Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

साधूभेटीसाठी उद्या चव्हाण नाशिकमध्ये

$
0
0

नाशिक : कुंभमेळ्यातील साधू महंताच्या भेटीसाठी शुक्रवारी (दि. ११) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण पक्षाच्या शिष्टमंडळासह नाशिक दौऱ्यावर येत आहेत. चव्हाण आपल्या दौऱ्यात साधू महंताची भेट घेण्यासह शंकराचार्य अधोक्षानंदजी महाराज यांची भेट घेणार आहेत.

काँग्रेसच जम्बो शिष्टमंडळ कुंभमेळ्यातील सोयी सुविधांची पाहणी करण्यासह साधू महंताच्या भेटीसाठी शुक्रवारी येत आहेत. काँग्रेसचे राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी यात सहभागी होणार आहेत. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता चव्हाण रामकुंडाची पाहणी करणार असून त्यानंतर साधुग्राममध्ये जावून साधू महंताशी चर्चा करणार आहे. शंकराचार्य अधोक्षानंदजी महाराज यांची भेट घेणार आहे. त्यानंतर त्र्यंबकेश्वरला रवाना होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लासलगावला पावसाची दमदार हजेरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, लासलगाव

लासलगावसह परिसरातील गावांमध्ये बुधवारी दुपारी जोरदार पाऊस बरसला आहे. दुपारी दीड वाजेच्या सुमारास सुरू झालेला मुसळधार पाऊस सुमारे दोन तास बरसला. त्यामुळे लासलगाव शहरातील रस्ते जलमय होऊन ठिकठिकाणी पाणी साचले होते. सोमवारी लासलगावमध्ये पावणे दोन इंच पावसाची नोंद झाली आहे. तर मंगळवारी सायंकाळी लासलगावला दोन इंच पाऊस बरसला आहे.

मुसळधार पावसामुळे सोमवारी दुपारी कोटमगाव रोडवर झाड उन्मळून पडले तर टाकळी विंचूर येथे पाणी साचले. सप्तशृंगी नगर, होळकर नगर, यशवंत नगर, धनराज हॉटेल परिसर आदी रहिवाशी भागात ओहाळातील पाण्याचा विळखा पडला. महावीर जैन विद्यालयाजवळ रस्त्यावर पाणी आल्याने शाळा सुटते वेळी विद्यार्थांना काही वेळ ताटकळत थांबावे लागले. कोटमगाव रेल्वे पुलाखाली पाणी साचल्याने पुलाखालून जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.

पिकांना मिळाले जीवदान

लासलगाव, टाकळी विंचूर, विंचूर, बोकडदरे, शिवरे फाटा, निफाड आदी भागात मंगळवारी सायंकाळी उशिरा जोरदार पाऊस झाला. अनेक दिवसांपासून परिसरात पावसाने दडी मारल्याने शेतपिके धोक्यात आली होती. मंगळवारी झालेल्या पावसाने कांदा, सोयाबीन, मका, बाजरी या पिकांना जीवदान मिळाले आहे.

सटाण्यात ४४ मिलीमीटर पाऊस

सटाणा शहर व परिसरात गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळो नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, मंगळवार सायंकाळी शहरात एक तासात ४४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

सटाणा शहरासह परिसरात मंगळवार सांयकाळी कमबॅग केले. बुधवारी देखील दुपारी १२ वाजेच्या सुमारास पावसाचे जोरदार आगमन झाले. यामुळे शहरात सर्वत्र पाण्याचे डबके तयार झाले. गटारी व नाले दुथडू भरून वाहत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाच स्वीकारताना लोकसेवकाला अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

एरंडोल येथे बदली झालेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकाच्या नांदगाव येथील सेवा काळातील थकीत बिले मंजुरीसाठी पाठवणे व सेवापुस्तक अद्ययावत करून पाठवण्यासाठी २५०० रुपयांची लाच घेताना नांदगाव पंचायत समितीतील लोकसेवक सुनील वैद्य यांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी रंगेहाथ पकडले. तक्रारदार शिक्षकांनी याबाबत जळगाव अॅन्टी करप्शनकडे तक्रार केली होती. बुधवारी नांदगाव पंचायत समितीच्या प्रशासकीय कार्यालयाच्या समोरील चहा टपरीजवळ सापळा रचून वैद्य याला लाच स्वीकारताना पकडण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकांनी धरले प्रशासनाला धारेवर

$
0
0

सफाई कामगारांच्या मृत्यूप्रकरणाची होणार चौकशी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सातपूरमध्ये दोन सफाई कामगारांच्या मृत्यूप्रकरणी संबंधित कंपनीमालकावर गुन्हा दाखल करण्याची आक्रमक मागणी महासभेत सर्वपक्षीय सदस्यांनी केली. मनसेच्या नगरसेवकांनीही आक्रमक होत प्रशासनाला धारेवर धरत सफाई कामगारांच्या सुरक्षेसंदर्भात पालिकेच्या कारभाचीच पोलखोल केली. महापालिकेने या घटनेची उपायुक्तांमार्फत चौकशी सुरू केली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत.

बुधवारी महासभेत सोमेश्वरपाठोपाठ सातपूरमध्ये झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या मृत्यूप्रकरणी सदस्यांनी आक्रमक होत या दुर्घटनेला संबंधित कंपनीचा मालक जबाबदार असल्याचा आरोप केला. त्यामुळे संबंधित कंपनी मालकावरच गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. अजय बोरस्ते यांनी या घटनेला प्रशासनाला जबाबदार धरत दुर्घटनेतनंतर आजही अशीच परिस्थिती कायम असल्याचा आरोप केला. सुधाकर बडगुजर यांनी यांनी सुरक्षा साधने पुरविला जात नसल्याचा आरोप करीत या घटनेची तक्रार आपण सफाई आयोग आणि केंद्र सरकारकडे करणार असल्याचा दावा केला. प्रकाश लोंढे यांनीही कंपनीमालकावर टीका करीत कलम ३०६, ३०४ अन्वये गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली. मनसेचे नगरेसवक रमेश धोंगडे यांनी मनसेच्याच कारभाराचे वाभाडे काढले. मृत कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नाही तर, पुढच्या सभेत आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी महापौरांना दिला. सेफ्टी टँक कालांतराने साफ झाले पाहिजेत याचा नियम करण्याची मागणी विक्रांत मते यांनी केली. उपमहापौर गुरुमीत बग्गा यांनी अनधिकृत बांधकामाचा शोध घेण्यासह कंपनी मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

सदस्यांच्या आक्रमक भावना लक्षात घेतल्यानंतर महापौरांनी कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे आदेश खातेप्रमुखांना दिले. अशा दुर्घटना घडणार नाहीत, याचे पालन करण्याचे सांगत विनोद मारू याच्या पत्नीचे प्रोबेशन पिरियड तीन वर्षांऐवजी अकरा महिने करण्याचे आदेशित केले. सातपूरमधील सफाई कामगारांच्या मृत्युची उपायुक्त डी. टी. गोतीसे यांच्याकडे ही चौकशी सोपवण्यात आली असल्याची माहिती आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली.

आयुक्तांच्या खुलाशाने गूढ

महासभेत आयुक्तांनी सादर केलेल्या घटनेमुळे दुर्घटनेचे गूढ अधिक वाढले. संबंधित कंपनीने सेफ्टी टँक दोन तास आधीच उघडली होती. त्यानंतर दोन तासांनी पहिला टँक खाली करण्यात आला. त्यानंतर दोन कर्मचारी आत उतरले. माळी बेशुद्ध झाल्यानंतर मारू वाचवण्यासाठी गेला. त्यापाठोपाठ जाधव गेल्याचा क्रम आयुक्तांनी सांगितला. संबंधित कंपनीतील सीसीटीव्ही फुटेज व मोबाइल फुटेज मागवल्याची माहिती दिली. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना योग्य न्याय दिला जाईल, असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाभिमानी’कडून पुतळ्याचे दहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यास दुष्काळी जाहीर करावे, शेतकऱ्यांचे २०१६ पर्यंतचे वीजबिल माफ झालेच पाहिजे यांसह अनेक मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या पुतळ्याचे प्रतिकात्मक दहन केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यासाठी चाललेल्या २० कार्यकर्त्यांना पोलिसांनी कार्यालयाच्या आवारातच ताब्यात घेतले. कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध नोंदविला.

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असतानाही राज्य सरकार नाशिकला दुष्काळी जिल्हा जाहीर करीत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना बुधवारी दुपारी रस्त्यावर उतरली. सलग तीन वर्षांपासून जिल्ह्यात गारपीट, दुष्काळामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असून, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केलाच पाहिजे, जनावरांना चारा उपलब्ध करून द्या, केशरी रेशन कार्डधारकांना पिवळ्या रेशनकार्डधारकांप्रमाणे रेशन उपलब्ध करून द्या, रोजगार हमीची कामे सुरू करा, अशा मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी राज्य सरकारचा प्रतिकात्मक पुतळा दहन केला. जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या दालनाला टाळे ठोकण्यासाठी कार्यकर्ते चालले होते. मात्र, त्यांना कार्यालयाच्या आवारातच पोलिसांनी ताब्यात घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरिकांसाठी होणार नियम शिथिल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

पहिल्या शाही पर्वणीदरम्यान नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागले. यामुळे नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पोलिस आयुक्तांनी भद्र‌काली पोलिस ठाण्यात आढावा बैठक बोलावली होती. यावेळी नागरिकांनी विविध अडचणी मांडल्याने पोलिस आयुक्तांनी दुसऱ्या शाही पर्वणीत बंदोबस्त शिथिल करण्याचे आश्वासन दिले.

दुसरी शाही पर्वणी तेरा सप्टेंबर रोजी होणार आहे. यानिमित्त पहिल्या पर्वणीत झालेली गैरसोय व आलेल्या अडचणींसंदर्भात धार्मिक गुरू, नागरिक, लोकप्रतिनिधी, विक्रेते, व्यापारी, व्यावसायिक आदींचे अनुभव जाणून घेण्यासाठी भद्रकाली पोलिस ठाण्यात आयुक्त एस. जगन्नाथन यांनी आढावा बैठक बोलावली होती. पर्वणी काळात अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याची मुभा मिळावी, शहरांतर्गत वाहने फिरण्यासाठी कोणतेच प्रतिबंध नसावे, दूध बाजारात सकाळी व सायंकाळी दूध विक्रीची परवानगी असावी, गल्ली बोळात बॅरिके‌डिंग लावून रस्ते बंद करण्यात येऊ नये, सिंहस्थ पास असलेल्या व्यक्तीला कोठेच अडविण्यात येऊ नये, भाविकांना अन्नदानासाठी अन्नछत्राला ठिकठिकाणी स्टॉल उभारू द्यावे, या अन्नछत्रसाठी अन्नसुरक्षा विभागाची परवानगीची अट शिथिल करावी, अशा विविध मुद्यांवर बैठक गाजली.

पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी मनोगत जाणून घेऊन दूध विक्रेत्यांना सकाळी व सायंकाळी एक तास अगोदर दूध बाजारात प्रवेश दिले जाईल, अमरधाम येथे अंत्यसंस्कारसाठी बंदोबस्ताच्या दृष्टीने विचार केल्यानंतर निर्णय घेऊ, गल्ली बोळातील बॅरिकेडिंग कमी करण्याचे प्रयत्न करू, शहरांतर्गत फिरण्यासाठी शहर बससेवा व रिक्षांचा पर्याय उपलब्ध करून देऊ, लोकप्रतिनिधी व इतर समाजसेवकांना दिलेले सिंहस्थ पास हे त्या त्या ठिकाणी ग्राह्य मानून प्रवेश दिला जाईल, पर्वणी काळात सर्व दुकाने, हॉटेल्स उघडी राहतील याचे नियोजन राहील. बाह्य पार्किंगपासून भाविकांची पायपीट कमी करण्यासाठीचे प्रयत्न राहणार असून, नाशिकरोड येथून रेल्वेने येणाऱ्या भाविकांसाठी व्दारका, काठेगल्ली येथपर्यंत वाहनाने येण्याची सोय केली जाईल, असे पोलिस आयुक्तांनी उपस्थित नागरिकांना आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणींमध्ये फ्री स्टाईल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सर्वच क्षेत्रांमध्ये मुलांच्या तोडीस तोड ठरणाऱ्या मुलींनी कॉलेज कॅम्पसमधील दादागिरीवरही मंगळवारी ठसा उमटविला. मुलींच्या एका गटातील आपसातील वादांचे रुपांतर थेट मुलींच्या टोळीयुध्दात झाल्याने बीवायके कॉलेजबाहेरील बघे अवाक् झाले होते. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करत हा गोंधळ मिटविला.

मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमाराला बीवायके कॉलेजच्या मागील गेटबाहेर अचानक झालेल्या गोंधळामुळे रस्त्यावरील गर्दी घोळक्याच्या दिशेने वळाली. येथे चक्क मुलींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी सुरू होती. तीन ते चार मुलींच्या टोळक्याने एका मुलीला गेटबाहेर रोखून मारहाण केली. हा प्रकार रोखण्यासाठी मध्ये पडू पाहणाऱ्या नागरिकांना दूर सारण्याचे अन् हा गोंधळ सुरू ठेवण्याचे काम मारहाण करणाऱ्या मुलींचे मित्र करीत होते. दरम्यान वाढत चाललेल्या गोंधळानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकारातील मुलींना पोलिसांना बोलविण्याचा दम भरत रोखले. दरम्यान, मारहाण झालेल्या मुलीनेही काही वेळ अगोदर इतर मुलींच्या सहाय्याने या तीन ते चार मुलींच्या गटाला मारहाण केल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून समजते. या प्रकारातील सर्वच मुली या कॅम्पसमधील विद्यार्थीनी असल्याचे त्यांच्या युनीफॉर्मवरून लक्षात येत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या प्रकारामुळे या कॉलेजमधील मुलींमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

दरम्यान सोमवारीही काही वादाच्या मुद्यावरून एचपीटी कॅम्पसमधील तीन मुलींनी एका मुलास चोप दिला होता. तर मंगळवारी याच कॅम्पसमध्ये चॉपर बाळगणाऱ्या विद्यार्थ्यालाही संस्था प्रशासनाने ताब्यात घेतल्याची माहिती आहे. कॉलेज परिसरात घडणाऱ्या या घटनांमुळे कॅम्पस दहशतीखाली आहे. पोलिसांनी शहरातील सर्वच कॉलेज कॅम्पसमध्येही पेट्रोलिंग सुरू करून कॅम्पसमधील दहशत मोडीत काढावी, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांमधून व्यक्त होते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परतीचा दिलासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यंदा अधिक ओढ दिलेल्या पावसाने परतीच्या वाटेवर असताना पुनरागमन करून उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे. तब्बल दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पावसाने बुधवारी दिवसभरात शहर व उपनगरांसह जिल्ह्यात ठिकठिकाणी चांगली हजेरी लावली. त्यामुळे दुष्काळाच्या छायेत असलेल्या शेतकऱ्यांसह सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या आहेत. खरीपाच्या पिकांना दिलासा मिळावा तसेच पाणीटंचाईचे सावट दूर होण्यासाठी पावसाचा जोर अधिक वाढावा अशी प्रार्थना बळीराजासह सामान्य जणही करीत आहेत.

यंदा शहर व जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत अवघे सहा ते आठ दिवस पावसाने हजेरी लावली आहे. त्यातही तीनवेळा तुरळक सरीच कोसळल्या आहेत. जून व जुलैचा शेवटचा आठवडा वगळता अद्यापपर्यंत एकदाही दमदार पाऊस झालेला नाही. पावसाची सर्वत्र ओढ असताना परतीचा पाऊस दिलासा देईल, असे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

बुधवारी दुपारी शहराच्या विविध भागात तसेच येवला, लासलगाव, निफाड, सटाणा, इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर येथेही पावसाची चांगला जोर होता. लासलगावला अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी तुंबल्याचे दिसून आले. परतीच्या पावसाने शेतीला फार दिलासा मिळणार नसला तरी धरण साठ्यात वाढ होऊन आगामी काळातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. रामकुंड परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे तेथे सिंहस्थासाठी निर्माण करण्यात आलेल्या विविध सोयी-सुविधा कोसळल्याचे पहायला मिळाले.

पर्वणी नियोजनाची चिंता

यंदाच्या सिंहस्थातील दुसरी शाही पर्वणी येत्या रविवारी होत आहे. या दिवशी पाऊस राहिल्यास त्याचा परिणाम सिंहस्थ नियोजनावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनही काहीसे चिंतेतच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फुलांची रेडिमेड आरास

$
0
0

प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प

पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे फुलांची बाजारपेठ सध्या म्हणावी तशी बहरलेली नाही. त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान सजावटीसाठी यंदा कृत्रिम फुलांनाच मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जात आहे. दुकानांमध्ये विविधरंगी फुलांचे नानाविध प्रकार व त्याच्या सजावटीसाठी लागणारे सिरेमिक पॉट यांच्या खरेदी नाशिककर करत आहेत.

गणेशोत्सवासाठी बाजारात प्लास्टिक व कापडापासून बनविलेल्या फुलांचे बुके, फ्लॉवर पॉट, फ्लॉवर ट्री, फ्लॉवर स्टँड, फुलांचे तोरण, फुलांचे हार याची मोठी रेंजचं उपलब्ध झाली आहे. शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेसोबतच नाशिक-पुणे महामार्गावरील गांधीनगर गेटसमोर, मुंबई नाका, सातपूर, पाथर्डी फाटा, म्हसरूळ या भागात या फुलांची मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू आहे. ताजी फुले काही तासांनी सुकून जातात, परंतु ही कृत्रिम फुले मात्र वर्षानुवर्षे टिकातात. त्यामुळेही या फुलांना प्राधान्य दिले जात आहे. मुंबईसह दिल्ली, उत्तर प्रदेश यासारख्या भागातून नाशिकमध्ये ही फुले आयात केली जात आहेत. तसेच या फुलांची किंमतही फारशी नसल्याने ग्राहकांना कमी पैशात सजावटीसाठी ही फुले उपलब्ध आहेत. लाल, पिवळा, जांभळा, नारंगी, गुलाबी यासारख्या फ्रेश रंगांच्या फुलांची चलती आहे.

'नैसर्गिक फुलांच्या तुलनेत या फुलांची किंमत बरीच कमी असते. त्याचसोबत ही फुले दीर्घ काळ टिकतात. कितीही जुनी असली तरी पाण्याने धुतल्यानंतर लगेचच ही फुले टवटवीत दिसू लागतात. ग्राहकांनी गुंतवलेला पैसाही वसूल होतो.' - सुखबिरसिंग जाटप, विक्रेता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकेश्वरला श्रावण सरींची हजेरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथे गुरुवारी दुपारी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने करपण्याच्या मार्गावर असलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. त्याशिवाय, दोन दिवसांवर आलेल्या दुस-या शाही पर्वणीसाठीही उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले आहे. अचानक आलेल्या पावसाने भाविकांची मात्र तारांबळ उडाली.

अचानक आलेल्या श्रावण सरींनी वातावरणात गारवा निर्माण झाला असून, भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे निर्माण होऊ पाहत असलेल्या आरोग्याच्या समस्याही दूर होण्यास मदत होणार आहे. या पावसाने शेतात कोमेजलेल्या पिकांना जीवदानच मिळाले. भात, नागलीबरोबरच भाजीपाल्यासाठीही हा पाऊस लाभदायक ठरणार आहे. मात्र, संपूर्ण पावसळ्यात पावसाचे घटलेले प्रमाण पाहता कृषि अधिकारी अजय सूर्यवंशी यांनी यंदा उत्पादनात घट येण्याची भीती व्यक्त केली आहे. तालुक्यात यावर्षी ऑगस्ट अखेर ९४० मिमी पाऊस झाला आहे. मात्र, मागील वर्षी तोच पाऊस १०६६ मिमी होता.

अर्थात केवळ ऑगस्ट महिन्यात गतवर्षी ४१४ मिमी पाऊस झालेला होता. यंदा तो १२६ मिमी इतकाच आहे.केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबुन असलेल्या नागली वरई आणि भात यांना वाढीच्या अवस्थेत कमी पाऊसाने चांगलाच फटका बसला आहे. काही दिवसांपासून कडकडीत ऊन व बदलते तापमान यामुळे या पिकांच्या वाढीवर व उत्पन्नक्षमतेवर परिणाम होत आहे. त्याचप्रमाणे करपासारख्या रोगाचा प्रादुर्भावही वाढतो आहे.

चार दिवस बरसणार पाऊस?

नाशिक : नाशिक जिल्हाभरात बुधवारी दिवसभरात ७० मिमी पावसाची नोंद झाली असून येत्या चार दिवसात पावसाचा मुक्काम कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. त्यातच परतीच्या पावसाच्या सरी बुधवारी कोसळल्याने या पावसाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. नाशिकमध्ये ३६.१, इगतपुरीत १४, दिंडोरी १, त्र्यंबकेश्वर ३, मालेगाव २, चांदवड ५.४, बागलाण ५, निफाड १.६ आणि येवल्यात २ अशा एकूण ७०.६ मिलीमीटर पावसाची बुधवारी नोंद झाली. पिंपळगाव बसवंत येथेही पावसाने चांगली हजेरी लावली. नाशिक शहरातही अधून मधून काही भागात पावसाच्या सरी कोसळल्याने समाधानाचे वातवरण होते.

बळीराजा सुखावला

आगामी चार दिवस परतीचा पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला असून, हा पाऊस झाल्यास जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट काही प्रमाणात दूर होऊ शकते, तसेच पिण्याच्या पाण्याचे संकटही काही प्रमाणात दूर होणार आहे. परतीचा पाऊस पडावा यासाठी बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणे कोरडी, चाराही मिळेना!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

गेल्या दोन-तीन वर्षांत पावसाने फिरवलेली पाठ आणि केवळ नावापुरताच झालेला पाऊस यामुळे मालेगाव तालुक्यात यंदा देखील दुष्काळाची धग सोसावी लागणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्या तीन महिन्यात तालुक्यात सरासरीच्या ४८ टक्के म्हणजे अवघा २३२ मिलीमीटर पाऊस झाल्याने दुष्काळाच्या भीषण परिस्थितीला तालुक्याला सामोरे जावे लागते आहे त्यामुळे हातातोंडाशी आलेले शेतीचे पीक करपून वाया जाते आहे तर पिण्याच्या पाण्यासह मुक्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अधिकच गंभीर होतो आहे. तालुक्यातील सुमारे ७० टक्के खरिपाची पिके पाण्याभावी नष्ट झाली आहेत. गावोगावी दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या असून, शेतीतले पीक डोळ्यादेखत जळताना पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे.

जूनच्या सुरुवातीला पेरणीपुरता आलेला पाऊस नंतर मात्र गायब झाला आहे. त्यामुळे शेतीसोबतच पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. शहर व तालुक्याला पाणीपुरवठा करणारी धरणे, तलाव, विहिरी यांनी तळ गाठला असून, शेतीला नाही तर किमान पिण्याला तरी पाणी भविष्यात राहील का? अशी परिस्थिती ओढवली आहे. यंदा तर गेल्या तीन महिन्यांत वरुणराजानं चांगलीच पाठ फिरवली आहे. यंदाच्या पावसाळ्यात तालुक्यात जूनमध्ये १५४ मिमी, जुलैत १७.०० मिमी तर ऑगस्टमध्ये ६१.०० मिमी इतकाच पाऊस झाला.

त्यातही मोठ्या प्रमाणात असमतोल राहिला असल्याने जूनच्या प्रारंभी मोठ्या आशेने खरीपाची पेरणी केलेल्या पिकांची पाण्याअभावी करपून वाया जाण्याची वेळ आली आहे. सरासरी ४८० इतकं वार्षिक पर्जन्यमान असलेल्या मालेगाव तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत अवघा २३२ मिलीमीटर म्हणजे निम्म्याहून देखील कमी पाऊस झाला आहे. पावसाने दिलेली ही हूल मात्र तालुक्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी ठरली असून, त्यामुळे शेतीचे अर्थकारण पुरते कोलमडले आहे .

जूनच्या प्रारंभी मालेगाव तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने मागील वर्षी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्याचे झालेले नुकसान यंदा खरीप हंगामात भरून निघेल अशी आशा शेतकऱ्याला होती. प्रारंभी झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी महागडी बी बियाणे, खते विकत घेत पेरण्याही केल्या; मात्र त्यानंतर पावसाने चांगलीच दडी मारल्याने शेतकरी चांगलाच चिंतेत सापडला अन् दुबार पेरणीचे संकट त्याच्यावर ओढवले. आता तर जवळपास ७० टक्के पिके करपून वाया जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एकीकडे शेतीची अवस्था अशी झालेली असतांना तालुक्याला आणि शहराला पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न भेडसावू लागला आहे. तालुका आणि शहराला पाणी पुरवणारे गिरणा धरण आटले असून, ३ टक्क्यांपेक्षा कमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याने पाणीपुरवठा योजनांनी पाणिकपतीचा निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. शहराला दोन दिवसाआड तर तालुक्यात अनेक गावांना आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी चांगलीच पायपीट नागरिकांना करावी लागते आहे. गावातील अनेक विहिरींना तलावांनी तळ गाठला असून, पिण्याचा पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर स्वरूप धारण करणार असल्याची चिन्हे आहेत.

यंदाचा पावसाच्या मोसमातील हा अखेरचा महिना सुरू असल्याने किमान परतीच्या पावसाने तरी काही दिलासा मिळेल या आशेन शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. गावोगावी हाताला काम नसल्याने हताश झालेला शेतकरी शेतमजूर रिकामाच बसून आहे तर शहरातील व्यापार उलाढाल देखील मंदावली असल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण परसले आहे. सर्वसामान्य नागरिक पावसाअभावी भाजीपाला पिकाचे उत्पन्न कमी झाल्याने महागाईला सामोरे जायचे कसे, अशा गर्तेत सापडला आहे .

चाऱ्याची मागणी

तालुक्यातील भीषण टंचाईचा परिणाम मुक्या जीवांवर देखील झाला आहे. जनावरांना चारा व पिण्याचे पाणी उपलबद्ध करून देण्यासाठी शेतकर्‍यांना चांगलीच दमछाक करावी लागते आहे त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी करपून वाया जाणार्‍या उभ्या पिकातच चर्‍यासाठी आपली जनावरे सोडून दिल्याचे देखील प्रकार घडत आहेत . पंचायत समितीकडे अद्याप चारा छावणी साठी प्रस्ताव आलेला नसला तरी दुष्काळाची दिवसेंदिवस वाढणारी तीव्रता लक्षात घेता तालुक्यातील अनेक गावातून चारा छावण्यांसाठी मागणी येवू शकते या पार्शवाभूमीवर प्रशासन तयारीला लागले आहे .

- तालुक्यावर आलेले दुष्काळाचे भीषण संकट लक्षात घेता स्वतः सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी मागील आठवड्यात प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या समवेत दुष्काळ आढावा बैठक घेतली. दिवसेंदिवस गंभीर होत असलेली परिस्थिति लक्षात घेता प्रत्येक गाव पातळीवर दुष्काळासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी अधिकार्‍यांना केल्या आहेत .

- दुष्काळाच्या भीषण संकटाला सामोरे जात असतांना मालेगाव शहर व परिसरात गेल्या काही दिवसात अधूनमधून आकाशात दाटून येताना परतीच्या पावसाची आशा लागली असली आहे. या आठवड्यात मंगळवारी पावसाने अचानक हजेरी लावल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र पावसाच्या परतीच्या प्रवासात तरी काही कृपा होईल या आशने बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे .

टँकरची मागणी

पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने गावाकडे असलेले तलाव विहीरी आटू लागले आहेत. अद्याप तालुक्यात दुंधे गावाला तळवाडे डॅममधून २३ एप्रिल पासूनच शासकीय ट्रँकरद्वारे रोज २ फेऱ्यांत पाणीपुरवठा केला जातो आहे. तसेच ,तालुक्याच्या संभाव्य पाणी टंचाई आराखड्यात एकूण १२ गावे टँकरग्रस्त असून त्याठिकाणी देखील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता टँकरने पाणीपुरवठा करण्याची परिस्थिती दुष्काळजन्य परिस्थितीमुळे ओढवू शकते.

विहीर अधिग्रहण

तालुक्यातील रावळगाव, वडनेर, खाकुर्डी, चंदनपुरी, वाजिरखेडे, वळवाडे, झोडगे या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होत चालली असल्याने रावळगाव येथे आधीपासूनच एक विहीर अधिग्रहीत करण्यात आली आहे. वडनेर गावात खाजगी विहिरीचा प्रस्ताव तहसील कार्यालकडे सादर करण्यात आला आहे तर अन्य गावात देखील संभाव्य विहीरींचे अधिग्रहण केले जावू शकते, अशी परिस्थिती सध्या आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिनेमॅक्समधील फास्टफूडकडून लूट

$
0
0

आनंद करंजीकर, नाशिक

सिनेमॅक्सच्या फूड स्टॉलवाल्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मल्टिप्लेक्समध्ये विकले जाणारे खाद्यपदार्थ मूळ किमतीपेक्षा दुप्पट किंमतीने सर्रास विकल्या जातात. सिनेमॅक्समध्ये या पद्धतीने ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे चित्र आहे.

सिनेमॅक्समध्ये असलेल्या काही पदार्थांच्या किंमती अक्षरशः बाजारभावापेक्षा चार पटीने विकल्या जातात. समोसा ३५ रुपये प्रती नग ज्याचा बाजारभाव १२ रुपये आहे. बरं इथे ग्राहकांना निर्णय स्वातंत्र्यही नाही. तिकीट काऊंटरवर तुम्हाला जबरदस्तीने कॉम्बो पॅक दिला जातो. ज्यामध्ये तिकीटाच्या बिलासोबत या पदार्थांचीही किंमत ग्राहकांना मोजावी लागते.

यामध्ये इतर पदार्थांचा विचार करायला गेले तर पॉपकॉर्न १८० रुपये ज्याची मूळ किंमत बाजाराच ४० रुपये इतकी आहे. बाजारात कुठेही स्पेशल चहा १५ रुपयांपेक्षा अधिक नाही. मात्र, सिनेमॅक्समध्ये चहाच्या एका कपासाठी ७० रुपये वसूल केले जातात तर सॅन्डवीच चक्क १२० रुपयांना. बाजारात कुठेही ४० रुपयांपेक्षा अधिक किंमतीला सॅन्डवीच मिळत नसेल. पाण्याची बाटली सुद्धा ४० रुपये विक्री करून ग्राहकांची उघडपणे लुबाडणूक केली जात आहे.

बरं थिएटर असलेल्या मॉलमधून खरेदी केलेले खाद्यपदार्थही सिनेमॅक्सच्या आवारात आणण्यास विरोध केला जातो. ही दुहेरी अडवणूक. पण यापेक्षा विशेष आश्चर्यकारक बाब म्हणजे कुणीही सिनेमॅक्सच्या या मुजोरीला विरोध करीत नाही. कारण प्रत्येक जण हाच विचार करतो की कुठे आपल्याला रोज यायचे आहे. कुठे पाच पन्नास रुपयांसाठी भांडण करायचे? अहो प्रश्न रोज न येण्याचा अथवा पाच पन्नास रुपयांसाठीचा नसून तेथील खाद्य पदार्थांना बाजारभावापेक्षा चार पटीने पैसे जास्त देणे हा तर चुकीचे आहे. पण तिकीटापेक्षा खाद्यपदार्थच महाग असल्याचे चित्र आहे. बाजारात भाजी किंवा दोन-चार रुपयांसाठी घासघीस करणारे मात्र अशा ठिकाणी मूग गिळून बसतात. त्यांच्यामुळेच सिनेमॅक्समधील फास्टफूडवाल्यांची मुजोरी वाढत चालली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थ सुविधांवर चोरट्यांचा डोळा

$
0
0

नामदेव पवार, सातपूर

सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिक आणि त्र्यंबकमध्ये येणाऱ्या भाविकांसह साधू महंतांच्या सोयीसाठी प्रशासनाने ठिकठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, या सुविधांचा लाभ सामान्यांपेक्षा चोरट्यांनीच घेण्यास सुरुवात केली आहे. चोरट्यांनी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, शौचालयातील साहित्य आणि कचरा टाकण्यासाठी ठेवलेले ड्रमवर यांची चोरी केली आहे. दरम्यान, पुढील दोन पर्वणीत तरी प्रशासनाने उभारलेल्या या सुविधा राहतील का, असा प्रश्न निर्मार झाला आहे.

त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये होत असलेल्या कुंभमेळ्यासाठी देशविदेशातून लाखो भाविक येत आहेत. त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासनाकडून खास काळजी घेतली जात आहे. यामध्ये पार्किंगची व्यवस्था, स्वच्छतागृहे, वस्त्रांतरगृहे, शौचालये, पिण्याच्या पाण्यासाठी ठिकठिकाणी व्यवस्था केले जातात. मात्र, पहिली पर्वणी उलटल्यानंतर प्रशासनाने उभारलेल्या अनेक सुविधांवर चोरट्यांकडून हात साफ केला जात आहे. यामध्ये मुख्य म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या टाक्यातच चोरट्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. शौचालये व कचरा टाकण्यासाठी ठेवलेल्या ड्रमची देखील चोट्यांकडून चोरी होत केल्याचे त्र्यंबकेश्वर रस्त्यावर दिसून आले आहे. यामुळे पुढील दोन सिंहस्थ पर्वणी शाहीस्नान काळात प्रशासनाने भाविकांसाठी उभारलेल्या सुविधांची देखभाल करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

खंबाळेत नळ-पाईपच गायब

त्र्यंबकेश्वरला सिंहस्थाच्या शाहीस्नानाला जाण्यासाठी खंबाळे येथे प्रशासनाने वाहने पार्किंगची व्यवस्था केली आहे. मात्र, पोलिसांच्या अतिसुरक्षेमुळे अनेक भाविकांनी पहिल्या शाहीपर्वणीत पाठ फिरवली. खंबाळे येथे भाविकांसाठी निवारा शेडसह पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व शौचालयाची निर्मिती केली. मात्र, अनेक पाण्याच्या टाक्या, पाईप आणि नळांची चोरी झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवा कल्याणार्थ ५१ मठांची स्थापना

$
0
0

शंकराचार्य अधोक्षजानंद यांची घोषणा

म. टा. प्रतिनिधी नाशिक

देशातील युवा पिढी भरकटत असून त्यांना योग्य दिशा देण्यासाठी ५१ मठांची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा शंकराचार्य अधोक्षजानंद यांनी केली. गोवर्धन पीठाचे जगदगुरू शंकराचार्य अधोक्षाजानंद स्वामी महाराजांच्या वतीने धर्मसंमेलन झाले. यावेळी विविध आखाड्यातील साधू महंतांनी हजेरी लावत धर्मरक्षणासाठीच्या उपाययोजनांवर उहापोह केला.

साधुग्राम येथे धर्म संसद संमेलनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री गेगांग अपांग हजर होते. यावेळी बोलतांना अधोक्षजानंद म्हणाले, की देशात अराजकता माजली आहे. तरुणांना योग्य दिशा नाही. मानवाच्या हातून सत्कृत्य घडावे. तरुणांमध्ये देशभक्ती वाढीस लागावी, व्यसनमुक्त तरुण घडावा यासाठी संपूर्ण भारतात ५१ मठांची स्थापना करण्यात येणार आहे. यातील मणीपूर, सिक्कीम, आसाम, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, मेघालय या ठिकाणी १५ मठ स्थापण्यात येणार आहेत. तसेच जम्मू व काश्मिरमधील युवक व्यसनाधिन होत असून त्यांना योग्य दिशा देण्यासाठी १० मठांची स्थापना करण्यात येणार आहे. या मठांमधून भरकटलेल्या तरुणांना समाजात परतण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. राजस्थान, पंजाब, गुजरात येथे काही लोकांकडून मोठ्या प्रमाणात राष्ट्र विरोधी कारवाया होत असून तेथील तरुणांनी योग्य दिशा मिळावी यासाठी तेथे विशेष प्रयत्न केले जात आहेत. जीवनापासून भरकटलेल्या तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती जागृत व्हावी हा एकमेव उद्देश असल्याचे स्वामी म्हणाले.

गेगांग अपांग म्हणाले, की सीमेबाबत अनेक कपोलकल्पित बातम्या पसरवल्या जात आहे. भारत आणि चीन यांच्यात १९६२ आणि १९८४ मध्ये काही प्रमाणात वाद झाले होते. मात्र, त्यानंतर गंभीर परिस्थिती उद्भवलेली नाही त्यामुळे भारतातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे ते म्हणाले. यावेळी अपांग यांनी साधुग्राममधील विविध आखाड्यांना भेटी दिल्या. तसेच विविध राजकीय कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वक्फ’ला मिळाला सीईओ

$
0
0

खान नजमुल इस्लाम, जुने नाशिक

अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्याविना निराधार झालेल्या राज्य वक्फ बोर्डाला तात्पुरता पदभार स्वीकारण्यासाठी शिलेदार मिळाला आहे. औरंगाबाद येथील भूमी अभिलेख कार्यालयातील अधीक्षक नसीमबानो पटेल यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.

वक्फ बोर्डाचे अध्यक्षपद रिक्त असतानाच सीईओ म्हणून रुजू झालेल्या सय्यद एजाज हुसेन यांनी धाडसी निर्णय घेत आपल्या कामाची वेगळी छाप पाडली. मात्र, वक्फ बोर्डाच्या ‌जमिनींवर डोळा असलेल्या भूखंडमाफियांसह बोर्डच्या काही सदस्यांकडूनच हुसेन यांची कोंडी करण्यात आली. नेहमी होणाऱ्या या त्रासाला कंटाळून हुसेन यांनी बदली मागून घेतली. त्यामुळे अगोदरच अध्यक्ष नसलेल्या बोर्डचा कारभार पाहण्यासाठी कुणाचे नेतृत्वच शिल्लक राहिले नाही. या प्रश्नावर 'महाराष्ट्र टाइम्स'ने प्रकाश टाकल्यानंतर त्यांची सरकारी पातळीवर दखल घेण्यात आली. औरंगाबाद येथील भूमी अभिलेख विभागातील अधीक्षक नसीमबानो पटेल यांच्याकडे बोर्डच्या 'सीईओ'चा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला. त्यांनीही तो पदभार स्वीकारला आहे.

भूमाफियांची बेबंदशाही

वक्फ बोर्डाच्या मालकीच्या राज्यभरात सुमारे एक लाख एकर जमिनी आहेत. त्यापैकी सुमारे ७० टक्के जमिनींवर भूमाफीयांनी अतिक्रमणे केले आहे. याबाबत चौकशी समितीने राज्य सरकारला अहवालाद्वारे माहिती देखील दिली आहे. पुढील कारवाईसाठी या अहवालास विधीमंडळाची परवानगी मिळणे आवश्यक आहे. दरम्यान, राज्य सरकारने सात वर्षांपासून रिक्त असलेले वक्फ बोर्डच्या अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर केली. मात्र, त्यावर नवव्यांदा अखेरच्या क्षणी स्थगित दिली. या सर्व घडामोडींमुळे भूमाफीयांचे फावले होते.

विविध समस्यांचा सामना

बोर्डाचे तत्कालीन 'सीईओ' सय्यद एजाज हुसेन यांनी औरंगाबाद जिल्हा न्यायालयात न्यायाधीश म्हणून बदली करून घेतल्यानंतर त्यांच्या जागी येण्यास कुणीही इच्छूक नसल्याचे दिसून आले. हुसेन यांच्याजागेवर रेहान काझी यांना पदभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, भूमाफीयांची दहशतीमुळे त्यांनी सीईओचे प्रभारी पदभारही स्वीकारालाच नाही. अपुरे कर्मचारी आणि अनेक वर्षांपासून अनुदानच मिळत नसल्याने राज्य वक्फ बोर्ड विविध समस्यांना तोंड देत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आज घडणार ‘बाप्पासाठी ज्वेलरी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गणरायाच्या आगमनाची घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये जोरदार तयारी सुरू झाली आहे. बाप्पाच्या आगमनात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने तयारीला लागला आहे. याच पार्श्वभूमीवर 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फेही 'बाप्पासाठी ज्वेलरी' हे हटके ज्वेलरी मेकिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे.

आज (दि. ११) दुपारी ३ ते ५ या वेळात शालिमार येथील आयएमए हॉलमध्ये हे वर्कशॉप होणार आहे. नेहा खरे यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. आपल्या लाडक्या बाप्पासाठी स्वतः तयार केलेली ज्वेलरी घालण्याची मजा वेगळीच आहे. पण अनेकदा ही ज्वेलरी बनवायची कशी? याची माहिती नसल्यामुळे ज्वेलरी बनविण्यास आपण धजवत नाही. हा विश्वास या वर्कशॉपद्वारे निर्माण होऊन प्रत्येकजण आकर्षक ज्वेलरी करण्यास शिकता येणार आहे.

मुकूट, बांगड्या, बाजुबंद, तोडी, पैंजण, नथ, कुड्या, हार, गजरा, कंबरपट्टा, अंगठी असे अनेक आकर्षक दागिने शिकण्याची संधी या वर्कशॉपमध्ये मिळणार आहे. कल्चर क्लब सदस्यांसाठी ५० रुपये तर इतरांसाठी १०० रुपये फी ठेवण्यात आलेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कालिदासला आज ‘जरा हवा येऊ द्या’

$
0
0

म.टा खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबच्यावतीने खास वाचकांसाठी आज शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता महाकवी कालिदास कलामंदिर येथे संतोष पवार यांचे प्रसिध्द नाटक 'जरा हवा येऊ द्या' चे सादरीकरण होणार आहे.

या नाटकात संतोष पवार, मुकेश जाधव, श्रृती कुलकर्णी यांनी भूमिका केलेल्या आहेत. नाटकाचे दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना व संगीत संतोष पवार यांचेच आहे. नाटकाची निर्मिती समीर चौगुले यांनी केलेली आहे. नाटक वन्समोअर या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आले आहे.

जे कल्चर क्लब सदस्य आहेत व ज्यांनी या नाटकाची तिकिटे नेलेली नाहीत ते आज, शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी साडे अकरा ते एक या वेळेत मटा कार्यालयातून (महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर बिल्डिंग, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड ) तिकिटे घेऊन जाऊ शकतात.

या नाटकाची तिकिटे पूर्वीच कल्चर क्लब सदस्यांना देण्यात आली आहेत. त्याच तिकिटांवर प्रवेश देण्यात येणार आहे. ज्यांनी आधी तिकिट नेले असतील त्यांना पुन्हा तिकिटे घेता येणार नाहीत. तिकिट हरवले असल्यास ती संपूर्ण जबाबदारी सदस्याची राहील. ही ऑफर फक्त कल्चर क्लब सदस्यांसाठीच आहे. त्यांना एका कार्डवर दोन तिकिटे मिळणार आहेत. ही ऑफर तिकिट संपेपर्यंत व दिलेल्या वेळेपुरतीच मर्यादित आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

दहा महिन्यांपूर्वी लहवित गावात किरकोळ कारणावरून आपसात झालेल्या वादातून तरुणाला जखमी केल्याप्रकरणातील आरोपीला देवळाली कॅम्प पोलिसांनी निफाड येथून अटक केली. गणपत नामदेव मुंडे (२७) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

गणपतने त्यांच्याच गावातील रहिवासी व मित्र असलेल्या सचिन गणपत काळे याच्यावर चाकूने हल्ला केला होता. सचिन गंभीर जखमी झाला होता. घटना ८ ऑक्टोबर २०१४ रोजी घडली होती. तेव्हापासून गणपत फरार होता. गणपत निफाड तालुक्यातील चाटोरी गावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक प्रकाश निकम यांच्यासह शिपाई अल्लाउद्दिन शेख, झाडे, डांगळे यांनी त्याला अटक केली. गणपतविरोधात गुन्हा दाखल करून त्याची नाशिकरोड कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, जखमी सचिनवर उपचारासाठी आतापर्यंत आठ लाख रुपये खर्च झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालिकेच्या मृत्यूचे स्थायीत पडसाद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

सिडकोतील गणेश चौकात घंटागाडीखाली सापडून नऊ वर्षीय बालिका नेहा ठाकरे ठार झाली. प्रभाग क्रमांक ४३ मधील या घटनेचे तीव्र पडसाद गुरूवारी स्थायी समितीवर उमटले. संबंधित घटनेला ठेकेदार, स्वच्छता निरीक्षक आणि ड्रायव्हर जबाबदार असल्याचा आरोप करीत, तिघांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सदस्यांनी केली.

सदस्यांनी आरोग्य विभागाचे वाभाडे काढले. घंटागाड्यांच्या अवस्थेवर चिंता व्यक्त करीत आणखी किती बळी देणार, असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला. सभापतींनी संबंधित ठेकेदार व स्वच्छता निरीक्षकावरही गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. सोबत घंटागाड्यांची तपासणी केल्याशिवाय त्या उद्या बाहेर काढू नका, असे फर्मान सोडले आहे. राहुल दिवे यांनी या प्रकरणाला जबाबदार असलेल्या अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करा अन्यथा कामकाजावर बहिष्कार टाकू, असा इशारा त्यांनी दिला. यशवंत निकुळे यांनी घंटागाड्यांची स्थिती वाईट असल्याचे सांगून त्यांची देखभाल व दुरूस्ती होत नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. संबंधित गाडीचा चालक हा दारू प्यायला असून, गाडीचा ब्रेकही लागला नाही. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप केला. गाड्यांची देखभाल ठेकेदाराकडे असतांनाही तो दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. रत्नमाला राणे यांनी हा काळा दिवस असल्याचे सांगून अधिकारी आणि ठेकेदांराची मुलगी गेली असती तर काय केले असते, असा सवाल केला. घंटागाड्यांचे आरटीओचेही पासिंग झालेले नाही. संबंधित ड्रायव्हर हा दारू प्यायलेला होता, असाही आरोप करण्यात आला. कर्मचा-यांची टेस्ट करूनच त्यांना कामावर घ्यायला हवे, अशी मागणी सदस्यांनी केली. यावेळी सदस्यांनी महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढत, आरोग्य विभागालाच आरोपीच्या पिंज-यात उभे करीत या गलथान कारभाराचे आणखी किती बळी द्यायचे असा सवाल सदस्यांनी केला.

सभापती शिवाजी चुंभळे यांनीही तीव्र संताप व्यक्त करीत आरोग्याचा खेळ बंद करा, असा आदेश देत, गाड्याबाहेर पडण्यापूर्वी त्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले. घटनादुर्दैवी असल्याचे सांगून संबंधित घटनेला ड्रायव्हर, स्वच्छता निरीक्षक व ठेकेदार जबाबदार आहेत. त्यामुळे हे गुन्हेगार असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले.

१५ लाखांची मदत द्या!

संबंधित घटनेला मनपा प्रशासन आणि संबंधित ठेकेदार जबाबदार आहेत. त्या मुलीच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबावरच संकट कोसळले आहे. त्यामुळे ठेकेदार आणि महापालिकेने मुलीच्या कुटुंबीयांना १५ लाखाची आर्थिक मदत करावी, असे आदेश सभापतींनी दिले. संबंधित रक्कम प्रशासन आणि टेकेदाराने कशी द्यायची ते बघा, मात्र तात्काळ मदत करा असे आदेश सभापतींनी दिले आहेत.

मॅडम, माझी दीदी गेली हो!

अपघातात मरण पावलेली नेहा ठाकरे ही नवीन नाशिक सिडकोतील मविप्रच्या अभिनव बाल विकास मंदिर या शाळेत इयत्ता तिसरीत शिकत होती. शाळेत अत्यंत हुशार असणा-या नेहाचा मृत्यू झाल्याचे कळताच शिक्षिका अर्चना आहेर व मुख्याध्यापिका जया शिंदे ह्या तिच्या घरी पोहचल्या. नेहाच्या आईने शिक्षिका आहेर यांना पाहिल्यावर `मॅडम माझी दीदी गेली हो` असा टाहो फोडला. शिक्षिका आहेर व मुख्याध्यापिका शिंदे यांनाही रडू कोसळले. अभिनव बाल विकास मंदिर शाळेत समाजदिनाच्या दिवशी नेहाने इंग्रजीत भाषण करुन सर्वांनेच मने जिंकली होती, अशी आठवण मुख्याध्यापिका सौ. शिंदे यांनी सांगितली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ तिघांना निलंबित करण्याचे आदेश

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ठेकेदारांना नियमबाह्य पद्धतीने मदत केल्याचा ठपका ठेवत स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे यांनी आपल्या अधिकारात सहायक आरोग्य अधिकाऱ्यासह तिघांना निलंबित करण्याचे आदेश गुरुवारी दिले.

वॉटग्रेससह अन्य ठेकेदारांना कागदपत्रे उपलब्ध करून देणे, विभागाची माहिती पुरविण्याचा ठपका समितीने डॉ. हिरेंसह पाटोळे यांच्यावर ठेवला आहे तर मुलीच्या मृत्यूप्रकरणी सिडकोच्या स्वच्छताधिकाऱ्याला दोषी धरण्यात आले आहे. आयुक्तांसह स्थायी समितीला नोटीस पाठवणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीवर टीकास्र सोडत प्रशासनाच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

वॉटरग्रेस कंपनीच्या वतीने बदनामी झाल्याचे सांगत, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, सहाय्यक आयुक्त जीवन सोनवणे, यांच्यासह सभापती शिवाजी चुंभळेसह सर्व सदस्यांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सदस्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोग्य विभागात सुरू असलेल्या गैरकारभाराचा पाढाच वाचला. प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी ठेकेदारासाठींच काम करत असल्याचा आरोप करत, घरभेदीची भूमिका निभावत असल्याचा आरोप केला. महापालिकेची माहिती व कागदपत्रे ठेकेदारांना पोहचवले जाते. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी कोणासाठी काम करत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. सहायक आरोग्य डॉ. सचिन हिरे, वरिष्ठ लिपिक जगदीश पाटोळे हे विभागाच्या विरोधात कामकाज करतात. वेतन महापालिकेचे घेतात आणि काम ठेकेदारांचे करतात असा आरोप खुद्द सभापतींनीच केला. या दोघांचे तत्काळ निलंबन करा. दोषी आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश सभापतींनी आपल्या अधिकारात दिले. तर सिडकोतील घटनेत नेहाच्या मृत्यू स्वच्छता निरीक्षक रमेश गाजरे यांच्या हलगर्जीपणा मुळे झाला. त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश सभापतींनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images