Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सोशल नेटवर्किंग फोरमतर्फे वृक्ष लागवडीचे नियोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यभरात सुरू असलेल्या हरित क्रांतीत सह्योग म्हणून सोशल नेटवर्किंग फोरमनेही आपले योगदान देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार यंदाच्या पावसाळ्यात संपूर्ण शहरात फोरमच्यावतीने वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.

वृक्षलागवडीसाठी मे महिन्यात महानगरपालिकेला जागा ऊपलब्ध करून देण्याची फोरमने विनंती केली होती. महापालिकेच्या सकारात्मक भूमिकेमुळे या प्रयत्नांना यश मिळाले असून, नाशिक मनपाने म्हसरूळ परिसरात आरोग्य विद्यापीठामागे सहा एकर जागा फोरमच्या वृक्षसंवर्धनासाठी उपलब्ध करून दिली आहे. या जागेवर अडीच ते तीन हजार झाडं लावण्याचे नियोजन असून, खड्डे खोदण्याच्या कामाचा शुभारंभ १० जून रोजी फोरमचे मार्गदर्शक जीवन सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमासाठी प्रमोद गायकवाड, डॉ. संदीप आहिरे, डॉ. पंकज भदाणे, इंजि. प्रशांत बच्छाव आदी प्रयत्नशील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोषी कमी; निर्दोष जास्त

$
0
0

एसीबीच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह; चार महिन्यात तीन चर्तुथांश जण निर्दोष

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अॅन्टी करप्शन ब्युरोमार्फत दाखल होणाऱ्या खटल्यांमध्ये मागील चार महिन्यात अवघ्या सात जणांना शिक्षा झाली, तर तब्बल २३ व्यक्ती निर्दोष सुटले. यामुळे मोबाइल, रेकॉर्डर किंवा इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या एसीबीच्या कार्यपध्दतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नाशिकचा हा ट्रेंड राज्यात सुध्दा दिसून येतो. त्यामुळे राज्य सरकारने याचा गांर्भीयाने विचार करण्याची आवश्यकता आहे.

समाजातील लाचखोरीचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी लाचखोरांचे दोषत्व कोर्टासमोर सिध्द होणे आवश्यक आहे. मात्र, सापळ्यांमध्ये अटक केलेल्या व्यक्तींचे दोषत्व पुराव्यानिशी कोर्टात सिध्दच होत नाही. चालू वर्षी राज्याचे गुन्हा सिध्द होण्याचे प्रमाण अवघे २१ टक्के इतके आहे. यंदा नाशिक कोर्टात एसीबीच्या एकूण ३० खटल्यांचा निकाल लागला. यात, अवघ्या सात जणांविरोधात एसीबी सबळ पुरावे सादर करू शकली. उर्वरित २३ जणांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. सन २०१५ मध्ये दोषत्व सिध्द होण्याचे प्रमाण २८ टक्के होते. वर्षभरात सुनावणी पूर्ण झालेल्या ९३ खटल्यांमध्ये २६ जणांना लाचखोरीच्या गुन्ह्यात शिक्षा झाली, तर तब्बल ६७ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. विशेष म्हणजे एसीबी फोन रेकॉर्डर, व्हिडिओ रेकॉर्डिंग यासह इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करते. याबाबत बोलताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुन्हा सिध्द होण्याचे प्रमाण कमी असण्यासाठी अनेक कारणे कारणीभूत ठरतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला म्हणजे तो पुरावा कोर्टाला मान्य होतोच असे नाही. एसीबीच्या पुरावा संकलन पध्दतीत काही आमूलाग्र बदल होण्याची आवश्यकता असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. नाशिकप्रमाणे राज्यातही एसीबीची गुन्हा सिध्द होण्याच्या प्रमाणाबाबत ओरड आहे. चालू वर्षी २१३ पैकी १६८ व्यक्ती निर्दोष सुटल्या आहेत. सन २०१५ मध्ये सुध्दा अवघ्या २३ टक्के म्हणजे १२१ जणांना शिक्षा झाली. सुमारे ५२० खटल्यांपैकी ३९९ जणांना कोर्टात सबळ पुराव्यांअभावी निर्दोष सोडले. सापळा प्रकरणात अटक होऊन सुध्दा संबंधित विभागाकडून कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होत नाही. नाशिक परिक्षेत्रात अशा प्रकारच्या ११ जणांचे निलंबन रखडले आहे. या व्यतिरिक्त शिक्षा होऊनही सेवेतून बडतर्फ न करण्यात आलेले ग्रामविकास व समाज कल्याण विभागातील दोघे कर्मचारी आहेत.

उघड चौकशींना गती देण्याची आवश्यकता उत्पन्नापेक्षा जास्त संपदा जमा करणाऱ्या व्यक्तींची एसीबीमार्फत उघड चौकशी केली जाते. मात्र, वर्षानुवर्षे या चौकशींना गतीच मिळत नाही. नाशिक परिक्षेत्रात अशा प्रकारच्या ८० पेक्षा जास्त चौकशींची प्रकरणे प्रलंबित आहेत. यात सहा लोकप्र​तिनिधींसह उर्वरित उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अनेक प्रकरणे पाच ते सहा वर्षांपासून प्रलंबित आहेत. सध्याचे व माजी आमदारांची चौकशीची प्रकरणेदेखील २०१४ पासून प्रलंबित असून, यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम तयार होतो. लाचखोरींच्या प्रकरणांना एसीबीकडूनच अभय मिळत असल्याची भावना जनमाणसात असून, त्याचाही थेट परिणाम लाचखोरीवर होत आहे.

वर्ष - गुन्हे सिध्द - निर्दोष मुक्तता- एकूण खटले - टक्केवारी २०१६-७-२३-३०-२३, २०१५-२६-६७-९३-२८, २०१४-१७-२३-४०-४३, २०१३-१३-६१-७४-१८, २०१२-१६-८९-१०५-१५, २०११-१२-४७-५९-२०, २०१०-७-१९-२६-२७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाळेधारकांना आयुक्तांचा दणका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या गाळ्यांमध्ये पोटभाडेकरू ठेऊन वरकमाई करणाऱ्या गाळेधारकांना आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सोमवारी अनपेक्षित धक्का दिला. डॉ. गेडाम यांनी एकाच दिवशी एक हजार कर्मचाऱ्यांची जमवाजमव करत गनिमी काव्याने पालिकेच्या ५८ व्यापारी संकुलातील दोन हजार गाळ्यांचे सर्वेक्षण केले. ऐनवेळी गाळ्यांच्या सर्वेक्षणाची कल्पना दिल्याने या तपासणी माेहिमेतून धक्कादायक माहिती समोर येणार आहे. सद्यस्थितीत या माहितीची पडताळणी व विश्लेषण केले जात असून दहा दिवसात वस्तुस्थिती जाहीर करणार असल्याची माहिती डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली आहे.

प्रत्येक गाळ्याची चित्र‌ीकरणासह फुलप्रुफ तपासणी करून पालिकेच्या पथकांनी ५० हजार पांनाची माहिती जमवली आहे. विशेष म्हणजे आयुक्तांनी अतिशय गुप्तपणे स्मार्ट सिटीच्या सर्वेक्षणाच्या नावाखाली कर्मचाऱ्यांना जमवत, त्यांना ऐनवेळी गाळ्यांच्या सर्वेक्षणाची कल्पना दिल्याने धक्कादायक माहिती समोर येणार आहे.

महापालिकेच्या मालकीच्या गाळ्यांच्या फेरलिलावावरून सध्या वाद सुरू आहे. प्रशासनाने रेडीरेकनरने दरवाढ केल्याने गाळेधारक आक्रमक झाले होते. त्यामुळे फेरलिलाव, रेडीरेकनरने भाडेवाढ करण्याचा विषय हा महासभेत गेला होता. महापौरांनी यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी गटनेत्याची एक समिती नियुक्त केली आहे. या समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी ही दरवाढ चुकीची असल्याचे सांगून नवीन प्रस्ताव ठेवण्याचे आदेश‌ित केले होते. त्यामुळे येत्या महासभेत हा विषय चर्चेला येणार असतांनाच आयुक्त डॉ. गेडाम यांनी गाळ्यांसदर्भातील वस्तुस्थिती महासभेवर आणण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आयुक्तांनी गुप्त मोहीम आखत सोमवारी गनिमी काव्याने गाळे तपासणीची मोहीम हाती घेतली.

अनेक गाळे हे नगरसेवकांच्या नातेवाईकांकडे आहेत. तर काहींमध्ये पोटभाडेकरू मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे आयुक्तांनी गुप्तपणे ही मोहीम राबवली. ५८ व्यापारी संकुलातील १९७३ गाळ्यांच्या तपासणीसाठी ९५९ कर्मचारी व ६८ टीमलिडरची टीम तयार करण्यात आली. सकाळी नऊ ते ११ दरम्यान ही मोहीम राबविण्यात आली. कर्मचाऱ्यांकडे सतरा प्रश्नांची प्रश्नावली देत, ती गाळेधारकाकडून भरून घेण्यात आली. पोटभाडकरू संदर्भात प्रश्न विचारण्यात आले. तर शॉपअॅक्ट वीज कनेक्शनची माहिती घेण्यात आली. ही सर्व माहिती जमविण्यात आली असून तिचे निष्कर्ष सुरू असून दहा दिवसात जाहीर करणार असल्याचे आयुक्तांनी सांगीतले. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांना शेवटपर्यंत भनक लागू दिली नाही. स्मार्ट सिटीच्या प्रशिक्षणासाठी ९५९ कर्मचाऱ्यांना महाकवी कालीदास कला मंद‌िरात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे कर्मचारी व अधिकारीही इमानेइतबारे उपस्थित राहिलेत. या ठिकाणी जवळपास ६८ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली टीम तयार करण्यात आल्यात.

पोटभाडेकरूंनी काढला पळ

महापालिकेचे पथक अचानक गाळ्यांवर धडकल्यानंतर इतर पोटभाडेकरूंना या सर्व मोहिमेची माहिती समजली. त्यामुळे आपली पोल उघड होऊ नये म्हणून काही गाळेधारकांनी गाळे बंद करून धूम ठोकली. पथकाचा सामना करण्यासाठी पुरेसे कागदपत्रे नसल्याने काही जण गाळे बंद करून पसार झाले. सोमवारी सर्व व्यवहार सुरळीत होत असल्याने सोमवारीच तपासणी करावी अशी रणनीती आयुक्तांनी ठरविली होती. त्यानुसार मोहिमेचे कर्मचारी पोहोचल्यानंतर त्यांनी चित्र‌िकरण सुरू केले. त्यामुळे अनेक गाळेधारक घाबरले. त्यांनी थेट पोबारा करणेच पसंद केले.

रेड‌िरकनरला आयुक्तांचे उत्तर

प्रशासनाने रेड‌िरेकनरनुसार गाळ्यांची दरवाढ केल्यानंतर महापौरांनी गाळेधारका संदर्भात निर्णय घेण्यासाठी गटनेत्यांची समिती नियुक्त केली होती. या संदर्भात महापौरांच्या उपस्थिती बैठक झाली होती. यात पालिकेच्या गाळ्यांना रेड‌िरेकनर लावताच येत नसल्याचा दावा उपमहापौर गुरूमीत बग्गासह लोकप्रतिनिधींनी केला होता. त्यामुळे प्रशासन बॅकफूटवर आले होते तर आयुक्तही अनपेक्षित हल्ल्याने दुखावले गेले होते. लोकप्रतिनिधी व गाळेधारकांना उघडे पाडण्याचा चंगच प्रशासनाने बांधला होता. स्थायी व महासभेत पोटभाडेकरूवरून अगोदरच वांदग झाले होते. त्याचा धागा पकडत आयुक्तांना ही मोहीम फत्ते केली.













मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमबीबीएसच्या सुलतानचा सुवर्णषटकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मविप्र संचलित डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजचा एमबीबीएस अभ्यासक्रमाचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी सुलतान मोईनुद्दीन शौकतअली याने तब्बल सहा सुवर्णपदकांसह राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. मूळचा ठाणेकर असलेला मोईनुद्दीन एमबीबीएसच्या अभ्यासक्रमासाठी पाच वर्षांपासून नाशिकमध्ये आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत झालेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षांमध्ये एमबीबीएस विद्याशाखेत त्याने ही बाजी मारली. या अभ्यासक्रमात त्याने सहा विषयांत सर्वाधिक गुण मिळवत सुवर्णपदकांची कमाई केली. सोबतच त्याने महाराष्ट्रात सर्व खासगी व गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेजमधून पहिला येण्याचा मानदेखील मिळविला आहे. एमबीबीएसच्या पहिल्या, दुसऱ्या व अंतिम वर्षात त्याने अंतिम परीक्षेत सुवर्णपदके पटकावली, शिवाय अनॉटॉमी, पॅथॉलॉजी, फॉरेन्सिक मेडिसीन, पीएसएम कम्युनिटी मेडिसीन, मायक्रो बायोलॉजी व फिजिऑलॉजी या विषयांमध्येही गुणांचा उच्चांक साधत त्याने सुवर्णपदके पटकावली.

रुग्णसेवा हेच ध्येय ठेवून मेडिकल क्षेत्रातील करिअर निवडले होते. या यशामागे माझ्या आईची प्रेरणा आहे. मेडिसीन या आवडत्या विषयात करिअर करण्याचा माझा मानस आहे.

- सुलतान मोईनुद्दीन शौकतअली, गोल्ड मेडलिस्ट, डॉ. पवार मेडिकल कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनचालकांना ‘झिंग-झिंगाट’ भोवणार!

$
0
0

वाहतूक पोलिस करणार 'ऑन द स्पॉट' गुन्हा दाखल

arvind.jadhav @timesgroup.com

नाशिक : वाहनचालकांची तपासणी, त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल व सरते शेवटी कोर्टात खटला अशा त्रासदायक कार्यपध्दतीला फाटा देण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या हाती आधुनिक ब्रेथ अॅनालायझर मिळाले आहे. याद्वारे मद्यपी वाहनचालकांची जागेवरच माहिती संकलित करून लागलीच गुन्हा दाखल करता येणे शक्य आहे. थेट कोर्टात कारवाई झाल्यास शहरातील ड्रंक अॅण्ड ड्राईव्हच्या प्रकारामध्ये मोठी घट होऊ शकते.

मागील तीन महिन्यांपासून वाहतूक विभागात आमूलाग्र बदल झाला आहे. कारवाईचे प्रमाण लक्षणीय वाढले असून, प्रमुख रस्त्यासह आडमार्गालाही वाहतूक पोलिस कारवाई करताना दिसतात. याबाबत माहिती देताना वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त देवीदास पाटील यांनी सांगितले की, मद्यपी वाहन चालकांमुळे गंभीर अपघातांच्या घटना घडतात. शहर वाहतूक विभाग यापूर्वी साध्या ब्रेथ अॅनालायझरच्या माध्यमातून मद्यपी वाहनचालकांचा शोध घेत होते. मद्यपी वाहनचालक सापडले की त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी पाठवले जायचे. वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल प्राप्त झाला आणि त्यात ३० मिली ग्रॅमपेक्षा जास्त अल्कोहोल संशयितांनी घेतल्याचे निष्पन्न झाले तरच गुन्हा दाखल करून मद्यपी वाहनचालकास कोर्टासमोर केले जात होते. ही प्रक्रिया वेळ काढू होती. त्याचा फायदाही मद्यपी वाहनचालकांना मिळत होता. मात्र, आता वाहतूक विभागाकडे सहा आधुनिक ब्रेथ अॅनालायझर उपलब्ध झाले आहेत. जीपीएस सुविधा असलेल्या या ब्रेथ अॅनालायझरमुळे मद्यपी वाहनचालकाची माहिती, त्याचा वाहन क्रमांक, लायसन्स क्रमांक, फोटो तसेच अल्कोहोलचे प्रमाण, कारवाई केलेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची माहिती रिपोर्टमध्ये येणार आहे. या रिपोर्टची जागेवरच प्रिंट काढून त्यावर मद्यपी वाहनचालकाची स्वाक्षरी घेण्यात येईल. हाच रिर्पोट वैद्यकीय पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार असून, लागलीच मद्यपी चालकास कोर्टात हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई अत्यंत पारदर्शी पध्दतीची असून, यामुळे वारंवार मद्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांचाही डेटा उपलब्ध होणार असल्याचे पाटील म्हणाले.

मागील दोन ते तीन दिवसांपासून कारवाईस गती देण्यात आली आहे. शनिवारी २६, तर रविवारी ड्रंक अॅण्ड ड्राईव्हच्या १५ केसेस झाल्या. चालू वर्षात १६० पेक्षा जास्त ड्रंक अॅण्ड ड्राईव्हच्या केसेस झाल्या असून, गत वर्षीच्या तुलनेत यात मोठी वाढ झाली आहे. वाहतूक पोलिसांकडून सातत्याने होणाऱ्या कारवाईमुळे अपघातांच्या संख्येत सुध्दा घट होत आहे.

- देवीदास पाटील, सहायक पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेडिक्लेम कंपनीला ठोठावला दंड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मेडिक्लेम पॉलिसी काढूनही आजाराची माहिती लपवल्याचे कारण पुढे करत क्लेम नाकारणाऱ्या बिरला सनलाईफ इन्शुरन्सला ग्राहक न्यायमंचाने दणका दिला आहे. तक्रारदाराचे हॉस्पिटल व मेडिकल बिलाचे १५ हजार २२० रुपये देण्याचे आदेश देत पाच हजाराचा दंडही ठोठावला. यात शारीरिक व मानसिक त्रासापोटी तीन हजार व खर्चापोटी दोन हजार रुपयांचा समावेश आहे.

नाशिकरोड येथील कमल धिरुमल शर्मा यांनी मेडिक्लेमची पॉलिसी काढल्यानंतर त्यांचा क्लेम नाकारला. त्यानंतर त्यांनी ग्राहक न्यायमंचाकडे धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीत त्यांनी म्हटले की, बिरला सनलाईफ इन्शुरन्स कंपनीकडून फॅमिली पॉ‌लिसी काढली. त्यानंतर पाच महिन्याने माझ्या पत्नीचे गळुचे ऑपरेशन केले. त्याचा खर्च १५ हजार इतका करावा लागला. सदर खर्चाची रक्कम मिळवण्यासाठी इन्शुरन्स कंपनीला क्लेम केला. पण, त्यांनी मिस रिप्रेझन्टेशन ऑफ फॅक्टसचे कारण देत क्लेम नाकारला. या तक्रारीवर युक्तिवाद करतांना बिरला सनलाईफ इन्शुरन्स कंपनीने सांगितले की, टी.पी.ए.ने केलेल्या चौकशीत शर्मा यांच्या पत्नीला पॅालिसी घेण्यापूर्वीच गुडघे दुखी व थायरॉईडचा त्रास होता. त्यामुळे पॉलिसीच्या अटी व शर्थीचा भंग केला. त्यामुळे त्यांची तक्रार फेटाळण्यात यावी. या दोन्ही युक्तिवादावर ग्राहक न्यायमंचाने कंपनीचा युक्तिवाद फेटाळत तक्रारदाराच्या बाजूने निकाल दिला. हा निकाल जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्य प्रेरणा काळुंखे -कुळकर्णी, कारभारी जाधव यांनी दिला. तक्रारदारातर्फे अॅड. के. जी. कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता शाळाही ‘अॅप’ टू डेट

$
0
0

ashwini.kawale@timesgroup.com

नाशिक ः आज शाळेचा काही निरोप आहे का, म्हणून पालकांना वारंवार स्कूल डायरी तपासावी लागते. मात्र, आता ही माहिती तुम्ही कुठेही असलात तरी मिळणार आहे. पालकांना अप टू डेट माहितीसाठी आता नाशिकच्या काही शाळांनी मोबाइल अॅप आणले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांजवळ विविध सूचनांच्या चिठ्ठ्यांऐवजी मोबाइलवर थेट नोटिफिकेशनच येत आहे... आपल्या विद्यार्थ्याची प्रगती कशी आहे हेही स्मार्टफोनवरच पाहता येते.

मुंबई, पुण्यापाठोपाठ आता नाशिकमध्येही अत्याधुनिक सुविधा पुरविणाऱ्या शाळांची संख्या वाढली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्याकडे कल असल्याचा दावा या शाळा वेळोवेळी करीत असतात. याच पार्श्वभूमीवर तांत्रिक विकासाकडेही त्यांचे लक्ष आहे. स्मार्ट फोनमधील अॅप्सचा लाभ विविध कारणांसाठी घेता येत असल्याने शाळांनी ही क्लृप्ती लढवली आहे. प्रत्येक इंग्रजी माध्यमाच्या शाळेची स्वतंत्र वेबसाइट आहे. या वेबसाइटवर शाळेविषयी संपूर्ण माहिती दिली जाते. मात्र, वेबसाइटच्या तुलनेत अॅप वापरणे अधिक सोयीस्कर असल्याने शाळांनी यासाठी पुढाकार घेतला असल्याचे दिसून येते. तसेच पाल्याची सुरक्षितता हा आजच्या काळात महत्त्वाचा विषय ठरत आहे. पाल्य शाळेत गेला तरी अनेक पालकांना धास्ती असते. ही धास्ती मिटविण्यासाठी मोबाइल अॅप्स फायदेशीर ठरणार असल्याचा विश्वास संस्था चालकांच्या वतीने व्यक्त केला जात आहे.

शाळेतील तास, शाळेची संपूर्ण माहिती, विद्यार्थिसंख्या, शाळेचे कामकाज, कर्मचारी, शाळेतील विविध सुविधा, इतकेच काय तर स्कूल बसची माहिती काढण्यासाठी अगदी नेव्हिगेशनचा पर्यायही अशा अॅप्समध्ये देण्यात आला आहे. त्यामुळे अर्थातच पाल्याची माहिती पालकांच्या हातात येऊन पोहोचली आहे.

हल्ली पालक खूप बिझी झाले आहेत. त्यांच्या बिझी शेड्युलमध्ये अॅप्सची चांगली मदत होते. शाळेतील उपक्रम, विद्यार्थ्याची गैरहजेरी, सुट्या आदींविषयी त्यांना माहिती मिळणे सोपे झाले आहे. आधी केवळ विद्यार्थ्यांच्या डायरीत नोट लिहून दिल्या जात असे. आता अॅपमुळे माहिती देणे सुकर झाले आहे, असे ग्लोबल व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या संचालिका विजयालक्ष्मी मणेरीकर यांनी सांगितले.

या शाळांचे अॅप

विज्डम हाय इंटरनॅशनल स्कूल, अशोका युनिव्हर्सल स्कूल, रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल, फ्रवशी इंटरनॅशनल अॅकॅडमी, इस्पॅलिअर एक्सपीरिमेंटल स्कूल, ग्लोबल व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल आदी शाळांचे अॅप्स कार्यरत आहेत, तर काही शाळांचे अॅप लवकरच येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजकांचा ओढा दिंडोरी एमआयडीसीकडे

$
0
0

gautam.sancheti@timesgroup.com

नाशिक ः नाशिक शहरातील सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीत भूखंड शिल्लक नसल्याने नव्याने विकस‌ित होत असलेल्या दिंडोरी तालुक्यातील औद्योगिक वसाहतीकडे उद्योजकांचा वाढता कल आहे. त्यामुळे ब्रिटानियासह अन्य दिग्गज कंपन्यांनी दिंडोरीला पसंती दिली आहे. चीनच्या शिष्टमंडळालाही दिंडोरीची जागा दाखविण्यात आली असून येत्या काळात याठिकाणी मोठी गुंतवणूक होण्याची चिन्हे आहेत.

नाशिकपासून अवघ्या १० किलोमिटर अंतरावर असलेल्या तळेगाव दिंडोरी, अकाराळे या गावाच्या शिवारात ५०० एकर जागेत नवीन एमआयडीसी उभी रहात आहे. त्यासाठी रस्ते बांधले गेले आहे. त्याचप्रमाणे पालखेड धरणातून पाइपलाइनचे कामही सुरू झाले आहे. या औद्योगिक वसाहतीत २०० हून अधिक उद्योग उभे राहणार असून त्यासाठी विविध परदेशी कंपन्याबरोबच मोठ्या कंपन्याने येथे उद्योग सुरू करण्यासाठी एमआयडीचे अधिकारी यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या नव्या एमआयडीसीत सुमारे ३ हजार कोटींची गुंतवणूक व्हावी यासाठी आखणी करण्यात आली आहे.

नाशिक शहरातील सातपूर एमआयडीसीचे ६२५.७३ हेक्टर क्षेत्र असून त्याची स्थापना १९६८ साली झाली. येथे १२२२ भूखंड आहे. त्यातील ११८१ भूखंडाचे वाटप झाले असून इतर भूखंडावर वाद तर काही प्रकरणे कोर्टात आहेत. त्याचप्रमाणे अंबड औद्योगिक वसाहत ५१५.५० हेक्टरवर वसली आहे. १९७५ मध्ये ती विकस‌ित केली असून येथे १६१६ भूखंड पाडण्यात आले. त्यात १६०१ भूखंड वितरीत करण्यात आले. त्यामुळे या ठिकाणी नवीन उद्योगांना आता जागा शिल्लक नाही. त्यामुळे नव्याने विकस‌ित होत असलेल्या उद्योजकांनी दिंडोरीकडे मोर्चा वळव‌िला आहे.

उद्योगांसाठी अनुकूल वातावरण

दिंडोरी एमआयडीसीत चीनच्या एका शिष्टमंडळाने नव्या उद्योगासाठी पाहणी केल्यानंतर ब्रिटानिया कंपनीनेही येथे सर्व्हे केला आहे. त्याचप्रमाणे औषधनिर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबई येथील किलीच ड्रग इंडिया लिमिटेड कंपनीही येथे उद्योग सुरू करणार आहे. त्यासाठी ७० कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे वृत्त आहे. या कंपनीबरोबरच अनेक औषध निर्मात्या कंपनीने येथे पाहणी केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तळेगाव दिंडोरी-आक्राळे या गावाच्या शिवाराजवळ असलेली ही एमआयडीसी ओझर विमानतळापासून १० किलोमीटर अंतरावर आहे. तर, मुंबई-आग्रा रस्ताही येथून जवळ आहे. त्यामुळे येथे अनेक उद्योजकांचा कल वाढला आहे. सातपूर, अंबड येथे अनेक उद्योजक भूखंडाची मागणी करतात. पण येथे जागा शिल्लक नाही. त्यामुळे दिंडोरी येथे विकस‌ित होणाऱ्या एमआयडीकडे आता कल वाढू लागला आहे. चीनच्या शिष्टमंडळाने येथे भेट दिली. त्यानंतर ब्रिटानिया कंपनीने येथे पाहणी केली. त्याचप्रमाणे अनेक औषध निर्माण करणाऱ्या कंपनीची येथे पसंती असल्यामुळे येथे मोठी गुंतवणूक होईल. आमचेही मोठ्या कंपन्या आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हेमांगी पाटील, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नगरसेवक लोंढेंवर अटकेची टांगती तलवार!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कोर्टाच्या आवारात संशयित आरोपींना मद्य पुरवणे तसेच पोलिस कर्मचाऱ्यास अॅट्रास‌िटी दाखल करण्याची धमकी देऊन सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या नगरसेवक प्रकाश लोंढेंना मंगळवारी हायकोर्टाने दणका दिला. या गुन्ह्यात त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला असून, पोलिसांची तीन ते चार पथके त्यांच्या मागावर आहेत. ३ जून रोजी जिल्हा कोर्टाने लोंढेंचा अर्ज फेटाळला होता. तेव्हापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या लोंढेंना हायकोर्टात सुध्दा दिलासा मिळाला नाही. स्वारबाबानगर येथील प्रकाश लोंढेंच्या कार्यालयात झालेल्या दुहेरी हत्याकांडातील संशयितांना कोर्टाच्या आवारात मद्य व खाण्याचे इतर साहित्य देण्यास मज्जाव केल्यानंतर सातपूर विभागातील नगरसेवक प्रकाश लोंढे यांनी पोलिस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली होती. ही घटना २४ मे रोजी घडली. यानंतर काही दिवसांनी नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्यावर सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अटक होण्याची शक्यता गृहीत धरून लोंढेंनी ३० मे रोजी जिल्हा कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला. त्यावर सुनावणी होऊन कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. लोंढेविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर कोर्टाने आपला निर्णय दिला. जिल्हा कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळाल्यानंतर लोंढे भूम‌िगत झाले. यानंतर त्यांनी मुंबई हायकोर्टात जामीनासाठी अर्ज दाखल केला. मात्र, तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. हायकोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळला. यामुळे सरकारवाडा पोलिस लोंढेंना कधीही अटक करू शकतात. त्यांच्या शोधार्थ आमची तीन ते चार पथके कार्यरत असल्याचे सरकारवाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांनी सांगितले. सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा सिध्द झाल्यास संशयितास दोन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.

मुलगा आणि वडील दोघेही फरार यावर्षीच्या सुरुवातीला स्वारबाबानगर परिसरात दोघा सराईत गुन्हेगारांची हत्या झाल्याची बाब समोर आली होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या ग्रामीण पोलिसांनी प्रकाश लोंढेंचा मुलगा भूषण याचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आणले. हायकोर्टाकडून तात्पुरता जामीन मिळवलेला भूषण नंतर मात्र फरारच झाला. त्याचा शोध आजही सुरूच आहे. दुसरीकडे नगरसेवक तसेच रिपब्ल‌िकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष लोंढे हेही मागील महिनाभरापासून बेपत्ता आहेत. त्यांचाही शोध सुरू असून याविषयी सातपूर भागात विविध चर्चांना ऊत आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेवर बलात्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड निफाड तालुक्यातील श्रीरामनगर (कोळवाडी) येथील विवाहीत महिलेला धाक दाखवून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्या तसेच अश्लील चित्रफित व्हायरल केल्याप्रकरणी मनोज दत्तात्रय सुपेकर (३५) याच्यावर निफाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी निफाड पोल‌िसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीरामनगर (कोळवाडी) येथील सुपेकर हा गावातीलच एका विवाहित महिलेला माझ्याकडे तुझे काही पुरावे आहेत, तू माझ्याशी शरीर संबंध ठेवले नाही, तर मी तुझी बदनामी करेल, असा धाक दाखवून या विवाहित महिलेवर त्याने श्रीरामनगर येथे राहत्या घरात, द्राक्षबागेत वेळोवेळी बलात्कार केला. तसेच शिर्डी येथे पीड‌ित महिलेला धाक दाखवून लॉजवर त्याने बलात्कार केला. शिवाय तिची नजर चुकवून तिच्याशी केलेल्या शरीर संबंधाची आपल्या मोबाइलमध्ये चित्रफीत बनवली व ती इतरांच्या मोबाइलमध्ये व्हायरल करून त्या पीडित महिलेची बदनामी केली. निफाड पोलिसांनी सुपेकर याच्या विरोधात भा.दं.वि कलम ३७६, २९२ अ ५०६ आयटी अॅक्टअन्वये गुन्हा दाखल केला असून, संशयित आरोपी सुपेकर यास निफाड पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास पोल‌िस निरीक्षक रणजित डेरे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हवालदाराच्या वाहनाने दोघांना ठोकरले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
भरधाव वेगात कार घेऊन जाणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने दोन दुचाकींना उडवले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. अपघाताची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शरणपूररोडवरील राजीव गांधी भवन शेजारील सिग्नलवर घडली. पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, संबंध‌ित पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. अर्जुन विठ्ठल आघाव, असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून ते पोलिस मुख्यालयांतर्गत पाथर्डी फाटा क्वॉर्टरमध्ये लाइन सार्जंट म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी दुपारी २ वाजून पाच मिन‌िटांच्या सुमारास आघाव मद्यधुंद अवस्थेत आपल्या ताब्यातील एमएच ०६ सीजी ८२०३ या स्विफ्ट कारने रामायण बंगल्याकडून केटीएचएम कॉलजेकडे भरधाव वेगात चालले होते. आघाव शरणपूर सिग्नलजवळ पोहचले. तिथे शरणपूरकडे जाणारे सिग्नल बंद होते. मात्र, आघाव यांनी परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत तिथे उभे असलेल्या दुचाकी क्रमांक एमएच १५ डीए ३५४ आणि स्कूटर क्रमांक एमएच १५ एफ ८९०३ यांना जोराची धडक दिली. परिसरातील नागरिकांनी दुचाकीवरील जखमीला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले तर दुसऱ्या व्यक्तीस किरकोळ दुखापत झाल्याने त्याला प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले. याप्रकरणी इंदिरानगर परिसरातील साईनाथनगर येथील सत्यवंदन सोसायटीत राहणाऱ्या कैशल विवेकानंद घोडके या विद्यार्थ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलिसांनी आघावविरोधात कलम २७९, ३३७, ३३८, मोटार व्हेईकल अॅक्ट १८२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

आघाव मद्याच्या आहारी होते किंवा नाही याचा रिपोर्ट येणे बाकी आहे. अपघाताच्या घटनेमुळे मी घाबरलो होतो, असे आघाव यांनी सांगितले. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आज त्यांची साप्ताहीक सुटी होती. - डॉ. सीताराम कोल्हे, पीआय, सरकारवाडा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

…आणि त्याच्या वेदना निमाल्या!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक त्याचे विव्हळणे ऐकून दगडालाही पाझर फुटावा...त्याच्या वेदना पाहून कठोर काळीजही गलबलून जावे, अशा परिस्थितीत सापडलेल्या माकडाच्या वेदनेचे मूळ अखेर शस्त्रक्रियेद्वारे दूर करण्यात आले. बाहेर आलेल्या दाताच्या सुळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि या माकडाची असह्य वेदनांपासून सुटका झाली. 'आवास' प्राणीमित्र संस्थेने या माकडाला जीवदान दिले. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारात दोन दिवस हे माकड जखमी अवस्थेत पडलेले होते. या माकडाच्या दाताचे सुळे कातडीच्या बाहेर आले होते. त्यामुळे त्याचे अन्न पाणी बंद झाले होते. त्याच्या अंगावर जखमाही झाल्या होत्या. या माकडाची परिस्थिती बघताच अॅनिमल वेलफेअर अँटी हॅरेशमेंट सोसायटी (आवास) संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या माकडाला उपचारासाठी नेले. वनविभागात नोंद करून त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांना दाखवण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू झाले. या माकडाची शारीरिक अवस्था दयनीय असल्याने त्याच्यावर जवळपास महिनाभर उपचार सुरू होता. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्याच्या दातांवर शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. आवास संस्था थोडे दिवस या माकडाचा सांभाळ करणार असून वनविभाग त्याला जंगलात सोडणार आहे. या माकडावर शस्त्रक्रीया करण्यासाठी पशू वैद्यकीय अधिकारी संजय महाजन, डॉ. जगदीश गायकवाड यांनी परिश्रम घेतले. तसेच वनपरिमंडळ अधिकारी मधुकर गोसावी, अभिषेक कुलकर्णी आवास संस्थेचे गौरव क्षत्र‌िय हे या शस्त्रक्रियाप्रसंगी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोंढेच्या घराची पोलिसांकडून झडती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हवालदार आहेर यांना धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा निर्माण करणारे फरारी नगरसेवक प्रकाश लोंढे याच्या कार्यालयाची व घराची पोलिसांकडून मंगळवारी रात्री कसून झडती घेण्यात आली. या वेळी स्वारबाबानगरात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा दाखल झाला होता. या वेळी पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहाय्यर पोलिस आयुक्त अतुल झेंडे यांनी लोंढेच्या कार्यालय व घराची तपासणी केली. दरम्यान, उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला असताना तो न्यायालयाने फेटाळल्याने लोंढे यांच्या कार्यालय व घराचे सर्च ऑपरेशन करण्यात आले असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.
शहरातही पोलिस आयुक्तांच्या आदेशावरून भद्रकाली, फुलेनगर, सिन्नर फाटा, भारतनगर आदी भागांत पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. दरम्यान, प्रकाश लोंढे बुधवारी पोलिसांना शरण येणार असल्याच्या पोस्ट व्हॉट्सअॅपवर झळकत होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रीडा प्रबोधिनी, ब्रह्मा स्पोर्टला विजेतेपद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा कबड्डी संघटनेच्या मान्यतेने व आडगाव येथील ब्रह्मा स्पोर्टतर्फे नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय ५५ किलो वजनी गटाच्या स्पर्धेत मुलींच्या गटात नाशिकचा क्रीडा प्रबोधिनी, तर मुलांच्या गटात यजमान आडगावच्या ब्रह्मा स्पोर्टने विजेतेपद पटकावले.

आडगाव येथे झालेल्या या स्पर्धेचे उद््घाटन अॅड. नितीन ठाकरे, आयएएस अधिकारी रवींद्र खातळे यांच्या हस्ते झाले. राज्य कबड्डी संघटनेचे सहसचिव प्रकाश बोराडे, जिल्हा संघटनेचे सदस्य रंगनाथ शिंदे, अॅड. जे. टी. शिंदे, नगरसेविका मीनाताई माळोदे, अॅड. नितीन माळोदे, मधुकर नवले, निवृत्ती मते, भिकाजी शिंदे, सागर माळोदे, पंचप्रमुख राजेंद्र निकुंभ आदी उपस्थित होते.

स्पर्धेत मुलांचे २८, तर मुलींच्या आठ संघांनी सहभाग घेतला. मुलींच्या पहिल्या उपांत्य फेरीत क्रीडा प्रबोधिनीने नाशिकच्या रचना स्पोर्टसला, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत साई स्पोर्टसने शिवशक्ती आडगावचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. मुलांच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात यजमान ब्रह्मा स्पोर्टसने आरएसएस पांढुर्लीचा पराभव केला, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत शिवशक्ती आडगावने सय्यद पिंप्रीच्या उत्कर्ष क्रीडा मंडळाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली.

मुलांच्या अंतिम सामन्यात राष्ट्रीय खेळाडू तुषार माळोदे, रोहित माळोदे, शाकीब सय्यद यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर ब्रह्मा स्पोर्टसने शिवशक्ती आडगावचा एकतर्फी पराभव करीत विजेतेपद मिळविले. शिवशक्तीतर्फे राष्ट्रीय खेळाडू सनी मतेने एकतर्फी लढत दिली. मुलींच्या गटातील अंतिम फेरीत राष्ट्रीय खेळाडू श्रुती जाडरच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर क्रीडा प्रबोधिनीने साई स्पोर्टसचा २२-१२ असा १० गुणांनी दणदणीत पराभव केला. विजयी संघाकडून संजना गायकवाड, ज्योती पवार, चंदा बर्डे, मालती गांगुर्डे, सबिना सय्यद यांनी चांगला खेळ केला. साई स्पोर्टसकडून काजल जठार, अभिलाषा दातीर, कोमल देशमुख यांनी चांगला खेळ केला.

मुलांच्या संघात तृतीय क्रमांकाचे पारितोषिक आर. एस. एस. पांढूर्ली, तर मुलींच्या संघात रचना स्पोर्टसला मिळाले. चंद्रकांत माळोदे, मनोज मते, राजू मोरे, रणजित राऊत, तुकाराम लभडे, सागर माळोदे यांनी सहकार्य केले. राजेंद्र निकुंभ, शरद पाटील, सुरेश शिंदे, विजय ढिकले, दत्ता जाधव, संतोष खरे, रेहमान शेख, चंद्रकांत ढिकले, भारत खत्री पंच होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुसळगाव एमआयडीसीत ९० टक्के पाणीपुरवठा बंद

$
0
0

कारखान्यांचे कोट्यवधींचे नुकसान; पिण्याच्या पाण्यासाठी जास्त पैसे

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

मुसळगाव औद्योगिक वसाहतीत ९० टक्के पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. यावर सहकारी वसाहतीने गेल्या दोन दिवसांपासून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. यात प्रत्येक उद्योगासाठी दोनशे लिटरचा ड्रम भरून देण्याची सुरुवात करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत मुसळगाव एमआयडीसीत पिण्याच्या पाण्याचे हाल सुरू झालेले दिसून येत आहे. याउलट एमआयडीसीकडून अत्यल्प पाणीपुरवठा होत असल्याने येथील कारखान्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामुळे उद्योगांवर बंद करण्याची पाळी येऊन ठेपली आहे.

एकीकडे मान्सूनची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे. त्यात दिवसेंदिवस पाण्याची मागणी वाढतच आहे. विहिरींनी तळ गाठल्यामुळे चारपट पैसे मोजून टँकरद्वारे पाणी मिळत नसल्याने पाण्यावर अवलंबून असलेले माळेगाव औद्योगिक वसाहतीपाठोपाठ मुसळगाव येथील अनेक उद्योग बंद पडत आहेत. पाणीटंचाईमुळे उत्पादनाचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात घटले आहे. उद्योगासाठी नव्हे तर पिण्यासाठी तरी पाणी द्यावे अशी मागणी निमाच्या पदाधिकाऱ्यांनी एमआयडीसीकडे या अगोदर केली होती. या मागणीनुसार माळेगाव औद्योगिक वसाहतीत नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू केला होता.

यासोबतच मुसळगाव औद्योगिक वसाहतीतही पाणीपुरवठा करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. उद्योगांना नाही तर किमान पिण्यासाठी तरी नळाद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी उद्योजकांकडून होत आहे. ही मागणी एमआयडीसीने तातडीने पूर्ण करून मुसळगाव औद्योगिक वसाहतीसाठी नळाद्वारे पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही उद्योजकांकडून होत आहे.

उद्योगधंदे बंदच्या मार्गावर

मुसळगाव एमआयडीसीत पाण्याअभावी उद्योगधंदे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. एमआयडीसीत फूड, फार्मा, लोखंड यासारखे कारखान्यांचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. तसेच काही उद्योग तर बंद पडले आहेत. येथील कामगार व अधिकाऱ्यांना एमआयडीसीकडून पिण्यास पाणी दिले जात नसल्याने उद्योजकांना टँकरद्वारे व्यवस्था करावी लागत आहे. परंतु, या पाण्याने कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी याकडे लवकर लक्ष देऊन ही समस्या सोडविण्याची मागणी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन अरूण चव्हाणके यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कळवण शहरविकासासाठी ३ कोटींचा निधी मंजूर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण शहराचा दिवसागणिक विस्तार आणि प्रगती होत असून रस्ते, गटार व सांडपाणी या प्रमुख समस्या जनतेला भेडसावत आहेत. कळवण शहरात गटार व सांडपाणी यांचे निर्मूलन करण्याची मोठी समस्या असल्याने ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी सरकार व नाबार्डकडून ३ कोटी ५६ लाख रुपये मंजूर झाले आहे. राज्य सरकारने या प्रकल्पाच्या कामांची स्थगिती उठवल्याने निविदा प्रक्रियेचा सोपस्कार पूर्ण करण्यात येऊन कामास लवकरच प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती कळवण नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सुनीता पगार यांनी दिली.

कळवण नगरपंचायत हद्दीतील अपूर्ण असलेली भारत निर्माण योजनेतंर्गत पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये गणेशनगर, रामनगर, संभाजीनगर व शिवाजीनगर भागातील पाणी प्रश्नाची कायमस्वरूपी सोडवणूक करण्याचा आपला मनोदय असल्याची माहिती नगराध्यक्षा सुनीता पगार यांनी दिली आहे.

जिल्हा परिषदेच्या १३ व्या वित्त आयोगातून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांच्या प्रयत्नातून सुभाषपेठेत पेव्हर ब्लॉक, कळवण नगरपंचायत अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण ही कामे मार्गी लावण्यात यश आले आहे. जीवन प्राधिकरण विभागाकडून गटार सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प कळवण नगरपंचायत हद्दीत राबविण्यात येणार आहे. त्या अंतर्गत दररोज २ लाख लीटर शुद्ध पाणी करण्यात येणार असून त्या पाण्याचा शेती व्यवसायासाठी उपयोग केला जाणार असल्याची माहिती कौतिक पगार यांनी दिली.

उपनगराध्यक्षा रंजना पगार, जयेश पगार, अतुल पगार, साहेबराव पगार, बाळासाहेब जाधव, मुख्याधिकारी डी. आर. ठाकूर, लेखाधिकारी संजय आहेर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांच्या पदरात मोफत बियाणे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इगतपुरी

तालुका मनसेने पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनोखा उपक्रम राबवला. तालुक्यात दुष्काळाने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांना मोफत भाताच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाने तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

घोटी येथे मनसेनेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे व इगतपुरी तालुकाध्यक्ष मुळचंद भगत यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तालुक्यातील गरजू शेतकरी बांधवांना मोफत ब‌ि-बियाणे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी तालुक्यातील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात सामील झाला होता. या वेळी संदीप किर्वे, मुलचंद भगत, भोलेनाथ चव्हाण, कैलास भगत, डॉ. रंगरेज आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारची फसवणूक २६ वर्षांनी उघड

$
0
0

pravin.bidve @timesgroup.com

नाशिक : गृहबांधणी योजनेसाठी मंजुरी घेतल्यानंतर नागरी जमीन कमाल धारणा अधिनियमान्वये राज्य सरकारला १० टक्के सदनिका देणे बंधनकारक असतानाही त्यापैकी निम्म्या सदनिका राज्य सरकारकडे हस्तांतरीतच केल्या नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे २६ वर्षांपूर्वी ही फसवणूक झाली असून, अल‌िकडे हा प्रकार उघडकीस आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जमीन कमाल धारणा अधिनियमान्यवये एखाद्या व्यक्तीला विशिष्ट आकारमानाचे क्षेत्रच स्वत:च्या नावे ठेवता येते. त्यापेक्षा अधिक क्षेत्र त्याच्याकडे असेल तर त्यावर सरकारच्या योजना राबविणे आवश्यक असते. तसे न केल्यास ती जमीन सरकारजमा होण्याची शक्यता असते. पंचवटीतील लोकसहकारनगर येथे १९७६ च्या जमीन कमाल धारणा अधिनियमाच्या कलम २१ अन्वये नारायण रामजी कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांकडे ४३२७.५३ चौरस मीटर अतिरिक्त क्षेत्र होते. ते गृहबांधणी योजनेसाठी मंजूर करण्यात आले होते. त्यासाठी त्यांनी ३० मार्च १९७९ रोजी अर्ज केला होता. ६ फेब्रुवारी १९८० रोजी ही योजना मंजूर करण्यात आली. मात्र, त्यासाठी कलम २१ अन्वये एकूण सदनिकांपैकी १० टक्के सदनिका राज्य सरकारकडे हस्तांतरीत करण्याची अट घालण्यात आली होती. १९९०-९१ च्या सुमारास येथे १०० सदनिका बांधून पूर्ण झाल्या. त्यानंतर त्यापैकी दहा सदनिका राज्य सरकारकडे हस्तांतरीत करणे आवश्यक होते. परंतु, केवळ पाच सदनिकाच हस्तांतरीत करण्यात आल्या. उर्वरीत पाच सदनिका अजूनही हस्तांतरीत करण्यात आल्या नाही.

आणखी प्रकरणे पुढे येण्याची शक्यता अशा प्रकारे आणखी काही प्रकरणं पुढे येण्याची शक्यता बळावली आहे. तब्बल २५ वर्षांनंतर हा प्रकार उघडकीस आल्याने इतके वर्ष या नागरी जमीन कमाल धारणा कायदा विभागातील अधिकारी काय करीत होते, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. नवीन मंजुरीची कामे बंदच झाली असून वर्षानुवर्ष या विभागाला पुर्णवेळ अधिकारीच मिळत नसल्यामुळे येथील कामकाजही दुर्लक्षित राहिल्याची माहिती पुढे आली आहे.

