Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पोलिस वसाहतीत डासांचा उपद्रव

0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

सातपूर पोलिस स्टेशनच्या पाठिमागेच असलेल्या पोलिस वसाहतीतील रहिवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून डासांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. परिसरात अस्वच्छतेमुळे नागरिक हैराण झाले असून महापालिका व पोलिस प्रशासन या दोन्ही विभागांकडून मूलभूत सुविधा पुरविली जात नसल्याची खंत पोलिस कुटुंबांनी व्यक्त केली आहे.

सातपूर औद्योगिक वसाहत स्थापन झाल्यानंतर सातपूर पोलिस स्टेशनचीही निर्मिती करण्यात आली. त्र्यंबकेश्वर रस्त्यावर सन १९७८ नंतर सातपूर पोलिस स्टेशनच्या मागे पोलिसांना राहण्यासाठी राज्य सरकारने सहा इमारतींची उभारणी केली. यात पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना हक्काचा निवारा मिळाला. मात्र, या पोलिस वसाहतीत पाहिजे त्या नागरी सुविधा मिळत नसल्याची पोलिस कुटुंबांची तक्रार आहे. यात प्रामुख्याने पोलिस वसाहतीतील राहणाऱ्या रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो तो डासांचा. बाराही महिने पोलिस वसाहतीतील रहिवाशांना डासांच्या उपद्रवाने हैराण केले आहे. वसाहतींमधील जवळपास सर्वच फ्लॅटधारकांनी जाळीचे दरवाजे बसविले आहे. मात्र, तरीही डांसाचा त्रास मात्र होऊ शकलेला नाही, अशी रहिवाशांची तक्रार आहे.

भंगार वाहनांची गर्दी

महापालिकेच्या पुढाकाराने पोलिस वसाहतीसाठी उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु, महापालिकेने लक्ष न दिल्याने या उद्यानाची दुरवस्था झाली आहे. उद्यानाच्या मोकळ्या जागेत पोलिस स्टेशनच्या हद्दीत अपघातग्रस्त झालेली आणि जप्त करण्यात आलेली वाहने उभी केली जातात. या भंगार वाहनांनी अर्धेअधिक उद्यान व्यापून टाकलेले आहे. याच बंद पडलेल्या वाहनांमध्ये डास लपून बसतात.

निम्म्या सदनिका रिकाम्या

पोलिस वसाहतीत मूलभूत सुविधांचाही वानवा आहे. नागरी सुविधांच मिळत नसल्याने या वसाहतीतील निम्म्या अधिक सदनिका रिकाम्या पडून आहेत. यात पोलिस जमादार असलेल्या कुटुंबाला दोन सदनिका देण्यात आल्या आहेत. तरीही सद्या स्थितित २९ सदनिकांमध्ये १२ पोलिस कुटुंबांचे वास्तव्य आहे.

पोलिसांना हक्काचे घर असावे म्हणून राज्य सरकारने पोलिस वसाहतीची स्थापना केली. परंतु, अनेक वर्षांपासून पोलिस वसाहतीला नागरी सुविधांपासून वंचित राहवे लागत आहे. यात प्रामुख्याने सहन करावा लागतो, तो डासांचा उपद्रव. यावर महापालिका व पोलिस प्रशासनाच्या विभागाने उपाय करण्याची गरज आहे. - मयूर चंद्रमोरे

कायद्याच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलिसांच्याच वसाहतीमध्ये नागरी सुविधांचा अभाव आहे. पाच वर्षांपूर्वी महापालिकेने नव्याने रस्ते केले होते. परिसरातील वाढलेल्या जंगली झांडामुळे साप व विषारी किटकांपासून नेहमीच काळजी घ्यावी लागते. पोलिस वसाहतीला अस्वच्छतेने घेरले आहे. - विशाल गांगुर्डे

आरोग्य धोक्यात

पोलिस वसाहतीच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर जंगली झाडे, झुडपे असल्याने साप, विंचू आणि विषारी किटकांचा मुक्त संचार आहे. या भागात नियमित स्वच्छता केली जात नसल्याने पोलिस कुटुंबाचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासाठी महापालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासने यांनी पुढाकार घेत मूलभूत सुविधा पुरविण्याची मागणी पोलिस कुटुंबांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जलतरण तलावातील सळसळता सूर

0
0

>> फणिंद्र मंडलिक

नातीला पोहता यावे या उद्देशाने ते स्विमिंग टॅँकवर आले आणि बघता बघता ते स्वतःच पाण्याच्या प्रेमात पडले. वयाच्या ६० व्या वर्षी पाण्यात उतरलेले जगन्नाथ पाटील ७५ व्या वर्षी स्विमिंगच्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची तयारी करीत आहे.

जगन्नाथ बापूराव पाटील हे नाशिकरोडच्या राजमाता जिजाऊ जलतरण तलावरील सर्वात सिनिअर व्यक्तिमत्व. नाशिकरोडच्या जलतरण तलावावर स्विमिंग करीत असताना त्यांनी पोहण्याच्या अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. स्थानिक स्पर्धेतील सहभागानंतर त्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. तेथेही त्यांनी यश संपादन केले. त्यानंतर त्यांना स्विमिंगचे वेडच

लागले असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. ज्येष्ठ नागरिकांच्या राज्यात कुठेही जलतरणाच्या स्पर्धा असल्या की तात्या तेथे जाऊन सहभागी होतातच. राज्यस्तरीय जलतरणाच्या स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवल्यानंतर ते आता राष्ट्रीय स्पर्धेची तयारी करीत आहे.

पाटील हे मूळचे देवळालीचे. लोक त्यांना आदराने तात्या म्हणतात. बालपण देवळालीगावात गेले. त्यामुळे त्यांचा वालदेवी नदीशी संबंध आला. लहानपणी नदीला भरपूर पाणी असल्याने ते नेहमी पोहायला जात. कालांतराने पाणी कमी होऊन वालदेवीचे गटारीत रुपांतर झाले. त्यामुळे ओघानेच पोहणे थांबले. त्यावेळी त्यांचे वय होते १५-१६ वर्षाचे. ३० ऑगस्ट २००१ रोजी नाशिकरोड जलतरण तलावाच्या उद्घटानावेळी नातीला टँकवर घेऊन गेले असताना तेच स्वतः सभासद झाले. ४० वर्षांपूर्वी तुटलेली स्विमिंगची नाळ पुन्हा जोडली गेली. चाळीस वर्षाच्या खंडानंतर त्यांनी पोहायला सुरुवात केली. नांदेड येथे झालेल्या जेष्ठांच्या जलतरण स्पर्धेत ते राज्यात प्रथम आले. या यशामुळे त्यांचा पोहण्याचा उत्साह वाढत गेला व ते स्विमिंगसाठी महाराष्ट्रभर जाऊ लागले. कोल्हापूर, मुंबई, पुणे येथे झालेल्या स्पर्धांमध्येही त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला. तसेच नाशिकरोड येथे झालेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत त्यांनी तिसरा क्रमांक मिळवला.

तरुणाईला लाजविणारा उत्साह

आजही जगन्नाथ पाटील कोणताही मोबदला न घेता येणाऱ्या तरुणांना स्विमिंगचे धडे देतात. त्यांचा उत्साह तरुणाईला लाजवेल असाच आहे. त्यांच्याकडूनच स्विमिंगचे धडे गिरविणाऱ्या नात पूजा पाटील हिने भगिरथी नदीत पार करण्याची कोलकत्यात झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत पारितोषिक मिळविले. या स्पर्धेत देशभरातून हजारपेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले होते. येत्या काही दिवसात दिल्ली, मुंबई, कोलकता, चेन्नई या शहरात ज्येष्ठासाठी राष्ट्रीय स्पर्धा होणार आहेत. त्याचा जगन्नाथ पाटील कसून सराव करीत आहेत. रोज तीन ते चार तास स्विमिंग करत आहेत. सकाळी सकाळी सहा वाजता स्विमिंग टॅँकवर ते उपस्थित होतात. कुणी स्विमिंगला दांडी मारली तर त्याला दरडावून जाब विचारतात. राष्ट्रीय स्पर्धेत मी निश्चित नाशिकचे नाव उज्ज्वल करेल, असा पाटील यांना ठाम विश्वास आहे.

स्विमिंगमुळे चैतन्य

स्विमिंग हे माझ्या उत्साहाचे औषध आहे. स्विमिंगमुळे मला कोणताही आजार झालेला नाही, असे जगन्नाथ पाटील सांगतात. माझ्या स्विमिंगच्या यशात घरच्यांप्रमाणेच जलतरण तलावावरील स्टाफचाही मोलाचा आहे. जलतरण तलावाच्या जलनिर्देशक माया जगताप, हरि सोनकांबळे यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिल्यानेच मी जलतरण स्पर्धेत सहभागी होऊ शकलो. आहार कसा असावा? कोणत्या स्पर्धेत काय तयारी करावी? तसेच स्पर्धेचे भौगोलिक वातावरण कसे असणार आहे? तेथील वातावरण कसे असणार ? याविषयी त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. कितीही वय होऊ द्या, मी स्विमिंग सोडणार नाही. मी अधिकाधिक जोमाने स्विमिंग करीतच राहणार, असे ते उ तर आणखी जोमाने करणार आहे, असेही ते सांगतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भविष्यनिर्वाह सभासदांचे खाते झाले अपडेट

0
0

नाशिकसह पाच जिल्ह्यांतील १५ लाख खातेधारकांना लाभ

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने सभासदांचे खाते अवघ्या साडेसहा तासांत अद्ययावत झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे २०१४-१५ च्या व्याजासह ही खाती अपडेट करण्यात आली आहे. ई-गव्हर्नन्सच्या जोरावर ही किमया साध्य होऊ शकली आहे.

कर्मचारी भविष्य निधी उपक्षेत्रीय नाशिकच्या नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुबारस्थित ७ हजार ५१७ आस्थापनांच्या पंधरा लाखांहून अधिक सभासदांना त्याचा लाभ होणार आहे. या सभासदांना आपल्या खात्यात व्याजासह २०१४-१५ च्या अखेरची जमा भविष्य निधी रक्कम पाहता येणार आहे. एक एप्रिल रोजीच सर्व सभासदांची खाती अपडेट करण्यात आली आहेत.

यापूर्वी खाती अपडेट करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागत होता; पण यंदा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आम्हाला हे काम संपवता आले, अशी माहिती कर्मचारी भविष्य निधी उपक्षेत्रीय कार्यालयाचे आयुक्त जगदीश तांबे यांनी सांगितले. ई-गव्हर्नन्स व इतर प्रगत तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून सभासदांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न पीएफ कार्यालयामार्फत केला जात आहे. देशभरातील पीएफ खातेधारकांची खाती अपडेट करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे.

सभासदांची खाती अवघ्या साडेसहा तासांत अपडेट होणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. मागील दोन-तीन वर्षांत ई-गव्हर्नन्सच्या दिशेने टाकलेली पावले व त्याबरोबरच आमच्या कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे हे साध्य होऊ शकले आहे.

- जगदीश तांबे, आयुक्त, कर्मचारी भविष्य निधी उपक्षेत्रीय कार्यालय, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विरगावला हवी पोलिस चौकी

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

तालुक्यातील विरगाव येथे गेल्या पंधरवाड्यात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली असून, व्यापारी व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे विरगाव येथे कायमस्वरूपी पोलिस चौकी स्थापन करावी, या मागणीचे निवदेन विरगांव येथील ग्रामस्थांनी बागलाणचे पोलिस उपविभागीय अधिकारी विनायक ढाकणे यांना दिले आहे.

विरगाव हे सटाणा शहरापासून ९ कि.मी. अंतरावर असून, येथे ज्वेलर्स, कापड, किराणा, शेती औजारे यासारखे मोठे मोठे व्यवसायिक व्यवसाय करतात. तसेच, येथे राष्ट्रीयकृत बँका असून, परिसरात गेल्या महिन्यात अनेक छोटे मोठ्या चोऱ्या झाल्या. गेल्या आठवड्यात येथील जयंवत ज्वेलर्स हे दुकान फोडले. शेजारील नागरिकाने प्रतिकार केल्याने त्यास मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच, काशिनाथ बोरसे यांचे देखील वेल्डिंग वर्क्सशॉपमध्ये चोरी केली. उध्दव दंडगव्हाळ यांच्या घरात देखील चोरी करण्यात आली. यामुळे गावातील व्यापारी व नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांचा धाक शिल्लक राहिला की नाही अशी शंका निर्माण होऊ लागली आहे.

पोलिस विभागाकडून अद्यापपर्यंत एकाही घटनेचा शोध लागलेला नाही. यामुळे गावात मंजूर असलेली पोलिस चौकी कार्यान्वित करून संरक्षण मिळावे व मागील गुन्ह्याचा लवकरात लवकर तपास करावी, अशी मागणी निवदेनात करण्यात आली आहे. यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, उपसरपंच संजय बच्छाव, साईनाथ देवरे, पप्पू ठाकरे, दीपक कोठावदे यांनी पोलिस उपविभागीय अधिकारी विनायक ढाकणे यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर प्रश्न मार्गी लागावा, अशी मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थ कामांवर आज पुन्हा चर्चा

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथे आज साधू-महंत, सिंहस्थ नागरी समिती, नगरपरिषद सदस्य, नागरिक व शासन अधिकारी यांची संयुक्त बैठक होत आहे. नगरपरिषदेने या बैठकीचे आयोजन केले आहे. दुपारी १२ वाजता देवस्थान संस्थानच्या शिवप्रसाद या इमारतीत होत असलेल्या बैठकीत नागरिकांनी आपल्या समस्या मांडाव्यात, असे अपेक्षित आहे.

शहरामध्ये सुरू असलेल्या खोदकामांनी नागरी जीवन त्रस्त झाले आहे. या कामांमध्ये सुसूत्रता व नियेजानाचा आभाव असल्याचे नागरिकांच्या चर्चेतून वारंवार ध्वनीत झाले आहे. याचा सर्वप्रथम थेट परिणाम म्हणजे बसस्थानक शहराबाहेर हलविण्यात आले आहे. शाळा महाविद्यालयांच्या परीक्षा तसेच शहरात भाविकांचा वाढलेला ओघ पाहता एक किलोमीटर अंतरावर हलविण्यात आलेले बसस्थानक सर्वांनाच त्रासदायक ठरत आहे. शहरात गावाबाहेरून येण्यारे तीन रस्ते आहेत. तरी देखील रस्त्यांच्या कामांचे निमित्त करून बसस्थानक बाहेर पाठविल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अशाच प्रकारे शहरांतर्गत रस्त्यांच्या बाबतीत धरसोड करीत काम सुरू असल्याने नागरिकांना आपत्कालात मदत मिळणे दुरापास्त झाले आहे. अवघ्या दोन महिन्यांवर सिंहस्थ पर्वकाल आलेला असतांना कामे प्रगतीपथावर या शिर्षकाखाली रेंगाळत आहेत. नव्याने मंजुरी मिळालेली कामांची परिस्थती काय असेल याची कल्पनाच न केलेली बरी, असे नागरिक म्हणत आहेत. सिंहस्थ पूर्वनियोजनात नागरिकांचा सहभाग खरोखरच म्हत्वाचा ठरतो.

मात्र, त्यास आता उशीर झाला आहे. किमान काही महिने अगोदर अनुभवी नागरिकांचा सल्ला घेतला असता तर आज ही वेळ निश्चितच आली नसती. आजच्या बैठकीत काय निष्पन्न होणार याकडे त्र्यंबक नगरीचे लक्ष लागले आहे. यामध्ये नागरी जीवनाची झालेली कोंडी दूर होणार की केवळ शाल श्रीफळ आणि सत्कार असे या बैठकीचे स्वरूप राहणार अशीच चर्चा शहरात होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘येमको’ बँकेसाठी ६५.४४ टक्के मतदान

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला तालुक्याच्या सहकार क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या येवला मर्चंटस् को ऑप. बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी ६५.४४ टक्के मतदान झाले. बँकेच्या विविध गटातील एकूण १५ जागांवर निवडणूक रिंगणात असलेल्या ३५ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद केले. आज, (दि.६) मतमोजणी होणार आहे.

जनसेवा व परिवर्तन या दोन पॅनल बरोबरच इतर उमेदवारांकडून प्रचाराची मोठी रणधुमाळी गाजताना रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी मतदानाला प्रारंभ होताना शहरातील विंचूर रोडवरील जनता विद्यालयाच्या इमारतीबाहेर दोनही पॅनलचे नेते, उमेदवार व पाठीराखे यांची मोठी गर्दी दिसत होती. मतदान संपेपर्यंत उमेदवार मतदारांना हात जोडत मतदानासाठी साद घालत होते. पहिल्या दोन तासात मतदानाच्या झालेल्या एकूण आकडेवारीवर नजर टाकता ती बरीच कमी दिसत होती. मात्र १० ते १२ व त्यानंतर देखील मतदानात प्रत्येक तासागणिक वाढ होत गेली. दुपारी १२ नंतर तर मतदारांच्या संख्येत चांगलीच वाढ होताना अनेक मतदार केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एकूण १४ हजार २०५ मतदारांपैकी ९ हजार २९७ मतदारांनी हक्क बजावला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र शेळके यांनी दिली.

चोख व्यवस्था अन् बंदोबस्त

'येमको' बँकेच्या रविवारी झालेल्या मतदान प्रक्रियेसाठी सहकार विभागाने २१ मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी तसेच मतदान केंद्राबाहेर मतदारांना त्यांच्या आडनावाच्या इंग्रजी वर्णमालेनुसार स्लिपा देण्यासाठी खास टेबल लावतांना जवळपास एकूण १९० च्या वर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. बरोबरच चार पोलिस अधिकाऱ्यांसह तब्बल ३५ पोलिस कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त देखील तैनात केला गेला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लासलगाव बाजार समिती आजपासून गजबजणार

0
0

म. टा. वृत्तसेवा, लासलगाव

मार्चएण्ड व सलग नऊ दिवसांच्या सुटीनंतर अखेर आजपासून लासलगाव बाजार समितीत शेतमालाच्या लिलावाला सुरुवात होणार आहे. गेल्या आठवडाभरापासून बाजार समिती बंद राहिल्याने लासलगाव व परिसरात कमालीची शांतता पहावयास मिळाली होती. त्यात बँकाचेही कामकाज मार्चएण्ड, गुड फ्रायडे व साप्ताहिक सुटीमुळे बंद राहिल्याने येथील व्यवसाय ठप्प पडल्याचे चित्र दिसत होते.

एरव्ही ग्राहकांच्या गर्दीने फुलून जाणाऱ्या इथल्या बाजारपेठेत बंदमुळे मोठा शुकशुकाट निर्माण झाला होता. गेल्या आठवड्यात निफाड तालुक्यातील बहुतांश भागात ढगाळ हवामान तयार झाल्याने कांदा उत्पादकांसह शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. त्यात नऊ दिवस बाजार समिती बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांच्या काळजीत आणखीनच भर पडल्याचे दिसत होते.

सध्या तालुक्यात अंतिम टप्प्यात आलेला लाल कांदा व अर्ली उन्हाळ कांदा काढणीला वेग आला आहे. त्यामुळे कधी एकदा बाजार समिती सुरू होते याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. बाजार समित्या बंद होण्यापूर्वी लाल कांद्याची आवक वाढल्याने बाजारभावात मोठी घसरण झाली होती. मार्च महिन्यात येथील बाजार समितीत लाल कांद्याची सुमारे ३ लाख २५ हजार क्विंटलची आवक झाली होती. तर, लाल कांद्याला १ हजार ५८७ रुपयांचा उच्चांकी व १ हजार २६४ रुपयांचा सरासरी भाव मिळाला होता. मार्च महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात आवक वाढल्याने दीड हजार रुपयांपर्यंत असणाऱ्या कांद्याच्या दरात सुमारे चारशे ते पाचशे रुपयांपर्यंत घसरण झाली होती.

या घसरत्या बाजारभावामुळे कांदा उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. त्यातही आता येत्या काही दिवसात उन्हाळ कांद्याची मोठी आवक सुरू होणार असल्याने भाव घसरणीची भीतीही कांदा उत्पादकांना सतावत आहे. दरम्यान, रविवारी दिवसभर निफाड तालुक्यात ढगाळ हवामान तयार झाले होते. तर, रविवारी सकाळपासून दुपारी १२ वाजेपर्यंत अनेक गावांमधील शेतशिवारांवर धुक्याची चादर तयार झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून आले. नेमके कशामुळे असे झाले याबाबत तर्कवितर्क काढले जात होते.

लिलावासाठी नंबर

नवीन आर्थिक वर्षात आजपासून बाजार समितीचे लिलाव पुन्हा सुरू होणार असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी सोमवारी होणाऱ्या लिलावासाठी रविवारी सकाळपासूनच लासलगाव बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी नंबर लावण्यास मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामपालिका निवडणुकीवर बहिष्कार

0
0

नगरपरिषदेचा आदेश प्राप्त न झाल्याने सर्वपक्षीय बैठकीत निषेध

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

राज्य सरकारने राज्यातील सर्व तालुका मुख्यालय नगरपंचायत/नगरपरिषद करण्याचा अध्यादेश काढला. मात्र, याबाबत दिंडोरी ग्रामपालिकेला आदेश प्राप्त न झाल्याने सर्वपक्षीय पदा‌धिकाऱ्यांनी ग्रामपालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आज ग्रामपालिकेसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

राज्य सरकारने दहा मार्चला राज्यातील सर्व तालुका मुख्यालये नगरपंचायत/ नगरपरिषद करण्याचा निर्णय घेत तहसीलदारांना प्रशासक म्हणून काम पाहण्याचे आदेश काढले. मात्र, अद्याप दिंडोरीच्या तहसीलदारांना संबंधित आदेश प्राप्त न झाल्याने पुढील कार्यवाही झालेली नाही. यामुळे ग्रामस्थांनी तहसीलदार-जिल्हाधिकारी यांना निवेदन देत ग्रामपालिका निवडणुकीऐवजी नगरपरिषद करावी, अशी मागणी केली होती. अद्यापही आदेश प्राप्त न झाल्याने जनतेत संभ्रम असून, उद्या ग्रामपालिकेचे अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. याबाबत रविवारी सकाळी दिंडोरी येथील रामेश्वर मंदिर येथे सर्वपक्षीय बैठक होऊन कुणीही ग्रामपालिका निवडणुकीचे फॉर्म न भरता निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

माजी आमदार रामदास चारोस्कर, कादवाचे संचालक बाळासाहेब जाधव, माजी सरपंच शिवाजी पिंगळ, भाऊसाहेब बोरस्ते, प्रमोद देशमुख आदींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ग्रामपालिका निवडणुकीबाबत विचारविनिमय झाला. शासनाने तालुक्याच्या ठिकाणाचा विकास होण्याचे दृष्टीने नगरपंचायत करण्याचा निर्णय घेतला. त्याचे सर्वांनी स्वागत केले. मात्र, नगरविकास व ग्रामविकास या खात्यातील असमन्वयामुळे इतर सर्व नगरपंचायत अधिसूचना निघून तेथील ग्रामपालिका निवडणूक स्थगित झालेली असताना दिंडोरीत मात्र अधिसूचना प्राप्त झाली नाही. येथे ग्रामपालिका निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. कदाचित केव्हाही सदर अधिसूचना येऊन ग्रामपालिका बरखास्त होऊ शकते, अशा परिस्थितीत निवडणूक झाली तर शासकीय यंत्रणेसह इच्छुक उमेदवारांचाही खर्च वाया जाणार आहे. त्यामुळे सदर निवडणुकीत कुणीही फॉर्म न भरण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, वार्डनिहाय समन्वय समिती स्थापन करण्यात येऊन निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांनी अर्ज दाखल केले आहेत, त्यांचेही अर्ज माघारी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच आज (दि. ६) पुन्हा सर्वपक्षीय शिष्टमंडळ प्रांताधिकारी मुकेश भोगे, तहसीलदार मंदार कुलकर्णी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अशी असावी शिक्षण प्रणाली

0
0

>> प्राचार्य डॉ. हरिष आडके

देशाचे उच्च शिक्षण २०१५ चे धोरण ठरविण्याचे काम सुरू झाले आहे. नुकतेच २१ मार्चला त्याचा मसुदा (ड्राफ्ट) तयार झाला. त्याचे वेळापत्रक स्थानिक, जिल्हा, राज्य आणि देशपातळीवर २१ मार्च २०१५ ते ३१ डिसेंबर २०१५ दरम्यान निश्चित केले जाणार आहे. शिक्षण क्षेत्रात रिबोटींग (पुनर्स्थापना) करणे हे मोठे आव्हान असते. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी ते यशस्वीपणे स्वीकारले आहे.

टेक्नोपॅक २०१३ च्या पाहणी अहवालानुसार उच्च शिक्षणात देशात आज ८ लाख १० हजार प्राध्यापक सेवेत आहेत. प्रत्यक्षात ही संख्या ११ लाख ६० हजार हवी. २०२० सालापर्यंत एकूण १३ लाख ८० हजार प्राध्यापकांची आवश्यकता भासणार आहे. शेवटच्या रांगेतील व्यक्तीलाही दर्जेदार उच्च शिक्षण मिळण्यासाठी हे चित्र बदलणे आवश्यक आहे. त्यासाठी कौशल्यावर आधारित पदवीका ते पदवी यात पूल बांधणे महत्त्वाचे आहे. संस्कृती व भाषा यांच्यात समन्वय साधण्यासाठी उच्च शिक्षणाच्या नव्या धोरणात थीम तयार करताना वीस गोष्टींचा समावेश केलेला आहे. त्यात शिक्षणचा दर्जा, विद्यापीठाचे रॅँकींग, कायदा व नियमात आमूलाग्र बदल, विद्यापीठांचे नियंत्रण, स्वायत्ता व दर्जा, त्यात लोकांचा सहभाग, पब्लिक- प्रायव्हेट पार्टनरशीप, तांत्रिक कौशल्याच्या संधी, प्रादेशिक क्षमता, स्त्री-पुरुष समानता, सामाजिक दरी कमी करणे, उच्च शिक्षकांना प्रशिक्षण व त्यांच्या दर्जा आणि कौशल्यात वाढ, सांस्कृतिक विकास, खासगी क्षेत्राबरोबर भागीदारी, विद्यापीठाचे अनुदान, शिक्षक-विद्यार्थी यांचा दर्जा सुधारण्यासाठी अनुदान, संशोधनसाठी मदत, रोजगार निर्मिती व जागतिक विद्यापीठांच्या तुलनेत बरोबरी आदी गोष्टींचा समावेश आहे. याबाबत शिक्षण तज्ञ आणि समाजातील मान्यवरांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. आतापर्यंत आठ हजारावर लोकांनी आपली मते नोंदवली आहेत.

भारतात आजच्या घडीला ३६ राज्ये, ६४० जिल्हे, पावणे आठ हजार शहरे आणि सुमारे सहा लाख खेडी आहेत. या सर्वांच्या विकासासाठी २०१० पासून प्राथमिक शिक्षणात राईट टू एज्युकेशन (शिक्षणाचा हक्क) याचा समावेश करण्यात आला. या सर्व गोष्टींचा गांभिर्याने विचार करून उच्च शिक्षणाबरोबरच माध्यमिक शिक्षणाचीही पुनर्रचना करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. प्राथमिक शिक्षणाची आवश्यकता काय यावरुनच माध्यमिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यासाठी प्राथमिक शिक्षणात टीईटी (टीचर इलिजीब्लीटी टेस्ट) व सेंट्रल टीचर इलिजिब्लिटी टेस्ट (सीटीईटी) यांची सुरवात झाली आहे. महाराष्ट्रात टीचर इलिजिब्लिटीचा रिझल्ट पाच टक्क्यांच्या आतच आहे. माध्यमिक शिक्षकांना प्रशिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, आरोग्य, कौशल्य, खेळ आदी अवगत करुन देणे आणि त्यांचा (पर्यायाने विद्यार्थ्यांचा) सर्वांगीण विकास साधने म्हणजे शिक्षण. त्याबरोबरच हुशारी, परिस्थितीचा अंदाज, निर्णय क्षमता हे देखील अवगत हवे. या सर्वांचा समावेश नवीन धोरणात करण्यात आला आहे.

माणसाने कसे वागावे याबाबत एक गोष्ट सांगावीशी वाटते. एक म्हातारा बाप होता. त्याच्याकडे सतरा घोडे होते. त्याला तीन मुले होती. त्या सर्वांची लग्ने झालेली होती. वय झाल्याने म्हाताऱ्याने काशीला जाण्याचे ठरविले. जाताना मुलांना सांगितले की, तुम्ही गुण्या-गोविंद्याने रहा. नाहीच पटले तर माझ्या मित्राची मदत घ्या. आपल्या घोड्यांचे वाटप कसे करायचे हे तो सांगेल. म्हातारा काशीला रवाना झाल्यानंतर दोन महिन्यांतच घरातील बायांमध्ये नेहमीप्रमाणे कुरुबुरी सुरू झाल्या. त्या वाढतच गेल्याने भाऊही वैतागले. शेवटी त्यांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी वडिलांच्या सल्ल्याप्रमाणे तिघेजण वडिलांच्या मित्राच्या वस्तीवर गेले. तिघांना पाहताच वडिलांचा मित्र म्हणाला, मला वाटलेच होते की तुमचे जमणार नाही. तुमच्या वडिलांनी मोठ्याला एक द्वितीयांश, मधल्या मुलाला एक तृतीयांश आणि धाकट्याला एक नऊमांश अशा पद्धतीने घोड्यांचे वाटप करण्यास मला सांगितले होते. यावर तिघांनी आश्चर्य व्यक्त करीत घोड्यांचे भाग कसे करता येईल असा प्रश्न उपस्थित केला. तेव्हा वडिलांचा मित्र म्हणाला, की यासाठीच तर माझ्याकडे येण्याचा सल्ला तुमच्या वडिलांनी दिला आहे. मी सकाळी येतो आणि वाटप करून देतो. दुसऱ्या दिवशी हा मित्र आपल्या तबेल्यातील घोडा घेऊन या तिन्ही भावांकडे गेला आणि घोड्याचे वाटप सुरू केले. तिघा भावांचे सतरा आणि आपला एक, असे अठरा घोडे एकत्र केले. मोठ्याला एक द्वितीयांश म्हणजे नऊ, मधल्याला एक तृतीयांश म्हणजे सहा आणि धाकट्याला एक नऊमांश म्हणजे दोन असे सतरा घोड्यांचे वाटप करुन स्वतःच्या घोड्यावर टांग मारली आणि गुडबाय करुन निघून गेला.

तात्पर्य- आपण दुसऱ्याला मदत जरुर करावी, सल्लाही द्यावा पण आपले नुकसान मात्र कदापी होऊ देऊ नये. देशाची शिक्षण प्रणालीदेखील अशाच प्रकारची असायला हवी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बागमार मामांचे कार्य पुढे न्यावे

0
0

मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हुकूमचंद बागमार ऊर्फ मामांनी कायमच मानवतेचा दृष्टिकोनातून काम केले असून, त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. सामाजिक क्षेत्रात देखील आपल्या कामाचा बागमार मामांनी ठसा उमटवला आहे. त्याचे अपूर्ण राहिलेले कार्य पुढे नेणे हीच खरी त्यांना श्रध्दांजली ठरेल, असा सूर हुकूमचंद बागमार यांच्या शोकसभेत व्यक्त झाला.

नाशिक शहरातील सहकार क्षेत्रातील अग्रणी हुकूमचंद बागमार यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्यासाठी गंगापूर रोडच्या चोपडा लॉन्स येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी आमदार, सहकार क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या. आमदार देवयानी फरांदे म्हणाल्या, की व्यापाराबरोबरच शेतकरी व व्यापाऱ्यांना विधायक मार्गदर्शन करुन मामांनी मोठे वलय निर्माण केले. आपल्या ७७ वर्षाच्या सेवाभावी जीवनात अनेक गोष्टींवर मामांनी मात केली. अनेक अडथळे आले प्रसंगाला तोंड देत त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले. नाशिक मर्चंट बॅँकेच्या जडणघडणीत मामांचा वाटा मोठा आहे हे नाकारुन चालणार नाही. सीमा हिरे म्हणाल्या, की त्यांचे कार्य मानवतेला धरून होते. त्यांनी सहकाराबरोबरच महावीर दवाखाना, कॅन्सर हॉस्पिटल अशी सामाजिक कार्ये करून महाराष्ट्रातील सहकारी बॅँकांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. आमदार बाळासाहेब सानप म्हणाले, की बागमार मामांचे कार्य जनताभिमुख होते. त्यांनी सचोटीने काम करून कुणाचीही पर्वा केली नाही. बॅँकेवर सरकारने प्रशासक नेमले तरी त्यांनी न डगमगता धिराने तोंड दिले. त्यांचे कार्य पुढे ठेवणे हीच खरी श्रध्दांजली ठरेल. यावेळी बागमार कुटुंबीयांसोबतच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व पदाधिकारी, अ‍ॅपेक्स बँक, अर्बन बँक्स् फेडरेशन, राज्य सहकारी बँक व जिल्हा बँकेचे पदाधिकारी, नाशिक सहकारी साखर कारखान्याचे संचालक तसेच नाशिक मनपाचे नगरसेवक उपस्थित होते.

प्रिती सुधाजी शिक्षण फंड, जैन धमार्थ दवाखाना, नाशिक धान्य किराणा, घाऊक व्यापारी संघटना, पृथ्वीराज निमाणी मंगल कार्यालय, जैन बोर्डींग, स्थानकवासी जैन श्रावक संघ, नामको चॅरिटेबल ट्रस्ट, कॅन्सर हॉस्पिटलचे पदाधिकारी, नागरी बँक असोसिएशनचे पदाधिकारीही उपस्थित होते. जयप्रकाश जातेगावकर व गौतम सुराणा यांनी सूत्रसंचलन केले. हुकूमचंद बागमार यांच्या शोकसभेसाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर गुजरात व मध्य प्रदेश येथील काही संस्थांचे पदाधिकारी हजर होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यसेवा पूर्व परीक्षेला २,७२७ जणांची दांडी

0
0

म.टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत वर्ग एकच्या पदांसाठी रविवारी घेण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षेला २ हजार ७२७ परीक्षार्थींनी दांडी मारली. १० हजार ३८८ परीक्षार्थींपैकी ७ हजार ६६१ जण या परीक्षेला सामोरे गेले. परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून काळजी घेण्यात आली.

रविवारी (दि. ५) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने विविध पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. उपजिल्हाधिकारी गट अ साठी नऊ जागा होत्या. सहायक पोलिस आयुक्त पदासाठी (१३), सहायक विक्रीकर आयुक्त पदासाठी (३), उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी पदाच्या २१ जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. अशा एकूण ४६ जागांसाठी जिल्हाभरातून १० हजार ४४० विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज भरला होता. त्यापैकी २ हजार ७२७ जणांनी परीक्षेला दांडी मारली.

शहरातील ३० केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. ती सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाने तब्बल ९२१ अधिकारी कर्मचाऱ्यांची यंत्रणा कामाला लावली. त्यामध्ये सहा समन्वय अधिकारी, ३० उपकेंद्र प्रमुख, १२५ पर्यवेक्षक, ४६० समवेक्षक, ६० लिपीक, १५० शिपायांचा समावेश होता. अनुचित प्रकार घडू नये यासाठी केंद्रनिहाय ६० पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातपूरला गुन्हेगारी पुन्हा बळावली

0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

कामगार वस्तीचा भाग म्हणून परिचित असलेल्या सातपूर भागात गुन्हेगारी पुन्हा डोक वर काढायला सुरुवात केली आहे. गँगवारमधून हत्या झालेल्या अमोल मोहिते खून प्रकणातील आरोपी अद्यापही फरारच आहेत. यामध्ये सातपूर भागात किरकोळ व भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. यामुळे पोलिसांवर नागरिकांची सुरक्षा व चोरट्यांवर आळा बसविण्याचे आवाहन उभे राहिले आहे. पोलिसांनी परिसरात पेट्रोलिंग वाढविण्याची मागणी नगरसेवक तसेच नागरिकांनी केली आहे.

सातपूर भागात अनेक महिन्यांपासून गुन्हागारीचे प्रमाण वाढायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे अशोकनगर व श्रमिकनगरच्या काही भागात छोटे, मोठे गुन्हे व चोऱ्या नेहमीच होत असतात. चारच दिवसांपूर्वी झालेल्या मोहिते हत्या प्रकरणामुळे गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढले आहेत. यात चार वर्षांपूर्वी झालेल्या अजय मांगटे हत्या प्रकरणातील आरोपी मोहिते याचा खून झाल्याने अशोकनगर भागातील गँगवारने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यातच मोहिते हत्या प्रकरणातील सर्रात असलेले संशयित आरोपी रोशन काकड, दिपक भालेराव, बाळू नागरे यांचा अद्यापही तपाल पोलिस लावू शकलेले नाहीत. भविष्यात मोहितेच्या हत्येनंतर पुन्हा गँगवार होणार नाही, याची दक्षता पोलिसांनाच घ्यावी लागणार आहे.

तो मृतदेह राजू गुप्ताचा

वासाळी रस्त्यावर शनिवारी (दि. ४) तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खडबळ उडाली होती. यात पोलिसांनी चौकशी केली असता, तो मृतदेह राजू गुप्ता या तरुणाचा असल्याचे सांगितेल. संबधित तरुणाचा पोहतांना मृत्यू झाल्याचे समजले. राजू श्रमिकनगरमध्ये राहत होता. पोहण्यासाठी पाण्यात उडी मारल्याने दगड लागला. उपचारासाठी रुग्णालयात नेत असतांना वासाळी रस्त्यावर त्यांच्या गाडीचा अपघात झाला असल्याचे त्याच्या मित्रांनी पोलिसांना सांगितले. परंतु, गुप्ताच्या कुटुंबीयांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.

अशोकनगर, श्रमिकनगरला रोजच चोऱ्या

राज्यातून नव्हे तर देशभरातून कामाच्या निमित्ताने अशोकनगर व श्रमिकनगर भागात नागरिक वास्तव्यास आहेत. परंतु, येथील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. तो रोजच होणाऱ्या भुरट्या चोऱ्यांचा. यात स्थानिक पातळीवर राजकीय किंवा वजनदार व्यक्ती नसल्याने रहिवाशी भयभीत झाले आहेत. दोन दिवसांपूर्वीच श्रमिकनगर भागात पुन्हा घरफोडी झाली. यावेळी नगरसेवक दिनकर पाटील यांनी चोऱ्या करणारे परिसरातील टवाळखोर असल्याचे पोलिसांना सांगितले होते. तसेच पेट्रोलिंग करतांना पोलिसांनी खाजगी वाहन वापरण्याची विनंती त्यांनी पोलिसांना केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इतिहास स्मारकात म्हसोबाचे ‘कारण’

0
0

गंगापूररोडवरच्या जुन्या पंपिंग स्टेशनमधील प्रकार; महापालिका अनभिज्ञ

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

गंगापूररोडवरील प्रस्तावित इतिहास स्मारकात रविवारी म्हसोबाच्या कारणाखाली मटणपार्टी पार पडली. दिवसभर 'कारणाची' लगभग सुरू होती. विशेष म्हणजे याबाबत महापालिका अधिकारी अनभिज्ञ होते. भविष्यात येथे कुणी 'ओल्या पार्टी'चे आयोजन केल्यास सर्वसामान्यांना नवल वाटणार नाही.

गंगापूररोडवरील जुन्या पंपिंग स्टेशनच्या परिसरात महापालिकेने इतिहास स्मारक करण्याचे नियोजन आखले आहे. मात्र, हे काम अद्यापपर्यंत पूर्णत्वास गेलेले नाही. त्यातच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक येथेच तयार करण्याची मागणी शिवसेनेने मध्यंतरी केली. काही शिवसैनिकांनी इतिहास स्मारकाच्या जागी 'बाळासाहेब ठाकरे स्मारक ऐतिहासिक संग्रहालय' असा बोर्डही चढवून दिला. शिवसेना आणि मनसे या प्रमुख पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अनेक दिवस वाकयुध्द रंगले होते. मात्र, राजकारणाव्यतिरिक्त पक्षांनी काहीच ठोस भूमिका घेतली नाही. रविवारी दुपारच्या सुमारास शीतपेयाच्या बॉटल्या, मद्याच्या बाटल्या तसेच इतर खाद्य पदार्थांची पाकिटे इतस्थ आढळून आली. स्मारकात म्हसोबाचे कारण म्हणून मटण शिजवण्यात आले. मटणावर तब्बल ५० पेक्षा जास्त लोकांनी ताव मारला. स्मारकाच्या आत गेल्यानंतर समोरच तयार करण्यात आलेल्या चौथऱ्यावर महिलांनी भाकरी थापल्या. या ठिकाणी सुरक्षारक्षकही आढळून आला नाही. 'कारणा'च्या कारणासाठी महापालिका जागेचा वापर नि:शुल्क करून देते की शुल्क आकारते, याविषयाची माहिती महापालिका अधिकाऱ्यांना सांगता आली नाही. महापालिकेचे अनेक प्रकल्प 'असून अडचण नसून खोळंबा' या प्रकारात मोडतात. त्यातच स्मारकाच्या जागेत जेवणाच्या पंगती उठत असतील तर उद्या सार्वजनिक उद्यानांमध्ये लग्नाचेही कार्यक्रम सहज पार पडू शकतील, अशी टीका परिसरातील नागरिकांनी केली.

मद्यपार्ट्या नित्याच्याच

गेल्या अनेक महिन्यांपासून याठिकाणी रात्रीच्या सुमारास मद्यपार्ट्या झोडल्या जातात. रविवारी दुपारच्या सुमारास शीतपेयाच्या बॉटल्या, मद्याच्या बाटल्या तसेच इतर खाद्य पदार्थांची पाकीटे इतस्थ आढळून आली. तिथे स्वच्छतेचा अभाव असून, अनेकदा गैरकृत्यांसाठी या जागेचा वापर होतो, अशी माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशन दुकानदारांना वेतन द्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वस्त धान्य दुकानातील काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना बायोमेट्रीक पध्दतीने धान्य वितरण योजना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेवर कोट्यवधींचा खर्च करण्यऐवजी स्वस्त धान्य दुकानदारांना वेतन द्यावे, अशी मागणी ना‌शिक जिल्हा रास्त भाव दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात संघटनेची बैठक झाली. या बैठकीला आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विजयश्री चुंभळे यांची उपस्थित होत्या. गोरगरीब तसेच सामान्य नागरिकांना धान्य मिळायला हवे असेच स्वस्त धान्य दुकानदारांना वाटते. परंतु, त्यासाठी सरकारकडून धान्याचा पुरेसा आणि वेळेत पुरवठा व्हायला हवा अशी अपेक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून विक्रेते अल्प कमिशनवर काम करीत आहेत. ही कमिशन पध्दती बंद करून त्याऐवजी सरकारने आम्हाला दरमहा २५ हजार रुपये वेतन द्यावे, अशी मागणी करण्यात आली. याविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू अशी ग्वाही उपस्थित लोकप्रतिनिधींनी दिली. बैठकीला संघटनेचे अध्यक्ष निवृत्ती कापसे, दिलीप मोरे, अशोक बोराडे, लक्ष्मण नवले, राजेंद्र घोडके, रवी काळे, स्वप्नील जैन आदी उपस्थित होते.

रेशनकार्ड अर्जामध्ये असंख्य चुका

काळाबाजार थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रत्येक कार्डधारकाचा आधारकार्ड क्रमांक, बँक खाते क्रमांक, रेशनकार्ड क्रमांक तसेच मोबाईल क्रमांक संकलित केला जातो आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अर्जांमध्ये अनेक त्रूटी आहेत. त्यामुळे हे काम रेंगाळण्याची चिन्हे आहेत. अर्जावरील रकाने छोटे असून त्यावर क्रमांक लिहिणेही शक्य होत नाही. ज्या दुकानदारांकडे दोन तीनशे कार्डधारक आहेत. त्यांच्याकडे दीड दोन हजार अर्ज देण्यात आले आहेत. या त्रूटी दूर व्हाव्यात, अशी दुकानदारांची मागणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विल्होळीत गौण खनिजांची चोरी

0
0

पाच जणांना अटक; पोलिस व तहसीलची संयुक्त कारवाई

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

विल्होळी परिसरातील गट नंबर १५२ मधून गौण खनिजांची चोरी करणाऱ्या पाच जणांना नाशिक तालुका पोलिसांनी अटक केली. पोलिस आणि तहसील कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे रविवारी दुपारी छापा टाकला. या ठिकाणाहून पोलिसांनी दोन ट्रक, ब्लास्टिंग मशिन, एक जेसीपी मशिन व दोन डंपर जप्त केले असून, तीन वाहनमालक फरार झाले आहेत.

विल्होळी परिसरातील दगडाच्या खाणीमधून मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची तस्करी होत असल्याची माहिती तहसीलदार गणेश राठोड यांना मिळाली होती. मात्र, अनेकदा छापे मारूनही संशयित आरोपी फरार होण्यात यशस्वी ठरले होते. आज, दुपारी तहसीलदार राठोड व पोलिसांना पक्की खबर मिळाली. त्यानंतर दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांनी दुपारी पावणेबारा वाजेच्या सुमारास संयुक्तपणे छापा मारला. यावेळी सुरेश गुरूप्रसाद जल्ली (चालक), राजू गायकवाड (चालक), आण्णा लष्करे (चालक व मालक), मदन रसाळ (चालक) आणि बाळ बद्रे (चालक) यांना पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली. त्यांच्याकडील दोन ट्रक, ब्लास्टिंग मशिन, एक जेसीपी मशिन व दोन डंपर जप्त करण्यात आले. या वाहनांच्या मालकांपैकी दिलीप पाटील, मोहन वामन भावनाथ तसेच राजू बद्रे फरार झाले आहेत. सातपूर परिसरातील दिलीप पाटील वगळता इतर सर्व संशयित विल्होळी परिसरातील रहिवाशी आहेत.

संशयित केव्हापासून खनिजांची तस्करी करीत होते, याचा तपास केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी नाशिक तालुका पोलिसांनी कलम ३७९, ५११ व महाराष्ट्र गौण ​खनिज कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्ह्याची नोंद केली आहे. कारवाईत पोलिस ​उपनिरीक्षक राजकुमार उपासे, एएआय ढुमसे, तहसीलदार गणेश राठोड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ज्ञानपीठराव, संबळ अन् गिरणा गौरव

0
0

>> अशांत किरकिरकर

ज्ञानपीठराव ठरलेले प्रा. भालचंद्र नेमाडे इतक्या मोठ्या उंचीचे झाले असताना गिरणा गौरवसारखा मातीतला पुरस्कार स्वीकारण्यासाठी येणार का? असा प्रश्न समस्त नाशिककर एकमेकांना विचारीत असताना संबळाच्या गजरात नेमाडे यांचे कालिदासला आगमन झाले. नेमाडेंचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. ज्ञानपीठ जाहीर झालेला नसताना त्यांनी गिरणा प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी येण्याचा शब्द दिला. ते आले, त्यांनी अत्यंत नम्रपणे हा पुरस्कार स्वीकारला व मोबदल्यात प्रचंड अशा उंचीचे विचारही दिले. साहित्य संमेलनासाठी घुमानला रेड कार्पेट अंथरलेले असताना हा माणूस नाशिकला येत नाही म्हटले तरी (त्यांच्या मानाने) हा छोटा जीवनगौरव स्वीकारतो म्हणजे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या गतीपर्यंत येऊन पोहोचलेला तो वाटत रहातो.

भालचंद्र नेमाडे हे नेहमीच वादग्रस्त राहिलेले व्यक्तिमत्त्व. विशेष म्हणजे हे वादग्रस्तपण त्यांनी कधीही नाकारलेले नाही. संशोधनामध्ये काठोकाठ बुडून गेलेला हा माणूस सामान्यांच्या पातळीवर येऊन त्यांच्याशी त्यांच्यासारखेच बोलतो. रोजच्या जगण्याला सुसह्य करणारे काहीतरी नवीन सांगतो म्हणजे नक्कीच त्याच्यातला दम आपण मानला पाहिजे. त्यांचा नम्रपणा कधी जाहीर होतो तर त्यांना पुरस्कार देणारा शेतातला एक साधा शेतकरी, भास्कर गुंजाळ त्यांना लवून नमस्कार करतो, तर नेमाडे त्यांच्या पायाला हात लावून त्यांना पुन: नमस्कार करतात. यात त्यांचा नम्रपणा आहे. संबळ वाजवून श्रोत्यांमध्ये चैतन्य भरणारा कृष्णा साबळे त्यांना एका तालात संबळ वाजवून दाखवतो तेव्हा ते अत्यंत प्रामणिकपणे त्याच्या जवळ जात त्याच्या पाठीवर हात ठेवतात व त्याचा सत्कार करतात. यात त्यांचा नम्रपणा आहे. मागील श्रोते जेव्हा आवाज येत नाही हो म्हणून मोठ्याने बोंब ठोकतात तेव्हा माझा आवाज बंद करू का? असे विनोदी स्वरात विचारतात तेव्हा त्याचा नम्रपणा जाहीर होतो. नेमाडे खऱ्या अर्थाने असे मोठे वाटत रहातात. नेमाडे म्हणतात, गावाबाहेर कशाला मोठेपणा शोधायचा, त्यासाठी मुंबई, दिल्ली कशाला जायचे? येथेच, आपल्या गावात मोठेपणा आहे. तळाशी रहायला शिका, तळात माती असते, तळात गवत असते, छोटी रोपटे असतात. शिखरावर बर्फ असतो तेथे जाऊ नका. तेथे ऑक्सिजन नाही, तेथे माणूस बेशुध्द पडतो. किती साधे सोपे तत्त्वज्ञान. आता शेतकऱ्यांनीच बंड करून उठले पाहिजे हे जितक्या साधेपणाने ते सांगतात तितक्याच साधेपणाने ज्ञानेश्वर पहिला बंडखोर नाहीये हो, तो आपल्याला माहीत असलेला बंडखोर आहे. त्याच्याआधी शेकडो होऊन गेले, विशेष म्हणजे ते सगळे गोदावरी व तापी खोऱ्यातले होते. त्याच्या आधी १२०० वर्षे प्राकृत भाषा होती. तिला जपण्याची वेळ आता आली आहे. आपली मराठी भाषा ज्यापासून उत्पन्न झाली ती प्राकृत काळाच्या उदरात गडप होत चालली आहे, तिला वाचवा असा टाहोही ते फोडतात. जैन लोक डोंगरावर जाऊन खाली असलेल्या समाजाविषयी चर्चा का करतात? असा प्रश्न एकाला विचारला असता त्याने जैनांबद्दल अनुद्गार काढले त्याला समज देताना पाश्चात्यातील एक विद्वान म्हणतो की, जैन धर्म खूप आधीचा आहे. अगदी बुध्दांनाही जैनांनी अहिंसा शिकवली होती येथपर्यंत नेमाडे सांगतात. शेवटी ते म्हणतात की, आपली नवता आपण आपल्या परंपरेतून शोधले पाहिजे. सतीची चाल अकबराने बंद केली होती, नेताजी पालकरांना शिवाजी महाराजांनी पुन्हा आपल्या धर्मात घेतले होते याचा विचार करा व आजची पाऊले टाका असा उपदेशही ते देऊन जातात. त्यांचे हे विचार ऐकल्यावर कळते की नेमाडे ज्ञानपीठराव का आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजतारा ठरताहेत धोकादायक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पवननगर प्रभाग क्रमांक ४६ मधील आनंदनगर, लोकहिताय चौक, दत्तचौक तसेच प्रभाग क्रमांक ४३ येथील परिसरात विद्युत तारांचे मोठे जाळे पसरले आहे. या विद्युत तारा रहिवाशांच्या घरालगत असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. यामुळे विद्युत तारा भूमिगत करण्यात याव्यात, अशी मागणी लोकहिताय संघर्ष समितीकडून करण्यात आली आहे.

सिडकोतील बहुतांश भागात विद्युततारा भूमिगत करण्यात आल्या आहेत. मात्र, अनेक भागात विद्युत तारा घरांना लागूनच आहेत. गेल्या तीन वर्षांपूर्वी दहा वर्षाय मुलीचा पोलवरील उघड्या विद्युत तारांच्या वीज प्रवाहामुळे मृत्यू झाला होता. त्यांनतर विद्युत कंपनीने सिडकोतील अनेक भागात विद्युत तारा भूमिगत केल्या. परंतु, पवननगर प्रभाग क्रमांक ४६ मधील आनंदनगर, लोकहिताय चौक, दत्तचौक तसेच प्रभाग क्रमांक ४३ येथील परिसरातील तारा पूर्णतः विद्युत तारांनी व्यापलेला असतानाही वीज कंपनीचे याकडे लक्ष नाही. गेल्या महिन्यात समता चौकात विद्युततारा तुटून फार मोठा अपघात झाला होता. असाच अपघात इतरही होण्याची दाट शक्यता आहे.

अनेक भागात विद्युत तारा घरांच्या गॅलरीला लागूनच आहेत. सिडकोच्या घरांचे बांधकामव उंचा वाढविल्यामुळे विद्युत तारा घराला लागूनच आहेत. यामुळे अपघातातच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

समितीच्या मागण्या

पवननगर प्रभाग क्रमांक ४६ मधील आनंदनगर, लोकहिताय चौक, दत्तचौक तसेच प्रभाग क्रमांक ४३ येथील परिसरातील विद्युत तारा भूमिगत कराव्यात.

लोकहिताय चौकामधील महापालिकेच्या शाळेलगर असलेले विद्युत जनित्र इतरत्र हल‌विण्यात यावे.

वीजतारांना सेफ्टीपाईप बसविण्यासाठी घेतलेले एक ते दोन हजार रुपये वीज कंपनीने परत करावते.

वीज बिल ग्राहकांना किमान पंधरा दिवस आधी मिळावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूमाफियांचा अधिकाऱ्यांवर हल्ला

0
0

म. टा. प्रति‌निधी, जळगाव

वाळूमाफियांची दहशत पुन्हा वाढली असून, शिरसोली- मोहाडी रस्त्यावर गौणखनिजांची चोरी रोखण्यासाठी पेट्रोलिंग करीत असलेल्या मंडल अधिकाऱ्यासह तीन तलाठ्यांवर डम्पर नेण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली. डम्पर तहसील कार्यालयात जमा करण्याचे सांगितल्याचा राग आल्याने अधिकाऱ्यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी एका संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.

जळगाव तालुक्यातील शिरसोली- म्हसावद भागात गौणखनिजांची चोरी रोखण्यासाठी महसूल अधिकारी व तलाठी यांच्या पेट्रो‌लिंगच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शनिवारी मध्यरात्रीपासून मंडल अधिकारी राहुल मधुकर नाईक, तलाठी घनश्याम लांबोळे, तलाठी आर. टी. वंजारी व तलाठी के. एम. बागूल आय टेन कारमधून पेट्रोलिंग करीत होते. शिरसोली, म्हसावद, लमांजन भागात पाहणी केल्यानतंर ते अनुभूती शाळेजवळील शिरसोली- मोहाडी रस्त्यावर आले. शनिवारी मध्यरात्री अडीच वाजता त्यांना वाळू भरलेला डम्पर (एमएच १९/ झेड ४७३६) त्यांनी थांबविला. चालक राजू आत्माराम कोळी (वय ३०, रा. वडगाव) याला खाली उतरवले. त्याच्यासोबत डम्परमालकाचा पुतण्या धनराज कोळी खाली उतरला. डम्परचालकाकडे पावती नसल्याने, तसेच रात्री वाहतुकीस बंदी असल्याने त्यांना डम्पर तहसील कार्यालयात नेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

अधिकारी थोडक्यात बचावले!

चालक माहिती देत असताना सोबत असलेल्या धनराजने, अधिकाऱ्यांना डम्पर कुठेच नेणार नाही, असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मंडल अधिकारी राहुल नाईक यांची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्कीही केली. चालक राजू याच्याकडून डम्परची किल्ली हिसकावून त्याने डम्पर सुरू केला. डम्पर रिव्हर्स घेऊन त्याने वाळू रिकामी केली. त्यानंतर डम्पर पुन्हा सुरू करून तो रस्त्यावर थांबलेल्या अधिकाऱ्यांच्या अंगावर भरधाव आणला. त्यातून बचाव करीत अधिकारी आपल्या कारमध्ये बसले आणि कार रोडवरून खाली नेत स्वतःचा बचाव केला. त्यानंतर धनराज डम्परसह फरारी झाला. अधिकाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती देऊन चालक राजूला त्यांच्या ताब्यात दिले.

गुन्हा दाखल

या प्रकरणी मंडल अधिकारी राहुल नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पो‌लिसांत संशयित राजू कोळी व धनराज कोळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अशोक अहिरे तपास करीत आहेत. संशयित चालकास घेऊन पोलिसांनी आज दुपारी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. फरारी धनराज यांचा शोध सुरू आहे.

..तर वाचलो नसतो!

या घटनेबाबत माहिती देताना अधिकारी राहुल नाईक, तलाठी घनशाम लांबोळे, आर. टी. वंजारी व के. एम. बागूल यांनी, हटलो नसतो, तर आम्ही वाचलोच नसतो, अशी प्रतिक्रिया 'मटा'शी बोलताना दिली. छोट्याशा रस्त्यावर उभे असताना डम्पर रिव्हर्स घेऊन खूप अंतरावर वाळू रिकामी करण्यासाठी गेलेल्या धनराजने डम्पर भरधाव आमच्याकडे आणत असताना क्षणातच आम्ही कारमध्ये बसून गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली. त्यामुळे थोडक्यात बचावल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्याची ५९ दुकाने पडली बंद!

0
0

२९ रमिट रूम, १६ बियर शॉप बंद

अरविंद जाधव, ना​शिक

गेल्या आर्थिक वर्षात नाशिक जिल्ह्यातील मद्याची ५९ दुकाने परवाना नूतनीकरण केला नाही म्हणून बंद करण्यात आली. यात २९ परमिट रूम, १६ बियर शॉपी आणि एका देशी-विदेशी मद्य विक्रीच्या दुकानाचा समावेश आहे.

साधारणतः हमखास पैसा जमा होणारा व्यवसाय म्हणून मद्य विक्रीचे दुकान किंवा परमिट रूम सुरू केले जाते. परमिट रूम, वाइन शॉप, बियर शॉपच्या परवान्यासाठी अशरक्षः मारामार होते. मात्र, परवाना शुल्क व नंतर येणारा खर्च यामुळे मद्य व्यवसाय सहजतेने सुरू होत नाही. तसेच, झाला तरी परवानाधारकास वर्षानंतर 'लायसन्स फी' भरून परवान्याचे नूतनीकरण करावे लागते. याबाबत माहिती देताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, लोकसंख्या व ठिकाण यानुसार ही लायसन्स फी आकारली जाते. शहरातील मद्य विक्रीच्या दुकानासाठी हे शुल्क जवळपास ७ लाख ६२ हजार इतके आहे. तेच परमिट रूमसाठी ४ लाख ६७ हजार तर बियरशॉपसाठी १ लाख ८७ हजार रुपये इतके आहे. मद्य विक्रीचे दुकान सुरू ठेवणे तुलनेत परमिट रूमपेक्षा सोपे आहे. परमिट रूमसाठी मालकास चांगली सेवा पुरवावी लागते. त्यावरच ग्राहकांची संख्याही अवलंबून असते. काही कारणांमुळे ग्राहकांची संख्या रोडवल्यास त्याचा परिणाम उत्पन्नावर होतो. मग, वार्षिक परवान्याचे शुल्कही जमा होत नाही. त्यामुळे परमिट रूम बंद करण्याशिवाय पर्याय नसतो, असे संबंधित अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

गत आर्थिक वर्षात जिल्ह्यातील तब्बल २९ परमीट रूम बंद झाले. बियर शॉपीबाबत देखील तिच ओरड असून, वर्षभरात १६ बियर शॉपी मालकांना दुकानांना ताळे ठोकण्याची वेळ आली. तर, एक मद्य विक्रीचे दुकान परवाना नूतीनकरण न केल्यामुळे बंद झाले. आगामी काळात यातील काही व्यावसायिक परवाना नूतनीकरण करण्यासाठी पुन्हा येऊ शकतात. अशावेळी शुल्क व त्यावरील व्याज आकारून परवान्याचे नूतनीकरण करून देता येते. मात्र, तोपर्यंत संबंधित दुकान किंवा हॉटेल बंदच ठेवण्यात येईल, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संबंधित अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

महसुलातही घट

गत आर्थिक वर्षात राज्य उत्पादन शुल्काच्या महसुलातही घट झाल्याचे समोर आले आहे. २०१४-१५ या आर्थिक वर्षात नाशिक विभागाला १ हजार ४३७ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात वर्षाअखेर १ हजार २४२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. हे उत्पन्न २०१३-१४ या वर्षापेक्षाही कमी आले. या आर्थिक वर्षात राज्य उत्पादन शुल्क विभागाला १ हजार २९३ कोटी रुपयांचे उत्पन्न हाती आले होते. मद्य निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी फिरवलेली पाठ, हे महसूल घटण्यामागचे मुख्य कारण ठरले. गत आर्थिक वर्षात मद्य निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे दोन महत्वाचे प्लांट दुसरीकडे हलवण्यात आल्याचे, या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुके नव्हे, धूळच!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरात रविवारी पहाटेपासून धुळकट वातावरण झाल्याने वातारणात धुळ आहे की धुके याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण झाले. अनेकांनी एकमेकांना फोन करुन व व्हॉट्सअपद्वारे विचारपूस करीत माहिती घेण्याचा प्रयत्न केला.

अवकाळी पावसाचा तडाका ओसरल्यानंतर उन्हाचा तडाका वाढू लागला. रविवारी सकाळी मात्र वातावरणात अचानक कमालीचा बदल झाल्याने निरभ्र आकाशाची जागा धुळीच्या साम्राज्याने घेतली. सकाळी सुरू झालेले धुळीचे वादळ सायंकाळी शांत होताना दिसले.

शनिवारी आकाश निरभ्र असताना रविवारी पहाटे अचानक अकाशात धुळीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे रविवारी सकाळी फिरायला निघालेल्या नागरिकांना काही वेळात पाऊस पडणार असे वाटले. मात्र, दुपार होऊनही वातावरणात बदल न झाल्याने मैदानावर व लांबवरून धुळीचे लोट येताना दिसले. इमारतींच्या गच्चीवरुन नजर टाकली असता रोज दिसणारी पांडवलेणी, चामरलेणी, रामशेजचा किल्ला दिसेनासा झाला. या ठिकाणी फक्त धुळीचे लोट दिसत होते.

दम्याचे आजार असलेल्यांना या वातावरणाचा त्रास झाला अनेकांना बोलतांना खोकल्याची उबळ येत होती तर लहान मुलांना देखील या वातावरणाने त्रास होऊ शकतो असे डॉक्टरांचे म्हणणे होते. धुळेचे लोट दिसत असले तरी त्याचे अस्तित्व जाणवले नाही. अखाती देशांमध्ये आलेल्या धुळीच्या वादळाचे हे परिणाम असू शकतील असे मत पर्यावरण तज्ञांनी व्यक्त केले. या अगोदरही दोन वर्षापूर्वी वातावरणात बदल झाल्याने असे वातावरण तयार झाले होते; मात्र त्यावेळी धुळीचे अस्तित्व जाणवत होते. यावेळी धुळीचे अस्तित्व दिसत नसल्याने नागरिकांनी सुस्कारा टाकला. नाशिक शहरातील म्हसरुळ परिसरात धुळीचे लोट येताना दिसत होते शहरातील मोकळ्या परिसरात याचे प्रकर्षाने अस्तित्व जाणवले.

वातावरणातील धुळीने आजार होण्याची शक्यता आहे. यामुळे विषाणूंची वाढ होणार असून अॅलर्जीच्या रुग्णांमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे डोकेदुखी, त्वचाविकार वाढणार आहे. धुलीकण डोळ्यात गेल्याने चूरचूर वाढणार असून इजा होण्याची शक्यता आहे त्याच प्रमाणे दमा असल्याने याची काळजी घ्यावी.

- डॉ. दिपाली देसले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images