकासचा प्रस्ताव फेटाळला आहे.
हायकोर्टाच्या आदेशानुसार महापालिकेला शहरात २१ हजार वृक्षांची लागवड करायची होती. त्यासाठी साडेपाच कोटींची तरतूद करण्यात आली होती. तत्कालीन आयुक्तांनी १५ फुट झाडांची अट निश्चित केली होती. परंतु, पाचपैकी चार ठेकेदारांनी १५ फुटी वृक्षलागवडीस नकार दिल होता. त्यामुळे प्रशासनाने या चार ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची नोटीस बजावली. तर एका ठेकेदाराने साडेपाच हजार वृक्षलागवड सुरू केली.
या कंपन्यावर जबाबदारी
स्थायी समितीच्या गुरूवारी झालेल्या बैठकीत प्रशासनाने जादा विषयात १५ हजार २०० वृक्षांची लागवड करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला. त्यात नाशिक पश्चिम, नवीन नाशिक, नाशिक पूर्व, सातपूर विभाग, नाशिकरोड, पंचवटी अशा सहा विभागात ही वृक्षलागवड केली जाणार आहे. त्यासाठी १० फुट वृक्षांची अट शिथिल करण्यास आली. सुमारे तीन कोटी ६५ लाखांचा खर्च यासाठी येणार आहे. मे. कल्पतरू कन्स्ट्रक्शन, मे. महारुद्र एंटरप्रायजेस, मे. भाग्यश्री कन्स्ट्रक्शन, ज्योती मजूर बांधकाम सोसायटी व मे. टेरेकॉन इकोटेक प्रा. लि. या कंपनीला ही कामे दण्यात आली आहे. जादा विषयातील या विषयांना सभापतींनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे वृक्षलागवड मार्गी लागले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
October 13, 2016, 2:56 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
चार दिवसांच्या सुट्यांनंतर शाळा सुरू झाल्या असल्या तरी पालकवर्ग मात्र अद्याप धास्तावलेलाच दिसत असल्याचे गुरुवारी दिसून आले. काही शाळांमधील विद्यार्थीसंख्या पटसंख्येच्या निम्मीच उपस्थित असल्याने शहरातील वातावरण पाहता पालकच विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास तयार नसल्याचे समोर आले. दरम्यान, रिक्षा, व्हॅनचालक यांनीही विद्यार्थ्यांना तुम्ही तुमच्या जबाबदारीवर पाठवा, अशी भूमिका घेतल्याने अनेक पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविणेच पसंत केले.
तळेगाव (अंजनेरी) येथील बालिका अत्याचार प्रकरणामुळे काही दिवसांपासून शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणामुळे शहरात जाळपोळ, दगडफेक या प्रकारांबरोबरच अफवांचेही मोठे आव्हान प्रत्येकासमोरच उभे राहिले. कानावर पडणारी कोणतीही घटना खरी की खोटी याचा अंदाज लावणे शहरवादीयांना कठीण झाले. विविध विचित्र अफवांनी मनात घर केले. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवावे की नाही, याबाबत पालकांची द्विधा मनस्थिती झाली. त्याचा परिणाम शाळांमधील विद्यार्थी संख्येवर दिसून आला. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी स्वतः नाशिकमधील परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे जाहीर केले आहे. तरीदेखील शाळांमध्ये ही परिस्थिती दिसून आल्याने शिक्षक, मुख्याध्यापकांची जबाबदारी वाढली आहे. काही शाळांच्या परीक्षाही लवकरच सुरू होणार आहेत. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, असे आवाहन शैक्षणिक संस्थांकडून करण्यात येत आहे.
आडमुठे व्हॅनचालक!
तळेगाव (अंजनेरी) प्रकरणामुळे शहरात प्रत्येक सामान्य व्यक्तीच्या मनात भीती निर्माण झाली. त्यास विद्यार्थ्यांची ने-आण करणारे रिक्षाचालक, व्हॅनचालकही अपवाद ठरले नाहीत. स्वतःच्या जबाबदारीवर शाळेत पाठवा, असे म्हणत त्यांनी विद्यार्थी सुरक्षेबाबत हात झटकल्याने पालकही अधिक धास्तावले. किमान विद्यार्थ्यांना सुखरूप शाळेत सोडणे व घरी आणून सोडावे, अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 13, 2016, 2:57 pm
खतप्रकल्पाच्या दुरवस्थेमुळे नाशिकच्या विकासाची गेलेल्या वर्षभरापासून झालेली कोंडी आता फुटली आहे. स्थायी समितीने महापालिकेचा खत प्रकल्प ३० वर्षासाठी मे. मेलहेम आयकॉस या कंपनीला सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर चालविण्यास मंजुरी दिली आहे.
येत्या सहा महिन्यात खत प्रकल्प कार्यान्वित होणार असून राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) बांधकामांवर घातलेली बंदी उठण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसह विकासकांना दिवाळीपूर्वीच आनंदाची बातमी मिळाली आहे. स्थायी समितीमधील सर्व सदस्यांनी एकमताने या प्रस्तावाला मंजुरी दिली. संबंधित प्रकल्प ठेकेदाराने अटी-शर्तींचे पालन केले नाही तर त्याची जबाबदारी प्रशासनावर निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे उशिरा का होईना, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दबाव कामी आल्याचे मानले जात आहे.
कपाट, विकास नियंत्रण नियमावलीमुळे अगोदरच शहरातील बांधकाम व्यवसाय ठप्प झाला होता. त्यात गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये खतप्रकल्पाच्या दुरवस्थेवरून पुण्याच्या ‘एनजीटी’ने शहरातील नवीन बांधकामाना सरसकट बंदी घातली होती. तसेच नवीन बांधकाम करावयाचे असल्यास त्यासाठी जाचक अटी-शर्ती लादण्यात आल्या होत्या. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून ‘एनजीटी’च्या आदेशाने बांधकाम व्यवसायावर बालंट आले होते. ‘एनजीटी’च्या नव्या अटी व शर्तींची पूर्तता करणे बिल्डरांना शक्य नव्हते. त्यामुळे महापालिकेने ही बंदी उठविण्यासाठी ‘एनजीटी’कडे धाव घेतली होती. परंतु, ‘एनजीटी’ दिलासा देण्यास नकार दिल्याने महापालिकेने अखेर पाथर्डी येथील खतप्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पाथर्डी येथे ६० कोटी रुपये खर्चूनही खत प्रकल्प बंद पडला असून तेथे कचऱ्याचे डोंगर साचले आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
राज ठाकरे यांनी घातले लक्ष
स्थायी समितीच्या गेल्या बैठकीत हा प्रस्ताव तहकूब करण्यात आला होता. प्रशासनाने मंजुरीसाठी हा प्रस्ताव ठेवला असतांनाही, त्यास तहकूब ठेवल्याने प्रकरण थेट राज ठाकरे यांच्यापर्यंत गेले. त्यामुळे गुरूवारी सभापती सलिम शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे. शहरहिताचा विषयाला विरोध न करता सर्वच सदस्यांनी समंती दर्शवली. न्याय प्रक्रियेत अडकणार नाही, याची जबाबदारी प्रशासनावर टाकत सभापतीनी या विषयाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे गेले वर्षभर बांधकाम व्यवसायाची झालेली कोंडी आता फुटणार आहे.
सहा महिन्यात निकाल
स्थायी समितीच्या मंजुरीनंतर संबधित कंपनीसोबतच खत प्रकल्प कार्यान्वित करण्यासंदर्भातील करारनामा तत्काळ केला जाणार आहे. या ठिकाणी कार्यरत असलेले ६९ कर्मचारी पुन्हा महापालिककडे वर्ग होणार असून तेथे ठेकेदाराकडून १८३ कर्मचारी नव्याने भरले जाणार आहेत. ठेकेदार आहे त्याच यंत्रसामुग्रीचा वापर करणार असून आवश्यकता भासल्यास नवीन यंत्रसामग्री आणली जाणार आहे. सहा महिन्यात या ठिकाणी खत प्रकल्प कार्यान्वित होऊन तेथे तयार झालेले १५ ते २० लाख मेट्रीक टन कचऱ्याचे कॅपिंग केले जाणार आहे. त्यामुळे सहा महिन्यानंतर ‘एनजीटी’त अहवाल सादर केल्यानंतर नवीन बांधकामावर आणलेली बंदी उठवली जाण्याची शक्यता आहे. तसेच या ठिकाणी तयार होणारे खत हे आरसीएफ कंपनीकडून खरेदी केले जाणार आहे.
दिनकर पाटलांची कोंडी
स्थायी समितीत सभापतींसह सर्वपक्षीय सदस्यांनी भाजपचे सदस्य दिनकर पाटील यांची त्यांच्या अनुपस्थित कोंडी करीत त्यांच्यावर टीकास्र सोडले. प्रस्ताव तहकूब असतांना एका दिवसात पाटील यांचा अभ्यास कसा झाला, असा प्रश्न सदस्य लक्ष्मण जायभावे, मनीषा हेकरे व अशोक सातभाई यांनी केला. तसेच प्रकाश लोंढे यांनीही अभ्यासाची झलक आता दिसायला लागली, असा टोला पाटील यांना लगावला. दोन-दोन तास बोलणारे अचानक पाच मिनिटात बोलून कसे विषय संपवतात, असा प्रश्न सदस्यांनी केला. पाटील यांनी मुंबईला जायचे असल्याचे सांगून पाच मिनिटात प्रस्तावाला समर्थन देत, सभागृह सोडले होते. त्यामुळे अन्य सदस्यांनी त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्यावर हल्लाबोल करण्याची संधी सोडली नाही.
असा असणार करार
महापालिकेने खत प्रकल्प नव्याने चालविण्यासाठी गेल्या एक वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. पुणे येथक्षल मे. मेलहेम आयकॉस इनव्हायमेंट इंजिनिअर्स प्रा. लि. या कंपनीने हा प्रकल्प चालविण्याची तयारी दर्शवली आहे. तीन निवादापैकी मेलहेम कंपनीची निविदा प्रतिटन ६४० रुपये असल्याने त्यांना ३० वर्षांसाठी हा प्रकल्प चालविण्यास देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला. दररोज खत प्रकल्पात जमा होणाऱ्या ४०० ते ५०० टन कचऱ्यापैकी ७० टक्के कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. ठेकेदाराला ३५० टनापर्यंत ६४० रुपये तर त्या पुढील कचऱ्यासाठी प्रती टन ३८४ रुपये दिले जाणार आहेत. पुढील ३० वर्षे ठेकेदारालाच संपूर्ण प्रकल्पाच्या देखभाल, दुरुस्तीसह सध्याच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर प्रक्रिया कराव्या लागणार आहेत.
येथील १५ ते २० लाख मेट्रिक टन कचऱ्याचे कॅपिंग केले जाईल. तसेच कचऱ्यावर प्रक्रिया करून विविध प्रोडक्ट तयार केले जाणार असून झीरो लॅण्डफिल करण्याचा प्रयत्न आहे. राज ठाकरे यांनी संबंधित प्रकल्पाला चालना देण्याचे आदेश दिले आहेत.
- सलिम शेख, सभापती, स्थायी समिती
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 13, 2016, 12:50 pm
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
हिंसक कारवायांच्या पार्श्वभूमीवर आठ गावांमध्ये लागू करण्यात आलेली संचारबंदी शुक्रवारी दुपारी बारानंतर शिथिल होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मोबाइल इंटरनेट सेवा व मद्य विक्रीवर लादलेले निर्बंधही शनिवारी उठवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. गुरुवारी संचारबंदी लागू केलेल्या गावांना भेट देत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यातील स्थिती पूर्वपदावर आली असून, कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, सर्वांनी शांतता राखावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडेकर यांनी केले आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथे घडलेल्या घटनेनंतर शहरासह जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर चार दिवस हिंसाचाराच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडल्या. त्यामुळे अफवांना पेव फुटले व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. जिल्ह्यातील विल्होळी, सांजेगाव, शेवगेडांग, अंजनेरी, तळेगाव, महिरावणी, तळवाडे आणि गोंदे या गावांमध्ये मंगळवारी रात्री ४८ तासांची संचारबंदी लागू करण्यात आली. आता ती शिथिल होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे गेले चार दिवस बंद असलेली मोबाइल इंटरनेट सेवा व मद्य विक्रीवरील निर्बंधही उठवण्यात येणार आहेत. शहरासह जिल्ह्यातही गुरुवारी शांततेचे वातावरण होते.
बससेवाही सुरू
गेल्या चार दिवसांपासून बंद असलेली एसटी महामंडळाची बससेवा गुरुवारी पूर्ववत सुरू करण्यात आली. बुधवारी तुरळक प्रमाणात टप्प्याटप्प्याने बस सोडण्यात आल्या. आज त्यात वाढ करण्यात आली. मुंबई, पुणे, औरंगाबाद, धुळ्यासह ठीकठिकाणी आज बससेवा सुरू झाली. त्र्यंबकेश्वरकडे जाणारी बससेवा मात्र अजूनही बंदच ठेवण्यात आली आहे.
शहर बससेवाही सुरू
बाहेरगावाला जाणाऱ्या बससेवेबरोबरच गुरुवारी सकाळी दहानंतर शहर बससेवाही सुरू करण्यात आली. सकाळी ही सेवा उशिरा सुरू झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले; पण नंतर हळूहळू ही सेवा सर्वत्र सुरू झाल्यामुळे सर्वांना हायसे वाटले. बुधवारी संपूर्ण दिवस शहर बससेवा बंद होती. त्यामुळे आज दिलासादायक चित्र सर्वत्र दिसत होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 14, 2016, 3:30 pm
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेचे ‘क’ वर्गातून ‘ब’ वर्गात रुपांतर झाल्याने शुक्रवारच्या महासभेत ‘ब’ वर्गाच्या आकृतीबंधाला मंजुरी देण्यात आली. या नव्या आकृतीबंधात ७ हजार ६५६ नव्याने पदांची निर्मिती होणार आहे. त्यामुळे महापालिकेतील आस्थापनावरील पदांची संख्या ही पंधरा हजारांच्या आसपास होणार आहे. महासभेच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव आता राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे. परंतु, सध्याच पालिकेचा आस्थापना खर्च ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने पदनिर्मितीवर राज्य सरकारकडून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता कमीच आहे. अनुकंपा तत्त्वावरील ७८ पदे भरण्याचे आदेशही महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत.
