Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सिव्हिलमधील लाचखोर कक्षसेवकास कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

न्यायालयीन कामासाठी आवश्यक असलेले आजाराचे प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदाराकडून सहा हजार रुपयांची लाच घेणाऱ्या सिव्हिल हॉस्पिटलमधील कक्षसेवकाला कोर्टाने एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास संशयितास अटक केली होती.

जैलेंद्र शंकर निकम असे कक्ष सेवकाचे नाव असून, त्याच्यावर सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदारास मणक्याचा आजार असून, न्यायालयीन कामासाठी त्यांना आजाराचे प्रमाणपत्र हवे होते. त्यासाठी गुरुवारी ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले होते. तेथे कक्षसेवक निकम याने प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी सहा हजार रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता शुक्रवारी सिव्हिल हॉस्पिटलजवळील टपरीनजीक सापळा रचून अटक करण्यात आली. याबाबत सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करून निकमला शनिवारी कोर्टात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने निकमला एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

११ जणांना न्यायालयीन कोठडी

राजीवनगर झोपडपट्टी येथील अतिक्रमण हटवल्यानंतर पोलिसांना शिवीगाळ करून वाहनांची तोफफोड करणाऱ्या ११ संशयितांना कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. रस्ता रूंदीकरण करताना राजीवनगर झोपडपट्टी येथील नागरिकांनी विरोध केला. पोलिसांच्या मदतीने अतिक्रमण विभागाने हा विरोध मोडून काढत सर्व जागा रिकामी केली. यानंतर, संध्याकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास काही अतिक्रमणधारकांनी पोलिस स्टेशनसमोर जमून जोरदार घोषणाबाजी केली. तसेच दगडफेक करून वाहनांचे नुकसान केले. यात पीएसआय गुर्जर जखमी झाले. पोलिसांनी लाठीमार करून गर्दी पांगवली. तसेच ११ जणांना ताब्यात घेतले. आज, कोर्टात हजर केले असता त्यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली.

तोतया पोलिसाने लांबवले दागिने

गंगापूर पोलिस स्टेशन हद्दीतील प्रमोदनगर बस स्टॉपजवळ तोतया पोलिसाने ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हातोहात लंपास केले. ही घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. फिर्यादी रस्त्याने घरी जात असताना तोतया पोलिसांनी त्यांना रस्त्यात थांबवून पोलिस असल्याची बतावणी केली. तसेच दागिने काढून ठेवण्यास सांगितले. सोन्याची चैन व अंगठी असा मुद्देमाल रूमालात ठेवत असताना चोरट्यांनी हातचालाखी करून मुद्देमाल चोरी केला. याप्रकरणी गंगापूररोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, ड्युटीवरील कोणतेही पोलिस दागिने काढून ठेवण्यास सांगत नसल्याने नागरिकांनी दागिने काढून ठेवू नये, असे आवाहन पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी केले आहे.

दिंडोरीरोडवर चेन स्नॅचिंग

दिंडोरीरोडवरील टाटिया हॉस्पिटलजवळ शतपावली करणाऱ्या महिलेच्‍या गळ्यातील ५५ हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत पल्सरवरील चोरट्यांनी तोडून पोबारा केला. फिर्यादी व त्यांची बहिण शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास जेवणानंतर शतपावली करीत असताना चोरीची घटना घडली. दोन दिवसापूर्वी ना​शिकरोड परिसरात शतपावली करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील चेन चोरट्यांनी तोडून पोबारा केला होता. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आता भूमिपुत्रांनाच प्राधान्य

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेच्या मुख्य लेखापालपदाच्या वादावर शनिवारी महासभेने पडदा टाकला असून, प्रतिनियुक्तीच्या अधिकाऱ्याऐवजी भूमिपुत्राला प्राधान्य दिले आहे. मुख्य लेखापाल राजेश लांडे यांना मूळ सेवेत परत पाठविण्याचा दुसऱ्यांदा निर्णय घेत एस. व्ही. घोलप यांच्याकडे धुरा पदोन्नतीने देण्याचा निर्णय महासभेने घेतला आहे. त्यामुळे दोन मुख्यलेखापालपदाचा वाद निकाली निघाला आहे. सोबतच महापालिकेत यापुढे महत्वाच्या रिक्त पदांवर सक्षम असलेल्या भूमिपुत्रांनाच पदोन्नती देण्याचे आदेश महापौरांनी दिले असून, प्रतिनियुक्ती अधिकाऱ्यांना जवळपास दार बंद केले आहे.

मुख्य लेखापालपदावर लांडे की घोलप याचा निर्णय घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने महासभेला दिला होता. त्यानुसार महापौर अशोक मुर्तडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत आयुक्तांकडून यासंदर्भातील प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यावर सदस्यांनी आपली मते घोलप यांच्या पारड्यात टाकली. घोलप यांना महापालिका आयुक्तांच्या निवड समितीने २२ फेब्रुवारी २०१३ मध्ये मुख्यलेखापालपदी पदोन्नती दिली. त्यांनी पदभारही स्वीकारला. मात्र, शासनाने राजेश लांडे यांना या पदावर प्रतिनियुक्तीने महापालिकेत पाठविले. त्यामुळे तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांनी मुख्यलेखापालपदाची धुरा लांडेकडे सोपवली. दरम्यान, घोलप यांनी उच्च न्यायलयात दाद मागीतली होती. महापालिकेच्याच निवड समितीने घोलप यांना पदोन्नती दिली असतानाही त्यांना डावल्याबद्दल नगरसेवकांनी आक्षेप घेतला. सर्वच नगरसेवकांनी परसेवेतील अधिकाऱ्यांना विरोध करीत पदोन्नतीने महापालिकेतीलच अधिकाऱ्यांना स्थान देण्याची मागणी केली. प्रकाश लोंढे, अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, तानाजी जायभावे, गुरुमीत बग्गा, संभाजी मोरूस्कर, राहुल दिवे, संजय चव्हाण, अनिल मटाले, कविता कर्डक, सलिम शेख यांनी घोलप यांनाच मुख्यलेखापालपद देण्यात यावे, अशी मागणी केली. तर सदीप लेनकर, सचिन महाजन यांनी शैक्षणिक अर्हता आणि कायद्याप्रमाणे योग्य तो निर्णय घेण्याची मागणी केली. त्यावर महापौरांनी घोलप यांच्या बाजूने रूलिंग देत लांडेना मूळ सेवेत परत पाठविण्याचा पूर्वीचा निर्णय कायम ठेवला. यापुढे रिक्त पदावर महापालिकेतीलच सक्षम अधिकाऱ्याची पदोन्नतीने नियुक्ती करण्याचे आदेश दिले.

सदस्यांचा आक्षेप

महासभेत काही सदस्यांनी शासन निर्णयाच्या अधिन राहून निर्णय घेण्याची मागणी केली. संदीप लेनकर यांनी मुख्यलेखापालपदासाठी दहा वर्षांच्या अनुभव असण्याचा शासनाचा निर्णय आहे. मात्र घोलप यांनी ही अर्हता पूर्ण केलेली नाही. शासनाचा निर्णय मोडता येणार नाही. घोलप यांच्या बाबतीत निवड समितीने दहा वर्षांची अट शिथिल करीत तीन वर्षांची केली आहे. निवड समितीला शासन निर्णय बदलण्याचा अधिकार आहे, असा सवाल करत कायद्याप्रमाणे निर्णय घेण्याची मागणी केली. सचिन महाजन यांनी दहा वर्षांची अट शिथिल करण्याच्या मुद्यावर हरकत घेत अमिषापोटी झाल्याचा आरोप केला.

लांडेंची घरवापसी

मुख्यलेखापालपदी असलेल्या राजेश लांडे यांना महासभेने पावणे दोन वर्षापूर्वीच आपल्या मूळ सेवेत परत पाठविण्याचा ठराव केला होता. दोन वर्षापासून ते या पदावर कार्यरत असल्याने घोलप यांना बाजूला रहावे लागले. शनिवारी पुन्हा त्यांचा पहिलाच ठराव कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने दुसऱ्यांदा घरवापसीचा निर्णय होणारे ते पहिलेच अधिकारी आहेत.

महापालिकेत दोन लेखापाल कसे?

उपमहापौर गुरुमीत बग्गा यांनी महापालिकेत दोन मुख्यलेखापाल कार्यरत असल्याचा गौप्यस्फोट केला. निवड समितीने पदोन्नती दिल्यानंतर घोलप यांना पदावर रूजू करून घेण्यात आले. मात्र, लांडे आल्यानंतर मुख्यलेखापाल पदाचा पदभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला. घोलप यांना मात्र पदोन्नतीचे पत्र देण्यात आले नाही. त्यामुळे त्याही याच पदावर कार्यरत असल्याचा दावा त्यांनी केला. सोबतच तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांच्या कारभारावर आक्षेप घेतला. त्यामुळे आता ज्यांची मुदत पूर्ण होईल त्या पदावर स्थानिक अधिकाऱ्यांनाच पदोन्नतीने नियुक्ती देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण अधिक

0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

महिलांमध्ये कॅन्सर विषयी असलेले अज्ञान व जनजागृतीअभावी कॅन्सरचे वाढते प्रमाण असून, शहरी भागात स्तनाचा तर ग्रामिण भागात गर्भाशयाचा कॅन्सरचा वाढता आलेख आहे. समाजात कॅन्सरविषयी प्रभावीपणे जनजागृती होत नसल्याने महिला कॅन्सरविषयी जागरुकच नाहीत. कॅन्सर होण्यासाठी कारणीभुत असलेले तंबाखुजन्य खाणे टाळणे, या पदार्थांपासून दूर राहणे व वेळेत तपासणी, वेळेत औषधोपचार यामुळे कॅन्सरवर नियंत्रण व मात करता येणं शक्य असल्याचे प्रतिपादन कॅन्सर पेशन्टस् एड असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. नीता मोरे यांनी केले.

व्दारका येथील टाकळीरोडवर सैफी अंब्युलन्स क्राप्स व कॅन्सर पेशन्टस् एड असोसिएशन मुंबई यांच्यातर्फे शनिवारी दाऊदी बोहरा समाजातील महिलांसाठी कॅन्सरविषयक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मार्गदर्शन करताना डॉ. निता मोरे बोलत होत्या. त्या म्हणाल्या,'हरीयाली ट्रस्टच्या माध्यामातून महिलांत कॅन्सरविषयी जनजागृती करण्यात येते. लवकरच नाशिकमध्येही त्याचे विस्तार केले जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणुन या कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी आमदार देवयानी फरांदे, नगरसेवक सचिन मराठे, अर्चना थोरात, हैदरअली नुरानी, तय्यबभाई नुरानी, नूरभाई नुरानी, सलिम बाक्सवाला, अलताफ इलेक्ट्रीवाला, मुफ्फदल काचवाला, अलीभाई सुबा उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीकरांचा पाणीप्रश्न सुटणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

देवळाली कॅन्टोन्मेन्ट च्या पाणी पुरवठ्यात जलसंपदा विभागाकडून होणाऱ्या तांत्रिक अडचणीचे निराकरण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने झाले. यामुळे पाणी वितरण व्यवस्था सुरळीत होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत बोर्डाचे उपाध्यक्ष सचिन ठाकरे यांनी दिली.

ठाकरे म्हणाले,'कॅन्टोन्मेन्ट बोर्डाला जलसंपदा विभागाकडून होणारे पाण्याचे आवर्तन (रोटेशन) संपल्याने पाणी सोडण्यात आले नसून, नदीपात्रातही पाणीसाठा शिल्लक नाही. ही पाणीटंचाई लक्षात घेऊन मुंबईत ९ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, माजी आमदार वसंत गिते, नगरसेवक दिनकर आढाव, बाबुराव मोजाड, तानाजी करंजकर आदींच्या शिष्टमंडळाने प्रश्न मांडला.

कॅन्टोन्मेन्टसाठी ९५ दशलक्ष एम.सी.एफ.टी.(घनफुट) पाणी मंजूर असून एकूण वापर पाणी कपात धरून ६० दशलक्ष एम.सी.एफ.टी. पाणी वापर होतो. जलसंपदा विभाग इतर नगरपालिकांना प्रति १० हजार लिटरला ३ रुपये ९४ पैसे दर आकारते हाच दर कॅन्टोन्मेन्टसाठी ५ रुपये २५ पैसे (प्रति १० हजार लिटर) असा असून, स्थानिक स्वराज्य संस्थांना एक दर व कॅन्टोन्मेन्टसाठी दुसरा दर असे का? मागील बोर्डाने १९९२ पासून दर समान करण्याची मागणी केली होती. त्यामुळे २० लाख ८५ हजार एकूण थकबाकी बोर्डाकडे होती. पण पालकमंत्र्यांनी हे सर्व लक्षात घेऊन जलसंपदा विभागास यातील तफावत दूर करण्याचे आदेश दिले. त्यांच्या या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करत जलसंपदा विभागाने कॅन्टोन्मेन्टसाठी नवीन दर ३ रु १५ पैसे असा असणार आहे. नव्या दरानुसार निर्माण झालेल्या तफावतीमुळे झालेला फरक वजा जाता ती थकबाकी ७ लाख ५७ हजारांवर आली आहे. त्याच प्रमाणे यापुढेही जेवढे पाणी वापर होईल, तेवढीच आकारणी करण्याचे ठरविण्यात आल्याची माहिति उपाध्यक्ष सचिन ठाकरे यांनी दिली. या निर्णयाचे सर्व सदस्यांनी स्वागत केले आहे.

पाणीपुरवठा नियमित होणार

अनियमित होणारा पाणी पुरवठ्यासंदर्भात एडम कमांडन्ट कर्नल जे. एस. ब्रार, गेरीसन इंजिनिअर मेजर अमित शर्मा, बाबुराव मोजाड, दिनकर आढाव, तानाजी करंजकर, मीना करंजकर, प्रभावती धिवरे, आशा गोडसे, कावेरी कासार, जलअभियंता आर. सी. यादव आदींनी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील बाफणा यांची भेट घेऊन पाणीटंचाईचा प्रश्न मांडला. याबाबत बाफणा यांनी सकारात्मक निर्णय घेत २१ एप्रिल रोजी पाण्याचे आवर्तन सोडण्याचे मान्य केले. बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर संजीव तिवारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मोलाचे मार्गदर्शन केल्याने हा प्रश्न निकाली निघाल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रकाश लोंढेंना महासभेचे अभय

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सातपूरमधील धम्मतीर्थ विहारच्या अतिक्रमणासंदर्भात आरपीआयचे नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या विरोधात कोणाताही सबळ पुरावा व दस्तावेज नसल्याचे शिक्कामोर्तब करीत महासभेने त्यांच्या नगरसेवकपदाला अभय दिला आहे. व्यावसायिक रतन लथ यांचे लोंढे यांना बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचे सांगून हा महासभेचाच अपमान असल्याचा दावा सदस्यांनी केला आहे. सर्व नगरसेवक एकजूट करून लोंढेंच्या बाजूने उभे राहिल्याने महापौरांनी आपला कौल लोंढेंच्या बाजून देत आयुक्तांचा प्रस्ताव रद्दबातल ठरविला. दरम्यान, लथ यांनी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.

सातपूरमधील अतिक्रमीत धम्मतीर्थ विहार हे नगरसेवक प्रकाश लोंढे यांचे असल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी फ्रवशी अॅकेडमीचे संचालक रतन लथ यांनी उच्च न्यायालयात केली होती. त्यामुळे उच्च न्यायालयाने या अतिक्रमणाबाबत आयुक्तांनी चौकशी करून अहवाल महासभेपुढे ठेवावा आणि त्यांच्या नगरसेवकपदाचा फैसला करावा, असे आदेश दिले होते. त्यानुसार शनिवारच्या महासभेत आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी अहवालासह प्रस्ताव सादर केला. त्यात दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर लोंढेंचा अतिक्रमणाशी संबध नसल्याचे नमूद केले होते. त्यामुळे महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी लोंढेंच्या बाजूने आपला कौल दिला.

अनधिकृत अतिक्रमणासंदर्भात लोंढे यांना कोणतीही नोटीस नसताना हा प्रस्ताव महासभेत आलाच कसा असा सवाल सुधाकर बडगुजर यांनी उपस्थित केला. हे नगरसेवकाला बदनाम करण्याचे षडयंत्र असून, आयुक्तांचा प्रस्तावही चुकीचा असल्याचा दावा त्यांनी केला. तर, उत्तम कांबळे यांनी लथ यांची याचिका आकसापोटी असल्याचा आरोप केला. नालंदा एज्युकेशन ट्रस्टची हे धम्मतीर्थ असून लोंढेंचा संबंध नसल्याचा दावा केला. संभाजी मोरूस्कर यांनी पराभवाने खचून विरोधकांनी हे कृत्य केले असून, २०१७ ची निवडणूक लोंढेंच्या विरोधात लढा आणि जिंका असा सल्ला दिला. अजय बोरस्ते यांनी हे डॉकेट शहरात धार्मिक तेढ वाढविणारे असल्याचा दावा केला. महासभा ही नाशिकच्या विकासासाठी असून, अतिक्रमणाचा किंवा कोणाचे पद घालवण्यासाठी नाही असे सांगून शहरात किती मंदिरे व मशिदी अनधिकृत आहेत, ते सांगा असा उलट सवाल प्रशासनाला केला.

संजय चव्हाण, राहुल दिवे, यशवंत निकुळे, प्रा. कुणाल वाघ, मनसे गटनेता अनिल मटाले, सभागृहनेते सलिम शेख, विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, उपमहापौर गुरुमीत बग्गा यांच्यासह सर्वांनी लोंढेंच्या बाजूने कौल दिला. हा नगरसेवकांविरुद्धचा हल्ला असून, परतवून लावण्याचे आवाहन केले. धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगत लथ यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे महापौरांनी लोंढेंच्या विरोधात या अतिक्रमणासंदर्भात कोणाताही पुरावा नसल्याने हा प्रस्ताव रद्दबातल ठरवला. त्यामुळे लोंढेच्या नगरसेवकपदाला अभय मिळाले आहे.

अॅड. ढिकलेंसाठी अर्धातास सभा तहकूब

माजी महापौर व आमदार अॅड. उत्तमराव ढिकले यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महासभा तहकूब केली जाणार अशी चर्चा होती. मात्र, सत्ताधाऱ्यांनी नियमावली संदर्भात कठोरता दाखवत केवळ अर्ध्या तासासाठी सभा तहकूब करून ढिकलेंना श्रद्धांजली वाहिली. महापालिकेच्या नियमावलीनुसार विद्यमान सदस्याचा मृत्यू झाला तरच महासभा तहकूब करता येणार आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी नियमावलीचे पालन करीत महासभा कायम ठेवली.

अतिक्रमणा संदर्भात कोणतीही नोटीस नसताना तसेच माझा संबंध नसताना माझ्याविरुद्ध कटकारस्थान केले जात आहे. लथ यांनीच अनेक ठिकाणी अतिक्रमण केले आहे. खोटे दस्ताऐवज करून लोकांच्या जमिनी लाटल्या. अशांतता पसरवण्याचा लथ यांचा प्रयत्न असून, त्यांच्याकडे कोट्यवधीची संपत्ती अल्पावधीत आली कशी असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपल्या पित्यालाही त्यांनी सोडले नाही.

- प्रकाश लोंढे, नगरसेवक

महासभेचा निर्णय लोंढेंच्या बाजूने जाणार याची खात्री होती. लोंढेंच्या दबावाखाली येऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे लोंढेंचे प्रकरण पुन्हा उच्च न्यायालयात घेऊन जाणार असून, माझ्याकडे संपूर्ण पुरावे आहेत. न्यायालयात मला शंभर टक्के न्याय मिळणार.

- रतन लथ, तक्रारदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जातपडताळणी अधिकारी नेमणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

जात पडताळणी कार्यालयात संभाजी ब्रिगेडने दोन तास ठिय्या आंदोलन देत घोषणांनी कार्यालय दणाणून सोडले. येत्या मंगळवारपासून जातपडताळणी अधिकारी नियुक्त करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

नासर्डी पुलाजवळील समाज कल्याण कार्यालयापुढे हे आंदोलन झाले. जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ, प्रदेश संघटक गणेश कदम, महानगरप्रमुख नितीन रोटे पाटील, सरचिटणीस जयप्रकाश गायकवाड, नाशिकरोड विभागप्रमुख राजाभाऊ जाधव आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले. कायमस्वरुपी अधिकारी नियुक्त करावा, भ्रष्टाचार संपवावा, एजंट आणि अधिकारी यांची

साखळी उद्ध्वस्त करावी, अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

जातपडताळणी अधिकारी राजेंद्र कल्लाळ यांनी मंगळवारपासून अधिकारी नियुक्त करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात शुभम मुठाळ, भीमा सातपुते, सुभाष वाघ, चेतन माळवे, नितीन टिळे, राहुल जाधव, प्रकाश बर्डे आदींनी सहभाग घेतला.

जात पडताळणी कार्यालयात नागरिकांची कोणत्याही कारणास्तव अडवणूक होत असल्यास अथवा कामाला विलंब होत असल्यास संभाजी ब्रिगेडशी संपर्क साधावा.

- योगेश निसाळ, जिल्हाध्यक्ष, संभाजी बिग्रेड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोडचा हॅपी स्ट्रीट बहरला

0
0

मटा टीम

वाहनांची गर्दी, कर्णकर्कश हॉर्न आणि सततचा ट्रॅफिक जाम... या 'रूटिन' पेक्षा वेगळा शांत, मोकळा रस्ता आणि जोडीला ताजी, शुद्ध प्रदूषण मुक्त हवा, फक्त आणि फक्त कलेचा आणि खेळांचा अस्वाद... हे नाशिकरोडकरांचे स्वप्न प्रत्यक्षात आलं होतं. निमित्त होते 'महाराष्ट्र टाइम्स'ने आयोजित केलेल्या हॅपी स्ट्रीट उपक्रमाचे.

'महाराष्ट्र टाइम्स' आपल्या वाचकांसाठी नेहमी वेगवेगळे उपक्रम राबव‌ति असतो. रविवारी (१८ एप्रिल) रोजी नाशिककरोडकरांसाठी 'महाराष्ट्र टाइम्स'ने हॅपी स्ट्रीट या उपक्रमांतर्गत आनंदाची पर्वणी आणली होती. या उपक्रमाला वाचकांनी अभूतपूर्व प्रतिसाद देत 'मटा'वरचा विश्वास आणखी दृढ केला. बिटको चौक ते कोठारी कन्या शाळा या मार्गावर विविध कलांचे सादरीकरण करुन नागरिकांचा रविवार सुखद केला. सुरुवातीला अगदी स्वप्नवत वाटणारा उपक्रम प्रत्यक्षात येताना डोळ्याचे पारणे फिटणारा ठरला. नेहमी गोंगाट असलेल्या रोडवर मटाने, विविध कलांचे सादरीकरण करीत वाचकांनाही सहभागी करुन घेतले, बिटको चौकातून जेलरोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर झुंबा डान्सचे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. डान्स हा शरीरासाठी किती उपयुक्त असतो आणि त्यातून कशी उर्जा मिळते हे नृत्याच्या विविध हालचालीतून दाखवण्यात आले. सुरुवातीला वेस्टर्न म्युझिक त्यानंतर बॉलिवूडच्या गीतांनी आबाल वृध्दांना ताल धरायला लावला. अनेकांना हा प्रकार नवीन असल्याने त्याविषयी अनेक जण जाणून घेत होते. त्याच्या लगतच ज्येष्ठ चित्रकार रमेश जाधव यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. रोजच्या जगण्यातील दृष्ये त्यांनी वॉटर कलरच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे चितारली होती. रंगाचे जाडथर त्यात मिसळलेल्या पाण्याच्या मिश्रणातून तयार झालेल्या शेड, घराच्या दृष्यातील गंजलेल्या पत्र्यांचे शेडींग हुबेहूब दिसत होते. समोर असलेले फुल अलगद उचलून घ्यावे, अशी न‌सिर्गचित्र काढली होती. निसर्ग छायाचित्रकार प्रविण अस्वले यांनी काढलेल्या सकाळच्या वातावरणातील निसर्ग चित्रे मोहीत करणारी होती. त्यांनी सादर केलेलं प्रदर्शन पाहण्यासाठी रांगा लागल्या होत्या. डोंगरदऱ्या पालथ्या घालून त्यांनी छायाचित्र काढली होती. कलाकाराने आपली कला कुठेही सादर करावी त्यांला बंधन नसावे, म्हणून निधी अग्रवाल यांच्या ग्रुपने स्ट्रिट पेंटिंगचे आयोजन केले होते. यात लहान मुलांनीही आपल्या आवडीची चित्रे काढली.

सुनिता देशपांडे यांचे कॅनव्हॉस वरील पेंटिंग अत्यंत अल्हाददायक होते. त्याच्या फुलाच्या पेंटिंगला भरपूर प्रतिसाद मिळाला. हॅपी स्ट्रीटमध्ये वयाचे बंधन नसल्याने कुणीही आपली कला सादर करीत होता. तरुणाईला हवेसे वाटणारे टॅटू आणि नेल आर्ट यानी रंगत आणली. नेल आर्टमध्ये स्ट‌किर, ट्युब्स, क्रिस्टल, स्ट्रक्चरवर्क, फ्रेंच इत्यादी प्रकार नागरिकांना शिकविण्यात आले. त्याच प्रमाणे इंड‌यिन आणि वेस्टर्न, परमानंट व रिमुव्हेबल टॅटू काढण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत रांगा लागल्या होत्या. पारंपरिक पध्दतीने काढलेले वारली पेंटिंग रसिकांची दाद घेऊन गेले. ताशांचा कडकडाट, आराध्य ढोलचा निनादाने वातावरण अगदी उत्सवमय झाले होते.

सेल्फी काढण्याची धडपड

नाशिकरोडमध्ये प्रथमच हॅपी स्ट्रीटचा कार्यक्रम होत असल्याने या कार्यक्रमाचे आपण साक्षीदार आहोत हे टिपण्यासाठी तरुण तरुणींचे घोळके सेल्फी काढण्यात दंग होते. अनेकांनी आपण काढलेले फोटो व्हॉट्सअपवर टाकून इतरांनाही पुढच्या रविवारी येण्याचे आवाहन केले.

हॅपी स्ट्रीट आपल्या परिसरात होत असल्याने तो यशस्वी व्हावा यासाठी प्रत्येक नागरिक झटत होता. अनेक नगरसेवक, नगरसेविका, सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक, उद्योगपती, व्यापारी, नोकरदार या उपक्रमात सामिल झाले होते. पुढील रविवारी आणखी जास्त संख्येने आम्ही हजर राहू, अशी ग्वाही अनेकांनी दिली. नाशिकरोडमध्ये 'मटा'ने प्रथमच असा उपक्रम राबविल्याने अनेकांनी 'मटा'वर अभिनंदनाचा वर्षाव केला. निवासी संपादक शैलेंद्र तनपूरे यांना प्रत्यक्ष भेटून हा उपक्रम सुरु ठेवावा अशी विनंती केली.

टॅटूची क्रेझ

सौरभ नांदकर व प्रशांत पाक्तेकर यांच्या टॅटू स्टॉलवर बच्चे कंपनीने एकच कल्ला केला होता. टॅटू काढण्यासाठी सर्वच वयोगटातील लोकांमध्ये टॅटूची क्रेझ पहायला मिळत होती. लहान मुलांचा प्रतिसाद जास्त होता. स्वतःच्या नावाचे टॅटू काढण्याकडे बऱ्याच जणांचा कल होता. तसेच काहींनी शिवाजी महाराज व नॅचरल डिझाइनचे टॅटू काढणे पसंत केले. पर्मनंट व टेंपररी अशा दोन प्रकारात टॅटू उपलब्ध होते.

धमाका हास्याचा

अॅड. बबन मुठाळ यांच्या निसर्गानंद हास्य क्लबने सर्वांचच लक्ष वेधलं. या क्लबमध्ये ८० सदस्य आहेत. या अॅक्टला प्रेक्षकांचा सुपर डुपर प्रतिसाद मिळाला. खुमासदार विनोद, हसण्याच्या विचित्र पद्धती यामुळे प्रेक्षकांच भरपूर मनोरंजन झालं. या क्लबच्या अॅक्टमुळे सर्व स्तरातील लोकांना मस्त विरंगुळा मिळाला.

कॅनव्हास पेंटिंग

सुनिता देशपांडे व साथीदार यांच्या स्टॉलवर महिलांची गर्दी लक्षणीय होती. येथे रूमाल व कॅनव्हासवरील पेंटिंगचे प्रदर्शन मांडलेले होते. रूमालावर काढलेल्या हँड अॅम्ब्रोडरी व वारली पेंटिंग विशेष लक्ष वेधत होत्या. कॅनव्हासवर अॅक्रेलिक कलर्सचा वापर करून फ्री स्टाईल, भावनिक व नेचर पद्धतीची पेंटिंग्स काढली होती. या या सर्वांतून हँकरचिफ पेंटिंग आकर्षक होत्या.

ड्रम्सचा तडका

विनेश नायर व ग्रूप यांच्या ड्रम्स सादरीकरणाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. या ग्रूपमध्ये विनेशसोबत आस्था कुकरेजा, लावण्या चव्हाण, गणेश जाधव, ओजस गायकवाड यांनी आपलं टॅलेंट सादर केलं. स्प‌निोलॉजी ड्रम प्ले प्रकाराला अधिक पसंती मिळाली. सेव्हन एट पॅटर्न, डबल बेस यांनी दाद मिळवली.

लँडस्केप व फ्लॉरल फोटोग्राफी

प्रवीण अस्वले यांच्या लँडस्केप व फ्लॉरल फोटोग्राफी प्रदर्शनास भन्नाट प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनात २५ फोटोग्राफरचा समावेश होता. नाशिकच्या आजूबाजूचा परिसर, जैवविविधता व फुलांचे फोटोग्राफ्स या थीमचा वापर फोटोग्राफीत करण्यात आला होता. द रूट व लीफ पॅटर्न या फोटोग्राफ्सना विशेष पसंती मिळाली.

झुम्बा झुम्बा...

नाशिकरोडला सकाळी श्रध्दा जोशी यांच्या 'द डान्स स्टुड‌िओ' तर्फे झुम्बा आयोजित करण्यात आला होता. यावेळी यात अनेक नाशिककर अबालवृध्दांनी झुम्बाच्या तालावर झुम्बा करत संडे मॉर्निंगची सुरूवात केली. अनेक तरूणींनी झुम्बा करते वेळी सेल्फीही काढल्या. काठ‌यिावाडी ड्रेस परिधान करून राजस्थानी जॉगर्स ग्रुप येथे झुम्बा करत सर्वांच लक्ष्य वेधत होते.

ग्रिटिंग्जनी वेधले लक्ष

रूपा पाटील यांच्याकडून ग्रिटिंग्स ठेवण्यात आली होती. यात वारली आर्ट, निसर्ग चित्रे आणि विविध वैविध्यपूर्ण ग्रिटिंग्स नागरिकांचे लक्ष्य वेधत होती. यात प्रामुख्याने गिटार आणि कोटच्या आकाराची ग्रिटिंग्स लक्ष्य वेधत होती.

वारली पेंटिंग

सौरभ सोनवणे यांची वारली कला चित्रप्रदर्शन यात होते. यामध्ये वारली कलर पेंटिंग, वारली पेंट वॉच, रेम्बो, तारपा, वारली पेंट्स केलेल फ्लावर पॉट्स आणि पेपर बॅग तसेच टायपिंग वारली पेंटिंगही होती. याकडे अनेक नागरिक उत्सुकतेने पहात होती.

बचपन गली

बचपन गलीमध्ये आजच्या हॅपी स्ट्रीटमध्ये अबालवृध्दांसोबत अनेकांनी सहभाग घेतला. लहानांसोबतच गोट्या खेळण्याचा मोह अनेकांनी घेतला. तसेच लहानग्यांनी रिंग डान्सही केला. त्याचसोबत बॅडमिंटन, स्किपिंग यावरही अनेकांनी कुशलता दाखवली.

अनोखी कॅलीग्राफी

चिंतामण पगार आणि नितीन गायधनी यांच्यातर्फे कॅलीग्राफी ही कला सादर केली होती. यामध्ये नेम्स मेकिंग, आर्ट मेकिंग आणि शेप्स मेकिंग हे होते. त्यांनी नागरिकांना डेमो दाखवले तसेच नागरिकांनी आपल्या नावाची कॅलीग्राफी स्टाईल्स नेम्स त्यांच्याकडून तयार करून घेतले.

ढोलचा नाद खुळा

अमोल गोलवाडकर यांचे अराध्य ढोल पथकाने हॅपी स्ट्रीटची शोभा वाढवली. संपूर्ण हॅपी स्ट्रीटवर अराध्यचा ढोलचा आवाज गुंजत होता. अनेकांनी या ढोलच्या तालावर ठेकाही धरला. यावेळी अराध्यने शिवस्तुती, एटबीट्स आणि नाशिक ढोल यांच्या ताल धरला.

स्ट्र‌ीट आर्ट

निधी आग्रवाल यांच्या फितुर ग्रुपतर्फे स्ट्रीट आर्ट होतं. यामध्ये त्यांनी नागरिकांना आर्ट करायला लावलं होतं. नागरिकांच्या कलेतून, प्राणी, फुलं, मानवी चेहरे आणि हॅपी स्ट्रीटचे अनेक संदेश देणारे चित्र रेखाटण्यात आले.

बासरीचे अनोखे सूर

इस्ट अॅण्ड वेस्ट म्युझिक कंपनी आणि जॉय म्युजिक अॅकॅडमी यांच्यातर्फे बासरी व गिटार वादनाचा कार्यक्रम होता. 'आशिकी' चित्रपटातील च्या गाण्यावर गिटारची अन् बासरीची धून पडताच नागरिकांनी गर्दीचा टाळ्यांचा कडाडून प्रतिसाद मिळाला.

संकलन- फणींद्र मंडलिक, अश्विनी पाटील, पवन बोरस्ते, सौरव बेंडाळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडला लवकरच नगराध्यक्षाची निवड

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाडचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांचा कार्यकाळ संपला आहे. यामुळे सत्ताधारी शहर विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार पंकज भुजबळ सांगतील त्याच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व माजी नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे यांनी याबाबत राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयात पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी पगारे यांनी नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्या कामाचे कौतुक केले. त्यांच्या कारकीर्दीत शहराच्या पाणीपुरवठ्याचे अचूक नियोजन, सार्वजनिक आरोग्य व स्वच्छतेत सुधारणा, पथदिव्यांचा प्रश्न आदी बाबतीत चांगली कामगिरी झाल्याची माहिती दिली. योगेश पाटील यांनी पालिकेच्या कारभाराबद्दल जनतेत चांगली प्रतिमा निर्माण केली म्हणूनच घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीत विक्रमी वाढ झाल्याचे राजाभाऊ पगारे यांनी नमूद केले. नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी पाणीपुरवठा यंत्रणेकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन सात दिवसाआड पाणीपुरवठा शक्य केला आहे. आपला शब्द पाळल्याचे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मतदारयादी तयारीला मुहूर्त

0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

तब्बल चौदाशे कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक घेण्यासाठी पणन व सहकार विभागाने आदेश दिल्यानंतर आजपासून (दि. २०) मतदारयाद्या तयार करण्याचे काम सुरू होत आहे. सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर दि. २२ मे रोजी अंतिम मतदारयादी प्रसिध्द होणार आहे.

जिल्ह्यातील महत्वाची बाजार समिती असलेल्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या निवडणुकीचे आदेशानुसार अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी बाजार समितीच्या मतदारयाद्या तयार करण्याचा आदेश जारी केला. मतदारयाद्या तयार करण्याची जबाबदारी सुध्दा निश्चित केली आहे. त्यानुसार आजपासून पिंपळगाव बाजार समितीच्या सोसायटी, ग्रामपंचायत, व्यापारी व हमाल मापारी मतदार संघाच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू होत आहे. दि. २९ एप्रिलपर्यंत सर्व मतदारसंघातील मतदारयादी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर दि. ३० एप्रिलरोजी मतदारयादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. प्रसिध्द झालेल्या मतदार यादीवर ११ मे पर्यंत आक्षेप व हरकती नोंदवण्याची मुदत आहे. दि. २१ मे रोजी आक्षेप व हरकतींवर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात निर्णय होईल. दि. २२ मे रोजी अंतिम यादी प्रसिध्द होईल.

दरम्यान, पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत निफाड तालुक्यातील ६९ गावांचे कार्यक्षेत्र आहे. बाजार समितीत सोसायटी गट १३ जागा, त्यापैकी एक जागा आर्थिक दुर्बल व दोन जागा महिला राखीव आहेत. अकरा जागा सर्वसाधारण गटासाठी आहेत. ग्रामपंचायत गटासाठी चार जागा आहेत. व्यापारी गटातून दोन व हमाल मापारी गटासाठी एक जागा आहे. याशिवाय प्रक्रिया गटातून एक स्थानिक ग्रामपंचायतमधून एक व पंचायत समितीतून एक जागा आहे, असे एकूण २३ सदस्यांचे संचालक मंडल असेल. निवडणूक मात्र २० जागांसाठी होईल. स्थानिक ग्रामपंचायत व पंचायत समितीतील सदस्य ठरावानुसार बाजार समितीत संचालक होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्वस्त होण्यासाठी धावपळ

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान, वारकरी संप्रदायचे आद्य संस्थापक संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर संस्थानचे विश्वस्त होण्यासाठी इच्छुकांची कागदपत्र पुरावे जमा करण्यासाठी धावपळ सुरू आहे. संत निवृत्तीनाथ महाराज विश्वस्त मंदिर न्यास बाबत काही महिन्यांपूर्वी न्यायालयीन निवाडा होऊन सुधारीत योजना लागू झाली आहे. त्यानुसार नाशिक धर्मदाय आयुक्तांनी विश्वस्तपदासाठी अर्ज मागविले आहेत.

सुधारीत योजनेनुसार एकूण १३ विश्वस्त असतील. यामध्ये पुजारी गोसावी कुटुंबीयांचे तीन सदस्य व त्र्यंबक नगरपालिकेचे मुख्याधिकारी असे चार पदसिध्द सदस्य आहेत. उर्वरित नऊ सदस्य जिल्ह्यातील कायम रहिवासी असलेल्या वारकरी भाविकांमधून निवड करावयाची आहे. त्याकरिता दि. १३ ते २४ एप्रिल २०१५ पर्यंत इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. दि. ५ ते ८ मे पर्यंत मुलाखती होणार आहेत.

सन १९९२ दरम्यान विश्वस्त मंडळ अस्तित्वात आल्यानंतर न्यायालयीन दावे सुरू झाले. दरम्यानच्या कालावधीत वारकरी व भाविकांच्या सुविधांबाबत तसेच, विविध कारणांनी सातत्याने विश्वस्त मंडळ चर्चेत राहिले. न्यायालयीन आदेशाने नवीन विश्वस्त मंडळाची नेमणूक प्रक्रिया नाशिक धर्मदाय उपायुक्तांनी जाहीर केली आहे. श्री संत निवृत्तीनाथ समाधी मंदिर ट्रस्ट येथे विश्वस्त होण्यासाठी इच्छुकांची संख्या बरीच मोठी असल्याचे दिसून येत आहे. दिनांक २४ एप्रिल २०१५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. त्र्यंबक येथे संगणक केंद्रावर अर्जनमुने व दाखले टंकलिखित करण्यासाठी होणारी गर्दी पाहता अनेकांच्या इच्छा आकांक्षांना पालवी फुटली असल्याचे चित्र आहे. अर्थात नऊ विश्वस्त असल्याने संधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणांच्या तालुक्यातच टंचाई

0
0

इगतपुरी तालुक्यात टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची वाढती मागणी

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्याला धरणांचा तालुका म्हणून संबोधले जाते. मात्र, या तालुक्यलाही सध्या तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी, चिंचलेखैरे, खडकेद या तीन गावांनी तत्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, तसेच मुकणे धरणातूनही आवर्तन सोडावे, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

सध्या जिल्ह्यात ४१ गावे व १०७ वाड्यांना २७ टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. इगतपुरी तालुक्याला पाण्याचे कोठार समाजले जात असले तरी डोंगराळ भाग असल्याने अटणारे पाण्याचे स्रोत, कमकुवत योजना, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, अधिकाऱ्यांचा कानाडोळा, वीजमंडळाची अनास्था यामुळे अनेक योजना बंद पडत असल्याने तालुक्यालाही पाणीटंचाईची झळ बसत आहे. आजही अनेक गावांमधे पाण्याचे स्रोत आटल्याने ग्रामीण भागातील अनेक महिलांना दूरवरून मिळेल त्या ठिकाणावरून पाणी आणावे लागत आहे.

गेल्या आठवड्यातच डोंगराळ भागातील आंबेवाडी, चिंचलेखैरे तसेच खडकेद या गावातील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्याची मागणी केली आहे. या गावात पाणी पुरावठ्यासाठी सार्वजनिक विहिरी आहेत. मात्र, या विहिरींनी तळ गाठल्याने येथील नागरिकांना विशेषतः महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याबाबत प्रशासनाकडे मागणी करूनही अद्यापपर्यंत कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. तालुक्याकडे पाण्याचे टँकर मागावे तर लवकर मिळत नाही, प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी केली तर, या मागणीकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. यामुळे पिण्याचे पाणी मागावे तरी कुणाकडे? असा गंभीर प्रश्न टंचाईग्रस्त गावांना पडला आहे.

इगतपुरी तालुक्याजवळच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेरवळ, धाडोशी, सामुंडी, गणेशगाव -विनायकनगर, कौलपेंढा, उंबरदरी या गावांना, वाड्यापाड्यांना भीषण पाणीटंचाई जाणवत असतानाही अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. पंधरा दिवसापूर्वीच याबाबतचे प्रस्ताव, निवेदन देऊनही दखल घेतली जात नाही. या गावांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे.

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक गावांना भीषण पाणीटंचाई जाणवत असतानाही अद्यापपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला गेला नाही. या गावांना तत्काळ पाणीपुरवरठा करावा, अन्यथा तहसील व प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल.

- भगवान मधे, जिल्हा सरचिटणीस, श्रमजीवी संघटना

मुकणे धरणातून आवर्तन द्या

इगतपुरी तालुक्यातील पाडळी, जानोरी, अस्वली, बेलगाव कुऱ्हे, नांदुरवैद्य या परिसरातही पाण्याची स्थिती भीषण झाली आहे. पाणी आटल्याने पाणीपुरवठा योजना बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. याची तत्काळ दखल घेऊन प्रशासनाने विनाविलंब मुकणे धरणातून पाण्याचे आवर्तन सोडावे, अशी मागणी युवा कार्यकर्ते बाळासाहेब भोर यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांमुळे आयुष्य खडतर

0
0

खडीकरणानंतर प्रतीक्षा डांबरीकरणाची; पिण्याच्या पाण्यासाठीही रहिवाशांचा संघर्ष

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

बालगृह रोड येथील ओम शांतीनगर व भीमवाडी भागात परिसराच्या अंतर्गत अरुंद रस्त्यांच्या विस्ताराची स्थानिक नागरिकांना प्रतीक्षा आहे. तसेच या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

काही वर्षापूर्वी या परिसरातील नागरिकांनी सातत्याने कॅन्टोन्मेन्ट प्रशासनाकडे पाठपुरावा करत खडीकरण करून घेतले; मात्र या खडीकरणामुळे रोगापेक्षा इलाज भयंकर अशीच अवस्था रहिवाशांची झाली आहे. या खडीकरण झालेल्या रस्त्याचे डांबरीकरण होणार तरी कधी याची स्थानिकांना प्रतीक्षा आलेल आहे. डांबरीकरणच न झाल्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालविणेच काय तर पायी चालणेही कठीण झाले आहे. या भागात काही अपघात किंवा आपत्ती कोसळल्यास अग्निशमन दलाचा बंब किंवा रुग्णवाहिका जाऊ शकेल, इतका सुद्धा रस्ता नाही.

पाण्यासाठी जागरण

सर्वसाधारण कर्मचारी राहत असलेल्या या भागातील नागरिकांना पिण्यासाठीचे पाणी देखील मुबलक प्रमाणात मिळत नसल्याने महिला वर्गाचे पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी हाल होत आहेत. प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या पाण्याच्या नळाला रात्री तीन वाजता पाणी येते. गटारांची अवस्था तर अधिकच गंभीर बनली आहे. रस्त्याच्या मधोमध पाणी वाहते. परिसरात बागडणारी लहान मुले या गटाराच्या पाण्यात पाय टाकून चालतात. यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.

पथदीपांमुळे गैरसोयच अधिक

रस्त्यावर असलेल्या विजेचे खांब नागरिकांच्या सोयीसाठी की गैरसोय वाढविण्यासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण रस्त्याच्या मधोमध उभारण्यात आलेल्या विजेच्या खांबांमुळे वाहने चालविणेही कठीण झाले आहे. याशिवाय या पथदीपांमध्ये कधी अधून मधून विजेचा प्रवाह उतरतो. या विजेच्या झटक्याचा हादरा देणारा अनुभव केवळ लहानग्यांनाच नव्हे तर मोठ्या व्यक्तींच्याही वाट्याला आला आहे.

गटारांची बांधणी करावी

ओम शांतीनगरातील अंतर्गत रस्त्यांवर पावसाळ्यात गुडघ्याएवढे पाणी साचते. त्यामुळे येणे जाणे देखील कठीण होते. प्रशासनाच्या वतीने अंतर्गत भागात गटारांची निर्मिती करण्यात आली तर ही समस्या कायमची मिटू शकते. याच वार्डातून प्रशासनास सर्वाधिक महसूल प्राप्त होतो. मात्र, सुविधांचा अभाव कायम आहेच. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी या बाबत लक्ष घालून समस्यांचे निराकरण करावे अशी स्थानिकांची मागणी आहे.

कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा सुरळीत करून नागरिकांना मुबलक पाणी मिळेल याची प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी दखल घेत योग्य प्रयत्न करण्याची गरज आहे.

- जिजाबाई निकम

रस्त्यातील विजेचे खांब आणि अरुंद रस्त्यामुळे वाहने चालवितांना आमची कसरत होते. वीज महावितरण कंपनीने या प्रश्नाकडे लक्ष देत विजेचे खांब रस्त्यातून दूर करावे.- अशोक गायकवाड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलनाच्या पीडा डॉक्युमेन्ट्रीतून

0
0

आंदोलनाची तरुणाईला भुरळ

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

सामाजिक आंदोलनांची भुरळ तरुणाईला पडत चालली आहे. युवकांच्या संवेदनशिलता, जिंदादिलीचे ते लक्षण आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे असो की मेधा पाटकर. त्यांच्या आंदोलनात उच्चशिक्षत तरुणांचा सहभाग वाढू लागला आहे.

नर्मदा प्रकल्पग्रस्तांनी मेधा पाटकरांच्या नेतृत्वाखाली नाशिकरोडच्या विभागीय महसूल कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. एचपीटी कॉलेजचा फॅन्टास्टिक फाईव्ह ग्रुप नर्मदा आंदोलनावर डॉक्युमेन्ट्री तयार करत आहे. यू ट्यूब आणि व्हॉटसअपवर ती लोड केली जाणार आहे. आंदोलनाची निगेटीव्ह आणि पॉझिटिव्ह बाजू समाजासमोर मांडण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न वाखणण्याजोगाच आहे. या ग्रुपमधील प्रणील धनदर एम. ए. पॉलिटिक्स करतोय. तो तीन वर्षे मर्चंट नेव्हीमध्ये होता. त्याचे वडिल चर्चचे धर्मगुरू आहेत. शेतकरी कुटुंबातील विवेक चित्ते बी. ई. मेकॅनिकल झाला असून एम. ए. जर्मन कोर्स करत आहे. पूजा तिवारीचे वडील पोलिस अधिकारी आहेत. ती बी. ई. कम्प्युटर असून एम. ए. इकोनॉमिक्स करत आहे.

काजल बोरस्तेचे वडिल बिझनेसमन आहे. ती बीएससी फिजिक्स झाली असून आता एम. जे. एम. सी. हा पत्रकाराचा कोर्स करत आहे. सुरेश नखाते एम. ए. पॉलिटिक्स करत आहे. त्याला तर पक्के समाजसेवकच व्हायचय. यूपीएससीची तयारीही हा ग्रुप करत आहे. हा ग्रुप

शेखर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पावसाळ्यात सातपूरच्या फाशीच्या डोंगरावर दहा हजार झाडे लावणार आहे.

आसामचेही विद्यार्थी

कंगणा, प्रस्तुती आणि ग्रेसी या आसाममधील टाटा इन्स्टिट्यूटमध्ये एम. एस. डब्ल्यू हा कोर्स करत आहेत. कंगणाचे वडिल बँकेत अधिकारी तर प्रस्तुतीचे वडिल व्यापारी आणि आई शिक्षिका आहे. अभ्यासक्रमाचा भाग म्हणून त्या महिनाभरापासून नर्मदा प्रकल्पग्रस्तांसमवेत उन्हातान्हात फिरत आहेत. उपाशीपोटी झोपत आहेत. पोलिसांच्या लाठ्या खात आहेत. ज्या कामात आनंद मिळतो तेच करा असे मेधादीदींनी सांगितल्याने त्यांनी समाजसेवक होण्याचा निर्धार केला आहे. आंदोलनाचे नेतृत्व करणारी लतिका राजपूत एम. ए. आणि एमसीएम आहे. दुसऱ्या नेत्या योगिनी खानोलकर मुंबईतून एल. एल. बी., एल. एल. एम. झाल्या आहेत. आदिवासींमध्ये शिक्षण, कायदे, आरोग्य जागृतीचे काम ही युवा मंडळी करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंटरनेट वापरताना बेपर्वाही नको

0
0

सायबरतज्ज्ञ रक्षित टंडन यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सोशल मीडिया आणि ऑनलाइन व्यवहार ही काळाची गरज असली, तरीदेखील त्याचा अत्यंत जबाबदारीने आणि तितकाच सुरक्षितपणे वापर करण्याची काळजी आपण स्वतःच घेतली पाहिजे. तंत्रज्ञानाला घाबरून दूर राहण्यापेक्षा त्याला समजून घेत त्याचा प्रभावी वापर करा, असे प्रतिपादन गुरगाव यूपी पोलिसांच्या सायबर क्राइम सेलचे सल्लागार तथा इंटरनेट अॅण्ड मोबाइल असोसिएशनचे कन्सल्टंट, ज्येष्ठ सायबरतज्ज्ञ रक्षित टंडन यांनी केले.

जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन संस्थेतर्फे महाकवी कालिदास कलामंदिरात सायबर सिक्युरिटी' या विषयावर व्याख्यान झाले. टंडन पुढे म्हणाले की, काही मूलभूत सोप्या बाबी लक्षात ठेवल्यास तंत्रज्ञानाचा प्रभावी सुरक्षितपणे वापर करता येतो. नेट वापरणाऱ्यांना, विशेषतः महिला व लहान मुलांनी अधिक काळजी घ्यावी. फोन कॉल्स, इ-मेल अथवा ऑनलाइन व्यवहारांतील फसवणूक आपल्या निष्काळजीपणातून होत असते. त्यामुळे प्रत्येक क्षणाला सावधानता बाळगा. व्हॉट्सअॅप असो की फेसबुक यावर कुणाही अनोळखी व्यक्तीला प्रवेश देऊ नका. त्यातील सेटिंग्ज बदलून त्या अधिक सुरक्षित करा. सोशल अकाउंट्सवरील सर्वच माहिती खरी आणि सविस्तर देऊ नका. एटीएम कार्डचा वापर असो की मोबाइल, हे तुमचे वैयक्तिक असल्याने ते कुणाच्याही हाती देऊ नका. कुठल्याही आमिष दाखविणारे इ-मेल अथवा फोन कॉल्सला उत्तर देऊ नका, असा सल्लादेखील त्यांनी दिला.

यावेळी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन म्हणाले की, पारंपरिक गुन्हेगारीतही सायबर क्राइमचा वापर होऊ लागला आहे. आगामी काळात हे प्रमाण वाढणार असल्याने, आपण स्वतःही काळजी घेतली पाहिजे. हर्षित पहाडे यांनी सूत्रसंचालन केले. संघटनेचे अध्यक्ष वर्धमान लुंकड यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे स्वरूप कमलेश कोठारी यांनी स्पष्ट केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. अतुल जैन, पारस लोहाडे, अमित बाफणा, संदीप लुंकड, प्रशांत मुथा, कल्पेश सोळंकी, उज्ज्वला लुणावत आदी मान्यवर प्रयत्नशील होते.

यावेळी आमदार प्रा. देवयानी फरांदे, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, पोलिस उपायुक्त हरिष बैजल, सहायक पोलिस उपायुक्त एस. पी. गोरे, सायबर सेलचे प्रमुख आर. डी. कुटे, आयकर विभागाचे सहआयुक्त सुमेरकुमार काले, इएसडीएसचे संचालक पीयूष सोमाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सूक्ष्म नियोजनास सुरुवात

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या सूक्ष्म नियोजनास विविध विभागामार्फत सुरुवात झाली आहे. पोलिस विभागाकडून बंदोबस्त, बॅरकेडींग, पार्किंग आदी कामांचे नियोजन होत असून यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देऊन आराखडे तयार केले जात आहेत.

कुंभमेळ्यासाठी साधू-महंतांबरोबरच लाखोंच्या संख्येने भाविक शहरात दाखल होणार आहेत. अनूचित घटना टाळण्यासाठी तसेच एकाच ठिकाणी होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी सूक्ष्म नियोजनाची आवश्यकता आहे. सूक्ष्म नियोजनात अगदी बारीक बारकाव्यांचा विचार होत असून त्यादृष्टीने माहिती संकलित केली जाते आहे. पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लागलीच सिंहस्थ नियोजनाच्या दृष्टीने काम सुरू केले आहे. विविध भागांना अधिकाऱ्यासमवेत भेटी देऊन जगन्नाथन बारकावे टिपत आहेत. त्यांनी रविवारी सकाळी पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांच्यासह इतर अधिकाऱ्यासमवेत मुंबई-आग्रा हायवेसह गंगापूर आणि त्र्यंबकेश्वर रस्त्यांची पाहणी केली. कोणत्या रस्त्यावर किती पार्किंग आहेत? भाविकांना कोणत्या रस्त्याने आणयाचे? आपत्कालीन परिस्थितीचे मार्ग कोणते? याबाबत त्यांनी माहिती घेतली. पोलिस मुख्यालयात सुमारे एक हजार सातशे नवीन बॅरिकेड्स आल्या आहेत. अजूनही काही बॅरिकेड्स येणार असून गर्दीच्या नियोजनाच्या दृष्टीने त्यांचा वापर केला जाणार आहेत. कोणत्या ठिकाणी किती बॅरिकेड्सची आवश्यकता भासेल याचा या पाहणी दरम्यान अभ्यास केला जातो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हा बँकेचा बिगूल वाजला

0
0

अर्ज स्वीकृतीला आजपासून सुरुवात; १९ मे रोजी मतदान

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गत दोन वर्षांपासून भ्रष्टाचारादी प्रकारांमुळे चर्चेत असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीचा बिगूल वाजला आहे. आगामी पाच वर्षांच्या कालावधीसाठी या निवडणुकीच्या माध्यमातून संचालक मंडळाची नियुक्ती होणार आहे. सोमवारपासून (दि. २०) अर्जस स्वीकृतीला सुरुवात होणार असून १९ मे रोजी मतदान व २१ मे रोजी मतमोजणी होऊन नव्या संचालक मंडळाची नियुक्ती होणार आहे.

जिल्हा बेँकेच्या निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आता जिल्ह्यातील वातावरण तापणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा बँकेच्या कारभारावर बोट ठेवले गेले. भ्रष्टाचार अन् मनमानीसारख्या मुद्यांमुळे पुन्हा चर्चेत या बँकेवर गत वर्षभरापासून प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. आता होत असलेल्या निवडणुकीतून सन् २०१५ ते सन् २०२० या कालावधीसाठी नवे संचालक मंडळ निवडून येणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विभागीय जिल्हा उपनिबंधक सतिश खरे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तालुका उपनिबंधक जी. जी. मावळे हे काम बघणार आहेत. या निवडणूक प्रक्रियेत २१ संचालकांची निवड होणार आहे. यामध्ये १५ जागा खुल्या गटासाठी, २ महिला राखीव, १ अनुसूचित जमाती, १ विमुक्त भटक्या जमाती, १ ओबीसी, १ शेतीसंस्था यानुसार २१ जागांसाठी मतदान होईल. २४ एप्रिलपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अर्ज स्वीकृती होणार आहे. २७ एप्रिल रोजी अर्ज छाननी होईल. २८ एप्रिल रोजी अर्ज सूची प्रसिध्द होणार आहे. २८ एप्रिल ते ११ मे या कालावधीत अर्ज माघारीसाठी मुदत देण्यात आली आहे. १२ मे रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप होणार असून १९ मे रोजी मतदान होईल. २१ मे रोजी मतमोजणी होईल.

प्रारूप यादीत अन्याय

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची प्रारूप यादी तयार करताना सहकारी संस्थांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आलेली नाही. परिणामी अनेक संस्थांवर अन्याय झाला असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक पां. भा. करंजकर यांनी म्हटले आहे. सहकारी संस्थांनी मुदतीत ठराव देऊनही त्यांचा मतदार यादीत समावेश करण्यात आलेला नाही. त्यांचे ठराव नाकारताना नैसर्गिक न्याय तत्वानुसार बाजू मांडण्याची संधी देणे बंधनकारक होते. मात्र, प्रत्यक्षात ही संधी न देता मतदार यादीतून ही नावे वगळण्यात आली आहेत. नावे वगळण्याचे कारण संस्थांना लेखी स्वरूपात कळविणे गरजेचे असतानाही तसे कळविण्यात आलेले नाही. सहकार विभागाने जिल्हा बँकेस आवश्यक त्या न्यायालयीन सूचना का दिलेल्या नाहीत. त्यांनी संगनमताने मतदार संस्थांवर अन्याय केला असल्याचे करंजकर यांनी म्हटले आहे.

दोन पॅनलमध्ये चूरस

जिल्हा बँकेचे दिवंगत अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते उत्तमराव ढिकले यांचे चिरंजीव सुनील ढिकले व राजेंद्र भोसले असे दोन विरोधी पॅनल उभे राहण्याची शक्यता आहे. या दोन पॅनलमध्ये मुख्य लढत होईल. ज्येष्ठ नेते उत्तमराव ढिकले यांच्या निधनामुळे एकंदरीत बँकेची निवडणूकही प्रभावित होण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करिअरची गवसणार नवी वाट

0
0

२२ ते २५ एप्रिल दरम्यान करिअर महोत्सव

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दहावी आणि बारावीच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना वेध लागले आहेत ते पुढील शैक्षणिक प्रवेशाचे. पालकांनाही विद्यार्थ्यांच्या करिअरची मोठी चिंता आहे. हीच बाब लक्षात घेऊन 'महाराष्ट्र टाइम्स' आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने पुढील आठवड्यात करिअर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवातून विद्यार्थी व पालकांना करिअरच्या नव्या वाटा गवसणार आहेत.

विद्यार्थी दशेत बारावी ही प्रत्येकासाठी जणू टर्निंग पॉईंटच असते. हीच बाब लक्षात घेऊन 'महाराष्ट्र टाइम्स' आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यावतीने 'करिअरच्या नव्या वाटा' या विशेष मार्गदर्शन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २२ ते २५ एप्रिल दरम्यान हा महोत्सव शरणपूर रोडवरील पुणे विद्यापीठाच्या विभागीय केंद्रातील सेमिनार हॉलमध्ये होणार आहे.

या महोत्सवाच्यानिमित्ताने विद्यार्थ्यांना मौल्यवान मार्गदर्शन मिळतानाच त्यांचे भाविष्य उज्ज्वल होण्यासाठीचा मार्गही गवसणार आहे. करिअरच्या पारंपरिक मार्गांव्यतिरीक्त वेगळ्या विषयांवर त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे विद्यार्थ्यांना माहिती देणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी व पालकांच्या शंकांचे निरसनही हे तज्ज्ञ करणार आहेत.

या महोत्सवाचे उदघाटन येत्या बुधवारी (२२ एप्रिल) सकाळी ११ वाजता होणार आहे. याप्रसंगी पुणे विद्यापीठाच्या बीसीयूडीचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड, विनजीत टेक्नॉलॉजीचे सहसंस्थापक अभिजीत जुनागडे आणि पुणे विद्यापीठाच्या नाशिक केंद्राचे समन्वयक डॉ. रावसाहेब शिंदे उपस्थित राहणार आहेत.

दि. २२ ते २५ एप्रिल दरम्यान दररोज दोन विषयांवरील करिअरच्या वाटा विद्यार्थ्यांना गवसणार आहेत. त्यामुळेच दहावी व बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही हा महोत्सव मोलाचा ठरणार आहे. तसेच घडविण्यासाठी तज्ज्ञांचे मिळणारे अनमोल मार्गदर्शन विद्यार्थी व पालकांना महत्वाचे ठरणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.



महोत्सवाचे वेळापत्रक

२२ एप्रिल- बुधवार

इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी- सकाळी ११.३०- विग्नेश अय्यर, उपाध्यक्ष, विनजीत टेक्नॉलॉजी

हॉटेल मॅनेजमेंट -दुपारी १ वाजता-नितीन जाधव, प्राचार्य, हिरे कॉलेज, पंचवटी

२३ एप्रिल- गुरुवार

फॉरेस्ट- सकाळी ११ वाजता-अरविंद विसपुते, मुख्य वनसंरक्षक

मॅथ्स, स्टॅटेस्टिक्स-दुपारी १ वाजता - डॉ. दिलीप गोटखिंडीकर,

गणित तज्ज्ञ

२४ एप्रिल- शुक्रवार

इंटेरिअर डिझायनिंग- सकाळी ११ वाजता- हेमंत दुगड, अध्यक्ष, ट्रीपल आयडी

अॅग्रिकल्चर- दुपारी १ वाजता- डॉ. जयराम पूरकर, प्राचार्य, के के वाघ कॉलेज

२५ एप्रिल-शनिवार

सायकॉलॉजी-सकाळी ११ वाजता-डॉ. सुचेता कोचरगावकर, प्राचार्य, भोसला कॉलेज

खगोलशास्त्र- दुपारी १ वाजता -

डॉ. निवास पाटील, खगोलतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थ कामांसाठी धावपळ

0
0

त्र्यंबकेश्वरला अधिकाऱ्यांचे पाहणी दौरे; कामांच्या प्रगतीबाबत नाराजी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हवामान खात्याच्या अंदाजाने प्रशासन हबकले असून, २७ मे २०१५ रोजी मान्सूनला सुरुवात झाल्यास सिंहस्थ कामांच्या पूर्ततेसाठी धावपळ सुरू झाली आहे. त्र्यंबक नगरपालिका प्रशासनाने सर्व ठेकेदारांची तातडीची बैठक बोलवून कामांना वेग द्या म्हणून तगादा सुरू केला आहे. दरम्यान, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी पाहणी दौरा करीत कामांच्या प्रगतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

त्र्यंबकला सिंहस्थ अंतर्गत पहिल्या टप्प्यातील कामे आता पूर्णत्वास येत आहेत. नव्याने वाढीव मिळालेल्या कामांबाबत मात्र वेळेत पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. गत आठवड्यात झालेल्या निविदा प्रक्रियेनंतर सहा निवाराशेड आणि पाच रस्ताकामांना प्रतिसाद मिळाला नसून, ठेकेदारांनी या कामांकडे पाठ फिरविल्याचे स्पष्ट झाले आहे. विकासकामांबाबत नगरपालिका प्रशासन आणि नगरसेवक यांच्यात बेबनाव असल्याचे उघड झाले आहे. प्रभारी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे यांनी प्री फॅब्रिकेटेड शेड देण्यात यावे म्हणून सभागृहाने ठराव मंजूर केला होता. मुख्याधिकाऱ्यांनी याबाबतच्या पुनर्निविदा काढल्याने सभागृहाने ठरविलेल्या कामांना फाटा देण्याचे काम प्रशासन करीत असल्याचे नमूद केले आहे. मुख्याधिकारी निवृत्ती नागरे यांनी जिल्हा प्रशासनाच्या सूचनांप्रमाणे कामे होत आहे, असे सांगितले. एकूणच प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा हा बेबनाव सिंहस्थ कामांच्या प्रगतीत अडसर ठरणार काय असा प्रश्न आता नागरिकांमध्ये चर्चेत आला आहे. शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांनी प्रचंड कालापव्यय केल्याने नागरिक त्रस्त झाले असून, नगरसेवकांना यामध्ये नागरिक आणि प्रशासन यामधील दुव्याची भूमिका बजावण्यास अपयश आले आहे. सिंहस्थ पर्वणी साधण्यासाठी यापूर्वी ठकेदार गळ लावून बसत असायचे. मात्र, यावेळेस कामे घेण्यास कोणी तयार नाही, असे का याबाबत विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत. शाहीमार्गांचे रूंदीकरण हा विषय आता बासनात गुंडळला की काय असाच प्रश्न आता जाणकार नागरिक विचारत आहेत.

आयुक्तांसह विविध उच्चाधिकारी येथे भेट देत आहेत. मात्र, बहुदा सायंकाळी सुरू झालेला हा दौरा अंधारात पाहणी करीत आटोपता घेतला जातो असाच अनुभव कालपर्यंत आला आहे. मेनरोड गंगास्लॅबच्या दोन्ही बाजूस गटारीसाठी स्वतंत्र पाइपलाइन टाकण्यात येत आहे. या कामाची आजची परिस्थती पाहता हे कितपत यशस्वी होणार असा सवाल उपस्थित झाला आहे.

दरम्यान, वेधशाळेचे अलीकडील बहुतांश अंदाज खरे ठरल्याने २७ मे रोजी पावसाचे आगमन झाल्यास करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्र्यंबक येथील पाऊस सुरू झाल्यास आठ पंधरा दिवस उघडीप देत नाही. त्यात बांधकामे प्रलंबित राहिल्यास सिंहस्थ नियोजन यशस्वी होणे कठीणच ठरणार आहे. अहिल्या व गोदावरी घाटाची कामांची परिस्थिती रेंगाळली आहे. कचरा डेपोचा परिसर महिनाभरात कसा स्वच्छ करणार आणि किती भाविक तेथे स्नानासाठी जाणार या बाबत सांशकता दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दर्जा तपासणार कोण?

0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

देशातील सर्वात वेगवान प्रवासी सेवा देणाऱ्या रेल्वेमध्ये सर्रासपणे विकल्या जाणाऱ्या पाणी बाटल्यांचा दर्जा तपासणार तरी कोण असा प्रश्न प्रवासी उपस्थित करीत आहेत. त्यातच रोजच अनेकविध कंपन्यांचे लाखो बाटल्यांची रेल्वेत विक्री होत असते. यासाठी रेल्वे प्रशासनाने ठरवून दिलेले निकष पाळणाऱ्या कंपन्यांच्याच पाणी बाटल्यांची रेल्वेमध्ये विक्री करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

भारतात प्रवासी साधनांमध्ये रेल्वेचा मोठा सर्वात वाटा आहे. त्यामुळे केंद्राकडून रेल्वे विभागाचा स्वतंत्र अर्थसंकल्प सादर केला जातो. केंद्र सरकार देखील रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधांचा विचार आणि कृती केली जात असते. परंतु, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या रेल्वेत मिळणाऱ्या पाणी बाटलीच्या दर्जाबाबत तपासणी करणार कोण असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे. ऐन उन्हाळ्यात उष्णतेमुळे पिण्याच्या पाण्याची प्र‍चंड मागणी असते. रेल्वेत गर्दीतून प्रवास करतांना जे उपलब्ध होईल ते बाटलीबंद पाणी घेण्याकडे प्रवाशांचा कल असतो. किंबहुना ती त्यांची गरजच असते. यामध्ये अनेकविध कंपन्यांच्या लाखो पाणी बाटल्यांची रोजच विक्री होते.

तसेच नाशिकरोडला देखील रेल्वेत पाणी वाटणाऱ्या एका खाजगी ठेकेदाराकडून कमी दर्जा असलेल्या पाण्याच्या बाटल्या प्रवाशांना पुरविल्या जात असल्याचे प्रवासी सांगतात. यासाठी रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष घालत दर्जेदार व आयएसआय मार्क असलेल्याच सिलबंद पाणी बाटल्यांना रेल्वेमध्ये विक्री करण्याचे बंधन व्यावसायिकांना घातले पाहिजे, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

सुरक्षित प्रवासी साधन म्हणून रेल्वेकडे आदराने पाहिले जाते. मात्र, उन्हाळ्यात प्रवाशांना विकल्या जाणाऱ्या पाणी बाटल्यांचा दर्जा तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. गर्दीच्या डब्यांमध्ये किंवा अगदी रेल्वे स्टेशनवर सर्रासपणे विकल्या जाणाऱ्या दर्जाहीन पाणी बाटल्यांकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देत कारवाई करण्याची गरज आहे.

- गणेश देवरे, प्रवासी

रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

एकीकडे रेल्वेत प्रवाशांना विकत देण्यात येत असलेल्या पाणी बाटल्यांचा दर्जा दर्जा माहिती नसतो. तर दुसरीकडे प्रवाशांनी टाकून दिलेल्या रिकाम्या बाटल्या गोळा करून त्यामध्ये रेल्वे स्टेशनवरीलच पाणी भरले जाते. काही वेळ डिपफ्रिझरमध्ये ठेवलेल्या आणि साध्या प्लॅस्टिकने सिलबंद केलेल्या या पाण्याच्या बाटल्या गर्दी असलेल्या रेल्वेतील डब्यांमध्ये सर्रासपणे विकल्या जातात. गर्दीच्या डब्यांमध्ये विकण्याचे कारण की पाणी बाटली घेतांना शक्यतो कुणी फारसे प्रश्न विचारणार नाही, असा विक्रेत्यांचा डाव असतो. या सर्व प्रकाराकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष नसल्याचे दिसून आलेले आहेत. तसेच प्रवाशी देखील तक्रार करण्याचे धाडस दाखवित नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राप्तीकरदात्यांनो, सजग रहा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

प्राप्तीकर भरणाऱ्यांनी कायम सजग रहावे. वजावटींचे लाभ मिळविण्यासाठी बजेटचे बारकाईने वाचन करून प्राप्तिकरातील नवीन बदल आत्मसात करावेत, असे प्रतिपादन क. का. वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे यांनी केले.

पिंपळगाव कॉलेजच्या प्राध्यापक प्रबोधिनी व्याख्यानमालेत प्राप्तीकरातील तरतूदी या विषयावर तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. उपप्राचार्य डी. डब्लू. शेळके, एस. वाय. माळोदे व्यासपीठावर होते. ८० सीसह विविध विविध कलमांखाली मिळणाऱ्या वजावटींची सोप्या शब्दात माहिती देताना प्राचार्य डॉ. शिंदे म्हणाले, की भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी प्लॅस्टिक मनी ही संकल्पना प्रगत देशात लोकप्रिय झाली आहे. भ्रष्टाचाराच्या गर्तेत बुडालेल्या भारतात ही संकल्पना रुजू लागली असून तिचे स्वागतच करायला हवे. प्रत्येकाला प्राप्तीकरातून काही तरी सूट मिळतेच. त्यासाठी सॅलरी, बिझनेस, प्रापर्टी, कॅपिटल गेन, इनकम फ्राम अदर सोर्सेस हे प्राप्तिकराचे हेडस जाणून घ्यावेत. इन्फ्रास्ट्रक्चर बॉण्डस्, देणगी, नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट, एलआयसी आदी मार्गांनी प्राप्तीकरातून सूट मिळवता येते.

रेडीरेकनरमध्ये याची सविस्तर माहिती आहे. शेतीवर कर नसल्याने उद्योजक, व्यापारी शेतीकडे वळत आहेत. लॉटरी, क्रॉसवर्ड पझल, रेस आदींच्या बक्षीसातून ३० टक्के कर वजा होतो. प्रा. ज्ञानोबा ढगे यांनी स्वागत केले. प्रा. व्ही. जी. गायकवाड यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images