Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

महिला बालकल्याणच्या सदस्यपदासाठी चुरस

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महिला व बालकल्याण समितीच्या नऊ सदस्यांची मुदत १२ ऑगस्ट रोजीच संपल्याने आता नव्या सदस्यांच्या निवडीसाठी १६ ऑगस्ट रोजी महासभा होणार आहे. महासभेत पक्षीय बलानुसार नऊ सदस्यांची निवड केली जाणार असून, नव्या निवडीत सभापतिपदावर आता मनसेने दावा ठोकला आहे, तर राष्ट्रवादीनेही सभापतिपद मागितले आहे. दरम्यान, शेवटचे वर्ष असल्याने या समितीवर तरी संधी मिळावी, यासाठी महिला सदस्यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

महिला बालकल्याण समितीच्या विद्यमान सभापती वत्सला खैरे, उपसभापती भामरे यांच्यासह नऊ सदस्यांची मुदत १२ ऑगस्ट रोजी संपुष्टात आली आहे. त्यामुळे नवीन सदस्य निवडीचा प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी नगरसचिव विभागाने १६ ऑगस्ट रोजी महासभा बोलावली आहे. नवीन सदस्यांच्या नावांवर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी महापौरांकडे गटनेत्यांची बैठक झाली. बैठकीत राष्ट्रवादीने सभापतिपद मिळावे अशी मागणी केली. मात्र, महाआघाडीच्या जागावाटपानुसार आता सभापतिपदावर मनसेचा दावा आहे. त्यामुळे मनसेकडे हे पद असावे, अशी मनसेची इच्छा आहे. त्यामुळे सदस्यांची नावे अंतिम होऊ शकली नाहीत. दुसरीकडे विद्यमान सदस्यांनी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे सर्व पक्ष कोंडीत सापडले आहेत. पुढील वर्षी निवडणुका आहेत. त्यामुळे समितीला कामकाजासाठी सहा महिनेच मिळणार आहेत. तरीही या समितीवर जाण्यासाठी महिलांमध्ये रस्सीखेच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


श्वान निर्बीजीकरण ठेकाही वादात

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

घंटागाडी व पेस्ट कंट्रोलमुळे अगोदरच वादग्रस्त ठरलेल्या आरोग्य विभागाची कोटीच्या कोटी उड्डाणे कायम असून, आता श्वान निर्बीजीकरणाचा ठेकाही वादात सापडला आहे. आरोग्य विभागाने नवीन ठेका देण्याची तयारी सुरू केली असून, हा ठेका आता ७५ लाखांवरून थेट एक कोटी १४ लाखांवर नेण्यात आला आहे. विभागाने दहा टक्के वाढ पकडली असली तरी २५ ते ३० लाखांचा गोलमाल यात असल्याचा आरोप आता केला जात आहे.

महापालिकेने शहरातील श्वान निर्बीजीकरणाचा ठेका नव्याने देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी तब्बल एक कोटी १४ लाख रुपये अंदाजित रक्कम धरण्यात आली आहे. प्रतिश्वानापोटी महापालिका कंत्राटदाराला ७५० रुपये अदा करते. त्यामुळे आतापर्यंत दरवर्षी या ठेक्यावर साधारण ७० ते ७५ लाख रुपये खर्च होतात. मात्र, नव्या ठेक्याची रक्कम ही थेट एक कोटी १४ लाखांपर्यंत नेण्यात आली आहे. या विभागासाठी जवळपास दहा कर्मचारी काम करत असून, त्यांना किमान वेतन देण्यामुळे किंमत वाढल्याचा दावा विभागातर्फे केला जात आहे. किमान वेतन दिले तरी ठेक्याची किंमत ही ८५ ते ९० लाखांपर्यंत जाणे अपेक्षित आहे. मात्र, ती थेट ४० लाखांपर्यंत वाढविण्यात आली असून, ठेकेदाराला २५ ते ३० लाख रुपये अतिरिक्त रक्कम देण्याचा घाट असल्याचा आता आरोप केला जात आहे.

आरोग्य विभागाने घंटागाडी प्रकरणातही अशीच कोटीच्या कोटी उड्डाणे केली होती. त्यामुळे हा ठेकाच आता वादात सापडला असतानाच, पुन्हा नव्याने श्वान निर्बीजीकरण ठेक्याचा वाद निर्माण होणार आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची पुन्हा कोंडी होऊन प्रशासनावर त्याचे खापर फुटणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्ही. के. सिंह यांनी घेतले त्र्यंबकराजाचे दर्शन

0
0

म. टा. प्रतिनिधी, त्र्यंबकेश्वर

केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी शुक्रवारी भगवान त्र्यंबकराजाचे सपत्निक दर्शन घेतले.

नगराध्यक्षा विजया लढ्ढा, नगरसेवक धनंजय तुंगार, योगेश तुंगार यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्यासमवेत दीपक लढ्ढा आणि आरोग्य सभापती यशवंत भोये आदी या वेळी उपस्थित होते. व्ही. के. सिंह यांनी मंदिराची माहिती घेतली. त्यांना ध्वजावतरण सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, ते येथे येऊ शकले नसल्याने शुक्रवारी त्यांनी त्र्यंबकेश्वराला भेट दिली. या वेळी त्यांनी लढ्ढा यांच्याकडून ध्वजावतरण आणि सिंहस्थपर्वाची माहिती घेतली. या वेळी सिंह यांचा देवस्थान ट्रस्ततर्फे सत्कार करण्यात आला. विश्वस्त कैलास घुले उपस्थित होते. घुले यांनी देवस्थान संस्थानला केंद्रीय पुरातत्त्व खात्याकडून सहकार्य मिळावे आणि विकासकामांबाबत माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायबर क्राईमवर वचक

0
0

सुसज्ज सायबर लॅबचे आज पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सायबर गुन्हेगारीवर वचक बसविण्याबरोबरच अशा गुन्ह्यांची तत्काळ उकल करून आरोपींचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालये आणि पोलिस आयुक्तालयांच्या क्षेत्रात 'सायबर लॅब' सुरू करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. आज, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी, एकाच दिवशी राज्यातील ४४ ठिकाणी या सायबर लॅबचे उद्‌घाटन होत असून, नाशिक शहर पोलिसांनादेखील या निर्णयाचा फायदा होणार आहे.

माहिती तंत्रज्ञानामुळे सर्वत्र ई-बँकिंग, पेपरलेस कार्यालय, सोशल मीडिया आदींचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यातून आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणे वापरून गुन्हे करण्याच्या विविध युक्त्या सायबर गुन्हेगारांकडून वापरल्या जातात. या गुन्ह्यांना आळा घालण्याबरोबरच हे गुन्हे करणाऱ्यांना वचक बसावा, यादृष्टीने गृह विभागाने महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्हा मुख्यालये आणि पोलिस आयुक्तालय क्षेत्रात 'सायबर लॅब' उभारण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. सर्व जिल्हे, पोलिस आयुक्तालयांसह मुंबई, पुणे आणि नागपूर रेल्वे कार्यक्षेत्रात ४४ विविध ठिकाणी 'सायबर लॅब'ची उभारणी करून गृह विभागाने या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे. स्वातंत्र्यदिनी एकाच दिवशी या ४४ लॅबचे संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्री आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते उद्‌घाटन होत आहेत. नाशिक शहर पोलिसांसाठी सायबर लॅब सुसज्ज होणे जमेची बाजू आहे. यासाठी एक विशेष सर्व्हर, कम्प्युटर्स, तीन महत्त्वाचे सॉफ्टवेअर असे ३५ ते ४० लाख रुपयांचे साधने पुरविण्यात आले आहेत. या युनिटसाठी प्रशिक्षित दोन अधिकारी व सात कर्मचारी देण्यात आले असून, यामुळे सायबर क्राईम गुन्ह्यांचा तपास करणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे सहज होणार असल्याचे सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे यांनी सांगितले. पोलिस आयुक्तालयातील दुसऱ्या मजल्यावर हे युनिट कार्यरत राहणार असून, त्याचे उद्‌घाटन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे.

कर्मचाऱ्यांचे हक्काचे गेस्ट हाऊस

सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान तयार करण्यात आलेल्या बॅरेक्सचा योग्य वापर करीत शहर पोलिसांनी कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज गेस्ट हाऊस तयार केले आहे. सोळा रूम्सची क्षमता असलेल्या या गेस्ट हाऊसचे उद्‌घाटन स्वांतत्र्यदिनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. तपासासाठी बाहेरगावाहून येणाऱ्या, तसेच मुख्यालयातच एकट्या राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना अवघ्या ५० रूपयांत या ठिकाणी राहता येऊ शकते. हॉटेलप्रमाणे सर्व सुविधा कर्मचाऱ्यांना पुरवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, यामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक भार कमी होऊ शकेल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात चोख बंदोबस्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच प्रमुख ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विविध ठिकाणी नाकाबंदी करून तपासणी सुरू आहे.
सोमवारी सर्वत्र स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या आदेशान्वये आयुक्तालयातील १३ पोलिस स्टेशनच्या माध्यमातून चोख पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शहरातील सर्वच प्रमुख ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली असून, संशयास्पद वाहनचालकांची तपासणी केली जात आहे. याबरोबर, संवेदनशील भागात बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून सातत्याने तपासणी केली जात आहे. गर्दीच्या म्हणजे रेल्वेस्थानक, बसस्थानक, मंदिरे व मॉल सारख्या ठिकाणी विशेष काळजी घेतली जात असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. शहर पोलिसांकडून शनिवारपासूनच या बंदोबस्ताचे नियोजन सुरू आहे. पोलिस स्टेशन, क्राईम ब्रँचसह इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे काम केले जात आहे.

नागरिकांना एखाद्या संशयास्पद व्यक्तीबाबत, तसेच वस्तूबाबत माहिती द्यायची असल्यास त्यांनी तत्काळ नजीकच्या पोलिस स्टेशनमध्ये किंवा कंट्रोल रूमशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाकाबंदीदरम्यान पोलिसाला उडवले

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाकाबंदीदरम्यान पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहनचालकाने पोलिसालाच उडवले. वाहन पळवून नेत असताना पोलिस कर्मचाऱ्यास फरफटत नेल्याने कर्मचाऱ्यास दुखापत झाली आहे. या प्रकरणी सिन्नर तालुक्यातील लोणारवाडी येथील वाहनचालक विकास माणिक लोणारे याच्याविरोधात नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दसक पुलाजवळ शनिवारी नाकांबदीदरम्यान वाहनांची तपासणी सुरू होती. त्यावेळी एमएच १५ डीजे ५३२५ क्रमांकाच्या दुचाकीवरून लोणारे तेथे आला. उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांनी लोणारे याच्याकडे वाहनाच्या कागदपत्रांची मागणी केली. मात्र, कागदपत्रे दाखवण्याऐवजी लोणारे याने कर्मचाऱ्यांचे लक्ष नसल्याचे पाहून दुचाकी सुरू केली. संशयित आरोपी नाकाबंदी तोडून पळ काढण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिस शिपाई बर्वे यांनी त्यास रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशयितांच्या दुचाकीने धडक देऊन त्यांना फरफटत नेले. त्यामुळे बर्वे यांना दुखापत झाली. या प्रकरणी पोलिस नाईक गोसावी यांनी लोणारे विरोधात नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.

भाजलेल्या वृध्दाचा मृत्यू

शेकोटीचा शेक घेत असताना अंगावरील घोंगडीने अचानक पेट घेतल्याने गंभीररीत्या भाजलेल्या वृध्द व्यक्तीचा मृत्यू झाला. गोरक्ष नामदेव साबळे (वय ६२, रा. आदित्यनगर, जेलरोड) असे या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. साबळे हे घरी शेकोटीजवळ बसून शेकत होते. मात्र, त्यांच्या अंगावरील घोंगडीने पेट घेतल्याने त्यांचे हात पाय, चेहरा, मानेचा भाग जळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाविकांनी फुलला प्रदक्षिणा मार्ग

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

शनिवार, रविवारसह स्वातंत्र्य दिनाच्या सुटीमुळे त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची संख्या वाढली आहे. दुसऱ्या श्रावणी सोमवारमुळे दर्शन प्रदक्षिणा मार्ग भाविकांनी फुलला आहे. पावसाने उघडीप दिल्याने निसर्ग चहुंगाने बहरला आहे. त्र्यंबकेश्वरची सहल येथील विलोभनीय निसर्ग पाहून अविस्मरणीय होणार यात शंकाच नाही.

भाविकांच्या दर्शनासाठी मंदिरात नियोजन झाले आहे. नेहमीप्रमाणे पूर्वदरवाजा दर्शनरांग सज्ज झाली आहे. तथापि, मंदिरातून बाहेर पडताना मात्र भाविकांना नाहक यातना होतील, असे नियोजन बदलण्याची गरज आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात पूर्वदरवाजाने प्रवेश केल्यानंतर नंदी मंदिरातून थेट सभामंडपात आणि तेथून दक्षिण दरवाजाने बाहेर असे होत असलेले नियोजन भाविकांची सत्वपरीक्षा पाहणारे आहे. मंदिरात दर्शनासाठी जातांना किमान दोन ते चार तास बंद मंडपात दर्शन बारीत प्रतीक्षा केल्यानंतर मंदिर प्रांगणात प्रवेश मिळतो. त्यानंतर तातडीने सभामंडपात व घाईगडबडीने दक्षिण दरवाजाकडे जावे लागते. येथे असलेल्या गायत्री मंदिराकडून बाहेर पडल्यानंतर पुन्हा पूर्व दरवाजाला चप्पल, मोबाइल, पिशव्या आदी साहित्य घेण्यासाठी संपूर्ण मंदिर परिसराला वळसा घालावा लागतो. लक्ष्मीनारायण चौकात वाहनांची गर्दी, रस्त्यावर ठाण मांडून बसलेले व्ययवसायिक यामधून चालता येणे मुश्किल होत आहे.

गरज मोबाइल, बॅग लॉकरची

त्र्यंबकेश्वर मंदिरात मोबाइल घेऊन जाण्यास मनाई आहे. यामुळे येथे मोबाइल सांभाळण्याचा व्यवसाय जोमात आला आहे. प्रत्येक मोबाइल मागे पाच ते दहा रुपये घेऊन, तसेच बॅग कॅमेरा आदी वस्तू सांभाळण्याचा लॉकर व्यवसाय येथे सुरू झाला आहे. भाविकांना मात्र भुर्दंड बसतो आहे. दिवसाला भाविकांच्या दानातून लाखो रुपये उत्पन्न मिळविणारे देवस्थान भाविकांसाठी मोफत लॉकर सुविधा निर्माण करीत नाही ही दुर्दैवाची बाब आहे. असाच प्रकार चपलस्टँडबाबत धरसोड होत आहे. बॅग स्कॅनर आणले आहे. मात्र ते दर्शनबारीच्या शेवटच्या टोकाला आहे. एकूणच दर्शनाचे नियोजन असे दुर्लक्ष करणारे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकचे संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र बॅडमिंटन संघटना आणि नाशिक जिल्हा बॅडमिंटन संघटनेतर्फे सुरू असलेल्या राज्यस्तरीय ज्युनिअर बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या दिवशी नाशिकच्या १७ आणि १९ वर्षांखालील संघांनी आपापल्या गटात विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

सांघिक प्रकारच्या १९ वर्षांखालील गटात नाशिकने सांगलीच्या संघाला ३-१ असे पराभूत केले. मुलांच्या एकेरीत झालेल्या पहिल्या सामन्यात सांगलीच्या निनाद अन्यपन्यावार याने नाशिकच्या हृषिकेश होले याचा तीन सेटपर्यंत रंगलेल्या मॅरेथॉन लढतीत १४-२१, २१-१७, १६-२१ असा पराभव पत्करावा लागला. हा सामना तब्बल ४३ मिनिटे रंगला. त्यानंतर मात्र नाशिकची राष्ट्रीय चम्पियन असलेली वैदेही चौधरी हिने दिया गडा हिचा २१-४, २१-६ असा केवळ १५ मिनिटांत पराभव करत नाशिकला बरोबरी साधून दिली. त्यानंतर झालेल्या पुरुष दुहेरी आणि महिला दुहेरी अशा दोन्ही सामन्यांत विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

१७ वर्षांखालील गटातही साताऱ्याविरुद्ध खेळताना नाशिकची सुरुवात पराभवानेच झाली. मात्र, नंतरचे तिन्ही सामने जिंकत संघाने विजय नोंदविला. पहिल्या सामन्यात नाशिकच्या अधीप गुप्ताचा साताऱ्याचा हर्षल जाधव याने २१-११, २१-१८ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. मात्र मुलींच्या एकेरीत नाशिकची उदयोन्मुख खेळाडू सई नांदूरकर हिने सिद्धी जाधव हिचा पराभव केला. विजयासाठी मात्र सईला चांगलेच झुंजावे लागले. पहिला सेट ११-२१ असा गमावल्यानंतर सईने सुधारणा करत दुसरा सेट जिंकला. ३५ मिनिटे चाललेल्या या सामन्यात सईने २१-११, २१-१९, २१-१७ अशी बाजी मारली.

दरम्यान, १९ वर्षांखालील गटात ठाणे विरुद्ध चंद्रपूर सामन्यात ठाणे संघाने ३-० असा सहज विजय मिळवला. पहिला सामना ठाण्याचा प्रतीक रानडे विरुद्ध अंजेश कावळे (चंद्रपूर) यांच्यात रंगला. ४५ मिनिटे चाललेल्या या चुरशीच्या सामन्यात प्रतीकने २१-१२, १३-२१, २२-२० असा विजय मिळविला. टायब्रेकपर्यंत रंगलेल्या या सामन्यात विजय मिळवत संघातील मृण्मयी देशपांडे आणि सुकृत बापोरीकर यांनी तीच लय कायम ठेवली व संघाला पुढच्या फेरीत प्रवेश मिळवून दिला.

१७ वर्षांखालील गटात लातूर विरुद्ध कोल्हापूर या सामन्यात धक्कादायक निकालाची नोंद झाली. मुले-मुलींच्या एकेरीच्या सामन्यांत अनुक्रमे आदित्य माळी आणि गार्गी चिंचोलीकर यांनी लातूर संघाला विजय मिळवून दिला खरा, मात्र दुहेरीतील तिन्ही सामन्यांत पराभव पत्करावा लागल्यामुळे कोल्हापूरने ३-२ असा सामना जिंकला.

स्पर्धेत एकूण २५ जिल्हा संघांनी सहभाग घेतला असून, सांघिक सामने उद्यापर्यंत सुरू राहणार आहेत. त्यानंतर ६०० पेक्षा जास्त खेळाडूंचे वैयक्तिक सामने दिवस रंगणार आहे.


स्पर्धेतील पहिल्या सत्राचे निकाल

१७ वर्षांखालील गट

सांगली विजयी विरुद्ध धुळे (३-१)
रायगड वि. वि. परभणी (३-१)
औरंगाबाद वि. वि. रत्नागिरी (३-२)
सातारा वि. वि. वर्धा (३-०)
कोल्हापूर वि. वि. लातूर (३-२)
मुंबई उपनगर वि. वि. सोलापूर (३-०)
सांगली वि. वि. अहमदनगर (३-०)
नागपूर वि. वि. रायगड (३-१)
नाशिक वि. वि. सातारा (३-१)


१९ वर्षांखालील गट

सातारा वि. वि. यवतमाळ (३-०)
औरंगाबाद वि. वि. वर्धा (३-०)
सांगली वि. वि. अमरावती (३-०)
रायगड वि. वि. लातूर (३-१)
नाशिक वि. वि. सांगली (३-१)
धुळे पराभूत वि. पुणे (०-३)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थ्यांचा मोर्चा

0
0

वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सुरगाणा वीज वितरण कार्यालयाच्या भोंगळ कारभाराला कंटाळून स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियातर्फे धडक मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामध्ये तालुक्यातील खासगी, अनुदानित माध्यमिक शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.

वीज वितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी अलंगुण येथून बारा ते पंधरा मैल पायपीट करून विद्यार्थ्यांनी कंपनीचे कार्यालय गाठत अधिकाऱ्यांसमोर समस्यांचा पाढा वाचला. तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू असून, दहा ते बारा दिवस वीज गायब असते. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करणे, वसतिगृहात रहाणे, अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, असे निवेदनात म्हटले आहे.

विद्यार्थ्यांच्या मागण्या

संपूर्ण तालुक्यात वीजपुरवठा सुरळीत करावा, सिंगल फेज योजना सुरू करावी, उंबरठाण येथील विद्युत उपकेंद्राचे काम त्वरित सुरू करून ते कार्यान्वित करावे, वीज वितरण कार्यालयातील रिक्त जागा भराव्यात, विजेचे जीर्ण खांब व वीजवाहक तारा बदलून नवीन टाकाव्यात आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार तथा उपजिल्हाधिकारी राजेंद्र कचरे, वीज वितरण कंपनीचे अभियंता यांना देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पर्यटन विकासासाठी सरकार बांधील’

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुका ही निसर्गाची खाण असून, निसर्ग बहरलेला आहे. पर्यटनाच्या माध्यमातून या तालुक्याचा जास्तीत जास्त विकास होण्यासाठी शासन बांधील राहील, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटनमंत्री जयप्रकाश रावल यांनी केले.
इगतपुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र कावनई येथे सिंहस्थ ध्वजारोहण रावल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार निर्मला गावित, आमदार योगेश घोलप, आखाड्याचे श्रीमहंत रामकिशोरदास शास्त्री, चतुःसंप्रदाय आखाड्याचे महंत कृष्णचरणदास, जगतगुरु द्वाराचार्य, डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर, दिगंबर आखाड्याचे महंत भक्तिचरणदास आदिंसह लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित शासनप्रतिनिधी व साधूसंत यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर कपिलधारा तीर्थक्षेत्री विधीवत गंगापूजन, जलपुजन व देवतापूजन करण्यात आले. यावेळी मंत्रांच्या जयघोष सुरू होता. त्यानंतर महाआरती करुन सिंहस्थ ध्वजाचे ध्वजावतरण रावल व साधू महंतांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कपिलधारा ट्रस्टच्या वतीने उपस्थित लोकप्रतिनिधी व साधू, महंत यांचा सिंहस्थ प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार हेमंत गोडसे म्हणाले की, नाशिकचा सिंहस्थ सोहळा हा राज्यस्तरीय, देशपातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवरचा भक्तीसोहळा म्हणून लवकरच मान्यता मिळणार आहे. केंद्रशासन त्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही गोडसे म्हणाले. सिंहस्थामुळे नाशिक जिल्ह्याचा देशभर लौकिक झाला असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी माजी जि. प. सदस्य जनार्दन माळी, काशिनाथ मेंगाळ, जि. प. सदस्य गोरख बोडके, उपसभापती पांडुरंग वारुंगसे, प्रांताधिकारी बाळासाहेब वाघचौरे, पर्यटन विभागाच्या प्रादेशिक अधिकारी प्रज्ञा मिसाळ, तहसीलदार अनिल पुरे, ज्ञानेश्वर लहाने, कार्यकारी अभियंता रमेश गावित, नगरसेवक केशव पोरजे, भाजपा नेते अशोक मुणोत आदि उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा तालुक्यांमध्ये होणार अग्न‌िशमन केंद्रे

0
0

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील चांदवड, कळवण, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, निफाड या तालुक्यांमध्ये अग्निशमन केंद्रे सुरू होणार आहेत.
राज्य सरकारने महाराष्ट्र अग्नी सुरक्षा अभियान राबवण्याचा निर्णय २००९मध्ये घेतलेला आहे. या अभियानातंर्गत ड -वर्ग नगर महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतीना अग्निशमन केंद्र व अग्निशमन वाहन घेण्यासाठी शासनाने अनुदान दिले. मात्र, नंतर स्थापन झालेल्या संस्थांचा अग्निशमन सुरक्षेत समावेश केला नव्हता. अग्निशमन केंद्र व वाहन असणे या स्थानिक संस्थांत गरजेचे असल्यामुळे राज्य शासनाने त्यांचा समावेश महाराष्ट्र अग्नी सुरक्षा अभियानात करुन घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा राज्यातील ड -वर्ग नगर महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींना होणार आहे. नाशिक जिल्ह्यात २००९ नंतर चांदवड येथे नगरपरिषद व कळवण, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, निफाड येथे नगर पंचायती स्थापन झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना फायदा होणार आहे.
नव्याने स्थापन झालेल्या नगर पंचायत व नगर परिषदा या अगोदर विविध समस्यांनी ग्रस्त आहेत. त्यांना अद्याप स्टाफही मिळाला नाही. त्यासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. मुख्याधिकाऱ्यांचा प्रश्नही कायम आहे. अशात हा निर्णय दिलासादायक आहे.
अग्निशमन केंद्र व वाहनासाठी शासनाकडून ७० टक्क्यांहून अधिक रक्कम दिली जाते. उर्वरीत रक्कम ही संबंध‌ित संस्थेला लोकवर्गणी म्हणून खर्च करावी लागते. त्यामुळे नव्याने स्थापन झालेल्या या नगर परिषद व नगरपंचायतींतील ही रक्कमही भरणेही अवघड जाणार आहे. त्यासाठी शासनाने १०० टक्के अनुदान दिल्यासच हे केंद्र उभारणे व वाहन घेणे सोपे जाणार आहे. ग्रामपंचायतीमधून नगर पंचायत व नगर परिषदेमध्ये गेल्यानंतर या संस्थांच्या सोयी व सुविधांमध्ये फारसा बदल झाला नाही. पण अग्निशमन केंद्र असणे ही गरजेची गोष्ट असल्यामुळे त्याचा फायदा या शहरांना होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा उत्पादकांना अनुदान द्या

0
0

सभापती केदा आहेर यांची मागणी

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये विक्रीस आणलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट ५०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे राज्य सरकारने अनुदान देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती केदा आहेर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. याबाबत आहेर हे मुख्यमंत्री, सहकार व पणनमंत्र्यांचीही भेट घेऊन शेतकऱ्यांची कैफियत मांडणार आहेत, असेही यात म्हटले आहे.

देवळा येथे नुकतीच याबाबत एका पत्रकार परिषदेत केदा आहेर यांनी ही माहिती दिली. याबाबत बोलताना सभापती केदा आहेर म्हणाले, एक महिन्यांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर कांद्याचे लिलाव चालू झाले असले तरी कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा पूर्णतः भ्रमनिरास झाला आहे. गेल्या चार वर्षांपासून गारपीट, बेमोसमी पाऊस, दुष्काळ यामुळे जिल्ह्यातील शेतकरी होरपळून निघालेला असताना मागील वर्षी झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करून कांद्याचे उत्पादन काढले होते. मात्र मोठ्या प्रमाणात कांदा चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्याला एक महिन्यांपासून व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये खुल्या व गोणी पद्धतीच्या लिलावाचा वाद निर्माण झाल्याने भावच नाही. तसेच बाजार समित्यांमधील कांद्याचे लिलाव पूर्णतः ठप्प झाले.

या सर्वपरिस्थितीत शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून कांद्याला सरासरी एक हजाराच्यावर प्रतिक्विंटल उत्पादन खर्च येत असताना ५०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने बाजार समित्यांमध्ये विक्रीस आणलेल्या कांद्याला सरसकट ५०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे अनुदान द्यावे, अशी मागणी पत्रकात शेवटी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हॉट्सअॅपमुळे अपघातग्रस्ताला मदत

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिन्नर फाटा

व्हॉट्सअॅपवरील मेसेजेकडे अनेकदा खोटे असल्याचे समजून दुर्लक्ष केले जाते. मात्र, व्हॉट्सअॅपवरील मेसेज संवेदनशील सदस्यांमुळे एखाद्याचा जीव वाचवू शकतो, याचा प्रत्यय नुकताच आला.

प्रेरणा एकता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संचालक व आदिवासी विकास विभागातील कर्मचारी विजय रूपवते यांचा अपघात झाला. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती त्यांच्या प्रेरणा संस्थेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर इतर सदस्यांना मिळाली आणि काही तासाच अपघातस्थळी धाव घेत त्यांच्या मित्रांनी मदत केली. या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून मित्रमंडळींनी जखमी रूपवते यांच्या वैद्यकीय उपचारासाठी तीन लाख रुपयांचा मदत निधीही उपलब्ध करून दिला. या मित्रांनी सिटी स्कॉनच्या रिपोर्टनुसार तत्काळ ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक आधार दिला. या ग्रुपच्या सदस्यांनी संपूर्ण रात्र रुग्णालयात जागून काढली. रूपवते यांना वैद्यकीय उपचारासाठी राज्यभरातून मदत उपलब्ध झाली. मित्रांच्या सहकार्यानेच त्यांना उपचारासह जीवदानही मिळाले.

गरजूंसाठी नेहमी पुढाकार

प्रेरणा एकता संस्थेचा समाजातील गरजूंना मदत करण्यासाठी नेहमी पुढाकार असतो. या संस्थेच्या सदस्यांत वकील, डॉक्टर्स, व्यावसायिक, नोकरदार, लेखापाल, सनदी लेखापाल आहेत. या संस्थेचे अध्यक्ष कैलास दराडे, सचिव शरद सोनवणे, सहसचिव विष्णू वारुंगसे, शाम घुगे, प्रकाश गायकवाड, साहेबराव सोनवणे, भगवान काकड, राजेंद्र सांगळे, अमित आडके, उदय गडकरी, राजेंद्र सानप, धनंजय कर्के, नितीन कंडारे आदींचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजेसमध्ये सर्रास प्रोजेक्ट पायरसी

0
0

स्वप्न‌िल देवकर, कॉलेज क्लब रिपोर्टर

अभ्यासक्रमातील प्रोजेक्टचे आऊटसोर्सिंग करण्याचा ट्रेंड शहरातील इंज‌िनीअरिंग कॉलेजांमध्ये पसरतो आहे. विद्यार्थ्याने स्वत:च्या सहभगाने करणे अपेक्षित असणारे प्रोजेक्ट चक्क २५ हजार रुपयांपर्यंतच्या रकमा भरून प्रोजेक्ट डेव्हलपर्सकडून तयार करवून घेतले जात असल्याचे वास्तव कॅम्पसमध्ये उघड झाले आहे.

शहरात इंज‌िनीअरिंग कॉलेजेसची संख्या मोठी आहे. पुणे विद्यापीठांतर्गत येणाऱ्या या अभ्यासक्रमात पदवीसाठी विविध प्रोजेक्टस असतात. या प्रोजेक्टला सुमारे २०० गुण देण्यात येतात. त्यामुळे अभ्यासक्रमात प्रोजेक्टचे महत्व विशेष आहे. वर्गात शिकलेल्या थिअरीनंतर विद्यार्थ्यांना त्या ज्ञानाचा प्रत्यक्षानुभव घेता यावा, यासाठी या प्रोजेक्टची रचना असते. मात्र कॅम्पसमध्ये सर्रास मार्केटिंग करणाऱ्या प्रोजेक्ट डेव्हलपर्स कंपन्यांना पायबंद घालण्याकडे इंज‌िनीअरिंग कॉलेजेसही काणाडोळा करत आहेत.

डेव्हलपर्सकडून मार्केटिंग

इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक गुणांना वाव मिळावा यासाठी अभ्याक्रमानुसार स्वतंत्र करावा लागतोे. अशा प्रकारच्या प्रोजेक्टसाठी अभ्यासक्रमात २०० ते २५० मार्कांची तरतूदही आहे. विद्यार्थांनी हे प्रोजेक्ट स्वतः बनवणे अपेक्षित असताना कमी वेळेत संपूर्ण काम होत असल्याने विद्यार्थी प्रायव्हेट प्रोजेक्ट डेव्हलपर्सकडे आकर्षित होताना दिसत आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवरही होत आहे. अशा प्रकारच्या डेव्हलपर्सकडून एका प्रोजेक्टसाठी तब्बल २५ ते ३० हजार रुपये घेतले जातात. कॉलेजच्या आवारातच विद्यार्थांना संपर्कासाठी व्हिज‌िटिंग कार्ड देखील देण्यात येते.

प्रोजेक्टचे काटेकोर परीक्षण व्हावे

इंज‌िनीअरिंगसारख्या महत्वाच्या विद्याशाखेत पायाभूत ज्ञान घेतानाच या प्रकारची पायरसी होत असेल तर ही कॉलेजेस देशाला कशा प्रकारचे मनुष्यबळ पुरवताहेत हे चित्र स्पष्ट होते. या प्रकारच्या प्रोजेक्ट पायरसीला आळा घालून गुणवान विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी गुणवंत आणि मेहनतीने प्रोजेक्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून होत आहे. या पायरसीला आळा घालण्यासाठी कॉलेजेसने या प्रोजेक्ट्सची समीक्षा अतिशय काटेकोरपणे करायला हवी अशी मागणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळ्यातील दोन शाळांना ‘आयएसओ’

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

देवळा येथील देवळा एज्युकेशन सोसायटी संचालित श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल व जिजामाता कन्या विद्यालय या दोघी शाळांना मानाचे आय.एस.ओ. मानांकन प्राप्त झाले असून एकच संस्थेच्या दोन विद्यालयांना एकाचवेळी मानाचे मानांकन मिळण्याची राज्यातील पहिलीच घटना आहे.

शालेय व्यवस्थापनाच्या कामकाजाबाबत मानाचा असलेला आय. एस. ओ. दर्जा प्राप्त करण्यासाठी जे निकष ठरवून देण्यात आले होते. ते सर्व पूर्ण करून श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल व जिजामाता कन्या विद्यालयाने आपल्या कार्याच्या जोरावर मानांकन यशस्वीरित्या मिळविले.

संस्थेच्या दोन्ही विद्यालयाच्या सुसज्य इमारतींबरोबरच सर्व सोयींनी युक्त क्रीडांगण, प्रयोगशाळा व कला विभागाचे कामकाज ठळकपणे दिसून आले. ग्रामस्थांना संदेश देणारा फलक विद्यालयाच्या दर्शनी भागात लावलेला असून दररोजचा दिनविशेष, थोर पुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी, प्रबोधनपर माहिती सादर केली जाते. या सर्व बाबींचा विचार करून मूल्यमापन समितीने दोन्ही विद्यालयांना एकाच वेळी आय. एस. ओ. मानांकन दिल्याची माहिती मुख्याध्यापक डी. ई. आहेर, मुख्याध्यापिका उषाताई बच्छाव यांनी दिली. यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी विशेष परिश्रम घेतले.

गुणवत्तेच्या निकषावर विद्यालयांसाठी देण्यात येणारा मानाचा आय. एस. ओ. मानांकनाचा दर्जा संस्थेच्या दोन्ही विद्यालयांनी पटकावून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. यासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे सर्व कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत.

- हितेंद्र आहेर, अध्यक्ष देवळा एज्युकेशन सोसायटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काश्यपी धरणग्रस्तांचे आज ‘करो या मरो’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रकल्पबाधित कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यासह अनेक मागण्यांची वर्षानुवर्षे दखल घेतली जात नसल्याने काश्यपी धरणग्रस्तांच्या संयमाचा बांध फुटला आहे. सरकार आणि प्रशासनाच्या निषधार्थ आजपासून (दि. १५ ऑगस्ट) काश्यपी धरणात सुमारे दोन ते अडीच हजार धरणग्रस्त बेमुदत जलसमाधी आंदोलनाला बसणार आहेत. ज‌िवाची पर्वा न करता मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा धरणग्रस्तांनी दिला असून, नाशिकमध्ये असणारे पालकमंत्री गिरीश महाजन या आंदोलनाची दखल घेणार की धरणग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.

जिल्ह्यात काश्यपी धरणाचे काम सुमारे २५ वर्षापूर्वी पूर्ण झाले. मात्र, धरणग्रस्तांना अजूनही त्यांच्या संपादित जम‌िनींचा मोबदला मिळालेला नाही. या धरणातील पाण्याचा सर्वाधिक लाभ नाशिक महापालिका क्षेत्रातील रहिवाशांना होतो. मात्र, अपेक्षित मोबदला न मिळाल्याने धरणग्रस्तांमध्ये आपल्यावर अन्याय झाल्याची भावना बळावली आहे. स्थानिकांना दरवर्षी ३० टक्के पाणीसाठा राखून ठेवण्यात यावा, महापालिका व पाटबंधारे विभागाने संयुक्तपणे केलेला काश्यपी धरणासंबंधीचा करारनामा पूर्ण करण्यात यावा, धरणग्रस्तांना धरणावर मत्स्य व्यवसाय करण्याचे अधिकार मिळावेत, त्यासाठी ठेक्या संबंधीचे शुल्क व अनामत रक्कमदेखील माफ करण्यात यावी आदी मागण्या सरकारदरबारी अनेक वर्ष प्रलंबित आहेत. संपादीत जमिनीचा विनाअट व विनाविलंब चालू बाजारभावाप्रमाणे मोबदला द्यावा, त्यांचे पुनर्वसन करावे अशा मागण्यासांठी काश्यपी धरणग्रस्तांनी वारंवार आंदोलने करूनही सरकारने त्याची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. त्यामुळेच त्यांनी जलसमाधीचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा प्रशासनाला दिलेल्या इशाऱ्यापमाणे १५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतीमध्ये ध्वजवंदन झाल्यानंतर सकाळी दहाला हे सर्व आंदोलक काश्यपी धरणाकडे कुटुंबियांसह धाव घेणार आहेत. तेथे धरणातील पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. देवरगाव, धोंडेगाव, काळूशी, वैष्णववाडी, खाडेचीवाडी, शिरपाडी येथील महिला, पुरुषांसह दोन ते अडीच हजार ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

आम्ही जिल्हाधिकाऱ्यांपासून राज्य सरकारपर्यंत सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, उपयोग झाला नाही. त्यामुळेच आता जलसमाधी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर धरणग्रस्त काश्यपीत उड्या मारतील. हे बेमुदत आंदोलन होईलच.

- यशवंत मोंढे, धरणग्रस्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षांची पळवापळव!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहराची मुख्य बाजारपेठ म्हणून पाहिल्या जाणाऱ्या रविवार कारंजा परिसरातील रिक्षाचालकांच्या येत असलेल्या तक्रारीनुसार शहर वाहतूक पोलिसांनी दोन दिवसात १६१ रिक्षाचालकांवर कारवाई केली. यापैकी २३ रिक्षा जप्त करण्यात आल्या तर सात रिक्षाचालकांवर सरकारवाडा पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहे.

रविवार कारंजा परिसरात रिक्षाचालकांच्या मक्तेदारीमुळे वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजतात. रविवार कारंजा परिसरात अनधिकृतपणे थांबा करून उभ्या राहणाऱ्या रिक्षाचालकांमुळे वाहतुकीची समस्या उग्र रूप धारण करीत आहे. शहर बसेसला वळण घेण्याइतकीही जागा मिळत नसल्याने वाहतूक कोंडी होते. अशोकस्तंभाकडून रविवार कारंजाकडे येणाऱ्या वाहनधारकांना रविवार कारंजावरील वळणावर रिक्षाचालकांच्या बेशिस्तीला सामोरे जावे लागत आहे. बहुतांश रिक्षाचालक भररस्त्यातच रिक्षा उभ्या करून प्रवासी भरण्याच्या कामात व्यस्त होतात. बसचालकांना तुच्छतेची वागणूक देणाऱ्या रिक्षाचालकांच्या मुजोरीमुळे अनेकदा बसचालक व रिक्षा व्यावसायिकांमध्ये वादाचे प्रसंग उभे राहतात. थांबा नसतांनाही अनधिकृतपणे रिक्षा रस्त्यात थांबवून त्यात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवण्याचा सपाटा रविवार कारंजावर सुरू असतो. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी शनिवारपासून याठिकाणी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत माहिती देताना वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गुरूनाथ नायडू यांनी सांगितले, की काही दिवसांपासून बेशिस्त रिक्षाचालकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे आम्ही खास मोहीम म्हणून ही कारवाई सुरू केली. शनिवारी काही तासातच पोलिसांनी ८० रिक्षाचालकांवर कारवाई केली. त्यापैकी संशयास्पद १७ रिक्षा जप्त करण्यात आल्या. त्यातील सात रिक्षाचालकांवर कलम २८३ चे उल्लंघन केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी सुटी असल्याने आरकेसह शहरात सर्वत्र गर्दी होते. त्यामुळे आम्ही सकाळपासूनच आरके परिसरातील बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई केल्याचे नायडू यांनी सांगितले. रविवारी देखील ८१ रिक्षावर कारवाई झाली. त्यापैकी ५ रिक्षा जप्त झाल्या असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी योग्य ते उपाय राबवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

१८ गुन्हे दाखल

रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून रहादारीस अडथळा आणल्याप्रकरणी शनिवारी दिवसभरात शहरातील पाच पोलिस स्टेशनमध्ये विविध वाहनचालकांविरोधात १८ गुन्हे दाखल करण्यात आले. यात, सरकारवाडा पोलिस स्टेशनमधील वरील सात गुन्ह्यांचा समावेश आहे. बेशिस्त वाहनचालकांविरोधात अंबड पोलिस स्टेशनमध्ये तीन, इंदिरानगरला दोन, सातपूरला पाच तर नाशिकरोडला एक गुन्हा दाखल झाला. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई व्हावी, या हेतून गुन्हे दाखल होत असून यापुढे ही प्रक्रिया आणखी गतीमान केली​ जाईल, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सेल अन् वाहतुकीचा बोजवारा

१५ ऑगस्टनिमित्त देण्यात येणाऱ्या विविध वस्तुवरील सवलती आणि त्यातच लागून आलेला रविवार यामुळे दिवसभर शहरातील रस्ते वाहनांनी खचाखच भरले होते. विशेषतः मोठ्या मॉलबाहेरील चित्र फार वाईट होते. खरेदीसाठी मॉलकडे जाणाऱ्या ग्राहकांच्या अस्ताव्यस्त पार्क झालेल्या वाहनांमुळे याठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या उद्भावली. सायंकाळी कॉलेजरोड, उंटवाडी तसेच गंगापूररोड परिसरात गर्दी झालेली पाहण्यास मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत नागपूरला विजेतेपद

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यस्तरीय ज्युनिअर आंतर-जिल्हा सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत नागपूरच्या संघाने पुण्यावर वर्चस्व राखत दोनही वयोगटातील अजिंक्यपद पटकावले. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या अंतिम सामन्यात थरारक खेळाचे प्रदर्शन झाले. दोनही गटात नागपूरच्या संघाने पाचपैकी शेवटचे २ सामने जिंकत विजेतेपद पटकावले. नाशिकचे प्रसिद्ध क्रीडा मानसशास्र तज्ज्ञ भीष्मराज बाम यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
१७ वर्षाखालील गटात खेळताना पुणे संघाने २-० अशी आघाडी घेतली होती. मात्र, नंतरचे तीनही सामने जिंकत नागपूरने धक्का दिला. एकेरीतील दोन सामने पुणे संघातील सोहम पाटील आणि पूर्वा बर्वे यांनी जिंकत संघाला आश्वासक आघाडी मिळवून दिली होती. मात्र, नागपूर संघाने चिवट खेळ करत दुहेरीत पुण्याची डाळ शिजू दिली नाही. मिश्र दुहेरीत रितिका ठाकर आणि गौरव मिथे यांनी प्रयत्नांची शर्थ करत संघाला विजयश्री मिळवून दिली.
१९ वर्षांखालील गटातही अटीतटीचे सामने झाले. याही गटात पुणे संघाने पहिले दोनही सामने जिंकले. मात्र, दुहेरीत पुण्याला लय सापडलीच नाही. नागपूरच्या संघातील खेळाडूंनी दुहेरीतील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. रोहन गर्बानी, सौरभ केऱ्हालकर, राशी लांबे, रितिका ठाकर यांनी नागपूरला विजय मिळवून दिला. शेवटचा व निर्णायक सामना तीन सेटपर्यंत खेळला गेला. रितिका आणि सौरभ यांनी मिश्र दुहेरीत चांगला खेळ करताना संघाला २१-१७, १९-२१, २१-१६ असा विजय मिळवून दिल्याने नागपूरला पुन्हा एकदा विजयाची चव चाखता आली.
नाशिकच्या १७ वर्षांखालील तसेच १९ वर्षांखालील संघांना उपांत्यफेरीत पराभवाचा सामना करावा लागला. दोन्ही गटात पुण्याच्या संघाने नाशिकला अनुक्रमे ०-३, १-३ असे पराभूत केले. १९ वर्षांखालील गटात नाशिकची राष्ट्रीय खेळाडू वैदेही चौधरीने एकमेव विजय मिळविला.
१७ वर्षांखालील गटात उपांत्यफेरीत पुण्याच्या संघाने पूर्ण वर्चस्व राखले. पुण्याच्या सोहम पाटीलने नाशिकच्या कौशल शिरुदेला २१-१७, २१-१२ असे पराभूत करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. दुसऱ्या सामन्यात शिल्पी पुसाडकरला पुण्याच्या पूर्वा बर्वे हिने २१-१५, २१-१८ असे सरळ सेटमध्ये नमवले. विजयाची तीच लय पुढे कायम ठेवत सोहम पाटील आणि सोहम नावंदर या जोडीने अधिप गुप्ता आणि अजिंक्य पाथरकर या जोडीला २३-२१, २१-१८, २१-१५ असे पराभूत करत सामना अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला.
१९ वर्षांखालील गटात नाशिकची वैदेही चौधरी व्यतिरिक्त कोणाचीही डाळ शिजली नाही. याही गटात पुण्याच्या संघाने ३-१ असा मोठा विजय प्राप्त केला. पुणे संघाच्या आर्य भिवपथकी याने नाशिकच्या तनय अखेगावकर याचा २१-७, २१-१२ असा धुव्वा उडवला. पुढील सामन्यात नाशिकची राष्ट्रीय खेळाडू वैदेही चौधरी हिने पूर्व बर्वेला २१-१५, २१-१४ असा विजय मिळवल्याने नाशिकने बरोबरी साधली. मात्र, पुण्याच्या संघाने पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध करत नाशिकच्या खेळाडूंना नामोहरम केले. अजिंक्य पाथरकर, हृष‌िकेश होले या जोडीला सोहम पाटील आणि तेजस देव या जोडीने २३-२१, २१-१६ असे पराभूत केले. तर अदिती कुटे आणि वैदेही चौधरी या बलाढ्य जोडीचे आव्हान अदिती काळे आणि पूर्वा बर्वे या जोडीने २१-१९, २१-१९ असे परतवून लावत संघाला अंतिम फेरीत पोचविण्यास मदत केली.
१७ वर्षांखालील उपांत्य फेरीत दुसऱ्या एका सामन्यात मुंबई उपनगर संघाला नागपूरने ३-१ असे पराभूत केले. एकेरीचे दोनही सामने नागपूरच्या रोहन गर्बानी आणि मालविका बनसोड यांनी जिंकल्याने नागपूरचा विजय सोपा झाला. तिसऱ्या सामन्यात मुंबईच्या अक्षय शेट्टी आणि वंश सिंघ या जोडीने नागपूरच्या गौरव मिथे आणि रोहन गर्बानी यांना पराभूत केल्याने मुंबईचे आव्हान जिवंत राहिले होते. मात्र मुलींच्या दुहेरीत मालविका बनसोडे आणि राशी लांबे या नागपूरच्या जोडीने विजय मिळवत संघाला अंतिम फेरी गाठून दिली.
१९ वर्षांखालील संघातही नागपूर संघाने वर्चस्व राखत थरारक झालेल्या सामन्यात ठाण्याच्या संघाला ३-२ असे पराभूत केले. ठाण्याकडे २-१ अशी आघाडी असूनही शेवटचे दोन्ही सामने जिंकत नागपूरने अंतिम फेरी गाठली. नागपूरच्या रितिका ठाकरने चमक दाखवत तब्बल तीन सामन्यांत सहभाग घेत सर्व सामने जिंकले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरी पाहुनी कळले मोठा झाला पाऊस!

0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

'मनात माझे नाव तुझ्या पण आग्रही नाही, तुझ्याएवढा पाऊससुद्धा लहरी नाही', 'किती दिसांनी घरी परतुनी आला पाऊस, सरी पाहुनी कळले मोठा झाला पाऊस' अशा एकापेक्षा एक सरस गझलांनी कुसुमाग्रज स्मारकातील सायंकाळ रंगत गेली. निमित्त होते, प्रथमेश क्रिएशन्स गोवानिर्मित 'जावे कवितांच्या गावा' आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी गझल मुशायऱ्याचे.

यावेळी प्रतिष्ठानचे कार्यवाहक मकरंद हिंगणे, लोकेश शेवडे, विनायक रानडे यांच्या हस्ते ज्येष्ठ गझलकार नासिर शेख, कमलाकर देसले, प्रशांत वैद्य आणि गौरवकुमार आठवले यांचा स्मृतिचिन्ह व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

पुढे गझलकारांनी आपल्या गझल पेश केल्या.

'दिशा कुठे शब्दात जमावासाठी होती, भाषणबाजी केवळ नावासाठी होती, पत्राचा मजकूर विनंतीने भरलेला, पण शेवटची ओळ दबावासाठी होती, वर्मावर खंजीर लागला तेव्हा कळले, पाठीवरची थाप सरावासाठी होती...' गोविंद नाईक यांनी सादर केलेल्या या गझलेने मुशायऱ्याची सुरुवात झाली. 'चिता पेटून गेल्यावर सभा भरणार असते, जिचे सौभाग्य गेले तीच फक्त रडणार असते, तिला आढ्याकडे बघणे जिवावर येत असते, धन्याची आठवण कारण तिला छळणार असते...' आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीचं भीषण वास्तव मांडणारी ही गझल संतोष वाटपाडे यांनी सादर केली. 'तिचा तो खास झाल्यावर मनाला त्रास झाल्यावर, कराव्या बंद आठवणी तिचा तो भास झाल्यावर, बियाण्यासारखा मृत्यू मलाही दे जरा देवा, किती आनंद होतो रे कुणाचा घास झाल्यावर...' आकाश कंकाळ या युवा गझलकाराने सादर केलेल्या या गझलेला सर्वांचीच वाहवा मिळाली. रेश्मा कारखानीस यांनी 'कोणता रे धर्म त्यांचा जात होती कोणती, माणसाला जाळणारी वात होती कोणती, वस्त्र बदलावे तसे बदलायचे ते नेहमी, सापही साशंक त्यांची कात होती कोणती...' ही गझल सादर केली. अनिल आठलेकर यांनी 'कोणाला दोष केव्हाही उगाचच देत नाही मी, इथे माझ्याच कामाला कधी येत नाही मी, उन्हाळे पावसाळेही जसे आले तसे गेले, सहज बिघडायला काही तुझी तब्येत नाही मी...' ही गझल सादर करत सभागृहात हशा पिकवला. 'जन्म एक मध्यरात्र वाटतो, मग तुला

स्मरून मी पहाटतो. ज्या पुढे उडून दाखवायचे, तोच आपली पतंग काटतो. विठ्ठला पुन्हा मला झपाट तू आणि मी पुन्हा तुला झपाटतो...' ही गझल वैभव कुलकर्णी यांनी सादर केली. प्रशांत वैद्य यांनी 'चारचौघींसारखी नाहीस तू, पाहिजे होते मला ते पीस तू, शोध माझ्या अंतरंगी घेशी तुझा, काय माझ्यासारखी झालीस तू...' ही गझल सादर केली. 'वरवरचा शुकशुकाट आहे, आत सईंचे चऱ्हाट आहे. भाग्य चालते रखडत माझे, स्वप्न धावते सुसाट आहे...' दत्तप्रसाद जोग यांनी निवेदनाबरोबरच ही गझल सादर केली. याचबरोबर पाऊस, दुष्काळ, राजकारण, प्रेम, तसेच रोमँटिक मूडमधील गझल यावेळी सादर झाल्या. या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन खेळाडू आज जाणार श्रीलंकेला

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिन्नर फाटा
श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथील महिंद्राराजे स्टेडियमवर १९ ते २२ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मास्टर अॅथलेटिक्स मर्कंटाइल चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या संघात निवड झालेले पांडुरंग ताजनपुरे, अतुल जंत्रे व नारायण वाघ हे तीन यंग सिनीयर्स खेळाडू आज (दि. १७ ) श्रीलंकेला रवाना होणार आहेत.
पांडुरंग ताजनपुरे हे चेहेडी येथील किराणा व्यावसायिक आहेत, तर अतुल जंत्रे हे सम्राट ग्रुप या बांधकाम कंपनीत स्टोअर किपर म्हणून नोकरीस आहेत. या स्पर्धेत सहभागी होत असलेले नाशिकचे तिसरे खेळाडू नारायण वाघ हे ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोकरीस आहेत. श्रीलंकेत होत असलेल्या मर्कंटाइल इंटरनॅशनल मीटमध्ये शंभर मीटर, पाच हजार मीटर धावणे व पाच हजार मीटर वॉकमध्ये ते सहभागी होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images