Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘त्या’ शिफारशी ठरणार संस्कृतसाठी लाइफ लाइन

$
0
0

Jitendra.tarte@timesgroup.com

नाशिक : प्राचीन कालखंडात भारतात देवभाषा असणारी संस्कृत आधुनिक कालखंडाशीही कशी सुसंगत आहे अन् याची आधुनिक विद्याशाखांशी सांगड घालण्यासाठी आगामी दहा वर्षांत काय करावे, याबाबत अॅक्शन प्लॅन देणारा अहवाल संस्कृत संवर्धनासाठी केंद्राने नेमलेल्या समितीने सरकारकडे सादर केला होता. केंद्राने हा अहवाल नुकताच स्वीकारला आहे. यामुळे त्या अहवालातील शिफारशी संस्कृत संवर्धनासाठी 'लाइफ लाइन' ठरणार आहेत.

केवळ कर्मकांडाच्या कोशात अडकलेल्या संस्कृत भाषेला पूर्णत: व्यवहारात (अप्लाइड सायन्स) आणण्यासाठी निर्वाचन आयोगाचे माजी अध्यक्ष एन. गोपाल स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली मनुष्यबळ नियंत्रण विभागाने (एचआरडी मंत्रालय) १३ सदस्यीय समिती नेमली होती. या समितीने देशाच्या शिक्षणव्यवस्थेतील संस्कृतसंदर्भात अभ्यास करून फेब्रुवारीमध्ये काही शिफारशींसह केंद्राला अहवाल सादर केला होता. हा अहवाल नुकताच केंद्र सरकारने स्वीकारला आहे. त्यामुळे देशस्तरावर संस्कृत जतन आणि संवर्धनाच्या दृष्टीने आशावादी पाऊल पुढे पडले आहे. आता या पुढील टप्प्यात सरकारच्या स्तरावरून प्राथमिक ते उच्च शिक्षणाच्या शैक्षणिक धोरणांमध्ये संस्कृतचा विविध अंगाने समावेश होण्याचा रस्ता मोकळा झाला आहे.

काय आहेत शिफारशी

देशातील सर्व राज्यांमधील शैक्षणिक मंडळांतर्गत येणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, विद्यापीठ अनुदान आयोगांतर्गतचे उच्च शिक्षण, एआयसीटीईसारख्या संस्थांमध्ये तांत्रिक स्तरावरील शिक्षणातही संस्कृतचा समावेश करण्याच्या शिफारशी आहेत. ठळक मांडण्यासारख्या शिफारशींमध्ये कुठल्याही शाखेच्या विद्यार्थ्याला संस्कृत विषय अभ्यासता यावा, संस्कृत भाषेतूनच संस्कृतचे शिक्षण देण्यात यावे, यासाठी आगामी चार वर्षांत देशात पाच लाख शिक्षकांना संस्कृत बोलण्याचे प्रशिक्षण दिले जावे, संस्कृत शिक्षणात ऑडिओ, व्हीडिओ, ऑनलाइन माध्यमे व तंत्रज्ञान वापरावे, फिजिक्स, केमिस्ट्री, गणित यांसारख्या आधुनिक विद्याशाखांमध्ये भारतीय ज्ञानातील संदर्भ समाविष्ट करावेत, उच्च शिक्षणात यूजीसीने देशस्तरावर संस्कृत संवादाचे उपक्रम विद्यापीठांमध्ये राबवावेत, या प्रकारच्या शिफारशी आहेत.

संस्कृतमध्येच लिहा संशोधन प्रबंध

आधुनिक ज्ञानशाखा आणि संस्कृतमधील संदर्भ यांची सांगड घालून इंटर डिसिप्लिनरी रिसर्चला संधी वाढावी, आधुनिक समाजाच्या समस्या संस्कृतच्या माध्यमातून सोडविण्याची संशोधनदिशा असावी, संस्कृतमधून संशोधनाचा प्रबंध लिहिण्याची सुविधा हवी यांसह वेदपाठशाळांचे संवर्धन व त्यांच्यासाठी योजनाही सुचविण्यात आल्या आहेत.


प्राचीन परंपरेला जोडण्याचे काम

संस्कृत आधुनिक विज्ञान नाकारत नाही. मात्र, या भाषेत प्राचीन अन् पुढारलेले विज्ञान, सामाजिक ज्ञान-भान दडले आहे. एन. गोपालस्वामी यांच्या समितीने केंद्राला सादर केलेले संस्कृतसंदर्भातील अहवाल प्राचीन ज्ञान-विज्ञान परंपरेला आधुनिक शाखांशी जोडणारा व स्वागतार्हच आहे.

- शिरीष भेडसगावकर, क्षेत्रीय संघटक, संस्कृत भारती (महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात राज्य)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मैत्रेयची १०० कोटींची परदेशात गुंतवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मैत्रेय कंपनीची परदेशातील मालमत्ता आणि गुंतवणूक पोलिसांनी शोधून काढली आहे. यामध्ये सर्वाधिक २३ मिलीयन डॉलर म्हणजे सुमारे १०० कोटी रुपये रक्कम अमेरिकेतील एका कंपनीत गुंतविल्याचे उघड झाले आहे. गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पोलिसांनी ही रक्कम इस्क्रो खात्यात वळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

अमेरिकेतील व्ही. जी. कबालो या कंपनीत मैत्रेयच्या संचालकांनी पैसे गुंतवले आहेत. पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या मार्गदशनाखाली नाशिक शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तपास करून ही मालमत्ता शोधून काढली आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यास मदत होणार आहे. एवढी मोठी रक्कम गुंतवणूही मैत्रये कंपनीच्या संचालकांनी याबाबत कोणतीही माहिती दिलेली नव्हती. सुमारे शंभर कोटीची ही गुंतवणूक इस्क्रो खात्यात वळविल्यास गुंतवणूकदारांचे पैसे परत करणे शक्य होणार आहे. मैत्रेय आतापर्यंत काही गुंतवणूकदारांचे पैसे परत केले आहेत. मात्र, अजूनही शेकडो गुंतवणूकदारांचे पैसे परत करणे बाकी आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मोक्का’ हटण्याचा संशयितांना विश्वास!

$
0
0

दोषारोपपत्राकडे लागली नजर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'टिप्पर' या कुख्यात टोळीतील सदस्यांसह पंचवटीतील परदेशी टोळीतील सदस्य कोर्टात दोषारोपपत्र दाखल होण्याची वाट पाहत आहेत. एकदा का हा तांत्रिक अडथळा दूर झाला की मोक्का कलम हटवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू होतील. राजकीय पक्ष कोणताही असो, सर्वच मदतीला येतील, असा विश्वास संशयितांना असून, याबाबत ते पोलिसांना उघड धमकीच देत आहेत.

शहरातील अंबड आणि पंचवटी पोलिस स्टेशन हद्दीतील दोन कुख्यात टोळ्यांमधील सदस्य सध्या मोक्का या प्रभावी कलमाखाली सेंट्रल जेलमध्ये बंद आहेत. टिप्परच्या दहापेक्षा जास्त सदस्यांवर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, लूट असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. दीड-दोन महिन्यापूर्वी या संशयितांना पोलिसांनी अपहरणाच्या गुन्ह्याखाली अटक केली. यानंतर त्यांच्यावर मोक्काचे कलम वापरण्यात आले. दुसरीकडे पंचवटीतील कुंदन परदेशीसह त्याच्या दहापेक्षा जास्त साथिदारांवर अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. प या दोन्ही टोळ्यांना राजकीय आश्रय देणाऱ्या नगरसेवक, तसेच कार्यकर्त्यांचा शोध पोलिस घेत आहेत. सुनील बागूल यांचा पुतण्या अजय यासदेखील संशयितांना मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली. सिडकोत पाच ते सहा नगरसेवकांची चौकशी झाली आहे. याशिवाय आणखी एका व्यक्तीस लवकरच अटक करण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. दरम्यान, मोक्का कलमानुसार अटक झालेल्या व्यक्तीविरोधात सहा महिन्यांच्या कालावधीत कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात येते. कोर्टात दोषारोपपत्र दाखल झाले की लागलीच संशयित हायकोर्टात धाव घेऊ शकतात. सध्या, मोक्का कलमानुसार सेंट्रल जेलमध्ये बंद असलेले संशयित दोषारोपपत्र कोर्टात दाखल होण्याची वाट पाहत आहेत. सर्वच राजकीय पक्ष आमच्या सोबत असतात. काहीही झाले तरी मोक्काचे कलम रद्द होईल, असा विश्वास संशयितांना वाटतो. तशी उघड धमकीच संशयित वेळोवेळी पोलिसांना देत आहेत. याबाबत बोलताना एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, कोर्टात दाद मागणे हा संशयिताचा अधिकार आहे. त्यानुसार त्यांनी प्रयत्न केले, तर पोलिसांची हरकत नाही. मात्र, संशयितांना कोणत्याही व्यक्तीने विशेषतः राजकारणी व्यक्तीने मदत केल्याचे समोर आले, तर पोलिस संबंधितांविरोधात कडक कारवाई करतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वस्त धान्य दुकानदार बॅकफूटवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वस्त धान्य दुकानदारांचे परवाने रद्द करण्याचा टोकाचा इशारा जिल्हा पुरवठा विभागाने दिल्याने जिल्हाभरातील अनेक स्वस्त धान्य दुकानदार बॅकफूटवर येऊ लागले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ७१२ दुकानदारांनी धान्य उचल करण्याची तयारी दर्शवली असून, त्यासाठी रीतसर चलनही फाडले आहे. शहरातील बहुतांश रेशन दुकाने खुली होणार असली तरी पेठ, त्र्यंबकेश्वर आणि सुरगाण्यातील दुकानदार मात्र संपावर ठाम आहेत.

दुकानदारांना किमान ३५ हजार रुपये मानधन द्यावे, हमाली रद्द करून थेट स्वस्त धान्य दुकानापर्यंत माल पोहोचवावा, कारकूनी कामे दुकानदारांवर लादू नयेत, कमिशनमध्ये वाढ करून द्यावी यांसह काही मागण्यांसाठी स्वस्त धान्य दुकानदार संघटनांनी संपाचे हत्यार उपसले आहे. १ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या संपामुळे जिल्हा पुरवठा विभागापुढील अडचणी वाढल्या आहेत. स्वस्त धान्य दुकानदारांनी १० ऑगस्टपर्यंत धान्याची उचल केली नाही, तर दुकानदारांचे परवाने रद्द करण्याचा इशारा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिल्याने आता चलन भरण्यास दुकानदारांचा प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यामुळे संपात फूट पडली असून, शहरातील २३० पैकी २०० दुकानदारांनी चलन भरले आहे. जिल्ह्यातील ७११ दुकानदारांनी चलन फाडत संपातून माघार घेतली आहे. जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाण्यातील दुकानदारांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाच मागणाऱ्या तलाठ्याविरोधात अॅन्टी करप्शनची कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महसुली रेकॉर्डला नोंद घेऊन सुधारित ७/१२ उतारा देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठ्याविरोधात अॅन्टी करप्शन ब्यूरोने गुन्हा दाखल केला आहे.

मनोज देवीदास मोरे असे संशयित तलाठ्याचे नाव असून, तो त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे सजा येथे कार्यरत आहे. एसीबीकडे आलेल्या तक्रारदाराच्या आजोबाने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गोरठाण येथील शेत गट नंबर १०९ मधील ७८ आर ही शेतजमीन खरेदी केली आहे. त्याप्रमाणे महसुली रेकॉर्डला नोंद घेऊन तक्रारदाराच्या आजोबाच्या नावे सुधारीत ७/१२ उतारा मिळावा, यासाठी तक्रारदाराने मोरे यांची भेट घेतली. मात्र, मोरेने तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची मागणी केली केली. सर्व व्यवस्थित असताना दोन हजार का, द्यायचे असा प्रश्न उपस्थित झाल्याने तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार २३ मार्च २०१६ रोजी एसीबीने सापळापूर्व पडताळणी केली. त्यात, मोरेने दोन हजार रुपये रक्कमेची मागणी केल्याचे सिध्द झाले. या पार्श्वभूमीवर तक्रारदाराला पैसे देण्यासाठी पाठवून एसीबीने मोरेच्या कार्यालयात सापळा रचला. मात्र, तू सुधारीत उतारा घेऊन जा मी तुला दोन दिवसांनी कॉल करतो, तेव्हा तू ये, असे सांगत मोरेने पैसे स्वीकारले नाहीत. तक्रारदार उतारा घेऊन तेथून निघून गेला. यानंतर एसीबीने मोरेला जेरबंद करण्यासाठी अनेकदा सापळे रचले. मात्र, मोरेने पैसे स्वीकारलेच नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहराची पाणी कपात रद्द

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाऊस लांबल्याने नाशिक जिल्ह्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच बहुतांश धरणे कोरडी पडल्याने पाण्याचा प्रश्न बिकट होऊ लागला होता. त्यात गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी सोडावे लागल्याने नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अवघा सहा ते सात टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने जिल्ह्यातील धरणे भरली असून, शहरात होणारी पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे महापौर अशोक मुर्तडक यांनी सांगितले.

शहरातील अनेक भागात कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा आता पूर्ण दाबाने होणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात कमी प्रमाणात पाणीसाठा शिल्लक असल्याने महापालिकेने ऑक्टोबर २०१५ पासून १५ टक्के पाणी कपात करण्यात सुरूवात केली होती. त्यानुसार आठवड्यातून एक दिवस म्हणजे गुरूवारचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यानंतर ही कपात रोजची ३० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली. शहराच्या काही भागात दोन वेळ होणारा पाणीपुरवठा रद्द करुन एक वेळ करण्यात आला होता. त्याच प्रमाणे बांधकामासाठी लागणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. व्यावसायिक पाणी वापरावर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादण्यात आले होते. गेल्या आठवड्यात गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरणात मुबलक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे महापालिकेतर्फे घेण्यात आलेला पाणी कपातीचा निर्णय रद्द करण्यात आला असून, १५ ऑगस्टपासून शहरवासियांना दोनवेळ पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होणार आहे. दरम्यान, शहरातील अनेक पाणीटाक्यांवर असलेल्या व्हॉल्वमनच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. कपात रद्द झाल्याने त्यांना मुळ जागी येण्यास दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. १५ ऑगस्टपासून सर्व विभागात पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा अंदाज महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बागायतीसह खरीप पिकांचे नुकसान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

देवळालीसह नाशिकमध्ये झालेल्या तुफान पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकरीवर्गाचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून महसूल विभागाकडून या पिकांची पाहणी करून पंचनामे करण्याची प्रक्रिया तहसील स्तरावर सुरू झाली आहे.

नाशिक तालुक्यात एकूण २७,०५३ हेक्टर सरासरी क्षेत्र लागवडीखाली आहे. यात गतवर्षी अंतिम पेरणी झालेल्या आकडेवारीप्रमाणे २५,६५४ हेक्टर परिसरात खरीप पिकांच्या पेरण्या करण्यात आल्या होत्या. मात्र यंदा हे क्षेत्र कमी झाले असून त्यामध्ये १९,०६४ क्षेत्रात खरीप पिकांची लागवड झाली. याशिवाय शेतकरी वर्गाने जून महिन्यात लावलेल्या फ्लॉवर, कोबी, टोमॅटो, कोथंबीर, कारले यांसह ढोबळी मिरची अशा बागायती पिकांसह बऱ्याच खरीप (जिरायती) पिकांचे या पावसाने नुकसान झाले. पावसाचे पाणी शेतात साचून राहिल्याने भाजीपाला पिकांचे सर्वाधिक नुकसान झालेले आहे.

याबाबत तहसील मंडळाच्या वतीने पिकांचे पंचनामे करण्याचे काम सलग सुरू आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी यासाठी अधिक कुमक मागवून पंचनामे करण्याचे आश्वासन दिले. यामुळे आता पर्जन्यग्रस्त पिकांचे पंचनामे आता लवकरात लवकर होतील व झालेल्या नुकसानी शेतकऱ्यांना भरून मिळतील या आशेने बळीराजा आता केवळ पीकपहाणी करून पंचनामे करण्यासाठी आटापिटा करीत असल्याचे दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जिल्हा बदल’च्या फाइल्स पेंडिंग

$
0
0

जिल्हा बदल करू इच्छिणाऱ्यांना 'वेट अँड वॉच'

म. टा. प्रतिनिधी, सिन्नर फाटा

नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील प्राथमिक शाळांतील शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया चालू शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच दि. ९ जूनपर्यंत पूर्ण केली आहे. तरी जिल्हा बदलीच्या फायलींवर मात्र अद्यापही निर्णय झालेला नसल्याने जिल्हा बदल करू इच्छिणाऱ्या शिक्षकांवर वेट अँड वॉचची वेळ आली आहे.

चालू शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्हातंर्गत शिक्षक बदल्यांची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून प्राथमिक शिक्षकांना दिलासा दिला होता. या प्रक्रियेत अनुसूचित जाती प्रवर्गातील २००, भटक्या विमुक्त (ड) या संवर्गातील ३० व मागास संवर्गातील १५ अशा एकूण २४५ प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदल्या झाल्या होत्या. परंतु जिल्हा बदल गटातून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला प्राप्त प्रस्तावांत शेजारील अथवा इतर जिल्ह्यांतून नाशिक जिल्ह्यात बदलीचे प्रस्ताव आहेत. सर्व प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून चालू आठवड्यात शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी दिली. जिल्हा बदल प्रस्तावांच्या मान्यतेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने चालू आठवड्यात असे प्रस्ताव दाखल केलेल्या शिक्षकांची प्रतीक्षा आता संपणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘ईपीएस पेन्शनधारकांचा लढा तीव्र करणार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निवडणुकीपूर्वी सरकारने पेन्शन वाढवण्याबाबत आश्वासन दिले होते; मात्र ते पाळलले नाही. त्याबाबत पेन्शनधारकांच्या वतीने लढा तीव्र करणार असून वेळप्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

ईपीएस पेन्शनधारकांची बैठक संघटनेच्या कार्यालयात नुकतीच झाली. अध्यक्षस्थानी सुधाकर गुजराथी होते. इपीएस ९५ चे अंतर्गत येणारे सर्व पेन्शनर यांना सध्या मिळणारी पेन्शन अत्यंत तुटपूंजी आहे. आताच्या महागाईच्या काळात ते परवडणारी नाही. त्यामुळे पेन्शनधारकांची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पाळलेले नाही. त

्यामुळे ही परिस्थिती उद्भ‍वली आहे. या प्रश्नाच्या संदर्भात सरकारने खासदार भगतसिंग कोशियारी यांची समिती नेमली होती. त्या समितीने अल्पशी वाढ सुचवली. परंतु, त्याची देखील अद्याप अमलबजावणी झालेली नाही. तरी ही पेन्शनवाढ ताबडतोब लागू करावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. पेन्शनवाढ लागू झाली नाही तर लढा अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही या बैठकीत देण्यात आला. बैठकीस राजू देसले, डी. बी. जोशी, सुभाष काकड, नारायण कुलकर्णी यांनी विचार प्रकट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालाजी कोट परिसरात घरफोडी

$
0
0

बंद घराचे कुलूप तोडून २० हजार रुपये किमतीच्या तांब्या-पितळेच्या भांड्यांची चोरी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बालाजी कोट येथील गायधनी वाड्यातील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे २० हजार रुपये किमतीची तांबे पितळची भांडी चोरून नेली. याप्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील एका संशयिताविरूध्द सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रभाकर देवीदास घाडगे असे संशयिताचे नाव आहे.

याप्रकरणी तारवालानगर येथे राहणाऱ्या अमोल गायधनी यांनी तक्रार दिली आहे. गायधनींच्या तक्रारीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील धानोरा माळशीद येथे राहणारा संशयित काही दिवस गायधनीच्या वाड्यात भाडेकरू म्हणून वास्तव्यास होता. ३ ते ६ ऑगस्ट दरम्यान संशयिताने वाड्यातील बंद घराचे कुलूप तोडून घरातील तांब्याचे निरंजनी, ताट, घडवे, पळ्या, पंचपात्री व संसारोपयोगी तांबे पितळाचे भांडे चोरी केले. या चोरीप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास उपनिरीक्षक उबाळे करीत आहेत.

विद्युत मोटार पाइपची चोरी

कारागृह वसाहतीतून विद्यूत मोटार व पाईप लाईन चोरीस गेल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जेल वसाहत येथे राहणाऱ्या दत्तात्रय त्र्यंबक अचपाळे यांनी याप्रकरणी तक्रार दिली. कारागृह वसाहतीतील हनुमान लाईन येथे ठेवलेली सुमारे २०,९७८ रूपये किंमतीची इलेक्ट्रिक मोटार आणि २४० फूट लांबीचे एचडीइपी पाइप चोरी जाण्याची घटना ४ ते ६ ऑगस्ट दरम्यान घडली. याप्रकरणी पुढील तपास हवालदार आहेर करीत आहेत.

तरुणाची आत्महत्या

सिडकोतील लेखानगर भागात राहणाऱ्या २९ वर्षीय तरुणाची आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. ७) दुपारी उघडकीस आली. तरूणाच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. अमजद आमीन पठाण (वय २९) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. इंदिरागांधी वसाहत येथे राहणाऱ्या अमजदने रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून गळफास लावून घेतला. याप्रकरणी अंबड पोलिसांनी आकमास्त मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास हवालदार उघडे करीत आहेत.

तीन दुचाकी चोरी

शहर परिसरातील तीन दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्यात. पंचवटीतील त्रिकोणी बंगला येथील अनर्व सोसायटीत राहणाऱ्या विशाल नथू सूर्यवंशी यांची पॅशन (एमएच १५ एक्यू १२९१) घराजवळून चोरट्यांनी लंपास केली. ही घटना ३० जून रोजी घडली असून याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. याचा अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत. वाहनचोरीची अन्य एक घटना आडगाव शिवारात घडली. समर्थनगर परिसरात राहणारे संदीप नामदेव होळकर यांची हिरोहोंडा (एमए १५ एफडी ०८७१) चोरट्यांनी बुधवारी (दि. २७ जुलै) रोजी रात्रीच्या सुमारास चोरी केली. घराच्या पार्किंगमध्ये दुचाकी लावलेली होती. यानंतर, उंटवाडी रोडवरील संभाजी चौकात वाहनचोरांनी दुचाकीवर हात साफ केला. डिजीपीनगर येथील आदित्य राजेंद्र खैरनार यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. २७ जुलै रोजी दुपारच्या सुमारास खैरनार संभाजी चौकात गेले होते. यावेळी गुलमोहर हॉटेल येथे दुचाकी (एमएच १५ एएफ २२२५) उभी केली. मात्र, खैरनार परत येईपर्यंत चोरट्यांनी सदर दुचाकी चोरी केली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ आता आस मदतीची

$
0
0

९० टक्के पंचनामे पूर्ण; मदतीचा प्रस्ताव सरकारला पाठविणार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गत आठवड्यात गोदावरीला आलेल्या पुरामूळे नदीकाठचे रहिवासी आणि व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले असून, पंचनाम्यांचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत. शहरात तीन दिवसांत ३ हजार २६४ स्थळांसह ९० टक्के पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. उर्वरित पंचनामे लवकरच पूर्ण करून मदतीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारकडून मदत कधी मिळते याकडे आता पूरग्रस्तांचे लक्ष लागले आहे.

ऑगस्टच्या पहिल्या सप्ताहात गोदावरीला महापूर आला. पावसाचा जोर आणि गंगापूर, दारणासह अन्य काही धरणांमधून सुरू असलेला पाण्याचा विसर्गामुळे पंचवटी परिसरासह नदीकाठची बाजारपेठ अक्षरशः पाण्याखाली गेली. नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांचे अतोनात नुकसान झाले. अनेकांचे संसार या पुरात वाहून गेले. अशी शेकडो कुटुंब पुरामुळे रस्त्यावर आली आहेत. विशेष म्हणजे सराफ बाजार, भांडी बाजार, दहीपूल, गोदाकाठ आणि पंचवटीच्या बऱ्याचशा परिसरात पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे लवकरात लवकर पूर्ण व्हावेत यासाठी दहा पथके स्थापन करण्यात आली. प्रत्येक पथकात महसूलचे तीन, महापालिका आणि पोलिसांचे प्रत्येकी दोन कर्मचारी आहेत. त्यासाठी मालेगाव, चांदवड, बागलाण, येवला, नांदगाव या तालुक्यांमधील महसूल खात्यातील तलाठी, मंडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. पंचनाम्यांचे काम पूर्ण होत आल्याने नाशिक तालुक्याबाहेरील तलाठी रविवारी सायंकाळी त्यांच्या कार्यस्थळी रवाना झाले. पंचनामे करणाऱ्या पथकांकडून देण्यात येणारा अहवाल वस्तुस्थिती दर्शक असावा, त्यावर बाधित व्यक्तींची स्वाक्षरी असावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. संबंध‌ित ठिकाणचे फोटो, व्हीडीओ शुटिंग करणे सक्तीचे होते. याबाबतच्या आदेशाची प्रत उपजिल्हाधिकारी उदय किसवे, प्रदीप भोये, दिपमाला चौरे, तहसीलदार गणेश राठोड यांसह महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पाठविल्या होत्या.

७ ऑगस्टपर्यंत पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पथकांना दिले होते. सोमवारपर्यंत ९० टक्के पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती नाशिक तहसील कार्यालयातून मिळाली. पंचनाम्याशिवाय त्यांनाही संबंधित विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळत नसल्याने त्यांचे पंचनामे प्राधान्याने करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिल्लीत महाराष्ट्राचे ‘वैभवदर्शन’!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नवी दिल्लीतील कुतूब परिसरात शिवाजी महाराज मेमोरियल राष्ट्रीय समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय वस्तू संग्रहालय साकारले जात आहे. त्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढलेले महाराष्ट्रातील गड-किल्ले व शिवकालीन वास्तुंचे फोटो असणार आहेत.

समितीचे सचिव व माजी केंद्रीयमंत्री विजय नवल-पाटील यांनी हे फोटो भेट दिल्याबद्दल ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी त्यांची मुंबईत मातोश्रीवर भेट घेतली. त्यांना शिवकालीन सुवर्णमुद्रा भेट दिली. समितीने प्लॅस्टिकमुक्त महाराष्ट्र अभियान सुरू केले आहे. त्यानिमित्त ठाकरे यांना कापडी पिशवी देण्यात आली. यावेळी मंत्री दादा भुसे, आमदार योगेश घोलप, विजय करंजकर, हर्षवर्धन बोऱ्हाडे आदी उपस्थित होते. महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, बिहार, उत्तरांचल, दिल्ली आदी सात राज्यात या समितीचे ४० सदस्य कार्यरत आहेत. माजी मुख्यमंत्री मोतीलाल व्होरा हे समितीचे अध्यक्ष आहेत.

नाशिककरांचा खारीचा वाटा

दिल्लीतील संग्रहालयात पुरातन नाणी, शस्त्रास्त्रे, शिवमुद्रा, तसेच शिवकालीन जहाज, घोडे आदी वस्तुंची प्रतिकृती तसेच उद्धव ठाकरेंनी काढलेल्या फोटोंचा समावेश असणार आहे. नाशिककरांचेही योगदान वस्तु संग्रहालयासाठी मिळत आहे. विजय नवल-पाटील हे नाशिकच्या शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांकडून वस्तू संग्रहालयासाठी काही वस्तू तयार करून घेत आहेत. नाशिकमधील २२ शिक्षक व त्यांचे विद्यार्थी हे काम करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात स्वच्छतेसाठी २४ तास पाणीपुरवठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे बहुतांश भागात पाणी साचले होते. हे पाणी ओसरताच बहुतांश भागात गाळ साचला आहे. हा गाळ काढण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून अशा भागांमध्ये चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असल्याची माह‌िती महापौर अशोक मुर्तडक यांनी दिली.

अनेक ठिकाणी गाळामुळे रस्त्याने चालणे अवघड झाले आहे. नदीकाठच्या घरांमध्ये गाळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा गाळ काढण्यासाठी पाण्याची आवश्यकता असल्याचे लक्षात घेऊन या परिसरामध्ये २४ तास पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. जोपर्यंत परिसर स्वच्छ होत नाही तेथील स्वच्छता निरीक्षक परिसर स्वच्छ झाल्याचा अहवाल वरिष्ठांना देत नाही तोपर्यंत २४ तास पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नागरिकांनी जलदगतीने पालिकेच्या स्वच्छता मोह‌िमेत सहकार्य देऊन आपला परिसर गाळमुक्त करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओझरला लवकरच येणार इजिप्तची फळे

$
0
0

शुक्रवारी कार्गो विमानात होणार वाहतूक

bhavesh.brahmankar@timesgroup.com

नाशिक : ओझर येथून शेळ्या-मेंढ्यांची शारजा येथे कार्गो विमानाद्वारे थेट निर्यात सुरू झाल्यानंतर आता ओझर येथे इजिप्तच्या फळांची आयात होणार आहे. येत्या १२ ऑगस्टच्या शेळी निर्यातीसाठी शारजा येथून येणाऱ्या कार्गो विमानात ही फळे येण्याची दाट चिन्हे आहेत. आयात आणि निर्यात या दोन्हींमुळे ओझर येथील कार्गो सेवा आणखी गतिमान होणार आहे.

ओझर येथून गेल्या १५ जुलै रोजी शेळ्यांची शारजा येथे कार्गो विमानाद्वारे निर्यात सुरू झाली. आता या सेवेला अधिक बळ मिळत असल्याचे दिसून येत आहे. युक्रेनच्या कार्गो विमानाद्वारे ओझर ते शारजा ही कार्गो वाहतूक होत आहे. सद्यस्थितीत ओझरला येणाऱ्या कार्गो विमानात कुठलीही मालवाहतूक होत नाही. त्यामुळे ओझरहून निर्यातीसाठीचा खर्चही वाढत आहे. शारजाहून ओझरला काही उत्पादनांची आयात झाली, तर हा वाहतूक खर्च कमी होणार आहे. आता त्यादृष्टीने सकारात्मक बाब समोर आली आहे. शारजा, दुबई आणि अन्य आखाती देशांमधून इजिप्तची विविध प्रकारची फळे जगाच्या बहुतांश भागात जातात. यातील काही फळे भारतातही येतात. मुंबई येथे कार्गो विमानाद्वारे ही फेळ सध्या येत आहेत. हीच फळे ओझर येथे कार्गो विमानाद्वारे आणण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळेच येत्या १२ ऑगस्ट रोजी शेळ्यांच्या निर्यातीसाठी येणाऱ्या कार्गो विमानात ही फळे येणार आहेत. त्यासाठीची चाचणी सध्या सुरू आहे. ही फळे आणण्यात किती खर्च येतो, यंत्रणांचे सहकार्य आणि अन्य बाबी कशा पद्धतीने पार पडतात यावर या फळांची आगामी आवक अवलंबून असणार आहे. मुंबईपेक्षा ओझर येथे नक्कीच कमी खर्चात ही फळे येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तसे झाले तर येत्या काळात फळांची आयात ओझर येथे होऊ शकणार आहे. तसेच, मुंबई येथील जवाहरलाल नेहरू बंदराच्या ठिकाणाहून समुद्रमार्गे होणारी शेळ्या-मेंढ्यांची निर्यात ओझरहून कार्गो विमानाद्वारेच होऊ शकेल.

१५०० शेळ्या रवाना

सोमवारी (८ ऑगस्ट) ओझर येथून युक्रेनच्या कार्गो विमानात १५०० शेळ्या-मेंढ्यांची निर्यात झाली. १५६ मेंढ्या आणि १३४४ शेळ्या संध्याकाळच्या सुमारास शारजाला पोहचल्या आहेत. आता यापुढील निर्यात १२ ऑगस्ट रोजी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकला भाविक कमी, अन् पोलिसच जास्त!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे भाविकांसह पर्यटक चांगलीच गर्दी करतात. मात्र आज, श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असतानाही भाविकांची अपेक्ष‌ित गर्दी नव्हती. राज्यातील पूरपरिस्थ‌ितीचा हा परिणाम असल्याचे भाविकांनी सांगितले. दरवर्षीप्रमाणे यंदाही गर्दी होणार असे वाटल्याने येथे मोठा पोलिस बंदोबस्त होता. मंदिर परिसरात भाविक कमी आणि पोलिसच जास्त असे चित्र दिसत होते.

त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथे पुराच्या बातम्यांनी भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सोमवारच्या तुलनेत रविवारची गर्दी अधिक होती. पोल‌िस बंदोबस्त अधिक असल्याने भाविक कमी आणि पोल‌िस जादा असेच चित्र पाहावयास मिळाले होते. सोमवारी दुपारच्या पालखीनंतर आलेले भाविक परतण्यास सुरुवात झाली होती. ब्रह्मगिरी प्रदक्षिणेस देखील विशेष गर्दी नव्हती.

आधीच गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाला तोंड देत असल्याने व्यापारी, व्यावसायिक ग्राहकांच्या प्रतीक्षेत होते. मात्र पहिल्या सोमवारी गर्दी कमी असल्याने त्यांचाही चांगलाच हिरमोड झाला. आता येत्या सोमवारी तरी गर्दी वाढेल, अशी आशा त्यांना लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जबाब देण्यासाठी माझ्यावर दबाव

$
0
0

ईसीपी कंपनीचे गोवर्धनदास लालवाणी यांची साक्ष

म. टा. वृत्तसेवा, धुळे

घरकुल प्रकरणात जबाब देण्यासाठी माझ्यावर दबाव असल्याचे ईसीपी कंपनीचे कर्मचारी गोवर्धनदास लालवाणी यांनी मंगळवारी, धुळ्यातील विशेष न्यायालयात सांगितले. या कंपनीला घरकुले बांधण्याचा ठेका खान्देश बिल्डर्सकडून देण्यात आला होता.

जळगाव नगरपालिकेतील घरकुल घोटाळ प्रकरणी सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील निर्मलकुमार सूर्यवंशी व अॅड. प्रवीण चव्हाण यांच्याकडून ईसीपी कंपनीचे कर्मचारी गोवर्धनदास नारायण लालवाणी यांना साक्षीदार म्हणून न्यायालयात हजर करण्यात आले, मात्र लालवाणी यांनी न्यायालयात सांगितले की, जबाब देण्याबाबत माझ्यावर दबाब असल्याने वकील लावण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती जळगाव येथील अॅड. सुधीर कुळकर्णी यांच्यातर्फे अर्जाद्वारे विशेष न्या. आर आर कदम यांच्याकडे केली. त्यावर सरकार पक्षाची बाजू ऐकून घेत जिल्हा विशेष न्या. कदम यांनी साक्षी दरम्यान वकील घेण्याची मंजुरी लालवाणी यांना दिली. परंतु, वकील केवळ त्यांच्याबरोबर उपस्थित राहतील. ते कामकाजात हस्तक्षेप करू शकणार नाही, अशीही सूचना न्यायालयाकडून करण्यात आली. आजच्या कामकाजात मनपाचे तत्कालीन आयुक्त प्रकाश बोखड यांची सरतपासणी व उलटतपासणी झाली.

वकिलांमध्ये वाद

सरतपासणीच्या वेळी विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण हे मनपाचे तत्कालीन आयुक्त प्रकाश बोखड यांची साक्ष नोंदवत असताना त्यांच्या पाठीमागे आरोपीचे वकील जितेंद्र निळे उभे राहून कागदपत्र पाहत होते. त्यांना उद्देशून अॅड. चव्हाण यांनी हरकत घेतली. त्यावर अॅड. निळे यांनी मी कुठे उभे राहावे, हे सांगणारे तुम्ही कोण?, असा प्रश्न केल्याने दोघांमध्ये शाब्दीक चकमक उडाली.

न्यायालयाकडून कडक समज

सोमवारी सायंकाळी संशयित आरोपी सुरेश जैन यांची सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट घेतली होती. त्यासंदर्भात विविध वृत्तपत्रात छापून आलेल्या बातम्या सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी न्यायालयास दाखवून आरोपींचे हे कृत्य चुकीचे असल्याचे सांगितले. त्यावर न्यायालयाने पोलिसांना विचारणा केली, मात्र दररोज बंदोबस्तावरील पोलिस बदलत असल्याने त्याबाबत आपल्याला काही माहिती नाही, असे न्यायालयातील उपस्थित पोलिसांनी सांगितले. संपूर्ण कामकाजाच्या वेळी आरोपी व पोलिसांनी न्यायालयात उपस्थित राहावे, अशी सूचना विशेष न्या. कदम यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुहेरी हत्याकांड प्रकरणी तपासाला गती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकरोड येथील रोकडोबावाडीत रविवारी मध्यरात्री गुलाब शेख आणि अकबर शेख या युवकांचा खून झाला होता. त्यांचा मित्र संदीप जैन याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचे गूढ उकलण्यासाठी उपनगर पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. त्यांनी तीन पथके नेमली असून, ती वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली आहेत. पोलिसांनी मंगळवारी परिसरातील सुमारे २५-३० जणांची चौकशी केली.

गुलाब व अकबर शेख या दोघांच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. उपनगर पोलिस ठाण्यावर त्यांनी मोर्चाही काढला होता. रात्री उशिरा पोलिसांना शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर त्यांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. तपासाचे कोणतेही धागेदोरे नसल्यामुळे मुख्य साक्षीदार संदीप जैन हाच पोलिसांचा मुख्य आधार आहे. तथापि, त्याने अद्याप आवश्यक माहिती दिलेली नाही. त्यामुळे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे. घटना किचकट असली तरी आव्हान स्वीकारले असून, गुन्हेगार लवकरच पकडले जातील, असा आशावाद पोलिस उपयुक्त श्रीकांत धिवरे यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सटाणा, कळवण, देवळा बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील कांदा गोणीपद्धती ऐवजी खुल्या (प्रचलीत) पद्धतीने लिलाव करण्यात यावा, या मागणीसाठी शेतकरी आणि कांदा उत्पादकांनी पुकारलेल्या सटाणा बंदला शहरासह तालुक्यातील किराणा, कापड, किरकोळ व घाऊक व्यापारी बांधवांनी कडकडीत बंद पळला. दरम्यान, कांदा उत्पादकांनी सटाणा शहरातून तहसीलवर मोर्चा काढून निवेदन सादर केले. या मोर्चात कळवण, देवळा व सटाणा तालुक्यातील कांदा उत्पादक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राज्य महामार्गावरील वाहनांवर कांदा फेक करून आंदोलकांनी भावना व्यक्त केल्या.

सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्ह्यातील बाजार समितीत कांदा लिलाव गत महिन्याभरापासून बंद असल्याने कांदा चाळीत सडू लागला आहे. यामुळे संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सोमवारी राज्यमहामार्गावर तब्बल चार तास रास्तारोको आंदोलन छेडले. तर आज, मंगळवारी शहरासह तालुका बंद ठेवून सरकार निर्णयाचा निषेध नोंदविला.

सकाळी ११ वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी येथील राज्य महामार्गावरून तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात कांदा खुल्या पणाने विक्री झालाचा पाहिजे, गोणीपद्धत बंद झालीच पाहिजे, बंद करा, बंद करा, गोणी पद्धत बंद करा, शेतकरी एकजुटीचा विजय असो, यासारख्या घोषणांनी शहर दणाणून सोडले. राज्य महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर कांदा फेक करून आंदोलकांनी आपला संताप व्यक्त केला.

तहसील कार्यालयावर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. शेतकरी संघटनेचे नेते रामचंद्रबापू पाटील यांनी शासनाचे नियमन मुक्ती धोरणावर चर्चा केले. हे सरकार व्यापारीधार्जिणे असल्याचा त्यांनी आरोप केला. पिंपळगाव येथील व्यापारी अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांनी शेतकऱ्यांच्या अन्नात वीष कालविण्याचा घृणास्पद प्रकार सुरू केल्याचा आरोप केला.

येथील शेतकरी संघटनेचे नेते देविदास पवार यांनी बाजार समितीच्या संचालकांनी कांद्याचा प्रश्न भिजत ठेवला असून, व्यापाऱ्यांची मुजोरी वाढण्यासाठी खतपाणी घातल्याचा घणाघाती आरोप केला. ब्राह्मणगावचे सरपंच सुभाष अहिरे यांनी व्यापाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी मागणी केली.

यावेळी सुरेश बागड, पांडुरंग सोनवणे, जिभाऊ सोनवणे, अरविंद सोनवणे, बाळासाहेब सोनवणे यांची भाषणे झाली. मोर्चात जिभाऊ सोनवणे, काका रोंदळ, नानाजी दळवी, दीपक रौंदळ आदींसह कांदा उत्पादक शेतकरी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदूरमध्यमेश्वर धरणावर तरुणाची स्टंटबाजी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

गोदावरी आणि दारणा या नद्यांना पूर आल्याने नांदूरमध्यमेश्वर धरणाचे आठही दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू असताना एका तरुणाने जीवघेणी स्टंटबाजी केल्याची धक्कादायक घटना समोर आली. यामुळे धरणाच्या सुरक्षितेबाबत पाटबंधारे विभागाची बेपर्वाई समोर आली आहे. गोदावरी आणि दारणा या नद्यांना पूर आल्याने निफाड तालुक्यातील सायखेडा आणि चांदोरी गावात पाणी शिरले. यामुळे या भागातले जनजीवन विस्कळीत आहे. नांदूरमध्यमेश्वर धरणाचे आठही दरवाजे उघडले असून पाण्याचा विसर्ग या धरणातून होत आहे. त्यामुळे धरण परिसरात पर्यटकांसह परिसरातील नागरिक गर्दी करीत आहेत. अशातच पाण्याचा विसर्ग सुरू असताना एक तरुण थेट धरणावरील शिडीवरून खाली उतरत विसर्ग होत असलेल्या पाण्याशी खेळत होता. विशेष म्हणजे त्याचा हा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे धरणाच्या सुरक्षिततेबाबत पाटबंधारे विभाग किती बेदखल आहे याची चर्चा होऊ लागली आहे.

धरणावर सुरक्षेसाठी ८ ते १० सुरक्षारक्षक कायमस्वरूपी असतात. सुरक्षा रक्षकांची नजर चुकवत तो तरुण खाली उतरला असावा. त्या तरुणावर फिर्याद नोंदविण्यासाठी वरिष्ठांचा अभिप्राय मागवत आहोत. तसेच येथे पोल‌िस बंदोबस्त गरजेचा आहे.-ए. ए. शेख, ज्यु. इंज‌िनीअर, नांदूरमध्यमेश्वर धरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खर्डेतील शाळेला कुलूप

$
0
0

म टा वृत्तसेवा,कळवण

शालेय इमारतीच्या नवीन बांधकामाबाबत संस्थाचालक वेळकाढू धोरण अवलंबित असल्याने खर्डे (ता. देवळा) येथील माध्यमिक विद्यालयाला संतप्त ग्रामस्थांनी, पालकांनी अखेर कुलूप ठोकले. जोपर्यंत शालेय इमारतीच्या बांधकामास सुरुवात होत नाही, तोपर्यंत शाळेचे कुलूप न उघडण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

खर्डे येथे विधायक कार्य समितीचे इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गेल्या ५० वर्षांपासून आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेला मोफत जागा उपलब्ध करून देत १९८१ मध्ये इमारत बांधून देण्यात आली. मात्र, ही इमारत अत्यंत जीर्ण झाली असून बांधकामही निकृष्ट दर्जाचे आहे. इमारतीचा स्लॅब केव्हाही कोसळण्याची भीती आहे. शाळेला स्वतंत्र स्वच्छतागृह नाही, संरक्षक भिंत नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, संपूर्ण स्लॅब जीर्ण व गळका झाला आहे. मागील सप्ताहात शाळेतील इमारतीचे प्लास्टरही विद्यार्थांच्या अंगावर कोसळल्याने तो जखमी झाला होता.
याबाबत ग्रामस्थांनी संस्थाचालकांना इमारतीच्या दुरुस्तीसाठी दोन दिवसाची मुदत दिली होती. मात्र संस्थाचालकांनी याकडे दुर्लक्ष केल्याने मंगळवारी सकाळी ११ वाजता शाळेला कुलूप ठोकून जोपर्यंत इमारतीच्या कामास सुरुवात होत नाही तोपर्यंत कुलूप न उघडण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. माजी सरपंच नारायण जाधव, माजी उपसरपंच भरत देवरे, शिवसेनेचे विभाग प्रमुख विजय जगताप, सामाजिक कार्यकर्ते गिरीश पवार, मधुकर देवरे, नानाजी निकम, गोकुळ जगताप हजर होते.
देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश माने, प्रभारी गटशिक्षण अधिकारी सतीश बच्छाव यांनी संस्थाचालकांशी संपर्क साधला असता त्यांनी असमाधानकारक उत्तर दिल्याने ग्रामस्थांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images