Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नाशिककर वेठीस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मतांच्या लालसेपोटी नाशिकच्या हक्काचे पाणी भाजपने मराठवाड्याला पळविल्यानंतर पालिकेतील सत्ताधारी मनसेने उर्वरित पाण्याचे प्रभावीपणे नियोजन करून नाशिककरांना दिलासा देणे अपेक्षित होते. मात्र, दुर्दैवाने मनसेनेही भाजपच्या वाटेवर जात पाण्यावरुन राजकारण सुरू केले आहे. दोन्ही पक्षांच्या कुरघोडीत सामान्य नाशिककरांना वेठीस धरले जात आहे. महापालिकेमार्फत सगळ्यांना पाणी देण्याची जबाबदारी टाळून मनसेने शहरात मोफत पाणी टँकरसेवा सुरू केली आहे. दुसरीकडे ज्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आहेत, ते प्रशासनही भाजपच्या तालावर नाचत असल्याने शहराच्या पाणीपुरवठ्याचा पुरता खेळखंडोबा झाला आहे.

गेल्या चार महिन्यांपासून नाशिकच्या विकासाचा प्रश्न मागे पडला आहे. महापालिका ते गल्ली असे सर्वत्र पाण्याचीच चर्चा झडत आहे. धरणे उशाशी असल्याने मुबलक पाणी वापरण्याची सवय असलेल्या नाशिककरांवर भाजपने मराठवाड्यांच्या मतांपायी हंडाभर पाण्यासाठी दारोदार फिरण्याची वेळ आणली आहे. गंगापूर धरणाचे पाणी जायकवाडीला गेल्यानंतर नाशिककरांना पाण्याची चणचण जाणवत असून, जसजसा उन्हाळा तीव्र होत आहे, तशी पाण्याची दाहकता वाढत आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस तापत चालला आहे. शहराचा मुख्य भाग वगळता इतरत्र पाणीपुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाला आहे. अशा बिकट परिस्थितीत सत्ताधारी मनसेकडून नाशिककरांना पाणी नियोजनाच्या अपेक्षा होत्या. परंतु, शिल्लक पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याचे सोडून मनसेनेही भाजपच्या नादाला लागून पाण्याचे राजकारण सुरू केले आहे. त्यामुळे सत्ताधारी मनसे, भाजप आणि प्रशासनाच्या तिहेरी कात्रीत नाशिककर जनता भरडली जात आहे.

मनसेने शनिवारी मोफत पाणीसेवा सुरू केली. सात टँकरमार्फत मागेल त्याला पाणी देण्याची मोहीम सुरू करण्यात आली. परंतु, हीच तत्परता मनसेने प्रशासनामार्फत दाखवणे अपेक्षित असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. फसलेल्या प्रशासनाने पाण्याचे फेरनियोजन करण्यासाठी महापौरांचे उंबरठे झिजवण्याचे काम सुरू केले आहे. परंतु, त्यांच्या फेरनियोजनाला संमती दिली जात नसल्याचे चित्र आहे.

फेरनियोजनाची टोलवाटोलवी शनिवारी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम व महापौर अशोक मुर्तडक यांनी पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेवून विभागवार पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. यात बहुतेकांनी आठवड्यातून एक दिवस पाणीबंद ठेवण्यावर कल व्यक्त केला. परंतु, सत्ताधारी व प्रशासनाने इथेही निर्णय घेण्यासाठी एकमेकांकडे बोट दाखवले. या बैठकीत निर्णय घेऊन पुढील आठवड्यापासून त्याची अंमलबजावणी अपेक्षित होती. परंतु, निर्णय झालाच नाही. उलट आता तो गटनेत्यांच्या बैठकीत ठेवण्याचा निर्णय झाल्याचे महापौरांनी पत्रकारांना सांगितले.

सत्ताधाऱ्यांची हतबलता महापालिकेत सुरू असलेल्या पाण्याच्या खेळखंडोब्यावर विरोधकांनीही तीव्र टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर वचक नसल्याचा आरोप शिवसेना गटनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे. पाणी नियोजनासाठी ११ कोटी रुपयांचा विषय महासभेवर स्थगित असतांनाही, त्याच्या निविदा कशा निघाल्या असा सवाल केला आहे. सत्ताधाऱ्यांचे घेतलेले निर्णय प्रशासन राबवत नाही. त्यामुळे नाशिककरांची कोंडी होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

तांत्रिक अहवालावर निर्णय पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याचे सांगत, आयुक्त डॉ. गेडाम यांनी पाणी फेरनियोजनाचा निर्णय हा तांत्रिक अहवालानंतर घेतला जाणार असल्याचे सांगितले आहे. बहुसंख्य नागरिक व नगरसेवकांचा कल हा आठवड्यातून एक दिवस सरसकट पाणीबंद ठेवण्याचा आहे. परंतु, प्रशासकीय अडचणी असल्याचे सांगून दोन दिवसात निर्णय घेवू, असे सांगून वेळ मारून नेली जात आहे. त्यामुळे विभागवार पाणीकपातीतून प्रशासनाकडून नाशिककरांना दिलासा मिळत नसल्याचे चित्र आहे.

फेरनियोजनाची टोलवाटोलवी

शनिवारी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम व महापौर अशोक मुर्तडक यांनी पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेवून विभागवार पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. यात बहुतेकांनी आठवड्यातून एक दिवस पाणीबंद ठेवण्यावर कल व्यक्त केला. परंतु, सत्ताधारी व प्रशासनाने इथेही निर्णय घेण्यासाठी एकमेकांकडे बोट दाखवले. या बैठकीत निर्णय घेऊन पुढील आठवड्यापासून त्याची अंमलबजावणी अपेक्षित होती. परंतु, निर्णय झालाच नाही. उलट आता तो गटनेत्यांच्या बैठकीत ठेवण्याचा निर्णय झाल्याचे महापौरांनी पत्रकारांना सांगितले.

सत्ताधाऱ्यांची हतबलता

महापालिकेत सुरू असलेल्या पाण्याच्या खेळखंडोब्यावर विरोधकांनीही तीव्र टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर वचक नसल्याचा आरोप शिवसेना गटनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे. पाणी नियोजनासाठी ११ कोटी रुपयांचा विषय महासभेवर स्थगित असतांनाही, त्याच्या निविदा कशा निघाल्या असा सवाल केला आहे. सत्ताधाऱ्यांचे घेतलेले निर्णय प्रशासन राबवत नाही. त्यामुळे नाशिककरांची कोंडी होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

तांत्रिक अहवालावर निर्णय

पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याचे सांगत, आयुक्त डॉ. गेडाम यांनी पाणी फेरनियोजनाचा निर्णय हा तांत्रिक अहवालानंतर घेतला जाणार असल्याचे सांगितले आहे. बहुसंख्य नागरिक व नगरसेवकांचा कल हा आठवड्यातून एक दिवस सरसकट पाणीबंद ठेवण्याचा आहे. परंतु, प्रशासकीय अडचणी असल्याचे सांगून दोन दिवसात निर्णय घेवू, असे सांगून वेळ मारून नेली जात आहे. त्यामुळे विभागवार पाणीकपातीतून प्रशासनाकडून नाशिककरांना दिलासा मिळत नसल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​फुले मार्केटचा होणार मॉल

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक
जुन्या नाशकातील महात्मा ज्योतिबा फुले मार्केटचा पुनर्विकास करून त्या जागेवर आता बीओटी तत्वावर सुसज्ज वाहनतळासह चार मजली मॉल बांधण्याचा निर्णय महापालिकेतर्फे घेण्यात आला आहे. मॉलची इमारत हरित लवादाने सुचविलेल्या अटी शर्तींनुसार ग्रीन बिल्डिंग तंत्रज्ञानाचा वापर करत बनविण्यात येणार असून या परिसरातील बीफ, मटण मार्केट वडाळा गावात स्थलांतरीत करण्यात येणार आहे.
महात्मा फुले मार्केटचा पुनर्विकास करत या जागी सुसज्ज मॉल उभारण्याचा प्रस्ताव नगरसेवक सुफी जीन व समिना मेमन यांनी महापालिकेला सादर केला होता. हा प्रस्ताव मंजूर करत महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी शहर अभियंता व अन्य अधिकाऱ्यांसमवेत या भागाची पाहणी केली. लवकरच या संदर्भातील डॉकेट सादर करुन महसभेची या प्रकल्पासाठी मंजुरी घेतली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या मॉलमध्ये एक लाख ७२ हजार स्क्वेअर फुटांचे बांधकाम होणार आहे. बेसमेंटमध्ये दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळ तसेच ५५० स्टॉल्स असणार आहेत.
या मॉलच्या बांधकामासाठी फुले मार्केट परिसरातील बीफ, मटण कत्तलखाना वडाळा गावात हलविण्याचे ठरले आहे. याबरोबर बोकडांचा कत्तलखानाही हलविण्यात येणार आहे. मटण मार्केटमध्ये फक्त मटण विक्रीची मुभा असेल, असे आयुक्त गेडाम यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेला हा प्रकल्प पूर्णत्वास येणाच्या मार्ग सोपा झाला आहे.
याचसोबत सारडा सर्कल परिसरात स्कायवॉक उभारण्याबाबतही यावेळी माहिती देण्यात आली. नॅशनल उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी हा स्कायवॉक बनविला जाणार आहे. यासाठी निधी देणार असल्याचे प्रभाग क्रमांक ३६ चे नगरसेवक सुफी जीन व नगरसेविका समिना मेमन यांनी या भेटीदरम्यान जाहीर केले.


या मिळणार सुविधा

१ सारडा सर्कलजवळ होणार स्कायवॉक
२ मॉलसंबंधिचे डॉकेट महासभे‌त होणार सादर
३ १ लाख ७२ हजार स्क्वेअर फुटांचे होणार बांधकाम
४ मॉलमध्ये होणार ५५० स्टॉल्स उपलब्ध
५ दुचाकी व चारचाकी धारकांसाठी स्वतंत्र वाहनतळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डासांंचे अड्डे उध्वस्त होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड
नाशिकरोड व जेलरोड परिसरात डासांनी सध्या उच्छाद मांडला आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये नुकतीच याबाबत बातमी प्रसिद्ध झाली होती. तिची दखल घेऊन महापालिकेमार्फत नदीतील पाणवेली काढणार असल्याची माहिती नगरसेवक शैलेश ढगे यांनी दिली.
नासर्डी नदीपासून टाकळी गोदावरी संगमापर्यंत तसेच या संगमापासून दसकच्या संत जनार्दनस्वामी पुलापर्यंतच्या पाणवेली काढल्या जाणार आहेत. जेलरोड, टाकळी येथील नदीपात्रात पाणवेली प्रचंड वाढल्या आहेत. त्यात डासांची प्रचंड पैदास झाल्याची माहिती विभागीय स्वच्छता अधिकारी संजय दराडे यांनी दिली.
नगरसेवक शैलेश ढगे, राहुल दिवे, बांधकाम उपअभियंता निलेश साळी, शाखा अभियंता विशाल गरुड यांनी नुकतीच दसक, पंचक, नांदूर येथील गोदापात्राची पाहणी केली. नदीत पाणी सांडपाणी साचलेले असून पाणवेलीही फोफावल्याचे यावेळी लक्षात आले. या दोन्ही कारणांमुळे डासांची पैदास वाढली आहेत. त्यामुळे प्रत्येक कॉलनीत धुराळणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैलावाहिनी पुन्हा नादुरुस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प
देवळाली कॅम्पवासीयांच्या आवश्यक सेवेसाठी असणारी व्हॅक्युम एम्प्टीयर व्हॅन (मैलावाहिनी) गेल्या महिन्याभरापासून पुन्हा नादुरुस्त झाली आहे. वर्षभरात ही व्हॅन अनेकदा खराब झाल्याने नागरिकांकडून नवीन व्हॅक्युम एम्प्टीयर व्हॅनची मागणी होत आहे.
देवळालीच्या कॅन्टॉन्मेन्ट प्रशासनाच्या वतीने देवळालीच्या विविध भागात निर्माण होणारा मैला वाहून नेण्यासाठी आवश्यक सेवा म्हणून व्हॅक्युम एम्प्टीयर व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्यापासून ही व्हॅन नादुरुस्त असून नागरिक सातत्याने या वाहनाची मागणी करत आहेत. परंतु प्रशासन मात्र ही बाब गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे.
नागरिकांच्या घराजवळ असलेल्या टाक्यांच्या आजूबाजूस मोठ्या प्रमाणात घाण पाण्याचे साम्राज्य पसरले आहे. काही दिवसांपूर्वी याबाबत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता नवीन असणारी व्हॅक्युम एम्प्टीयर व्हॅन खरेदी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. नवीन व्हॅन तर लांबच पण उपलब्ध असलेली व्हॅनही पुन्हा नादुरुस्त झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.गेल्या वर्षभरात अनेकदा ही असणारी व्हॅक्युम एम्प्टीयर व्हॅन बिघडली आहे. प्रशासनाने नको तिकडे होत असलेला खर्च कमी करीत नवीन व्हॅन
खरेदी करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​‘सातपूरचा श्वास मोकळा करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर
महापालिकेने सातपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मंडईची उभारणी केली आहे. या मंडईच्या बाहेर व रस्त्यावर असलेल्या अतिक्रमणांमुळे सातपूरचा श्वास कोंडला गेला आहे. या अतिक्रमणाची व्यवस्था लावत सातपूरचा श्वास मोकळा करा, अशी मागणी फेरीवाला झोनच्या बैठकीत ग्रामस्थांनी केली.
राष्ट्रीय फेरीवाल झोनची कठोर अंबलबजावणी करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. यासाठी महापालिकेच्या सातपूरच्या विभागीय कार्यालयात फेरीवाला झोनबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भाजी विक्रेत्या महिलांनी आपल्यावर अन्याय होत असल्याचे सांगत कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला होता. सातपूरच्या प्रवेशापासून रस्ते अतिक्रणांनी वेढले आहेत, मंडई असताना रस्त्यांवर भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे, अशा अनेक समस्या यावेळी मांडण्यात आल्या.
महापालिकेचा लाखो रुपयांचा कर भरणाऱ्या मार्केटमधील व्यापाऱ्यांवर उपासमारीचे वेळ आल्याचे भाजी विक्रेते मोराडे यांनी सांगितले. मंडईच्या पार्किंगमध्येही अतिक्रमणे असल्याची माहिती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शंकर पाटील यांनी दिली. या सर्वांची माहिती समजावून घेत ती आयुक्तांकडे सादर करणार असल्याचे उपायुक्त गोतीसे यांनी सांगितले. तसेच राष्ट्रीय फेरीवाला झोनमध्ये नोंदणी करण्याचे आवाहन विभागीय अधिकारी केरुरे यांनी केली. बैठकीला फेरीवाला झोनचे पदाधिकारी, सातपूरचे ग्रामस्थ, रस्त्यावर बसणारे भाजी विक्रेत्यांचे प्रतिनिधी, सभापती उषा शेळके, नगरसेविका नंदिनी जाधव, उपायुक्त दत्तात्रय गोतीसे, विभागीय अधिकारी चेतना केरुरे उपस्थित होते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याचा मालेगावात पाच तास थरार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील भायगाव शिवारातील जाजुवाडी परिसरात रविवारी सकाळी बिबट्या आढळून आल्याने एकाच खळबळ उडाली. या भागातील महादेव मंदिरासमोरील घराच्या जिन्याखाली हा बिबट्या लपून बसला होता. वनविभागाने तब्बल पाच तास शर्थीचे प्रयत्न करून बिबट्याला जेरबंद केले.
सकाळी ९ च्या सुमारास जाजुवाडी परिसरातील प्रा. मोरसकर यांना त्यांच्या बंगल्याच्या जिन्याखाली बिबट्या दिसला. त्यांनी लागलीच परिसरातील नागरिकांना याबाबत कळविले. ही बातमी शहरभर पसरल्याने बघ्यांची प्रचंड गर्दी झाली. मात्र बराच वेळ हा बिबट्या त्याच जागी बसून होता. मालेगाव वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती कळव‌िण्यात आली. तत्पूर्वी मालेगावचे प्रांत अजय मोरे, तहसीलदार सुरेश कोळी तसेच वडनेर खाकुर्डी पोल‌िस स्थानकाचे निरीक्षक बोरसे आदींसह मोठा पोल‌िस बंदोबस्त या भागात तैनात करण्यात आला होता. बिबट्याकडून इजा होवू नये म्हणून या परिसरात कोणालाही येऊ दिले जात नव्हते. मोठा गोगाट असूनही बिबट्या जागीच पडून होता. बिबट्या पकडण्यासाठीची सामग्री आणि प्रशिक्षित अधिकारी कर्मचारी मालेगावी नसल्याने नाशिक येथील विशेष पथक बोलावण्यात आले. नाशिक येथील उपविभागीय वन अधिकारी वाडेकर आणि त्यांचे पिंजरा व बंदुकधारी पथक दुपारी एकच्या सुमारास येथे पोहचले. तोपर्यंत बिबट्या जिन्याच्या खालीच बसून असल्याने त्याला बेशुद्ध करण्यासाठी त्यावर शूट करण्यात अडचण निर्माण झाली. त्यामुळे बाजूच्या घरातून त्यावर शूट करण्यात आले. त्यानंतर अर्ध्यातासाने बिबट्याला बाहेर काढून पिंजराबंद करण्यात आले. नाशिक येथील पांडव लेणी नजीक असलेल्या उद्यानात या बिबट्याला नेल्यात आले आहे. मालेगाव हे भविष्यातील जिल्ह्याचे ठिकाण असून येथे वनविभागाचे उपविभागीय कार्यालय आहे. त्याअंतर्गत ५ राखीव वन क्षेत्र येतात. मात्र अस असूनही बिबट्या सारख्या हिंस्त्र प्राण्यांना पकडण्यासाठी येथील वनविभागाकडे प्रशिक्षित अधिकारी, कर्मचारी तसेच उपयोगी साहित्य नसल्याचे रविवारी उघड झाले. नाशिक येथून वेळीच बिबट्या पकडणारे पथक आल्याने पुढील अनर्थ टळला.

२१ वर्षांपूर्वी आला होता बिबट्या वन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार तालुक्यातील मोसम काटवन भागात जंगल असून पाण्याचा तुटवडा असल्याने हा बिबट्या शिकार व पाण्याच्या शोधात मानवी वस्तीत शिरला असावा. मात्र या आधी सुमारे १९९४-९५ सालीही बिबट्या मालेगावी आढळून आला होता.



..तर काय झाले असते तब्बल पाच तसा बिबट्या एकाच जागी बसून असल्याने प्रशासनाला नाशिक हून पथक बोल‌ाविण्यास वेळ मिळाला. या वेळात जर बिबट्या बाहेर पडला असता किंवा त्याने आजूबाजूला असलेल्या जमावावर हल्ला केला असता, तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती, अशी चर्चा दिवसभर नागरिकांमध्ये सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ पंचनाम्यांमध्ये चालढकल नको’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात सुरू असलेला बेमोसमी पाऊस व गारपीटीने शेतमालाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल आणि कृषी विभागाने दिरंगाई न करता युद्धपातळीवर सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी तसेच कृषीपंपांचे कनेक्शन तोडू नये, अशी मागणी कळवण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. याबाबत कळवणचे तहसीलदार अनिल पुरे यांनस निवेदन दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण हिरे, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देवरे, जिल्हा बँक संचालक धनंजय पवार, कळवण नगरपंचायत गटनेते कौतिक पगार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने तहसीलदार अनिल पुरे यांना निवेदन दिले. महसूल व कृषी विभागाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा व सरसकट पंचनामे करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.

पंचनामे करण्यात दिरंगाई होऊ नये व सरसकट सर्व नुकसानीचे पंचनामे करावेत, जणेकरून शेतकऱ्याला मदतीचा हात मिळेल. अन्यथा शेतकऱ्याचे भवितव्य अंधकारमय होईल असेही निवेदनात नमूद केले आहे.

शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची बिले न भरल्याने त्यांची जोडणी पुढ‌ील पीक येईपर्यंत वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तोडू नये असे आदेश सरकारने द्यावेत अशी मागणी ही यावेळी करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी फक्त नुकसानीचे अहवाल मागविण्याचे आदेश देऊन भागणार नाही तर जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनी तातडीने नुकसानीची प्रत्यक्ष पहाणी करून सरकारला वास्तववादी अहवाल द्यावा. तसेच नुकसान भरपाई मिळून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी मागणीही केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, जिल्हा उपाध्यक्ष नारायण हिरे, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देवरे, जिल्हा बँक संचालक धनंजय पवार, कळवण नगरपंचायत गटनेते कौतिक पगार, विधानसभा अध्यक्ष राजेंद्र पवार, आदी उपस्थित होते.

सरकारी मदत द्या

कळवण तालुक्यातील मानूर येथे मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या शीतल अशोक हळदे हिच्या कुटूंबियांना शासनस्तरावरून आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने तहसीलदार अनिल पुरे यांच्याकडे केली. अर्जुनसागर प्रकल्पात मासे पकडत असताना वीज पडून जखमी झालेल्या गंगापूरच्या ३ युवकांनाही मदत मिळवून देण्याची विनंती केली आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२० दिवसात १०९ कोटी खर्चणार कसे?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक वर्ष समारोपाकडे जात असूनही विविध विभागांकडून अद्याप तब्बल १०९ कोटींचा निधी खर्च होऊ शकलेला नाही. गेल्या अकरा महिन्यांत मंजूर निधीच्या ६५ टक्के निधी खर्च करणे प्रशासनाला शक्य झाले आहे. २० दिवसांत ३५ टक्के निधी प्रशासन कसा खर्च करणार, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

‍जिल्हा नियोजन व विकास विभागाने मंजूर केलेल्या परंतु अद्याप खर्च न होऊ शकलेल्या निधीबाबत जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह यांनी नुकताच आढावा घेतला. डीपीडीसीच्या सर्वसाधारण योजनेंतर्गत मंजूर ३३६ कोटींपैकी अवघा २२७ कोटींचा निधी खर्च होऊ शकला आहे. ३१ मार्चपर्यंत १०९ कोटींचा निधी खर्च करण्याचे आव्हान प्रशासनाला पेलावे लागणार आहे. त्यातही चार रविवार, दुसरा व चौथा शनिवार या सुट्या असून महाशिवरात्री, होळी, गुडफ्रायडे, रंगपंचमी, धुलीवंदनासारख्या सणांचा हा काळ आहे. त्यामुळे हे काही दिवस काम होऊ शकले नाहीत. तर प्रशासनाच्या हातात केवळ २० दिवसांचा कालावधी उरणार आहे. त्यामध्ये हा ३५ टक्के निधी खर्च होऊ शकलेला नाही तर तो सरकारकडे परत जाण्याची नामुष्की ओढावू शकते. तसे झाल्यास पुढील आर्थिक वर्षात सरकारकडून जिल्ह्याला मिळणार असलेला निधीही कमी होणार असल्याने प्रशासनाची धांदल उडाली आहे.

सरकारी अधिकाऱ्यांची अकार्यक्षमता व उदासिनतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी ताशेरे ओढल्याने सद्यस्थितीत सर्वच विभागांकडून विविध योजना मार्गी लावण्यासाठी धावपळ सुरू आहे. अपेक्षित प्रमाणात निधी खर्च न झाल्याबद्दल कुशवाह यांनी बहुतांश विभागांच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. हा निधी आता कसा खर्च करणार याबाबत विचारणा करण्यात आली.

६९ कोटी जलयुक्तसाठी सवर्साधारण योजनांसाठी ३३६ कोटींच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी ६९ कोटी जलयुक्त शिवार कामांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. ३३६ पैकी २४८ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून २२७ कोटींचा खर्च झाला आहे. अनुसूचित जाती उपयायोजनांमध्ये ८१ कोटींच्या आराखड्यापैकी ४९ कोटी (६० टक्के) निधी खर्च झाला आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२९ गावांसह १९ वाड्यांची तहान भागतेय टँकरवर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

दुष्काळातील दाहकतेच्या मोठ्या झळा सोसतांना निर्माण झालेल्या भीषणटंचाईला सामोरे जातांना येवला तालुक्यातील गावोगावच्या जनतेचे हाल होत आहेत. मार्चच्या प्रारंभीच तालुक्यातील तब्बल २९ गावांसह १९ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असून इतर गावांमधूनही टँकरची मागणी होऊ लागली आहे.

यावर्षीच्या टंचाई परिस्थितीत येवला तालुक्यातील अनेक गावे व वाड्या वस्त्यांना पिण्याच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य निर्माण झालं आहे. विहिरींसारखे पाण्याचे नैसर्गिक स्रोत कधीच आटल्याने अनेक गावांत पिण्याच्या पाण्यासाठी मोठा आटापिटा करण्याची वेळ आलेली आहे. तालुक्यात यंदाच्या दुष्काळाच्या झळा इतक्या भयाण आहेत की मागील वर्षीच्या डिसेंबर पासूनच गावागावात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावे लागले आहेत. गेल्या काही

महिन्यात तर दिवसागणिक अनेक गावांमधून टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे. सध्याही येवला

तहसील व पंचायत समिती स्तरावर पाणी टँकर सुरू करा या मागणीचे प्रस्ताव धडकत असून यंदाची भिषण टंचाई बघता येत्या काळात त्यात दिवसेंदिवस वाढ होत जाण्याची दाट चिन्हे आहेत.

सध्या येवला तालुक्यातील २९ गावे व १९ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ५ सरकारी तर १० खासगी अशा १५ टँकरद्वारे दररोज एकूण ५४ फेऱ्या सध्या केल्या जात आहेत. अशातच तालुक्यातील अनकाई, गोरखनगर, वसंतनगर व चांदगाव या चार गावांचे प्रस्ताव नुकतेच प्रशासनाला प्राप्त झालेले असून या गावांची लवकरच तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडून संयुक्त पाहणी केली जाताना टँकर सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

टँकरद्वारे पाणीपुरवठा गावे : कुसमाडी,वाईबोथी,बाळापुर,पांजरवाडी,बोकटे,दुगलगांव,आहेरवाडी,लहीत,जायदरे,मुरमी,आडगांव रेपाळ,धामणगाव,खिर्डीसाठे,देवळाणे,खरवंडी,देवदरी,कोटमगाव खुर्द,तांदूळवाडी,खैरगव्हाण,महालगाव,हडपसावरगाव,चिचोंडी बुद्रुक,रायते,गुजरखेडे,बल्हेगांव,चिचोंडी खुर्द,कासारखेडे,गोपाळवाडी,कोटमगांव बुद्रुक.

वाड्या : महादेववाडी, चांदरजठार वस्ती, रानमळा कुळधरवस्ती, सायगाव फाटा (सर्व सायगांव), गोपाळवस्ती (खैरगव्हाण), हनुमान नगर (सोमठाण जोश), गोल्हेवाडीरोड वस्ती, योगेश्वरवाडी फुलेवाडी शंकरवाडी, सावतावाडी जयहिंदवाडी, दळेवस्ती रामवाडी बजरंगवाडी (सर्व अंदरसूल), घनामाळी मळा, वडाचा मळा पाटीलवस्ती, खोडके सानपवस्ती, माळवाडी फरताळवाडी, गाडेकर घाडगेवस्ती (सर्व नगरसूल), हनुमान नगर (खिर्डीसाठे), वाघ वस्ती, हवालदार वस्ती, भैरवनाथ वस्ती सानप महानुभाव वस्ती (राजापूर).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेश पेठेतील कोंडी सुटणार!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

शहरातील वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध पर्याय सुचव‌िण्यात आले असून यामध्ये गणेश पेठेत सम-विषम तारखांचे पार्किंग आणि सकाळी ११ ते सायंकाळी ७ या काळात चारचाकी वाहनांना बंदी करण्याचा निर्णय, तसेच गणेशपेठ ते वावी वेस, व्यापारी बँक कॉर्नर ते नाशिक वेस या रस्त्यावर एकेरी वाहतूक करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील. वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी सिन्नर वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.

आमदार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस नगराध्यक्षा अश्विनी देशमुख, वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत, निफाडचे पोलिस उपअधीक्षक दीपक गिऱ्हे, तहसीलदार मनोजकुमार खैरनार, पोलिस निरीक्षक राजेश शिंगटे, ताराचंद खिवंसरा, नगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुनील शिंदे आदी उपस्थित होते.

गणेश पेठेत सम-विषम तारखांचे पार्किंग आणि सकाळी ११ ते सायंकाळी ७ या काळात चारचाकी वाहनांना बंदी करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

शहरातील गणेश पेठेत कोंडी होत असल्याने सरस्वती पूल ते शिवाजी चौक, वावी वेस हा शहरात येण्याचा मार्ग, तर व्यापारी बँक कॉर्नर ते नाशिक वेस हा मार्ग बाहेर पडण्यासाठी निश्चित करण्यात आला. पेठेत सम-विषम तारखांचे पार्किंग करण्याचा तसेच त्यासाठी दुकानदारांनी फलक लावण्याचा निर्णय घेण्यात आला.

चौकात गतिरोधक बसवावेत, महामार्गावरील दुभाजकांत पथदीप बसवावेत, आडवा फाटा, बसस्थानक, मारुती मंदिर येथे सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी, अशा सूचना नागरिकांनी केल्या. निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी नगरपालिकेने अधिसूचना प्रसिद्ध करावी, अशी सूचना उपअधीक्षक दीपक गिऱ्हे यांनी केली. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष ताराचंद खिंवसरा, सोनल लहामगे, दिवाकर पवार, मु. शं. गोळेसर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे, शिवसेनेचे शहराध्यक्ष राहुल बलक, रत्नाकर पवार, संतोष खर्डे आदींनी सूचना मांडल्या.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेडसर महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

रस्त्याने जाणाऱ्या वेडसर महिलेला बळजबरीने रिक्षात बसवून बोकडदरे शिवारातील वनविभागाच्या जंगलात नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या चौघा संशयितांपैकी दोघांना सरपंच व गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. यापैकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी रात्री सव्वा आठ वाजता ही वेडसर महिला (वय ४२) बोकडदरे शिवारात एकटी चालली होती. बोकडदरे येथील हनुमंत फकीरा पिंपळे, मारुती भीमा बछाव, योगेश माळी, ज्ञानेश्वर अशोक पिंपळे यांनी तिला बळजबरीने रिक्षात बसवून बोकडदरे शिवारात नेत तिच्यावर सामुहिक अत्त्याचार करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार बोकडदरेचे सरपंच भाऊसाहेब दराडे व गावकऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांना फोन केला. तसेच या चौघांना पकडण्याचा प्रयत्न केला. हनुमंत पिंपळे व

ज्ञानेश्वर पिंपळे यांना पकडण्यात यश आले असून बाकीचे दोन संशयित फरार आहेत. याबाबत निफाड पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पीडित महिला ही वेडसर असल्याने तिला या प्रकाराबाबत काही सांगता येत नाही. तिला नाशिक येथे नेण्यात आले असून मानसोपचार तज्ज्ञाकडून तपासणी करण्यात

येणार आहे. तसेच तिची वैद्यकीय तपासणीही करण्यात येणार

असल्याचे पोलिस निरीक्षक निघोट यांनी सांगितले.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्यांच्या’ हालचालींवर तिसऱ्या डोळ्याची नजर

$
0
0

pravin.bidve@timesgroup.com

नाशिक : कारागृह अन सरकारी महिला वसतिगृहासारख्या कडेकोट सुरक्षा असणाऱ्या ठिकाणांहून निसटू पाहणाऱ्यांवर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर असणार आहे. सुरक्षा व्यवस्थेबाबतच्या प्रस्तावांना जिल्हाधिकारी प्रशासनाने मान्यता दिली असून त्यासाठी नावीन्यपूर्ण योजनेमधून तब्बल २१ लाखांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे.

राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये नाविन्यपूर्ण (इनोव्हेशन) योजनेचाही समावेश आहे. या योजनेंतर्गत राखीव असणारा साडे तीन टक्के निधी सरकारी कार्यालयांमधील ठोस कामांसाठी वापरता येतो. यंदा सुरक्षेच्या कारणास्तव हा निधी वित‌रीत करण्याला जिल्हा प्रशासनाकडून पसंती देण्यात आली. अशोकस्तंभ येथील वात्सल्य महिला वसतिगृहात पुनर्वसनासाठी ठेवण्यात आलेल्या नऊ बारबाला रखवालदाराच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून पळून गेल्या होत्या. दोन वर्षांपूर्वी हा प्रकार घडला होता. त्यानंतरही असे प्रकार येथे सातत्याने घडले. असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी या सरकारी वसतिगृहात सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी पाच लाख ७७ हजार रुपये निधी जिल्हा प्रशासनाने मंजूर केला आहे.

नाशिकरोड कारागृहातून मंगलसिंह रोहिदास भोसले (३२) या कैद्याने १५ फुट उंच भिंत ओलांडून ६ एप्रिल २०१४ रोजी पलायन केले होते. कारागृहात मोबाइल, गांजा व तत्सम वस्तू बाळगल्या जात असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहेत. अशा गैरप्रकारांवर वॉच ठेवण्यासाठी कारागृह प्रशासनाने ६० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तेवढे पुरेसे नसल्याने कारागृह प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. नाविन्यपूर्ण योजनेतून कारागृहाला ९ लाख ५१ हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. भूमी अभिलेख कार्यालयातील गैरप्रकारांवरही सीसीटीव्हींचा वॉच असणार आहे. त्यासाठी त्यांना पाच लाख ४९ हजारांचा निधी देण्यात आला आहे. केवळ सीसीटीव्हींसाठी प्रशासनाने चालू वर्षी २० लाख ७७ हजार रुपयांच्या निधीला मंजुरी दिल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी प्रदीप पोतदार यांनी दिली आहे.

याखेरीज महाराष्ट्र पोलिस अॅकॅडमीमध्ये याच योजनेंतर्गत नऊ लाख ८१ हजारांच्या निधीतून क्लॅम्बिंग व रॅप्लिंग वॉल उभारण्यात आली आहे.

धान्य गोदामांतील गैरप्रकार थांबणार

रेशन धान्य घोटाळ्यामुळे नाशिक जिल्हा राज्यभरात बदनाम झाला. नाशिकरोड येथील सरकारी गोदामात चोरीचे प्रकार घडले. धान्याची साठवणूक करणारी सरकारी आणि खासगी गोदामांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे स्पष्ट झाले. अशा गोदामांची सुरक्षा अधिक भक्कम व्हावी आणि गरीबांच्या धान्यावर कुणी डल्ला मारू नये यासाठी तेथेही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी तब्बल १५ लाख ५३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

नावीन्यपूर्ण योजनेतून सीसीटीव्ही, रॅप्लिंग वॉलसाठी निधी दिला आहे. सीबीएस येथील किशोर सुधारालयातून काही मुले पळून गेल्यानंतर तेथेही सीसीटीव्हींची मागणी झाली. मात्र, हा प्रस्ताव विलंबाने प्राप्त झाल्यामूळे तो चालू वर्षी मंजूर होऊ शकलेला नाही.

- प्रदीप पोतदार, जिल्हा ‌नियोजन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकरी दुष्काळात होरपळून निघालेला असतानाच अवकाळी पाऊस आणि गारपिटीने त्याच्या तोंडचे पाणी पळविले आहे. नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आठ दिवसांच्या आत मदत दिली जावी, अशी मागणी छावा क्रांतिवीर सेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास कोणत्याही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा संघटनेने दिला आहे.

निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. गेली चार वर्ष संकटांचा सामना त्याला करावा लागत असून, यामुळे त्याचे मनोबलही खच्ची होऊ लागले आहे. एकीकडे बेमोसमी पाऊस आणि गारपीट धुडगूस घालतो. तर, यंदा जून ते सप्टेंबर या ऐन हंगामात पावसाने तोंड फिरविल्याने शेतकऱ्यांवर दुष्काळाचा सामना करण्याची वेळ आली. हे संकट कमी म्हणून की काय आता पुन्हा अवकाळी पावसाने धिंगाणा घातल्याने जिल्ह्यातील द्राक्षबागा, डाळिंब, कांदा, गहू, हरभरा, भाजीपाला या पिकांची मोठी हानी झाली. शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून, प्रत्येक ठिकाणच्या नुकसानीचे काटेकोरपणे पंचनामे करावेत, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष करण गायकर, शिवा तेलंग, ज्ञानेश्वर दाते, ज्ञानेश्वर थोरात आदींनी केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसे नगरसेवक टंचाईमुक्तीसाठी सरसावले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने जायकवाडी धरणासाठी पाणी सोडून नाशिककरांवर लादलेल्या पाणीटंचाईला सामोरे जातांना मनसेने शहरवासियांसाठी मोफत पाणी टँकर सेवा कार्यान्वित केली आहे. या उपक्रमासाठी आता प्रत्येक नगरसेवकांनी २ महिन्यांचे मानधन दिले आहे.

महापालिकेतील सत्ताधारी मनसेने उर्वरित पाण्याचे प्रभावीपणे नियोजन करून नाशिककरांना दिलासा देणे अपेक्षित असताना मनसेनेही भाजपच्या वाटेवर जात पाण्यावरुन राजकारण सुरू केल्याचे वृत्त 'मटा'मध्ये छापून आले. त्याची दखल घेत मनसेने हा उपक्रम सुरू केला आहे. मनसेने शनिवारपासून ७ पाणीटँकर कार्यान्वित केले. पहिल्याच दिवशी पाणीटँकरच्या शहराच्या विविध भागात ३५ फेऱ्या झाल्या. रविवारीही हा जोर कायम होता सकाळपासून नागरिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क करून पाणीटँकरची मागणी करीत होते. नागरिकांच्या सोयीसाठी रविवारपासून दोन टँकर वाढवण्यात आले असून आगामी काळात गरज पडल्यास आणखी टँकरची तयारी पक्षाने ठेवल्याचे कळवले आहे.

नगरसेवकांची बैठक

उपक्रमचा एक भाग म्हणून रविवारी सकाळी राजगड कार्यालयावर पक्षाच्या सर्व नगसेवकांनी पक्षनेते अविनाश अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली. यात पाणी टंचाईवर आणखी काय उपाययोजना करता येतील, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

दोन महिन्यांचे मानधन

सामाजिकतेचा भाग म्हणून मनसेच्या नगरसेवकांनी स्वयंस्फूर्तीने या उपक्रमासाठी दोन महिन्यांच्या मानधनाचे चेक जमा केले आहे. त्यामुळे या योजनेसाठी भरीव रक्कम प्राप्त झाली असून पदाधिकाऱ्यांनीही पक्ष कार्यालयात धनादेश जमा करण्यास सुरूवात केली आहे. उपक्रम ३० जूनपर्यंत सुरू रहाणार असून पाणीटँकरसाठी नागरिकांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे मोबाइल नंबर दिले आहेत. टॅँकरची गरज असलेल्या नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजगड कार्यालय ०२५३-२३१७७७८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भूमाता’ला रोखणार त्र्यंबकच्या महिला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात पुणे येथील भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी स्थ‌ानिक तसेच, बाहेरील विविध संघटना पुढे सरसावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्‍थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून मंदिरात पोलिस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे.

शनि शिंगणापूरच्या पार्श्वभूमीवर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा इशारा दिला आहे. मंदिराची परंपरा जोपासण्यासाठी हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था, हिंदुत्ववादी संघटना, महिला दक्षता समिती, शारदा महिला मंडळ, पुरोहित संघ त्र्यंबकेश्वर, माहेश्वरी महिला मंडळ, आदिवासी संघर्ष समिती, त्र्यंबक नगरपरिषद आणि त्र्यंबकचे नागरिक एकत्र येऊन विरोध करणार आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर पेंडाल टाकण्यात आला असून, भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी तेथे महिला थांबणार आहेत. बॅरिकेडिंगही केले आहे. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचे काम पोलिस पार पाडतील. यापूर्वी ​शनिशिंगणापूर येथे झालेल्या आंदोलनाची व तिथे पोलिसांनी काय केली, याची माहिती घेऊन त्यादृष्टीने कारवाईची रूपरेषा आखण्यात येईल, असे पोलिस उपअधीक्षक प्रवीण मुंढे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुक्ता...

$
0
0

वृन्दा भार्गवे
गेल्या दोन दशकात नजरेत भरण्याजोगा बदल घडलेला दिसतो तो तरुणींच्या जीवनशैलीत. असे विधान अनेक पालक ठामपणे करताना आढळतात. प्रत्येकाचा सूर वेगळा असतो. त्यामागचे विश्लेषण निराळे असते. घरातल्या एकुलत्या मुलीने मला लग्न करायचे नाही असे पंचविसाव्या वर्षी सांगितल्यावर तिच्या निर्णयाने चक्रावलेले पालक कारण विचारतात. एखाद्या सामाजिक प्रकल्पात पूर्णत: झोकून देणार हे तिचे उत्तर. दुसरीकडे थोड्या कर्मठ घरातल्या तरुणीने मी अमुक एका धर्माच्या तरुणाबरोबर लग्न करणार असे म्हणणे, त्याक्षणी घरादाराला बसलेला हादरा किंवा ना सामाजिक कामात रस ना लग्नात, केवळ चिक्कार पैसा कमावणार नि फॅशन इंडस्ट्रीत नाव कमावणार असे एखादीने जाहीर करणे. एखादी कमावलेल्या पैशातून जगप्रवासाला निघते. हिंसेचा निषेध आणि शांततेचा स्वीकार हे तिचे स्वप्न. समाजातल्या दुर्बल घटकांसाठीच समाज माध्यमाला वापरण्याचा एखादीचा पण.. तिच्या शॉर्ट फिल्मला आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळणारा पुरस्कार. घरात कोणतेही वातावरण नसताना एका नवीनच क्षेत्रात एखादीने घेतलेली उडी. आंतरराष्ट्रीय महिला दिन रोज कोणत्या न कोणत्या राज्यात आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करणाऱ्या असंख्य तरुणी, महिला. अनेक वेगवेगळी शिखरे पादाक्रांत करून आपण काही खास केले नाही म्हणत साधेपणाने जगणाऱ्या.

त्यांच्या विचारात, जगण्यात नकारात्मकता यावी असे बरेच गेल्या काही वर्षात घडले. उदाहरणार्थ पंधरा एक वर्षांपूर्वी आयटी कंपन्या, बीपीओ कंपन्या भारतात आल्या. चकचकीत ऑफीसेस, अलिशान इमारतीतील एसीचे वातावरण, अद्ययावत सोयी-सुविधा, त्याच इमारतीत असणारा कॅफे, बार, रेस्तराँ, नोकरीची कळकट ऑफिसेस इतिहासजमा झाली. त्या जागी पॉश केबिन आली. कॉल सेंटर्स आणि लागोपाठ Macdonald, पिझ्झा हट, सीसीडी, बरिस्ताने केलेला प्रवेश यामुळे मोकळेपणाची दालने खुली होत गेली. पदवी मिळालेले तरुण तरुणी कॉल सेंटर्सकडे आकर्षित झाले. कोणत्याही विषयातील पदवी आणि सोबत इंग्रजीचे उत्तम ज्ञान एवढ्या भांडवलावर अनेकजणी २०००च्या आसपास या आउटसोर्सिंग करणाऱ्या कंपन्यांमध्ये अहोरात्र काम करू लागल्या. भरपूर पगार ही या जॉबची जमेची बाजू. पॉकेटमनीसाठी हात पसरावे लागण्याचे दु:ख विरून गेले. आयुष्य स्वप्नवत वाटावे, अशा क्षणी केवळ दिनक्रमाने बऱ्याचजणींचा भ्रमनिरास झाला. तो त्यातील जीवनशैलीने.

टीम लीडरची सातत्याने चालणारी देखरेख, संतापी, रागीट ग्राहकांशी संयमाने बोलण्याची खोटी कृत्रिम पद्धत, भाषा आणि उच्चारावर रोज घेतली जाणारी मेहनत, आपले नाव बदलून निराळे पाश्चात्य नाव घेतल्याने स्वतःचे खरे नाव, आपली identity लपवून ठेवण्याचा मनस्ताप. एका वेगळ्याच देशातील कोणीतरी ग्राहकाने आपला केलेला अपमान, भारतीय म्हणून केलेली हेटाळणी तरीही जॉब म्हणून आठ तास सलग नाईट शिफ्टमध्ये काम करावे लागणे. त्यातून खांदे, डोळे, डोकेदुखीचे, निद्रनाशाचे आजार. नैराश्याचे आलेले झटके. खाण्याच्या बदललेल्या सवयी. सर्जनशीलता कमी झाल्याने इतर कोणत्याही कामातला उत्साह नाहीसा होणे. त्यातून मार्ग काढण्यासाठी अनेक औषधांचे सेवन.

घरापासून दूर महानगरात राहताना स्वतंत्रच राहण्याच्या सवयीने अनेकींच्या नात्यात उलथापालथ झाली. मनावर फारसा ओरखडा उमटू न देता नव्याने उभारी घेत performance या एकाच शब्दाला अनेकजणी सामोऱ्या गेल्या. या जॉबमुळे मध्यमवर्गातील अनेक तरुणींची आडनाव लावणे, जात-पोटजात, धर्म याबद्दलची मते बदलली. एकेरी नाव ही ओळख. स्त्री-पुरुष समानता हा आग्रह, शरीरसंबंध पाप वगैरे नसून गरज आहे यावर शिक्कामोर्तब. जगण्यातला हा आमुलाग्र बदल.

आज branded कंपन्या, कार्पोरेट क्षेत्रातले वातावरण अनेकींना स्वतःमध्ये बदल घडवण्यास भाग पाडते त्याचे मूळ येथे दडलेले दिसते. कधी क्लायेंट मीटिंग्स, events, त्यासाठी घालण्यात येणारे कपडे, फूड, त्याबरोबरीने येणारी पेय, आवडो न आवडो विशिष्ठ पेहरावाचा केलेला वापर. देशांतर्गत आणि देशाबाहेरील प्रवास करताना एकटीत बदल घडवावाच लागणे हा खरोखर एक निर्णायक टप्पा होता. अर्थात या लाइफस्टाइलमुळे तरुणींचे अध:पतन झाले असे नाही. अनेकजणी चटपटीत झाल्या. त्यांची भाषा, त्यांची संवाद साधण्याची पद्धत. सादरीकरण त्यातील डौल, आत्मनिर्भरता हा बदल वाखाणण्याजोगा होता.

काहीजणी कुटुंबकर्त्या बनल्या. स्वत:च्या हिमतीवर महानगरात घरे घेतली. जिम, पोहणे, फिरणे, मनाला वाटेल तसे जगणे यामुळे कोणाचे निर्बंध त्यांना नकोसे झाले. या जगण्याला विरोध झाला तो त्यांच्याच घरातून. कारण ही जीवनशैली घरातल्यांसाठी नवी होती. गेल्या दशकात वर्क फ्रॉम होममुळे अनेकजणी ऑनलाइन जगणे शिकल्या. घरातून बाहेर पडायचे ते एकदम रात्री किंवा ते देखील नाहीच. घरात भाजीपाल्यापासून सगळ्या गोष्टी ऑनलाइन. जगण्यात साथ देणारा एकमेव कॉम्प्यूटर त्यानंतर मोबाइल. संपर्क करायचा झाला तर घरातल्या घरात या साधनांचा वापर. लग्नाच्या वेळेस रजा, गरोदरपणात रजा आणि वर्षभरात १५ दिवस बाहेर बाकी संपूर्ण वेळ घरात. या नव्या जीवनपद्धतीवर अनेक सर्वेक्षण झाली. संशोधन पेपर लिहिले गेले. बाहेरचे प्रदूषण नको, वाहनाचा प्रवास नको, लोकांच्या नजरा नको, जंक फूड खाणे नको म्हणून घरात बसून काम करणाऱ्यांकडून अधिक उत्तम काम होऊ शकतो हा निर्वाळा संशोधनातून दिला गेला.

वर्क फ्रॉम होममुळे त्यांची जीवन जगण्याची पद्धती बदलली. दिवसभर एका खोलीत बंद, सातत्याने तांत्रिक विषयाशी संबंध. घरात बारीकसारीक गोष्टींमध्ये रुची राहिली नाही. विमानाचे तिकीट असो वा रेल्वेचे अथवा बसचे, ड्रेसपासून डायपरपर्यंत घरात बसल्याजागी सगळे काही येत असेल तर त्यांना इतरांशी संवाद साधणे तो कमी होणे वा जास्त झाल्याने संघर्ष होणे अशा कोणत्याच समस्यांना तोंड द्यावे लागत नव्हते.

आता हे सगळे वाईट की चांगले हा प्रश्न बराचसा अप्रस्तूत ठरतो. महिला दिन साजरा करताना ऐतिहासिक, पौराणिक दाखल्यात या तरुणीचे मूल्यमापन करून चालणार नाही. घरे सांभाळणारी, चार भिंतीच्या आत राहणारी ती आणि चार भिंती छेदून आपले आकाश शोधणारी ती, असा तिचा गौरव करताना आर्थिक, सामाजिक, राजकीय, कृषी, क्रीडा विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्र कोणतेही असो अनेक गोष्टींवर मात करत घेतलेला निर्णय कृतीत उतरवणारी आजची तरुणी जगण्याबरोबर शैली बदलत गेली. दगडाला स्पर्श म्हणजे भूतकाळ, फुलाला स्पर्श म्हणजे वर्तमान आणि अग्नीला

स्पर्श म्हणजे भविष्य असे यू-ट्युबच्या एखाद्या चित्रफितीत म्हणणारी एखादी कर्तृत्ववान स्त्री भूतकाळाला ठेचकाळत नाही. या पिढीची बदलत गेलेली ही धारणा महिला दिनाच्या दिवशी लक्षात घ्यायला हवी.

(लेखिका साहित्यिक तसेच तरुणांच्या भावविश्वाच्या

अभ्यासक आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुस्तकातले मनोहारी नाशिक

$
0
0

अशांत किरकिरकर
काही शहरांना प्राचीन, दीर्घ परंपरा असते. त्यांचा इतिहास लिहिला जावा इतके त्यांचे मोठेपण असते. नाशिक हे असेच शहर आहे. नाशिकला प्राचीन परंपरा लाभलेली आहे. पुरातन काळापासून नाशिक शहर व त्या आसपासचा परिसर विविध नावांनी ओळखला जात असे. जनस्थान, त्रिकंटक, गुलशनाबाद, आणि विद्यमान नाशिक अशी चार नावे या परिसरास होती. ऐतिहासिक काळापासून नाशिक धार्मिक स्थळ मानले गेले. रामायणात नाशिक परिसरातील 'पंचवटी' येथे श्रीराम वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे. महाकवी कालिदास व भवभूती यांनी त्यांच्या लेखनात नाशिकबद्दल आदराचे उद््गार काढले आहेत.

मोगल साम्राज्याच्या काळात नाशिक 'गुलाबांचे शहर' म्हणून 'गुलशनाबाद' या नावाने ज्ञात होते. या शहराला नाशिक हे नाव कसे पडले याबाबत दोन मान्यता आहेत. 'नऊ शिखरांचे शहर' म्हणून 'नवशिख' आणि नंतर अपभ्रंश होऊन नाशिक असा एक मतप्रवाह आहे. तसेच दुसरा संदर्भ रामायणाशी आहे. राम, सीता आणि लक्ष्मण नाशिकमधील पंचवटी परिसरात वास्तव्यास असताना शुर्पणखेचे नाक (संस्कृत भाषेमध्ये 'नासिका') लक्ष्मणाने या ठिकाणी कापले. त्यावरून नासिक अथवा नाशिक, हे नाव पडले असेही म्हणतात. नाशिकचा डोंगर हा सह्याद्रीच्या नासिकासदृश आहे म्हणूनही नासिक हे नाव पडले असावे, अशी दाट शक्यता आहे. भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळ्याचे क्षेत्र नाशिक आहे. दर १२ वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो. येथील मंदिरे व गोदावरी नदीवरील घाट प्रसिद्ध आहेत. इ.स. १२०० सालाच्या सुमारास खोदलेली पांडवलेणी आहेत. गोदावरी नदीला नाशकात गंगा म्हणतात.

गौतमीपूत्र सातकर्णी या राजाच्या आधीपासून येथे अनेक राजांनी राज्य केले. नाहापानाचा पराभव येथेचे झाला. नाहापानाच्या काळात गोवर्धन (आताचे गंगापूर) हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण होते. शक व सातवाहन यांच्यात नाशिकलाच संघर्ष झाला. इ.स.१२५-२०० हा कालखंड सातवाहनांचा होता. याच वेळेस आभिर राजवटीने वर्चस्व गाजवलेले दिसते. अभिर या प्रदेशातील गवळी राजे होत. अंजनेरी ही त्यावेळची राजधानी. प्रारंभी ती शत्रापांची होती. सहाव्या शतकाच्या प्रारंभी चालुक्यांनी हा प्रदेश हस्तगत केला. त्यानंतर राठोरांची सत्ता आली. त्यांनी मयुरखंडीला (जि. नाशिक) नाशिकची राजधानी बनविले. नवव्या व दहाव्या शतकापर्यंत हा प्रदेश राष्ट्रकुटांच्या अधिपत्याखाली होता. सतराव्या शतकात हा भाग मोगल राजवटीत होता. मोगलांनी नाशिकचे नाव बदलून गुलशनाबाद केले व ते सुभ्याचे मुख्य ठिकाण ठेवले. इ.स.१७४७ मध्ये नाशिक प्रदेश पूर्णपणे मराठ्यांच्या हातात गेला. इ.स.१८१५ ते १८१७ च्या काळात इंग्रजांनी आपले साम्राज्य प्रस्थापित केले. इ.स.१८१८ पर्यंत हा भाग पेशव्यांचा हाती होता. पण १८१८ मध्ये थोमस हिस्लॉपच्या ब्रिटिश सैन्याने कोपरगाव घेतले. चांदवडच्या उत्तरेकडील भाग जिंकला. ७ मार्च १८१८ खान्देशातील थाळनेर, चांदवड किल्ला जिंकून १८१८ मार्च अखेर होळकरांच्या नाशिकवर पूर्ण ताबा मिळवला. इ.स.१८६४ मध्ये नाशिकला नगरपरिषदेचा दर्जा मिळाला.

नाशिकला दीर्घ परंपरा आहे. धार्मिक, ऐतिहासिक अशा साऱ्याच अंगांनी नाशिक समृध्द आहे. म्हणूनच ते पुस्तकातून आल्यावर अंगोपांगी बहरलेले वाटते. प्रा. बाळकृष्ण अंजनगावकर यांनी १९९१ मध्ये 'नाशिक जिल्हा व महानुभाव पंथ' हे पुस्तक लिहिले आणि अलिकडच्या काळात नाशिकमधील काही महत्त्वाच्या ठिकाणांना उजाळा मिळाला. या पुस्तकात चक्रधर स्वामींनी ज्या स्थळांना भेटी दिल्या आहे त्यांची वर्णने आली होती. त्यानंतर २००७ मध्ये डॉ. कैलास कमोद यांचे 'माझं नाशिक' पुस्तक आलं. त्यातून नाशिकचे आधुनिक रूप मांडण्यात आले होते. त्यानंतर काही कालावधीतच म्हणजे २०१३ मध्ये 'नाशिक छायाचित्र' पुस्तक प्रकाशन झाले. किशोर अहिरराव यांनी हे पुस्तक केलेले असून त्यात नाशिकचे छायाचित्रातून दर्शन घडविण्यात आलेले आहे. मध्यंतरी विश्वरूप राहा यांचे 'बर्डस ऑफ नाशिक डिस्ट्रिक्ट कॉन्झर्वेशन गाईड' हे पुस्तक आले. त्यात नाशिकच्या पर्यावरणाविषयी सर्व माहिती देण्यात आलेली होती. नाशिकला येणारे पक्षी याबद्दल त्यात माहिती होती. याच काळात २०१५ मध्ये नाशिकबद्दल विशेषत्वाने मांडणारे ठाकूर भरतसिंह यांचे पुस्तक आले. 'नाशिक युगो युगों की साक्षी नगरी' या शीर्षकाने आलेले हे पुस्तक म्हणजे नाशिकचा संशोधनरूपी परिपाठच आहे. २०१५ मध्येच नाशिकबद्दल इत्थंभूत माहिती असलेले 'तपोभूमी' हे रमेश पडवळ लिखित पुस्तक प्रकाशित झाले. नाशिकचा सर्व बाबतीत विचार या पुस्तकात करण्यात आला आहे. नाशिकचा इतिहास मांडणारी ही पुस्तके आहेच परंतु अद्यापही शहराचे आकर्षण तीळमात्रही कमी झालेले नाही कारण अजूनही नाशिकवर वेगवेगळ्या अंगाने संशोधन होऊन पुस्तके येतच आहेत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे 'सांस्कृतिक नाशिक' या विषयावर एक पुस्तक प्रस्तावित आहे.

नाशिकच्या विशेषावर आलेल्या या पुस्तकांबद्दल लिहिण्याचे कारण म्हणजे गेल्याच आठवड्यात नाशिकवरची आणखी दोन पुस्तके प्रकाशित झाली. एक म्हणजे डॉ. कैलास कमोदांचे 'डिस्कव्हरी ऑफ नाशिक' व दुसरे म्हणजे मधुकर झेंडे लिखित 'चौकांचा इतिहास' ही दोन्ही पुस्तके नाशिकचा इतिहास मांडणारी आहे. ही दोन्ही पुस्तके अतिशय जाणकार, अधिकारी व्यक्तींनी लिहिली आहेत. 'डिस्कव्हरी ऑफ नाशिक' या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी दोन पद्मश्री लाभले. डॉ. अश्विन मेहता व कुमार केतकर अशी बडी मंडळी या पुस्तकांसाठी नाशिकमध्ये आली. त्यांनी नाशिकचे पौराणिक व आधुनिक महत्त्व अधोरेखित केले. तर 'चौकांचा इतिहास' हे पुस्तक इल्युजिनिस्ट

पध्दतीने प्रकाशित करण्यात आले. इल्युजिनिस्ट हा जादूतलाच पुढचा प्रकार आहे.

या पुस्तकाची प्रतिकृती अधांतरी नेत मूळ नाशिकचे परंतु विख्यात झालेले जादूगार सतीश देशमुख यांनी हा कार्यक्रम रंगवला. विशेष म्हणजे त्यांनी ही अधांतरी प्रतिकृती प्रेक्षकांमध्येही नेली व कुतूहल निर्माण केले. त्यानंतर 'स्मार्ट नाशिक' या विषयावर नगररचनाकार सुलक्षणा महाजन यांचे व्याख्यान झाले. अतिशय मार्मिक भाषेत त्यांनी नाशिकविषयी कळकळीने काही गोष्टी व्यक्त केल्या. ऐतिहासिक नाशिकने काळाच्या ओघात प्रचंड आधुनिक रूप ल्यायले असले तरीही त्याची जपणूक करणे आपल्याच हाती आहे, हे महाजन यांच्या सांगण्यावरून जाणवले.

नाशिक हे जात्याच सुंदर आहे परंतु त्याला आता आकार देण्याची गरज निर्माण झाली आहे. तरच धार्मिकतेत रामाचे, इतिहासात सावरकरांचे असलेले नाशिक पाहताना पर्यटकांना मनस्वी आनंद होणार आहे.

(नाशिक संदर्भ : विकिपिडीया)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाणी बचतीसाठी कसरत करणाऱ्या महापालिका प्रशासनाने पाणीकपातीचे फेरनियोजन केले आहे. विभागानुसार आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. त्याऐवजी आता संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा दर गुरूवारी बंद ठेवण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहराच्या विविध भागात रोटेशननुसार आठवडातून एक दिवस पाणीकपात करण्यात येत होती. मात्र, यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला. तसेच, पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार लोकप्रतिनिंधीसह नागरिकांकडून होत होती. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सूचना व तांत्रिक अधिकाऱ्यांचे अभिप्राय लक्षात घेत प्रशासनाने आठवड्यातून एक दिवस संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला. यापुढे संपूर्ण नाशिक शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सोशल मीडिया’मुळे हिंसाचार

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com

नाशिक : इंटरनेट सुविधेसह एक स्मार्ट फोन हवा, असा प्रत्येकाचा आग्रह असतो. काळासोबत चालण्याचे 'स्टेटस सिम्बॉल' म्हणून गणले जाणारे हेच आयुध आता कौटुंबिक हिंसाचाराला खतपाणी घालण्याचे काम करीत आहे. सोशल मीडियाचा वापर पती-पत्नीच्या कलहाला कारणीभूत ठरत असून २०१४ च्या तुलनेत २०१५ यात घटनांमध्ये वाढ झाल्याचे महिला सुरक्षा शाखेच्या नोंदीवरून स्पष्ट होते.

हुंडाबळी, हुंड्यामुळे छळ, विनयभंग, महिलांची हत्या याबाबत काम पाहणाऱ्या शहर पोलिस आयुक्तालयातील महिला सुरक्षा विशेष शाखेकडे २०१५ मध्ये कौटुंबिक हिंसाचाराबाबत १८८ तक्रारी दाखल झाल्यात. याबाबत माहिती देताना सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे यांनी सांगितले, की ​महिला सुरक्षा शाखेकडे तक्रार आली की पती-पत्नीमध्ये प्रथमतः तडजोड करण्याचा प्रयत्न केला जातो. अगदी शुल्लक कारणांमुळे एखाद्या कुंटुंबाची वाताहत होऊ नये, असा त्यामागचा हेतू असतो. समुपदेशनानतंरही पती किंवा पत्नीच्या वागण्यात बदल झाला नाही तर पुढे कायदेशीर कारवाई होते. घरगुती भांडणाच्या कारणांची यादी मोठी आहे. पारंपारीक पध्दतीच्या या कारणांमध्ये मोबाइल व सोशल मीडियाचा वापर करण्यावरून झालेल्या भांडणांची नवीन भर पडत असल्याचे गोरे यांनी स्पष्ट केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून सदर व्यक्ती अनेक परिचित आणि अपरीचित व्यक्तींच्या संपर्कात येतो. सोशल मीडियाचा वारंवार वापर करणाऱ्या व्यक्ती त्यातच गुंग असतात. पती-पत्नीच्या नात्यात त्यामुळे दरी निर्माण होण्यास सुरुवात होते. एकदा की संशयाचे भूत सदर व्यक्तीच्या डोक्यात शिरले की एकमेकांवर आरोप केले जातात.

सुखी कुटुंबाचे हे धनी मग ​पोलिस स्टेशनपर्यंत पोचतात. सन २०१५ चा विचार करता, या वर्षात कौटुंबिक हिंसाचार किंवा पती पत्नीच्या भांडणाच्या २५ पेक्षा जास्त केसेस मोबाइल किंवा सोशल मीडियाचा अतिरेक वापर केला म्हणून समोर आल्यात. त्यातील काही वादांवर समुपदेशनानंतर पडदा पडला. तर उर्वरित प्रकरणात गुन्हे दाखल झाले. सन २०१४ मध्ये अशा पध्दतीचे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण अवघे ५ टक्के होते. म्हणजेच एका वर्षात अशा घटनांमध्ये आठ टक्के वाढ झाल्याचे दिसते.

महिला अत्याचार किंवा कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांची लागलीच नोंद होते. कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये समुपदेशनाचा पर्याय आम्ही वापरतो. अनेक कुटुंब यामुळे पुन्हा एकत्र येतात. सोशल मीडियामुळे उद्भवणारे वाद सुध्दा वाढत असून त्याचा कुटुंबातील प्रत्येकाने विशेषतः पती-पत्नीने सखोल विचार करणे अपेक्षित आहे.

- सचिन गोरे, सहायक पोलिस आयुक्त, क्राइम ब्रँच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठांचा कार्यकर्ता

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

ज्येष्ठ नागरिकांना वयाच्या उत्तरार्धात काय काम करावं असा प्रश्न पडतो मात्र इंदिरानगरच्या अनंत घोलप यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्याचे व्रत हाती घेतले. फेस्कॉम, आयस्कॉम यासारख्या संस्थामधून जेष्ठांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याचे काम ते करीत असतात. ज्येष्ठांचे ओळखपत्र असो अथवा निराधार योजनेचे मानधन मिळविण्याचा प्रश्न असो यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात.

अनंत घोलप हे मुळचे सिन्नर तालुक्यातील वावी या गावचे रहिवासी. प्राथमिक शिक्षण सिन्नर येथे झाल्यानंतर माध्यमिक शिक्षण त्यांनी येवल्याला घेतले. तेथेच १९५२ साली पोस्टाच्या क्लार्क पदासाठी परीक्षा आयोजित केली होती. या परीक्षेत घोलप चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊन नोकरीला लागले. नोकरी करीत असताना नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये सेवा बजावली. त्यावेळी पोस्टातील बचत ही सामान्य माणसांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. पोस्टात पैसे टाकण्यासाठी किंवा काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिक येत असत त्यावेळी त्यांना मदत करणे हा त्यांना छंद जडला. काम झाल्यानंतर जेष्ठांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून बरे वाटे. ज्या ज्या ठिकाणी मदत करता येईल त्या ठिकाणी घोलप ज्येष्ठांना मदत करीत असे.

कालांतराने 3९ वर्षे सेवा झाल्यानंतर घोलप यांनी ज्येष्ठांच्या कार्याला वाहून घेतले आणि १९९० पासून आजतायागायत ते विविध संस्थांच्या माध्यमातून ज्येष्ठांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करीत आहेत. यासाठी ते कुणाकडूनही एक पैसादेखील घेत नाही उलट अनेकदा स्वतःच्या खिशातील पैसे घालून त्यांनी कामे केली आहेत व आजही करत आहेत. ज्येष्ठांसाठी काम करीत असतांना त्यांनी आपली लेखनाची आवड जोपासली असून 'ओंजळ' नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे. सध्या ते फेस्कॉमच्या माध्यमातून ते काम करीत असतात. या संस्थेचे त्यांनी अध्यक्षपददेखील भूषवले आहे. त्यांनी नाशिक जिल्ह्यात २५० जेष्ठ नागरिक संघाची स्थापन केली असून १७५ ज्येष्ठ नागरिक संघाचे ते संस्थापक आहेत.

जिल्ह्यातील जेष्ठ नागरिक संघाना ते कायमच आरोग्य, पर्यावरण, समाज प्रबोधन, बचतगट असा वेगवेगळ्या विषयांची माहिती देऊन कार्य प्रणव करीत असतात. ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र द्यावे ही मागणी सरकारने पूर्ण केल्याने हुतात्मा स्मारकातील ज्येष्ठ नागरिक संघात सहकाऱ्यांच्या सोबतीने ओळखपत्र केंद्र सुरू केले असून त्या माध्यमातून ज्येष्ठांना ओळखपत्र मिळवून देत असतात. एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांवर जेव्हा हल्ले होऊ लागले तेव्हा त्यांना पोलिस संरक्षण द्यावे अशी घोलप यांनी राज्य सरकारकडे मागणी केली. २०१० साली सरकारने ती पूर्ण करुन त्याबाबत अध्यादेश काढला. त्या कामासाठीही ते स्थानिक पोलिसांना मदत करीत असतात. ज्येष्ठांना पेन्शनसाठी जी कागदपत्रे लागतात ती पूर्ण करुन देण्याचे काम ते करतात. त्याचप्रमाणे जेष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून पर्यावरण विषय त्यांनी गांभीर्याने हाताळला असून ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या नातवाच्या नावाने एक झाड लावावे त्याचे संगोपन करावे यासाठी ते प्रयत्नशील असतात. या योजनेला संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पर्यावरणाचे फक्त प्रबोधनच करीत नाही तर जुन्या कापडापासून थैल्या तयार करुन दुकानदारांना देण्याचे काम ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून ते करतात. ज्या रुग्णालयात गर्भलिंग निदान चाचणी होत नाही तेथील डॉक्टरांना गुलाब पुष्प देऊन ते कौतुक करतात. ही चळवळ चागल्या तऱ्हेने समाजात रुजावी यासाठी ते प्रयत्नशील असतात. ज्येष्ठ नागरिक संघ प्रत्येक शहरात व ग्रामिण भागात कार्यरत आहेत. या संघाला जागेची आवश्यकता असते काही ठिकाणचे समाज मंदिरे ज्येष्ठ नागरिक संघाला मिळाली आहेत त्याचे विरंगुळा केंद्रात देखील रुपांतर करण्यात आले आहे. जेष्ठ नागरिकांना आपला वेळ आनंदाने

व्यातील करता यावा यासाठी व्यायामाची साधने तयार व्हावीत यासाठी ते प्रयत्नशील असतात.

राज्यातील नव्हे तर परराज्यातील जेष्ठ नागरिक संघांनी देखील त्यांच्या कार्याची दखल घेतली असून अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे. रोज एका तरी ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न सोडवलाच पाहिजे असा त्यांचा निर्धार असतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images