Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

त्र्यंबक नगरपरिषदेकडून गाळे सील

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

नगरपरिषद वसुली विभागाने थकबाकी असलेल्या व्यावसायिक गाळ्यांना सिल करण्याच्या धडक मोहीमेस प्रारंभ केला. यामध्ये नगरपरिषदेच्या भाजी मंडई, बसस्थानकाच्या समोरचा परिसर आणि पंचायत समिती आवाराच्या लगत असलेल्या व्यावसायिक गाळेधारकांनी लाखोंची थकबाकी वारंवार नोटीस बाजावूनदेखील भरलेली नाही. त्यामुळे मंगळवारी (दि. १६) मुख्याधिकारी डॉ. चेतना केरूरे, अभियंता कांगणे, कर निरीक्षक मंगेश सोनार, सहायक अधिकारी प्रशांत पोतदार यांनी पोलिस पथकाची मदत घेऊन ठोस कारवाई केली. यामध्ये काही व्यावसायिकांनी ७५ टक्केपर्यंत थकबाकी भरल्याने त्यांना वगळण्यात आले. या कारवाईच्या दरम्यान काही गाळे अनाधिकृत वापर होत असल्याचे आढळले तर काही ठिकाणी गाळाधारक वेगळीच व्यक्ती असून परस्पर पोटभाडेकरू म्हणून गाळा वापरात असल्याचे आढळून आले. हे गाळेही सील करण्यात आले असून परस्पर पोटभाडेकरू असेल तेथे कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगि‌तले.

शहरात विविध ठिकाणी व्यापारी संकुल आहेत. त्याठिकाणी साधरणत: प्रती गाळा ७०० ते ३००० रुपयांच्या दरम्यान जागा आणि लिलावाप्रमाणे मासिक भाडे आकारले जाते. यात काही गाळेधारकांनी गाळ्यांना खासगीत दहा हजारांपर्यंत भाडे आकारुन कमाईचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे या गाळ्यांचा नव्याने लिलाव करून सुधारित भाडे आकारणार असल्याचे प्रशासनाने ठरविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेती, पाण्याचा प्रश्न मिटणार

$
0
0

राज्यमंत्री दादा भुसे यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तळवाडे साठवण बंधाऱ्याचे विस्तारीकरणामुळे साठवण तलावाची क्षमता ८७ दशलक्ष घनफूट होणार आहे. यामुळे चणकापूर धरणातील पाण्याची बचत होणार असून बचत झालेले पाणी कालवा व नदीद्वारे सिंचनासाठी दिले जाणार असल्याने त्याचा फायदा शेती, व्यवसायाला होणार आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

मालेगाव येथील महानगरपालिकेस पिण्याच्या पाणीपुरवठा करणाऱ्या तळवाडे साठवण बंधाऱ्याच्या विस्तारीकरण कामाचा शुभारंभ ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मालेगाव आमदार आसिक शेख, मनपा महापौर हाजी मो. इब्राहिम, स्थायी सभापती एलाज बेग, अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, तहसीलदार डॉ. सुरेश कोळी, नगरसेवक, ग्रामस्थ उपस्थित होते. हा प्रकल्प मार्गी लागत असून तालुका व शहराच्या पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याची काळजी दूर होणार असल्याचेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तालुका दर्जासाठी आंदोलन

$
0
0

मनमाड बचाव कृती समितीकडून उपोषण; शहरवासीयांचा पाठिंबा

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

वर्षानुवर्षे मनमाड शहर विकासापासून वंचित असून मनमाड शहराला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा तसेच नांदगाव तहसीलचे विभाजन करून मनमाड शहराला अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्यात यावे या मागण्यांसाठी मनमाड बचाव कृती समितीने आंदोलन तीव्र केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेले हे आंदोलन आता तीव्र झाले असून बुधवारी (दि. १७) अद्वय हिरे यांनीही याला पाठिंबा दर्शविला आहे. प्रशासनाने लवकर निर्णय घ्यावा असे आवाहन आंदोलनकर्त्यांनी केले आहे.

मनमाड शहराला तालुक्याचा दर्जा मिळावा यासाठी मंगळवारपासून सुरू झालेल्या या उपोषणात समितीचे भीमराज लोखंडे, पोपट शेठ बेदमुथा, दादा बंब, महेंद्र गरुड, विष्णू चव्हाण, कैलास शिंदे यांचा समावेश आहे.

शहरात अप्पर तहसील कार्यालय सुरू करावे, मनमाड पालिकेतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी यासारख्या मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. शहराला विकासापासून दूर सारल्याने आता शहराला सरकारने न्याय द्यावा, अशी आर्त हाकही यावेळी देण्यात आली. आपल्या मागण्यांवर उपोषणकर्ते ठाम असून 'आता केवळ आश्वासन नको तर आता ठोस कृती हवी' अशी भूमिका मनमाड बचाव कृती समितीने घेतली आहे. समितीचे प्रमुख संयोजक अशोक परदेशी यांनी या प्रश्नी समिती आता आरपारची लढाई लढणार असल्याचे सांगितले. प्रशासनाकडून प्रांताधिकारी वासंती माळी, नांदगावच्या तहसीलदार रचना पवार, पोलिस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी भेटी देत उपोषणकर्त्यांची मनधरणीचा प्रयत्न केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थेट भाजीपाला विक्रीला महापालिकेचा अडथळा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी राज्य सरकारचे धोरण असले, तरी महापालिकेला मात्र त्यात रस नसल्याची बाब पुढे आली आहे. आतापर्यंत कृषी विभाग, पणन मंडळ व 'आत्मा' यांच्या अनेक बैठका झाल्या. पण महापालिकेने त्यात कोणतेही औत्सुक्य दाखविलेले नाही. कृषी विभागाने भाजी विक्रीसाठी नाशिक शहरात एकूण १७ जागा मागितल्या असल्या, तरी महापालिकेने केवळ एका जागेचे औदार्य दाखविले आहे. परिणामी, नाशिककरांना थेट भाजीपाला मिळण्यात अडचणी निर्माणझाल्या आहेत.

शेतकरी व ग्राहक थेट जोडले जावे व मध्यस्थ व्यापारी त्यात असू नये या हेतूने सरकारने ही योजना सुरू केली. या योजनेत शेतकऱ्यांना थेट मोबदला तर ग्राहकांना कमी दरात शेतमाल मिळणार असताना मनपाने त्यात डिव्हायडर टाकले आहे. कृषी व पणन मंडळाने मनपाकडे मागितलेल्या जागा या संपूर्ण शहरातील ग्राहकांना फायदा देणाऱ्या असल्या तरी महानगरपालिकेने मात्र जागा न दिल्यामुळे स्वस्त शेतीमालापासून नाशिककरही मुकले आहेत.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नाशिकमध्ये महाराष्ट्र शासन, कृषी पणन मंडळ, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त प्रयत्नातून गंगापूर रोडवरील मॉडर्न चौक व डॉ. भाभानगर येथील नवशक्ती चौक येथे ही दोन विक्री केंद्रे सुरू करण्यात आली. त्यात एक केंद्र मनपाच्या जागेत असले तरी दुसरे केंद्र मात्र खासगी जागा भाड्याने घेवून सुरू करण्यात आले आहे. काठे गल्लीतील केंद्र सहा महिन्यांपूर्वीच सुरू करण्यात आले आहे. या सर्व केंद्रांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. पण यासारखी केंद्रे शहरभर सुरू झाली, तर त्यातून अधिक ग्राहकांपर्यंत हा शेतमाल थेट पोहचणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिदुर्मिळ वनस्पतींना संजीवनीसाठी पुढाकार

$
0
0

सौरभ झेंडे, कॉलेज क्लब रिपोर्टर

जैवविविधतेत वनस्पती, प्राणी आणि मानव यांची नैसर्गिक साखळी अतिशय महत्त्वाची मानली जाते. या साखळीतला प्रत्येक घटक कुठल्या ना कुठल्या कारणाने एकमेकांशी निगडित आहे. पण, सद्यःस्थितीत वनस्पतींच्या काही प्रजाती अतिदुर्मिळ त्याचप्रमाणे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचा जैवविविधतेवर परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे अशा वनस्पतींना संजीवनी देण्यासाठी व्ही. एन. नाईक कॉलेजने पुढाकार घेतला आहे.

जैवविविधता हा विषय फक्त पुस्तकांपुरता मर्यादित न ठेवता त्यासाठी काही प्रयत्न करावयास हवेत, या उद्देशाने दुर्मिळ आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या वनस्पतींचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी कॉलेजच्या बॉटनी विभागाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी इको क्लब अंतर्गत सर्वे ऑफ रेअर मेडिसिनल प्लांट्स अराउंड नाशिक हा उपक्रम हाती घेतला असून, या उपक्रमात दुर्मिळ आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या औषधी, त्याचप्रमाणे अन्य वनस्पतींचे प्रोपोगेटिंग पार्टस कलेक्ट करून त्यांचे कल्टिवेशन करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. अंजनेरी, तोरंगण, त्र्यंबकेश्वर व इगतपुरी भागात नामशेष होत चाललेल्या वनस्पतींच्या काही दुर्मिळ प्रजाती आढळून येतात. एन्डेजर्ड म्हणजे संपुष्टात येणाऱ्या या वनस्पतींचे प्रोपोगेटिंग पार्टस, त्यात त्यांची बियाणे, ट्यूबर्स, कंद कलेक्ट करून कॉलेजच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये त्यांचे कल्टिवेशन करून जगवण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुर्मिळ वनस्पतींच्या यादीत बऱ्याच अशा वनस्पती आहेत ज्या आजच्या असंख्य आजारांवर उपयुक्त आहेत. परंतु, नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने त्या खूप दुर्मिळ स्वरूपात आढळतात. या कारणांमुळे त्यांचा उपयोग होऊ शकत नाही. जर या वनस्पती नवीन ठिकाणी कल्टिवेट करून जगवता आल्या, तर नक्कीच याचा जैवविविधता संवर्धनासाठी फायदा होईल, असे व्ही. एन. नाईक कॉलेजच्या बॉटनी विभागाचे प्रमुख प्रा. एच. पी. शिंदे यांनी सांगितले. कॉलेजच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये प्रथमतः हा उपक्रम राबवण्याचा निर्णय झाला. यावेळी नाशिकजवळील भागांतून काही वनस्पतींचे प्रोपोगेटिंग पार्टस कलेक्ट करून कल्टिवेशन केले गेले. त्यात क्लोरोफायटम बोरिविलियम (सफेद मुसळी), सेरोपेजिया सह्याद्रिका (कंदीलपुष्प), डायोस्कोरिआ बल्बिफेरा (डुक्कर कंद), ग्लोरिसा सुपर्बा (कळलावी), सेरोपेजिया हिरसूटा (हमिल) या वनस्पतींचा समावेश आहे. जैवविविधता टिकवण्यासाठी त्यातील घटकांचे संवर्धन महत्त्वाचे आहे. त्यासाठी कॉलेजच्या वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. याद्वारे विद्यार्थ्यांना दुर्मिळ वनस्पतींमधील विविधतेचा अभ्यास तर होतोच, परंतु एकंदरीत वनस्पतींमधील जैवविविधता टिकविण्याच्या दृष्टीने हातभार लागेल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे. या उपक्रमास कॉलेजचे प्राचार्य.

डॉ. व्ही. जी. वाघ आणि उपप्राचार्य डॉ. डी. बी. गोस्वामी यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

दुर्मिळ व नामशेष होणाऱ्या वनस्पतींचे प्रोपोगेटिंग पार्टस कलेक्ट करून जर त्यांचे कल्टिवेशन करून त्या जगत असतील, तर ही नक्कीच चांगली बाब आहे. आमच्या कॉलेजच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये काही अशाच वनस्पतींचे जतन व संवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहेत.

-प्रा. एच. पी. शिंदे

अशा अनेक वनस्पती आहेत ज्या गंभीर आजारांवर उपयुक्त आहेत. परंतु, नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने त्यांचा उपयोग होऊ शकत नाही. कल्टिवेशन करून त्या जगवता आल्या, तर नक्कीच जैवविविधतेला याचा फायदा होईल आणि उपयुक्त वनस्पती वापरातदेखील येतील.

-प्रा. एम. पी. सांगळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लग्नाचे आमिष दाखवून पळवून आणलेल्या महिलेवर एकाने वेळोवेळी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून संदीप (पूर्ण नाव व पत्ता नाही) नामक तरुणाविरुद्ध भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव (जि. जळगाव) येथील २४ वर्षीय महिलेशी ओळख वाढवून संशयिताने हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी (१४ ऑगस्ट) संशयिताने चाळीसगाव येथे जाऊन त्या महिलेची भेट घेतली. तसेच लग्नाचे आमिष दाखवून तिला नाशिकला पळवून आणले. रात्री भद्रकालीतील पिंपळ चौक भागातील लॉजवर व दुसऱ्या दिवशी मनमाड येथील सुखसागर लॉज येथे बलात्कार केला. त्यानंतर महिलेस सोडून त्याने पोबारा केल्याने महिलेने पोलिसांत धाव घेतली असून याप्रकरणी भद्रकाली पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला उपनिरीक्षक जाधव याचा अधिक तपास करीत आहेत.

एकाला अटक
धारदार चाकू बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी उंटवाडी रोडवर एकास अटक केली आहे. दिनेश भटू चौधरी (वय २९, रा. दंडेवाला बाबानगर, मोहाडी, धुळे) असे संशयिताचे नाव असून तो बुधवारी दुपारी उंटवाडी येथील मुलांच्या निरीक्षणगृह परिसरात संशयास्पद फिरताना आढळला. पोलिसांनी त्याची चौकशी करीत अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे धारदार चाकू मिळाला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांत शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुगार अड्डे उद्ध्वस्त
गंगापूर पोल‌िस ठाण्याच्या हद्द‌ीतील संत कबीरनगर परिसरात जुगार अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, संत कबीरनगरमधील साई मंदिरासमोर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर बुधवारी (१७ ऑगस्ट) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास छापा टाकला. त्यावेळी संशयित विलास बुधाजी गायकवाड (वय २८, रा. संत कबीरनगर) व तीन साथीदार हे ५२ पत्त्यांच्या कॅटवर जुगार खेळताना आढळले. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेत ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुप्त माहिती मिळाल्यानुसार पोलिसांनी, दत्त चौकातील मटण मार्केटच्या भिंतीलगत सुरू असलेल्या कल्याण मटका व मेन स्वरलाइन नावाच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी संशयित किशोर प्रभाकर खेले (वय २५), सुभाष अशोक मुर्तडक (वय २७) हे मटका आकडा जुगार खेळताना मिळाले. त्यांना ताब्यात घेऊन अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रक्षाबंधनाने गहिवरले २००० लष्करी जवान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिन्नर फाटा

देशरक्षणाच्या कर्तव्यासाठी आपल्या कुटुंबीयांपासून कोसो दूर असणाऱ्या आर्टिलरी सेंटर येथे कार्यरत दोन हजार लष्करी जवानांना राखी बांधून मराठा सेवा संघप्रणीत जिजाऊ ब्रिगेडच्या महिला सदस्यांनी रक्षाबंधन साजरे केले. याप्रसंगी आपल्या सख्ख्या बहिणींची उणीव या बहिणींनी भरून काढल्याने उपस्थित अनेक जवानांना गहिवरून आले.

आर्टिलरी सेंटरमधील ड्रील मैदानावर हा भावाबहिणीच्या अतूट नात्याचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी देशाच्या विविध प्रांतांतून येथे लष्करी प्रशिक्षणासाठी आलेल्या जवानांच्या मनगटावर जिजाऊ ब्रिगेडच्या माहिला सदस्यांनी राखी बांधून त्यांचे औक्षण केले व निरोगी दीर्घायुष्याची ईश्वराकडे प्रार्थना केली. याप्रसंगी लेप्टनंट कर्नल हिमांशू पांडे, सुभेदार मेजर युर्मिदास आदी लष्करी अधिकारी उपस्थित होते.

माजी नगरसेविका डॉ. हेमलता पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा माधुरी भदाणे, प्रदेश महासचिव सुनंदा जरांडे, उषा पाटील, मीरा निसाळ, मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष दपक भदाणे, सचिव उदय बोरसे, उद्योजक विशाल देसले आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंदीजनांनी अनुभवली बहिणीची माया

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावातील नातेसंबंधांची वीण अधिक घट्ट करणारा सण. मात्र, असे काही समाजघटक असतात की, त्यांना या नात्याचे प्रेम मिळत नाही. बंदीजन हा त्यापैकीच एक घटक. आपल्या हातून काहीतरी चुकीचे घडल्यावर कारागृहात असलेल्या बंदीजनांना बहिणीची कमतरता जाणवू नये यासाठी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने कम्युनिटी हेल्थ फाउंडेशन व डब्ल्यूओडब्ल्यू संघटनेतर्फे मध्यवर्ती कारागृहात भावुक वातावरणात रक्षाबंधन साजरे करण्यात आले. कारागृह अधीक्षक रमेश कांबळे यांच्या सहकार्याने हा विशेष सोहळा झाला.

महिलांनी बंदीजनांना राख्या बांधून या नात्याला उजाळा दिला. काही कैद्यांना यावेळी गहिवरून आले. या मानलेल्या भावांनी आपल्या वर्तनात सुधारणा करावी, ही ओवाळणी अनेक बहिणींनी मागितली गेली. कम्युनिटी हेल्थ फाउंडेशनच्या अश्विनी न्याहारकर म्हणाल्या की, आज विविध संधी उपलब्ध असताना वाईट घटना टाळता येऊ शकतात. गतकाळातील वाईट गोष्टी व कटू आठवणी मागे टाकून बंदीजनांनी नव्या दमाने व नव्या जोमाने आयुष्याला प्रारंभ करावा. या आगळ्यावेगळ्या सामाजिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल महिलांचे विशेष कौतुक करण्यात आले.

यावेळी मेघा मराठे, कामिनी तनपुरे, संगीता गायकवाड, जया आढाव, अश्विनी निकम, स्नेहा वर्मा, सीमा पाटील, प्रतिभा पाटील, नूतन पाटील, अरुणा पाटील आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अश्विनी

न्याहारकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.

---

विविध संस्थांनीही घेतला पुढाकार

नाशिकरोड ः मध्यवर्ती कारागृहात शहरातील विविध संस्थांतर्फेदेखील रक्षाबंधन साजरे करण्यात आले. रेणुका महिला औद्यागिक सहकारी संस्थेतर्फे बंदीजनांचे औक्षण करून राखी बांधण्यात आली. यावेळी महिला आघाडी अध्यक्षा मंदा फड, जिजाबाई जाधव, सुनीता जाधव, कल्पना पोटिंदे, कांचन चव्हाण, शिवानी जाधव, दीपाली कुलथे, सुदाम निकम आदी उपस्थित होते. नाशिक सोशल सर्व्हिस सोसायटीतर्फे देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. संस्थेचे फादर आल्वीन व इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. त्यांनी दोनशे बंदीजनांना राख्या बांधल्या. झेप बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सुनीता निमसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दीडशे बंदीजनांना राख्या बांधल्या. नाशिकरोडच्या सॅव्ही कालेज आणि युवा मंचतर्फे रक्षाबंधन झाले. संचालिका श्रुती भुतडा, युवा मंचच्या अध्यक्षा स्मिता बोरा आदी उपस्थित होते. त्यांनीही बंदीजनांना राख्या बांधल्या. गोविंदा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त राजेंद्र तिवारी यांच्या उपस्थितीत दीडशे बंदीजनांना राख्या बांधण्यात आल्या. कारागृह अधीक्षक रमेश कांबळे, उपअधीक्षक वैभव आगे, प्रमोद वाघ, वरिष्ठ तुरुंगाधिकारी कैलास भवर, एस. एस. कुंवर, जी. ए. मानकर, श्रीमती एन. वाय. गुजराथी, बी. एन. मुलाणी, तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थिती होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुन्हेगारांचे नातेवाईकही पोलिसांच्या रडारवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता विविध गुन्हेगारांचे नातेवाईकही पोलिसांच्या रडारवर आहेत. गुन्हेगारांच्या नांग्या ठेचण्यासाठीच पोलिसांनी ही नामी युक्ती शोधली असून, यामुळे गुन्हेगारांना वेसण घालतानाच इतरांमध्येही त्याची जरब बसविण्याचा पोलिसांचा हेतू आहे.
शहारातील राजकीय व्यक्तींचे विविध गुन्ह्यांशी असलेले संबंध लक्षात घेत पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. त्यानंतर आता गुन्हेगारांच्या नातेवाईकांकडे पोलिसांनी रोख वळविला आहे. गुन्हेगारांची पाठराखण करण्यासाठी थेट पोलिस ठाण्यापर्यंत धाव घेणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांवरच कारवाई करण्याच्या हेतूने पोलिसांनी पावले टाकली आहेत. मुंबई पोलिस अॅक्टचे कलम १२० प्रमाणे पोलिस थेट संबधित गोतावळ्यास अटक करून न्यायालयात हजर करीत असल्याने गुन्हेगारांच्या साथीदारांचे धाबे दणाणले आहेत. नुकत्याच एका कारवाईत पोलिसांनी दहा जणांना अटक केली असता न्यायालयाने त्यांना समज देवून कोर्टात हजेरी लावण्याचा हुकूम केला आहे. दरम्यान या गुन्ह्यात सुमारे ५ हजार रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद असल्याने त्याचा चांगलाच प्रभाव पडण्याची चिन्हे आहेत.
सरकारवाडा पोलिसांनी मतेश जडगुले, पवन आहिरे व सचिन गांगुर्डे या संशय‌ितांना गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी अटक केली होती. त्यामुळे बुधवारी सरकारवाडा पोलिस ठाण्यात संशय‌ितांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीच्या पाश्वभूमीवर वरिष्ठांच्या आदेशान्वये विनाकारण पोलिस ठाणे आवारात संशयास्पदरित्या वावर ठेवल्याने दहा जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत संशयीतांना अटक करून थेट न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने समज देवून कोर्टात हजेरी लावण्याचा हुकूम केला. यामुळे गुन्हेगारांबरोबरच त्यांच्या समर्थकांचे तसेच त्यांच्या आसपास राहणाऱ्यांचेही धाबे दणाणले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्याचा पाठपुरावा करणारे ‘डेटिंग विथ रेन’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सत्याला कितीही नाकारले तरी ते पाठपुरावा सोडत नाही. सत्याला सामोरे जाण्याची प्रबळ इच्छा असणारा एक पत्रकार, वेगवेगळ्या परिस्थितीत अडकल्याने सत्याला स्पर्श करू न शकल्याने आतल्या आत घुसमटणारा परंतु या सर्वांतून बाहेर पडून स्वतंत्रपणे काहीतरी करण्याची इच्छा मनी बाळगणारा. असे विविध पैलू घेऊन सादर झाले ते शिवसंघ प्रतिष्ठान निर्मित 'डेटिंग विथ रेन' हे नाटक.
सखाराम पांडुरंग गांगुर्डे हा हाडाचा पत्रकार नाही. तो परिस्थितीमुळे पत्रकार बनलेला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी कोणता पेशा स्विकारायचा यातून त्याने पत्रकारितेची निवड केलेली आहे. त्या दरम्यान त्याला भेटलेल्या काही मुलींची कथा म्हणजे डेटिंग विथ रेन. अनेक टक्के-टोणपे खाल्लेला सखाराम गावाला जाण्यासाठी बसची वाट पहात उभा आहे. तेथे एक तरुणी येते. तीदेखील तेथे तिच्या बॉयफ्रेण्डची वाट पहात आहे. अभिलाष कुलकर्णी येईल व तिला त्र्यंबकेश्वरच्या फार्म हाऊसवर घेऊन जाईल अशा गोड समजात ती तेथे उभी आहे. या स्टॉपवरच तिची भेट होते ती सखारामशी. तिच्याकडे बराचसा वेळ असल्याने हळूहळू ती त्याला समजून घ्यायला लागते. त्यातून सखारामला भेटलेल्या चार मुलींची कथा उलगडत जाते.
नाटकाची निर्मिती शिवसंघ प्रतिष्ठानची होती. निर्माते प्रमोद गायकवाड, लेखन दत्ता पाटील तर दिग्दर्शन सचिन शिंदे यांचे होते. संगीत लक्ष्मण कोकणे, प्रकाशयोजना प्रफुल्ल दीक्षित, वेशभूषा नुपूर सावजी, रंगभूषा माणिक कानडे, नेपथ्य राहुल गायकवाड तर निर्मिती सूत्रधार प्राजक्त देशमुख व सदानंद
जोशी होते. या नाटकात प्रणव बोरसे, प्रफुल्ल दीक्षित, सई आपटे, प्रतिक शर्मा, पल्लवी पटवर्धन, नुपूर सावजी, पीयूष नाशिककर, दत्ता अलगट, प्रज्ञा तोरस्कर, धनंजय गोसावी व राहुल गायकवाड यांनी भूमिका केलेल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दी जीनिअसतर्फे उद्या ‘नाट्यदर्शन’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दी जीनिअस व स्मिमाताई हिरे कॉलेज ऑफ अप्लाईड आर्ट्स, परफॉर्मिंग आर्ट्स अॅण्ड फॅशन डिझाईन यांच्यातर्फे 'अंतर्वक्र भिंगातून पाहताना : नाट्यदर्शन' या लघुनाट्य महोत्सवाचे शनिवार, २० ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले आहे. या नाट्य महोत्सवाची सुरुवात दिवाकरांच्या निवडक नाट्यछटांनी होणार आहे. परशुराम सायखेडकर नाट्यगृहात, सायंकाळी ६ वाजता हा महोत्सव होणार आहे.

नाट्य छटांच्या प्रांतातील निर्विवाद असे चक्रवर्ती सम्राट दिवाकर हे नाट्यछटेद्वारे मार्मिक विनोद, जगण्यातील विसंगती व तत्कालीन सामाजिक अन्यायाची जाणीव करून देतात. काव्यमय व चिंतनात्मक लिखाणातून लिहिलेल्या या नाट्यछटा आजही समाज जीवनाचं प्रतिबिंब आपल्यासमोर लख्खपणे दाखवून आपलेच दर्शन घडवितात. या नाट्यछटा सुयश लोथे, राजवर्धन दुसाने, चैतन्य देवरे, भूषण आहिरे, श्रद्धा उबाळे, ओवी भालेराव, पल्लवी ओढेकर, रिया हिंगणे, एकता आढाव आणि मनोज गुळवे हे कलाकार सादर करणार आहेत. या नाट्यछटांचे दिग्दर्शन पूर्वा सावजी व सुहास जाधव यांनी केले आहे.

त्यानंतर 'बी. आर. ई गणेश' तसेच 'डिजिटल इंडिया : हेंडल विथ केअर' हे प्रहसन सदर होणार आहेत. अभिषेक रहाळकर, ओवी भालेराव, रिया हिंगणे, एकता आढाव यांनी यात अभिनय केलेला असून त्याचे दिग्दर्शन प्रतिक शर्मा आणि स्वराली हरदास यांनी केले आहे. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरीही माणसांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने समाजाची प्रगती होत नाही, असे या प्रहसनातून नर्म विनोदी शैलीतून प्रामुख्याने मांडण्यात आले आहे.

यांचे लाभले सहकार्य

देवेन कापडणीस यांनी या लघुनाटकांचे लेखन केलेले असून चेतन वडनेरे, विश्वदीप यादव, अभिषेक रहाळकर, प्रतिक नाईक, प्रशांत सोनवणे, रिया हिंगणे, एकता आढाव यांनी या 'शॉर्ट प्ले'चे दिग्दर्शन केले आहे. आपण अजुनही आपली सरंजामी वृत्ती कशी जोपासली आहे यावर केलेले भाष्य, चौका-चौकातून तयार होणारे राजकारणी, भाई व त्यांनी पसरविलेली दहशत, जुनी माणसे जातात आणि नव्या मुखावट्यांची माणसे येतात अशा आशयांच्या शॉर्ट प्ले बरोबरच सार्वजनिक जीवनात दाखविली जाणारी शिस्त व शुद्धता आतून दांभिकतेने घेरलेली असते. असे कथानक त्यातून येते.

या कार्यक्रमात प्रकाशयोजना रवी रहाणे, आदित्य रहाणे यांची असून संगीत तेजस बिल्दीकर, नेपथ्य गुलाब पवार, रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा पल्लवी ओढेकर, दीपक गरुड, प्रीतम खैरनार, चंद्रकांत जाडकर, प्रसाद गर्भे यांची सर्जनशील मदत आहे. लघुनाट्य महोत्सवास प्रवीण काळोखे व रश्मी काळोखे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

प्रवेशिका कार्यक्रम स्थळी
कार्यक्रमासाठी प्राचार्या संपदा हिरे, चित्रपट दिग्दर्शक तानाजी घाडगे, मकरंद माने यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. यासाठी लक्ष्मण सावजी, रव‌ींद्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मनोज पिंगळे, प्राचार्य रामदास गायधनी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. प्रवेशिका कार्यक्रमस्थळी एक तास आधी उपलब्ध असतील. जास्तीत जास्त नाट्यप्रेमींनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहीहंडीसाठी गुजरातची घागर

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

श्रावण पौर्णिमा आटोपताच सगळ्यांना वेध लागतात ते गोपाळकाला अर्थात दहीहंडी उत्सवाचे. बालगोपाळांसह गोविंदा पथकांच्या सध्या रंगीत तालमी सुरू झाल्या आहेत. मुंबई, पुणे पाठोपाठ आता नाशकातही मेगा दहीहंडीच्या तयारीला वेग आला आहे. या उत्सवासाठी गुजरातमधील विविधरंगी घागर बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत.

शहरात पंचवटीमधील मालेगाव स्टँड परिसरात दहीहंडीसाठी लागणारी विविध रंगातील व पारंपरिक पद्धतीच्या घागरी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. आकार आणि रंग-रुपाप्रमाणे घागरीच्या किमती ५० रुपयांपासून सुरू होतात. रंगीत घागरी १५० रुपये ते ४०० रुपयांपर्यंत आहे. ग्रामीण भागातील विविध कुंभारांसह शेजारील गुजरात राज्यातूनही घागरींची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे.

ढोल पथकांचा घुमणार आवाज
गेल्या काही वर्षांपासून दहीहंडी उत्सवात डीजेचा वापर केला जात आहे. मात्र, यंदा पुणे-मुंबईच्या धर्तीवर दहीहंडीसाठी ढोल ताशा पथकांना आमंत्रित करून अनोख्या पद्धतीने गोविंदांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यामुळे विविध ढोल ताशा पथकांच्या सरावाला वेग आला आहे. नाशिकमधील अनेक अशी ढोलताशा पथकांची मागणी नाशिकसह गुजरात, मध्य प्रदेश, उत्तरप्रदेश सारख्या राज्यात केली जात असल्याचे ढोल ताशा पथकानी सांगितले.

नाशिकमधील दहीहंडी उत्सवासाठी आता ढोलताशा पथकांना आमंत्रित केले जात आहे. यामुळे पारंपरिक वाद्यकलेला वाव मिळणार आहे.
- ऋषिकेश कालेवार, ढोलताशा पथक मालक

बालगोपाळांसह विविध मंडळाकडून आता दहीहंडी उत्सवासाठी लागणाऱ्या घागरींची मागणी केली जात आहे. अनेक मंडळे ४-५ आकर्षक घागरींची खरेदी करतात.
- अभिजित शिंदे, घागर विक्रेता

निवडणूक पार्श्वभूमीवर गोविंदा पथके जोरात
म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

सण उत्सवाने भरगच्च श्रावण महिन्यातील उत्सवात कृष्णजन्माष्ठमीला होणारा दहीहंडीचा उत्सव यंदा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरात होणार आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह कायम ठेवण्यासाठी इच्छुकांकडून प्रयत्न केले जात असल्याने दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा आतापासूनच सज्ज झाले आहे. दहीहंडी फोडणाऱ्या महिला पथकांनीही सराव करण्यास सुरवात केली आहे.

शहरातील श्रीकृष्ण मंदिर परिसरात भाविकांकडून गोपालकाल्याबरोबरच छोट्या दहीहंडींचे आयोजन केले जाते. ठराविक भागात दहीहंडी उत्सव होतात. नाशिकला होणाऱ्या दहीहंड्यांची उंची मर्यादित असल्याने दहीहंडी फोडण्यास गोविंदाना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत नाही. कृष्ण जन्माष्ठमीच नव्हे तर त्यानंतर विविध मंडळे आपापल्या सोयीनुसार दहीहंडीचे आयोजन करतात.

विद्यमान नगरसेवक आपापल्या प्रभागात दहीहंडीच्या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या तयारीला लागले आहे. पंचवटी, सिडको, नाशिकरोड, इंदिरानगर, सातपूर, कॉलेजरोड आदी भागात दरवर्षी दहीहंडी होत असल्यातरी यंदाच्या उत्सवाचा जोर काही औरच राहणार आहे. प्रत्येक मंडळ दुसऱ्या मंडळापेक्षा मोठ्या प्रमाणात दहीहंडी आयोजन करण्याच्या तयारीत असल्याने यंदाच्या दहीहंड्यांची धमाल बघायला मिळणार आहे.

उत्सुकता महिला गोविंदांची
डोंगरे वसतिगृह मैदानावरील दहीहंडी नाशिककरांसाठी आकर्षणाचा विषय ठरत होता. त्यात महिला गोविंदा पथक नाशिकच्या बाहेरून येतात. अशा प्रकारच्या दहीहंड्यांची यंदाही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्रिमूर्ती चौकात बस सुसाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको

पवननगर येथून पंचवटीकडे जाणाऱ्या शहर वाहतूक बसचे गुरुवारी अचानक ब्रेक फेल झाल्याने दोन दुचाकींसह एका रिक्षाला धडक बसली. यात गाड्यांचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसचालक व वाहकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी हानी टळली. मात्र, या अपघातामुळे शहर बसच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

त्रिमूर्ती चौकातील दिव्या अॅडलब्स येथून जात असतांना बसचे ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने ही गोष्ट तातडीने वाहकाला सांगितली. दुर्गानगर ते त्रिमूर्ती चौक हा रस्ता उताराचा असल्याने वेळ न दडविता वाहकाने बसच्या पुढच्या दरवाजात उभे राहून जोरजोराने ओरडत रस्त्यावरील अन्य वाहनांना बाजूला होण्याची सूचना केली. वाहनचालकानेसुद्धा ब्रेक नसतांना गाडीचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला. त्रिमूर्ती चौकात सिग्नलपूर्वी बस थांबविण्यात वाहनचालकाला यश आले. गाडी थांबल्याचे पाहून बसच्या मागील बाजूस असलेल्या अन्य काही वाहनांनी बसच्या पुढे जाऊन सिग्नलवर उभे राहणे पसंत केले. मात्र, याचवेळात गाडी अचानकपणे पुन्हा पुढे जावू लागली. यात दोन दुचाकीसह एका रिक्षाला बसची धडक बसली. अचानकपणे झालेल्या या धडकेमुळे परिसरात धावपळ उडाली. मात्र बसचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिस व अंबड पोलिस कर्मचाऱ्यांनी त्रिमूर्ती चौक सिग्नलकडे तत्काळ धाव घेत वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला. तसेच संपातलेल्या नागरिकांची समजूत काढली. अपघातग्रस्त दोन दुचाकी व एक रिक्षा जवळ असलेल्या पोलिस चौकीत नेण्यात आली.

स्वत:चा वा‌चविला जीव
अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी दुचाकीवरून जाणाऱ्या ज्योती चव्हाण या महिलाला किरकोळ दुखापत झाली. रिक्षामध्ये कोणी प्रवासी नव्हते. रिक्षाचालक राजेंद्र परदेशी याने प्रसंगावधार राखत गाडीतून बाहेर उडी घेत स्वत:चा जीव वाचविला. रिक्षाचे नुकसान झाले आहे.

त्रिमूर्ती चौकातील सिग्नलवर थांबलेलो असताना अचानक मागून आलेल्या बसने धडक दिली. खाली पडल्याने मी बसच्या पुढच्या चाकाखालीच जाणार होतो. परंतु, हेल्मेटमुळे बचावलो.
- समाधान हसळकर, अपघातग्रस्त दुचाकीस्वार

नाशिकरोड रेल्वे स्टेशन येथे आईला सोडायला जात असताना त्रिमूर्ती चौकातील सिग्नलवर थांबलो होतो. केवळ नशीब बलवत्तर असल्याने माझा आणि आईचा जीव वाचला.
- अक्षय चव्हाण, अपघातग्रस्त दुचाकीस्वार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपळगाव टोलच्या दरात कपात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

टोलनाक्याचे दर वाढणे व त्याला विरोध होणे हे नित्याचेच झाले आहे. पिंपळगाव बसवंत या राष्ट्रीय मार्गाचे टोल दर आता कमी झाले असून, 'बांधा वापरा हस्तांतरीत करा' या तत्त्वावरिल हा टोल नाका आता केंद्राच्या पब्ल‌िक फंडेज प्रोजेक्टमध्ये वर्ग करण्यात आला आहे. एकीकडे जिल्ह्याबाहेरील वाहनांसाठी हे दर कमी झाले असले तरी जिल्ह्यातील नोंदणीकृत वाहनांसाठी वेगळे शुल्क आकारण्यात येणार आहेत.

नवीन दर १९ ऑगस्ट २०१६ पासून ते ३१ मार्च २०१७ या कालावधीसाठी असतील. सुधारीत दरात कार, जीप, व्हॅन एलएमव्हीसाठी एकेरी शुल्क १२५ असणार असून याअगोदर हेच दर १५० रुपये होते. त्याचप्रमाणे एकाहून अधिक खेपांसाठी २२० रुपये दर आता १८५ करण्यात आले आहे. मासिक पासचे ४९२० रुपयाचे दर ४१२० करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील नोंदणीकृत कारवर्गातील वाहनांसाठी एकेरी शुल्क ४० रुपयांवरुन ६० रुपर्यांपर्यंत गेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वाहनधारकांना मात्र याचा फटका बसणार आहे.

एलसीव्ही, मिनी बस

एलसीव्ही, एलजीव्ही व मिनी बससाठी एकेरी शुल्क २०० असणार असून याअगोदर हेच दर २३० रुपये होते. त्याचप्रमाणे एकाहून अधिक खेपांसाठी ३४० रुपये दर आता ३०० करण्यात आले आहे. मासिक पासचे ७६०० रुपयाचे दर ६६०० करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नोंदणीकृत वाहनांसाठी एकेरी शुल्क आता १०० रुपये असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरण फुल, पाणी मात्र गुल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, गंगापूररोड

गंगापूर धरणात पुरेसे पाणी असतानाही गंगापूररोड परिसरातील नववसाहतींचा मोठा भाग आजही तहानलेलाच आहे. गंगापूररोडच्या वाढत्या लोकवस्तीसाठी बळवंतनगर येथे नवीन जलकुंभ मंजूर आहे. परंतु, निधीअभावी हा जलकुंभ उभारता येत नसल्याचे पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढणाऱ्या गंगापूररोड भागात पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.

शहरातील सर्वांत वेगाने वाढणारा भाग म्हणून गंगापूररोडची ओळख आहे. त्यातच बंगल्यांसह मोठ्या इमारतींचे जाळे गंगापूररोड परिसरात उभे राहिले आहे. उच्चभ्रू लोकवस्ती म्हणून नावारूपाला आलेल्या गंगापूररोड भागात नव्याने स्थापन होत असलेल्या वसाहतींत रस्त्यांची समस्येबरोबरच पिण्याच्या पाण्याची समस्यादेखील मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली आहे.

गंगापूररोडवरील सिरीन मेडोज, बळवंतनगर, कडलगनगर, नवश्या गणपती सेक्टर, आनंदवली गाव, गोदावरी हाइट्स, शंकरनगर, नरसिंहनगर, अभियंतानगर आदी भागांमध्ये पिण्याचे पुरेसे पाणी मिळत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. पाण्यासाठी गंगापूररोडवासीयांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे.

विशेष म्हणजे धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतानादेखील गंगापूररोड परिसर तहानलेलाच असल्याने रहिवाशांमध्ये नाराजी आहे. गंगापूररोडवासीयांनी स्थानिक नगरसेवक व महापालिकेकडेदेखील पिण्याच्या पाण्याबाबत तक्रारी केल्या आहेत. मात्र, उपाययोजना झालेली नाही. महापालिकेने येथील वाढलेला परिसर पाहता बळवंतनगर भागात नवीन जलकुंभ मंजूरदेखील केलेला आहे. परंतु, निधीअभावी मंजूर पाण्याची तो रखडला आहे. महापालिका आयुक्तांनी याकडे लक्ष घालावे, अशी

मागणी नगरसेवक विलास शिंदे यांनी केली आहे.

गंगापूररोड परिसरात नवीन इमारतींचे बांधकाम करण्यासाठी जणू स्पर्धाच लागलेली पाहायला मिळते. परंतु, वाढत्या लोकवस्तीत रहिवाशांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. महापालिकेने गंगापूररोडवासीयांनी पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

-विलास शिंदे, नगरसेवक

---

शहरातील सर्वाधिक झपाट्याने वाढलेला परिसर म्हणून गंगापूररोडची ओळख आहे. त्यातच नवीन वसाहतींचे मोठे जाळे गंगापूररोड भागात उभे राहिले आहे. परंतु, पिण्याचे पाणी पुरेसे मिळत नसल्याने रहिवाशांना भटकंती करावी लागत आहे.

- मधुकर मंडलिक, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


यूजीसीचे रॅगिंगवर लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रॅगिंगला कॉलेजेस आणि विद्यापीठांमध्ये आळा बसावा यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. रॅगिंगच्या विरोधात भूमिका घेण्यासाठी आता यूजीसीने विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही प्रतिज्ञापत्र भरण्याची सक्ती केली आहे.

विविध ठिकाणी फोफावणाऱ्या कॉलेज कल्चरमध्ये मोठ्या प्रमाणावर रॅगिंगच्या घटना अलिकडे उघडकीस आल्या होत्या. तरुणांमध्ये फोफावणाऱ्या या विकृतीला वेळीच आळा घालण्यासाठी यूजीसीने आणखी कडक धोरण स्वीकारलेआहे. यूजीसीच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या रॅगिंगविरोधी समितीच्या बैठकीत विद्यार्थी व पालकांकडून ऑनलाइन प्रतिज्ञापत्र भरून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासंदर्भात यूजीसीच्यावतीने सर्व विद्यापीठांना सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही विद्यापीठांकडून या मुद्द्याला मिळालेला थंड प्रतिसाद लक्षात घेऊन यूजीसीने विद्यार्थी आणि पालकांना हे प्रतिज्ञापत्र सक्तीचे केले आहे.

विविध उपक्रम

रॅगिंगच्या विरोधात कॉलेजेसचा सहभाग वाढावा, यासाठी यूजीसीने कॉलेज स्तरावर अँट‌िरॅगिंग समिती, सीसीटीव्ही बसविणे, अँट‌‌िरॅगिंग वर्कशॉप्स, व्याख्याने, चर्चासत्रे व प्रबोधन कार्यक्रमांचेही आयोजन केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पं. पलुस्करांचा ठेवा नाशिककरांच्या विस्मृतीत

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

नाशिक ः भारतीय शास्त्रीय संगीत घराघरांत पोहोचवून ज्यांनी अजरामर केले, तुलसी रामायणावरील हस्तलिखित प्रत ज्यांच्यामुळे लिहिली गेली, त्या पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांचा ९० वर्षांपूर्वीचा हा अनमोल ठेवा नाशिककरांच्या विस्मृतीत गेल्याची खंत संगीतप्रेमींना सतावत आहे. त्यांचा अंगरखा, कुबडी, खडावा या त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा आजही जपल्या असल्या तरी नाशिककरांना त्याची माहितीही नाही, अशी स्थिती आहे. पलुस्कर यांनी स्थापन केलेल्या श्री रामनाम आधाराश्रमात हा अनमोल ठेवा उपलब्ध असून, त्याचे जतन होण्याची अपेक्षा त्यांच्या १४४ व्या जन्मदिनी व्यक्त होत आहे. काळाराम मंदिरालगत असलेल्या या आश्रमाचीही दुरवस्था झाल्याची बाब निदर्शनास येत आहे.

नाशिक शहराचे नाव विश्वात पोहोचवणाऱ्या तीन व्यक्ती होत्या- विनायक दामोदर सावरकर, दादासाहेब फाळके आणि विष्णू दिगंबर पलुस्कर. यापैकी दादासाहेब फाळके आणि वि. दा. सावरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नाशिक शहरात त्यांची भव्य स्मारके उभी राहिली. मात्र, भारतीय शास्त्रीय संगीतात ज्यांनी अभूतपूर्व कामगिरी केली, त्या पलुस्करांच्या पदरी मात्र निराशा आली. पं. पलुस्कर मुंबईहून नाशिकला स्थायिक झाल्यानंतर त्यांनी पंचवटीतील काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजाला असलेल्या जागेत रामनाम आधाराश्रम या संस्थेची स्थापना केली. येथे त्यांनी अनेकांना संगीताचे धडे दिले.

स्मारकाबाबतही उदासीनता
एकेकाळी राजेशाही थाटात वावरणारे पलुस्कर येथे विरक्तीचे जीवन जगत होते. या जागेत त्यांनी रामायणाचे धडे गिरवले. यासाठी त्यांनी तुलसी रामायणाचे हस्तलिखित तयार करून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या तुलसी रामायणाची हस्तलिखित प्रत आजही रामनाम आधाराश्रमात पाहायला मिळते. या ठिकाणी संगीताच्या शिक्षणासाठी लागणारी पुस्तके छापली जात. त्यासाठी पलुस्करांनी संगीत प्रिंटिंग प्रेसची स्थापना केली. पलुस्कर ज्या प्रिंटिंग मशिनवर पुस्तके छापत असत ते मशीन आजही या जागेत आहे. रामाच्या भक्ती बरोबरच दत्तात्रेयांची भक्तीही करीत असे. अनेकदा गिरणार पर्वतावर ते जात असे. त्यांना दत्तात्रेयांनी दृष्टान्त दिला व त्यांना कुबडी भेट दिल्याची आख्यायिका आहे. ती कुबडीही या ठिकाणी पाहायला मिळते. या सर्व वास्तू जागतिक ठेवा आहे. तो जपण्यासाठी भव्य स्मारकाची गरज आहे.

त्यांनी तयार केलेले साहित्य पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे. त्यामुळे या वस्तू जतन व्हाव्यात अशीही संगीतप्रेमींची अपेक्षा आहे. त्यांच्या संगीतकलेचा वारसा त्यांच्या सून गंगूबाई पलुस्कर यांनी सांभाळला. याच जागेतून त्यांनी गांधर्व महाविद्यालयाची धुरा वाहिली. येथे कुलीन स्त्रियांना संगीत शिक्षणाची कवाडे उघडी करून दिली. पलुस्करांना थोडा दृष्टिदोष होता. त्यामुळे तुलसी रामायण त्यांनी मोठ्या अक्षरांमध्ये आपल्या शिष्यांकडून लिहून घेतले. त्याची प्रत रामनाम आधाराश्रमात आजही सुस्थितीत आहे. विवेक व सुरेंद्र जालिहालकर व त्यांचे कुटुंब या दुर्मिळ वस्तूंची निगा राखतात. आधाराश्रमात संगीताचे कार्यक्रम आजही होत असतात.

असे आहे हस्तलिखित
- तुलसी रामायणाची प्रत हँडमेड पेपरवर
- २ इंच आकाराची अक्षरे; एका पानावर चार ओळी
- एकूण २ हजारावर पाने

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवन पवारांचा भाजपमध्ये प्रवेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

जेलरोड येथील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले अपक्ष नगरसेवक आणि पवन पवार यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. जेलरोड येथे सायंकाळी झालेल्या सभेत भाजपच्या शहरातील सर्वच नेत्यांची भाऊगर्दी झाली होती. दरम्यान, प्रचंड गर्दी, रॅली आणि फटाक्यांच्या आतषबाजीमुळे वाहतूक खोळंबली होती.

जेलरोड येथील प्रभाग ३५ ब आणि ३६ ब मध्ये महापालिकेची २८ ऑगस्टला पोटनिवडणूक होत आहे. सर्वच उमेदवारांनी जोर लावल्याने प्रचारात रंगत वाढली आहे. या दोन्ही प्रभागातील भाजपच्या उमेदवार मंदा ढिकले आणि सुनंदा मोरे यांच्या प्रचार कार्यालयांचे उदघाटन आमदार सानप व सीमा हिरे यांच्याहस्ते झाले. त्यानंतर झालेल्या सभेत पवन पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पवार यांच्या पक्षप्रवेशाच्या सोहळ्याला भाजप शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, माजी आमदार वसंत गिते, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, माजी शहराध्यक्ष विजय साने या बड्या नेत्यांची उपस्थिती होती. यामुळे येथील दोन्ही प्रभागांच्या पोटनिवडणुकीतील चुरस वाढली आहे. याप्रसंगी सचिन हांडगे, प्रा. शरद मोरे, प्रकाश घुगे, हेमंत गायकवाड, रामदास सदाफुले, बाजीराव भागवत, सुनील आडके, सचिन ठाकरे, सुरेश अण्णा पाटील आदींची उपस्थिती होती. महापालिकेतील सत्ताधारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर निशाणा साधत, पोटनिवडणूक लादणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, भाजपच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन यावेळी भाजप नेत्यांनी केले.

नगरसेवक पवन पवार यांच्यावर हाणीमारीसह, खंडणी असे विविध गुन्हे पोलिसात दाखल आहेत. तसेच त्यांच्या वर यापूर्वी तडीपारीची कारवाई देखील करण्यात आलेली आहे. याशिवाय तडीपार गुन्हेगाराला आपल्या कार्यालयामध्ये आश्रय दिल्याचाही पवार यांच्यावर ठपका आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध शस्त्रविक्रीला चाप

$
0
0



प्रवीण बिडवे, नाशिक
शहरात सातत्याने घडणाऱ्या गोळीबाराच्या घटनांचे मूळ उखडून टाकण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. शेजारील मध्य प्रदेशसह बिहार, उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यांतून गावठी कट्टे आणि पिस्तूल यासारखी हत्यारे आणली जात असल्याचे स्पष्ट झाले असून, थेट तेथील अवैध हत्यारे विक्रीवर कारवाई करण्याचा धाडसी निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

गोळीबाराच्या घटनांमुळे नववर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच नाशिककरांच्या कानठळ्या बसू लागल्या. त्यामुळे यंदाचे वर्ष गोळीबारासारख्या गंभीर गुन्ह्यांनीच अधिक गाजते की काय याची भीती शहरवासीयांना वाटू लागली आहे. नववर्षाच्या स्वागतावेळी सातपूरमधील स्वारबाबानगरात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या दोघांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यानंतरही शहरात गोळीबाराचे सत्र सुरूच राहिले. शहरात गावठी कट्टे आणि पिस्तुलसारखी हत्यारे सहजासहजी उपलब्ध होऊ लागल्याने नाशिकचे बिहार होत असल्याची भीती नागरिकांमध्ये बळावू लागली आहे. शहरात जुलै अखेरपर्यंत खूनाच्या २६ तर जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्याही तेवढ्याच घटना घडल्या आहेत. आगॅस्टमध्येही हे सत्र सुरूच असून या आठवड्यात गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे दोन गुन्हे घडले आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही गुन्ह्यांत हत्यारे वापरणाऱ्यांमध्ये एक व्यापारी तर एक नोकरदार व्यक्ती असल्याने त्यांना ही हत्यारे कोठून आणि कशी मिळाली हे शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

मध्य प्रदेशची सीमा असून तेथील उंबरठी या गावातून पिस्तुल, गावठी कट्टा यांसारख्या अवैध शस्त्रांची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. याखेरीज गोळीबाराच्या अनेक गुन्ह्यांमध्ये परप्रांतीय संशयितांचा सहभागही आढळून आला आहे. असे संशयित बिहार व उत्तर प्रदेशातून शस्त्रे आणत असल्याचे निरीक्षण वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे.

शस्त्रविक्रेत्यांचे रॅकेट
शहरात गावठी कट्टे आणि पिस्टलची विक्री करणारे रॅकेटच कार्यरत असून खबऱ्यांकडून मिळणाऱ्या माहितीच्या अनुषंगाने आतापर्यंत अशी २८ शस्त्रे शहर पोलिसांनी जप्त केली आहेत.

गँगस्टर रडारवर
अवैध शस्त्रांची तस्करी करणाऱ्या टकल्या गँगच्या निसार अहे उर्फ सुलतान मेंबर आणि कर्ला दादा या दोघांना ग्रामीण पोलिसांनी शहरात अटक केली. त्यांच्याजवळून दोन रिव्हॉल्व्हर आणि जिवंत काडतूसे हस्तगत करण्यात आली. अशा काही गँगस्टर्सच्या मुसक्या आवळण्याचे काम पोलिसांकडून सुरू असले तरी आता गुन्हेगारी जगताशी संबंध नसलेल्या नागरिकांकडेही शस्त्रे मिळून येऊ लागल्याने पोलिस यंत्रणा अचंबित झाली आहे. मात्र, पोलिसांनी शस्त्रे विकणाऱ्यांवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंडरपासची कोंडी फुटणार

$
0
0

महापालिका आयुक्त कृष्णा यांनी केली द्वारका अंडरपासची पाहणी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका येथील भुयारी अंडरपासची कोंडी फुटण्याची शक्यता आहे. महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी शुक्रवारी द्वारका येथील भुयारी अंडरपासची पाहणी केली असून, त्या ठिकाणचे अतिक्रमण तातडीने काढण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभाग व 'न्हाई' यांची संयुक्त बैठक घेऊन या मार्गावर लवकर तोडगा काढण्याचे आदेशही दिले. या ठिकाणी असलेली असुरक्षितता दूर करण्याचे आदेश दिल्याने हा मार्ग पुन्हा सुरळीत सुरू होण्याची शक्यता आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका येथील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी अंडरपास उभारण्यात आला. परंतु, हा अंडरपास चुकीच्या पद्धतीने उभारण्यात आल्याचा आरोप झाला. या अंडरपासच्या आजूबाजूला अतिक्रमणाचा वेढा पडला आहे. तसेच या अंडरपासचा वापर नागरिक करीत नसल्याने तो अडगळीत पडला आहे. अंडरपासवर तोडगा काढण्याचे अनेक प्रयत्न झाले. परंतु, येथील वाहतुकीची कोंडी कायम राहिली. अंडरपासची निर्मितीच चुकीच्या पद्धतीने झाली आहे. या अंडरपामधून प्रवास करणे धोकादायक असून, नागरिकवरील रस्त्याचाच वापर केला जात आहे.

आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी शुक्रवारी सकाळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह द्वारका अंडरपासची पाहणी केली. या ठिकाणी अंडरपासच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी या अतिक्रमणावर चिंता व्यक्त केली. तसेच, पादचाऱ्यांच्या सुरक्षेवरही चिंता व्यक्त करण्यात आली. या ठिकाणी अंधार असून, येथून पादचाऱ्याने सुरक्षित बाहेर पडणेच अवघड असल्याचे दिसून आले. त्यामुळे सुरक्षेसह अतिक्रमणाच्या प्रश्नावर चिंता व्यक्त करीत अतिक्रमण तातडीने हटवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. या ठिकाणी साचलेले पाणी तातडीने काढून पादचारी वापर करतील अशी व्यवस्था करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

'न्हाई'सोबत संयुक्त बैठक

द्वारका अंडरपाससंदर्भात तातडीने तोडगा काढण्यासाठी तातडीने न्हाईसोबत बैठक घेण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. महापालिकेचा बांधकाम विभाग व न्हाईचे अधिकारी एकत्रित बैठक घेऊन हा मार्ग वाहतुकीसाठी तातडीने कसा खुला करता येईल, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. प्रसंगी त्यात काही अंतर्गत बदल करण्याची आवश्यकता भासल्यास तो बदल करण्याचीही तयारी केली जाणार आहे. त्यामुळे या अंडरपासची कोंडी फुटण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images