Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘पायाभूत सुविधांसाठी खासगी संस्थांची मदत’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्रात अनेक संकुले उभारण्यात आली आहेत मात्र त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी आज सरकारकडे निधी नाही. हे खरे असले तरी काही चांगल्या संस्थांना सांगून ही क्रीडा संकुलांची चांगल्या पद्धतीने देखरेख करणे सोपे होईल. हे सर्व स्थानिक पातळीवर व्हायला हवे, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

महाराष्ट्र बॅडमिंटन संघटना आणि नाशिक जिल्हा बॅडमिंटन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेचे औपचारिक उदघाटन पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. जयप्रकाश दुबळे, महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अरुण लखानी, जिल्हा बॅडमिंटन संघटनाध्यक्ष एस. राजन, पदाधिकारी उपस्थित होते.

लखानी यांनी आपल्या मनोगतात चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास बॅडमिंटन या खेळाला चांगले भविष्य असल्याचे सांगितले. संघटनांना राज्य सरकारची संस्था म्हणून मान्यता मिळावी अशी मागणीही त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हिरावाडीत घरफोडी; ७० हजारांचा ऐवज लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी तब्बल ७० हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. ही घटना शुक्रवारी हिरावाडी परिसरात घडली.

अभिजित संभाजी बोरुडे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. हिरावाडीतील त्रिकोणी बंगल्याजवळील सिद्धिविनायक टाऊनशिपमध्ये राहणारे बोरुडे कुटुंबीय शुक्रवारी बाहेरगावी गेले असता चोरट्यांनी संधी साधली. चोरट्यांनी बोरुडे यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून लोखंडी कपाटातील ७० हजार रुपयांचे सुमारे सव्वातीन तोळ्याचे सोने व चांदीचे दागिने लंपास केले. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, उपनिरीक्षक देवरे तपास करीत आहेत.

दुचाकीस्वार ठार

दुचाकी दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात जखमी झालेला प्रशांत उत्तमराव जगताप (वय ३०, रा. सायोना सोसायटी, इंदिरानगर) या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नाशिक- पुणे हायवेवरील हॉटेल करीलीव्हसमोर १० ऑगस्ट रोजी हा अपघात झाला होता. अपघातातील आणखी एका गंभीर जखमीवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याचा मित्र रोहित शरद भामरे (२४ रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, उपनगर) जखमी असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शाइन (एमएच १५/सीडब्लू ७४१८) या मोटारसायकलवरून येत असताना दुभाजकावर आदळल्याने हे दोघे गंभीर जखमी झाले होते. यात प्रशांतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक निरीक्षक येवला तपास करीत आहेत.

सिव्हिलमधून दुचाकींची चोरी

सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये लावलेल्या दोन मोटारसायकली चोरट्यांनी लंपास केल्या. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असली तरी हॉस्पिटलच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. मखमलाबाद रोडवरील अशोक गोपाळ अरगडे शुक्रवारी सकाळी आजारी असलेल्या नातेवाइकांना भेटण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले होते. अरगडे परत येईपर्यंत चोरट्यांनी पार्किंगमधून हिरो होंडा (एमएच १५/एव्ही ७३५१) व महेश खामकर यांची सीबीझेड (एमएच १८/एजे ६१३५) या दोन मोटारसायकली लंपास केल्या होत्या. हवालदार निकम तपास करीत आहेत.

दोन ठिकाणी चेनस्नॅचिंग

पोलिसांचा बंदोबस्त तैनात असतानाही चोरट्यांनी दोन ठिकाणी चेन स्नॅचिंग करीत पोबारा केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

महात्मानगरमधील विमल जयंत पाटील (वय ६५) शनिवारी रात्री जेवण आटोपून शतपावलीसाठी घराबाहेर पडल्या असता चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडले. एस्सार कंपनीच्या पेट्रोलपंपासमोरून त्या गणपती मंदिराकडे पायी जात असताना समोरून दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ४० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत ओरबाडून पोबारा केला. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक निरीक्षक गवळी तपास करीत आहेत. चेन स्नॅचिंगची दुसरी घटना अमृतधाम परिसरात घडली. विमल हॉस्पिटल परिसरात राहणाऱ्या आशा शरद देवरे (वय ४५) रविवारी दुपारी दीडच्या सुमारास घराजवळ हरिओम इमारतीजवळून पायी जात असताना काळ्या रंगाच्या पल्सरवरील दोघांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सुमारे १५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. या प्रकरणी आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल असून, उपनिरीक्षक सदाफुले तपास करीत आहेत.

बसचालकास मारहाण

कट मारल्याच्या कारणावरून बस अडवून चालकास मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी दुपारी एकच्या सुमारास सारडा सर्कल परिसरात घडली. या प्रकरणी एका बुलेटस्वाराविरुद्ध मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश दत्तू झाडे (रा. चिंचोली, सिन्नर) या बसचालकाने ही तक्रार दिली आहे.

झाडे सीबीएसकडून द्वारकाकडे बस घेऊन जात असताना एमटीवाय ९५६८ या क्रमांकाच्या बुलेटस्वाराने त्यांची बस सारडा सर्कल भागात अडवली. कट का मारला, अशी विचारणा करीत बुलेटस्वाराने शिवीगाळ करून चालकाच्या केबिनमध्ये घुसून झाडे यांना मारहाण केली. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.

सिडकोत तडिपारास अटक

शहर व जिल्ह्यातून हद्दपार केलेले असताना सिडको आणि परिसरात वास्तव्य करणाऱ्या अंबड येथील तडिपार गुंडास पोलिसांनी रविवारी गजाआड केले. त्र्यंबक पांडुरंग भारसकर (वय २२, रा. पांजरापोळ, रामनगर, दत्तनगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. शहरातील विविध पोलिस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. २०१५ मध्ये शहर पोलिसांनी त्याला शहर आणि जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले होते. मात्र, भारसकर सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीत राहत होता. दत्तनगरमधील कारगिल चौकात भारसकर उभा असल्याची माहिती मिळाल्यानंतर अंबड पोलिसांनी त्याला अटक केली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार विसे तपास करीत आहेत.

पेठ रोडवर एकाची आत्महत्या

पेठ रोड परिसरातील दोंदे चाळीत राहणारे मनोज दादाजी रंगारी (वय ५५) यांनी रविवारी दुपारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. रंगारी यांनी छतास साडीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीवनात मोठे होताना समाजालाही सोबत घ्या

$
0
0

विनोद खरोटे यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अहिर सुवर्णकार समाजातील अनेक विद्यार्थी समाजातील विविध क्षेत्रात उच्च स्थानावर कार्यरत आहेत. मात्र यशाचे शिखर पादाक्रांत करतांना विद्यार्थ्यांनी जीवनात मोठे होताना, समाजालाही सोबत घेऊन पुढे जायला हवे, असे प्रतिपादन संस्थेचे उपाध्यक्ष विनोद खरोटे यांनी केले. सुवर्णकार समाजबांधवांनी गरीब परंतु हुशार मुलांची जात न पाहता, अशा मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अहिर सुवर्णकार समाज, नाशिकरोड देवळाली संस्थेतर्फे जेलरोड येथील श्रीहरी मंगल कार्यालयात समाजबांधवांचा मेळावा आणि समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी अध्यक्ष राजेंद्र दुसाने यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. कार्यक्रमास चंद्रकांत लवटे, विक्रम खरोटे, माजी नगरसेविका सुनंदा खरोटे, तृप्ती जाधव, संजय खरोटे, रवींद्र जाधव, रवींद्र पोतदार, राजेश भालेराव, संतोष सोनार आदी उपस्थित होते.

समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचे 'मन मे है विश्वास' पुस्तक देऊन गौरव करण्यात आला.

स्पर्धा परीक्षेत नशीब अजमावणाऱ्या नाशिकमधील गुणवंत परंतु गरीब विद्यार्थ्यांना सर्वप्रकारची मदत करण्यास आपण कटिबद्ध राहू, असा विश्वासही खरोटे यांनी यावेळी व्यक्त केला. सर्वाधिक विद्यार्थ्यांनी दैनंदिन अभ्यासाबरोबरच स्पर्धा परीक्षांचीही तयारी करण्यावर भर द्यायला हवा, असे मत संस्थेचे सरचिटणीस संतोष सोनार यांनी व्यक्त केले. यशस्वीतेसाठी महेश घोडके, संतोष विसपुते, गौरव विसपुते, धनंजय दंडगव्हाळ आदींनी विशेष परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मी नाशिककर’ भावनेतून ‘अभिमान चित्र’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशाच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सिटी सेंटर मॉल येथे 'अभिमान चित्र' या अनोख्या उपक्रमाचे सोमवारी (दि. १५) आयोजन करण्यात आले होते. केवळ नाशिककर या एकाच उद्देशाने एकत्र येत येथे स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.

अभियानाची सुरुवात खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते झाली. या उपक्रमात हजारो नाशिककरांचे त्यांच्या परिवारसह हातात भारताचा ध्वज घेऊन फोटो काढण्यात आले. या सर्वांचे फोटो स्टुडिओ सेटअपमध्ये काढून त्यांना त्वरित फोटो प्रिंट विनामूल्य देण्यात आली. अभियानात कलाकार किरण भालेराव, मिसेस इंटरनॅशनल वर्ल्डवाइड २०१५ नमिता कोहोक आदींनी सहभाग घेतला.

अभियानाची सांगता शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांच्या हस्ते झाली. संकल्पना अमित पाटील व आदित्य बोरस्ते यांची होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायबर लॅबची चोवीस तास सुविधा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तंत्रज्ञान क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. त्यातच कम्प्युटर आणि मोबाइलच्या माध्यमातून गुन्हेगारीचे प्रकार वाढत आहेत. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी 'सायबर लॅब' उपयुक्त ठरेल, असा विश्वास पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

आडगाव येथील ग्रामीण पोलिस मुख्यालय आणि शहर पोलिस आयुक्तालयात सुसज्ज सायबर लॅबच्या उद्‌घाटनप्रसंगी महाजन बोलत होते.
राज्यात ४२ ठिकाणी एकाच वेळी या लॅबचे उद्‌घाटन होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत असून, अशा स्वरूपाची यंत्रणा स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे पालकमंत्री महाजन यांनी स्पष्ट केले. या यंत्रणेमुळे सायबर गुन्ह्यांचा तपास वेगाने होऊन गुन्हेगारांना वचक बसविता येईल. संवाद यंत्रणा वेगवान होत असताना त्यासोबत येणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी ही अत्याधुनिक यंत्रणा उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पोलिस मोबाइल व्हॅनमुळे नागरिकांना संकटकाळी तत्काळ मदत करता येईल आणि नागरिकांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण होईल, असेही ते म्हणाले.

आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापौर अशोक मुर्तडक, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी राधाकृष्णन, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे, पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे आदी उपस्थित होते. तंत्रज्ञानाचा उपयोग मोबाइल बँकिंग, ई-बँकिंग, मोबाइल शॉपिंग, ई-गव्हर्नन्स आदी क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर होत आहे. सोशल मीडियाचा विस्तारही वाढतो आहे. याबरोबरच या क्षेत्रात फिशिंग, क्लोनिंग, हॅकिंगसारखे प्रकारही वाढत आहेत. सायबर लॅबच्या माध्यमातून अशी गुन्हेगारी रोखणे किंवा गुन्ह्यांचा तपास तत्काळ करणे शक्य होईल, असे विशेष पोलिस महानिरीक्षक चौबे यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविकात पोलिस अधिक्षक शिंदे यांनी आठ पोलिस उप अधीक्षकांच्या क्षेत्रात प्रत्येकी एक मोबाइल व्हॅन फिरती ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले. व्हॅनमध्ये सहा कर्मचारी आणि सुसज्ज साहित्य असणार आहे. भविष्यात सीसीटीव्ही कॅमेरे आणि जीपीएस यंत्रणेचाही उपयोग करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

शहर पोलिसांची चांगली कामगिरी
शहर पोलिस दलाच्या लॅबचे उद्‌घाटन करताना महाजन यांनी शहर पोलिसांच्या चांगल्या कामगिरीचे कौतुक केले. नव्या सुविधांमुळे पोलिस दल अधिक सक्षम होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या लॅबसाठी आमदार अपूर्व हिरे यांनी ३० कम्प्युटर आणि एक सर्व्हर उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले. सहाय्यक पोलिस निरीक्षक श्वेता शिंदे यांनी सादरीकरणाद्वारे 'सायबर लॅब'ची माहिती दिली. या लॅबमध्ये एकूण चार अधिकारी आणि आठ कर्मचारी कार्यरत असणार आहेत. या कक्षाची सुविधा २४ तास उपलब्ध राहणार आहे. शहरातील विविध पोलिस स्टेशनशी ही लॅब जोडली जाणार आहे. मोबाइल, संगणक, लॅपटॉप आदींवरील माहिती प्राप्त करणे या लॅबच्या माध्यमातून शक्य होणार आहे. सायबर गुन्ह्यांच्या विश्लेषणासाठी हार्ड डिस्कवरील माहिती आता मुंबईऐवजी नाशिक पोलिस आयुक्तालयातच मिळविता येईल, अशी माहिती या वेळी देण्यात आली.

ही आहेत सायबर लॅबची वैशिष्ट्ये
- लॅबसाठी चार अधिकारी, आठ कर्मचारी नियुक्त
- चोवीस तास सुविधा उपलब्ध
- लॅबमुळे मोबाइल, कम्प्युटर, लॅपटॉपवरील माहिती मिळविणे शक्य
- सायबर गुन्ह्यांचे विश्लेषण आता मुंबईऐवजी नाशिकमध्येच मिळणार
- ऑनलाइन घोटाळ्यांचा तपासही लॅबमुळे शक्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध मद्य विक्री; १३ जणांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वातंत्र्यदिनी मद्य विक्रीवर बंदी असतानाही अवैध साठा करून विक्री केल्या प्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आली. उत्तमनगरमधील पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेला ४५ हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांत गंभीर माळी, विठ्ठल बोरसे, नाना पाटील, मधुकर पाटील, सुनील ठाकरे, सुनील वाघ, प्रशांत माळी, नानाभाऊ माळी, श्रीकांत चव्हाण, अशोक बेलवार, संजय खैरनार, राजू आव्हाड आणि सैजात शौकतअली शेख यांचा समावेश आहे. या संशयितांकडून पोलिसांनी विविध कंपन्यांच्या ४५ हजार रुपयांच्या मद्याच्या बाटल्या जप्त केल्या. ड्राय डेच्या दिवशी हे मद्य जादा दराने विक्री करण्यासाठी पत्र्याच्या शेडमध्ये ठेवण्यात आले होते. पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांच्या पथकास ही माहिती समजताच त्यांनी छापा टाकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळ फार्म परिसरात गर्दी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा आलिशान बंगला भुजबळ फार्म जप्त होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर भुजबळ समर्थकांसह नाशिककरांनीही मंगळवारी या परिसरात गर्दी केली होती. दुपारच्या सुमारास अनेक समर्थकांनी तेथे हजेरी लावली, तर रात्री उशिरापर्यंत अनेक जण तेथे येऊन पाहणी करीत होते.

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात सहा महिन्यांपासून सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत असलेल्या माजी मंत्री भुजबळ यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पदावर असताना ठेकेदारांकडून जवळपास ७८० कोटींचा लाभ घेत, या पैशांतून त्यांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप केला जात आहे. कारवाईचाच एक भाग म्हणून ईडीने भुजबळांच्या २२ मालमत्ता जप्त करण्याची नोटीस बजावली आहे. त्यात दिंडोरीतील शेतजमिनीसह भुजबळ फार्मचाही समावेश आहे. भुजबळ फार्ममधील साडेतीन एकर जागा ही भुजबळांची वडिलोपार्जित आहे, तर उर्वरित जागा त्यांनी नव्याने विकत घेऊन त्यावर आलिशान महाल उभा केला आहे. हा महाल व त्यांच्या कार्यालयाची जागा जप्त केली असून, हे बेहिशेबी पैशांतून बांधल्याचा ईडीचा आरोप आहे. भुजबळ फार्म ही भुजबळांची नाशिकमधील ओळख असून, ही जागाच आता ईडीने जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे भुजबळ समर्थकांसह अनेकांनी मंगळवारी भुजबळ फार्म परिसरात गर्दी केली होती. दरम्यान, ईडीकडून लवकरच जप्तीची कारवाई पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुष्काळ, गारपीटीसारखे नैसर्गिक अरिष्ट, कर्जबाजारीपणा यामुळे होत असलेल्या शेतकरी आत्महत्यांचे सत्र समाधानकारक पाऊस झाल्यानंतरही सुरूच आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ‍मालेगाव आणि नांदगाव तालुक्यात शेतकरी आत्महत्येच्या घटना घडल्या. जिल्ह्यात आतापर्यंत ६३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून, गतवर्षभरात ८५ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली होती.

नांदगाव तालुक्यातील साकोरे येथील दत्तू राधो बोरसे (वय ४२) यांनी रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास विषप्राशान करुन आत्महत्या केली. तर मालेगाव तालुक्यातील नांदगाव बुद्रक येथील अजयसिंग रामसिंग परदेशी (वय ४५) या शेतकऱ्यानेही गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. गत तीन चार वर्षांत जिल्ह्यात पावसाचे वेळापत्रक बदलले आहे. गारपीट, अवकाळी पाऊस यासारख्या नैसर्गिक अरिष्टांमुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास वारंवार हिरावला गेला. गत वर्षभरात तर दुष्काळाची दाहकता सोसावी लागल्याने खरीप आणि रब्बी असे दोन्ही हंगाम शेतकऱ्यांच्या हातून निसटले. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्रच शहरात सुरू झाले. जून संपेपर्यंत पावसाचा जोर नसल्याने ५५ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली. मात्र गेल्या दीड महिन्यात समाधानकारक पाऊस होऊनही जिल्ह्यात ‍शेतकरी आत्महत्येच्या आठ घटना घडल्या आहेत. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी कर्जाचे पुणर्गठन, दुष्काळग्रस्तांना मदत, मागेल त्याला शेततळे, मोफत खते आणि बियाणे, याखेरीज बाजार समित्यांमधील दलालांच्या जाचातून तसेच आडतीच्या कचाट्यातून शेतकऱ्यांची मुक्तता असे सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. तरीही शेतकरी आत्महत्या होत असल्याने या घटनांच्या मूळाशी जाण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दमणगंगेचे पाणी ‘गोदावरी’ला द्या

$
0
0

नदीजोड प्रकल्प समावेशासाठी खासदार गोडसेंचे निवेदन

म. टा. प्रतिनिधी, सिन्नर फाटा

गोदावरी-गिरणा तुटीचे खोरे असल्याने दमणगंगेचे पाणी गोदावरी खोऱ्यात व नार-पार-औरंगा-अंबिका नद्यांच्या खोऱ्यातील पाणी गिरणा खोऱ्यात वळविण्यासाठी जास्तीत जास्त नदीजोड प्रकल्पांचा समावेश दमणगंगा-नार-पार खोऱ्यातील गुजरात व महाराष्ट्राच्या पाणी वाटपाबाबत राज्य सरकारने नेमलेल्या समितीने बृहत आराखड्यात करावा, अशा मागणीचे निवेदन खासदार हेमंत गोडसे व जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष इंजिनीअर राजेंद्र जाधव यांनी समिती अध्यक्ष राजेंद्र पवार यांना दिले.

राज्य सरकारने गेल्या एप्रिल महिन्यात जलविज्ञान मेरीचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. समितीवर या नद्यांच्या खोऱ्यातील पाणी उपलब्धता विचारात घेवून महाराष्ट्राच्या वाट्याला येणारे जलनियोजन अंतिम करण्यासाठी बृहत आराखडा तयार करण्याची जबाबदारी दिली आहे. याशिवाय नद्यांच्या खोऱ्यांतील पाणी गोदावरी व तापी खोऱ्यात वळविण्यासाठी तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असणाऱ्या योजना सुचविण्यास सांगितले आहे. त्याच अनुषंगाने खासदार गोडसे व राजेंद्र जाधव यांनी या समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांची भेट घेत वरील मागणीचे निवेदन दिले.

काय आहेत मागण्या

बृहत आराखड्यात दमणगंगेचे पाणी गोदावरी व नारपार-अंबिका-औरंगा या नद्यांचे पाणी गिरणा खोऱ्यात वळविण्यासाठी जास्त नदीजोड प्रकल्पांचा समावेश करावा, राज्याला वीजेपेक्षा पाण्याची जास्त गरज असल्याने कोकणातून गोदावरी-गिरणा खोऱ्यात पाणी वळविणाऱ्या सर्व नदीजोड प्रकल्पांत धरणाच्या पायथ्याशी वीजप्रकल्प उभारण्याची शिफारस करावी, मुंबईसाठी दमणगंगा-पिंजाळ लिंक राबविण्याऐवजी पिंजाळ-शाई-काळू-पोशीर-शिलार या ७३ टीएमसीच्या प्रस्तावित धरणांतून पाण्याची गरज पूर्ण करण्याबाबत सुचविणे, मराठवाड्यासाठी ४४ टीएमसीचा दमणगंगा-गोदावरी लिंक प्रस्ताव यासोबत विविध मागण्या यात करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणग्रस्तांनी घेतल्या ‘काश्यपी’त उड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विविध मागण्यांसाठी 'करो या मरो'च्या तयारीने आलेल्या काश्यपी धरणग्रस्तांपैकी १५ ते २० जणांनी स्वातंत्र्यदिनी धरणात उड्या घेऊन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. अन्य ग्रामस्थांनी त्यांना तत्काळ बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या सर्वांची प्रकृती स्थिर असून, राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रश्नावर नेमलेली उच्चस्तरीय समिती लवकरच या प्रकरणात लक्ष घालणार असून, विशेष बाब म्हणून हा प्रश्न हाताळण्याच्या हालचाली गतिमान करण्यात आल्या आहेत. त्यामुळे काश्यपीग्रस्तांचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता बळावली आहे.

शहरवासीयांची तहान भागविता यावी, यासाठी १९९२ मध्ये काश्यपी धरण बांधण्यात आले. धरणासाठी चार ते पाच गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. मात्र, त्या वेळी दिलेल्या आश्वासनांप्रमाणे त्यांना मोबदला मिळालेला नाही. धरणग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीला महापालिकेत नोकरी दिली जाणार होती. मात्र, ६० पैकी केवळ २३ धरणग्रस्त कुटुंबातील सदस्यांना नोकरी मिळू शकली आहे. उर्वरित ३७ कुटुंबे अद्याप नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. याशिवाय धरणग्रस्तांना अपेक्षित मोबदलाही मिळू शकलेला नाही. या प्रमुख मागण्यांसह अन्य काही मागण्या मान्य होत नसल्याने सोमवारी स्वातंत्र्यदिनी जलसमाधी घेण्याचा इशारा धरणग्रस्तांनी दिला होता. त्यानुसार मंगळवारी सकाळी दहा ते अकराच्या सुमारास देवरगाव, धोंडेगाव, काळूशी, वैष्णववाडी, खाडेचीवाडी, शिरपाडी येथील धरणग्रस्त एकत्र आल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. प्रांताधिकारी बाळासाहेब वाघचौरे, तहसीलदार राजश्री अहिरराव यांच्यासह काही अधिकाऱ्यांनी धरणावर धाव घेतली. जलसमाधी घेण्याच्या तयारीने आलेल्या आंदोलकांपैकी १५ ते २० जणांनी अचानक धरणात उड्या घेतल्या. त्यापैकी अनेकांना पोहता येत नसल्याने काही ग्रामस्थांनी त्यांना तत्काळ बाहेर काढले. काहींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व करणारे यशवंत मोंढे यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी तातडीची बैठक बोलावली. बैठकीला महापालिका, पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अप्पर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत मोहिते उपस्थित होते.

या प्रश्नाबाबत २८ जून रोजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी उच्चस्तरीय समिती नेमली आहे. समितीमध्ये नगरविकास, विधी व न्याय विभाग, पाटबंधारे विभागाच्या सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. महापालिका आणि पाटबंधारे विभागाने या प्रश्नाबाबतचे अहवाल समितीला सादर केलेत का, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी विचारणा केली. आठ दिवसांत हे अहवाल सादर करण्याचे आदेश या वेळी देण्यात आले. लवकरात लवकर याबाबत उच्चस्तरीय समितीच्या सूचनेनुसार बैठक आयोजित केली जाईल, असे धरणग्रस्तांना सांगण्यात आले आहे.

धरणग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न सोडविणे, नुकसानभरपाई देण्याबाबतची भूमिका स्पष्ट करणे, गावठाणात सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे आणि ग्रामस्थांनी गावठाण ताब्यात घेणे आदी ‌विषयांवर या बैठकीत चर्चा झाली.

मागण्या मान्य होत नसल्याने आमच्यापैकी काहींनी धरणात उड्या मारल्या. ग्रामस्थांनी आम्हाला बाहेर काढले. पाण्याचा मार लागल्याने मी उपचार घेत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी झालेल्या बैठकीला मी नव्हतो. उच्चस्तरीय समितीकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे.

- यशवंत मोंढे, काश्यपी धरणग्रस्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरत-नागपूर महामार्ग रोखला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

साक्री तालुक्यातील अक्कलपाडा प्रकल्पातर्गंत डाव्या कालव्याचे काम त्वरीत सुरू करावे यासह विविध मागण्यांसाठी धुळे तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरत-नागपूर महामार्गावर भदाणे गावाजवळ रास्ता रोको केला. हे काम लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

निम्न पांझरा अक्कलपाडा प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून, उजवा कालव्याचे कामही संपुष्टात आले आहे. मात्र, या प्रकल्पांतर्गंत डावा कालव्याचे साधारण एक किमी अंतराचे काम होणे बाकी आहे. उर्वरित काम पूर्ण झाले आहे. यावर्षी अक्कलपाडा प्रकल्प भरून त्याचे पाणी गेटव्दारे पांझरा नदीत सोडण्यात आले होते आणि डावा कालव्याचे पाणी हे तालुक्यातील भदाणे, खंडलाय, अकलाड, मोराणे, नेर यासह अन्य गावातील शेतकऱ्यांच्या शेतीला मिळणे अपेक्षित आहे. मात्र, डाव्या कालव्याचे काम अपूर्ण असल्याने या गावातील शेतककरीवर्गाला पाण्याच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे या कालव्याचे काम तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्याचा पाणीप्रश्न मार्गी लावणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

आगामी काळात राज्य सरकारच्या माध्यमातून सटाणा शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी लवकरच उच्चस्तरीय बैठक घेवून प्रश्न निकाली काढण्यात येईल. पाणीप्रश्नावर कोणतेही राजकारण न करता सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न निश्चितमार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली. शिवसेनेच्या वतीने आयोजित आजी माजी नगरसेवकांच्या कृतज्ञता सत्कार सोहळ्यात भुसे बोलत होते.

अध्यक्षस्थानी शिवसेनेचे संपर्कप्रमुख अजय सावंत होते. व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबट, उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, कार्यक्रमाचे संयोजक व माजी तालुका प्रमुख अरविंद सोनवणे, शहरप्रमुख शरद शेवाळे, बाजार समिती संचालक अॅड. वसंत सोनवणे, कारभारी पगार, आदी उपस्थित होते.

भुसे म्हणाले, तळवाडे येथील साठवण बंधाऱ्यांचे नुकतेच विस्तारीकरणामुळे साठवण तलावाची क्षमता ८७ दलघफू होणार असून चणकापूर धरणातील पाण्याची बचत होणार आहे. यामुळे चणकापूर धरणातील शेती सिंचनाचे पाणी दुष्काळामुळे केवळ पिण्यासाठी आरक्षित होत असल्याने शेती सिंचनावर विपरित परिणाम होत होता. तो बंद होवून चणकापूरचे पाणी आता शेती सिंचनासाठी मिळण्यास मदत होणार आहे. बागलाण, कळवण, देवळा तालुक्यातील शेती सिंचनाला लाभ मिळणार आहे. सटाणा शहराचा गेल्या अनेक वर्षांपासून भिजत पडलेला कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न केवळ राजकारणामुळे जैसे थे आहे. मात्र आपण तो आता निकाली काढण्यासाठी लवकरच उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करणार असल्याची ग्वाही दिली. याच बरोबर शहरातील ट्रामा केअर इस्पितळाच्या रिेक्त जागा भरून इस्पितळ सुरू करण्यासाठी आरोग्ययमंत्री दीपक सावंत यांना पुढील सप्ताहात भेटून मार्ग काढण्यात येईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

भुसे यांच्या हस्ते शहरातील माजी नगरसेवकांचा सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. कार्यक्रमास माजी नगरसेवक कन्हैयालाल पाठक, वसंत मुंडावरे, पंकज ततार, दिलीप बगडाणे, सुरेश येवला, सुनील मोरे, अनिल कुवर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतमध्ये राज्य सरकारने ७४ मुख्याधिकारींची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीत नाशिक जिल्ह्यातील निफाड, कळवण, पेठ व दिंडोरी या चार नगरपंचायतींचा समावेश आहे. या नगरपंचातमध्ये दोन वर्षांसाठी नवीन मुख्याधिकारी देण्यात आले असून त्यांनी मंगळवारी पदभारही स्वीकारला आहे.

राज्यात स्थापन झालेल्या या नगर पंचायतीमध्ये पूर्णवेळ मुख्याधिकारी पदच भरले नव्हते. त्यामुळे या नगरपंचायतमध्ये प्रभारी अधिकाऱ्यांची प्रतीनियुक्ती करून काम सुरू होते. त्यामुळे या पदावर तहसीलदार किंवा जिल्ह्यातील दुसऱ्या नगरपरिषदेचे मुख्याधिकारी काम करत होते. आता नव्याने भरलेल्या या पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा परीक्षेद्वारे सरळसेवेने निवड केलेल्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्या प्रशिक्षण काळातच ही नियुक्ती दिल्यामुळे अगोदर रखडलेल्या कामांना वेग येईल का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

नाशिक जिल्ह्यात सहानगर पंचायतीची स्थापना ९ महिन्यांपूर्वी करण्यात आली. त्यात चांदवडला नगर परिषदेचा दर्जा देण्यात आला. ग्रामपंचायतीमधून नगरपंचायतीमध्ये रुपातंर केल्यानंतर या ठिकाणी कामात सुधारणा अपेक्षीत असतांना या नगर पंचायतीचे काम वेगवेगळ्या कारणाने रखडले. अजूनही या नगरपंचायतमध्ये नव्याने कामगारांची भर्ती झालेली नाही. त्यासाठी शासनस्तरावर प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीत असलेला स्टाफच नगरपंचायतीचे काम करत आहे. त्यातच मुख्याधिकारी पद कायमस्वरुपी नसल्यामुळे या नगरपंचायतींमध्ये नोव्हेंबर २०१५ मध्ये निवडणुका होवूनही कामाला गती मिळाली नाही. त्यामुळे केंद्र व राज्याचा निधीही या नगरपंचायतीत निर्णयाविना पडून आहे.

आता नव्याने स्थापन झालेल्या या मुख्याधिकारी यांना ही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. त्याचप्रमाणे त्यांच्यावर कामाला गती देण्याची जबाबदारी सुद्धा असणार आहे. विशेष म्हणजे सुरगाणा येथे ही नियुक्ती का करण्यात आलेली नाही. पण जिल्ह्यातील उर्वरीत चार नगरपंचायतमध्ये कायमस्वरुपी मुख्याधिकारी यांची नियुक्ती केल्यामुळे येथील कामाला गती मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’विद्यार्थ्यांच्या हाती पडणार दात्यांचं देणं!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करत ज्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या वर्षात ९० टक्क्यांच्या पार झेंडा रोवला, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शाबासकीची थाप अन् दात्यांच्या संचिताची शिदोरी रविवारी (२१ऑगस्ट) देण्यात येणार आहे. प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेणाऱ्या स्ट्रगलर्सना भविष्यात उज्ज्वल यशाचा झेंडा रोवण्यात मदत करण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे हेल्पलाइन हा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमांतर्गत नाशिक शहरातून जमा झालेले धनादेश त्या मुलांना हस्तांतरित करण्यासाठी येत्या रविवारी समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
गंगापूर रोडवरील भोसला मिलिटरी कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये रविवार, २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होईल. या मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध विचारवंत व सीएचएमई सोसायटीच्या नाशिक शाखेचे कार्याध्यक्ष प्रकाश पाठक, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आर. जी. आगळे, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीएचएमई सोसायटीचे सचिव डॉ. दिलीप बेलगावकर हे उपस्थित राहणार आहेत.
अश्विनी जाधव, वेदांगी भावसार, भाग्यश्री पाटील, प्रसाद देवकर, नीलेश सावळे, श्रीवरद चव्हाण, कुणाल सोनवणे, अशोक खाडे, शिवानी देशमुख, कृष्णा निंबाळकर हे ते 'मटा'ने हेरलेले दहा विद्यार्थी आहेत. 'मटा हेल्पलाइन'चे हे सहावे वर्ष आहे. या सहा वर्षांत नाशिककरांनी विद्यार्थ्यांच्या ओंजळीत भरभरून दान टाकलेले आहे.
आर्थिक परिस्थिती अत्यंत कमकुवत असताना या विद्यार्थ्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. नुसते शिक्षणच नाही घेतले तर त्यात उज्ज्वल यश संपादन करून दाखविले. दारिद्र्याच्या या दशावतारांमधून बाहेर पडण्यासाठी हे विद्यार्थी प्रयत्न करीत आहेत. भविष्यात त्यांना खूप काही करून दाखवायचे आहे; पण त्यासाठी आता आर्थिक मदतीची गरज आहे.
या गरीब विद्यार्थ्यांसाठी 'मटा'तर्फे हेल्पलाइन या उपक्रमांतर्गत मदतीची हाक देण्यात आली होती. त्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभला.
नाशिककरांनी या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण भार उचलण्याची तयारी दाखवली. कुणी त्यांना दत्तक घेऊन त्यांचे शिक्षण आम्हीच पूर्ण करू असा हट्ट धरला, तर कित्येक कॉलेजेसने या विद्यार्थ्यांना तीनही वर्षे मोफत शिकवू, असे सांगितले. हा उपक्रम म्हणजे जगन्नाथाचा रथ आहे. तो वाचकांच्या हातून ओढला जावा, असा हेतू होता. नाशिककरांच्या भरभरून प्रतिसादामुळे तो पूर्णदेखील झाला आहे. हा रथ ओढणाऱ्या हातांना, या उपक्रमात योगदान देणाऱ्यांना तर या
कार्यक्रमाचे निमंत्रण आहेच, पण नाशिककरांनीही या हृद्य सोहळ्याला उपस्थित रहावे अशी विनंती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणांना लुटणारे संशयित गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दोघा युवकांना मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देत एटीएम कार्डद्वारे जबरदस्तीने २५ हजार रुपये काढून घेण्यात आले. मंगळवारी दुपारी घडलेल्या या प्रकारानंतर पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे.
म्हसरूळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर किशोर कुवर (वय २७ रा. मोतीबाग नाका, मालेगाव), संदीप शांतीलाल वाघ (वय ३५, रा. ओम निवास), प्रशांत रघुनाथ गांगुर्डे (वय ३० रा. सुदर्शन कॉलनी, दत्तनगर), ललित दिनकर चौधरी (वय ३७, रा. गोटीराम गल्ली, रविवार कारंजा) व अनिल पुंडल‌िक पाटील (वय ४०, रा. लिबर्टी पॅलेस, गंगापूर रोड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.
मुकेश चंदूलाल जैन (२८ रा. परिमल अपार्टमेंट, मायको सर्कल) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. जैन व त्यांचा मित्र अनिल सूर्यवंशी हे दोघे घराजवळ उभे असताना संशयितांसह दहा ते बारा जण तेथे आले. दोघांना जबरदस्तीने वाहनात बसवून म्हसरूळ येथील दिल्ली पब्लिक स्कूल परिसरात नेले. त्यांना मारहाण केली. जीवे ठार मारण्याची धमकी देत दोघांच्या खिशातील एटीएम कार्ड घेवून त्याद्वारे २५ हजार रुपये काढून घेतले. दोघांनी संशयितांच्या तावडीतून सुटका करून घेत थेट पोलिस ठाणे गाठले.
सातपूरला घरफोडी
सातपूर औद्योगिक वसाहतीत घरफोडीची मालिका सुरूच आहे. चोरट्यांनी सुमारे ४५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. मंगेश कैलास सोनवणे (वय ३३, रा. वरदेश्वर गणपती मंदिर, एमएचबी कॉलनी, समतानगर) यांनी फिर्याद दिली आहे. सोनवणे कुटूंबीय रविवारी बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिने व २० हजार रुपये रोख असा सुमारे ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
जुगार अड्ड्यावर छापे
पोलिसांनी अवैध धंद्यांना लक्ष्य केले असून, पंचवटी आणि भद्रकाली परिसरात दोन जुगार अड्डे पोलिसांनी उद्ध्वस्त केले. पंचवटीतील कुमावत नगर भागात नवीन इमारतीच्या गाळ्यामध्ये जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सायंकाळी साडेपाचच्या सुमारास छापा टाकून पोलिसांनी अभिजीत वसंत परदेशी (रा. कुमावतनगर) व अन्य चौघांना ताब्यात घेतले. दुसरी कारवाई द्वारका परिसरात करण्यात आली. अमरधाम रोडवर दुपारी साडेबाराच्या सुमारास गयाउद्दीन फयाजउद्दीन सय्यद (रा. जहागिरवाडा, बागवानपुरा) हा मटका जुगार खेळताना मिळून आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोळीबार, वाहन तोडफोडीने नागरिक धास्तावले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोळीबार, वाहनांची तोडफोड यांसारखे गुन्हे शहरात पुन्हा खुलेआमपणे घडू लागल्याने शहरवासीयांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हेगारी प्रवृत्तींनी डोकेवर काढल्याने पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून पोलिस नागरिकांना भयमुक्त वातावरणात जगण्याचा आनंद मिळवून देणार का, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

