महापालिकेकडून शनिवारी करण्यात आलेले पाणीपुरवठ्याचे सोशल ऑडटिने शहरात भाजपला जीवदान ठरले असून, नाशिककरांना मात्र हा कायमस्वरूपीचा त्रास ठरणार असल्याची भीती सत्ताधाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी या सोशल ऑडटिचा आधार घेत 'नाशिककर पाण्याची उधळपट्टी करत असून शहरात दीड ते दोन तास पाणीपुरवठा होतो' असा दावा केला आहे. त्यामुळे पाणीकपातीने अगोदरच कोंडीत सापडलेल्या सत्ताधाऱ्यांच्या जखमेवर सोशल ऑडटि करून मीठ चोळण्याचाच प्रकार असल्याचा दावा सत्ताधारी करत असून, आता थेट आयुक्तांनाच याचा जाब विचारण्याची तयारी सुरू झाली आहे.
जायकवाडीला पाणी सोडल्यानंतर शहरात सुरू झालेले राजकयि कवित्व अद्याप संपण्याचे नाव घेत नाही. पाणी सोडल्यानंतर त्यावर उदभवलेल्या परिस्थिती तोडगा काढण्याऐवजी या विषयाचे राजकारण करण्यात अधिक रस घेतला जात आहे. पाणीगळती रोखण्यासह पाण्याचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाने केलेल्या या सोशल ऑडटिने नवा वाद उदभवला आहे. या ऑडटिमध्ये शहरात पाण्याची उधळपट्टी होत असून, अनेक ठिकाणी पाण्याचा अधिक पुरवठा होत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष निघाला आहे.
सोशल ऑडटिने नाशिककर पाण्याची अधिक नासाडी करत असल्याचा चूकीचा संदेश बाहेर जात असल्याची भावना नगरसेवकांमध्ये निर्माण झाली आहे. सोशल ऑडटि आता करण्याची आवश्यकता नव्हती, अशी चर्चा सत्ताधारी पदाधिकारी व नगरसेवकांमध्ये असून हा प्रकार भाजपसाठी चालवला जात असल्याचा आरोप होऊ लागला आहे.
या प्रकारामुळे भाजपला थेट फायदा होणार असून, प्रशासन भाजपच्या भल्यासाठी सोशल ऑडटि करतेय का, असा सवाल आता नगरसेवक करत आहेत. भाजपला तारण्यासाठी हा अट्टाहास असून, या ऑडटिने नाशिककरांच्या हक्काच्या पाण्यापासूनच कायमस्वरूपी वंचति होण्याची वेळ येणार असल्याने नगरसेवक संतापले आहेत. त्यामुळे या सर्वांनी आता आयुक्तांच्या विरोधातच मोहीम उघडण्याची तयारी सुरू केली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट