Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मुस्लिम जोडप्यांचा सामूहिक ‌निकाह

0
0

सामूहिक निकाहसारखे उपक्रम स्तुत्य आहे. मुस्लिम समाज कल्याणसाठी २५ लाखांचा निधी देण्याची घोषणा खासदार हेमंत गोडसे यांनी केली. तर येत्या वर्षभरात शहरात अल्पसंख्यांकांसाठी पॉलिटेक्निक कॉलेज सुरू करण्याचे आश्वासन आमदार देवयानी फरांदे यांनी दिले. संघटनेचे अध्यक्ष बबलू शेख यांनी प्रस्ताविक केले. अलहाज सय्यद मीर मुख्तार अशरफी यांनी सूत्रसंचालन केले.

सोहळ्यास आमदार बबन घोलप, आमदार अनिल कदम, हज कमेटीचे अध्यक्ष इब्राहिम भाईजान, हाजी मोहम्मद रऊफ पडेल, सुनील बागुल, निलेश चव्हाण, सुधाकर बडगुजर आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शेख रफीक बबलू, समीर खतीब, मुश्ताक लालू, अमजद पठाण, जफर कादरी आदींचे सहकार्य मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पॅरिसच्या ट्रेनरकडून फिटनेसचे धडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

परदेशी ट्रेनरकडून फिटनेसविषयी नवनवीन टीप्स आणि खेळांविषयी मार्गदर्शनाची संधी सिडकोतील शांतारामबापू कॉलेजमधील विद्यार्थ्यांना नुकतीच मिळाली. निमित्त होते भारत-युरोप शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत पॅरिस विद्यापीठातील प्रा. विन्सेन फ्लोरान्स यांची कॉलेज भेट.

या भेटीमध्ये फ्लोरान्स यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कडकडीत थंडीला न जुमानता विद्यार्थी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. फ्लोरान्स यांनी यावेळी व्यायामाच्या विविध टीप्स विद्यार्थ्यांना देत आयुष्यभर शरीर निरोगी ठेवण्याचा सल्ला दिला. व्यसनाधिनतेपासून दूर रहा आणि शरीरसंपदा कमावून समाजाच्याही उपयोगी पडा, असेही आवाहन त्यांनी केले. यानंतर विद्यार्थ्यांना मैदानावर घेऊन जात व्हॉलीबॉल खेळाच्या प्रात्यक्षिकात सहभागी होत त्यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत केला.

प्राचार्य डॉ. बी. जी. वाघ यांच्या हस्ते या उपक्रमाचे उदघाटन झाले. भारत-युरोप शैक्षणिक कार्यक्रमाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दीपक मगरे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे संयोजन जिमखाना विभाग प्रमुख प्रा. मिनाक्षी गवळी यांनी केले. यावेळी उपप्राचार्य एन. एम. शब्दे, शिक्षक व खेळाडू विद्यार्थी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांची वेबसाईट हॅक?

0
0

arvind.jadhav @timesgroup.com

नाशिक : नाशिक शहर पोलिसांची अद्ययावत वेबसाईट फेसबुकच्या कचाट्यात सापडली आहे. nashikpolice.com ही वेबसाईट उघडण्याचा प्रयत्न केला असता थेट फेसबुकचे पेज समोर येत असून, सायबर क्राइम रोखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांच्या वेबसाईटला हॅकर्सने दणका तर दिला नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे.

शहरवासीयांना आपली वाटावी, असे डिझाईन तयार केल्यानंतर नाशिक शहर पोलिसांच्या वेबसाईटचे कौतुक खुद्द पोलिस महासंचालकांनी केले. पोलिस विभागाचे चांगले कार्य नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी शहर पोलिसांकडून या वेबसाईटचा वापर होतो. विशेष म्हणजे दररोज या वेबसाईटवर माहिती सुध्दा अपडेट केली जाते. परदेशी नागरिक देखील या वेबसाईटचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. वाहतूक विभागाकडून होणारी कारवाई, दररोजच्या गुन्ह्यांची समरी, फरारी गुन्हेगारी, मिसिंग व्यक्ती, चोरीला गेलेली वाहने याबरोबर पोलिस विभागाची माहिती या वेबसाईटवर असते. मात्र, मागील तीन दिवसांपासून ही वेबसाईट सुरू करण्याचा प्रयत्न

केला असता तिथे फेसबुक पेज

समोर येते.

वेबसाईटचा कोणताही फायदा युजर्सला होत नाही. त्यामुळे हा तांत्रिक दोष आहे, की एखाद्या हॅकर्सने शहर पोलिसांच्या वेबसाईटला दणका दिला, असा प्रश्न समोर येत आहे. या वेबसाईटसंदर्भात काम पाहणाऱ्या क्राईम ब्रँचच्या शीतल भूषण सूर्यवंशी यांनी सांगितले की, संबंधित वेबसाईटचे तांत्रिक काम शारदा एंटरप्रायझेज ही कंपनी पाहते. तसेच, वेबसाईटच्या मेन्टेनन्सचे काम करण्याची जबाबदारी नि​श्चित करण्यात आली आहे. सुरक्षा प्रणाली उत्तम असून, ही वेबसाईट हॅक होण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. तांत्रिक कारणांमुळे तीन दिवसांपासून वेबसाईटवर काम करणे शक्य नसून, याबाबत संबंधित विभागाकडे तक्रार केली असल्याचे त्यांनी सांगितले.



वेबसाईट हॅक होण्याची शक्यता कमी आहे. वेबसाईटची सुरक्षा प्रणाली चांगली असून, वेबसाईट सुरू करण्यात येणाऱ्या अडचणी लवकरच दूर केल्या जातील.

- सचिन गोरे,

सहायक पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'व्यायाम, छंदाची सांगड घाला'

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आपले मन वर्तमानात रमविण्याचे कौशल्य आत्मसात केल्यास चिंता आणि तणावापासून मुक्त होणे शक्य होईल. वर्तमानात राहण्यासाठी व्यायाम, खेळ आणि छंद यांची सांगड घाला, असे आवाहन कृषि विज्ञान केंद्राचे विस्तार शास्रज्ञ डॉ. नितीन ठोके यांनी केले.

सुशासन दिनाच्या निमत्ताने मुक्त विद्यापीठात आयोजित 'तणावमुक्ती व्यवस्थापन' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. विद्यापीठाच्या यश इन सभागृहात हे व्याख्यान पार पडले. डॉ. ठोके म्हणाले, 'अनेक जण भूत आणि भविष्यकाळातील आनंदाच्या कल्पनांवर अवलंबून राहतात. परंतु यातून समाधान अन् तणावमुक्तीची प्रक्रिया घडून येत नाही. तणावमुक्तीसाठी प्रत्येकाने व्यायाम, योगासने करायला हवेत. त्यामुळे शरीराबरोबरच मनही प्रसन्न राहते. प्रत्येकाने आपले छंद जोपासावेत तसेच वाचनाची आवड, अध्यात्मिक गोडी निर्माण करावी आणि खेळाकडे वळावे, असेही विचार डॉ. ठोके यांनी मांडले.

आजच्या धकाधकीच्या आणि गतिमान युगात लहान मुलांपासून ते वृध्दांपर्यंत तणावाखाली जाण्याचे प्रमाण तितक्याच गतीने वाढत आहे. तणावापासून मुक्त होण्यासाठी अनेकविध उपाय शोधले जातात. परंतु, काहीवेळा मद्यपान, धुम्रपान यासारख्याही गैरमार्गाचाही अवलंब करण्याकडे तरुणाईचा कल वाढत आहे व तो अतिशय घातक असल्याचे स्पष्ट करून तणावामुळे अपघात, दुर्धर आजार, नैराश्य, विकृत कृत्य अशा गोष्टी आपल्या नकळत घडत जातात. त्यामुळे तणावाची कारणे व त्यावरील उपाययोजना वेळीच करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष साबळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. प्रकाश कदम यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.

व्यासपीठावर यशवार्ता मासिकाचे कार्यकारी संपादक संतोष साबळे, कृषिविज्ञान केंद्राचे डॉ. प्रकाश कदम उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीर्थक्षेत्र मांगीतुंगीसाठी १८ कोटींचा निधी मंजूर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मांगीतुंगी तीर्थक्षेत्र येथे भगवान श्री ऋषभदेवांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक सोहळ्यानिमित्त प्राधान्याने करावयाच्या विकासकामांसाठी साडेअठरा कोटीच्या खर्चाला उच्चाधिकार समिती आणि राज्यस्तरीय शिखर समितीने मान्यता दिली आहे. ग्रामविकास विभाग हा निधी उपलब्ध करून देणार असून, ही कामे तातडीने हाती घ्यावीत, असे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.

बागलाण तालुक्यातील श्री मांगी शिखराजवळ भगवान ऋषभदेवांची जगातील सर्वात उंच १०८ फूट उंचीची भव्य मूर्ती अखंड पाषाणात साकारण्यात येत आहे. शिखराच्या पायथ्यापासून १८०० फूट उंचीवर ही मूर्ती आहे. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि महामस्तकाभिषेक सोहळा ११ ते १६ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत होणार आहे. त्यासाठी देश विदेशातून १५ ते २० लाख भाविक येणार आहेत. भाविकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी विकासकामांचा प्राधान्यक्रम आराखडा तयार करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सात नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी ४० कोटी रुपये किमतीचा आराखडा सादर केला. या आराखड्यापैकी १८ कोटी १८ लाखांचा निधी ग्रामविकास विभाग प्रशासकीय मान्यतेसह उपलब्ध करून देणार आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समिती आणि मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय शिखर समितीने प्राधान्याने करावयाच्या विकासकामांना आणि त्यासाठीच्या खर्चाला मान्यता दिली आहे. मंजूर निधीमधून तातडीची २२ कामे मार्गी लावण्यात येणार आहेत. त्यामध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वीजपुरवठा, अंतर्गत रस्ते, विद्युत विभागाची कामे, पर्यटकांसाठी लिफ्ट, रस्ता रुंदीकरण, पोलिस चौक्या तयार करणे, वैद्यकीय सुविधा पुरविणे, आपत्कालीन व्यवस्थापन, वाहनतळ, सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे यासारख्या महत्त्वपूर्ण कामांचा समावेश आहे. ही कामे तातडीने मार्गी लावावीत, असे आदेश राज्य सरकारने दिले. त्याची जबाबदारी जिल्हास्तरीय कार्यकारी समितीवर सोपविण्यात आली आहे. आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी कार्यान्वित यंत्रणांशी समन्वय साधण्याचे आणि ठरलेल्या कालावधीत कामे मार्गी लावण्याची जबाबदारी त्यांना पार पाडावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धडपड्या शिक्षणतज्ज्ञ

0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

आपल्याला शिक्षण घेताना असंख्य अडचणी आल्या, मुंबईत स्थिरावण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली हे हाल दुसऱ्याच्या वाट्याला येऊ नये म्हणून जितेंद्र गोस्वामी यांनी इगतपुरीत आश्रमशाळा काढली. आज वयाच्या सत्तरीत ते येथे राहून जास्तीत जास्त मुलांना शिक्षण मिळावे यासाठी झटत आहे.

नागपूर येथून एम.ए.पर्यंत पूर्ण केल्यानंतर मुंबईतील डॉक लिमिटेडमध्ये त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. रात्रपाळीची नोकरी करुन मुंबई विद्यापीठाची एम.एल.एस ही पदवी मिळवली. पण वेळेचे बंधन असलेल्या या कामात त्यांचे मन रमत नव्हते. भटक्या विमुक्तांसाठी कार्य करण्याची धडपड असल्याने समाजासाठी काम करायला सुरुवात केली. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम वाढल्याने १९९५ मध्ये अखेर नोकरीचा राजीनामा देऊन या कार्यात स्वतःला गुंतवून घेतले. धडपड्या वृत्तीच्या गोसावी यांनी सायन चुनाभट्टी येथे मुक्तादेवीच्या डोंगरावर एक शाळा उभी करण्याचा संकल्प केला. येथे एमएसके प्रथमिक विद्यालय व हायस्कूल उभारुन दोन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यास सुरुवात केली.

प्रमिला गोस्वामी व जितेंद्र गोस्वामी यांनी डोंगर खोदून शिक्षणाचे काम सुरू केले. या शाळेला महाराष्ट्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या कार्याचेदेखील कौतूक केले आहे. शैक्षणिक काम करत असताना गोस्वामी यांना राज्यपालांनी मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर काम करण्याची संधी दिली. त्या काळात केंद्रीय नियोजन मंडळाच्या सामाजिक न्याय आणि रोजगार संधी अपसमितीचे निमंत्रक म्हणून केंद्र सरकारने त्यांची नेमणूक केली होती. यापूर्वी वसंतराव नाईक महामंडळाचे संचालक म्हणून गोस्वामी यांनी काम केले आहे. कर्जदारांना कष्ट करणाऱ्यांना व शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज मिळवून दिले. त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र सरकारने त्यांना दलित मित्र पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. ते दलित मित्र आहेतच परंतु सर्वार्थाने समाजाच्या भल्यासाठी धडपडणारा, राजकारणातील चुकीच्या भूमिकांचे समर्थन न करणारा, आपले मत स्पष्ट मांडणारा आणि सामाजिक जाणिवा असलेला एक उत्साही कार्यकर्ता म्हणून गोस्वामी राजकारणातील सर्वांचे मित्र आहे.

भटक्या विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी इगतपुरी येथे संजीवनी प्राथमिक आश्रमशाळा सुरू केली. याच समाजाच्या उत्कर्षासाठी पतपेढीही उभारली अगदी कमी दराने त्यांनी कर्ज उपलब्ध करुन दिले आहे. शोषित, वंचित मुलांसाठी जास्त काम करता यावे यासाठी सध्या ते इगतपुरी येथे राहतात. या शाळेतील मुलांना मंगेश पाडगावकर ते भालचंद्र मुणगेकर इत्यादी मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. त्याचप्रमाणे येथील मुलांचे आरोग्य व्यवस्थित राहावे यासाठी दर महिन्याला त्यांची आरोग्य तपासणी केली जाते. शालेय ज्ञानाबरोबरच इतर बाबींचे ज्ञान व्हावे यासाठी मान्यवरांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते. तसेच दर २६ जानेवारीला आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची सहल काढण्यात येते. या मुलांना काही उणीव राहू नये सासाठी ते स्वतः जातीने लक्ष घालतात. स्वतः अन्नाचा नमुना तपासल्याशिवाय मुलांना जेऊ देत नाही. अनेकदा सरकारी गोदामातून येणारे धान्य निकृष्ट दर्जाचे असते. त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. यासाठी त्यांनी खासगी व्यक्तींकडून किराणा भरला जातो. या परिसरात अनेक आश्रमशाळा आहेत, मात्र गोस्वामींच्या आश्रमशाळेत मुलांना प्रवेश मिळावा यासाठी दुरून लोक इगतपुरीला येत असतात. वयाच्या सत्तरीकडे झुकलेल्या जितेंद्र गोस्वामी यांचा उत्साह आजही दांडगा आहे. पहाटे पाचला सुरू झालेला दिनक्रम रात्री एक वाजता संपतो, आतापर्यंत राज्य सरकार तसेच देश विदेशातील सन्मान त्यांना मिळाले आहेत. त्यामुळे काही राहून गेले असे वाटत नाही. कामाचे समाधान हाच माझा पुरस्कार आहे असे म्हणतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेगवेगळ्या अपघातांत चौघे ठार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील जुने नाशिकसह जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये एका पाच वर्षाच्या चिमुरडीसह तिघांचा मृत्यू झाला. उज्मा सलीम अन्सारी, सांतू भुरा कुशवाह, शुभम विष्णू ठाकरे आणि विलास पांडूरंग उगले, अशी मृतांची नावे आहेत.

जुने नाशिक भागातील कथडा येथे राहणारी पाच वर्षाची उज्मा अन्सारी घराजवळ खेळत असताना अंगावरून कार गेल्याने तिचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी साडेसात वाजेच्या सुमारास झाली. या प्रकरणी इनोव्हा कार चालक इम्रान सय्यद याच्या विरोधात भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. इम्रान आपल्याकडील कार (एमएच १५, बीएक्स २३४) पार्क करीत असताना हा अपघात झाला. उज्माच्या डोक्यास व तोंडास गंभीर दुखापत झाल्याने तातडीने तिला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

दुसऱ्या घटनेत सिडकोतील कारगिल चौकात भरधाव टेम्पोने धडक दिल्याने दुचाकीवरील सांतू भुरा कुशवाह (वय २२) या युवकाचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री सात वाजेच्या दरम्यान सांतू आपला भाऊ कपिल भुरा कुशवाह (वय २०) याच्यासोबत जात असताना अपघाताची घटना घडली. दत्तनगर परिसरात राहणारे दोघे भाऊ सायंकाळच्या सुमारास घराकडे परतत असताना त्यांना टेम्पोने धडक दिली. दोघांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सांतूचा मृत्यू झाला. जखमी कपिलवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसऱ्या घटनेत संसारी, देवळाली कॅम्प येथे राहणारे विष्णू ठाकरे सातपूर औद्योगिक वसाहतीकडे जात असताना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडले. सातपूरमधील कार्बन नाका बस थांब्याजवळ शनिवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची चौथी घटना सिन्नर तालुक्यातील बारगाव पिंप्रीजवळ घडली. भरधाव वेगात जाणाऱ्या झायलो गाडीने दिलेल्या धडकेत सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथील मोटरसायकलस्वार विलास उगले (वय ४०) यांचा मृत्यू झाला.

उगले हे शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान दुचाकीवरून जात असताना बारगाव पिंप्रीरोडवर खिंडीजवळील परिसरात भरधाव येणाऱ्या एमएच १५, डीएम १७९० क्रमाकांच्या झायलो कारने त्यांना धडक दिली. गंभीर जखमी झाल्याने त्यांना सुरुवातीस खासगी व नंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना शनिवारी त्यांचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अंकुर’ची सांगता

0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंकुर फिल्म फेस्टिव्हलचा तिसरा आणि शेवटचा दिवस पर्यावरण, सामाजिक, धार्मिक आणि मानवतावादी विषयावर जागृती करणारा आणि भाष्य करणाऱ्या चित्रपटांचा ठरला. गोध्रा दंगल घडल्यानंतर भारतातील समाजमन मुळापासून हलले. त्या समाज मनाचा ठाव 'हद-अनहद' या राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या माहितीपटाने घेतला. निर्मात्या शबनम वीरमणी यांच्या संगीत मैफलीने अंकुर फिल्म फेस्टिव्हल २०१५ ची सांगता झाली.

गोदावरीचे भविष्य हे आपले कर्तव्य असल्याचे सांगणारी 'हरितकुंभ' ही नाशिकमध्ये निर्मित केलेली फिल्म होती. यामध्ये गोदावरी नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी आवाहन करण्यात आले. 'पहिली भेट' हा प्रेम कसे असते हे दाखविणारा माहितीपट होता. 'पणती-द गर्ल' मध्ये स्त्री भ्रूण हत्या विषयावर प्रकाश टाकला आहे. त्यानंतर दो पल, चमत्कारिक पक्षी विश्व, गंगा माँ को दर्द, आम्रपाली ड्रेनेज प्रोब्लेम स्लोव्ह, बहुरूपी समुदाय, व्हिक्टरी आफ्टर कन्टीन्यूअस एफर्ट, विस्तापिताना आधी पुनर्वसन वे, विकास पर्व ऑफ वन मॉर्डन लेज, अनहोनी, डॉ. जे, पुस्तकी आदी या फिल्म दाखविण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आवक घटल्याने भाज्या कडाडणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आवक घटू लागल्याने पालेभाज्या व फळभाज्यांचे दर हळूहळू वाढू लागले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता आहे. सध्या वांगे, कारले, गिलके, दोडके व गवार यांचे दर पन्नास रुपयांपर्यंत पोहोचले आहेत तर पालेभाज्यांचे दर दहा ते पंधरा रुपयांनी वाढले आहेत. मात्र, कांदा आणि बटाटा यांचे दर घसरले आहेत. आणखी काही दिवस ​तरीत्यांचे दर फारसे वाढण्याची शक्यता नाही.

आवक व मागणीनुसार कुठल्याही वस्तूचे दर ठरत असतात. गेल्या आठवड्यापर्यंत भाज्यांचे दर पन्नास रुपये किलोच्या आत होते. मात्र, पाणीटंचाईमुळे भाजीपाला लागवडीवर परिणाम झाला आहे. यामुळे आवक घटू लागली आहे. पालेभाज्या मेथी, कोथिंबीर, शेपू, पालक यांचे दर पंधरा रुपयांवरून पंचवीस ते तीस रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. मेथी व कोथिंबीर २५ ते ३० रुपये जुडीप्रमाणे मिळत आहे. टोमॅटोचीही आवक घटल्याने दर पाच ते दहा रुपयांनी वाढले आहेत. गाजराची आवक मर्यादीत असल्याने वीस रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहेत. समाधानाची बाब म्हणजे रोजच्या वापरातील कांदा आणि बटाटा यांच्या किमती कमी झाल्या आहेत. लाल कांद्याची भरमसाठ आवक होत असल्याने दहा रुपये किलोप्रमाणे मिळत आहे. तर, नवीन बटाटा दहा ते पंधरा रुपये किलोने मिळत आहे.

काकडी तीस रुपये किलोप्रमाणे मिळत आहे. कोबी व फ्लॉवरचेही दर दहा रुपयांनी वाढले आहेत. मुळा वीस रुपयाला आठ मिळत आहेत.



संत्री, पपईची भरमसाठ आवक

बाजारपेठेत संत्री व पपईची भरमसाठी आवक होत असून, दरही कमी आहेत. संत्री दहा ते वीस रुपये किलो तर, पपई दहा ते पंचवीस रुपये किलोप्रमाणे मिळत आहे. चौकाचौकात पपई व संत्री विक्रेते दिसत असून दारोदारी विकणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. यामुळे सध्या नाशिककर या दोन्ही फळांवर ताव मारत आहेत. इतर फळांची आवक मर्यादीत असल्याने त्यांच्या किमती मात्र जैसे थे आहेत.

‌सध्या नाशकात संत्री व पपईची आवक खूपच होत आहे. यामुळे पंधरा ते वीस दिवसांपूर्वी चाळीस रुपये किलोने मिळणारी संत्री आत दहा ते वीस रुपये किलोप्रमाणे मिळत आहे. पपईचीही तीच अवस्‍था आहे. दहा रुपये किलो तसेच नगानेप्रमाणेही पपईची विक्री होत आहे. मकरसंक्रातीपर्यंत आवक टिकून राहण्याची चिन्हे असून, दरात वाढ होण्याची शक्यता धूसर आहे. सफरचंदचे दर टिकून असून ८० ते १२० रुपये किलोप्रमाणे मिळत आहेत. चिकू व सिताफळ ६० रुपये किलोने मिळत आहेत. केळीचे दर जैसे थे आहेत.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारहाण करून मुलाला लुटण्याचा प्रयत्न

0
0



नाशिक : रस्त्याने पायी जाणाऱ्या अल्पवयीन मुलास मारहाण करून त्यास लुटण्याचा प्रयत्न झाला. ही घटना शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास गंगापूररोडवर घडली. या प्रकरणी तिघा संशयितांविरोधात गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. गंगापूररोड परिसरातील सौभाग्य नगर येथे राहणारा रवि निजाम सिद्धीकी (वय १७) हा सायंकाळी घराकडे जात असताना पांढऱ्या रंगाच्या अॅक्टिव्हावरून शेखर विटकरसह दोघे संशयित त्याच्या जवळ आले. तुझ्या खिशात काय

आहे ते आम्हाला दे, असे म्हणून तिघांनी रविला मारहाण केली. तसेच, त्याच्या गळ्यातील पितळी चेन ओरबाडण्याचा प्रयत्न केला.

स्टोव्हच्या भडक्याने तिघे भाजले

नाशिक : स्टोव्हच्या भडक्यात तीन महिन्यांच्या बालिकेसह दोनजण भाजल्याची घटना मालेगाव येथे घडली. जखमींना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पुष्पा सतीश देवरे, सतीश सखाराम देवरे व त्यांची तीन महिन्याची मुलगी वैष्णवी, अशी जखमींची नावे आहते. शनिवारी देवरेंच्या घरात स्टोव्हवर स्वयंपाक होत असताना स्टोव्हचा अचानक भडका उडाला. त्यामुळे पुष्पा यांच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. त्यात त्या ९० टक्के गंभीररीत्या भाजल्या. तर, सतीश व वैष्णवी ३० टक्के भाजले आहेत.

ज्वेलरी दुकान फोडले

काझीपुरा भागातील मुरलीगंगा अपार्टमेंट येथील ज्वेलरी शॉप चोरट्यांनी शनिवारी रात्री फोडले. या घरफोडीत २८ हजार ६०० रुपयांचे चांदीचे दागिने आणि मोबाइल असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी दुकानमालक महमंद ए. रहमान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकला दर्शनासाठी भाविकांची रीघ

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

सलग चार दिवस सुटी आल्याने रविवारी त्र्यंबकेश्वर भाविकांनी गजबजले होते. गर्दीचा उच्चांक झाला असून, शहर पर्यटकांनी व्यापले आहे. मंदिर चौकात उभे राहण्यास देखील जागा शिल्लक नाही, असे चित्र निर्माण झाले आहे.

नाताळच्या सुटींमुळे त्र्यंबकेश्वरमध्ये गर्दीत वाढ झाली आहे. शालेय सहली आणि सलग शासकीय सुटी आल्याने पर्यटक व भाविकांची संख्या प्रचंड वाढली आहे. सोमवारपासून काही प्रमाणात गर्दी ओसरायला सुरुवात होईल. मंदिरात दर्शनासाठी किमान चार तास लागत आहेत. भाविक पूर्वदरवाजाच्या दर्शन रांगेतून दर्शनास जात होते. अर्थात उत्तर दरवाजाने देणगी दर्शन सुरू होते. मात्र, या रांगेत देखील चांगलीच गर्दी असून तेथे देखील दोन तास थांबावे लागल्याचे भाविकांनी सांगितले.

-

लॉकर सुविधेचा अभाव

भाविकांना मोबाइल आणि बॅग ठेवण्यासाठी येथे खासगी लॉकर सुविधा आहे. मात्र, त्याचा नाहक खर्च भाविकांना करावा लागतो. याकरिता देवस्थान ट्रस्टने विनामूल्य व्यवस्था करावी, अशी मागणी भाविकांनी केली आहे.

--

वाहनांची वर्दळ वाढली

वाहनांची संख्या वाढल्याने नगरपालिकेचे उत्पन्न वाढले आहे. जव्हार फाट्यावर वाहनतळ फी वसूल केली जाते. येथे दोन ते तीन ठिकाणी पोलिस वाहनांची रहदारी नियमन करण्यासाठी असतात. तरी देखील शहरात वाहने दाखल होतात. थेट मंदिराच्या मागील बाजूस वाहने उभी केली जातात.

--

पाणीपुरवठा विस्कळीत

त्र्यंबक शहरात गर्दी वाढली असताना शहराच्या मध्यवस्तीत पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. शहरास अंबोली, गौतमी बेझे आणि अहिल्या अशा तीन धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. अंबोली धरणावर मेन्टेनन्स सुरू केली आहे. म्हणून शहात पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. गर्दीच्या कालावधीत दुरुस्तीचा मुहूर्त काढला म्हणून नागरिकांनी नापसंती व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवक वाढूनही कांदादरात सुधारणा

0
0

टीम मटा

केंद्र शासनाने कांद्याच्या घसरत्या किमतींना ब्रेक लावण्यासाठी कांद्याचे किमान निर्यातमूल्य ४०० डॉलरहून घटवित शून्य केल्याचा परिणाम सोमवारी नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांमध्ये दिसून आला. प्रमुख बाजार समित्यांसह उपबाजारांमध्ये सरासरी दोनशे ते तीनशे रुपयांनी कांदादर वधारले आहेत. मात्र, शेतकरी अजूनही समाधानी नसून, आणखी भाव वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याचे सरासरी दर सुमारे तीनशे रुपयांनी वधारले. चार दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी लिलावाला सुरुवात होताच खरेदीदार व्यापाऱ्यांमध्ये या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे उत्साहाचे वातावरण पहावयास मिळाले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्राने घेतलेल्या निर्णयाचा सकारात्मक परिणाम कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगावसह पिंपळगाव, उमराणा, मनमाड, येवला, नांदगावमध्ये दिसून आला.

गेल्या महिनाभरापासून कांद्याचे सरासरी दर एक हजार ते अकराशे रुपये प्रती क्विंटलवर स्थिरावले होते. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये केंद्र शासनाच्या कांदा विषयक धोरणाविषयी मोठा असंतोष पहावयास मिळाला होता. कांदा उत्पादकांची होणारी आर्थिक कोंडी पाहता जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी याविषयी शेतकऱ्यांची बाजू लाऊन धरल्याने अखेर केंद्राने कांद्याचे निर्यातमूल्य हटविण्याचा शेतकरी हिताचा निर्णय घेतला. निर्यातमूल्य हटताच सोमवारी कांद्याच्या किमान व सरासरी दरात सुमारे तीनशे रुपयांची तेजी येऊन सरासरी भाव १ हजार ४०० रुपयांपर्यंत पोहचले. कांद्याला १ हजार ६२३ रुपयांचा कमाल भाव मिळाला तर किमान दरही एक हजार रुपयांपर्यंत मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याची सुमारे २३ हजार क्विंटल आवक झाली होती.

मनमाड, नांदगावमध्ये वाढ

मनमाड : मनमाड व नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी १५० ते २०० रुपयांनी वाढ झाल्याचे चित्र होते. सकाळी कमीतकमी ११५० ते जास्तीत जास्त १४०९ रुपये भाव मनमाड समितीत होता. तर, नांदगाव बाजार समितीत १२०० ते जास्तीत जास्त १४०७ रुपये भाव असल्याची माहिती समिती प्रशासनाने दिली. सोमवारी दुपारी कांद्याला १६२० रुपायांपर्यंत भाव वाढल्याचे सांगण्यात आले. मात्र वाढ झालेली दिसत असली तरी ती समाधानकारक नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

उमराणे, झोडगेत दोनशे रुपयांनी वाढ

मालेगाव : तालुक्यातील उमराणे व झोडगे येथील कांदा बाजारात सरासरी १०० ते २०० रुपये कांदा भावात वाढ झाल्याने आवक देखील वाढली आहे. उमराणे येथे कांद्याची प्रमुख बाजारपेठ असून, येथे किमान ९५० तर कमाल १५०० रुपये प्रती क्विंटल असा भाव मिळाला. एक हजारहून अधिक वाहनातून सुमारे २० हजार क्विंटल कांदा आवक झाली. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत कांदा आवक वाढली असून कांद्याच्या भावात २०० रु वाढ झाली आहे. झोडगे उपबाजार समितीच्या कांदा बाजारात देखील कांद्याच्या भावात सरासरी १०० रुपये भाव वाढ झाली. क्विंटलला १४०० रुपये असा चढा भाव राहिला. येथे देखील १०० हून अधिक वाहनांची आवक पाहायला मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेराव

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

केळझर धरणातून सटाणा शहरासाठी पिण्याचे पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. या पाण्याचा वापर शेती सिंचनासाठी धरण व नदीलाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांकडून होऊ नये म्हणून तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील निकवलेसह पसिरातील दहिंदुले, चाफापाडा व डांगसौंदाणे या गावांमध्ये तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे रविवारी (दि. २७) डांगसौदाणे वीजपुरवठा कार्यालयावर शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना घेराव घालून आंदोलन छेडले. संबंधित अधिकाऱ्यांनी ठोस आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

निकवेलसह परिसरात दहिंदुले, चाफापाडा, डांगसौदाणे आदी गावांना डांगसौदाणे येथून विद्युत पुरवठा होत असतो. मात्र, डांगसौदाणे सबस्टेशन येथे तांत्रिक बिघाड झाल्याने शुक्रवारपासून रविवारपर्यंत वीजपुरवठा खंडित आहे. या कालावधीमध्ये वीजपुरवठा सुरळीत झाला का नाही याची खात्री करण्यासाठी एक ते दोन तास वीजपुरवठा देण्यात आला. त्यानंतर परत वीजपुरवठा खंडित करण्यात आला. वीजपुरवठा सुरळीत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वीजपुरवठा सुरळीत नसल्याने कांदा लागवड वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

सटाणा शहराला गत काही दिवसांपासून तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शहरातील पिण्याचे पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेता केळझर धरणातून आरम नदीपात्राद्वारे पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांद्याची मागणी वाढण्याचे संकेत

0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

निर्यातमूल्य हटविल्यानंतर सोमवारी पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा दरात दोनशे ते तीनशे रुपयांनी सुधारणा झाली. परदेशातून कांद्याला होणारी मागणी लक्षात घेता यापुढील काळात कांद्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दिवाळीनंतर लाल कांद्याची भरमसाट आवक सुरू झाल्याने दरात घसरण झाली. निर्यात मंदावल्यानंतर या महिन्यात सातशे रुपयांपर्यंत भाव घसरले. गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने निर्यातमूल्य शुन्य केले. दरम्यान, कांद्याला कोलंबो, दुबई, मलेशिया या बाजारपेठींसह देशांतर्गत बिहार, कोलकाता, गुवाहाटी, दक्षिण भारती आदी ठिकाणाहून मागणी वाढली आहे. नाशिकचा कांदा स्थानिक बाजारपेठेबरोबरच निर्यात होत आहे. पिंपळगाव, लासलगाव, मनमाड या ठिकाणाहून दररोज एक हजार टन कांदा कोलंबो, मलेशिया, दुबई या ठिकाणी निर्यात होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबक नगराध्यक्षपदी भाजपच्या लढ्ढा

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनलेल्या त्र्यंबकेश्वर नगरपालिकेत शिवसेना नगरसेवकाच्या जिवावर भाजपने सत्ता मिळवली. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या विजया दीपक लढ्ढा यांनी शिवसेनेच्या सिंधू दत्ता मधे यांचा एका मताने पराभव केला.

नगराध्यक्ष निवडणुकीमुळे त्र्यंबक नगरपरिषद प्रांगणास पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. बॅरिकेडिंगसह पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. शिवसेनेचे दोन उमेदवारी अर्ज होते त्यापैकी अंजनाबाई मधुकर कडलग या प्रमुख दावेदार मानल्या जात होत्या. त्यांनी आपला अर्ज माघारी घेतला तेव्हाच खऱ्या अर्थाने भाजपचा विजय झाल्याचे चित्र दिसत होते. दुपारी दीड वाजता विजया लढ्ढा आणि त्यांचे समर्थक गटनेते योगेश तुंगार, धनंजय तुंगार, यशोदा अडसरे, आशा झोंबाड, अनघा फडके, यशवंत भोये, अभिजीत काण्णव हे सोबत आले. त्यानंतर जवळपास दहा मिनिटांनी संतोष कदम एकटेच आले. त्यांच्या समवेत सशस्त्र बंदोबस्त होता.

शिवसेनेच्या सिंधू मधे आणि त्यांच्या समवेत गटनेते रवींद्र सोनवणे, रवींद्र गमे, अंजना कडलग, अलका शिरसाठ, तृप्ती धारणे, शकुंतला वाटाणे, ललित लोहगावकर हे होते. दुपारी दोन वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली. प्रथम सिंधू मधे यांना त्यांच्या गटाने हात उंचावून मतदान केले. त्यांना आठ मते मिळाली. नंतर विजया लढ्ढा यांच्या गटाने हात उंचावून मतदान केले. त्यांना नऊ मते मिळाली. निवडणूक अधिकाऱ्यांनी विजया लढ्ढा यांना विजयी घोषित केले. यामध्ये संतोष कदम हे उपनगराध्यक्षपदी कायम आहेत.

निवड प्रक्रिया पीठासन अधिकारी बाळासाहेब वाकचौरे, प्रांताधिकारी यांनी पार पाडली. त्यांच्या समवेत निवासी नायब तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी व मुख्याधिकारी निवृत्ती नागरे यांनी सहकार्य केले. पोलिस उपाधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, पोलिस निरीक्षक देवीदास पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला. निवड झाल्यानंतर विजया लढ्ढा, दीपक लढ्ढा आणि संजय लढ्ढा यांनी आभार व्यक्त केले. शहरातील प्रमुख मार्गावर मिरवणूक काढण्यात आली.

साधारणत: महिन्याभरापूर्वी अनघा फडके यांनी राजीनामा दिल्यानंतर नाट्यमय प्रसंग घडत गेले. राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप सदस्यांनी सेनेत प्रवेश केला. यामध्ये भाजपाकडून दखल घेतली नाही म्हणून तृप्ती धारणे यांनी पुढाकार घेत थेट मातोश्रीवर दाखल होऊन पक्षांतर केले. तोपर्यंत सेनेचा एकमेव सदस्य असलेले संतोष कदम हे भाजपाच्या विजया लढ्ढा यांच्या नगराध्यक्षपदावरील दावेदारीसाठी अज्ञातस्थळी रवाना झाले होते. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा, सेना प्रवेश सेनेतील काही स्थानिक शिवसैनिकांना मान्य नव्हता. त्यामुळे संतोष कदम हे भाजपच्याच गटात राहतील, यावर ठाम राहिले.

कदम ठरले किंगमेकर भाजपाच्या विजया लढ्ढा यांना विजयी करण्यासाठी सेनेचे संतोष कदम यांचे मत निर्णायक ठरले. अर्थात त्यांचे सत्तासमीकरण जुळविण्यासाठी आरपीआयचे शांताराम बागुल आणि त्यांचे सहकारी यांचे प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कवी विष्णू थोरेंचा ‘धुळपेरा उसवता’ बंगालीत

0
0

Prashant.bharvirkar@timesgroup.com

नव्या पिढीचे कवी सध्या अत्यंत वास्तववादी कविता लिहून जगण्याचे नवे तत्वज्ञान मांडत आहेत. ग्रामीण भागातून येणारे कवी तर शेती-मातीच्या कवितेतून आपला ठसा ठळकपणे उमटवत आहेत. या नव्या पिढीचेच प्रतिनिधीत्व करणारा चांदवडचा कवी व चित्रकार विष्णू थोरे यांचा 'धुळपेरा उसवता' हा शेतीमातीच्या कवितांचा पहिलाच काव्यसंग्रह बंगालीत अनुवादीत होणार आहे. त्याबाबतची सर्व औपचारिकता पूर्ण झालेली असून कवितांचा अनुवाद देखील झालेला आहे.

ग्रामीण कवितेच्या क्षेत्रात सध्याच्या नव्या पिढीमध्ये दमदार लिखाण करणाऱ्यांमध्ये विष्णू थोरे यांचे चांगले नाव आहे. त्यांनी 'धूळपेरा उसवता' या कवितासंग्रहात आपल्या कवितेत, ग्रामीण अनुभवाशी संलग्न असे अनुभव रेखाटले आहेत.

फेसबूकच्या माध्यमातून बंगाली कवयित्री दीपांजली कलिका यांच्याशी झालेली मैत्री विष्णुच्या कवितांना बंगालीत घेऊन गेली. या कवयित्रीची एक कविता फेसबूकवर गाजत असताना विष्णूने त्याचे अक्षरचित्र बनवले होते व त्याच्या कवितांशीही ओळख करून दिली. त्यातूनच आसाम प्रांतात, दीपांजली यांच्या काव्यमेळ्यामध्ये 'धुळपेरा उसवता' या काव्यसंग्रहाचे वाचन करण्यात आले व त्यांच्या ग्रुपने हा संग्रह बंगाली भाषेत करण्याचे ठरवले. या काव्यसंग्रहातील कविता बंगालीत अनुवादीत करण्यात आल्या असून लवकरच काव्यसंग्रह प्रकाशित होणार आहे. शेतकरी कुटुंबातून घेतलेल्या अनुभवातून विष्णूने ग्रामीण बोलीतील शब्दकळा, शहरातील जनजीवनाचे दुख, हर्ष, दारिद्र्य, चालीरिती, रूढी, परंपरा व संस्कृती इत्यादींचा अंतर्भाव आपल्या कवितेत आविष्कृत केला आहे. शेतीसाठी लागणारे अवजारे, शेतीच्या मशागती संबंधीचे शब्द उदा. गोवऱ्या, शेत, पाऊस, आभाळ, नांगर, ढग, भुई, पांभर, बांधमेर, गुरे-ढोरे, घरदार, गाडी, चाकं, अशी शब्दकळा अतिशय वास्तवपूर्णरित्या त्यांच्या कवितेतून येते. कवितेतील याच शब्दांची प्रतिमा बंगाली भाषेत उभी करताना दमछाक होत आहे.

सोशल मीडियामुळे जग खिडकीसारखे झाले आहे. माझ्या कविता बंगालीत जाणे ही या खिडकीतीलच देवाणघेवाण आहे असे मला वाटते. आपले अनुभव वेगळ्या भाषेशी, त्यांच्या संस्कृतीशी रिलेट होताना पाहून आनंद होतोय.

विष्णू थोरे, कवी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परत मिळालेल्या फीचा वाचनासाठी विनियोग

0
0

तुषार देसले, मालेगाव

टीव्ही, मोबाइल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे मुले पुस्तकांपासून दुरावत आहेत. वाचनसंस्कृतीचा ऱ्हास होत आहे. अशी ओरड नेहमीच ऐकावायस मिळते. मात्र, विद्यार्थ्यांतील चांगल्या विचारांना योग्य दिशा मिळाली, तर त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करून त्यांना पुन्हा पुस्तकांकडे नेता येऊ शकते. हा एक अनोखा प्रयोग मालेगाव तालुक्यातील झोडगेच्या जनता विद्यालयातील शिक्षकांनी खरा करून दाखवला.

दुष्काळी परि‌स्थितीमुळे शासनाने यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी परत करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. यामुळे दुष्काळी झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना आणि त्यांच्या पाल्यांना दिलासा मिळाला. परीक्षा फी सध्या विद्यालयातून परत केली जात आहे. झोडगे येथील जनता विद्यालयाने देखील तिचे वाटप केले जात आहे.

या परत केलेल्या फीचा विनियोग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि बौद्धिक प्रगतीसाठीच व्हावा या विचारातून मुख्याध्यापक बी. आर. देसाई आणि मराठी विषय शिक्षक के. ए. देसले यांनी विद्यार्थ्यापुढे एक अभिनव प्रस्ताव ठेवला. फी परत देताना याच फी मधून नाममात्र शुल्क भरून गावातील वाचनालयाचे सभासद झालात तर? अशी कल्पना मांडली. परीक्षा फी परत मिळते आहे ही चांगली गोष्ट असली तरी परत मिळालेली फी अन्य करणांसाठी खर्च होण्याऐवजी विद्यार्थी वाचनालयाचे सभासद झाल्यास ते कायमस्वरूपी पुस्तकांशी जोडले जातील. वाचनाचे वेड त्यांना लागल्यास वाचनसंस्कृती देखील जोपासली जाईल, असा हेतू शिक्षकांनी त्यांच्यापुढे स्पष्ट केला. कोणालाही सक्ती करण्यात आली नाही. चांगुलपणाला आणि विचारांना योग्य वळणावर नेता येते हे या छोट्याशा प्रयोगातून येथील जनता विद्यालयाच्या शिक्षकांनी सिद्ध केले.

दहावीची परीक्षा फी परत मिळाली याचे आम्हाला समाधान आहेच. शिक्षकांनी वाचनालयाचे सभासद व्हावे असे सुचवले. या प्रस्तावचे आम्ही स्वागत केले. परत मिळालेल्या फीचा अन्यत्र खर्च न करता त्याचा योग्य विनियोग केला याचा आनंद आहे.

- तनय पाठक, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिलिव्हरी बॉयकडून होणारी लूट थांबणार

0
0

pravin.bidve@

timesgroup.com

नाशिक : दारापर्यंत सिलिंडर घेऊन येणाऱ्या गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्याकडे तुम्ही १० ते २० रुपये अधिक मोजत असाल तर आता तसे करण्याची आवश्यकता नाही. वितरक कंपनीच्या वेबसाइटवरच सिलिंडरची मागणी नोंदविण्यास सुरूवात झाली आहे. ऑनलाइन पैसेही स्वीकारले जात आहेत.

जिल्ह्यात ही ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित झाल्याची माहिती गॅस कंपनीतील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे वितरण प्रणालीत पारदर्शकता आली असून, ग्राहकांची लूट थांबण्यासही मदत होत आहे. मोबाईलवर मागणी नोंदविल्यानंतर अवघ्या दोन ते तीन दिवसांतच संबंधित वितरकाचा डिलिव्हरी बॉय सिलेंडर घेऊन आपल्या घरी येतो. अनेकदा तो पावतीवरील किमतीपेक्षाही १० ते २० रुपये अधिक मागतो. त्यावरून अनेकदा वादही होतात. काही ग्राहक पावतीवर नमूद रक्कमच देतात. परंतु, अनेक ग्राहक डिलिव्हरी बॉयने केलेल्या मागणीनुसार सिलिंडरसाठी अधिक पैसेही मोजतात. पावतीवर नमूद रकमेपेक्षा अधिक पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. अशा तक्रारींची दखल घेऊन ग्राहकांसमोर ऑनलाइन पैसे अदा करण्याचा पर्याय खुला करण्यात आला आहे.

अशी आहे कार्यपध्दती

वितरक कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन लॉगीन आयडी तयार करून ग्राहक क्रमांक व तत्सम महत्वपूर्ण माहितीची नोंद करावी. वेबसाईटच्या होम पेजवर बुक दि रिफील असा पर्याय उपलब्ध होतो. त्यावर क्लीक केल्यानंतर आपल्यासमोर पे इट ऑनलाइन किंवा कॅश ऑन डिलिव्हरी असे दोन पर्याय उपलब्ध होतात. आपण क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे पैसे अदा करू शकतो. बुकिंगनंतर चार दिवसांच्या आत सिलिंडर घरपोच करणे बंधनकारक आहे. त्यावेळी डिलिव्हरी बॉयला पैसे अदा करण्याची गरज नाही. त्याने पैशांची मागणी केलीच तर वितरकाशी संपर्क साधून ग्राहकाला विचारणा करता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार अपघातात नवरदेवाची आजी ठार

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

नातवाचा विवाह समारंभ आटोपून घराकडे परतीच्या प्रवासाला निघालेल्या आजीचा कारच्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. नवरदेवाच्या काकांसह अन्य वृद्ध महिला गंभीर जखमी झाले आहेत. या हदयद्रावक घटनेने शहरावर शोककळा पसरली.

येथील बांधकाम ठेकेदार प्रवीण बळीराम सोनवणे यांचा मुलगा सतीश याचा रविवारी (दि. २७) मालेगाव येथे दुपारी विवाह समारंभ होता. विवाह आटोपून सायंकाळी सटाणा येथे परतीच्या प्रवासाला निघालेल्या वऱ्हाडी मंडळीसोबत कारला (एम. एच ४१ डब्ल्यू २३२३) रावळगाव फाट्याजवळ अज्ञात वाहनाने हूल दिली. यामुळे कारचालक सुनील बळीराम सोनवणे (नवरदेवाचे काका) यांचा कारवरील ताबा सुटल्याने कार झाडावर आदळली. या अपघातात नवरदेवाची आजी व कारचालक सुनील सोनवणे यांच्या आई यशोदाबाई बळीराम सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला. तर, कारमधील महिला सुलोचना प्रभाकर पाटील, वत्सलाबाई परशराम ठाकरे व बिजली पंडित जगताप तसेच कारचालक सुनील बळीराम सोनवणे हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उकळत्या दुधात पडलेल्या बालिकेचा मृत्यू

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव शहरानजीक असलेल्या वडगाव गावातील अडीच वर्षीय चिमुरडीचा नाशिक येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

वडगाव येथील रहिवासी राजेंद्र तुकाराम खैरनार यांची अवघे अडीच वर्षाची कन्या गेल्या १५ दिवसापूर्वी आपल्या आजोळी ताहाराबाद येथे आईसोबत गेली होती. हॉटेलमध्ये चहासाठी घेतलेले दूध बाबांनी तापवण्यासाठी गॅस शेगडीवर ठेवले होते. त्याचवेळी अंगणात खेळत असलेली ती चिमुरडी दूध उकळत असलेल्या भांड्यानजीक जाऊन डोकावत असताना पडली. चिमुरडीच्या किंचाळल्याने तिचे बाबा आणि अन्य कुटुंबीयांनी धाव घेत तिला बाहेर काढले. गरम असलेल्या दुधात ती पडल्याने अंग भाजले होते. तिला तत्काळ नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. गेल्या १५ दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. याबाबत नाशिक येथील पोलिस स्थानकात नोंद झालेली असली तरी या घटनेला वडगावचे उपसरपंच शशिकांत राजकोर यांनी दुजोरा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images