Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

वनकर्मचाऱ्यांचे ‘स्मार्ट’ रिपोर्टिंग

$
0
0

bhavesh.brahmankar@timesgroup.com

नाशिक : अवैध वृक्षतोडीसह विविध प्रकारच्या गुन्हे तत्काळ उघड होणारी स्मार्ट प्रणाली वनविभागात कार्यरत झाली आहे. जंगलात असलेल्या वनकर्मचाऱ्यांद्वारे तेथील सद्यस्थिती तसेच गुन्ह्याची माहिती स्मार्टफोनद्वारे थेट ऑनलाइन कळविली जात आहे. त्यामुळे वनविभागाच्या कामकाजाच कमालीची पारदर्शकता आली आहे.

वृक्षतोड, वणवे, जनावरांची चराई, शिकार, अतिक्रमण यासह विविध वन गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच हे गुन्हे उघड करण्यासाठी राज्याच्या वनविभागाने पीडीए (पर्सनल डिजिटल असिस्टंट) ही प्रणाली कार्यन्वित केली आहे. व्हॉटसअॅपसारख्याच असलेल्या या प्रणालीद्वारे जंगलातील वनरक्षक तेथील वन गुन्ह्यांची माहिती तत्काळ फोटोसह देत आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून चालणाऱ्या या प्रणालीत गुन्हा घडला ते ठिकाण, त्याचे भौगोलिक स्थान, गुन्ह्याची गंभीरता, गुन्हेगाराची माहिती, साक्षीदारांची माहिती, पुरावे, कुठल्या कायद्याचा भंग करण्यात आला आहे, आदींची माहिती क्षणार्धात संकलित होतानाच ती पाठविली जात आहे. यामुळे उपवनसंरक्षकांपासून ते थेट वनविभागाच्या नागपूर येथील मुख्यालय किंवा मंत्रालयातील वन विभागाच्या प्रधान सचिवांना ही माहिती मोबाइलवरही उपलब्ध होत आहे. या कार्यप्रणालीमुळे वनविभागाचे कामकाज स्मार्ट होतानाच या कामकाजात पारदर्शकता येण्यास मोठी मदत झाली आहे.

कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

नाशिक जिल्ह्यातील ३७६ वनकर्मचाऱ्यांना पीडीएचे सॉफ्टवेअर स्मार्टफोनमध्ये देण्यात आल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील यांनी दिली आहे. या कर्मचाऱ्यांना त्याच्या वापराचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

पीडीए प्रणालीमुळे पेठ, सुरगाणा सारख्या आदिवासी भागातील वनक्षेत्रातील गुन्हे तातडीने उघड होत असल्याचे चित्र आहे. तसेच, जंगलात प्रत्यक्ष वन गुन्ह्यांची स्थिती काय आहे, हे सुद्धा स्पष्ट होत आहे.

कर्मचाऱ्यांवरही असणार नजर

पीडीएच्या वितरणामुळे वनकर्मचारी फिल्डवर आहेत की नाही याची शहानिशाही वरिष्ठ अधिकाऱ्यांना होत आहे. नाशिकमधील वनविभागाच्या मुख्य कार्यालयातील कंट्रोल रुममध्ये नाशिक व नगर जिल्ह्यातील वनकर्मचाऱ्यांनी पीडीएद्वारे पाठविलेली माहिती संकलित केली जाते. मोबाइलशिवाय कॉम्प्युटरद्वारेही माहिती पाठविण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच, ज्या ठिकाणी मोबाइल नेटवर्क नसेल तेथे वनकर्मचारी फोटो काढून त्याची विस्तृत माहिती भरतात. ज्यावेळी नेटवर्क येईल तेव्हा ती माहिती आपोआप पाठविली जाते. या प्रणालीमुळे वनविभागाच्या कामकाजात अमूलाग्र बदल झाल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आणखी होणार पाणीकपात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जायकवाडीत पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानेही नकार दिल्याने नाशिककरांनी आता महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे धाव घेतली आहे. जायकवाडीत पाणी सोडताना मराठवाडावासियांची नेमकी गरज विचारात घेतली नसल्याचा दावा प्राध‌किरणाकडे केला जाणार आहे. लोकप्रतिनिधीसह महापालिकाही त्यात स्वतंत्र पार्टी झाली असून, आमचे म्हणणे ऐकून घ्यावे अशी मागणी महापौरांनी अशोक मुर्तडक केली आहे. अर्ज मंगळवारी दाखल करण्यात आला असून त्यावर आज मुंबईत सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिककरांच्या आशा प्राधिकरणाच्या निर्णयावर लागल्या आहेत. पाणी वाटपाच्या वादाबाबत जलचिंतन संस्थेसह नाशिक तसेच नगरमधील लोकप्रतिनिधींनी प्राधिकरणाकडे अपिल दाखल केले आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाकडून तपश‌ीलवार माहिती घेऊन त्याआधारे वस्तुस्थिती पटवून देण्याचा प्रयत्न याचिकेत केला आहे. गंगापूर धरण समुहातून २०१५-१६ करीता पिण्यासाठी ७३३० दशलक्ष घनफूट पाणी लागणार आहे. सद्यस्थितीत समूहात (खरीप वापरासह) २२५.३८ दशलक्ष घनमीटर (७९५८ दलघफू) पाणी उपलब्ध आहे. म्हणजेच पिण्याचा वापर वजा जाता १६.८१ दलघमी (६२८ दलघफू) पाणी शिल्लक राहते तर शेतीसाठी पाणीच शिल्लक राहत नाही. पिण्याच्या पाण्यात कपात केली तरी जेमतेम ५०० दलघफू इतकेच पाणी उपलब्ध होऊ शकते. ३० जुलै २०१६ पर्यंत जिल्ह्यात पाऊस पडला नाही तर पिण्याच्या पाण्यासाठी समूहावर अवलंबून असणारे नाशिक शहर, नाशिक आणि निफाड तालुका यांना पाणीच शिल्लक राहणार नाही.

शहरात आणखी पाणीकपात

गंगापूर धऱणसमूहातून जायकवाडीला पाणी सोडल्यानंतर धरणातात शहरासाठी केवळ साडेतीन टीएमसीच पाणी शिल्लक राहणार आहे.यातून बाष्पीभवनामुळे तब्बल २०० दशलक्ष घनफुट पाणी वाया जाण्याची शक्यता असल्याने नाशिककरांवर जानेवारीपासून पुन्हा पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे.



आणखी होणार पाणीकपात गंगापूर धरण समुहातून जायकवाडीला पाणी सोडल्यानंतर धरणात शहरासाठी केवळ साडेतीन टीएमसीच पाणी शिल्लक राहणार आहे. बाष्पीभवनामुळे तब्बल २०० दशलक्ष घनफूट पाणी वाया जाण्याची शक्यता असल्याने नाशिककरांवर जानेवारीपासून पुन्हा पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. उपलब्ध साठा ऑगस्टपर्यंत टिकवण्यासाठी दिवसाआड पाण्याचा पुरवठा शहरावर ओढावण्याची शक्यता असल्याने नाशिककरांवर पाण्याचे बिकट संकट ओढावणार आहे.

गंगापूर धरणसमूहात सद्यस्थितीत पाच हजार ७२८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. यातून १३५५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा हा जायकवाडीसाठी सोडावा लागणार आहे. त्यामुळे धरणात ४ हजार ६६६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक राहणार आहे. एकलहरे प्रकल्प ६०० दशलक्ष घनफूट मेरी- ७५, एमआयडीसी २५० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित आहे. त्यामुळे पालिकेच्या वाट्याला केवळ साडेतीन टीएमसीच पाणी शिल्लक राहणार आहे. त्यात बाष्पीभवनातून पाव टीएमसी पाणी जाण्याची शक्यता आहे. ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेला ३ हजार ८०० दशलक्ष घनफूट पाण्याची गरज आहे.

उपलब्ध साठाके हा ऑगस्टपर्यंत पुरविण्यासाठी पालिला आणखी पाणीकपातीशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे जानेवारीपासून शहराला पाणीकपातीचा पुन्हा सामना करावा लागणार आहे. फेब्रुवारीपासून दिवसाआड पाणीकपात ओढावणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे पाणीबाणीची भयावह स्थिती निर्माण होणार असल्याने पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. त्यामुळे पाण्याच्या उद्रेकाचा सामना नाशिककरांना करावा लागणार आहे.

विभागीय अधिकाऱ्यांवर कारवाई?

पाणीकपात झाल्यानंतर पालिकेने पाण्याच्या गैरवापर करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, सहाही विभागातील विभागीय अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले असल्याने सर्रास पाण्याचा गैरवापर सुरू आहे. सर्व्हिस सेंटर्स, तरणतलाव, हॉटेल्समध्ये मोठा गैरवापर केला जात आहे. त्यामुळे कारवाई न करणाऱ्या विभागीय अधिकाऱ्यांवर कारवाईची तयारी पालिकेन सुरू केली आहे. अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांनी विभागीय अधिकाऱ्यांना दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला असून, कारवाई करा अथवा कारवाईला सामोरे जा, असा इशारा दिला आहे.

... तर नगरसेवकांचे फिरणे बंद

जानेवारीपासून गंभीर पाण्याची परिस्थिती ओढावणार आहे. तर वर्षाच्या कालावधीतच निवडणुका आहेत. मात्र, त्याची तयारी अगोदरपासूनच नगरसेवकांना करावी लागणार आहे. त्याच वेळी पाण्याचा तुटवडा राहणार असल्याने पहिला प्रश्न पाणीपुरवठ्याच उपस्थित होणार आहे. नगरसेवक काय करत होते, असा सवाल मतदारांकडून होणार असून, त्यांचे फिरणेही बंद होणार आहे. विशेषतः भाजप आमदारांसह नगरसेवकांना त्याचा मोठा फटका बसणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नस्तनपूरच्या शनिदेवाची महती

$
0
0

संदीप देशपांडे

शनीच्या साडे तीन पीठापैंकी महत्त्वाचे एक पीठ असलेल्या नांदगांव तालुक्यातील नस्तनपूर येथील शनिदेवाची महती आता म्युझिक अल्बमद्वारे सर्वांसमोर येणार आहे. गायक आदर्श शिंदे याच्या आवाजामध्ये यातील दोन गाण्यांचे मुंबईमध्ये नुकतेच रिकॉर्डिंग झाले असून 'नस्तनपूरचा राजा' हा अल्बम लवकरच प्रदर्शित होणार आहे.

दर शनिवारी या मंदिरात हार्मोनियम सेवा करणाऱ्या सचिन पगारे या संगीतवेड्या तरुणानेच या कल्पनेला मूर्त स्वरुप दिले आहे. प्रभू रामचंद्रांनी साक्षात नस्तनपूर येथे येऊन शनी देवाच्या मूर्तीची स्थापना केल्याचे सांगितले जाते.

या स्थळाचे धार्मिक महत्त्व सर्वदूर पोहोचावे अशी या ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार अनिल आहेर यांची मनस्वी इच्छा होती. विजय चोपडा आणि सहकाऱ्यांनी ही योजना प्रत्यक्षात आणत 'नस्तनपूरचा राजा' हा म्युझिक अल्बम साकारला आहे. यातील गाणी नाशिकच्या विनायक पाठारे यांनी लिहिली असून सचिन पगारे व विजयराज निकम यांनी सुरेल चाली लावल्या आहेत.

या अल्बममध्ये एकूण ९ गाणी असून आदर्श शिंदे, विजयराज यांच्यासह गायिका उत्तरा केळकर, वैशाली भैसने माडे यांनी विविध गाण्याना आपला स्वर दिला आहे. सचिन पगारे, विजयराज, प्रशांत पंचभाई यांची संगीत साथ या गीतांना लाभली आहे. या अल्बमचा प्रकाशन सोहळा गायक आदर्श शिंदे, उत्तरा केळकर यांच्या उपस्थितीत लवकरच नांदगावमध्ये केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शॉर्ट फिल्मचा स्मार्ट पर्याय

$
0
0

नाशिक टाइम्स टीम

शहरातील समस्यांची केवळ चर्चा न करता त्या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून समाजासमोर मांडून त्यावर सोल्युशन शोधण्यासाठी प्रा. वृंदा भार्गवे यांनी 'दवप्रभा प्रॉडक्शन' या मंचाची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे 'विकास' या विषयाला प्राधान्य देऊन त्याला वाहिलेल्याच शॉर्ट फिल्मस् या माध्यमातून तयार केल्या जाणार आहेत.

नाशिक शहराची स्मार्ट सिटीकडे होत असलेली वाटचाल कौतुकास्पद असली तरी शहरात आजही अनेक समस्या आहेत, ज्याकडे प्रशासनाचे तसेच नाशिककरांचेही दुर्लक्ष होत आहे. अशा विकासाला बाधक असलेल्या समस्या हेरुन त्या दवप्रभा प्रॉडक्शनच्या शॉर्ट फिल्मसव्दारे मांडण्यात येणार असल्याची माहिती याबाबत बोलताना प्रा. भार्गवे यांनी दिली. तसेच केवळ परिस्थितीची मांडणी न करता समस्या सोडविण्याचा पर्याय देऊन प्रशासनासमोर या फिल्मस् सादर केल्या जाणार आहेत. नाशिकच्या पोटेन्शियलची ओळख करुन देणारी 'नाशिक बाईट्स' ही ४ मिनिटे ४० सेकंदांची शॉर्ट फिल्म नुकतीच या ग्रुपमार्फत तयार करण्यात आली आहे, ज्यामध्ये धार्मिकतेसोबतच नाशिकचा औद्योगिक विकासही अधोरेखित करण्यात आला आहे. ही शॉर्ट फिल्म यू ट्युबवर उपलब्ध आहे.

प्रा. वृंदा भार्गवे आणि मार्मिक गोडसे यांच्या प्रयत्नातून साकार झालेल्या या मंचामध्ये सृष्टी, रुचिता, योगेश, सुरेश, ऋषिकेश, प्रणव यांचाही सहभाग आहे. कोणत्याही आर्थिक बाबींचा समावेश नसल्यामुळे कोणतीही शॉर्ट फिल्म व्यावसायिक दृष्टीकोन समोर न ठेवता तयार करण्यावर या ग्रुपचा भर असणार आहे. या अंतर्गत २ ते १० मिनिटे कालावधीच्या शॉर्ट फिल्मस् बनविल्या जाणार असून विकासासोबत 'कला' हा विषयही काही प्रमाणात हाताळला जाणार आहे.

प्रियांका डहाळेला समर्पित

नाशिकची दिवंगत पत्रकार प्रियांका डहाळेला फिल्म या माध्यमाची खूप चांगली जाण होती. या माध्यमाव्दारे काम करण्याची तिची इच्छा होती. परंतु काही महिन्यांपूर्वी तिचे अपघाती निधन झाले. ती आज असती तर आम्ही दोघींनी मिळून हे काम केले असते अशी भावना वृंदा भार्गवे यांनी व्यक्त केली. त्यामुळे 'दवप्रभा'ची प्रत्येक कलाकृती प्रियांकाला समर्पित करणार असल्याचे त्या म्हणाल्या.

ओव्हरस्मार्टनेस करा व्हॉट्सअॅप

अनेक नागरिक उपलब्ध संसाधनांचा गैरवापर करताना दिसतात. उदा. पाणी वाया घालवणे, रस्त्यात कचरा टाकणे. नेमके हे प्रकारच विकासाला खीळ घालतात. असे प्रकार आढळल्यास तसा फोटो ९५९५८९३४७९ या नंबरवर व्हॉट्सअॅप करावा असे आवाहन या ग्रुपमार्फत करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधार मेडिटेशनचा

$
0
0

प्रतीक गंगेले, कॉलेज क्लब रिपोर्टर

सध्याच्या धावपळीच्या जगण्यात काहीतरी हरवत चालल्याची जाणीव होते आणि प्रत्येक जण त्या गोष्टीच्या शोधात निघतो. पण घर, ऑफिस, आसपास घडणाऱ्या घटना या सगळ्यांचा रोजच्या जगण्यात असलेल्या प्रभाव त्यातून बाहेर पडू देत नाही. या अवस्थेतूनच बाहेर पडण्यासाठी सध्या विपश्यना म्हणजे मेडिटेशन करण्याकडे अनेकांचा कल वाढताना दिसतो आहे.

कुठलाही व्यायमाचा प्रकार नाही, कोणत्याही साधनांची गरज नाही. धर्म, पंथ, जात-पात यांच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या चुका दाखवणारा, आपल्या दु:खासाठी आपणच कारणीभूत असतो या सर्वांची जबाबदारी घ्यायला लावणारा हा दु:खमुक्तीचा मार्ग म्हणजे विपश्यना. स्पर्धेच्या काळात भारतातच नव्हे तर परदेशातही हा आनंद प्राप्तीचा सोपा मार्ग ठरत आहे.

स्पर्धेच्या जगात प्रत्येकाची लाईफस्टाइल बदलत चालली आहे. बक्कळ पैसा कमावणे, उत्तम जीवन जगण्यासाठी प्रत्येकजण धडपड करताना दिसतो. जीवनाचा वेग प्रचंड, स्वयंनिर्भर राहण्यालाच प्राधान्य, विभक्त कुटुंब पद्धती या सगळ्यांचा प्रभाव वाढल्याने शरीर आणि मन यावरील तणाव वाढला आहे. म्हणूनच यामधून बाहेर पडण्यासाठी विद्यार्थी, नोकरदार, व्यवसायिक, महिलांना मेडिटेशनचा आधार होतो आहे. प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या प्रकारचा तणाव जणवतो. अशा मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी मेडिटेशन हा पूरक पर्याय असल्याने डॉक्टर्सही याचा सल्ला देतात.

सध्या अनेक ठिकाणी यामुळे विपश्यना केंद्रांमध्ये वाढ होताना दिसते आहे. भौतिक जगापासून काही काळ दूर राहून मेडिटेशनच्या माध्यमातून मिळणाऱ्या ऊर्जेचा फायदा होत असल्याची भावना अनेक लोक व्यक्त करताना दिसतात. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर याचे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याने अनेक लोक याकडे वळताना दिसत आहेत.

बरीच मंडळी आता दहा दिवसांचा कोर्स एकदाच नव्हे तर वर्षातून दोनदा करण्याचा अनुभव घेतात. तसेच अगदी वीस किंवा चाळीस दिवसांचाही कोर्स करण्याचीही पद्धत रुढ होताना दिसते आहे. यामधून मिळणाऱ्या फायद्यांमुळे काही जण विपश्यनेचे शिक्षक म्हणून काम करताना दिसतायत तर काही लोक याचे महत्त्व पटवून देण्याचे सामाजिक कार्य करताना दिसत आहेत.

माणूस कायम बाहेर बघत असतो. या माध्यमातून आपण स्वतःकडे लक्ष देतो. आपल्या चुका समजण्यास मदत होते. मन एकाग्र करण्यासाठीे विपश्यना हे सगळ्यात प्रभावी माध्यम आहे. यामुळे नक्कीच एक सक्षम आणि चिंतामुक्त समाज निर्मित होऊ शकतो. - अनिल डेर्ले, विपश्यना आणि योग गुरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इकोफ्रेंडली दिवाळी

$
0
0

पवन बोरस्ते, कॉलेज क्लब रिपोर्टर

दिवाळीमध्ये सर्वच वयोगटातील लोक आनंदाचे क्षण साजरे करतात. तरुणाईचा यातील उत्साह जास्त असतो. पण यंदा मात्र तरुणाईने दिवाळी वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यावरणाचे महत्त्व आणि राज्यात असलेली दुष्काळ परिस्थिती लक्षात घेत यंदा अनेकांनी साध्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला आहे.

यंदा दिवाळी साजरी करण्याबाबत कल्पेश घोलप म्हणतो, दिवाळी म्हणजे सणांचा राजा. मी दरवर्षी मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करतो. पण यंदाची दिवाळी मी साधेपणाने साजरी करणार आहे. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असल्याने मी दुष्काळग्रस्तांना व गोरगरिबांना माझ्या परीने दिवाळीत फराळाचे पदार्थ वाटप करणार आहे.

राज्यातील दुष्काळामुळे अनेक भागात दिवाळी साजरी होते की नाही असी परिस्थिती आहे. याविषयी बोलताना सूरज भोर म्हणतो, महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे आमच्या फाऊंडेशनतर्फे आम्ही दुष्काळ निधी जमा करत आहोत. ही मदत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. या कामात व्यस्त असल्यामुळे मी दिवाळीकडे दुर्लक्ष केलयं. ही दिवाळी मी साधेपणाने सेलिब्रेट करणार आहे.

दरवर्षी दिवाळीला मी हजारोंचे फटाके फोडतो. फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनीप्रदूषण व वायूप्रदूषण होते. याचे गांभीर्य लक्षात घेत मी इकोफ्रेंडली व कमी आवाजाचे फटाके खरेदी करणार आहे. जेणेकरून कुणालाही त्रास होणार नाही, असा संकल्प गौरव आरोटे याने यंदा केला आहे. तर इकोफ्रेंडली सेलिब्रेशनविषयी कृतिका झा सांगते, नेहमीच्या प्लास्टिक कंदीलाला फाटा देत यावेळी मी पेपरमेड कंदील लावणार आहे. घरच्यांनीही निर्णय चांगला असल्याचे सांगितले. तसेच दिवाळीनंतर परिसरात झालेला फटाक्यांचा कचरा मी साफ करणार आहे. यंदाची दिवाळी मी पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त दिवाळी म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. सूरज गावंडे याविषयी म्हणतो, वायफळ खर्चाला फाटा देत गोरगरिबांना एक पणती देत त्यांचे घर प्रकाशमय करण्याचा निर्णय मी घेतला आहे. फराळाचे वाटपही मी करणार आहे. दिवाळी व्हेकेशनमध्ये मी करत असलेल्या एका छोट्याशा कृतीने समाधान व अनुभवाची शिदोरी मला मिळणार हे नक्की. मागील काही महिन्यात राज्यात घडलेल्या घटना, दुष्काळ आणि पर्यावरणाचा होणारा ऱ्हास लक्षात घेत तरुणाई यासाठी पुढे सरसावली आहे. सामाजिक भान जपत मदतीचा हात या सर्वांनी पुढे केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकवून तिला जीवे मारणाऱ्या पतीला कोर्टाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. देवळा येथे २१ ऑक्टोबर २०१० रोजी ही घटना घडली होती.

दिपक दैलत गुंजाळ असे आरोपीचे नाव असून त्याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. यामुळे दिपकचे त्याची पत्नी आशा हिच्यासोबत वाद होत होते. यातूनच दिपकने २१ ऑक्टोबर २०१० रोजी गुंजाळनगर येथील घरात दारूच्या नशेत आशाला रॉकेल टाकून पेटवून दिले. तिला अत्यावस्थ अवस्थेत सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एच. मोरे यांच्यासमोर चालला. या खटल्यात आरोपीचा १० वर्षाचा मुलगा आदित्य याची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. २ पंच एक साक्षीदार फितूर झाल्यानंतर सरकारी वकील गायत्री पटनाला यांचा युक्तिवाद महत्त्वपूर्ण ठरला.

कापड दुकानात चोरी

सरदार चौकातील श्रीराम वस्त्र भांडार या दुकानाचे लाकडी दरवाजा तोडून चोरट्यांनी आतील २ लाख ५५ हजार रुपये किंमतीच्या साड्या, ब्लाऊज पीस, ड्रेस मटेरियल आणि रोख रक्कम चोरी केली. विशेष म्हणजे चोरट्यांनी पहिल्या मजल्यावर चढून हे कृत्य केले. या प्रकरणी किरण सुधाकर धारबळे यांनी​ दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

दोन चेन स्नॅचिंग

चेनस्नचर्सने पुन्हा एकदा महिलांच्या गळ्यातील स्त्रीधन लुटून नेले. ​दिंडोरी रोडवरील पोकार कॉलनी येथे राहणाऱ्या कविता धनंजय देवकर बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आशिष बिल्डींग येथून पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपयांचे मंगळसूत्र तोडून नेले. यानंतर चोरट्यांनी पुन्हा एकवार चोपडा लॉन्स येथील रस्त्यावरून पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ४० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र तोडून पोबारा केला. ही घटना बुधवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. यापूर्वी सुध्दा चोरट्यांनी याच परिसरात चेन स्नॅचिंग केल्याच्या घटना अद्याप ताज्या आहेत. दरम्यान याप्रकरणी पवननगर परिसरात शंकुतला सुरेश खैरनार यांनी तक्रार दाखल केली आहे.

अंगरक्षकास मारहाण

‍देवळाली कॅम्प : माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांचे तत्कालीन अंगरक्षक व देवळाली कॅम्पचे रहिवासी काशिमित्रा पुनानाथजी माथुर यांना देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशनवर रेल्वे पोलिस दलाच्या जवानाने यांनी मारहाण केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माथुर ८५ वर्षीय यांनी निवेदनात दिले आहे. त्यात नमूद केल्यानुसार, ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशन मास्तर यांना भेटण्यासाठी जात असतांना प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर गोहाटी एक्सप्रेस आली. त्यावेळी आपण बाजूला उभे होतो. याप्रसंगी आरपीएफ कर्मचारी राऊत यांनी अंगात गणवेश परिधान केलेला नसतांना 'तुम्ही कोणाला हात करत छेडछाड करत होते' अशी विचारणा करीत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहन तपासणी ‘जैसे थे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऑटोमेटिक व्हेईकल इन्स्पेक्शन सर्टिफिकेशन सेंटरच्या (एव्हीइएस) विरोधात उभे ठाकलेल्या वाहनचालकांच्या मागणीवर गुरूवारी समाधानकारक तोडगा निघू शकला नाही. जुन्या तसेच शोरूम वाहनांना सर्रास दोषी ठरवणाऱ्या यंत्रणेचे काम काही दिवस बंद ठेवण्याची मागणी वाहनचालकांसहीत विविध संघटनांनी केली आहे.

प्रादेशिक परिवहन विभागातील (आरटीओ) ५ एकर जागेत साकारण्यात आलेली राज्यातील पहिलीच एव्हीइएस यंत्रणा सुरुवातीपासूनच वादात सापडली आहे. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एआरएआय) सहकार्याने सुरू झालेल्या या प्रकल्पात अगदी किरकोळ कारणांसाठी वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र नाकारले जाते. इव्हीएस यंत्रणेद्वारे ट्रक, बसेस, रिक्षा, व्यावसायिक कार, जीप आदी वाहनांचे ब्रेक, हेडलाइट, टायर्स व इंजिनाची स्थिती, चेसीज, ध्वनी व वायू प्रदूषणाचे प्रमाण या बाबी तपासण्याचे काम केले जाते. मात्र, जुन्यासहीत अगदी शोरूममधून आणलेल्या वाहनांना सुध्दा परदेशातून आयात केलेली यंत्रणा दोषी ठरवत आहेत. सदर चाचणीमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या वाहनाला पुन्हा चाचणीसाठी वेळ घ्यावी लागते. दंड तसेच शुल्कही भरावा लागतो. दिवसभरात बोटावर मोजता येईल, इतक्याच वाहनांची चाचणी होत असल्याने शेकडो वाहनचालकांना आरटीओ कार्यालयात ठाण मांडून बसावे लागते. यामुळे व्यवसाय बुडत असून सर्वसामान्य वाहनचालक आर्थिक दृष्ट्या भरडला जात असल्याचा आरोप वाहनचालकांकडून होतो आहे.

याबाबत बोलताना श्रमिक रिक्षा, टॅक्सी, टेम्पो, ट्रक चालक मालक सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष भगवंत पाठक यांनी सांगितले, की अनेक वाहनचालक १०० किलोमीटर अतंर तुडवत येतात. परदेशातून आयात केलेली यंत्रणा भारतीय वाहनांची चाचणी कशी घेऊ शकते, हाच खरा प्रश्न आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची मॅन्युअल चाचणी घ्यावी, संबंधित कंपनीने आपले सर्व्हिस स्टेशन सुरू करेपर्यंत वाहनचालकांची अडवणूक करू नये या मागण्यांसाठी आरटीओ अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू असल्याचे पाठक यांनी सांगितले. दरम्यान, 'आरटीओ' आमच्या मागण्या मान्य करीत नाही तोपर्यंत एकही वाहन चाचणीसाठी पाठवण्यात येणार नाही, असे महाराष्ट्र रिक्षा टॅक्सी चालकमालक संघटनेचे उपशहर प्रमुख राहुल मैंद यांनी स्पष्ट केले. यामुळे बुधवारपासून चाचणीचे काम ठप्प पडले आहे.

यांत्रिक तपासणीस वाहनचालकांची 'ना'

पुढील दोन दिवस वाहनांच्या हेडलाईटचे काम सेंटरमध्येच करून वाहनांना उत्तीर्ण केले जाऊ शकते, असे डेप्युटी आरटीओ भरत कळसकर यांनी वाहनचालकांच्या बैठकी दरम्यान सांगितले. मात्र, ही भूमिका रास्त नसून संबंधित कंपनीने सर्व्हिस सेंटर सुरू करेपर्यंत वाहनांची यांत्रिक पध्दतीने तपासणीच करू नये, असे मत वाहनचालकांनी मांडले आहे.

गुरुवारी दिवसभर तब्बल २०० पेक्षा जास्त वाहने आणि त्याहून अधिक चालक-मालक कार्यालयात उपस्थित होते. दरम्यान, ऑल इंडिया टूरिझम अॅण्ड ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीपसिंह बेनिवाल यांनीही निवेदन सादर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाण्यासाठी सरसावली महापालिका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीला पाणी सोडण्याविरोधातील आंदोलनाची दखल मुख्यमंत्री घेत नसल्याने लोकप्रतिनिधी आणि महापालिका आता आक्रमक झाली आहे. आपल्या हक्काच्या पाण्याला धक्का लावू नये म्हणून महापालिकेच्या वतीने शनिवारी (दि. ७) तातडीची महासभा बोलविण्यात आली आहे. यात सरकारला संभाव्य पाणीटंचाई व कायदा सुव्यवस्थेसंदर्भातील परिस्थितीची जाणीव करून दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजप आमदारांचेही ऐकत नसून नाशिकच्या प्रश्नांसाठी त्यांच्याकडे वेळ नसल्याची टीका कृती समितीने केली आहे.

जायकवाडीला पाणी सोडण्याला भाजप वगळता सर्व पक्षांचा तीव्र विरोध आहे. भाजपच्या आमदार सीमा हिरेंनीही पाणी सोडण्यास तीव्र विरोध केला आहे. न्यायालयीन लढाई पाठोपाठ राजकीय दबाव टाकण्यासाठी नाशिकमधील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, माकप, आरपीआय यांनी एकत्रित मोट बांधत आंदोलन तीव्र केले आहे. पाणी सोडण्याच्या निषेधार्थ भाजप आमदारांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. तर मुख्यमंत्र्याच्या भेटीसाठी दोन दिवसापासून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, मुख्यमंत्री नाशिकच्या प्रश्नांसदर्भात गंभीर नसल्याचा आरोप शिवसेनेच्या अजय बोरस्ते यांनी केला आहे. भाजप सरकार नाशिकवर अन्याय करत असून नागरिकांना संकटात ढकलत आहे. त्यामुळे आता अधिक आवाज बुंलद करण्यासाठी गुरुवारी महापालिकेच्या गटनेत्यांनी तातडीने बैठक घेतली. त्यात महापौरांना तातडीची महासभा घेवून सरकारला आपल्या पाण्याची दाहकता दाखवावी अशी विंनती करण्यात आली. महापौर अशोक मुर्तडक यांनीही तातडीने शनिवारी सकाळी दहा वाजता तातडीची महासभा आयोजित केली आहे. आमच्या हक्काचे चार टीएमसी पाणी आम्ही कोणालाच देणार नाही असा ठराव करून तो तातडीने शासनाला सादर केला जाणार आहे. तर शुक्रवारपासून सर्वपक्षीय आंदोलन सुरू केले जाणार आहे.

प्राधिकरणाकडून न्यायाची पायमल्ली

जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने महापालिकेचे म्हणणे ऐकून घ्यावे यासाठी महापौरांनी बुधवारी प्राधीकरणाकडे अर्ज दाखल केला होता. मात्र, प्राधिकरणाने त्यांच्या अर्जाकडे दुर्लक्ष करत त्यांना सुनावणीसाठी बोलावले नाही. त्यामुळे महापौर संतप्त झाले असून त्यांनी प्राधिकरणाने नैसर्गिक न्यायाची पायमल्ली केली असल्याचा आरोप केला आहे. महापालिकेची भूमिका मांडू द्यायला हवी होती. मात्र महापालिकेचाही आवाज दाबला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.


कायदाच रद्द करा

सन २००५ मध्ये तयार झालेला महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधीकरण हा कायदाच रद्द करावा अशी मागणी कृती समितीने केली आहे. जागतिक बँकेच्या कर्जासाठी हा कायदा पास करण्यात आला होता. मात्र हे कर्जच मिळाले नसल्याने व हा कायदा अन्यायी असल्याचे सांगून तो तात्काळ रद्द करावा, अशी मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापाऱ्यांना नोटिसा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एलबीटीचे विवरण पत्र सादर करण्याची मुदत उलटून गेल्यानंतरही विवरणपत्र दाखल न करणाऱ्या व्यापारी, बिल्डर, ऑनलाइन कंपन्यावर कारवाईचा बडगा उचलला आहे. वेळेत विवरणपत्र सादर न केल्याप्रकरणी शहरातील १३ हजार १३६ व्यापारी व विकसकांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती उपायुक्त हरिभाऊ फडोळ यांनी दिली आहे. १५ दिवसाच्या आत व्यापाऱ्यांकडून खुलासा मागविण्यात आला आहे.

राज्य सरकारने छोट्या व्यापारी व व्यावसायिकांना एलबीटी माफ केल्यामुळे विवरण पत्रही सादर न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया पालिकेच्या एलबीटी विभागाने सुरू केली आहे. एलबीटी माफ झाल्याने आपल्यावर कारवाई होणार नाही अशी अटकळ बांधून असलेल्या या व्यापाऱ्यांना महापालिकेने दिवाळीत झटका दिला आहे. गेल्या वर्षीचे एलबीटीचे विवरण सादर करण्याची मुदत ही ३१ ऑक्टोबर होती. त्या मुदतीत व्यापाऱ्यांनी, व्यावसायिकांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे एलबीटी विभागाने या व्यापाऱ्यांना थेट नो‌िटसाच बजावल्या आहेत. संबंधितांना खुलासा देण्यासाठी १५ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.

या काळात खुलासा केला नाही तर थेट बँक खाते सील केले जाणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत व्यापारी संकटात सापडले आहे. महापालिकेने पाठविलेल्या नोटिसेला उत्तर देण्याचा पर्याय त्यांच्यापुढे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी कार्यालयास संतप्त विद्यार्थ्यांचा घेराव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वसतीगृहांसह आदिवासी विद्यार्थ्यांना विविध सुविधांपासून वंचित ठेवले जात असल्याच्या मुद्यावरून आदिवासी विद्यार्थ्यांनी छेडलेल्या आंदोलनात गुरूवारी आदिवासी आयुक्त कार्यालयास घेराव घालण्यात आला. विद्यार्थ्यांना वेळ न देता आयुक्त निघून गेल्याचा मुद्दा उचलून धरीत गुरूवारी संतप्त विद्यार्थ्यांनी आयुक्तालयातील पाच ते सहा कर्मचाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत कार्यालयातच कोंडून ठेवले.

औरंगाबाद विभागातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा गुरूवारी अकरावा दिवस पार पडला. सकाळपासून विद्यार्थी अस्वस्थ होते. त्यांनी आदिवासी आयुक्त सोनाली पोंक्षे-वायंगणकर यांच्याशी बोलण्याचा आग्रह धरला होता. यानुसार सायंकाळी विद्यार्थी प्रतिनिधींची चर्चा सुरू झाल्यानंतर काही वेळातच आयुक्तांनी मागील दरवाजाने कार्यालयाबाहेर पळ काढल्याचा आरोप भारतीय आदिवासी पँथरच्या विद्यार्थ्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक विभागातील १३ तहसीलदारांच्या बदल्या

$
0
0

नाशिक जिल्ह्यातील ५ तहसीलदारांचा समावेश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महसूल विभागातील एकूण १३ तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी काढण्यात आले आहेत. त्यात नाशिक जिल्ह्यातील ५ तहसीलदारांचा समावेश आहे. बदली झालेले तहसीलदार, त्यांचे सध्याचे पद आणि नियुक्तीनंतरचे पद पुढीलप्रमाणे.

१) एस. बी भाटे - तहसीलदार, पाथर्डी - करमणूक शुल्क, नाशिक २) वंदना खरमाळे - निवडणूक शाखा, नाशिक - तहसीलदार, श्रीगोंदा, ३) डॉ. राजश्री अहिरराव - तहसीलदार, राहुरी- तहसीलदार, नाशिक. ४) गणेश राठोड - तहसीलदार, नाशिक - तहसीलदार, निवडणूक शाखा, नाशिक. ५) शर्मिला मोसळे - तहसीलदार, देवळा - तहसीलदार, साक्री. ६) कैलास पवार - तहसीलदार, अकोला - तहसीलदार, देवळा. ७) वैशाली हिंगे - तहसीलदार, भुसावळ - तहसीलदार, पुरवठा, विभागीय आयुक्तालय. ८) सुरेश कोठी - तहसीलदार, पारोळा - तहसीलदार, मालेगाव. ९) महेश चौधरी - तहसीलदार, संजय गांधी योजना नाशिक - तहसीलदार, नगरपालिका, विभागीय आयुक्तालय. १०) गायत्री सौंदाणे - तहसीलदार, शिंदखेडा - धाविअ, मालेगाव. ११) अनिल कंबाडे - धाविअ, मालेगाव - तहसीलदार, सुरगाणा. १२) माणिक आहेर - तहसीलदार, साक्री - तहसीलदार, चांदवड. १३) मनोज देशमुख - तहसीलदार, चांदवड - तहसीलदार, अकोले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोगस आदिवासींचा प्रश्न राष्ट्रीय आयोगाकडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने बोगस आदिवासींना संरक्षण देण्यासाठी काढलेल्या २१ ऑक्टोबर २०१५ परिपत्रकाविरोधात भाजप खासदारांनी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडे धाव घेतली आहे. दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी दिल्लीत अध्यक्ष रामेश्वर ओरायण यांची भेट घेवून हे परिपत्रक रद्द करण्याची मागणी केली आहे. ओरायण यांनी पुण्यात यासंदर्भात होणाऱ्या बैठकीत मुद्दा उपस्थित कऱण्याचे आश्वासन दिले असून, सचिवांशी चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे.

राज्यातील भाजपच्या सरकारने बोगस आदिवासींना संरक्षण देण्यासाठी २१ ऑक्टोबर २०१५ रोजी परिपत्रक काढले आहे. त्यामुळे २००५ पर्यंतच्या बोगस आदिवासींच्या नोकऱ्या वाचणार आहेत. मात्र, या निर्णयाला भाजप आमदार व खासदारांनी विरोध केला आहे. रामेश्वर ओरायन यांच्या बरोबरच्या चर्चेत हरिश्चंद्र चव्हाण यांनी सांगितले की, जे बिगर आदिवासी ज्याही पदावर कार्यरत असतील जर अवैध प्रमाणपत्र असेल तर त्यांना शासनाने ज्या वर्गाचे जातीचे प्रमाणपत्र असेल त्या वर्गाच्या जातीमध्येच सामील करावे. त्यांना अनुसूचित जमातींचे जात प्रमाण पत्र नसताना (बोगस आदिवासी प्रमाणपत्र )पदावर सामावून घेणे हे घटनेच्या विरोधात आहे.

शासन निर्णय आदिवासी बांधवांवर अन्यायकारक आहे. ही सर्व पदे शासनाने मूळ आदिवासी असणाऱ्यांनाच दिली पाहिजे. ओरायन यांनी यासंदर्भात पुणे येथे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे येथे बैठक ठेवली आहे. तेथे आदिवासी विभागाचे मुख्य सचिवांना बोलावून शासन निर्णय बदलण्यास सांगणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसेला महागाईची झाली आठवण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कल्याण-डोंबवली महापालिकेत सपाटून मार खाल्यानंतर जनतेशी नाळ तुटलेली मनसे गुरूवारी महागाई व पाण्याच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरली. मनसेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शक्तीप्रदर्शन केले. भाजप सरकार नाशिकला मराठवाडा करीत असल्याचा आरोप करतानाच महागाई हे शासनाचेच कटकारस्थान असल्याचा आरोपही मनसेच्या नेत्यांनी केला. मनसेच्या सर्व नेत्यांनी या आंदोलनात सहभाग घेवून पक्षाची ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला.

ऐन दिवाळीच्या सणात महागाईने कळस गाठला असून, डाळी सर्वसामान्यांच्या आहारातून हद्दपार होत आहेत. तर पाणीटंचाई असतांनाही नाशिकचे हक्काचे पाणी जायकवाडीला दिले जात आहे. त्यामुळे शासनाच्या या दुटप्पी वागणुकीच्या विरोधात मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा आयोजित केला होता. माजी आमदार वसंत गिते यांनी पक्ष सोडल्यानंतर प्रथमच गुरुवारी मनसे जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरली होती. त्यामुळे मनसेच्या या मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. राज्य सचिव प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापौर अशोक मुर्तडक, डॉ. प्रदीप पवार, प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले, जिल्हाप्रमुख सुदाम कोंबडे, शशीकांत जाधव, सलिम शेख, अनिल मटाले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक या आंदोलनात सहभागी झाले होते. मनसेच्या कार्यालयातून शालीमारमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात आला. जवळपास दीड ते दोन हजार कार्यकर्त्यांसह महिलांनी या मोर्चात हजेरी लावून मनसेची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला.

पिक्चर अभी बाकी है!

या आंदोलनात बोलतांना महापौर अशोक मुर्तडक यांनी पाणी व महागाई विरोधातील पक्षाची भुमिका स्पष्ट करताना, आजचा केवळ ट्रेलर आहे. पूर्ण पिक्चर बाकी असून, सरकारला आम्ही आता सळो की पळो करून सोडणार असल्याचा इशारा दिला. शुक्रवारी सर्वपक्षीय आंदोलन केले जाणार असून, आता दररोज सरकारला आम्ही उघडे पाडणार आहोत.

उणीव भरून निघाली!

कार्यकर्त्यांचा मोठा गोतावळा असलेले माजी आमदार वसंत गिते यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत मनसेची आंदोलने होत होती. मात्र, प्रथमच गितेंविना हा मोर्चा काढण्यात येणार होता. मोर्चा फुसका ठरू नये, याची पूरेपूर जबाबदारी स्थानिक नेत्यांनी घेतली. मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमवत गितेंची उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनामुळे शहरातील रस्ते व व्यापारपेठांमधील रस्ते चांगलेच जाम झाले होते. त्यातून नागरिकांचेही हाल झाले.

दरवाढ व साठेबाजी हे शासनाचे कटकारस्थान आहे. अच्छे दिनच्या नावाखाली जनतेची फसवणूक केली जात आहे. मनसेचा सरकार विरोधात एल्गार आहे. त्यांना मराठवाड्याप्रमाणेच नाशिकही उजाड करायचे आहे. या सरकारची पोलखोल आम्ही करणार आहोत.- प्रमोद पाटील, सचिव, मनसे

राज्य सरकार लुटपूटची लढाई खेळत आहे. नाशिकच्या हक्काचे पाणी पळवून नेण्याचा हा प्रयत्न असून, या सरकारला आम्ही उघडे पाडणार आहोत. सरकार नाशिककरांना सापत्न वागणूक देत आहे. येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.- अशोक मुर्तडक, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपळगाव टोलची पुन्हा दरवाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत येथे असलेल्या टोलनाक्याच्या दरवाढीने पुन्हा डोके वर काढले आहे. आता नाशिक जिल्ह्यातील अवजड वाहनांना (तीन ते सहा अॅक्सल) सध्याच्या २१० रुपयांऐवजी ६९० रुपये टोल लागणार आहे. याप्रश्नी जिल्ह्यात नाराजीचे वातावरण आहे. नवी दरवाढ १५ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे.

पीएनजी टोलवे कंपनीने गेल्या १ एप्रिललाच टोल दरवाढ जाहीर करुन लागू केली होती. त्यात नाशिक जिल्ह्यातील वाहनांना सूट देण्यात आली होती. मात्र, ही सूट अधिक काळ देणे शक्य नसल्याने कंपनीने पुन्हा दरवाढ करण्याबाबतच्या हालचाली सुरु केल्या. त्यासंबंधीचा प्रस्ताव कंपनीने जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांना सादर केला. कुशवाह बोस्टनहून परतल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली आणि दरवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्याची विनंती केली. सद्यस्थितीत लहान वाहनांना टोल दरवाढू लागू करु नये, असा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. परिणामी अवजड वाहनांना दरवाढ सहन करावी लागणार आहे. सध्या नाशिक जिल्ह्यातील एमएच १५ आणि एमएच ४१ क्रमांक असलेल्या आणि अवजड वाहनांना (तीन ते सहा अॅक्सल) २१० रुपये टोलदर आहे. हाच टोल आता १५ नोव्हेंबरपासून तब्बल ६९० रुपये एवढा लागणार आहे. त्यामुळे अवजड वाहनधारकांनी या वाढीविरोधात असंतोष व्यक्त केला आहे. दिवाळीत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काही संघटनांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गिरणाचे पाणी आमच्या हक्काचे!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

जळगाव जिल्हा प्रशासनाची पालकमंत्री एकनाथ खडसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मालेगाव महानगरपालिकेला गिरणा धरणाचे पाणी देण्यास असमर्थता दर्शविण्यात आली आहे. या निर्णयाचा मालेगावकरांनी निषेध नोंदवला आहे. जळगाव जिल्हा प्रशासनाकडून मालेगावकरांचे गिरणा धरणातील हक्काचे पाणी पळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करतानाच, पाणी मिळविण्यासाठी आंदोलन करण्याचा इशाराही मालेगाववासीयांनी दिला आहे.

आधीच नाशिक-नगरमधून मराठवाड्याला पाणी सोडण्यास प्रचंड विरोध होत असून, आता मालेगाव शहराच्या अगदी नजीक असलेल्या आणि मालेगाव शहर व तालुक्याची तहान भागवणार्‍या गिरणा धरणाचे पाणी जळगाव जिल्हा प्रशासनाकडून मालेगावला देण्यास विरोध होत आहे. यंदा मालेगाव तालुका व शहरात पावसाचे प्रमाण सरासरीच्या कमीच राहिल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मालेगाव बाह्यचे आमदार व राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी नुकतेच तालुक्यातील १५० गावांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली असून, पाणीटंचाई बाबत उपयोजना करण्याचे आदेश दिले आहेत. तर शहरात मनपा महापौर हाजी इब्राहीम व आयुक्त किशोर बोरडे यांनीही पाणीटंचाई आढावा घेत सध्या शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो आहे.

यंदा पाऊस कमी झाल्याने मालेगावकरांची तहान भागवण्यात अत्यंत महत्वाचा असलेला जलस्त्रोत म्हणजे गिरणा धरण होय. मात्र, तेही केवळ १०० टक्के भरले आहे. अजूनही मालेगाव मनपा कडून ८०० दलघफू पाण्याची गिरणा धरणातून मागणी आहे. येत्या काही दिवसांत मालेगावचा पाणीप्रश्न चांगलाच पेटणार असून, खडसे यांच्या निर्णयाचा सर्वपक्षीय नेत्यांकडून निषेध नोंदविण्यात आला आहे.

गिरणा धरणाचे पाणी हे मालेगावकरांच्या हक्काचे पाणी आहे. जळगाव जिल्हा प्रशासनाने घेतलेला निर्णय हा एकतर्फी असून, आमचा त्याला विरोध आहे. काँग्रेस पक्ष याचा निषेध करीत असून, पाणी मिळविण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन करू. - आसिफ शेख, काँग्रेस आमदार , मालेगाव मध्य

शासनाने पिण्याच्या पाण्याला आधी प्राधान्य दिले आहे. गिरणा धरणातून जळगाव चाळीसगाव नांदगाव-मालेगाव अशा विविध शहरांना पाणी दिले जाते आहे. गिरणा धरणातून जळगावसाठी असलेल्या पाण्याला आमचा विरोध नसला तरी मालेगावकरांना त्यांच्या हक्काचे पाणी गिरणा धरणातून मिळालेच पाहिजे, अशी आमची ठाम भूमिका आहे. कोणत्याही परिस्थिती मालेगावचे हक्काचे पाणी मालेगाकरांसाठीच राहिल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. - दादा भुसे, सहकार राज्यमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा उत्पादनासाठी आता ‘चिंगळी’ प्रकल्प

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

कांदा तुटवड्यामुळे किरकोळ बाजारात किलोमागे वाढणारे कांदा भाव तर दुसरीकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरातही उत्पादन खर्चा इतकेही न पडणारे दाम बघता होणारी ओरड मोठ्या चर्चेचा अन् चिंतेचाही विषय. या सर्व बाबींवर उपाय म्हणुन आता वर्षभर कांदा उत्पादनासाठी 'चिंगळी' कांदा प्रकल्प राबवला जाणार आहे. कृषी विभागाच्या वतीने याबाबत नियोजन करताना पाऊल टाकण्यात आले आहे. जानेवारीपासून नाशिक जिल्हाभर इच्छुक शेतकऱ्यांची निवड करून सुधारित तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम राबविण्यात येणार आहे.

गेल्या दहा-पंधरा वर्षातील कांदा उत्पादन अन् त्याच्या बाजारभावाचा विचार केल्यास नाशिक जिल्ह्यात कांदा हा दोन ते अडीच हजार प्रतिक्विंटलच्या पुढे गेल्यास दिल्ली तो किरकोळ बाजारात ५ ते १० रुपये किलोमागे जातो. मग त्यातून या कांदा भावाबद्दल सुरू होते ती शहरी मध्यमवर्गीयांची ओरड. याअगोदर अनेकदा या कांदा भावाने अनेक राज्य सरकारांचा मोठा वांधा होताना काही ठिकाणी तर सरकारे देखील गडगडल्याची उदाहरणे. कांदा लागवडीचे क्षेत्र कमी होतानाच कांदा उत्पादनावर परिणाम करणारे घटक लक्षात घेतले तर प्रामुख्याने कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ, अवेळी होणारी गारपीट, बियाण्यांचा तुटवडा तसेच कांद्यावरील किडीरोगाने होणारे नुकसान या बाबी कारणीभूत ठरतात. या सर्व गोष्टींमुळे कांदा उत्पादन घटतांना मागणीच्या तुलनेत बाजारात कांद्याचा पुरवठा कमी झाला किंवा तुटवडा निर्माण झाला की आपोआपच किरकोळ बाजारातील कांदा भावाचा आलेख वर जातो. मात्र, गेल्या अनेक वर्षांत किरकोळ बाजारभावात वाढलेल्या कांदा भावाचा प्रत्यक्ष कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होत नाही.

ज्या शेतकऱ्यांकडे विहिरीत पाणी संरक्षित आहे किंवा ज्यांच्याकडे शेततळ्यात साठवण केलेले पाणी उपलब्ध आहे, त्यांच्याकडे 'चिंगळी' कांदा लागवडीचा कार्यक्रम येत्या जानेवारी महिन्यात कृषी विभाग राबवणार आहे. या उपक्रमांतर्गत येवला तालुक्यातील ५०० शेतकऱ्यांची निवड कृषी विभागामार्फत केली जाणार आहे.या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांकडे ठिबक सिंचन संच असणे बंधनकारक असणार आहे. या प्रकल्पात निवड केल्या गेलेल्या शेतकऱ्यांकडून प्रथमतः त्यांच्या शेतातील प्रत्येकी १० गुंठे क्षेत्रावर पोळ कांदा रोपे टाकून घेतली जाणार आहेत. पुढे दीड ते दोन महिन्यात लागवड केल्या गेलेल्या कांद्याच्या गाठी अर्थातच बारीक चिंगळी तयार झाल्यानंतर त्या गाठी शेतातून उपटुन घेतल्या जाताना त्याच्या जुड्या बांधुन सावलीत साठवण केली जाईल. जून-जुलै महिन्यात पाऊस पडल्यावर या गाठींची पुनर्लागवड केली जाणार आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोठ्या अपघाताची वाट पाहणार का?

$
0
0

गणेश पाटील, नाशिक

आहिल्याबाई होळकर पूल ते रविवार कारंजा पुढे मेहेर सिग्नलपर्यंत ट्रॅफिक जॅम होणे ही नित्याचीच बाब बनली आहे. या रस्त्यावर वाहन चालकांनाच नव्हे तर पायी चालणाऱ्या विद्यार्थी, महिला, वृद्ध नागरिकांनाही काय त्रास सहन करावा लागतो ते प्रत्यक्ष अनुभवल्यानंतरच लक्षात येते. तात्काळ उपाययोजना करण्याऐवजी महापालिका व पोलिस यंत्रणा मोठा अपघात घडण्याची वाट पाहतेय का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

रविवार कारंजाच्या वळणावर पूलापर्यंत अरुंद रस्त्याने दोन्ही बाजूने वाहतूक आहे. त्यातच म्हसरुळ, मखमलाबादचे प्रवाशी घेण्यासाठी रिक्षाचालक रिक्षा उभ्या करतात त्यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येत भरु पडते आहे. सुंदरनारायण मंदिर ते रविवार कारंजा वाहतूक बेटापर्यंत दुभाजक असावेत त्यामुळे रिक्षा व इतर वाहने उभी न राहता वाहतूक कोंडी होणार नाही. पोलिसांचा ताण कमी होईल. यशवंत मंडईसमोर दोन्ही बाजूने भाजीपाला, फळ विक्रेते आहेत त्यातील एक बाजुचा रस्ता मोकळा असावा. दुभाजकामुळे सुंदरनारायण मंदिराकडून येणारी वाहने डॉ. किबेंच्या दवाखान्याजवळून तेली गल्लीकडे वळसा न घालता कारंजाला वळसा घालून जातील. त्यामुळे या अरुंद रस्त्यात वाहतूक कोंडी होणार नाही.

रेडक्रॉस सिग्नलकडून रविवार कारंजाकडे विरूध्द दिशेने येणाऱ्या वाहनांना पोलिसांकडून मज्जाव करणे, या ठिकाणी मालाची चढ-उतार होणे, ठराविक वेळ ठरवून देखील दिवसभरात केव्हाही विशेषतः सायंकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत वर्दळीच्या वेळात ट्रक, टेम्पो दुकानासमोर उभे केले जातात. त्यांना वेळेची व दंडाची जाणीव करून देणे हे प्रशासनाचे काम आहे. शहर वाहतूक बस व्यतिरीक्त एसटीच्या बाहेर गावी जा-ये करणाऱ्या बसेस दिंडोरी नाक्याहून द्वारका मार्गे न जाता रविवार कारंजा मार्गे बस स्थानकात जातात. विशेषतः सप्तशृंगी गड, कळवण, पेठ, वापी इ. बसेस सर्रासपणे या अती वर्दळीच्या व अरुंद अशा भागातून येजा करतात. त्यांना प्रशासनाने मज्जाव करावा.

महाबळ गुरुजी चौक ते मेहेर सिग्नल (एमजी रोड) रस्त्यावर दुभाजक बसवावे, त्यामुळे तेथे वाहतूक कोंडी होणार नाही. दोन्ही बाजूने कार, वाहने पार्कींग करून देखील रस्त्यावर दुसरी वाहणे उभी केलेली असतात. त्यातून मार्ग काढीत वाहने, पादचारी जीव मुठीत घेऊन जात असतात. दुभाजकामुळे पार्कींग केलेल्या वाहनांव्यतिरिक्त इतर वाहनांना रस्त्यात थांबता येणार नाही.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांना मिळणार व्यवसाय शिक्षणाचे धडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना स्वावलंबी व आर्थिकदृष्टया सक्षम बनविण्यासाठी शाळांमध्ये व्यवसाय शिक्षण योजना राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच प्रात्यक्षिक ज्ञान मिळावे, या उद्देशाने विकसित केलेली ही योजना शाळांमध्ये लवकरच लागू होईल, अशी माहिती शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबईचे अवर सचिव श्रीनिवास शास्त्री यांनी दिली.

शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक आदींपर्यंत व्यवसाय शिक्षण योजनेची माहिती पोहोचवण्यासाठी के. के. वाघ शिक्षणसंस्थेत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी शास्त्री बोलत होते.

ते म्हणाले की, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाअंतर्गत ही योजना राबविण्यात येणार असून, राज्यातील ३५० सरकारी शाळांमध्ये ती सुरू करण्यात येणार आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना ऑटोमोबाईल, रिटेल, सिक्युरिटी मल्ट‌िस्कील फाऊंडेशन कोर्सेस आदी विषयांचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. पारंपरिक अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक शिक्षण मिळाले, तर त्याचा फायदा नक्कीच त्यांना भविष्यात होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच ही योजना जास्तीत जास्त शाळांमध्ये राबविणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या योजनेत विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना योजनेची माहिती करुन द्यावी, असे आवाहन शास्त्री यांनी यावेळी उपस्थितांना केले.

यावेळी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान पुणेचे सहसंचालक राजेंद्र शहाडे यांनी शाळांच्या बांधकामविषयक समस्यांबाबत मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक भगवान सूर्यवंशी यांनी केले. तसेच माध्यमिक स्तरावरील व्यवसाय शिक्षण योजनांसंबंधी माहितीही दिली. प्रा. योगिता भामरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरोहित एकांकिका स्पर्धा यंदापासून जिल्हास्तरावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळातर्फे ३७ वर्षापासून कै. वा. श्री. पुरोहित एकांकिका स्पर्धा घेतली जाते. शहर पातळीवरील ही स्पर्धा यंदापासून जिल्हास्तरावर २० ते २३ डिसेंबर दरम्यान होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष महेश दाबक आणि सचिव गजानन होडे यांनी दिली.

माजी मुख्याध्यापक आणि ज्येष्ठ रंगकर्मी वामनराव पुरोहित यांच्या स्मरणार्थ होणारी ही स्पर्धा पुढील वर्षी विभाग तर त्यापुढील वर्षी राज्यस्तरावर होणार आहे. प्रथम पारितोषिक ५०००, द्वितीय ३००० आणि तृतीय पारितोषिक १५०० असे आहे. इतरही पारितोषिक आहेत. स्पर्धा प्रमुख म्हणून सुधीर फडके (९८९०८९८९३९) आणि हेमंत देशपांडे (९४२०६९४३७५) काम पाहत आहेत. या स्पर्धेने रंगभूमीला डॉ. गिरीश ओक, कै. राजीव पाटील, कै. कुमार बापट, राजू पत्की, धनंजय वाबळे, स्नेहा कुलकर्णी, किरण समेळ, गौरी केंद्रे आदी कलाकार दिले आहेत.

गेल्या ११ वर्षांपासून संस्थेच्या नाशिक, नाशिकरोड, सिन्नर, इगतपुरी, नांदगाव या पाच संकुलातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून २४ एकांकिकेचे सादरीकरण प्रथम संकुल स्तरावर प्राथमिक फेरीत होते. नंतर प्रत्येक गटातील एक व ग्रामीण भागातील माध्यमिक गटात अशा चार एकांकिकांची अंतिम फेरी नाशिक येथे होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images