Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

त्र्यंबकमध्ये साध्वीचा पुन्हा राडा

$
0
0

साध्वीला रोखण्यासाठी महिलांचे कडे

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर मंदिरातील गाभाऱ्यात प्रवेश मिळावा, यासाठी साध्वी हरसिध्दगिरी यांनी दुसऱ्या दिवशीही अयशस्वी प्रयत्न केला. यावेळी मंदिरासमोरील पेंडालमध्ये उपोषण करण्याचा साध्वीचा प्रयत्नही महिलांनी उधळून लावला. अखेर आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती यांच्या मध्यस्‍थीने साध्वीला गाभाऱ्याच्या दरवाजापासून दर्शन घेण्यास सांगून तसेच, उसाचा रस देऊन साध्वीला उपोषण मागे घेण्यास भाग पाडण्यात आले.

भूमाता ब्रिगेडचे आंदोलन महिला दिनास होणार म्हणून येथे पहाटेपासून गावच्या रणरागिणी सज्ज होत्या. साध्वी हरसिध्दगिरी यांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी हट्ट धरला. साध्वी हरसिध्दगिरी यांनी मंदिरासमोरील पेंडालमध्ये बस्तान बसविले. आपण उपोषण करणार असल्याचे जाहीर केले. मात्र, महिलांनी तेथे बसण्यास मज्जाव केला. तसेच, पोलिसांनीही विनंती केली. मात्र, या साध्वीने नकार दिला. स्थानिक महिलांचा रूद्रावतार पाहून पोलिसांनी या साध्वीस रिक्षात बसवून पोलिस ठाण्यात आणले. तेथे समजावण्याचा प्रयत्न केला. साध्वी ऐकण्यास तयार नव्हती. तेव्हा आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती यांनी साध्वीस समजावून सांगितले. तसेच, या साध्वीस मंदिरात नेऊन नेहमी प्रमाणे महिला दर्शन घेतात तसे गाभाऱ्याच्या दरवाजापासून दर्शन घडविले. त्यानंतर उसाचा रस घेवून या साध्वीने उपोषण सोडले.

महिलांचा पहारा

पोलिस यंत्रणा सतर्क होती. काही हातघाईचा प्रसंग नको म्हणून बंदोबस्त वाढविण्यात आला. सकाळी आठ वाजेच्या दरम्यान काही तासानंतर भूमाता ब्रिगेडला ताब्यात घेतल्याचे वृत्त पसरले आणि शहरातील महिला पुन्हा घरोघरी परतल्या. अर्थात केव्हाही प्रवेश होऊ शकतो म्हणून शहरातील काही महिला येथे पहाऱ्यास थांबल्या आहेत.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काम हेच प्रमाण होऊ शकते

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नेता होण्यासाठी कोणत्याही विशिष्ट जाती-धर्माची गरज नसते. कोणत्याही पक्षाचा झेंडा खांद्यावर लागत नाही. प्रामाणिकपणे केलेले काम हेच प्रमाण आहे. हे कामच तुम्हाला नेता बनवते. त्यामुळे सामान्य माणसाचे ऐका, त्याचे गुलाम बनून रहा, त्याला तुमच्या जीवनात महत्त्वाचे स्थान द्या तुम्हाला काही कमी पडणार नाही, असे प्रतिपादन आमदार ओमप्रकाश तथा बच्चू कडू यांनी केले.

माजी आमदार व पत्रकार माधवराव लिमये यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या वतीने दिला जाणारा कार्यक्षम आमदार पुरस्कार वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी कडू बोलत होते. आमदार कडू पुढे म्हणाले की, पोथी-पुराणांमध्ये फार पैसा खर्च होत आहे. या पैशातील २५ टक्के पैसा अंध-अपंगांसाठी वापरला तर त्यांचे भले होईल व देशात दारिद्र्य राहणार नाही. आपण ज्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे त्यांच्या गावांना जा, त्यांचे दर्शन घ्या त्यातून सद्‍बुध्दी मिळेल. अच्छे दिन 'वरून' येत नाहीत, ते खालच्या माणसांनाच आणता आले पाहिजे. असेही आमदार कडू म्हणाले.

यावेळी विनायकदादा पाटील म्हणाले की, माणसे गढूळ होत चालली आहेत, नितळ माणसेच राहिलेली नाही. महाराष्ट्राची कुस भाग्यवान आहे की आमदार बच्च कडू यांच्यासारखी माणसे येथे आहेत. त्यांच्यासारख्या माणसांमुळे समाजात बॅलन्स टिकून आहे.

किशोर पाठक यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले. नरेश महाजन यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्षम आमदार निवडीमागची भूमिका मिलिंद जहागिरदार यांनी व्यक्त केली. परिचय जयप्रकाश जातेगावकर यांनी करून दिला. आर्चिस नेर्लिकर यांनी माधवराव लिमये यांच्याविषयी माहिती दिली. सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांनी स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिग्नलवर होणार गाडी आपोआप बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिग्नलवर सुरु असलेली गाडी अवघ्या १० सेकंदात अचानक बंद होते आणि केवळ क्लचवर पाय ठेवला तर ती तत्काळ सुरुही होते. महिन्याकाठी कित्येक लिटर आणि शेकडो रुपये वाचविणारी ही संकल्पना आणि उपकरणाची निर्मिती केली आहे नाशिकच्या विराज रानडे या इंजिनीअरींगच्या विद्यार्थ्याने.

दररोज शहरातील अनेक सिग्नलवर शेकडो वाहने सुरुच राहतात. केवळ सिग्नलच नाही तर अनेकदा किरकोळ कामेही वाहन सुरु ठेवूनच केली जातात. यातून इंधनांचा मोठा अपव्यय होतो. तसेच, मोठ्या प्रमाणात प्रदूषणही हाोते. ही बाब देशाच्या अर्थकारणावरही दूरगामी परिणाम करणारी आहे. हे लक्षात घेऊन विराज रानडे या इंजिनीअरींगच्या विद्यार्थ्याने अनोखी शक्कल लढवीत सिग्नलवर आपोआप गाडी बंद व्हावी असे उपकरण तयार केले आहे. एखाद्या ठिकाणी वाहन १० सेकंद उभे राहिले तर ते वाहन आपोआप बंद होणे आणि केवळ क्लच दाबताच वाहन पुन्हा सुरु होणे या उपकरणामुळे शक्य होत आहे. 'इंटलिजंट अॅडलिंग सिस्टीम' असे या उपकरणाचे नाव असून गेल्या चार महिन्यांच्या अथक प्रयत्नांमधून हे उपकरण तयार करण्यात त्यास यश आले आहे. विशेष म्हणजे विराज हा इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन (इ अँड टीसी) शाखेचा विद्यार्थी आहे. तरीही त्याने ऑटोमोबाइल आणि इ अँड टीसी या दोन्ही शाखांचा अभ्यास करीत साकारले आहे. यासाठी त्याने काही गॅरेज आणि शोरुम्समध्ये जाऊन अभ्यास केला आहे. अवघ्या ८ ते १० हजार रुपयात हे उपकरण तयार होऊ शकते. हे उपकरण वाहनात लावल्याने वर्षाकाठी देशातील हजारो लिटर इंधन आणि पैसे वाचण्याबरोबरच वायू प्रदूषणालाही यामुळे आळा बसणार आहे. मुबलक प्रमाणावर हे उपकरण तयार केले तर अवघ्या काही हजार रुपयात ते उपलब्ध होऊ शकते, असे विराज सांगतो. मुंबई किंवा पुण्यातील ट्रॅफिकमध्ये अडकणाऱ्या वाहनांना हे उपकरण फायदेशीर आहे. तसेच, १० सेकंदांऐवजी २० किंवा ठराविक सेकंदांचे सेटिंगही या उपकरणात करणे शक्य आहे.

इंधनांचा अपव्यय हा देशाच्या अर्थ आणि पर्यावरणावरही परिणाम करणारा आहे. त्यामुळेच 'इंटलिजंट अॅडलिंग सिस्टीम' हे उपकरण तयार करण्यात मला यश आले आहे. वेगनार या कारमधील चाचणी यशस्वी झाली असून, प्रत्येक वाहनात हे उपकरण बसविणे शक्य आहे.

- विराज रानडे, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होय, गाडी चालणार हवेच्या इंजिनावर!

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

नाशिक : पृथ्वीला प्रदुषणामुळे मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला असून, येणाऱ्या पिढीला तो घातक ठरणार आहे. जगाच्या पाठीवर इंधन साठा अवघा ४० टक्के शिल्लक असल्याचेही स्पष्ट झालेले आहे. म्हणुनच काळाची गरज ओळखून नाशिकच्या शैलेश महाजन या तरुणाने हवेवर चालणारे इंजिन तयार करण्याचा फॉर्म्युला शोधून काढला आहे.

फॉसिल इंधनाच्या वापरामुळे हवेत कार्बनडाय ऑक्साईड, सल्फर ऑक्साईड, हायड्रोजन क्लोराईड, नायट्रोजन ऑक्साईड अशा प्रकारचे विषारी वायू मिसळतात. त्यामुळे प्रदूषण होते. याला आळा बसावा म्हणून हवेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध लावल्याचे शैलेश महाजन यांचे म्हणणे आहे. शैलेशने तयार केलेल्या इंजिनमुळे शून्य टक्के प्रदूषण होणार आहे. पाच वर्षांपूर्वी हवेवर मशिन चालू शकते, असे वाचनात आले होते. त्यानंतर त्याने या संशोधनाला सुरुवात केली. शैलेशने तयार केलेल्या इंजिनात कॉम्प्रेस एअरचा वापर करून एनर्जी प्रॉडक्शन तयार होते.

असे इंजिन अनेक माध्यमांमध्ये वापरू शकतो, याचा वापर गाड्यासाठी होऊ शकतो अथवा ज्या ज्या ठिकाणी इंजिनचा वापर आहे तेथे तेथे कमी अधिक क्षमतेचे इंजिन तयार करता येते. कोणतेही इंजिन सुरू करण्यासाठी बाहेरील एनर्जीचा वापर करावा लागतो. मात्र, शैलेशने बनवलेल्या इंजिनासाठी अशा एनर्जीची गरज नाही. हे इंजिन फोर स्ट्रोकचे असून, दोन स्ट्रोक हे एअर कॉम्प्रेसरचे काम करतील, तर उर्वरित दोन स्ट्रोक इंजिन म्हणून काम करतील.



पेटंटसाठी सरकारकडे अर्ज

इंधन वापरातून सरकारला महसूल मिळतो जर हवेवर चालणारे इंजीन तयार झाले तर सरकारला हजारो कोटींच्या महसुलाला मुकावे लागेल. त्यामुळे हे मशीन सुरू ठेवण्यासाठी मोबाईलवर एक अॅप तयार करण्यात आले असून, ते रिचार्ज केल्यावरच इंजिन सुरू करता येणार आहे. त्यातून आपोआपच सरकारला महसूल मिळेल. त्यासाठी पीएलसी सिस्टीम (programing logical control) बसवण्यात आली आहे. एअर टँकमध्ये एअर कंट्रोल ठरावीक पातळीपर्यंत स्थिर रहाण्यासाठी टाकीला मीटर असून, हवेची क्षमता जास्त झाल्यास हवा सेफ्टीवॉलद्वारे बाहेर पडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या इंजिनाच्या पेटंटसाठी शैलेशने भारत सरकाच्या पेटंट विभागाकडे अर्ज दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे तालुका शिवसेनेचा उपक्रम

$
0
0

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांना मदत

म. टा. वृत्तसेवा, धुळे

कर्जबाजारीपणातून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबासोबत गेल्या अकरा वर्षांपासून धुळे तालुका शिवसेना भाऊबीज साजरा करीत आहे. यंदाही आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटूंबांना दिलासा देण्यासाठी ऑक्टोबर २०१४ ते २०१५ या वर्षात तालुक्यातील आत्महत्या केलेल्या २७ शेतकरी कुटूंबातील सदस्यांना भेटी घेवून साडी-चोळीचा आहेर देण्यात आला.

शिवसेनेचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम सुरू आहे. दुष्काळग्रस्त परिस्थिती व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. बहुतांश शेतकत्यांनी विषारी औषध प्राशन करून व गळफास घेवून आत्महत्या केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून अवकाळी पाऊस व गारपीटमुळे पुरेसे उत्पन्न मिळत नाही आणि सावकारी व बँकाचे कर्ज फेडणे शक्य नसल्याने शेतकरी आत्महत्या करतात. या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांच्या कुटूंबियांच्या मनात आत्मविश्वास जागविण्याचा प्रयत्न शिवसेना करीत असल्याचे माजी आ. प्रा. शरद पाटील यांनी सांगितले. यामध्ये जिल्हाप्रमुख हिलाल माळी, राजेंद्र पाटील, उपजिल्हाप्रमुख नितीन पाटील, धीरज पाटील, संजय गुजराथी, युवासेनेचे पंकज गोरे, कैलास पाटील, आधार हाके, मनिष जोशी, कमलेश भामरे, राजेंद्र कोतेकर, दिनेश पाटील, शंकर खलाणे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपक्रमात सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्य ात आदिवासींचा मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

एकलव्य आदिवासी युवा संघटना, आदिवासी एकता परिषद व आदिवासी विकास मंचतर्फे आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी, मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा शिंदखेडा ते धुळे या मार्गे मोटारसायकलने काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

आदिवासी समाजाचा विकास व न्याय हक्कांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. सकाळी ९ वाजता शिंदखेडाहून निघालेला हा मोर्चा दुपारी १२ वाजेच्या सुमारास धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन धडकला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी जिल्हा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात होती. शिंदखेडा ते धुळे मार्गातील ठिकठिकाणच्या गावातील आदिवासी बांधव मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या मोर्चेकरांनी दिलेल्या निवेदनात, २१ ऑक्टोबर २०१५ च्या शासन निर्णयाद्वारे आदिवासींना संरक्षण दिले असून त्यास विरोध आहे. एकीकडे आदिवासी भुकबळी व कुपोषित असून दुसरीकडे बोगस आदिवासींना योजनेचा लाभ दिला जात आहे. बिगर आदिवासींमार्फत शासकीय जागा लाटण्याचा प्रयत्न होत आहे. प्रत्येक गावात आदिवासी समाजासाठी दफनभूमी असायला हवी अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच शबरी महामंडळापासून धुळे जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना वंचित ठेवले जात आहे, त्यांना सरकारकडून मदत मिळावी. शंभर रूपये रोजंदारीने मजुरी करणाऱ्या आदिवासींना वीज बिल भरावयास सांगण्यात येते. त्याला आळा बसला पाहिजे, असे या निवेदनात म्हटले आहे. धुळे शहरात शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाची ४० एकर जागा आहे तरीही आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी १० एकर जागा मिळत नाही. यामुळे आदिवासी समाजावर अन्याय होत असल्याचा आरोपही यात केला गेला आहे. या अन्यायाविरोधात हा मोर्चा काढण्यात आला असल्याचे शेवटी निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी संघटनेचे दीपक अहिरे, रोशन गावित, संजय मालचे, गुलाब सोनवणे, श्रीराम मोरे, किशोर ठाकरे तसेच आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजूनही जिवंत अाहे शब्दांची भूक

$
0
0

चाळीसगावच्या ना.बं.वाचनालयात वाचकांची दिवाळी

म. टा. वृत्तसेवा, चाळीसगाव

दिवाळीत मराठी माणसाला जितके फराळाचे वेध असतात तितके दिवाळी अंकाचीही उत्कंठा असते. मराठी माणूस आणि दिवाळी अंकाचे एक अनोखे नाते आहे. दिवाळी अंकांना शतकी परंपरा आहे. याच परंपरेनुसार शहरातील ना. बं. वाचनालयात वाचकांसाठी विविध क्षेत्रातील नामांकित दिवाळी अंक वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याला वाचकांकडूनही भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

सुसंस्कृत मराठी माणसाच्या दिवाळीत दिवाळी अंकाना महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळेच वर्षसरतीला येणाऱ्या दिवाळीत वाचकांना दिवाळी अंकाची प्रतीक्षा असते. फटाके, गोड, फराळ यासारखेच दिवाळी अंकाचा खजिना वाचकांना शब्दांची भूक भागविण्यास मदत करत असतो. त्यांच्यासाठी ही वैचारिक फराळाची मेजवानीच असते. वाचनप्रेमींकडूनही दिवाळीच्या सुट्यांमध्ये या खजिन्याची मनमुराद लूट होत असते.

चाळीसगावच्या ना.बं. वाचनालयास शतकीय परंपरा आहे. वाचनालयात साठ हजार विविध ग्रंथ आहेत. याच गौरवशाली पंरपरेनुसार गेल्या तीस वर्षांपासून वाचनालयाकडून दिवाळीत विविध क्षेत्रातील दिवाळी अंक वाचनासाठी उपलब्ध करून दिले जातात. या वर्षीही साहित्य, ऐतिहासिक, अध्यात्मिक, आरोग्यविषयक, पाककृती, विनोदी व बालकांसाठी असे ७० दिवाळी अंक आले आहेत. वाचनसंस्कृतीस बळ मिळावे व वाचकांना याचा लाभ घेता यावा म्हणून नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत दिवाळी अंक योजनाही सुरू करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात आदिवासींचा मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

एकलव्य आदिवासी युवा संघटना, आदिवासी एकता परिषद व आदिवासी विकास मंचतर्फे आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी, मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा शिंदखेडा ते धुळे या मार्गे मोटरसायकलने काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

आदिवासी समाजाचा विकास व न्याय हक्कांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. सकाळी ९ वाजता शिंदखेडाहून निघालेला हा मोर्चा दुपारी १२ वाजेच्या सुमारास धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन धडकला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी जिल्हा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात होती. शिंदखेडा ते धुळे मार्गातील ठिकठिकाणच्या गावातील आदिवासी बांधव मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

२१ ऑक्टोबर २०१५ च्या शासन निर्णयाद्वारे आदिवासींना संरक्षण दिले असून त्यास विरोध आहे. एकीकडे आदिवासी भुकबळी व कुपोषित असून दुसरीकडे बोगस आदिवासींना योजनेचा लाभ दिला जात आहे. बिगर आदिवासींमार्फत शासकीय जागा लाटण्याचा प्रयत्न होत आहे. प्रत्येक गावात आदिवासी समाजासाठी दफनभूमी असायला हवी अशी मागणीही करण्यात आली आहे. शंभर रूपये रोजंदारीने मजुरी करणाऱ्या आदिवासींना वीज बिल भरावयास सांगण्यात येते. त्याला आळा बसला पाहिजे, असे या निवेदनात म्हटले आहे. धुळे शहरात शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाची ४० एकर जागा आहे तरीही आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी १० एकर जागा मिळत नाही. यामुळे आदिवासी समाजावर अन्याय होत असल्याचा आरोपही यात केला गेला आहे.

मागण्या

बोगस आदिवासींना योजनेचा लाभ नको

आदिवासी विद्यार्थी वसतिगृहास जागा

प्रत्येक गावात समाजाची दफनभूमी व्हावी

शबरी महामंडळाचा लाभ मिळावा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खान्देश बिल्डर्सच्या निविदा बेकायदेशीरच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जळगाव घरकूल घोटाळाप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात सलग दोन दिवस कामकाज झाले. यावेळी या गुन्ह्यातील मुख्य फिर्यादी व साक्षीदार डॉ. प्रवीण गेडाम यांची साक्ष नोंदविण्यात आली की, घरकूल बांधकामाच्या नऊ ठिकाणांच्या निविदांमध्ये खान्देश बिल्डर्सने १५ प्रकारचे बदल केले होते. मात्र शासनाच्या नियमानुसार व अर्टी शर्तींनुसार निविदा प्रक्रियेमध्ये बदल करता येत नाही. तसेच या निविदा व टिप्पणीमध्ये नगरपालिकेचे अधिकारी, अभियंता व अध्यक्षांच्या स्वाक्षऱ्या होत्या आणि त्या डॉ. गेडाम यांनी ओळखल्या आहेत.

तसेच या घरकूल बांधकामांचा विशिष्ट तपशील तयार करण्यात आला होता. त्यात घरकूलाचा खर्च, काम व अन्य बाबींचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामध्ये सात अटी शर्ती ठेवण्यात आल्या होत्या. परंतु अभियंता खडके यांनी या टिप्पणीला नकारात्मक उत्तर देऊन स्वीकारली नाही. अंतर्गत लेखापरीक्षक ओझा यांनी टिप्पणीवर नवीन निविदा मागविण्याचे सूचित केले. यामुळे खान्देश बिल्डर्सचे व्यवस्थापकीय संचालक जगन्नाथ वाणी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यामुळे ते बेकायदेशीर असल्याची साक्ष नोंदविण्यात आली. तर या खटल्याचे कामकाज आता २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

या प्रकारावर आरोपींच्या वकीलांनी हरकत घेत सांगितले की, ज्यावेळी निविदा प्रक्रिया व टिपणी तयार करण्यात आली, तेव्हा या गुन्ह्यातील फिर्यादी डॉ. गेडाम हे नगरपालिकेत कार्यरत नव्हते. मग त्यांनी स्वाक्षऱ्या नेमक्या ओळखल्याच कशा? ही हरकत नोंदविण्यात आली. तसेच मंगळवारी या खटल्याचे कामकाज सुरू असताना कोर्टात एकही आरोपी उपस्थित न राहता ते कोर्टाच्या आवारात फिरत असल्याची तक्रार सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. कदम यांच्याजवळ केली होती. त्यामुळे बुधवारी सकाळी साडेअकरा ते साडेपाचपर्यंत कामकाज सुरू असताना आरोपी कोर्टातच बसले. दुपारी २ ते ३ वाजेपर्यंत जेवणाच्या सुटीच्या वेळी कोर्टाच्या परिसरात त्यांना राहता आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठ्यासाठी ‘संजीवनी’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या थकीत वीज बिलासाठी 'पेयजल पाणीपुरवठा संजीवनी' योजना कार्यान्वित करण्यात येणार असून, त्यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

धुळे शहरातील वीज वितरण संदर्भातील विविध कामांची आढावा बैठक ऊर्जा मंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झाली. धुळ्याच्या महापौर जयश्री आहेरराव, आमदार अनिल गोटे, महावितरणचे कार्यकारी संचालक ताकसांडे, संचालक (प्रकल्प) प्रभाकर शिंदे, अधीक्षक अभियंता पडाळकर, वाणिज्य अभियंता खंडाईत आदी उपस्थित होते.

धुळे शहरातील महावितरणच्या विविध कामांचा आढावा घेऊन बावनकुळे म्हणाले की, पेयजल पाणीपुरवठा संजीवनी योजनेअंतर्गत महानगरपालिकेच्या थकीत वीज बिलातील ५० टक्के वीज बिल टप्प्याटप्याने भरण्याची सवलत देण्यात येईल. मूळ थकबाकी रकमेच्या उर्वरित ५० टक्के रक्कम आणि व्याज व दंडाच्या ५० टक्के रक्कम महावितरणला शासनाकडून अनुदान स्वरुपात दिली जाईल. महावितरण कंपनीकडून ५० टक्के व्याज व दंडाची रक्कम माफ करण्यात येणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव महापालिकेने पाठविल्यास त्यावर तातडीने निर्णय घेण्यात येईल, असेही बावनकुळे यांनी सांगितले. धुळे शहरात अधीक्षक अभियंता कार्यालयाची स्वतंत्र इमारत स्थापन करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. तसेच वीज चोरीचे प्रमाण कमी होण्यासाठी लघु व उच्च दाबाच्या वीज वाहिन्या भूमिगत करण्यात येणार असून, रस्त्यात अडथळा आणणारे वीजखांब, विद्युत वाहिन्याही सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात थंडीचा जोर वाढला

$
0
0

म टा वृत्तसेवा, धुळे

गेल्या काही दिवासांपासून धुळे शहर व परिसरात थंडीच्या प्रमाणात वाढ होवू लागली आहे. मध्यरात्रीच्या वेळी तापमानाचा पारा खाली येऊन पहाटे थंडीची हुडहूडी जाणवत आहे. गेल्या दोन दिवसात तापमानाचा पारा किमान १९ अंशांपर्यत खाली येत आहे. यामुळे थंडीच्या प्रमाणात हळूहळू वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनाही उन्हाळ्याच्या झळांपासून यामुळे दिलासा मिळाला आहे.

अशा वातावरणात धुळेकर पहाटे व सायंकाळी जिल्हा क्रिडा संकूलाच्या मैदानावर पायी फिरायला यायला सुरवात झाली आहे. तर तरूणमंडळी नेहमीप्रमाणे व्यायाम व खेळाच्या सरावासाठी येताना दिसत आहेत. शहरात थंडीचे प्रमाण वाढल्याने नागरिकांनी दैनंदिन कामाला सुरवात करण्यापूर्वी थंडीपासून संरक्षणासाठी स्वेटर, कानपट्टी यांचा वापर सुरू केला आहे.

सध्याच्या परिस्थितीत रात्री थंडी असली तरी दिवसा मात्र सकाळी 9 वाजेनंतर वातावरणात तीव्र उन्हाचे चटके जाणवत आहेत. दिवसाचे तापमान साधारण ३५ अंशांपर्यंत असते. हेच तापमान रात्री १९ अंशांपर्यंत खाली येते. यामुळे दिवसा उन्हाचे चटके आणि रात्री थंडी असा अनूभव धुळ्याचे नागरिक घेत आहेत. दिवाळीनंतर हळूहळू थंडी वाढत असते. याची चाहूल लागायला सुरवात झाली आहे. यामुळे रात्री घराबाहेर पडतांना थंडीपासून बचावाच्या उपाययोजना करतांना नागरिक दिसत आहेत. येत्या काही दिवसात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

दररोज सकाळी उठून व्यायाम करावा आणि पायी फिरल्यास शरीर सदृढ राहते. यासोबत स्विमिंग केल्यास संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. प्रत्येकाने सकाळी व रात्री जेवणानंतर पायी फिरावे आरोग्यास चांगले असते. - किरण कांबळे, नागरिक

पायी फिरण्यासाठी हिवाळ्यातच यावे असे नाही तर दररोज सकाळी पायी फिरायला आल्यास शरीराचा व्यायाम होतो. आपल्याला सकाळी शुद्ध हवा श्वसनासाठी मिळते. यावेळी व्यायाम अथवा योगादेखील करावा ज्याने चांगले आरोग्य राहते. - मोहन पवार, वृंदावन कॉलनी, वलवाडी परिसर

मला लहानपणापासून निरनिराळ्या खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेण्याची सवय आहे. त्यामुळे व्यायामाची सवय आहेच. या थंडीच्या दिवसांमध्ये रोज सकाळी फिरायला हवे. यामुळे उत्तम आरोग्य लाभते. आणि आपले शरीर सदृढ राहते. - हेमंत माळी, खेळाडू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थंडीच्या चाहुलीने अंड्याचे वाढले दर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरात गेल्या आठ दिवसापूर्वी थंडीचा तडाखा सुरू झाला आहे. हळुहळु वातावरणात बदल होत आहे. सकाळी उन्हाचे चटके व रात्री थंडी असा अनुभव धुळे शहरवासियांना येत आहे. मात्र यंदाही हिवाळा सुरू झाल्यानंतर नागरिकांनी अंडे खाण्यास पसंती दिली आहे. त्यामुळे सध्या दररोज किमान सहा हजार अंडे विक्री होत असल्याचे अंडे विक्रेत्यांनी 'मटा' शी बोलताना दिली आहे.

या वाढलेल्या थंडीमुळे शहरात अंडे प्रतिडझन ५० रूपये झाले आहेत. हे दर गेल्या दहा दिवसांपूर्वी ४५ रूपये प्रतिडझन एवढे होते. तर अचानक या वाढलेल्या थंडीमुळे अंड्याच्या दरात वाढ झाली आहे. कारण थंडीच्या दिवसात अंडी खाल्याने शरीरात उष्णता निर्माण होवून शरीराला पोषक आहार मिळतो. थंडीच्या दिवसात हिरव्या पालेभाज्यांमध्ये मेथीच्या भाजीसह अंडींची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. प्रत्येकजण दररोज आहारात हे पदार्थ आवर्जुन घेतात. सध्या मेथीची भाजी पाच ते दहा रूपयाला एक जुडी मिळत आहे. तर शहरातील होलसेल अंडी विक्रेते दररोज २ ते ४ हजारांपर्यंत अंडी विक्री करत आहेत. तरी गेल्या वर्षापेक्षा यंदा व्यवसाय तेजीत नाही, असे अंडी विक्रेत्याचे म्हणणे आहे.

गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तीनशे रुपये शेकडा व ४५ रूपये प्रतिडझन दराने विक्री होणारे अंडी सध्याच्या स्थितीत चारशे रुपये प्रतिशेकडा व ५० रुपये प्रतिडझनने विक्री होत आहेत. यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने अंडी व्यवसायावर त्याचा परिणाम दिसून येत आहे, असेही अंडी विक्रेत्यांनी माहिती देतांना सांगितले.

जिल्ह्याबाहेरही विक्री

धुळे शहरात तालुक्यातील देवभाने, मेहेरगाव, मुकटी व नवापूर येथील पोल्टीफार्म मधून अंडी विक्रीसाठी येतात. विशेष म्हणजे धुळे तालुक्यातून नाशिक व जळगाव जिल्ह्यातही अंडी विक्रीसाठी जात आहेत. कारण त्याठिकाणी पोल्टीफार्म कमी आहेत. यामुळे शेकडो अंडी दररोज जिल्ह्याबाहेर विक्रीसाठी जात आहेत. मात्र धुळे शहरातील हॉटेल व किराणा व्यावसायिक तालुक्यातून ४ ते ६ हजार अंडी विक्रीसाठी नेत असल्याची माहिती अंडी होलसेल विक्रेते वराडे यांनी दिली.

धुळे तालुका व नवापूर शहरातून दररोज एकूण दोन लाखांच्या जवळपास अंडी विक्रीसाठी येत आहेत. तर त्यातून काही अंडी ही जळगाव व नाशिक जिल्ह्यात विक्रीसाठी पाठविण्यात येतात. यामुळे अंडी व्यवसाय तेजीत आहे असे नाही. यंदा संथ गतीने व्यवसाय सुरू असून ग्राहकांचा प्रतिसाद बरा आहे. - अशोक वराडे, अंडीविक्रेता, धुळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एचआयव्हीतून सावरतोय धुळे जिल्हा

$
0
0

पंकज काकुळीद, धुळे

देशात एचआयव्ही एड्स संसर्गित लोक साधारणपणे २५ लाखांपेक्षा अधिक आहे. त्यात सर्वात जास्त प्रमाण स्त्रियांचे आहे. देशात दर शंभर एचआयव्ही संसर्गित लोकांमध्ये ६१ पुरूष आणि ३९ महिला असतात. या आकड्यानुसार पुरूषांमध्ये संसर्गाची संख्या जास्त आहे. याच अनुषंगाने धुळे जिल्हा एचआयव्हीच्या जंजाळातून सावरतोय असे गेल्या दहा वर्षांच्या एचआयव्ही रूग्णांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. आकडेवारीनुसार जिल्ह्यातील एचआयव्हीच्या रूग्णसंख्येत आशादायक घट झाली आहे. धुळे जिल्ह्यात सन २००२ ते ऑक्टोंबर २०१५ अखेर एचआयव्हीची लागण झालेल्या रूग्णांच्या संख्येत घट होत आहे, अशी माहिती जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रक अधिकारी शीतल पाटील यांनी 'मटा'शी बोलतांना दिली.

सध्या जिल्हा नियंत्रण कार्यालयाच्या माध्यमातून जिल्ह्यात ११ एड्स प्रतिबंधक व नियंत्रण केंद्र आहेत. या केंद्रामध्ये जानेवारी ते ऑक्टोबर २०१५ अखेर ४७ हजार ८२५ गरोदर स्त्रियांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली आहे. त्यात १८ महिलांना याची लागण झाली आहे. तर सर्वसाधारण रूग्णांमध्ये ४२ हजार ४१२ रूग्णांच्या तपासणीत ४४१ जण एचआयव्ही बाधित झाल्याचे वैद्यकिय अहवालानुसार माहिती मिळाली आहे.

जिल्ह्यात सर्वोपचार रूग्णालयातंर्गत ठिकठिकाणी अकरा एचआयव्ही नियंत्रण तपासणी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. त्यात १५ समुपदेशक एचआयव्ही तपासणीसाठी येणाऱ्या रूग्णांना याबाबत सविस्तर माहिती देतात. त्याचबरोबर याविषयी कोणत्या उपाय व दक्षता घ्याव्यात याचेही मार्गदर्शन करतात. यामुळेच गेल्या दहावर्षांपूर्वीपेक्षा आता लोकांमध्ये एचआयव्हीविषयी जागरूकता झाल्याने रूग्णांच्या आकडेवारीत घट झाली आहे. ही केंद्रे जिल्ह्यासह मालेगाव, जळगाव, नंदुरबार, नाशिक व इतर ठिकाणाहून रूग्ण उपचारासाठी दाखल होतात.

या केंद्रात आता ६१५ बाधित रूग्णांवर औषधोपचार नियमित सुरू आहेत. तर जिल्हा एड्स नियंत्रक केंद्र कार्यालयामार्फत जिल्हाभरातील ११ केंद्रावर ४४१ रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा एड्स नियंत्रक कार्यालयाने दिली आहे. एचआयव्ही बाधिताला अगोदर दूर ठेवले जाई मात्र आता यावर औषधे येऊ लागल्याने रूग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारनेही एचआयव्हीवर आता प्राथमिक उपाय म्हणून औषधे बाजारात आणली आहेत. मात्र या रोगावरील औषधींनी रूग्ण कायमस्वरूपी बरा होत नाही तर त्याचे आयुष्य वाढते. यासोबतच यासाठी शासनाने जनजागृती व पथनाट्याद्वारे या आजाराची माहिती प्रत्येक नागरिकांपर्यत पोहोचविली आहे.

प्रतिबंधात्मक उपाय

> रूग्णाने नियमित वैद्यकीय सल्ल्यानुसार औषधोपचार व खबरदारी घ्यावी > प्रत्येकाने एकाच साथीदाराशी एकनिष्ठ राहावे > सुरक्षिततेसाठी कंडोमचा नियमित वापर करावा > गदोदर स्त्रियांनी एड्सची तपासणी करावी > एकदाच वापरात येणाऱ्या सुईचा वापर करावा > सरकारी रक्तपेढीतीलच रक्त वापरावे

एचआयव्ही म्हणजे काय?

हा आजार म्हणजे एचआयव्ही हा एक विषाणू आहे. जेव्हा हा मानवी शरीरात आढळतो तेव्हा त्यावेळी एचआयव्ही रोगाची बाधा झाल्याचे स्पष्ट होते. हा विषाणू आपल्या शरीरातील सीडी-४ पेशींना दुर्बल बनवितो. त्याचे प्रमाण कमी करतो. तेव्हा शरीराची आजाराविरूध्द लढण्याची क्षमता कमी होत जाते व त्यामुळे शरीर कमकूवत बनते. त्यालाच एड्स असे म्हणतात.

एड्सविषयी गेल्या काही वर्षांपूर्वी माहिती नव्हती. मात्र आता ठिकठिकाणी एचआयव्ही नियंत्रक केंद्र झाल्याने रूग्णांना एड्सविषयी माहिती देऊन त्यांच्या मनातून भीती काढता येते. - बाबाजी पाटील, एचआयव्ही, समुपदेशक, धुळे

एड्स रूग्णांसाठी जिल्ह्यात एकूण ११ ठिकाणी नियंत्रक केंद्रे स्थापन करण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्रावर औषधी, तसेच अडचणी समजून घेवून त्या सोडविण्यात येतात. यामुळेच रूग्णांच्या संख्येत घट झाली आहे. आता नागरिक सुज्ञ झाल्यानेच ही घट होत आहे. - शितल पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, धुळे

जिल्हा सर्वोपचार रूग्णालयात धुळे, जळगाव, नंदुरबार, मालेगाव, नाशिक या ठिकाणाहून एड्स रूग्ण उपचारासाठी येतात. त्यांना योग्यप्रकारे मार्गदर्शन व उपचार केले जातात. गेल्या काही वर्षांपेक्षा आता बाधितांची संख्याही कमी होत आहे. - अभिषेक पाटील, एचआयव्ही वैद्यकीय अधिकारी, धुळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक हरवले, कामे रखडली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील वॉर्ड क्रमांक २६ मध्ये दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे दीपक शेलार हे निवडून आलेत. परंतु त्यांनी उमेदवारीच्यावेळी नागरिकांना दिलेले आश्वासन पाळले नाहीत. उलट आमचे नगरसेवक दीपक शेलार हे हरवले आहेत? असे वॉर्डातील नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. यामुळे वॉर्डातील विकासकामे रखडली आहेत, असे निवेदन येथील नागरिकांनी धुळे उपायुक्तांना दिले.

धुळ्यातील वॉर्ड क्र. २६ चे राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक शेलार हे गेल्या काही दिवसांपासून वॉर्डात दिसेनासे झाले आहेत. यावरून येथील नागरिकांकडून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून ते मीसिंग झाले आहेत. त्यांच्यामुळे वॉर्डातील विकासकामेही रखडली आहेत, असा आरोप करीत परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेत नुकतेच अनोखे आंदोलन केले. यावेळी वॉर्डातील नागरिकांनी आमचे नगरसेवक दीपक शेलार हरवले आहेत असे सांगून त्यामुळे विकासकामेही रखडली आहेत, अशा घोषणा दिल्यात. याबाबतचे निवेदन त्यांनी धुळे उपायुक्त एच. पी. कौठळकर यांना दिले. या आंदोलनामुळे धुळे महापालिकेमध्ये सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादीची गोची झाली आहे.

यावेळी नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपूर्वी मनपाच्या निवडणूकीत दीपक शेलार राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात होते. प्रचारादरम्यान प्रत्येक सभेत त्यांनी वाॅर्डाच्या विकासाचा मुद्दा हाती घेतला. तसेच परिसरातील मतदारांना विकासाचे आमिष दाखूवन निवडून आलेत. याबाबत वार्डातील प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी स्वत: पुढाकार घेईन असे आश्वासनही त्याच्याकडून देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात शेलार यांना निवडून दोन वर्ष झाले आहेत. परंतु वॉर्डात कुठल्याही विकासकामांची सुरुवात झालेली नाही असे निवेदनात म्हटले आहे. वॉर्डात लहान मुलांसाठी बगीचा, गटारी, पथदिवे यासह अन्य सुविधा देण्याचे कबूल करून‌ही विजयी झाल्यानंतर दोन वर्षाचा कालावधी उलटला तरी देखील विकास झालेला नाही. त्याचबरोबर नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासही नगरसेवक शेलार तयार नाहीत, असेही यात सांगितले आहे.

आजच्या स्थितीत वॉर्डात ठिकठिकाणी दुरवस्था झालेली आहे. पथदिव्यांची व्यवस्था नाही. डेंग्यूची साथ पसरत असल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. अशावेळी नगरसेवक वॉर्डात लक्ष घालत नाहीच शिवाय ते परिसरातही दिसून येत नाहीत. निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासने ही पूर्णपणे फोल ठरली आहेत. त्यामुळे वॉर्डातील नागरिकांनी आता मनपा प्रशासनाकडे नगरसेवकांविरूध्द निवेदन दिले आहे. त्यांचा नगरसेवक हरविल्याचा आरोपही त्यांनी यात केला आहे. निवेदन देतांना वॉर्डातील तुषार जैन, राहुल मराठे, स्वप्नील मासाळ, कल्पेश जगताप, मनोज शिंदे, भूषण चौधरी, आनंद शेलार राजेंद्र पाटील उपस्थित होते.



'आमचे नगरसेवक दिसले का?'

या आंदोलनावेळी वॉर्डातील नागरिकांनी व गाडगेबाबा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी मनपा आवारात नगरसेवक शेलार यांचे फोटो हातात धरून 'आमचे नगरसेवक कोठे दिसले का?' असा सवाल केला. त्यामुळे आवारातील उपस्थितांची या अनोख्या आंदोलनामुळे चांगलीच तारांबळ उडाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पांझरासाठी २५२ कोटी मंजूर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्य नदी संवर्धन योजनेतर्गंत पांझरा नदी सुशोभिकरणाच्या २५२ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला हिरवा कंदिल मिळाला आहे. या प्रस्तावाला नुकतीच पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मंजुरी दिल्याची माहिती शिवसेनेचे नगररसेवक तथा गटनेते संजय गुजराथी यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. याअंतर्गत पांझरा नदीवर नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक, उद्याने तसेच इतरही सोयी सुरू केल्या जाणार आहेत. यासाठी केंद्राकडून ९० तर महापालिकेकडून १० टक्के अनुदान दिले जाणार असल्याची माहितीही गुजराथी यांनी यावेळी दिली.


राज्य नदी संवर्धन योजनेतंर्गत धुळे महापालिकेतर्फे पांझरा नदी सुधारण्यासाठी निसर्ग कन्सलटन्सी यांच्यामार्फत हा सुशोभिकरणाचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. यामध्ये धुळे शहराची हद्दवाढ लक्षात घेवून एकूण २५२ कोटी ५७ लाख ७५ हजार २४३ रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. याबाबत महापालिकेने सतत पाठपुरावा केल्याने अखेर राज्य सरकारकडून याला मंजुरी मिळाली आहे.


अनुदानातील वाटा


यामध्ये मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावापैकी केंद्र शासनाकडून ९० टक्के अनुदान मिळणार आहे. तर १० टक्के वाटा हा धुळे मनपाला टाकावा लागणार आहे. या प्रस्तावातंर्गत पांझरा नदीचे १३ किलोमीटरपर्यंत सौंदर्य खुलविण्यात
येणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.


याठिकाणी पर्यावरणाच्या दृष्टीने घनकचरा व्यवस्थापनासाठी डंपींग ग्राऊंडवर कचऱ्याची प्रक्रिया करून गॅसनिर्मिती यंत्रणा प्रस्तावित आहे. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती गुजराथी यांनी दिली. यावेळी सेनेचे सहसंपर्क नेते रवींद्र मिर्लेकर जिल्हाप्रमुख हिलाल माळी, राजेंद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


या सोयी-सुविधा
नदीपात्रात दोन्ही बाजूस जॉगिंग ट्रॅक
दुतर्फा वृक्षलागवड
ट्रॅकवर आकर्षक एलइडी पथदिवे
मुलांसाठी खेळणी, बांबु हाऊस
एमपी थिएटर डॉल्बी सांऊडसह
सुसज्ज जीम गार्डन
खाद्य पदार्थांचे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रवीण गेडामांचा अर्ज बाद करा

$
0
0

घरकुल प्रकरणी आरोपींच्या वकीलांची मागणी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्हा विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. कदम यांच्यासमोर जळगाव मनपाचे तत्कालीन आयुक्त प्रवीण गेडाम यांची सरतपासणी संपली आहे. मात्र त्यांची उलटतपासणी व अन्य सर्व साक्षीदारांचे जवाब झाल्यानंतर नोंदविण्याची मागणी करणारा आरोपी पक्षाचा अर्ज धुळे विशेष न्यायालयाने फेटाळला़ होता. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

गेडाम यांच्या नुकसान भरपाईच्या अर्जावरही बुधवारी कामकाज झाले. त्यात आरोपींच्या वकीलांनी गेडाम यांचा अर्ज बाद करा अशी मागणी केली आहे. याबद्दल सरकार पक्षाचे म्हणणे ऐकून १७ मार्चला निर्णय होणार असल्याचे न्यायालयाकडून सांगण्यात आले. या प्रकरणात धुळ्याच्या न्यायालयात दहा लाखांची नुकसान भरपाई मागणारा अर्ज प्रवीण गेडाम यांनी केला होता. यावर बुधवारी आरोपी पक्षाच्यावतीने अॅड. जितेंद्र निळे, अॅड. संजिव वाणी, अॅड. प्रकाश पाटील, अॅड. पंकज पाटील यांच्यासह अन्य वकीलांनी आपला खुलासा सादर केला.

यात अॅड. निळे यांनी गेडाम हे विशेष न्यायालयाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला़. नाशिक महानगरपालिकेत गेडाम यांच्यासमवेत अनेक अधिकारी आहेत. असे असताना केवळ धुळ्यास आल्याने नाशिकच्या जनतेचे मोठे नुकसान झाले, असे म्हणून नुकसान भरपाई मागणे योग्य नाही़. त्यांनी चुकीच्या पद्धतीने दहा लाखांची मागणी करणे कायद्याला धरून नाही़. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद करावा, अशी मागणी वकीलांनी केली आहे. आता यावर सरकार पक्षाचे म्हणणे १७ मार्चला ऐकल्यानंतर निर्णय घेणार आहे.

सहा याचिकांवर ११ मार्चला निर्णय

दरम्यान उच्च न्यायालयात गेडाम यांची उलटतपासणी ही खटल्यातील सर्व साक्षीदारांच्या साक्षीनंतर घेण्याची मागणी करणारा अर्ज दाखल झाला आहे. यात सरकार पक्षाचे वकील प्रवीण चव्हाण यांनी ११ मार्चपर्यंत बाजू मांडण्याची मुदत मागितली़ आहे. यावर आरोपी पक्षाच्या वकीलांनी धुळ्याच्या न्यायालयात सरकार पक्ष उलटतपासणी घेण्यासाठी हरकत घेत आहे. अशा स्थितीत सरकार पक्षच उच्च न्यायालयात मुदत मागत आहे, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे. यावर न्यायालयाने सरकार पक्षाला मुदतीची माहिती द्यावी. तसेच उलटतपासणी घेण्यासंदर्भात कायद्याच्या चौकटीत राहुनच काम करण्याचे सांगितले आहे. ११ मार्च यादिवशी उलटतपासणीस आव्हान देणाऱ्या सहा याचिकांवर अंतिम निर्णय देण्यात येणार आहे. दरम्यान आरोपी पक्षाच्या वकीलांनी उच्च न्यायालयाच्या या आदेशाची माहिती बुधवारी धुळे न्यायालयात दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपाकडून दूषित पाणीपुरवठा

$
0
0

शिवसेनेची धुळे महापालिकेकडे तक्रार; आंदोलन छेडण्याचा इशारा

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरात गेल्या आठवड्याभरापासून दूषित व पिवळसर रंगाचा पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार शिवसेनेचे धुळे जिल्हाध्यक्ष हिलाल माळी यांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे. यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सद्यस्थितीला शहराच्या साठ टक्के भागात पाणीपुरवठा हा तापी नदीतून केला जातो. त्यासाठी बाभळे जलशुद्धीकरण केंद्रातून पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जातो.
या प्रकाराबाबत शिवसेनेकडे नागरिकांनी तक्रार केली होती. तरी मनपाने हा दूषित पाणीपुरवठा बंद करत चांगले पाणी द्यावे अन्यथा शिवसेनेकडून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. शहराला तापी पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र गेल्या आठवड्याभरापासून शहराला दूषित व पिवळसर पुरवठा करण्यात आला. त्यामुळे नागरिकांना पोटदुखी, मळमळणे, जुलाब आदीचा त्रास जाणवत होता. तसेच पाण्याचा दुर्गंधीयुक्त वास येत असल्याची तक्रार नागरिकांनी शिवसेनेकडे केली आहे. यावर सेनेचे जिल्हाप्रमुख माळी व पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त भोसले यांना निवेदनाद्वारे तो थांबविण्याचे सांगण्यात आले. यासोबतच शहरात ठिकठिकाणी पाणी गळती थांबवावी. तर काही ठिकाणी जास्त दाबाने पाणीपुरवठा करावा अशी मागणीही करण्यात आली आहे.


नकाणे तलावाच्या पाणीपातळीत घट

शहरातील चाळीस टक्के भागात शहरालगत असलेल्या नकाणे तलावातून केला जातो. या तलावाच्या पाण्याची पातळी सध्या खाली गेली असून सद्यस्थितीत या तलावात १३० एमसीएफटी पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा मे अखेरपर्यंत पुरेल, असा दावा मनपा पाणीपुरवठा विभागाने केला आहे. धुळे शहरात तापी योजना, नकाणे तलाव व हरणमाळ तलावातून पाणीपुरवठा होतो. त्यात नकाणे तलावात कमी जलसाठा शिल्लक आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीतून शहरासाठी पाणी उचलण्यात येत आहे. तर नकाणे तलावाच्या पाण्याच्या वापर बंद करण्यात केला आहे. त्यामुळे आणखी काही दिवस नकाण्यातील पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यास मदत होणार आहे. दुसऱ्या हरणमाळ तलावाची क्षमता ४५० एमसीएफटी आहे. परंतु या तलावात सध्या केवळ मृतपाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून नियोजन सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांचा संपणार वनवास

$
0
0

६९ कोटींची होणार कामे; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निविदा प्रसिद्ध

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी मनसेने शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण व खडीकरणासाठी सादर केलेल्या १९२ कोटींच्या ठरावाला प्रशासनाने चाल देण्यास सुरुवात केली आहे. रस्त्यांच्या डांबरीकरणापाठोपाठ आता शहरातील २१३ किलोमीटरच्या कॉलनीतील रस्त्यांच्या अस्तारीकरणाच्या कामाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. बांधकाम विभागाच्या वतीने बुधवारी ६९ कोटींच्या कामांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या.

महापालिका निवडणुकांचा पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने शहरात १९२ कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांचे प्रस्ताव मांडण्यात आले होते. निवडणुका असल्याने व जनतेसमोर विकासकामे घेवून जाणे आवश्यक असल्याने महासभेत त्याला मंजुरी देण्यात आली आहे. परंतु, तिजोरीत खळखळाट असल्याने रस्त्यांची कामे होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. परंतु, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच रस दाखविल्यानंतर प्रशासनाने आता या रस्त्यांच्या कामाला गती दिली आहे. यापूर्वी शहरातील ४९ किलोमीटरच्या रस्त्यांचे खडीकरण कामाच्या निविदा काढण्यात आल्या

आहेत. त्यासाठी १६ कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यापाठोपाठ शंभर किलोमीटर रस्त्यांचे खडीकरण व अस्तारीकरणसाठी ३० कोटींच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. एमआयडीसीतील रस्त्यांसाठीही सात कोटींच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत.

सर्वाधिक महत्वाचा प्रश्न होता तो कॉलनींमधील अंतर्गत रस्त्यांच्या अस्तारीकरण कामाचा. जवळपास २१३ किलोमीटरच्या कामासाठी ६९ कोटी रुपये खर्च होणार आहेत. विशेषतः शहरातील नव्याने विकसीत होणाऱ्या भागामंधील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामासाठी नगरसेवक आग्रही होते. प्रशासनाने अखेरीस या कामांना हिरवा कंदील दाखवला आहे. एप्रिल अखेरपर्यंत या रस्त्यांच्या कामाच्या प्रशासकीय आदेश दिले जाणार असून, तत्काळ कामांची सुरुवात केली आहे. त्यामुळे कॉलनी रस्त्यांचा वनवास संपणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थायीच्या नऊ सदस्यांची उद्या निवड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्थायी समितीच्या रिक्त नऊ जागांवर नवीन सदस्यांच्या निवडीसाठी उद्या (ता. ११) महासभा होत आहे. या महासभेत मनसेचे पाच, राष्ट्रवादीचे तीन आणि काँग्रेसचा एक अशा नऊ सदस्यांची निवड केली जाणार आहे. स्थायीवर जाण्यासाठी नगरसेवकांमध्ये चुरस आहे. महाआघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार सभापतीपद मनसेला मिळणार असल्याने या पक्षात जोमाने लॉबिंग सुरू आहे. दुसरीकडे शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या तणाव असल्याने त्याचा थेट फायदा मनसेला होण्याची शक्यता आहे.

स्थायी समितीत मनसेच्या पाच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन, तर काँग्रेसची एक जागा रिक्त आहे. मनसेतर्फे सभागृह नेते सलिम शेख, सुरेखा भोसले, यशवंत निकुळे, गणेश चव्हाण, अशोक सातभाई, अनिल मटाले, राहुल ढिकले आदि दिग्गज इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादीत विद्यमान सभापती शिवाजी चुंभळेंसह समाधान जाधव, रंजना पवार, उषा अहिरे इच्छुक आहेत. काँग्रेसतर्फे लक्ष्मण जायभावे यांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. मनसेत संभावित फाटाफूट लक्षात घेता, निष्ठावतांना संधी दिली जाणार आहे. त्यामुळे विद्यमान सदस्यांना पुन्हा संधी दिली जाणार आहे. सभापतीपदावर महाआघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार मनसेचा दावा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष असे नऊ सदस्यांचे बळ मनसेच्या पाठीशी राहणार असून, काँग्रेस सुद्धा मनसेलाच समर्थन देण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनसेचा सभापती होणे अटळ असले तरी या पक्षात सभापतीपदासाठी रस्सीखेच आहे. मनसेतर्फे सलिम शेख यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालमत्ता सर्वेक्षणासाठी अखेर निविदा प्रसिद्ध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मालमत्ता करातील दरवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळल्यानंतर प्रशासनाने आता मालमत्तांच्या सर्वेक्षणाला गती दिली आहे. सत्ताधाऱ्यांनी मालमत्ता करातील त्रुटी शोधण्याचे आदेश दिल्यानंतर पालिकेने शहरातील मालमत्ता सर्वेक्षणासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. हे सर्वेक्षण खाजगी कंपनीमार्फत केले जाणार असून त्यासाठी निविदा प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे.

इच्छुक कंपन्याना निविदा दाखल करण्यासाठी ३१ मार्चची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मालमत्तांच्या सर्वेक्षणातून पालिकेला मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. महापालिका हद्दीतल्या मालमत्ता सर्वेक्षणासाठी पालिकेन २००७ मध्ये हैद्राबादस्थित स्पेक सिस्टीम्स लिमिटेड ही कंपनी नियुक्त केली होती. मात्र, संबंधित कंपनीने त्रुटीचा फायदा घेत अर्धवट काम सोडले. वारंवार स्मरणपत्रे देऊनही कंपनीने सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले नसल्याने मनपाने अखेर न्यायालयात दावा दाखल केला आहे.त्यामुळे महापालिकेचे सर्वेक्षणाचे काम पुढे सरकलेच नाही. सद्यस्थितीत पालिकेच्या हद्दीत केवळ तीन लाख ९६ हजार मालमत्ता आहेत. मात्र, गेल्या आठ ते दहा वर्षात त्यात मोठी वाढ झाली आहे. अनेक रहिवाशी मालमत्तांचा वापर व्यावसायिक कारणासाठी केला जात आहेत. अनेकांना घरपट्टीच लागू केलेली नाही. अनेक ठिकाणी चुकीची मोजदाद करण्यात आल्याने पालिकेच्या उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे या वाढीव मालमत्तांकडून कर वसुली करून महसूल वाढविण्याची मागणी प्रशासनाकडून होत आहे. आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी नुकतेच स्थायी समिती मालमत्ता कर वाढविण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, महासभेने हा प्रस्ताव फेटाळत नवीन मालमत्तांचे सर्वेक्षण करून महसूल वाढविण्याचे आदेश दिले होते.

प्रशासनाने मिळकतींचे सर्वेक्षण करून उत्पन्न वाढविण्याच्या प्रयत्नांना सुरुवात केली आहे. बुधवारी महापालिकेने खाजगी कंपनीमार्फत सर्वेक्षणाचे काम करण्याची निविदा प्रसिद्ध केली आहे. कंपन्यांना निविदा भरण्यासाठी ३१ मार्चची मुदत देण्यात आली असून, २१ मार्चला निविदापूर्व बैठक होणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांना या निविदाप्रक्रियेत आमंत्रित करण्यात आले आहे.

मिळकतींत तिपटीने वाढ?

सद्यस्थितीत मनपाकडे तीन लाख ९६ हजार मिळकतींची नोद आहे.तर सन २००५ पासून सर्वेक्षण झालेले नाही. त्यामुळे गेल्या दहा वर्षात शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली असून, मोठा विस्तार झाला आहे. त्यामुळे या सर्वेक्षणात हा आकडा दुप्पट किंवा तिप्पटही होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी मिळकतींचा वापर योग्य पद्धतीने दाखविण्यात आलेला नाही. त्यामुळे व्यावसायिक वापराच्या मिळकतींची संख्या सुद्धा दुपटीपेक्षा अधिक वाढणार आहे. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात भरघोस वाढ होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images