Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

धर्म संरक्षणासाठी लढणारा आखाडा

$
0
0

वानंविषयरूपंयच्छुष्कं फलमुदाह्रतम् !

यस्मातु निर्गतं वानं सा निर्वाणस्समीरित: !!

म्हणजे विषय रूप हे सुखलेले फळ असून, त्याला वान म्हटले गेले आहे. वान म्हणजे सुकलेले फळ त्याच्यातून निघून गेले तो निर्वाण अथवा निर्वाणी आखाडा. ज्यातून सर्व अहंमभाव निघून जातात असा आखाडा असेही याला म्हटले जाते. हा आखाडा आठव्या शतकात निर्माण झाल्याचे म्हटले जाते. निर्वाणी आखाड्याची नाशिकमध्ये बैठक नाही. मात्र निर्वाण अंतर्गत येणारा खाकी आखाड्याची नाशिक येथील नागचौकात बैठक आहे. त्यामुळे खाकी निर्वाणी आखाडा असेही खाकी आखाड्याला म्हटले जाते. खाकीचा उच्चार खं- आ- कं असा होतो. खं म्हणजे ब्रह्म, आ म्हणजे स्मरण व कं म्हणजे सुख म्हणून ब्रह्माच्या स्मरणात सुखी असलेला आखाडा म्हणजे खाकी आखाडा असेही म्हटले जाते. तर खाकी म्हणजे लाठी. अंतिम क्षणापर्यंत झुंजणारे साधू अशी खाकी आखाड्याची ख्याती आहे. या आखाड्याची निर्मिती देशाचे व धर्माच्या संरक्षणासाठी झाल्याचे म्हटले जाते. नाशिक येथील खाकी आखाड्याचे कामकाज महंत नरसिंहदास गुरूपूरणदास खाकी व महंत सर्वेश्वरदास गुरूनरसिंहदास खाकी हे पाहतात. खाकी आखाडा रामाचा उपासक आहे. तर हनुमान हे त्यांचे ध्वजनिशान आहे. सिंहस्थ शाहीस्नानाचा पहिला मान खाकी आखाड्याला मिळाला आहे.

ताम्रपट सांगतोय इतिहास

अमृताचे थेंब नक्की रामकुंडात पडले की, त्र्यंबकेश्वरला हा वाद बराच जुना आहेत. तर अनेकजण सिंहस्थ कुंभमेळा यापूर्वी कधीच या ठिकाणांवर भरत नसल्याचे सांगतात. सिंहस्थ चर्कतिर्थावर भरत असल्याचे उल्लेख काही ताम्रपटांमध्ये मिळतात. तर खाकी आखाड्याकडे असलेल्या ताम्रपटात चर्कतिर्थावर आखाड्यांमध्ये युद्ध झाल्याचा उल्लेख नाही. त्यात फक्त शैव व वैष्णव पंथीयांच्या पेशव्यांनी केलेल्या विभागणीचा उल्लेख आहे. सिंहस्थ नेमका पेशव्यांच्या आधी नेमका कुठे भरत होता. याचा स्पष्ट उल्लेख नसला तरी यावरील तारखांवरून संशोधकांना बरेच काही अभ्यासता येईल, असे खाकी आखाड्यातील साधू सांगतात. खाकी आखाड्याची युद्धात मोठी हानी झाल्याचा उल्लेखही या ताम्रपटावर आहे.

सिंहस्थासाठी देशभरातून येणाऱ्या साधू महंताची चांगली व्यवस्था करण्यासाठी खाकी आखाडा प्रयत्न करीत आहे. या आखाड्याने आतापर्यंत समाजात धार्मिक भावना जोपासणे व धर्म संरक्षणासाठी अनेक आहुत्या दिल्या आहेत. हा आखाडा यंदाच्या सिंहस्थात ही महत्त्वाची भूम‌किा पार पाडेल. - महंत नरसिंहदास गुरूपूरणदास खाकी, महंत सर्वेश्वरदास गुरूनरसिंहदास खाकी

(संकलन : रमेश पडवळ)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिंहस्थासाठी ऑगस्टपासून पोलिसांची ‘वर्दळ’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‌सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बंदोबस्तासाठी राज्यभरातील किमान १० हजारापेक्षा अधिक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या बॅरेक्सचे काम अंतिम टप्प्यात आले असून, १ ऑगस्टपासून नियुक्त कर्मचारी शहरात दाखल होण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

सिंहस्थ कालावधीत कायदा व सुव्यवस्था, गर्दीवरील नियंत्रणासाठी बाहेरून येणाऱ्या पोलिसांच्या निवासासाठीच्या बॅरेक्सच्या कामास मार्च महिन्याच्या दरम्यान सुरुवात करण्यात आली होती. नाशिक शहरात सुमारे २८ नवीन बॅरेक्स बनविल्या जाणार असून, काही पोलिस स्टेशन हद्दीतील मंगल कार्यालये व लॉन्समध्येही व्यवस्था केली जाणार आहे. एवढेच नव्हे तर यापूर्वीच्या दहा बॅरेक्स व दोन मोठ्या हॉलचा वापर देखील केला जाणार आहे. एका तपानंतर येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे १४ जुलै २0१५ रोजी रामकुंडावर ध्वजारोहण होणार असून, १९ ऑगस्टला साधुग्राममध्ये ध्वजारोहण होणार आहे. तर २९ ऑगस्ट, १३ सप्टेंबर, १८ सप्टेंबर २0१५ रोजी प्रथम, द्वितीय व तृतीय शाहीस्नान होणार आहे. या पुण्यपर्वाचा लाभ घेण्यासाठी लाखो भाविक नाशिक शहरात येणार आहेत. याकाळात शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच येणाऱ्या भाविकांच्या गर्दीवरील नियंत्रणासाठी मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

सिंहस्थ पर्वणीतील शाहीस्नानातील कालावधीतील बंदोबस्तासाठी शहरातील पोलिस यंत्रणेच्या मदतीसाठी जिल्ह्याबाहेरील पोलिस कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात येणार आहे. त्यामध्ये दहा हजार पोलिस कर्मचारी तसेच चार हजार गृहरक्षक दलाचे जवान असे सुमारे १४ ते १५ हजारांवर कर्मचारी येणार आहेत. पोलिस बंदोबस्ताचा आकडा अद्याप नि​श्च‌ति नसून, तो कमी जास्त होऊ शकतो. जुलै महिन्यापर्यंत ते काम पूर्ण होऊन साधारणतः १ ऑगस्टपासूनच कर्मचारी येण्यास सुरूवात होईल. तोपर्यंत बॅरेक्सचे काम पूर्णत्वास जाईल.

कर्मचाऱ्यांना योग्य त्या सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत असून, त्यावर पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांचे लक्ष आहे. बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना तसेच अधिकाऱ्यांना लागलीच फिल्डवरच प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहीस्नानाची अनोखी परंपरा

$
0
0

रमेश पडवळ, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान साधुंच्या आखाड्यांकडून पर्व आणि तिथीविशेषला केल्या जाणाऱ्या स्नानाला शाहीस्नान म्हटले जाते. शाही हा शब्द ऊर्दू आहे. हा शब्द नेमका कोठून आला याबाबत अधिक माहिती मिळत नाही. मात्र, मुस्लिम सत्तेतही कुंभमेळा आपले महत्त्व टिकवून होता. याकाळात कुंभमेळ्याला आलेल्या भव्यतेतून हा शब्द आला असावा असे म्हणता येईल. साधूसंत राजेशाही पद्धतीने घोडे, उंट, हत्ती व सजविलेल्या रथातून स्नानासाठी कुंभमेळ्यात येत असल्याने त्याला शाहीस्नान म्हटले जाऊ लागले असावे. शाहीस्नान हा सोहळा अनोखाच नाही तर दुर्मीळही असतो. कारण हा क्षण नाशिककरांना बारावर्षातून एकदाच अनुभवता येतो. म्हणून या सोहळ्याची परंपरा अनुभवनं हा एक उत्सव ठरतो. याकाळात गोदापात्र अन् अख्ख शहर साधूंनी गजबजलेलं असतं. एवढ्या मोठ्या गर्दीला कोणीही सूचना देणारे अथवा निमंत्रण देणारं नसतं तरीही प्रत्येकजण आपले काम नियोजनानुसार करीत असतो. शहरही साधूसंतांच्या स्वागताला अन् हा सोहळा अनुभवायला या गर्दीत सहभागी झालेला असतो. शाहीस्नानाचा क्षण अनुभवताना शाहीमार्गावर जयघोष, कसरती, शस्त्रअस्त्राच्या कवायती अन् अनोख्या मिरवणुका पहायला मिळतात. पण हा सोहळा नेमका कसा पार पडतो... कोणता आखाडा पहिले स्नान करतो हे पाहणेही मजेशीर असते.

नाशिकमधील आखाडे हे वैष्णवपंथीय आहेत. यात दिंगबर आखाडा, निर्वाणी आखाडा, निर्मोही आखाड्यांचा समावेश असतो. या आखाड्यांचे १८ उपआखाडे आहेत व या सर्वांचे ६५० खालसे आहेत. हे सर्व आखाडे चार संप्रदायाचे आहेत. या चार संप्रदायांचा मिळून एक श्री चतु: संप्रदाय आखाडाही आहे. प्रत्येक आखाड्याचे सारथ्य आचार्य व महंत करत असतात. तर यासर्वांचे सारथ्य आखाडा परिषदेचे अध्यक्ष करतात. १४ जुलै २०१५ ला रामकुंडावर सकाळी ६.१६ मिनिटांनी ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर १९ ऑगस्ट २०१५ ला साधुग्राम येथे ध्वजारोहण होईल. त्यानंतर प्रत्येकाला उत्सुकता असेल ती श्रावण कृष्ण पंचमीला म्हणजेच २९ ऑगस्ट २०१५ ला होणाऱ्या प्रथम शाहीस्नानची. त्यानंतर श्रावण अमावस्येला म्हणजे १३ सप्टेंबर २०१५ रोजी द्वितीय

शाहीस्नान होईल व भाद्रपद शुक्ल पंचमीला म्हणजे १८ सप्टेंबर २0१५ ला तृतीय शाहीस्नान होईल. अन् श्रावण शुद्ध अष्टमी ११ ऑगस्ट २०१६ ला ध्वजावतरण होऊन सिंहस्थ पर्व संपेल. यादरम्यान होणाऱ्या तिन्ही शाहीस्नानाचे क्रम परंपरेनुसार ठरलेले आहेत. पहिल्या शाहीस्नानाला निर्वाणी आखाडा व त्याचे उपआखाडे व खालसे पहिल्यांदा स्नान करतात. त्यांच्यामागे दिंगबर आखाडे व त्यांचे खालसे असतात. तर सर्वात शेवटी निर्मोही आखाडा व त्यांचे खालसे असतात. खाकी आखाडा निर्वाणी अंतर्गत येत असल्याने त्यांना पहिल्या शाहीस्नानाला पहिला मान दिला जातो. यावेळी प्रत्येक आखाडा आपल्या इष्टदेवतेला स्नान व पूजाअर्चा करून झाली की आपल्या साधूंना शाहीस्नानासाठी पाठवितो. प्रत्येक आखाडा स्नान झाला की मागील आखाड्याला स्नानाची संधी देतो.

दुसऱ्या शाहीस्नानात पहिल्या शाहीस्नानादरम्यान सर्वात शेवटी असलेल्या निर्मोही आखाडा पहिले स्नान करतो. त्यानंतर दिंगबर व त्यानंतर सर्वात शेवट निर्वाणी आखाडा स्नान करतो. दुसऱ्या शाहीस्नानात निर्वाणी शेवटी स्नान करतो तर निर्मोही पहिल्यांदा. तर तिसऱ्या शाही स्नानात पुन्हा निर्वाणी पहिल्यांदा दिंगबर कायम मध्यभागी व निर्मोही पुन्हा सर्वात शेवटी अशा पद्धतीने सिंहस्थाच्या शाही मिरवणुकीत सहभागी होतात व स्नान करतात. पहिल्या व दुसऱ्या शाहीस्नानाच्या वेळी आखाडे शाहीस्नान केल्यानंतर लगेच परतीच्या मार्गावर निघतात. मात्र तिसऱ्या शाहीस्नानाच्यावेळी आखाड्यांचे आचार्य व महंत मात्र तेथेच थांबतात. म्हणजेच निर्वाणी आखाड्याचे आचार्य महंत शाहीस्नानाला जातात व तेथेच थांबतात. रामकुंडावर गर्दी होऊ नये म्हणून आखाड्यातील साधू परतीच्या मार्गावर निघतात. असेच त्यानंतर शाही स्नानाला आलेला दिंगबर व निर्मोही आखाडा करतो. असे म्हटले जाते की, तिन्ही आखाडे प्रथम तिसऱ्या आखाड्यात एकत्र येतात. त्यांचा संगम रामकुंडावर होतो. तिन्ही आखाड्यांचे महंत एकमेकांना भेटल्यानंतर पहिल्यांदा शेवटी आलेल्या निर्मोहीचे महंत परतीच्या मार्गावर निघतात. त्यानंतर दिंगबर व त्यानंतर निर्वाणीचे महंत रामकुंडावरून परतीच्या मार्गाच्या मिरवणुकीत सहभागी होतात. ही परंपरा गेली अडीचशे वर्षांपासून सुरू आहे. त्यापूर्वी शाहीस्नान ही परंपरा नव्हती. स्नान व्हायचे मात्र त्याला शाहीस्नान आखाड्यांच्या वर्चस्व अन् महत्त्वावरून म्हटले जाऊ लागले. आपल्या आखाड्याचा दबदबा दाखविण्यासाठी आखाडे आपली श्रीमंती मिरवणुकांमधून दाखवू लागले व मानाचा संघर्षातून ही परंपरा निर्माण झाल्याचेही म्हटले जाते.

हा सोहळा फक्त शाहीस्नानापुरता नसतो तर या तिन्ही आखाड्यांचे महंत व साधू एकत्रित येऊन विचारविनिमयही करतात. भविष्यातील आव्हाने, धर्मशास्त्रावर त्यांची चर्चा होते. सर्व महंत एकत्रि‌त भोजनाचा आस्वादही घेतात. अनेक वादविवादांवर या काळात निर्णय होतात. जे प्रश्न सुटत नाहीत त्यावर धर्मपीठावर निर्णय घेण्याबाबतही चर्चा होते. अनेकदा आखाडा परिषदेच्या सदस्य व इतर महंतांच्या नेमणुकांबाबतही चर्चा होते. सिंहस्थाचे तेरा महिने त्यांच्यातील संवाद एकमेकांना समृद्ध करतो. त्यांच्या वैचारिक संगमात भाविकही पुण्य घेतात, असे म्हटले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योगाभ्यासाची ‘कीर्ती’ पोहोचवणारा ‘कुमार’

$
0
0

>> फणिंद्र मंडलिक

नाशिकमध्ये योगाचा पाया रोवण्यात कीर्तीकुमार औरंगाबादकर यांचा मोलाचा वाटा आहे. वयाच्या ८० व्या वर्षीही चैतन्यदायी व्यक्तिमत्व म्हणून नाशिककरांना ते परिचित आहेत. आजही तितक्याच तळमळीने योगाच्या प्रचार व प्रसारासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे. त्यांचे कार्य तरुणांनाही लाजवणारे आहे.

कीर्तीकुमार औरंगाबादकर यांना नाशिककर कुमार काका म्हणून देखील ओळखतात. कुमार काका गेल्या पन्नास वर्षांपासून नाशिकमधील युवकांना योगाचे धडे देत आहेत. चाळीस वर्षांपासून नाशिकच्या पोलिस अकादमीत प्रशिक्षण घेत असलेल्या अधिकाऱ्यांना योगाचे शिक्षण देत आहेत.

कुमार काकांना खरी आवड होती ती मल्लखांबची. लहानपणापासून ते मल्लखांब करीत असत. शरीर सुदृढ व्हावे म्हणून १९५४ साली कुमार काकांनी रोकडोबा व्यायामशाळेत व्यायामाला सुरुवात केली. सन १९६० मध्ये गुलालवाडी व्यायामशाळेतील डबलबार, सिंगलबार, जिम्नॅस्टीक, मल्लखांब या क्रीडाप्रकारांनी त्यांना आकर्षित केले. एका दमात ८०० बैठका व सव्वापाचशे जोर हा त्यांचा नित्यक्रम होता. पुढे मात्र दुखापती वाढल्याने डॉक्टरांनी त्यांना बैठा व्यायाम करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे १९६४ पासून ते योगाभ्यासाकडे वळाले. गुलालवाडी व्यायामशाळेतील योगगुरू मणिभाईं यांच्याकडून त्यांनी योगाभ्यासाला सुरुवात केली. बलोपासनेची लहानपणापासून आवड असल्याने अल्पावधीत ते पारंगत झाले. सन १९७४ मध्ये योगाचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी त्यांनी मणिभाईंच्या अध्यक्षतेखाली योग मल्लखांब असोसिएशनची स्थापना केली. या संस्थेच्या सचिवपदाची जबाबदारी अर्थात कुमारकाकांकडे देण्यात आली. योगाच्या प्राचार व प्रसारासाठी डॉ. वि. म. गोगटे यांच्यासह कुमारकाका अनेक ठिकाणी दौरे करू लागले. डॉ. गोगटे यांच्याकडे वक्तृत्व कला असल्याने ते व्याख्याने देत व कुमार काका योगाचे प्रात्यक्षिके करून दाखवत. योगाच्या प्रसारासाठी कुमार काकांनी जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांचा दौरा केला. एचएएलमध्ये येणारे रशियन अधिकारी, भोसला मिलिटरी स्कूलचे विद्यार्थी, अर्टिलरी सेंटर येथील अधिकाऱ्यांच्या अनेक बॅचेसला त्यांनी विनामूल्य प्रशिक्षित केले. प्राचीन ग्रंथातील माहितीच्या आधारे कोणत्या योगक्रियेने कोणता आजार बरा होतो याचा त्यांनी सखोल आभ्यास केला व त्यातून अनेकांना रोगमुक्त केले. योगाभ्यास करायला वयाचे बंधन नाही. फक्त तज्ज्ञांचा सल्ला घेणे अपेक्षित असल्याचे ते म्हणतात. योगाचा प्रसार करीत असताना महाराष्ट्र सरकारने त्यांना १९७४ मध्ये महाराष्ट्र पोलिस अकादमीत पोलिस अधिकाऱ्यांना योग शिकवण्याची जबाबदारी दिली. वीस वर्षांपर्यंत कोणताही मोबदला न घेता त्यांनी अव्याहतपणे अकादमीतील अधिकाऱ्यांना योगाचे मोफत धडे दिले. काही दिवसांनी अकादमीच्या अधिकाऱ्यांना ही बाब समजल्यावर त्यांना तुटपूंजे मानधन सुरू केले. तेव्हापासून आजतागायत पोलिसांच्या डीटीएस शाखेच्या १४० बॅचमधील अधिकाऱ्यांना त्यांनी प्रशिक्षित केले आहे. दीक्षांत समारंभ झाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक कुमार काकांच्या पाया पडतात तेव्हा कामाचे सार्थक झाले असे वाटते, असे ते आवर्जून सांगतात. कुमारकाका एकदा आपल्या कुटुंबीयांसोबत बाहेरगावी गेले असताना रस्त्यात एका ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. तेवढ्यात एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने कुमार काकांना बघितले आणि त्यांना गाडीतून उतरण्यास सांगितले. अधिकाऱ्याने क्षणाचाही विलंब न लावता तडक कुमार काकांचे पाय धरले. आम्हाला तुमच्या सेवेची संधी कधी मिळणार म्हणून तो अधिकारी सोडायलाच तयार नव्हता. असे अनेक प्रसंग कुमारकाकांच्या आयुष्यात आले. ते म्हणतात मी धन नाही कमावले मात्र माणसे जोडली. महाराष्ट्रात कुठेही जा माझ्या ओळखीचा माणूस सापडणार नाही असे होणार नाही.

नाशिकमधील अनेकांना त्यांनी योगाभ्यास करण्यासाठी प्रवृत्त केले असून, त्यांच्या प्रेरणेने शिष्यांनी अनेक ठिकाणी योगाचे वर्ग सुरू केले आहेत. नाशिक हे भारतातली योगाचे प्रमुख केंद्र व्हावे अशी त्यांची इच्छा आहे. कीर्तीकुमार औरंगाबादकर योगाभ्यासाने आजही ते कुमार असल्याचा वेळोवेळी प्रत्यय देतात हेच खरे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्यांना’ हवी आहे साथ

$
0
0

चित्रपट इंडस्ट्रिसाठी नाशिक शहरातून अनेकजण प्रयत्न करताना दिसतात. त्यातील सर्वच यशस्वी होतात असे नाही. स्ट्रगल करावाच लागतो. मात्र, हा स्ट्रगल करीत असताना जे शिखरावर पोहोचलेत त्यांनी काय करावे? ज्यांच्या नावाचे झेंडे रोवले गेले आहे त्यांनी अशांना हात दिला पाहिजे. त्याची क्षमता जोपासा, त्यासाठी ना अजिबात नाही परंतु, जर ते प्रामाणिक असतील त्यांना साथ देण्याची गरज आहे.

एखाद्या क्षेत्रात आपण यशस्वी झाल्यास, त्याच मार्गावरून येणाऱ्या सहप्रवाशास मार्गदर्शन करण्याची नितांत आवश्यकता असते. त्यामुळे ग्रुपिझम जपला जातो, असा आरोप होत असल्यास त्याला भीक घालायला नको. आपल्या माणसाचे नाव सूचविण्यास डगमगले की तेथे इतरांचा शिरकाव यशस्वी होतो असे म्हणतात. नाशिकचे जे कलावंत मुंबईला गेले व यशस्वी झाले त्यांनी आता मागच्यास हात देण्याची गरज आहे.

नाशिककरांना आपला अॅक्टिंगबाबतचा अनुभव सांगताना नुकतीच एक तरूण अभिनेत्री म्हणाली होती की, सेटवर मी अभिमानाने सांगते की मी नाशिककर आहे. तसे सांगणे मला कमीपणाचे वाटत नाही. याउलट माझे मत असे आहे की, नाशिकहून जितकेही कलाकार मुंबईला जातात, त्यांनी एखादा ग्रुप करून राहिले पाहिजे. त्याचे कारण असे की आपल्या शहरातील कलाकारांना अनेकदा दुय्यम वागणूक मिळते. त्या अभिनेत्रीने सांगितलेल्या अनुभवाशी अपवाद वगळता अनेकजण सहमत असतील. प्रत्येक क्षेत्रात ग्रुपिझम करण्याची गरज का निर्माण होते हेच त्या अभिनेत्रीने थोडक्यात सांगितले होते.

हा सर्व उहापोह करण्याचे कारण म्हणजे आर्टिस्ट कोणताही असो, त्याची कला पेश करण्याची अट एकच असते की त्याच्यासोबत त्याचाच जथा असतो. गाण्यासाठी मुकूल शिवपूत्र असले तर त्यांना तानपुऱ्यावर शशिकांत मुजूमदारच हवे असतीत, का तर त्यामागे बैठक जुळल्याचे स्पष्ट असते. आताही अनेक गायक, वादक, कलाकार असे आहेत की त्यांना एखाद्या शहरातून कार्यक्रमाचे आमंत्रण आले की त्यांचाच जथा त्यांना लागतो. त्यामागे भावना असते, त्यांचे आपलेपण जपण्याची. मूळ मुद्दा असा आहे की, हा आपलेपणा वाटतो का? आपल्या गावातील एखादा स्ट्रगलर आपल्याकडे येतोय म्हटल्यावर त्याला मार्गाला लावण्यापेक्षा आपण रस्त्याला तर नाही ना लावत आहोत याचा विचार बडी कलाकार मंडळी करतात का? नाशिकमधून तर अशी कितीतरी मंडळी बडी झाली आहेत, परंतु त्यांना अद्याप शहराचा म्हणून असा एक ग्रुप निर्माण करता आलेला नाही. याहून मोठी शोकांतिका कोणती?अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे हौशी कलावंतांसाठी महाकवी कालिदास कलामंदिर उपलब्ध करून देण्याची घोषणा वर्षभरापूवी करण्यात आली. त्याची अनामत रक्कम नाट्य परिषदेने कालिदास व्यवस्थापनाकडे सुपूर्दही केली. पहिल्या काही महिन्यात एक सत्र शनिवार-रविवार वगळता नाट्यकर्मींसाठी उपलब्ध करून दिले जात होते. मात्र, त्याचा लाभ घेण्यासाठी फारसे कुणी पुढे येत नसल्याचे आता चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृत्यूनंतरही डॉक्टरांनी जपला सेवाभाव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

आठ दिवसांपूर्वी मुंबई-आग्रा महामार्गावर कोकणगावजवळ झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या डॉ. चंद्रेशखर गांगुर्डे यांनी कीडनी व नेत्रदान तर डॉ. सूरज पाटील यांनी नेत्रदान करून मृत्यूनंतरही आपल्यातला सेवाभाव जपत क्रूरतने अंध झालेल्या नियतीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले.

भीषण अपघातात कुटुंब प्रमुख गेल्याचे आभाळाएवढे दुःख असतानाही गांगुर्डे व पाटील परिवाराने अवयव दानाचा निर्णय घेत सामाजिक बांधिलकी जपली. नेत्रदानामुळे डॉ. चंद्रशेखर गांगुर्डे व सूरज पाटील मृत्यूनंतरही डोळेरुपी या जगात पहावयास मिळणार आहेत. नाशिक येथील सुशील आय बँकेतील डॉ. उदय साकुरीकर यांनी गेल्या सोमवारीच नेत्रदानाची यशस्वी शस्त्रक्रिया केली आणि याचे यशस्वी प्रत्यारोपणही झाल्याचे वृत्त आहे. भीषण अपघातात परिवारातील प्रमुख व्यक्तीच निघून गेल्याने डॉक्टरांच्या परिवारावर दुःखाचे आभाळ कोसळले होते. मात्र, अशाही परिस्थितीत धैर्याने अवयव दानास संमती देणाऱ्या, नेत्रदानातून कुणाला तरी दृष्टी मिळणार तसेच कीडनी दानातून एखाद्यास जीवन मिळणार या सकारात्मक विचारांनी आणि अथांग मनाने निर्णय घेणाऱ्या गांगुर्डे व पाटील परिवारास अवघ्या पिंपळगाव परिसराने सलाम केला आहे.

डॉ. चंद्रशेखर गांगर्डे व डॉ. सूरज पाटील यांचे डोळे भीषण अपघातानंतरही चांगले होते. त्यांच्या परिवाराने संमती दिल्यानंतर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. डोळे काढणे तांत्रिकदृष्ट्या सोपे असते. त्यासाठी कमी वेळ लागतो. मात्र, प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया अवघड असते. मृत्यूनंतर सहा तासांच्या आत डोळे काढावे लागतात. पंधरा दिवसाच्या आत प्रत्यारोपण करावे लागते.

- सुशील आय इन्स्टिटयूट, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्या जेरबंद

$
0
0

रोकडोबावाडी परिसरातील तिसरी घटना

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

देवळाली गावाजवळील रोकडोबावाडी नजिकच्या डोबी मळ्यात शनिवारी मध्यरात्री बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. या भागात बिबट्याला पकडण्याची ही तिसरी वेळ आहे. रोकडोबावाडी परिसराला लागूनच लष्कराचे मोठे क्षेत्र आहे. तेथे विपुल प्रमाणात वन्य प्राणी आढळतात. बिबट्याला येथे भरपूर भक्ष उपलब्ध आहे. रोकडोबावाडीत पंधरा एकर क्षेत्रात ऊस असल्याने बिबट्याला लपण्यास चांगली जागा आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याच्या शोधार्थ बिबट्या परिसरात येत असावा, असा ग्रामस्थांचा अंदाज आहे. यापूर्वी बि

वर्षभरात या भागात तिसऱ्यांदा बिबट्या जेरबंद करण्यात आला आहे. बिबट्याचे दर्शन नित्यनियमाने होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली होती. विभागाने आठ दिवसापूर्वी बुवा मळ्यात पिंजरा लावला होता. शनिवारी रात्री बिबट्या पिंजऱ्यात अडकला. पहाटे बिबट्याच्या डरकाळ्यांनी परिसर हादरून गेल्यावर ग्रामस्थ जमा झाले. त्यांनी वनविभागाला कळवले. सकाळी सातच्या सुमारास वन परिक्षेत्र अधिकारी पी. बी. खैरनार, उत्तम पाटील, वनरक्षक एस. पी. थोरात व सहकारी दाखल झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याला आठ वाजता गंगापूर रोप वाटिका येथे नेण्यात आले. वरिष्ठांच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती वन परिमंडळ अधिकारी एम. एस. गोसावी यांनी दिली. गेल्या आठवड्यातच भगूर येथे रेल्वेच्या धडकेने एका बिबट्याचा मृत्यू झाला होता. उन्हामुळे पाण्यासाठी तसेच भक्ष्यासाठी बिबटे मानवी वस्त्यांकडे धाव घेऊ लगाल्याचे दिसून येत आहे.

रोकडोबावाडी परिसरात वालदेवी नदी परिसर आणि शेती असल्याने बिबट्याचा मुक्काम येथे असतो. वरचेवर त्याचे दर्शन होत असते. परिसरातील मंदिरात पहाटे किंवा रात्री जाण्यास नागरिक घाबरतात. बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा.

- सुनील बुवा, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीआयआयचे व्हीजन इन्फ्रास्ट्रक्चर अन् मार्केटिंग

$
0
0

पॉझिटिव्ह मीटरिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व शहरातील प्रथितयश उद्योजक सुधीर मुतालिक यांची कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) च्या विभागीय अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली. या निमित्ताने उद्योग जगताकडील आव्हाने पेलताना त्यांच्या व्हीजनवर टाकलेला प्रकाशझोत.

उद्योगांची कोंडी फोडण्यासाठी सीआयआयचे प्राधान्यक्रम कशाला असेल?

- उत्तर महाराष्ट्राचा विचार करता इन्फ्रास्ट्रक्चर आणि मार्केटींग या दोन मुद्द्यांवर आम्ही विशेष भर देण्यासाठी नियोजन करीत आहोत. उद्योगांना अलिकडे खुल्या होत असलेल्या जागतिक संधीच्या एकीकडे गप्पा रंगत असताना दुसरीकडे रस्ता, वीज अन् पाण्याच्या समस्येकडे पाठ फिरवून चालणार नाही. उत्पादनापर्यंत येथील उद्योजक पोहचतात. मात्र गुणवत्ता असूनही मार्केटींगच्या तंत्राअभावी ठेचकाळतात. मार्केटींग समिटसारखे उपक्रम राबवून हे ही चित्र बदलवू.

अनेक वर्षांपासून अद्यापही मोठे प्रकल्प का रेंगाळले आहेत?

निर्णयक्षमते अभावी शासनस्तरावर रेंगाळलेल्या प्रकल्पांची संख्या मोठी आहे. या प्रकल्पांना दिली जाणारी गती हा बाजार पेठेतील मंदीच्या वातावरणावर उतारा ठरू शकतो. रस्ते बांधणी, वीज प्रकल्प यासारख्या रखडलेल्या प्रकल्पांना गती देता आल्यास लघु उद्योजकांसह उद्योगांवर अवलंबून मजुरांच्या कुटुंबानाही हातभार मिळेल. मंदीत रूतू पाहणारे आर्थिक चक्र धावू लागेल.

वर्षापासून नाशिकही काही प्रमाणात मंदीचा सामना करतेय का?

उद्योगासारख्या क्षेत्रात मंदी अन् फायद्यासारखे चढ उतार सुरू असतात. काही प्रमाणात सद्यस्थितीत आव्हाने वाढली असली तरीही स्थानिक उद्योजकांनी मनोबल हरवता कामा नये. लघु उद्योजकांचे मनोबल सुदृढ करण्यासाठी मोठ्या उद्योजकांनीही पुढाकार घ्यायला हवा. शासनाच्या स्तरावरही रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एकत्रित प्रयत्न व्हावेत. यातून हे चित्र नक्कीच बदलेल.

कुशल मनुष्यबळाचा प्रश्न एमआयडीसींना कायमच त्रासदायक ठरलाय का?

प्रश्न कुशल मनुष्यबळाच्या उपलब्धतेचा नसतो. कुशल बनलेले मनुष्यबळ नाशिकसारख्या शहरात स्थिर राहण्याचा असतो. मर्यादीत उत्पन्नात काम करणाऱ्या कामगारांना निवाऱ्यासाठी शहरात व्यवस्थाच होत नसेल तर ते या शहरात कसे राहतील? अशा उद्योगपूरक समूहांसाठी कमी किमतीची घरे यासारखे प्रकल्प उभारण्यासाठी संघटित प्रयत्न गरजेचे आहेत.

सरकारची उद्योगविषयक बदलती धोरणे आशावादी वाटतात का?

नक्कीच! उद्योगांच्या उभारणीत अन् एकूणच चक्रामध्ये लघुउद्योजकांचे स्थान महत्वाचे आहे. या समूहासमोरील व्यवस्थेतील क्लिष्टता कमी करण्यावर सरकार भर देते, हे आशावादी चित्र आहे. मुळापासून व्यवस्थेत काही बदल घडविताना थोडा वेळ लागेल पण तितका संयम ठेवण्याचीही तयारी हवीच ना!

नव्या उद्योजकांना नाशिकमध्ये गुंतवणुकीस कितपत वाव आहे?

नाशिकचे वातावरण त्यासाठी पोषक आहे. तरीही या बरोबरीने महागडे इन्फ्रास्ट्रक्चर, बँकेचे चढे व्याजदर, गगनाला भिडणाऱ्या जागांच्या किमती यासारख्या प्राथमिक आव्हानांना अगोदर नियंत्रणात आणावे लागेल. त्यानंतर नाशिकसारख्या शहरातील गुंतवणुकींना चालना मिळणे नक्कीच शक्य होईल.

एकीकडे उद्योगांचा मनुष्यबळासाठी सुरू असणारा शोध आणि दुसरीकडे बेरोजगारीसारखे आव्हान, हा विरोधाभास वाटत नाही का?

