म. टा. वृत्तसेवा, कळवण
कळवण तालुक्यातील हिंगळवाडी ग्रुपग्रामपंचायतमधील जुने उतारे व नमुने गहाळ झाल्यामुळे नागरिकांना मोठी अडचणी निर्माण झाली आहे. तत्काळ या प्रकारची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कळवण तालुक्यातील वाडी बु. ग्रामपंचायत अंतर्गत असोली, एकलहरे गाव येत असून, जुने उतारे नोंदी नसल्याचे आढळून आले आहे. फक्त २०१० पासून कागदपत्रे असल्याची खातरजमा झाली आहे. पंरतु, त्यामागील कागदपत्रे नाही, असे संबंधित कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. ही बाब गांभीर्याची बनली आहे. जुने कागदपत्र मिळत नसल्याने नागरिकांची कामे खोळंबली असून, याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्मण झाला आहे.
रामदास देवरे, असोली यांनी ग्रामपंचायतीकडे १९८१ चे उतारे मागितले. पंरतु, ग्रामसेवक यांनी आपल्याकडे मागील काहीच उतारे नसल्याचे सांगितले. मग मागील कागदपत्रे गेली कुठे हा संशोधनाचा विषय बनला आहे. मागील दप्तर गहाळ झाले, तर नवीन दप्तर का केले नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. दप्तर गाळ झाले तर त्याचा पंचनामा का करण्यात आला नाही असा सवाल उपस्थित झाला आहे. याबाबत गटविकास अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
ग्रामपंचायतीच्या कागदपत्रांची देखरेख करण्याचे काम ग्रामसेवकाचे असते. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम गटविकास अधिकाऱ्याचे असते. परंतु, येथे कोणाचे काही घेणे देणे नसल्याचे दिसून आले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ग्रामपंचायतीचे कागदपत्रे गहाळ किंवा नष्ट झाली आहेत, तर नवीन कागदपत्रे का केली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधितांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
कोट
वाडी बु. ग्रामपंचायतीच्या मागील दप्तरचा शोध घेऊन दप्तर मिळाले नाही तर, दप्तराबाबत चौकशी करून दोषींवर कडक करावी करण्यात येईल.
- तुकाराम सोनवणे, गटविकास अधिकारी
आक्टोबर २०१० पासून येथे हजर झालो त्या वेळी मला दप्तर व नमुने उपलब्ध झाले नसल्यामुळे याबाबत ग्रामपंचायतीत ठरावही करण्यात आला आहे.
- रवींद्र ठाकरे, ग्रामसेवक
दप्तर मिळत नसल्यामुळे शासनाच्या कामात नागरिकांना अडथळा निर्माण झाला आहे. दप्तर तत्काळ उपलब्ध करून द्यावे. मागील दप्तर आले नाहीतर ग्रामपंचायतीला टाळे लावले जाईल.
- रामदास देवरे, नागरिक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट