Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

एका दिवसात २७ लाख वसूल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने शहरातील बड्या थकबाकीदारांविरोधात जप्ती मोहीम सुरू केली आहे. बुधवारी शहरातील सहा विभागात जप्तीची कारवाई करण्यात आली. बुधवारी विविध कर विभागाने बड्या २८ थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई केली असून, या कारवाईतून २६ लाख ५७ हजार रुपयांची वसुली केली आहे. तर आठ जंगम मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत.

चिंतामणी कन्स्ट्रक्शन, झुलेलाल पतसंस्था, रचना ट्रस्ट, दिलीप पाठक, राज डेव्हलपर्स, मनोज किसनानी या बड्या थकबाकीदारांवर कारवाई करण्यात आली. पालिकेच्या या मोहिमेमुळे थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. मार्च अखेरपर्यंत वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महापालिकेने थकबाकी वसुलीसाठी मोहीम तीव्र केली आहे. महापालिकेने सोमवारी सातपूर प्रभागात जप्ती मोहीम राबवून ११ लाखांची वसुली केली होती. त्याच धर्तीवर आता जप्ती मोहीम शहरभर लागू केली असून, बुधवारी उपायुक्त रोहिदास दोरकुळकर, निरीक्षक मनोज संगमनेरे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सहा विभागातील २८ बड्या थकबाकीदारांवर कारवाई करण्यात आली. सहा विभागात २८ मिळकतींवर बुधवारी जप्ती वॉरन्ट बजावण्यात आले. त्यापैकी २० मिळकतधारकांनी मालमत्ता जप्तीची कारवाई टाळत थकबाकी जमा केली आहे. त्यामुळे एकाच दिवशी २६ लाख ५७ हजारांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे. तर आठ जंगम मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. थकबाकीदारांमध्ये चिंतामणी कन्स्ट्रक्शन, झुलेलाल पतसंस्था, रचना ट्रस्ट, दिलीप पाठक, राज डेव्हलपर्स, मनोज किसनानी, भीमराव हरि साळवे, बाळकृष्ण राजाराम गायकवाड या बड्या थकबाकीदारांचा समावेश आहे.

महापालिकेची कारवाई

विभागाचे नाव मिळकत संख्या जप्त मिळकत संख्या वसूल केलेली रक्कम

नाशिकरोड ०६ ०२ पाच लाख ७८ हजार २१२

पंचवटी ०२ ०० एक लाख ६७ हजार ७०१

नाशिक पश्चिम ०२ ०२ ०००

नवीन नाशिक ०३ ०० दोन लाख ६० हजार २७१

सातपूर ०६ ०२ ६ लाख ११ हजार २२६

नाशिक पूर्व ०९ ०२ १० लाख ३९ हजार ६३८

एकूण २८ ०८ २६ लाख ५७ हजार ०९२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मैत्रेयच्या सर्व शाखा राहणार बंद

$
0
0

कंपनी व्यवस्थापनाला प्रतीक्षा कोर्टाच्या निर्णयाची म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मैत्रेय कंपनीचे वसई येथील मुख्यालय पोलिसांनी सील केल्याने कंपनीचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. कोर्टाचे आदेश मिळेपर्यंत मैत्रेयच्या सर्व शाखा बंद ठेवण्याचा निर्णय कंपनी व्यवस्थापनाने घेतला आहे. गुंतवणूकदारांनी संयम ठेवून सहकार्य केले तर त्यांना त्यांचे पैसे परत मिळू शकतील, असे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.

मैत्रेय कंपनीच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालिका वर्षा सत्पाळकर यांना नाशिक पोलिसांनी अटक केल्यानंतर कोर्टाने त्यांची रवानगी कोठडीत केली आहे. सत्पाळकर गजाआड झाल्यामुळे गुंतवणूकदारांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. आपले पैसे मिळणार की नाही अशा विवंचनेत गुंतवणूकदार आहेत. त्यातूनच कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचण्याची शक्यताही बळावली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कंपनीच्या व्यवस्थापनाकडूनही गुंतवणूकदारांना संयम राखण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांनी सुरू केलेल्या तपास प्रक्रियेत कंपनीच्या वसई येथील मुख्य कार्यालयातील सर्व्हर ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच वसई येथील मुख्यालयाला सील केल्याने तेथील दैनंदिन व्यवहारही ठप्प झाले आहेत. कंपनीने केलेल्या आर्थिक गुंतवणूकीवर मंदीमुळे परतावा मिळण्यास उशीर होत आहे. परिणामी कंपनीकडे गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांनाही पैसे देण्यास विलंब होत असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.

गुंतवणूकदारांनो पुढे या!

मैत्रेय प्लॉटर्स ऍण्ड स्ट्रक्चर्स प्रा. लि. कंपनीविरोधात सरकारवाडा पोलिसांनी गुंतवणूकदारांच्या आर्थिक ठेवींच्या अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दहा तक्रारदारांचा पंधरा लाख रुपयांचा अपहार झाल्याची नोंद केली असली तरी हा घोटाळा त्यापेक्षा कितीतरी मोठा आहे. गुतंवणूकदारांनी तक्रारी द्याव्यात, असे पोलिसांचे आवाहन आहे. कंपनीने दिलेले धनादेश न वटणे ही गुंतवणूकदाराची फसवणूक आहे. तक्रारदारांनी पुढे येणे आवश्यक आहे. संचालिका वर्षा सत्पाळकर यांनी दिलेल्या माहितीची सत्यता पडताळून पाहिली जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश बारगळ यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिलिंडरमधून गॅस चोरी

$
0
0

राणेनगरमधून एकाला अटक; सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भरलेल्या सिलिंडरमधील गॅस काढून तो रिकाम्या सिलिंडरमध्ये भरून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचा गोरखधंदा गुन्हे शाखा दोनच्या पथकाने उघडकीस आणला आहे. याप्रकरणी राणेनगर येथील भगवती गॅस एजन्सीच्या डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यताही व्यक्त केली आहे.

गॅस सिलिंडर ही जीवनावश्यक वस्तू असली तरी तिचा पुरवठा करणाऱ्यांकडून ग्राहकांच्या डोळ्यात धूळफेक केली जात असल्याचा प्रकार गेल्या वर्षभरात तिसऱ्यांदा उघडकीस आला आहे. गुन्हे शाखा दोनचे सहायक पोलिस निरीक्षक आर. ए. साळुंके यांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवती गॅस एजन्सीच्या अजय सुधाकर काळे या डिलिव्हरी बॉयला ताब्यात घेण्यात आले आहे. ग्राहकांना निर्धारीत वजनापेक्षा कमी वजनाचे सिलिंडर दिले जात असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून वाढल्या होत्या. गॅस सिलिंडरची परस्पर चोरी केली जात असल्याच्या संशयावरून गुन्हे शाखेचे पोलिस सिलिंडरच्या वाहनांवर पाळत ठेऊन होते. पाथर्डी गावाजवळील

केशवनगर परिसरात भरलेल्या सिलिंडरमधील गॅस रिकाम्या सिलिंडरमध्ये भरत असताना काळे आढळून आला. स्टीलच्या पाईपच्या मदतीने कुशलतेने गॅस रिकाम्या सिलिंडरमध्ये भरला जात असल्याची माहिती तपासात आढळून आले. पोलिस निरीक्षक बी.एन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संजय ताजणे, देवकिसन गायकवाड, रमेश घडवजे, छगन सोनवणे आदींनी ही कारवाई करून त्याच्याकडून ३२ सिलिंडरच्या टाक्यांसह रिक्षा, स्टीलचा पाईप व तत्सम तीन लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चार रिकामे सिलिंडर तर २८ अर्धवट भरलेल्या सिलिंडरचा यात समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम परवानगीसंदर्भात हरित लवादात शुक्रवारी अपील

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील बांधकाम परवानगी थांबविण्याच्या हरित लवादाच्या आदेशाविरोधात आता बुधवारऐवजी शुक्रवारी (दि. १२) अपील दाखल केले जाणार आहे. महापालिकेने अपील दाखल करण्याचे काम अॅड. रघुनाथ महाबळ यांच्या एजन्सीला दिले असून, महाबळ स्वतः गुरूवारी पालिकेच्या खत प्रकल्पाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर शुक्रवारी पुण्याच्या हरित लवादात पुर्नविलोकन याचिका दाखल केली जाणार आहे.

कचऱ्याच्या प्रश्नांवरून हरित लवादाने नाशिकमधील बांधकामे थांबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सुमारे दोन महिन्यांपासून शहरातील बांधकाम परवानग्या थांबल्या असून, बिल्डरांसह ग्राहकांमध्ये अस्वस्थता आहे. शहराचा विकास ठप्प झाला असल्याने व्यावसायिक अस्वस्थ आहेत. तर हरित लवादाच्या निर्णयाला वरच्या न्यायालयात अपील केल्यास निकाल विरोधात जाण्याची शक्यता होती. त्यामुळे महापालिकेने या निर्णयाला पुण्याच्या हरित लवादात पुर्नविलोकन याचिका दाखल निर्णय घेतला आहे. महापालिकेने या संदर्भातील प्रतिज्ञापत्र तयार केले असून, हरित लवादाचे अॅड.रघुनाथ महाबळ अॅड कंम्पनी यांना वकील पत्र दिले आहे. त्यामुळे अॅड.महाबळ हे गुरूवारी नाशिकमध्ये येवून खत प्रकल्पाची पाहणी करणार आहे. त्यानंतर शुक्रवारी(ता. १२) लवादात अपील दाखल करणार आहेत. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना दिलासा मिळण्याचे चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदल्यांचा दुसरा लॉट पुढील आठवड्यात

$
0
0

कर्मचाऱ्यांना रोखल्यास विभागप्रमुख जबाबदार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत पहिल्या टप्प्यात २४९ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या पहिला टप्पा पार पडल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात ५३५ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रस्तावित आहेत. हा दुसरा टप्पा पुढील आठवड्यात पार पडणार आहे. कर्मचाऱ्यांनी या बदल्याची चांगलीत धास्ती घेतली आहे. पाणीपुरवठा विभागातील नऊ कर्मचाऱ्यांना बदलीतून सूट देण्यात आली आहे. जे कर्मचारी बदलीच्या ठिकाणी हजर होणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

महापालिकेने पहिल्या टप्प्यात २४९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. एकूण एक हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रस्तावित आहेत. आता बदल्यांचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम सध्या जळगावातील घरकूल घोटाळ्यातील सुनावणीत व्यस्त आहेत. ते परतल्यानंतर पुढील आठवड्यात या बदल्यांवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. सद्यस्थितीत पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना बदलीतून सूट मिळणार आहे. तर पहिल्या टप्प्यात ज्या कर्मचाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी हजेरी लावली नाही, त्यांच्यावर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे. सोबतच विभागप्रमुखांवरही जबाबदारी निश्चित केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'टीडीआरप्रकरणी हायकोर्टाचा दिलासा नाहीच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने नुकतेच जाहीर केलेल्या नव्या टीडीआर धोरणाविरोधात मनसेने हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. शासकीय अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यास स्थगिती देण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. परंतु, शासनाच्या वकिलांनी हायकोर्टात बाजू मांडण्यासाठी मुदत मागितली. हायकोर्टाने शासनाला एक महिन्याची मुदत दिल्याने ही सुनावणी आता ११ मार्चला होणार आहे. त्यामुळे टीडीआर प्रकरणात तात्पुरता दिलासा मिळाला नाही.

राज्य सरकारने नुकतेच जाहीर केलेल्या नव्या टीडीआर धोरणात नऊ व साडेसात म‌ीटर रुंदीच्या रस्त्यांवर आता टीडीआर देण्यास मनाई करण्यात आली आहे. नाशिकचे बहुतेक रस्ते ६, ७.५० व ९ मीटरच्या आतच आहेत. त्यामुळे या निर्णयाचा सर्वाधिक फटका नाशिकच्या विकासाला बसणार आहे. नव्या डीपीत प्लॉटधारकांना अधिक टीडीआर देऊन घरे स्वस्त करण्याचा प्रयत्न होत असतानाच, शासनाच्या या निर्णयाने सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न भंगणार आहे. संबंध‌ित निर्णय हा सर्वसामान्यांना घरापासून वंचित ठेवणारा असून, अधिकारी धार्जिणा आहे. त्यामुळे या निर्णयावर शासनाने तत्काळ फेरविचार करून तो मागे घ्यावा, अशी मागणी करणारी याचिका मनसेनेच्या वतीने हायकोर्टात दाखल झाली आहे. बुधवारी न्या. अभय ओक यांच्या पीठासमोर सुनावणी होवून अॅड.सचिन गोरवाडकर यांनी आदेशाला स्थगिती देण्याची मागणी केली. त्यावर शासनाच्या वकिलांनी म्हणणे मांडण्यासाठी मुदत मिळावी अशी मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांद्याला हंगामातील निच्चांकी भाव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड
गेल्या आठवडाभरापासून कांद्याचे बाजार भाव सातत्याने कोसळत आहे. यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला असून, लासलगाव बाजार समितित कांद्याला या हंगामातील सरासरी ६४० रूपये इतका निच्चांकी भाव मिळाला आहे.

आठवड्याभरापूर्वी कांद्याला ९०० ते १००० रूपए असे सरासरी भाव होते. त्यामध्ये सातत्याने घसरण होऊन बुधवारी ६४० रूपयांपर्यंत भाव खाली आला. यात अजुनही घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पिंपळगाव बाजार समितीत बुधवारी कांद्याला सरासरी ७०१ रूपये भाव होता. गुजरात, राजस्थान या राज्यातील कांदा मार्केटमध्ये आल्याने महाराष्ट्रातील कांद्याची मागणी कमी झाल्याने कांद्याचे दर दिवसागणिक कोसळत आहेत. सध्याचा उन्हाळ (गावठी) कांदा मार्केटला येत आहे. या कांद्याची लागवड निफाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात झाली आहे. लागवड झालेल्या कांद्यापैकी फक्त २० टक्केच कांदा मार्केटला आला आहे. त्यामुळे येत्या काळात दर कोसळण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पर्धा परीक्षेसाठी सकारात्मक दृष्टीकोन गरजेचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी केले.

महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचलनालय व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आयोजित नाशिक ग्रंथोत्सव अंतर्गत 'स्पर्धा परीक्षेचे विश्व' या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी संपादक श्रीमंत माने, शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुरज मडावी उपस्थित होते. कुशवाह म्हणाले, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना यशस्वी होण्याचे उद्दिष्ट समोर ठेवूनच प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यास केला पाहिजे. आज स्पर्धा ही केवळ परीक्षेत नसून प्रत्येक क्षेत्रात आहे. त्यामुळे स्पर्धेला सामारे जाताना जिद्द आणि कष्टासोबत सकारात्मक विचारही महत्वाचा आहे. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासोबत व्यक्तिमत्वाचा विकासालाही महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. समाजाचे ऋण फेडायचे असतील तर प्रशासन हे क्षेत्र अत्यंत योग्य आहे, असेही ते म्हणाले.

ते म्हणाले, की परीक्षेचा अभ्यास करतांना आपल्या चुकांचे मूल्यमापन स्वत: करावे. यश मिळाल्यावर त्याचा गर्व न करता जबाबदारीचा विचार युवकांनी करावा. प्रशासनात काम करत असतांना स्वभावात सौम्यता आणणे आवश्यक असते. म्हणून परीक्षेची तयारी करत असतांनाच कमी बोलणे व अधिक ऐकण्याची क्षमता वाढविण्याची गरज आहे.

३० हजार रुपयांच्या पुस्तकांची विक्री

ग्रंथ प्रदर्शनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून शासकीय ग्रंथांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. शासकीय मुद्रणालायाच्या स्टॉलवर पहिल्याच दिवशी ३० हजार रुपयांची विक्री झाली. यात मराठी शब्दकोश, भाषा, चळवळ साहित्य आदिंचा समावेश होता. त्याचप्रमाणे वैशाली प्रकाशन, ज्योती प्रकाशन व शिल्पा प्रकाशन इत्यादींच्या स्टॉलवर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. यातील बाल साहित्याला चांगली मागणी असून अनेक शाळांनी आपल्या वाचनालयाला लागणारी पुस्तके या प्रदर्शनातून खरेदी केली. आज या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाढीव पाणीकपातीचा आज सोक्षमोक्ष

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक शहरातील वाढीव पाणीकपातीवरून सध्या महापालिकेतील महाआघाडी आणि भाजपमधील सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी आता महापौरांनीच पुढाकार घेतला आहे. भाजपच्या दबावाखाली येऊन प्रशासनाने लागू केलेल्या छुप्या कपातीचा डाव उघडकीस आल्यानंतर मनसे भाजपाच्या वादात नागरिकांचे हाल होऊ नये म्हणून महापौरांनी वाढीव पाणीकपातीचा एकदाचा सोक्षमोक्ष लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील चारही आमदार, एक खासदार आणि सर्वपक्षीय गटनेत्यांच्या उपस्थितीत महापालिकेत बैठक बोलाविण्यात आली आहे. त्यामुळे पाणीकपातीच्या विषयावर एकदाचा तोडगा निघण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ३१ जुलैपर्यंत पाणी पुरविण्यासाठी चार दिवसांपासून प्रशासनाने प्रायोगिक तत्त्वावर १० टक्के कपात सुरू केली होती. परंतु सत्ताधाऱ्यांना अंधारात ठेवून ही कपात लागू केल्याने मोठा वाद ओढवल्याने हा निर्णय मागे घेण्यात आला. गुरूवारपासून शहरात पाणीपुरवठा सुरळीत होईल.

शहरात गेल्या तीन महिन्यापासून वाढीव पाणीकपातीवरून मनसे आणि भाजपमध्ये संघर्ष पेटला आहे. महापालिका एकीकडे वाढीव पाणीकपातीला तयार असताना भाजपचे आमदार कपातीला विरोध करत आहेत. परंतु त्याच वेळी छुपी पाणीकपातही नागरिकांवर लादली जात आहे. त्यामुळे या वादात मात्र नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे या वाढीव पाणीकपातीचा एकादाचा काय तो सोक्षमोक्ष लावण्याचा निर्णय महापौरांनी घेतला आहे. सध्याच्या उपलब्ध पाणीसाठा आणि शिल्लक दिवसांमध्ये २६ दिवसांचा तुटवडा येत आहे. त्यामुळे वाढीव पाणीकपात अटळ असल्याने त्याचा अंतिम निर्णय घेण्यासाठी आता महापौरांनी आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, सीमा हिरे, योगेश घोलप, खासदार हेमंत गोडसे, उपमहापौर गुरूमीत बग्गा आणि सर्व पक्षाच्या गटनेत्यांची एकत्र‌ित बैठक बोलविली आहे. महापौरांच्या दालनात दुपारी चार वाजता ही बैठक होणार असून, त्यात वाढीव पाणीकपातीचा अंतिम फैसला घेतला जाणार आहे.

या बैठकीत उपलब्ध पाण्याची वस्तुस्थिती सादर केली जाणार असून, प्रशासनाचीही भूमिका जाणून घेतली जाणार आहे. त्यामुळे सध्या राजकीय पक्षांनी सुरू केलेल्या पाणी वादातून नागरिकांची सुटका होण्याची शक्यता आहे.

जलकुंभनिहाय वाढीव कपात?

संपूर्ण शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात लागू करणे तांत्रिक दृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे जलकुंभ निहाय किंवा विभागनिहाय आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्यावर सध्या सत्ताधाऱ्यांमध्ये खल सुरू आहे. कपातीच्या दृष्टीकोनातून जलकुंभ निहाय एक दिवस कपात शक्य आहे. त्यामुळे यावर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीडीआर, वीज बैठक निष्फळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक नवीन विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) धोरण आणि औद्योगिक वीज दराच्या प्रश्नावर मुंबईत बैठक होऊनही त्यात राज्य सरकारकडून कुठलाही दिलासा मिळाला नसल्याने नाशिकच्या माथी अन्यायच आला आहे. टीडीआरप्रश्नी हायकोर्टात जाण्याचा पवित्रा बांधकाम उद्योगातील संघटनांनी घेतला आहे तर वीज प्रश्नामुळे नाशिकचे उद्योग स्थलांतर होण्याची मोठी भीती आहे.

राज्य सरकारने नुकतेच जाहीर केलेले टीडीआर धोरण बांधकाम क्षेत्रासाठी आणि सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नांसाठी जाचक असल्याचे समोर येत आहे. त्याबाबत नाशिकच्या विविध संस्था-संघटनांनी असंतोष व्यक्त केला आहे. त्याशिवाय नाशिकच्या बांधकाम उद्योगाचे अनेक प्रश्न आहेत. तसेच, मराठवाडा आणि विदर्भातील उद्योगांना अल्पदरात वीज उपलब्ध करुन देण्याचे राज्य सरकारने घोषित केले आहे. याचा नाशिकच्या उद्योग जगताला मोठा फटका बसणार आहे. या दोन्हींबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बुधवारी दोन स्वतंत्र बैठका झाल्या.

नाशिकच्या दोन शिष्टमंडळांनी भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले पण त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळू शकलेला नाही. याप्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, सीमा हिरे, डॉ. अपूर्व हिरे, बांधकाम व्यावसायिक अविनाश शिरोडे, नरेश कारडा, विजय सानप, उद्योजक मंगेश पाटणकर, मिलिंद राजपूत, राजेंद्र अहिरे आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

टीडीआर धोरणाने नाशिकच्या बांधकाम व्यवसायावर विपरीत परिणाम होणार आहे. ६ आणि ७.५ मीटर रस्त्यालगत असलेल्या छोट्या प्लॉटधारकांना कुठल्याही प्रकारचा टीडीआर यापुढे मिळणार नाही. यापुढे छोट्या रस्त्यांलगत छोटी घरेच बांधली जावीत, अशी सरकारची भूमिका असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. जुन्या बिल्ड‌िंगचे नुतनीकरण करण्यास कुठलीही अडचण येणार नाही, पूर्वलक्षी प्रभावाने धोरण लागू होणार असल्याने त्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करा, बांधकाम उद्योगातील अडचणींच्या संदर्भात योग्य आणि व्यावहारिक प्रस्ताव सादर करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. दोन्ही बैठकांमधून नाशिकच्या हिताचा कुठलाही निर्णय न झाल्याने दोन्ही शिष्टमंडळांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

रात्री वीज सवलतीत घ्या

विजेच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट निष्फळ ठरली आहे. मराठवाडा आणि विदर्भावरील अनुशेष भरुन काढण्यासाठीच ही सवलत असून, राज्यातील अन्य भागाला आजवर अनेक सवलती मिळाले असल्याची टिपण्णी मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांनी केली आहे. मात्र, रात्रीच्यावेळी नाशिकच्या उद्योगांना सवलत देण्याची तयारी ऊर्जामंत्र्यांनी दर्शविली आहे. सवलत न मिळाल्याने नाशकातून मोठ्या प्रमाणात उद्योग बाहेर जाण्याची भीती आहे.

कंपाऊंडची चौकशी

टीडीआर धोरणात मोकळ्या भूखंडांना कंपाऊंड करण्याची अट घालण्यात आली आहे. हे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणल्यानंतर त्यांनी ही अट गांभिर्याने घेतली आहे. याप्रकरणी चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

कपाटाबाबत लवकरच निर्णय

कपाटाच्या प्रश्नाबाबत येत्या काही दिवसातच सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मात्र हा निर्णय काय असेल याबाबत त्यांनी काहीही माहिती दिली नाही. त्यामुळे कपाटाचा प्रश्न अजूनही अधांतरीच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टुमदार कंक्राळा

$
0
0





सुदर्शन कुलथे

मालेगावच्या उत्तरेकडच्या भागात गाळणा टेकड्या पसरलेल्या आहेत. थेट धुळ्यापर्यंत पसरलेल्या या टेकड्यांवरच या परिसरातले काही मोजके किल्ले बांधलेले दिसून येतात. ऐतिहासिक वास्तूंनी सजलेल्या गाळणा किल्ल्याच्या नैऋत्येला कंक्राळा किल्ला उभा आहे. मालेगावच्या या माळमाथा भागातल्या भटकंती दरम्यान गाळण्याच्या किल्ल्यासोबतच कंक्राळ्याची भेट अनोखी ठरते.
00000000000
गिरिभ्रमण म्हणजे नुसती सहल अथवा पर्यटन नाही, तर गड-किल्ल्यांचं स्थान, भौगोलिक रचना, मार्ग, इतिहास यांचा सखोल अभ्यास आणि त्याचबरोबर शारीरिक फिटनेस, मौजमजा आणि आनंद देणारी एक परिपूर्ण भटकंती होय. या गिरिभ्रमण-गिर्यारोहणाचा छंद एकदा लागलं की सुटणं कठीण. मग प्रमुख गड-किल्ल्यांसोबत दुर्लक्षित, अप्रकाशित ठिकाणांचीही स्वच्छंदपणे मुशाफिरी सुरू राहते. आजच्या या धावपळीच्या युगात आपल्या कामातून वेळ काढत, सुटीचा दिवस सत्कारणी लावत, नियोजनबद्ध रितीने केलेली मुशाफिरी तर आपल्याला आगळाच आनंद देते.
अशाच एखाद्या मोकळ्या दिवशी मालेगावच्या डोंगराळ माळमाथ्याच्या भागात धुमश्चक्रीला निघायचं. मालेगावच्या उत्तरेला गाळणा टेकड्या पसरलेल्या आहेत. त्यातच कंक्राळा हा छोटेखानी पण टुमदार असा किल्ला वसलेला आहे. या कंक्राळ्याला पोहोचण्यासाठी आपलं खाजगी वाहन घेऊन गेलेलं बरं. कारण या भागात वाहतूकीची तशी थोडी गैरसोय होऊ शकते. मालेगावहून करंजगव्हाण हे साधारण १५ कि.मी. तर करंजगव्हाणहून कंक्राळा गाव हे पाच-सात किमीचं अंतर.
रस्ते तसे चांगले असले तरी या भागात पाण्याचं दुर्भिक्ष्य असल्याचं जाणवतं. उजाड वाटणाऱ्या या प्रदेशात लहानशा कंक्राळा गावाची स्थिती मात्र थोडी बरी आहे. कांदा, कापूस, डाळिंब अशी पीकं इथे घेतली जातात. इनमिन तीन हजार लोकसंख्या असलेल्या कंक्राळा भागातला शेतकरी हा काबाडकष्ट करून जगणारा, फारसा सधन नसलेला, सर्वसामान्य असा दिसून येतो. इकडे आल्यावर फार वेगळ्याच ठिकाणी एखाद्या वाळवंटी खडकाळ भागात आल्यासारखं वाटतं. इथलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली माती. ही माती बांधकामासाठी अतिशय उत्तम असल्याचं समजतं. अगदी सिमेंटसारखी सुबक आणि मजबूत अशी ही माती आहे. गावातली काही जूनी घरं शंभर-दीडशे वर्षांपूर्वीची असली तरी आजही अगदी भक्कम स्थितीत उभी असलेली दिसतात.
सर्व गाव बघताबघता किल्ल्याचा मार्ग विचारायचा. गावातली मंडळी किल्ल्याकडे बोट करून रस्ता दाखवतात. गावाच्या पाठीशी किल्ला उभा आहे. डोंगरमाथ्याकडे उभ्या कातळावर पांढरा चूना फासलेला दिसतो, त्या दिशेने किल्ल्याकडे मोर्चा वळवायचा. किल्ल्यापर्यंतचा रस्ता ठळक नसला तरी चुकत नाही. या उजाड मैदानातून कंक्राळा दुर्गाच्या पायथ्याशी आपण पोहोचतो. चालता चालताच किल्ल्याचं निरीक्षण करायचं. कंक्राळ्याच्या माथ्यावर असलेल्या दोन टेकड्यांमधून खाली उतरलेली एक घळ दिसते. त्या घळीतूनच किल्ल्यावर चढायचा मार्ग आहे. या घळीच्या दिशेने कुच करत वर चढायला लागायचं. या घळीतून पडलेल्या दगडांमधून नागमोडी वळणं घेत वर चढायचं. घळीत भरपूर झाडं आहेत. सिताफळ, डाळिंब आणि काही काटेरी झुडूपं. या झाडांवर आपण फळं शोधण्याच्या आधीच उथल्या माकडांनी ती कधीच फस्त केलेली असतात. इथं काळ्या आणि लाल तोंडाच्या माकडांचे टोळके दिसतात. वीस-पंचवीस मिनिटांतच आपण दोन टेकड्यांच्या खिंडीत येऊन पोहोचतो. खिंडीत पोहोचताच एक दगडी तटबंदी असलेली भिंत आपल्या समोर येते. ही तटबंदी डावीकडच्या टेकडीवर सलग जाऊन त्याबाजूला एक गोलाकार मोठा बुरूजही दिसतो. ही तटबंदी खिंडीतून आपलं लक्ष वेधून घेते. उजवीडच्या उभ्या कातळकड्यात काही गुंफा कोरलेल्या दिसून येतात. ही पाण्याची टाकी असून त्यात बारमाही पाणी आढळतं. काहीतर वरच्या भागात अशी कोरलेली आहेत की या टाक्यांपर्यंत जाण्यासाठी कातळातच मार्गही खोदलेला आहे. इथंच एक खुरटं असं चिंचेचं झाड दिसतं. त्याच्या जवळच कातळाला पांढरा रंग फासलेला आहे. या ठिकाणी पीरबाबाचं ठिकाण असल्याचं गावकरी मानतात. त्याला नवस बोलून कंदूरी करण्याची प्रथाही इथे आहे. कंदुरी म्हणजे बोकडबळी देऊन फेडलेला नवस. ही कंदूरीची प्रथा सटाण्याच्या अंतापूरला दर्ग्यात मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. असो. आपणही पीराला नमस्कार करून नाही बोकड, तर निदान आपल्या डब्यातली चटणी-भाकरी, पोळी भाजी चवीनं खायची आणि टाक्यातलं थंडगार पाणी पिऊन पुन्हा खिंडीत यायचं अन् गडमाथ्यावर चक्कर मारायची.
किल्ल्याच्या उजवीकडील व डावीकडील भाग थोडा उंचावलेला असल्यानं त्यामध्ये खोलगट भाग तयार झालेला आहे. इथंच दगडी तटबंदी बांधलेली आहे. इथून थोडं पुढे सरकलं, की तटबंदी असलेल्या प्रवेशद्वाराचे अवशेष दिसतात. किती सुंदर प्रवेशद्वार असेल याचा अंदाज ढासळलेल्या कोरीव दगडांवरून लावता येतो. थोडं निरखून बघत राहीलं तर भूतकाळातला भव्य चिरेबंदी दरवाजा आपल्यासमोर उभा राहतो. 'बा अदब... बा मुलाहिजा..' अशी हाक जरी कुणी दिली नाही तरी या प्रवेशद्वारातून अदबीने प्रवेश करायचा. इथं उजव्या रांगेत काही पाण्याचे टाके आढळतात. काही कोरडी तर काही मातीने भरलेली. त्यानंतर एक घराचं जोतं आणि त्याच्या वरच्या बाजूला म्हणजे उजवीकडील उंचवट्यावर एका घराचे अवशेष दिसतात. घराचे अवशेष पाहून गडाच्या पूर्व बाजूने निघत गोल फिरायचं. पूर्व बाजूकडे खाली उतरून दरीच्या काठावर यायचं. इथं. पाण्याच्या पाच टाक्या खोदलेल्या आहेत. त्यापैकी काही टाक्यांतलं पाणी पिण्यायोग्य आहे. इकडून आजबाजूचे ठेंगणे ठुसके डोंगर न्याहाळायचे. सपाट मैदानावर उठावलेल्या छोट्याछोट्या टेकड्यांमध्ये गाळणा किल्ला शोधून काढायचा. गडफेरी तशीच चालू ठेवत पुन्हा खोलगट भागाकडे म्हणजे खिंडीत परतायचं. आता डावीकडील उंचवट्याच्या भोवतालची तटबंदी बघत प्रदक्षिणा मारायची. याच्या वरच्या भागात काही जोती आढळतात. बाकी तटबंदीशिवाय काही नाही. इकडून लांबवर नजर भिरकवली तर आपल्या ओळखीचे डोंगर-किल्ले भेटतात का ते शोधायचं.
कंक्राळा दुर्गावरची तटबंदी, बुरूज, पाण्याच्या टाक्यांची रांग, घरांचे अवशेष, विखूरलेली जोती असा सर्व पसारा बघून इथं पूर्वी नक्कीच चांगला राबता असणार यात शंका नाही. पण इतिहासात मात्र कंक्राळ्याची पानं सापडत नाहीत. पण लळींग, गाळणा या परगण्यांप्रमाणे असणाऱ्या किल्ल्यांमध्ये 'कंक्राळा' असं बुलंद नाव घेऊन हा किल्ला मानाने उभा असलेला दिसतो.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आणखी वाढीव पाणी येणार कुठून?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर धरणातून मराठवाड्याला पाणी दिल्यानंतर पाण्यावरून सुरू झालेल्या राजकारणाने कळस गाठला आहे. वाढीव पाणीकपातीवरून मनसे, भाजपमध्ये टोलवाटोलवी कायम आहे. शहराला ३१ जुलैपर्यंत पाणी पुरविण्यासाठी आणखीन २५ दिवस पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. त्यासाठी आणखीन ३०० दशलक्ष घनफूट पाण्याची गरज आहे. मात्र, धरणात जादा पाणी उपलब्ध नसतांनाही भाजप आमदारांनी वाढीव पाणीकपातीला विरोध करत आणखीन पाणी देवू, अशी भूमिका कायम ठेवली आहे. त्यामुळे हे ३०० दशलक्ष घनफूट पाणी येणार कुठून? असा सवाल सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केला आहे. तर अतिरिक्त पाण्यावरून भाजपची पुन्हा कोंडी होणार आहे.

शहरातील वाढीव पाणीकपातीचा निर्णय घेण्यासाठी गुरूवारी महापौर अशोक मुर्तडक यांनी आमदारांसह गटनेत्यांची बैठक बोलावली होती. यात उपमहापौर गुरूमीत बग्गा, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, आमदार बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. अपूर्व हिरे, स्थायी समिती अध्यक्ष शिवाजी चुंभळे, विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, सभागृह नेते सलिम शेख, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते, भाजप गटनेते संभाजी मोरुस्कर, काँग्रेस गटनेते शाहू खैरे, मनसे गटनेते अनिल मटाले, माकप गटनेते तानाजी जायभावे, आरपीय गटनेते प्रकाश लोंढे, दिनकर पाटील उपस्थित होते.

बैठकीत अधीक्षक अभियंता यू. बी. पवार यांनी पाण्याची वस्तुस्थिती सादर केली. गंगापूर धरणात आता महापालिकेसाठी १३८३ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. तर १७१ दिवस पाणी पुरवायचे आहे. सध्याच्या १२.३५ क्यूसेक प्रमाणे पाणी पुरवायचे झाल्यास २५ दिवसांचा गॅप कायम आहे. त्यावर आमदार सानप यांनी महापालिकेच्या पाणीगळतीवर बोट ठेवत, काटकसरीने पाणी वापरण्याचा सल्ला दिला. शहरात पाण्याचा अपव्यव होत असल्याचा आरोप त्यांनी महापालिकेने सुरुवातीलाच जास्त पाणी का मागितले नाही, असा प्रश्न केला. आम्हीही २० वर्षांपासून सभागृहात काम करतो. मात्र, अशा प्रकारचे राजकारण आम्ही केले नाही. सत्ताधारी पक्ष जनतेला घाबरवित आहे. ते तातडीने थांबले पाहिजे, असे सांगत त्यांनी पाणीकपातीला विरोध केला. गरज वाटल्यास अजून पाणी उपलब्ध करून देवू असा दावा त्यांनी केला. सानपांच्या या आक्रमकतेमुळे बैठकीचा रंग बदलला. मनसे नगरसेवकांनी भाजपला टार्गेट करत जुने विषय उकरून काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे बैठक निर्णयाविना संपली.

सानपांची 'दबंगगिरी'

भाजप शहराध्यक्ष असलेल्या आमदार बाळासाहेब सानप यांनी एकहाती किल्ला लढवीत सत्ताधारी मनसे, शिवसेना, काँग्रेस सदस्यांना तोंड दिले. तसेच बैठकीत त्यांनी थेट अधिकाऱ्यांना दमबाजी केली. माहिती देण्याच्या प्रयत्न करणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनाही बोलू न देता खाली बसण्यास आमदार सानप यांनी भाग पाडले. त्यांच्या या दबंगशाहीमुळेच नगरसेवक आणि सानप यांच्यात वादावादी झाली. शेवटपर्यंत त्यांनी मनसेच्या पाणीकपातीचा प्रयत्न उधळून लावला.

मनसे पदाधिकाऱ्यांचा उथळपणा

महापौरांनी सामंजस्य भूमिका दाखवत सर्व गटनेते आणि आमदारांची वाढीव पाणीकपातीसंदर्भात बैठक बोलावली. मात्र, या बैठकीत मनसेच्याच पदाधिकाऱ्यांचा उथळपणा महापौरांच्या अंगलट आला. मनसेचे जिल्हाप्रमुख सुदाम कोंबडे यांनी जायकवाडीच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित करून भाजप आमदारांना आयते कोलीत दिले. आमदार सानप यांच्यासमोर मागील कुरापती काढल्याने बैठकीत सानप आणि कोंबडे यांच्यातच तू-तू, मंै-मंै सुरू झाली. तर अनिल मटाले यांनीही भाजप आमदारांमुळे लोक घाबरायला लागल्याचे वक्तव्य केल्याने भाजप आमदार संतप्त झाले. महापौरांनी दोघांनाही शांत राहण्याचा सल्ला दिला. मात्र, गटनेते आणि नगरसेवक महापौरांचेही ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे महापौरही हतबल झाले. या संधीचा फायदा घेवून आमदारांनी बैठकीतून पाय काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मनसेचेच पदाधिकारी महापौरांच्या प्रयत्नांवर पाणी फिरवण्याचा प्रयत्न करत होते.



जलसंपदाचा यू-टर्न

जलसंपदा विभागाचे उपअभियंता एन. डी. महाजन यांनी प्रथम ३०० क्यूसेक पाणी महापालिकेला देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा खुलासा केला. त्यामुळे पहिले ३०० दशलक्ष घनफूट पाणी मिळाले नसल्याची बाबसमोर आली. त्यामुळे भाजप आमदारांची फसगत झाली. मात्र, आमदारांनी तातडीने सुत्रे फिरवत, जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र आल्याचे सांगितले. दुसरीकडे महाजन यांची कानउघाडणी केली. त्यामुळे बैठक संपण्यापूर्वी त्यांनी ३०० दशलक्ष पाणी महापालिकेला दिल्याचा खुलासा केला.

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत तोडगा

बैठकीत वादावादी, एकमेकांवर आरोप करण्याच्या राजकारणामुळे या बैठकीत तोडगा निघालाच नाही. त्यामुळे आता पुन्हा वाढीव ३०० दशलक्ष पाणीकपातीचा निर्णयाचा विषय पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे टोलवण्यात आला आहे. येत्या बुधवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेवून सर्वपक्षीय तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, ही बैठक लांबली तर महापालिका आपल्या स्तरावर निर्णय घेईल, असा इशाराच महापौरांनी आमदारांना दिला. त्यामुळे कपातीची टोलवाटोलवी सुरूच आहे.

बोरस्ते-सानप यांच्यात तू-तू,मैं-मैं

बैठकीत मनसे विरुद्ध भाजप असा वाद रंगला. आमदार बाळासाहेब सानप व शिवसेना गटनेते अजय बोरस्ते एकमेकांना चिमटे काढलेत. शिवसेनालाही सत्तेत असल्याची आठवण करून देत, माझ्या घरासमोर आंदोलन केले तेव्हा मला चहा पाजला आला नाही याची खंत वाटते, असा टोला सानप यांनी लावला. तर बोरस्ते यांनीही आम्ही सत्तेत असलो तरी जनतेसोबत असल्याचे सांगत जनतेची चेष्टा होवू देणार नाहीत असे प्रत्युत्तर दिले. पूर्ण बैठकीत शिवसेना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तू-तू, मैं-मैं सुरूच होती.

पाणीकपाती बैठक निष्फळ ठरली. सध्याच्या साठ्यात २५ दिवसांचा तुटवडा आहे. त्यामुळे बुधवारपर्यंत बैठक घेवून पालकमंत्र्यांनी निर्णय द्यावा. अन्यथा महापालिका आपल्या अधिकारात कपातीसंदर्भात निर्णय घेईल.

- अशोक मुर्तडक, महापौर

आमदार पाणी उपलब्ध करून देत असतील तर कपातीची गरज नाही. आम्हाला एकवेळ पूर्ण पाणी मिळावे. यापुढे पाणीकपात सहन करणार नाहीत.

- अजय बोरस्ते, गटनेता, शिवसेना

महापालिका हद्दीत पाणी अपव्यव होत असून प्रथम गळती थांबवावी. ३०० क्यूसेक पाण्याव्यतिरिक्त आणखीन पाणी उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. मनसेने राजकारण करू नये. - बाळासाहेब सानप, आमदार

शहराला रोज ३५० एमएलडीपेक्षा कमी पाणीपुरवठा करू नये. सध्याच्या कपातीत एक थेंब पाणी कमी केले तरी आम्ही रस्त्यावर येवून आंदोलन करू.

- गुरूमीत बग्गा, उपमहापौर

नाशिकमध्ये पाण्याचे पाट वाहत आहेत. पाणीगळती रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पालकमंत्र्यांसोबत बैठक घेवून वाढीव पाण्यासाठी प्रयत्न करू.

- प्रा. देवयानी फरांदे, आमदार

गळती लगेच थांबवणे अवघड आहे. १८०० किलोमीटरची जलवाहिनी आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करतांना धरणातून किती पाणी उचलले जाते व प्रत्यक्षात किती पाणी पोहचते, त्याचा हिशेब करून पाण्याचे नियोजन केले पाहिजे.

- डॉ. प्रवीण गेडाम, आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेंट फ्रान्सिसचा तिढा काही सुटेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सेंट फ्रान्सिस हायस्कूलच्या तिडके कॉलनी व राणेनगर या दोन्ही शाखांविरोधात वर्षभरापासून सुरू असलेला शाळा विरोधी पालक हा तंटा अद्यापही मिटलेला नसून पालकांनी शनिवारी (दि. १३) पुन्हा शाळेसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. जिल्हा प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याची खंत पालकांमध्ये असून शाळेला वठणीवर आणण्यासाठी पुन्हा बंड पुकारण्याचे ठरवले आहे.

शाळा अवाजवी फीची मागणी करीत असल्याच्या विरोधात पालकांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. शाळेने दहावीच्या फी न भरलेल्या विद्यार्थ्यांचे हॉलतिकिट रोखले असून, त्याविरोधात हे आंदोलन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेवर फी न भरल्याचे शेरे देणे, शैक्षणिक, बस फी भरण्याबाबत पालकांना वारंवार फोन करणे, निकाल न दाखविणे, विद्यार्थ्यांना वर्गात थांबून ठेवणे, विद्यार्थ्यांना मारणे या कारणांमुळे पालकांनी शाळेविरोधात वर्षभरात इंदिरानगर पोलिस स्टेशन, सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तसेच मनपा शिक्षणमंडळातील सुनावणीतही शाळेला खडसावले असून विद्यार्थ्यांना त्रास न देण्याची सूचना देण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला शाळा प्रशासनानी पालकांविरोधात रितसर कायदेशीर नोटीस पाठवून फी न भरल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या परिस्थितीला गंभीर वळण मिळाले आहे. या तक्रारींचा शाळेनी मात्र विरोध केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हातगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सुरगाणा तालुक्यातील हातगड या डोंगरी किल्यावर दुर्ग संवर्धन प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. किल्ल्यावरील धान्य शस्र, दारुगोळा साठवणुकीसाठी असणाऱ्या कोठी घराच्या आजूबाजूचा परिसर यावेळी स्वच्छ करण्यात आला.

या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी कचरा केला होता. नाशिकमधील विविध कॉलेजमधील विद्यार्थ्यांना घेवून ही मोहीम राबविण्यात आली. तब्बल दोन तास श्रमदान केल्यानंतर परिसर स्वच्छ झाला. यावेळी गडाच्या खाली पुष्पाताई हिरे प्राथमिक शाळेत विविध पाड्यांवरील शिक्षण घेत असलेल्या मुलांना संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, विजय कुमार घोटे यांनी निसर्गपर्यावरण, पक्षी आणि प्राण्यांविषयी माहिती दिली, गड कोट किल्याविषयी इतिहास सांगितला.

गुजरातच्या सरहद्दीवर हा किल्ला असून किल्यावर जाण्यासाठी कातळ खोदीव पायऱ्या असून, प्रवेशद्वाराजवळील एक दुर्मीळ शिलालेख पुरातन खात्याच्या दुर्लक्षमुळे धूळ खात पडला आहे. या किल्ल्याच्या वरच्या भागात पठाराची तटबंदी मोडकळीस आल्याचे दिसून येते. परिसरात अनेक पाण्याचे बारमाही तळी आहेत. किल्ल्यावर पाच दरवाजे व नऊ बुरुज बघावयास मिळतात. या किल्ल्यावर हस्तमान या ऋषींचे वास्तव्य असल्याची आख्यायिका आहे. शिवरायांचा इतिहास सांगणाऱ्या या किल्याची अवस्था सध्या बिकट आहे. किल्ल्यावर एकही वन कर्मचारी बघावयास मिळाला नाही.

मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, अजित जगताप, पक्षिमित्र भीमराव राजोळे, सागर घोलप, आशिष बनकर, दर्शन घुगे, धनंजय बागड, सलोनी वाघमारे,रेश्मा कोठुळे, अंजली व्यवहारे, कोमल महाले, शहाजादी पटेल,भाग्यश्री तापर, सागर बनकर, आकाश जाधव, पप्पू जगताप आदींसह विविध महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारसाठी झाला विवाहितेचा छळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कार विकत घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आल्याची घटना म्हसरुळ पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली. फिर्यादी महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचे पती वारंवार मानसिक छळ करून चारित्र्यावर संशय घेत शिवीगाळ व मारहाण करतात. बुधवारी रात्री ८ वाजता मारहाण करून अंगावरील दागिने काढून घेत घरातून हाकलून दिले असल्याचे फिर्यादी महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. म्हसरुळ पोलिसस्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पैशांसाठी छळ

घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरुन ५० हजार रुपये आणावेत यासाठी सासरकडील मंडळी छळ करीत असल्याची तक्रार मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये एका महिलेने दाखल केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार मानसीक व शारिरीक छळ सुरु होता बुधवारी संध्याकाळी ६ वाजता अंगावरील दागिने काढून घेत घरातून हाकलून दिल्याचेही महिलेने तक्रारीत म्हटले आहे. मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

इंदिरानगरमध्येही तक्रार

नवऱ्याला नोकरी लावण्यासाठी माहेरुन ५ लाख रुपये आणावे यासाठी सासरच्यांकडून वारंवार मानसिक व शारीरिक छळ होत असल्याची तक्रार महिलेने इंदिरानगर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. पैसे देत नसल्याने उपाशी ठेवून शिवीगाळ करीत अंगावरचे दागिने काढून घेत बुधवारी रात्री घरातून बाहेर काढून दिल्याचे महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कडीतोडून ऐवज लंपास

घराला कुलूप असल्याने व घरातील व्यक्ती बाहेर गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने कडी कोयंडा तोडून घरातील रोख रुपये २५ हजार, सोन्याचे दागिने, पितळी भांडे व गॅस सिंलेडर चोरुन नेल्याची घटना पंचवटी पोलिस स्टेशनच्या हद्दीत शुक्रवारी घडली सर्व मिळून १ लाख ३१ हजार पाचशे रुपयाचा ऐवज चोरीला गेला आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी घडल्याचा पोलिसांना संशय आहे. पंचवटी पोलिसस्टेशनमध्ये गुन्हा नोदविण्यात आला आहे.

ढिकले नगरला चोरी

गेल्या अनेक दिवसांपासून ढिकले नगर परिसरात चोऱ्यांचे सत्र सुरू असून, सोमवारी रात्री ३१ हजार ६०० रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ढिकले नगर येथील एक कुटूंब बाहेर गेल्याची संधी साधत रात्री ९.३० वाजता अज्ञात चोरट्याने घराचा कडी कोयंडा तोडून घरातील रोख रुपये २५ हजार, सोन्याचे वेढे, निरंजन असा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली आहे. दरम्यान, ढिकलेनगर परिसरातील चोरीसत्र तातडीने थांबवावे अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. या भागात पोलिस गस्त वाढवावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

मोटार सायकलची चोरी

घराबाहेर लावलेली यामाहा कंपनीची वाय. झेड. इ. आर, ७० हजार किमतीची मोटार सायकल अज्ञात व्यक्तीने इंदिरानगर परिसरातून चोरीला नेली असल्याची तक्रार इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे. मोटार सायकलाचा क्रमांक एमएच १५ एफडी ०६७५ असा आहे. ही गाडी कुणाला आढळल्यास इंदिरानगर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जुगार खेळताना अटक

इंदिरानगर येथील सप्तश्रृंगीमाता मंदिराजवळ अंदर बाहर नावाचा जुगारवर धाड टाकून एक जणाला अटक करण्यात आली. इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या व्यक्तीकडून ३३० रुपये जप्त करण्यात आले.

धावत्या रेल्वेतून पिस्तुलाची चोरी

धावत्या रेल्वेत ड्यूटीवर असणाऱ्या रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्याचे पिस्तूल व ९ काडतुसे चोरट्यांनी हातोहात लांबवली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी रात्री उशिरा चोरीचा गुन्हा दाखल केला.

मलकापूर येथील रेल्वे सुरक्षा बलाचे सहाय्यक निरीक्षक सुमित किशनचंद सैनिक सहकाऱ्यांसह हावडा-एक्सप्रेसमध्ये ड्युटीवर होते. डब्यातील स्वच्छतागृहात जाताना त्यांनी पिस्तूल व ९ काडतुसे सहकारी आर. एस. मिश्रा यांच्या बॅगमध्ये ठेवल्या. मनमाड स्थानक आल्यावर मिश्रा हे प्लॅटफार्मवर उतरले. गाडी सुरू झाल्यावर सदर बॅग चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. रेल्वे पोलिसांच्या तपासात चोरीला गेलेली बॅग मनमाड येथे रेल्वे ओव्हरब्रिजमागे सापडली. मात्र, त्यात पिस्तूल व काडतुसे आढळून आली नाहीत.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरटीओकडून शुल्क दुप्पट; एक ते पाच हजारांची आकारणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र मोटार वाहन नियमात सुधारणा करण्यात आल्याने आता विविध परवान्यांसाठी सुधारित शुल्क लागू होणार आहेत. हे शुल्क जवळपास दुप्पट झाले असून, यापुढे आता १ हजारांपासून ५ हजार रुपयांपर्यंतचे शुल्क आकारले जाणार आहे.

महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ चे नियम ७५ (१)(अ) मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे विविध परवान्यांसाठीच्या शुल्कात वाढ झाली आहे. मीटर बसविलेल्या मोटार कॅब, मीटर न बसविलेल्या मोटार कॅब, मॅक्सी कॅब, करारावरील वाहने, टप्पा वाहने, माल वाहतूक वाहने, खाजगी सेवा वाहने यांना परवाना देणे किंवा परवान्याचे नवीकरण किंवा प्रतिस्वाक्षरी यासाठी शुल्क आकारले जाते. आता हे शुल्क प्रत्येकी १ हजार रुपये सुधारित शुल्क आकारण्यात येणार आहे.

पर्यटक कॅबसाठी परवाना देणे किंवा परवान्यांचे नवीनीकरण आणि राष्ट्रीय परवाना देणे किंवा त्यांचे नवीनीकरण करण्यासाठी प्रत्येक २ हजार रुपये सुधारीत शुल्क असणार आहे. पर्यटक कॅब व्यतिरिक्त अन्य पर्यटन वाहनांसाठी उशीर झाल्यास प्रत्येक महिन्यासाठी प्रतिवाहन ५ हजार रुपये शुल्क लागणार आहे. ऑटोरिक्षा आणि टॅक्सी परवाना मुंबई बाहेर प्रत्येकी १० हजार, नवीन टॅक्सी परवान्यासाठी २० हजार रुपये परवाना शुल्क असणार आहे.


सुधारीत शुल्कासंदर्भात काही हरकती किंवा सूचना असतील तर त्या अपर मुख्य सचिव, गृह विभाग (परिवहन), दुसरा मजला, मंत्रालय, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०००३२ यांच्याकडे सादर कराव्यात.

-भारत कळसकर

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याची मादी जेरबंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

गेल्या अनेक दिवसांपासून तारूखेडले (ता. निफाड) शिवारात दहशद पसरवणारी बिबट्याची मादी अखेर पिंजऱ्यात जेरबंद झाली. या मादीसोबत पिंजऱ्यात दोन मृत बछडेही आढळून आले.

मादीने पिंजऱ्यात अडकल्यानंतर मारलेल्या धडकांमुळे बछड्यांचा अंत झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली. तर मादीनेच पिल्लांना संपविले असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे होते. याबाबत खात्रीशीर माहिती मात्र उपलब्ध होऊ शकली नाही. वन विभागाने मादीला नाशिक येथे रवाना केले, तर दोन्ही बछड्यांना सिन्नर येथे नेऊन त्यांची उत्तरीय तपासणी करून माळेगाव येथील उद्यानात त्यांचे दहन करण्यात आले. तारूखेडले शिवारात यापूर्वी ४ बिबट्यांना वनविभागाने जेरबंद केले आहे. याच परिसरात काही महिन्यांपूर्वी एक सातवर्षीय मुलगी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रंथालयांनी घ्यावा योजनांचा लाभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना कोलकाता येथील राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानामार्फत विविध उपक्रमांसाठी निधी उपलब्ध केला जातो. राज्यातील जास्तीत जास्त ग्रंथालयांनी याचा फायदा घ्यावा, असे आवाहन ग्रंथालय संचालक किरण धांडोरे यांनी केले आहे.

केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकातातर्फे शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांसाठी कार्यान्वित असलेल्या अर्थसहाय्याच्या समान निधी व असमान निधी योजनांमधून राज्याच्या ग्रंथालय संचालनालयामार्फत दरवर्षी अर्थसहाय्य देण्यात येते. त्या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना www.rrrlf.gov.in या प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. समान निधी योजना राज्य शासनाच्या ५० टक्के अर्थसहाय्यामधून असणाऱ्या या योजनेतून परिसंवाद, चर्चासत्रे व कार्यशाळा प्रशिक्षण वर्गाचे आयोजन, ग्रंथप्रदर्शने व वाचन संस्कृती रुजविण्यासाठीचे उपक्रम यासाठी अर्थसहाय्य करण्यात येते. तसेच सार्वजनिक ग्रंथालयांना इमारत विस्तार, बांधणीसाठी आणि फिरत्या ग्रंथालयांसाठी अर्थसहाय्य केले जाते.

तसेच असमान निधी योजनेतून ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसामुग्री फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसहाय्य देण्यात येते. सार्वजनिक ग्रंथालयातील बालविभाग, महिलाविभाग, ज्येष्ठ नागरिक विभाग, नवसाक्षर विभाग, स्वतंत्र स्पर्धा परीक्षा विभाग यासाठी प्रतिष्ठानकडून १०० टक्के अर्थसहाय्य दिले जाते. असमान निधी योजनांतर्गत महोत्सव करण्यासाठी प्रतिष्ठानकडून १०० टक्के अर्थसहाय्य केले जाते. शारीरिकदृष्ट्या विकंलाग व्यक्तींसाठी विभाग स्थापन करण्यासाठीही प्रतिष्ठानकडून १०० टक्के अर्थसहाय्य्‍ा देण्यात येते.

या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छूकांनी संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच, अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर मेनू बारमधील असिस्टंस या लिंकवर पाहावे. ग्रंथालयांनी समाननिधी व असमाननिधी योजनेसाठी विहीत पध्दतीत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह इंग्रजी, हिंदीतील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात २५ फेब्रुवारीपर्यंत पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाव पालिकेत कामबंद!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील नगरसेविका अखत्तरुन्निसा मोहम्मद अनिस यांचे पुत्र सादीक अहमद अनिस याने गुरुवारी मनपाच्या स्वच्छता कार्यालयात घुसून स्वच्छता अधीक्षक व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच, कार्यालयातील सामानाची तोडफोड केली. या प्रकाराने संतप्त झालेल्या अधिकारी, कर्मचारी यांनी शुक्रवारी मनपा प्रवेशद्वाराजवळ कामबंद आंदोलन केले. मनपा कर्मचारी व अधिकारी यांना दमदाटी करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली.

मनपाच्या स्वच्छता विभागातील जेसीबी शहरातील ६० फुटीरोडवरील गटारींची स्वच्छता करण्यासाठी पाठवावे, अशी मागणी नगरसेविका पुत्र सादीक अहमद अनिस याने स्वच्छता अधीक्षक गोविंद परदेशी यांच्याकडे केली होती. मात्र, सध्या शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असून, मोहीम आटोपली की जेसीबी स्वच्छता कामासाठी पाठवण्यात येईल, असे सादीक यास कळवण्यात आले होते. असे असताना देखील गुरुवारी त्याने स्वच्छता विभागाच्या कार्यालयात अधीक्षक गोविंद परदेशी व अन्य कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत धक्कबुक्की केली. तसेच, कार्यालयातील सामानाची तोडफोड केली. यामु‌ळे मनपा अधिकारी-कर्मचारी यांच्यात असंतोष निर्माण झाला होता.यावेळी मनपा उपायुक्त कमरूदीन शेख, राजेंद्र फातले, विलास गोसावी, शकील सैय्यद, राजेश धसे, खालिद महवी, जहीर अन्‍सारी, युनियन नेते महादू पगारे, मनोहर पेंटर आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते.

काळ्या फिती लावून कर्मचा-यांकडून निषेध

या घटनेचा निषेध म्हणून मनपा अधिकारी-कर्मचारी संघटनेच्या वतीने सकाळपासून कामबंद आंदोलनास सुरुवात झाली होती. मनपाच्या प्रवेशद्वारवार कर्मचारी अधिकारी यांनी एकत्र येऊन निषेध व्यक्त केला. यावेळी उपायुक्त कमरुद्दीन शेख यांनी गुन्हेगाराला तत्काळ अटक करावी व आशा पध्दतीने अरेरावी व गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच, दिवसभर काळ्या फिती लावून कार्यालयात कामे तसेच, प्रभाग एकचे अधिकारी पंकज सोनवणे आणि त्यांचे कर्मचारी यांनी कार्यालय ते मनपा असा मोर्चा देखील काढला.

आयुक्तांनीही घेतली दखल या प्रकरणी आयुक्त किशोर बोर्डे यांना निवेदन देण्यात येऊन संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली होती. आयुक्तांनी देखील या प्रकरणाची गंभीर दाखल घेत गुन्हा नोंदवण्याचे आदेश उपायुक्त राजेंद्र फातले यांना दिले होते. त्यानुसार शिवीगाळ व धक्काबुक्की करून कार्यालयातील समानाची तोडफोड करणाऱ्या सादिक अहमद अनिस याच्यावर येथील किल्ला पोलिस व पवारवाडी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाेटीतील भाजीबाजाराचे लवकरच स्थलांतर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या घोटी शहरातील रस्त्यावर असलेल्या भाजी बाजाराचे पर्यायी जागेत स्थलांतर करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. आठ दिवसात पर्यायी जागेत भाजीबाजारासह रस्त्यावरील बाजार स्थलांतर होणार आहे.

घोटी शहरातील रस्त्यावर बसणारे भाजी विक्रेते व अन्य विक्रेत्यांशी चर्चा करण्यासाठी नवीन व पर्यायी जागेचे नियोजन करण्यासाठी प्रभारी गटविकास अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॉ. भटिंडा ए. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी, ग्रामपालिका सदस्य व विक्रेते यांची संयुक्त बैठक घोटी ग्रामपालिका कार्यालयात पार पडली. या बैठकीस सरपंच कोमल गोणके, उपसरपंच समाधान जाधव, ग्रामविकास अधिकारी संजय बेनाडे यांच्यासह ग्रामपालिका सदस्य उपस्थित होते.

या बैठकीत पर्यायी जागेचे नियोजन, जागेचा आराखडा, देण्यात येणाऱ्या सुविधा, विक्रेत्यांची भूमिका यावर साधकबाधक चर्चा झाली. प्रारंभी विक्रेत्यांची भूमिका जाणून घेतली. विक्रेत्यांनी आपली भूमिका मांडली. दूरवर भाजीबाजार जाणार असल्याने खरेदी-विक्रीवर होणारा प्रतिकूल परिणाम, संभाव्य सुविधांचा अभाव यावरही चर्चा झाली. दरम्यान, टप्याटप्याने ग्रामपालिका सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे नमूद करण्यात आले. रस्त्यावरील सर्वच विक्रेत्यांना पर्यायी जागेत स्थलांतर करण्याच्या निर्णयावर एकमत झाले. किमान आठवडे बाजाराच्या दिवशी तरी रस्त्यावरील सध्याच्या जागेवर बसू देण्याची विक्रेत्यांची विनंतीही अधिकाऱ्यांनी धुडकावून लावली. या बैठकीत प्रभारी अधिकारी भटिंडा ए. राजा दयानिधी, तहसीलदार महेंद्र पवार, उपसरपंच समाधान जाधव, सदस्य संतोष दगडे, रामदास शेलार, बाळासाहेब झोले, ग्रामसेवक संजय बेनाडे व विक्रेते आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

घोटी शहरातील रस्त्यावर बसलेल्या विक्रेत्या व व्यापाऱ्यांनी विक्रीस ठेवलेल्या वस्तू मार्किंगच्या आत ठेवाव्यात. दोन दिवसात मार्किंगच्या आत बसण्याची व्यवस्था व अंमलबजावणी करावी अन्यथा कारवाई करण्यात येईल. - भतांडा ए राजा दयानिधी, सहायक जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images