महापौर अशोक मुर्तडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत ‘ब’ वर्ग महापालिकेला आवश्यक असलेल्या कर्मचारी व अधिकारी यांच्या पदांची संख्या असलेला आकृतीबंध प्रशासनाच्या वतीने सादर करण्यात आला. महापालिकेचा दर्जा ‘क’ वर्गावरून ‘ब’ वर्गावर झाला आहे. ‘क’ वर्गात असतानाच पालिकेत साडेसात हजार पदे मंजूर आहेत. परंतु, ‘ब’ वर्गात या पदांची संख्या वाढणे अपेक्षित असून, नोकरभरतीसाठी सत्ताधाऱ्यांनी प्रशासनावर दबाव टाकला होता. त्यानुसार प्रशासनाने ‘ब’ वर्गानुसार आवश्यक असलेला आकृतीबंध सादर केला. त्यात नव्याने ७ हजार ६५६ पदांची आवश्यकता आहे. त्यात ‘अ’ वर्ग पदे २७५, ‘ब’ वर्ग १०९, ‘क’ वर्ग २४२७ तर ‘ड’ वर्गासाठी ४८४५ पदांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे हा आकृतीबंध मंजूर झाल्यास पंधरा हजार पदांची निर्मिती होणार आहे. आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर तो मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला जाणार आहे. शासनाने शिक्कामोर्तब केल्यानतंरच त्याची अंमलबजावणी होणार आहे.
अखेर खुर्ची मिळाली
महापौर होण्याची इच्छा बाळगून असलेल्या स्थायी समिती सभापती सलिम शेख यांना शुक्रवारी महापौरांच्या खुर्चीवर बसण्याची संधी प्राप्त झाली. उपमहापौर गुरुमीत बग्गा हे बोलण्यासाठी सभागृहात आले. त्याच वेळेस महापौर मुर्तडक यांना बाहेर जायचे असल्याने त्यांना शेख यांना पीठासन अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसण्याची विनंती केली. त्यानुसार शेख यांनी महापौराच्या खुर्चीवर विराजमान होऊन सरतेशेवटीका होईना महापौरपदाच्या खुर्चीवर बसण्याची संधी मिळवली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
October 14, 2016, 3:30 pm
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
दिवाळी पंधरा दिवसांवर येऊन ठेपली असतानाही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यासंदर्भातील निर्णय न झाल्याने शिवसेनेने महासभेत आक्रमक धोरण स्वीकारले. कर्मचाऱ्यांबाबत शिवसेनेला आलेला उमाळा बघून अन्य पक्षातील नगरसेवकांनीही सानुग्रह अनुदानाची मागणी लावून धरली. महापौरांनी आयुक्तांसह लेखा विभागासोबत चर्चा करून सानुग्रह अनुदान देण्याबाबतचा निर्णय आज (दि.१५) जाहीर करणार असल्याचे सांगितले.
महापौर अशोक मुर्तडक यांच्या अध्यक्षतेखाली महासभा सुरू होताच शिवसेनेने सानुग्रह अनुदान देण्यासंदर्भातील पत्र वाचून दाखविण्याची मागणी केली. महापौरांनी विषयपत्रिका संपल्यानंतर बोनसचा विषय घेऊ असे सांगितले. मात्र माजी महापौर विनायक पांडे, गटनेते अजय बोरस्ते, शिवाजी सहाणे यांच्यासह सर्वच नगरसेवकांनी उभे राहून पत्राच्या वाचनाची मागणी केली. दिवाळीत कर्मचाऱ्यांना तत्काळ बोनस मिळाला पाहिजे, अशी मागणी केली. परंतु, पत्रच सापडत नसल्याने विषय नंतर घेण्याची महापौरांची मागणी सेनेच्या नगरसेवकांना नाकारली. अखेरीस महापौरांनी पत्राचे वाचन करण्याचे आदेश दिले. शिवसेनेने कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त २० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली. विनायक पांडे यांनी अच्छे दिन वर टीका करीत भाजपवरही शरसंधान साधले. शिवसेनेचा उमाळा पाहून अन्य पक्षातील नगरसेवकांनी दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळायला हवे, अशी मागणी केली. त्यामुळे महापौरांंनी आयुक्त, लेखा विभागातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे जाहीर केले. महापालिकेतील सर्व कर्मचारी संघटनांना एकत्रित बैठक घेऊन जाहीर करणार असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले. गेल्या वेळेस सानुग्रह अनुदान १३ हजार ५०० रुपये देण्यात आले होते.
शिवसेनेचे शक्तीप्रदर्शन
शुक्रवारच्या महासभेत शिवसेना चांगलीच आक्रमक दिसून आली. शिवसेनेने मनसेला घेरण्याबरोबरच भाजपवरही शरसंधान साधले. महासभेत भाजपच्या अच्छे दिन ही गले की हड्डी बनल्याचे सांगत, माजी महापौर विनायक पांडे यांनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाना साधला. शिवसेनेच्या सदस्यांनी सानुग्रह अनुदानाचा विषय सर्वप्रथम घेण्यासह महापौरांना भाग पाडले. निवडणुका जवळ आल्याने शिवसेनेच्या नगरेसवकांमध्ये आलेली आक्रमकता चर्चेचा विषय बनली होती.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 14, 2016, 3:30 pm
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
नाशिक जिल्हा न्यायालयाच्या पाठीमागील बाजूस असलेली पोलिस मुख्यालयाच्या अखत्यारीतील अडीच एकरपेक्षा जास्त जागा ५० वर्षांचा विचार करून कोर्टाला देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. या निर्देशामुळे जिल्हा न्यायलायाच्या विस्तारीकरणाला मदत मिळणार आहे. विशेष म्हणजे या निर्देशात उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समितीने जागेची पूर्तता ३१ डिसेंबर २०१६ पूर्वी करण्याचे नमूद केल्यामुळे ही जागा त्या अगोदर ताब्यात मिळण्याची शक्यता आहे.
नाशिक जिल्हा न्यायालयासाठी पोलिस खात्याची पाच एकर जागा मिळावी, यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. काका घुगे व नाशिक वकील संघाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने त्याबाबत पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश महाराष्ट्राचे महाअधिवक्ता रोहित देव व विधी व न्याय विभागाचे मुख्य सचिव यांना दिले होते. त्यांनी नाशिक कोर्टाची जागेची पाहणी करून उच्च न्यायालयामध्ये अहवाल सादर केला. या अहवालानुसार अडीच एकर जादा जागा कोर्टासाठी देण्यात यावी, तसेच वकिलांच्या चेंबरच्या दोन इमारती नवीन बांधून देऊन नंतर कोर्टाचे जादा इमातरतीचे बांधकाम व्हावे, अशा स्वरुपाचा अहवाल उच्च न्यायालयात दिला होता.
रोहित देव यांनी दिलेला अहवाल उच्च न्यायालयाने स्वीकारला व त्यानंतर न्यायलायच्या प्रशासकीय समितीने अडीच एकरपेक्षा जास्त जागा कोर्टाचा ५० वर्षांचा विचार करून मिळावी, असे मत मांडत शासनाने त्याचा विचार करण्याचे निर्देश दिले. या जागेसाठी मुंबई व महाराष्ट्र बार असोसिएशनने राज्य सरकारकडे गेल्या १५ वर्षांपासून पाठपुरावा केला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ही जागा मिळावी याासाठी याचिका दाखल करण्यात आली व त्यानंतर हा निकाल आला आहे.
ही जागा मिळावी यासाठी ज्येष्ठ विधीज्ज्ञ काका घुगे ,जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष नितीन ठाकरे, बार कौन्सिलचे सदस्य अॅड. जयंत जायभावे, अॅड. सुरेश निफाडे, अॅड. जालिंदर ताडगे यांनी सतत पाठपुरावा केला. त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाचे अॅड. संदीप शिंदे, सचिन गिते यांनी मदत केली. त्यामुळे ही जागा आता मिळणार आहे.
सर्व न्यायालये एकाच ठिकाणी
विस्तारीकरण झाल्यामुळे शहराच्या विविध भागात असलेली एकूण ५० हून अधिक न्यायालये एकाच ठिकाणी येण्याची शक्यता आहे. त्यात कामगार, औद्योगिक, कौटुंबिक अशा विविध न्यायालयांचा समावेश असेल. पार्किंगसह वकिलांसाठीही मुबलक जागा उपलब्ध होणार आहे.
जिल्हा न्यायालयात तीन हजार वकील
जिल्हा न्यायलायत सध्या तीन हजारांहून अधिक वकील कार्यरत आहेत. तसेच, न्यायालयाच्या आवारात विविध प्रकारची ३५ न्यायालये कार्यरत आहेत. तसेच, हजारो नागरिक या ठिकाणी दररोज येतात. पार्किंगच्या असुविधेसह विविध अडचणी येथे निर्माण झाल्या आहेत. सन १८८५ सालापासून या न्यायालयाला जागा मिळू शकलेली नाही.
तत्कालीन अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
सन २००२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची शिष्टमंडळाने भेट घेत न्यायालयाच्या जागेचा मुद्दा उपस्थित केला. याची दखल घेत न्यायालयासाठी पोलिस मुख्यालयातील दोन एकर जागा देण्यात यावी, असे आदेश त्यांनी दिले. परंतु, तत्कालीन अधिकाऱ्यांनी त्याचे पालन न केल्याने न्यायालयास जागा मिळू शकली नाही.
उच्च न्यायालयाच्या या निर्देशामुळे नाशिक जिल्हा न्यायालयाला नवीन कोर्ट मिळेल. पक्षकार व वकिलांना नवीन जादा जागा मिळतील. या निर्देशामुळे अडीच एक जागा मिळणार हे निश्चित झाले आहे. अतिरिक्त जागेबाबतही ५० वर्षांचा विचार करण्याचेही सुचवल्यामुळे शासन त्याबाबत विचार करेल. हा लढा सर्वांच्या सहकार्याने लढला गेला.
- अॅड. नितीन ठाकरे, अध्यक्ष, जिल्हा वकील संघ
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 14, 2016, 3:30 pm
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
तळेगाव प्रकरणातील पाच वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी पालकमंत्र्यांनी केलेल्या विधानावरून शिवसेनेने आता भाजपला घेरण्याची तयारी सुरू केली आहे. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी थेट पालकमंत्र्यांनाच या दंगलीप्रकरणी जबाबदार धरले असून, मुख्यमंत्र्यांच्या विश्वासू लोकांनी वातावरण बिघडवल्याचा आरोप केला आहे. तसेच भाजपचे नगरसेवक कंबरेला पिस्तूल बांधून फिरल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तळेगाव येथील पाच वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी अहवाल येण्यापूर्वीच बलात्कार झाला नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे नाशिकमधील वातावरण अधिक चिघळले होते. महाजन यांच्या या वक्तव्याने नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त करत, अशांततेला खतपाणी मिळाले होते. त्यामुळे शहरासह संपूर्ण जिल्हा सलग पाच दिवस धगधगत होता. त्यातच या दंगली प्रकरणात चिथावणी दिल्याप्रकरणी व पोलिसांवरच चाकूहल्ला केल्याप्रकऱणी भाजपचा नगरसेवक पवन पवार यास अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्या घरातून शस्त्रेही जप्त करण्यात आली. त्यामुळे भाजपच्या अडचणी वाढून पवन पवारचा प्रवेश चांगलाच अंगलट आला आहे.
शुक्रवारी शिवसेनेच्या नेत्या व प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेवून पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर हल्लाबोल केला. नाशिकचे वातावरण बिघडण्यास पालकमंत्री महाजन यांचे वक्तव्यच कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या किचन कॅबिनेटमध्ये असलेल्या महाजन यांनीच नाशिक भडकवले असा आरोप करत, अहवाल येण्याआधीच त्यांनी वक्तव्य करून जमावाला अशांत केल्याचा आरोप केला आहे. तसेच पवन पवारच्या प्रवेशासह स्थानिक आमदार बाळासाहेब सानप यांच्यावरही त्यांनी आरोप केले आहेत.
निवडणुकीचा रंग
सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना नेत्यांनीच दंगलीसंदर्भात भाजपवर शरसंधान केल्याने भाजपची पंचाईत झाली आहे. आगामी काळात नाशिक महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्यात भाजप व सेना आमने-सामने लढण्याची शक्यता आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 14, 2016, 3:30 pm
म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर
वासननगर येथे उभारण्यात आलेल्या क्रीडा प्रबोधिनीच्या लोकार्पण सोहळ्यापूर्वीच या प्रबोधिनीच्या नामकरणावरून स्थानिक नागरिक, शिवसेना पदाधिकारी व मनसेच्या नगरसेवकात वादविवाद होऊन शाब्दिक चकमक झाली.
यावेळी स्थानिक नागरिकांनी शिवसेनेच्या नगरसेविका व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या प्रबोधिनीचे लोकार्पण करून घेतले. मात्र, संतप्त झालेल्या मनसे नगरसेवकांनी हा लोकार्पण सोहळा चुकीचा असून, शनिवारीच या प्रबोधिनीचा लोकार्पण सोहळा होणार असल्याचे जाहीर केले.
वासननगर येथे महानगर पालिकेच्या क्रीडांगणाचे आरक्षण असलेल्या जागेवर क्रीडा प्रबोधिनी उभारण्यात आली आहे. या प्रबोधिनीचा लोकार्पण सोहळा आज (दि. १५) रोजी होणार असून ‘शिवराज क्रीडा प्रबोधिनी’ असे नाव देण्यात आले आहे. मात्र, या नावाला स्थानिक नागरिक व नगरसेविका वंदना बिरारी यांनी विरोध दर्शविला आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेला निवेदनही दिले होते. मात्र, त्या निवेदनाचा उपयोग न होता क्रीडा प्रबोधिनीचे उद्घाटन शनिवारी होणारच असे लक्षात आल्यावर काही स्थानिक नागरिक तसेच शिवसेनेच्या नगरसेविका वंदना बिरारी, माजी नगरसेवक पुंजाराम गामणे, अमोल जाधव, गणेश जाधव, सुदाम डेमसे, रवींद्र गामणे यांनी ‘स्व. मुरलीधर गामणे क्रीडांगण’ अशा नामकरणाचा फलक लावून या त्याचे उद्घाटन केले. यावेळी नगरसेवक सुदाम कोबडे यांनी या क्रीडांगणावर येऊन या नावास विरोध दर्शविला. हे लोकार्पण चुकीचे होत असून, खरे लोकार्पण शनिवारीच होणार असल्याचे जाहीर केले. वाद वाढत जाऊन अखेरीस या दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमक झाली. शिवसेना नगरसेविका वंदना बिरारी यांनी स्थानिक नागरिकांचा विचार करून त्यांना विश्वासात घेऊनच हे नामकरण झाले पाहिजे अशी मागणी करीत अखेरीस या फलकाचे उद्घाटन केले. मात्र, दोन्ही गटातील वाद वाढत असल्याचे लक्षात येताच इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदानंद इनामदार यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाद मिटविला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
October 14, 2016, 3:30 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शहर बसमधील प्रवाशांचे तसेच बसस्थानकाच्या आवारातील नागरिकांचे पाकीट मारणाऱ्या अहमदनगर येथील तीन संशयित महिलांना सरकारवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गर्दीचा फायदा घेत त्या पुरुषांच्या खिशातील पाकिटावर आणि महिलांच्या पर्सवर डल्ला मारत असल्याचे समोर आले आहे.
सुवर्णा विठ्ठल काळे (वय ३०), माया कल्याण भोसले (वय २५) व प्रतिभा प्रवीण काळे (वय २२ रा. इनामदार वस्ती हातगाव नगर, शेगाव, जि. अ. नगर) अशी त्यांची नावे आहेत. बुलढाणा येथील अमजदखान मुनाफ खान यांनी फिर्याद दिली आहे. खान दाम्पत्य गुरुवारी सायंकाळी जुने सीबीएस येथे बसमध्ये चढत असताना संशयित महिलांनी त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील पर्स
हातोहात लांबविली होती. मात्र, ही घटना पत्नीपाठोपाठ बसमध्ये प्रवेश करणाऱ्या खान यांच्या लक्षात आली. पर्समध्ये मोबाइल, मेकअप कीट, रोकड व कागदपत्र असा सुमारे ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल होता. या घटनेची माहिती सरकारवाडा पोलिसांना कळविण्यात आल्याने पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून महिलांना ताब्यात घेतले. संशयित महिलांनी प्रवासात व शहरातील विविध बसस्थानक आवारात अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
कॅनडा कॉर्नरला घरफोडी
कॅनडा कॉर्नर परिसरातील रामदास कॉलनी भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ४६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षद नामदेव धोत्रे (रा. साई निवास, रामदास कॉलनी) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. धोत्रे कुटुंबीय मंगळवारी बाहेरगावी गेले असताना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिने, रोकड व साड्या असा सुमारे ४६ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अहिरराव करीत आहेत.
एकास मारहाण
सामायिक विहीरीच्या जागेवरून महिलेसह दोघांनी एकास जबर चोप दिला. या मारहाणीत तरुण जखमी झाल्याची घटना गंगापूर शिवारातील ध्रुवनगरमध्ये घडली. गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गोरख मधू पाटील (रा. यशवंत निवास, गुलमोहर कॉलनी, ध्रुवनगर ) यांनी फिर्याद दिली आहे. गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास पाटील आपल्या घराजवळ उभे असताना हा प्रकार घडला. तुकाराम शांताराम पाटील, गोविंद शांताराम पाटील व लिलाबाई शांताराम पाटील (रा. गुलमोहर कॉलनी) आदींनी पाटील यांना गाठून सामायिक विहिरीच्या जागेवरून वाद घातला. शिवीगाळ करीत त्यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या घटनेत त्यांच्या हातापायास गंभीर दुखापत झाली.
तरुणाला लुटले
पायी चाललेल्या तरुणाला बेदम मारहाण करीत त्याला लुटण्यात आल्याची घटना मधुबन कॉलनीत घडली. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी लूटमारीचा गुन्हा दाखल केला आहे.
संदीप कुमार मौर्य (वय १९, रा. कुमावत नगर, पेठरोड) या तरुणाने तक्रार दिली आहे. तो सोमवारी रात्री आठच्या सुमारास मधुबन कॉलनीतील एका बेकरीसमोरून चालला होता. ५ ते ६ जणांच्या टोळक्याने त्याला अडविले. बेदम मारहाण केली. त्याच्या गळ्यातील सोन्याचे ओमपान हिसकावले. तसेच खिशातील मोबाइल आणि पाकिट असा सुमारे ७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल घेवून पोबारा केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 14, 2016, 3:30 pm
म. टा. वृत्तसेवा, सातपूर
औद्योगिक वसाहतीतील नावाजलेल्या एशियन कंपनीतील कामगारांना कामाअभावी वाऱ्यावर भटकण्याची वेळ आली आहे. त्यातच कामगार उपायुक्तांच्या मध्यस्थीने कंपनी व्यवस्थापनाला कामगारांनी राजीनामे सादर केले होते. परंतु, कंपनी व्यवस्थापनाने कामगारांचा हिशेब न दिल्याने कामगार उपायुक्तांनी कामगारांना राजीनामे परत केले असल्याचे ‘मटा’ला सांगितले. कंपनी व्यवस्थापनावर कारवाई करावी, अशी मागणी कामगारांनी कामगार उपायुक्त जी. जे. दाभाडे यांच्याकडे केली आहे.
एशियन कंपनी व्यवस्थापनाने मे २०१६मध्ये उत्पादन प्रक्रिया बंद करणार असल्याचे सांगत कामगारांना प्रलंबित पगार व हिशेब देण्याचे मान्य केले होते. यानंतर कामगार युनियन व कामगार उपायुक्त यांच्या मध्यस्थीने कामगारांना उर्वरित पगार व हिशोब देण्यात आला. यावेळी भविष्य निर्वाह निधी व पेन्शनचा हिशोब ४५ दिवसांच्या आत सादर करणार असल्याचे कंपनी व्यवस्थापनाने कामगार उपायुक्तांना लेखी आश्वासन दिले होते. परंतु, ४५ दिवसांहून अधिक दिवस उलटूनही व्यवस्थापनाने कामगारांचा हिशोबच दिला नसल्याने कामगार उपायुक्त दाभाडे यांनी कामगारांचे लिहून घेतलेले राजीनामे परत केले असल्याचे सांगितले. कामगारांनी एशियन व्यवस्थापनाने हिशेब न दिल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
कंपनीची जागा भाड्याने
एशियन कंपनीत गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या कामगारांना कंपनीने वाऱ्यावर सोडले आहे. तर दुसरीकडे कंपनीने मुख्य कंपनीची मागील बाजू ई-स्मार्ट नावाच्या कंपनीला भाडेतत्वार दिली असल्याचे कामगार सांगतात. यात नुकतेच भाजपत प्रवेश केलेल्या एका मोठ्या नेत्याचेच कामगार याठिकाणी काम करत आहेत. तसेच एशियनमधील राजीनामे सादर केलेले ७५ कामगारदेखील याच ठिकाणी कामावर घेतले गेले आहेत. परंतु, त्यांना सरकारच्या कामगार कायद्याचा नियम डावलून काम करून घेतले असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. कामगार उपायुक्तांनी लक्ष द्यावे अशीही मागणी कामगारांनी केली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 14, 2016, 3:30 pm
म. टा. प्रतिनिधी , नाशिक
‘नॅनो टेक्नॉलॉजी’ या अत्याधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयाच्या अद्यावत मांडणीसाठी जिल्ह्यातील चांदवड कॉलेजने पुढाकार घेतला आहे. चांदवड येथील श्री. नेमीनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संस्थेच्या कर्मवीर आबड, लोढा, जैन कॉलेजमध्ये फिजीक्स विषयांतर्गत रविवारपासून (१६ ऑक्टोबर) दोन दिवसीय नॅशनल कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली आहे. भारताच्या संशोधन प्रयोगशाळेचे शास्त्रज्ञ डॉ. एन. आर. मुनीरत्नम हे उपस्थित उपस्थित राहणार आहेत.
‘नॅनो मटेरिअल इम्पॅरिटीव्ह अॅण्ड न्यू मिलीनिअम’ या विषयावर फिजीक्स या विषयांतर्गत ही नॅशनल कॉन्फरन्स चांदवड कॉलेजमध्ये १६ व १७ ऑक्टोबर या दोन दिवशी पार पडेल. अध्यक्षस्थानी बेबीलाल संचेती असतीले. डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होईल. कोरिया विद्यापीठाचे तंत्रज्ज्ञ डॉ. डी. पी. अमळनेरकर यांचे बीजभाषण होईल. मार्गदर्शक म्हणून भारताच्या संशोधन प्रयोगशाळेचे शास्त्रज्ञ डॉ. एन. आर. मुनीरत्नम, डॉ. बी. बी. काळे, डॉ. पी. के. खन्ना, प्राध्यापक एम. विठ्ठल, डॉ. एल. ए. पाटील, डॉ. पी. एस. पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. एस. डी. ढोले, डॉ. रामपाल शर्मा, डॉ. एस. पी. गिरी, डॉ. आर. एस. माने या मान्यवरांचा समावेश असणार आहे.
टेक्नॉलॉजीची प्रात्यक्षिके
अद्यावत तंत्रज्ञान म्हणून जागतिक संशोधकांचे आकर्षणकेंद्र असणाऱ्या नॅनो टेक्नॉलॉजी या विषयावरील सादर होणारी प्रात्यक्षिके हे या कॉन्फरन्सचे प्रमुख वैशिष्ट्य असणार आहे. ‘नॅनो मटेरिअरलची निर्मिती’ आणि ‘नॅनो मटेरिअलची उपयुक्तता’ या विषयावर तज्ज्ञाद्वारे प्रात्यक्षिके सादर होतील. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी विद्यार्थी व संशोधकांना प्राध्यापक डॉ. गणेश पाटील यांच्याशी ९४०३०२१३४४ या क्रमांकावर संपर्क साधावा.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 14, 2016, 3:30 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
केवळ अभ्यासाचा भाग म्हणून प्रोजेक्टकडे व संबंधित विषयाकडे न बघता त्याचा समाजाला उपयोग व्हावा, या विचारांनी मविप्र संचलित कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाइन सेंटर आर्किटेक्टच्या मोहित हेडा या विद्यार्थ्याने अपंग व विशेषतः पोलिओ बाधितांसाठी तीनचाकी सायकल तयार केली आहे. अपंगांना निश्चित स्थळी कोणत्याही कष्टाशिवाय व सुरक्षितरित्या पोहोचता यावे, या उद्देशाने त्याने हा प्रोजेक्ट तयार केला आहे. ही सायकल पूर्णतः स्वयंचलित आहे, हे प्रोजेक्टचे वैशिष्ट्य आहे.
केंद्र सरकारमार्फत अपंगांच्या सक्षमीकरणासाठी सुगम्य भारत अभियान राबविले जात आहे. यामध्ये तरुणांचा सहभाग देखील सरकारला अपेक्षित आहे. यानुसार हा प्रोजेक्ट महत्त्वाचा ठरत असून, तो अपंग व्यक्तीलाच दान करण्याचा निर्णय मोहितने घेतला आहे. अपंग व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये प्रवास करणे त्यांना अधिक खडतर जात असते. यावर उपाय म्हणून हा प्रोजेक्ट साकारण्यात आला आहे.
या प्रोजेक्टसाठी त्याला ३० ते ३२ हजार रुपये खर्च आला आहे. यामधील काही त्रुटी दूर करून तो याचे पेटंट करणार आहे. मोठ्या स्तरावर या प्रोजेक्टची निर्मिती केल्यास २० हजार रुपये प्रति प्रोजेक्टपर्यंत तो देता येईल, असे त्यानी सांगितले. या प्रोजेक्टसाठी त्याला अतुल केडिआ, रोहण पटवा, विभागप्रमुख सुवर्णा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. पोलिओबाधित असलेले सुकडू कोळी यांना ही सायकल दान करण्यात येणार आहे.
अशी आहे सायकल
ही सायकल बॅटरीवर असून, चार्ज करावी लागते. पाच तासात बॅटरी चार्ज होते. एकदा बॅटरी चार्ज केली तर २५ ते ३० किमीपर्यंत ही सायकल चालू शकते. त्याबरोबरच सोलर सिस्टीम बसविता येईल, अशी व्यवस्थाही यात करण्यात आली आहे. ही सायकल चालविण्यास अत्यंत सोपी असून, अपंग व्यक्ती कोणतीही हालचाल न करता ही सायकल चालवू शकतो. कोणत्याही वातावरणात चालू शकणारी, अॅडजस्टेबल सिट, हेडलाईट, इंडिकेटर, सीट बेल्ट, लगेज बॉक्स अशा सुविधाही यात आहेत. तसेच पुढील काळात सायकलमध्ये मोबिलिटी डिव्हाईस विकसित करण्यात येणार आहे. जेणे करून या व्यक्तींना आपत्कालीन काळात मदतीसाठी प्रयत्न करता येतील.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
October 14, 2016, 3:30 pm
म. टा. वृत्तसेवा, सटाणा
महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत हागणदारीमुक्त स्वच्छ शहर म्हणून नाशिक विभागातून सटाणा नगरपरिषदेची निवड करण्यात आली आहे. मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सटाणा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुलोचना चव्हाण, आमदार दीपिका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण व मुख्याधिकारी हेमलता डगळे यांना पारितोषिक देवून सन्मानित करण्यात आले.
मुंबई येथील नॅशनल सेंटर अपॉर मध्ये आयोजित या कार्यक्रमास गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, पालिका संचालनायाचे आयुक्त वीरेद्रसिंग उपस्थित होते. सटाणा नगरपरिषदेने हागणदारीमुक्त शहर होण्यासाठी विशेष योजना राबवून शहरवासियांचे प्रबोधन केले होते. पोलिकेने नागरीकांना या अभियानातंर्गत स्वच्छतेची सप्तपदी समजावून सांगितली. सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती, पाणी व प्रकाश व्यवस्था करून शौचालये वापरण्यायोग्य करण्यात आलीत. शहरातील मालमत्ताधारकांकडे शौचालय नसल्यास रोख १८ हजार अनुदान देऊन लोकसहभागातून शौचालये बांधण्यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने प्रोत्साहन देण्यात आले होते. दीड वर्षात तीन वेळेस शौचालये उभारणीच्या कामाची शासनाच्या उच्चस्तरीय समितीच्यावतीने पाहणी करण्यात आली होती. या सर्व कामांची दखल घेत शासनाने नाशिक विभागातून सटाणा नगर पालिकेची हागणदारीमुक्त स्वच्छ शहर म्हणून निवड केली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 14, 2016, 3:33 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे. हे प्रमाण वाढविण्याच्या उद्देशाने शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती देण्याचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रतिवर्षी विविध पदांसाठी अनेक परीक्षा घेतल्या जातात. सनदी परीक्षांमध्ये राज्याचे प्रतिनिधीत्त्व वाढावे, या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी एक समिती गठित करण्यात आली होती. या समितीच्या अहवालानुसार मुलांमध्ये न्यूनगंड, परीक्षेची काठीण्यपातळी, माध्यमांबाबत असणारा गैरसमज, परीक्षेतील यशप्राप्तीनंतर उपलब्ध संधींच्या माहितीचा अभाव अशा अनेक बाबी समोर आल्या आहेत. त्या अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांमध्ये या परीक्षांबाबत जागरुकता निर्माण करणे महत्त्वाचे ठरेल, या विचाराने हा उपक्रम येत्या काळात राबविण्यात येणार आहे. विशेषतः माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागांमधील विद्यार्थ्यांना शाळेतच याअंतर्गत मार्गदर्शन केले जाणार आहे.
अशी होणार प्रक्रिया
केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवरुन व स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करणाऱ्या संस्थांशी समन्वय साधून ही माहिती माध्यमिक शिक्षण विभागांनी संकलित करायची आहे. यासाठी भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्थेचे मार्गदर्शन या विभागाला घेता येणार आहे. ही माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांना उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या असणार उपाययोजना
दहावी व बारावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी निकालानंतर जिल्हाधिकारी व माध्यमिक शिक्षणाधिऱ्यांच्या पुढाकाराने दोन दिवसाचे शिबिर राबविण्यात येणार आहे. यामध्ये करीअर मार्गदर्शन केंद्राच्या प्रमुखांना मार्गदर्शनासाठी निमंत्रित करावे, या परीक्षांविषयी जागरुकता निर्माण करावी, विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन करावे आदी सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी जिल्ह्यात विशेषतः ग्राणीण भागात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरांचेही आयोजन करण्यात येणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 14, 2016, 3:30 pm
म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर
त्र्यंबकच्या प्रस्तावीत विकास आराखड्याबाबत दोनशे पेक्षा अधिक हरकती आल्या आहेत. सर्वाधिक हरकती या रस्ता रंदीकरणाबाबत आल्या आहेत. शुक्रवारी हरकती सूचनांची अंतिम मुदत होती. दरम्यान भाजपाचे शहराध्यक्ष शामराव गंगापुत्र यांनी हरकती सूचनांसाठी मुदतवाढ मिळावी असा अर्ज दिला आहे.
शुक्रवारी हरकतींसाठी अखेरीच मुदत होती. मात्र शहर आणि परिसरात तळेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर अशांत वातावरण निर्माण झाले असल्याने ग्रामस्थांना हरकती घेण्यासाठी असलेल्या कागदपत्रांची जुळवाजुळव करणे माहिती घेणे याबाबत अडचणी आलेल्या आहेत. त्याकरिता मुदत वाढ मिळावी असा अर्ज गंगापुत्र यांनी दिला आहे. दरम्यान येथे नगराध्यक्षा व मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने उपनगराध्यक्ष संतोष कदम यांनी हा अर्ज स्वीकारला व नगरविकास विभागाकडे देण्यात येणार असल्याचे सांगितले.
त्र्यंबक नगरपालिकेत शुक्रवारी मतदार नोंदणी अभियानाचा आणि डीपी हरकतींचा अखेरचा दिवस असल्याने ग्रामस्थांची गर्दी झाली होती. सायंकाळी कार्यालयाची वेळ संपत आली तरीही हरकती येत होत्या.
शेवटी छापील हरकत नमुन्यात माहिती भरून देण्यात येत होत्या. सर्वाधिक हरकती या रस्ता रंदीकरणाबाबत आल्या आहेत.
त्र्यंबकेश्वर शहर भाजप, ग्राहक पंचायत, आखाडा परिषद आदि संस्थांनी नागरिकांच्या गटांनी आणि नगरसेवकांनीदेखील या डीपीवर हरकती नोंदविल्या आहेत. महिन्या भराच्या मुदतीत वेळेत कागदपत्र न मिळणे, पुरेशी माहिती न मिळणे, शासकीय सुट्या, शेवटच्या आठवड्यातील तणावग्रस्त परिस्थिती यामुळे हरकती घेतांना ग्रामस्थांची दमछाक झाली आहे.प्रशासनाने नागरिकांना नाहक तिकीटचा भुर्दंड दिल्याचे स्पष्ट केले आहे.
डीपीवर हरकती आल्या आहेत. त्यांचा विचार होईलच. अर्थात हा प्रारूप विकास आराखडा अधिक रहिवासी क्षेत्र उपलब्ध करणारा असल्याने प्लॉटचे भाव खऱ्या अर्थाने जमिनीवर आणणारा आहे. यामध्ये विकासाला अधिक चालना मिळेल. सर्वसामान्यांना स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्याची संधी उपलब्ध होईल.
- संतोष कदम,
उपनगराध्यक्ष
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 14, 2016, 1:58 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
तळेगाव अंजनेरी येथील घटनेनंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या व्हॉट्सअॅपवरील सात ग्रुप अॅडमिनसह आठ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यातील सर्व ग्रुप अॅडमिनना अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियाचा गैरवापर केल्याबाबत पोलिसांनी गेल्या पाच दिवसांत ही कारवाई केली आहे. अत्याचाराची घटना ज्या तळेगाव अंजनेरीत घडली तेथील एका ग्रुप अॅडमिनचा यात समावेश असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक चौबे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल उपस्थित होते.
सोशल मीडियाच्या गैरवापरप्रकरणी अंबड पोलिसांनी सर्वाधिक चार जणांना, गंगापूर पोलिसांनी दोघांना, तर सातपूर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हे सर्व व्हॉट्सअॅप ग्रुपचे अॅडमिन असल्याची माहिती या वेळी पोलिसांनी दिली. दोन समाजांत तेढ निर्माण करणे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे, तसेच दंगा भडकविण्यास कारणीभूत ठरल्याचे व सायबर अॅक्टअंतर्गतचे गुन्हे या सर्व आठ जणांवर दाखल करण्यात आले आहेत. अनेकांनी मेसेज, तसेच फोटोंची खात्री न करता ते पुढील व्यक्तींना पाठवून दिले. त्यामुळे अशा व्यक्तींनाही पोलिस स्टेशनमध्ये बोलावण्यात येऊन समज देण्यात येणार आहे. फेसबुकचाही या काळात गैरवापर करण्यात आला असून, एक गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. सिंघल यांनी दिली. मोबाइल इंटरनेटवर शनिवारी दुपारी एकपर्यंत बंदी असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
५३ गुन्हे; ११८ संशयितांना अटक
गेल्या रविवारपासून जिल्ह्यात दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शहर व ग्रामीण पोलिसांनी एकूण ५३ गुन्हे दाखल केले असून, ११८ संशयितांना अटक करण्यात आली आहे. पोलिस निष्पक्षपातीपणे हे प्रकरण हाताळत असून, कायदा आणि सुव्यवस्था हातात घेणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही, अशी ग्वाही पोलिस आयुक्त डॉ. सिंघल आणि विशेष पोलिस महानिरीक्षक चौबे यांनी दिली.
अॅट्रॉसिटीचे सात गुन्हे दाखल
तळेगाव अंजनेरी येथे अल्पवयीन मुलीवरील बलात्काराचे शहरासह जिल्ह्यात जोरदार पडसाद उमटले. ही सर्व परिस्थिती हाताळताना ग्रामीण पोलिसांनी सर्वाधिक २७ गुन्हे दाखल केले असून, त्यापैकी २३ प्रकरणांमध्ये ८२ संशयितांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सहा गुन्हे जातिवाचक शिवीगाळीचे आहेत, तर उर्वरित गुन्हे दंगल, सरकारी कामात अडथळा, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन अशा स्वरूपाचे आहेत.
दंगलीचे व्हिडीओ शूटिंगही!
दंगलसदृश परिस्थितीत शहरात पाच लोक जखमी झाले असून, त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. गोंधळाची, तसेच दंगलसदृश परिस्थिती जेथे जेथे निर्माण झाली त्या ठिकाणचे व्हिडीओ शूटिंग पोलिसांनी केले आहे. त्यावरून संशयितांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, संबंधितांवर कारवाई केली जात असल्याची माहिती डॉ. सिंघल यांनी दिली.
दोन अधिकारी रडारवर
शहरात निर्माण झालेली दंगलसदृश परिस्थिती हाताळताना दोन पोलिस अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद राहिल्याच्या तक्रारी पोलिस आयुक्त डॉ. सिंघल यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. तणाव निवळला की याबाबतची चौकशी केली जाणार आहे. पक्षपातीपणे कारवाया करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही सिंगल यांनी दिली आहे.
सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्यांवर आम्ही गुन्हे दाखल करीत आहोत. आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्या जात असतील तर नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी.
- डॉ. रवींद्र सिंघल, पोलिस आयुक्त
जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. प्राप्त सूचनांचीदेखील आम्ही निश्चितपणे दखल घेऊ.
- विनयकुमार चौबे, विशेष पोलिस महानिरीक्षक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
October 15, 2016, 3:30 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
डोअर अलार्म, प्लाझमा बॉल, व्हॅक्युम क्लिनर, नॅचरल सोप, रोबोनिट्स, मायक्रो फोन, रेन वॉटर हार्वेस्ट, प्रोजेक्टर, सेल द युनिट ऑफ लाइफ अशा तीस वेगवेगळ्या प्रयोगांनी विज्ञानाविष्काराची ओळख करून दिली. निमित्त होते, रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलतर्फे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनाचे. सिटी सेंटर मॉलमधील ग्रॅण्ड बॉलरुम हॉल येथे आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे शनिवारी उद्घाटन करण्यात आले.
विद्यार्थ्यांची वैज्ञानिक विषयांप्रती गोडी वाढावी, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. रविवारी हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. प्रदर्शनात रासबिहारी शाळेच्या नववीच्या विद्यार्थिनी कोमल थेटे व सुबोधी कांबळे यांनी तयार केलेली डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारीत चित्रफित दाखविण्यात आली. शाळेच्या इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले ३० प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले आहेत. हायड्रोलिक पंप, क्रिस्टलिझशन, हायड्रो पॉनिकस, इलेक्ट्रोमॅग्नाटिक क्रेन, सिक्युरिटी सिस्टीम, होवेरबोर्ड, अमोनिया फाऊंटन, रोटर व्हील अशा वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सचा त्यात समावेश आहे. केटीएचएम कॉलेजच्या प्राध्यापिका सुजाता मगदूम या विज्ञान प्रयोगांचे परीक्षण करणार आहेत. रविवारी निकाल जाहीर होणार असून उत्कृष्ट प्रकल्पासाठी २ पारितोषिके दिले जाणार आहे.
आमदार प्रा. फरांदे म्हणाल्या की, आजकालच्या दैनंदिन जीवनात विज्ञानाशी जोडलेले रहावे लागते. विज्ञान हे मानवाच्या जीवनातील अविभ्याज्य भाग आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयाचा सखोल अभ्यास केला पाहिजे. यासाठी परीक्षेतील गुण महत्त्वाचे नसतात तर पाठ्य पुस्तकांव्यतिरिक्त वाचन आणि व्यावहारिक ज्ञान महत्त्वाचे आहे. शाळेच्या विज्ञान विषयाच्या शिक्षिका नमिता दास, मुख्याध्यापिका बिंदू विजयकुमार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी के. डी. सिंह यांचे या प्रदर्शनास मार्गदर्शन लाभते आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा कदम आणि कोमल थेटे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन के डी सिंह यांनी केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 15, 2016, 3:30 pm
म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर
नाशिक महापालिकेने सहकार्य केल्यास महिन्यातून एक आठवडा खास नाशिकच्या खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी निश्चित येण्याचा प्रयत्न करीन. कारण नाशिकमध्ये कविता राऊतसारख्या खेळाडू बघावयास मिळत असल्याने अजूनही चांगले खेळाडू येथून तयार करण्याची तयारी असल्याचे प्रतिपादन भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार धनराज पिल्ले यांनी केले.
पाथर्डी फाटा येथील शिवराज क्रीडा प्रबोधिनीच्या उद्घाटनप्रसंगी पिल्ले बोलत होते. या वेळी महापौर अशोक मुर्तडक, नगरसेवक सुदाम कोंबडे उपस्थित होते. वासननगर येथील गामणे मळा परिसरात ही क्रीडा प्रबोधिनी महापालिकेतर्फे साकारण्यात आली आहे. या प्रबोधिनीच्या नावावरून शुक्रवारीच दोन्ही नगरसेवकांमध्ये वादविवाद झाला होता. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पिल्ले यांनी प्रबोधिनीचे उद्घाटन केले. या वेळी त्यांनी सांगितले, की भारतात काही खेळांना महत्त्व दिले जात नसून, सर्वांनी बीसीसीआयचा आदर्श घेणे गरजेचे आहे. त्यांनी क्रिकेटसाठी घेतलेले परिश्रम लक्षात घेणे गरजेचे आहे. शिवाजी पार्कच्या मैदानावर खेळून सचिन तेंडुलकर मोठा झाला. अशाच प्रकारे सद्यःस्थितीत टेनिस, कबड्डी, धावणे अशा विविध खेळांमध्ये विध्यार्थी लक्ष देऊ लागले आहेत. नाशिकमध्ये एक स्वतंत्र क्रीडा प्रबोधिनी निर्माण झाली असून, त्याकडे महापालिकेने लक्ष दिले पाहिजे. नाशिकमध्ये चांगले खेळाडू आहेत; पण प्रशासनाने त्यांना सहकार्य केल्यास नाशिकचा लौकिक निश्चितच वाढेल.
या वेळी महापौर मुर्तडक व नगरसेवक कोंबडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रकाश कोल्हे, मनोज पिंगळे, भगवान दोंदे, मोहन मोरे, त्र्यंबक कोंबडे, तानाजी गवळी, रमेश जगताप, अनिल दंडगव्हाळ आदी उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 15, 2016, 3:30 pm
सातपूर परिसरातील नागरिकांचा सवाल; गाडीचालकही हैराण
म. टा. वृत्तसेवा, सातपूर
नाशिक महापालिकेत अति महत्त्वाच्या सेवा देणाऱ्या घंटागाड्यांची दयनीय अवस्था झाली आहे. महापालिकेने नवीन ठेकेदाराचीही नेमणूक केलेली असल्याचे सांगितले जात आहे. मात्र तरीही नवीन घंटागाड्या कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यातच नादुरूस्त असलेल्या घंटागाड्यांनी चालकदेखील मेटाकुटीस आले आहेत. अतिरिक्त लावण्यात आलेल्या घंटागाड्यांचीदेखील फारशी काही चांगली परिस्थिती नसल्याने महापालिकेने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
शहरातील घरोघरी जाऊन घाण-कचरा गोळा करण्याचे काम घंटागाड्यांमार्फत केले जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून घंटागाड्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यांची प्रशासनाकडून दुरूस्तीच होत नसल्याने चालकदेखील हैराण झाले आहेत. महापालिकेने नुकताच घंटागाडीचा ठेका दिला असल्याचे जाहीर केले. परंतु नवीन घंटागाड्या कधी येणार, असा सवाल उपस्थित होत आहे. सद्यस्थितीत असलेल्या घंटागाड्यांना ‘चल यार धक्का मार’ अशीच परिस्थिती पहायला मिळते. त्यातच अतिरिक्त चालविण्यात येत असलेल्या घंटागाड्या देखील विना छप्परच्या असल्याने पाहिजे तेवढया प्रमाणात कचरा गाड्यांमध्ये घेता येत नाही. छप्पर नसल्याने रस्त्यावरून जातांना कचरा रस्त्यावर पडण्याचे देखील प्रकार घडत असतात. यासाठी महापालिकेने तत्काळ ठेकेदाराकडून नवीन घंटागाड्या उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी होत आहे.
कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
घंटागाड्यांची दुरवस्था असताना दुसरीकडे कर्मचाऱ्यांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. घंटागाडीवर काम करणारे कर्मचाऱ्यांना मास्क, गमबूट अथवा सुरक्षेची कुठलीच साधने दिली जात नाही. त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे. एकीकडे किमान वेतनासाठी घंटागाडी कर्मचाऱ्यांची युनियन कामगार उपायुक्तांकडे मागण्या मांडत असताना दुसरीकडे कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने देण्यात यावेत, अशीही मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
महापालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्यांचेच आरोग्य गेल्या काही वर्षांपासून धोक्यात आले आहे. महापालिकेने स्मार्ट सिटीचे स्वप्न पहाताना परिसरासाठी तातडीने नवीन घंडागाड्या उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.
-योगेश आहेर, रहिवाशी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