हा विरोधाभास आहेच. नाशिकसारख्या शहरांमध्ये हे चित्र अद्याप 'जैसे थे' असले तरीही ते तसेच का आहे, याचा विचार करणारी यंत्रणा कमी पडते. यावर शिक्षण आणि उद्योग या दोन्ही क्षेत्रांनी आपसातील संवाद वाढविण्याची गरज आहे. कुठल्याही विद्याशाखेतून बाहेर पडणारा विद्यार्थी प्रामुख्याने उद्योग आणि शेती क्षेत्रातील संस्थामध्ये रूजतो. हा लक्ष्यगट डोळ्यांसमोर ठेवून उद्योगांना हवे असणारे मनुष्यबळ निर्मितीच्या दृष्टीने उत्पादक संवादाला चालना मिळावी.

शब्दांकन : जितेंद्र तरटे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एक धागा सुखाचा....

$
0
0

साडेचार हजारहून अधिक अपंगांना मिळाला जगण्याचा आधार

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक

कुणाला दोन्हीही पाय आहेत पण त्यात त्राणच नाही, कुणाला सृष्टी न्याहाळण्याचे भाग्यच लाभले नाही. बहिरेपणामुळे कुणाच्या कानांपर्यंत ध्वनी पोहोचत नाही तर कुणा अपंगाचे आयुष्यच त्याला ओझे वाटू लागलेय. प्रत्येकाची व्यथा वेगळी असली तरी आयुष्य निरस करणारे. अपंगत्व हेच एकमेव कारण. अशा अपंग बांधवांच्या जीवनात जणू एकप्रकारची चेतनाच सरकारने फुंकली. नवीन अन अत्याधुनिक कृत्रिम उपकरणे मोफत मिळाल्याने जगणेच सुसह्य झाल्याचे भाव या बांधवांच्या चेहऱ्यावर होते.

सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचा अपंग सशक्तीकरण विभाग, श्री पंचायती आखाडा बडा उदासीन निर्वाण, जिल्हा प्रशासन आणि कल्याणम करोति संस्थेने घेतलेल्या पुढाकारातून सामाजिक न्याय शिबिर आणि अपंग उपकरण वितरण समारंभ घेण्यात आला. जिल्ह्यातील तब्बल चार हजार ४४६ अपंग बांधवांना तब्बल तीन कोटी ३९ लाख ७५ हजार रूपये किमतीच्या उपकरणांचे वाटप करण्यात आले. अंध, अपंग, बहिरेपणा असलेल्या सर्वच बांधवांना आवश्यकतेनुसार या उपकरणांचे वाटप करण्यात आल्याने ते सुखावले आहेत. जास्तीत जास्त अपंग बांधवांना या शिबिराद्वारे मोफत उपकरणे मिळावीत यासाठी जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह यांच्यासह प्रशासनाने व्यक्तीश: लक्ष घातले. म्हणूनच या उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

विशेष म्हणजे मोटराईज्ड तीनचाकी सायकलसारखी सुमारे ३५ हजार किमतीची महागडी उपकरणेही तब्बल १० बांधवाना मोफत देण्यात आली. त्यासाठी स्थानिक खासदारांनी आपल्याकडील काही निधी उपलब्ध करून दिला. अपंग बांधवांना १५७३ तीनचाकी सायकल, ४२६ व्हील, ११२० कुबड्या, ८८९ वॉकींग कीट, १६७४ श्रवणयंत्र, २५३ अत्याधुनिक फोल्डिंग छडी, अंध मुलांना ब्रेल कीट, ८०० एमएसआयडी किट, ३०८ कृत्रिम अवयवांचे वाटप करण्यात आले. फोल्डिंग छडीचे वाटप हे देखील या समारंभाचे वैशिष्ट्य ठरले. वाटेत अडथळे आल्यास व्हायब्रेट होत असल्याने अंध व्यक्तीस मार्ग बदलणे त्यामुळे सोपे होणार आहे. ब्रेल कीटमध्ये टॅब आणि मोबाईलचा समावेश आहे. महाराष्ट्र ओबीसी कॉर्पोरेशनतर्फे मिराबाई ठाकरे यांना ४० हजाराच्या आर्थिक सहाय्याचा धनादेश देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुणवत्तेचेही मोल जाणावे!

$
0
0

भारत निधर्मी राष्ट्र म्हणून जगाच्या पाठीवर ओळखला जाणारा देश आहे. येथे असंख्य धर्म, पंथ अन् संप्रदाय रुजले. व्यवसायांमुळे जाती की जातींमुळे व्यवसाय हे सांगता येत नसले तरीही या दोन्हीही बाबींचा आपसात संबंध पूर्वपारपासून चालत आला आहे.

कुठल्याही धर्माच्या ग्रंथाने मानवाच्या मनात कधीही द्वेष कालविलेला नाही. कायम एकजूटतेचा आणि आपसातील प्रेम, सौहार्द कायम ठेवण्याचाच संदेश प्रत्येक धर्मग्रंथाने आजवर दिला आहे. देशाच्या आजवरच्या वाटचालीत असंख्य महापुरूषांची नावे घेता येतील. यातील कुणाचेही योगदान वगळून चालणार नाही. यात सर्वच धर्माच्या आणि पंथांच्या महापुरूषांचा सहभाग आहे. महापुरूषांचे कार्य हे जाती अन् धर्माच्या चौकटींना कधीच भेदून पार झालेले असते. मात्र, माणसे महापुरूषांच्या प्रतिमा या चौकटीत बांधून ठेवतात. मात्र या महापुरूषांच्या प्रतिमांचा उपयोग राजकीय लोक स्वार्थ साधण्यासाठी करून घेतात. समाजातही दोन गट असतात. सुशिक्षित आणि अशिक्षित. सुशिक्षित लोकांचा बुध्दीभेद करणे सोपी गोष्ट नाही. मात्र अशिक्षित लोकांचा बुध्दीभेद करून त्यांच्या बळावर सत्ता काबीज करणे हे राजकारण्यांसाठी सोपे ठरते. याच ठिकाणी शिक्षणाचे महत्त्व पुन्हा जाणवते. उच्च शिक्षण देणारी विनाअनुदानित महाविद्यालये स्थापन करण्यासाठी सरकारने खासगी संस्थांना परवानगी दिली तेव्हापासून त्यात झालेल्या राजकारण्यांच्या शिरकावाचा ठसा अद्यापही कायमच आहे. समाज शिक्षणाशिवाय निद्रीस्तच रहावा, सत्ता गाजविण्यासाठी अशी इच्छा करणाऱ्या राजकारण्यांच्याच हाती पुन्हा शिक्षणसंस्था गेल्या आहेत. महाविद्यालयातील तरूणांना हाताशी पकडून त्यांना निवडणुकांमध्ये गोवण्याचे तंत्रही याच कार्यपध्दतीचा एक भाग म्हणावा लागेल. विद्यार्थ्यांकडून ओरबाडल्या जाणाऱ्या देणग्या, सेवकांना दिला जाणारा अपूर्ण पगार, सुविधांचा अभाव, राजकीय वर्चस्वाचा वापर अन् मुलभूत शैक्षणिक सुविधांची वाणवा अशी अवस्था शिक्षण क्षेत्रात निर्माण झाली आहे. 'शिका, संघटीत व्हा अन् संघर्ष करा' असा संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देऊन अन्यायग्रस्त दलित समाजाला मुख्य प्रवाहात आणले. हा संदेश कुठल्याही काळामध्ये प्रेरकच ठरतो. काळाच्या एका टप्प्यावर समाजातील एका समुहाला समान रेषेत आणण्यासाठी आरक्षणासारख्या सुविधांनी नक्कीच सिंहाचा वाटा उचलला आहे. मात्र त्यानंतरच्या कालावधीत काही पिढ्या आता पुढे सरकल्या आहेत. या पिढ्यांनी स्वत:चे अस्तित्व निर्माण केले आहे. या स्थितीत समाजातील सर्वच घटकातील समुहांची वाटचाल ही केवळ गुणवत्ता आणि धर्मनिरपेक्षतेसारख्या गुणांवरच व्हायला हवी असे स्पष्टपणे वाटते.

(लेखक फ्रावशी अकादमीचे अध्यक्ष आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आनंदाची गुरुकिल्ली

$
0
0

गुडबायबरोबरच नाशिककरांना हॅपी स्ट्रीटची प्रतीक्षा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'हॅपी स्ट्रीट' हा केवळ उपक्रम नाही तर आनंदी जगण्याची कला शिकवणारा परिपाठ आहे. अशा आशयाच्या हजारो प्रतिक्रिया नाशिककरांनी रविवारी व्यक्त केल्या. उन्हाळ्याच्या कालावधीतील अखेरचे हॅपी स्ट्रीट रविवारी पार पडले. कॉलेजरोडवर आयोजित या उपक्रमात मोठ्या संख्येने नाशिककरांनी सहभाग घेतला.

रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमाराला हॅपी स्ट्रीट कॉलेजरोडवर अबालवृध्दांच्या गर्दीने पुन्हा बहरला. जॉगिंगच्या ट्रॅककडे वळणारी पावलेही नकळत हॅपी स्ट्रीट गर्दीत सामील झाली. एरव्ही ट्रॅफीक सिग्नलचे इशारे पाळत जगणाऱ्या कॉलेजरोडवर चक्क एक्सरसाईजलाच सुरुवात झाली. सिनीअर सिटीझन्सच्या उत्साहासोबतच स्केटींग कीटसह आलेल्या लहानग्यांनी स्ट्रीटचा उत्साह वाढविला. व्हॉलीबॉल, बॅडमिंटन अन् फुटबॉलच्या स्पोर्टस् गेम्ससह आगामी कुंभाची चाहूल देणाऱ्या रांगोळ्या, गेल्या कुंभातील स्मृती जागविणारे फोटोग्राफ्स, लहानग्यांच्या इवल्याशा हातावर कोरले जाणारे मजेदार टॅटू, दुनियेची दु:ख दूर सारत भोवताल हलवून टाकणारा हास्ययोगा, तर शरीराला रिफ्रेशमेंट देणारा झुम्बा डान्स अशा नानाविध कलाप्रकारांनी हॅपी स्ट्रीट उपक्रमास धम्माल आणली.

गेल्या काही आठवड्यांपासून 'महाराष्ट्र टाइम्स' ने या उपक्रमाचे आयोजन केले होते. शहरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक संस्था, कलाप्रिय व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक संघ, तरुणांचा सहभागी असणारी विविध सांस्कृतिक मंडळे, कलेचे शिक्षण देणाऱ्या विविध संस्था अशा विविध घटकांनी सहभाग घेत 'हॅपी स्ट्रीट' च्या अनोख्या संकल्पनेत रंग भरले होते. स्वत:च्या भावविश्वात स्वत:ला कोंडून घेणाऱ्या मनोवृत्तींचाही हॅपी स्ट्रीटने 'ब्रेन वॉश' केला. मॉडेल कॉलनी ते बिग बझार चौकापर्यंतच्या एका बाजूच्या रस्त्याला या उपक्रमामुळे यात्रेचे स्वरूप आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इच्छाशक्ती असल्यास आजार टाळणे शक्य

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आपल्या रोजच्या वागण्यात केवळ १० टक्के बदल केल्यास ८० टक्के आजार टाळता येतात. घरातल्या घरात अत्यंत छोट्या गोष्टी पाळल्यास अनेक आजारांना पळवता येते, त्यासाठी इच्छाशक्ती मात्र प्रबळ हवी, असे प्रतिपादन जे. जे. रूग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने यांनी केले.

गोदाघाटावरील यशवंतराव देवमामलेदार पटांगणावर सुरु असलेल्या ९४ व्या वसंत व्याख्यानमालेत 'आजार होणे कसे टाळावे?' या विषयावर ते बोलत होते. हे व्याख्यान शांतारामबापू वावरे यांच्या स्मृतीला अर्पण करण्यात आले होते.

लहाने पुढे म्हणाले की, लहान मुलांना ८० टक्के आजार पाण्यामुळे होतात त्यामुळे त्यांना वयाच्या दोन वर्षांपर्यंत उकळून गार केलेले पाणी पाजले तर त्यांना पाण्यापासून होणाऱ्या आजारांपासून दूर ठेवता येते. मोठ्या माणसांना शक्यतो पाण्यापासून आजार होत नाही, झाले तर त्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे असा समजावे. पाणी वेळेवर पिले तर आजारच होत नाही असेही ते म्हणाले.

लहाने पुढे म्हणाले की, दोन जेवणातील अंतर शक्यतो सहा तास इतके असावे जास्त अंतर झाल्यास अॅसिडीटीला सामोरे जावे लागते. उपाशी राहिल्याने खूप व्याधी होतात. जेवल्यावर अर्धा तासाने पाणी प्यावे कारण लगेचच पाणी प्यायल्याने ते पातळ होऊन साचून राहण्याची भिती असते हे सांगतानाच लहाने पुढे म्हणाले की, रात्रीचे जेवण सात वाजता घ्यावे कारण पचण्यासाठी तितका वेळ देणे महत्त्वाचे असते. झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिऊ नये. प्रत्येकाने दिवसभरात किमान तीन लीटर पाणी प्यावे हे बदल केल्यास अनेक आजार टाळता येऊ शकतात असेही ते म्हणाले.

शांतारामबापू वावरे यांच्याबद्दल आठवणी सांगून संगीता बाफणा यांनी त्यांना अभिवादन केले. श्रीकांत बेणी यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. तर वसंत व्याख्यानमालेचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर शहा यांच्या हस्ते लहाने यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जयप्रकाश जातेगावकर, छाया कडभाने, सुलोचना हिरे, नंदा वावरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ गॅस एजन्सींवर कारवाई करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ग्राहकांना प्रमाणित वजनापेक्षाही कमी गॅस देऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या गॅस एजन्सीजवर कारवाई करावी अशी मागणी नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीने केली आहे. फसवणूक झालेल्या ग्राहकांना भरपाई द्यावी अशी देखील पंचायतची मागणी आहे.

ग्राहकांना वितरीत केल्या जाणाऱ्या सिलिंंडरमधील गॅस काढून घेतला जात असल्याचा प्रकार पोलिसांच्या गुन्हे शाखेने अलीकडेच उघडकीस आणला होता. असा गॅस रिकाम्या सिलिंंडरमध्ये भरून त्याची परस्पर विक्री केली जात असल्याचेही पोलिसांनी केलेल्या पाहणीत उघडकीस आले होते. सिडको परिसरातील राणेनगरमध्ये हा प्रकार उघडकीस आला होता. गॅस सिलिंंडरचे वितरण करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली होती. यानंतरही भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत कांदा बटाटा भवनजवळ एका कारवाईमध्ये भारत गॅसचे दोन भरलेले गॅस सिलेंडर, पाच रिकामे सिलिंंडर, एक एचपी मोटर, गॅस भरण्याचे नोजर, गॅस भरण्याचे अन्य मशिन असा ३७ हजारांचा मुद्देमाल बेकायदेशीररित्या बाळगला जात असल्याचे पो‌लिसांनी आढळले होते. त्यांनी हा माल हस्तगत केला होता.

ग्राहकांकडून नियमानुसार पैसे आकारूनही त्यांना कमी वजनाचा गॅस देऊन फसवणूक केली जात असल्याचे या प्रकरणांवरून उघडकीस आले आहे. या सर्व प्रकारांचा पंचायतने निषेध केला असून, संबंधीतांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. सिलिंंडरचे व गॅसचे वजन करूनच तो ग्राहकाला दिला जावा, गॅसचे सिल योग्य आहे, की नाही याची खातरजमा करून देणे, त्याची गळती होत नसल्याचा विश्वास ग्राहकाला वितरकाकडून दिला जाणे आवश्यक आहे. मात्र तसे न करता टाळाटाळ केली जात असल्याचा असंख्य ग्राहकांचा अनुभव आहे. याबाबत पंचायतने देखील वारंवार तक्रारी केल्या आहेत. परंतू त्याची दखल घेतली जात नाही. गॅस वितरक वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यास उत्सुक नसल्याचे अनेकदा प्रत्ययास आले आहे.

जिल्हाधिकारी आणि पुरवठा विभागाने ग्राहक संरक्षण अधिनियम १९८६ व अत्यावश्यक सेवा कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. कमी वजनाचा गॅस विकणाऱ्या कंपनीचा प्रतिनिधी, ‌जिल्हा विक्री अधिकारी, गॅस वितरक व त्यांचे प्रतिनिधी यांच्या विरुध्द पॅक कमोडीटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करावा. एचपी गॅस जिल्हा विक्री अधिकारी व गॅस वितरकांनी आठवड्यातून दोन दिवस गॅस एजन्सीत गॅस ग्राहकांच्या तक्रारी ऐकून त्याचे निवारण करावे असे जिल्हाधिकाऱ्यांचे नियम असूनही त्याचे पालन न केल्याबद्दल कारवाई करावी. सिलिंंडर वितरणाबाबतच्या तक्रारी पंचायतीत मांडाव्यात असे आवाहन सचिव विलास देवळे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्याची आत्महत्या

$
0
0

नाशिक : दहावीची परीक्षा देऊन ११ वीच्या तयारीला लागलेल्या सटाणा येथील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. कुलद‌ीप विष्णू आहिरे (वय १८) असे विद्यार्थ्याचे नाव आहे.