कॉन्ट्रॅक्टर बंधूंवर गुन्हा हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने संबंधितांकडे वारंवार पाठपुरावा केला. त्यांच्या पत्त्यावर लेखी नोट‌िसा पाठविल्या. परंतु ते तेथे राहत नसल्याचे आढळून आले. त्यांच्या मुंबई येथील पत्त्यावरही रजिस्टर पोस्टाने नोट‌िसा पाठविण्यात आल्या. परंतु ही नोटीसही परत आली. पाच सदनिका त्यांनी स्वत:हून राज्य सरकारकडे का हस्तांतरीत केल्या नाही, याबाबत त्यांनी जिल्हा प्रशासनाला खुलासा देखील सादर केलेला नाही. त्यामुळे सहायक नगर रचनाकार प्रफुल्ल नल्ला यांनी नारायण रामजी कॉन्ट्रॅक्टर, गौतम शांतीलाल कॉन्ट्रॅक्टर आणि सुनील शांतीलाल कॉन्ट्रॅक्टर (सर्व रा. माटुंगा, मुंबई) यांच्याविरोधात पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार संबंध‌ितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी उघडकीस आली फसवणूक लोकसहकारनगर परिसरात या योजनेंतर्गत सात इमारतींमध्ये एकूण १०० सदनिका बांधण्यात आल्या. त्यापैकी माया नावाच्या इमारतीची अलीकडच्या काळात पडझड झाली. तेथे नवीन इमारत बांधायची होती. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नागरी जमीन कमाल धारणा विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक होते. या प्रमाणपत्रासाठी कार्यालयात अर्ज करण्यात आला. त्यावेळी करण्यात आलेल्या जुन्या रेकॉर्डच्या पडताळणीत हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. अन्य इमारतींप्रमाणे ही इमारत सुस्थितीत राहिली असती तर अजूनही कित्येक वर्ष हा प्रकार उघडकीसच आला नसता, हे विशेष. या जागेवर नवीन इमारत बांधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. परंतु नवीन इमारतीमधील एक सदनिका राज्य सरकारकडे हस्तांतरीत करावी, अशी अट त्यामध्ये घालण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमबीबीसच्या १५० जागांवर टांगती तलवार

$
0
0

Jitendra.tarte@timesgroup.com

मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडे (एमसीआय) एमबीबीएसच्या जागा मान्यतेसंदर्भात प्रलंबित असणाऱ्या प्रस्तावावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नसतानाही विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेजातील ५०, तर विदर्भातील गोंदिया मेडिकल कॉलेजातील १०० जागांना मान्यतेचा प्रस्ताव प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांना स्वतःच्या जोखमीवर प्रवेश घ्यावे लागणार आहेत.

सीईटीच्या मेरिट लिस्टनुसार पहिल्या ८५० विद्यार्थ्यांच्या मेडिकल प्रवेशप्रक्रियेला बुधवारी, १५ जूनपासून सुरुवात होणार आहे. या प्रक्रियेत सहभागी विद्यार्थ्यांनी जागामान्यतेची वस्तुस्थिती लक्षात घेऊनच स्वत:च्या जोखमीवर संबंधित मेडिकल कॉलेजचा नामोल्लेख प्रेफरन्स फॉर्ममध्ये करावा, असा इशाराच स्टेट एन्टरन्स सेलने दिला आहे.

पुण्याच्या ससून रुग्णालयात प्रेफरन्स फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असून, या अर्जांमध्ये अपेक्षित मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजचा स्पष्ट नामोल्लेख करायचा आहे. यादीत उत्तर महाराष्ट्रातील धुळे अन् विदर्भातील गोंदिया येथील मेडिकल कॉलेजचा पर्याय समोर येताच विद्यार्थ्यांचा पेन मात्र जागीच थबकतो आहे.

काय आहे स्टेट एंट्रन्सचा इशारा?

धुळ्याच्या मेडिकल कॉलेजात एमबीबीएससाठीच्या ५० जागांना एमसीआयची मान्यता आहे. या कॉलेजने यात भर घालत आणखी ५० जागांची मागणी कौन्सिलकडे केली आहे, तर गोंदिया मेडिकल कॉलेजने कौन्सिलकडे एमबीबीएसच्या १०० जागांना मान्यता देण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. हे दोन्हीही प्रस्ताव कौन्सिलकडे निर्णयासाठी प्रलंबित आहेत. स्टेट कॉमन एंट्रन्स सेलने विद्यार्थ्यांना थेट सावधानीचाच इशारा दिला आहे. सेलने काढलेल्या सूचनापत्रकानुसार धुळे व गोंदियातील कॉलेजची परिस्थिती या सूचनापत्रकात ठळक शब्दांत नमूद केली आहे. प्रवेशांना सुरुवात झाली असताना अद्याप याबाबत परवानगीचे अंतिम पत्र कॉलेजकडे नाही. मान्यता मिळाली तर अडचण नाही. मात्र, ही मान्यता यंदा न मिळाल्यास या विद्यार्थ्यांचे भवितव्यच धोक्यात येऊ शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी, मनसेला शिवसेनेकडून खिंडार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपले धक्कातंत्र कायम ठेवले असून, शहराप्रमाणेच ग्रामीणमध्येही ताकद वाढविण्याचे काम सुरू केले आहे. शहरातील मनसे, राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांना गळाला लावल्यानंतर सिन्नरमध्ये राष्ट्रवादीला मोठे खिंडार पाडले आहे. सिन्नर नगरपालिकेतील राष्ट्रवादीचे आठ नगरसेवक, सिन्नर पंचायत समितीतील राष्ट्रवादीचे गटनेते उदय सांगळेंसह आठ सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला असून, त्यात त्र्यंबकेश्वरमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांचे पडघम वाजायला लागताच शिवसेना आक्रमक झाली आहे. इतर पक्षांतून पदाधिकारी व उमेदवारांना आयात करण्याचा सिलसिला सुरू केला आहे. आमदार राजाभाऊ वाजे यांनी मंगळवारी सिन्नरमध्ये राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला. सिन्नरमधील राष्ट्रवादीचे नगरसेवक विजय जाधव, शैलेश नाईक, मनोज भागत, राजेंद्र घोरपडे, प्रमोद चोथवे, नगरसेविका वैजयंती बर्डे, शुभांगीताई झगडे, पुष्पलता लोणारे अशा आठ जणांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला, तर सिन्नरमधील राष्ट्रवादीचे बडे नेते व पंचायत समितीतील गटनेते उदय सांगळे यांच्यासह पंचायत समितीचे आठ सदस्य शिवसेनेत दाखल झाले. त्यामुळे सिन्नरमधील राष्ट्रवादी जवळपास नामशेष झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर व सिन्नर तालुक्यातील पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच, जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी शिवसेना भवनात शिवबंधव बांधून शिवसेनेत प्रवेश केला. त्यात त्रंबकेश्वरचे मनसे तालुकाप्रमुख नामदेव चव्हाण, मनसे वाहतूक सेना तालुकाप्रमुख समाधान आहेर, संघटक पंडित चव्हाण यांचा समावेश आहे. सहकार राज्यमंत्री दादा भुसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते या वेळी उपस्थित होते.

आव्हाडांना अपशकुन

नाशिक राष्ट्रवादीच्या प्रभारीपदी आमदार जितेंद्र आव्हाड यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. आव्हाड यांचे होमटाऊन हे सिन्नर असून, त्यांच्या नियुक्तीने सिन्नरमध्ये राष्ट्रवादीचे बळ वाढणे अपेक्षित होते. मात्र, राष्ट्रवादीचे बळ वाढण्याऐवजी सिन्नरमध्ये राष्ट्रवादीच नामशेष झाली आहे. त्यामुळे हा आव्हाडांसाठी अपशकुन असल्याची चर्चा आहे. सिन्नरमध्ये आव्हाडांच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच, दुसरीकडे सांगळे यांनी पूर्ण राष्ट्रवादीच शिवसेनेत विलीन केल्याने आव्हाडांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images