Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

माणूस ही मोठी प्रयोगशाळा

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'आपण आपल्या मनामध्ये डोकावण्याचा कधी प्रयत्न केलाय का? आपण कोण आहोत हे जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केलाय का? क्षणभर डोळे मिटून आपण आपल्या आतमध्ये डोकावले तर आपल्याला कळेल की, आपण कोण आहोत. आपण येथे का आलो आहोत. खरे तर माणूस म्हणजे एक मोठी प्रयोगशाळच आहे,' असे मत खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केले.

९५ व्या वसंत व्याख्यानमालेत 'मैं कोन हूँ...मै क्या हूँ' या विषयावरील बाविसावे पुष्प दर्डा यांनी गुंफले. हे पुष्प मूळचंदभाई गोठी यांच्या स्मृतींना अर्पण करण्यात आले होते. गोदाघाट येथील यशवंतराव देवमामलेदार पटांगणावर ही व्याख्यानमाला सुरू आहे.

दर्डा म्हणाले की, आपण येथे आलेलो नाही, आपल्याला आणण्यात आले आहे. परंतु हे कितीजणांना कळते? आपल्या येण्यामागे काहीतरी उद्देश आहे. लहानपण, तरूणपण आणि वृद्धपण असा मोठा कालावधी आपण आयुष्यभर प्रवास करून घालवतो. जीवन सुंदर आहे, शाश्वत आहे आणि संपूर्ण आहे. फक्त गरज आहे ती स्वत:मध्ये हरवून जाण्याची. आपण अंतरंगात डोकावून पाहिले तर आपल्याला अनेक बाबींचे उत्तर मिळेल. आपण आपल्याकडे कधी हिशोब मागणार आहोत की, नाही याचादेखील विचार व्हावा.

आपण लहानपणी आई, वडील व शिक्षक यांचा विचार करतो, तरूणपणी मित्रांचा आणि बायकोचा विचार करतो तर वृद्धपणी आणखी बऱ्याच जबाबदाऱ्या घेऊन ठेवलेल्या असतात; परंतु आपण स्वत:चा कधी विचार करतो का? आपण आज जसे आहोत तसे काही वर्षांपूर्वी होतो का? याचे उत्तर नकारार्थी मिळते. आपण असे का झालो याचे मूळ शिक्षकांमध्ये आहे कारण ते संस्कार देणारे होते व याचा त्यांना आत्मविश्वास होता. आज संस्कार कोठे आहे, संस्कार असते तर वृद्धाश्रम नसते, जागांवरून भांडणे झाली नसती आणि कशावरून हेवेदावे झाले नसते. असेही दर्डा म्हणाले.

यावेळी अविनाश गोठी यांची प्रमुख उपस्थिती होती. विजय दर्डा यांचा परिचय श्रीकांत बेणी यांनी करून दिला. संगीता बाफणा यांनी मूळचंदभाई गोठी यांना श्रध्दांजली अर्पण केली.

_____

आजचे व्याख्यान

विषय : अद्वैत धून (शास्त्रीय-उपशास्त्रीय संगीताची बहारदार मैफल)

सादरकर्ते : निहिरा निसर्ग, निसर्ग देहूकर, नाशिक

स्थळ : यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाट

वेळ : सायंकाळी ७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुक्या जनावरांच्या जिवाशी खेळ!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

येवला वनविभागाने अनेक गावातून गायी जप्त करून आणल्या आहेत. निफाड येथे औरंगाबाद महामार्गावर निफाड इंग्लिश स्कूलशेजारी त्यांना बंदिस्त ठेवले असून, त्यांच्या चारापाण्याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. भरउन्हात या मुक्या जनावरांचे हाल होत आहेत.

वनविभागाच्या जागेत चरताना या गायी, गोरे आणि शेळ्या वनविभागाने ताब्यात घेतल्या. जागेवर या जनावरांच्या मालकांनी दंड न भरल्याने त्यांच्यावर केस करून ही जनावरे निफाड येथे आणली. डोंगरगाव, पिंपळ खुटे, घुलेवाडी या परिसरातील ही जनावरे आहेत. जप्त केलेल्या जनावरांची काळजी घेण्याची वनविभागाची जबाबदारी आहे. त्यानुसार या जनावरांच्या देखभालीसाठी एक कर्मचारी आहे. या कर्मचाऱ्याने जमेल तेवढे प्रयत्न करून त्यांना चरायला घेऊन जातो. पण, आता दुष्काळामुळे येथे चरायला काही नसल्याने मी काय करू, असे सांगितले. सामाजिक कार्यकर्ते अविनाश राऊत यांनी हा प्रकार उघडकीस आणून दिला. अधिकारीवर्गाशी या वेळी मोबाइलवरून चर्चा केल्यानंतर चारा म्हणून उसाच्या बांड्या असलेली गाडी आली. तेव्हा कुठे भुकेने व्याकूळ असलेल्या जनावरांच्या पोटात चारा गेला.

पिण्यासाठी पाणीही मिळेना! जप्त केलेली जनावरे हे जानेवारी महिन्यापासून येथे आहेत. अत्यंत कडक उन्हाळा सुरू आहे. तीव्र तापमानाच्या काळातही ही जनावरे खुंटीला बांधून एका जागी उभी आहेत. त्यांना धड निवाराही नाही. पाण्याचा स्त्रोत कमी झाल्याने या जनावरांना कधी गटारीचे पाणी प्यायची वेळ येते. ही वस्तुस्थिती खुद्द इथल्या कर्मचाऱ्याने सांगितली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मातब्बर अधिकाऱ्यांचा जीव टांगणीला!

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अपसंपदा असल्याच्या आरोपाबाबत तथ्य आढळून आल्यानंतर अँण्टी करप्शन ब्युरोमार्फत उघड चौकशी सुरू होते, अशी उघड चौकशी सुरू असलेल्यामध्ये महापालिका, महसूल, पोलिस, आरोग्य अशा वेगवेगळ्या खात्यातील मातब्बर समजल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. उघड चौकशी पूर्ण होईपर्यंत या अधिकाऱ्यांचा जीव टांगणीला लागला असून, दोषी अधिकाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात येतात, असे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

घरकुल प्रकल्पाच्या प्रस्तावापासूनच महासभेच्या रडारवर आलेले महापालिकेचे बांधकाम विभागाचे चीफ इंजिनीअर सुनील खुने यांची एसीबीमार्फत उघड चौकशी सुरू आहे. चौकशी अधिकाऱ्याने काही महिन्यापूर्वी त्यांचे एकूण मालमत्ता, उत्पन्न, व खर्च यांचा तपशील वरिष्ठांना सादर केला. मात्र, यात चार त्रुटी आढळून आल्या. त्यानुसार २८ मार्च २०१६ हा अहवाल परत करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी पोलिस उपअधीक्षक छापरिया करीत आहेत.

एसीबीचे पोलिस अध‌‌ीक्षक डी. पी. प्रधान याबाबत म्हणाले,'आम्ही संकल‌ित केलेली माहिती खरे की खोटे हे सिध्द करण्याची जबाबदारी संबंध‌ित व्यक्तीचे असते. अनेकदा सदर व्यक्ती शेती उत्पन्न किंवा हात उसणे कर्ज दाखवतात. मात्र, त्याचे सबळ पुरावे सादर झाले पाहिजे. आयटी रिर्टन्स नसेल तर असे पैसे अपसंपदा म्हणून गणले जातात. युनिटचे एसपी किंवा पोलिस महासंचालक कार्यालयातून या त्रुटींवर काम केले जाते. काढलेल्या त्रुटींवर समाधानकारक स्पष्टीकरण देण्यात आले नाही तर गुन्हा दाखल होतो.' हा नियम सर्वच प्रकरणात वापरला जातो, असे प्रधान यांनी स्पष्ट केले.

सुनील खुनेपाठोपाठ सिव्ह‌िल हॉस्पिटलचे तत्कालीन सिव्ह‌िल सर्जन आसाराम दादासाहेब भालसिंग, सिव्ह‌िलचे मुख्य प्रशासकीय अधिकारी गणपत रायसिंग चव्हाण, औद्योगीक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सह संचालक प्रकाश परदेशी, सिव्ह‌िल सर्जन प्रमोद मुरलीधर चपळगांवकर, पाटबंधारे विभागाचे डिव्ह‌िजनल इंजिनीअर आत्माराम खैरनार, सहायक पोलिस निरीक्षक शिवसिंग जाधव, सहकार विभागातील विशेष लेखा परीक्षक अनिल दगाजी पाटील, वन विभागातील दक्षता विभागाचे अधिकारी हेमंत माणकलाल छाजेड, पाटबंधारे विभागाचे डिव्ह‌िजनल इंजिनीअर पंड‌ित भगवान पाटील, निफाडच्या निवासी नायब तहसीलदार राजश्री अहिरराव (गांगुर्डे), पीडब्लूडीचे बीड येथील एक्झ‌िक्युटीव्ह इंजिनीअर वसंत बाविस्कर, माजी सहायक पोलिस आयुक्त संजीव ठाकूर, पोलिस निरीक्षक दिलीप सुरेश गावीत, सिन्नरचे तत्काल‌ीन तहसीलदार सुनील महादू सैंदाणे, मालेगावचे तत्कालीन डीव्हायएसपी योगेश चव्हाण, मालेगावाचे तत्कालीन अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांच्यासह अनेक बडे अधिकारी एसीबीच्या रडारवर आहे. यातील काही जणांनी आपल्याकडील संपत्तीची माहितीच अद्याप सादर केलेली नाही किंवा त्यांनी सादर केलेली माहिती त्रुटींमुळे नाकारण्यात आलेली आहे. उघड चौकशी सुरू असली म्हणजे संबंध‌ित व्यक्ती दोषी असतोच असे नाही. संबंध‌ित व्यक्तीस क्लिन चीट मिळाली तरी ती फाईल बंद होण्यास काही कालावधी लागतो, असे एसपी प्रधान यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरपालिका निवडणुकीचे वाहू लागले वारे

$
0
0

येवल्यात भाजपची नियोजनासाठी झाली बैठक

म. टा. वृत्तसेवा, येवला

पाच महिन्यांवर येऊन ठेपलेल्या येवला नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीचे वारे आतापासूनच वाहू लागले आहेत. निवडणुकीच्या दृष्टीने विविध राजकीय पक्षांच्या वतीने आडाखे बांधण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची प्राथमिक नियोजन बैठक शहरातील विश्रामगृहावरील सभागृहात झाली. या बैठकीत पक्षाच्या जिल्ह्यातील वरिष्ठ नेतेमंडळींनी हजेरी लावत स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

पालिका निवडणुकीचे तिकीट वाटप हे पक्षाच्या स्थानिक कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांशी चर्चा व विचारविनिमय करूनच निश्चित केले जाईल, असा विश्वास खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. पालिकेच्या निवडणुकीत फिल्डवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याचेही यावेळी त्यांनी नमूद केले. नगराध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा व्हावा. युती होईल अथवा नाही, मात्र पक्षाचा कार्यकर्ता सक्षम व्हायला हवा, असे यावेळी पक्षाचे जिल्हा संघटन सरचिटणीस बापू पाटील म्हणाले.

निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेला नवा कार्यकर्ता उरावर बसणार नाही, याकडे विशेष लक्ष देऊन, तर कधी जुन्यानव्यांचा मेळ घालून जुन्याचे मार्गदर्शन घेत पालिकेवर आगामी निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकवायचा आहे, असे यावेळी आमदार डॉ. राहुल आहेर म्हणाले. पालकमंत्र्यांनी येवल्यात अधिकारी व पक्ष कार्यकर्ते यांची संयुक्त सभा लावावी, असे माजी आमदार कल्याणराव पाटील म्हणाले. कल्याणकारी योजना मतदारापर्यंत पोहचवण्यासाठी काम करावे. मतभेद सोडून काम करावे, असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष दादाराव जाधव यांनी केले.

भाजप नगरसेवक बंडू क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार छगन भुजबळ यांच्यावर थेट आरोप केले. पालिका निवडणुकीच्या वातावरणात वरिष्ठ भाजप नेत्याच्या सभा व्हाव्यात, आपसातील हेवेदावे दूर करून एकसंघ रहा अशी अपेक्षा यावेळी गोरख खैरनार, सागर नाईकवाडे, वीरेंद्र परदेशी यांनी व्यक्त केली. भाजपा येवला शहराध्यक्ष आनंद शिंदे यांनी पक्षाच्या येवला शहरातील केल्या जात असलेल्या सामाजिक कार्यावर प्रकाशझोत टाकला.

बैठकीस भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष समीर चव्हाण, जिल्हा सरचिटणीस भाऊराव निकम, ज्येष्ठ नेते कैलास सोनवणे, नितीन पांडे, विजय श्रीश्रीमाळ, मनोज दिवटे आदी उपस्थित होते. गणेश खाळेकर यांनी सूत्रसंचालन केले.

...तर एकला चलो रे येवला शहरात पक्षाने गेल्या काही पक्षाने केलेली कामे सांगत भाजपाचाच नगराध्यक्ष झाला पाहिजे, असा सूर शिंदे यांनी आळवला. भाजपचा नगराध्यक्ष होणार असेल तरच युती करावी अन्यथा 'एकला चलो रे' साठी आम्ही सक्षम असल्याची भूमिकाही त्यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोकाटे, गावित चौकशीच्या फेऱ्यात

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com

नाशिक ः नाशिक विभागातील सात आजी- माजी लोकप्रतिनिधींच्या उत्पन्नाची अँटी करप्शन ब्यूरोमार्फत उघड चौकशी सुरू आहे. दुष्काळाचा सामना करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील चार लोकप्रतिनिधींचा यात समावेश असून, सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे, नवापूरचे शरद गावित, तसेच जळगाव महापालिकेतील नगरसेवक कैलास सोनवणे यांच्याही मालमत्तेची तपासणी एसीबीमार्फत सुरू आहे. याशिवाय विविध ८२ अधिकाऱ्यांच्या प्रकरणांची एसीबीकडून झाडाझडती सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नाशिक विभागात आमदार म्हणून कार्यरत असलेल्या किंवा राहिलेल्या एकूण सहा जणांची एसीबीने उघड चौकशी सुरू केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे नेते बबनराव पाचपुते, तसेच अशोक लांडे हत्या प्रकरणात सहभागी असल्याच्या आरोपातून नुकतेच निर्दोष सुटलेले राहुरी विधानसभेचे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अरुण जगताप, तसेच लांडे खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेले भानुदास कोतकर यांचा यात समावेश आहे. भाजपवासी झालेले सिन्नर तालुक्याचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्याही मालमत्तेचा शोध घेतला जात आहे. जळगाव महापालिकेतील शहर विकास आघाडीचे नगरसेवक कैलास सोनवणे यांनाही एसीबीने रडारवर घेतले आहे. एसीबीचे पोलिस अधीक्षक डी. पी. प्रधान यांनी सांगितले, की एखाद्या व्यक्तीकडे कमी कालावधीत खूप संपत्ती जमा होत असल्याची माहिती मिळाल्यास एसीबी गुप्त चौकशी सुरू करते. संबंधित व्यक्तीच्या स्थावर व जंगम मालमत्तेची माहिती मिळवली जाते. त्यात तथ्य आढळून आल्यास उघड चौकशीसाठी राज्य सरकारकडे मंजुरी मागितली जाते. नाशिकमध्ये अशा प्रकारची ८२ प्रकरणे उघड चौकशीसाठी घेतली आहेत. त्यात नाशिकमधील ४० प्रकरणांचा समावेश आहे. उघड चौकशीदरम्यान संबंधित व्यक्तीने फॉर्म एक ते सहा भरून आपल्याकडील संपत्तीचा समाधानकारक खुलासा केला नाही तर त्यांच्यावर अपसंपदेचा गुन्हा दाखल होतो.

कृषी विभागाचे तीनतेरा

नाशिक युनिटअंतर्गत कृषी विभागाच्या तब्बल आठ अधिकाऱ्यांच्या संपत्तीची उघडपणे चौकशी सुरू आहे. कृषिप्रधान जिल्हा अशी नाशिकची ओळख असून, याच विभागातील वरिष्ठांसह कनिष्ठ अधिकारी एसीबीच्या फेऱ्यात अडकले आहेत. ही केवळ चौकशी आहे. उघड चौकशी सुरू असली म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी ठरते असे नाही.

तीन आमदार भाजपचे

सत्ताधारी भाजपमध्ये सक्रिय झालेल्या तीन आजी-माजी आमदारांची चौकशी सुरू आहे. विशेष म्हणजे सर्वच लोकप्रतिनिधीच्या अपसंपदेची उघड चौकशी २०१४ मध्ये सुरू झाली. त्यात अद्याप समाधानकारक प्रगती नाही. अनेक लोकप्रतिनिधी माहिती देण्यास टाळटाळ करतात. लोकसेवकांची भूमिका पार पाडणाऱ्या या लोकप्रतिनिधींची चौकशी पूर्ण होऊन काय समोर येते, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मानवतेच्या दृष्टीने स्थगिती’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रभारी क्रीडा उपसंचालक संजय सबनीस यांची प्रकृती चिंताजनक असल्याने संयोजक व महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने मानवतेच्या दृष्टीने नाइलाजास्तव स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचा खुलासा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी रविवारी पत्रकाद्वारे केला.

खेळाडूंना देण्यात येणाऱ्या रोख रकमेबाबत शासन निर्णयानुसार गंभीर त्रुटी आढळल्याने खेळाडूंचे आर्थिक नुकसान होणार होते, तसेच यापूर्वीच्या जालना व अहमदनगर येथे झालेल्या स्पर्धेच्या शासकीय नियमांची पायमल्ली झाल्याचे निदर्शनास आल्याने दुसऱ्या दिवशी तात्पुरते सामने थांबविण्यात आले होते. तिसऱ्या दिवशी २२ मे रोजी सकाळच्या सत्रात स्पर्धा सुरू करण्याची तयारी असताना स्पर्धा संयोजन समितीचे कोशाध्यक्ष व प्रभारी उपसंचालक संजय सबनीस यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आल्याची क्रीडाधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी क‍ळविले. ही माहिती समजताच परिषदेच्या सर्व सभासदांनी तातडीने रुग्णालयात जाऊन सबनीस यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर कुस्तीगीर परिषदेची तातडीने बैठक होऊन मानवतेच्या दृष्टीने स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तामिळनाडूचा श्रीनाथ विजेता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक येथे रेषा असोसिएट्सतर्फे रविवारी झालेल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत तामिळनाडूच्या नारायणन श्रीनाथ याने विजेतेपद पटकावले. गोव्याची महिला ग्रँडमास्टर भक्ती कुलकर्णी उपविजेती, तर अव्वल मानांकित ग्रँडमास्टर शार्दूल गागरेला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. येथील स्वामीनारायण मंदिरात रविवारी दुपारी अडीच वाजता स्पर्धेचा समारोप झाला.

आमदार सीमा हिरे, डॉ. गुजराथी, कांगणे, लक्ष्मण सावजी, अनिल भालेराव, अर्चना कुलकर्णी यांच्या उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. स्पर्धेत नाशिकच्या १५ ते २० खेळाडूंच्या रेटिंगमध्ये सुधारणा झाली, तर नवोदितांना फिडे रेटिंग मिळेल, अशी माहिती पंचप्रमुख नितीन शेणवी यांनी दिली. स्पर्धेत नाशिकच्या १३ मुलांनी बक्षिसे मिळवली. स्पर्धेचे आयोजक मिलिंद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.

स्पर्धेचा निकाल (कंसात गुण)

१. आंतरराष्ट्रीय मास्टर नारायणन श्रीनाथ, तामिळनाडू (९), २. महिला ग्रँडमास्टर भक्ती कुलकर्णी, गोवा (८.५), ३. आंतरराष्ट्रीय मास्टर समीर कठमाळे, सांगली (८), ४. आंतरराष्ट्रीय मास्टर विक्रमादित्य कुलकर्णी, मुंबई (८), ५. शाश्वत चक्रवर्ती, छत्तीसगड (८), ६. ग्रँडमास्टर शार्दूल गागरे, अहमदनगर (८), ७. फिडे मास्टर नितीश बेलूरकर, गोवा (७.५), ८. इंद्रजित महिंद्रकर, औरंगाबाद (७.५), ९. ऋतुजा बक्षी, औरंगाबाद (७.५), १०. पवन दोडेजा, अमरावती (७.५), ११. एम. विनयकुमार, तेलंगणा (७.५), १२. अवधूत लेंडे, नाशिक (७.५), १३. प्रतीक मुळे, पुणे (७.५), १४. गणेश ताजणे, नाशिक (७), १५. रईस अहमद ए. क्यू., सातारा (७).

विशेष पारितोषिके

१. कल्पेश देवांग, नंदुरबार, २. सौरभ कुलकर्णी, मुंबई, ३. नमीत चव्हाण, पुणे, ४. गिरीश डाकलिया, छत्तीसगड, ५. पद्मानंद मेनन, पुणे, ६. सम्यक पतोडी, औरंगाबाद, ७. यश ढोके, नागपूर, ८. बालाजी एम., तामिळनाडू, ९. वल्लभ कवी, पुणे, १०. आविष्कार वानखेडे, नाशिक.

उत्कृष्ट ज्येष्ठ खेळाडू

१. उदय नाईक, मुंबई उपनगर

उत्कृष्ट नवोदित खेळाडू

१. प्रणव शास्त्री, ठाणे, २. विवेक पाटील, नंदुरबार, ३. मोतीलाल गावित, धुळे, ४. कौशिक साळसिंगीकर, नाशिक, ५. सिद्धान्त सोनार, नाशिक,

उत्कृष्ट महिला खेळाडू

१. साक्षी चितलांगे, औरंगाबाद, २. धनश्री राठी, नाशिक, ३. शलाका पागे, नागपूर, ४. श्रुती राठी, नाशिक, ५. श्रेया राठी, नाशिक

१३ वर्षांखालील वयोगट

मुले ः १. आदित्य सामंत, नाशिक, २. पार्थ लोणकर, नागपूर, ३. आर्यन शहा, पुणे, ४. आर्यन पोलखरे, ५. नील शिंत्रे, मुंबई. मुली ः १. प्रचीती चंद्रात्रे, नाशिक, २. ग्रीष्मा धुमाळ, ठाणे, ३. कियार्रा खटुरिया, मुंबई शहर, ४. अनुभा राठी, अकोला, ५. श्रावणी सामंत, नाशिक

११ वर्षांखालील वयोगट

मुले ः १. सिद्धान्त देवरे, नाशिक, २. साहील खोसे, पुणे, ३. प्रणीत कोठारी, अहमदनगर. मुली ः १. श्रुती रांका, नाशिक, २. अदिती वावल, पुणे, ३. अयशी बासू, मुंबई उपनगर, ४. वृंदा राठी, नाशिक.

९ वर्षांखालील वयोगट

मुले ः १. ओम कदम, मुंबई, २. वीर कडाकिया, मुंबई उपनगर, ३. मारू मिटांक, मुंबई उपनगर. मुली ः १. पृथा गाजरे, मुंबई उपनगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंब्यांचे दर होईना कमी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मे महिना संपत आला तरी आंब्याचे दर कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आवक भरपूर असूनही दर मात्र कायम आहेत. तसेच सफरचंद व इतर फळांचे दरही कायम असून, केळींची आवक थोडी मंदावली आहे.

अक्षय तृतीयेनंतर साधारणतः आंब्यांची मागणी कमी होण्याबरोबरच दरही कमी होतात. यंदा मात्र, अजूनही आंब्यांचे दर कमी झालेले नाहीत. लालबाग, केशर, देवगड, राजापुरी, हाफूस, बदामी आदी आंब्यांचे दर अजूनही सर्वसामान्यांच्या आवकेबाहेर आहेत. साधारणतः ५० रुपये किलोच्या पुढेच आंब्यांचे दर आहेत. हाफूस आंबा १०० रुपये किलोच्या पुढे तर केशर ८० रुपये किलोने विक्री होत आहे. गावठी आंबे अद्याप बाजारात दाखल न झाल्यानेही आंब्यांचे दर कमी झालेले नाहीत, असे विक्रेत्याने सांगितले. सफरचंद, चिकू, केळी, अननस, किवी, टरबूज, संत्री या फळांचे दर मात्र जैसे थे आहेत. टरबुजांची अजूनही चांगली आवक होत असून नगानुसार दर ठरत आहेत. सफरचंदचे दर १०० ते १६० रुपये किलोने मिळत आहेत.

किलोचे दर आंबे - ५० ते १२०, सफरचंद - १४० ते १६०, चिकू - ६०, अननस - ५०, संत्री - ६०, केळी - ३० रु. डझन, किवी - ३० रुपयांना एक, टरबूज - २० ते ७० रु. नग, नारळ - ३० रुपये नग.

कांदापात ४० रुपये जुडी

पाणीटंचाईची झळ भाजीपाल्याला बसली असून, पालेभाज्या कडाडल्या आहेत. कांदापात ४० ते ५० रुपये जुडी तर मेथी, कोथिंबीर, शेपू, पालक यांचे दर पाच ते दहा रुपयांनी वाढले आहेत. यामुळे गृहिणींच्या बजेटवर परिणाम झाला आहे. इतर फळभाज्यांचे दरही सर्वसामान्यांच्या आवकेबाहेर गेले आहेत. दुष्काळामुळे भाजाापाल्याची आवक घटल्याने दरावर परिणाम झाला आहे. लागवड नसल्याने आवक प्रचंड घटल्याने कांदापात पन्‍नास रुपये जुडीचा उच्‍चांक गाठला आहे. शेपूनेही कधी नव्हे त तीस रुपये जुडीपर्यंत मजल गाठली आहे. पालक आठ ते दहा रुपये जुडी तर मेथीही ४० रुपये जुडीने ‌विक्री होत आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या जेवणातून पालेभाज्या कमी झाल्या आहेत.

फळभाज्यांचेही दर वाढले आहेत. पाच ते सात रुपये किलोने विक्री होणारे टोमॅटो आज २० ते ३० रुपये किलोने मिळत आहेत. कारले, गिलके, दोडके यांचे दर ६० ते ७० रुपये किलोवर स्थिरावले आहेत. गवार, भेंडी व वांगे हे पन्नाशीच्या घरात खेळत आहेत. कोबी व फ्लॉवरनेही वीस रुपये किलोचा टप्पा गाठला आहे. पाणीटंचाईमुळे नवीन लागवड नसल्याने अजून महिना दीड महिना तरी भाजीपाल्याचे दर कमी होण्याची चिन्हे नाहीत. यामुळे सर्वसामान्यांना महागाईची झळ सोसावी लागणार आहे.

किलोचे दर कारले - ६०, गिलके - ६०, दोडके - ६०, वांगे - ४०, बटाटे - २०, गवार - ५०, शेवगा - ४०, टोमॅटो - ३०, कोबी - २०, फ्लॉवर - २०, मिरची - ७०, भेंडी - ४०, मेथी - ३० ते ४५, कोथिंबीर - १० ते २५, कांदापात - ४० ते ५०, शेपू - २० ते ३०, पालक - ८ ते १०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा अखेर स्थगित!

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक

नाशिक येथे सुरुवातीपासून वादात सापडलेली राज्यस्तरीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद व आयोजकांच्या 'मैदानाबाहेरील कुस्त्यां'मुळे रविवारी अखेर स्थगित करण्यात आली. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने घेतलेल्या या निर्णयाचा फटका खेळाडूंनाच बसला आहे. या संपूर्ण प्रकाराचे खापर प्रभारी क्रीडा उपसंचालक संजय सबनीस यांच्यावरच फोडण्यात आले. या धक्क्यामुळे सबनीस यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना शनिवारी रात्री हृदयविकाराचा धक्का बसला. त्यांना खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. एकूणच या प्रकाराने महाराष्ट्रातील मानाच्या खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

कुस्तीप्रेमींचे लक्ष लागलेल्या तिसऱ्या राज्यस्तरीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेला तारीख जाहीर करण्यापासूनच ग्रहण लागले होते. या स्पर्धेची तारीख तीन वेळा बदलण्यात आली. अखेरीस २० मेपासून येथील सातपूर क्लब हाऊसच्या मैदानावर स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. पहिल्या दिवशी दोन वजनगटांतील स्पर्धा झाल्या. मात्र, कुस्तीगीर परिषद व आयोजकांमध्ये दुसऱ्या दिवसापासून बक्षिसाच्या मुद्द्यावरून वादाची ठिणगी पडली. जागतिक कुस्ती महासंघाच्या नियमानुसार वजनगट वाढल्याने त्याची अंमलबजावणी खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेतही करण्यात आली. त्यामुळे सातऐवजी आठ वजनगटांत ही स्पर्धा कुस्तीगीर परिषदेने घेतली. शासननिर्णयाप्रमाणे या वाढीव वजनगटाची बक्षिसे आयोजकांनीच द्यावी, अशी भूमिका महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने घेतली. मात्र, शासननिर्णयात सातच वजनगट निश्चित करण्यात आल्याचा दावा आयोजकांनी केला. या दोघांच्या वादात शनिवारच्या सर्वच लढती रद्द करण्यात आल्या होत्या. कुस्तीगीर परिषद आपल्या मुद्द्यावर अडून राहिल्याने आयोजकांच्या बैठकीत अखेरीस ही बक्षिसे देण्याचे मान्य करण्यात आले. स्पर्धा सुरू राहावी, खेळाडूंचे नुकसान होऊ नये म्हणून आयोजकांना कुस्तीगीर परिषदेपुढे नमते घ्यावे लागले.

धुसफूस सुरूच

बक्षिसाच्या मुद्द्यावरून आयोजकांनी माघार घेतल्यानंतरही कुस्तीगीर परिषद व आयोजकांतील दरी वाढतच गेली. हा संपूर्ण प्रकार महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांच्या कानावर घालण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन लांडगे यांनी शनिवारी तातडीने पुण्यातून नाशिककडे कूच केले. लांडगे रात्री अकराच्या सुमारास नाशिकमध्ये दाखल झाले. त्यामुळे धुसफूस आणखी वाढली. लांडगे यांनी संपूर्ण प्रकाराची माहिती घेतल्यानंतर प्रभारी क्रीडा उपसंचालक सबनीस यांनाच जबाबदार धरले. त्यांच्यावर सर्वच पदाधिकाऱ्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. एकूणच या प्रकाराने सबनीस अस्वस्थ झाले. शनिवारी मध्यरात्री त्यांची तब्येत बिघडल्याने क्रीडाधिकारी अविनाश टिळे यांनी त्यांना डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अधिकारीच नसल्याने कुस्ती स्पर्धा स्थगित करण्यात येत आहेत. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची क्रीडामंत्र्यांसोबत सोमवारी बैठक आहे. या बैठकीतच पुढचा निर्णय घेऊ. मात्र, तोपर्यंत कुस्ती स्पर्धा होणार नाही, असे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी सांगितले.

ज्या बक्षिसाच्या मुद्द्यावर कुस्तीगीर परिषद अडून बसली होती, ती बक्षिसे देण्यास मान्यता दिल्यानंतरही परिषदेने स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय चुकीचा आहे. खेळाडूंच्या भल्यासाठी आम्ही ही स्पर्धा घेतली होती. आता यामुळे खेळाडूंचेच नुकसान झाले आहे. आयोजनासाठी केलेला सर्व खर्चही यामुळे वाया घेतला आहे, आयोजक आमदार सीमा हिरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेकवर सह्या नसणे हाच कळीचा मुद्दा

$
0
0

महेश पठाडे, नाशिक

नाशिक येथे तिसऱ्या राज्यस्तरीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेत सरकारने आर्थिक व्यवहारातून महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला खड्यासारखे दूर ठेवल्यानेच वादाची ठिणगी पडली. स्पर्धेत बक्षिसांपासून पंच, प्रशिक्षकांच्या मानधनापर्यंतच्या सर्वच बाबतीत धनादेशावर सही करण्याचे अधिकार केवळ प्रभारी क्रीडा उपसंचालक संजय सबनीस यांनाच देण्यात आले होते. यापूर्वीच्या स्पर्धांत कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस व शासकीय अधिकाऱ्याच्या सहीशिवाय कोणतेही व्यवहार होत नव्हते. मात्र, या वेळी हे अधिकार केवळ सबनीस यांनाच असल्याने कुस्तीगीर परिषदेत अस्वस्थता होती. त्याला बक्षिसाच्या मुद्द्याने खतपाणी घातले आणि आयोजक- परिषदेतील वाद चिघळतच गेला. त्याची परिणती कुस्ती स्पर्धा स्थगित होण्यात झाली.

नाशिकमध्येच गेल्या वर्षी भाई नेरूरकर चषक खो-खो स्पर्धा क्रीडा उपसंचालक संजय सबनीस व आमदार सीमा हिरे यांच्या आयोजन व नियोजनाखालीच झाली होती. त्या वेळी क्रीडा उपसंचालकांबरोबरच महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या सरचिटणीसांचीही सही घेतली जात होती. यापूर्वीच्या खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेतही हाच पायंडा होता. यंदा मात्र हा पायंडा मोडला. कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे दिल्लीत असल्याने त्यांना स्पर्धेच्या दिवशी उपस्थित राहता येणे शक्य नव्हते. त्यामुळे प्रभारी क्रीडा उपसंचालक संजय सबनीस यांच्याच सहीने धनादेश दिले जात होते. कुस्तीगीर परिषदेला ही बाब समजल्यानंतर प्रचंड संताप व्यक्त झाला. यामागचा सूत्रधार सबनीस हेच आहेत, अशी कुस्तीगीर परिषदेची धारणा झाली. मात्र, बाळासाहेब लांडगे नाशिकमध्ये एक दिवस उशिराने दाखल होणार असल्याने तोपर्यंत आर्थिक व्यवहार ठप्प होतील म्हणूनच हे अधिकार सबनीस यांनी स्वतःकडे घेतले. मात्र, ते शासनाच्या संमतीने घेतले किंवा नाहीत याची अद्याप उकल होऊ शकलेली नाही. मात्र, आठव्या वजनगटातील बक्षिसांच्या रकमेवरून या वादाला फोडणी मिळाली.

'अयोध्या'त रामायण!

स्पर्धेतील पंच, प्रशिक्षक व कुस्तीगीर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची निवास व भोजन व्यवस्था अयोध्या हॉटेलमध्ये होती. येथे बक्षिसाच्या मुद्द्यापेक्षाही परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांना धनादेशावर सहीचे अधिकार नसल्याची चर्चा अधिक चवीने रंगली. ही माहिती बाळासाहेबांच्या कानावर घातल्याने आयोजक व कुस्तीगीर परिषदेतील धुसफूस वाढली. बक्षिसाचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर बाळासाहेब तातडीने नाशिकला रात्री अकराच्या सुमारास दाखल झाले. त्यांनी त्याच रात्री बैठक घेतली. एकूणच हे संपूर्ण प्रकरण सबनीस यांच्यावरच फोडले. हे संपूर्ण रामायण 'अयोध्या'वरच रंगले.

स्पर्धेवर प्रश्नचिन्ह

खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेला सुरुवातीपासून लागलेले ग्रहण पाहता याबाबत आयोजक व महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेत अनेकदा बैठकी झाल्या. आता स्पर्धा अनिश्चित काळापर्यंत स्थगित करण्यात आल्याने राज्य सरकारने यापुढे ही स्पर्धा घ्यायची किंवा नाही, यावर गंभीरपणे विचार सुरू केला आहे. याबाबत आमदार सीमा हिरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की खेळाडूंच्याच फायद्यासाठी ही स्पर्धा घेतली होती. आता स्पर्धा स्थगित झाल्याने क्रीडामंत्री विनोद तावडे यांनीही या स्पर्धेबाबत गंभीरपणे विचार सुरू केला आहे.

लाखो रुपयांचा खर्च वाया

स्पर्धेवर आतापर्यंत १२ ते १४ लाख रुपयांपर्यंत खर्च करण्यात आला होता. पहिल्या दिवसाच्या लढती झाल्यानंतर उर्वरित लढती स्थगित करण्यात आल्या. त्यामुळे स्पर्धेवरील खर्च वाया गेला आहे. हा खर्च कोणी द्यायचा असा प्रश्न आयोजकांसमोर आहे. याबाबत सरकारला संपूर्ण माहिती दिली जाईल. त्यानंतरच काय तो निर्णय होईल, असे क्रीडा कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिओ ऑलिम्पिकला नरसिंगच जाणार!

$
0
0

mahesh.pathade@timesgroup.com

रिओ ऑलिम्पिकला नरसिंग यादवच जाणार असून, दिल्लीत कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याशी झालेल्या चर्चेत हा निर्णय झाल्याची माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी रविवारी 'मटा'शी बोलताना दिली. भारताला कोटा मिळवून देणारा नरसिंग यादव व ऑलिम्पिकवीर सुशील कुमार यांच्यात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर लांडगे यांनी प्रथमच कुस्तीगीर परिषदेची भूमिका मांडली.

यापूर्वी ज्या मल्लाने कोटा मिळवून दिला आहे त्यालाच ऑलिम्पिकला पाठविण्यात आले आहे. जर वाइल्ड कार्डवर भारताला प्रवेश मिळाला असता तर मल्लांमध्ये चाचणी घेणे योग्य असते. यापूर्वी वाइल्ड कार्डावर प्रवेश मिळाल्याने पप्पू यादव व महाराष्ट्राचा काका पवार यांच्यात लढत झाली होती. त्यात काका पवार पराभूत झाल्याची आठवणही लांडगे यांनी सांगितली.
ते म्हणाले, की जागतिक कुस्ती स्पर्धेत सहभागी होण्याची नरसिंग यादवऐवजी सुशील कुमारला संधी होती. मात्र, खांदा दुखावल्याने तो जाऊ शकला नाही म्हणून नरसिंगला पाठविण्यात आले. आता नरसिंगने भारताचा ऑलिम्पिक प्रवेश निश्चित केल्यानंतर सुशील कुमार खांद्याच्या दुखापतीतून कसा काय तंदुरुस्त झाला?
खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेबाबत ते म्हणाले, की ही स्पर्धा १२ वर्षे राष्ट्रीय स्पर्धा म्हणून खेळविली जात होती. मात्र, स्पर्धेची पारितोषिके उत्तरेतील मल्लांना जात असल्याने ही स्पर्धा राज्यस्तरीय करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून ही स्पर्धा राज्यस्तरीय झाली. त्यामुळे महाराष्ट्राच्या मल्लांचा फायदा झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावधान! आपण घेतोय रोज विषाचा प्याला

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

नाशिक ः गायी-म्हशींच्या दुधाचे प्रमाण वाढण्यासाठी देण्यात येणाऱ्या ऑक्सिटोसिन इंजेक्शनची शहरात मोठ्या प्रमाणात विक्री सुरू असून, संपूर्ण नाशिक शहरातील गोठ्यांमध्ये याचे सर्रास वितरण होत आहे. गायी-म्हशी सातत्याने जास्त प्रमाणात दूध देऊ शकत नाहीत. त्यासाठी बाजारात ऑक्सिटोसिन इंजेक्शन उपलब्ध आहे. हे इंजेक्शन १ एमएल व २ एमएल या स्वरूपात मिळत असून, दिवसाला सरासरी दहा लिटर दूध देणाऱ्या गायी- म्हशी ऑक्सिटोसिनमुळे २० लिटरपर्यंत दूध देतात. मात्र, ऑक्सिटोसिनचे हे दूध मानवी शरीराला घातक असून, त्यामुळे पुरुषांमध्ये नंपुसकत्व येण्याची शक्यता असते.

अन्न आणि औषध प्रशासनाने या ऑक्सिटोसिनवर बंदी आणलेली आहे. मात्र, तरीही हे ऑक्सिटोसिनची विक्री सुरू असून, त्याची एक साखळीच तयार झाली आहे. शहरात प्रामुख्याने हे इंजेक्शन ट्रॅव्हलच्या बसमधून अथवा खासगी वाहनाने कानपूर, दिल्ली, इंदूरहून येते. वाहनातून उतरवल्यानंतर स्थानिक विक्रेता गोठे मालकांना तो आपल्या माणसांद्वारे थेट पोहोच करतो. १०० एमएलच्या बॉक्ससाठी अवघे तीस रुपये याची किंमत असते. पूर्वी हे इंजक्शन मेडिकलमध्ये उपलब्ध होत असे. मात्र, कारवाईमुळे त्याची विक्री बंद झाली आहे. मध्यंतरी अन्न व औषध प्रशासनाने अशा गोठे मालकांवर कारवाई केली. मात्र, त्यांनाही धमकावण्याचा प्रकार झाला होता. काही कालावधीनंतर पुन्हा हा धंदा जोमाने सुरू झाला आहे. हे इंजेक्शन दिल्यानंतर गायी-म्हशींमधील स्त्री हार्मोन्सची वाढ होऊन जनावरांना पान्हा फुटतो व ते जास्त प्रमाणात दूध देऊ लागतात. इंजेक्शनमुळे मिळणारे दूध मानवी शरीरास घातक असून, यामुळे स्त्रियांमधील हार्मोन्सचा समतोल बिघडून आजारात वाढ होते. पुरुषांच्या हार्मोन्समध्ये बदल होऊन नंपुसकत्व येण्याचा संभव असतो.

शहरात इंजेक्शन येते याबद्दल शंका नाही. मानवी शरीराला घातक असलेले इंजेक्शन आमचा कोणताही सभासद विकत नाही. आम्ही याबाबत विक्रेत्यांना सूचना केल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने याचा शोध घ्यावा व कारवाई करावी, असे नाशिक जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गोरख चौधरी यांनी सांगितले.

इंजक्शन दिलेल्या गायी-म्हशींच्या दुधाने पुरुषांमधील स्त्री हार्मोन्सची वाढ होते. सुरुवातीला थायरॉइडसारखे आजार होतात. पुढे दीर्घकाळ परिणाम होऊन अनेक आजार होऊ शकतात, असे डॉ. राहुल सावंत यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खते, बियाणे मोफत द्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

दुष्काळातून होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सरकारने मोफत बियाणे आणि खते त्वरित उपलब्ध करून द्यावीत, तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी धुळ्यात शिवसेनेचा सोमवारी सकाळी अकरा वाजता संपर्कप्रमुख बबनराव थोरात आणि जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मोर्चात शेकडो शिवसैनिक आणि शेतकरी सहभागी झाले होते. या वेळी जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

जिल्ह्यात काही वर्षे सोडली तर सतत दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे. गेल्या दोन वर्षांपासून अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. शासनाने या सर्व पार्श्वभूमीवर कृषी औद्योगिक महामंडळातर्फे कृषी विभागामार्फत धुळे जिल्ह्यात शेतकरी कोणते पीक किती प्रमाणात लागवड करतात याचे सर्वेक्षण करून कापूस, ज्वारी यांसारखे बियाणे आणि खते मोफत उपलब्ध करून द्यावे, शेतकऱ्यांचे पूर्वीचे कर्ज माफ करावे, त्यांना आता खरीप हंगामासाठी जिल्हा बँकेसह सर्व राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कर्जाचे वितरण करावे, शेतक-यांच्या मालाल हमी भावासाठी तातडीने उपाययोजना करावी आदी मागण्या करण्यात आल्या.
काद्यांला दोन हजार रुपये हमीभाव मिळाला पाहिजे, सर्व शेतकऱ्यांची वीजबिले माफ झाली पाहिजेत, अशाही मागण्या करण्यात आल्या. मोर्चात संपर्कप्रमुख बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, हेमंत साळुंखे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, महिला संघटक कविता क्षीरसागर, वंदना पाटील, मनीषा जोशी, उपजिल्हाप्रमुख संजय गुजराथी, राजेंद्र पाटील, नितीन पाटील, भूपेंद्र लहामगे, सुनील बैसाणे, महेश मिस्तरी, रावसाहेब गिरासे, संदीप सूर्यवंशी, सुधीर जाधव, कैलास पाटील आदी सहभागी झाले होते.

भाजपवर टीका

भाजपचे एकनाथ खडसे व शहराचे आमदार अनिल गोटे यांच्यावर थोरात यांनी टीका केली. ते म्हणाले की, भाजपचे नेते भामटे आहेत. महसूलमंत्री खडसे धुळ्यातील तेलगी घोटाळ्यातील आरोपींबरोबर फिरतात. खडसे यांचा राजकीय दौरा नसतो. ते खासगी कामासाठीच धुळ्यात येतात. जनतेने भाजपच्या नेत्यांना निवडून देऊन मोठी चूक केली आहे. 'सबसे बडी भूल कमल का फूल' असा टोलाही हाणला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तर प्रदेशातून पुरविले जाते ऑक्सिटोसिन

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

जनावरांनी जास्त दूध द्यावे यासाठी देण्यात येणारे इंजेक्शन थेट उत्तर प्रदेशातून मागविण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

महाराष्ट्रात ऑक्सिटोसीनच्या इंजेक्शनला बंदी आहे. तरीही, शहरात ते मुबलक प्रमाणात मिळत असून पूर्वी मेड‌िकलमध्ये मिळणारे इंजेक्शन आता थेट गोठ्यांपर्यंत पोहचत आहे. यासाठी उत्तर प्रदेशातील काही व्यापाऱ्यांनी समांतर यंत्रणा उभारली आहे. या व्यापाऱ्यांकडे नाशिकमधील गोठ्यांना रोज किती इंजेक्शन्स लागतात याची माहिती आहे. त्यानुसार गोठे मालकांना आठवड्यातून एकदा इंजेक्शनचा पुरवठा केला जातो. यातील काही माल हा मध्यप्रदेशातील इंदूरहूनही येत आहे. इंदूरमध्ये ऑक्सिटोसिनच्या व्यापारासाठी बाजारपेठ आहे. येथे या इंजेक्शनची खुलेआम विक्री होत असते. हा माल इंदूरमार्गे खासगी वाहनांतून थेट नाशिक शहरात दाखल होतो. प्रत्येक वेळी माल उतरविण्याचे ठिकाणी बदलले जात असमन स्थानिक पुरवठादार हा माल थेट गोठ्यांपर्यंत पोहचव‌ित आहेत. कुणाला शंका येऊ नये यासाठी सायकल अथवा छोट्या वाहनांचाही यासाठी वापर करण्यात येतो. बऱ्याचदा हा माल हायवेवरच उतरवून घेतला जातो. नाशिकमधील काही व्यापारी दिल्लीहूनही माल आणतात. हा माल ट्रान्स्पोर्टद्वारे थेट दुकानात पोहचव‌िला जातो. बिलावर ऑक्सिटोसीन असे न लिहीता दुसऱ्या औषधाचे नाव लिहीले जाते त्यामुळे कुणाचेही याकडे लक्ष जात नाही.

तपासणीसाठी यंत्रणा नाही

मध्यप्रदेशातून हा माल येत असताना तपासणीसाठी कुठल‌ीही यंत्रणा नाही. त्यामुळे हा माल राजरोसपणे शहरातील गोठ्यांपर्यंत पोहोचविला जात आहे. या प्रकाराबाबत पोलिसांना देखील माहीती नसल्याने तेदेखील बिनधास्त आहेत.

--

ऑक्सिटोसीनयुक्त दूध ओळखायचे कसे?

दुधात अनेक प्रकारे भेसळ केली जाते. प्रत्येकवेळी प्रयोगशाळेत जाऊन त्याची चाचणी करणे शक्य होत नाही. या करता बाजारात दूध भेसळ ओळखणारे यंत्र उपलब्ध आहे. याची किंमत १ हजार रुपयांपर्यंत आहे. यासोबत काही स्ट्रीपही मिळतात. त्याच्या वापराने दुधाचा अथवा स्ट्रीपचा रंग बदलल्यास दूध ऑक्सिटोसीन युक्त असे समजावे. त्याचप्रमाणे अन्न औषध प्रशासनाकडून देखील याची तपासणी केली जाते.

(क्रमशः)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जबाजारीपणातूनच आत्महत्या

$
0
0

जिल्ह्यात आतापर्यंत ३८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; २१ प्रकरणे मंजूर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला सरकारकडून मिळणारी एक लाखांची आर्थिक मदतही मोठी वाटत असली तरी अलीकडे झालेल्या अशा घटनांमध्ये जिल्ह्यातील तीन कुटंब मदतीला मुकले आहेत. जिल्हा प्रशासनाने शेतकरी आत्महत्येची १२ प्रकरणे मंजूर केली असून, या घटना कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र तीन प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत.

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. शेतकरी आत्महत्येची प्रत्येक घटना सरकारी निकषांमध्ये बसतेच असे नाही. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात या विषयावर बैठक बोलाविण्यात आली होती. एकूण १७ पैकी १२ प्रकरणे पात्र, तर तीन अपात्र ठरविण्यात आली. दोन प्रकरणांच्या फेरचौकशीचे आदेश संबंधित तहसीलदारांना देण्यात आले आहेत.

निफाड, सिन्नर, बागलाण, मालेगाव, नांदगाव, दिंडोरी, चांदवड या तालुक्यांमध्ये शेतकरी आत्महत्येच्या घटना सातत्याने घडत आहेत. चालू वर्षात ३८ शेतकऱ्यांनी विविध कारणांमुळे खचून जाऊन आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते. मात्र, त्यासाठी संबंधित शेतकरी कर्जबाजारी असावा, कर्जवसुलीसाठी त्याच्याकडे बँकांकडून तगादा सुरू असावा किंवा गेल्या काही वर्षांपासून त्याची जमीन नापीक असावी, अशा प्रकारचे निकष आहेत. अशा निकषांना पात्र ठरणाऱ्या प्रकरणांमध्येच संबंधित शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मंजूर केली जाते. आत्महत्येच्या नेमक्या कारणांचा शोध घेऊन त्याचा अहवाल तहसीलदार आणि संबंधित पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांद्वारे जिल्हा प्रशासनाला सादर केला जातो.

आर्थिक अरिष्ट, निसर्गाचे दुष्टचक्र यांसारख्या संकटांना त्रासून शेतकऱ्याने आत्महत्या केली असेल, तर तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले जातो. १२ एप्रिल रोजी याबाबतची बैठक झाली होती. त्यानंतर सोमवारी पुन्हा याबाबतची बैठक बोलावण्यात आली. एप्रिलपूर्वीची प्रलंबित प्रकरणे तसेच नवीन १७ प्रकरणे मंजुरीसाठी प्रशासनासमोर ठेवण्यात आली होती.

सरकारी मदतीस पात्र ठरलेली शेतकरी कुटुंब नामदेव तुकाराम कांडेकर (पांगरी, ता. सिन्नर), संजय तानाजी सूर्यवंशी (खालप, ता. देवळा), आप्पा नानाजी गायकवाड (विंचूरे, ता. बागलाण), छबू रेवजी कोल्हे (विटावे, ता. चांदवड), हरिभाऊ भिमाजी नागरे (अस्तगाव, ता. नांदगाव), सागर पंढरीनाथ डोंगरे (गोळेगाव, ता. निफाड), कैलास संतू जाधव (सोनजांब, ता, दिंडोरी), आकाश राजेंद्र शिंदे (वनसगाव, ता. निफाड), अशोक लहानू शेळके (चास, ता. सिन्नर), देवीदास भाऊसाहेब चव्हाण (रा. हिरापूर, ता. चांदवड), कोंडाजी राजाभाऊ वक्ते (वडनेरभैरव, ता. चांदवड), नंदू मुकुंदा घोटेकर (चांदोरा, ता. चांदवड).

अपात्र प्रकरणे दिलीप रामनाथ खिंडे (रा. सोनगाव, ता. निफाड), महेंद्र पुंजा गाडे (रा., सोनगाव, ता. निफाड), विलास गोविंद चौधरी (रा.ओझर, ता. निफाड).

फेरचौकशीसाठी ठेवलेली प्रकरणे बापू रामभाऊ अहिरे (ब्राह्मणवाडे, ता. बागलाण), ‍रंगनाथ संतू शेळके (रा. नांदूर शिंगोटे, ता. सिन्नर)

जिल्ह्यात २१ प्रकरणे पात्र तर ११ अपात्र जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या ३७ घटना. त्यापैकी १८ प्रकरणे यापुर्वीच निकाली काढण्यात आली आहेत. त्यामध्ये नऊ प्रकरणे मंजूर, तर तेवढीच प्रकरणे नामंजूर करण्यात आली आहेत. १७ मार्च रोजी सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील नामदेव तुकाराम कांडेकर यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली होती. हे प्रकरण प्रलंबित ठेवण्यात आले होते. मात्र ते आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. आतापर्यंत ३७ पैकी ३४ प्रकरणे मंजुरीसाठी ठेवण्यात आली आहेत. त्यापैकी २१ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. ११ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली असून, दोन प्रकरणांची फेरचौकशी केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिसपाटील, कोतवाल भरतीप्रक्रिया नियमानुसार

$
0
0

उपविभागीय अधिकाऱ्यांचा दावा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निफाड उपविभागातील पोलिसपाटील व कोतवाल पदांच्या भरतीसाठी पारदर्शक पद्धतीने आणि नियमानुसार निवडप्रक्रिया राबविण्यात आली आहे. निवड प्रक्रियेत आर्थिक बाबी संदर्भातील सर्व तक्रारी निराधार व तथ्यहीन असून, केवळ गुणवत्तेच्या आधारावर निवड प्रक्रिया राबविल्याचा दावा उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी केला आहे.

निफाड उपविभागातील पोलिसपाटील व कोतवाल पदांच्या भरतीकरिता २४ एप्रिल रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली. लेखी परीक्षेचा निकाल ५ मे रोजी जाहीर करून १० ते १३ मे या कालावधीत पाच सदस्यीय निवड समितीमार्फत मुलाखती घेण्यात आल्या. कोतवालपदाच्या १६ मे रोजी मुलाखती घेण्यात येऊन त्याच दिवशी दोन्ही पदांसाठीचे निकाल जाहीर करण्यात आले. मात्र या भरतीप्रक्रियेत घोळ झाल्याचे आरोप होऊ लागले आहेत.

गुणांकन पद्धतीबाबत सरकारच्या तसेच संबंधित अधिनियमामध्ये स्पष्ट तरतूद नाही. संबंधित समितीने सर्वंकष विचार करून सर्वात लायक उमेदवार निवडणे सरकारला अभिप्रेत आहे. गुणांकन पद्धतीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना तसेच उमेदवारांची पदासाठीची पात्रता तपासण्यासाठी निवड समितीने पोलिसपाटीलपदासाठी ११, तर कोतवाल पदासाठी १२ मुद्दे निश्चित केले होते.

गुणांकन पद्धतीमध्ये त्याच्या शैक्षणिक आर्हतेसोबतच पदासाठी आवश्यक सर्वंकष व्यक्तितीमत्व, व्यावहारिक कौशल्य, निर्णय क्षमता, समय सुचकता, परिस्थितीजन्य कौशल्य आदी सर्वंकष गुणांचा विचार करून निश्चित मुद्यांच्या आधारे गुणांकन करण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भातील सर्व दस्त सर्वांच्या अवलोकनार्थ उपलब्ध करून देण्यात आलेले असून, इच्छुक व्यक्ती संपूर्ण दस्तऐवज कार्यालयीन वेळेत येऊन अवलोकन करू शकतात, असे प्रशासनाने कळविले आहे. निवड प्रक्रियेसंदर्भात कोणास कोणतीही तक्रार किंवा अडचण असल्यास कार्यालयात संपर्क करावा, असे आवाहन मंगरूळे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बागलाण, नांदगावमध्ये दोन शेतकरी आत्महत्या

$
0
0

बागलाण, नांदगावमध्ये दोन शेतकरी आत्महत्या

नाशिक : बळीराजाच्या आत्महत्येच्या हृदय ‌पिळवटून टाकणाऱ्या घटनांचे सत्र नाशिक जिल्ह्यात सुरूच आहे. सोमवारी बागलाण आणि नांदगावात दोन शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. चालू वर्षात मृत्यूला कवटाळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ३८ झाली आहे. बागलाण तालुक्यातील जुनी शेंमळी येथील जिभाऊ गोटू बागूल (वय ६५) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. दुसरी घटना नांदगाव तालुक्यातील मनमाडजवळील माळेगाव कर्यात येथे घडली. देवीदास पुंडलिक फरताळे (वय ५१) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इगतपुरीत धक्काबुक्कीत तरुणाचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इगतपुरी

पत्नीचा हात धरून मोटरसायकलवर का बसवले यावरून कुरापत काढून धक्काबुक्की करीत ढकलल्याने दगडाचा मार लागून युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते येथील दऱ्याची वाडी येथे घडली. पोलिस पथकाने अवघ्या आठ तासांतच संशयित आरोपीला जेरबंद करून न्यायालयात हजर केले असता त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

काळुस्ते जवळील दऱ्याची वाडी येथे २२ मे रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी एकनाथ पांडू गावंडा (वय २१) याने कृष्णा सोमा भले (वय २२, रा. निरपण) यास तू माझ्या पत्नीला फशाबाईचा हात धरून तुझ्या मोटरसायकलवर का बसवले या कारणाची कुरापत काढली. कृष्णा भले यास धक्काबुक्की व शिवीगाळ केली. तसेच कृष्णा भले यास ढकलल्याने जमिनीवर पडून दगडाचा मार डोक्याला लागून त्यात तो जागीच मृत झाला.

या घटनेची फिर्याद बाबू मनाजी भले यांनी इगतपुरी पोलिस ठाण्यात दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुभाष पाटील, पोलिस कर्मचारी विनोद गोसावी, गणेश वराडे, राहुल पगारे, दराडे, राठोड आदी पोलिस पथकांनी त्वरित आरोपीचा शोध घेण्यासाठी धाव घेतली. संशयित आरोपीने या घटनेनंतर घटनास्थळावरून पळ काढला होता. खबऱ्याच्या सांगण्यावरून काळुस्ते येथील जि. प. शाळेच्या मागे लपून बसलेल्या संशयित आरोपी एकनाथ गवांडा यास जेरबंद करण्यात अखेर पोलिसांना यश आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेन्शन खाते उघडण्यास नकार

$
0
0

बँक ऑफ महाराष्ट्राची आडगाव शाखा अनेक दिवसापासून कोणार्क नगर परिसरात कार्यरत आहे. या परिसरात शेकडो निवृत्त पेन्शनधारकांचे वास्तव्य आहे. मात्र, त्यांचे खाते उघडण्यास बँक ऑफ महाराष्ट्राच्या आडगाव शाखेने स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. त्यामुळे पेन्शनधारकांना बँकेच्या मुख्य आणि अन्य शाखांमध्ये जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

कोणार्कनगर परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांचे पेन्शन खाते बँकेच्या शहरातील मध्यवर्ती भागातील शाखांमध्ये आहे. आपल्या परिसरात बँक ऑफ महाराष्ट्रची आडगाव शाखा आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना आनंद झाला. त्यांनी बँकेच्या आडगाव शाखा व्यवस्थापकांची भेट घेऊन पेन्शन खाते उघडण्यासाठी विनंती केली. मात्र, लाल फितीमधील कारभारात फसलेल्या बँक कर्मचाऱ्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता दिल्या. आम्हाला बँकेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून पेन्शनधारकांची खाती उघड्यासंदर्भात अद्याप परवानगी मिळालेली नाही. तसेच आमच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याचेही कारण बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पुढे केले. त्यामुळे पेन्शनधारकांचा हिरमोड झाला आहे. अन्य बँकेच्या कामांसाठी देखील कर्मचाऱ्यांकडून सहकार्य मिळण्याऐवजी ज्येष्ठ नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याची ज्येष्ठ नागरिकांची तक्रार आहे. बँक आपल्या शाखेत स्वत:हून येणाऱ्या ग्राहकांना अशी बेजबाबदारपणाची वागणूक कशी काय देऊ शकते? यातून बँकेचा व्यवसाय वाढण्याऐवजी कमी होण्याची शक्यता अधिक असल्याचे मत आडगाववासीयांनी मांडले आहे.

प्रवास बनतोय जिकिरीचा वयाची ६५ वर्षे पार केलेल्या आणि शारीरिक क्षमता कमी झाल्यामुळे हतबल असलेल्या पेन्शनधारक ज्येष्ठ नागरिकांना शहरातील बँकेत जाण्यासाठी सातत्याने वाहतुकीची वर्दळ सुरू असलेला महामार्ग ओलांडण्याचा धोका पत्करावा लागतो. जत्रा चौफुली ओलांडून बस किंवा रिक्षा पकडून प्रवास करणे त्यांना जिकिरीचे होते. आपल्या घराजवळच बँकेची शाखा उपलब्ध झाल्यास उतारवयात होणारी दगदग कमी होऊ शकेल, अशी मागणी त्यांनी मांडली आहे.

आमच्या शाखेत राज्य कर्मचाऱ्यांच्या पेन्शन खात्याच्या मायकर नंबरची समस्या आहे. आम्ही बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. याशिवाय शाखेत मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे आमचा नाईलाज आहे. - पी. एल. तायडे, शाखाधिकारी, बँक ऑफ महाराष्ट्र, आडगाव

जत्रा चौफुली दररोज अनेक छोटे मोठे अपघात होतात. त्यामुळे आम्हाला महामार्ग ओलांडून जाणे अवघड आहे. स्थानिक बँक शाखेत पेन्शन मिळाली तर आमच्यासाठी सोयिस्कर होऊ शकेल. - गोविंद वाडेकर, स्थानिक ज्येष्ठ नागरिक

आमच्या घराजवळ शाखा असून देखील आम्हाला कित्येक किलोमीटर पेन्शन घेण्यासाठी शहरातील मुख्य शाखेत जावे लागते. आम्हाला कोणार्कनगर शाखेमध्येच पेन्शन उपलब्ध झाली तर आमचा त्रास कमी होईल. - किशोर पेटकर, स्थानिक ज्येष्ठ नागरिक

आमच्या उतार वयाचा विचार करता बँक कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांची समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करावा. तसे झाल्यास शहरातील मुख्य शाखेत जाण्यासाठी होणारी दगदग टळू शकेल. - पंढरीनाथ जगदाळे, स्थानिक ज्येष्ठ नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टर दाम्पत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

$
0
0

फ्लॅट विक्री व्यवहारात भंडारा जिल्ह्यातील महिलेची २७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रविवार पेठेतील डॉक्टर दाम्पत्याविरुद्ध नाशिकरोड पोलिस ठाण्यात ४२० कलमाखाली गुन्हा दाखल झाला आहे.

नीलिमा कापसे (४१, पंचायत समितीमागे, सरदार सॉ मिलजवळ, भंडारा) यांनी फिर्याद दिली आहे. डॉ. नारायण मुरलीधर येवलेकर (५४, रा. लोणार गल्ली, रविवार पेठ, नाशिक) आणि त्यांची पत्नी डॉ. रोहिणी यांचा जेलरोडवरील बिशप हाऊससमोर आनंद विजय संकुलमध्ये पाचव्या मजल्यावर ५८ क्रमांकाचा फ्लॅट आहे. त्याच्या विक्रीचा व्यवहार नीलिमा कापसे यांच्याशी झाला. या फ्लॅटवर कोणताही बोजा किंवा कर्ज नाही असे त्यांनी कापसे यांना सांगून २९ लाख रुपयांना विकला.

बोजाची २७ लाखांची रक्कम निकाली काढून देतो, असे आश्वासन २७ नोव्हेंबर २०१३ पासून आजपर्यंत देत राहिले. मात्र, बोजा कमी करून दिला नाही. त्यामुळे डॉक्टर दाम्पत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक राठोड तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images