Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

दिंडोरी नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस, शिवसेनेतर्फे अर्ज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

दिंडोरी नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्ष निवडणुकीसाठी काँग्रेसचे भाऊसाहेब बोरस्ते व शिवसेनेचे प्रमोद देशमुख या दोन माजी सरपंचांनी अर्ज दाखल केले आहे. शनिवारी ३० जानेवारीला नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांची निवडणूक होणार आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करीत निवडणूक लढवत काँग्रेसने सात, तर राष्ट्रवादीने तीन जागा जिंकत बहुमत मिळवलेले आहे. त्यांनी दहा नगरसेवकांच्या गटाची नोंदणी केली आहे. शिवसेनेला दोन अपक्ष, तीन तर मनसे व भाजपला प्रत्येकी एक जागा मिळालेली आहे. शिवसेनेचे प्रमोद देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सात नगरसेवकांच्या गटाची नोंदणी झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे बहुमत असल्याने भाऊसाहेब बोरस्ते हे नगराध्यक्ष होण्याची शक्यता असली तरी विरोधी गटानेही नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करीत निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने नगराध्यक्ष निवडणुकीत काय घडामोडी होतात, याची उत्सुकता लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनधिकृत पाणी उपशाला लगाम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड
सध्या गोदावरी डाव्या कालव्याला प्रथम पिण्यासाठी व नंतर शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्यावरील धरणे भरण्यासाठी टेल्ला कालव्याची वहनक्षमाता कमी झाली आहे. पाण्याची वहनक्षमता भरून काढण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या देवगाव सिंचन शाखेचे शाखाधिकारी बी. बी. गोसावी व कर्मचाऱ्यांनी अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करायला सुरुवात केली आहे.

नांदूरमध्यमेश्वर धरणातून गोदावरी डाव्या कालव्याला ३२५ क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, सोडलेल्या या पाण्यापैकी कोपरगाव तालुक्यातील पढेगाव व वैजापूर पाणीपुरवठा बंधाऱ्याला (टेल्ला) फक्त ४० क्युसेस पाणी मिळत आहे. जवळपास २८५ क्युसेस पाण्याची वहवतूट होत असल्याने कालव्या लगतच्या तटवर्ती भागात नाशिक पाटबंधारे विभागाच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्या निर्देशाने भरारी पथके तयार आली असून, या पथकात पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अभियंता, शाखाधिकारी, कर्मचारी तसेस पोलिड अधिकाऱ्यांच्या समावेश आहे. या पथकाने मोठ्या प्रमाणात अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई केली आहे.

कालवा लाभ क्षेत्रातील वाकद शिवारातील बोरकर नाला परिसरात भरारी पथक गस्त घालत असतांना उपविभागीय अधिकारी भा. वि. सुरळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखाधिकारी गोसावी कालवा निरीक्षक गांगुर्ड हे गस्त घालत असतांना शेतकरी तात्याबा वावधाने व इतर ४ जणांनी कालवा फोडण्याचा प्रयत्न केला म्हणुन त्यांच्यावर लासलगाव पोलिस स्टेशनला कलम ४२७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

कालवा तटवर्ती भागातील देवगाव, महादेव नगर, जानोरी, वाकद शीरवाडे, धानोरे, नांदगाव, या गावातील विहिरिणी तळ गाठला आहे. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. चालू आवर्तनात जर बंधारे भरले नाही तर भीषण पाणीटंचाई निर्माण होईल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने दबंगगिरी न करता परिसरातील बंधारे, नाले भरून देण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

सध्या पिण्याच्या पाण्याचे बंधारे भरून देण्याचे काम सुरू आहे. सिंचनासाठीचे स्वतंत्र नियोजन केले आहे. शेतकऱ्यांनी संयम ठेऊन सहकार्य करण्याची गरज आहे.

- बी. जी. गोसावी,

शाखा अभियंता,

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुवाबाजीच्या नादात बालकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वैद्यकीय उपचारांकडे दुर्लक्ष करून बाबाबुवांच्या नादाला लागलेल्या एका परप्रांतीय कुटुंबातील चार वर्षाच्या मुलाचा करुण अंत झाला. मुलाला होणाऱ्या त्रासावर वैद्यकीय उपचार करण्याऐवजी त्याला तांत्रिकाकडे घेऊन जाणाऱ्या मुलाचा मृत्यु झाला. एखाद्या तांत्रिकाकडे उपचार करण्याच्या अंधश्रद्धेपोटी या मुलाचा हकनाक बळी गेल्याची चर्चा सिव्ह‌िल हॉस्पिटलमध्ये सुरू होती.

उत्तर प्रदेश राज्यातील फारुदाबाद जिल्ह्यातील उंगाडा तालुक्यातील भुरेलालसिंग कश्यप यांचा चार वर्षीय रणजीत हा मुलगा अनेक दिवसांपासून आजारी होता. स्थानिक हॉस्पिटलमध्ये उपचार करूनही रंजीतला बरे वाटत नव्हते. मुलाच्या आजाराने चिंतेत असलेल्या भुरेलालसिंग यांना एका ओळखीच्या व्यक्तीने त्र्यंबकेश्‍वर परिसराजवळ राहणाऱ्या एका बाबाचे नाव सांगितले. बाबाच्या उपचार चांगला असल्याने मुलाला उपचारासाठी तेथे नेण्याचा सल्ला दिला. मुलाच्या आजाराने वैतगलेल्या वड‌िलांना यातून एक आशेचा किरण दिसला. त्यांनी नाशिकमधील त्र्यंबकजवळील एका पाड्यावरील बाबाकडे येण्याचे ठरवले. त्यानुसार गुरुवारी सकाळी रेल्वेने कश्यप कुटूंबीय नाशिकमध्ये दाखल झाले. मात्र, प्रवासादरम्यान झालेली धावपळ व वेळेत उपचार न मिळाल्याने रणजीतची तब्येत आणखीच बिघडली. त्याला लागलीच सिव्ह‌िल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला.

रणजीतवर स्थानिक किंवा उत्तर प्रदेशातील एखाद्या शहरातील हॉस्पिटलमध्ये उपचार झाले असते तर परिस्थिती बदलली असती. मात्र, रणजीतच्या वड‌िलांनी अघोरी उपचार घेण्याचे ठरवले. वड‌िलांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे चार वर्षीय निरागस मुलाचा मृत्यू झाल्याची चर्चा सिव्ह‌िल हॉस्पिटलमध्ये सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोंढेची पोलिसांना हुलकावणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सातपूर येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी हायकोर्टाने अटकपूर्व जामीन रद्द केल्यानंतर भूषण लोंढेसह त्याचा साथीदार फरार झाला आहे. शहर व ग्रामीण पोलिसांचे पथक दोघांच्या मागावर असून, हायकोर्टाच्या आदेशाविरोधात नगरसेवक प्रकाश लोंढे सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सूत्रांच्या माहितीनुसार, सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केल्यानंतर लागलीच सुनावणी होण्याची शक्यता नाही. यात काही महिन्यांचा कालावधी लोटला जाऊ शकतो. त्याचा प्रत्यक्ष फायदा भूषणाला होणार आहे. हायकोर्टाने अटी व शर्थींसह घालून दिलेला तीन दिवसांचा अटकपूर्व जामीन हायकोर्टाने पुढे सुरू ठेवण्यास नकार दिल्यानंतर भूषणसह त्याचा साथिदार फरार आहे. सातपूर येथील पीएल ग्रुपच्या कार्यालयात अर्जुन ऊर्फ वाट्या महेश आव्हाड (२४) व पंचवटीतील गोपाळनगर येथील निखिल गवळी (२२) या सराईत गुंडांची ३१ डिसेंबरच्या रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

याप्रकरणात पोलिसांनी ललीत अशोक विठ्ठलकर, निखील मधुकर निकुंभ, प्रिन्स चित्रसेन सिंग, वतन शिवाजी पवार आणि किशोर गायकवाड या पाच संशयितांना लागलीच जेरबंद केले. खुनाच्या गुन्ह्यात भूषण आणि संदीप गांगुर्डे यांचाही सहभाग असल्याचे पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याही नावाचा समावेश केला. शहर पोलिस व ग्रामीण पोलिसांचे तपासी पथके भूषणच्या मागावर असून, त्याला अटक करण्यात येईल, असा दावा पोलिसांकडून केला जातो आहे.

सीसीटीव्हीची चर्चा

पीएल ग्रुप कार्यालयात काही महिन्यापूर्वी सीसीटीव्ही बसवण्यात आले होते. ग्रुपचे सदस्य अनेकदा या सीसीटीव्हींचे रेकॉर्डींग पाहात बसलेले असत, असे सूत्रांनी ​सांगितले. ३१ डिसेंबररोजी झालेल्या हत्याकांडाचा उलगडा सात ते आठ दिवसांनी झाला. त्यात पीएल ग्रुपचे नाव येताच येथील सीसीटीव्ही व कम्प्युटर काढून घेण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. पोलिसही याबाबत अनभिज्ञ असावेत. सीसीटीव्हीबाबत होणाऱ्या चर्चेमध्ये तथ्य असल्यास पोलिसांना दुहेरी हत्याकांडातील सर्वात ठोस पुरावा मिळू शकतो.

गोंदे दुमालात गोळीबार

वाडीवऱ्हे पोल‌िस ठाण्याच्या हद्दीत गोंदे दुमाला येथे अंतर्गत वादातून दोन गटात झालेल्या वादात गुरूवारी एका गटाने गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली असून, पोलिसांनी या प्रकरणी एकास अटक केली आहे.

वाडीवऱ्हे पोलिसांत दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी सुनील विठोबा नाठे हे व त्यांचा लहान भाऊ हे दोघे घरासमोर गाडी धुवत असताना संशय‌ित केशव शिवराम नाठे याने मागील भांडणाची कुरापत काढून तुम्ही तुमच्या हद्दीतच गाडी धुवा असे म्हणत नाठे यांच्या लहान भावाला मारहाण केली, तसेच घरात जाऊन पिस्तूल घेत गोळीबार केला. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. वाडीवऱ्हे पोल‌िसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली व संबं‌धितावर गुन्हा दाखल करत अटक केली.

२५ तोळे सोने लंपास

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसुल येथे राहणाऱ्या मुसद्दिक अब्दुल गणी शेख (५१) यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी घरातील २५ तोळे सोन्याचे दागिने व तीन लाख रुपये रोख, असा मुद्देमाल चोरी केला. ही घटना २५ नोव्हेंबर रोजी घडली.

शेती व वीटभट्टीचा व्यवसाय करणारे शेख कुटुंबीय २४ जानेवारी रोजी पालघर येथील सातपाटी येथे गेले होते. या दरम्यान चोरट्याने पूर्व दिशेच्या दरवाजाची लाकडी फळी हत्याराने फोडून घरात प्रवेश केला. यानंतर चोरट्यांनी त्यांच्या घरातील तिजोरी फोडून त्यातील तीन सोन्याच्या चेन, तीन लॉकेट, एक हार सेट, चार अंगठ्या, एक सोन्याची पोत आणि चार बांगड्या असा २५ तोळे वजनाचा मुद्देमाल तसेच तीन लाख रूपये रोकड लंपास केली.

हज यात्रेला जाण्यासाठी शेख यांनी रोकड जमा केली होती. त्यावरच चोरट्यांनी हात साफ केला असून याप्रकरणी हरसूल पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बालगुन्हेगारांकडून सहा मोटरसायकली जप्त

सिडको : नाशिक शहरात मोटरसायकल चोरींच्या प्रमाणात गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली होती. यापार्श्वभूमिवर पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरानगर पोलिस ठाण्याची गुन्हे शाखेच्या टीमने दोन बालगुन्हेगारांकडून ६ मोटरसायकल ताब्यात घेतल्या आहेत. याबाबत माहिती देतांना पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी चोरी करणारे बालगुन्हेगार सिटी सेंटर मॉल परिसरात मोटरसायकलवर राखण ठेऊन चोरी करत असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे पकडण्यात आलेले दोन्ही बालगुन्हेगार मोटरसायकल चोरण्यात अत्यंत चपळ असल्याचेही धिवरे म्हणाले.

पोलिस उपायुक्त धिवरे, सहाय्यक आयुक्त अतुल झेंडे, इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक हेमंत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक जमिल शेख, भास्कर दिघे, दत्ता पाळदे, चंद्रकांत गवळी व अकलाक शेख यांनी सापळा रचत २ मोटरसायकल चोर बालगुन्हेगार ताब्यात घेतले होते. ताब्यात घेतलेल्या दोन बालगुन्हेगारांकडून एक मोटरसायकल मिळाली. यानंतर दोघेही बालगुन्हेगारांना विश्वासात घेता अजुन ५ मोटरसायकल त्यांच्याकडून पोलिसांनी जप्त केल्या. यापैकी गंगापूर पोलिस ठाण्यात दाखल असलेली एक मोटरसायकल त्यांच्याकडून मिळाली. दोघेही बालगुन्हेगारांना बालसुधारगृहात दाखल करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'तळवलकर'च्या संचालकांविरुध्द गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सभासदांनी पैसे देऊनही जीम सुरू करण्यात चालढकल करणाऱ्या तळवलकर जीमच्या दोघा संचालकांविरोधात गंगापूररोड पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणात पोलिसांनी राहुल भास्कर तळवलकरला अटक केली असून, कोर्टाने त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. ऑक्टोबर महिन्यापासून ही जीम बंद असून तेव्हापासून सभासद आणि संचालकांमध्ये कोणताही तोडगा निघाला नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.

राहुल भास्कर तळवलकर, अंबर तळवलकर आणि एका व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यापैकी राहुलला पोलिसांनी अटक केली आहे. त्यास गुरूवारी नाशिक कोर्टात हजर करण्यात आले. आजवर ३२ तक्रारी समोर आल्या असून, तक्रारदारांची संख्या व फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. त्यानुसार कोर्टाने राहुलला पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. याबाबत डिसुझा कॉलनी परिसरात राहणाऱ्या अशोक हरिबेश सिंग यांनी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. गंगापूररोड परिसरातील सावरकरनगर येथील प्रतिथयश मानल्या जाणाऱ्या फिटनेस सोल्युशन प्रा. लि. या तळवलकर जीमला ऑक्टोबर महिन्यापासून टाळे लागले आहे. मुंबई येथून संचाल‌ित होणाऱ्या या हाय फ्रोफाईल जीमच्या सदस्यत्वासाठी पाच हजारापासून २५ हजार रूपयांपर्यंत वर्गणी आकरण्यात आली. आधुनिक यंत्रसामग्री, प्रशिक्षीत ट्रेनर व निवडक व्यक्तींना प्रवेश अशा प्रचारामुळे सुरूवातीपासूनच संबंध‌ित जीम सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र ठरली. या जीमसाठी काही वर्षांसाठी किंवा लाईफटाईम सदस्यत्वासाठी सदस्यांनी बक्कळ पैसे मोजले.

गंगापूररोड, महात्मानगर आदी परिसरातील शेकडो नागरिकांनी पैसे भरून संबंध‌ित जीमचे सदस्यत्व स्विकारले. मात्र, या जीममधील एका कर्मचाऱ्याने जमा केलेले पैसे मॅनेजमेंटकडे जमा करण्याऐवजी थेट आपल्या बँक खात्यावर जमा केले. यामुळे मॅनेजमेंटने ही जीम बंद करण्याचा निर्णय घेतला. यातील काही सदस्यांनी मॅनेजमेंटच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत सर्व पुरावे सादर केले. मात्र, संचालक मंडळ आपल्या निर्णयावर कायम राहिले. ऑक्टोबर महिन्यात बंद पडलेली जीम पुन्हा सुरू होत नसल्याचे स्पष्ट झाल्याने सिंग यांच्यासह अन्य काही सदस्यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज सादर केला. पैशांचा अपहार केल्याचा आरोप असलेल्या कर्मचाऱ्याने राजीनामा दिला असून, मॅनेजमेंटने पैसे जमा केलेल्या सभासदांची फसवणूक केल्याचा आरोप केला. सदस्यांनी केलेल्या आरोपात तथ्य असल्याचे आढळून आल्यानंतर गंगापूर पोलिसांनी संबंध‌ित संचालकांसह मॅनेजरविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास पीएसआय पवार करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकचा पोलाद उद्योग धोक्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा आणि विदर्भ या विभागांना कमी दराने वीज देण्याचा घाट घालण्यात येत आहे. सरकारकडून मिळणाऱ्या या सापत्न वागणूकीच्या परिणामी राज्यातील औद्योगिक समतोल ढासळू शकतो. परिणामी नाशिकमधील पोलाद उद्योगावर गंडातरही येऊ शकते. अशी भीती व्यक्त करतानाच गुरूवारी निमा (नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन) चे पदाधिकारी आणि पोलाद उद्योजकांनी सरकारचा हा डाव हाणून पाडण्याचा इशारा दिला.

वीज दरांचे फेरनियोजन ऊर्जामंत्र्यांच्या विचाराधीन आहे. या नियोजनात मराठवाडा आणि विदर्भाचा सहानुभूतीने विचार होत असून, या भागांना कमी दराने वीज पुरविण्यात येणार असल्याच्या माहितीने उद्योजकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. नाशिकमधील पोलाद आणि प्लास्ट‌िकशी संबंधित उद्योजकांनीही या संदर्भात गुरूवारी झालेल्या बैठकीत मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मराठवाडा व विदर्भात तुलनेने कमी दरात वीज वितरीत झाल्यास नाशिकच्या पोलाद अन् प्लास्ट‌िक उद्योगांवर गंडांतर येऊन सुमारे २५ हजार कामगारांचे भविष्य संकटात सापडू शकते, अशी भीतीही यावेळी व्यक्त करण्यात आली.

राज्यामध्ये उद्योगास पुरविल्या जाणाऱ्या वीजदरांमध्ये समानता हवी अन्यता औद्योगिक असमतोल आणि त्यातून उद्भवणारे प्रश्न अटळ असल्याचेही मत उद्योजकांनी व्यक्त केले आहे. सरकारच्या या चामत्कारिक निर्णयप्रक्र‌ियेचा यावेळी निषेध करण्यात आला.

...अन्यथा उद्योजक रस्त्यावर

सरकारने राज्यभरात समान दराने वीजेचे वितरण करावे अन्यथा राज्यभरात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निमा पदाधिकारी व उद्योजकांच्या बैठकीत देण्यात आला. यासाठी नाशिकसह राज्यात मुंबई, ठाणे, कोल्हापूर, जळगाव, अहमदनगर, नंदूरबार, सांगली, सातारा, कोल्हापूर या शहरांमधील उद्योजकांशी पत्रव्यवहार करण्यात येऊन त्यांचेही याविषयी प्रबोधन करण्यात येणार असल्याची भूमिका निमाचे सरचिटणीस मंगेश पाटणकर यांनी मांडली. सरकारने उद्योजकांचे मुद्दे विचारात न घेतल्यास उद्योजक आंदोलन छेडून रस्त्यावर उतरतील असाही इशारा या बैठकीत देण्यात आला आहे. या बैठकीस निमाचे अध्यक्ष संजीव नारंग, सरचिटणीस मंगेश पाटणकर, मिलींद राजपूत, मनिष अय्यर, किशोर अग्रवाल, अजय बाहेती, निहार गुप्ता आदी उद्योजक सहभागी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॉवरडीलचे कामगार ‘रस्त्यावर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

विल्होळी येथील पॉवरडील एनर्जी सिस्टीम कंपनीतील कामगारांना गेल्या आठ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. तसेच, बंद असलेली कंपनी नोव्हेंबर महिन्यात सुरू केल्यानंतर ठराविकच कामगारांना कामावर घेण्यात आले. यात अन्याय झालेल्या कामगारांनी शुक्रवारी कामगार उपायुक्त कार्यालयावर जोरदार निदर्शने केली. थकीत वेतन व कामगारांना कामावर त्वरित घ्यावी, अशी मागणी कामगारांनी केली.

पॉवरडील कंपनीतील कामगारांचा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित होता. यामध्ये महापालिकेचे स्थायी सभापती शिवाजी चुंभळे यांनी मध्यस्थी करीत पॉवरडीलची टाळेबंदी उठवून कंपनी पूर्ववत सुरू केली. परंतु, या कंपनीत वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कामगारांना कंपनीने डावलत नव्याने कामगार भरती केली. यामुळे अनेक कामगारांना बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. याबाबत कामगारांनी वेळोवेळी कंपनी व्यवस्थापनाकडे विचारणा केली. मात्र, त्यांना कामावर घेण्यात आले नाही.

पॉवरडील कंपनी व्यवस्थापन कामावर घेत नसल्याने माळी नामक कामगाराने आत्महत्येचा प्रयत्न देखील केला. यात कंपनी व्यवस्थापन जुन्या कामगारांना न्याय देत नसल्याने पॉवरडीलच्या कामगारांनी कामगार उपायुक्त कार्यालवर जोरदान निदर्शने करीत थकीत वेतन व कंपनीने कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, अशी मागणी केली. कामगारांच्या आंदोलनात कुटुंबातील सर्वच सदस्य सहभागी झाले होते.

आंदोलनाचा इशारा कपंनीने थकीत वेतनाबरोबरच जुन्या कामगारांना परत कामावर घ्यावे, या मागणीचे कामगारांनी कामगार उपायुक्त आर. एस. जाधव यांना निवेदन दिले. कामगारांची मागणी मान्य न झाल्यास एक जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुस्तके न मिळाल्यास ‘मनविसे’तर्फे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात तृतीय वर्ष या वर्गासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची पुस्तके मिळाली नसल्याने परीक्षा द्यायची कशी, असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. हा प्रश्न त्वरीत न सोडविल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

मुक्त विद्यापीठात तिसऱ्या वर्षाकरीता नाशिक जिल्ह्यातील हजारों विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. परंतु या विद्यार्थ्यांना वार्षिक अभ्यासक्रमाची पुस्तकेच मिळालेली नाहीत. विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार पोस्टाने आणि एस. टी. महामंडळाद्वारे काही विद्यार्थ्यांना पुस्तके पाठविली आहेत परंतु अजूनही शेकडो विद्यार्थ्यांना पुस्तके मिळालेली नाहीत. ही पुस्तके मुक्त विद्यापीठाच्या केंद्रात पाठविली असती व विद्यार्थ्यांना तशी माहिती दिली असती तर ही पुस्तके वेळेत मिळाली असती. विद्यापीठाच्या चुकीने वर्ष वाया गेले व आर्थिक, शैक्षणिक नुकसान झाले तर जबाबदारी विद्यापीठाची राहील. हा प्रश्न त्वरीत सोडवावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. मनविसेच्या वतीने कुलगुरू माणिकराव साळुंखे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मनविसे प्रदेश कार्यकारिणी सदस्य संदीप भवर, गणेश वाळके, मनोज घोडके आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


क्रीडा सुविधा रास्त दरात पुरवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुलातील उपलब्ध क्रीडा सुविधा उदयोन्मुख क्रीडापटू, प्रशिक्षण संस्था आणि क्रीडाप्रेमी नागरिकांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय सोमवारी नाशिक विभागीय क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी जाहीर केला.

हे संकुल उत्कृष्ट दर्जाचे प्राविण्य केंद्र बनावे, यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करील, असेही त्यांनी स्पष्ट केले. विभागीय क्रीडा संकुल समितीची सभा हिरावाडी रोड येथील संकुलात झाली. या बैठकीला विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, क्रीडा संघटक भीष्मराज बाम, नरेंद्र छाजेड, नगरसेवक रुची कुंभारकर, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पवार, माहिती उपसंचालक सतीश लळीत आणि समितीचे सदस्य सचिव तथा क्रीडा उपसंचालक संजय सबनीस उपस्थित होते.

सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करुन नाशिकला अद्ययावत क्रीडा संकुल उभे केले आहे. या संकुलातील इनडोअर बॅडमिंटन हॉल, जिम्नॅस्टिक सुविधा, टेबल टेनिस, शुटींग रेंज, स्क्वॅश कोर्ट, जलतरण तलाव, मल्टिपर्पज प्लेईंग फिल्ड आणि लॉन, वसतिगृह आदी सुविधा तयार आहेत. बाकीची प्रगतीपथावर असलेली कामे कालबद्ध कार्यक्रम आखून पूर्ण करावीत, अशा सूचनाही डवले यांनी दिल्या. सुविधांचा वापर उदयोन्मुख क्रीडापटू, प्रशिक्षण संस्था आणि क्रीडाप्रेमी नागरिकांना व्हावा, यासाठी मासिक शुल्क आकारून या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्रैमासिक, सहामाही, वार्षिक शुल्क भरणाऱ्यांना त्यात काही प्रमाणात सवलत द्यावी. यासाठी सदस्यत्व कार्ड देण्याची सूचनाही त्यांनी केली. क्रीडा संकुल परिसरात सीसीटीव्ही लावणे, अद्ययावत ध्वनीक्षेपक यंत्रणा बसविणे, बॅडमिंटनकरिता रोलेबल सिंथेटिक सरफेस उपलब्ध करून देणे, इनडोअर स्टेडियममध्ये कुस्तीसाठी पोडियम तयार करून देणे, वसतिगृह, इनडोअर हॉल आणि पथदिपांसाठी सौरशक्तीचा वापर करणे ही कामे प्राधान्याने करुन घेण्याचा निर्णयही समितीने घेतला. संकुलाची सुरक्षा लक्षात घेऊन खासगी सुरक्षा रक्षक नेमण्यासही समितीने मान्यता दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅग्रो उद्योजकांसाठी टेक्नॉलॉजी इन्क्युबेटर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दर्जा असूनही पूरक संस्कारांच्या अभावाने स्पर्धेत मागेच राहणारे कृषी प्रॉडक्ट प्रमोट करण्यासाठी आता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात टेक्नॉलॉजी इन्क्युबेटर स्थापन करण्यात येणार आहे. कृषी उद्योजकतेशी निगडीत प्रत्येक घटकाला या माध्यमातून सल्ला देण्यात येईल. शिवाय कृषी उत्पादनाचे प्रोसेसिंग, मार्केटींग, ब्रँडिंग आणि ट्रेनिंगचीही सुविधा या माध्यमातून देण्यात येईल.

विद्यापीठाच्या विद्वत परिषदेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांतर्गत मुक्त विद्यापीठात आभासी व्यासपीठ, कृषी पोर्टल आणि पीक उत्पादन व प्रक्रिया तसेच ग्राम विकासासाठी तंत्रज्ञानाचा प्रसार केला जाणार आहे. या बरोबरीलाच नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाच्या नुकसानीचे सर्वेक्षण, माती आणि पाण्याचे संवर्धन, जमीन आरोग्य व्यवस्थापन, पशु संवर्धन व्यवस्थापन, आदींबाबत सल्ला व मार्गदर्शन देण्यासाठी प्रयत्नही केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार असल्याचे विद्वत परिषदेचे सदस्य प्रतापराव पवार यांनी सांगितले. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांनी अॅग्रीकल्चर टेक्नॉलॉजी इन्क्युबेटरसाठी विद्यापीठातर्फे आर्थिक तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऋग्वेद महोत्सवाला उदंड प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऋग्वेदतर्फे आयोजित संगीत सभेत पं. प्रसाद खापर्डे यांनी भरगच्च सभागृहात सायंकालीन समयातील पुरीया रागाने गायनास सुरुवात केली. 'पिया गुणवंता' या विलंब‌ित एकतालातील बंदीश घेऊन पुरीयाचा स्वर विस्तार हळूवारपणे मंद्रसप्तकातील षडज, मध्य, सप्तकातील आलाप, बोल आलापाने व मुळातच असणारा गोड मधुर आवाजातील राग व तालाच्या अंगाने केलेली सरगम व बोल याने प्रत्येक आवर्तन नव्याने सजवून समेला येण्याचा अंदाज त्याच्या राग ताल व तालमीची साक्ष देत होता.

द्रुत तिन तालात कालापासून मुखडा असणारी 'मोरे चतुर पिया' ही बंदिश त्यांनी सादर केली जलद सरगम ही त्याच्या सेहवसान घराण्याची खासियत असणारी व तिन्ही सप्तकात दाणेदार सपाट वक्र तान क्रिया अत्यंत सहजतेने त्यांनी गाऊन रसिकांना अनोखा नजराणा पेश केला. त्यानंतर मीश्र काफी रागात 'कृपा करो महाराज' सुफी ढंगाची ठुमरी सादर केली. कै. सरवटे बुवा समर्पित संगीत सभेत मध्यंतरात स्वर विलासी या सरवटे बुवावरील प्रमोद भडकमकर लिखीत जीवन चरित्राच्या पुस्त‌िकेचे प्रकाशन पं. कमलाकर वारे, विनायकराव गोवीलकर, सुमन रानडे, पं. रामदास पळसुले, पं. खापर्डे यांचे हस्ते झाले व श्री गोवीलकर व पं. कमलाकर वारे यांनी सरवटे बुवांच्या आठवणी व्यक्त केल्या.

दुसऱ्या सत्रात रामदासजी पळसुले याचे तबला वादन झाले. त्यांनी विलंब‌ित तीनतालात तीश्र चतुर्थ जाती पेशकार फरूखाबाद अजराडा पंजाब दिल्ली घराण्याचे कायदे, रेले अत्यंत तयारी व बुध्दीमत्तेने त्यांनी खुलवले. त्यांना तबला साथ त्यांचे तरुण शिष्य पाणटक्के याने तयारीने केली. संवादिनी वर नगमा साथ पुष्कराज भागवत यांनी केली. प्रास्ताव‌िक अर्चना भडकमकर यांनी केले. अमेय चितळे यांनी आभार मानले. प्रा. नीलेश रोटे यांनी सूत्रसंचलन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँक संचालकांना न्यायालयाचा दिलासा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भ्रष्ट संचालकांना अपात्र ठरविण्याच्या राज्य सरकारच्या अध्यादेशाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या जिल्हा बँकेतील संचालकांना न्यायालयात तात्पुरता दिलासा मिळाला आहे. संबंधित संचालकांना आपली बाजू मांडण्यासाठी दोन आठवड्याची मुदत मिळाली आहे. संबंधित आदेश हा राजकीय हेतून प्रेरित असल्याचा आरोप जिल्हा बँकेतर्फे करण्यात आला आहे. संचालकांची बाजू ऐकून घेत न्यायालयाने संचालकांना तात्पुरता दिलासा दिला आहे. त्यामुळे ११ संचालकांवरील अपात्रतेची टांगती तलवार काही काळासाठी टळली आहे.

राज्यपालांनी सहकार क्षेत्रात भ्रष्टाचार करणाऱ्या संचालकांवर अपात्र ठरविण्याच्या अध्यादेशावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे संचालकांना दहा वर्ष निवडणुका लढविता येणार नाहीत. हा आदेश जिल्हा बँकेला प्राप्त झाला असून, या आदेशामुळे विद्यमान अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यासह अकरा संचालक अपात्र ठरणार आहेत. या विरोधात सर्व संचालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली. याचिकाकर्ते प्रमोद जोशी यांनी संबंधित निर्णय हा पूर्वक्षीय प्रभावाने लागू करता येणार नाही, तसेच हा राजकीय निर्णय असल्याचा दावा केला. न्या. जहागीरदार व पटवर्धन यांच्या द्विस्तरीय पीठाने याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून घेतली. यावेळी संचालक गणपतराव पाटील व परवेझ कोकणी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदेशीर बांधकामांवर गदा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

पिंपळगाव बसवंत शहरातील ६३ इमारतींचे बांधकाम बेकायदेशीर ठरवत महसूल विभागाने संबंधित बांधकाम व्यावसायिकांना तीस दिवसात हे बेकायदेशीर बांधकाम स्वतःहून पाडण्याबाबत नोटीस जारी केल्या आहेत. तीस दिवसात हे बांधकाम पाडले नाही तर प्रशासनच हे बांधकाम जमीनदोस्त करेल, असा इशारा नोटीसमध्ये दिला आहे. यामुळे बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

निफाडचे तहसीलदार डॉ. संदीप आहेर यांनी बेकायदेशीर बांधकामप्रकरणी व्यावसायिकांना नोटीस बजावली आहे. याबाबत तातडीने बैठक घेऊन व्यावसायिकांनी या निर्णया विरोधात न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीस सोहनलाल भंडारी, अशोकलाल भंडारी, विजय बाफना, नयनेश संघवी, नंदकुमार जंगम, संदीप कोचर, विक्रांत मोरे, सुभाष कापडणीस, संदीप कुशारे, विष्णूभारती गोसावी, ज्ञानेश्वर चव्हाण, डॉ. नीलेश शेटे, डॉ. मनोज सुराणा, नायब तहसीलदार रामदास आहेर आदी उपस्थित होते.