कुलदीप आहिरे हा गेल्या काही दिवसापासून नाशिकमध्ये ११ वीच्या अभ्यासक्रमाची खासगी क्लासच्या मदतीने तयारी करीत होता. दहावीच्या निकालापूर्वीच ११ वीच्या अभ्यासक्रमाच्या तयारीला लागलेल्या या विद्यार्थ्याने २२ मेच्या रात्री गोळे कॉलनीतील घरात आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्माक मृत्यूची नोंद केली असून, आत्महत्येच्या कारणांचा पोलिस शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनाशर्त निलंबन मागे घ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरकारला नमविण्यासाठी महसूल विभागाशी संबंधीत संघटना अधिक आक्रमक झाल्या आहेत. पुरवठा खात्याच्या कामकाजावर बहिष्काराच्या भूमिकेवर संघटना ठाम असून, राज्यसरकारने तहसीलदारांचे निलंबन विनाशर्त मागे घेतले नाही तर गुरूवारी (२८ मे) पासून राज्यभर कामकाज बंद आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.

सुरगाणा येथे झालेल्या रेशन धान्य घोटाळाप्रकरणी जिल्ह्यातील सात तहसीलदारांना निलंबित करण्यात आले आहे. कुठलीही चौकशी न करताच ही निलंबनासारखी कठोर कारवाई करण्यात आल्याचा संघटनेचा आरोप आहे. या निषेधार्थ राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. संघटनेने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय बैठक घेतली. नियोजन भवन येथे संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. सात तहसीलदारांवरील निलंबनाच्या कारवाईनंतर पुढील भूमिका आणि आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. पुरवठा खात्याच्या कामकाजावर कायमस्वरूपी बहिष्कार टाकण्याच्या निर्णयाचा या बैठकीमध्ये पुनरूच्चार करण्यात आला. संघटनेने दबावतंत्राचा अवलंब सुरू केला आहे. राज्यसरकारने तहसीलदारांचे निलंबन विनाशर्त मागे घ्यावे अशी मागणी करण्यात आली. मागण्या मान्य करण्यासाठी राज्यसरकारला आता २७ मे पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही तर २८ मे पासून कामकाज बंद करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.

आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांनी या घोटाळ्याची चौकशी करून अहवाल शासनाला सादर केला आहे. मात्र त्यानंतरही कारवाई झाल्याने सरकारचा आयएएस अधिकाऱ्यांवरही विश्‍वास राहिला नसल्याचे स्पष्ट होते, अशी भूमिका या बैठकीत मांडण्यात आली. तहसीलदारांची चौकशी न करताच त्यांचे निलंबन करण्यात आले. चौकशीत तहसीलदार दोषी न आढळल्यास सरकार त्यांना नुकसानभरपाई देणार का अशा मागणीवरही बैठकीत चर्चा झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘स्पा’ आड अवैध धंद्याचे रॅकेट

$
0
0

विद्यार्थ्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रकार; संशयितांना पोलिसांचे अभय

अरविंद जाधव, नाशिक

गंगापूररोडवरील पॉश स्पा किंवा मसाज पार्लर आड राजरोसपणे अवैध धंदे सुरू आहेत. थत्तेनगरमधील एका स्पामध्ये विद्यार्थ्यास ब्लॅकमेल करून लाखो रूपये उकळण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. १०-१२ दिवसांपूर्वी घडलेल्या याप्रकरणात पोलिसांनी मात्र अवैध धंद्यावाल्यांना पाठीशी घालीत तक्रारदारांनाच शिव्यांची लाखोली वाहिली असून यामुळे सर्वसामन्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरातील एका कॉलेजमध्ये १८ वर्षीय मुलगा शिक्षण घेतो. जन्मतः गतीमंद असलेला मुलगा काही महिन्यापूर्वी त्याच्या मित्रासोबत स्पामध्ये गेला होता. मसाजमुळे हातपायांना आराम मिळेल, असे त्याच्या मित्राने सांगितले होते. या स्पामध्ये रशियन तरूणीसह स्थानिक तरूणींचा भरणा होता. त्यांनी त्या गतीमंद मुलाचे फोटो काढून मोबाइल नंबर घेतला. नंतर स्पामधून सारखे त्या मुलाला कॉल्स जाऊ लागले. अमुक पैसे घेऊन ये अन्यथा तुझे फोटो सोशल मीडियावर टाकले जातील, अशी धमकी देण्यात येऊ लागली.

याप्रकारामुळे घाबरलेल्या मुलाने घरातूनच कधी २५ ते कधी ५० हजार रूपये चोरून स्पा मध्ये देऊ लागला. घरातील पैशांना गायब होऊ लागल्याने पालकांनी मुलाकडे चौकशी केली व त्यातून ब्लॅकमेलचा प्रकार समोर आला. त्यानंतर, सदर मुलाचे वडील व काका स्पामध्ये गेले. मुलाने दिलेली माहिती खरी असल्याची खातरजमा करून त्यांनी गंगापूर पोलिसांना कळवले. मात्र, दहा मिन‌िटांच्या अंतरावर असलेले पोलिस अर्धा-पाऊण तास पोहचलेच नाहीत. यानंतर हीच माहिती मुलाच्या वडीलांनी कंट्रोल रूमला कळवली. वायरलेसवरून मॅसेज गेल्यानंतर काही वेळाने पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. मुलीसह पीडीत मुलाच्या नातेवाईकांना पोलिस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यात आले. तिथे संशयितावर पीटा कलमान्यवे कारवाई करण्याचे सोडून फिर्यादीनांच दमबाजी करून प्रकरण मिटवण्यात आले.

याबाबत, सध्या जोरदार चर्चा सुरू असून, या वृत्तास गंगापूर पोलिस स्टेशनमधील काही कर्मचाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. पोलिस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर सर्व प्रकार घडला असताना वरिष्ठ अधिकारी यापासून अनभिज्ञ असल्याचे दिसते. मागील वर्षापर्यंत ब्युटीपार्लर तसेच स्पा आड देहविक्री करणाऱ्या सात ठिकाणावर पोलिसांनी छापा मारून गुन्हे दाखल केले होते. आता, पोलिस अवैध धंद्यावाल्याच्या पाठीमागे उभे राहिले असून, फिर्यादींना पोलिस स्टेशनमध्ये शिवीगाळ व दमबाजी करण्याचे प्रकार सुरू आहेत. याकडे पोलिस आयुक्तांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

रशियन मुली देहविक्रीत

दहा दिवसांपूर्वी झालेल्या या घटनेवेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांमध्ये रशियन मुलींचा भरणा होता, असे संबंधितांनी सांगितले. यापूर्वी क्राईम ब्रँचकडून देखील अशा मुलींचा शोध घेतला जात होता. मात्र, त्यांच्यापर्यंत पोहचणे पोलिसांना शक्य झाले नव्हते. यावेळेस असे रॅकेट उद्धवस्त करण्याची संधी पोलिसांकडे होती. मात्र, कारवाईच थंड बस्त्यात गुंढाळण्यात आली.

सीनिअर पीआय काळेंची अरेरावी

गंगापूर पोलिस स्टेशनचे सीनिअर पीआय शंकर काळे तक्रारदारांशी अरेरावीची भाषा करतात. वरिष्ठांसह लोकप्रतिनिधींना जुमानत नाहीत. कुठेही तक्रार करा, काही फरक पडणार नाही, असे ते फिर्यादीला सांगून आराडाओरड करतात. गंगापूर पोलिस स्टेशनचे काही कर्मचारी देखील याप्रकाराला वैतागले आहेत. अवैध धंद्यावाल्यांना पाठीशी घालताना केसच दाबून टाकण्याचे प्रकार यापूर्वी घडले असून, पोलिस मात्र सर्वसामन्य टपरीधारकांना किंवा चहावाल्यांना दमबाजी करताना दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धावत्या रेल्वेत हाणामारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

यशवंतपूर एक्स्प्रेसमध्ये कोपरगाव- मनमाडदरम्यान एनएसयूआय संघटनेचे कार्यकर्ते व रेल्वेतील खानपान सेवा कर्मचारी यांच्यात बिर्याणीत स्क्रू निघाल्याच्या कारणावरून जोरदार हाणामारी झाली. एकमेकांच्या अंगावर उकळते तेल व गरम पाणी फेकण्यात आल्याने या वादात पाच जण जखमी झाले. रेल्वे पोलिसांनी १७ जणांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली.

बंगळुरू येथून एनएसयूआय या संघटनेचे साठ कार्यकर्ते दिल्ली येथे अधिवेशनाला जात होते. काही कार्यकर्ते आणि रेल्वे पेंट्रीकार्डमधील विक्रेते, कर्मचारी यांच्यात वाद झाला. बिर्याणीत स्क्रू निघाल्याची तक्रार करीत काही कार्यकर्त्यांनी पेंट्रीकार्डमध्ये जाऊन जाब विचारला. त्याचे पर्यावसन जोरदार हाणामारीत झाले. जीवाच्या भीतीने पेंट्रीकार्ड आतून बंद करून कर्मचाऱ्यांनी स्वतःला कोंडून घेतले. मनमाड स्थानकात आल्यानंतर साखळी ओढून गाडी थांबवून पोलिसांना बोलविण्यात आले. तब्बल सव्वातास गाडी रोखून धरण्यात आली. पोलिसांनी पेंट्रीकार्डच्या खिडकीच्या काचा फोडून डब्यात प्रवेश केला. दोन्ही गटांनी परस्परविरोधी आरोप-प्रत्यारोप केल्याने मनमाड स्थानकावर मोठा तणाव निर्माण झाला. या घटनेत तीन विद्यार्थी आणि दोन पेंट्रीकार्ड कर्मचारी जखमी झाले. त्यांच्यावर मनमाड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाट्यपरिषद छे, ‘हास्य’परिषद!

$
0
0

प्रशांत भरवीरकर, नाशिक

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद कधी काय 'नाट्य' करून ठेवले याचा भरवसाच नसताना परिषदेचा आणखी एक हास्यास्पद उपद्‍व्याप समोर आला आहे. परिषदेच्या कार्यालयाचे केवळ नूतनीकरणच केलेले असताना विनापरवानगी तेथे कोनशिला उभारण्याचा उद्योग नाट्यपरिषदेने केलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे हे नूतनीकरण चौथ्यांदा झालेले असूनही आताच कोनशिला का उभारण्यात आली हे कोडे उलगडत नाही.

संपूर्ण राज्यभरात अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद किती गोंधळ घालते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. अध्यक्षपदाच्या निवडीचे वादंग असेल किंवा अध्यक्षांच्या वागण्याचे गौडबंगाल असेल मराठी नाट्यपरिषद नेहमीच चर्चेत राहिली आहे. चर्चेत राहण्यासाठी नाशिकची शाखाही कमी मागे नाही. कोणत्या न कोणत्या कारणाने नाशिकचे विभागीय कार्यालय चर्चेत राहते. आताही महाकवी कालिदास कलामंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या मराठी नाट्यपरिषदेच्या ऑफिसचे नूतनीकरण करण्यात आले आहे. तेथे कोनशिला उभारण्यात आली असून, त्यावर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वत:ची नावे उमटवून मिरवून घेतले आहे. परंतु, कोणतीही कोनशिला उभारताना त्यासाठी महापालिकेची परवानगी आवश्यक असते ती परवानगी घेतलेलीच नसल्याचे समजते. प्रा. रामदास बरकले अध्यक्ष असताना मराठी नाट्यपरिषदेच्या या कार्यालयाची रंगरंगोटी करण्यात आली होती. त्यानंतरही दादा नाडगौडा व नेताजी उर्फ दादा भोईर असताना या कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले होते. आता तब्बल चौथ्यांदा या कार्यालयाला पार्टेशन करून रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्याबरोबरच तेथे दिमाखात कोनशिलाही उभारण्यात आली आहे. परंतु हा प्रकार अत्यंत हास्यास्पद आहे.

नाट्यपरिषदेच्या अध्यक्षांची निवड जोरशोरसे होण्याची बाब असताना सध्या झालेल्या अध्यक्षांच्या वाट्याला मात्र तसे कोणतेच कोडकौतुक आलेले नसल्याचेही समोर आले आहे. नेताजी भोईरांना अध्यक्षपद नको होते म्हणून त्यांनी ते सोडले व प्रा. रविंद्र कदम यांना सर्वसाधारण सभेवर अध्यक्ष करण्यात आले मात्र ही बाब अतिशय गोपनीय का ठेवण्यात आली याबाबत मात्र शंकाच आहे.

कोनशिलेवर जी नावे कोरण्यात आली आहे. त्यात पूर्वी नाट्यपरिषदेला विरोध करणाऱ्या अनेक बंडखोरांचीही वर्णी लावण्यात आली असल्याचे दिसत असून, त्यांना गप्प बसविण्यासाठी हा मार्ग निवडला गेला असल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपंगांना जिल्ह्यात क्रीडासुविधा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, त्र्यंबकेश्वर

भारताची मान अभिमानाने उंचावण्याचे काम भारतीय अपंग खेळाडूंकडून जगभरात सुरू आहे. त्यांच्या क्रीडा नैपुण्याला चालना देण्यासाठी केंद्र सरकार जिल्हास्तरावर अत्याधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारितामंत्री थावरचंद गेहलोत यांनी रविवारी त्र्यंबकेश्वर येथे दिली. देशात पाच ठिकाणी नॅशनल स्पोर्टस् सेंटरची स्थापना करणार असल्याची घोषणाही गेहलोत यांनी केली.

सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयांचा अपंग सशक्तीकरण विभाग, श्री पंचायती आखाडा बडा उदासीन निर्वाण, जिल्हा प्रशासन आणि कल्याणम् करोति संस्थेच्या सहकार्याने आयोजित सामाजिक न्याय शिबिर आणि अपंग उपकरण वितरण समारंभात ते बोलत होते. त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळा मैदानावर हा कार्यक्रम झाला.

गेहलोत म्हणाले, की समाजातील अपंग बांधवांची सेवासुश्रुषा हाच मानवधर्म आहे. अपंगांमधील प्रतिभेला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. इंजिनीअरींग, वैद्यकशास्त्र, वकिली, प्रशासनासारख्या सर्वच क्षेत्रात अपंग व्यक्तिंनी यश मिळविले आहे. पॅराऑलिंपीक स्पर्धा, अंधांची विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने विजेतेपद पटकाविले आहे. म्हणूनच सर्वच क्षेत्रातील अपंगांना प्रोत्साहीत करण्याचे सरकारचे धोरण असल्याचेही गेहलोत यांनी स्पष्ट केले. एका वर्षात २० लाख अपंगांना विविध उपकरणांचा लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव अविनाश अवस्थी यांनी प्रास्ताविकात दिली. त्र्यंबकेश्वर येथील शिबिर देशातील सर्वात मोठे शिबिर ठरले असून, त्यामध्ये साडेचार हजारांहून अधिक बांधवांना उपकरणांचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री गिरीष महाजन, खासदार हेमंत गोडसे, हरिश्चंद्र चव्हाण, महामंडलेश्वर कार्ष्णि स्वामी श्री गुरूशरणानंदजी महाराज, आनंद भास्कर महाराज, रघुमुनी महाराज, नरेंद्रगिरी महाराज, हरिगिरी महाराज, सागरानंद सरस्वती, स्वांत रंजन यांसह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थ बैठकीला रेल्वेमंत्रीच गैरहजर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळा अ‍वघ्या काही दिवसांवर येवून ठेपला असतानाच रेल्वेचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. आपत्ती व्यवस्थापनाचा योग्य आराखडा सादर न केल्याप्रकरणी टीकेचे धनी बनलेला आणि सिंहस्थ कामांची गती अत्यंत धीमी असलेल्या रेल्वेच्या विशेष गाड्यांचे नियोजनही अद्याप बासनातच आहे. रेल्वेमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीला नाशिकचे सर्वच अधिकारी सोमवारी मुंबईत दाखल झाले; पण मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे या अधिकाऱ्यांची बैठक पालकमंत्र्यांना घ्यावी लागली आहे.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये मुंबईत ही बैठक होणार होती. त्यासाठी नाशिक‌हून विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, पोलिस अधीक्षक संजय मोहीते यांसह अधिकाऱ्यांचा ताफा मुंबई येथे गेला होता. परंतु, प्रभु यांना ऐनवेळी दुसरे महत्वाचे काम निघाल्याने ते या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. परिणामी पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थित बैठकीचा सोपस्कार पार पाडण्यात आला. रेल्वे मंत्रालयाकडून सिंहस्थ पर्वणी काळात १२ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. परंतु, या गाड्या पुरेशा नाहीत हे निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला.

बैठकीला रेल्वेचे अधिकारी उपस्थित असले तरी ठोस निर्णय घेणारे कुणीच नसल्याने कुठलाच निर्णय होऊ शकला नाही. प्रवासी वाहतुकीसंदर्भात पुढील तीन ते चार दिवसांत वर्कआऊट करा. त्यानंतर पुढील बैठक नाशिकमध्येच घेण्यासंदभाऱ्त या बैठकीत चर्चा झाली. बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आनंद कुलकर्णी, नगर विकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, पोलीस गृहनिर्माण विभागाचे महासंचालक अरुप पटनाईक, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक एस.के.सूद आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images