महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्यांनीही गोवंश हत्याबंदी कायदा करणे आवश्यक आहे. गायींची कत्तल कुठला विशिष्ट धर्म करीत नाही. तर, गो हत्येमागे मोठ्या विदेशी कंपन्याचा हात असल्याचा आरोप स्वास्थ्य वैज्ञानिक उत्तम माहेश्वरी यांनी केला. नंदिनी गोशाळेतर्फे आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पंचगव्य चिकित्सेबाबत मार्गदर्शन केले.
गंगापूररोडवरील शंकराचार्य संकुलातील डॉ. कूर्तकोटी सभागृहात गो माता या विषयावर तीन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. त्यातील दुसरे पुष्प माहेश्वरी यांनी गुंफले. 'काऊथेरपी' म्हणजेच पंचगव्य चिकित्सा. गायीपासून मिळणाऱ्या विविध पदार्थांवर आधारित नवीन चिकित्सापद्धती विकसित झाली असून, तीच पंचगव्य चिकित्सा असल्याचे त्यांनी सांगितले. या चिकित्सा पद्धतीने असाध्य आजारांवर मात मिळविता येऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्याक्त केला. गायीचे दूध पौष्टिक असण्याबरोबरच तूप, ताक, गोमूत्र, शेण, गायीच्या खुरांखालील माती देखील बहुगुणी आहे. बाजारात मोठ्या कंपन्यांकडून गाईचे तूप विक्री होत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट