Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शेगाव ते नागपूर शिक्षकांची दिंडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील २२ हजार शिक्षक शेगाव ते नागपूर अशी पाय‌ी दिंडी काढणार आहेत. राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हे शिक्षक भूक, भीग मांगो आंदोलन करुन सरकारचे लक्ष वेधणार आहेत. विशेष म्हणजे, सत्तेत असलेल्या शिवसेनेची शिक्षक आघाडीही यात सहभागी होऊन सरकारला घरचा आहेर देणार आहे.

विनाअनुदानित शाळेतील शिक्षक हे उपाशीपोटी काम करतानाच उपासमार होऊ नये यासाठी शेतमजुरी आणि बुट पॉलिशचाही व्यवसाय करीत आहेत. राज्य सरकारने विनाअनुदानित शाळांकडे केलेल्या दुर्लक्षामुळे शिक्षकांची परिस्थिती भयावह झाल्याचा आरोप आमदार श्रीकांत देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. सरकारकडे वारंवार यासंदर्भात पाठपुरावा करुनही काहीच झालेले नाही. त्यामुळे शिक्षक आघाडी महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती व महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना यांनी आक्रमक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच येत्या १ डिसेंबरला शेगाव येथून विनाअनुदानित शिक्षकांची पायी दिंडी नागपूरकडे जाणार आहे. या दिंडीत शिक्षक आपली भूक ही भीक मागून भागविणार असल्याचे देशपांडे यांनी सांगितले आहे. राज्याच्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे नागपूर येथे होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ही दिंडी ११ डिसेंबरला नागपूर येथे पोहचणार आहे. या दिंडीद्वारे समाज प्रबोधनपर भजन, कीर्तन व शिक्षकांच्या व्यथाही मांडल्या जाणार आहेत.

राज्यातील १५ ते १६ वर्षांपासून अविरत सेवा देणाऱ्या शिक्षकांच्या भावनांशी सरकार सातत्याने खेळ करीत असल्याचा आरोपही देशपांडे यांनी केला आहे. विनाअनुदानित शाळांना व तुकड्यांना राज्य सरकारने तातडीने निधी द्यावा. त्यासाठी राज्य सरकारला केवळ २२७ कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. त्यासाठीची इच्छाशक्ती सरकारने दाखवावी. सध्याच्या राज्य आणि केंद्र सरकारवर सर्वज समाज घटक अत्यंत नाराज आहेत. सर्वसामान्यांना लागणाऱ्या तूरडाळीपासून ते सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. सरकारने अच्छे दिन येतील असे सांगितले पण तसे होताना दिसत नाही. हिवाळी अधिवेशनात सरकारने निर्णय जाहिर केला नाही तर हिंसक आंदोलन केले जाईल, असा इशारा देशपांडे यांनी दिला आहे. यावेळी जिल्हा पदाधिकारी संजय चव्हाण यावेळी उपस्थित होते.

आश्रमशाळांचाही प्रश्न

विनाअनुदानित शाळांबरोबरच विमुक्त जाती, भटक्या जमाती कनिष्ठ कॉलेज, आश्रमशाळा यांचाही प्रश्न आहे. २००८ मध्ये एका आदेशाद्वारे तब्बल १४७ आश्रमशाळा सुरु करण्यात आल्या. याच आदेशात विविध बाबी सांगण्यात आल्या आहेत. शिक्षकांचा पगार ४ वर्षांनंतर २५ टक्के, ५ वर्षांनंतर ५० टक्के, ६ वर्षांनंतर ७५ टक्के तर ७ वर्षांनंतर १०० टक्के वेतन अदा करण्यात येईल.

आता कुठे गेली तळमळ?

आघाडी सरकारच्या काळात झालेल्या आंदोलनास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पाठिंबा दिला. तसेच, शिक्षकांच्या व्यथा मांडणारी भाषणे त्यांनी केली. आता ते सत्तेत असूनही निर्णय घ्यायला वेळ का लागतो आहे, असा सवाल देशपांडे यांनी विचारला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संत संमेलनाच्या आठवणींना उजळा...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांचे मंगळवारी निधन झाल्याने २००३ मध्ये झालेल्या संत संमेलनाच्या आठवणी जाग्या झाल्या. त्यांनी तब्बल ८ दिवस नाशिकमध्ये मुक्काम करीत देशव्यापी संमेलन यशस्वी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

प्रखर हिंदुत्ववादी नेते अशी ओळख असलेले विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांचे मंगळवारी नवी दिल्लीत निधन झाले. त्यांच्या निधनाने विहिंपच्या नाशिक शाखा आणि पदाधिकाऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. सिंघल यांचे नाशिकमधील दौरे आणि त्यांच्याविषयीच्या आठवणींना यावेळी अनेकांनी उजाळा दिला. तर, काही जणांनी त्यांच्या विषयीचा आदरभाव तसेच त्यांच्या आठवणी सोशल मीड‌ियावरही प्रदर्शित केल्या. २००३ मध्ये झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात विहिंपच्यावतीने राष्ट्रीय संत संमेलन घेण्यात आले होते. 'या संमेलनासाठी सिंघल हे स्वतः नाशिकमध्ये ८ दिवस होते. विहिंपचे पदाधिकारी नाशिकरोड येथील माझ्या घरी त्यांचा निवास होता असे एकनाथ शेटे यांनी त्यांच्या आठवणी कळविल्या. स्पष्ट विचार आणि प्रभावी नेतृत्व अशी सिंघल यांची ओळख होती. तळागाळातील कार्यकर्त्यामध्ये उत्साह निर्माण करतानाच त्यांच्या अडी-अडचणी दूर करण्याचे कसब सिंघल यांच्याकडे होते, असे शेटे यांनी सांगितले. अस्पृश्यता निवारणाचे मोठे राष्ट्रीय कार्य त्यांच्या मार्गदर्शनाखाली विहिंपने राबविले. तसेच, दलित वस्तीत जावून काम करण्याचा पायंडा सिंघल यांनी पाडला आणि अमुलाग्र बदल त्यातून घडून आला. नाशिकच्या संत संमेलन यशस्वी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

पंतप्रधानांचा शोकसंदेश

आयुष्यभर संघाचे प्रचारक राहिलेले सिंघल अविवाहित होते. ८०च्या दशकात अयोध्येतील राम मंदिर बांधणीसाठी संघ परिवाराने हाती घेतलेल्या आंदोलनात सिंघल यांचा प्रमुख सहभाग होता. विहिंपची भूमिका महत्त्वाची होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी सिंघल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. 'सिंघल यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन मला मिळाले, हे माझे भाग्यच. अनेक पिढ्यांसाठी ते प्रेरणास्रोत होते', असे मोदी यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

महापालिका प्रभाग क्रमांक तीनमधील रासबिहारी रोडवरील साई-शिव नगरातील रहिवाशी नादुरुस्त व बंद पथदीप आणि ठि‌कठिकाणी खड्डे पडलेले रस्ते यामुळे हैराण झाले आहेत. लोकप्रतिनिधींकडे या प्रश्नी अनेकदा तक्रार केली. मात्र, समस्या सोडविल्या जात नसल्याची नागरिकांनी तक्रार आहे.

परिसरातील सर्वात मोठी कॉलनी आहे आणि याच परिसरात समोरच के. के वाघ अॅग्रीकल्चरल कॉलेज आणि इंग्लिश मीडियमची शाळा आहे. शाळा व कॉलेजातील तरुण तरुणींना रस्त्यांवरून सायकल व गाड्या चालविणेच काय तर पायी चालणेही कठीण झाले आहे. रस्त्यांचे अनेक वर्षांपासून फक्त खडीकरण झाले. मात्र, त्यानंतर डांबरीकरण करण्यात आलेच नाही. गेल्या पावसाळ्यात पाण्यामुळे रस्त्यावरील खडी वर आल्यामुळे अनेक ठिकाणी खोल खड्डे निर्माण झाले आहेत. पुन्हा खडीकरण करावे आणि तातडीने डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मुख्य रस्त्यावर पथदीप आहेत. मात्र, दिवे बसविण्यात आलेले नाही. त्यामुळे परिसरात कायम अंधार असतो. परिसरात मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. त्यामुळे अनेक साप व अन्य किटक फिरतांना दिसतात. त्यामुळे रात्री घराबाहेर पडतांना बॅटरी घेऊनच निघावे लागते. कॉलनीतील मुख्य रस्ता तर मद्यपींचा अड्डा बनला आहे. यामुळे महिला वर्गाची अडचण होते. घंटागाडी अनियमितपणे येते त्यामुळे कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषीथॉन प्रदर्शनात होणार प्रयोगश‌ील शेतकऱ्यांचा गौरव

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मीड‌िया एक्झिबिटर्स व ह्युमन सर्व्हिस फाऊंडेशन यांच्यातर्फे कृषीथॉन २०१५ या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे १० वे प्रदर्शन असून, या प्रदर्शनात महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील प्रयोगशील युवा व महिला शेतकऱ्यांचा विशेष गौरव करण्यात येणार असल्याची माहिती कृषीथॉनचे आयोजक संजय न्याहारकर यांनी दिली.

मागील दोन वर्षापासून आयोजित केल्या जाणाऱ्या 'प्रयोगशिल युवा शेतकरी' व 'प्रयोगशील महिला शेतकरी' या पुरस्कारांचे तिसरे वर्ष कृषीथॉनमध्ये संपन्न होणार आहे. या पुरस्कार सोहळ्याबद्दल माहिती देताना आयोजक संजय न्याहारकर यांनी सांगितले की, यंदाचे कृषीथॉनचे १० वे प्रदर्शन असून 'युवकांचा कृषी क्षेत्रातील सहभाग' या संकल्पनेवर आधारित असणार आहे.

कृषीथॉन २०१५ ची मांडणी युवकांनी कृषी क्षेत्राकडे केवळ शेती या दृष्टीकोनातून न पाहता नोकरी, उद्योग, व्यवसाय तसेच या क्षेत्रातील अनेक नवनवीन संधींबाबत युवकांना माहिती मिळावी हे उद्द‌िष्ट समोर ठेवून करण्यात आली आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीला अधिक समृध्द करण्याचा सातत्याने प्रयत्न करणाऱ्या युवकांचा आणि महिलांचा खऱ्या अर्थाने गौरव व्हावा आणि त्यांच्या कृषीक्षेत्रातील योगदानाची योग्य दखल घेतली जावी या हेतूने या पुरस्कारांचे आयोजन केले जात आहे.

महिला शेतकऱ्यांचा सन्मान

कृषीथॉन प्रदर्शनात महिला शेतकऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक संजय न्याहारकर यांनी दिली. न्याहारकर म्हणाले की, कृषीक्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने कष्ट करणाऱ्या महिला शेतकऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे. नवनवीन प्रयोग यशस्विरीत्या राबवून आणि आधुनिक पध्दतीचा वापर करून अनेक महिला शेतकऱ्यांनी स्वबळावर शेती व्यवसायाला व्यापारिक दृष्ट्या यशस्वी करून दाखविले आहे. त्यांनी केलेले शेतीतील अभिनव प्रयोग इतर महिलांना नवी दृष्टी आणि प्रेरणा देणारे आहे. मात्र शेतीतील खडतर प्रयोग जिद्दीने यशस्वी करणाऱ्या महिला आजपर्यंत दुर्देवाने फार कमी प्रमाणात प्रकाशझोतात आल्या आहेत आणि त्यांचे प्रेरणादायी कार्यही पडद्याआड राहिले आहे. हे लक्षात घेऊन कर्तृत्ववान महिला शेतकऱ्यांना सन्मान कृषीथॉन २०१५ मध्ये केला जाणार आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज कामगारांचे आज धरणे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनतर्फे वीज कामगारांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी (दि. १८) विद्युत भवनासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. कामगारांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य उपाध्यक्ष व्ही. डी. धनवटे यांनी द्वारसभेत नुकतेच केले. द्वारसभेला उपसरचिटणीस ज्योती नटराजन, अरुण म्हस्के, जी. एच. वाघ, दीपक गांगुर्डे, पंडित कुमावत, ललित वाघ, सुरज घुगे, सुभाष निफाडे आदी उपस्थित होते. फेडरेशनने जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या समस्येची सोडवणूक व्हावी यासाठी शासनाला निवेदन दिले होते. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. गुंड प्रवृत्तीच्या ग्राहकांकडून वीजबील वसुलीसाठी पोलिस संरक्षण मिळावे, अतिरिक्त कामाचा मोबदला मिळावा, महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रसाधनगृहाची सुविधा उपलब्ध करावीआदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राष्ट्रवादी युवक’तर्फे नाशिकरोडला आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

प्रेक्षकांना जादा दराने तिकीट विक्री केली तसेच तिकीटांसमवेत खाद्य पदार्थांचे कूपन घेण्याची सक्ती केली जात असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे येथील रेजिमेंटल प्लाझात आंदोलन करण्यात आले.

दुपारचा चित्रपटचा शो बंद पाडण्याचा आंदोलकांनी प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळेची हस्तक्षेप करून आंदोलकांना रोखले. संघटनेचे शहराध्यक्ष अंबादास खैरे, वैभव देवरे, सनी ओबेराय, राहुल तुपे, खंडू दातीर, इम्रान पठाण, आदींनी आंदोलनात सहभाग घेतला. कार्यकत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रकार सावंत बंधू देणार अलबेन‌ियाला धडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अलबान‌िया देशाच्या सांस्कृतिक मंत्रालय व इंटरनॅशनल वॉटरकलर सोसायटी ऑफ अलबेन‌िया या जागतिक कलासंस्थेच्या संयुक्त विद्यमाने अलबेन‌िया देशातील तिराना या राजधानीच्या शहरात वीझआर्ट इंटरनॅशनल वॉटरकलर बीनाले २०१५ चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शकांमध्ये चित्रकार सावंत बंधुंना विशेष आमंत्रित करण्यात आले आहे.

२१ ते २५ नोव्हेंबर या काळात नॅशनल हिस्टोरीकल म्युझियम प्लेस ऑफ काँग्रेस, तीराना, अलबानीया या ठिकाणी होणार आहे. या दरम्यान इंटरनॅशनल वॉटरकलर फेस्टिव्हलचे ही आयोजन करण्यात आले असून, अलबान‌ियाच्या निवड समितीने जगातील विविध देशातील सर्वोत्कृष्ठ आठ चित्रकारांची जागत‌ीक वॉटरकलर वर्कशॉपसाठी निवड करण्यात आली आहे.

या आठ तज्ज्ञ चित्रकारात सावंत बंधूसह इटली देशाचे इगोर सावा, कॅनडा देशातील अटानूर डोगन, दिल्लीतील अमित कपूर, युक्रेनचे इहोर युरचेनको, अलबानीयातील हेलीडॉन हालीती तर जर्मेनीच्या गॅबरेल कोनींग्स हे आठ दिग्गज चित्रकार आपआपल्या चित्रशैलीत जलरंग चित्राचे धडे विविध देशातून आलेल्या चित्रकारांना देणार आहेत. अलबान‌िया देशातील प्रमुख १० टी.व्ही चॅनल्स विशेष डॉक्युमेंट्री फिल्म्स् करून जगभरात प्रसा‌रित करणार आहेत.

याच ठिकाणी होणाऱ्या वीझ आर्ट इंटरनॅशनल वॉटर कलर बीनालेत ५८ देशातील निवडक २१० चित्रकारांच्या ४०० चित्रकृतींचे जागतिक चित्रप्रदर्शनही प्रदर्शित होणार आहे. या प्रदर्शनात राजेश सावंत यांचे जलरंगातील कॅंपेनीयन, गोल्डन लाईन, टॉपलाईट ही रचनाचित्रे तर प्रफुल्ल सावंत यांचे जलरंगातील इव्ह‌िनींग अॅट इस्तान्बुल, फर्स्ट लाईट, लेन अॅट बनारस ही निसर्गचित्रे प्रदर्शित होणार आहेत. तसेच वीझ ऑर्ट इंटरनॅशनल

वॉटर कलर बीनालेच्या जागतिक सचित्र पुस्तिकेत चित्रकार सावंत बंधूची ही सर्व चित्रे मुद्र‌ित केली जाणार असुन, या पुस्तिकेचे जगातील अनेक देशातील विविध म्युझियम, आर्ट कॉलेजसमध्ये वितरणही केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इंड‌ियन पॅनारोमा’त नाशिकचा दिग्दर्शक

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

नाशिक : नाशिकच्या भूमीतून अनेक चित्रपटच बनले नाहीत तर दिग्दर्शक देखील उदयास आले आहे. नाशिकच्या सुहास भोसले या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला 'कोती' चित्रपटाला गोवा येथे होणाऱ्या ४६ व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्ट‌िव्हलमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.

या महोत्सवात सहभागी होण्यासाठी भारतातून २३० चित्रपटांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यातील २६ चित्रपटांना या महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. यात गजेंद्र आहिरे यांचा 'द सायलेन्स' सुबोध भावे यांचा 'कट्यार काळजात घुसली', तर सुहास भोसले यांचा 'कोती' या तीन मराठी चित्रपटांचा समावेश आहे. 'कोती' हा चित्रपट तृतीय पंथीयांवर आधारीत आहे. एका कुटूंबातील लहान मुलगा तृतीय पंथी असल्याचे कळते. त्यामुळे त्याच्याबद्दल असलेली समाजाची अनास्था, कुटूंबाला होणारा सामाजिक त्रास यातून निर्माण झालेला तणाव या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. अरिबाम शाम शर्मा यांच्या नेतृत्वाखाली १५ परीक्षकांनी या चित्रपटाची निवड या महोत्सवासाठी केली आहे. मराठीतून या फिल्म फेस्ट‌िव्हलसाठी निवड होणे ही अत्यंत गौरवास्पद समजले जाते.

नाशिकमधून प्रथमच सुहास भोसले यांच्या चित्रपटाने हा मान मिळवला आहे. सुहास भोसले हे गेल्या १५ वर्षापासून चित्रपट क्षेत्रात असून, त्यांनी आतापर्यंत 'सावरखेड एक गाव', 'पक पक पकाक', 'देवकी' अशा अनेक चित्रपटांना सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. त्याच प्रमाणे रंगभूमीवर देखील अनेक नाटकांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. त्यात 'तीन पैशाचा तमाशा' 'वेटींग फॉर गोदो' अशा अनेक प्रायोगिक नाटकांचा समावेश आहे. या फिल्म फेस्ट‌िव्हलमध्ये सहभागी झाल्यानंतर जागत‌िक पातळीवर ही फिल्म प्रदर्शित होण्यास मदत होणार आहे. हा चित्रपट महोत्सव २० नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत गोवा येथे होणार असून, २२ तारखेला पणजी येथील आयनॉक्स चित्रपट गृहात 'कोती'चे प्रदर्शन होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुहास भोसले यांचे असून, कथा पटकथा संवाद 'रझाकार' या मराठी चित्रपटाचे लेखक राजेश दुर्गे यांचे आहे. या चित्रपटात आज्ञेश मुनशिंडकर, दिवेश मेदगे या लहान जोडीने अप्रतिम अभिनय केला असून, त्यास संजय कुलकर्णी विनीता काळे, मोहिनीराज गटणे, लक्ष्मीकांत विसपुते यांची साथ मिळाली आहे.

माझ्या पहिल्याच चित्रपटाची आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली आहे. नाशिककरांनी भरभरुन प्रेम दिल्यामुळेच हे साध्य होऊ शकले. यापुढेही नवीन विषयावर चित्रपट देईन.

- सुहास भोसले, दिग्दर्शक 'कोती'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

गिरणा धरणातील मालेगावकरांचे हक्काचे पाणी पळवण्याचा घाट घातला जात आहे. यामुळे मालेगावसह कसमादे भागातून विरोध वाढत असून, आता गिरणाच काय पण कसमादेमधील एक थेंब पाणी देखील जळगावला न देण्याचा पवित्रा मालेगाव तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांनी घेतला आहे.

कसमादे पाणीप्रश्नावर राजकीय पक्षांचे नेते पुढे सरसावले असून, येत्या काळात पाणीप्रश्नावर खान्देश (जळगाव) व मालेगावचे राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. आमदार आसिफ शेख यांनी पाणीप्रश्नी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. तसेच भाजपचे अव्दय हिरे, प्रसाद हिरे यांनी देखील पत्रक काढून गिरणा व कसमादेचे पाणी जळगावला देण्यास विरोध केला आहे.

यंदा पावसाने पाठ फिरवली. जून ते ऑक्टोबर या कालावधीत मालेगाव तालुक्यात ८६ टक्के, नांदगाव ३२ टक्के, कळवण ७६ टक्के, बागलाण ८७ टक्के, देवळा ५४ टक्के असा सरासरीच्या कमीच पाऊस झाला. मालेगाव शहरानजीक असलेल्या गिरणा धरणात देखील १८८४ दलघफू हणजे केवळ १० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मालेगावसह नांदगाव, चाळीसगाव, जळगाव शहरांच्या पिण्याच्या पाण्याची भिस्त या जलसाठ्यांवर आहे. मात्र, आता यातील पाणी मालेगावला न देता जळगावला मिळावे, यासाठी प्रशासनाने बैठक घेऊन पालकमंत्री खडसे यांची देखील संमती घेतली आहे. त्यामुळे मालेगावचे हक्काचे पाणी खान्देशात पळविण्याचा घाट घातला जात आहे. मात्र, याला आता मालेगावात जोरदार विरोध होऊ लागला आहे.

राज्याचे सहकार राज्यमंत्री तथा मालेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे यांनी शासन दरबारी मालेगावकरांची बाजू लावून धरली आहे. काँग्रेसेचे आमदार आसिफ शेख, तुषार शेवाळे, प्रसाद हिरे यांनी देखील अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे. भाजप नेते अद्वय हिरे यांनी देखील पत्रक काढून कसमादेचे पाणी जळगावला देण्यास विरोध दर्शवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रमजीवी संघटनेचा बिऱ्हाड मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक पोलिस ठाण्यावर श्रमजीवी संघटनेने मंगळवीरी बिऱ्हाड मोर्चा नेऊन तळपत्या उन्हात दोन तास ठियया आंदोलन केले. गत महिन्यात तालुक्यातील धुमोडी येथील शेतकरी महिलांना अमानुष मराहाण करीत उभे पीक तुडवण्याचा आदेश देणारे पोलिस आणि त्यांना सहकार्य करणारे महसूल कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करा, अन्यथा आम्ही येथेच बिऱ्हाड करू, असा इशारा आंदोलकांनी दिला. पोलिस प्रशासनाने याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

श्रमजीवी संघटनेचे संस्थापक माजी आमदार विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. सिंहस्थ बसस्थानकापासून या मोर्चास प्रारंभ झाला. त्र्यंबक पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारी रस्त्यावर आंदोलकांनी ठिय्या मांडला. आंदोलनाचा पवित्रा ओळखून प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलकांना थांबविण्यासाठी सिंहस्थातील बॅरिकेडिंग यावेळेस उपयोगास आले. गेल्या महिन्याच्या २८ ऑक्टोबर २०१५ रोजी तालुक्यातील धुमोडी येथे जमिनीचा ताबा घेण्याच्या वादातून हा प्रकार घडला आहे. त्र्यंबकच्या बडा उदासीन आखाड्याची धुमोडी येथील जमीन काही कुळं कसतात. याबाबत आखाड्याने कोर्टबाजी करून कुळांची नावे कमी केली. त्यानंतर २८ तारखेस ताबा घेण्यासाठी पोलिस फौजफाटा घेऊन बडा उदासीन आखाड्याचे साधू प्रेमानंद आणि पाच साधू तेथे गेले असता जमीन कसत असलेल्या महिलांनी तेथून जाण्यास नकार दिला. या जमिनीचा वाद महसूल लवादाकडे सुरू आहे, असे महिलांनी सांगितले. पिकात ट्रॅक्टर घालू नका, अशी विनवणी केली. श्रमजीवी संघटनेच्या म्हणण्यानुसार येथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी उभ्या पिकात ट्रॅक्टर घालण्यास सांगितले. तसेच, यास विरोध करणाऱ्या महिलांना साधूंनी माराहाण केल्याचा आरोप करीत पोलिसांनी साधूंचीच बाजू घेतली. यावेळी महसूल खात्याचे तलाठी आणि मंडलाधिकारी उपस्थित होते. या प्रकरणी श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी महिला यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. याबाबत न्याय मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

त्र्यंबकेश्वर येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक चौधरी तसेच हवालदार परदेशी आणि आणखी काही कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी करण्यात आली. त्याच प्रमाणे महसूल मंडलाधिकारी सोनवणे आणि तलाठी पाटील यांच्यावर महसूल विभागाने कारवाई कारावी, अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली.

त्र्यंबकेश्वर येथील आखाड्यांच्या जमिनी आहेत. शेतकरी शेकडो वर्षांपासून या जमिनी कसत आहेत. जमिनीला भाव आल्याने आखाडे आणि बिल्डरांनी संगनमत करून या जमिनी विकण्याचा सपाटा लावला आहे. धुमोडी येथे असाच प्रकार घडला आहे. शेतकऱ्यांच्या विरुध्द निकाल लागला. त्यानंतर पोलिसांनी उभ्या पिकात ट्रॅक्टर घातला. जमिनीचा ताबा घेण्यासाठी मारहाण केली. दोषींवर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील.

- विवेक पंडित, संस्थापक, श्रमजीवी संघटना

कोर्टाच्या निकालाने जमिनीचा आखाड्याने ताबा घेतला आहे. जमीन कसण्यास आमचा विरोध नव्हता मात्र, वारस महिलांनी जमिनीवर नावे लावण्याचा प्रयत्न केल्याने ती आखाड्यास परत मिळाली. कोणलाही मारहाण केलेली नाही. मात्र, कुभांड रचून साधूंना बदनाम करीत आहेत.

- महंत रघुमुनी महाराज, बडा उदासीन आखाडा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रेलरच्या धडकेत दुकानांचे नुकसान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर कॉलेजसमोर ड्रायव्हरचे नियंत्रण सुटून ट्रेलर भरधाव वेगात शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये घुसल्याने झालेल्या अपघातात सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले. सोमवारी हा अपघात झाला. यावेळी दुकाने बंद असल्याने मोठा अनर्थ टळला.

नाशिक येथून लोखंडी प्लेट घेऊन मुसळगावकडे ट्रेलर (एमएच ०४, बीजी ३२२१) जात होता. चालक अब्दुल करीम हुसेन चौधरी याचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरील वाहनांना वाचविण्याच्या प्रयत्नात ड्रायव्हरने कॉलेजसमोरील शॉपिंग कॉम्प्लेक्सकडे ट्रेलर वळविला. येथील बजाज शोरूम, शिव ऑटोमोबाइल या दुकानांपुढील पत्र्याचे शेड जमीनदोस्त केले. शेजारी असलेल्या कॉर्पोरेशन आणि सेंट्रल बँकेच्या बोर्डाचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बजाज शोरूमचे संचालक रामदास ठोक यांच्या मालकीच्या शोरूमचे पत्र्याचे शेड, सीसीटीव्ही संच, बापू पाटील यांच्या शिव ऑटोमोबाइलचे पत्र्याचे शेड आणि दोन्ही बँकांचे फलक मिळून सुमारे दोन लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पहाटे अपघात झाल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांद्यावर भर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

खरीप हंगामात जूनपासून पावसाने वेळोवेळी दिलेल्या हुलकावणीमुळे मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळसदृश परिस्थिती ओढावली आहे. सरासरीच्या केवळ ८६ टक्केच पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. यंदा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्यासोबत रब्बी हंगामातील पिकाला लागणाऱ्या पाण्यासाठीसुद्धा संघर्षच करावा लागेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे गहू आणि हरभरा या पिकांच्या क्षेत्रात व उत्पादनात लक्षणीय घट होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.

मालेगाव तालुक्याच्या भौगोलिक क्षेत्राचा विचार करता खरीप हंगामात सुमारे ८० हजार ८७५ हेक्टर सर्वसाधारण पेरणी क्षेत्र होते. प्रत्यक्षात ७२ हजार ०७९ म्हणजे ९० टक्के क्षेत्रावर पेरणी करण्यात आली. मात्र, पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे यातील सुमारे ७० टक्के पेरणी क्षेत्रावर उत्पादनात घट झाल्याचे पहायला मिळाले. खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या हाती काहीच न लागल्याने आता रब्बी हंगामात तरी काही उत्पादन हाती येईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. रब्बी पिकांची पेरणी सुरू झाली असली तरी पिण्याचा पाण्याचा प्रश्न तालुक्यात गंभीर बनला आहे. गिरणा-मोसम खोऱ्यात यंदा हरणबारी, चणकापूर धरणाचे पूरपाणी सोडता नदीपात्र बहुतांशी कोरडेच राहिले. प्रामुख्याने बागायती क्षेत्र असलेल्या या भागाला याचा मोठा फटका बसू शकतो. तालुक्यातील गिरणा धरणात अवघा दहा टक्के साठा असून, त्यातही जळगाव-मालेगाव असा पाणीप्रश्न पेटला आहे. हरणबारी, चणकापूर धरणातून पुन्हा मालेगावला आवर्तन देण्यास विरोध वाढत आहे.

त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याबाबत निर्णय घेण्याची वेळ आल्यास पिण्याच्या पाण्यास प्राधान्य देण्यात येईल. खरीप हंगामात आधीच पीक वाया गेल्याने १५० हून अधिक गावातील पीक आणेवारी पन्नास पैशांच्या आत असल्याने दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. त्यात आता रब्बी हंगामात उत्पादन क्षेत्रात कमालीची घट होत असून, शेतकऱ्यांसाठी रब्बीची वाट देखील बिकट होणार आहे.

यंदा खरीप हंगामात पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्यामुळे पाण्याची उपलब्धता लक्षात घेता रब्बी हंगामात मोठी घट पहायला मिळत आहे. शेतकरी बांधवांनी उपलब्ध पाण्यानुसार कांदा पिकास प्राधान्य द्यावे. पाण्याचे सूक्ष्म नियोजन केल्यास त्याचा लाभ मिळू शकेल. - गोकुळ अहिरे, तालुका कृषी अधिकारी

तालुक्याच्या रब्बी हंगाम २०१५-१६ च्या अहवालानुसार एकूण ८५१० हेक्टर सर्वसाधारण पेरणी क्षेत्राचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात ६३९.४० हेक्टर क्षेत्रावरच पेरणी करण्यात आली आहे. त्यातही हरभरा, गहू, मका पिकांच्या क्षेत्रात सुमारे ३० ते ४० टक्के इतकी घट होण्याची शक्यता आहे. खरीप कांदा उत्पादनात लक्षणीय घट आल्याने कृषी विभागाकडून रब्बीत हिवाळी कांदा लागवडीला प्रोत्साहन दिले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हा उघड होण्याचे प्रमाण

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com

नाशिक : चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण तुलनेत फारच कमी आहे. चालू आणि गत वर्षातील पहिल्या आठ महिन्यात स्नॅचिंगच्या तब्बल १४० घटना घडल्या. यातील अवघ्या ४६ गुन्ह्यांतील आरोपींपर्यंत पोलिस पोहोचू शकले. गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण कमी असल्याने गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

यावर्षी पहिल्या आठ महिन्यात चोरट्यांनी उपनगर, इंदिरानगर आणि नाशिकरोड, पंचवटी पोलिस स्टेशन हद्दीत उच्छाद मांडला. विविध हायवेशी असलेली इतर रस्त्यांची संलग्नता आणि पोलिसांचे दुर्लक्ष यामुळे स्नॅचर्स घटनेनंतर काही मिनिटातच बेपत्ता होतात. अचानक होत असलेल्या स्नॅचर्सच्या हल्ल्यांमुळे सर्वसामान्यांच्या मनात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. बहुतांश स्नॅचर्स काळ्या रंगाच्या पल्सरवर येऊन पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील चेन ओरबडून नेतात. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी सुध्दा चोरीची असते. त्यामुळे गुन्हेगारांपर्यंत पोहचताना पोलिसांच्या नाकीनव येते. त्यातच गुन्हा उघडकीस येण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. या सर्व नकारात्मक परिस्थितीमुळे वयस्कर महिलांनी दागिने घालून घराबाहेर पडताना विशेष सावधगिरी बाळगणे अपे‌क्षित आहे.

याबाबत बोलताना परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी सांगितले की, स्नॅचर्सला रोखण्यासाठी पोलिस आपल्यापरीने उपाययोजना राबवत असतात. काही महिन्यांपूर्वी स्नॅचिंगच्या घटनांचा वेग काहीसा वाढला होता. त्यामुळे आम्ही थेट नागरिकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली. आज आमचे पोलिस अधिकारी व कर्मचारी विविध कॉलनी परिसरांना भेट देऊन चेन स्नॅचिंगसह घरफोडी व इतर गुन्हे कसे रोखता येतील, याचे मार्गदर्शन देत आहेत. यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून हळूहळू परिमंडळ दोनमधील नाशिकरोड, उपनगर, इंदिरानगर या पोलिस स्टेशन हद्दीतील गुन्हे कमी झाले आहेत. साधारणतः स्नॅचर्स आपले सावज शोधताना होणाऱ्या प्रतिकाराचा विचार करतो. त्यामुळेच गुन्हेगार वयस्कर व्यक्तींना टार्गेट करतात. तोतया पोलिस प्रकरणात सुध्दा वयस्करांनाच लक्ष केले जाते. चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात स्थानिकांसह परजिल्ह्यातील गुन्हेगारांचा सहभाग असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. तपासाच्या दृष्टीने हाच कळीचा मुद्दा ठरतो. झालेल्या गुन्ह्याचा तपास करण्यापेक्षा गुन्हा होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे धिवरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोलवाढीला विरोध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

पिंपळगाव बसवंत ते गोंदे या राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी उड्डाणपूल, सर्विसरोड, पथदीप, भुयारी मार्गाची कामे प्रलंबित असताना पीएनजी टोल कंपनीकडून टोलवाढीच्या हालचाली सुरू आहेत. टोल कंपनीच्या या निर्णयाविरोधात विविध पक्ष, संघटनांनी आवाज उठवून टोलवाढीला विरोध केला आहे. तसेच, तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

टोलवाढप्रश्नी निफाडचे प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसीलदार संदीप आहेर, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, राष्ट्रीय महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी सुनील पुरोहित, राजन विचारे, माजी आमदार दिलीप बनकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते हंसराज वडघुले व स्थानिक लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक पिंपळगाव पोलिस ठाण्यात झाली. या बैठकीत लोकप्रतिनिधींनी महामार्गावर प्रलंबित असलेल्या कामांबाबत व सातत्याने होणारे अपघात तसेच, अपघातात निष्पाप नागरिकांचे जाणारे बळी याबाबत गंभीरपणे तक्रारी मांडल्या. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (२४ नोव्हेंबर) लोकप्रतिनिधी, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, टोल कंपनीचे अधिकारी यांनी संयुक्तपणे महामार्गाची पाहणी करून त्रुटींचा अभ्यास करावा, याबाबतचा अहवाल तयार करून राष्ट्रीय महामार्गाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना व टोल कंपनीस सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अहवालानुसार महामार्गाची दुरुस्ती करण्यासाठी पावले उचलण्याचे सुचित करण्यात आले.

या बैठकीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्त हंसराज वडघुले, दिलीप बनकर, बापूसाहेब पाटील, प्रकाश गोसावी, गणेश बनकर, बाळासाहेब आंबेकर, दीपक शिंदे यांनी महामार्गाची दयनीस अवस्था अधिकाऱ्यांसमोर मांडली. पिंपळगाव बसवंत येथील चिंचखेड चौफुली, सर्विस रोड, कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न, पथदीप, स्पीडब्रेकर्स, ओझरचा उड्डाणपूल, सर्विसरोड, अंडरपास याबाबत बैठकीत तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडला.

बैठकीस उपस्थित लोकप्रतिनिधींनी राष्ट्रीय महामार्ग व टोल कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मात्र, प्रांताधिकारी व तहसीलदार तसेच पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मध्यस्थीनंतर महामार्गाची पाहणी करून अहवाल सादर करण्याचा व अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा तोडगा काढण्यात आला. या बैठकीस सोमनाथ बोराडे, देवेंद्र काजळे, गोरख खैरनार, किरण देशमुख आदींसह लोकप्रतिनिधी व वाहनधारक उपस्थित होते.

टोलवाढीबाबत संभ्रमावस्था

पिंपळगाव बसवंत येथील टोलकंपनी पीएनजीने टोलमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत बैठकीत कंपनीच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारण्यात आले. मात्र, त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली. यामुळे टोलवाढीबाबत संभ्रमावस्था वाढली आहे.

प्रस्तावित दुरुस्ती

सायखेडा रस्‍ता १७ बाय ५.५९ मीटर अंडरपास

खंडेराव मंदिरसमोर ६ बाय २.५० मीटरचे दोन अंडरपास

गडाख कॉर्नर १७ बाय ४.५० मीटर अंडरपास

बाणगंगा पुलावर सर्विसरोडसाठी स्वतंत्रपूल

चिंचखेड चौफुलीवर १८ मीटरचे तीन अंडरपास.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढली बालगुन्हेगारांची संख्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‍शहरात पाकीटमारी, भुरट्या चोऱ्यांसह दरोडा आणि खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांतही बालगुन्हेगारांचा समावेश असणे ही चिंताजनक बाब बनली आहे. किशोर सुधारालयातून बाहेर पडणारी मुलेही पुन्हा गुन्हेगारीच्या वाटेवर वेगाने पाऊले टाकत असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले असून, अशा बालगुन्हेगारांचे समुपदेशन करण्याचा निर्णय पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी घेतला आहे.

शहरात दररोज पाकीटमारी, वाहनचोरीपासून ते दरोड्यापर्यंतचे मालमत्ता विषयक गुन्हे घडतात. पोलिस दफ्तरी अशा गुन्ह्यांची नोंद देखील होते. मात्र, त्यामध्ये सापडणाऱ्या संशयितांमध्ये तुलनेने अल्पवयीन आरोपींचे प्रमाण खूपच कमी आहे. हाणामाऱ्या, जीवे मारण्याचा प्रयत्न, आणि खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये मात्र अल्पवयीन आरोपी सापडण्याचे प्रमाण खूप मोठे असल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. क्षुल्लक कारणावरून राग डोक्यात घालून हे अल्पवयीन एखाद्या गुन्ह्याचे धनी होतात. आरोपी म्हणून पहिल्यांदा पोलिस स्टेशनची पायरी चढणारे अल्पवयीन आरोपी नंतर सातत्याने ही पायरी चढत असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले आहे. केलेल्या कृत्याचा पश्चाताप व्हावा म्हणून त्यांना किशोर सुधारलयासारख्या ठिकाणी प्रायश्चित्त घेण्यासाठी पाठविले जाते. मात्र, तेथून बाहेर पडल्यानंतरही पुन्हा यापैकी अनेक अल्पवयीन मुले कोणत्या कोणत्या गुन्ह्यात अडकल्याचे पहावयास मिळाले आहे. गतवर्षी शहरातील अशा अल्पवयीन आरोपींची संख्या ८५ होती. ऑक्टोबर अखेरपर्यंत ती ११० तर नोव्हेंबरमध्ये १२५ वर पोहोचली आहे. त्यामध्ये चोरी प्रकरणांमधील २३, घरफोड्यांमधील २० आणि हाणामारीच्या घटनांमधील २६ आरोपी आहेत. याखेरीज खुनाच्या गुन्ह्यात देखील काही अल्पवयीन आरोपींना पकडण्यात आले आहे. महिला आणि बालकल्याण विभागाच्या समन्वयक दीपाली मानकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा विभाग शालाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेत आहे. अशा विद्यार्थ्यांकडे शिक्षणाचा आग्रह धरून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. याकामी एनजीओंची देखील मदत घेण्यात येत असून, अल्पवयीन मुलांना गुन्हेगारी क्षेत्रापासून परावृत्त करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

अल्पवयीन आरोपींची अशी वाढती संख्या चिंताजनक असून, गुन्हेगारी मार्गापासून या मुलांना परावृत्त करण्यासाठी समुपदेशनाचा मार्ग अवलंबविण्याचा निर्णय पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी घेतला आहे. त्यासाठी एका एनजीओशी पोलिसांनी संपर्क केला असून, त्यांनीही मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


व्यायामाच्या मदतीला अॅप्स

$
0
0

व्यायामाच्या मदतीला अॅप्स

धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये आरोग्यासाठी व्यायाम करणं आवश्यक बनलं आहे. मात्र ट्रेनिंग घेऊन व्यायाम करणं किंवा दररोज त्यासाठी जिममध्ये जाणं प्रत्येकाला जमतंच असं नाही. म्हणूनच त्यावर उपाय ठरत आहेत व्यायामाची अॅप्स.

प्रतीक गंगेले, कॉलेज क्लब रिपोर्टर
थंडी सुरू झाली की अनेकांना व्यायामाचा कंटाळा येऊ लागतो. अनेकदा वेळेअभावी जिम किंवा अन्य व्यायामाच्या क्लासेसना जाणे जमतेच असे नाही. पण मोबाइलवर उपलब्ध असणारे व्यायामाचे अॅप्स ही उणीव भरुन काढत आहेत. घरच्या घरी शास्त्रोक्त पद्धतीने माहिती घेऊन वर्कआउट करणाऱ्यांमध्ये ही अॅप्स प्रचंड लोकप्रिय होत आहेत.

खास युवा वर्गाची आवड लक्षात घेऊन विविध कंपन्यांनी टोटल फिटनेस, जिम वर्कआउट, होम वर्कआउट नावाने अॅप्स तयार केली आहेत. यामध्ये अॅब्ज, बायसेप्स , कार्डिओ, फोरआर्म्स यांचे किती सेट्स मारायचे, डम्बेल्स किती आणि कसे उचलायचे, प्रत्येक प्रकार किती वेळ करायचा याची परिपूर्ण माहिती फोटोसह दिलेली असते. अनेक वेळा डम्बेल्स नसले तरी थेराबेंडचा उपयोग करून आपण घरच्या घरी व्यायाम करू शकतो. महिलांमधून या अॅप्सना विशेष पसंती मिळत आहे.

अनेक जण आजकाल योगा करण्याला प्राध्यान्य देताना दिसतात. पण प्रत्येकाला योगाचे क्लासेस लावणे शक्य नसते. अशांसाठी योगासन, डेली योगा असे भारतातील सर्वच भाषांमध्ये उपलब्ध असलेले अॅप्स लोकप्रिय ठरत आहेत. प्रत्येक अॅपमध्ये वर्गवार विभागणी करण्यात आली असून प्रत्येक आसन कसे करायचे आणि त्याचे फायदे यांची सविस्तर माहिती कृतीसह दिलेली आहे. गूगल फिट, फिटनेस ट्रेनर या अॅप्समध्ये आपला वर्कआऊट प्लॅन आपण सेव्ह करून ठेवू शकतो. हे अॅप्स अँड्रॉईड तसेच काही जावा फोन्समध्ये प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौधरींच्या तक्रारीमुळे सादरे होते व्यथ‌ित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येप्रकरणी बुधवारी मनसेचे जळगावमधील नगरसेवक ललित कोल्हे यांची नाशिकमधील सीआयडी कार्यालयात तब्बल साडेतीन तास चौकशी करण्यात आली. सागर चौधरी खंडणीची तक्रार देण्यासाठी गेल्याने सादरे व्यथ‌ित होते. चौधरी याला समजावून सांगा असा संवाद सादरे यांनी आपल्याशी फोनवरून साधला होता, अशी माहिती चौकशीत पुढे आली आहे.

सादरे आत्महत्या प्रकरणाचा तपास सीआयडीचे नाशिकमधील पथक करीत आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी समजावून घेण्यासाठी सीआयडीने वाळू ठेकेदार रविंद्र चौधरी, राजेश मिश्रा आणि नगरसेवक ललित कोल्हे यांना वेगवेगळ्या दिवशी चौकशीसाठी नाशिक‌मध्ये बोलावले होते. अधीक्षक प्रदीप देशपांडे, पोलिस निरीक्षक के. डी. पाटील यांनी त्यांची चौकशी केली. बुधवारी सकाळी कोल्हे चौकशीसाठी सीआयडी कार्यालयात हजर झाले. साडेतीन तास त्यांची चौकशी करण्यात आली. सागर चौधरी सादरे यांच्या विरोधात खंडणीची तक्रार देण्यासाठी गेला होता. ही बाब सादरे यांना समजली. ते व्यथ‌ित झाले. त्यांनी मला मोबाइलवर फोन केला. माझ्या विरोधात तक्रार देऊ नको असे चौधरी याला समजावून सांगा असे सादरे यांनी सांगितल्याची माहिती आज झालेल्या चौकशीतून पुढे आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्रीय समिती आज नाशकात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्राची द्विसदस्यीय समिती आज नाशिकसह अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा करणार आहे. जिल्ह्यातील सिन्नर आणि येवला तालुक्यातील काही गावांना भेट देऊन ही समिती तेथील दुष्काळी परिस्थितीचा दाहकता तपासणार आहे.

‍समितीमध्ये निती आयोगाचे अध्यक्ष मानस चौधरी, केंद्रीय ऊर्जा प्राधिकरणाचे सचिव शंतनु विश्वास यांचा समावेश असणार आहे. जिल्ह्यात नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि इगतपूरी हे तीन तालुके वगळता अन्य १२ तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे या तालुक्यांमधील अनेक गावे यंदा दुष्काळाच्या झळा अनुभवित आहेत. सुरगाणा तालुक्यातील १९१ गावांमध्ये ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी आहे. राज्यात १५ हजार ७४७ गावांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती असून, राज्य सरकारने केंद्राकडे तातडीची चार हजार कोटी रुपयांची मदत मागितली आहे. दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे राज्यातील शेतीची बिकट अवस्था होण्याची भीती आर्थिक मदत मागतेवेळी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे.

या पार्श्वभुमीवर केंद्राची ही समिती राज्यभरातील दुष्काळाची पाहणी करणार आहे. त्यासाठी चार समित्यांनी नेमणूक करण्यात आली असून, त्यापैकी एक समिती नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर ओढवलेली परिस्थिती, शेतीमधील पिकांची सद्दस्थितीची पाहणी या दौऱ्यात केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किराणा दुकान जळून खाक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

येथील मेनरोडवरील किराणा दुकानास लागलेल्या आगीत आठ लाखांचे साहित्य जळून खाक झाले. त्र्यंबक नगरपरिषदेच्या अग्निशमन वाहनाने काही वेळातच आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.

मेनरोड वरील व्यापारी सारडा यांचे सर्वांत जुने किराणा मालाचे दुकान व त्यावर निवासस्थान आहे. या दुकानास लागूनच घरे आहेत. सारडा यांच्या दुकानाला लागलेली आग शेजारी पसरली असती तर मोठा अनर्थ घडला असता. बुधवारी पहाटेच्या सुमारास सारडा यांच्या किराणा दुकानातील स्वीच बोर्ड जवळ शॉर्टसर्किट झाल्याने ठिणग्या पडून आग पसरली. तेल, तूप तसेच पेपरची रद्दी यामुळे आग आणखी भडकली. पहाटे मेनरोड गंगास्लॅबवर चहाची दुकाने लागतात. यातील एका व्यवसायिकास धूर दिसल्याने त्याने नागरिकांना सावध केले. रस्त्यावर अडथळ्यांमुळे अग्निशमन वाहन वेळेत पोहचणे शक्य झाले नाही. रस्त्यावर वाहने उभी करणे, माळा शंख, रूद्राक्ष माळा यांची पथा-या पसरून दुकाने लावणे यास नगरपालिकेने आळा घातला पाहिजे. मेनरोड वर घटनास्थळ असल्याने किमान वाहन तेथे जावू शकले. इतरत्र गल्ली गल्लीबोळात घटना घडल्यास काय करणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्यात बायोगॅस प्रकल्प धूळखात पडून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा नगरपरिषदेने घनकचरा व्यवस्थापनाचा भाग म्हणून सुमारे तीस लाख रूपये खर्चून उभारलेला महत्त्वाकांक्षी बायोगॅस प्रकल्प सद्यस्थितीत शोभेची वास्तू म्हणून ठरला आहे. नाशिक जिल्ह्यातील क वर्ग नगरपालिकामधील एकमेव सटाणा पालिकेने बायोगॅस प्रकल्प निर्मिती करून नावलौकीक मिळविला असला तरी प्रकल्प बंद अवस्थेत असल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.

या प्रकल्पाचे काम पूर्ण होवूनही हस्तांतराच्या प्रतीक्षेत प्रकल्प धूळखात पडून आहे. पूर्ण क्षमतेने प्रकल्प कार्यान्वित करण्यात यावा अशी अपेक्षा शहरवासीय बाळगून आहेत. राज्यातील माथेरान, डोबिंवली, कल्याण या पालिका क्षेत्रातील बायोगॅस प्रकल्पांचा अभ्यास करून सटाणा पालिकेने प्रकल्पाचे काम पूर्ण केले. भाभा अणुसंशोधन केंद्र व महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने ना हरकत दाखला दिल्यानंतर पूर्ण क्षमतेने प्रकल्प कार्यान्वित होईल, अशी अपेक्षा प्रशासनाला आहे.

घनकचरा व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून बायोगॅस प्रकल्प उभारणारी नाशिक जिल्ह्यातील सटाणा ही पहिलीच क वर्ग पालिका आहे. १३ ऑक्टोबर २०११ ला या प्रकल्पाची उभारणी शहरातील वॉर्ड क्र. १९ मधील मटन मार्केट मागील मोकळ्या जागेवर बाराव्या वित्त आयोगांतर्गत केली. शासनाने व प्रदूषण नियंत्रण मंडळाने घनकचऱ्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक असल्याचे निर्देश दिले असल्याने बायोगॅस प्रकल्पाचे काम मार्गी लागले. ठाण्याच्या अवनी एंटरप्राईजेस या कंपनीला प्रकल्पाच्या कामाचा ठेका देण्यात आला आहे. तब्बल वर्षभर कासवगतीने काम करीत प्रकल्प कसाबसा पूर्ण झाला. भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई यांच्या निसर्गऋण प्रकल्पाच्या अहवालानुसार काम पूर्ण झाले.

सटाणा शहरात दररोज दहा टन घनकचरा निर्माण होतो. दररोज तीन टन गॅस निर्मिती क्षमतेचा प्रकल्प असल्याने शहरातील सर्व मंगल कार्यालये, लॉन्स, हॉटेल्स, उपहारगृहातील वाया जाणारा ओला कचरा, उरलेले अन्नपदार्थ, भाजीपाला, आठवडे बाजारातील व दैनंदिन बाजारातील भाजीपाला गवत व शहरातून घंटागाडीद्वारे जमा केलेला ओला व सुका कचरा, बाजार समिती आवारातील सडके कांदे, डाळिंब, द्राक्ष या प्रकल्पात कच्चा माल म्हणून वापरले जाणारे होते.संपूर्ण साचलेल्या ओल्या कचऱ्याचे बारीक तुकडे करून प्रकल्पात टाकल्यानंतर त्याचे रूपांतर स्वयंपाकाच्या गॅसमध्ये होणार होते. हे सर्व जणू काही मृगजळच ठरले आहे. टेंस्गिग पूर्ण करून प्रकल्प हस्तांतरीत करता न आल्याने तीस लाख रूपये खर्चून पालिकेला उपयोग काय, असा प्रश्न शहरवासीयांना सतावतो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images