Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

झेंडूच्या फुलांनी सजली बाजारपेठ

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसरा अर्थात विजयादशमीच्या निमित्ताने शहरातील बाजारपेठ झेंडूच्या फुलांच्या खरेदीसाठी फुलून गेल्या आहेत.

दसरा सणाच्या निमित्ताने शहरात चैतन्यमय वातावरण झाले असून, या दिवशी झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व असल्याने कालपासूनच शहरातील मोसम पूलचौक, सटाणा नाका, रावळगाव नाका आदी ठिकाणी झेंडूच्या खरेदी विक्रीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. यंदा पावसाने दमदार हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणात बाजारात झेंडूची फुले विक्रीसाठी दाखल झाली आहेत. मात्र या दिवशी ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने किमतीत देखील वाढ झाली आहे. ४० ते ५० रुपये शेकडा दराने बाजारात फुलांची विक्री होत आहे.

झेंडूच्या फुलांसोबतच आपट्याची पाने अर्थात सोने खरेदीसाठी देखील नागरिकांनी बाजारात गर्दी केली आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील आपट्याच्या झाडांची पाने तसेच फांद्या विक्रीस बाजारात आणल्या आहेत. शहर परिसरात आपट्याची पाने दुर्मिळ असल्याने नागरिकांकडून त्याची खरेदी केली जाते आहे.

दुचाकी, चारचाकी खरेदीसाठी गर्दी

दसरा निमित्ताने खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी शहरातील दुचाकी चारचाकी वाहनांच्या शो रूम तसेच गृहोपयोगी वस्तू व सोने बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. दसरा असल्याने खरेदीसाठी बाजारात अनेक ऑफर्सदेखील देण्यात आल्या आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खास स्टॉल लावण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकरोड दहशतीखाली

0
0

दगडफेक अन् जाळपोळीच्या घटनांमुळे धास्तावले रहिवासी

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

तळेगाव (अंजनेरी) येथील एका चिमुरडीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर जिल्हाभरात निर्माण झालेल्या तणावाचा गैरफायदा उठवत रविवारी रात्री व सोमवारी दुपारी समाजकंटकांनी जेलरोड भागात दगडफेक, गाड्यांची तोडफोड करण्याबरोबरच टायर्स पेटवून दहशत निर्माण केली. या दगडफेकीत पोलिसही लक्ष्य झाले. सोमवारी दुपारी परिस्थिती हाताबाहेर जाताच पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनीच रस्त्यावर उतरून दंगेखोरांची धरपकड केली. यावेळी पोलिसांनी जेलरोड परिसर पिंजून काढत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. यावेळी पोलिसांच्या लाठ्याही चालल्या. सुमारे १० संशयितांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळाले. या घटनेत नाशिकरोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख हेही जखमी झाले. कलम १४४ खाली यावेळी जेलरोडला जमावबंदी लागू करण्यात आली होती. गेल्या ४० वर्षांनंतर प्रथमच अघोषित संचारबंदी जेलरोडला बघायला मिळाली.

तळेगाव (अंजनेरी) येथील घटनेमुळे शनिवारपासून जिल्हाभरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. त्याचा परिणाम रविवारी नाशिकरोड परिसरातही दिसून आला. या तणावपूर्ण वातावरणात काही समाजकंटकांनी सोमवारी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी सकाळी आठ वाजेदरम्यान दसक येथून ५०-६० जणांचा जमाव हातात झेंडे घेऊन जोरदार घोषणाबाजी, शिवीगाळ करीत छत्रपती चौकापर्यंत चालून आला होता. यावेळी पोलिसांनी या जमावाची समजूत घातली. त्यानंतर दुपारी पुन्हा परिस्थिती बिघडली.

समाजकंटकांचा धुडगूस

जेलरोडवरील छत्रपती चौक, बोराडे मळा, राजराजेश्वरी चौक, वज्रेश्वरीनगर, भीमनगर, पाण्याची टाकी या भागात समाजकटकांच्या अक्षरशः झुंडीच्या झुंडी दुचाकीवरून फिरत होत्या. गाडीला निळे झेंडे असलेले तरुण जोरदार घोषणाबाजीबरोबरच रस्त्यावरील लोकांना शिवीगाळ करताना दिसले. वाहनांवर दगडफेक केली. वज्रेश्वरी नगरात दुपारी २.४५ वाजता सुमारे शंभर ते दीडशे जणांचा जमाव रस्त्यावर उतरला. या जमावाने एक दुचाकी (क्र.एम.एच.१५ इ.क्यू.०५८८) रस्त्यावर ओढून आणत या गाडीचा दगड टाकून अक्षरशः चुराडा केला. या प्रकारामुळे या भागात प्रचंड दहशत निर्माण झाल्याने सर्व व्यावसायिकांनी दुकाने बंद करून घेतली.

कारवाईला दिरंगाई

रविवारी रात्री भीमनगर येथे शेकडोंचा जमाव जमला होता. यावेळीही तुफान दगडफेक झाली होती. याचवेळी छत्रपती चौकातही मोठा जमाव जमला होता. यावेळी पोलिसांनी धडक कारवाई करून सामाजिक तेढ निर्माण करणारे व अफवा पसरविणाऱ्यांना ताब्यात घेतले असते, तर सोमवारचा तणाव निर्माण झाला नसता.

सणांवर सावट

दसरा आणि आनंदाला तोटा असे म्हटले जाते. मात्र, यंदाच्या दसऱ्यावर दहशतीचे सावट कायम असून, अनेक सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मंगळवारी संचलन, तसेच बौद्ध धम्मप्रवर्तन दिनानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत या उत्साहावर दहशतीचे सावट असून, शहरातील आर्थिक उलाढालीलाही यामुळे ब्रेक लागला आहे.


वाहनांची जाळपोळ व तोडफोड

जेलरोडला छत्रपती चौक, भीमनगर, इंगळेनगर, वज्रेश्वरी चौक व चेहेडी येथे वाहनांवर दगडफेक झाल्याने मोठे नुकसान झाले. शिवसेनेचे नाशिकरोड संपर्कप्रमुख शिवा ताकाटे यांची झायलो (एम. एच.१४ बी. एक्स. ३९४३) गाडी समाजकंटकांनी पेटवून दिली. शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख नितीन चिडे यांचीही सफारी ही चारचाकी गाडी फोडली. रविवारी रात्री १०.४५ वा चेहेडी येथे नाशिक-पुणे महामार्गावर पारगाव खंडाळा डेपोची बस समाजकंटकांनी अडवून चाकांची हवा सोडत बसही फोडली. नाशिकरोड पोलिस येथे वेळीच पोहोचल्याने ही बस जाळपोळीपासून वाचली.

बसस्थानकात शुकशुकाट

नाशिकरोड बसस्थानकावर सोमवारी एकही बस आली नाही. बाहेरगावाहून येणाऱ्या बसेसही शहरात आल्या नाही. रात्री ११ वाजता चेहेडी गावाजवळ एका बसवर दगडफेकीची घटना घडल्याने त्यानंतर सिन्नरकडून नाशिककडे पुणे-सटाणा ही सटाणा डेपोची बसही पोलिस बंदोबस्तात चेहेडी येथून नाशिकरोड बसस्थानकात रात्री आणण्यात आल्याची माहिती नाशिकरोड बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक यू. आर. घुगे व एस. इ. सोनवणे यांनी दिली. शहरातील परिस्थिती चिघळल्याने ही बस सोमवारी दिवसभर नाशिकरोड बसस्थानकातच उभी होती. शहर व ग्रामीण या दोन्हीही बससेवा बंद राहिल्याने सोमवारी दिवसभर नाशिकरोड बसस्थानकात शुकशुकाट दिसून आला.


पोलिस आयुक्तही रस्त्यावर

जेलरोडला परिस्थिती हातबाहेर गेल्याने दुपारी तीन वाजता स्वतः पोलिस आयुक्तच रस्त्यावर उतरले. त्यांनी छत्रपती चौक ते वज्रेश्वरीनगर, बोराडे मळ्यापर्यंत स्ट्रीट पोलिसिंग करून परिस्थितीची माहिती घेतली. त्यांच्यासोबत शीघ्र कृती दलाचीही एक तुकडी होती. यानंतर मात्र पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू केली. यावेळी पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहाय्यक पोलिस आयुक्त विजयकुमार चव्हाण, अतुल झेंडे, नाशिकरोडचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख, आडगावचे संजय सानप, उपनगरचे अशोक भगत, गुन्हे शाखा युनिट तीनचे नारायण न्याहाळदे, हनुमंत गाडे आदी पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सुमारे २५० ते ३०० पोलिस कर्मचाऱ्यांनी जेलरोडच्या छत्रपती चौकाच्या आजूबाजूच्या नगरांचा परिसर अक्षरशः पिंजून काढला. पोलिसांची कुमक वाढताच वाहनांची तोडफोड करणारे समाजकंटक पसार झाले.


तरुण जखमी

माल धक्का रस्त्याने गायकवाड मळ्याकडे जात असताना हितेंद्र अनिल गायकवाड (२७) याला व त्याच्या कुटुंबियांना जमावाकडून मारहाण करण्यात आली. जमावाने हितेंद्र याला त्याच्या चारचाकी गाडीवर चिकटवलेले स्टीकर काढण्यास सांगितले. त्याने नकार दिल्यानंतर त्याच्या डोक्यात लोखंडी सळई मारण्यात आली. गाडीत असलेल्या त्याच्या आईलाही मारहाण झाली. हितेंद्रला सुरुवातील बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तो गंभीर जखमी असल्याने त्याला सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले.

स्टीकर्स, लोगो पाहून वाहने लक्ष्य

विशिष्ट समाजाची ओळख म्हणून वापरत असलेल्या स्टीकर्स अथवा लोगो पाहून दोन्ही बाजूंच्या आंदोलनकर्त्यांकडून वाहनांना लक्ष्य केले जात आहे. याबाबत पोलिस आयुक्त डॉ. सिंघल यांनी सांगितले, की वाहनावर कोणत्याही स्वरूपाचे स्टीकर्स अथवा लोगो लावणे हेच बेकायदा आहे. आता आमचे लक्ष्य कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याचे असून, त्यानंतर अशा वाहनचालकांवर कारवाई करण्यात येईल, असे सिंघल यांनी स्पष्ट केले.

लॉजची तपासणी

वाहनांची तोडफोड व दगडफेक करून दहशत निर्माण करणारे छत्रपती चौकालगतच्या कुबेर लॉजमध्ये लपून बसल्याचा संशय आल्याने पोलिसांनी या लॉजची तपासणी केली. परंतु, येथे संशयास्पद काही आढळून आले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तणावाच्या भीतीपोटी कॅम्पस पडले ओस

0
0

तळेगाव येथील घटनेचे पडसाद; विद्यापीठ परीक्षा सुरळीत

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

शहरात निर्माण झालेल्या तणावजन्य परिस्थितीचे पडसाद कॉलेज कॅम्पसमध्येही पडले. या तणावाच्या भीतीपोटी शहरातील सर्वच कॉलेजेसचे कॅम्पस ओस पडले होते. कॉलेजच्या स्टाफने नाममात्र हजेरी लावली असली, तरीही या कॅम्पसला सोमवारी अघोषित सुटीच जाहीर झाली होती.

त्र्यंबकेश्वरमधील तळेगाव येथील घटनेचे पडसाद रविवारी शहरात उमटले होते. शहराबाहेर झालेल्या वाहनांची तोडफोड व जाळपोळीचे लोण रात्रीच्या सुमारात शहरातही पसरले होते. यामुळे संभाव्य परिस्थितीचा अंदाज बांधत शहरात इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी सोमवारसाठी सुटी घोषित केली होती. मात्र कॉलेजांतून अशी कोणतीही सुटी जाहीर करण्यात आली नव्हती. तरीही सोमवारी विद्यार्थी सिनीअर कॉलेजकडे फिरकले नाहीत. ज्यूनिअर कॉलेजेसना तर सोमवारी सकाळी सुटी जाहीर करण्यात आली. शहरातील काही कॉलेजेसमध्ये तुरळक विद्यार्थी आले असले तरीही सर्वच कॉलेजमधील लेक्चर्स बंदच ठेवण्यात आले होते.



कॉलेजबाहेरही बंदोबस्त

शहरातील कॉलेजमध्ये युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हजारोंच्या संख्येने विद्यार्थी एकत्रित होण्याचे ठिकाण शहरातील सध्याच्या स्थितीत प्रसंगी संवेदनशील होऊ शकते हे लक्षात घेऊन प्रमुख कॉलेजेसबाहेरही पोलिसांनी बंदोबस्त लावला होता. विविध कॉलेज कॅम्पसमध्ये राजकीय पक्ष प्रेरीत विद्यार्थी संघटना कार्यरत आहेत. पक्षांकडून या संघटनांचा उपयोग अशांतता माजविण्यासाठी होऊ नये , यासाठी विविध नेत्यांनाही पोलिसांच्या वतीने तंबी देण्यात आली. यामुळे कॅम्पसचे वातावरण सोमवारी सुनेसुनेच राहीले.


कॉलेजस्तरावरील परीक्षा रद्द

दरम्यान , शहरात काही सिनिअर वर्गातील अभ्यासक्रमांच्या विद्यापीठीय परीक्षा अगोदरपासून नियोजन होत्या. या परीक्षा सुरळीत पार पडल्या. यातही ज्या परीक्षा कॉलेज स्तरावरून नियंत्रित करता येणे शक्य होत्या त्या परीक्षा रद्द करून पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या संदर्भातील तारीख व वेळेचा तपशील विद्यार्थ्यांना कॉलेजकडून कळविण्यात येणार आहेत.

इंटरनेट बंद; विद्यार्थ्यांचा हिरमोड

मोबाईल डाटा इंटरनेट वापरणारे सर्वाधिक लाभार्थी कॉलेजियन्स आहेत. मोबाईल व इंटरनेट कंपन्यांचा हाच प्रमुख लक्ष्यगट आहेत. तर इंटरनेटच्या माध्यमातून अफवांना बळी पडून युवक अशांततेत भरकटले जाऊ नयेत, यासाठी मोबाईल इंटरनेट डाटा पोलिसांच्या सूचनांनुसार दोन दिवसांसाठी बंद केला. त्यामुळे व्हॉट्स अॅप किंवा इतर सोशल मीडियावर सेकंद सेकंदाला अपडेट बघण्याची सवयच जडलेल्या तरूणाईचा मात्र चांगलाच हिरमोड झाला. मात्र नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनच पोलिसांचे हे पाऊल स्वागतार्ह असल्याचेही मत अनेक कॉलेजियन्सने व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात दिवसभर मोर्चे, निदर्शने

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकेश्वर तालुक्यात तळेगाव (अंजनेरी) येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटनेचे पडसाद सोमवारीदेखील उमटले. संतप्त जमाव शांत झाला असला तरी आता ठिकठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटक रोष व्यक्त करीत आहेत. जिल्ह्यात विंचूर येथे सोमवारी कडकडीत बंद पाळण्यात आला, तर अनेक ठिकाणी रास्तो रोको करून निषेध नोंदविण्यात आला.

सोमवारी निफाड तालुक्यातील विंचूर पूर्णत: बंद ठेवण्यात आले. त्यामुळे दसऱ्याच्या पूर्वदिनी तेथील व्यवहार ठप्प झाले. लासलगाव, नांदगाव, कळवण, अभोणा, चांदोरी, येवला, मालेगाव तालुक्यातील टेहरे तसेच ढवळेश्वर येथेही स्थानिक रहिवाशांनी रास्ता रोको करून या घटनेचा निषेध केला.

सिन्नर तालुक्यातील गोंदे येथे या घटनेच्या पार्श्वभूमीवर दोन गट आमने सामने आल्याने सोमवारी सकाळी काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र सिन्नर तालुका प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केल्याने हा तणाव निवळला. इगतपूरी तालुक्यातील प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच पोलिस निरीक्षकांनी पाडळी देशमुख अन्य जवळपासच्या गावांमध्ये सकाळी शांतता समित्यांची बैठक घेतली. तसेच शांतता बाळगून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली.

सटाणा आगाराचे

पाच लाखांचे नुकसान

सटाणा : तळेगाव अंजनेरी येथील घटनेच्या निषेधार्थ आंदोलकांनी एसटी महामंडळाच्या बसेस फोडल्याने खबरदारीचा उपाय सटाणा बस आगाराने संपूर्ण आगार बंद ठेवून ३५४ बस फेऱ्या रद्द केल्या. यामुळे प्रवाशांचे हाल झाले. तसेच सटाणा आगाराचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आगाराचे व्यवस्थापक कैलास पाटील यांनी दिली.

नाशिक शहर आणि परिसरात रविवारी मोठा उद्रेक झाला. आंदोलकांनी एसटी महामंडळाच्या बसेस लक्ष करून जाळपोळ, दगडपेक केली. परिणामी महामंडळाच्या नाशिक आगारातून थेट जिल्हाभरात बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. रविवार सायंकाळपासूनच जिल्हाभरासह परराज्यात जाणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्या. यामुळे सोमवारी सकाळी शाळा, महाविद्यालये व शासकीय निमशासकीय कार्यालयात जाणाऱ्या येणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. यामुळे सटाणा आगारातील सुमारे ८० बसेससह कर्मचारी, वाहक, व चालक यांनी विश्रांती घेणे पसंद केले.

त्र्यंबकमध्ये शुकशुकाट

त्र्यंबकेश्वर : तळेगाव (अंजनेरी) येथील घटनेच्या उद्रेकाने विस्कळीत झालेले जनजीवन आता पूर्वपदावर येत असून, नाशिक-त्र्यंबक रस्ता शांत झाला होता. तथापि बस सेवा पूर्णत: ठप्प असल्याने सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता.

त्र्यंबकेश्वर बस स्थानकात दररोजच्या २५० बस ये-जा करतात. त्यामध्ये दररोज नाशिक-त्र्यंबक जादा बस सोडाव्या लागतात व त्यांच्याही ५० पेक्षा अधिक फेऱ्या होतात. नवरात्रोत्सव आणि सलग आलेल्या शासकीय सुट्यांमुळे गर्दीचा उच्चांक या आठवड्यात अपेक्ष‌ीत होता. मात्र वातावरणातील तणाव आणि बंद बससेवा यामुळे येथे शुकशुकाट जाणवत होता. रविवारी बससेवा थांबलेली आणि त्र्यंबक बंद यामुळे भाविकांचे प्रचंड हाल झाले. सायंकाळी बसस्थानक परिसरात अत्यंत आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. येथील हॉटेल ओम गुरूदेव संचालक संतोष नाईकवाडी, विजय नाईकवाडी, नगरसेवक ललीत लोहगावकर, आरोग्य निरीक्षक शाम गोसावी, अमोल दोंदे आदींनी भुकेल्या प्रवाशांना खिचडी तयार करून दिली. पिण्याचे पाणी उपलबब्ध करून दिले. त्याच बरोबर रात्री मुक्कामासाठी येथील अमृतकुंभ निवासस्थानात निवाऱ्याची सुविधा दिली.

प्रवाशांची लूट

बससेवा बंद असल्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनी पर्वणी साधली. नाशिक-त्र्यंबक दरम्यानच्या २८ किमी प्रवासासाठी प्रती व्यक्ती १०० ते २०० रुपये दर आकारत कमाई केली. दरम्यान सोमवारी बस बंद होत्या. तसेच बाहेरगावाहून येणारे आणि जाणारे प्रवासीदेखील कमी होते. एरवी मंदिरात नेहमी दर्शनासाठी चार पाच तास रांगेत उभे राहावे लागते. मात्र सोमवारी शुकशुकाट दिसत होता.

दसऱ्यावर सावट

तळेगाव (अंजनेरी) घटनेने बाजारपेठेतील उलाढाल थंडावली आहे. याचा थेट परिणाम बँकींग क्षेत्रावर झाला आहे. दसरा सण असूनही पाहीजे तसा उत्साह जाणवत नाही. शहर आणि परिसरात देवीमंदारांमध्ये नवरात्रोत्सव संपन्न होत आहे. मात्र या घटनेनंतर दांड‌िया तर थांबलाच. त्याचबरोबर येथे होत असलेल्या महाप्रसादाच्या जेवणावळीदेखिल झाल्या नाहीत. नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी पावसाचा भडीमार तर अंत‌िम चरणात दंगलसदृष्य वातावरण यामुळे हा उत्सव आनंदाला पारका झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

कळवणला रास्ता रोको

कळवण : कळवण येथे मराठा समाजाच्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी व समस्त मराठा समाज बांधवामार्फत तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कळवण बसस्थानकासमोर झालेल्या रास्ता रोको आंदोलनात तळेगाव घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. घटनेतील नराधमास तत्काळ फाशी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. राष्ट्रवादीचे हिरामण पगार, मनसेचे शशिकांत पाटील, राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष प्रवीण रौंदळ, शिवसेनेचे नेते कारभारी आहेर, माकप सरचिटणीस हेमंत पाटील, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, दीपक हिरे, रामा पाटील, प्रदीप पगार, प्रकाश आहेर यांनी निषेध केला. पीड‌ित मुलीला १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली. या आंदोलनाप्रसंगी आंदोलकांच्या वतीने सायली पगार, ऋतुजा निकम या दोन अल्पवयीन मुलींच्या हस्ते कळवणचे तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन देण्यात आले.

अनर्थ टळला

कोपर्डी व आता तळेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ लोकशाही मार्गाने कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण न होऊ देत कळवणकरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. रास्ता रोको आंदोलनाची सांगता शांततेत पार पडल्यानंतर सटाणा आगाराच्या एका एस. टी. चालकाने जमावाला चिथावणीखोर वक्तव्य केल्याने तरुणांनी कळवण आगाराकडे मोर्चा वळवत त्या चालकाची कानउघाडणी केली. बाका प्रसंग उद्भवण्याच्या आत तहसीलदार कैलास चावडे, पोल‌िस उपनिरीक्षक विनोद जाधोर यांनी मध्यस्थी केली. त्या चालकाने उपस्थितांची माफी मागितल्याने पुढील अनर्थ टळला.

दिंडोरीत मूक मोर्चा

दिंडोरी : शहरातून मूकमोर्चा काढण्यात आला. नाशिक-कळवण रस्त्यावर रास्ता रोको करत आरोपीला कठोर शासन करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. दिंडोरी शहरात बंद पाळण्यात आला. दिंडोरी येथील पालखेड चौफुली येथून मूकमोर्चा काढण्यात आला. मोर्चात नगराद्यक्ष भाऊसाहेब बोरस्ते, उपनगरद्यक्ष सचिन देशमुख, नगरसेवक कैलास मवाळ, माधव साळुखे, दिलीप जाधव, सूर्यकांत राजे, बाजार समिति उपसभापती अनिल देशमुख उपस्थित होते.

येवल्यात आंदोलन स्थगित

येवलाः शहरात सोमवारी सकाळी रास्ता रोकोचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, जिल्ह्यातील स्फोटक परिस्थिती लक्षात घेत रास्ता रोको आंदोलन स्थगित करून तहसीलदार व पोल‌िस निरीक्षकांना केवळ निषेधाचे निवेदन देण्यात आले. येथील मराठा समाजाने सोमवारी आयोजित केलेला रास्ता रोको अचानक स्थगित केला. मात्र, या रास्ता रोको आंदोलनासाठी नियोजित स्थळी विंचूर चौफुलीवर हजारो कार्यकर्ते उपस्थित झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलक सैराट!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तळेगाव (अंजेनरी) येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेला आता जातीय रंग प्राप्त झाला असून, नाशिकरोड परिसरात सोमवारी दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत जमावावर नियंत्रण मिळवले. शहराच्या सीमेवर सुरू असलेली धुसफूस शहरात सुरू झाल्याने पोलिसांनी सकाळपासून मोबाइल, इंटरनेट सेवा खंडित केली. शहरात कलम १४४ अन्वये जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी पीडित मुलीची, तसेच तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली. शनिवारी रात्री झालेल्या या प्रकरणाचे पडसाद रविवारपासून उमटत आहेत. या घटनेचा निषेध करणाऱ्या आंदोलनकर्त्यांनी मुंबई-आग्रा महामार्गावर अनेक वाहनांची तोडफोड करीत एसटी बसेस, तसेच पोलिसांच्या वाहनांना आग लावली. रविवारी सायंकाळी हे आंदोलन काही प्रमाणात थंड झाले होते. मात्र, रात्रीनंतर शहरात पुन्हा त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. दलित विरुद्ध मराठा असा थेट संघर्ष दिसून येत असून, पोलिस त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. नाशिकरोड भागात दुपारपासून ठीकठिकाणी आंदोलनकर्त्यांनी वाहनांची तोडफोड केली. विहितगाव येथेही पोलिसांनी बळाचा वापर करीत परिस्थिती नियंत्रणात आणली. दिवसभरात येथे दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

दरम्यान, सायंकाळच्या सुमारास पाथर्डी गाव परिसरातही तणावाचे वातावरण होते. येथे जमावाने दोन दुचाकी जाळल्याची माहिती समजते. रविवारी दुपारपासून बंद झालेली एसटी बससेवा मंगळवारी सुरू होण्याची शक्यता आहे. त्र्यंबकेश्वर तालुका, तसेच मुंबई- आग्रा हायवेवर हिंसक आंदोलन करून प्रवाशांना लुटणाऱ्या सात ते आठ जणांना पोलिसांनी पाडळी येथून ताब्यात घेतल्याचे समजते. रविवारी झालेल्या आंदोलनाविरोधात ग्रामीण पोलिसांनी दोनशेपेक्षा अधिक आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

स्टीकर्स, लोगो पाहून वाहने लक्ष्य

विशिष्ट समाजाची ओळख म्हणून वापरत असलेल्या स्टीकर्स अथवा लोगो पाहून दोन्ही बाजूंच्या आंदोलनकर्त्यांकडून वाहनांना लक्ष्य केले जात आहे. याबाबत पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी सांगितले, की वाहनावर कोणत्याही स्वरूपाचे स्टीकर्स अथवा लोगो लावणे हेच बेकायदा आहे. आता आमचे लक्ष्य कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याचे असून, त्यानंतर अशा वाहनचालकांवर कारवाई करण्यात येईल, असे सिंघल यांनी स्पष्ट केले.

दसरा सणावर दहशतीचे सावट

दसरा आणि आनंदाला तोटा असे म्हटले जाते. मात्र, यंदाच्या दसऱ्यावर दहशतीचे सावट कायम असून, अनेक सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मंगळवारी संचलन, तसेच बौद्ध धम्मप्रवर्तन दिनानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत या उत्साहावर दहशतीचे सावट असून, शहरातील आर्थिक उलाढालीलाही यामुळे ब्रेक लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन शाळकरी मुलांचा तलावात बुडून मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ग्रामीण पोलिस मुख्यालयामागील पाझर तलावात पोहोण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी उघडकीस आली. अवघ्या १५ वर्षांच्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली असून, हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

समाधान ज्ञानेश्वर कांबळे (वय १५) आणि करण मुराजी बोरगे (वय १५) अशी मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत. धात्रक फाटा येथील जसलोक स्वीटच्या मागे राहणारा कांबळे आणि धात्रक फाटा येथील बंगला क्रमांक ३० शेजारी शेडमध्ये राहणारा बोरगे हे दोघे शाळकरी मित्र सोमवारी पाझर तलावावर पोहोण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत संजय साबळे हा दहा वर्षांचा मुलगादेखील होता. पाझर तलावात पाणी खोल असून, त्याचा अंदाज न आल्याने या दोघा मित्रांचा बुडून मृत्यू झाला असावा. तिसरा मुलगा मात्र घरी परतला होता. सोमवारी रात्री उशिरापर्यंत हे दोघे घरी न आल्याने त्यांच्या पालकांनी शोधाशोध केली. मात्र, मुले मिळाली नाहीत. त्यामुळे मुलांच्या पालकांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. दरम्यान, या दोघांसोबत दीपक साबळे या मुलाने ते दोघे पोहोण्यास गेले असल्याची माहिती मंगळवारी सकाळी दिल्याने सदर बाब समोर आली. त्यानुसार त्यांचे पालक व पोलिस शोध घेण्यासाठी पाझर तलावाजवळ गेले. मुलांचे कपडे व चपला काठावर मिळाल्याने पोलिसांना संशय आला. त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती अग्निशमन दलास दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत पाण्यात मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. अवघ्या काही वेळातच दोघांचे मृतदेह हाती लागले. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुदैवाने जीवितहानी टळली!

0
0

परंपरा जोपासताना गोळीबारात गडावर दहा जण जखमी

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सप्तशृंग गडावर दसऱ्याच्या दिवशी बोकडबळीच्या विधीनंतर देवस्थानचा सुरक्षारक्षक हवेत गोळीबार करीत सलामी देण्याची परंपरा आहे. ही परंपरा राबवत असताना उपस्थितांचा धक्का लागल्याने गोळी जमिनीवर झाडली गेली. यामुळे गोळीतील छर्रे उडाल्याने सप्तशृंग देवस्थानच्या आठ कर्मचाऱ्यांसह दोन ग्रामस्थ असे दहा जण जखमी झाले. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी न झाल्याने यात्रा सुरळीत सुरू आहे.

सप्तशृंग गडावर दसऱ्याच्या निमित्ताने भगवतीला बोकडबळी देण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. देवस्थानचा सुरक्षा कर्मचारी सालाबादाप्रमाणे बोकडबळीच्या पार्श्वभूमीवर हवेत गोळीबार करून सलामी देत असतो. बंदूक लोड केलेली असताना हवेत गोळीबार करण्यास सज्ज असलेल्या कर्मचारीचा हात ट्रिगरवर असताना जवळ असलेल्या गर्दीचा धक्का लागल्याने हा गोळीबार हवेत न होता जमिनीवर झाला. जमिनीवरील फरशीमुळे बंदुकीतून निघालेल्या गोळीचे छर्रे उडूनजवळ उपस्थित आठ सुरक्षा कर्मचाऱ्यांना व दोन ग्रामस्थांना लागल्याने जखमी झाले.

जखमी सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये रामचंद्र रामू पवार यांना तीन ठिकाणी, दिगंबर गोधडे व शरद शिसोदे यांना दोन ठिकाणी पायाला दुखापत झाली. गणेश देशमुख, संतोष पवार, पद्माकर देशमुख यांना पायाला दुखापत झाल्याने कळ्वणच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तसेच, युवराज पाने व महेंद्र देशमुख यांच्यावर किरकोळ जखमेमुळे उपचार करून घरी पाठविण्यात आले. जखमींपैकी सागर दुबे व मधुकर गवळी या ग्रामस्थांवर वणी येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

शनिवार, रविवारची सुट्टी तसेच, विजयादशमीमुळे भाविकांची सप्तशृंग गडावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. मात्र शनिवारपासून देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी हजेरी लावल्याने लाखो भाविक भगवती चरणी नतमस्तक झाले. नवरात्रोत्सवामुळे अनेक जण मंदिरात घटी बसले होते. सप्तशृंग गडावर कोजागिरी पौर्णिमेपर्यंत भाविकांची गर्दी सुरूच राहील, असे सप्तशृंग देवस्थानचे विश्वस्त तहसीलदार कैलास चावडे यांनी सांगितले.

सप्तशृंग देवस्थानच्या स्थापनेपासून निर्माण झालेली परंपरा आतापर्यंत सुरू आहे. बोकडबळी दिला गेल्यानंतर हवेत गोळीबार करून नवरात्रोत्सव समाप्तीची सूचना या माध्यमातून दिली जाते. गर्दीच्या सान्निध्यात धक्का लागल्याने हा प्रकार अपघाताने झाला. मात्र त्यामुळे यात्रेवर कुठलाही परिणाम झालेला नसून, अफवांवर विश्वास ठेवू नये.

- सुदर्शन दहातोंडे, व्यवस्थापक, सप्तशृंग देवस्थान ट्रस्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजियन्सनाही आता मिळणार ‘वाचन प्रेरणा’

0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

व्हर्च्युअल मीडियाच्या आहारी जाणाऱ्या तरुणवर्गाला वाचन आणि चिंतनाच्या प्रवाहात आणण्यासाठी उच्चशिक्षण विभागाने सकारात्मक पाऊल उचलले आहे. देशाचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवशी केवळ शाळांतच साजरा होणारा ‘वाचन प्रेरणादिन’ आता कॉलेज स्तरावरही साजरा करण्याचे आदेश उच्चशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. धनराज माने यांनी दिले आहेत.

यासंदर्भात संचालनालयाने सर्व विद्यापीठ आणि शिक्षण सहसंचालकांना पत्र पाठविले आहे. १५ ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणादिन म्हणून साजरा केला जातो. उच्च शिक्षण विभागाच्या या आदेशांमुळे कॉलेजेसमध्ये येत्या शनिवारी (दि. १५) विविध विषयांवर चर्चासत्रे, परिसंवाद आणि कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत.

या उपक्रमांतर्गत ‘वाचन प्रेरणा’ या विषयावर तज्ज्ञांचे व्याख्यान, चर्चासत्र, निबंध, काव्यवाचन, अभिवाचन स्पर्धा, परिसंवाद आणि कार्यशाळा घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या दिवशी कॉलेजांमध्ये लेखकांशी त्याच्या लेखनाविषयी किंवा त्याच्या कलाकृतीविषयी चर्चा अथवा त्यांची प्रकट मुलाखत घेता येणार आहे. वृत्तपत्रांतील अग्रलेख व प्रमुख लेखांचे वाचन आणि ई-बुक्सचे सामूहिक वाचन असे कार्यक्रम आयोजित करण्याचेही स्वातंत्र्य देण्यात आले आहे.

कार्यक्रम पार पडल्यानंतर त्याची माहिती उच्च शिक्षण संचालनालयाला admin@jdhepune.info या ई-मेलवर, तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना vinodtawademinister@gmail.com ई-मेलवर पाठविण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.


चित्र बदलण्याचा प्रयत्न

वरिष्ठ वर्गांमध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थीवर्ग अभ्यासक्रमाव्यतिरिक्तच्या पुस्तक वाचनात रस घेत नसल्याचे काही संस्थांच्या पाहणीचे निष्कर्ष आहेत. परिणामी, ज्ञानसंपन्न समाजाच्या शिक्षणाच्या उद्दिष्टाला बाधा पोहोचते. याशिवाय वाचनाअभावी समाजाची बौद्धिक वाढही सर्वांगीण होत नाही. याबरोबरच तरुणाईच्या हाती इंटरनेट आल्याने मोठ्या प्रमाणावर तरुणाई पुस्तक वाचनापासून दुरावून सामाजिक नुकसान होते आहे. हे चित्र बदलण्यासाठी ‘वाचन प्रेरणादिन’ यासारख्या उपक्रमाचे आयोजन केले जात असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अपवाद वगळता जिल्ह्यात शांतता

0
0

अपवाद वगळता जिल्ह्यात शांतता

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर तालुक्यात मंगळवारी शांतता प्रस्थापित झाली. सायंकाळी उशिरा वेगवेगळ्या अफवांचे पेव फुटल्याने सर्वसामान्यांची धावपळ उडाली होती. विशेषतः तळेगाव (अंजनेरी), पैगलवाडी, तसेच त्र्यंबकेश्वरमध्ये काही ठिकाणी हाणामारी झाल्याची माहिती समजते. मात्र, त्याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. संध्याकाळी नाशिककडून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी वाहतूक मात्र ठप्प करण्यात आली, तर सातपूरमध्ये तणापूर्ण शांतता होती. सिव्हिल हॉस्पिटल, तसेच फुलेनगरमध्ये पोलिस प्रशासनाने बंदोबस्तही वाढवला होता.

तळेगाव (अंजनेरी) येथे एका पाच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यापासून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आज, विजयदशमी (दसरा) असल्याने पोलिसांनी अतिरिक्त कुमक तैनात करून समाजकंटकांना रोखण्याची तयारी केली. संध्याकाळपर्यंत किरकोळ घटना वगळता शांतता होती. मात्र, यानंतर वेगवेगळ्या अफवा पुन्हा सुरू झाल्या. दोन समाजांतील तरुणांमध्ये तळेगाव, त्र्यंबकेश्वरमध्ये दगडफेक, तसेच हाणामारी झाल्याचे समजते. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.
दरम्यान, शहरात आज, शहरात काही ठिकाणी मोटारसायकल रॅली काढून घोषणाबाजी करण्यात आली. यातील उत्साही तरुणांनी रस्त्याने जाणाऱ्यांना शिवीगाळ, तसेच धक्काबुक्की केल्याच्या तक्रारी समोर आल्या. संध्याकाळी पाथर्डी फाटा येथील बुद्ध स्मारक येथे दोन वाहनांची तोडफोड करण्यात आली. मात्र, हा वाद तेथेच मिटला.

लेखानगरला तणाव निवाळला

समाजकंटकांनी राणेनगर येथे एक चारचाकी फोडली. यानंतर लेखानगर येथे संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास नगरसेवक शिवाजी चुंबळे यांच्या घरासमोर पार्क केलेली चारचाकी फोडून समाजकंटकांनी काही ट्रकचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती समजताच चुंबळे समर्थकांनी लेखानगर येथे गर्दी केली. पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन गोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवाजी चुंबळे यांनीही कार्यकर्त्यांना शांततचे आव्हान करीत पोलिसांना सहकार्य करण्याची हमी दिली. यानंतर येथील तणाव निवळला. घटनेची माहिती समजताच आमदार जयंत जाधव, शैलेश कुटे, दिनकर पाटील यांनी चुंबळे यांच्या निवासस्थानी धाव घेतली. शहर पोलिस सर्व घडामोंडीकडे लक्ष ठेवून आहेत.

मोबाइल डाटा सुरू होण्याची शक्यता कमी

व्हॉटसअॅपद्वारे पसरणाऱ्या अफवा रोखण्यासाठी पोलिसांनी शहरासह जिल्ह्यातील मोबाइल इंटरनेट सेवा सोमवारपासून बंद केली आहे. आज, दसऱ्याच्या दिवशीही मोबाइलधारकांना इंटरनेट सेवेपासून वंचित राहावे लागले. इंटरनेट सेवा सुरळीत करण्यासाठी परिस्थितीचा विचार केला जाईल. मंगळवारी रात्रीपर्यंत अफवांचे पीक कमी झाल्याची खात्री पटल्यास बुधवारपासून इंटरनेट सेवा सुरू केली जाईल; अन्यथा त्यात वाढ केली जाईल, असे पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूर्णत्वापूर्वीच गोदापार्कची दैना

0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

महापालिकेने गोदावरी नदीच्या किनारी मोठ्या धूमधडक्यात उभारलेल्या बहुचर्चित गोदापार्कची अक्षरशः दैना झाली आहे. त्यामुळे रोजच पहाटे व सायंकाळी गोदापार्कवर जॉगिंग करण्यासाठी येणाऱ्या नाशिककरांनी त्याकडे पाठच फिरविली आहे. गोदापार्कच्या या दुरवस्थेकडे महापालिका लक्ष घालणार का, असा सवाल नाशिककर उपस्थित करीत आहेत. महापालिकेने किमान गोदापार्कची दुरुस्ती तरी करावी, अशी मागणी नाशिककरांनी केली आहे.

माजी महापौर दशरथ पाटील यांच्या कार्यकाळात त्यावेळी शिवसेनेत असलेले मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी गोदापार्कची संकल्पना आणली होती. माजी महापौर पाटील यांनी गोदापार्कला विरोधदेखील केला होता. परंतु, बाळासाहेबांच्या आग्रहाने शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या उपस्थितीत गोदापार्कचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला होता. त्यानंतर गोदापार्कची उभारणीदेखील करण्यात आली. परंतु गोदावरीला आलेल्या पुरामुळे गोदापार्कच्या संरक्षक जाळ्याच वाहून गेल्याने गोदापार्कचे मोठे नुकसान झाले होते. दरम्यान, गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत नाशिककरांनी मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या हाकेला साथ देत महापालिकेत सत्ता दिली. राज ठाकरे यांनी महापालिकेची सत्ता घेतल्यानंतर पुन्हा गोदापार्क बनविणारच असा संकल्प केला. खासगी कंपनीमार्फत पुन्हा नव्या ठिकाणी गोदापार्कचे उद्घाटन करण्यात आले. परंतु, गेल्या ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरामुळे व जोरदार पावसाने नव्याने तयार करण्यात आलेला गोदापार्कदेखील वाहून गेला. चोपडा लॉन्सच्या बाजूला उभारलेल्या गोदापार्कवरही झाडाझुडपांचे साम्राज्य वाढले आहे. गोदावरीला आलेल्या महापुराने गोदापार्कची तटबंदी ढासळली आहे. सद्यःस्थितित गोदापार्क हा टवाळखोर व गुन्हेगारांचा अड्डाच बनलेला पाहायला मिळत आहे. लाखो रुपये खर्च करून महापालिकेने उभारलेल्या गोदापार्ककडे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी लक्ष घालावे, अशी मागणी नाशिककरांनी केली आहे.

ड्रेनेजचे ढापेच झाले गायब

महापालिकेने गोदावरी नदीलगत उभारलेल्या ड्रेनेजचे ढापेच गायब झाले आहेत. विशेष म्हणजे महापालिकेने लावलेल्या ‘ड्रेनेजचे ढापे चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल’ या आशयाच्या फलकाच्या बाजूलाच असलेल्या ड्रेनेजचे ढापे चोरट्यांनी लंपास केले आहेत. त्यामुळे महापालिकेची यंत्रणा करते काय, असा सवालदेखील उपस्थित होत आहे.

---

गोदातीरी महापालिकेने चोपडा लॉन्सच्या बाजूला अत्यंत सुंदर असा गोदापार्क उभारला होता. परंतु गोदावरी नदीला आलेल्या अनेक पुरांमुळे गोदापार्कच नाहीसा झाला आहे. उरलेल्या गोदापार्कला रानटी झाडा-झुडपांनी वेढा घातला आहे. याकडे महापालिकेने लक्ष देण्याची गरज आहे.

-उत्तम शिंदे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रमिकनगर बनले निराधार वृद्धेची ‘माय’

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी...’ हे त्रिकालबाधित सत्य सर्वश्रुत असतानाही ८० वर्षांच्या वृद्धेला आपुलकीच्या नात्यांपासून कालगतीमुळे विलग व्हावे लागले. दुर्दैव म्हणजे या वृद्धेस तिच्या स्वत:च्या माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी श्रमिकनगरमधील नागरिक मदत करायला तयार असूनही विस्मरणामुळे तिला स्वत:चे घर अन् माणसांची माहितीच आठवत नाहीये. परिणामी, या कालगतीशी झुंजत दिवस कंठणाऱ्या या निराधार वृद्धेची मायच श्रमिकनगर बनले आहे. येथील रहिवाशांनी या वृद्धेस तात्पुरता निवाराही मिळवून दिला आहे.

श्रमिकनगर परिसरात महादेव मंदिरात वर्षभरापासून सीताबाई रामचंद्र बिडवे (वय ८०) ही वृद्धा राहते. येथील रहिवासी रंजनकुमार व इतर नागरिकांनी सीताबाई यांच्यासाठी महादेव मंदिर परिसरात निवाऱ्यासाठी झोपडी तयार केली आहे, तर परिसरातील महिला व राधा सिंग या रोजच सीताबाई यांची मायेने काळजी घेत असतात. नातेवाईकांची माहिती नसलेल्या सीताबाईंची कुणाला माहिती असेल, तर त्यांनी श्रमिकनगर येथील महादेव मंदिर परिसरात भेट द्यावी, असे आवाहन श्रमिकनगरवासीयांनी केले आहे.

सुमारे वर्षभरापूर्वी सीताबाई यांना कुणीतरी या मंदिराच्या आवारात रिक्षातून सोडून गेल्याचे परिसरातील रहिवासी सांगतात. स्वत:च्या घराविषयी त्रोटक माहिती आठविताना त्यांचा निर्देश आडगावच्या विडी कामगारनगरकडे आहे. येथील लक्ष्मीनगर भागात घर असल्याचे त्या सांगतात. पण, त्यापलीकडे त्यांना स्मृती नाही, असे रंजन कुमार यांनी सांगितले. रंजन कुमार यांनी सीताबाई यांनी पंचवटी व आडगाव परिसरातही नेले होते. परंतु, त्यांना घर न आठवल्याने पुन्हा महादेव मंदिरात त्यांच्या वास्तव्याची सोय करण्यात आली. मंदिर परिसरात असलेल्या अंगणवाडीतील सेविकाही सीताबाईंना उदरनिर्वाहासाठी काही ना काही देतात. मंदिर परिसरातील अनेक महिला मायेने रोजच सीताबाईंची जेवणाची सोय करीत असतात. राधा सिंग या आईप्रमाणे सीताबाईंची रोज सेवा करतात.

___

मंदिराच्या आवारातील स्वच्छता करताना आजारी अवस्थेत सीताबाई नजरेस पडल्या होत्या. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्या ठणठणीत बऱ्या झाल्या आहेत. त्यांच्याबद्दल कुणाला माहिती असल्यास कृपया कळवावे.

-रंजनकुमार, रहिवासी, श्रमिकनगर

___

सीताबाईंना जेवणासाठी रोजच अनेक महिला मदत करीत असतात. मीदेखील जेवण्याची व पाण्याची सोय सीताबाईंना करून देते. कणखरपणे बोलणाऱ्या सीताबाईंना नातेवाईकांविषयी माहिती देता येत नाही. परंतु, आडगाव शिवारातील लक्ष्मीनगर भागात त्यांचे घर असल्याचे त्या सांगतात.

-राधासिंह, रहिवासी, श्रमिकनगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंद इंटरनेटमुळे वाढला खरा संवाद!

0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

तळेगाव (अंजनेरी) अत्याचार प्रकरणानंतर तणावग्रस्त नाशिकमध्ये अफवांचे पेव फुटल्यामुळे दक्षता म्हणून जिल्हा प्रशासनाकडून इंटरनेट बंद करण्यात आले. दोन दिवसांपासून शहरात सोशल मीडिया पूर्णतः बंद आहे. यामुळे सोशल मीडियाच्या जाचामधून मोकळीक मिळालेल्या अनेकांची रोजच्या भरमसाट मेसेजमधून सुटका झाली आणि थेट संवादाद्वारे त्यांनी दसऱ्याच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली.

कामाच्या व्यापात असतांना सोशल मीडियावर येत असणाऱ्या मेसेजपासून अनेकजण त्रासले होते. यंगस्टर्सच्या परीक्षा असल्याने त्यांना अशीही इंटरनेटपासून मुक्ती हवी होती. मात्र, नेट पॅक असल्याने थोड्यावेळाने ते नेट ऑन करून चॅटिंग करत असायचे. आता दोन दिवसांपासून सोशल मीडियाच्या व्यापातून सुटका झाल्याचे यंगस्टर्स व नाशिककर सांगतात. पूजा गवळे सांगते, की इंटरनेट बंद असल्याने घरात अभ्यासाला वेळ मिळाला आहे. नेट सुरू असल्यावर सोशल मीडियावर चॅटिंग करण्यात बराच वेळ खर्ची होतो. हे योग्य नसल्याचं समजत असलं तरीही नेटची सवय जाता जात नाही. प्रशासनाने नेट बंद असल्यामुळे रोजच्या सोशल मीडियातील मेसेजपासून सुटका मिळाली आहे. रविवारपासून तणावात असलेलं नाशिक या नेट बंदमुळे शांत झाले. सोशल मीडियाचा अपरिहार्य वापर केल्याने काय सहन करावं लागत हे यातून दिसून आले.’

तरुणाई आता सोशल मीडियावरील फेक मेसेजेसला वैतागल्याचे यावरून दिसून आले. कीर्ती महाजन सांगतात, की सोशल मीडिया बंद असल्याने घरातील एकत्र संवाद वाढला आहे. कायम मोबाइलमध्ये चॅटिंग करणारे मेम्बर्स आता खऱ्या आयुष्यातला संवाद साधत आहेत. सोशल मीडियाचा वापर हा सीमित पद्धतीनेच व्हावा हा धडा यातून आपण घ्यायला हवा. रोजच्या कामात डिस्टर्ब करणारी सोशल मीडिया नसल्याने टेन्शन हलकं झाल्याचं वाटतं आहे. प्रशासनाने या भूमिकेचं स्वागत आहे. नागरिकदेखील सोशल मीडियाच्या रोजच्या व्यापला कंटाळले होते. अनेकांना व्हॉट्सअॅप मेसेज वाचायलाही वेळ मिळत नसल्याने ते त्रस्त झाले. मात्र, आता शांत वाटत असल्याचेही मत त्यांना आवर्जून नोंदविले.

मेसेजद्वारे नव्हे थेट शुभेच्छांवर भर
सोशल मीडियावर कायमच सणांच्या शुभेच्छा दिल्या जातात. यामुळे फोन कॉल्सवर दिल्या जाणाऱ्या शुभेच्छा कमी होऊन संवाद कमी झाला होता. यंदा मात्र नेट बंद असल्याने शहरातील नागरिकांनी फोन करीत नातेवाईक व मित्रमंडळींना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच काही जणांनी थेट भेट देत मित्रमंडळींशी सुख-दु:खाच्या मनमोकळ्या गप्पा मारल्या. यातून कित्येक वर्षांपासून हरवलेला फोन कॉल्सवरील संवाद पुन्हा एकदा दिसून आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे क्रॉसिंगची प्रवृत्ती संपेना!

0
0



म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड स्थानकात रेल्वे रुळावरुन जाताना महिनाभरात तीन जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांनी प्रवाशांचे प्रबोधन करण्यावर भर दिला असून कायदेशीर कारवाईही सुरुच ठेवली आहे.

नाशिकरोड रेल्वेस्थानकातून दररोज शंभर गाड्या धावतात. दररोज 12 ते 14 हजार तिकीटे विकली जातात. सरासरी 20 हजार प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. त्यातून महिन्याला नऊ ते दहा कोटींचा महसूल मिळतो. प्रवाशांची गर्दी वाढतच असल्याने त्यांच्या जिवीताच्या रक्षणासाठी कुंभमेळ्यात फ्लॅटफार्म एक व चारला जोडणारा पादचारी पूल उभारण्यात आला आहे. याशिवाय दोन वेगळे पादचारी पूल आहेत. फ्लॅटफार्म एक, दोन व तीनवरुन पादचारी पूलावर जाण्याची सोय आहे. तरीही प्रवासी रुळ ओलांडण्याचा धोका पत्करतात. त्यांचा आळस त्यांच्या जीवावर बेततो.


नियमित प्रबोधन

प्रवाशांनी पादचारी पुलाचाच वापर करावा, रुळ ओलांडू नये म्हणून रेल्वे सुरक्षा दल नियमित प्रबोधन करते. त्यांचे जवान गस्त घालत असतात. प्रबोधनाचे बॅनर स्थानकात लावण्यात आले आहेत. घरी कोणी आपली वाट पहात आहे, आपला लाखमोलाचा जीव सांभाळा असे प्रबोधनपर फलक हिंदी आणि मराठीतून लावण्यात आले आहेत. मात्र, प्रवासी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करताना दिसतात.


आरपीएफची कारवाई

रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) रुळ ओलांडणा-या सरासरी तीनशे प्रवाशांवर दर महिन्याला कारवाई करते. त्याआधी समज दिली जाते. तरीही प्रवासी एकत नसतील तर रेल्वे कायद्याच्या कलम 147 कलमाखाली कारवाई केली जाते. रुळ ओलांडणा-यांना अटक करुन मनमाड कोर्टापुढे उभे करतात. कोर्ट अशा प्रवाशांना दोनशे ते पाचशे रुपयांपर्यंत दंड ठोठावू शकते. दंड न भरल्यास तीन ते सहा महिन्यांसाठी जेलची हवाही खावी लागते.


दुभाजक निरुपयोगी

प्रवाशांनी रुळ ओलांडू नये म्हणून आरपीएफने रुळांच्या मधल्या जागेत तीनशे मीटरपर्यंत लोखंडी दुभाजक कायमस्वरुपी रोवले आहेत. तरीही प्रवाशी त्यावर चढून दुस-या फ्लॅटफार्मवर जातात. उन्हाळ्यात व सुटीच्या हंगामात रुळ ओलांडणा-यांचे प्रमाण जास्त असते. उत्तरप्हदेश, बिहार, खान्देश, मराठवाडा या भागात जाणा-या प्रवाशांची संख्या जास्त असते. मुंबईहूनच या प्रवाशांच्या गाड्या भरुन येतात. नाशिकरोडला या गाड्या आल्यानंतर उभे राहण्यासाठीही जागा नसते. त्यामुळे अऩेक प्रवाशी रुळावरुन जातात. वयस्कर प्रवासी आणि युवकांचे प्रमाण त्यात जास्त असते.


फुकटे आणि भटके

रेल्वे रुळ ओलांडणा-यांमध्ये फुकटे प्रवाशी भटक्यांची संख्या जास्त असते.

मध्य रेल्वेने मार्च 16 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात तब्बल 21 लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई करुन कोट्यवधीचा दंड वसूल केला. नाशिकरोड स्थानकात याच कालावधीत 7311 फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 51 लाख 63 हजार 470 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हा दंड किमान अडीचशे रुपये आणि तिकीटाची पूर्ण रक्कम असा असतो. नाशिकरोडला तेरा टीसी आहेत. प्रवाशांना मार्गदर्शन करण्याबरोबरच त्यांना तिकीट काढून प्रवास करण्याची शिस्त लावण्याचे कामही ते करतात.

---

प्रवाशांनी आपला जीव कुटुंबियांसाठी मोलाचा आहे हे लक्षात घ्यावे. रेल्वे रुळ ओलांडण्याचा कधीही धोका पत्करु नये. कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी नेहमी पादचारी पुलांचा वापर करुन रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे.

-संजय गांगुर्डे, सहाय्यक निरीक्षक, आरपीएफ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काश्मीर फॉर्म्युला नाशिकमध्ये यशस्वी

0
0

काश्मीर फॉर्म्युला नाशिकमध्ये यशस्वी

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

अंजनेरी (ता. त्र्यंबकेश्वर) येथील बालिकेवरील अत्याचारानंतर परिस्थिती आता निवळली आहे. अतूट सामाजिक ऐक्य, नागरिकांचा संयम आणि संघटनांची समजदारी ही त्याची कारण असले तरी इंटनेटवर प्रायोगिक बंदी घालण्याचा काश्मीर फार्म्युला हे त्याचे खरे रहस्य आहे. त्यामुळेच पोलिसांवरील ताण कमी होऊन नाशिकरोडसह शहरात दसरा शांततेत साजरा झाला.

काश्मीरमध्ये अतिरेकी बुऱ्हाण वानी लष्कराशी चकमकीनंतर ठार झाला होता. तेव्हापासून काश्मीर खोऱ्यात गेली अनेक दिवस दगडफेक, हिंसाचार, जाळपोळ सुरू होती. यात अनेकांचा बळी गेला. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी तेथील इंटरनेट, मोबाइल सेवा सरकारने बंद ठेवली होती. त्यामुळे वातावरण पूर्वपदावर आले. आताही काश्मीरमधील बहुतांश भागात इंटरनेट, मोबाइल सेवा बंदच आहे. त्याच धर्तीवर काश्मीर फॉर्म्युला नाशिकमध्ये अजमाविण्यात आला. कायदा व सुव्यवस्थेची घडी विस्कटू नये, यासाठी राज्यात पहिल्यांदाच असा प्रयोग होता. त्यामुळे हाताबाहेर गेलेली परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर आली आहे.

पोलिसांविषयी मात्र नाही तक्रार
व्हॉटसअॅपसारख्या सोशल मीडियामुळे आग भडकत होती. त्यामुळे प्रशासनाने ४८ तास जिल्ह्यातील इंटरनेट सेवाच बंद ठेवली आहे. दसऱ्याला नागरिकांची गैरसोय होणार असतानाही असा धाडसी निर्णय घेण्यात आला. नागरिकांना व्हॉटसअॅपवर दसऱ्याच्या शुभेच्छा देता आल्या नसल्या तरी शांतता व कायदा-सुव्यस्था टिकून राहिल्याने त्यांनीही तक्रार केली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेकडून थेट नोकरीची हमी

0
0

महापालिकेकडून थेट नोकरीची हमी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने आता शहरातील बेरोजगारांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला असून या प्रशिक्षणाद्वारे दरवर्षी ५०० प्रशिक्षितांना थेट नोकरीची हमी दिली जाणार आहे. यासाठी महापालिका दरवर्षी एक कोटी रुपये खर्च करणार आहे. रोजगाराच्या उपलब्धतेअंतर्गत हॉस्पिटॅलिटी, हेल्थ केअर, ऑटोमोबाईल, बांधकाम या क्षेत्राशी संबंधित प्रशिक्षण या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत दिले जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली आहे.

शहरातील बेरोजगारांची संख्या कमी करण्यासाठी महापालिकेने आता बेरोजगारांना कौशल्य प्रशिक्षण देवून त्यांना रोजगाराच्या संधी मिळवून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी येत्या महासभेवर प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या कौशल्य प्रशिक्षणाद्वारे हॉस्पिटॅलिटी, हेल्थ केअर, ऑटोमोबाइल, बांधकाम या क्षेत्राशी संबधित प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी शहरातील दारिद्र्यरेषेखाली असलेले अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक, महिला, अपंगाना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी १८ ते ३५ वयोगटाची अट ठेवण्यात आली असून खाजगी संस्थेद्वारे हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

सबंधित तरुणाला प्रशिक्षण प्रमाणपत्र दिले जाणार असून तीन महिने नोकरीची हमी दिली जाणार आहे. त्यासाठी करिअर मार्गदर्शन व समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. त्याद्वारे जनजागृती करणे निर्माण करणे, अर्ज मागविणे, कौशल्यविषयक निर्धारण करणे, प्रशिक्षण देणे व त्यांनतर रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यासाठी दरवर्षी ५०० लाभार्थी निवड केले जाणार असून त्यावर एक कोटी खर्च येणार आहे. प्रतिलाभार्थी २० हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. संबंधित प्रस्ताव महासभेवर ठेवण्यात आला असून मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती कृष्णा यांनी दिली आहे.

गडचिरोलीच्या धर्तीवर हा कौशल्य विकास कार्यक्रम राबविला जाणार आहे. गडचिरोलीमध्ये ८० टक्के यश आले होते. त्यामुळे नाशिकमध्येही हा प्रकल्प यशस्वीपणे राबवून बेरोजगारांना रोजगार देण्याचा प्रयत्न आहे.
- अभिषेक कृष्णा, आयुक्त, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुंबई, त्र्यंबकेश्वर बससेवा बंदच

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव (अंजनेरी) येथे झालेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर निर्माण झालेला तणाव काहीसा निवळला आहे. त्यामुळे शहरात, जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेरही काही मार्गांवर बससेवा पूर्ववत सुरू करण्यात आली असली तरी मुंबई आणि त्र्यंबकेश्वर मार्गावरील बस वाहतूक मंगळवारीही बंदच ठेवण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. वातावरण पूर्णत: निवळत नाही तोपर्यंत जोखीम उचलली जाणार नाही, असे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

तळेगाव येथील घटनेचे तीव्र पडसाद जिल्ह्यात आणि विशेषत: नाशिक-मुंबई आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर उमटले होते. संतप्त जमावाने आठ बसेस जाळल्या, तर १८ बसेसची तोडफोड केली. त्यामुळे महामंडळाच्या नाशिक विभागाचे सुमारे दोन कोटींचे नुकसान झाले. संतप्त जमावाकडून एसटी बसेसचे नुकसान केले जात असल्याने रविवारी दुपारपासून बसद्वारे होणारी प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. सोमवारी दिवसभर बससेवा बंद होती. जनजीवन पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत बससेवा बंदच राहणार असल्याचे महामंडळातील सूत्रांकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात १३ बस डेपो असून, ११०० बसेस आहेत. त्यापैकी ९५० बसेस रोज शहर, जिल्हा आणि राज्यांतील रस्त्यांवर धावत असतात. या सर्व बसेसची वाहतूक पूर्णत: थांबविण्यात आली होती. त्यामुळे शहरांतर्गत, जिल्ह्यांतर्गत तसेच जिल्ह्याबाहेरील वाहतूकही ठप्प झाली होती. ऐन सणासुदीच्या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. महामंडळाच्या नाशिक विभागाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. जिल्ह्याबाहेरील डेपोंच्या बसेस पोलिसांच्या सूचनेनुसार सोडण्यास सुरुवात झाली. पोलिसांच्या बंदोबस्तातच या बसेस सोडण्यात आल्या. रात्रीनंतर धुळे, जळगाव, नंदुरबार या मार्गांसह जिल्ह्यांतर्गत बहुतांश मार्गांवरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली. मात्र मंगळवारी सायंकाळपर्यंत मुंबई, तसेच त्र्यंबकेश्वर मार्गांवरील वाहतूक सुरू करण्यात आली नसल्याची माहिती महामंडळातील सूत्रांकडून देण्यात आली. या मार्गांवर बससेवा सुरू करण्याची जोखीम तूर्तास उचलणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले. पोलिस तसेच महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून सूचना आल्याशिवाय ही वाहतूक सुरू केली जाणार नाही असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

शहर बससेवा सुरू

गेल्या दोन दिवसांत शहरात १२ बसेसच तोडफोड करण्यात आली. त्यामुळे शहर बससेवादेखील बंद करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला होता. मात्र मंगळवारी सकाळी साडेसहापासून शहर बससेवा सुरू करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील तणाव निवळला

0
0

परिस्थिती पूर्वपदावर; समाजकंटकांची चौकशी अन् शोध सुरू

म. टा. वृत्तसेवा सिन्नर, फाटा

तळेगाव (अंजनेरी) येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर रविवारनंतर नाशिकरोड शहरात झालेला उद्रेक मंगळवारपर्यंत निवळल्याने शहरातील सर्व सेवा सुरळीतपणे सुरू झाल्याचे चित्र मंगळवारी सकाळनंतर दिसून आले. त्यामुळे दसरा सणाच्या निमित्ताने नागरिकांनी खरेदी करण्यासाठी मुख्य बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली. दरम्यान, पोलिसांनी काही समाजकंटकांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.

रविवारी रात्री भीमनगर येथे व सोमवारी दुपारी जेलरोडच्या छत्रपती चौक, सायखेडा रोड, भारत भूषणनगर, पाण्याची टाकी परिसरात समाजकंटकांनी वाहनांची जाळपोळ व तोडफोड करीत प्रचंड दहशत निर्माण केली होती. जेलरोड भागात तर गटागटाने वाहनांवरून फिरत समाजकंटकांनी घोषणाबाजी करीत, शिवीगाळ करीत अक्षरशः धुडगूस घातला होता. त्यामुळे शहरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.

सोमवारी दुपारी तीन वाजता परिस्थिती चिघळल्याने शहर पोलिस आयुक्तांनी जेलरोडला भेट देऊन कायदा व सुव्यवस्थेची पाहणी केली होती. त्यानंतर जमावबंदी आदेश लागू करण्यात आला होता. यावेळी शीघ्र कृती दलाची एक तुकडीही शहरातील दंगेखोरांवर नियंत्रण ठेवण्यास तैनात करण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी जमावबंदी आदेशाचा भंग करणाऱ्यांवर सौम्य लाठीमारही केला होता. त्यामुळे संपूर्ण शहरात अघोषित संचारबंदी निर्माण झाली होती. दंगेखोरांच्या दहशतीमुळे जेलरोड, नाशिकरोडच्या बाजारपेठा अंशतः बंद ठेवण्यात आल्या होत्या.

सोमवारी सायंकाळपर्यंत शहरात वाहनांवर दगडफेक करणाऱ्या समाजकंटाकांवर पोलिसांनी पूर्णपणे नियंत्रण मिळविल्याने सोमवारी रात्री दगडफेकीची घटना घडली नाही. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून सर्व व्यावसायिकांनी आपापले व्यवहार सुरू केले. दसऱ्याच्या निमित्ताने नागरिकांनीही फुले, सिकसोने, वाहने, किराणा, दागिणे खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे शहरातील सर्व रस्ते पुन्हा गजबजल्याचे दिसून आले.

रात्रीही पोलिस बंदोबस्त

भीमनगर, देवळालीगाव, मालधक्का, जेलरोड पाण्याची टाकी, छत्रपती चौक, जुना सायखेडा रोड, सिन्नर फाटा, चेहेडी, बिटको चौक या संवेदनशील ठिकाणी पोलिस बंदोबस्त कायम होता. त्यामुळे समाजकंटकांना पुन्हा डोके वर काढण्याची संधीच मिळाली नाही.

वाढदिवसाची पार्टी करणारे ताब्यात

सोमवारी रात्री दहा वाजेच्या दरम्याने सहा-सात युवकांचा एक गट वाहनांची तोडफोड करण्यासाठी एका हॉटेलमध्ये एकत्र येऊन मद्यपान करीत असल्याची माहिती नाशिकरोड पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या सातही युवकांना नाशिकरोड कोर्ट परिसरातून ताब्यात घेतले असता मित्राच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ते पार्टीसाठी एकत्र आल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. मात्र त्यांनाही रात्रभर पोलिस ठाण्यात थांबावे लागले. मंगळवारी त्यांना १४९ कलमाखाली प्रतिबंधात्मक नोटीस देऊन पोलिसांनी सोडून दिले.

