श्री संप्रदाय, ब्रह्मसंप्रदाय, संकारी संप्रदाय व रुद्र संप्रदाय हे चार संप्रदाय मिळून या आखाड्याची स्थापना झाली. रामानंदी, नि:मार्ग, विष्णुस्वामी, गौदिया असे चार संप्रदाय आहेत. याला रामानंद, नि:मार्ग, बल्वाचार, माध्यगोदेश्वर असेही म्हटले जाते. रामानंदी, नि:मार्ग, विष्णुस्वामी हे तीन संप्रदाय हे कृष्णाचे, तर चौथा गौदिया रामाचा उपासक आहे. या चारही संप्रदायांचा ध्वज एकच आहे. तो भगव्या रंगाचा असून, त्यावर हनुमानाचे चित्र असते. या संप्रदायांपैकी श्रीसंप्रदाय रामाची उपासना करतो, इतर तीन संप्रदाय कृष्ण उपासक आहेत. नाशिकला गंगाघाटावरील व्यंकटेश बालाजी मंदिर येथे हा आखाडा असून, याचे महंत कृष्णचरणदासजी हे आहेत. सर्व आखाड्यांचे साधू या आखाड्यात वास्तव्यास येतात. त्यामुळे चतु:संप्रदाय आखाडा सर्वसमावेशक अशी भूमिका बजावतो. चतु:संप्रदायाचे सुमारे ५० हजार साधू अनुयायी आहेत. या सर्वांच्या रक्षणाची जबाबदारी या आखाड्यावर किंवा तेथील स्थानधारी महंतावर असते. सिंहस्थात रामकुंडावर स्नान करून आखाड्याचे साधू चतु:संप्रदाय आखाड्यात पूजाअर्चा करून निवासासाठी तपोवनात जातात. या आखाड्यात एकूण २१०खालसा आहेत. (१९९१ च्या आकडेवारीनुसार) एका खालशात २०० ते २५० साधू असतात. त्यांचा एक प्रमुख असतो. आखाड्यात खालसे जितके जास्त तितके त्यांचे प्राबल्य जास्त असे मानले जाते. म्हणून चतु:संप्रदाय आखाडा सर्वसमावेशकता आणि सामंजस्याची भूमिका पारपाडतात.
निर्मोही आखाडा
आपल्या देहात पुत्रप्रेम, धनलोभ, गृहसंसाराचा लोभ अन् मोह असतो. तो ज्याने जातो तो म्हणजे निर्मोही आखाडा होय. या आखाड्याचे निशान ध्वज पविळ्या रंगाचा आहे. या आखाड्याचे स्नान नाशिकमध्ये नाही. या आखाड्याचे अनेक खालसे आहेत. यात श्री रामानंदीय निर्मोही, श्री रामानंदिय झाडिया निर्मोही, श्री रामानंदीय संतोषी निर्मोही, श्री राधावल्लभी निर्मोही, श्री हरिव्यासी संतोषी, श्री हरी व्यासी महानिर्वाणी, दादू पंथी यांचा समावेश होतो.
सिंहस्थात व इतर वेळी देशभरातून येणाऱ्या साधूमहंतांना निवारा, भोजन व इतर सोईसुविधा देण्यासाठी चतु:संप्रदाय आखाडा जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतो - महंत कृष्णचरणदासजी, चतु:संप्रदाय आखाडा
(संकलन : रमेश पडवळ)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट