Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

धुळ्यातही आयसिसचे वारे?

$
0
0

जळगाव : सोशल मीडियाद्वारे आयसिस या दहशतवादी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांच्या संपर्कात असलेल्या धुळ्यातील सहा जणांची दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) चौकशी केल्याची माहिती पुढे आली आहे.

मोठ्या शहरांप्रमाणे आयसिसच्या संपर्कात धुळ्याचेही विद्यार्थी आल्याने खळबळ उडाली आहे. धुळे व जिल्ह्यातील कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे, तसेच तांत्रिक ‌अभ्यासक्रमाला अॅडमिशन असलेले १८ ते २१ या वयोगटातील एकूण सहा विद्यार्थी काही महिन्यांपासून नकळत आयसिसच्या प्रभावाखाली गेले आहेत. या सहाही विद्यार्थ्यांनी व्हॉटसअॅप स्टेटससाठीही आक्षेपार्ह मजकूर

वापरलेला असल्याचे चौकशीतून पुढे आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निर्माता संघ करंडक दीर्घांक स्पर्धेचे आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक


मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ आणि झलक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय दीर्घांक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. निर्माता संघ करंडक दीर्घांक स्पर्धा ही गुणवंतांचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे.


झलक हा एक मराठी कलाविश्वात सादर होणाऱ्या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या प्रचार आणि प्रचारासाठी निर्माण केलेला सांस्कृतिक उपक्रम आहे. याद्वारे मराठी कलाविश्व अधिकाधिक लोकाभिमुख व्हावे म्हणून सोशल मीडियाच्या प्रत्येक शाखेद्वारे प्रसार केला जातो. झलकच्या या कार्याची दखल घेऊन मराठी नाट्य व्यावासायिक निर्माता संघाने यावर्षी या स्पर्धेच्या आयोजनात सहभागी होण्याचा मान झलकला दिला आहे. यंदा स्पर्धेचे तिसरे वर्ष असून, प्राथमिक फेरी ५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी नाशिक, कणकवली, पुणे, मुंबई या चार शहरांमध्ये होणार आहे. शेवटच्या फेरीमध्ये १५ दीर्घांकाची निवड केली जाइल. निवड झालेल्या दीर्घांकाची अंतिम फेरी ४, ५, ६, ७ एप्रिल या कालावधीत मुंबई येथे होणार आहे.


दीर्घांक स्पर्धेतील प्रथम पुरस्काराचे स्वरूप रोख एक लाख रुपये व मानचिन्ह, तर द्वितीय आणि तृतीय पुरस्कार अनुक्रमे ७५ हजार व ५० हजार असे आहे. सर्वोत्कृष्ट लेखक, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनय यांना प्रत्येकी ११ हजार रुपये तसेच संगीत, नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा, वेशभूषा यासाठी पाच हजार रुपये असे बक्षिस देण्यात येणार आहे.


स्पर्धेसंबंधी विस्तृत माहिती, नियमावली व अर्ज झलकमराठी डॉट कॉम वर उपलब्ध आहे. दिनांक १५ जानेवारीपर्यंत प्रवेश अर्ज व इतर संबंधित गोष्टी जोडून माहिती लिहिलेल्या पत्त्यावर पोहोचले पाहिजे. स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. अधिक माहितीसाठी संदीप विचारे (९८२१३३२४११), सई काळे (९१६७८४८५८६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर, एन्काऊंटर का ऑर्डर कौन देता है?

$
0
0

'रेझिंग डे' उपक्रमात विद्यार्थ्यांचा पोलिसांना सवाल


म. टा. प्रतिनिधी, सातपूर


'सर, आपके एन्काऊंटर का ऑर्डर कौन देता है? असा निरागस प्रश्न चौथीच्या विद्यार्थ्यांनी थेट पोलिसांनाच विचारला आणि पोलिसांसह उपस्थित शाळेचे शिक्षकही अवाक् झाले. निमित्त होते 'रेझिंग डे'चे. गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये घडलेल्या या संवादामुळे नव्या पिढीवर प्रसार माध्यमांचा होणारा भडिमार आणि त्यांच्या मनामध्ये पोलिस प्रशासनाबद्दल निर्माण झालेले आकर्षण दर्शविणारे आहे.


शहरातील सर्व शाळा, कॉलेजेसमध्ये 'रेझिंग डे'निमित्त विद्यार्थ्यांना पोलिसांकडून सुरक्षेबाबत माहिती दिली जात आहे. यात काही विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी पोलिस ठाण्यात आणले जात आहेत. गंगापूररोडवरील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी गंगापूर पोलिस ठाण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी माहिती दिल्यावर विद्यार्थ्यांना काही शंका असल्यास प्रश्न विचारण्यास सांगण्यात आले. यावर एका विद्यार्थ्यांने 'सर आपको एन्काऊंटर का ऑर्डर कौन देता है?' असा प्रश्न करीत सर्वांनाच आर्श्चयात टाकले. यावर पोलिस निरिक्षक रमेश यादव यांनी असे कोणीही ऑर्डर देत नसल्याचे सांगत विद्यार्थ्यांचे समाधान होईल असे स्पष्टीकरण दिले. कारवाई करीत असतांना गुन्हेगारांकडून गोळीबार झाला तर पोलिस आपल्या बचाव करण्यासाठी प्रत्युत्तर देतात. यात काही वेळा फायरिंग देखील केले जाते. तसेच चित्रपटात दाखविले जाणारे प्रसंग काल्पनिक असतात. त्यावर विश्वास ठेवू नका, असेही यादव यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शन

याप्रसंगी पोलिसांनी पोलिस ठाण्यात कशा प्रकारे कामकाज चालते. स्वतःची सुरक्षा कशी घ्यावी, शस्त्रांची हातळणी कशी करतात याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. ऐरवी चित्रपटात किंवा सिरियलमध्ये दिसणाऱ्या बंदुका, रायफल खऱ्या समोर बघायला मिळाल्यावर विद्यार्थी हरखून गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनांच्या अतिक्रमणामुळे कोंडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक


जुने नाशिकच्या मुख्य रसत्यांवर बेशिस्तपणे तासनतास उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीचा फज्जा उडत आहे. या वाहनांच्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. वाहतूक पोलिस मात्र या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याने बेशिस्त वाहनचालकांचे फावले आहे. यामुळे रस्ते अरुंद होऊन अपघात वाढले आहेत.


नाशिकचे प्रवेशद्वार समजला जाणारे द्वारका परिसर येथून ते थेट गोल्फ क्लबच्या गडकरी चौक पर्यंतच्या दरम्यान मुख्य रस्ता दुकानदार, गॅरेज, कार दुरुस्ती व्यावसायिक यांच्या अतिक्रमणांमुळे गजबजलेला आहे. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. भर रस्त्यावर वाहने उभी करून ती दुरुस्ती केली जातात. शिंगाडा तलाव परिसरातील कार दुरूस्ती दुकानांसमोर तर वाहनांचा गराडा कायम असतो. वडाळानाका परिसरात गॅरेज, वेल्डिंग वर्क्स आदींचे कामे केली जातात. सारडा सर्कल येथून द्वारका मार्गावर देखील दुकानदार, गॅरेज व चिकन मटण विक्रेत्यांचे अतिक्रमणे केली आहेत.

गादी, उशी भरणारे व्यावसायिक तर रस्त्यावर गादी पिंजत असतात. यामुळे रस्ता अरुंद झाला असून अनेक अपघात घडतात. अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपनगरला सिग्नलची कसोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

जवळपास दररोज होणऱ्या अपघातांमध्ये अनेक बळी गेल्यानंतर उपनगर नाका सिग्नल व्यवस्था उभारण्यात आली आहे. मात्र, येथे चारपेक्षा अधिक रस्ते येऊन मिळत असल्याने सहा सिग्नल उभारावे लागले आहेत. वाहनचालकांबरोबरच सिग्नलचही कसोटी लागणार आहे.

उपनगर येथे गेल्या महिन्यात आईसह बालक ट्रकखाली सापडून ठार झाले होते. दीड वर्षापूर्वी एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. सिग्नल नसल्यामुळे लहान मोठे अपघात येथे कायम घडत असतात. गेल्या महिन्यात राजकीय पक्षांनी स्पीडब्रेकरसाठी रस्ता खोदण्याचे आंदोलन केल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्याची दखल घेत प्रशासनाने अखेर सिग्नल बसविले.

तब्बल सहा सिग्नल

उपनगर येथे यापूर्वीही सिग्नल व्यवस्था उभारण्यात आली होती. मात्र, या चौकाला जयभवानी रोडचा रस्ताही येऊन मिळतो. त्यातच चौकात दोन्ही बाजूला बसस्टॉप आहेत. त्यामुळे सिग्नल व्यवस्था फेल झाली होती.
परिणामी निष्पापांचे बळी गेले होते. आता सहा सिग्नल उभारण्यात आले असून ते लवकरच कार्यान्वित केले जाणार आहेत. मात्र, वाहनचालक किती व कसे सहकार्य करतात यावर सिग्नलचे यश अवलंबून आहे.


सहकार्याचे आवाहन

नगरसेविका सुमन ओहोळ म्हणाल्या, की प्रचंड वाहतूक आणि चौकाची विचित्र परिस्थिती यामुळे वाहतूक नियमन आव्हानच आहे. सिग्नल व्यवस्था यशस्वी होण्यासाठी वाहनचालकांनी सहकार्य करावे. सिग्नल १२ जानेवारीपर्यंत कार्यान्वित होतील. बसस्टॉपमुळे सिग्नल फेल होऊ शकतात हे लक्षात घेऊन महापालिका कार्यकारी अभियंता संजय पवार, विजय ओहोळ यांनी पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वत:च्याच जिवाशी खेळ

$
0
0

वाहनचालक, पादचाऱ्यांचा आडमुठेपणा; उड्डाणपुलाखाली दुभाजकास विरोध

म. टा. प्रतिनिधी, सिडको


उड्डाणपुलाखाली वाहनचालक व पादचाऱ्यांनी ठिकठिकाणी दुभाजकांना तोडल्याने त्यांच्या दुरुस्तीचे काम महामार्ग प्राधिकरणाने सुरू केले आहे. मात्र, त्यास नागरिकांकडून विरोध केला जात आहे. पार्थडी फाटा, राणेनगर ते लेखानगर कार्नरपर्यंत अनेक ठिकाणी पंक्चर आहेत. यामुळे अनेकदा अपघात होतो. या परिस्थितीला आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या महापालिकेच्या प्रयत्नांना खीळ घातत नागरिक स्वत:च्या जिवाशी खेळत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.


पार्थडी फाटा, राणेनगर ते लेखानगर कार्नरपर्यंत उड्डाणपुलाखाली टाकण्यात आलेले सर्व्हिस रोडचे दुभाजक वाहनचालक व पादचाऱ्यांनी पंक्चर केले आहेत. यामुळे उड्डाणपुलाखालून शॉर्टकट मारतांना अनेकदा अपघात झाले आहेत. याबाबत प्रसिद्धी माध्यमांनी उड्डाणपुलाखाली सर्व्हिसरोडवरून शॉर्टकट मारतांना होणाऱ्या अपघातांची देखल घेत वाहनचालक घातक प्रवास करत असल्याचे मांडले होते. मात्र, यापासून बोध न घेता आजही वाहनचालक व पादचारी जीव धोक्यात घालून प्रवास करतांना दिसतात. महामार्ग प्राधिकरणाने विविध ठिकाणी पंक्चर केलेले दुभाजक दुरुस्ती करण्याचे काम ठेकेदाराकडे सोपविले आहे. मात्र, या दुभाजकांची दुरुस्ती करत असतांना वाहनचालक, पादचारी व उड्डाणपुलाखाली वाहने पार्क करणाऱ्यांकडून विरोध केला जात असल्याचे ठेकेदाराच्या कामगारांनी सांगितले. शार्टकट मारतांना होणाऱ्या अपघाताबाबत वाहनचालक व पादचाऱ्यांना माहिती असून दुभाजकांना विरोध करत असल्याने ते आपल्या जिवाशीच खेळ करत असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. महामार्ग प्राधिकरणाने विरोध करणाऱ्यांवर पोलिस कारवाईची मागणी केली जात आहे.


नागरिकांच्या सुरक्षेसाठी उड्डाणपुलाखाली दुभाजक टाकण्यात आले आहेत. शॉर्टकट मारण्यासाठी दुभाजकांची अनेक ठिकाणी तोडफोड केली आहे. यात महामार्ग प्राधिकरणाने दुभाजक टाकले पाहिजे. भविष्यात अपघातात जीव गेल्यास जबाबदार कोण राहिल?
- नितीन अमृतकर, सिडको

उड्डाणपुलाखाली चारचाकी वाहने पार्क करता यावीत म्हणून काही वाहतूकदार दुभाजकांना विरोध करत आहेत. परंतु, तोडलेल्या दुभाजकातून सर्व्हिसरोडवर येतांना अनेक अपघात झाले आहेत. असा जीव धोक्यात घालणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई करण्याची गरज आहे.
- चेतन नेहते, रहिवाशी, राणेनगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर, एन्काऊंटर का ऑर्डर कौन देता है?

$
0
0

शहरातील सर्व शाळा, कॉलेजेसमध्ये 'रेझिंग डे'निमित्त विद्यार्थ्यांना पोलिसांकडून सुरक्षेबाबत माहिती दिली जात आहे. यात काही विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी पोलिस ठाण्यात आणले जात आहेत. गंगापूररोडवरील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी गंगापूर पोलिस ठाण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी माहिती दिल्यावर विद्यार्थ्यांना काही शंका असल्यास प्रश्न विचारण्यास सांगण्यात आले. यावर एका विद्यार्थ्यांने 'सर आपको एन्काऊंटर का ऑर्डर कौन देता है?' असा प्रश्न करीत सर्वांनाच आर्श्चयात टाकले. यावर पोलिस निरिक्षक रमेश यादव यांनी असे कोणीही ऑर्डर देत नसल्याचे सांगत विद्यार्थ्यांचे समाधान होईल असे स्पष्टीकरण दिले. कारवाई करीत असतांना गुन्हेगारांकडून गोळीबार झाला तर पोलिस आपल्या बचाव करण्यासाठी प्रत्युत्तर देतात. यात काही वेळा फायरिंग देखील केले जाते. तसेच चित्रपटात दाखविले जाणारे प्रसंग काल्पनिक असतात. त्यावर विश्वास ठेवू नका, असेही यादव यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शन

याप्रसंगी पोलिसांनी पोलिस ठाण्यात कशा प्रकारे कामकाज चालते. स्वतःची सुरक्षा कशी घ्यावी, शस्त्रांची हातळणी कशी करतात याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. ऐरवी चित्रपटात किंवा सिरियलमध्ये दिसणाऱ्या बंदुका, रायफल खऱ्या समोर बघायला मिळाल्यावर विद्यार्थी हरखून गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभ्यासासाठी घेतला मंदिरांचा आसरा

$
0
0

अमळनेरमधील मंदिरांत विद्यार्थ्यांची गर्दी

म. टा. वृत्तसेवा, अमळनेर
शालेय आणि स्पर्धात्मक परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यासाशिवाय तरणोपाय नाही. तसेच विविधस्तरातील परीक्षेला सामोरे जातांना कठीण अभ्यास असतो. जर घरात अभ्यासाला पोषक वातावरण नसेल तर विद्यार्थी वेगवेगळी शांत ठिकाणे शोधतात. अशीच काहीशी पद्धत अमळनेरमधील विद्यार्थ्यांनी अवलंबली आहे. चोपडा रस्त्यावरील गायत्री मंदिरात भक्तांपेक्षा विद्यार्थ्यांचीच अधिक गर्दी दिसायला लागली आहे. त्यांना अभ्यासासाठी याठिकाणी शांतता मिळत असल्याने विद्यार्थी याठिकाणी रमत आहेत.


शहरातून बाहेरच्या भागात असलेल्या गायत्री मंदिरात पैलाड, ताडेपुरा, शनिपेठ, आंबेडकर हॉस्टेल, आणि देवळी येथील विद्यार्थी अभ्यासासाठी येतात. या भागातील बहुसंख्य कुटुंब ही दारिद्र्ये रेषेखालील आहेत. शिवाय या भागात घरे जवळजवळ असल्याने अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थी शांत आणि चांगले वातावरणच्या शोधात असतात.

समस्यांवर उपाय

विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अभ्यासिकाही उपलब्ध नाहीत. म्हणून विद्यार्थी अभ्यासासाठी शाळा, महाविद्यालयाच्या लायब्ररीत जातात. तर पैलाड भागातील विद्यार्थी हे गायत्री मंदिर आणि परिसरात वेगवेगळ्या मंदिरात येतात. हा पर्याय त्यांच्या सर्व समस्यांवर एकच उपाय म्हणून सिद्ध होत आहे. तसेच हा परिसर शहरापासून लांब असल्याने येथे खूप शांतता असते. मंदिर परिसरातील झाडांच्या सावलीत विद्यार्थी अभ्यास करत आहेत. अभ्यासाला कंटाळला आला तर एकत्रितपणे अभ्यासावर चर्चा करतात. ग्रुपने अभ्यासाची चर्चा केली तर अभ्यास अधिक लक्षात राहतो, असेही
त्यांचे मत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आराईच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा तालुक्यातील आराई ग्रामपंचायतीचे सरपंच विजय सोनवणे यांच्याविरूध्द दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला. आराई ग्रामपंचायतीचे सरपंच सोनवणे हे सदस्यांना कामकाजात विश्वासात घेत नाहीत, तसेच कामकाज करीत असतांना मनमानी पद्धतीने कारभार करीत असल्या कारणाने १२ सदस्यांनी त्यांच्या विरूद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता.


आराई ग्रामपंचातीच्या कार्यालयात तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करून अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्यात आले. सभेस ग्रामपंचातीचे १५ सदस्य उपस्थित होते. त्यापैकी त्यांच्या विरूध्द १२ सदस्यांनी मतदान केल्याने सरंपच सोनवणे यांच्यावरील अविश्वास बहुमताने मंजूर करण्यात आला. यावेळी माजी सरपंच दिलीप सोनवणे, सदस्य छाया तलवारे, ज्योती अहिरे, एकनाथ अहिरे, साधना वसंत अहिरे आदि उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीला जाळून मारले; पतीला जन्मठेपेची शिक्षा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

पत्नीने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून ठार मारल्या प्रकरणी निफाडच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने एकास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. संजय संपत मोरे, रा. वडाळीभोई, ता. चांदवड असे आरोपीचे नाव आहे.


१२ डिसेंबर २०१२ रोजी पती संजय संपत मोरे याने त्याने दारु पिण्यासाठी पैसे मागितले होते. पत्नी शोभाने पैसे नकार दिल्यानंतर संजयने घरातील स्टोव्हमधून रॉकेल तिच्या अंगावर फेकले. त्यानंतर घरातील पेटता दिवा अंगास लागल्याने आपण भाजलो असल्याचा जबाब शोभा हिने उपचारांदरम्यान दिला होता. त्यानंतर शोभाचा मृत्यू झाला होता. संपत मोरे याच्याविरुध्द वडाळीभोई पोलिस स्टेशनला भादवि कलम ३०७ अन्वये, तर उपचारादरम्यान शोभाचा मृत्यू झाल्याने भादवि कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. तपासाअंती सदर खटल्याचे आरोपपत्र निफाडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. सरकार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील अॅड यू. डी. गवांदे यांनी तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक प्रिया थोरात यांच्यासह एकूण बारा साक्षिदारांची साक्ष नोंदविली.


सदर खटल्याची अंतिम सुनावणी होऊन आरोपी संजय संपत मोरे यास भादवि कलम ३०२ अन्वये दोषी ठरवत जन्मठेप व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावास अशी शिक्षा निफाडच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. जे. मंत्री यांनी सुनावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनाच्या धडकेत चिमुरडे बहीणभाऊ ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही शिवारात अज्ञात वाहनाने मोटार सायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात चिमुरड्या बहीण-भावाचा मृत्यू झाला. या प्रकरणी चांदवड पोलिसांत बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. फरारी पिकअप व्हॅनचालकाचा पोलिस शोध घेत आहेत. या अपघातात २ जण जखमी झाले आहेत.

कातरणी येथील केशव दशरथ सूर्यवंशी मुलगा प्रेम (६ वर्षे) आणि मुलगी अर्पिता (४ वर्षे) या दोन मुलांसह मोटारसायकल (एमएच १५ एफसी २०७३)ने समिट रेल्वे स्थानकाकडे जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात प्रेम व अर्पित जागीच ठार झाले. तर केशव सूर्यवंशी व हनुमान कुशारे हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर चांदवड येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना नाशिक सिव्हिलला रवाना करण्यात आले आहे. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. या दोन बालकांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन

$
0
0

पोलिसांकडून वृध्दांना स्वेटर, ब्लँकेट व फळांचे वाटप

म. टा. वृत्तसेवा, येवला

खाकी वर्दीच्या आत देखील माणसातील माणूसपण जपणारं मन असते. हे येवला तालुका पोलिसांनी
दाखवून देताना तालुक्यातील एका वृद्धाश्रमातील वृद्धांना मदतीचा हात दिला. समाजातील उपेक्षित घटकांसाठी आपणही काहीतरी देणं लागतो या भावनेतून येवला तालुका पोलिसांनी तालुक्यातील शिरसगांव लौकी येथील सैंग ऋषी वृध्दाश्रम गाठताना तेथील वृध्दांना स्वेटर, ब्लँकेटसह फळांचे वाटप केले. तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रुपचंद वाघमारे यांच्या संकल्पनेतून 'रेझिंग डे' सप्ताहातंर्गत हा स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

शिरसगांव लौकी येथील नवनाथ नारायण जऱ्हाड यांनी स्वखर्चाने सैंग ऋषी वृध्दाश्रमाची स्थापना केली आहे. जऱ्हाड यांनी आदीगुरु दत्तात्रेय प्रभू कृपा फाऊंडेशनची स्थापना केलेली असून शासनाकडून अथवा कोणाकडून कशाचीही अपेक्षा न बाळगता ८ ते ९ वृध्दांना सहारा दिला आहे. १५ बाय ३० फुट आकाराच्या या आश्रमात नव्याने ३० बाय १०० फुटाचे बांधकाम सुरु आहे.याच आश्रमाला येवला तालुका पोलिसांनी भेट देत तेथील वृद्धांना स्वेटर, ब्लँकेटसह फळांचे वाटप केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सेरिब्रल पाल्सीवर स्टेमसेल उपचार शक्य’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सेरिब्रल पाल्सी हा आजार बराच होऊ शकत नाही असा समाजात गैरसमज आहे. मात्र, नवनव्या संशोधनांमुळे या आजारातून पेशंटला काही प्रमाणात बाहेर काढणे शक्य आहे. त्यासाठी स्टेमसेल थेरपी उपयोगी ठरत असल्याचा दावा न्युरोजेन ब्रेन अॅण्ड स्पाईन इन्स्टिट्यूटच्या उपसंचालक डॉ. नंदिनी गोकुळचंद्रन यांनी बुधवारी पत्रकार प‌रिषदेत केला.


डॉ. गोकुळचंद्रन म्हणाल्या, 'सेरिब्रल पाल्सीबाबत समाजातील अनेक गैरसमजामुळे पेशंट आयुष्यभर आपल्या कुटुंबीयांवर अवलंबून रहातो. सेरिब्रल पाल्सीवर उपचारच नाहीत, असाही अपप्रचार केला जातो. मात्र, स्टेमसेल थेरपीच्या माध्यमातून सेरिब्रल पाल्सीवर उपचार शक्य आहेत. लहान वयात सेरिब्रल पाल्सीवर उपचार सुरू केल्यास चांगले परिणाम पहायला मिळतात.' यावेळी स्टेमसेलच्या माध्यमातून उपचार झालेल्या नाशिकच्या दोन पेशंटची माहिती यावेळी देण्यात आली. स्टेमसेल थेरपीनेच सेरिब्रल पाल्सी या आजारावर नियंत्रण आणणे शक्य नाही तर त्याबरोबर इतरही थेरपी व समुपदेशनाची गरज पडते. यात न्युरोजेन ब्रेन अॅण्ड स्पाईन इन्स्टिट्यूट महत्त्वाचे भूमिका पारपाडत असल्याचे डॉ. गोकुळचंद्रन यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारमच्या आरोग्य केंद्राला स्टाफ देण्याचे आश्वासन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

राज्य शासनाची मंजुरी मिळतानाच नव्या वास्तूचे बांधकाम होऊन उभ्या राहिलेल्या येवला तालुक्यातील भारम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला लवकरच सर्व स्टाफ मिळणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सर्वच स्टाफ देण्याची ग्वाही त्यांच्या भेटीसाठी मुंबईत गेलेल्या येवल्यातील शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिली.

आरोग्यमंत्र्यांच्या या आश्वासनामुळे केवळ अधिकारी अन् कर्मचाऱ्यांअभावी बंद असलेले भारमचे प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरच या भागातील जनतेच्या सेवेत कार्यान्वित होईल, असा विश्वास येवला पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार यांनी व्यक्त केला आहे. येवला तालुक्याच्या पूर्व भागातील भारम येथे राज्य शासनाकडून प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले जाताना या केंद्राच्या इमारतीचे बांधकामही गेल्या आठ महिन्यांपूर्वी पूर्ण झालेले आहे. इमारत उभी राहिली खरी मात्र या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर कर्मचारी वर्गाची अद्यापपावेतो नियुक्ती झालेली नसल्याने हे आरोग्य केंद्र बंदच आहे. येवला पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार, पंचायत समिती सदस्य दिलीप मेंगळ तसेच साहेबराव सैद, रवी काळे या शिवसेनेच्या एका शिष्टमंडळाने मुंबईत राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची भेट घेत या प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत त्यांचे लक्ष वेधले. यावेळी संभाजी पवार यांनी येवला तालुक्यातील इतर ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामधील दुरवस्थेची तपशीलवर माहितीही दिली. आरोग्यमंत्र्यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.


येवला शहरात सध्या कार्यान्वित असलेल्या येवला ग्रामिण रुग्णालयाच्या इमारतीतच राज्य शासनाने मागे उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी दिली आहे. मात्र, याबाबत स्टाफ व इतर अत्याधुनिक सोयीसुविधांच्या बाबतीत पुढील कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याकडेही यावेळी शिष्टमंडळाने आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे लक्ष वेधले. येवला तालुक्यातील कुसूर येथे राज्य शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करावे, असे साकडेही एका लेखी निवेदनाद्वारे यावेळी शिष्टमंडळाने डॉ. सावंत यांना घातले. या भेटीप्रसंगी निफाडचे आमदार अनिल कदम हेही उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध नळजोडण्यांवर संक्रांत

$
0
0

मालेगाव महापालिकेने राबवली मोहीम; १६ लाखाहून अधिक रुपयांचा दंड वसूल


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव शहराच्या मनपा हद्दीतील अवैध नळजोडणी धारकांवर पालिका प्रशासनाने सलग तीन दिवस कारवाई करून १६ लाख रुपयांपेक्षा अधिक दंड वसूल केला आहे. शहरातील चारही प्रभागांमध्ये एकावेळी मनपा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कारवाईने अवैध नळजोडणीधारकांचे धाबे दाणाले आहे. शहरात होणारी पाणीचोरी आणि पालिकेच्या महसुली नुकसानीला आळा बसणार असल्याने नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.

सलग तिस-या दिवशी चारही प्रभागात मनपाच्या नियंत्रण अधिकारी आणि कर्मचा-यांनी कारवाई सुरू ठेवली. चारही प्रभागात एकूण ११ नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या, तर १०२ नळ जोडणीधारकांकडून ९ लाख ५० हजार ६१६ रुपये तिसऱ्या दिवशी वसूल करण्यात आले. सुरुवातीच्या दोन दिवसात कारवाई पथकाला अनेक ठिकाणी नागरिकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले होते. मात्र, तिसऱ्या दिवशी अनेकांनी दंड भरून नळजोडणी अधिकृत करून घेण्यास प्राधान्य दिले. मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांनी या कारवाईदरम्यान अनेक ठिकाणी भेटीदेवून पाहणी केली आहे.

या कारवाईत मनपा उपायुक्त कमरुद्दीन शेख, पाणी पुरवठा अभियंता जाहीर अंसारी, शहर अभियंता कैलास बच्छाव, पंकज सोनवणे, अनिल पारेख, जयपाल त्रिभुवन, मंगेश गवांदे आदींसह वर्ड लिपिक व कर्मचारी यांनी काम पहिले आहे. मनपाची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली असताना पाणी चोरीद्वारे कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. शिवाय, पाणीचोरांना कोणताही धाक उरलेला नाही अशी ओरड सर्वत्र झाल्याने अखेर मनपाने केलेल्या या कारवाईला तीन दिवसांत चांगले यश येत आहे. या कारवाईत मनपाच्या महसुलातही भरघोस वाढ होणार आहे. तीन दिवसाच्या कारवाईत एकूण १६ लाख १५ हजार ९५७ रु इतका दंड वसूल झाला आहे.


कारवाईचा बडगा

खंडित नळ जोडणी- २६
एकूण अधिकृत केलेल्या
नळजोडणी- १८५
दंड वसुली- १६ लाख
१५ हजार ९५७ रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संसदेत आम्ही साड्यांवरही चर्चा करतो: सुप्रिया सुळे

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

'संसद सभागृहात महत्त्वाच्या मुद्द्यांवरील चर्चेदरम्यान महिला खासदारांमध्ये 'बाकीच्या' गप्पाच अधिक रंगतात,' असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. 'त्याच-त्याच मुद्द्यांवरील भाषणे ऐकून कंटाळा आला की, वेळ घालवण्यासाठी आम्ही एकमेकींच्या साड्या, पार्लर आणि फॅशनची चर्चा करतो,' असं सुळे यांनी काल बेधडकपणे सांगून टाकलं.

नाशिकमधील युवती मेळाव्याचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते गुरुवारी झाले. त्यावेळी त्यांनी संसदेतील काही किस्से उपस्थितांना ऐकवले. 'संसदेच्या सभागृहात असताना मी एखाद्या विषयावरचं पहिलं भाषण ऐकते. त्यानंतर दुसरं आणि तिसरंही ऐकते. दोन-तीन भाषणं झाली की पुढच्या भाषणांमध्ये खासदार अनेकदा तेच-तेच बोलतात. आधीच्याच खासदारांच्या मुद्द्यांची पुनरावृत्ती करतात. अशावेळी कंटाळा येतो. मग वेळ घालवण्यासाठी जवळच बसलेल्या खासदारांसोबत आम्ही गप्पा मारतो. टीव्हीवर जेव्हा ते दाखवलं जातं तेव्हा पाहणाऱ्याला वाटतं की आम्ही देशातील एखाद्या गंभीर विषयावर चर्चा करतो. प्रत्यक्षात तसं नसतं. 'तुमची साडी कुठून आणली? माझी साडी कुठून आणली?' याचीच चर्चा अधिक असते, असं त्या म्हणाल्या. सुळे यांच्या या वक्तव्याबद्दल उपस्थितांमध्ये उलटसुलट चर्चा रंगली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वादांची संमेलने..

$
0
0

- प्रा. डॉ. विवेक खरे
मराठी भाषा आणि मराठी साहित्य यावर चर्चा घडावी तसेच त्याचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने अखिल भारतीय पातळीवर दरवर्षी एका उत्सवाचे आयोजन करण्यात येते. आपण सर्वजण या उत्सवाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या नावाने ओळखतो. म्हणायला अखिल भारतीय असलेले हे संमेलन आतापर्यंत महाराष्ट्राबाहेर काही विशिष्ट राज्यांत अपवादाने झालेले आहे. तर हे संमेलन आणि त्याला जोडून येणारे वाद या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारख्या वाटतात. दरवर्षी होणाऱ्या या संमेलनात वाद होणे हे मराठी साहित्यप्रेमींच्या जणू अंगवळणीच पडले आहे. कधी हे वाद बोकड बळीमुळे, तर कधी स्मरणिकेत नथुराम गोडसेंचे नाव आल्यामुळे, कधी यशवंतराव चव्हाण यांच्यावरील वादग्रस्त विधानामुळे, तर कधी अध्यक्षांनीच लिहिलेल्या कादंबरीतील वादग्रस्त मजकुरामुळे, कधी नंदीबैल म्हणून साहित्यिकांची हेटाळणी झाल्याने अशा अनेक कारणांनी वाद निर्माण झाले. पिंपरी चिंचवड येथे पुढच्याच आठवड्यात होवू घातलेल्या ८९ व्या अ. भा. साहित्य संमेलनाच्या तोंडावर नियोजित अध्यक्ष्यांनीच यावेळी वादाला आमंत्रण दिले. एका कार्यक्रमात त्यांनी देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान झालेल्या व्यक्तीचा एकेरी उल्लेख केला तसेच त्यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधानही केले. खरे तर अध्यक्षपदी निवडून आलेल्या व्यक्तीने अत्यंत जबाबदारीने आपली मते मांडायला हवीत याबाबत कोणाचेही दुमत होणार नाही. पण तरीदेखील कोणताही मनुष्य (मग तो संमेलनाचा अध्यक्ष का असेना) असे बेजबाबदारपणे का वागतो याचा शोध घेतला पाहिजे.

साहित्य संमेलनाच्या निवडणूक प्रक्रियेपासूनच वादाला सुरुवात होते. लोकशाही प्रक्रियेने होणाऱ्या या निवडणुकीत जिंकून येण्याच्या अहमहमिकेने उमेदवार परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करतात. आपली भाषा, त्या भाषेतून निर्माण होणारे साहित्य, त्या साहित्याबद्दल गंभीर चर्चा अशा महत्त्वपूर्ण विषयांना बगल देवून व्यक्तिगत पातळीवर आरोप-प्रत्यारोप करून साहित्यिक मंडळी सर्वसामान्य माणसांसारखे भांडतात, त्यावेळी साहित्यप्रेमींना आश्चर्य वाटते. या सगळ्या प्रक्रियेतून अध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या साहित्यिकाला मग गगन ठेंगणे वाटणे स्वाभाविक आहे. अध्यक्ष झाल्यावर वेगवेगळ्या सभा-संमेलनामध्ये आपल्या लेखनाविषयी, भविष्यकालीन साहित्यिक योजनांविषयी, मराठी भाषेच्या विकासाविषयी, भविष्यात भाषेवर येणाऱ्या संकटांविषयी, विविध स्तरातील, विविध प्रदेशातील लेखन करू पाहणाऱ्या नवलेखकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांविषयी खरेतर गंभीरपणे मार्गदर्शन होईल, असे विचार संमेलनाध्यक्षांनी मांडणे अपेक्षित असते. मात्र, तसे होतांना अपवादानेच दिसते.

इंग्रजीत 'लार्जर दॅन लाईफ' असा एक वाक्प्रचार आहे. सकारात्मकरित्या वापरला जाणारा हा वाक्प्रचार संमेलनाध्यक्षांच्या बाबतीत मात्र नकारात्मकतेने वापरणे समर्पक ठरेल. अध्यक्ष आपली प्रतिमा आहे, त्या वास्तवापेक्षा मोठी करण्याचा जाणूनबुजून प्रयत्न करतात. आयुष्यापेक्षा मोठे होण्याचा प्रयत्न करतात. आपल्या अभ्यासाचा प्रांत सोडून नको, त्या विषयावर बोलण्याचा जणू आपल्याला अधिकारच प्राप्त झाला आहे, या अविर्भावात ते वर्षभर वावरतात. कोणत्याही विषयावर आपले मुक्तचिंतन करतात. अर्थात याबाबतीत ते पूर्णपणे दोषी आहेत असे नाही. भारतीय मानसिकतेतच मनुष्याच्या विचारांपेक्षा त्याची प्रतिमा मोठी मानण्याचा प्रघातच आहे. संमेलनाध्यक्ष देखील यातून सुटू शकत नाहीत. अध्यक्षांकडून सर्वसामान्य लोकांच्या अवास्तव अपेक्षा असतात. अध्यक्ष म्हणजे सर्व दुखण्यावर जालीम उपाय देणारा वैद्य या भूमिकेतून त्यांच्याकडे पाहिले जाते. मराठी शाळा बंद पडण्याचा प्रश्न असो, सीमाभागातील मराठी लोकांचा प्रश्न असो, नक्षलवाद्यांचा प्रश्न असो, शासकीय अनुदानाचा प्रश्न, प्रकाशकांचा प्रश्न असो असे कितीतरी प्रश्न घेवून सामान्य लोक अध्यक्षांकडे येतात. मात्र, हे सर्व प्रश्न आजवर झालेल्या किती संमेलनाध्यक्षांनी मुळापासून सोडविण्यासाठी काही प्रयत्न केले हा शोधाचा विषय होऊ शकतो. खरे तर अध्यक्षांच्या हातात काहीच नसते. ज्या मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने संमेलन भरविले जाते ते महामंडळ अध्यक्षाला फक्त तीन दिवस मिरवत असते आणि अध्यक्ष देखील अध्यक्षपदाची झूल पांघरून स्वतःला मिरवून घेण्यात धन्यता मानतात.

मागील काही वर्षांपासून संमेलनाच्या अध्यक्षीय निवडणुकीत उभे राहणाऱ्या साहित्यिकांची नावे पाहिली तर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे सर्वसाधारण साहित्यनिर्मिती केलेली, साहित्यविषयक निश्चित भूमिका नसलेली मंडळीही नंबरगेमच्या आधारे निवडून येण्याची खात्री बाळगून निवडून येण्याचा प्रयत्न करतात. आज मराठी साहित्यात असे कितीतरी साहित्यिक आहेत, ज्यांच्या साहित्यावर वाचक मनापासून प्रेम करतात, त्यांना डोक्यावर घेवून नाचतात पण हे साहित्यिक अध्यक्षीय निवडणुकीपासून लांबच राहणे पसंत करतात. गुणवत्ता असूनही निवडून येण्याची खात्री त्यांना नसते आणि निवडून नाही आलो तर नाचक्की होईल असेही त्यांना वाटत असते. त्यामुळे सामान्य साहित्यिक कुवत असणाऱ्यांचे फावते. साहित्य संमेलन आज एक मोठा इव्हेंट झाले आहे. या इव्हेंटमध्ये पैसे ओतणाऱ्यांनाही असे बिनबुडाचे अध्यक्ष हवेच असतात. त्यांना साहित्यापेक्षाही आपली प्रतिमा लोकांसमोर नेण्यात रस असतो. म्हणून मागील काही वर्षांपासून संमेलन आयोजनकर्तेच आपण कोणाला अध्यक्षपदी निवडून आणायचे हे ठरवितांना दिसतात. पिंपरी चिंचवड येथे होऊ घातलेल्या संमेलनाचे चित्र काहीसे असेच दिसते आहे.

वाद घालणे हे जिवंतपणाचे, ज्ञानी होण्याचे लक्षण मानले जाते. पण वाद कोणत्या विषयावर घालावेत हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. नको त्या विषयांवर वाद घालून, पातळी सोडून आपल्या पदाची प्रतिष्ठा गमावण्यात काहीच अर्थ नाही. गुजराती भाषेत एक म्हण आहे, त्याप्रमाणे ज्याचे काम त्याने करावे दुसऱ्याने ते केले की तोंडघशी पडण्याची वेळ येते. मराठीत साहित्य संमेलनाध्यक्षांची एक वैचारिक परंपरा आहे. संमेलनाच्या याच मंचावरून दुर्गाबाई भागवतांनी जाचक आणीबाणीच्या विरोधात रणशिंग फुंकले होते. प्र. के अत्रे, आचार्य जावडेकर, गं. बा. सरदार, य. दि. फडके, नारायण सुर्वे, राम शेवाळकर, वसंत बापट अशा दिग्गज साहित्यिकांनी या पदाची शोभा वाढविली. किमान त्याची तरी आठवण निवडून आलेल्या अध्यक्षांनी ठेवणे संयुक्तिक ठरेल. साहित्यसंमेलने ही मराठी वाचकांच्या अस्मितेशी जोडलेली आहेत. ही अस्मिता टिकवून ठेवण्यात साहित्य संमेलनाशी संबंधित सर्वच घटकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

(लेखक एसएमआरके कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनावश्यक लाज सोडा

$
0
0

gayatri.kulkarni@timesgroup.com संकोच हा महिलांचा सर्वात मोठा शत्रू आहे. केवळ यामुळेच आज महिला काही नैसर्गिक अधिकारांपासूनही वंचित आहेत. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ आणि मोफत मुतारी उपलब्ध करुन मिळण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, मग महिलाच का यापासून दूर आहेत. याबाबत बाळगली जाणारी अनावश्यक लाज महिलांनी बाजूला ठेवली तरच 'राईट टू पी' ही मोहिम पूर्णत: यशस्वी होईल. या मोहिमेतील महिलांचा सहभाग आणि हाय कोर्टाच्या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत मुमताज शेख यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी संवाद साधला.

हायकोर्टाच्या आदेशानुसार काम सुरू झाल्याची काही माहिती मिळाली आहे का?

-मुंबईमध्ये तरी याबाबत काम सुरू झालेच आहे, पण आता अन्य महापालिकांमार्फतही तसे व्हावे अशी आशा आहे. प्रत्यक्ष रिपोर्ट आमच्यापर्यंत आलेला नसला तरी आम्ही विविध शहरांमध्ये 'राईट टू पी' चळवळ सुरू करीत आहोत, ज्यामुळे या आदेशाची योग्य आणि काटेकोर अंमलबजावणी होईल, यासाठी महिलांचा सहभाग अतिशय आवश्यक आहे.

यापुढे तुमच्यामार्फत कोणते काम हाती घेतले जाणार आहे?

-मुळात लघवी किंवा मुतारी हा शब्द उच्चारण्यातच महिला संकोचलेल्या असतात. केवळ या संकोचामुळेच आज अनेक महिलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. ही गोष्ट लाजेशी जोडली गेल्यामुळे याबाबत होणारा अन्याय किंवा असुविधा यावर बोलायला महिला धजावत नाहीत. याचाच गैरफायदा घेतल्यामुळे आजवर महिलांना सार्वजनिक ठिकाणी या हक्कांपासून वंचित राहावे लागले. त्यामुळे यबाबात महिलांसह सर्व नागरिकांमध्ये जनजागृतीचे काम हे आमचे यापुढचे उद्दीष्ट आहे.

अन्य शहरांमध्ये ही मोहिम कशाप्रकारे राबविली जाणार आहे?

-मुंबईमध्ये या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. परंतु प्रत्येक शहराची परिस्थिती लक्षात घेऊन त्यावर काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे 'राईट टू पी' या चळवळीसाठी त्या-त्या शहरातील लोकांचा एक सक्रिय ग्रुप आमच्यामार्फत तयार केला जाणार आहे. हायकोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी योग्य पध्दतीने व्हावी तसेच याबाबत महिला व नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासाठी हा ग्रुप काम करणार आहे.

ग्रामिण भागामध्ये याबाबत काही काम करणार आहात का?

-सध्या आम्ही विविध ग्रामपंचायती असलेल्या भागांचा अभ्यास केला आहे. ग्रामपंचायतींमध्ये महिलांसाठी १० टक्के बजेट असते. ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर करुन या निधीच्या वापरातून बाजार गावांमध्ये अशा प्रकारच्या मोफत मुताऱ्या उभारण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. ग्रामीण भागातील हा बदल निश्चितच सुधारणेच्या दृष्टिने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

`त्या` दोघांचा लोंढेच्या कार्यालयात खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक तडीपार गुन्हेगार अर्जुन महेश आव्हाड आणि सराईत गुन्हेगार निखिल विलास गवळी यांच्या हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने प्रकाश लोंढे ग्रुपच्या (पीएल ग्रुप) चौघा सदस्यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. यातील दोघा जणांना पोलिसांनी अटक केली असून, हत्येची घटना सातपूर परिसरातील जगतापवाडी येथील पीएल ग्रुपच्या कार्यालयातच झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

सातपूर परिसरातील अर्जुन आव्हाड आणि अमृतधाम, पंचवटी येथील निखिल गवळी या दोघांचे मृतदेह जव्हार रोडलगत तोरंगण घाटात सापडले होते. ३१ डिसेंबर रोजी त्यांची हत्याची झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तपास करीत पीएल ग्रुपच्या प्रिन्स चित्रसेन सिंग, वतन शिवाजी पवार, सनी उर्फ ललीत अशोक विठ्ठलकर आणि निखिल

मधुकर निकुंभ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. सावतानगर परिसरात राहणाऱ्या विठ्ठलकर आणि खुटवडनगर येथे राहणाऱ्या निकुंभला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर इतर दोघे अद्याप फरार आहेत. या गुन्ह्यात वापरलेली एमएच १४ बीएफ १२१२ क्रमांकाची एन्डीव्हर फोर्ड ही कार जप्त करण्यात आली आहे. घटनेच्या दिवशी मद्यधुंद अवस्थेत झोपलेल्या अर्जुन व निखिलवर अगदी जवळून गोळ्या झाडण्यात आल्या. ही सिनेस्टाईल घटना जगतापवाडीतील पीएल ग्रुपच्या कार्यालयात झाली. यानंतर आरोपींनी दोन्ही मृतदेह वाहनात टाकून जव्हाररोडलगत फेकून दिले. नगरसेवक लोंढे यांच्या कार्यालयात झालेल्या डबल मर्डर प्रकरणी शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांविरोधात शहरातील वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवा, अरे बोल ना रे बाबा...!

$
0
0

संदीप देशपांडे, मनमाड

हॅलो, कोण बोलतंय ?

माझा देव का?

देवा, अरे बोल ना रे बाबा...

असा रागवू नको...

ऐक ना माझं दुःख... !

मनमाड किंवा नाशिक रेल्वे स्टेशनवर कॉईन बॉक्स शेजारी उभ्या असणाऱ्या प्रवाशांना नेहमी ऐकू येणारा हा आवाज अस्वस्थ करतो पण, या भाबड्या आवाजात देवाला हाक देणारी ही महिला गेल्या अनेक महिन्यापासून दररोज हेच करताना दिसते. स्टेशन परिसरात विमनस्क अवस्थेत फिरणाऱ्या या महिलेला देवाशी काय अन् का बोलायचे असेल बरे, असा प्रश्न हा संवाद ऐकणाऱ्यांना पडतो.

वय चाळीशीच्या आसपास... फाटलेली साडी... विस्कटलेले पांढरे होऊ लागलेले केस अन् दोन्ही पायात वेगवेगळ्या रंगांच्या चपला... हा अवतार पाहिल्यावर मनमाड रेल्वे स्टेशनवरील कोणताही प्रवासी झटकन बाजूला होतो अन् या वेड्या म्हणवल्या गेलेल्या मह‌िलेला जायला जागा करून देतो. ती महिला स्थानकाच्या बाहेर असणाऱ्या एखाद्या कॉईन बॉक्सच्या दिशेने जाते... एक कॉईन त्या बॉक्समध्ये टाकते. झटझट कोणतातरी नंबर फिरवते अन् हॅलो हॅलो म्हणू लागते. दरम्यान, नंबर न लागल्याने तो कॉईन पुन्हा बाहेर येतो. पण, संवाद सुरूच असतो... हॅलो, देवा तुच आहेस ना? तु का रे माझा फोन घेत नाही. अजून क‌िती वेळा तुला फोन लावू... माझं तु ऐकून घेणार आहेस की नाही? कुणाला सांगू माझं दु:ख, कोण सोडवेल मला यातून... की तु फक्त ऐकत राहणार आहेस?

हा संवाद आजूबाजूचे प्रवाशी अन् दुकानदाराला आवाक करतात. काहीकाळ त्यांच्या मनात अनेक प्रश्नांचा पिंगा रंगतो... हा तिचा संवाद अनेकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. याला कोणी भोळेभाबडेपणा म्हणतो तर कोणी शुद्ध वेडेपणा! पण, कधी ना कधी देव फोन घेईल या आशेवर ही फोनवाली बाईची चिकाटींने दररोज देवाला फोन करायला येते. त‌िच्या या वेडेपणाला वैतागून कॉईनबॉक्सवाला तिला हकलूनही देतो मग ती दुसरीकडे जाते पण देवाला फोन करणे ती सोडत नाही.

देवाचा धावा करणारी ती कोठून आली, तिचे कुटुंबिय कोठे आहेत याची तिलाही माहिती नाही. ‌तिच्याशी कोणी बोलण्याचा प्रयत्न केला तर अंगावर धावून जाते. भिकाऱ्यासारखं आयुष्य जगत असलेल्या या महिलेल्या आयुष्यात काही घडलयं का? म्हणून त‌िचा व्यवस्थेवर विश्वास उडालेल्या या महिलेला थेट देवाकडे तक्रार करायची आहे हेही समजायला काही मार्ग नाही. त्यामुळे तिची या संवादामागील करूण कहाणी मात्र अर्धवट राहते.

मनमाड व नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरात अशा पद्धतीने विक्षिप्त पद्धतीने जगणारे अनेक स्त्री-पुरूष पहायला मिळतात. त्यांना या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी कोणी प्रयत्नही करताना दिसत नाही. हीच तर तक्रार देवाशी संवाद साधून तिला करायची नसेल ना?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images