कधीकाळी शांतताप्रिय शहर अशी ओळख असलेल्या नाशिक नगरीचा उल्लेख आता गुन्हेगारांची नगरी म्हणून होऊ लागला आहे. केवळ हाणामाऱ्या आणि चोऱ्या अशा किरकोळ गुन्ह्यांची नोंद होणाऱ्या या शहरात आता खून, अपहरण, जबरी चोरी आणि बलात्कारासारखे गुन्हे सर्रास घडू लागले आहेत. विशेष म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आणि गुन्हेगारांना पाठशी घालणारे लोकप्रतिनिधी शहरात खुलेआम वावरत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेपुढे आव्हान निर्माण झाले आहे. बुधवारी उंटवाडी येथे बाल न्यायालयाच्या आवारात अल्पवयीन संशयितांवरील गोळीबार तसेच सातपूर भागात वाहनांच्या तोडफोडीसारख्या गंभीर गुन्हयांमुळे शहरात खळबळ उडाली. या घटनांच्या तळाशी जाण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरू केले असले तरी अशा घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात पोलिसांना अजूनही यश येऊ शकलेले नाही. शहरात गावठी कट्टे, पिस्तुलं विक्रीसाठी येत असल्याच्या अनेक घटना आतापर्यंत उघडकीस आल्या आहेत. अशी शस्त्रं शहरात येतात कोठून, आतापर्यंत अशी किती हत्यारे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना विकली गेली याचा कोणताही तपशील पोलिसांकडे नाही. शस्त्रं जप्तीच्या कारवाया पोलिसांनी अनेकदा केल्या असल्या तरी ती शहरात येणारच नाहीत यासाठी पोलिसांना ठोस कार्यवाही करावी लागणार आहे. गुन्हेगारांना राजकीय अभय मिळत असल्याने अशा राजकीय पदाधिकाऱ्यांचा पर्दाफाश करणे हे पोलिसांपुढील मोठे आव्हान ठरले आहे. वाहन जाळपोळीच्या सत्राबरोबरच आता वाहनांच्या तोडफोडीद्वारे नागरिकांमध्ये दहशत पसरविण्याचे काम गुन्हेगारी प्रवृत्तींनी हाती घेतले आहे. आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर असे प्रकार बळावण्याची शक्यता असून, अशा घटना रोखण्यासाठी पोलिस काय करतात, याकडे आता नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

सात महिन्यांत दोन हजार गुन्हे

शहरात सात महिन्यांत २ हजार ३० गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी २६ गुन्हे खुनाचे आहेत. एका खूनातील संशयितांना पकडण्यात पोलिसांना अजूनही यश येऊ शकलेले नाही. वाहनचोरीचे सर्वाधिक ३२१ गुन्हे घडले आहेत. चोरीच्या २६७ घटनांची पोलिस स्टेशन्समध्ये नोंद आहे. चेन स्नॅचिंग आणि घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना अजूनही हवे तेवढे यश येऊ शकलेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फरार नगरसेविकापुत्राचा पोलिसांकडून शोध सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गुजरातमधील कंपनीत गुंतविलेल्या भांडवलाच्या वसुलीसाठी कंपनीमधील कमिशन एजंटचे अपहरण करून तीन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी फरार असणारा नगरसेविकापुत्र धीरज शेळके (रा. सातपूर) व त्याच्या साथीदाराचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
भद्रकालीचे वरिष्ठ पोल‌िस निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गृहोपयोगी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या गुजरातमधील विनटेक या कंपनीत संशयित ललित भानुभाई पटेल, हितेश अमृतलाल पटेल, संदीप गणेश पटेल (रा. शंकरनगर, गंगापूररोड, नाशिक) यांनी कमिशन एजंट दीपक कु‌कडियामार्फत दीड कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र, तीन महिन्यांपासून ठरल्याप्रमाणे कमिशन वा भांडवल मिळत नसल्याने संशयितांनी कंपनी मालक जिग्नेश पानसरीया व दीपक कुकड‌िया यांना चर्चेसाठी नाशिकला बोलावले. संशयित पटेल यांनी सातपूर विभागाच्या माजी प्रभाग सभापती उषा शेळके यांचा मुलगा धीरज शेळके व त्याचा साथीदार रवी कावळे यांची मदत घेऊन दीपक कुकड‌ियाचे अपहरण केले. त्याचे वडील मुकेश कुकड‌िया यांच्याकडे तीन कोटींची खंडणी मागितली. मात्र भद्रकाली पोलिसांनी सापळा रचून दीपकची सुखरूप सुटका केली. पोलिसांनी अटक केलेल्या तिघांना चार दिवसांची पोल‌िस कोठडी सुनावण्यात आली होती. कोर्टाने ही कोठडी आणखी दोन दिवसांनी वाढविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ईहवादापासून लांब पळून चालणार नाही!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भोवतालच्या जगात अनेक प्रश्न ज्वलंत आहेत. सक्र‌िय सामाजिक सहभाग हाच या प्रश्नांच्या सोडवणुकीचा मार्ग आहे. मात्र, अध्यात्माच्या चुकीच्या संकल्पनांआड लपून बहुसंख्य लोक ईहवादाला तिलांजली देतात आणि सामाजिक सहभागातून पूर्णत: निष्क्र‌िय होतात. हे चित्र बदलायला हवे. ईहवादापासून पळवाट काढून चालणार नाही, त्याला सामोरे जायला हवे, असे मत कोल्हापूर येथील ज्येष्ठ पत्रकार विलास पाटील यांनी व्यक्त केले.
ज्योती स्टोअर्स आणि शंकराचार्य न्यास यांच्या वतीने आयोजित 'लेखक तुमच्या भेटीला' या उपक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे आणि भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते प्रा. सुहास फरांदे होते.
पाटील यांनी 'अध्यात्माचा पंचनामा'हा विषय मांडला. ते म्हणाले, 'देव ही संकल्पना माणसाने त्याला हवी तशी निर्माण केली आहे. आजवर माणसाच्या मनावर अध्यात्माच्या मनुष्यनिर्मित संकल्पना वेगवेगळ्या पध्दतीने बिंबविल्या गेल्या. माणसाच्या गुणसूत्रांमध्ये या संकल्पना दडल्या गेल्या आहेत. त्या बदलणेही अवघड बनले आहे. तरीही प्रयत्न करायलाच हवेत.'
'केवळ हिंदूच नव्हे तर मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मांमध्येही अध्यात्माच्या संकल्पना पिढ्यान् पिढ्या रूजत गेल्या. माणूस प्रत्येक पिढीमध्ये चिक‌ित्सक आणि विवेकबुध्दी विसरून अनेक प्रसंगांत भावनेच्या आहारी गेल्याने तो या संकल्पनांना नकळत शरण गेला. जगाला मिथ्या मानण्याची चूक माणसाने करून स्वर्ग व नरकाच्या खोट्या कल्पनांमध्ये तो रमत गेला. या परिणामांमुळे प्रत्यक्षात भौतिक म्हणजेच ईहलोकाचे मोठे नुकसान माणसाइतके कुणीच केलेले नाही,' असेही मत त्यांनी व्यक्त केले. पाटील पुढे म्हणाले, अखेरीला हे जग काही नियमांनी बांधले आहे. विवेकबुध्दी आणि चिक‌ित्सेवर तपासता येणाऱ्या नियमांवर विश्वास ठेवणे म्हणजे देवावर विश्वास ठेवणे, अशी देवत्वाची व्याख्याही त्यांनी यावेळी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झाडांना राख्या बांधून ‘रक्षाबंधन’

$
0
0

वैनतेयच्या चिमुकल्यांचा पर्यावरण रक्षणाचा संदेश

म. टा. वृत्तसेवा, निफाड

'रक्षाबंधन' म्हणजे प्रेमबंधन, भावाने घेतलेली बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी. भारतीय संस्कृतीत या सणाला विशेष महत्त्व आहे. सद्यस्थितीला पर्यावरणाचा असमतोल बघता वृक्षाचे रक्षण करण्यासाठी निफाडच्या वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील कब-बुलबुल पथकातील विद्यार्थांनी झाडांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.

या वेळी विद्यार्थ्यांनी वह्यांचे पुठ्ठे, टिकल्या, रंगीत कागद, जुन्या साड्यांची लेस अशा टाकाऊ वस्तूंचा वापर करून आकर्षक राख्या तयार केल्या. त्यांना शिक्षक गोरख सानप यांनी सणाचे महत्त्व समजावून सांगितले. शाळेत विद्यार्थ्यांचे गट तयार करून शाळेच्या आवारातील झाडांना पाणी घालण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आकर्षक मकुट घालून त्यावर 'झाडे लावा झाडे जगवा' हा संदेश दिला. मुख्याध्यापिका अलका जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील कराड, सचिव रतन पाटील वडघुले, विश्वस्त वि. दा. व्यवहारे, अॅड. ल. जि.उगांवकर तसेच पालकांनी कौतुक केले.

'आम्ही दररोज या झाडांसमोरून जायचो. पण त्या झाडाला राखी बांधल्यापासून आम्हाला झाडांबद्दल आपुलकी वाटू लागली. त्यामुळे या झाडांची जोपासना करण्याचा आम्ही संकल्प केला' असे विद्यार्थिनी यशश्री नागरे, पायल म्हस्के यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वातंत्र्यसैनिकांचा फलक धूळखात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असताना अभोणा ग्रामपालिकेने मात्र ज्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग व बलिदानामुळे आपण हे स्वातंत्र्य उपभोगत आहोत अशा स्वातंत्र्यसैनिकांच्या नावाचे फलकच अडगळीत टाकण्याचा पराक्रम केला. यावर नूतन पदाधिकाऱ्यांच्या नावाचे फलक लावण्यासाठी जागा रिकामी व्हावी यासाठी हे फलक काढल्याचे कारण देण्यात आले.

स्वातंत्र्यदिनी नागरीकांनी ग्रामसभा सुरू असताना ग्रामपालिकेने जुनी मोटार सुस्थितीत असताना नव्याने खरेदी केलेल्या पाणीपुरवठ्याच्या मोटारीची माहीती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस समर्पक उत्तर न मिळाल्याने त्यांनी जुनी खराब झालेली मोटार दाखवण्याची मागणी केली. मोटार दाखवण्यासाठी कर्मचाऱ्याने डेड स्टॉकची रुम उघडली असता जुनी मोटार तर मिळालीच नाही. परंतु तेथे स्वातंत्र्यसैनिकांचे नावे असलेला फलक धूळखात आढळला. हा प्रकार बघून ग्रामसभेत गोंधळाचे वातावरण झाले होते. घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अभोणा गावात दिवसभर ग्रामपंचायतीच्या कृत्याचा ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष दिसून येत होता. ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या नावाचीही पाटी टाकून दिल्याने माजी सरपंच व नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ ग्रामसेवकावर अखेर गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

महिला सक्षमीकरण, स्त्रियांचा सन्मान हे शासकीय कार्यालयांचे ब्रीद असताना गावाची प्रथम नागरिक असलेल्या सरपंच महिलेला ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने झेंडावंदन करण्यापासून रोखल्याची घटना नांदगाव तालुक्यातील हिसवळ येथे सोमवारी (दि. १५) घडली. याबाबत संबंधित ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वातंत्र्यदिनी झालेल्या या घटनेबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. नांदगाव तालुक्यातील हिसवळ येथील ग्रामपंचायतीत सरपंच रोहिणी आहेर यांनीच शासकीय शिरस्त्यानुसार त्यांच्या झेंडावंदन करावे अशी अपेक्षा असताना ग्रामसेवक एन. के. अमृतकार यांनी उपसरपंच सुदाम आहेर यांना ध्वजवंदन करण्यास सांगितले. त्यामुळे सरपंच आहेर यांनी आपण महिला असल्यानेच आपला झेंडावंदन करण्याचा हक्क हिरावून घेतला, अशा आशयाची तक्रार नांदगाव पोलिस ठाण्यात दाखल केली. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. राहुल खाडे यांनी चौकशी करून संबंधित ग्रामसेवकावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेबाबत गटविकास अधिकारी चित्रलेखा कोठावळे यांनी हा प्रकार निंदनीय असल्याचे म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images