इगतपुरी शहर व तालुक्यातील विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय आदिवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष दि. ना. उघाडे यांच्या नेतृत्वाखाली शहरातून जाणाऱ्या जुना मुंबई-आग्रा महामार्गावरील रेल्वे पुलावर सुमारे एक तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रभारी तहसीलदार संघमित्रा बाविस्कर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तहसीलदार यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे मागे घेण्यात आले.
राज्य शासनाच्या प्रत्येक क्षेत्रात अनागोंदी कारभार होत असून शेतकरी, धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त, भूमिहीन, शेतमजूर व सामान्य माणूस यामध्ये भरडला जात आहे. तालुक्यातील जनतेला धरणे उशाशी असूनही पिण्यासाठी पाणी मिळत नाही याला जबाबदार कोण आहे. शहरात नव्याने सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम झाले. मात्र, काही ठिकाणी काम अर्धवट ठेवल्याने नागरिकांना व वाहनधारकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रेल्वे पुलावर कामच न केल्यामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत.
या पुलावरील रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी या निवेदनात केली आहे. सदरच्या मागण्या मान्य न झाल्यास अथवा आमचा आवाज चिरडण्याचा प्रयत्न केल्यास अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने तालुका बंद करण्याचा इशारा दि. ना उघाडे यांनी यावेळी दिला. या रास्तारोकोप्रसंगी अखिल भारतीय आदिवासी सेनेचे संस्थापक प्रमुख दि. ना. उघाडे, जनरल सेक्रटरी सुरेश चौधरी, नीलेश निकाळे, राहुल गोडे, संदीप शर्मा, जगन जोशी, नईम शेख, फईम शेख, रामचंद्र कर्डक, नरेश गोसावी, इंदुबाई पवार, शांताबाई पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट