Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘वीज कर्मचाऱ्यांनी एकत्रित लढा द्यावा’

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

वीज कंपनीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी एकत्र येऊन लढा द्यावा, १४ ऑक्टोबरच्या धरणे आंदोलन व साखळी उपोषणात सहभागी व्हावे, असे आवाहन अधिकारी व कर्मचारी फोरमचे केंद्रीय कार्याध्यक्ष एम. बी. आहेर यांनी केले.

नाशिकरोड येथील नाशिक परिमंडळ कार्यालय, वीज भवनासमोर वीज कंपनीतील अधिकारी व कर्मचारी यांची द्वारसभा झाली. त्यावेळी आहेर बोलत होते. बहुजन विद्युत अभियंता, अधिकारी व कर्मचारी फोरमतर्फे ही सभा झाली. झोनल अध्यक्ष ज्ञानेश्वर बागूल, झोनल सचिव संजय परवार, केंद्रीय पदाधिकारी भाऊसाहेब गांगुर्डे, साहेबराव पगारे, शिवदास साबरे, अविनाश पगारे, राजू जाधव, कुणाल तेलोरे, सुनील मायर, कैलास वारुंगसे, देवीदास सोनवणे, एन. डी. भोये, बाळासाहेब सोनवणे, प्रवीण माळी आदी उपस्थित होते.

संघटनेने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की बिंदुनामावली व मागासवर्गीयांच्या अनुशेषांची माहिती मिळावी, मंडल व विभागीय पातळीवर बिंदुनामावली शासनाच्या नामनिर्देशित अधिकाऱ्यांकडून प्रमाणित करूनच अनुशेष मुख्यालयाला पाठवावा, मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांच्या प्रलंबित प्रकरणांवर सकारात्मक कार्यवाही व्हावी, बदली व बढती पदस्थापनेत भेदभाव करू नये, वीजबिल थकबाकी वसुली करताना कर्मचाऱ्यांना मारहाण होऊ नये यासाठी पोलिस संरक्षण मिळावे, बदली पोस्टिंगमध्ये भेदभाव करू नये, मुख्य कार्यालयातून आलेल्या आदेशाच्या नावाखाली परिमंडळात ५१४ या परिपत्रकाचे उल्लंघन होत आहे, ते होऊ नये. यावेळी १४ ऑक्टोबरच्या आंदोलनाविषयीदेखील चर्चा करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वृद्धाश्रम संस्थांना नावनोंदणीचे आवाहन

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

वृद्धाश्रम चालविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी समाजकल्याण विभागाकडे नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नाशिक विभागातील स्वेच्छेने वृद्धाश्रम चालविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी संबंधित जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषदेकडे नोंदणी करावी, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त काशीनाथ गवळे यांनी केले आहे.

आई-वडील व ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी केंद्र सरकारच्या ज्येष्ठ नागरिक धोरणाच्या अनुषंगाने स्वेच्छेने सुरू असलेल्या स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू असलेल्या वृद्धाश्रमांची माहिती व आकडेवारी संकलित केली जात आहे. अशा संस्थांनी जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे नोंदणी करावी. ज्येष्ठांना पाल्यांकडून निर्वाह खर्च देण्याची तरतूद कायद्यात आहे. प्रत्येक उपविभागात निर्वाह प्राधिकरण स्थापन झाले आहे. ज्येष्ठांनी महसूल विभागातील संबंधित उपविभागीय अधिकारी किंवा सहाय्यक आयुक्त/जिल्हा समाजकल्याण अधिकारी, समाजकल्याण यांच्याशी संपर्क साधावा. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून राज्यातील निराधार ज्येष्ठांसाठी २३ मातोश्री वृद्धाश्रम विनाअनुदान तत्त्वावर चालविले जातात. वृद्धाश्रमांत प्रवेशितांना भोजन, प्रथमोपचार, निवास व्यवस्था मोफत देण्यात येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएमवर हॅकर्सचा डोळा!

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सिडको

एटीएममधून पैसे काढल्यानंतर अन्यत्र ठिकाणाहून पैसे काढले जात असल्याचा धक्कादायक प्रकार सिडकोत उघडकीस आला आहे. यामुळे आता एटीएममधून पैसे काढावेत की नाही असा प्रश्न परिसरातील खातेधारकांमध्ये निर्माण झाला आहे. याप्रकरणी लाखो रुपयांच्या अपहराबाबत अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रवीण अरुण खंडांगळे (२२, पाथर्डी फाटा) यांनी अंबड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खंडांगळे यांनी एक ऑक्टोबर रोजी पाथर्डी फाटा येथील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममधून डेबिट कार्डाच्या साह्याने एक हजार रुपये काढले. त्यांनतर त्यांच्या खात्यातून पाच ऑक्‍टोबर रोजी पुन्हा वीस हजार रुपये काढण्यात आल्याचा एसएमएस आला. पुन्हा दहा मिनिटांनी आणखी २० हजार रुपये काढल्याचा मेसेज आला. त्यामुळे खंडांगळे यांनी तातडीने बँकेत चौकशी केली. बँक खात्यातील पैसे गोव्यातून काढले गेल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. त्यामुळे त्रस्त झालेल्या खंडांगळे यांनी तातडीने अंबड पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. मात्र, खात्यातून परस्पर पैसे काढले गेलेले खंडागळे एकमेव खातेदार नाहीत. त्यांच्यापूर्वी अनेक जणांच्या खात्यातून असे पैसे काढण्यात आले आहे. विशेष म्हणजे या सर्व खातेदारांनी पाथर्डी फाटा परिसरातील त्या ‘एटीएम’चा वापर कधी ना कधी वापर केलेला आहे. त्यामुळे एटीएम हॅक करून खातेदारांची फसवणूक करण्यात आल्याचे मानले जात आहे.

अनेकांना घातला गंडा

यापूर्वी शिवसेनेचे नगरसेवक अरविंद शेळके यांच्याही खात्यातील ४० हजार रुपये काढले गेले आहेत. किरण विठ्ठल शेंडे यांच्या खात्यातून १२ हजार ८०० रुपये, स्वप्नील अहिरे यांच्या खात्यातून साडेसहा हजार रुपये, नाना सोमारे यांच्या खात्यातून ४० हजार रुपये, अनिल भिका सोनजे यांच्या खात्यातून २२ हजार, संजयकुमारसिंग यांच्या खात्यातून ४५ हजार रुपये, रणधीर वसंत तिडके यांच्या खात्यातून ६२ हजार चारशे रुपये, प्रमोद कुमार यांच्या खात्यातून २० हजार तर अनिल जाधव यांच्या खात्यातून १२ हजार रुपये या सर्वांचे पैसे पाथर्डी फाटा येथील एटीएममधून काढल्यानंतरच चोरीस गेल्याचे उघडकीस झाले आहे.



अखेर ‘ते’ एटीएम बंद

पाथर्डी फाटा येथील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यानंतर त्याच खात्यातून एकत्र ठिकाणाहूनही पैसे काढले जात असल्याचा प्रकार समोर आले. यानंतर अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. आता पाथर्डी फाट्यावरील आयसीआयसीआयचे एटीएम बंद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी व्यक्‍त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेलेब्रिटीजसोबत रंगल्या गप्पा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आपल्या आवडत्या टीव्ही कलाकारांना भेटणे हे प्रत्येक रसिक प्रेक्षकाचे स्वप्न असते. कलाकारांना भेटून त्यांच्याशी मनमुराद गप्पा माराव्यात, त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्याबाबत जाणून घ्यावे, अशी इच्छाही त्यामागे असते. पण, तशी संधी प्रत्येकाला मिळतेच असे नाही. महाराष्ट्र टाइम्सने ही संधी अशाच कलाकारांच्या फॅन्ससाठी उपलब्ध करून दिली. एका कॉन्टेस्टद्वारे जिंकलेल्या भाग्यवान विजेत्यांना ही संधी मिळाली. ‘मटा’च्या कार्यालयात पार पडलेल्या सेलेब मीट या उपक्रमाद्वारे कलाकारांच्या फॅन्सला मनमुराद गप्पा मारण्याची संधी मिळाली.

‘गोठ’ टीव्ही मालिकेचे रुपल नंद, समीर परांजपे, ‘नकुशी’ टीव्ही मालिकेचे विद्याधर जोशी, अतुल कास्वा आणि ‘ग सहाजनीं’ या टीव्ही मालिकांमधील पुरुषोत्तम बेर्डे, नियती राजवाडे हे कलाकार यावेळी उपस्थित होते. त्यांना भेटण्याची संधी अभय येवले, भाग्यश्री येवले, प्रतिभा आहेर, पूजा मोरे, क्रांती पाटील, पूनम दिघे, प्रिया धनराज, प्रिया जैन, मानसी ढिकले या भाग्यवंत विजेत्यांना मिळाली. प्रतिभा आहेर हिने नियती राजवाडे यांना खासगी जीवनातही कॉमेडी आहात का, असा प्रश्न विचारला. यावर त्यांनी मला सर्वांना हसवायला आवडतं. जशी मी स्क्रिनवर आहे, तशीच मी ऑफ स्क्रिनदेखील आहे. अभय येवले यांनी पुरुषोत्तम बेर्डे यांना त्यांच्या पुढील प्रोजेक्ट्सबद्दल माहिती विचारली. सध्या ‘गं सहाजणी’ या टीव्ही मालिकेवर लक्ष केंद्रित करत असल्याचे ते म्हणाले. तर भाग्यश्री येवले हिने पुरुषोत्तम बेर्डे यांच्या महाराष्ट्र टाइम्सच्या सगुण निर्गुणमधील लिखाणाची प्रशंसा केली. सगुण निर्गुणमधील लेखांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला; त्यामुळे या कॉलमसाठी पुन्हा लिखाण करणार आहे. विद्याधर जोशी यांनी नकुशी मालिकेतील भूमिकेविषयी सांगितले. कामाचा ताण असूनही इतके ताजे कसे दिसतात, या प्रश्नावर समीर परांजपे, रुपल नंद, नियती राजवाडे यांनी ‘आम्ही करीत असलेले काम आम्हाला आवडतं म्हणून ताजे दिसतो,’ असे दिलखुलासपणे सांगितले. अतुल कास्वा व विद्याधर जोशी यांनी अंधश्रद्धा अद्याप कायम असल्याने नकुशी परंपरा कशी वाईट आहे, याबाबत गप्पा मारल्या. प्रेक्षकांकडून मिळणारी दाद आमची ऊर्जा असल्याचे ते म्हणाले. गप्पा झाल्यानंतर सर्वांनी सेलिब्रिटीजसोबत फोटो काढण्याचा आनंद लुटला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्यायाविरोधात एकवटले शिक्षक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यात यावे व शासननिर्णयांमधील जाचक अटी काढून टाकाव्यात, यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शिक्षकांवर औरंगाबाद येथे पोलिसांकडून नुकताच लाठीमार करण्यात आला. या घटनेचा निषेध करण्यासाठी गुरुवारी जिल्ह्यातील शेकडो शिक्षक जिल्हा परिषदेसमोर एकवटले. शिक्षकांवरील अन्याय दूर करण्याची मागणी करीत माध्यमिक शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे यांना निवेदन देण्यात आले.

औरंगाबाद येथे विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांवर लाठीहल्ला करून त्यांच्यावर ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा निषेध करण्यासाठी जिल्ह्याभरातील शिक्षक, संस्थाचालकांनी एकत्रित येत गुरुवारी ९०० माध्यमिक शाळा बंद ठेवण्यात आल्या. तसेच सुमारे सहा हजार शिक्षकांचा यामध्ये सहभाग होता. राज्यातील सर्व विनाअनुदानित शाळांना विनाअट १०० टक्के अनुदान मंजूर करावे, अतिरिक्त शिक्षकांबाबतची कार्यवाही तत्काळ थांबवावी, समायोजनातील संभ्रमावस्था दूर करावी, आदी मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. शिवाय, १९ सप्टेंबर २०१६ च्या शासननिर्णयातील, ‘प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेच्या संदर्भात सर्व वर्ग प्रगत असावेत, माध्यमिक शाळेच्या संदर्भात नववी व दहावीच्या वर्गाचा निकाल १०० टक्के असावा, या शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर पदे सन २०१५-१६च्या संचमान्यतेनुसार रिक्त असल्यास सरकारी व खासगी अनुदानित शाळांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना समायोजनाने सामावून घेणे बंधनकारक राहील’, अशा जाचक अटी व शर्ती काढून टाकाव्यात, अशीदेखील मागणी यावेळी करण्यात आली. मुख्याध्यापक संघटना, संस्थाचालक संघटना, माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षक लोकशाही आघाडी, शिक्षकसेना, शिक्षक परिषद, शिक्षकेतर संघटना, कायम विनाअनुदानित शिक्षक संघटना, शिक्षकभारती सेना आदी संघटनांचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

शिक्षकांवर संकट
शिक्षकांवर लाठीहल्ला करून राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या शिक्षकविरोधी भूमिकेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. एक दिवस शाळा बंद ठेवली तरी पुढचे काही दिवस या घटनेमुळे शिक्षकांची अध्यापन करण्याची मानसिकता होईल का?, असा प्रश्न शिक्षकांनी गुरुवारी उपस्थित केला. विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांवर मोठे आर्थिक संकट ओढावले असल्याने मागण्यांचा त्वरित विचार व्हावा, अशी मागणी करण्यात आली. पदवीधर आमदार डॉ. सुधीर तांबे, संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, शिक्षक आमदार अपूर्व हिरे, साहेबराव कुटे, भारत भामरे आदींनी यावेळी भाषण केले.

शिक्षकांना झालेली मारहाण घृणास्पद आहे. या घटनेमुळे शिक्षकांचा उद्रेक झाला असून तो आणखी तीव्र होऊ शकतो.
- नंदलाल धांडे, सचिव, शिक्षक महासंघ

विनाअनुदानित शाळांनी अनेक वर्षांपासून आपल्या मागण्यांबाबत संयम बाळगला आहे. शिक्षकांच्या मागण्या त्वरित मान्य करण्यात याव्यात. अन्यथा बेमुदत शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल.
- एस. बी. देशमुख, सचिव, महाराष्ट्र मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुलशनाबादचा बहरला फुलबाजार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शीतल हवामान आणि फुलांचा कायम बहर यामुळे मुघल राजवटीत नाशिकनगरीला गुलशनाबाद हे नाव मिळाले. सुंदर फुलांमुळे ओळखल्या जाणाऱ्या ना‌शकातील फुलबाजार नवरात्रोत्सवानिमित्त बहरला आहे. फुलांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी फुलांचे भावदेखील १५ ते २० टक्क्यांनी वधारले आहेत. फुलांची मागणी आणि पुरवठा यांचे प्रमाण व्यस्त असल्याने फुलांच्या किमतीत वाढ झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात फुलांच्या विक्रीत विक्रमी उलाढाल झाल्याचे चित्र फुलबाजारात दिसते आहे. रोज १०० ते १५० रुपये किलोने विकली जाणाऱ्या निशिगंधाच्या फुलांचा भाव नवरात्रात २०० रुपयांपर्यंत वाढला आहे. १० ते २० रुपयांना विकली जाणारी १२ गुलाबांची जुडी २५ रुपयांना विकली जात आहे. रोज आठ ते १० रुपये नगानुसार विकली जाणारी लिली यंदा १५ ते २० रुपयांना विकली जात आहे. झेंडू २० ते ४० रुपये किलोने विकला जात आहे. नेहमी ३०० रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या मोगऱ्याचा भाव ४०० ते ५०० रुपयांपर्यंत गेला आहे. जरबेरा ५० रुपये, ग्लाडिओला ६० रुपयांना १० या प्रमाणात विकल्या जात आहेत.

तासाभरात आटोपला बाजार

पूजा विधीमध्ये मानाचे स्थान असलेल्या तुळसेला बाजारातही अधिक भाव मिळत आहे. तुळसेचा वाटा दर रोज पाच रुपयांना विकला जातो. त्यासाठी आता दुप्पट म्हणजे १० रुपये मोजावे लागत आहे. रोजच्या तुलनेत बुधवारी फुलांची मागणी दुप्पट होती. पहाटे सुरू होणार फूल बाजार सकाळी साडेआठ वाजेपर्यंत चालतो. परंतु, बुधवारी हा बाजार एक तासातच रिकामा झाला. पावसामुळे नाशिक तालुक्यातून फुलांची आवकही कमी झाली. याशिवाय जानोरी, दिंडोरी, ओझर, चांदशी या भागातून येणारी फुले पावसाने खराब झाली. मुंबईहून होणारा फुलांचा पुरवठा कमी झाल्याने फुलांच्या किमती वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. दसऱ्यापर्यंत फुलाचं भाव तेजीत राहण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तविली आहे.

शेवतींची आवक वाढली
अहमदनगर जिल्ह्यातून शेवंतीची आवक होत असून त्यांना चांगली मागणी आहे. झेंडूची फुले नाशिक जवळच्याच भागातून येत असून गुजरातमधील नवसारी येथील लिलीच्या फुलांना चांगली मागणी आहे. पुणे आणि उस्मानाबाद येथून येणाऱ्या जरबेराला वाढती मागणी आहे.

सणानिमित्त सध्या भावात तेजी आहे. फुलांना अधिक मागणी आहे; परंतु पुरवठा अल्प असल्याने भावात वाढ झाली आहे. दसऱ्यापर्यंत ही वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.
- राहुल सोनवणे, फुल विक्रेता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रा. शशिकांत अहिरेंना युवा प्रताप पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल लखमापूर (ता. सटाणा) येथील प्रा. शशिकांत रमेश अहिरे यांना उद्योग भारती, तसेच महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर संघटनेतर्फे युवा प्रताप २०१६ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

महाराष्ट्र कृषी शिक्षण व शिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. राम खर्चे यांच्या हस्ते नाशिक येथील कुसुमाग्रज सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. माजी कृषी आयुक्त पांडुरंग वाठारकर, रामेती कृषी विभागाचे प्राचार्य सुनील वानखेडे, कौशल्य रोजगार व उद्योजकता विकासचे उपसंचालक अनिल पवार, तसेच माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, सटाण्याचे नायब तहसीलदार आबासाहेब तांबे, कृषीश्री महेश कडूस पाटील प्रमुख पाहुणे होते.

प्रा. अहिरे यांनी शेतीबरोबरच सामाजिक बांधिलकीतून २०१२ मध्ये वसुंधरा प्रतिष्ठान संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून गावपातळीवर पर्यावरणाशी संबंधित विविध विषयांवर कार्यशाळा, वृक्षनिर्मिती, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, जलसंधारण, तसेच वन्यजीव संरक्षण, शिक्षणविषयक, मानवी आरोग्यविषयक, मोफत आरोग्यविषयक शिबिरे, रक्तदान शिबिरे घेतली आहेत. लखमापूरमध्ये वृक्षारोपणाच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरण जपण्याचा प्रयत्न केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फटाके स्टॉल्सला रस्त्यालगत बंदी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

हायकोर्टाच्या आदेशानुसार महापालिकेने या वर्षी रस्त्यालगत आणि गर्दीच्या ठिकाणी फटाके स्टॉल्सला बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मोकळ्या जागेत उभारण्यात येणाऱ्या दोन फटाके स्टॉल्समध्ये तीन मीटरचे अंतर ठेवण्यात येणार आहे. या नियमावलीच्या अंमलबजावणीची जबाबदारी पोलिसांवर सोपवण्यात आली आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात इदगाह मैदान, डोंगरे वसतिगृहासह नाशिकरोड येथील क्लबहाऊसमध्ये फटाके स्टॉल्स उभारले जातात. यासोबतच काही जण रस्त्यालगत व गर्दीच्या ठिकाणी स्टॉल्स उभारतात. परंतु, चंद्रकात लासुरे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टाने नियमावली संदर्भात ताशेरे ओढले. विस्फोटक अधिनियम व नियम १९८४ च्या कायद्याची अमंलबजावणी केली जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेने या वर्षी फटाके स्टॉल्स संदर्भात कडक धोरण अवलंबले आहे. त्यासाठीची नियमावली तयार केली आहे. त्यामुळे आता रस्त्यावर व गर्दीच्या ठिकाणी स्टॉल्स उभारता येणार नाही. अशा प्रकारचे स्टॉल्स उभारल्यास त्यांच्यावर पोलिसांमार्फत कारवाई केली जाईल. स्टॉल्स संदर्भातील कडक अटी व शर्तीचा भंग होणार नाही, याची हमी स्टॉल्सधारकांना द्यावी लागणार आहे. सोबतच या वर्षी डोंगरे वसतिगृहावरील स्टॉल्सधारकांनाही महापालिकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. विनापरवानगी स्टॉल्स उभारले तर कारवाई करण्याचा इशारा अग्निशमन विभागाने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऑनलाइनद्वारे एक टक्का सूट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने अखेर ऑनलाइन कारभाराला चालना देत, घरपट्टी व पाणीपट्टीधारकांसाठी ऑनलाइन कर भरणाऱ्यांना एक टक्का सवलतीची अंमलबजावणी सुरू केली आहे. घरपट्टीधारकांना एक टक्का तर पाणीपट्टी बिलांवर अर्धा टक्के सवलतीच्या निर्णयाची अंमलबजावणी एक नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. घरपट्टी व पाणीपट्टीवर अधिकाधिक ५०० रुपयांपर्यंत सवलत मिळणार आहे. महासभेच्या ठरावानंतर महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी या निर्णयाला संमती दिली आहे.

महापालिकेने एप्रिल ते जून दरम्यान जाहीर केलेल्या सवलत योजनेत मोठ्या प्रमाणावर मिळकतधारक ऑनलाइन कराचा भरणा करतात. गेल्या वर्षी एप्रिल ते मार्च या एक वर्षात शहरातील २७ हजार ५२८ मालमत्ताधारकांनी ऑनलाइन घरपट्टीचा भरणा केला होता. त्यातून तिजोरीत सात कोटी जमा झाले होते. तर १२ हजार ४१२ पाणीपट्टीधारकांनी एक कोटी ९४ लाख रुपये भरले होते. त्यामुळे हा प्रतिसाद बघता ऑनलाइन करभरणा करणाऱ्यांसाठी अतिरिक्त एक टक्का सवलतीची घोषणा चालू बजेटमध्ये केली. यंदाही एप्र‌िल ते ऑगस्टपर्यंत शहरातील २२ हजार ५९० मिळकतधारकांनी ऑनलाइन स्वरुपात महापालिकेकडे पाच कोटी २२ लाख ६५ हजारांची घरपट्टी जमा केली आहे. तर तीन हजार ५८१ पाणीपट्टीधारकांनी ४९ लाख रुपये ऑनलाइन स्वरुपात महापालिकेला जमा केले आहेत.

ऑनलाइन करभरणा करणाऱ्यांची संख्या वाढत असताना महापालिका एक टक्का सवलत देण्यास चालढकल करत होती. एका बिलासाठी महापालिकेला ८० रुपये खर्च येतो, तसेच मनुष्यबळही लागते. महापालिकेचे खर्च व मनुष्यबळ वाचवण्यासाठी अधिकाधिक लोकांनी ऑनलाइन कर भरणा करावा यासाठी ही योजना जाहीर करण्यात आली होती. परंतु, योजना जाहीर होऊन सहा महिने लोटले तरी, योजनेचा प्रस्ताव विभागांच्या चकरा मारत होता. नूतन आयुक्त कृष्णा यांनाही महापालिकेच्या ऑनलाइन कारभाराला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले असून त्यांनी महासभेच्या प्रस्तावाचे रुपांतर आदेशात केले आहे. एक नोव्हेंबरपासून नियमित घरपट्टी भरणाऱ्यांना बिलात एक टक्का, तर पाणीपट्टीधारकांना अर्धा टक्का सवलत दिली जाणार आहे. नागरिकांनी बिलाची वाट न बघता आपल्या इंडेक्स नंबरनुसार ऑनलाइन बिल भरल्यास थेट सवलत मिळणार आहे. ही सवलत अधिकाधिक ५०० रुपयांपर्यंत दिली जाणार आहे. थकबाकीदारांना यातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे मिळकतधारकांना या योजनेचा लाभ होणार असून ऑनलाइन कारभाराला चालना मिळणार आहे.

सवलतीचा धमाका
महापालिकेच्या वतीने एप्रिल ते जून या तीन महिन्यात आगाऊ कराचा भरणा करणाऱ्यांसाठी पाच, तीन, दोन टक्के एकत्र सवलत देण्याची योजना राबविली जाते. या सवलतीचा लाभ घेणाऱ्यांनी बिलाचा भरणा ऑनलाइन केल्यास त्यांना अतिरिक्त एक टक्का सूट मिळणार आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये बिल भरल्यास ६, मेमध्ये भरल्यास ४ तर जूनमध्ये भरल्यास ३ टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे सवलतीचा बंपर धमाका या तीन महिन्यात मिळकतधारकांना मिळणार आहे. तसेच विभागीय कार्यालयांमध्ये बिलासांठी नागरिकांना रांग लावण्याची गरज राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात भाजपतर्फे आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जवानांच्या रक्ताची दलाली करीत असल्याचे म्हणणाऱ्या काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांचा धुळे शहरात तीव्र निषेध करण्यात आला. भाजपतर्फे राहुल गांधी यांच्या पोस्टरवर जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

शुक्रवारी (दि. ७) भाजपकडून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. त्यांनी हे वक्तव्य करून शहीद जवानांचा अपमान केला म्हणून त्यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी हिरामण गवळी, विजय पाश्वापूरकर, शशिकांत मोगलाईकर, यशवंत येवलेकर, सचिन गिते, नंदू ठोंबरे, अमोल धामणे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मी कधीही पोलिसांशी संपर्क केला नाही’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नावात बदल करण्याबाबत न्यायालयात सादर केलेला दस्ताबाबत मला वैयक्तिक माहिती नाही, हे खरं नाही. तसेच यासंदर्भात मी स्वत:हून किंवा पोलिसांनीही आपल्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क साधला नव्हता, अशी माहिती उलटतपासणीच्या वेळी जळगावचे तालुका उपनिबंधक डॉ. मुकेश बऱ्हाटे यांनी उलटतपासणीत धुळे जिल्हा विशेष न्यायालयात माहिती दिली.

सरकार पक्षाकडून भिकमचंद जैन हौ. सोसायटीतील नावात बदलाबाबत दस्त न्यायालयात सादर केला गेला. त्यासंदर्भातील माहिती साक्षीत डॉ. बऱ्हाटे यांनी दिली. नव्याने दोषारोप पत्र दाखल करण्याची परवानगी सरकार पक्षाला देवून त्याबाबत नवीन आठ साक्षीदार तपासण्यास मंजुरी देण्यात आली. संशयित आरोपींपैकी जगन्नाथ वाणी, राजेंद्र मयुर हे न्यायालयात उपस्थित होते. उलटतपासणीत अॅड. एस. आर. वाणी यांनी विविध प्रश्न विचारले. त्याला उत्तर देताना त्यांनी, या कागदपत्राची आपल्याला वैयक्तिक माहिती नाही. १९९८ मध्ये मी कार्यालयात कार्यरत नव्हतो. तसेच पोलिसांनी कोणताही जबाब नोंदवलेला नसून याबाबत मी कधीही पोलिसांशी संपर्क केला नाही, असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्ताधारी जि.प.पासून दूर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सात गटांचे आरक्षण जाहीर झाल्याने तालुक्यातील तीन गटांच्या विद्यमान सदस्यांना राजकीय निवृत्ती घेण्याची वेळ येवून ठेपली आहे. विद्यमान सदस्य यतीन पाटील यांचा गट मात्र शाबूत राहिला आहे.

बागलाण तालुक्यातील सात जिल्हा परिषद गटांच्या आरक्षण सोडतीने अनेकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. तर नव्याने महिला सदस्यांना या ठिकाणी संधी मिळणार असल्याने महिलाराज सत्तेत येणार आहे. तालुक्यातील पठावेदिगर, ताहाराबाद, जायखेडा, नामपूर, वीरगाव, ठेंगोडा, ब्राह्मणगाव या सातही जिल्हा परिषद गटातील आरक्षणांनी अनेकांचे मनसुबे उधळले आहेत.

नव्याने झालेल्या आरक्षणानुसार पठावेदिगर गट हा खुला प्रवर्ग झाला आहे. यामुळे या ठिकाणी विद्यमान जि. प. सदस्य सिंधुताई सोनवणे यांचे पती व तुळजा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय सोनवणे यांचा मार्ग सुकर झाला आहे. ताहाराबाद गटाचे आरक्षण अनु. जमाती महिला राखीव झाल्याने काँग्रेसचे विद्यमान जि. प. सदस्य प्रशांत पाटील यांना जिल्हा परिषद राजकारणापासून दूर रहावे लागणार आहे. जायखेडा गटाचे विद्यमान सदस्य यतीन पाटील यांचा एकमेव गट शाबुत आहे. नामपूर गटाच्या भाजपच्या महिला जि. प. सदस्या सुनिता पाटील यांचा गट अनुजमाती गटाच्या पुरुष प्रवर्गासाठी राखीव झाल्याने त्यांच्या राजकीय अस्तित्त्वावर प्रश्न उभा ठाकला आहे. वीरगांव जिल्हा परिषद गटदेखील अनु.जमातीकरिता राखीव झाल्याने या गटाचे विद्यमान सदस्य प्रा. अनिल पाटील यांनादेखील राजकीय फटका बसला आहे. ठेंगोडा गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य शैलेश सूर्यवंशी यांचा गट महिला प्रवर्गासाठी खुला झाल्याने माजी जि. प. सभापती संगिता पाटील यांना संधी मिळणार आहे. ब्राह्मणगाव गट हा नागरिकांचा मागस प्रवर्ग महिला प्रवर्गासाठी असल्याने शिवसनेचे सदस्य प्रशांत बच्छाव यांची गैरसोय झाली असली तरीही या ठिकाणी ते त्यांच्या पत्नीला उभे करण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्तशृंग गडावर अपघात; तीस प्रवासी जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

तालुक्यातील सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू असून वातावरणात धुके पसरले आहे. या धुक्यामुळेच शुक्रवारी पहाटे एसटीला अपघात झाला. या अपघातात ३० प्रवासी जखमी झाले. पहाटे पाचच्या सुमारास नांदुरीपासून दोन किमी अंतरावर हा अपघात झाला.

पहाटेच्या वेळी धुके असल्याने बससमोर अचानक एक म्हशीचे पारडू आडवे आले. बस चालकाने ब्रेक दाबले असता मागून येणारी बस पुढच्या बसवर जोरात आदळली. अपघातग्रस्त बस नाशिक जिल्ह्यातील कळवण आगारातील होती. २० जखमींवर वणी येथील ग्रामीण रुग्णालयात तर इतर दहा जखमींवर गडावरील न्यासाच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

जखमींची नावे : संदीप साळवे, गणेश सालवे, सुरज खोतकर, भाऊसाहेब साळवे, मदन साळवे, अमोल घुमरे (सर्व. सोमठाण ता. सिन्नर), राजेंद्र शिंदे, गयाबाई बर्डे, भास्कर बर्डे, मनिषा बर्डे, सौरभ रोकडे, चंद्रकात सांगळे (रा. हिंगेवाडी, ता. सिन्नर) अशोक रोकडे, विलास वाघ, दिलीप रोकडे, लक्ष्मण बागले (अंदानेर, ता. कन्नड) यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा वर्षांनंतर नगरसूलने ओलांडली सरासरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

गेली तीन वर्षे दमदार पावसासाठी आसुसलेल्या येवला तालुक्याला यंदा वरुणराजाने भरभरून दान दिले आहे. पाटपाण्याअभावी कोरडवाहू भाग अशी गणती होणाऱ्या तालुक्याच्या उत्तर-पूर्व पट्ट्यातील नगरसूल, राजापूर, ममदापूर या भागातील बळीराजाच्या झोळीत सर्वाधिक पावसाचं दान पडले आहे. तब्बल दहा वर्षांनंतर वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी ओलांडल्याने नगरसूल परिसराला सुगीचे दिवस येणार आहेत.

गेल्या तीन वर्षात आभाळाकडे आशाळभूतपणे पाहताना मानपाठ एक झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हे मोठे वरदानच म्हणावे लागेल. तालुक्याच्या सर्वदूर यंदा पावसाची हजेरी ही जमेची बाजू म्हंटले जात आहे. यंदाच्या दमदार पावसाने यावेळचा खरिपाचा हंगाम तरारला आहे. तसेच जमिनीतील जलस्रोत वाढल्याने किमान पुढच्या उन्हाळ्यापर्यंतची पाण्याची चिंता देखील मिटली गेली. वार्षिक सरासरी ४८९ मिलीमीटर इतके पर्जन्यमान असलेल्या येवला तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात आजपर्यंत झालेला पाऊस लक्षात घेता महसूलच्या जळगाव नेऊर, येवला व नगरसूल परिमंडळाने वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी ओलांडली आहे. अंदरसूल परिमंडळ वार्षिक सरासरीनजीक पोहचल्यातच जमा आहे. तर, पाटोदा व सावरगाव ही परिमंडळे वार्षिक सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत काहीशी पिछाडीवर असली तरी परतीच्या पावसाचा रागरंग बघता ही पिछाडी भरून निघण्याची शक्यता आहे. तालुक्यातील उत्तर-पूर्व पट्ट्यातील नगरसूल, राजापूर, ममदापूर भागाने ५३४ मिलीमीटर इतक्या पावसाचा पल्ला गाठला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोड विभागात नगरसेवकांत खुशी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोड विभागातील पूर्वीच्या १२ प्रभागांचे रूपांतर आता नव्या प्रभागरचनेनुसार सहा प्रभागांत झाले असून, त्यापैकी एक प्रभाग तीन जागांसाठी झाल्याने नाशिकरोड प्रभागातील एक जागा घटली आहे. विद्यमान नगरसेवकांसह माजी नगरसेवकांनाही या सोडतीमुळे संधी मिळणार असल्याने काहीसे खुशीचे वातावरण आहे.

नवीन प्रभागनिहाय आरक्षणानुसार विद्यमान सर्व नगरसेवकांना पुन्हा उमेदवारीची संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे शुक्रवारी शहरभर कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. नवीन आरक्षणानुसार अनुसूचित जातीसाठी पाच पुरुष, तर महिला प्रवर्गासाठी केवळ एकच जागा मिळाली आहे. ओबीसी प्रवर्गात पुरुषांसाठी केवळ एक, तर महिलांसाठी पाच जागा मिळाल्या आहेत. याशिवाय खुल्या प्रवर्गात पुरुषांसाठी ६, तर महिलांसाठी ५ जागा मिळाल्या आहेत.

भालेराव, घोलपांची संधी हुकली

विद्यमान नगरसेविका ललिता भालेराव यांचा पत्ता कट झाला आहे. त्यांच्या प्रभागाचा समावेश नवीन प्रभाग क्रमांक १७ मध्ये झाला असून, महिला अनुसूचित जातीची जागा आता पुरुषांसाठी राखीव झाली आहे. त्यामुळे या जागेवर त्यांचे पती माजी नगरसेवक संजय भालेराव उमेदवारी करू शकतील. याबरोबरोबरच सध्याच्या प्रभाग क्र. ६० च्या नगरसेविका माजी महापौर नयना घोलप यांचा प्रभाग नवीन प्रभाग क्र. २२ मध्ये समाविष्ट झाला असून, येथील अनुसूचित जाती प्रवर्गाची जागा पुरुष राखीव झाली आहे.

दाणी-मेहरोलिया आमनेसामने

विद्यमान नगरसेविका वैशाली दाणी व कोमल मेहरोलिया यांचे सध्याचे प्रभाग नवीन प्रभाग क्र. २१ मध्ये समाविष्ट झाले असून, आता आगामी निवडणुकीत त्या आमनेसामने उभ्या ठाकलेल्या दिसतील.

या नगरसेवकांची मिटली चिंता

शोभा आवारे, कन्हैया साळवे, वैशाली भागवत, हरीश भडांगे, सूर्यकांत लवटे, केशव पोरजे, सुनीता कोठुळे, रमेश धोंगडे, संगीता गायकवाड, कोमल मेहरोलिया, शिवाजी सहाणे, संभाजी मोरुस्कर, सविता दलवाणी, वैशाली दाणी, सुनील वाघ, मंदा ढिकले, पवन पवार, सुनंदा मोरे, शैलेश ढगे, मंगला आढाव, अशोक सातभाई, रंजना बोराडे.

या माजी नगरसेवकांतही आनंद

सत्यभामा गाडेकर, दिनकर आढाव, अॅड. सुनील बोराडे, अंबादास ताजनपुरे, भारती ताजनपुरे, शिवाजी भागवत, संजय भालेराव, गणेश उन्हवणे, रामदास सदाफुले

पक्षांतर्गत धुसफूस वाढणार?

नवीन प्रभागनिहाय आरक्षणामुळे काही ठिकाणी पक्षांतर्गत धुसफूस रंगणार आहे. काही प्रभागांत सध्या दोन पुरुष अथवा महिला एकाच पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत. मात्र, नवीन आरक्षणात या जागा आता महिला, पुरुषांसाठी एकेरी झाल्याने अशा उमेदवारांची अडचण होणार आहे. नवीन प्रभाग क्र. २२ मध्ये सध्याचा प्रभाग क्र. ६० व ६१ एकत्र झाले असून, या दोन्हीही प्रभागांत शिवसेनेचे पुरुष उमेदवार निवडून आलेले होते. आता मात्र या नवीन प्रभागांत खुल्या प्रवर्गातून पुरुष गटाची एकच जागा झाल्याने येथील केशव पोरजे व सूर्यकांत लवटे या विद्यमान नगरसेवकांची अडचण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पूर्व विभागात साबळेंना फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

पूर्व विभागात बहुतांश विद्यमान नगरसेवकांना प्रभाग आरक्षण सोडतीत फायदा झाला आहे, तर प्रभाग २८ चे विद्यमान नगरसेवक संजय साबळे यांना नवीन प्रभाग क्रमांक १४ मधील मागासवर्गीय राखीव गटात फटका बसला आहे. अनुसूचित जाती महिला करिता हा प्रभाग राखीव झाल्याने आता साबळे यांना सर्वसाधारण गटातून निवडणूक लढवावी लागेल अथवा अन्य राखीव गट असलेला दुसरा प्रभाग शोधावा लागेल.

सलग निवडून येणारे शाहू खैरे, वत्सला खैरे यांचा प्रभाग २७ हा प्रभाग १३ मध्ये विलीन झाला असून, यात त्यांच्या प्रभागाचा बहुतांश भाग आला आहे. त्यामुळे त्यांना नवीन प्रभाग व आरक्षण सोडतीतही फायदाच झाला आहे. प्रभाग २५ चे नगरसेवक विनायक पांडे, माधुरी जाधव यांनाही ही सोडत पथ्यावर पडली आहे. प्रभाग २६ चे नगरसेवक सुफी जीन व समीना मेमन यांना हवे असलेले आरक्षण नवीन प्रभाग १४ मध्ये मनाप्रमाणे मिळाल्याने त्यांची एक प्रकारे लॉटरीच लागली आहे. प्रभाग २९ चे नगरसेवक रंजना पवार व विनायक खैरे यांनाही प्रभाग १४ मधील आरक्षणात फायदा झाला आहे. विनायक खैरे यांना अनुकूल असलेले नवीन प्रभाग १३ व १४ दोन्ही पर्याय मिळाले आहेत. प्रभाग ३९ चे नगरसेवक गुलजार कोकणी यांना काहीसा फटका बसलेला आहे. त्यांच्या प्रभागातील व्होट बँक असलेला भाग प्रभाग १४ मध्ये समाविष्ट झाला आहे. मात्र, त्यांच्याकडे १४ व १५ या प्रभागांचा पर्याय उपलब्ध आहे. प्रभाग ३० चे नगरसेवक सचिन मराठे, अर्चना थोरात, प्रभाग ३३ चे नगरसेवक मेघा साळवे, राहुल दिवे, प्रभाग ३७ चे नगरसेवक सुमन ओहोळ, कुणाल वाघ, प्रभाग ३८ चे सतीश कुलकर्णी, नीलिमा आमले, ५३ चे नगरसेवक अर्चना जाधव, सतीश सोनावणे, प्रभाग ५४ चे नगरसेवक संजय चव्हाण व रशिदा शेख यांना नवीन प्रभागरचनेत फायदा होत नवीन पर्याय उपलब्ध झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभागरचना भाजपच्या पथ्यावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

प्रथमदर्शनी प्रभागरचना भाजपच्या पथ्यावर पडल्याचे दिसत आहे. अनेक दिग्गजांना धोबीपछाड देण्यासाठी कुठल्या सीमा कुठे जोडून प्रभागरचना झाल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रभागरचनेवर भाजपचाच वरचष्मा दिसून येत आहे.

राष्ट्रीय महामार्ग निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे क्रॉस करता येत नाही. मात्र, प्रभाग क्रमांक २ व ३ या दोन्ही प्रभागांचे सूत्र बाजूला ठेवून प्रभागरचना झाली आहे, तसेच प्रभाग ४ हासुद्धा निवडणुकीच्या मैदानात काही उमेदवारांना बाजूला ठेवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने तयार केल्याचे दिसून येते. पंचवटीत आरक्षण सोडतीमध्ये जाणूनबुजून महिलांचे वर्चस्व ठेवण्यामध्ये भाजप अध्यक्षांना यश आल्याचे दिसून येते. त्यामुळे नाशिक शहराच्या महापालिका निवडणुका यासुद्धा मुंबई महापालिकेच्या धर्तीवर प्रभागरचना फुटल्याचा दावा शिवसेना नेते व माजी नगरसेवक भगवान भोगे यांनी यापूर्वीच केला होता. तो आजच्या प्रभागरचना व सोडतीमध्ये खरा झाला आहे, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू होती.

प्रभाग क्रमांक २ मध्ये आडगाव, नांदूर, मानूर ही पारंपरिक गावे जोडली गेली आहेत. या प्रभागात खुल्या वर्गाची लोकसंख्या अधिक असूनदेखील केवळ एक जागा महिलांसाठी खुली ठेवण्यात आली आहे. बाकी सर्व जागा आरक्षित आहेत, म्हणजेच एसटी पुरुष, एससी महिला, ओबीसी पुरुष यांना राखीव आहे. त्यामुळे येथील अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.
प्रभाग ३ मध्ये अनुसूचित जमातीची जागा असणे अपेक्षित होते. मात्र, तेथेही अनुसूचित जमातीला डावलले गेले. त्यामुळे आताच्या नगरसेविका असलेल्या ज्योती गांगुर्डे यांना पतीच्या निधनाने सहानुभूती मिळण्याची चर्चा होती; पण त्यांनाही बाजूला ठेवण्यात आले व त्या ठिकाणी दोन जागा महिलांसाठी खुल्या प्रवर्गातून, एक जागा ओबीसी पुरुष, एक जागा पुरुष खुल्या वर्गासाठी राखीव आहे. भाजपचे आमदार व शहराध्यक्षांनी आपल्या मुलाची सोय करण्यासाठी इतरांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे, अशी चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोत प्रस्थापित नगरसेवकांना धक्‍का

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

प्रभागरचना व आरक्षण जाहीर झाल्यानंतर सिडकोतील चार प्रस्थापितांना चांगलाच धक्‍का बसला आहे, तर उर्वरित नगरसेवक मात्र झालेल्या रचनेवर समाधान व्यक्‍त करीत आहेत.

सिडकोतील नगरसेवक लक्ष्मण जायभावे, डी. जी. सूर्यवंशी यांना प्रभागरचना व सोडतीचा चांगलाच धक्‍का बसल्याचे दिसून येत आहे. सिडकोतील चार नगरसेवकांव्यतिरिक्‍त अन्य नगरसेवकांची प्रभागरचना ही समाधानकारक असल्याचे बोलले जात आहे. नवीन प्रभागरचनेमुळे प्रभागाचे भौगोलिक क्षेत्र वाढल्याने इच्छुकांसह विद्यमान नगरसेवकांना आता निवडणूक लढण्याचे टेन्शनच आल्याचे दिसून येत आहे.

नगरसेवक जायभावे यांच्या प्रभागाला सातपूरचा काही भाग जोडला गेला आहे. सिडकोत सध्या २२ नगरसेवक असून, आता ती संख्या २४ वर जाणार आहे. त्यामुळे सिडकोला दोन नगरसेवक अधिक मिळणार आहेत. आज नव्याने जाहीर झालेल्या रचना व आरक्षणामुळे निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात होणार असल्याचे दिसत आहे. विद्यमान नगरसेवकांबरोबरच इच्छुकांनीही आतापासून निवडणुकीची व्यूहरचना करण्यास सुरुवात केली आहे. चार उमेदवारांचे पॅनल असल्यामुळे व आरक्षणाचा विचार करून कोण कोण उमेदवार आपल्यासोबत असणार, याबाबतच्या चर्चांनाही सिडको परिसरात उधाण आले होते. काही इच्छुकांनी तर थेट प्रभागरचना, त्यांचा समावेश असलेल्या परिसराचा नकाशा तयार करून सोशल मीडियावर प्रचारही सुरू केल्याचे दिसत होते. त्याचबरोबर कोण, कोणत्या प्रभागातून लढणार, याची घोषणासुद्धा सेाशल मीडियावर केल्याचे दिसत होते. एकूणच सिडकोतील राजकीय घडामोडींना जोर येणार असून, अनेक जणांनी तर ही आरक्षण व रचना जाहीर झाल्यानंतर पक्षांतराच्याही निर्णयाबाबत विचारविनिमय सुरू केल्याचे जाणवू लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटीतील दोन प्रभागांत राखीव जागाच नाही

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पंचवटी विभागातील प्रभाग तीन आणि पाचमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना संधीच राहिली नाही, तसेच प्रभाग दोनमध्ये सर्वसाधारण गटासाठी जागाच मिळालेली नाही. प्रभाग चारमध्ये सर्वाधिक झोपडपट्ट्यांचा समावेश झालेला आहे. डॉ. विशाल घोलप यांना संधीच राहिली नाही तर गणेश चव्हाण आणि परशराम वाघेरे यांना दुसऱ्या प्रभागाचा पर्याय शोधण्याची वेळ आली आहे. हे अपवाद वगळता बहुतांश आजी-माजी नगरसेवकांना निवडणूक लढविण्याची संधी मिळणार आहे.

सोडत निघताच आजी-माजी नगरसेवक तयारीला लागले आहेत. त्यांना निवडणूक लढविण्याची संधी या रचनेत आणि आरक्षण सोडतीमुळे शक्य वाटू लागली आहे. सोडतीनंतर इच्छुकांनी प्रभागातील इतर सदस्यांची शोधाशोध करण्यास सुरुवात केली आहे.

प्रभाग एकमध्ये अनुसूचित जमातीची जागा महिला राखीव झाल्याने रंजना भानसी यांचा मार्ग सोपा झाला आहे. मात्र, गणेश चव्हाण यांना संधीच राहिली नसल्याने त्यांना पर्याय शोधण्याची वेळ आली आहे. सर्वसाधारण महिला जागा नसल्याने शालिनी पवार यांच्याऐवजी सर्वसाधारणसाठी असलेल्या जागेवर माजी नगरसेवक अरुण पवार यांना संधी मिळणार आहे.

प्रभाग दोनमध्ये आडगाव, नांदूर, मानूर या तीन गावांचा समावेश झाला आहे. या प्रभागात सर्वसाधारण गटाला जागाच शिल्लक नसल्याने इतर मागास प्रवर्गाच्या इच्छुकांची संधी वाढल्या आहेत. उद्धव निमसे, सुनीता निमसे, मीना माळोदे या विद्यमानांसह अॅड. जे. टी. शिंदे, अनंत सूर्यवंशी, शिवाजी निमसे या माजी नगरसेवकांना संधी आहे. नव्याने इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे.

प्रभाग तीनमध्ये जाती-जमातीसाठी राखीव जागाच राहिली नाही. सुनीता शिंदे या इतर मागासवर्ग प्रवर्गातून निवडणूक लढल्या होत्या. त्यांना आता सर्वसाधारण महिला जागेवर लढावे लागेल. आमदार बाळासाहेब सानप यांचा बालेकिल्ला असलेल्या या भागात त्यांच्या कुटुंबीयांमधील कुणाची वर्णी लावली जाते, याकडे लक्ष लागून राहिले आहे. रुची कुंभारकर, समाधान जाधव यांना संधी आहे.

झोपडपट्टीचा समावेश असलेल्या प्रभाग चारमधून कविता कर्डक यांना संधी आहे. अनुसूचित जाती महिलासाठी राखीव झाल्याने डॉ. विशाल घोलप यांना संधीच राहिली नाही. अनुसूचित जमाती महिला राखीव झाल्यामुळे प्रा. परशराम वाघेरे यांनाही पर्याय शोधावा लागेल.

प्रभाग पाचमध्ये अनुसूचित जाती व जमातीसाठी जागाच नसल्याने मागासवर्ग- प्रवर्ग, महिला आणि सर्वसाधारण जागांसाठी उमेदवारांची संख्या प्रचंड वाढलेली असणार आहे. येथे उपमहापौर गुरुमित बग्गा, विमल पाटील, लता टिळे, राहुल ढिकले, फुलावती बोडके यांच्यासह माजी नगरसेवक कमलेश बोडके, जयश्री धनवटे, उल्हास धनवटे, हरिभाऊ लासुरे यांना संधी आहे.

मखमलाबादला रामवाडी आदी परिसर जोडलेला प्रभाग सहामधून महापौर अशोक मुर्तडक, मनीषा हेकरे, सिंधू खोडे, दामोदर मानकर यांच्यासह माजी नगरसेवक संजय बागूल यांनाही संधी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातपूरमध्ये कहीं खुशी कहीं गम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत शुक्रवारी जाहीर करण्यात आली. सातपूर भागात सोडण्यात आलेल्या आरक्षणात कहीं खुशी कहीं गम अशीच काहीशी परिस्थिती आहे. चार टर्म नगरसेवक झालेले प्रकाश लोंढे यांच्या प्रभागात पुरुष गटात अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग असे आरक्षण पडल्याने त्यांना दुसरा प्रभाग शोधावा लागणार आहे, तर दुसरीकडे स्थायी समिती सभापती सलीम शेख यांचाही प्रभाग विभागला गेला आहे.

पहिल्यांदाच सिडकोतील शिवशक्ती चौक, खुटवडनगर, डीजीपीनगर २ व प्रभाग ४८ चा भाग हा चुंचाळे गावाला जोडण्यात आला आहे. गेल्यावेळी सातपूर गावाला तीन प्रभागांत जोडले गेले होते. मात्र, आता गाव एकाच प्रभागात ठेवण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नगरसेवक दिनकर पाटील यांचा प्रभाग त्यांच्या मनाप्रमाणे झाला आहे. महापालिकेचा समावेश असलेल्या सातपूर प्रभागात प्रभाग क्रमांक ८, ९, १०, ११ व २६ या प्रभागांचा समावेश आहे.

दरम्यान, आरक्षण सोडत जाहीर करण्याकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागून होते. नगरसेवक लोंढे यांना त्यांचा बालेकिल्ला सोडून उभे राहावे लागणार आहे, तर प्रभाग ११ मध्ये पुरुष ओबीसी राखीव झाल्याने राजवाड्यातील काळे परिवारातील पुरुषांनादेखील दुसरा प्रभाग शोधण्याची वेळ येणार आहे. विद्यमान नगरसेवक असलेले विलास शिंदे, विक्रांत मते, रेखा बेंडकुळे, उषा आहिरे, दिनकर पाटील, लता पाटील, सुरेखा नागरे, सविता काळे, शशिकांत जाधव यांचे प्रभाग सोयीचे झाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. मात्र, स्थायी समितीचे सभापती शेख, नगरसेविका उषा शेळके, सचिन भोर व नंदिनी जाधव यांचे प्रभाग तोडले गेले आहेत. त्यातच चारचा प्रभाग झाल्याने सर्वच पक्षांना नगरसेवक म्हणून निवडून येण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार हे मात्र निश्चित.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>