राजकीय नेत्यांची हजेरी

सोमवारी सायंकाळी मालधक्का रोडवर हितेंद्र अनिल गायकवाड या युवकास त्याच्या चारचाकी गाडीवरील मराठा क्रांती मोर्चाचे स्टिकर काढण्याची सक्ती करून एका पाच जणांच्या गटाने त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून त्यास गंभीर जखमी केले होते. याशिवाय या हल्ल्यात हितेंद्र गायकवाड याची आई सरिता अनिल गायकवाड यांच्यावरही हल्ला चढवून यातील काही युवकांनी त्यांच्याशी झटापट केली होती. या घटनेनंतर शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांसह स्थानिक नेत्यांनी व शेकडो कार्यकर्त्यांनी नाशिकरोड

पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी यावेळी जमलेल्या प्रक्षुब्ध जमावाचे म्हणने ऐकून घेत कारवाईचे आश्वासन देत त्यांची समजूत काढली. या हल्ल्याच्या घटनेतील संशयित आरोपी प्रजोल शाम भालेराव, सनी भालेराव, उमेश पारखे व एक अनोळखी असे चार जण फरार असून, पोलिस त्यांचाही शोध घेत आहेत. त्यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन दिवसांनंतर नाशिक शांत

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर तालुक्यात मंगळवारी शांतता प्रस्थापित झाली. सायंकाळी उशिरा वेगवेगळ्या अफवांचे पेव फुटल्याने सर्वसामान्यांची धावपळ उडाली होती. विशेषतः तळेगाव (अंजनेरी), पैगलवाडी, तसेच त्र्यंबकेश्वरमध्ये काही ठिकाणी हाणामारी झाल्याची माहिती समजते. मात्र, त्याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. संध्याकाळी नाशिककडून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी वाहतूक मात्र बंद झाली.

तळेगाव (अंजनेरी) येथे एका पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यापासून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी विजयादशमी असल्याने पोलिसांनी अतिरिक्त कुमक तैनात करून समाजकंटकांना रोखण्याची तयारी केली. संध्याकाळपर्यंत किरकोळ घटना वगळता शांतता होती. मात्र, यानंतर वेगवेगळ्या अफवा पुन्हा सुरू झाल्या.

दोन समाजांतील तरुणांमध्ये तळेगाव, त्र्यंबकेश्वरमध्ये दगडफेक, तसेच हाणामारी झाल्याचे समजते. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. दरम्यान, मंगळवारी शहरात काही ठिकाणी मोटारसायकल रॅली काढून घोषणाबाजी करण्यात आली. यातील उत्साही तरुणांनी रस्त्याने जाणाऱ्यांना शिवीगाळ, तसेच धक्काबुक्की केल्याच्या तक्रारी समोर आल्या. संध्याकाळी पाथर्डी फाटा येथे दोन वाहनांची तोडफोड करण्यात आली. मात्र, हा वाद तेथेच मिटला.

मोबाइल इंटरनेट बंदच

व्हॉटसअॅपद्वारे पसरणाऱ्या अफवा रोखण्यासाठी पोलिसांनी शहरासह जिल्ह्यातील मोबाइल इंटरनेट सेवा सोमवारपासून बंद केली आहे. आज, दसऱ्याच्या दिवशीही मोबाइलधारकांना इंटरनेट सेवेपासून वंचित राहावे लागले. इंटरनेट सेवा सुरळीत करण्यासाठी परिस्थितीचा विचार केला जाईल. मंगळवारी रात्रीपर्यंत अफवांचे पीक कमी झाल्याची खात्री पटल्यास बुधवारपासून इंटरनेट सेवा सुरू केली जाईल; अन्यथा त्यात वाढ केली जाईल, असे पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भावी अभियंत्यांच्या हाती झाडू

0
0

कोटमगाव यात्रेत राबवली स्वच्छता मोहीम

म. टा. वृत्तसेवा, येवला

एरवी त्यांच्याकडे भली मोठी पुस्तके, इंजिनीअरिंगचे साहित्य, मात्र एक दिवस हे बाजूला ठेवत त्यांच्या हाती दिसला तो झाडू अन् कचरा उचलण्यासाठीची टोपली. येवला तालुक्यातील श्री क्षेत्र कोटमगावला हे चित्र दिसलं. येवल्यातील एस. एन. डी. तंत्रनिकेतनच्या होणाऱ्या अभियंत्यांनी यात्रेत स्वच्छता मोहिम राबविली.

तालुक्यातील श्री क्षेत्र कोटमगाव येथील नवरात्रोत्सवातील नऊ दिवस भरणारी यात्रा म्हणजे भाविकांची दररोजच होणारी अफाट गर्दी. त्यामुळे यात्रेत आजूबाजूला पडणारा कचरा हा ओघाने आलाच. हीच बाब लक्षात घेऊन शंभर भावी अभियंत्यांनी हाती झाडू अन् टोपली घेतली होती. त्यांनी यात्रेत थाटलेल्या विविध दुकांनासमोरील प्लास्टिक, केळीची साले, फूल असा कचरा विद्यार्थ्यांनी जमा करत संपूर्ण यात्रा परिसर स्वच्छ केला. या स्तुत्य उपक्रमात त्यांनी जवळपास ट्रॅक्टरभरून कचरा जमा करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली. विशेष म्हणजे या उपक्रमात विद्यार्थिनीदेखील सहभागी झाल्या होत्या.

प्लास्टिक मुक्ती अभियानाला सहकार्य केल्याबद्दल ग्रामपंचायतीनेदेखील या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांचे आभार मानले. जगदंबा एज्युकेशन सोसायटीचे कुणाल दराडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी कुणाल दराडे, विभागप्रमुख सतीश राजनकर आदींचा सत्कार केला. शरद लहरे, सरपंच नामदेव माळी, ग्रामसेवक सचिन कल्लापूरे आदी उपस्थित होते.कोटमगाव यात्रेत घटी बसणाऱ्या भाविकांसाठी मोफत आरोग्य शिबिर तसेच मंडळाच्या वतीने सातव्या माळेचे औचित्य साधून घटी बसलेल्या दीड हजार भाविकांना फराळ वाटप करण्यात आले. मोफत आरोग्य तपासणीदेखील करण्यात आली. यावेळी कुणाल दराडे, राजेंद्र गणोरे, प्रतीक जाधव, जगदंबा देवस्थान ट्रस्टचे सर्व सदस्य उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पदवीधर’मध्ये काँग्रेस अडचणीत

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसची डोकेदुखी वाढव‌िली आहे. पदवीधरसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी विभागवार बैठका घेणे सुरू केले आहे. पक्षाच्या आदेशानुसारच आपण निवडणूक लढव‌ित असून, प्रत्येक जिल्ह्यात नोंदणी सुरू केल्याचे त्यांनी सांग‌ितले आहे. कोते पाटील यांच्या एंट्रीने काँग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबेच्या अडचणी वाढल्या आहेत. कोते पाटील हे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे विश्वासू आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी त्यांच्यासाठी ताकद पणाला लावण्याची शक्यता आहे.

मतदार याद्यांच्या गोंधळामुळे पदवीधरच्या निवडणूक काहीकाळ लांबणीवर पडत असल्या तरी, या निवडणुकांमधील रंगत वाढत चालली आहे. सत्ताधारी भाजपने नाशिकच्या सीटसाठी आपली सर्व ताकद एकवटत उमदवार डॉ. प्रशांत पाटील यांच्यामागे पक्ष उभा केला आहे. पाटील यांच्या विजयाची जबाबदारी थेट मंत्र्यांवरच टाकण्यात आली आहे. तर काँग्रेसनेही या निवडणुकीसाठी विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनाच उमेदवारी जाहीर केली आहे. माकपच्या वतीने राजू देसले तर संवर्धन बहुउद्देशीय संस्थेचे सचिन चव्हाण निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. त्यामुळे चौरंगी लढत होईल, असे चित्र आजपर्यंत होते. मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादीनेही एंट्री घेतल्यामुळे रंगत वाढणार आहे.

विधानपरिषद निवडणुकांसाठी काँग्रेसने विश्वासात न घेतल्याने राष्ट्रवादीने आता वेगळी चूल मांडली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी संग्राम कोते पाटील यांना मैदानात उतरविले आहेत. कोते पाटील हे अजित पवार यांचे विश्वासू असून त्यांच्या एंट्रीने डॉ. तांबे यांच्या अडचणी वाढणार आहेत. कोते पाटील यांच्यासाठी पाचही जिल्ह्यात पक्षाने मतदार नोंदणीची कार्यक्रम सुरू केला आहे. नाशिकमध्ये पाच जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही आयोजित केली आहे.

नात्यागोत्यात पेच

काँग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे मेव्हुणे आहेत. तर राष्ट्रवादीचे उमेदवार कोते पाटील हे सुद्धा थोरातांचे भाचे आहेत. त्यामुळे थोरातांपुढेच या निवडणुकीचा पेच निर्माण झाला आहे. या भाऊबंदकीतून मार्ग काढण्यासाठी आता वरिष्ठ पातळीवरूनच प्रयत्न केले जाणार आहेत. राष्ट्रवादी व काँग्रेस एकमेकांविरोधात लढल्यास त्याचा थेट फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे.

पक्षाने पदवीधरची निवडणूक लढण्यासंदर्भातील आदेश दिले आहेत. त्यानुसार विभागीय पातळीवर काम सुरू केले असून, पाच जिल्ह्यांमध्ये यंत्रणा कार्यरत केली आहे. विद्यार्थी व शिक्षकांसाठी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. त्याचा फायदा निवडणुकीत होईल.

- संग्राम कोते-पाटील,

प्रदेशाध्यक्ष, रायुकाँ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images