पिंपळगाव शहरात बांधकाम व्यावसायिकांनी नियमांचे पालक न केल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते जयंत मुथा यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. यानुसार शहरातील ६३ बांधकामे महसूल विभागाने बेकायदेशीर ठरवली. बांधकाम व्यावसायिकांनी निवासीऐवज वाणिज्य प्रयोजनासाठी सुरू असलेला अनधिकृत कृषी वापर नियमित करण्याबाबत नगर रचना विभागाला प्रस्ताव दिला होता. मात्र, हा प्रस्ताव नियमबाह्य असल्याने नोंदविल्यानंतर निफाडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव नामंजूर करीत बांधकामे पाडण्याचे आदेश दिले आहेत.

माहितीच्या अधिकारात उघड माहितीच्या अधिकारात शहरातील बांधकामांची माहिती संकलित केली होती. शहरातील ६३ बांधकामे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४५ (२) नुसार शासनाने बेकायदेशीर ठरवले होते. या बांधकामांवर गदा येणार आहे.



शासनाच्या धोरणानुसार नियमित करता येण्यासारखी बांधकामे नियमित करावी. रस्त्यांना अडथळा आणणारी व नागरिकांची फसवणूक करणारी बांधकामे पाडण्यात यावीत. अनधिकृत बांधकामासंदर्भात जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी. - जयंत मुथा, सामाजिक कार्यकर्ते

शहरातील बांधकामे नियमित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. लवकरच याबाबत निर्णय होणे अपेक्षित आहे. मात्र, घाईने नोटीस जारी करून बांधकाम व्यावसायिकांवर दबाब टाकण्याचा हा प्रकार आहे. याबाबत न्यायालयात दाद मागणार आहोत. - सोहनलाल भंडारी, बांधकाम व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीडीआर धोरणाने बांधकाम क्षेत्र संकटात

$
0
0

टीडीआर धोरणाने बांधकाम क्षेत्र संकटात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शहरातील ६ आणि साडेसात मीटर रस्त्यालगत वापरण्यात येणारे विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) यापुढे वापरता येणार नसल्याने नाशकातील बांधकाम उद्योग संकटात येणार आहे. राज्य सरकारने १८ महापालिकांसाठी जाहीर केलेल्या टीडीआर धोरणामुळे येत्या काळात विकासनासाठी येणाऱ्या जुन्या बांधाकमांनाही फटका बसणार आहे.
राज्यातील महापालिका क्षेत्रात टीडीआरचे स्वतंत्र धोरण असावे या उद्देशाने राज्य सरकारने गेल्यावर्षी ३० एप्रिल रोजी एक मसुदा प्रसिद्ध केला होता. त्यावर सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यावरील जनसुनावणी झाल्यानंतर सरकारने टीडीआर धोरण गुरुवारी जाहीर केले आहे. या धोरणाचा मोठा परिणाम शहरातील बांधकाम क्षेत्रावर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सद्यस्थितीत ६ ते ७.५ मीटर रस्त्यालगत होणाऱ्या बांधकामांना ०.४ टीडीआर वापरला जातो. नव्या धोरणामुळे हा टीडीआर वापरावर गदा आली आहे. ६ ते ७.५ मीटर रस्त्यालगत टीडीआर लागू होणार नसल्याचे धोरणात म्हटले आहे. महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार (डीसीआर) शहरात ६ ते ७.५ मीटर रस्त्यालगतच बांधकामे सुरू आहेत. तसेच, येत्या काळात बांधकामे होणार आहेत. मात्र, आता टीडीआर वापरता येणार नसल्याने या रस्त्यालगत असलेल्या जागा विकसनासाठी घेण्यात येणार नाहीत. यातून स्वस्तात घरे उपलब्ध होण्यावरही परिणाम होणार असल्याचे बांधकाम क्षेत्रातील सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच, ९ मीटरपुढील रस्त्यालगतही टीडीआर वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. गावठाण सोडून आरक्षित जागांवर २ टीडीआर वापरता येणार. त्यातही या जागांना कंपांऊंड करुन द्यावे लागणार आहे. टीडीआर वापरल्यास ५ टक्के वेगळे चार्जेस द्यावे लागणार आहे. तसेच, सध्या ६ आणि ७.५ मीटर लगत असलेल्या जुन्या इमारती नव्याने विकसनासाठी येणार आहेत. तेथे टीडीआर लागू होणार नसल्याने या इमारतींचे काय, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. एकंदरीतच, टीडीआर धोरणातील अनेक तरतुदींमुळे शहरातील बांधकाम क्षेत्र अडचणीत येणार असल्याचे दिसून येत आहे.

६ आणि ७.५ मीटर ररस्त्यालगत टीडीआर वापरता न येणे हे अन्यायकारक आहे. एकप्रकारे हा टीडीआर स्वातंत्र्यावरच गदा आहे. याचा विपरित परिणाम शहरातील बांधकामांवर होणार आहे.

अविनाश शिरोडे
माजी अध्यक्ष, क्रेडाई

९ मीटर पुढील रस्त्यांलगत टीडीआर वापरण्यासही सरकारने विविध बंधने घातली आहेत. याचा मोठा परिणाम बांधकाम क्षेत्रावर होणार आहे.

विजय सानप
अध्यक्ष, आर्किटेक्ट अँड सिव्हिल इंजि. असो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंजनेरी मंदिराचे नूतनीकरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

अंजनेरी येथील हेमाडपंथी १६ मंदिराच्या नूतनीकरणासाठी १६ कोटी ९५ लाखाच्या निधीला केंद्राने तत्वतः मान्यता दिली आहे. या कामाला सुरुवात झाली असून तीन वर्षात ते पूर्ण होईल, अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

अंजनेरी गावालगत जैन, वैष्णव व शैव समाजाची सुमारे हजार वर्षापूर्वीची १६ मंदिरे आहेत. त्यांची दुरवस्था झाली आहे. प्रत्येक मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व आहे. पुरातत्व विभागाकडे मंदिराच्या जतनाची जबाबदारी आहे. खासदार गोडसे यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा व महासंचलक तिवारी यांना तीन महिन्यापूर्वी पत्र दिले होते. त्यानंतर केंद्रीय पुरातत्व विभागानेही पथक पाठवून सर्वेक्षण केले होते.

केंद्रीय पुरातत्व विभागाच्या संचालक जानवी शर्मा यांनी १४ जानेवारी रोजी विभागीय कार्यालयाला या प्रस्तावाबाबत नूतनीकरणासाठी लागणाऱ्या निधीची मागणी करावी, काम तीन वर्षात पूर्ण करण्याचा कार्यक्रम पाठवावा तसेच किती निधी लागेल तसे कळविण्यास सांगितले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवसेनेत फेरबदलांचे संकेत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेची निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपल्याने राजकीय पक्षांनी आतापासून तयारी सुरू केली आहे. भाजपने संघटनात्मक फेरबदल करीत आघाडी घेतल्यानंतर मित्र पक्ष शिवसेनेही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकारिणीत बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. संपर्क प्रमुख अजय चौधरी यांनी नाशिक दौऱ्यात याबाबत प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी बदलले जाणार नसले तरी, कार्यकारिणीत फेरबदल केले जाणार आहेत. जुन्यांचा अनुभव आणि नव्यांची आक्रमता साधून दोघांना नव्या कार्यकारिणीत स्थान दिले जाणार आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नवी कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे.

फेब्रुवारी २०१७ मध्ये महापालिकेच्या निवडणुका होणार असून, त्यासाठी राजकीय पक्षांनी आतापासून व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. भाजपने नुकतेच शहराध्यक्ष पदावर आमदार बाळासाहेब सानप यांची नियुक्ती करीत पूर्ण ताकदीनिशी उतरण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपचे शहरात तीन आमदार आहेत. त्यामुळे भाजप आक्रमक झाल्याने शिवसेनेनेही भाजपचा सामना करण्याची तयारी सुरू केली आहे. शिवसेनेचे नाशिक संपर्कप्रमुख अजय चौधरी यांनी गुरुवारी नाशिकच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी कार्यकारिणीबाबत चर्चा केली. पक्षातील जुन्या नेत्यांच्या अनुभवाचीही गरज आहे. तर, नव्या चेहऱ्यांनाही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षात स्थान द्यावे लागणार आहे. त्यामुळे चौधरी यांनी कार्यकारिणीत बदल करण्याचे संकेत दिले असून, जुन्यांचा अनुभव घेऊन आणि नव्या चेहऱ्यांना आक्रमकतेसाठी कार्यकारिणीत स्थान दिले जाणार आहे. त्यामुळे नव्या-जुन्यांचा मेळ नव्या कार्यकाणीत घालण्याचे आदेश त्यांना पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

पदाधिकारी राहणार कायम महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पक्षाने कार्यकारिणी बदलण्याचा निर्णय घेतला असला तरी, पदाधिकाऱ्यांना बदलले जाणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सध्याच्या महानगरप्रमुखांसह जिल्हाप्रमुखांच्या नेतृत्वाखालीच सेना निवडणूक लढणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल केल्यास त्याचा निवडणुकीतल्या रणनीतिवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुर्तास तरी, महानगर प्रमुखासह जिल्हाप्रमुखांना अभय मिळणार असल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६१ गॅस वितरक दोषी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिलिंडरमधून परस्पर एलपीजी गॅस काढून ग्राहकांच्या गळ्यात कमी वजनाचे सिलिंडर मारण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. नाशिक महसूल विभागातील पाच जिल्ह्यांत अशा ६१ एलपीजी गॅस वितरकांवर खटले दाखल केले आले आहेत. विशेष म्हणजे यात सर्वाधिक २१ कारवाया नाशिक जिल्ह्यामध्ये करण्यात आल्या आहेत.

सिलिंडर घरपोच देताना संबंधित वितरकाने ते वजन करूनच देणे अपेक्षित आहे. मात्र, तसे कोठेचे होताना दिसत नाही. परस्पर सिलिंडरमधील गॅस काढून कमी वजनाचे सिलिंडर ग्राहकांच्या माथी मारण्याचे प्रकार नाशिकसह जळगाव, धुळे, अहमदनगर जिल्ह्यात उघडकीस आले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालये आणि महसूल आयुक्तालयाला तक्रारी देखील प्राप्त झाल्या होत्या. नाशिकमध्ये सिडकोत असे प्रकार घडत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात स्वतंत्र मोहीम राबविण्याचे आदेश वैधमापन शास्त्र नियंत्रक तथा विशेष पोलिस महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी दिले होते. संपूर्ण राज्यात बुधवार, २७ जानेवारी रोजी अशी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. कमी वजनाचे सिलिंडर देणे, वजन काटे न बाळगणे अशा नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नाशिक महसूल विभागातील दोषी ६१ एलपीजी गॅस वितरकांवर खटले नोंद करून कारवाई करण्यात येत असल्याची माहिती प्रभारी उपनियंत्रक स. या. अभंगे यांनी दिली आहे. विशेष तपासणी मोहिमेमध्ये दोषी गॅस वितरकांवर खटले नोंदवून महाराष्ट्र वैधमापन शास्त्र कायद्यान्वये कारवाई करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सर्वाधिक २१ दोषी वितरक नाशिक जिल्ह्यामध्ये आढळले आहेत. तर जळगावात १५ वितरक दोषी आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली.

येथे करा तक्रार

नागरिकांनी वितरकाकडून सिलिंडर स्वीकारताना त्याचे वजन करून देण्याचा आग्रह धरावा. सिलिंडर घरपोच करणाऱ्याकडे अचूक वजन दर्शवणारा वजनकाटा असणे आवश्यक आहे. ग्राहकांनी वजनाची प्रत्यक्ष खात्री करून सिलेंडर ताब्यात घ्यावा, असे आवाहन वैधमापन शास्त्र नाशिक विभागाचे प्रभारी उपनियंत्रक स.या. अभंगे यांनी केले आहे. याबाबत तक्रारी असल्यास त्यासाठी हेल्पलाइन क्रमांक ०२२-२२८८६६६६ उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तर महाराष्ट्रालाही वीज सवलत द्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर तालुक्यात औद्योगिक प्रगती अधिक वेगाने होण्यासाठी तालुक्याचा 'वर्गीकरण डी प्लस' मध्ये समावेश करावा. यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळून उद्योग आकर्षित होण्यास मदत होईल. मराठवाडा व विदर्भास विजेच्या दरात विशेष सवलत देण्याचे शासनाच्या विचाराधीन असून, यामध्ये उत्तर महाराष्ट्राचा समावेश करावा, अशी मागणी सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीतर्फे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे करण्यात आली.

उद्योग मंत्री सुभाष देसाई सिन्नर येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असता हॉटेल पंचवटी येथे उद्योजकांनी त्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीचे अध्यक्ष अरुण चव्हाणके, तज्ज्ञ संचालक नामकर्ण आवारे यांनी औद्योगिक प्रगतीबाबत चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने मराठवाडा व विदर्भास विजेच्या दरात विशेष सवलत देण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्राचा समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली.

सिन्नर तालुक्याचे वर्गीकरण सी विभागात केल्याने विकासाचा वेग मंदावला असल्याने याकडे लक्ष वेधून तालुक्यात सेझ विकसित होत असताना त्यासही या वर्गीकरणाचा फटका बसत असल्याचे सांगितले. तसेच, अभय योजना बंद झाल्याने पुनरुज्जीवनक्षम बंद उद्योग सुरू करण्यात अडथळे येत आहेत. बंद पडलेले उद्योग नवीन उद्योजकास १५ वर्षे उत्पादन सुरू ठेवण्याची अट शिथिल करावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. शासकीय वसाहतींप्रमाणे चटई निर्देशांक १.५० करावा, संस्थेची जिरायत झोनमधील जमीन औद्योगिकमध्ये वर्ग करावी, अशी मागणी करण्यात आली.

सिन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीत उद्योग वाढले असून, पाण्याचीही मागणी वाढत आहे. अजून एक हजार घनमीटर पाण्याची गरज असून, पाणी वाढवून देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या प्रश्नाबाबत आपण तातडीने कारवाई करू, असे आश्वासन देसाई यांनी दिले. याप्रसंगी व्हा. चेअरमन पंडित लोंढे, संचालक प्रभाकर बडगुजर, अविनाश तांबे, किशोर देशमुख, मीनाक्षी दळवी, रामदास दराडे, सुनील कुंदे, संदीप आवारे, व्यवस्थापक कमलाकर पोटे, सुरेश उगले यांच्यासह अनेक उद्योजक उपस्थित होते.

महामार्गाच्या रुंदीकरणाला द्या वेग नाशिक-पुणे महामार्गावरील नाशिक ते सिन्नर रस्त्याचे काम अत्यंत मंदगतीने सुरू आहे. त्याचा उद्योगांना फटका बसत आहे. उद्योजक, कामगारांना प्रवासात अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. शिवाय ट्रक, कंटेनरने उत्पादीत कच्च्या मालाची वाहतूक करताना अडचणी येतात. हे काम वेगाने पूर्ण करावे. तसेच, सिन्नर ते शिर्डी या महामार्गावरील सिन्नरपासून दातलीपर्यंतच्या मार्गाचे सहापदरीकरण तातडीने करावे. अरुंद मार्गामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले असल्यामुळे अनेकांना विनाकारण मृत्यूस सामोरे जावे लागल्याने या दोन्ही रस्त्याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुणांकन वाढीसाठी महापालिकेची लगबग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
केंद्र सरकारच्या स्मार्टसिटी अभियानाच्या पहिल्या टप्प्यात निवड होण्याची संधी हुकलेल्या महापालिकेने आता दुसऱ्या टप्प्यातील निवडीसाठीची तयारी सुरू केली आहे. स्मार्टच्या गुणांकनात ३४ व्या स्थानावर असलेल्या नाशिकचे गुणांकन वाढविण्यासाठी आता आयुक्तांनी कंबर कसली आहे. दुसऱ्या टप्प्यातील शहरांच्या निवडीसाठी केंद्र सरकारने जून अखेर फेरप्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना महापालिकांना शुक्रवारच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये दिल्या आहेत. त्यादृष्ट्रीने प्रशासनाने पहिल्या टॉप थ्री शहरांच्या प्रस्तांवाचा अभ्यास सुरू केला आहे.

पहिल्या टप्प्यात तीन ते चार गुणांचा फटका नाशिकला बसला आहे. पहिल्या यादीत निवड न झालेल्या महापालिका आयुक्तांशी केंद्रीय सचिव पी. के. सिन्हा यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. ज्या राज्यांमधून एकही शहर निवडले गेले नाही अशा २३ राज्यांनाही एप्रिलपर्यंत प्रस्ताव देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे मार्गासाठीचे भूसंपादन थांबवा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर तालुक्यातील इंडिया बुल्सच्या औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी एकलहरा ते गुळवंच रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या भूसंपादनामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार असून, यासाठी येथील भूसंपादन शासनाने थांबवावे, अशी मागणी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे शेतकऱ्यांतर्फे करण्यात आली.

सिन्नर येथे एका कार्यक्रमाच्या निमितान्ने उद्योग मंत्री सुभाष देसाई आले ‌होते. हॉटेल पंचवटी येथे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे ही मागणी केली. एकलहरा, हिंगणवेढे, जाखोरी, जोगलटेंभी, नायगाव, देशवंडी, निपाणी, पिंपळगाव, बारागाव पिंप्री, गुळवंच येथील शेतजमीन रेल्वे मार्गासाठी घेतली जाणार आहे. आमचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे. या भागात बागायत शेती असून यामध्ये द्राक्ष, डाळिंब, टोमॅटो, ऊस यासारखी पिके घेतली जातात. या शेतजमिनी भूसंपादनात गेल्यास भूमिहीन होऊन आमची उपासमार होईल. शेतकरी रस्त्यावर येईल, त्यासाठी आमची जमीन रेल्वेमार्गासाठी घेवू नये, अशी मागणी शेतकऱ्यांनी उद्योग मंत्र्यांकडे निवेदनाव्दारे केली.

या प्रकरणी शेतकऱ्यांना फसवून एमआयडीसीने जमिनी ताब्यात घेतल्या आहेत. गुळवंच व मुसळगाव येथील शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्प साकारला जात आहे. शेतकऱ्यांचा या प्रकल्पास विरोध असून, येथील राखेमुळे शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. ‌हे सक्तीचे भूसंपादन थांबवावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यामध्ये उद्धव सांगळे, भाऊसाहेब कातकाडे, रतन मटाले, दशरथ रोडे, सोमनाथ पानसरे, आयुब सय्यद, हरिभाऊ ताजने, सुभाष जगळे आदी शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांवर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही, यासाठी इंडिया बुल्सच्या अधिकाऱ्यांशी बोलून नुकसान टाळण्यासाठी आपण प्रयत्न करू. - सुभाष देसाई, उद्योग मंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images