यावेळी उपसभापती गुरूदेव कांदे, संचालक भास्कर बनकर, निवृत्ती धनवटे आदी उपस्थित होते. बैठकीत अनेक व्यापारी, आडत्यांनी नियमनमुक्तीच्या अडचणी, त्रुटींवर चर्चा केली. बाजार समितीकडे अनेक नवीन व्यापाऱ्यांनी परवाने मिळावे, जागा मिळावी यासाठी मागणी केली आहे. त्यामुळे नवीन धोरणानुसार त्यांच्या मागणीचा विचार करावा लागेल, याची नोंद जुन्या अडतदार, व्यापाऱ्यांनी घ्यावी असेही बनकर यांनी स्पष्ट केले.
टोमॅटो व्यापार संकटात? नियमनमुक्तीमुळे टोमॅटो व्यापार पुढील काळात नेमका कसा चालणार याबाबत टोमॅटो व्यापारी, आडतदार, शेतकरी व बाजार समिती यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. सरकारने टोमॅटो हंगाम सुरू होण्यापूर्वीच धोरण जाहीर करावे, अशी मागणी येथील टोमॅटो व भाजीपाला आडतदार असोसियशनचे दीपक बनकर, उपाध्यक्ष अरुण चव्हाणके, सुभाष होळकर यांनी केली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट