Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

रेल्वेतून पडल्याने जवानाचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

तालुक्यातील चौगाव येथील सैन्यदलातील जवान अमोल कृष्णा शेवाळे यांचा रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी औरंगाबाद येथील जवाहर नगर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

औरंगाबाद येथील म्हाडा कॉलनीलगत असलेल्या रेल्वे रूळावर सकाळी सात वाजेच्या सुमारास नागरिकांना त्यांचा मृतदेह आढळला. ही बाब पोलिसांना समजल्यानंतर उस्मानपुरा ठाण्याचे कर्मचारी ए. जी. मिसाळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह घाटी रुग्णालयात हलविला. नाशिक येथे जाताना रेल्वेतून पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टोल कामगार पुन्हा सेवेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

निफाडचे विभागीय अधिकारी शशिकांत मंगरुळे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर पीएनजी टोल व्‍यवस्थापनाने स्थानिक सुरक्षा कामगारांना पुन्हा सेवेत घेतले आहे. यामुळे पंधरा दिवसापासून ठप्प झालेली टोल वुसली शनिवारी सायंकाळी सुरू झाली.

पीएनजी टोल कंपनीने टॉप्स सिक्युरिटी एजन्सीमार्फत दोन वर्षाच्या करारावर कामगारांची भरती केली होती. मात्र, पंधरा एप्रिलपासून टोल कंपनीने सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करतानाच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाबरोबर करार केला. कामगारांनी कामबंद आंदोलन, निदर्शने, धरणे व उपोषण आदी मार्गांचा अवलंब करीत टोल प्रशासनाशी संघर्ष केला. शेवटी कामगारांच्या संघटित शक्तीपुढे नमते घेत टोल कंपनीने टॉप्स सिक्युरिटी बरोबर झालेल्या करारास सहा महिने मुदतवाढ दिली. त्यानंतर कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाशी चर्चा करून कामगार आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक सुरक्षा कामगारांना कायमस्वरूपी सेवेत दाखल करून घेण्याचे आश्वासन टोल प्रकल्प व्यवस्‍थापक राजेश विचारे यांनी दिल्यानंतर कामगारांनी उपोषण मागे घेतले.

शनिवारी सायंकाळी आंदोलन मागे घेतल्यानंतर पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर टोल वसुली सुरू झाली. टोल प्रशासनाबरोबर झालेल्या चर्चेत महाराष्ट्र प्रदेश टोल संघटनेचे अध्यक्ष पांडूरंग भडांगे, प्रदेश सरचिटणीस अजय लोढा, कार्याध्यक्ष रामेश्वर भावसार, पिंपळगाव टोल युनियनचे अध्यक्ष सुधीर डांगळे सहभागी झाले होते. यावेळी कामगारांच्या वतीन पंधरा मागण्या करण्यात आल्या. सर्व मागण्या टोल व्यवस्‍थापनासमोर मांडण्यात येतील व याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे विचारे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांकडून ३१५ रिक्षांवर कारवाई

$
0
0

जड वाहनांमागे टेललॅम्प लावण्याचा निणर्य

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी तब्बल ३१५ रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उचलला. परवाना नसणे, गणवेश परिधान न करणे, फ्रंटसिट वाहतूक करणे आदी कारणामुळे ही कारवाई करण्यात आली.

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक पोलिस, प्रादेशिक परिवहन विभाग व संबंधित पोलिस स्टेशनमार्फत अवैधपणे रिक्षा व्यवसाय करणाऱ्या वाहनचालकावर कारवाई करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी शहर वाहतूक शाखेने दिवसभरात सर्व प्रकाराच्या ४२५ वाहनांवर कारवाई केली. त्यात ३१५ रिक्षांचा समावेश होता. परवाना नसणे, गणवेश परिधान न करणे, कागदपत्रे नसणे किंवा अपूर्ण असणे, नियमापेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणे अशा विविध कारणांमुळे ही कारवाई झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर विविध संघटनांशी पोलिस संवाद साधत असून, भाविकांना सिंहस्थ काळात कोणताही त्रास होऊ नये, अशी यामागची अपेक्षा असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. या कारवाईमुळे ‌रिक्षाचालकांचे धाबे दणाणले आहे. पोलिसांच्या या कारवाईचे प्रवाशांकडून स्वागत होत आहे.

दरम्यान, शहर परिसरात होणारे अपघात रोखण्यासाठी जड वाहनांच्या पाठीमागे टेललॅम्प लावण्याचा निर्णय ना​शिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि वाहतूक पोलिसांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.

शहरात झालेल्या दोन भीषण अपघातानंतर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अनेकदा जड वाहनांमागे लावलेले टेल लॅम्प बंद असतात. परिणामी पाठीमागून येणाऱ्या वाहनांना समोरील वाहनांचा अंदाज येत नाही. शहर परिसरात झालेल्या अपघाताच्या घटनानंतर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. वाहनाला टेल लॅम्प, रेडियम रिफ्लेक्टर लावावेत, अशी सूचना बैठकीत करण्यात आली. ही कामे करण्यासाठी वाहतूकदारांना ठराविक वेळ देण्यात आली असून, त्यानंतर नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येईल, असे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मायेच्या ओलाव्याने द्या; घरांना घरपण

$
0
0

अभय बाग यांचे आवाहन; वसंत व्याख्यानमालेचा समारोप

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

माणसे मोठी होताहेत पण, त्यांची मने मात्र छोटीच राहत आहेत. ज्या आई-वडिलांच्या छत्राखाली मूल मोठे होते, त्याच छत्राला आज ते विसरत आहे. उभी हयात लेकरांच्या भवितव्यासाठी कारणी लावणाऱ्या आई-वडिलांना अंतर देऊ नका. मायेच्या ओलाव्याने मुक्या होत चाललेल्या घरांना घरपण द्या, असे आवाहन अभय बाग यांनी केले.

गोदेकाठी यशवंतराव महाराज पटांगणावर आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या समारोपाचे सत्र बाग यांनी गुंफले. 'मुकी झालेली घरे' या विषयावर बाग यांनी विचार मांडले. यावेळी महिनाभर व्याख्यानमालेच्या आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचा गौरवही आयोजकांच्या वतीने करण्यात आला.

बाग म्हणाले, सद्यस्थितीत सामाजिक समस्यांमध्ये ज्येष्ठांना कुटुंब व्यवस्थेकडून मिळणारी वागणूक हा विषय एक सामाजिक समस्या बनला आहे. बहुतांश ठिकाणी ज्येष्ठ नागरिक मुलांच्या स्वैर वागणुकीमुळे एकलकोंडे बनले आहेत. अनेकदा त्यांना या बाबींच्या परिणामी आयुष्याच्या संध्याकाळी नैराश्य, एकटेपणाची भावना यासारख्या प्रश्नांशी झुंजत दिवस ढकलावे लागत आहेत. कुटुंब व्यवस्थेचा आधारस्तंभच आज संकटात सापडला असेल तर समाज व्यवस्थेतील इतर प्रश्न कसे सुटतील, असाही सवाल यावेळी बाग यांनी उपस्थित केला.

ज्या आई वडिलांनी मुलांसाठी उभी हयातभर खस्ता खाल्ल्या. परिस्थितीची बिकट आव्हाने झेलली. त्यांच्या धडपडीची अन् योगदानाची जाणीव जिवंत ठेवून ज्येष्ठांच्या संगोपणास मुलांनी प्राधान्य द्यावे. मोठ्या मनाने त्यांच्या समस्या समजावून घेत त्यांच्याप्रतीचा आदरभार जपावा अन् त्यांच्याशी मायेचे दोन शब्द आत्मियतेने बोलावे. मुलांकडून मनाच्या श्रीमंती शिवाय इतर कुठल्याही भौतिक श्रीमंतीची अपेक्षा आयुष्यभर जीवाचे रान करणाऱ्या आई वडिलांना नसते. हे लक्षात घेऊन मायेच्या ओलाव्याने घरांना घरपण द्या, असे आवाहनही बाग यांनी यावेळी केले.

व्यासपीठावर आमदार सीमा हिरे, महेश हिरे, माजी मंत्री शोभा बच्छाव, चंद्रशेखर शहा, मधुकर झेंडे उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते महिनाभर व्याख्यानमालेस उपस्थित राहणाऱ्या श्रोत्यांमधून उत्कृष्ट पुरूष श्रोता म्हणून रमेश आम्ले, उत्कृष्ट स्त्री श्रोता म्हणून पुण्याच्या आदिती जाधव तर उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून भूषण काळे यांना यावेळी गौरविण्यात आले. याशिवाय व्याख्यानमालेच्या आयोजनात योगदान देणाऱ्यांचाही प्रातिनिधीक गौरव करण्यात आला. यामध्ये योगेश बागले, संतोष कुलकर्णी, नंदू गवांदे, बापू गायधनी, सुनील बिरारी, सुनील देशपांडे आदींचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवरायांचे स्मारक तत्काळ उभारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक तत्काळ उभारण्याचे काम हाती घ्या, अन्यथा छत्रपतींचे नाव घेऊन निवडून दिलेल्या युती सरकारला मराठा समाज धडा शिकवेल, असे प्रतिपादन विजयसिंह राजे महाडिक यांनी केले.

अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या राज्यस्तरीय दहाव्या अधिवेशनात ते बोलत होते. डीजीपीनगर येथील माऊली लॉन्समध्ये आयोजित अधिवेशनास राज्यभरातील संघटनेचे शेकडो कार्यकते उपस्थित होते. अधिवेशन-शिबिराचे आयोजन संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज गायधनी, मनोज बोराडे व तुषार मटाले यांनी केले होते. महाडिक पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात भव्य स्मारक तत्काळ उभारा, अन्यथा मराठा समाज युती सरकारला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.

शिवचरित्राचे गाडे अभ्यासक नितीन बानगुडे पाटील यांनी देखील छत्रपतींच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकला. शिवचरित्रकार साहित्यिक डॉ. दिलीप धानके, मनीषा माने, सुनील मोरे व वामनराव भिलारे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी समाजातील कर्तृत्वान महिला व पुरुषांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिजाऊ महिला क्रांती संघटना, शंभुराजे युवा क्रांती संघटना, संभाजी ब्रिगेड, मराठा विद्यार्थी सेना आदी संघटनांनी परिश्रम घेतले.

अधिवेशनातील ठराव

राज्यस्तरीय अधिवेशनात सरकारकडे दहा मागण्या मांडण्याचा ठराव करण्यात आला. यात प्रामुख्याने मराठा समाजाला आरक्षण, यशवंतराव चव्हाण, क्रांतीसिंह नाना पाटील यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा, शिवजयंतीला प्रत्येक ग्रामपंचायतीला सरकारने ५० हजार रुपयांचा निधी द्यावा, तंटामुक्ती ग्राम योजनेचे प्रवक्ते दिवंगत आर. आर. पाटील यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा यांसह अनेक मागण्यांचा ठराव करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालमत्ता कराची विक्रमी वसुली

$
0
0

दोन महिन्यात २१ कोटी जमा; जूनमध्येही दोन टक्के सवलत

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मालमत्ताधारकासांठी महापालिकेने सुरू केलेल्या सवलत योजनेला एप्रिल आणि मे महिन्यात भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. एप्रिल पाठोपाठ मे महिन्यात सुद्धा सवलत योजनेत महापालिकेच्या तिजोरीत तब्बल अकरा कोटी रुपये जमा झाले आहेत. दोन महिन्याचा हा आकडा २१ कोटीवर गेला आहे. गेल्या वर्षी एप्रिल व मे या दोन महिन्यात महापालिकेच्या तिजोरीत केवळ तीन कोटीची रक्कम जमा झाली होती. मात्र या वर्षी तब्बल १७ कोटी अशी अतिरिक्त रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा झाल्याने पालिकेची दिवाळी झाली आहे.

नागरिकांनी मालमत्ता कर वेळेवर भरण्यासाठी पाच, तीन आणि दोन टक्के अशी सवलत योजना सुरू केली आहे. एप्रिल महिन्यात मालमत्ता कर भरल्यास पाच टक्के, मे म‌हिन्यामध्ये भरल्यास तीन टक्के आणि जून महिन्यामध्ये भरल्यास दोन टक्के बिलात सवलत दिली जाणार आहे. एप्रिल महिन्यात पाच टक्के बिलात सवलत मिळाल्याने शहरातील ४१ हजार ४४३ मिळकतधारकांनी १० कोटी ७६ लाख ९६ हजार ६४७ रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा केले आहेत.

एप्रिलनंतर मे महिन्यातही तीन टक्के सवलत योजनेला भरभरून प्रतिसाद मिळाला. मे महिन्यातही ४० हजाराच्या वर मालमत्ताधारकांनी १० कोटी २३ लाखाची रक्कम जमा केली आहे.

शेवटच्या दिवशी तब्बल दीड कोटीची रक्कम तिजोरीत जमा झाली. त्यामुळे एप्रिल आणि मे अशा दोन महिन्यात तब्बल २० कोटी ९७ लाखांची रक्कम पालिकेला मिळाली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात एक कोटी ७४ लाख रुपये जमा झाले होते. मात्र, या वर्षी त्यात ९ कोटीची वाढ झाली आहे. तर, गेल्या वर्षी एप्रिल आणि मे महिना अशा दोन महिन्यात तीन कोटी १० लाख रुपये जमा झाले होते. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी महापालिकेला १७ कोटी अशी विक्रमी रक्कम आगाऊ मिळाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिडको परिसरातील हनुमान चौक येथे राहणाऱ्या वृध्द दाम्पत्याने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची बाब रविवारी सकाळी उघडकीस आली. पांडूरंग शिंदे (वय ६५) आणि मंजुळा शिंदे (वय ६०) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.

महाराणा प्रतापचौकाजवळील हनुमान चौकात राहणाऱ्या शिंदे दाम्पत्याने रविवारी पहाटे दीड ते सकाळी ९ वाजेच्या दरम्यान आपल्याच खोलीत आत्महत्या केल्याची बाब सकाळी उघडकीस आली. आई वडिलांच्या खोलीत कोणतीही हालचाल नसल्याची पाहून मुलगा खोलीत गेला असता हा प्रकार समोर आला. शिंदे दाम्पत्यास तीन मुली व एक विवाहीत मुलगा आहे. याबरोबर घटस्फोटीत मुलगीही येथेच राहते. खालच्या मजल्यावर मुले व वरील मजल्यावर वृध्द दाम्पत्य वास्तव्यास होते. वायरमन म्हणून निवृत्त झालेल्या ​पांडूरंग शिंदे यांना तसेच त्यांच्या पत्नीस काही वर्षांपासून ब्लड प्रेशर, डायबेटीस तसेच थॉयराईडचा आजार सतावत होता. त्यातच काही दिवसांपूर्वी जीना चढताना मंजुळा शिंदे पडून त्यांचा हात दुखावला होता. या आजारपणाला ​शिंदे दाम्पत्य वैतागले असावे, असा पोलिसांचा कयास आहे. शिंदे यांनी पंख्याला दोर बांधून आत्महत्या केली. तर मंजुळा ​शिंदे यांचा मृतदेह अंथरुणावरच पडलेला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास अंबड पोलिस करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारची इतकीही ऐपत नाही का?

$
0
0

शंभर कोटीचे टोल तातडीने बंद करण्याची राज ठाकरेंची मागणी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यसरकारने काही टोल बंद करण्याची घोषणा केली असली, तरी त्याबाबत मी समाधानी नाही. टोल धोरणात युती सरकार पारदर्शकता का आणत नाही, असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. तर शंभर कोटीच्या आतील टोल बंद करता येत नाहीत, इतकीही ऐपत सरकारची नाही का? असाही टोला ठाकरेंनी लगावला.

नाशिक शहरातील विकास कामाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ठाकरेंनी भाजपा-शिवसेना युती सरकारच्या टोलधोरणावर अप्रत्यक्ष टीका केली. सध्या बंद होणारे टोल हे मनसेच्या आंदोलनाचे परिणाम आहेत. पंरतू सध्याच्या सरकारकडूनही टोल बंद करण्यासंदर्भात 'तारीख पे तारीख' सुरू असल्याचेही ते म्हणाले. टोलच्या धोरणात पारदर्शकता दिसत नसून, सरकारची एवढी ऐपत नाही का की, शंभर कोटीच्या आतील टोल तातडीने बंद करता येत नाहीत. महत्त्वाच्या रस्त्यांवर आणि एन्ट्री पॉईंटसरवरच टोल असायला हवेत. परंतू सरकार टोलमध्ये पारदर्शकता आणत नाही, अशी खंतही ठाकरे यांनी व्यक्त केली.

शेंडेंची बदली बिल्डरमुळे

महापालिका नगररचना विभागाचे सहसंचालक विजय शेंडे यांच्या बदलीवरूनही ठाकरेंनी फडणवीस सरकारवर टीका केली. शेंडेची बदली ही चुकीची असून बिल्डरधार्जिनी आहे. चांगल्या अधिकाऱ्यांची बदली केली जात असेल, तर चांगली कामे कशी होणार असा सवाल करत राजकीय दुश्मनीतून आडून शहरावर सूड उगवला जात असल्याचे ते म्ह्णाले.

सिंहस्थाचे पैसे कुठेत?

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी निधी न देणाऱ्या केंद्रासह राज्य सरकारवरही राज ठाकरेंनी टीका केली आहे. सिंहस्थ कामांचा मनपावर ओझे पडत आहे. केंद्राचे पैसे अजून तरी आले नाहीत, तर राज्य सरकारकडून हळूहळू पैसे येत आहेत. त्यामुळे महापालिका किती दिवस खड्ड्यात जाणार? केंद्र आणि राज्याकडून निधी येत नसल्याने कामावर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगीतले.

टोलवा टोलवी...

टोलचे कॅश व्यवहार तात्काळ बंद करा.

रोजच्या वाहनांच्या संख्येची नोंदणी करा

वाहनांची संख्या वाढतेय; मात्र टोल तेवढाच

टोलमध्ये दररोज होतेय बनवेगिरी

एटीएममशीन सारखी व्यवस्था निर्माण करा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थांबा, नाशिकचे चित्र पालटेल!

$
0
0

म. टा.खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिच्या वाढत्या शहरीकरणामुळे पार्किंगचा प्रश्न गंभीर होणार असतांनाही, नव्या विकास आराखड्यात पार्किंग प्लॉटकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. पार्किंगवर तोडगा काढण्यासाठी शहरातील मोठ्या मैदानांखाली पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी, अशी सूचना आपण नव्या विकास आराखड्यात करणार असल्याची माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. बॉटनिकल गार्डनचे काम दहा दिवसात सुरू होणार असून रस्त्यांची कामेही अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे काही दिवसातच नाशिकचे चित्र पालटेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.

राज ठाकरे यांनी रविवारी शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी, सिंहस्थासह महापालिकेची कामे उत्तम प्रकारे सुरू आहेत. रस्त्यांच्या कामाचें फिनीशिंग सुरू आहे. दोन तीन महिन्यात ही कामे पूर्ण होतील त्यामुळे काही दिवसातच शहराचे चित्र पालटलेले दिसेल. शहराच्या आतील भागातील स्वच्छतेलाही प्राधान्य दिले जात आहे. काही बिल्डरांकडून काही डेब्रिज जागेवरच सोडून दिले जाते. त्यामुळे हे शहरातील डेब्रिज काढण्याचे आदेश आयुक्तांना दिले आहेत. ट्रक लावून हे डेब्रिज हटवले जाणार आहे. बॉटनिकल गार्डनचे कामही दहा दिवसातच सुरू होणार आहे. तर गोदापार्कचे कामही अंतिम टप्प्यात असल्याचे ठाकरे यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे लवरकरच नाशिकचे चित्र पालटलेले दिसेल असे त्यांनी यावेळी सांगीतले.

बादलांशी चर्चा करणार

रामकुंडावरील भाजीबाजाराच्या जागेवर पंजाब सरकारची मालकी आहे. त्यामुळे या जागेवर कुठेलेही काम करता येत नाही. काही काम करायवयाचे असेल तर पंजाब सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. येत्या १० तारखेला पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल पुण्यात येणार आहे. त्यावेळी आपण या जागेबाबत त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

२५ घंगाळांची खरेदी

राज ठाकरे यांनी सराफ बाजाराचा दौरा करताना एका सराफाच्या दुकानात प्रवेश केला. त्या दुकानातील आकर्षक भांडी पाहून त्यांनी यावेळी घंगाळची खरेदी केली. सराफाला २५ घंगाळची ऑर्डरही त्यांनी दिली. तर काही तयार घंगाळ आपल्यासोबत नेले.

न्यायालयाचे राज्य

छोट्या छोट्या गोष्टींनाही स्थगिती देणाऱ्या न्यायालयाच्या कामकाजावरही ठाकरेंनी आक्षेप घेतला असून, महापालिका, राज्यसरकारचे कामकाज सध्या न्यायालयच चालवित असल्याची टीका त्यांनी केली आहे. झाडे तोडण्यासह विविध छोटया छोट्या गोष्टींवरही न्यायालयाकडून काही ही झाले तरी, स्थगिती दिली जाते.

गाडीला अपघात

राज ठाकरे यांच्या दौऱ्यात त्यांच्या ९ क्रमांकाची आवडती लॅन्ड क्रुझर गाडीला औरगांबादकडील रिंगरोडवरील एका पुलावर अपघात झाला. शहरात राहुल ढिकले यांच्या गाडीने या पुलावर मागून लॅन्ड क्रुझरला धडक दिली. त्यामुळे कारचे मागच्या बाजुचे बरेच नुकसान झाले. तर ढिकले यांच्या गाडीचेही मोठे नुकसान झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

$
0
0

नाशिकरोड : नाशिकरोड परिसरात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केले. पोलिस उपायुक्त विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ निरीक्षक नारायण न्याहाळदे आणि सहकाऱ्यांनी नुकतेच रात्री उशिरापर्यंत मोहिम हाती घेतली. सिन्नरफाटा, स्टेशनवाडी, गोदरेजवाडी या गुंडगिरी अधिक असलेल्या भागात ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी मद्याच्या अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले तसेच काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले. तीन पोलिस अधिकारी व १५ कर्मचारी यांनी या मोहिमेत भाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अॅसेट टॅलेण्ट स्कॉलर’ला गवसणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतातील आघाडीच्या मूल्यांकन आणि संशोधन कंपन्यांपैकी एक असलेल्या एज्युकेशन इनिशिटीव्ह (ईआय) व अमेरिकेतील ड्यूक युनिव्हर्सिटी टॅलेन्ट आयडेन्टीफिकेशन प्रोग्राम (ड्युक टीआयपी) यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या 'ड्यूक टिप असेट टॅलेंट सर्च' या क्रांतिकारी उपक्रमात नाशिकमधील तीन विद्यार्थी चमकले आहेत. चार्वी काब्रा, यश चांडक व दिव्य ब्रह्मेचा यांना 'अॅसेट टॅलेण्ट स्कॉलर' पुरस्काराने स्मानित करण्यात आले आहे.

'ड्यूक टिप असेट टॅलेंट सर्च'चे निकाल नुकतेच जाहीर केले. ऑगस्ट २०१४ मध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यात नाशिकच्या २८ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. त्यातील विस्डम हाय इंटरनॅशनल हायस्कूलच्या चार्वी काब्रा हिला गणित विषयात, यश चांडक व दिव्य ब्रह्मेचा यांना विज्ञान विषयात 'अॅसेट टॅलण्ट स्कॉलर्स' होण्याचा मान मिळाला आहे.

अॅसेट ही वैज्ञानिक पद्धतीने तयार करण्यात आलेली मूल्यांकन चाचणी असून ती विद्यार्थ्यांच्या इंग्लिश, गणित व विज्ञान या विषयांमधील बलस्थानांचा आणि कमजोरींचा शोध घेण्यासाठी या मूल्यांकन पद्धतीचा वापर केला जातो. गणित, विज्ञान व इंग्लिश या विषयांमध्ये असामान्य बुद्घिमत्ता असलेल्या गुणवान विद्यार्थ्यांचा शोध घेणे या उद्दिष्टानी उपक्रमाचे आयोजन केले जाते. या टॅलण्ट स्पर्धेत ३४७ बुद्धिमान विद्यार्थ्यांनी बाजी मारली. हा टॅलेण्ट सर्च प्रोग्राम म्हणजे ईआयच्या अॅसेट या पेटण्टधारी मूल्यांकन चाचणीचे प्रारुप होते. २००१ पासून दरवर्षी भारत, दुबई, कुवैत आणि सिंगापूरमधून साडे तीन लाखांहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देत आले आहेत. यावर्षी ३२०० विद्यार्थी सहभागी झाले होते. जवळपास तीन लाख विद्यार्थ्यांनी अॅसेट चाचणीला बसून या तीन विषयांमधील आपली गुणवत्ता सिद्ध केली.

नाशिकमधील यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविताना एज्युकेशन इनिशिएटीव्हज प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक श्रीधर राजगोपालन म्हणाले, की या स्पर्धेला नाशिकमधून चांगला प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी केलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे. या वर्षीच्या परीक्षेत अधिक कठीण प्रणालीचा वापर करून विद्यार्थ्यांच्या क्षमतेला तपासले गेले असल्याचेही ते म्हणाले.

अशी आहे 'ईआय' संस्था

'एज्युकेशन इनिशिएटीव्ह्ज प्रा. लि.' (ईआय) ही शैक्षणिक संशोधन आणि मूल्यांकन संस्था आहे. आपल्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा वाढीस लागावा याकरता आयआयटी आणि आयआयएम-ए अल्युम्नायच्या ग्रुपने ही संस्था स्थापन केली आहे. या संस्थेला दक्षिण आशियातील आघाडीची मूल्यांकन तज्ज्ञ अशी ओळख मिळाली आहे. स्पॅनिश बॅन्किण्टर फाऊंडेशन फॉर इनोव्हेशन आणि हफिंग्टन पोस्ट हे अमेरिकन वृत्तपत्र अशा दोन आंतरराष्ट्रीय स्त्रोतांकडून ईआयला भारतातील पहिल्या २५ शैक्षणिक प्रयोगकर्त्यांमध्ये स्थान दिले गेले आहे. शालेय शिक्षणातून मिळणाऱ्या ज्ञानामध्ये सुधारणा करून आणणे आणि त्याच्या दर्जात वाढ करणे यावर लक्ष केंद्रित करणारी ही देशातील सर्वात मोठी व एकमेव शासनेतर संस्था आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदा स्वच्छतेसाठी जल सत्याग्रह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

गोदावरी नदीची सध्या गटार गंगा झाली आहे. सिंहस्थ जवळ आला आहे पण प्रशासन अजूनही नदीच्या स्वच्छतेबाबत ठोस निर्णय घेतांना दिसत नाही. साफसफाईचा फक्त फार्स निर्माण करीत आहे. गोदावरीचे पाणी अतिशय निर्मळ झाले पाहिजे, गोदावरी गटारमुक्त झाली पाहिजे अशी मागणी निर्मल गोदा अभियान समितीने केली आहे.

रविवारी निर्मल गोदा अभियानचे वतीने 'जल सत्याग्रह' रामकुंड येथे करण्यात आला. गटार मुक्त गोदावरी करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत. कागदावर नियोजन करू नये. नदीत वेगवेगळ्या गटारीतून अतिशय घाण पाणी सोडण्यात येते. त्यामुळे पाणी खराब होते व भाविकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. गटारीकरण व प्रदुषणामुळे पिण्याचे पाणी, जलजीवन, शेतीचे नुकसान होत आहे. 'नमामि गंगेसाठी' २० हजार कोटी मंजूर झाले आहेत. गंगेलाही न्याय मिळाला पाहिजे, असेही यावेळी सांगितले. यावेळी नितीन शुक्ल यांनी सांगितले, की प्रशासनाने गोदावरी नदी निर्मल करण्यासाठी अधिक पाणी सोडून स्वच्छ करणेच चुकीचा निर्णय घेतला आहे. अधिक पाणी सोडल्याने निर्मल होणार नाही त्यासाठी गटारी बंद करणे गरजेचे आहे. प्रशासनाने हायकोर्टाचा अपमान केला आहे. अनेक घाट निर्माण करण्यापेक्षा 'रामकुंड, लक्ष्मण कुंड व परिसरातील सर्व भाग सुंदर करावा. सर्व भाविकांना स्वच्छ व निर्मल पाण्याने स्नान करता येईल असे नियोजन करावे, अशी मागणी नितीन शुक्ला, भारती जाधव, निखील सिन्हा, अनिल सिंग, हेमंत जाधव, गौरव क्षत्रिय, सौरव नागपुरे, जगबीरसिंग यांनी केली.

गोदावरी स्वच्छता प्रकल्पास फक्त ७० कोटी रुपये खर्च येणार आहे. ते पैसे दिले असते तर कायमचा प्रश्न मिटला असता.

- हेमंत जाधव

प्रशासनाने गोदावरीची गटारगंगा तातडीने उपाययोजना करवून थांबवावी. प्रशासनाने नागरिकांची फसवणूक केल्यामुळे मी निषेध म्हणून मुंडन केले आहे.

- नितीन शुक्ल

गोदेच्या पाण्यात स्नान करण्यासाठी अनेक भाविक येतात. मात्र, नदीच्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे आरोग्य बिघडते. त्यामुळे नदीची नियमित साफ-सफाई करण्यात यावी.

- भारती जाधव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ई-पेमेंटने कर भरल्यास जादा सूट

$
0
0

विनोद पाटील,नाशिक

नाशिक महापालिकेने मनुष्यबळावरील अतिरिक्त ताण कमी करून पेपरलेस कारभाराच्या दिशेने पाऊल टाकायला सुरूवात केली आहे. मालमत्ता कर सवलत योजनेत शहरातील मालमत्ता धारकांनी ई-पेमेंटचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्याने महापालिका आता ई-पेमेंटला एक टक्का अतिरिक्त सवलत देण्याचा विचार करते आहे. गेल्या दोन महिन्यात तब्बल सहा हजार मालमत्ताधारकांनी ई-पेमेंटचा वापर केला आहे. त्यामुळे कर विभागाने तयार केलेल्या या प्रस्तावाला आयुक्तांनीही संमती दिल्याने लवकरच स्थायी समितीवर मंजुरीसाठी हा प्रस्ताव येणार आहे. विशेष म्हणजे वर्षभर ही सवलत राहणार असून, सध्याच्या सवलत योजनेत एक टक्क्यांनी वाढ होणार आहे.

महापालिकेच्या क्षेत्रात तीन लाख 98 हजार मालमत्ता धारक असून, पाणीपट्टीचे ग्राहक एक लाख ९० हजार एवढे आहेत. या सर्वांना महापालिकेच्या वतीने वार्षिक बिल हे घरपोच दिले जाते. त्यासाठी महापालिकेच्या यंत्रणेवर मोठा ताण येतो. मालमत्ता कर आणि पाणीपट्टीचे बिल अदा केल्यानंतर ग्राहक महापालिकेच्या विभागीय कार्यालयांमध्ये येऊन बिल भरतात. त्यामुळे या विभागीय कार्यालयामंध्ये रांगा लागतात. आतापर्यंत एप्रिलमध्ये कर भरल्यास पाच, मेमध्ये तीन व जूनमध्ये दोन टक्के कर सवलत मिळत होती. या योजनेला ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला. दोन महिन्यात तब्बल २१ कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. मात्र, यामुळे या कार्यालयांवरचा ताण अधिकच वाढला आहे.

दोन महिन्यात मालमत्ता कर सवलत योजनेत सहा हजार २१० नागरिकांनी ई-पेमेंट पद्धतीने कर भरला आहे. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने कर भरणाऱ्यांची संख्या जास्त वाढल्याने महापालिकेच्या यंत्रणेवरील ताण वाचला आहे. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने कर भरणाऱ्यांना अतिरिक्त प्रोत्साहन देण्यासाठी बिलात आणखी एक टक्क्याची अतिरिक्त सूट देण्याचा प्रस्ताव विविध कर संकलन विभागाने तयार केला आहे. या प्रस्तावाला आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनीही अनुकूलता दर्शवली आहे. त्यामुळे महापालिकेच्या सूट व्यतिरिक्त ऑनलाईन भरणासाठी अतिरिक्त सवलत ग्राहकांना मिळणार आहे. विशेष म्हणजे ही योजना वर्षभर राबविली जाणार असल्याने मालमत्ताधारकांनाही रांगांशिवाय व विशेष सवलतीत कर भरता येणार आहे.

ई-पेमेटचे ६२१० ग्राहक

महापालिकेन सुरू केलेल्या मालमत्ता कर सवलत योजनेत ई-पेमेंट पद्धतीचा तब्बल सहा हजार २१० मालमत्ताधारकांनी लाभ घेतला आहे. या ऑनलाइन पद्धतीतून महापालिकेच्या तिजोरीत तब्बल एक कोटी ८५ लाख रुपये जमा झाले आहेत. ई-पेमेंटमुळे साडेपाच लाखाच रिबेट महापालिकेला द्यावे लागले आहेत. ई-पेमेंटला वाढलेला हा प्रतिसाद पाहूनच महापालिका प्रशासनाने ई-पेमेंट सूट योजनेचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव लवकरच स्थायीवर ठेवला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज आले, कुणी नाही पाहिले!

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी शहरातील विकासकामांची पाहणी 'मनसे' स्टाईलच केली. दोन-तीन ठिकाणे सोडली तर बहुतांश ठिकाणची पाहणी त्यांनी आपल्या आलिशान एसी गाडीत बसूनच केली. विशेष म्हणजे सिंहस्थातील सर्वात वादग्रस्त ठरलेल्या आणि ८२ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या साधूग्रामची पाहणीसुद्धा त्यांनी गाडीतूनच केल्याने त्यांच्या प्रतिक्षेतील साधूही अवाक् झाले. त्यामुळे अनेक ठिकाणी ठाकरे आले पण कोणी नाही पाहिले अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.

नगरसेवकांसह अधिकाऱ्यांच्या हमखास सुट्टीचा दिवस असलेल्या रविवारीच ठाकरे यांचा दौरा असल्याने नेहमीप्रमाणे अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांमध्येही उत्साह दिसत नव्हता. तर ठाकरे यांनीही आपले दौऱ्याचे सोपस्कार आपल्या सोयीने पार पाडले. नियोजित दौऱ्याला फाटा देत सकाळी साडे नऊ वाजता त्यांनी इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकपासून सुरुवात केली. त्यानंतर कामटवाडा पूल, एबीबी सर्कल, मखमलाबाद रोड, आरोग्य विज्ञान विद्यापीठ, साधुग्राम आणि रामकुंड, सराफ बाजार असा दौरा केला. त्यात जॉगिंग ट्रॅक, कामटवाडा पूल, मखमलाबाद रोड सोडता, उर्वरित ठिकाणांची गाडीत बसूनच पाहणी केली. उन्हाचाही चढलेल्या पाराचा परिणाम त्यांच्या दौऱ्यावर झाला. रिंगरोडसह साधूग्राम त्यांनी उभ्या उभ्या गाडीतून पाहिला. साधुग्रामला ठाकरे तर गाडीच्याही बाहेर आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या भेटीसाठी थांबलेल्या साधूंना त्यांची भेट होवू शकली नाही. त्यामुळे ठाकरे आले पण आम्ही नाही पाहिले अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. तर रामकुंडावर त्यांचे बॅण्डबाजा वाजवून कार्यकर्त्यांनी स्वागत केले. त्यानंतर थेट विश्रामगृहावर जावून अधिकारी आणि काही संस्थाशी चर्चा केली. त्यानंतर विश्रामासाठी हॉटेल एक्सप्रेस इनकडे प्रयाण केले.




नगरसेवकांनी फिरविली पाठ

रविवारच्या दौऱ्यात राज ठाकरे यांच्या दौऱ्याकडे अनेक नगरसेवकांनी पाठ फिरवली. महापौर अशोक मुर्तडक, सभागृहनेते सलिम शेख, जिल्हाध्यक्ष शशिकांत जाधव, सुदाम कोंबडे, गटनेता अनिल मटाले यांच्यासह नऊ ते दहा नगरसेवकच ठाकरे यांच्या दौऱ्याला उपस्थित होते. त्यामुळे नगरसेवकांच्या नाराजीची पुन्हा चर्चा सुरू झाली. अनेक नगरसेवक कामे होत नसल्याने नाराज आहेत. तर अनेकांवर गिते समर्थक असल्याचा शिक्का मारल्याने वर्तमान पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. त्यामुळे मनसेत सध्या किती नगरसेवक आहेत, हे सांगणेही अवघड झाले आहे.

श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न

रामकुंडावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज्यात उद्यापासून सुरू होणाऱ्या टोलमुक्तीच्या निर्णयाबद्दल ठाकरे यांच्या उपस्थितीत वाजत गाजत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. हा कार्यक्रम रस्त्या ऐवजी रामकुंडावर घेण्यात आल्याबद्दल रामकुंडावरीलच लोकांनी आश्चर्य व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरची झाली तिखट

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सटाणा

स्वयंपाकासाठी आवश्यक असलेला गरम लाल व काळा मसाल्यासोबतच लोणच्याच्या मसाल्याची तयारी घरोघरी सुरू असल्याने सर्वत्र या मसाला ठसका बसत असतो. मात्र, यंदाच्या अवकाळी पाऊस व मिरचीच्या कमी उत्पादनामुळे भाव तडकल्याले गृहिणींना मसाला चांगलाच तिखट लागत आहे.

वर्षभर पुरेल एवढा मसाला तयार करून डब्यात ठेवण्याची प्रथा फार पूर्वपार सुरू आहे. या मसाल्यासाठी मिरची हा प्रमुख घटक असून, अवकाळी पावसाचा फटका बसल्याने मिरचीचे दर कडाडले आहेत. बाजारात लाल मिरची विक्रीसाठी आली असून, नंदूरबार सर्वाधिक आवक होत आहे. चटकदार मसाला जेवणात महत्वाचा मानतात. मसाल्यासाठी खोबरे, खसखस, जिरे, हिंग, बाज्या अशा अनेक प्रकारचे मसाल्याचे पदार्थ वापरतात. लाल मिरचीचे तर चव अधिक स्वादिष्ठ असले. चांगल्या प्रतीची मिरची वापरून नागरिक मसाल्यासाठी गर्दी करतात.

यंदा बाजारात नंदुरबार भागातून अनेक प्रकारच्या मिरची दाखल झालेल्या असून मिरचीच्या दरात २० टक्के वाढ झाल्याने भाव चांगलेच वाढले आहेत. शंभर रुपयापासून साडेतीनशे रुपयांपर्यंत मिरची विक्रीस असून, देठाच्या व बिनदेठाच्या मिरचीच्या भावात वीस ते तीस रुपयांचा फरक आहे. नंदुरबार, जळगाव, गटूंर, आंध्रप्रदेश मधून मिरची बाजारात आली आहे.

मिरची बरोबर हळकूंड, जिरे, सुंठ, वेलची या पदार्थांना मागणी वाढली आहे. मसाला घरी बनवितांना मसाल्याचे सर्व पदार्थ चुलीवर मोठ्या कढईत भाजावे लागतात. त्यांनतर ते कांडप मशीनद्वारे दळून आणावे लागतात. यंदा कांडप मशीन व्यावसायिकांनी पाच रुपये दर वाढवून दिल्याने प्रती किलोचा भाव २५ ते ३० रुपये आहे.

मिरची दर

जळगांव कापरा- २१० रुपये, बेडकी २९० रुपये, रसगुल्ला २२० रुपये, काश्मीर ३४० रुपये, पाफडा १७० रुपये, गावरानी २४० रुपये, अकुंर २५० रुपये, लवंगी २१० रुपये.

मसाल्याचे दर

खोबरे १८० रुपये, हिंग २४० रुपये, जिरे २४० रुपये, तेल ११० रुपये.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साडेसतरा लाखांची लूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंडित कॉलनी परिसरात दोन बाईकवर आलेल्या चौघा जणांनी मिळून १७ लाख ७६ हजार रुपयांची रोकड लुटून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असला तरी घटनेच्या २४ तासानंतर आरोपींचा कोणताही मागमूस पोलिसांना लागलेला नाही.

खंडू शिरसाठ असे फिर्यादीचे नाव असून, ते मोरवाडीगाव येथील रहिवाशी आहेत. ते एका मद्य व्यवसायिकांकडे चालक म्हणून काम करतात. रविवारी रात्री वेगवेगळ्या मद्य दुकानांवरील कॅश एकत्रित करून मद्य व्यवसायिकाच्या घरी परतत होते. साधारणतः रात्री ११ वाजेच्या सुमारास शिरसाट पंडित कॉलनीतील ठक्कर नगर येथील मद्य व्यवसायिकाच्या चारचाकी वाहनाने पैसे घेऊन घरी पोहचले. मोठी रक्कम असल्याने सावधगिरी म्हणून इकडे-तिकडे पाहून शिरसाट वाहनातून खाली उतरले. त्याचवेळी दोन दुचाकीवर तिघे- चौघे जण तिथे पोहचले. त्यांनी लागलीच शिरसाठ यांना मारहाण करीत बॅग हिसकावून घेतली. तसेच घटनास्थळावरून पोबारा केला.

साधारणतः पाच मिनिटात हा सर्व प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात सहा आरोपींचा सहभाग असून, ते दोन दुचाकींवर आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. याबाबत अधिक माहिती देताना सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे यांनी सांगितले की, तपासासाठी वेगवेगळे पथके तैनात करण्यात आली असून, लवकरच त्यांना अटक करण्यात येईल. घटना घडली त्या ठिकाणापासून २०० मीटर अंतरावर एक सीसीटीव्ही आहे. मात्र, रात्रीचा अंधार व सीसीटीव्हीचे अस्पष्ट फुटेज त्यामुळे यातून काहीही निष्पण झालेले नाही. मागील काही महिन्यांपासून लुटीच्या घटना शहरात सातत्याने घडत आहेत. रविवारी रात्री गंगापूररोडवर एका महिलेच्या गळ्यातील ४४ हजार रुपयांची चेन हिसकावण्यात आली. याबरोबर, १७ मे रोजी देखील सातपूर एमआयडीसी परिसरात वृध्द महिलेच्या गळ्यातील ५२ हजार रुपयांची चेन ओरबडण्यात आली. या घटनेची नोंद रविवारी करण्यात आली. यापूर्वी धात्रक फाटा येथून महिलेच्या गळ्यातील ९० हजार रुपये किंमती​चे मंगळसूत्र चोरट्यांनी तोडून पोबारा केला. यातील एकाही आरोपीस अटक झालेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण समितीचा चेंडू सरकारच्या कोर्टात

$
0
0

निकालाकडे सर्वांचेच लागले लक्ष

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेच्या वादग्रस्त ठरलेल्या शिक्षण समिती सदस्य निवडीला आणि सभापती निवडी संदर्भातील सद्यस्थितीचा अहवाल महापालिका आयुक्तांकडून शासनाला सादर करण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षण समितीचा चेंडू आता शासनाच्या कोर्टात असून, त्यावर सरकार काय निर्णय घेते यावर समितीचे भविष्य अवलंबून आहे.

शिक्षण समितीच्या निवड प्रक्रियेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी स्थगिती दिली होती. सोबतच आयुक्तांना समितीसंदर्भात सव‌िस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले होते. त्यावरून महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांनी समितीच्या निवड प्रक्रियेसंदर्भातल सविस्तर अहवाल शासनाकडे सादर केला आहे. राजपत्रात नोंद झालेली नसल्याने शिक्षण मंडळ बरखास्त झाले. त्यानंतर शिक्षण आयुक्तांच्या पत्रानुसार महापौरांनी समितीची निवड प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानंतर सोळा समिती सदस्यांची निवड, सभापती निवडीसाठी विभागीय आयुक्तांना सादर केलेल्या प्रस्तावाची माहिती देण्यात आली आहे. तसेच आपल्या स्तरावर योग्य ती कारवाई करावी, असे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे आता समितीचे भविष्य आता शासनाच्या हातात आहे. मुख्यमंत्री फडणवीस या समितीसंदर्भात काय निर्णय घेतात, याकडेच आता सर्वांच्या नजरा लागून आहेत. समितीच्या सदस्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. तर शिक्षण मंडळ सदस्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. शिक्षण मंडळ पुनरुज्जीवित झाले तर, विविध पक्षातील कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. त्यामुळे शासनाच्या निर्णयाकडे आता सर्वजन डोळे लावून बसले आहेत. यामुळे मुख्यमंत्री फडणवीस अहवालावर समितीच्या बाजूने की विरोधात निकाल देतात हे औत्सक्याचे ठरले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सासे खूनप्रकरणातील संशयित फरार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

किरकोळ कारणावरून हत्या करण्यात आलेल्या शैलेश दत्तात्रय सासे (वय २६) या तरुणाच्या मारेकऱ्यांची ओळख पटली असून, पुढील काही तासातच आरोपीस अटक करण्यात येईल, असा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे. शैलेशची रविवारी रात्री साठे चौकातील किटकॅट चौकात दहा वाजेच्या सुमारास हत्या झाली होती.

भोई गल्लीत राहणाऱ्या आणि मासे विक्रीचा व्यवसाय असलेला शैलेश व साजन मोहन ठाकरे या दोघांनी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास काम आटोपल्यानंतर किटकॅट चौकातील सागर रसवंती आणि कोल्ड्रीक्स हे दुकान गाठले. दुचाकी पार्क करून पाण्याची बॉटल घेण्यासाठी ते आत गेले. घेतलेल्या बॉटल्स शैलेशने काऊंटरवर ठेवल्या. त्याच वेळी तिथे आलेल्या २२ ते २३ वयोगटातील आरोपीने सिगारेट पेटवून शैलेशच्या तोंडावर धूर सोडला. याबाबत शैलेशने जाब विचारला असता आरोपीने शिवीगाळ सुरू केली. सिगारेट पिणाऱ्या आरोपीसह त्याच्या दोन मित्रांनी बंदूक व चाकूसारखे हत्यार बाहेर काढले. या प्रकारामुळे साजन व शैलेशने दुचाकीकडे धाव घेतली. आरोपींनी शैलेशला गाठलेच. साजन तेथून निसाटला. शैलेशला फरफटत जवळील दुचाकी सर्व्हिस स्टेशनजवळ नेले. तेथे आरोपींनी शैलेशच्या पोटावर चाकूचे वार केले. यावेळी तिथे बघ्यांची गर्दी झाली होती. शैलेशला सोडून आरोपींनी दुचाकीवर बसून खडकाळी सिग्नलकडे धूम ठोकली. जखमी शैलेशला घेऊन साजनने रिक्षानेच सिव्हिल हॉस्पिटल गाठले. मात्र, अधिक रक्तस्त्रावामुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच शैलेशच्या नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तुफान तोडफोड केली. पोलिसांनी लाठीमार केला असता त्यांच्यावर देखील दगडफेक केली. यात, सहायक पोलिस आयुक्त रवींद्र वाडेकर यांच्या डोक्याला मार लागून ते जखमी झाले. त्यांच्यावर ​खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. खून प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तोडफोड केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्यांची नोंद केली आहे.

आरोपींचा वयोगट

शैलेशची हत्या करण्यात सहभागी असलेले सर्व आरोपी २२ ते २४ वयोगटातील आहे. पोलिसांना मिळालेल्या वर्णनानुसार त्याची ओळख पटवण्यात आली असून, त्यांच्या तपासासाठी पथके रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. .

पोलिसांचे अपयश

खुनाच्या घटनांमागे तत्कालीन कारणे असल्याचे सांगत अंग वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांचे अपयश या घटनेमुळे समोर आले आहे. खून करणाऱ्या आरोपींकडे चाकू बंदुक व सदृश्य हत्यार होते. टवाळखोर हत्यारे घेऊन फिरतात तसेच भरचौकात नागरिकांच्या साक्षीने तरुणाचा ​जीव घेऊन फरार होतात, हे पोलिसांच्या दृष्टीने आव्हान असल्याची भावना दिवसभर व्यक्त होत होती. गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा वचकच नाहीसा झाल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१८ महिन्यांनंतर ‘सेट’ला मुहूर्त

$
0
0

जितेंद्र तरटे, नाशिक

विद्यार्थ्यांची खऱ्या अर्थाने कसोटी पाहणाऱ्या विद्यापीठ अनुदान आयोगाला तब्बल अठरा महिन्यांनंतर सेट परीक्षेचा मुहूर्त सापडला आहे. सेट परीक्षेला सुरुवात झाल्यापासून परीक्षेच्या आयोजनातील हा पहिलाच प्रदीर्घ विलंब आहे. परीक्षेच्या या नियोजनातील गैरव्यवस्थापनाबद्दल परीक्षार्थींमधूनही तीव्र नाराजी आहे.

यापूर्वी सेट परीक्षा १ डिसेंबर २०१३ रोजी घेण्यात आली होती. यानंतर सहा महिन्याने या परीक्षेचे आयोजन अपेक्षित होते. दरम्यानच्या कालावधीत परीक्षेची अधिसूचनाही निघालेली नाही अन् त्याबाबतचे कारणही उमेदवारांना समजू शकलेले नाही. यामुळे परीक्षार्थी संभ्रमात होते. आता परीक्षेची अधिसूचना निघाल्याने परीक्षार्थींच्या मनावरील दडपडण थोडेसे कमी झाले आहे. युजीसीच्या वतीने पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून घेण्यात येणारी ३१ वी सेट परीक्षा आता ३० ऑगस्ट रोजी होईल. अर्ज भरण्याकरिता २७ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. बँकेमध्ये परीक्षा शुल्क भरण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत आहे. अधिक माहितीसाठी http://setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना संपर्क साधता येईल.

'नेट'चा लांबला निकाल

गेल्या वर्षी सीबीएसईच्या वतीने राष्ट्रस्तरीय अधिव्याख्याता पदासाठी नेट परीक्षा घेण्यात आली होती. गतवर्षी डिसेंबरच्या अखेरीला पार पडलेल्या या परीक्षेचा निकाल तब्बल पाच महिने उलटूनही लागलेला नाही. परिणामी या परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांमधून नाराजी व्यक्त होत आहे. अगोदर युजीसीच्या नियंत्रणात असणारी नेट परीक्षा गतवेळपासून सीबीएसईकडे वर्ग करण्यात आली आहे. मात्र, सीबीएसईनेही या प्रतिष्ठेच्या अन् महत्वाच्या परीक्षा प्रक्रियेस प्राधान्य देण्याऐवजी दहावी अन् बारावीच्या निकालास प्राधान्य दिल्याचा परीणाम नेट च्या विलंबित निकालास कारणीभूत ठरत असल्याची शक्यता परीक्षार्थींमधून व्यक्त होत आहे. यामुळे परीक्षार्थी वैतागले आहेत.

'पेट' देऊ की 'नेट'?

पाच महिन्यांपूर्वी पार पडलेल्या परीक्षेचा निकाल न लावतान नव्या नेट परीक्षेचे नोटीफिकेशन काही दिवसांपूर्वी निघाले. या नियोजनानुसार आता पुढील नेट परीक्षा ही २८ जून रोजी पार पडणार आहे. तर याच दिवशी म्हणजे २८ जून रोजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने पीएच.डी. प्रवेशासाठी घेण्यात येणारी 'पेट' परीक्षा होणार आहे. नेटसाठी जिल्हाभरातून सुमारे ११० हजार परीक्षार्थी बसणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे पेटसाठी अर्ज केला आहे. या दोन्हीही परीक्षा एकाच दिवशी पार पडणार असल्याने विद्यार्थ्यांना दोनपैकी एका परीक्षेवर पाणी सोडावे लागणार आहे. विद्यापीठाने या नियोजनात बदल करावा, अशीही मागणी उमेदवारांमधून होत आहे.

महाराष्ट्राच्याच वाट्याला वेगळा न्याय!

देशातील इतर राज्यांमध्येही राज्यस्तरीय अधिव्याख्याता पदासाठी युजीसीच्या वतीने चाचणी घेण्यात येते. युजीसीच्या धोरणांप्रमाणे नियोजित कालावधीत ही परीक्षा त्या राज्यांमध्ये पार पडते. मात्र, महाराष्ट्रात या परीक्षेच्या आयोजनात वेळोवेळी विलंबच होताना दिसून येत आहे. यंदा झालेल्या परीक्षा आयोजनातील विलंबनाने तर कळसच गाठत नवा विक्रम प्रस्थापित केल्याने शिक्षण क्षेत्रातून सखेद आश्चर्यच व्यक्त केले जात आहे. इतर राज्यांमधील सेट परीक्षा विनविलंब व नियोजित धोरणांप्रमाणे सुरू असतानाच युजीसीच्या वतीने महाराष्ट्राच्याच वाट्याला वेगळा न्याय का, असाही सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

३१ वी सेट परीक्षा :

(स्टेट इलिजिबीलिटी टेस्ट)

- परीक्षा दिनांक : ३०ऑगस्ट

- अर्ज करण्यासाठी मुदत : १ ते २७ जून

- बँकेत शुल्क भरण्याची अंतिम तारीख : ३० जून

- अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : http://setexam.unipune.ac.in

- नेट परीक्षा (नॅशनल इलिजीबिलीटी टेस्ट)

- नेट परीक्षा : दिनांक २८ जून

- मुक्त विद्यापीठ पीएच.डी प्रवेश (पेट परीक्षा) : दि.२८ जून

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अध्यक्षपदाचा फैसला उद्या

$
0
0

एकमत नसल्याने उत्सुकता कायम

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी बुधवारी (दि. ३) निवडणूक होत असून दोन्ही गटांनी अध्यक्षपदावर दावा केला आहे. सद्यस्थितीत हिरे गटाचे पारडे जड दिसत असले तरी ऐनवेळी चमत्काराची शक्यता असल्याने दोन्ही गटाकडून अध्यक्षपदाचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.

अध्यक्ष, उपाध्यक्षपद एक एक वर्षाचेच ठेवण्याचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांसह माजी मंत्री छगन भुजबळ यांनीही या निवडणुकीत उडी घेतल्याने चुरस वाढली असून अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार अपूर्व हिरे आणि माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्यापैकी एकाही पॅनलला बहुमत मिळाले नाही. तर काही अपक्ष पाच सदस्यांनी दबावगट तयार केल्याने अध्यक्षपदाची निवड चुरशीची बनली आहे. सद्यस्थितीत हिरे गटाचे पारडे जड असून या गटाकडे १३ सदस्य असल्याचा दावा हिरेंकडून करण्यात येत आहे. या सर्वांचे सध्या भारत भ्रमण सुरू असून मंगळवारी सायंकाळपर्यंत ते नाशिकमध्ये दाखल होणार आहे. हिरे गटाकडून अध्यक्षपदासाठी अद्वय हिरे आणि उपाध्यक्षपदासाठी सुहास कांदे यांचे नाव रेटले जात आहे. मात्र, काही सदस्यांचा याला विरोध असला तरी तो ऐनवेळी मावळण्याची शक्यता आहे. हिरेंना जास्त विरोध झाला तर ऐनवेळी माजी आमदार शिरीष कोतवाल यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे. हिरे गटाने अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद एक एक वर्षासाठी वाटून घेण्याचा फॉर्म्युला तयार केला आहे. तर एका सदस्याला राज्य बँकेवर प्रतिनिधी पाठवून ऐनवेळी अकराचा कोटा पूर्ण करण्यासाठी हिरे गटाकडून रणनीती आखली जात आहे.

माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या गटात सहा सदस्य असले तरी ऐनवेळी चमत्कार करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. हिरे गटातील काही सदस्यांच्या ते संपर्कात असून अध्यक्षपदावर तडजोडीची तयारी त्यांनी ठेवली आहे. तर काही जुन्या मिंत्राच्या माध्यमातून फिल्डींग लावली जात आहे. यासाठी खासदारासह काही आमदारांनीही प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे अध्यक्ष नेमका कोण होणार हे सांगणे सध्या अवघड झाले आहे. तर शिवाजी चुंभळे आणि आमदार जे. पी. गावीत अद्याप तटस्थ असून त्यांच्याकडून ऐनवेळी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनाही आपआपल्या परिने फिल्डींग लावायला सुरुवात केली आहे. त्यामुळे चुरस वाढली आहे.

गुळवे, पवार यांचे तळ्यात मळ्यात

इगतपुरीचे संदीप गुळवे आणि कळ‍वणचे धनंजय पवार यांनी अध्यक्षपदासाठी फिल्डींग लावली होती. यासाठी त्यांनी प्रयत्न केले. हिरे गटाकडून प्रथम दोघांनाही अध्यक्षपदाचे आश्वासन दिले गेले. मात्र, आता उपाध्यक्षपदही मिळत नसल्याची शंका असल्याने दोघांचेही सध्या तळ्यात मळ्यात सुरू आहे. त्यामुळे हे दोघेही सदस्य ऐनवेळी काहीही निर्णय घेण्याची शक्यता आहे.

पेटी, खोका याचीच चर्चा

निवडणुकीत कोणालाही बहुमत नसल्याने बहुमतासाठी जोडतोडीचे प्रयत्न केले जात आहे. संचालकपदासाठी लाखोची उधळण करणाऱ्या काही सदस्यांनी भरपाई काढण्यासाठी दोन्ही गटाकडे चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे सध्या सहकाराशी संबंधित लोकांच्या तोंडी पेटी आणि खोकाचीच चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images