Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आरोग्यसेवा देणारे केंद्रच ‘बेजार’

$
0
0

तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात ४१ पदे रिक्त

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील रिेक्त जागांमुळे आरोग्य यंत्रणाच मृत्यूशय्येवर निपचित पडली आहे. या परिस्थितीत परिसरातील आदिवासींसह ग्रामस्थांना ऐन पावसाळ्यात उपचारासाठी संघर्ष करावा लागण्याची वेळ येऊन ठेपली आहे. तर सटाणा शहरातील ट्रामा केअर युनिटदेखील गेल्या चार वर्षांपासून सुसज्ज असूनही रिेक्त पदांअभावी बंद असल्याने कोट्यवधी रुपयांची मशिनरी धूळखात पडून आहे. याकडे प्रशासनाने कोणतेही लक्ष न दिल्याने नागरिकांना आरोग्यसेवेची समस्या भेडसावत आहे.

जवळपास १७९ खेड्यांचा समावेश असलेला बागलाण तालुका हा तुलनेने जिल्ह्यात मोठा आदिवासीबहूल तालुका आहे. या तालुक्यातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या आदिवासी समाजाची आहे. सरकारच्या सोयी सुविधा मिळूनदेखील या तालुक्यातील आरोग्याचे प्रश्न सध्या ऐरणीवर आलेले आहेत. बागलाण तालुक्यात ११ प्राथमिक आरोग्य केंद्र तर सुमारे ५१ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहेत. या केंद्र व उपकेंद्राचा कारभार बघण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची दोन पदे आहेत. त्यापैकी डॉ. एन. के. सोनवणे हे कार्यरत असून एक पद रिेक्त आहे.

वैद्यकिय अधिकारी पदाची सुमारे सात पदे रिेक्त असल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र अलियाबाद व कपालेश्वर येथील प्रत्येकी २ पदे रिेक्त आहेत. तर ब्राम्हणगाव, मुल्हेर येथील प्रत्येकी एक तर तालुका आरोग्य अधिकारी अशी सात पदे रिेक्त आहेत. लोकप्रतिनिधींसह विविध सामाजिक पक्षांनी याबाबत आंदोलने छेडूनदेखील सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे.

रिक्त पदांची भरती केव्हा?

तालुक्यातील ५१ आरोग्य उपकेंद्रामधील ८ आरोग्यसेविकांची पदे रिेक्त आहेत. तसेच तीन उपकेंद्रात आरोग्यसेवकांची ३ पदे रिेक्त आहेत. आरोग्य सहाय्यकांची ६ पदे रिेक्त प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये औषधे वाटण्यासाठी औषध निर्माण अधिकारी पदाचीही ३ पदे रिेक्त आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाची निरपूर व वीरगाव येथे दोन पदे रिेक्त आहेत. एकूणच ११ आरोग्य केंद्र व ५१ उपकेंद्रामधून सुमारे ४१ पदे रिेक्त असल्याने तालुक्यातील आरोग्य यंत्रणा बंदच पडलेली आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या विभागाकडून मिळणाऱ्या सुविधा मिळण्यास कठीण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डीआरसी हस्तांतरणाला बसणार चाप

$
0
0

vinod.patil@timesgroup.com

नाशिक ः जनरल मुखत्यारपत्राच्या आधारे केवळ शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर कोट्यवधीच्या टीडीआरचे परस्पर हस्तांतरण करून कोट्यवधींचा मुद्रांक शुल्क बुडवणाऱ्यांना नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने रडारवर घेतले आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून मुखत्यारपत्राच्या आधारे डेव्हलपमेंट राइट सर्टिफिकेट (डीआरसी) मिळवणाऱ्या प्रकरणांची यादीच सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महापालिकेत वर्षानुवर्षे सुरू असलेल्या बेकायदेशीर डीआरसी व्यवहारांना चाप बसणार असून, यापूर्वी झालेले हजारो बेकायदेशीर व्यवहार उजेडात येणार आहेत. दरम्यान, आयुक्तांनी नगररचना विभागाला अशा प्रकरणांची तातडीने संबंधित विभागाला यादी देण्याचे आदेश दिल्याने टीडीआर धारकांचे धाबे दणाणले आहे.

महापालिकेकडून विकासकामांसाठी लागणाऱ्या जमिनीच्या बदल्यात जमीनमालकांना पालिकेकडून रोख रकमेऐवजी टीडीआर (विकास हस्तांतरण हक्क) दिला जातो. संबंधित जमीनमालक हा टीडीआर बिल्डरांना विकून जमिनीचा आर्थिक मोबदला मिळवतात. संबंधित जमीनमालकाकडून बिल्डर शंभर रुपयांच्या मुखत्याराचा आधार घेऊन डीआरसी करून ते आपल्या नावावर करून घेतात. महापालिकेकडे आजमितीस टीडीआरची हजारो प्रकरणे प्रलंबित आहेत. शहरातील निवडक राजकारणी व बिल्डरांनी एकत्रित येऊन या टीडीआरची बँकच तयार केली असून, तो बाजारभावानुसार चढ्या दराने विकला जातो. लहान बिल्डर हा टीडीआर घेऊन बिल्डिंगचा एफएसआय मिळवतात. मात्र, संबंधित टीडीआर हस्तांतरण ठराविक व्यक्तींच्याच नावाने आढळून आल्यानंतर आयुक्तांनी या प्रक्रियेला चाप लावला आहे. एकच टीडीआर अनेकांच्या नावाने करण्याच्या प्रक्रियेला आठ महिन्यांपासून बंदी घातली आहे.

दरम्यान, आता डीआरसी घेतानाचे व्यवहार हे मुद्रांक शुल्क न भरताच केल्याचे समोर आले आहे. टीडीआरचे रूपांतर डीआरसीत करताना पाच टक्के मुद्रांक शुल्क व एक टक्का एलबीटी शुल्क भरून करणे आवश्यक असते. मात्र, अनेक प्रकरणांमध्ये ही सर्व प्रक्रिया टाळून डीआरसी केल्याचे समोर आले असून, यामुळे राज्य सरकारचा कोट्यवधीच्या मुद्रांक शुल्काचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नाशिकच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने आयुक्तांना पत्र लिहून केवळ मुखत्यारपत्राच्या आधारे बेकायदेशीर झालेल्या व्यवहारांची यादीच सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आयुक्तांनी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे पत्र नगररचना विभागाला दिले असून, तातडीने ही माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कोट्यवधीचे बेकायदेशीर व्यवहार उघड होणार आहेत.

केवळ ७२० प्रकरणे?

नगररचना विभागाकडे टीडीआरची हजारो प्रकरणे असताना केवळ ७२० प्रकरणांतच कायदेशीररीत्या डीआरसी करण्यात आली आहे. यातही ५० टक्के प्रकरणे केवळ मुखत्यारपत्राच्या आधारे झाल्याने कायदेशीर प्रकरणेही तपासली जाणार आहेत. त्यामुळे बेकायदेशीररीत्या व्यवहार करणाऱ्या बिल्डरांना चाप लागणार असून, त्यांच्याकडून कोट्यवधीची वसुली केली जाण्याची शक्यता आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क या सर्व प्रकरणांसाठी पुन्हा नवीन प्रक्रिया राबवून शुल्क वसूल केले जाणार असल्याने सरकारच्या महसुलात कोट्यवधीची वाढ होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेडिओलॉजिस्टचा बंद मागे; आंदोलन सुरूच

$
0
0

आज मंत्रालयावर मोर्चा व धरणे

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य रेडिओलॉजी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेला बंद सरकारने दिलेल्या काही आश्वासनानंतर रात्री उशिराने मागे घेण्यात आल्याची माहिती संघटनेचे सचिव मंगेश थेटे यांनी दिली. राज्यात रुग्णांचे हाल होत असून, ते थांबण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन व मंत्रालयावर आज मोर्चा काढण्यात येणार आहे.

राज्य सरकारचे आरोग्य खाते रेडिओलॉजिस्टवर आकसाने कारवाई करीत असून, केवळ सोनोग्राफी सेंटर्सला टार्गेट केले जात आहे. या कारवाईच्या निषेधार्थ राज्यातील पाच हजार रेडिओलॉजिस्टने सोमवारपासून राज्यव्यापी बेमुदत बंद पुकारला होता. नाशिक शहरातील दीडशेच्यावर सोनोग्राफी सेंटर्स यात सहभागी झाले होते. मात्र, मंगळवारी सरकारने ‌‌दिलेल्या आश्वासनानंतर बंद मागे घेण्यात आला आहे. रेडिओलॉजिस्ट आपल्या विविध मागण्यांसाठी आज सकाळी ११.३० वाजता सरकारच्या विरोधात आझाद मैदानावर निदर्शने करणार आहेत. त्यानंतर मोर्चा काढून मंत्रालयात आरोग्य सचिव, आरोग्यमंत्री व मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून दीडशेच्यावर रेडिओलॉजिस्ट रवाना झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोळावं नव्हे, दुसरचं वर्ष ठरतंय धोक्याचं!

$
0
0

arvind.jadhav @timesgroup.com

ना‌शिक : सोळा वर्षांनंतरची वाहने धोकायदायक ठरत असल्याचा निष्कर्ष सर्वच पातळ्यांवर काढला जातो. यासाठी आरटीओकडून अशा वाहनांची सातत्याने तपासणी केली जाते. वास्तविक जीवघेण्या अपघातांसाठी इतकी जुनी नाही, तर अगदी एक वर्षभरापूर्वी रस्त्यावर आलेली वाहने कारणीभूत ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे. मागील पाच महिन्यात शहरात ४९४ अपघात झाले. त्यात सर्वाधिक अपघातग्रस्त झालेल्या वाहनांचे वय हे दोन ते आठ वर्षे इतके आहे.

अपघातासाठी कारणीभूत असलेल्या अनेक घटकांपैकी एक म्हणून वाहनांच्या फिटनेसकडे पाहिले जाते. जुन्या वाहनांमध्ये अनेक समस्याही असतात. त्यामुळे या वाहनांचा अपघात होण्याचा धोका सर्वाधिक असतो. वास्तव मात्र यापेक्षा भिन्न आहेे. अगदीच शोरूम वाहन असले की वाहनमालक एखाद वर्ष वाहनाला कुठे स्क्रॅच पडणार नाही, याची काळजी घेतोे. यानंतर वाहनांचा वारेमाप वापर सुरू होतो. जानेवारी ते मे २०१६ या पाच महिन्यांच्या काळात एका वर्षापेक्षा कमी जुनी असलेल्या वाहनांचे १२ अपघात झाले. त्यात एका व्यक्तीचा जीवही गेला. पाच महिन्यांत एकूण ४९४ अपघात झाले. त्यात दोन ते आठ इतके वर्षे वापरत असलेल्या ४०३ वाहनांचा समावेश होता. वाहतुकीचे पायाभूत नियमांकडे सर्वांनीच लक्ष दिले, तर अपघातांचे प्रमाण खूपच कमी होईल. मग, त्या वाहनांचे वय, वाहनचालकाचे वय या बाबी अपोआप मागे पडतील, असे बनसोड यांनी स्पष्ट केले.

दुचाकीच धोकादायक! शहरात दुचाकीची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे साहजिकच दुचाकींच्या अपघातांचे प्रमाण वाढत आहे. गत पाच महिन्यांत ४९४ पैकी सुमारे ४५ टक्के म्हणजे २०४ दुचाकींचा अपघात झाल्याची नोंद पोलिस दफ्तरी आहे. यानंतर चारचाकी वाहनांचा क्रमांक लागतो. चारचाकी वाहनांच्या १०४ अपघातात सात जण मृत्युमुखी पडले. यासह, मोपेड (५), ऑटो रिक्षा (३४), जीप (१९), बस (१८), ट्रक (३७), टेम्पो (२२), ट्रॅक्टर (३), इतर मोटार (३), सायकल (१), पादचारी (३०), झाडाला धडकून (५), तसेच रस्त्यावरील इतर अडथळ्याला धडकून एक अपघात झाला. यात ९२ जीवघेण्या अपघातांचा समावेश असून, तब्बल ९६ जणांचा मृत्यू झाला, तर १४८ नागरिकांना गंभीर दुखापतींना समोरे जावे लागले.

अपघाताची दुर्दैवी घटना रोखणे हे वाहनचालकाच्या हाती आहे. चांगले रस्ते उपलब्ध असणे याचा अर्थ म्हणजे खूप वेग पकडणे, असा होत नाही. एखादा कुत्रा आडवा गेल्यास दुचाकी स्लीप होऊन चालकाचा मृत्यू होता. वाहतुकीचे नियम कसोशीने पाळणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे. - जीवन बनसोड, प्रादेशिक परिवहन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरकुलासाठी वृद्धाचा आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंचवटीतल्या गोदावरीनगर झोपडपट्टीतून स्थलांतरित होऊन अकरा वर्षे उलटली तरी महापालिकेच्या घरकुलात घर मिळत नसल्याने त्रस्त झालेले ज्येष्ठ नागरिक भाऊलाल पुंडलिक जगताप यांनी मंगळवारी महापालिकेत आत्महत्येचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे पंचवटी विभागीय कार्यालयातही दाद मिळत नसल्याने संतप्त त्यांनी पालिकेत रॉकेल आणून ते अंगावर टाकण्याची तयारी केली होती. मात्र, सुरक्षारक्षकांनी सतर्कता दाखवल्याने अनर्थ टळला. महापौरांनी संबंधित वृद्धाची समजूत काढत, त्यांची मागणी तातडीने मंजूर करण्याचे आदेश आयुक्तांना दिले आहेत.

जगताप गोदावरीनगरातील झोपडपट्टीत राहत होते. महापालिकेने ही झोपडपट्टी उठवल्यानंतर त्यांना घरकुल योजनेत घर देण्याचे आश्वासन दिले होते. त्या संदर्भातील प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली. चुंचाळे येथील घरकुल योजनेत त्यांना घरही मंजूर करण्यात आले आहे. मात्र, हे घरकुल मिळवण्यासाठी अनेक दिवसांपासून ते कुटुंबासह पंचवटी विभागीय कार्यालयात चकरा मारत होते. मात्र, त्यांना घरकुल मिळत नव्हते. घरकुलासाठी महापालिकेच्या कार्यालयांमध्ये चकरा मारून त्रस्त झाल्याने मंगळवारी जगताप यांनी रॉकेलची बाटली घेऊन थेट महापालिका गाठली. पालिकेत शिरताना त्यांची पिशवी स्कॅनिंग मशीनमध्ये चेक करण्यात आली. त्यात सुरक्षारक्षकांना संशयास्पद वस्तू आढळल्याने त्यांनी जगताप यांची चौकशी केली. त्या वेळी त्यांच्याकडे असलेल्या बाटलीत रॉकेल आढळले. चौकशी केल्यानंतर घरकुल मिळत नसल्याने पालिकेत आत्मदहन करण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सुरक्षारक्षकांनी त्यांची बाटली जप्त करून घेत, त्यांची समजूत काढली.

महापौरांनाही संबंधित प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी जगताप यांना कार्यालयात बोलावून समजूत काढण्याचा प्रयत्न केला, तसेच अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण, उपायुक्त रोहिदास बहिरम व पंचवटीतल्या अधिकाऱ्यांना तातडीने बोलावून त्यांच्या तक्रारीसह घरकुलासंदर्भात माहिती घेतली. जगताप यांना तातडीने घरकुल देण्यासंदर्भात आदेश दिले. दरम्यान पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी त्यांना सायकांळी चौकशीसाठी ताब्यात घेतले. आत्महत्येचा प्रयत्न का केला, असे विचारल्यावर जगताप यांनी पंचवटीतल्या अधिकाऱ्यांचा भंडाफोड केला. पंचवटीतल्याच एका अधिकाऱ्याने, घर मिळवायचे असेल तर मुख्य कार्यालयात जाऊन आत्महत्या करा, असा सल्ला दिल्याचा दावा त्यांनी केला आहे.

स्कॅन मशिनने रोखले, अन्यथा...

महापालिकेच्या प्रवेशद्वारापाशी असलेल्या स्कॅन मशिनमुळे संबंधित वृद्धाच्या आत्महत्येचा प्रयत्न असल्याचा प्रकार उघड झाला. विशेष म्हणजे मशीनच्या इतिहासात ते पहिल्यांदाच कामी आले; अन्यथा अनर्थ घडला असता. पालिकेत येणाऱ्या आगंतुकाकडे बॅग व पिशवी असल्यास त्याची तपासणी मशिनद्वारे केली जाते. जगताप यांच्याही पिशवीची तपासणी सुरक्षा रक्षकांनी केली. त्यात संशयास्पद वस्तू आढळल्यानंतर सगळा प्रकार समोर आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्याजवळील भीषण अपघातात १७ प्रवासी ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

सुरत-नागपूर महामार्गावर शुक्रवारी, सायंकाळी एका मालवाहू कंटेनरचे टायर फुटून तो कालीपिलीवर जाऊन आदळला. या भीषण अपघातात कालीपिलीमधील १७ प्रवासी जागीच ठार झाले, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. धुळे तालुक्यातील भिरडाणे गावाजवळ ही घटना घडली. मृत प्रवाशांमध्ये नऊ महिला आणि आठ पुरुषांचा समावेश आहे.

धुळ्याहून जळगावकडे जाणाऱ्या कंटेनरचे (एमएच १८ एए ०९७८) धुळे तालुक्यातील भिरडाणे गावाजवळ उजव्या बाजूचे पुढील टायर फुटले. त्यानंतर हा कंटेनर समोरून येत असलेल्या कालीपिलीवर (एमएच १८ ई ८४७१) जाऊन जोरात आदळला. या भीषण धडकेत प्रवासी वाहनाचा चक्काचूर होऊन १७ जण जागीच ठार झाले. मृत व्यक्तींमध्ये चेतन छोटू पवार, रेखा नरेंद्र पाटील, सुलोचना राजेंद्र पाटील, विजय गुलाबराव पाटील, संगीता प्रेमराज मैंद, वसंत पंढरीनाथ पाटील, योगिता भटू पाटील, रामलाल तुळशीराम तिवारी, रफीक शेख, अनुसयाबाई, सिता फुला अहिरे, भारती हिरालाल बागूल, हेमतला मनोहर चौधरी, मंगला भाऊसाहेब पाटील, सरिता विश्वनाथ पाटील व अन्य दोघांचा समावेश आहे. इतर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर शासकीय सर्वोपचार रुग्णालयात उपचार करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. या अपघातामधील मृत व्यक्ती धुळे तालुक्यातील फागणे, मुकटी, अजंग, मोहाडी येथील रहिवासी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कालीपिलीत होते २४ प्रवासी?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

सुरत-नागपूर महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी एका मालवाहू कंटेनरचे टायर फुटून झालेल्या अपघातात कालीपिलीमधील १७ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. या कालीपिलीला नऊ प्रवाशांची आसन क्षमता मंजूर असताना, त्यात २४ प्रवासी कोंबण्यात आलेले होते, अशी माहिती आता सांगितली जात आहे. हा भीषण अपघात धुळे तालुक्यातील भिरडाणे गावाजवळ घडला होता. या घटनेमुळे अवैध प्रवासी वाहतुकीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

अपघातानंतर धुळे जिल्हा पोलिसांनी शनिवारच्या दिवशी पन्नासहून अधिक कालीपिली आणि खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. मात्र, पोलिसी कारवाईचे हे सत्र आणखी किती दिवस चालू राहील याबद्दल नागरिक साशंक आहेत. एरवी या गाड्यांमध्ये सर्रासपणे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले जातात. त्यांच्यावर आरटीओ, पोलिस प्रशासन वेळीच कारवाई का करत नाही? असा अर्थपूर्ण प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी, माजी आमदार प्रा. शरद पाटील, महानगरप्रमुख सतीश महाले, प्रदीप पानपाटील, हेमंत साळूंखे, अतुल सोनवणे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उर्दू शाळा आता ‘डिजिटल’

$
0
0

विद्यार्थ्यांना अभ्यासात होणार लाभ

Gopal.Paliwal@timesgroup.com

धुळे जिल्ह्यात डिजिटल शाळा अभियानात आता उर्दू शाळांनाही डिजिटल क्लासरूम सुरू झाले आहे. नुकतेच सोनगीरला मुलींची शाळा क्र. २, येथे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्याहस्ते डिजिटल क्लासरूमची सुरुवात करण्यात आली. त्यामुळे आता जिल्ह्यातील उर्दू शाळांतील अभ्यासक्रम आता मुलांना डिजिटली अभ्यासता येणार आहे.

जिल्हाभरात गेल्यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यांपासून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम हे अभियान सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास २५० शाळा संगणकीय अभ्यासक्रमाचा लाभ घेत आहेत. यामध्ये उर्दू शाळांचे प्रमाण मात्र कमी होते. यामुळे या अभियानाअंतर्गत सोनगीर येथील जिल्हा परिषदेची मुलींची शाळा क्र. २ मध्ये खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते डिजिटल क्लासरूमची सुरुवात करण्यात आली. या डिजिटल प्रणालीमुळे उर्दू शाळेस अभ्यासक्रम पूर्णपणे संगणकीय आधाराने मिळणार आहे. त्यांना याचा लाभ १ ली ते ५ वी इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांना देता येणार आहे.

यासाठी पुणे येथील कंपनीने हे सॉफ्टवेअर तयार केले असल्याचे अभियानाचे हर्षल विभांडिक यांनी माहिती देताना सांगितले. आम्ही 'प्रेरणा सभा'च्या जिल्ह्यातील जवळपास सर्वच शाळा येत्या जुलै महिन्यापर्यंत डिजिटल करू, असा विश्वासही विभांडिक यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘घरकुल’ राबविताना धोरणात्मक निर्णय

$
0
0

कनिष्ठ लेखापरीक्षक संजय कुटे यांची माहिती

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जळगाव नगरपालिकेने घरकुल योजना राबविताना कोणत्याही प्रकारचा धोरणात्मक निर्णय घेतला नव्हता. तसेच त्यासाठी अंदाजपत्रकाला जिल्हाधिकाऱ्यांची परवानी आणि योजनेला तांत्रिक मंजुरी घेण्यात आलेली नव्हती, अशी माहिती विशेष लेखापरीक्षण करणारे अहमदनगर येथील स्थानिक लेखा विभागाचे कनिष्ठ लेखापरीक्षक संजय रमन कुटे यांनी विशेष न्यायालयात सरतपासणीत दिली. मंगळवार, (दि. २८) रोजी धुळे जिल्हा व सत्र न्यायालयात जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी कामकाज झाले.

यात सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील निर्मलकुमार सूर्यवंशी, अॅड. प्रवीण चव्हाण यांच्याकडून याबाबत सरकारच्या आदेशानुसार ही सरतपासणी घेण्यात आली. कुटे यांनी सांगितले की, सरकारच्या आदेशानुसार जळगाव घरकुल योजनेचे विशेष लेखापरीक्षण करण्यासाठी नाशिकच्या स्थानिक लेखा विभागाचे डेप्युटी चीप ऑडीटर यांच्याकडून दोनजणांचे पथकाची नियुक्ती केली गेली. त्यात आपल्यासह गहिवड होते. तर प्रमुख सतिष कडकसे होते. मार्च ते जुलै २००७ या काळात हे विशेष ऑडीट करण्यात आले. त्यावर जळगावचे डेप्युटी ऑडीटर सोलंकी, धनगर, द्वारके यांच्याकडून देखरेख केलेल्या ऑडीटची तपासणी केली जात हाती.

लेखापरीक्षाबाबतचा अहवाल देत यामध्ये विविध प्रकारच्या मुद्द्यांना समाविष्ट करण्यात आले होते. प्रामुख्याने यात नगरपालिकेकडून घरकुल योजना राबविण्यासाठी कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यात आला नव्हता. तसेच त्याबाबतच्या अंदाजपत्रकाला जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी घेतली गेली नव्हती. ऑडीट करताना कॅशबुक, बिले, माजमाप पुस्तिका, नगरपालिका संचिका, टिपणी, अंदाजपत्रके, विविध प्रकारच्या याद्या आदींची तपासणी केली गेली. त्यानंतर संशयित आरोपींकडून उलटतपासणी घेण्यात आली. त्यात अॅड. प्रमोद पाटील, अॅड. एस. के. शिरोडे यांनी उलटतपासणी घेतली. कामकाजावेळी आरोपी सुरेश जैन, जगन्नाथ वाणी, पी. डी. काळे, राजा मयूर, प्रदीप रायसोनी, गुलाबराव देवकर आदींसह इतर संशयित आणि वकिलांची न्यायालयात उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंदुरबार पं. स. वर काँग्रेसचा झेंडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार तालुका पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतिपदासाठी मंगळवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात सर्वाधिक अकरा सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार हादरा देत काँग्रेसने झेंडा फडकविला आहे. यात काँग्रेसच्या रंजना नाईक सभापतीसाठी बहूमताने विजयी झाल्या. तर उपसभापतिपदी ज्योती पाटील यांचा विजय झाला आहे.

निवडणुकीत ऐनवेळेस राष्ट्रवादीचे चार सदस्य गैरहजर राहिल्याने अकरा सदस्य असूनही त्यांना हातची सत्ता गमावावी लागली आहे. मंगळवारी, (दि. २८) दुपारी काँग्रेसतर्फे रंजनाताई नाईक यांनी सभापती तर उपसभापती पदासाठी ज्योती पाटील यांनी अर्ज दाखल केले. तर राष्ट्रवादीच्यावतीने पुष्पांजली गावीत यांनी सभापती आणि तुषार धामणे यांनी उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केले होते. दरम्यान काँग्रेसचे सर्वच्या सर्व नऊ सदस्य उपस्थित राहिले आणि राष्ट्रवादीचे फक्त सात सदस्य हजर राहिल्याने राष्ट्रवादीच्या हातून सत्ता गेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे तालुक्यातील पाच जणांना जन्मठेप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे तालुक्यातील मुकटी गावात २९ जानेवारी २०१५ रोजी, रात्रीच्या सुमारास मागील भांडणाचा राग मनात ठेवून वचपा काढण्यासाठी आलेल्या सहा जणांपैकी पाच जणांना धुळे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. प्रदीप काळे यांनी जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणातील अजून एक आरोपी फरार असून, त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत असल्याची माहिती सरकारी वकील शामकांत पाटील यांनी दिली.

मागील भांडणाचा राग मनात ठेवून सतीश उर्फ योगेश पाटील, सुनील पाटील, ईश्वर पाटील, चंदू पाटील, उमेश पाटील, योगेश पाटील यांनी मुकटी गावातील समाधान पाटील व दत्तात्रय पाटील या दोघा भावांवर गुप्ती आणि चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले होते. समाधान पाटील हा जागीच मृत झाला, तर दत्तात्रयला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा व जिवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल करून पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात समर्थकांचा जल्लोष

$
0
0

खासदार डॉ. सुभाष भामरेंना केंद्रात राज्यमंत्रीपद; क्लीन इमेजला संधी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांचा सोमवारी, (दि. ४) केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने जिल्हाभरात आनंदाला उधाण आले होते. शहरात भाजप कार्यकर्त्यांसह नागरिकांनी ठिकठिकाणी फटाके फोडत, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. तर मंगळवारी (दि. ५) सकाळी अकरा वाजता डॉ. भामरे यांचा शपथविधी दिल्ली येथे झाला. त्यावेळी खासदार डॉ. भामरे यांच्या कुटूंबातील सदस्य उपस्थित असल्याचे सांगण्यात आले.

खासदार डॉ. सुभाष भामरे यांची मंत्रिपदाची बातमी धुळे जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरताच सोशल मीडियासह विविध माध्यमांवर खासदार भामरेंना शुभेच्छाचा वर्षाव सुरू झाला. शहरातील त्यांच्या घरीही कार्यकर्त्यांनी, हितचिंतकांनी आपला आनंद डॉ. भामरे यांच्या कुटुंबासोबत साजरा केला. यावेळी डॉ. भामरे यांच्या निवासस्थानी त्यांचे वडील रामराव पाटील, पत्नी विणा भामरे, बंधू सुरेश पाटील यांच्या डोळ्यातून प्रथम अश्रूअनावर झाले अन् त्यानंतर पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. धुळे शहरासह डॉ. भामरे यांच्या मुळगावी साक्री तसेच तालुक्यातील मालपूर, शिंदखेडा, शिरपूर याठिकाणीही फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्याला डबल बोनस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात धुळे जिल्ह्याला स्थान मिळणार अशी बातमी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती. मात्र ही बातमी अखेर गुरुवारी (दि. ७) सांयकाळी निश्चित झाली.

जिल्ह्यातील शिंदखेडा तालुका मतदारसंघातील भाजपचे आमदार जयकुमार रावल यांची राज्यमंत्री पदासाठी वर्णी लागल्याने धुळे शहरात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडून जल्लोष साजरा केला. या वेळी ज्येष्ठ कार्यकर्ते विजय पाश्चापूरकर, हिरामण गवळी, विनोद मोराणकर, अमित खोपडे, यशवंत येवलेकर, नगरसेविका वैभवी दुसाने, प्रतिभा चौधरी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. या निवडीने धुळ्याला भाजपकडून डबल बोनस मिळाल्याची चर्चा शहरात होत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसामुळं सुरत-भुसावळ रेल्वेमार्ग खचला!

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नंदुरबार, नाशिक

नंदुरबार, नाशिक जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाचा जोर आज सकाळपासून ओसरल्याचे चित्र आहे. मात्र, गेल्या २४ तासांत झालेल्या अतिवृष्टीने ४ जणांचे बळी घेतले आहेत, तर दोघे बेपत्ता आहेत. मुसळधार पावसामुळे तीन किमी लांबीचा सुरत-भुसावळ रेल्वेमार्ग खचला असून सुरत-नंदुरबार मेमू रेल्वेचे चार डबे घसरले आहेत. त्यामुळं वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.

मुसळधार पावसामुळे रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास सुरत-भुसावळ मीटरगेज रेल्वे मार्गावरील ३ किमीपर्यंतचा मार्ग खचला. त्यामुळं सुरत-नंदुरबार मेमू रेल्वेचे ४ डबे घसरून अनेक प्रवासी अडकून पडले होते. पावसाची संततधार सुरू असल्याने मदतकार्यात अडचणी येत होत्या. अखेर सोमवारी पहाटे सर्व प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. जखमी प्रवाशांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता असून रेल्वे प्रवाशांसाठी १५ बसेसची सोय करून देण्यात आली आहे.

पाचोराबारी येथे अतिवृष्टीमुळे सहा जण वाहून गेले. यापैकी चौघांचे मृतदेह हाती लागले असून अन्य दोन जण बेपत्ता असल्याचे जिल्हाधिकारी एम. एस. कलशेट्टी यांनी सांगितले. पावसामुळे सुमारे ८० घरांचे नुकसान झाले असून १०० जनावरे दगावल्याचेही सांगण्यात आले. नद्यांना पूर आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, पावसाचा जोर ओसरल्यामुळं परिस्थिती बरीच नियंत्रणात असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

नाशिकमध्येही धो-धो

गेल्या २४ तासात नाशिक जिल्ह्यात धो-धो कोसळणाऱ्या पावसाने गंगापूर आणि दारणाच्या पाणी साठयात विक्रमी वाढ झाली आहे. जिल्ह्याचा धरणसाठा ९ टक्यावरून थेट २४ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून नाशिककरांचा पाणीप्रश्न सुटेल, अशी आशा आहे.

गंगापूर धरणात ४८.३३%, दारणा धरणात ६६.१३%, तर कश्यपी धरणात १५.३८ % पाणीसाठा असल्याची नोंद करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून दाराणातून ९,१७५ क्युसेक्स, नांदूर मध्यमेश्वरमधून २३,३२६ क्युसेक्स, गोदावरी उजवा कालव्यातून २०० क्युसेक्स, गोदावरी डावा कालवा १०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.

चोवीस तासातील पाऊस (११ जुलै)

> नाशिक १८४ मिमी > इगतपुरी २१५ मिमी > त्र्यंबक २०८ मिमी > दिंडोरी १३४ मिमी > पेठ १८७ मिमी > निफाड ७१ मिमी > सिन्नर ९१ मिमी




मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिवृष्टीमुळे सुरत-भुसावळ रेल्वेमार्ग खचला

$
0
0

नवापूर तालुक्यातील घटना; १२ गाड्यांच्या मार्गात बदल तर तीन रद्द

टीम मटा, जळगाव/धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील पाचोराबारीजवळ झालेल्या अतिवृष्टीमुळे सुरत-भुसावळ रेल्वेमार्गाचा तीन किमीचा भाग हा १० ते १५ फूट खोल खचला आहे. त्यामुळे या मार्गावरील १२ गाड्यांच्या मार्गात बदल करण्यासह तीन गाड्या रेल्वे प्रशासनाने रद्द केल्या आहेत. भुसावळहून सुरतकडे जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या या नंदुरबारपर्यंत आणि सुरतकडून येणाऱ्या गाड्या सद्यस्थितीत नवापूरपर्यंत चालविल्या जात आहेत.

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात रविवार व सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. आतापर्यंत नवापूर तालुक्यात २५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसाचा मोठा फटका रेल्वेलादेखील बसला आहे. गुजरात व खान्देशला जोडणाऱ्या सुरत-भुसावळ रेल्वेमार्गाचा तीन किमीचा पट्टा रविवारी रात्री, पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाहून गेला. या भागात आता आधारासाठी खडी व स्लिपर नसल्याने रूळ अधांतरी आहेत. त्यावरून इंजिन जाणे शक्य नाही. हा मार्ग वाहून गेला त्यावेळी सुरतहून रात्री साडेनऊला निघालेल्या सुरत-नंदुरबार पॅसेंजरचे (५९०५१) इंजिनपासूनचे पहिले चार ते पाच डबे रूळावरून खाली उतरले. सुदैवाने या घटनेत जिवीतहानी झाली नाही. गाडीतील प्रवाशांची संख्या पावसामुळे कमी होती. या घटनेची माहिती मिळताच नंदुरबार रेल्वेस्थानकाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्री घटनास्थळी धाव घेतली. पश्चिम रेल्वेचे ईआरएम व मुंबईचे डीआरएम दाखल झाले आहेत.

प्रेरणा एक्स्प्रेस ढेकवदपासून परत

या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल केले. सुरतहून रात्री प्रेरणा एक्स्प्रेस ढेकवदपर्यंतच येऊन परत गेली. नंदुरबार स्टेशनवर उतरणाऱ्या प्रवाशांना परत नवापूरला पाठविण्यात आले. या प्रवाशांना तिकिटाचे पूर्ण भाडे रेल्वेने परत केले आहे. सुरतहून जळगावकडे येणाऱ्या काही गाड्या या वसई, कल्याण, नाशिकमार्गे वळविण्यात आल्या आहेत. भुसावळ-सुरत पॅसेंजर(५९०७८), सुरत-भुसावळ पॅसेंजर (५९०७५) व भुसावळ-सुरत पॅसेंजर (५९०७६) या तीन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

गाड्यांच्या मार्गात बदल

हावडा-अहमदाबाद(१२८३४), चेन्नई-अहमदाबाद नवजीवन (१२६५६), हावडा-पोरबंदर (१२९०६), अहमदबाद-हावडा (१२८३३), राजकोट-रेवा (१२९३७) या गाड्या भोपाळ, रतलाम, गोध्रा, वडोदरा, अहमदाबादमार्गे वळविण्यात आल्या आहेत. अहमदाबाद-नागपूर प्रेरणा (११४५३), अहमदाबाद-पुरी (१२८४४), गांधीधाम-विशाखापट्टनम् (१८५०२), सुरत-छपरा ताप्तीगंगा(१९०४५), अहमदाबाद-चेन्नई नवजीवन (१२६५५), बिकानेर-सिकंदराबाद (१७०३८) व वाराणसी-उधना (१९०५८) या सुरत, वसई रोड, कल्याण, नाशिक, जळगावमार्गे वळविण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मदतकार्य युद्धपातळीवर

$
0
0

पाचोराबारीत मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपये

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार तालुक्यातील पाचोराबारी परिसरात रविवारी, (दि. १०) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे गावातील नाल्याला आलेल्या पुरात चारजण वाहून मृत्यूमुखी पडले तर दोन जण बेपत्ता आहेत. घटनास्थळी नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी, (दि. १२) भेट देऊन पाहणी केली असून राज्य सरकारच्या वतीने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत करण्यात आली. अभ्यास दौऱ्यासाठी गेलेल्या खासदार डॉ. हीना गावित यांनीदेखील तत्काळ मायदेशी परतत पाचोराबारीत पाहणी केली. केंद्राकडून अतिवृष्टीत मृत व जखमींच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या अतिवृष्टीत सुरत-भुसावळ रेल्वेमार्गावरील रूळ खचल्याने रेल्वे प्रशासनाकडून सोमवारी पहाटेपासून रेल्वेमार्ग सुस्थितीत करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. तर बुधवारी दुपारनंतर हे काम सुरळीत होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

रविवारी (दि. १०) झालेल्या अतिवृष्टीने पाचाेराबारी भागात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. तसेच या पावसाने रेल्वेसेवाही ठप्प झाली असून ती सुरू करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. तर पाचोराबारी गावाचे जनजीवन पुन्हा सुरळीत होण्याच्या मार्गावर असून गावातील लोकांना सर्व सुविधा जिल्हा प्रशासनाच्यावतीने पुरविण्यात येत आहेत. यासाठी शर्यतीचे प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

पाचोराबारीच्या नुकसानग्रस्त भागास पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार शिरीष चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र डहाळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जी. सी. मंगळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, प्रांताधिकारी सुनिल गाडे, तहसीलदार नितीन पाटील, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता वर्षा अहिरे, जिल्हा परिषदेचे बी. एन. पाटील, मध्यम प्रकल्पाचे गिरवीरसिंग सुखमणी आदींनी भेटी देत पाहणी करत ग्रामस्थांशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते राज्य सरकारकडून मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना तत्काळ चार लाख रुपये देण्यात आले. तसेच ज्यांची गुरे-ढोरे, जनावरे वाहून गेली त्यांना तीस हजारांची मदत देण्यात आली. या मदतीपासून एकही जण वंचित राहणार नाही याबाबत त्यांनी सूचना दिल्या. घटनेतील नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून त्यांना वेळेत मदत करण्याच्या सूचनाही पालकमंत्री महाजन यांनी दिल्या. पुरामुळे चार जणांचा मृत्यू तर दानजण बेपत्ता आहेत. तसेच एकूण १७३ छोटी व मोठी जनावरे मृत झाली असून त्यांच्या मृत शरीराची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावण्याचे काम करण्यात आले. या गावातील एकूण ३२ घराचे पुर्णत: व १३९ घराचे अंशत: नुकसान झाले आहे. रेल्वे रुळाखालील भराव वाहून गेल्यामुळे अंदाजे ३ किलोमिटर लांबीचा रेल्वेमार्ग बाधित झाला आहे. त्यांच्या दुरुस्तीबाबत रेल्वे विभागामार्फत युद्धपातळीवर काम सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. मलिनाथ कलशेट्टी यांनी दिली.

गाड्यांच्या मार्गात बदल

भुसावळ : नंदुरबार येथ झालेल्या अतिवृष्टीने मंगळवारी, (दि. १२ जुलै) रोजी ११ गाड्यांच्या मार्गात बदल झाला आहे. तर गाडी क्र. ५९०१४ सुरत-भुसावळ ही रेल्वे रद्द करण्यात आली आहे. या गाड्यांमध्ये चैन्नई-अहमदाबाद एक्स्प्रेस (गाडी क्र.१२६५६) ही गाडी मनमाड, कल्याण, भोईसरमार्गे वळविण्यात आली आहे. सुरत-भागलपूर (गाडी क्र.१९०४७) ही दीड तास उशिराने निघेल. तर उधना-धनपूर (गाडी क्र. १९०६३) ही गाडी १० तास ४५ मिनिटे उशिराने सुटेल. सुरत-पुरी एक्स्प्रेस (गाडी क्र.२२८२६) ही गाडी ३ तास ३५ मिनिटे उशिराने धावेल. जोधपूर-चैन्नई (गाडी क्र.१६१२६) ही भोईसर, कल्याणमार्गाने धावेल. तसेच भागलपूर-सुरत (गाडी क्र.१९०४८) ही गाडी भुसावळ, इगतपुरीमार्गे धावणार आहे. अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस

(गाडी क्र.१२८४४) ही गाडी कल्याणमार्गे धावेल. सुरत-पुरी

(गाडी क्र.२२८२८) ही गाडी १९ तास उशिराने सुटेल. अहमदाबाद-हावडा (गाडी क्र.१२८३३) ही गाडी दहातास उशिराने धावेल, तर अहमदाबाद-चैन्नई एक्स्प्रेस (गाडी क्र.१२६५५) ही गाडी १३ तास १५ मिनिटे उशिराने सुटेल. तसेच गाडी क्र.19263 पोरबंदर दिल्ली रोहिला (गाडी क्र.१९२६३) ही गाडी २० तास १० मिनिटे उशिराने धावणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर सुरत-भुसावळ रेल्वेमार्ग पूर्ववत सुरू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील पाचोराबारी गावात रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे सुरत-भुसावळ रेल्वेमार्गाचा तीन किमीचा भाग वाहून गेला होता. त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, बुधवारपासून या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात दोन जण बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध अजूनही प्रशासकीय यंत्रणेला लागलेला नाही.

पाचोराबारीमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी गावातच ठाण मांडून बसले आहेत, तर रेल्वे प्रशासनाच्या अथक परिश्रमांनंतर बुधवारी सुरत-भुसावळ रेल्वेमार्ग सुरळीत झाला आहे. रविवारी अतिवृष्टी झाल्यानंतर पाचोराबारीजवळ रेल्वेरुळाखालील माती पाण्याच्या जोरदार प्रवाहाबरोबर वाहून गेली होती. त्यामुळे या ठिकाणी रेल्वेगाडीचे काही डबेही घसरले होते. तसेच वाहतूकसेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. रेल्वे प्रशासनाने सोमवारपासून या मार्गाचे दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. ते बुधवारी पूर्ण झाले. त्यानंतर या मार्गावरील भुसावळ-सुरत पॅसेंजर, सुरत-भुसावळ पॅसेंजर, हावडा-अहमदाबाद, चेन्नई-अहमदाबाद नवजीवन, हावडा-पोरबंदर, अहमदाबाद - हावडा, राजकोट-रेवा, अहमदाबाद-नागपूर प्रेरणा, अहमदाबाद पुरी, गांधीधाम-विशाखापट्टणम्, सुरत-छपरा ताप्ती गंगा, अहमदाबाद चेन्नई नवजीवन, बिकानेर सिकंदराबाद, वाराणसी-उधना आदी गाड्या पूर्ववत सुरू झाल्या आहेत, अशी माहिती देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर सुरत-भुसावळ रेल्वेमार्ग पूर्ववत सुरू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील पाचोराबारी गावात रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे सुरत-भुसावळ रेल्वेमार्गाचा तीन किमीचा भाग वाहून गेला होता. त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, बुधवारपासून या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात दोन जण बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध अजूनही प्रशासकीय यंत्रणेला लागलेला नाही.

पाचोराबारीमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी गावातच ठाण मांडून बसले आहेत, तर रेल्वे प्रशासनाच्या अथक परिश्रमांनंतर बुधवारी सुरत-भुसावळ रेल्वेमार्ग सुरळीत झाला आहे. रविवारी अतिवृष्टी झाल्यानंतर पाचोराबारीजवळ रेल्वेरुळाखालील माती पाण्याच्या जोरदार प्रवाहाबरोबर वाहून गेली होती. त्यामुळे या ठिकाणी रेल्वेगाडीचे काही डबेही घसरले होते. तसेच वाहतूकसेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. रेल्वे प्रशासनाने सोमवारपासून या मार्गाचे दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. ते बुधवारी पूर्ण झाले. त्यानंतर या मार्गावरील भुसावळ-सुरत पॅसेंजर, सुरत-भुसावळ पॅसेंजर, हावडा-अहमदाबाद, चेन्नई-अहमदाबाद नवजीवन, हावडा-पोरबंदर, अहमदाबाद - हावडा, राजकोट-रेवा, अहमदाबाद-नागपूर प्रेरणा, अहमदाबाद पुरी, गांधीधाम-विशाखापट्टणम्, सुरत-छपरा ताप्ती गंगा, अहमदाबाद चेन्नई नवजीवन, बिकानेर सिकंदराबाद, वाराणसी-उधना आदी गाड्या पूर्ववत सुरू झाल्या आहेत, अशी माहिती देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशन दुकानदार छेडणार वितरण बंद आंदोलन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रेशन व राॅकेल दुकानदारांना उदरनिर्वाह होईल असे कमिशन द्यावे, तमिळनाडू राज्याप्रमाणे पगार द्यावा किंवा ३५ हजार रुपये मानधन द्यावे यांसह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील रेशन दुकानदार १ आॅगस्टपासून रेशनचे सार्वजनिक वितरण बंद करणार आहेत.

नाशिक जिल्हा रास्त भाव दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक संघटनेची बैठक शनिवारी कालिकामाता मंदिर ट्रस्टच्या सभागृहात झाली. त्यावेळी हा निर्णय घोषित करण्यात आला.

या बैठकीत खासदार हेमंत गोडसे, आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, संघटनेचे राज्य सचिव बाबुराव मेमाडे, विभागीय अध्यक्ष गणपत डोळसे पाटील उपस्थित होते. या बैठकीत संघटनेतर्फे अगोदरच सरकारकडे आम्ही मागण्यांचे निवेदन दिले आहे. त्यावर लवकर निर्णय द्यावा, असे सांगितले होते. पण, शासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे आंदोलन पुकारल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले. माजी खासदार गजानन बाबर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. त्याचबरोबर शासनाने राॅकेल परवानाधारक हा पूर्णपणे उद््ध्वस्त झाला आहे. त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, तरी त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहचा प्रश्न सोडवावा, परवानाधारकांची संपूर्ण ग्रामीण शालेय पोषण आहार व इतर प्रलंबित देयके त्वरित द्यावीत, दुकानदाराला हमालीसह माल पाेहोचवावा, लाइट बिल, गाळाभाडे स्टेशनरी खर्चाची तरतूद करावी या मागण्या करण्यात आल्या आहेत.

या वेळी आमदार फरादे यांनी रेशन दुकानदारांच्या मागण्या रास्त असून, त्या शासन दरबारी पोहोचविण्याचे काम मी करेन, असे आश्वासन दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गिरीश बापट यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी रेशनदुकानदारांना सांगितले. या वेळी

जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे, सेक्रेटरी गिरीश कुलकर्णी यांनी शासनाने निर्णय न घेतल्यास हे आंदोलन अटळ असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीर्थक्षेत्री दारूबंदीसाठी पंढरपुरात आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिन्नर फाटा

राज्यातील धार्मिक तीर्थक्षेत्री दारूबंदी करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य दारूबंदी जनआंदोलन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी पंढरपुरात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना घेराव घालत जोरदार घोषणाबाजी केली. विधिमंडळाच्या येत्या पावसाळी अधिवेशनात दारूबंदीवर सरकारने आपली भूमिका जाहीर करावी, अन्यथा मुंबईत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन केले जाईल, याची कल्पनाही मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे दिली. या वेळी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पंढरपूर पोलिसांनी ताब्यात घेतले व रात्री साडेअकरा वाजता या कार्यकर्त्यांची मुक्तता केली.

राज्यात दारूबंदीच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शविल्याचे या आंदोलनाचे नेतृत्व करणारे नाशिकचे गणेश कदम यांनी दूरध्वनीद्वारे 'मटा'शी बोलताना सांगितले. मुख्यमंत्री कार्यालयाने व स्थानिक प्रशासनाने या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना या विषयावर चर्चेस आमंत्रित केले होते. त्यानुसार पंढरपूर शासकीय विश्रामगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी कदम यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या वसंत बरकले, तुषार भोसले, यश बच्छाव, अक्षय शिरसाठ, नामदेव शिंदे, मनोज खैरनार, वसंत कदम, रोशन शिरसाठ, संदीप मुठाळ, अनिल गायकवाड, अंकुश लोखंडे आदींसह सुमारे ४०० कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images