Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

ग्यानदासांविरोधात विनयभंगाची तक्रार?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यात साध्वींना वेगळी जागा मिळावी, यासाठी प्रयत्नशिल असलेल्या सर्वेश्वरी महादेव वैकुंठधाम मुक्तिद्वार आखाडा (परी) च्या प‌‌ीठाधिश्वर त्रिकाल भवंता यांनी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांच्याविरोधात थेट पोलिसात जाण्याचा निर्णय घेतला आहे. ग्यानदास यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करण्याचा निर्णय साध्वी यांनी बोलून दाखविला आहे. या प्रकरणी प्रशासनाच्या भूमिकेवरही त्यांनी तोंडसुख घेतले आहे.

श्री गंगा गोदावरी पंचकोठी संघाच्या ध्वजारोहणप्रसंगी साध्वी त्रिकालभवंता व महंत ग्यानदास यांच्यात मुख्यमंत्र्यांसमोरच सभामंडपात खडाजंगी झाली. साध्वींच्या हातातील माईक बंद असल्याने संन्याशांमधील वाद भक्तापर्यंत पोहचला नाही. साध्वींनी आंघोळीसाठी तसेच राहण्यासाठी वेगळी जागा देण्याची मागणी महंत ग्यानदास यांच्याकडे केली होती. मात्र, त्यांना साधुग्राममध्ये वेगळी जागा देणे शक्य नसल्याचे ग्यानदास महाराजांनी सांगितले होते. साध्वींना साधुग्राममध्ये जागा दिल्यास अग्नी आखाड्यातील साधुमहंत सहन करणार नाही, अशी भूमिका महंत ग्यानदास यांनी घेतली. साध्वी त्रिकालभवंताही या जागेसाठी आग्रही असून, त्यांनी महंत ग्यानदास यांच्यावर शोषणाचा आरोप केला आहे. साध्वी पोलिसात तक्रार करणार असून, ग्यानदास यांना जेलमध्ये टाकण्यात यावे, अशी मागणीही करणार आहेत. असे त्यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

आज करणार पोलिसात तक्रार

महंत ग्यानदास हे साध्वींचे शोषण करतात असा आरोप करून त्यांच्याविरोधात पोलिसात लेखी स्वरूपात तक्रार देणार असल्याचे 'मटा'शी बोलताना सांगितले. प्रशासनाने महंत ग्यानदास यांच्यावर कारवाई करावी, यासाठी मी वाट पहात होते. परंतु, प्रशासन मूग गिळून गप्प बसले आहे, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे गुरुवारी पोलिसात लेखी तक्रार देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


व्हीआयपींना आवरा

$
0
0

विनोद पाटील, नाशिक

ऐन सिंहस्थ काळात व्हीआयपी मंडळींच्या दौऱ्यांमुळे घायकुतीला आलेले भाविक व नाशिककरांना आता दिलासा मिळणार आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील दोन महिने व्हीआयपी नेत्यांच्या वावरण्याला मर्यादा येणार आहेत. व्हीआयपी नेत्यांना आवरा ही सुरक्षायंत्रणांची गळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली आहे. कुंभमेळामंत्री वगळता कुणीच वरिष्ठ नेत्यांनी आणि मंत्र्यांनी सिंहस्थाकडे फिरकू नका, अशा सूचनाच त्यांनी केल्या आहेत. त्यामुळे प्रशासनासह सुरक्षा यंत्रणांना सिंहस्थकाळात शहर व भाविकांच्या सुरक्षिततेवर लक्ष देता येणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण सोहळ्यादरम्यान गोंधळ उडाला होता. व्हीआयपींच्या राबत्यामुळे केवळ आठ ते दहा हजार भाविकांना मुख्य सोहळ्यापासून दूर ठेवण्यात आले होते. तर व्हीआयपी नेत्यांसोबत आलेल्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी घातलेला गोंधळ मिटवताना प्रशासनासह पोलिसांच्याही नाकीनऊ आले होते. व्हीआयपींच्या सुरक्षेच्या अतिरेकामुळे भाविक व काही राजकीय पदाधिकारी थेट पोलिसांना भिडले होते. त्यामुळे पर्वणीकाळात काय होणार अशी भीती सुरक्षायंत्रणांना सतावते आहे.

आंध्र प्रदेशातील पुष्कर मेळाव्यात झालेल्या चेंगराचेंगरीत २७ जणांचा मृत्यू झाला. गत सिंहस्थात नाशिकमध्ये चेंगराचेंगरीत २९ जणांचा बळी गेला होता. त्या पार्श्वभूमीवर अशा घटना टाळण्यासाठी निदान पर्वणीकाळात तरी व्हीआयपी बंदोबस्ताचा सुरक्षा यंत्रणांवरचा भार कमी व्हावा तसेच आणीबाणीच्या प्रसंगी भाविकांचा उद्रेक टाळावा यासाठी नेत्यांना आवर घाला, असे आर्जव सुरक्षायंत्रणाकडून करण्यात आले आहे.

प्रशासन व पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संभाव्य दुर्घटनांचा अंदाज घेत यासंबंधी गळ मुख्यमंत्र्यांना घातली आणि त्यांनी त्यास सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आता पालकमंत्री आणि सिंहस्थाशी निगडीत मंत्री आणि अधिकाऱ्यांशिवाय अन्य मंत्र्यांना नाशिकमध्ये येण्यास मज्जाव करण्यात येणार आहे. ठोस कारण असेल तर मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनंतर पर्वणीकाळात मंत्र्यांना येता येणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही हा नियम लागू राहणार आहे. त्यामुळे सिंहस्थाच्या नावाखाली मिटींग घेवून नाशिक दर्शन करणाऱ्या मंत्र्यांनाही आता पायबंद बसणार आहे.

घातपाताचाही धोका

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळ्याच्या काळात घातपाताचा धोका असल्याचा इशारा राष्ट्रीय सुरक्षायंत्रणांनी आधीच दिलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर आयबी, एटीएस, सीआयडी, एनआयए सारख्या तपास यंत्रणांनी नाशिकमध्ये तळ ठोकला आहे. सिमी आणि लष्करसारख्या संघटनांकडून घातपाताच धोका असून, मध्य प्रदेशतील जेलमधून पसार झालेल्या सिमीच्या अतिरेक्यांवर सुरक्षा यंत्रणांचा संशय आहे. त्यामुळे सिंहस्थात लष्करी जवानांसह, कमांडो आणि अतिरिक्त पोलिस दल दक्ष राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यूथफुल सिंहस्थ

$
0
0

अमोघ पोंक्षे / सौरव बेंडाळे कॉलेज क्लब रिपोर्टर

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणादरम्यान रामकुंडावर भाविकांसोबत गर्दी पाहायला मिळत होती ती तरुणाईची. धर्मध्वजा फडकताच हा संपूर्ण घोळका आपल्या जल्लोषाने वातावरणातील उत्साह वाढवत होता.

एकीकडे अनेक शाळांनी ध्वजारोहणाच्या दिवशी खबरदारी म्हणून शाळांना सुटी दिल्याचे निदर्शनास आले तर दुसरीकडे कार्यालयांसोबत अनेक शैक्षणिक संस्थांचे कामकाज चालू होते. पण अनेकांनी कॉलेजला जाण्याचे टाळत कुंभमेळ्याचा माहोल जवळून जाणण्यासाठी गोदाघाटावर हजेरी लावल्याचे चित्र होते.

डोळस भक्ती

गोदावरीत डुबकी मारुन पुण्य कमावण्यापेक्षा गोदेची स्वच्छता करत देवाप्रती आपली श्रध्दा असल्याचे दाखवून देणे आजची तरुणाई अधिक पसंत करते. त्याचप्रमाणे इतरवेळी प्रशासन व्यवस्थेतील त्रुटी काढत रान उठवणाऱ्या तरुणाईने कुंभमेळ्याचे प्रशासनाने केलेले नियोजन पाहून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत, प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे अशी आशाही व्यक्त करते. अनेकांनी स्वत:पासून याचा श्रीगणेशा केला.

रात्रीपासून कारमध्ये

सचिन आणि दुर्गेशदेखील सकाळी साडेचारला गंगाघटावर ध्वजारोहणासाठी गेले होते. रविवार कारंजावर आपली गाडी पार्क करुन तिथून ते गंगेवर पायी गेले. बारा वर्षात येणारा हा सिंहस्थ अनुभवायाचा म्हणून हे दोघे मित्रांसोबत रात्री अकरापासून कारमध्ये बसून होते.

सेल्फी...

सेल्फीची क्रेझ ध्वजारोहणादरम्यानही दिसून येत होती. अनेक ग्रुप्सनी या सेल्फीच्या माध्यमातून सोशल मीडियावरही हा सोहळा हिट केला. गौरवने त्याच्या ग्रुपसोबत काढलेले सेल्फी फेसबूक, ‌व्टिटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, हाइक सगळीकडे पोस्ट केल्याचे सांगितले. अनेकांनी या सोहळ्याचे व्हिडिओजही सोशल साईट्सवर उपलब्ध करुन दिले.

कट्ट्यावर भाव

सिंहस्थाच्या ध्वजारोहणप्रसंगी काढलेले सेल्फी, व्हिडिओ, फोटोज याचे शेअरिंग कट्ट्यांवर होत होते. 'आज मी गेलो होतो, जाम मज्जा आली. कसली भारी पुष्पवृष्टी केली राव, झक्कास...' असे संवाद तरुणाईमध्ये रंगले होते. शाही स्नानाचा अनुभव घेण्याचे प्लॅनिंगही आतापासूनच यंगर्स्टर्समध्ये सुरू झाल्याचे दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाठ्यपुस्तक छपाईचे काम राज्यातच ठेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्रातील मुद्रण व्यावसायिक सध्या प्रचंड मंद‌ीला तोंड देत असल्याने महाराष्ट्र राज्य पाठ्ययपुस्तक मंडळाचे काम महाराष्ट्रापुरतेच मर्यादित ठेवणे गरजेचे आहे, असे मत मुंबई मुद्रक संघ आणि महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे माजी अध्यक्ष आनंद लिमये यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

चाळीस वर्षांपासून पाठ्यपुस्तक मंडळाच्या स्थापनेपासून पुस्तक छपाईची कामे महाराष्ट्रातील चारशे नोंदणीकृत मुद्रकांमार्फत केली जात होती. २००४ साली तत्कालीन शिक्षणमंत्री अमरिश पटेल यांच्या आदेशानुसार २००५-०६ च्या अभ्यासक्रमासाठी आवश्यक ते नूतनीकरण शुल्क भरलेल्या मुद्रकांचा हक्क डावलून निविदा मागविल्यामुळे सर्व मुद्रकांनी तत्काल‌नि मुख्यमंत्र्याकडे दाद मागितली होती. परंतु पाठ्यपुस्तक मंडळाने अखिल भारतीय स्तरावरील मुद्रकांसाठी निविदा सूचना प्रसिद्ध केली व आजतागायत ही प्रथा कायम आहे. या निविदा देशपातळीवर न मागवता राज्य पातळीवर मागवाव्यात, अशी मागणी या मंडळाकडून केली जात आहे.

मार्च २०१५ अखेरपर्यंत पाठ्यपुस्तक मंडळाने महाराष्ट्रातील मुद्रणालयांकडे ६ कोटी ८५ लाख ८१ हजार २०० प्रतींचे व परराज्यातील मुद्रणालयांकडे २ कोटी, २३ लाख, ३२ हजार प्रतींचे काम सोपवले आहे. त्यामुळे आधीच विकलांग असलेल्या राज्यातील मुद्रण व्यवसायाला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. राज्यातील ११ कोटी पाठ्यपुस्तक छपाईचे काम राज्यातच ठेवावे, अशा मागणीही त्यांच्या वतीने केली जात आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालूनही त्यांनी या विषयाची दखल घेतली नाही, त्यामुळे त्यांनी केलेल्या 'मेक इन महाराष्ट्र'ची घोषणा केवळ नावापुरतीच आहे का? अशी शंकाही यावेळी उपस्थित करण्यात आली.

पाठ्यपुस्तक मंडळाची निविदा महाराष्ट्रापुरतीच मर्यादित ठेवली तर महाराष्ट्रातील मुद्रण व्यवसायास मदत होईल. तसेच पाठ्यपुस्तक मंडळाच्या अधिकाऱ्यांचा भारत भ्रमणावर होणारा खर्च व वेळेचीही बचत होईल. मागील दोन ते तीन वर्षांमध्ये अनेक मुद्रकांना आपले व्यवसाय बंद करावे लागले आहेत. पर्यायाने या व्यवसायावर अवलंबून असलेले कामगार निराधार झाले आहेत. या सर्व समस्या मिटवण्यासाठी महाराष्ट्रातील पाठ्यपुस्तक छपाईचे काम महाराष्ट्रातच ठेवणे गरजेचे असल्याचे लिमये यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी विनय तांबे व विलास सांगुर्डेकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आखाड्यांचे ध्वजारोहण १९ ऑगस्टला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

दिगंबर अनी, निर्वाणी आणि निर्मोही या तीन आखाड्यांचे ध्वजारोहण १९ ऑगस्टला होणार असून, त्यानंतरच सिंहस्थ कुंभमेळ्याला खऱ्या अर्थाने प्रारंभ होईल. यासाठी देशविदेशातून विविध आखाड्यांचे साधुमहंत दाखल झाले आहेत.

१९ ऑगस्टला तिन्ही आखाड्यांचे ध्वजारोहण होणार आहे.ध्वजस्तंभासाठी लागणाऱ्या सुमारे ५४ फूट उंचीचा अखंड लाकूड बुधवारी दुपारी साधुग्राम येथे दाखल झाले. एक महिना आधीच ध्वजाचे लाकूड आल्याने आखाड्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

दिंडोरीतास या ठिकाणाहून सुमारे ४५ ते ५१ फुट उंचीची निलगिरीची लाकडे साधुग्राम येथे आणली आहेत. या लाकडावर आकर्षक रंगरंगोटी व कलाकुसर करण्यात येणार आहे. यावेळी महंत कृष्णदास महाराज, महंत रामजनमदास महाराज, महंत

प्रेमदास महाराज, महंत नरेंद्र दास महाराज, महंत भक्तीचरन्दास महाराज आणि तिन्ही आखाड्यांचे महंत उपस्थित होते.

ध्वज असे असतील...

दिगंबर अनी, निर्मोही आणि निर्वाणी असे तीन आखाडे असून, या तिन्ही आखाड्यासमोर ध्वजारोहण केले जाईल. तिन्ही आखाड्याचा धर्मध्वजाचा आकार आयताकृती असेल. १० फूट रुंद आणि २५ फूट लांब असा असेल. तिन्ही ध्वजावर दोन्ही बाजूंनी हनुमानाचे चित्र असेल; मात्र तिन्ही ध्वजांचा रंग वेगळा असेल. दिगंबर अनी आखाड्याचा ध्वज पंचरंगी असतो, निर्वाणी आखाड्याचा ध्वज लाल रंगाचा असतो, तर निर्मोही आखाड्याचा ध्वज पांढरा रंगाचा असतो.

मित्र मंडळ सेवेत

आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सुविधा व अन्य सुविधा देण्याची जबाबदारी पंचवटीतील शिवशंकर मित्र मंडळ व फुलेनगर मित्र मंडळांने स्वीकारली आहे. पेठ रोडकडून येणाऱ्या भाविकांना आरोग्य सुविधेसह चहा, पाणी आणि नाश्ता देण्याची सोय मंडळातर्फे करण्यात आली आहे. या काळात पंचवटी मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून २४ तास वैद्यकीय सेवा दिली जाणार आहे, अशी माहिती सुनील जाधव, दौलत गायकवाड, रमेश काळे, बाबा ठाकूर, अशोक गुंजाळ यांनी दिली.

शाहीस्नान झाल्यावर ध्वजावतरण...

१९ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण, त्यानंतर सर्व आखाड्यांमध्ये इष्टदेवता यांची स्थापना केली जाईल. त्यानंतर सर्व धार्मिक विधी होतील. मग तिन्ही शाहीस्नान होतील आणि त्यानंतर मुहूर्त काढून ध्वजवतरण (ध्वज उतरवणे) होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वादग्रस्त विधानांची मोदींना झळ

$
0
0

नाशिक : घरवापसीसारख्या योजना तसेच यासंबंधी मंत्र्यांकडून होणारे वादग्रस्त वक्तव्य यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा डागळली जात असल्याची खंत अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांनी व्यक्त केली.

धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य ठोकणाऱ्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिमेला तडा देत असल्याचे लक्षात घ्यावे, असे ग्यानदास महाराजांनी स्पष्ट केले. आपल्या मतासाठी पुरावा देताना महंतानी भाजपाचे खासदार साक्षी महाराज आणि केंद्र‌ीय मंत्री निरजंन ज्योती यांच्या वक्तव्याचा आधार घेतला. हिंदू महिलांना किमान चार मुलांना जन्म द्यावा, असे निरंजन ज्योती यांनी म्हटले होते. हिंदुत्वाच्या नावाखाली बेफाम वक्तव्य करणाऱ्यांमुळे समाजावर तसेच धर्मावर चुकीचा शिक्का बसत असल्याचे ग्यानदास महाराजांनी स्पष्ट केले. दरम्यान, कुंभमेळ्याच्या कामांबाबत समाधानी असल्याचे स्पष्ट करीत महाराजांनी राज्य सरकारची स्तुती केली. मुख्यमंत्र्याचे अभिनंदन केल्याचे महंत ग्यानदास महाराज यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खालसे मदतीपासून वंच‌ित

$
0
0

पिण्यासाठी गढूळ पाण्याचा पुरवठा; अस्वच्छतेचा त्रास

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रामसृष्टी परिसरातील मोकळ्या जागेत २५ खालशांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जागा मिळालेल्या खालशांचे साधुमहंत १२ दिवसांपासून तळ ठोकून आहे. मात्र, प्रशासनाने अद्याप त्यांना पाणी, वीज, बाथरूम, टॉयलेट अशा कोणत्याही सुविधा पुरवलेल्या नाहीत. आखाड्यांच्या श्री महंताचेही प्रशासन ऐकत नसून लवकरात लवकर सुविधा मिळाल्या नाही निषेधाची भूमिका साधुमहंत घेण्याचा इशारा संबंधीतांनी दिला आहे.

प्रशासनाने आरक्ष‌ित जमिनीवर १ हजार ५३० प्लॉटस तयार केले. या प्लॉटसमध्ये टॉयलेट, बाथरूम, पाणी, वीज आदी पायाभूत सुविधा निर्माण केल्या. मात्र, यात रामसृष्टीतील मोकळ्या जागांचा समावेश नव्हता. प्रशासनाने सुविधा पुरवल्यानंतर जमिनी आखाडा परिषदेकडे सर्पुद केल्या आहेत. मात्र, आखाडा परिषदेने प्रशासनाकडून दुर्लक्षीत झालेल्या रामसृष्टीमध्ये २५ पेक्षा जास्त खालशांना जागा दिली.

आता मागील १५ दिवसांपासून संबंध‌ित खालशांचे प्रमुख पायाभूत सुविधा मिळाव्यात म्हणून तिन्ही आनी आखाड्यांच्या श्री महंताकडे तसेच प्रशासनाकडे चकरा मारत आहे. अनेकदा तक्रारी करूनही सुविधा उपलब्ध होत नसल्याचे महंत अंबिकादास यांनी सांगितले. अशीच कहाणी महंत गिरीदास महाराज (पानवालेबाबा) आणि महंत रामेश्वरदास महाराज यांनी सांगितली. गुरूपौर्णिमेनंतर भक्ताचा राबता सुरू होईल. जिथे साधुमहंताची व्यवस्था नाही, तिथे भक्तांना काय जागा देणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

आंघोळीसाठी गोदावरीचा आसारा मिळतो. मात्र, दैनंदिन गरजा भागवताना आसऱ्याची आवश्यकता पडते. त्यात कुंचबना होत असल्याची कैफीयत पानवालेबाबा यांनी मांडली. गुरूपौर्णिमेच्या आत सर्व व्यवस्था होणे आवश्यक आहे. तक्रारी करूनही फायदा होणार नसेल तर योग्य ती भुमिका घ्यावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

भंडारा करायचा कसा?

साधुग्राममध्ये प्रशासनाने २४ तास पाणी पुरवठा सुरू केला आहे. पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासनाने साधुग्राममध्ये पाइपलाईनचे जाळे पसरवले असून, त्यातील काही पाइपलाईन फुटल्या आहेत. फुटलेल्या पाइपलाईनमुळे साधुग्राममधील तपस्वी नगर नर्मदाखंड खालशा तसेच इतर ठिकाणी गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. याबाबत बोलताना खालशाचे प्रमुख महंत रामदास त्यागी (टाटम्बरी बाबा) यांनी सांगितले की, गढूळ पाण्याचा पुरवठा होत असला तरी भंडारा करणे गरजेचे आहे. प्रशासनाने हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

कचऱ्याचा प्रश्न बिकट

साधुग्राममधील स्वच्छतेचा प्रश्न बिकट होत चालला आहे. महापालिका ठेकेदार आणि ठेका यात गुरफटत असून, साधुग्राममध्ये कचऱ्याचे ढिगारे साचत आहेत. साधुग्राममध्ये वास्तव्यास असलेले साधुमहंत जेवणाचे पदार्थ स्वतःच तयार करतात. यामुळे निर्माण झालेला कचरा फेकण्यासाठी जागाच उपलब्ध नसून, मिळेल त्या ठिकाणी कचरा टाकण्यात येतो आहे. याबाबत दिगंबर आखाड्याचे प्रमुख महंत रामकिशोरदास महाराज यांनी खंत व्यक्त केली. अद्याप पाऊस झालेला नाही. मात्र, एकदा पाऊस सुरू झाल्यानंतर ही परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा इशारा रामकिशोरदास महाराजांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विडी कामगारांचा आंदोलनाचा इशारा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

विडी कामगारांना प्रतिदिन २१० रुपये किमान वेतन द्यावे, अशी मागणी सिटू कामगार संघटनेने केली आहे. या प्रकरणी शासनाने योग्य ती कारवाई न केल्यास विडी कामगारांचे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सिटूचे नेते हरिभाऊ तांबे यांनी दिला आहे.

या प्रकरणी विडी कामगारांच्या तीव्र भावना असून, शासन मालक धार्जिणे धोरण स्वीकारत असल्याने कामगारांची गळचेपी होत असल्याची टीका हरिभाऊ तांबे यांनी केली आहे. या प्रकरणी सिन्नरसह तालुक्यातील विविध गावात सभा घेवून विडी कामगाराबाबत आंदोलनाची दिशा ठरवली जात आहे. या प्रकरणी इतर राज्यात १७४ रुपये किमान वेतन दिले जात असतांना महाराष्ट्र शासन १४० रुपये किमान वेतन निश्चित करण्याच्या तयारीत असून मालक धार्जिणे धोरणाचे समर्थन विडी कामगार संघटना करीत असल्याचा आरोप तांबे यांनी केला आहे.

या प्रकरणी विडी कामगारावर अन्याय होत असल्याने महाराष्ट्र शासनाने विडी कामगारांना प्रतिदिन २१० रुपये किमान वेतन द्यावे अशी मागणी सिटू कामगार संघटनेनी केली असून या प्रकरणी शासनाने योग्य ती कारवाई न केल्यास विडी कामगारांचे तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा सिटूचे नेते हरिभाऊ तांबे यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


येवल्यात ‘प्रगती’विरुद्ध ‘शेतकरी विकास’

$
0
0

बाजार समिती निवडणुकीचा रंगला आखाडा

म. टा. वृत्तसेवा, येवला

पुलाखालच्या पाण्यागत वेगवेगळ्या वळणावरचं इकडून तिकडे व तिकडून इकडे वाहत जाणारे बेरकी रंगढंग अन् तिरक्या चालीचं राजकारण अशी ख्याती असलेल्या येवला तालुक्याच्या राजकीय पटलावर येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनिमित्ताने पुन्हा एकदा रंगात आले आहे.

२६ जुलै रोजी होणाऱ्या बाजार समितीच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाताना प्रचाराची रणधुमाळी जोमात सुरू झाली आहे. राज्याचे माजी मंत्री तथा येवल्याचे आमदार छगन भुजबळ प्रणित 'प्रगती' पॅनलपुढे येवला पंचायत समिती माजी सभापती संभाजी पवार व जिल्हा बँक संचालक किशोर दराडे यांच्या 'शेतकरी विकास' पॅनल ने आव्हान उभे केले आहे. बाजार समिती निवडणूक निमित्ताने सर्वांचीच कसोटी पणाला लागली असून, कोण बाजी मारणार ? याची उत्सुकता तालुकावासीयांना लागली आहे.

वयाची साठी गाठलेल्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आजवर झालेल्या प्रत्येक पंचवार्षिक निवडणुका या त्या त्या वेळच्या अनेक मुद्द्यांना हात घालत लढवल्या गेल्या. कांदा या नगदी पिकाने वर्षभर गजबजणाऱ्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवार तसे दुसऱ्या पिवळ्याधमक मक्याच्या राशींनी देखील नेहमीच फुलून जाते. तशीच मोठी गजबज व धामधूम असते ती समितीच्या प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत. जवळपास ३ कोटींच्या घरात वार्षिक उलाढाल व एकूण स्थावर मालमत्ता ११ कोटी ५४ लाख असलेल्या या येवला बाजार समितीच्या प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीच्या रिंगणात अनेकांच्या उद्या पडतात. ग्रामीण भागातील जनता जनार्दनाशी विशेषतः शेतकऱ्यांशी थेट नाळ जोडली जात असल्याने आपल्याही कपाळी संचालक पदाचा टिळा लागावा यासाठी अनेकांची धडपड असते. यावेळची निवडणूक देखील त्याला अपवाद नाही हे १८ जागांसाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या ५० उमेदवारांच्या यादीवर नजर टाकता म्हणावे लागेल.

येवला तालुक्याच्या राजकीय पटलावर गेल्या १० वर्षांपूर्वी आपले पाऊल टाकलेल्या माजी मंत्री छगन भुजबळ यांनी तालुक्याच्या प्रत्येक निवडणुकीत स्वतः लक्ष घालताना अनेक ठिकाणी आपले राजकीय 'बळ' निर्माण केले, त्यात येवला बाजार समितीचा देखील समावेश आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत बाजी मारत बाजार समितीत पाच वर्षे सत्ता राहिलेल्या भुजबळांनी या वेळी देखील आपला 'प्रगती' पॅनल रिंगणात उतरवतांना मतदारांना साद घातली आहे. जिल्हा बँकेचे माजी संचालक माणिकराव शिंदे व मविप्र संचालक अंबादास बनकर हे दोघे प्रगतीच्या प्रचाराची धुरा वाहत आहेत. तर तालुक्याचे माजी आमदार मारोतराव पवार यांचे पुतणे संभाजी पवार व जिल्हा बँक संचालक किशोर दराडे यांनी 'शेतकरी विकास' पॅनल निवडणूक रिंगणात उतरवत भुजबळांना आव्हान दिले आहे. भुजबळांनी ५ विद्यमान संचालकांना पॅनलमध्ये संधी देतानाच जेष्ठ नेते तथा विद्यमान संचालक अंबादास बनकर यांचे पुत्र संजय बनकर यांना मैदानात उतरविले आहे. पवार-दराडे यांच्या पॅनलने अनुभवी, नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी देतांना तालुक्याच्या सर्व भागाला न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.

माजी आमदार मारोतराव पवार यांचा तालुक्यातील दांडगा जनसंपर्क अन् दराडे यांचे सहकारावरील सध्याचे वर्चस्व बघता बाजार समितीची ही निवडणूक भुजबळांच्या 'प्रगती'पुढे आव्हान ठरणार असून, भुजबळांची कसोटी देखील पणाला लागली आहे. माणिकराव शिंदे यांचे डावपेच व बनकर यांची साथ हिच भुजबळ यांची जमेची बाजू समजली जात आहे.पवारांची जनमाणसातील 'पॉवर' अन दराडे यांची 'रणनीती' यापुढे भुजबळांची 'प्रगती'बळ कसे चालते याकडेच तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.

दृष्टीक्षेपात...

सोसायटी गटात सर्वसाधारण ७, महिला राखीव २, इतर मागासवर्ग १, विमुक्त जाती/भटक्या जमाती १ अशा एकूण ११ जागा. १ हजार ११ मतदार करणार २४ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसलाग्रामपंचायत गटात सर्वसाधारण २, आर्थिक दुर्बल घटक आणि अनुसूचित जाती जमाती प्रत्येकी १ अशा एकूण ४ जागा. ७४४ मतदार ठरविणार १२ उमेदवारांचे नशीबव्यापारी मतदारसंघात २ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात. ३२० मतदार देणार कौलमाथाडी-मापारी मतदारसंघातील एका जागेवर ७ उमेदवार. ३५२ मतदार निवडणार आपला प्रतिनिधीबाजार समितीच्या विविध १८ जागांवरील एकूण ५० उमेदवारांचे भवितव्य २४५७ मतदारांच्या हाती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरपोच गॅस सिलिंडर देण्याचे आदेश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर येथील एचपी ग्राहकांना सिलिंडर घरपोच मिळत नसल्याने गॅस ग्राहक संतप्त झाले आहेत. याबाबत तक्रारींचा पाढाच ग्राहकांनी वाचला आहे. गॅस एजन्सी व कर्मचारी यांच्यात पैसे ग्राहकाकडून आकारण्याबाबतचे वाद विकोपाला गेल्याने कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यामुळे ग्राहक अधिक संतप्त झालेले आहेत.

कर्मचाऱ्यांनी तहसीलदार मनोज खैरनार यांच्याकडे या प्रकरणी तक्रार करून एजन्सीमार्फत केल्या जाणाऱ्या सक्तीच्या पोहोच वसुलीची मागणी केली जात असल्याचे निदर्शनात आणून दिले. या दोघांच्या भांडणात गॅस ग्राहक भरडला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सिलिंडर घेण्यासाठी एजन्सीच्या गुदामात जावे लागत असल्याने एचपी गॅससंदर्भात तक्रारी वाढत आहेत. कर्मचाऱ्यांना एजन्सीचे चालक धीरवाणी, व्यवस्थापक जगताप विनाकारण त्रास देत आहेत. कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणे, त्यांना कामावरून काढून टाकण्याची धमकी देऊन कर्मचाऱ्यांचा मानसिक छळ सुरू केला असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पगार थकला असून, हातावर प्रपंच असणाऱ्या कर्मचाऱ्यांना संसाराचा गाडा हाकणे अवघड बनल्याने ३० जूनपासून संप पुकारल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. यावेळी संतोष कदम, अनिल देशमुख, चंद्रकांत शिंदे, संदीप जाधव आदी उपस्थित होते.

विस्कळीत झालेली वितरण व्यवस्था सुरळीत करण्यासाठी गॅस एजन्सीने युद्धपातळीवर उपाययोजना करावी, कर्मचाऱ्यांचा संप ही एजन्सीची अंतर्गत बाब असून, त्याचा ग्राहकसेवेशी संबंध नाही. त्यामुळे एजन्सीने ग्राहकांना घरपोच सिलिंडर देण्याची व्यवस्था तातडीने करावी, असे आदेश तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांनी एजन्सीला दिले. विस्कळीत सेवेमुळे ग्राहकांत नाराजी असून, त्यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रसंगी एजन्सीवर गुन्हे दाखल करण्याची तंबीही तहसीलदारांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसहभाग मृग‘जळा’साठी!

$
0
0

येवल्यात ममदापूरमध्ये बंधारा उपक्रमासाठी राबताहेत शेकडो हात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येवला तालुक्यात पाण्याअभावी होत असलेल्या हरिणांच्या मृत्यूची दखल घेत नाशिकच्या युवकांनी लोकसहभागातून बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. आतापर्यंत ममदापूर या संरक्षित क्षेत्रात सहा बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. अनेक सामाजिक संघटनांनीही या कामात रस घेतला असून, अशा प्रकारे लोकसहभागातून वन्यजीवांसाठीचा हा पहिलाच प्रयोग ठरला आहे.

हरिणांच्या वास्तव्यास लागणारी भौगोलिक परिस्थिती, अत्यल्प झाडी, छोट्या टेकड्या, तुरळक शेती, कमी लोकवस्ती, ओसाड प्रदेश असे पोषक वातावरण ममदापूर येथे असल्याने वनखात्याने राज्यातील दुसरे वनक्षेत्र म्हणून येवला तालुक्यातील ममदापूरची निवड केली. येथे हरिण व काळविटांची संख्या जास्त असल्याने हे क्षेत्र वनविभागाने राखीव ठेवले.

मात्र, तालुक्यात पुरेसा पाऊस नसल्याने पाण्याअभावी काही हरणांचा मृत्यू झाला. काही हरिण पाण्याच्या शोधार्थ रस्त्यावर आल्याने वाहनांच्या धडकेने ठार झाले. पाण्यामुळे हरिणांची संख्या कमी होते की काय, अशी भीती निर्माण झाली. यावर उपाय म्हणून नाशिकच्या नम्रता परदेशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी येथे लोकसहभागातून बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी वनखात्याच्या आ‍वश्यक परवानग्या घेऊन त्यांनी या ठिकाणी काम सुरू केले. सिमेंटच्या वापर न करता तेथेच असलेल्या दगड मातीच्या सहाय्याने बंधारे बांधण्यास सुरुवात केली. सुरुवातीला १० ते १५ लोकांनी हे काम पूर्ण केले.

या युवकांचे काम पाहून स्थानिक लोकांनीही मदतीचा हात पुढे केला. आजही या ठिकाणी पाण्याचा थेंब नाही; मात्र युवकांनी बांधलेल्या बंधाऱ्यांमुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटला आहे. उन्हाळ्यात बाहेरून पाणी आणून ते बंधाऱ्यात टाकण्यात आले. आता पाऊस झाल्यास ममदापूरच्या हरिणांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

हरीण सफारीचे नियोजन

युवकांचे कार्य पाहून या ठिकाणी निर्सग निर्वाचन केंद्र, डीअर सफारी, सायकल ट्रॅक बांधण्यात येणार आहे. येथील दुकानदारांनी गावात प्लास्टिक आणायचे नाही असा निश्चय केला आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना एक पिशवी दिली जाते. त्यांनी कचरा अभयारण्यात न टाकता या पिशवीत गोळा करून आणायचा आहे. हरिणांच्या पाण्याचा प्रश्न लोकसहभागातून सुटला आहे. पूर्वी मे महिन्यात पाण्याअभावी किमान एक तरी हरिणाचा बळी जात होता. मात्र, यंदा तसे घडलेले नाही

पाणी नसल्याने हरिणांचा मृत्यू होण्याच्या घटना दुर्दैवी होत्या. हे टाळण्यासाठी आम्ही उपक्रम सुरू केले. महाराष्ट्रातील हा पहिला प्रयोग असून, आम्ही त्यात यशस्वी झालो आहोत.

- नम्रता परदेशी,

पर्यावरण अभ्यासक

बंधारे बांधल्याने हरिण रस्त्यावर येण्याचे प्रमाण कमी होऊन त्यांचे अपघातही घटले. येत्या काही दिवसांत एकही हरिण जखमी झालेले नाही. हा प्रयोग यशस्वी ठरला आहे.

- अशोक काळे,

वन परिमंडळ अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सन्मानासाठी मनसेची आज पालिकेत लक्षवेधी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यात नगरसेवकांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीविरोधात सत्ताधारी मनसेच आक्रमक झाली असून, मनसेचे नगरसेवक सुदाम कोंबडे यांनी शुक्रवारी महासभेत लक्षवेधी मांडली आहे. जकात बुडविणाऱ्यांना मंचावर स्थान देण्यात आले असताना शिवसेना आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमापासून लांब ठेवल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी केला आहे. दरम्यान नगरसेवकांची आक्रमकता पाहता पोल‌िसांनी नमते घेतल्याची चर्चा असून, पर्वणी काळात आता नगरेसवकांना पास देण्याचा प्रस्ताव पोल‌िसांनी महापालिकेला दिला आहे.

ध्वजारोहण सोहळ्यात महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना आणि नगरसेवकांनाच मज्जाव करण्यात आला होता. विशेषता सत्ताधारी मनेसच्या पदाधिकाऱ्यांनाही अपमानजनक वागणूक मिळाल्याचा आरोप मनसेनच केला आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या सन्मानासाठी थेट लक्षवेधीच सभागृहात मांडली जाणार आहे. मनसेचे नगरसेवक सुदाम कोंबडे यांनी ही लक्षवेधी मांडली असून, त्याच्यावर वादळी होण्याची शक्यता आहे. महापालिकेचा सिंहस्थासाठी निधी असतानाही, नगरसेवकांना अशी वागणूक का? असा सवाल उपस्थित केला जाणार आहे. त्यामुळे सभागृहात वादळी चर्चा होणार आहे.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनाच निमंत्रण पत्रिकेत स्थान देण्यात आलेले नाही. तर कार्यक्रमाला येऊ नये अशाच पद्धतीने त्यांना निमंत्रण पोहचवण्यात आले. 'महापालिकेच्या वास्तूत स्वता:ची दुकाने थाटायची आणि पदाधिकाऱ्यांचा अपमान करायचे काम पुरोहित संघाने सुरू केले आहे. त्यामुळे प्रदूषण करणाऱ्या व गुंडगिरी करणाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी वस्रांतरगृहच ताब्यात घ्या' अशी भूम‌िका मनसेने घेतली आहे. इतर पक्षांकडूनही आक्रमक रूप घेतले जाणार असल्याने सभागृहात वादळी चर्चा होणार आहे.

दरम्यान, पदाधिकाऱ्यांना जास्तीचे पास देण्यात येतील, असे त्यांनी महापौरांना कळविले आहे.

गुन्हेगार मंचावर...

महापालिकेची जकात बुडविणाऱ्या उद्योजकांनाच सिंहस्थाच्या व्यासपीठावर स्थान दिल्याचा आरोप कोंबडे यांनी केला आहे. गुन्हेगारांना मंचावर स्थान दिले तर, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमापासून सतीश शुक्ल यांनी लांब ठेवल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या मनसेने वस्रातंरगृहावरच आक्षेप घेत, प्रदूषण करणारे आणि गुंडगिरी करणाऱ्या पुरोहित संघाच्या सदस्यांना वस्रातंरगृहातून बाहेर काढा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे पुरोहित संघ आणि मनसेतच संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कपिला नदीच्या स्वच्छतेस सुरुवात

$
0
0

म. टा. पंचवटी, नाशिक

पंचवटीतील कपिला नदीची अवस्था नाल्यासमान झाली असून या नदीची त्वरित स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी करणारी बातमी महाराष्ट्र टाइम्सने प्रसिद्ध केली आणि महापालिकेच्या पंचवटी प्रभाग समिती सभापती सुनिता शिंदे यांनी त्याची तत्काळ दखल घेतली. बांधकाम विभागाच्या कर्मचा ऱ्यांना बोलावून नदीच्या परिसरात साफसफाई करण्यात आली.

कपिला नदीच्या पाणी प्रवाहात परिसरातील काही नगरांमधून दुर्गंधीयुक्त पाणी आणि सांडपाणी थेट सोडले जाते. त्यामुळे ही नदी प्रदुषित झाली आहे. या प्रदुषणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नागरिकही हैराण झाला आहे.

नदीप्रवाह वाहत असलेल्या भागात डासांचे प्रमाण वाढले आहे. पाण्याला प्रचंड दुर्गंधी येते. त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या लोकांबरोबरच कपिला नदी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटक भाविकांचाही हिरमोड होत आहे. त्यामुळे या नदीच्या परिसराची स्वच्छता करण्यात यावी, अशी नागरिकांनी मागणी केली होती.

'मटा'ने कपिला नदीच्या दुरवस्थेसह नागरिकांची मागणी मांडणारी बातमी छापली. त्याची महापालिका प्रशासनाने तत्काळ दखल घेतली आणि स्वच्छता अभियान सुरू केले. याबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

कपिला नदीचा नाला झाला आहे. नदीचे पावित्र्य काही लोक जपत नाहीत. त्यामुळे नदी प्रदूषण वाढले आहे. डासांचे प्रमाण वाढले आहे लहान मुलांना त्रास होतो.

- दगाजी पाटील

परिसरातील सर्व समस्या ताबडतोब सोडविल्या जातील. दुर्गंधी युक्त पाण्याचा बंदोबस्त केला जाईल. नाल्याची त्वरित साफसफाई सुरू करण्यात आली आहे.

- सुनिता शिंदे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुंभमेळ्यात सुरक्षितता बाळगा

$
0
0

हॉटेल चालकांना पोलिसांचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमिवर सातपूर पोलिस ठाण्याच्या वतीने परिसरातील हॉटेलचालकांची नुकतीच बैठक झाली. यात वरिष्ठ पोलिस निरिक्षक मनोज करंजे यांनी कुंभमेळा काळात हॉटेलचालकांनी सुरक्षा बाळगावी, असे आवाहन केले. तसेच कुंभमेळ्यात नव्याने कामावर रूजू होणाऱ्या व्यक्तीचे संपूर्ण माहिती घेऊनच त्यांना कामावर ठेवा, अशीही सूचना केली. याप्रसंगी सातपूर परिसरातील सर्व हॉटेलचालक उपस्थित होते.

बारा वर्षांनंतर नाशिकमध्ये होऊ घातलेला महाकुंभ देशाच्या धार्मिकतेचे प्रतिक आहे. या होत असलेल्या धार्मिक उत्साहात अनुचित प्रकारामुळे गालबोट लागू नये यासाठी सातपूर पोलिस ठाण्याकडून विभागातील हॉटेलचालकांची संयुक्त बैठक सातपूर पोलिस ठाण्यात घेण्यात आली. यावेळी पोलिस निरिक्षक करंजे यांनी महाकुंभात देश, विदेशातून भाविकांचे आगमन नाशिकमध्ये होणार असल्याचे सांगितले. अशावेळी बाहेरून येणारे भाविक हॉटेलमध्ये राहण्यासाठी किंवा खाण्या-पिण्यासाठी गर्दी करणार आहेत. यासाठी हॉटेलचालकांनी किमान प्रवेशद्वारावार सीसीटीव्ही कॅमेरे बसविले पाहिजे. तसेच गर्दीच्या काळात कामगारांची देखील हॉटेलचालकांना गरज भासणार आहे. अशा वेळी कामगार व्यक्ती घेतांना त्याची पूर्ण माहिती घेतल्याखेरीज कामावर घेऊ नये असा सल्ला करंजे यांनी बैठकीत दिला. कुठल्याही प्रकारचा संशय असलेल्या व्यक्ती आढळल्यास पोलिसांना तत्काळ माहिती द्यावी. सिंहस्थ काळात हॉटेलचालकांनी शक्यतो रात्री दहा वाजताच हॉटेल बंद करावे, अशी सूचना करंजे यांनी केली.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी टंचाईचे संकट गडद

$
0
0

जिल्ह्यात अवघा १७ टक्के पाणीसाठा शिल्लक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जून महिन्याच्या सुरूवातीला काही प्रामाणात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारल्याने पाणी टंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. नाशिक जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अवघा १७ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, येत्या काही दिवसात पाऊस न झाल्यास अनर्थ ओढावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीला नाशिक जिल्ह्यात काही प्रमाणात पाऊस झाला, त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली आहे. काही दिवसात जिल्ह्यात पाऊस होऊन जलसाठा वाढेल असे तज्ज्ञांचे म्हणणे होते; परंतु चीनमध्ये आलेल्या वादळामुळे महाराष्ट्रातील पावसावर परिणाम झाला, त्यामुळे अपेक्षीत पाऊस पडू शकला नाही. नाशिक जिल्ह्यात २३ धरणे आहेत, त्यातील गोदावरी धरण समूह, पालखेड धरण समूह, गिरणा खोरे असी तीन विभाग पडतात. गंगापूर धरणाच्या समुहात गंगापूर, काश्यपी आणि गौतमी अशा तीन धरणांचा समावेश होतो तर पालखेड धरण समुहात १४ धरणांचा तर गिरणा धरण समुहात ६ धरणांचा समावेश होतो. नाशिक जिल्ह्यात ७ मोठे प्रकल्प, १६ मध्यम प्रकल्प असे एकूण २३ प्रकल्प आहेत. गंगापूर धरणात सध्यस्थितीला २ हजार १२५ द.ल.घ.फु साठा आहे. काश्यपी धरणात ३९९ व गौतमी मध्ये १५५ असा एकूण २ हजार ६७९ द.ल.घ.फु साठा आहे. हे प्रमाण २९ टक्के इतके आहे. पालखेड धरणसमुहाची २० हजार ४१२ द.ल.घ.फु पाणी साठवणूक करण्याची क्षमता आहे. मात्र त्या ठिकाणी आज फक्त ६६५ द.ल.घ.फु. पाणी साठा वापरता येईल, अशी परिस्थिती आहे. तर गिरणाखोऱ्यात २४ हजार ७५३ द.ल.घ.फु. पाणी साठा साठवणूकीची क्षमता आहे. मात्र सध्य परिस्थितीत नाशिक जिल्ह्यातील २३ धरणांमधून ६६ हजार ३५४ द.ल.घ.फु. पाणी साठवणुकीची क्षमता आहे.

यातील ११ हजार द.ल.घ.फु इतके पाणी वापरण्या योग्य आहे. टक्केवारीचा विचार केल्यास फक्त १७ टक्के पाणीसाठा जिल्ह्यात उपलब्ध आहे.

त्यामुळे येत्या काही दिवसात पाऊस न झाल्यास दृष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या सिंहस्थ कुंभमेळा सुरु झाला आहे. त्यासाठीही पाणी सोडले जात असून, धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमीच होते आहे. त्यात पाऊस नसल्याने प्रशासनला चिंता लागून राहिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेल्वे प्रवाशांचा रहिवाशांना जाच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने दाखल होत असलेल्या भाविकांचे शहरात स्वागत होत असले तरी नाशिकरोड रेल्वे रुळालगतचे रहिवाशी मात्र आतापासूनच वैतागले आहेत. काही भाविक रुळांलगत उघड्यावर प्रात:विधीस बसत असल्याने स्थानिकांची डोकेदुखी वाढली आहे.

नाशिकरोड पुलाखाली प्रभाग ५६ आणि ५७ मध्ये रेल्वे रुळालगत चिडे, नेहे, दिंडे, अरिंगळे, खर्जुल यांचे मळे आहेत. त्यामध्ये मोठी लोकवस्ती आहे. आता शेजारीच नवीन वसाहतीही झाल्या आहेत. कुंभमेळ्यासाठी येणारे भाविक आणि प्रवाशी रेल्वे रुळालगत उघड्यावर प्रात:विधीस बसतात. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत असून सार्वजनिक आरोग्यही धोक्यात आले आहे. सकाळी सकाळीत किळसवाने दर्शन रहिवाशांना घडू लागले आहे. सकाळी उग्रवास आणि घाणीच्या साम्राज्यामुळे रहिवाशांना ये-जा करणेही अवघड होते. नाशिकरोडचे जलशुद्धीकरण केंद्र रुळापासून पन्नास मीटरवर आहे. पाऊस पडल्यावर सर्व घाण या केंद्राभोवती जमा होते. पिण्याच्या पाण्यातही ही घाण मिसळते.

रहिवाशांची रात्रपाळी

गेल्या कुंभमेळ्यात येथे डोळ्यांची तसेच डेंग्यूची साथ आली होती. त्यावेळी शौचास बसणाऱ्यांना प्रतिबंध करण्यासाठी रहिवाशांनी रात्री व पहाटे गस्त सुरू केली होती. त्यासाठी प्रत्येकाची ड्युटी ठरवून घेतली होती. भाविकांशी वादविवादही घातले होते. अन्यवेळी रात्री रुळालगत मद्यपी दारू पिण्यास बसतात. विद्यार्थी, महिलांना सायंकाळनंतर येथून जाणे कठीण होत आहे. या मद्यपींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

फिरत्या शौचालयाची मागणी

रेल्वे प्रशासाने रेल्वे स्टेशन तर चकाक ठेवले आहे. मात्र, कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पुरेश्या शौचालयांची सोय केलेली नाही. त्यामुळे भाविक रुळालगतच बसतात. पुलाखाली आणि चिडे मळ्यात या भाविकांसाठी फिरत्या शौचालय उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.

भाविक आणि प्रवासी रुळालगत उघड्यावर शौचास बसत असल्याने हरित कुंभ संकल्पनेलाच हरताळ फासला गेला आहे. केवळ रेल्वे स्टेशन स्वच्छ ठेऊन उपयोग नाही तर भाविक अन्य ठिकाणी घाण करणार नाही याची दक्षता घ्यावी.- जगन गवळी

कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या महिलांची प्रचंड गैरसोय होते. रेल्वेतर्फे पुरेशी व्यवस्था नसल्याने त्यांना नाईलाजास्तव रुळालगत बसावे लागते. निदान त्यांच्यासाठी तरी फिरते शौचालये प्रशासनाने ठेऊन स्वतःची लाज राखावी.- विमल रसाने

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरकतींवर अंडरपासचा फैसला

$
0
0

महापौरांनी केली पाहणी; इंदिरानगर अंडरपास सुरू करण्याची नागरिकांची मागणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंदिरानगर अंडरपास आठ दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे. यानंतर तो सुरू करायचा की, कायमस्वरूपी बंद ठेवयाचा हे सर्वस्वी नागरिकांच्या हरकतींवर अवलंबून असणार असल्याची माहिती महापौर अशोक मुर्तडक यांनी दिली. मात्र अंडरपास सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. इंदिरनगर अंडरपास येथे सतत वाहतुकीची कोंडी होत असल्याचे स्पष्ट करीत शहर पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी अंडरपास बंद केला. तसेच दोन्ही सर्व्हिसरोड वन वे केले. पोलिसांच्या या भूमिकेमुळे इंदिरानगर, दिपालीनगर, राणेनगर, लेखानगर आदी भागातील शेकडो नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. इंदिरानगर अंडरपास वगळता दुसरा पर्याय जवळ नसल्याने नागरिकांमध्ये रोषाचे वातावरण निर्माण होते आहे. हा मार्ग सुरू करावा, दुचाकींसाठी मान्यता द्यावी, अशा विविध मागण्या नागरिकांकडून येत आहेत. तसा दबाव स्थानिक नगरसेवकांवर पडतो असल्याने बुधवारी माजी उपमहापौर सतीश कुलकर्णी यांच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांची भेट घेतली होती. यानंतर, गुरूवारी दुपारी महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरमीत बग्गा, मनसेचे शहराध्यक्ष राहुल ढिकले, सभागृहनेता सलिम शेख, गटनेता अनिल मटाले, नगरसेवक दिपाली कुलकर्णी, यशवंत निकुळे आदींनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले.

अंडरपास बंद झाल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनी भाडेवाढ केली आहे. सायकलस्वारांना सुध्दा तीन किलोमीटरचे अंतर कापून प्रवास करावा लागतो आहे. अपेक्षित ठिकाणी पोहचणे डोकेदुखी ठरत असून हा अंडरपास त्वरीत सुरू करावा अशी मागणी नगरसेवकांनी केली. त्यावर प्रशासनाने निर्णय घेतला असून ४० टक्के नागरिकांच्या हरकती प्राप्त झाल्यातर अंडरपास सुरू करता येईल, असे स्पष्टीकरण पोलिस आयुक्तांनी दिल्याची माहिती महापौर मुतर्डक यांनी दिली. हरकती नोंदवण्यासाठी अर्ज लवकरच उपलब्ध होतील, अशी माहिती नगरसेवक यशवंत निकुळे यांनी दिली.

जनह‌ित याचिकाच योग्य

हा प्लॅन तयार करणाऱ्या न्हाईच्या इंजिनअीरर्सने चूक केली. मोठी चूक केल्यानंतरही त्यांचे वेतन सुरू आहे. त्यात कोणताही फरक पडलेला नाही. आम्हाला त्रासाला सामोरे जावे लागते आहे. चुकांचा डोंगर उभा करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात जनहित याचिका दाखल करणे गरजेचे असल्याचे मत याप्रसंगी उपस्थित महिलांनी व्यक्त केले. प्रशासनाच्या चुकांचा भुर्दंड आम्ही का सहन करायचा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

अंडरपासचा मुद्दा नॅशनल हायवे अॅथोरटीच्या अखत्यारितील आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्या पुढाकाराने सर्व्हिसरोडचे रूंदीकरण करता येणे शक्य आहे काय? याची चाचपणी केली जाईल. नागरिकांना त्रास होतो आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत.

- अशोक मुर्तडक, महापौर

प्रशासनाने हा एकतर्फी निर्णय घेतला असून, त्याचा मनस्ताप स्थानिक नागरिकांना सहन करावा लागतो आहे. अंडरपास बंद करणे एवढाच एक पर्याय नागरिकांना देणे चुकीचे आहे.

- दीपाली कुलकर्णी, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दंगलीचा वणवा ठाणपाड्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हरसूलमध्ये मंगळवारी सुरू झालेल्या दंगलीचा वणवा गुरुवारी ठाणपाड्यापर्यंत पोहचला. ठाणपाडा येथे दंगलखोरांनी काही घरांना तसेच कार्यालयांना टार्गेट केले. दंगलीचा वणवा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांसमोर यामुळे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

तीन दिवसानंतर हरसूलमध्ये बाजारातील अनेक दुकानदारांनी व्यवसाय सुरू केले. प्रशासनाने साफसफाईचे काम सुरू केले असून दंगलीच्या खुणा मिटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. जीवन पूर्वपदावर येत असले तरी येथे एक प्रकाराची भीती कायम असल्याचे दिसून येते. हरसूलपासून सुमारे १० किलोमीटरवर असलेल्या ठाणपाडा येथे दंगलग्रस्तांनी उच्छाद मांडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानसेवेचा अडसर लवकरच होणार दूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) अखेर विमानसेवेचा अडसर दूर करण्यासाठी सायंकाळी सातपर्यंत सेवा देण्यासाठी सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे दुपार आणि संध्याका‍ळच्या विमानसेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

ओझर विमानतळावर दुपारी २.३० वाजेनंतर एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) तसेच इतर सेवा देण्यास यासंदर्भात खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन हा प्रश्न सोडविण्याची विनंती केली. संरक्षणमंत्र्यांनी एचएएलच्या अध्यक्षांना निर्देश दिल्यानंतर अखेर ओझर एचएएलमध्ये गुरुवारी बैठक झाली. त्यास एचएएलचे जनरल मॅनेजर के नारायण, डेप्युटी जनरल मॅनेजर पी. जी. शेटे, मॅनेजर व्ही. जी. देवधर, श्रीनिवास एअरलाइन्सचे हेमंत वाणी हे उपस्थित होते. त्यात सकारात्मक चर्चा झाली असून संध्याकाळी सातपर्यंत ओझर विमानतळाच्या ठिकाणी सेवा देण्यास एचएएलने सहमती दर्शविली आहे. मात्र, यासंदर्भातील लेखी आदेश अद्याप एचएएलने काढलेले नाहीत. हे आदेश येत्या एक-दोन दिवसात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, श्रीनिवास एअरलाईन्सकडे आणखी दोन विमाने येत असून येत्या २२ जुलैपासून नाशिक-पुणे तर, २५ जुलैपासून नाशिक-सूरत ही सेवा सुरू केली जाणार असल्याचे वाणी यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमधून २५ नवे सीए

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या वतीने मे महिन्यात घेण्यात आलेल्या सीए फायनल आणि सीपीटी प्रवेश परीक्षांमध्ये नाशिकच्या एकूण २४३ विद्यार्थ्यांनी यशाला गवसणी घातली आहे. यातील २५ विद्यार्थी यंदा सीए फायनल परीक्षेत पास झाले आहेत.

दोन्हीही परीक्षांसाठी १२०४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यातील वेगवेगळ्या पेपर्समध्ये २४३ विद्यार्थ्यांना यश मिळविले. अखिल भारतीय स्तरावर या फायनल परीक्षेचा निकाल ८ टक्के लागला. तर नाशिकचा निकाल २५ टक्के लागला आहे. फायनल परीक्षेच्या पहिल्या ग्रुपमध्ये २९ विद्यार्थी, तर दुसऱ्या ग्रुपमध्ये ८६ विद्यार्थ्यांनी यश मिळविले.

गेल्या काही वर्षांपासून या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढतो आहे. नाशिक शाखेसही या विषयात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला वाढला आहे. आनंद झंवर

चेअरमन, नाशिक सीए शाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images