Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

बाजारपेठेला झळाळी

$
0
0

शहरात दिवाळीच्या खरेदीसाठी गर्दी; वाहतुकीचा फज्जा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळी सणानिमित्त खरेदीसाठी शहरवासी वाहनांसह रस्त्यावर उतरल्याने शहरात वाहतुकीचा फज्जा उडाला. शहराची मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या शालिमार, रविवार कारंजा, एमजी रोड परिसरात नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. वाहतुकीचे नियोजन करताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाल्याचेही पहावयास मिळाले.

'दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा' असे म्हणतात ती काही अतिशयोक्ती नाही. गरीब असो अथवा श्रीमंत सर्वच जण या सणाची आतुरतेने वाट पहात असतात. अशा या दीपावलीला सुरूवात झाली असून, अबालवृध्दांच्या उत्साहाला भरते आले आहे. शनिवारी वसुबारस साजरी करण्यात आली. सोमवारी धनत्रयोदशी तर बुधवारी लक्ष्मीपूजन होणार असल्याने घराघरात त्याची तयारी सुरू आहे. दिवाळी निमित्त खरेदी करण्याची सवय नागरिकांमध्ये रूजली असल्याने शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले. गेल्या तीन चार दिवसांपासून बाजारपेठेत उत्साह संचारला आहे.

सातपूर आणि सिडको या मुख्य औद्योगिक वसाहतींमधील कंपन्यांना शनिवारी असलेली साप्ताहिक सुटी आणि बच्चे मंडळींच्या शाळांनाही लागलेली सुटी असा दुहेरी योग शनिवारी जुळून आल्याने कामगारवर्ग कुटूंबीयांसह खरेदीसाठी घराबाहेर पडला. बाजारपेठाही सकाळी अकरापासूनच नागरिकांच्या गर्दीने गजबजून गेल्या. खासगी वाहनांसह नागरिक खरेदीसाठी रस्त्यावर उतरल्याने सीबीएस, मेहेर, शालिमार, एमजी रोड, रविवार कारंजा, मेनरोड, पंचवटी, राजीव गांधी भवन चौकात वाहनधारकांना टप्प्या टप्प्यावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

वाहनचालकांचा बेशिस्तपणा!

दुपारी चारनंतर रस्त्यांची वाहनांची गर्दी अधिकच वाढली. किराणा, कपडे, पादत्राणे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मिठाई खरेदीसाठी सर्वाधिक गर्दी असल्याचे पहावयास मिळाले. वाहनतळांची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने मोकळी जागा दिसेल तेथे नागरिकांनी वाहने उभी केली. विशेष म्हणजे त्यामध्ये मोटरसायकलींप्रमाणेच कारची संख्याही मोठी असल्याने वाहतुकीचा प्रश्न अधिकच जटील बनला. दुकानांमध्ये खरेदीसाठी जाताना वाहने रस्त्यावरच बेशिस्तपणे उभी केली जात असल्याने शहरातील सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापालिकेच्या वतीने ‘रन फॉर स्मार्ट नाशिक’

$
0
0

नाशिक : महापालिकेच्या वतीने 'रन फॉर स्मार्ट नाशिक' व सायकल रॅलीचे रविवारी सकाळी आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली सकाळी सात वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथून निघणार असून, शहरातील क्रीडा संघटना तसेच सर्व स्तरातील विद्यार्थी, नागरिक, विविध कंपन्यातील कर्मचारी सहभागी होणार आहेत.

महापौर अशोक मुर्तडक, आयुक्त प्रवीण गेडाम, उपमहापौर गुरुमीत बग्गा, स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे यांच्यासह सर्व गटनेते, नगरसेवक या रॅलीत सहभागी होणार आहेत. धावपटू कविता राऊत, संजीवनी जाधव, किसन तडवी, सायकलपटू महाजन बंधू सहभागी होणार आहेत. या खेळाडूंचाही महापालिकेच्या वतीने गौरव करण्यात येणार आहे. 'रन फॉर नाशिक' ही रॅली हुतात्मा स्मारक, त्र्यंबकरोड मार्गे मायको सर्कल, शरणपूर पोलिस चौकी, कॅनडा कॉर्नर, कुलकर्णी गार्डन, राजीव गांधी भवन, रामायण बंगला मार्गे पुन्हा हुतात्मा स्मारकात पोहचणार आहे. शहर स्मार्ट करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पसा’मध्ये रंगली ‘बाबाज् करंडक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'लायन्स क्लब ऑफ नाशिक' आणि 'बाबाज थिएटर' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या 'बाबाज करंडक २०१५' या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा शनिवारी अंतिम टप्पा पार पडला. रंगकर्मींना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एकूण २४ संघ या स्पर्धेसाठी सहभागी झाले होते. त्यापैकी शनिवारी दोन सत्रात ११ एकांकिकांचे सादरीकरण करण्यात आले.

नाशिक येथील 'नाट्यसेवा' संस्थेनी शंतनु चंद्रात्रे लिखित 'एव्हरी डे डझ सन डे', पुण्यातील 'टी स्कूल' या संस्थेनी तीन एकांकिकांचे सादरीकरण केले. दुसऱ्या सत्रात मुंबईतील 'रंगसुगंध महाड' या संस्थेनी ऋषिकेश कोळी लिखित 'अनुत्तरीत', 'फोर्थ वॉल ठाणे' संस्थेने मोहन बनसोडेलिखित 'मित्रा' आदी एकांकिकेचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचा समारोप पारितोषिक वितरणाने झाला. यावेळी बाबाज् थिएटरचे मुख्य प्रशांत जुन्नरे, लायन्स क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष उमेश सोनवणे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरणपूरक दिवाळीचा विद्यार्थ्यांनी केला जागर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शाळांमध्ये पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यात आली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पर्यावरणपूरक दिवाळी साजरा करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत चिमुकल्यांनी दिवाळी साजरी केली.

साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ नाशिकरोड संस्थेतर्फे स्मार्टसिटीसाठी फटाकेविरहित जनजागृती अभियान राबविण्यात आले. राष्ट्रीय हरितसेना अंतर्गत इकोक्लबतर्फे या अभियानाची अंमलबजावणी करण्यात आली. या अभियानाच्या माध्यमातून विविध शाळांमध्ये तसेच नागरिकांमध्येही जनजागृती करण्यात आली. नाशिक शहरातील सुमारे ३५ शाळांमधील ७५ हजार विद्यार्थी व शिक्षकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. या अभियानास शहरवासीयांनी प्रतिसाद देऊन पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे मॅनेजिंग ट्रस्टी गणपत मुठाळ, प्रवीण जोशी, मिलिंद पांडे, प्राचार्य डी. बी. वाकचौरे आदींनी केले आहे.

राज्य सरकारअंतर्गत सामाजिक वनीकरण संचालनालयाच्या राष्ट्रीय हरित सेना उपक्रमांतर्गत दिवाळीची सुट्टी पर्यावरणाशी गट्टी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. बीज संकलन, घरच्या घरी रोपवाटिका, पक्ष्यांची यादी बनविणे, पक्ष्यांसाठी पाणपोई उघडणे व त्यांना घरकुल मिळवून देणे, जुन्या वह्यांमधील कोऱ्या कागदापासून वह्या तयार करणे आदींचा समावेश उपक्रमात करण्यात आले आहे.


`रंगुबाई जुन्नरे`त दिवाळी साजरी

नाशिक : नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित रंगुबाई जुन्नरे प्राथमिक शाळेत दिवाळी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थी नवीन कपडे घालून आले होते. स्नेहल काळे व शोभा रामिष्ट या शिक्षिकांनी यावेळी दिवाळीच्या सर्व दिवसांबद्दल व इकोफ्रेंडली दिवाळीबद्दल माहिती दिली. सामाजिक भान जपत या अनाथ बालकांनाही दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा रडके यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सचिन भालेराव, राधा देसाई, कांचन पाटील आदी उपस्थित होते.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शैक्षणिक संघटनांचा एल्गार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीच्या नेतृत्त्वाखाली कार्यरत असणाऱ्या सर्व संघटनांतर्फे विविध मागण्यांसाठी शनिवारपासून राज्यस्तरीय आंदोलनाला घंटानाद आंदोलनाने सुरुवात करण्यात आली. शिक्षकांच्या मागण्यांना सरकारकडून प्रतिसाद मिळत नसल्याने हे आंदोलन करण्यात आले. तसेच यासंबंधी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांना निवेदन देण्यात आले.

सध्या अशैक्षणिक कामांचा वाढता बोजा, शिक्षकभरती न करणे, कला व क्रीडाशिक्षकांची पदे रद्द करणे यामुळे शिक्षकांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. तसेच शालेय पोषण आहार यंत्रणा स्वतंत्र राबविणे, प्राथमिक शाळांमध्ये लिपीक व सेवकांची पदे मान्य करणे, शालेय स्तरावर २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्काचा परतावा करणे आदी मागण्याही पूर्ण होत नसल्याने याची पुन्हा एकदा आठवण सरकारी यंत्रणेला करुन देण्याच्या उद्देशाने आंदोलन करण्यात आले.

या सरकारने तरी आमच्या समस्यांना वाट करुन द्यावी, अशी मागणी यावेळी संघटनांनी केली. एकूण १८ संघटना आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. यावेळी नाशिक जिल्हा शिक्षण बचाव कृती समितीचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, रविंद्र जोशी, विलास सोनार, मोहन चकोर, अड. नितीन ठाकरे, एस. बी. देशमुख यांसह मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक लोकशाही आघाडी, संस्थाचालक आदी उपस्थित होते.


आता झोपमोड आंदोलन

१४ नोव्हेंबरला झोपमोड आंदोलन होणार असून, रात्री १० ते १२ दरम्यान लोकप्रतिनिधींच्या घरी जाऊन त्यांना निवेदन दिले जाणार आहे. त्यानंतर ३० नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता पुण्यातील शिक्षण संचालक कार्यालय, शिक्षण भवन ते शिक्षण आयुक्त कार्यालय येथे भव्य मोर्चा काढला जाणार आहे. ९ व १२ डिसेंबरला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातही आंदोलन केले जाणार आहे. १० डिसेंबरला राज्यभरात शाळा बंद ठेवण्यात येणार आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पं. वाडिकरांच्या स्वरांनी उजळणार पिंपळपार

$
0
0

संस्कृती नाशिकतर्फे हिंदुस्थानी क्लासिकलची मेजवानी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सलग दोन दशकांपासून शहरात दिग्गज गायकांना निमंत्रित करीत भारतीय शास्त्रीय संगीताचा नंदादीपतेवत ठेवणाऱ्या संस्कृती नाशिक या संस्थेने यंदाही पाडवा पहाटेचे निमित्त साधत रसिकांसाठी पं. कृष्णेंद्र वाडीकर यांची गायन पर्वणी उपलब्ध करून दिली आहे. गुरूवारी (दि.१२) पहाटे ५ वाजता ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात दीपप्रज्ज्वलन करून पाडवा पहाटेच्या किनारीला पं. वाडिकरांचे सोनेरी स्वर स्वर्ण झळाळी आणणार आहेत.

नेहरू चौकातील पिंपळपारावरील पाडवा पहाटेचे यंदा अठरावे वर्ष आहे. यंदाच्या गायन सोहळ्यात संस्कृती नाशिकने धारवाड येथील पं.कृष्णेंद्र वाडिकर यांना निमंत्रित केले आहे. पं. वाडिकर किराणा घराण्याचे गायक असून, हिंदुस्थानी क्लासिकल गायनातील नैपुण्यासाठी ते विख्यात आहेत. क्लासिकल संगीतातील ठुमरी, संत वाणी, नाट्य संगीत, दास वाणी या गायन प्रकारांसाठीही त्यांची विशेष ओळख आहे. ग्वाल्हेर घराण्याचे गायक अर्जुनसा नाकोड यांचे पं.वाडिकर हे शिष्य आहेत. नाशिकचे तबलावादक नितीन वारे हे त्यांना तबल्यावर, उमेश पुरोहित हे त्यांना संवादिनीवर, दिगंबर सोनवणे हे पखवाजवर तर अमित भालेराव हे त्यांना तालवाद्यावर साथ संगत करणार आहेत.



विवेक पाटणकर यांना संस्कृती पुरस्कार

नाशिकच्या सांस्कृतिक वर्तुळात विशेष योगदान देणाऱ्या दिग्गजांनाही पाडव्याच्या या मैफलीत गौरविण्यात येते. यंदा नाशिक संस्कृतीच्या वतीने देण्यात येणारा 'संस्कृती' हा पुरस्कार विख्यात वास्तू विशारद व ज्येष्ठ रंगकर्मी विवेक पाटणकर यांना देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष शाहू खैरे यांनी दिली. मैफलीनंतर पिंपळ पारावर यंदाच्या सिंहस्थातील निवडक क्षणचित्रांचे प्रदर्शनही मांडण्यात येणार आहे. या सांस्कृतिक मेजवानीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भूमिका टेक्निकली बांधता आली पाहिजे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भूमिका अधिक प्रभावी व सहज होण्यासाठी ती टेक्नीकली बांधून ठेवता आली पाहिजे हे श्रीराम लागूंच्या जीवनातील तत्त्वानी मोठी मदत केली. सुरुवातीला भूमिका टेक्निकली बांधणे म्हणजे काय याचा अर्थ समजत नव्हता. मात्र, चारचौघी नाटक साकारताना याचा अर्थ कळला आणि पुढे त्याचा फायदा झाला, असे उत्तर ज्येष्ठ अभिनेत्री दीपा लागू यांनी दिले.

कुसुमाग्रज स्मारकात दीपा लागू यांची मुलाखत आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुलाखतकार आशा साठे यांनी विचारलेल्या अभिनयात उत्स्फूर्तता कशी आली? या प्रश्नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या. सत्यजित दुबे यांच्या दिग्दर्शनामुळे अभिनयाला एक नवी दिशा मिळाली. ते दिग्दर्शित करीत असलेल्या 'आधे-अधुरे' या नाटकात मला भूमिका मिळाली आणि तेव्हापासून कमिटमेंट पाळणंही शिकता आलं. पहिल्याच नाटकाच्या वेळी त्यांनी नाटक तुझा श्वास असला पाहिजे, अशी शिकवण दिले. त्यामुळे कामात प्रामाणिकपणा आपोआपच भिनला. या नाटकामुळेच श्रीराम लागूंसोबत ओळख झाल्याचे त्यांनी सांगितले. नाट्यक्षेत्रात मानाचे मानले जाणाऱ्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकण्यास गेल्याचा अभाव कधीही जाणवला नाही, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. लागू यांनी अभिनय क्षेत्रातील आयुष्याबरोबरच वैयक्तिक क्षेत्रातील अनुभवही मांडले.

'सृजनसेतू' या दिवाळी अंकाचे प्रकाशन दीपा लागू, नाटककार, लेखिका आशा साठे यांच्या हस्ते झाले. सृजनशीलता व माणूस यांच्यात नातं निर्माण करण्याच्या हेतूने सेतू क्रिएशन्सतर्फे हा दिवाळी अंक प्रकाशित करण्यात आल्याचे संपादिका सीमा भानू यांनी सांगितले. प्रास्ताविक डॉ. वंदना बोकिल, तर स्वागत लोकेश शेवडे यांनी केले. जयश्री बोकिले यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंद्रप्रस्थात भरले ‘सृजन साधना’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महानगरपालिका व अश्विनी देशपांडे यांच्या संयुक्त विद्यमाने 'सृजन साधना' या हस्तकला व कलाकुसरीच्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उदघाटन शुक्रवारी महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते करण्यात आले. महिलांनी तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंना तसेच व्यावसायिक म्हणून विकसित होऊ पाहत असलेल्या महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

गृहसजावटीच्या वस्तू, खाद्यपदार्थ, पर्सेस, ज्वेलरी, फोटो फ्रेम्स, कॅण्डल्स, हस्तकलेच्या वस्तू आदींचा समावेश या प्रदर्शनात करण्यात आल्या आहेत. तसेच दिवाळीनिमित्त आवश्यक असलेल्या सर्व लहान-मोठ्या वस्तूंचा समावेशही येथे करण्यात आला आहे. ६० स्टॉल्स येथे असून दैनंदिन जीवनासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी येथे मिळतील अशी व्यवस्था येथे करण्यात आली आहे. उदघाटनाला उपमहापौर गुरुमीत बग्गा, योगिता आहेर, तानाजी जायभावे, शशी जाधव आदी उपस्थित होते. हे प्रदर्शन ८ नोव्हेंबरपर्यंत इंद्रप्रस्थ हॉलमध्ये सुरू राहिल.

अतिशय कमी कालावधीत नियोजिलेल्या हे प्रदर्शन कौतुकास्पद आहे. येत्या ६ महिन्यांत मोठ्या स्तरावर असे प्रदर्शन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.

- अशोक मुर्तडक

महापौर

महापालिकेच्या सहकार्यामुळे प्रदर्शनाच्या आयोजनाला गती मिळाली. ही गती निश्चितच स्मार्ट सिटीच्या दिशेने

उचललेले सकारात्मक पाऊल आहे. महिलांनाही याद्वारे व्यवसायाचा आत्मविश्वास येईल, असा विश्वास

वाटतो.

- अश्विनी देशपांडे

आयोजिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नगरसेवकांचा हल्लाबोल!

$
0
0

मराठवाड्याला पाणी देऊ नये म्हणून पालिका करणार रिटपीटीशन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या हक्काचे पाणी जायकवाडीला दिले जात असल्याने संतप्त झालेल्या पालिकेतील नगरसेवकांनी तत्काळ महासभा घेऊन शासनावर हल्लाबोल केला. सहा तास चाललेल्या महासभेत नगरसेवकांनी भाजप आमदारांसह सरकारचे धिंडवडे काढत, नाशिककरांना सापत्न वागणूक दिली जात असल्याच्या भावना व्यक्त केली. विसर्ग तत्काळ थांबवून पाण्याच्या फेरनियोजनासाठी हायकोर्टात रिटपिटीशन दाखल करण्याचा निर्णय शनिवारी महासभेत घेण्यात आला. दुसरीकडे पाण्याचा विसर्ग थांबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतलेल्या आमदारांची निराशा झाली आहे. 'पुढील काळात काळजी घेऊ' अशी बोळवण करीत मुख्यमंत्र्यांनी हात झटकले.

नाशिकच्या हक्काचे पाणी जायकवाडीला सोडण्याविरोधात महापौर अशोक मुर्तडक यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची विशेष महासभा झाली. अपेक्षेप्रमाणे सर्वपक्षीय नगरसेवकांनी भाजप आमदार व राज्य सरकारवर हल्लाबोल केला. तर अवसान गळालेल्या भाजप नगरसेवकांनी पाणी आंदोलनात महापौरासोबत असल्याचा दावा केला. पाणी आंदोलनासाठी आमंत्रणाची वाट पाहणाऱ्या आमदारांना सर्वपक्षीय नगरसेवकांनी झोडपून काढले.

३९ नगरसेवकांनी या प्रश्नावर संतप्त भावना व्यक्त करत, नाशिकच्या पाण्यासाठी काहीही करण्याची तयारी दर्शवली. पालकमंत्री गिरीश महाजन कुंभकर्ण असल्यापासून ते मराठवाड्यातील ब‌ियर व बिसलरीचे उद्योग पोसण्यासाठी हक्काचे पाणी पळवून नेले जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. जपानच्या उद्योगाची भरभराट करण्यासाठी नाशिकचे दोन हजार कोटीचे नुकसान होणार असल्याचा दावा नगरसेवकांनी केला. तर सभागृहात सरकारविरोधात फलक झळकवण्यात आले. महापौरांनीही सरकार आमच्याशी पक्षपातीपणे वागत असल्याचा आरोप केला. दरम्यान आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, दीपिका चव्हाण यांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मात्र पाणी थांबवता येणार नसल्याचे सांगत 'भविष्यात काळजी घेऊ' अशी बोळवण केली.

प्राधिकरणावर दबाव की सावध पवित्रा?

मराठवाड्याला नाशिक आणि नगरमधून पाणी सोडण्यासंदर्भातील याचिकेवरील निकाल महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने शनिवारीही जाहीर केला नाही. त्यामुळे प्राधिकरणावर निर्णय देण्यास दबाव आहे की प्राधिकरणाचा हा सावध पवित्रा, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

जायकवाडीला पाणी देण्याबाबत नाशिक आणि नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात विरोध झाला आहे. याद्वारेच मुंबई उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल झाली. तसेच, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडेही याचिका दाखल करण्यात आली. प्राधिकरणाने याचिकाकर्त्यांचे म्हणणे गुरुवारी ऐकून घेतले. निकाल शुक्रवारी देण्याचे प्राधिकरणाने जाहीर केले. मात्र, शुक्रवारीही तो जाहीर न झाल्याने शनिवारी निकाल जाहीर होईल, असे सांगितले जात होते. मात्र, शनिवारीही पुन्हा तोच प्रकार घडला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उच्च न्यायालयातील सुनावणी १७ डिसेंबरऐवजी १८ नोव्हेंबरला होणार आहे. या सुनावणीचाच धसका प्राधिकरणाने घेतला आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. न्यायालयाच्या कचाट्यात सापडू नये, यासाठीच सावध पवित्रा घेऊन निकाल जाहीर करण्यावर प्राधिकरणाचा भर असल्याचे समजते.


संकट नव्हे; सुलतानी आक्रमण

उपमहापौर गुरूमित बग्गा यांनी आक्रमक भाषण करत 'समान पाणीवाटपाचे धोरण हे संकट नसून आपल्यावरील सुलतानी आक्रमण आहे. यामुळे आत्महत्या नव्हे; तर हत्या होतील अशी स्थिती निर्माण होईल. नाशिककरांचा हिसका दाखविण्याची वेळ आली आहे. सरकाचा उद्दामपणा काढून घेण्याची क्षमता ही नाशिककरांमध्ये आहे.' ज्वालामुखीच्या उद्रेकाची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा बग्गा यांनी भाजप आमदारांसह सरकारला दिला.


आठ दिवस पाणीकपात रद्द

एकीकडे पाणी पळवून नेण्यावरून सभागृहात महाभारत रंगले असताना, महापौरांनी दिवाळीनिम‌ित्त आठ दिवस पाणीकपात तात्पुरती रद्द केली आहे. पाण्याचा अंदाज लक्षात घेऊन नागरिकांना दिवाळीत त्रास होऊ नये म्हणून अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यामुळे दिवाळीत नाशिककरांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मविप्रमध्ये आता पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पोलिस भरतीसारख्या संधींमध्ये शहर व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनाही योग्य संख्येने स्थान मिळावे, यासाठी मविप्रमध्ये पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. 'ना नफा, ना तोटा' तत्वावर ते केटीएचएम कॉलेजमध्ये सुरू होणार आहे. नंतरच्या टप्प्यात तालुका स्तरावर हे केंद्र सुरू होणार आहे.

विद्यार्थ्यांना वर्षभर लेखी व मैदानी अशा दोन्हीही प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येईल. पुरूषांसाठी १०० मीटर धावणे, गोळा फेक, लांब उडी, पूल अप्स, १६०० मीटर धावणे महिलांसाठी १०० मीटर धावणे, गोळा फेक, लांब उडी, ८०० मीटर धावणे या सरावाचा समावेश असेल. लेखी चाचणीसाठी अंक गणित, मराठी व्याकरण, बुध्दीमत्ता, सामान्य ज्ञान याबरोबरच इतिहास, भूगोल, विज्ञान, राज्यघटना, ग्राम प्रशासन, अर्थशास्त्र, समाज सुधारक, संगणक आदी विषयांबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. विद्यार्थ्यांना अद्यावत मैदान, उच्च प्रतीची साधनसामुग्री, तज्ज्ञ मार्गदर्शक, योगा प्रशिक्षण, आहार तज्ज्ञांचे मार्गदर्शन आदी सुविधा पुरविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंद्रप्रस्थात भरले 'सृजन साधना'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महानगरपालिका व अश्विनी देशपांडे यांच्या संयुक्त विद्यमाने 'सृजन साधना' या हस्तकला व कलाकुसरीच्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उदघाटन शुक्रवारी महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते करण्यात आले. महिलांनी तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंना तसेच व्यावसायिक म्हणून विकसित होऊ पाहत असलेल्या महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

गृहसजावटीच्या वस्तू, खाद्यपदार्थ, पर्सेस, ज्वेलरी, फोटो फ्रेम्स, कॅण्डल्स, हस्तकलेच्या वस्तू आदींचा समावेश या प्रदर्शनात करण्यात आल्या आहेत. तसेच दिवाळीनिमित्त आवश्यक असलेल्या सर्व लहान-मोठ्या वस्तूंचा समावेशही येथे करण्यात आला आहे. ६० स्टॉल्स येथे असून दैनंदिन जीवनासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी येथे मिळतील अशी व्यवस्था येथे करण्यात आली आहे. उदघाटनाला उपमहापौर गुरुमीत बग्गा, योगिता आहेर, तानाजी जायभावे, शशी जाधव आदी उपस्थित होते. हे प्रदर्शन ८ नोव्हेंबरपर्यंत इंद्रप्रस्थ हॉलमध्ये सुरू राहिल.

अतिशय कमी कालावधीत नियोजिलेल्या हे प्रदर्शन कौतुकास्पद आहे. येत्या ६ महिन्यांत मोठ्या स्तरावर असे प्रदर्शन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.

- अशोक मुर्तडक

महापौर

महापालिकेच्या सहकार्यामुळे प्रदर्शनाच्या आयोजनाला गती मिळाली. ही गती निश्चितच स्मार्ट सिटीच्या दिशेने

उचललेले सकारात्मक पाऊल आहे. महिलांनाही याद्वारे व्यवसायाचा आत्मविश्वास येईल, असा विश्वास

वाटतो.

- अश्विनी देशपांडे

आयोजिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोखा प्रदूषण; अन्यथा भरा दंड!

$
0
0

bhavesh.brahmankar@timesgroup.com

नाशिक : प्रदूषण करणारेच आता यापुढे दोषी ठरणार असून, त्यासाठीची तजवीज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) केली आहे. ग्रीन ट्रिब्यूनलच्या निर्देशानुसार एमपीसीबीने पर्यावरण कायद्याच्या अंमलबजावणीसाठीचा कृती आराखडा प्रसिद्ध केला आहे. त्यात 'पोल्यूटर टू पे' याच तत्त्वाला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे.

हवा, पाणी आणि जमीन यांच्या प्रदूषणाचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढत आहे. त्या तुलनेत प्रदूषण रोखण्याच्‍या उपाययोजना कमी पडत आहेत. त्यामुळेच कोर्टात याचिका दाखल होण्यासह विविध प्रकारच्या अपर्यावरणीय प्रकारांबाबतच्या सुनावणीही वाढत आहेत. विविध प्रकारचे पर्यावरणीय कायदे अस्तित्वात असले तरी त्याचा कुठलाही परिणाम प्रदूषण रोखणे किंवा बंद करण्यावर होत नसल्याची बाब पुण्यातील ग्रीन ट्रिब्यूनलच्या निदर्शनास आली.

त्यामुळेच पर्यावरण कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भातील सर्वंकष धोरण (एन्फोर्समेंट पॉलिसी) तयार करावे, असे निर्देश ट्रिब्यूनलने गेल्या वर्षी एमपीसीबीला दिले. त्यानुसार एमपीसीबीने या धोरणाचा मसुदा तयार केला आहे. एमपीसीबीच्या वेबसाइटवर हा मसुदा सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यात पोल्यूटर टू पे अर्थात प्रदूषण करणारेच भरणार दंड या तत्त्वावर अधिक भर देण्यात आला आहे. या तत्त्वानुसार प्रदूषण करणाऱ्यास दंड, नोटीस किंवा अन्य इतर कारवाईला सामोरे जावे लागेल.

प्रदूषण करणाऱ्या उद्योगांना नोटीस बजावण्यासह विविध प्रकारची कारवाई केली जाते. तसेच, परवान्यांचे नूतनीकरणही करताना फारशी काळजी घेतली जात नाही. म्हणूनच येत्या काळात ही सारीच प्रक्रिया पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक कडक केली जाणार आहे. त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांकडून होणाऱ्या प्रदूषणापोटी कारवाई करण्यातही अडचणी येतात. मात्र, नवीन मसुद्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांवर कडक कारवाई होणार आहे. तसेच, बँक गॅरंटीसंदर्भातील अनेक नियम कडक होतानाच एमपीसीबीकडून दिल्या जाणाऱ्या संमतीपत्राचे (कन्सेन्ट) निकषही वाढणार असल्याचे मसुद्यात नमूद आहे.

पर्यावरण कायद्याच्या अंमलबजावणीचे धोरणाचा मसुदा आम्ही तयार केला आहे. हा मसुदा http://mpcb.gov.in/legal/legal.php या लिंकवर सर्वांसाठी उपलब्ध आहे. नागरिकांच्या काही सूचना किंवा हरकती असतील तर त्यांनी त्या आवर्जून द्यावात.

- पी. अनबलगन,

सदस्य सचिव, एमपीसीबी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठमोळ्या अजिंक्यची अॅपलसोबत भरारी!

$
0
0

वय अवघे २० वर्षाचे; वेतन २ कोटी रूपये!

अरविंद जाधव, नाशिक

वड‌िलांचे चप्पलांचे दुकान. घरात कम्प्युटरचा अर्थाअर्थी संबंध नाही. मात्र, असे असताना अजिंक्य शिवाजी लोहकरे या विद्यार्थ्याने फिनिक्स भरारी घेत थेट जगभरातील विख्यात कंपन्यांना आपल्या दारात उभे केले. त्यातील अॅपलने त्याला वार्षिक २ कोटी रूपये पॅकेज देण्याचे मान्य केले असून, याच महिन्यात तो कंपनीसोबत आपले काम सुरु करणार आहे.

कम्प्युटर इंजिनीअरिंगचे शिक्षण घेणारा अंजिक्य मुळचा अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे राहणारा. १२ वीपर्यंत तेथेच शिक्षण पूर्ण केल्यानंतर इंजिनीअरिंगसाठी तो नाशिकमधील भुजबळ नॉलेज सिटी कॉलेजमध्ये दाखल झाला. घरात कम्प्युटरबाबत तसे कोणतेही वातावरण नव्हते. त्यामुळे इंजिनीअरिंग कॉलेजला प्रवेश करेपर्यंत कम्प्युटर किंवा लॅपटॉप तेवढ्या विश्वासाने चालवता येत नव्हते, असे अजिंक्यने सांगितले. मात्र, हार्डवेअर, सॉफ्टवेअर किंवा विविध अॅप्ल‌िकेशन यात हळूहळू रस निर्माण झाला. त्यातूनच मग अजिंक्यने 'एजेबूक' हे एक सॉफ्टवेअर आणि अॅप्लिकेशन तयार केले. इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षात असताना तयार केलेल्या या अॅप्लिकेशनबाबत त्याने काही दिग्गज कंपन्यांना माहिती दिली. व्हॉटसअॅप किंवा फेसबुकला टक्कर देण्याची क्षमता असलेल्या या सॉफ्टवेअरची दखल खुद्द फेसबुकने घेतली. त्यानंतर विप्रो, इन्फोसिस आदी कंपन्यांनी त्याच्याशी बोलणी सुरू केली. मात्र, अजिंक्यने थांबून घेण्याचा निर्णय घेतला. फेसबुकने त्याला १ कोटी ६७ लाख रूपयांची ऑफर दिली होती. शेवटी अजिंक्यला २ कोटी रुपये वार्षिक पॅकेज व इतर सवलती देत अॅपलने जवळ केले. २४ नोव्हेंबरपासून अजिंक्य पुणे येथील कार्यालयात रुजू होणार आहे. शिक्षणात खंड पडू नये म्हणून तो बाहेरुन आपले तिसऱ्या वर्षाची तयारी देखील करीत आहे.


अजिंक्यचे 'एजेबुक'

व्हॉटसअॅपमध्ये फक्त १०० एमबीपर्यंत डाटाशेअरिंग करता येते. मात्र, एजेबुकमध्ये २ जीबीपर्यंत डाटा शेअरिंग होऊ शकतो. ​विशेष म्हणजे यात इंटरनेट कनेक्शन हवेच असे नाही. इंटरनेट नसताना साडेतीन किलोमीटरपर्यंतच्या अंतरात दोन डिव्हाईस कनेक्ट होऊन डाटा शेअरिंग होऊ शकते. एखादा मॅसेज फॉरवर्ड करताना तो प्रत्येक वेळेस फॉरवर्ड करावा लागतो. तेच एजेबुकमध्ये सर्वांना एकादच फॉरवर्ड करण्याची सुविधा आहे. फेसबुक किंवा व्हॉटस अॅप मॅसेजशी स्पर्धा करण्याच्या दृष्टीने यात फिचर उपलब्ध असून २०१६ मध्ये हे कार्यन्वित होऊ शकते.

अशा प्रकारचे अॅप बनवणारा पहिलाच विद्यार्थी असल्याचा अभिमान वाटतो.

- अजिंक्य लोहकरे, इंजिनीअर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पं. वाडिकरांच्या स्वरांनी उजळणार पिंपळपार

$
0
0

संस्कृती नाशिकतर्फे हिंदुस्थानी क्लासिकलची मेजवानी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सलग दोन दशकांपासून शहरात दिग्गज गायकांना निमंत्रित करीत भारतीय शास्त्रीय संगीताचा नंदादीपतेवत ठेवणाऱ्या संस्कृती नाशिक या संस्थेने यंदाही पाडवा पहाटेचे निमित्त साधत रसिकांसाठी पं. कृष्णेंद्र वाडीकर यांची गायन पर्वणी उपलब्ध करून दिली आहे. गुरूवारी (दि.१२) पहाटे ५ वाजता ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात दीपप्रज्ज्वलन करून पाडवा पहाटेच्या किनारीला पं. वाडिकरांचे सोनेरी स्वर स्वर्ण झळाळी आणणार आहेत.

नेहरू चौकातील पिंपळपारावरील पाडवा पहाटेचे यंदा अठरावे वर्ष आहे. यंदाच्या गायन सोहळ्यात संस्कृती नाशिकने धारवाड येथील पं.कृष्णेंद्र वाडिकर यांना निमंत्रित केले आहे. पं. वाडिकर किराणा घराण्याचे गायक असून, हिंदुस्थानी क्लासिकल गायनातील नैपुण्यासाठी ते विख्यात आहेत. क्लासिकल संगीतातील ठुमरी, संत वाणी, नाट्य संगीत, दास वाणी या गायन प्रकारांसाठीही त्यांची विशेष ओळख आहे. ग्वाल्हेर घराण्याचे गायक अर्जुनसा नाकोड यांचे पं.वाडिकर हे शिष्य आहेत. नाशिकचे तबलावादक नितीन वारे हे त्यांना तबल्यावर, उमेश पुरोहित हे त्यांना संवादिनीवर, दिगंबर सोनवणे हे पखवाजवर तर अमित भालेराव हे त्यांना तालवाद्यावर साथ संगत करणार आहेत.


विवेक पाटणकर यांना संस्कृती पुरस्कार

नाशिकच्या सांस्कृतिक वर्तुळात विशेष योगदान देणाऱ्या दिग्गजांनाही पाडव्याच्या या मैफलीत गौरविण्यात येते. यंदा नाशिक संस्कृतीच्या वतीने देण्यात येणारा 'संस्कृती' हा पुरस्कार विख्यात वास्तू विशारद व ज्येष्ठ रंगकर्मी विवेक पाटणकर यांना देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष शाहू खैरे यांनी दिली. मैफलीनंतर पिंपळ पारावर यंदाच्या सिंहस्थातील निवडक क्षणचित्रांचे प्रदर्शनही मांडण्यात येणार आहे. या सांस्कृतिक मेजवानीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोप-प्रत्यारोपांच्या झडल्या फैरी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जायकवाडीला पाणी देण्याविरोधात तब्बल सहा तास चाललेल्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी भाजपला कोंडीत पकडत आमदारांसह पक्षाचे वस्रहरण केले. हक्काच्या पाण्यासाठी नगरसेवकांनी पक्षभेद विसरत एकत्रित येऊन लढा उभारण्याचा पवित्रा घेतला. सभागृहात नगरसेवकांनी एकमेकांची उणीदुणी काढण्याची संधी सोडली नाही. पाण्याच्या प्रश्नावर राजकारण करू नका असे सांगत सर्वानीच एकमेकांचे चेहरे उघडे पाडण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे सभागृहाला आखाड्याचे रूप मिळाले होते.

पाणीप्रश्नावर भाजपने ऐनवेळी नरो वा कुंजरोची भूमिका घेतल्याने भाजपला उघडे पाडण्याची एकही संधी नगरसेवकांनी सोडली नाही. महापौर अशोक मुर्तडक, शिवसेना गटनेता अजय बोरस्ते व शिवसेना आमदार अनिल कदम यांचे जाहीर कौतुक करीत भाजपला दुषणे दिली. पाण्याची दाहकता दाखवत भाजपवर आरोपाची एकही संधी नगरसेवकांनी सोडली नाही. शिवसेनेच्या अजय बोरस्ते यांनी सर्वपक्षभेद विसरून या अन्यायाविरोधात राजकीय व न्यायालयीन लढाई लढू असे सांगत वर्धापन दिनालाचा आंदोलनाची दुर्दैवी वेळ आल्याची टीका केली.

कौतुकाची थाप

पाण्याच्या प्रश्नावर प्रथम नागरिक म्हणून पुढाकार घेणाऱ्या महापौर अशोक मुर्तडक यांचे सभागृहातील सर्वच नगरसेवकांनी कौतुक केले. बोस्टनवरून परत येताच त्यांनी पाण्यासाठी रस्त्यावर उतरून सर्वपक्षीयांना सोबत घेऊन आंदोलन उभे केले. पाणी आंदोलनासाठी त्यांनी केलेली धावपळ ही निश्चित कौतुकास्पद असल्याचे उद्गार सर्वच सदस्यांनी काढले. शहरवासीयांच्या पाण्यासाठी महापौरांचा पुढाकार हा भूषणावाह असल्याचा दावा नगरसेवकांनी केला तर, दुसरीकडे भाजपसह आमदारांचा निषेध केला.

भुजबळ फार्महाऊसवर जाणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांवर टीका करणाऱ्या आमदार देवयानी फरांदे यांनी नगरसेवक सचिन महाजन यांना चांगलेच सुनावले. तसेच आपण बराच काळ आमच्या सोबत होता. आमच्या घरातही तुम्ही यायच्यात असे सांगत तुमच्या पोटात आता का दुखते असा सवाल महाजन यांनी उपस्थित केला. छगन भुजबळांच्या नावाने बोटे मोडण्यापेक्षा भुजबळांना जे जमले नाही ते भाजप आमदारांना का जमत नाही, असा सवाल त्यांनी केला.

मराठवाड्याची सुपारी!

या महासभेत बोलताना काँग्रेसचे नगरसेवक शाहू खैरे यांनी मराठवाड्यात हजारो शेतकरी पाणी वापरत आहेत. मात्र दिवाळीत आपल्यावर पाणीकपातीचे संटक आले आहे. हा आमचा गुन्हा झाला आहे. गोदावरी प्रदूषणात कधी उच्च न्यायालयाचे आदेश पाळले नाहीत. मात्र, आताच आदेश पाळले जात आहेत, असे सांगत कोणीतरी पाणी सोडण्यासाठी मोठी सुपारी वाजवल्याचा आरोप त्यांनी सभागृहात केला.

मंत्रिमंडळ विस्ताराची भीती

महासभेत स्थायी समिती अध्यक्ष शिवाजी चुंभळे यानी भाजपच्या आमदारांवर चांगलेच टीकास्र सोडले. आमदार आपल्या कर्तव्यापासून दूर गेल्याने त्यांनी जनतेचा मनस्ताप ओढवून घेतला आहे. आगामी काळात मंत्रिमंडळाचा विस्तार आहे. त्यामुळे कदाचित पद मिळावे यासाठी ते गप्प बसल्याची टीका त्यांनी केली. आता तुम्ही २०१७ ची स्वप्ने पाहू नका, असा टोला लगावत तुम्हाला जनता माफ करणार नाही असा इशारा दिला.

अन् शेवट ३८ ने!

पाण्याच्या ज्वलंत प्रश्नावर महासभा बोलावली असताना नगरसेवकांनी त्यातही उदासीनता दाखवली. महासभेत १२७ नगरसेवक आहेत. प्रत्यक्षात हजेरी ८९ नगरसेवकांनी लावली, तर शेवटपर्यंत निम्मेच म्हणजे ३८ नगरसेवक उपस्थित राहिले. महासभेत ३९ नगरसेवकांनी आपली भूमिका मांडली. काहींनी काढता पाय घेतला. महापौरांनी चाप लावला तरी नगरसेवकांचे पलायन सुरूच होते.

भाजपची गोची

सभागृहात सर्वाधिक हल्लाबोल झाला तो भाजप आमदार व सरकारवर. त्यामुळे या आक्रमणाचा सामना करताना भाजपचे गटनेते संभाजी मोरूस्कर यांची तारांबळ उडाली. ज्या आमदारांना निवडून दिले, त्यांनीच पाठ फिरवल्याने नगरसेवक आक्रमक झाले होते. थेट भाजपचेच धिंडवडे नगरसेवकांनी काढत पालकमंत्री, मुख्यमंत्री यांनाही टीकेचे धनी केले. मात्र, आम्ही महापौरांसोबत असल्याचे सांगत पाणी आंदोलनावर सोबत असल्याचे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.

पालकमंत्री कुंभकर्ण

मनसे जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी पालकमंत्र्यांवरच हल्लाबोल केला. पालकमंत्री कुंभकर्णासारखे झोपी गेल्याचा आरोप करीत पालकमंत्री उपरा मिळाल्याने व त्यांनी झोपेचे सोंग घेतल्यानेच हाल झाल्याचा आरोप सुदाम कोंबडे व वंदना बिरारी यांनी केला. या वक्तव्यावरून सभेत वादंग झाला..

पाटलांचे आंदोलन

सभागृहात भाजपचे नगरेसवक दिनकर पाटील यांनी सभागृहातच भाजपविरोधात भूमिका घेत थेट आंदोलन करण्याची सूचना केली. सभागृहात आंदोलन करून सरकारला जाग आणून देऊ, अशी विनंती त्यांनी केली. शिवसेनेच्या नेत्यांनी चांगले केले असे सांगत आमच्या आमदारांचे आता विचारूच नका असा टोलाही त्यांनी स्वपक्षीयांना लगावला. जनतेचा कळवळा असेल तर थेट आंदोलन करा, असे आव्हानच त्यांनी सर्वांना दिले. सभागृहात आंदोलन करण्याची केलेली घोषणा त्यांनी मागे घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पत्ता विचारण्याच्या बहाण्याने चेन स्नॅचिंग

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पायी जाणाऱ्या वृद्धेस पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून दुचाकीवरील दोघा संशयितांनी तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडून पळ काढला. ही घटना शिवाजीनगर येथील विद्युत कॉलनी परिसरात घडली. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

शिवाजीनगर येथे राहणाऱ्या कमल रामदास गायकवाड (वय ७३) या शुक्रवारी सायंकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घराजवळून पायी जात होत्या. त्यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून दोन संशयित त्यांच्याजवळ आले. संशयितांनी गायकवाड यांना पत्ता विचारण्याचा बहाणा करीत त्यांचे लक्ष विचलित केले. त्याचवेळी एका संशयिताने गायकवाड यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडून पळ काढला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कसाबसा उरकला उद्‍घाटन सोहळा

$
0
0

चित्रपट महामंडळ कार्यालयाच्या पदरी उपेक्षाच

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दीर्घप्रतीक्षेनंतर दिवाळीच्या मुहूर्तावर नाशिकमध्ये साकारलेल्या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या कार्यालयाच्या उद्‍घाटन सोहळ्याने रसिक प्रेक्षकांचा भ्रमनिरास केला. चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचा वारसा सांगणाऱ्या नाशिक नगरीने महामंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या पदरी पदार्पणातच उपेक्षेचे दान टाकले आहे.

कशाबशा उरकलेल्या या सोहळ्याकडे प्रशासन पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनीही पाठ फिरवली. धावपळीच्या जगण्यातही चित्रपटासारख्या सर्जनशील कलाकृतीसाठी थोडा वेळ काढण्याचे आवाहन करणाऱ्या चित्रपट महामंडळाकडे उद्‍घाटन सोहळ्याला द्यायला पुरेसा वेळ नसल्याची खंत या प्रकारामुळे व्यक्त होत आहे. चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांची जन्म व कर्मभूमी असलेल्या नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे वर्षानुवर्षे कार्यालयच नव्हते. मात्र, खासदार हेमंत गोडसे यांच्या पुढाकारानंतर शालिमार सारख्या शहराच्या केंद्रस्थानी महामंडळाच्या विभागीय कार्यालयासाठी जागा मिळाली. शनिवारी (७ नोव्हेंबर ) उद्‍घाटन कार्यक्रम घेण्याचे ठरले. अतिशय आकर्षक निमंत्रण पत्रिका छापण्यात आली. अभिनेत्री अलका कुबल यांनी स्वीकारलेले निमंत्रण या वैशिष्ट्यांमुळे या कार्यक्रमाची उंची वाढली. कार्यालयात आणि कार्यालयाबाहेरही केवळ कार्यकर्त्यांचाच भरणा असल्याने प्रमुख पाहुण्यांना वाट काढत कार्यालयात येणेही अवघड झाले. अभिनेत्री अल्का कुबल आणि खासदार गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत फित कापून कार्यालयाचे उद्‍घाटन कसेबसे उरकले गेले. मात्र, चित्रपट महर्षींच्या भूमीतील या सोहळ्याच्या पदरी पडलेली उपेक्षा रसिक मनाला नाराजीची झालर देऊन गेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

$
0
0

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

म. टा. प्रतिनिधी

प्रेयसीच्या लहान मुलीवरच अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाविरोधात नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितास विरोध करतानाच आईकडे मदत मागितली असता आईनेही याकडे दुर्लक्ष केल्याची गंभीर बाब या प्रकरणात समोर आली. चेहडी बुद्रुक येथील ताजनपुरे मळा येथे राहणाऱ्या संशयिताचे नाव शरद पुंजा जाधव (वय ३५) असे असून, या संशयिताविरोधात विनयभंगाची फिर्याद दाखल केली आहे. पळसे येथील फुलेनगर परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेसोबत संशयित जाधवचे प्रेमसंबंध आहे. या विवाहितेस १४ वर्षाची मुलगी असून, शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास जाधव याने मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. झोपेत असलेल्या मुलीला जाग आली व तिने भीतीपोटी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. आईला मदतीसाठी आवाज दिले मात्र, आईने प्रतिसाद दिला नाही. मुलीच्या आरडाओरडीमुळे संशयित पसार झाला. यापूर्वीही संशयिताने मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडित मुलीने तक्रारीत केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योग, पाणीप्रश्न सोडविण्याचे आव्हान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य मंत्रिमंडळात सहकार राज्यमंत्रिपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर दादा भुसे यांच्याकडून मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात उंचावल्या आहेत. विकासापासून वंचित असलेल्या तालुक्यात विकासाची गंगा वाहती होईल, अशी अपेक्षा मतदार बाळगून आहेत. जिल्हा निर्मितीचे भिजत घोंगडे मार्गी लावण्याबरोबरच रोजगार वाढीसाठी उपयुक्त असलेला औद्योगिक वसाहतींचा प्रश्न, पिण्याचे पाणी तसेच शेती सिंचनाचा प्रश्न सोडविण्याचे आव्हान ना. भुसे यांच्यापुढे आहे.

सलग तिसऱ्यांदा संधी मिळाल्याने ना. भुसे यांनी आजवर मतदारसंघात छोटी-मोठी अनेक कामे केली. मात्र, मतदारसंघाच्या विकासासाठी लक्षवेधी कामे होऊ शकलेली नाहीत. मालेगावात औद्योगिक वसाहतींची आजही प्रतीक्षा आहे. पिण्याचे पाणी उपलब्ध होत असले तरी शेती सिंचनाचा प्रश्न आ वासून उभा आहे. वर्षभरात आमदार निधीसाठी मिळणारा निधीही ते पूर्ण खर्च करू शकलेले नाहीत. मतदारसंघात आतापर्यत सुमारे ३३ लाख ११ हजार रुपयांची कामे केली आहेत. यामुळे मतदारसंघातील पायाभूत कामेही होऊ शकलेली नाहीत. मात्र, वर्षभरात त्यांनी ८० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळवली आहे. या निधीतील काही कामे प्रगतीपथावर आहेत. ही कामे पूर्ण झाल्यास मालेगाव बाह्य मतदारसंघाच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे.

अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्याचे कामकाज वडनेर उपविभागाला जोडण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून मंजुरी मिळवली. तसेच, मालेगाव महापालिकेच्या हद्दवाढ झालेल्या भागात मूलभूत सुविधांच्या विकासासाठी विशेष अनुदान म्हणून १४.५५ कोटी रुपये मंजूर करून घेतले आहेत. तळवाडे धरणाची क्षमता वाढविण्यासाठी ५.८० कोटी, उर्दू घर बांधण्यासाठी चार कोटी, अभ्यासिकेचे काम पूर्णत्वाकडे आहे. तालुका क्रीडा संकुल आंतरखेळ काम सुरू आहे. राज्यमार्ग व जिल्हा आणि इतरमार्गाचे कामांना मंजुरी मिळवली आहे. एस. सी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी निधी मंजूर करून घेतला आहे. तसेच आदिवासी विकास ठक्कर बाप्पा, २५१५ गाव अंतर्गत कामे, क्रीडांगण कंपाऊंड, इन्फ्रा-२ अंतर्गत कामांना मंजुरी मिळवली आहे. तसेच, तळवाडे येथे ३३ केव्हीच्या सबस्टेशनचे काम सुरू आहे.

मालेगाव जिल्हा निर्मितीचा मुद्दा गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीत लक्षवेधी ठरला आहे. मालेगावला मंत्रिपद मिळाल्याने तरी हा प्रश्न मार्गी लागेल, अशी मतदारांना अपेक्षा आहे. यामुळे ना. भुसे यांच्यापुढे सद्यस्थितीत तरी जिल्हा निर्मितीचे मोठे आव्हान आहे. तसेच, गिरणा धरणाच्या पाण्याचा प्रश्नही सध्या ऐरणीवर आला आहे. यामुळे जळगाव व मालेगावमध्ये पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे आहेत. यावर ना. भुसे यांना मालेगावचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ठोस पावले उचलावी लागणार आहेत.

भुसे यांनी अनेक कामांचा आढावा घेतला असून, अनेक कामे प्रस्तावित आहेत. यामध्ये महिला रुग्णालय, पश्चिम भागत अश्निशमन केंद्र सुरू करणे, भूमी अभिलेख केंद्र सुरू करणे, शहरातील रस्ते रुंदीकरण, मनपा हद्दवाडीतील ५९ कर्मचारी सामावून घेणे, मालेगावला भुयारी गटार योजना, पूरपाणी कालवे, नवीन सबस्टेशन, शेती महामंडळाच्या जमिनीवर औद्योगिक वसाहत सुरू करण्यासाठी पाठपुरावा, आदिवासी विकास उपकार्यालय सुरू करणे, केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत कामांचा पाठपुरावा करणे आदी कामे प्रस्तावित आहेत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्ज रक्कमेच्या दुप्पटीहून अधिक वसुली न करण्याचा निर्णय घेऊन तातडीने अमंलबजावणी करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच, कागदोपत्री असलेल्या सहकारी संस्थांची तपासणी करून तसेच मतदानापुरतीच संस्था म्हणून कार्यरत असलेल्या संस्थांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, विविध संस्थांमधील ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित करण्यासाठी पावले उचलण्यात येण्यात आहेत. ठेवी सुरक्षित राहण्यासाठी येत्या अधिवेशनात कायदा करण्याचे विचाराधीन आहे, असे ना. भुसे यांनी सांगितले.

विशेष करून मालेगावमध्ये उद्योग धंदे स्थापन करण्यावर भर दिला आहे. शेती महामंडळाच्या जमिनीवर औद्योगिक वसाहत स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिल्हा निर्मितीसाठी प्रयत्न सुरू आहेत. सरकारच्या धारेणानुसार हा प्रश्नही मार्गी लागेल. सहकारी कारखाने विकण्याचे गेल्या सरकारचे धोरण होत, त्यातूनच गिरणा कारखान्याची विक्री झाली. सहकारी साखर कारखाने सुरू करण्यासाठी काही नवीन प्रस्ताव विचाराधीन आहेत. मालेगावचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.

- दादा भुसे, सहकार राज्यमंत्री

गेली दहा वर्षे विरोधी पक्षात असल्यामुळे विकासकामे करता आली नाही म्हणून त्यांनी मतदारांकडे मतांसाठी झोळी पुढे केली. मात्र, आता दादा भुसे यांना मंत्रिपदही मिळाले आहे. तरी सुध्दा मतदारसंघात विकासकामे झालेली नाहीत. पाणीप्रश्नावर निवडणूक जिंकणाऱ्या भुसे यांना मतदारसंघातील पाणीप्रश्न अद्याप सोडवता आला नाही. एकही उद्योग आणता आलेला नाही. जिव्हाळ्याच्या गिरणा सहकारी साखर कारखानाही त्यांना राखता आला नाही. सहकार राज्यमंत्री असूनही मतदारसंघात बँकाचे क्षेत्र वाढीस लागलेले नाही.

- पवन ठाकरे, ‌प्रतिस्पर्धी उमेदवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन ठिकाणी चो-या

$
0
0


महिलेस अटक

पर्सची चैन उघडून त्यातून पैसे चोरणाऱ्या रंजना अशोक पगारे (पाथर्डी फाटा) या महिलेस नागरिकांनी रंगेहाथ पकडले. पाथर्डी फाटा येथे राहणारे मारुती फकीरा भड (वय ४९) हे शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सीबीएस जवळील सिग्नलवर त्यांच्या पत्नीसोबत जात असताना रंजनाने त्यांच्या पत्नीच्या पर्सची चैन उघडून पर्समधील सोन्याचे दागिने आणि रोकड चोरण्याचा प्रयत्न केला. ही चोरी भड यांच्या लक्षात येताच त्यांनी रंजनाला हटकले. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल करून रंजनाला अटक केली आहे. दुस-या घटनेत आंबेडकर नगर ते काठेगल्ली या प्रवासादरम्यान शहर बसमधून प्रवास करीत असताना पॅन्टच्या खिशातील २५ हजार रुपयांची रोकड चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी श्रावण लक्ष्मण रुपवते (वय ५०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तिस-या घटनेत सिडकोतील सिंहस्थनगर परिसरात राहणाऱ्या नंदकिशोर प्रल्हाद कोष्टी यांच्या घरी चोरट्यांनी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घरफोडी केली. यात चोरट्याने सोन्याचे दागिने आणि मोबाइल असा ३९ हजार रुपयांचा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images