Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

क्लीन इंडियाला जोड प्रात्यक्षिकांची

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

के. के. वाघ इंजिनीअरिंग कॉलेजच्या सिव्हिल इंजिनीअरिंग विभागातर्फे आयोजित फोर्स २०१५ या राष्ट्रीय स्पर्धेला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. या स्पर्धेत 'क्लीन इंडिया, ग्रीन इंडिया' या संकल्पनेला प्रत्यक्षिकांची जोड देण्यात आली आहे. स्वच्छतेच्या संकल्पनेवर आधारित बहुविध प्रकल्पांचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.

सिव्हिल इंजिनीअरिंग विभाग आणि सिव्हिल इंजिनीअरिंग स्टुडण्टस असोसिएशन (सेसा) यांच्या वतीने फोर्स २०१५ ही राष्ट्रीय स्पर्धा आयोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी प्रदूषण या थीमवर आधारित प्रकल्प सादर झाल्यानंतर यंदा 'क्लीन इंडिया, ग्रीन इंडिया' ही थीम घेण्यात आली आहे. सिव्हिल इंजिनीअरिंग क्षेत्राद्वारे प्रदूषण रोखण्यासंबंधीचे बहुविध प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले आहेत. स्पर्धेचे उदघाटन के के वाघ शिक्षण संस्थेचे विश्वस्त काशिनाथ टर्ले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य केशव नांदूरकर, विभागप्रमुख डॉ. पी. डी. जाधव, इव्हेंट कोऑर्डिनेटर प्रा. श्रीकांत बाविस्कर, सेसा प्रेसिडेंट संदेश माने, प्रा. सुहास पंडित आदी उपस्थित होते. सुमारे ७०० विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविला आहे. ग्रीन बिल्डींग, ग्रीन आर्किटेक्चर, ग्रीन टाऊनशीप्स, ग्रीन बंगलो यासह विविध प्रकारच्या संकल्पनांवर आधारित प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले आहेत. उदघाटन समारंभानंतर ब्रीज ओ मानिया, कॅड एन्झा, सर्व्हेइंग एव्हरेस्ट, टॉवर पॉवर, ड्रामा, पोस्टर स्पर्धा, क्वीझ स्पर्धा, स्नॅप हंट आदी कार्यक्रमांचे आयोजन झाले. ड्रामा आणि जनरल नॉलेजवर आधारित शनिवारी (दि. १४) कार्यक्रम होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बुकिंग करूनही मिळेना सिलिंडर

0
0

म. टा. वृत्तसेवा, लासलगाव

पंधरा ते वीस दिवसांपासून गॅस सिलिंडरचे बुकिंग करूनही मिळत नसल्याने लासलगाव व परिसरातील नागरिक येथील एचपी गॅस एजन्सीच्या कारभाराला वैतागले आहेत. सिलिंडर मिळत नसल्याने संतप्त झालेल्या गॅस ग्राहकांनी बुधवारी येथील एजन्सीचे कामकाज बंद पाडत कर्मचाऱ्यांना काही वेळासाठी ऑफिसमध्ये कोंडून ठेवत संताप व्यक्त केला.

बुकिंग करूनही सिलिंडर मिळत नसल्याच्या तक्रारींमध्ये सध्या कमालीची वाढ झाली आहे. घरपोच डिलेव्हरी मिळणे कठीण झाल्याने गेल्या काही दिवसांपासून दररोज पहाटे पाच वाजेपासून शेकडो नागरिक सिलिंडर मिळेल या आशेने लासलगावच्या जाधव गॅस एजन्सीबाहेर रांगांमध्ये उभे राहिल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे येथे मोठी वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होत आहे. तासनतास रांगेत उभे राहूनही अनेकांना सिलिंडर मिळत नसल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत. याचा प्रत्यय बुधवारी लासलगाव येथे पहावयास मिळाला. पहाटेपासूनच शेकडो नागरिक सिलिंडर घेण्यासाठी रांगेत उभे होते. दुपारी बारा वाजेपर्यंत एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तासनतास थांबूनही सिलिंडर मिळत नसल्याने अखेर नागरिकांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट ऑफिसमध्ये शिरकाव करीत कामकाज बंद पाडले आणि कर्मचाऱ्यांना कोंडले. एजन्सीची वितरण व्यवस्थाच कोलमडून पडल्याने आता सिलिंडरचा पुरवठा कधी सुरळीत होतो याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

गेल्या चार दिवसांपासून दररोज येथे सिलिंडर घेण्यासाठी फेरा मारत आहे. येथे आल्यावर एजन्सीकडून व्यवस्थित माहिती दिली जात नसून, तासनतास रांगेत उभे राहूनही सिलिंडर मिळणे कठीण झाले आहे. - चंद्रकला कडरे, गॅस ग्राहक

बुकिंग करून महिना झाला. मात्र, एजन्सी आम्हाला केवळ फेऱ्या मारायला लावत आहे. पाच दिवसांपासून सिलिंडर घेण्यासाठी रिक्षाने येथे येत आहे. सिलिंडर तर मिळतच नाही रिक्षा भाडे वाया जात आहे. - ग्यासउद्दीन मणियार, ग्राहक

एचपी कंपनीकडूनच सिलिंडरचा पुरवठा कमी झाला असल्याने वितरण व्यवस्था कोलमडली आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलणे सुरू असून, पुरवठा वाढवून वितरण सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. - बाळासाहेब जाधव, संचालक, जाधव गॅस एजन्सी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणांवर पुन्हा बुलडोझर

0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

नाशिकमध्ये काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा सातपूला झंझावात पहायला मिळाला. गंगापूररोड बारदान फाटा ते अशोकनगर बस स्टॉपपर्यंत रस्त्यालगतची शेकडो अनधिकृत अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. यामुळे अनेक वर्षांपासून अशोकनगर रस्त्याचा गुदमरलेला श्वास मोकळा झाला.

महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी शहरात मुख्य रस्त्यालगत असलेली अतिक्रमणे काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. यात अनेक वर्षांपासून गंगापूररोडवरील मोठ्या प्रमाणात असलेल्या हॉटेलांच्या अतिक्रमणावर महापालिकेने बुलडोझर चालविला होता. यामुळे शहरातील प्रसिद्ध गंगापूररोडवरील अतिक्रमण काढल्याने अनधिकृत शेडधारकांनी त्याची धास्ती घेत स्वतःहून अतिक्रमण काढले. परंतु, अनेक दिवसांपासून सातपूरला अतिक्रमण मोहिमेने विश्रांती घेतल्यानंतर शुक्रवारी सकाळपासूनच गंगापूररोडवरील बारदान फाट्यापासून अतिक्रमण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. यात बारदान फाट्यावरच असलेल्या अनधिकृत हॉटेलचे सर्वात प्रथम अतिक्रमण काढण्यात आले. यानंतर बारदान फाटा ते शिवाजीनगर कार्बननाकापर्यंत राबविण्यात आलेल्या मोहिमेत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेले अनधिकृत शेड व वॉलकंपाऊंडचे अतिक्रमणे जमिनदोस्त करण्यात आले. दुसऱ्या भागात शिवाजीनगर कार्बन नाका ते अशोकनगरपर्यंतच्या रस्त्यालगतचे अतिक्रमणही जमिनदोस्त करण्यात आले. अतिक्रमण मोहीम सुरू असतांना बघ्यांची एकच गर्दी मोहिमेच्या ठिकाणी झाली होती. परंतु, बारदान फाटा ते शिवाजीनगर कार्बननाकापर्यंत गंगापूर पोलिस ठाणे, तर कार्बननाका ते अशोकनगरपर्यंत सातपूर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी होत असलेली गर्दी पांगविण्याचे काम करत होते. मोहिमेत महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सोमनाथ वाडेकर, विभागीय अधिकारी महेंद्रकुमार पगारे यांसह नगररचना, विद्युत, आरोग्य व अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. तसेच गंगापूर व सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी, अधिकारी व पोलिस हवालदार यांनी मोहिमेत चोख बंदोबस्त ठेवला.

हवालदाराकडून विरोधाचा प्रयत्न

महापालिकेच्या मोहिमेत जाधव नावाच्या हवालदाराने भवर टॉवर समोरील अतिक्रमण हटविण्यास विरोध करण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी विभागीय अधिकारी पगारे यांनी हवालदारास आपण ऑनड्युटी असल्याची जाणीव करून दिली. यानंतर गंगापूर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाधव हवालदारास बाजूला करत त्यांचे पत्र्याचे शेड हटविण्याचे आदेश दिले. जाधव यांच्या मुलांनी जेसीबी चालकावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना बाजूला करत जाधव यांचे अनधिकृत शेडचे अतिक्रमण अखेर काढलेच. यावेळी कायद्याचे पालनाची जबाबदारी असलेल्यांनीच कायदा हातात घ्यावयाचा काय, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला.

मटाच्या वृत्ताची महापालिकेकडून दखल

'मटा'ने अनधिकृत हॉटेलांमुळे रस्त्यांच्या कामात अडथळा येत असल्याचे वृत्त प्रसारित केले होते. याची दखल महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने घेत सर्वच अनधिकृत हॉटेल्स अतिक्रमण मोहिमेत हटविण्यात आली. तसेच उर्वरित हॉटेल्सचे अनधिकृत अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याचे अतिक्रमण हटाव विभागाच्या अधिकाऱ्यांनी 'मटा'ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मवीर एक्स्पोला प्रारंभ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

के के वाघ इंजिनीअरींग कॉलेजच्या इलेक्ट्रिकल विभागाच्यावतीने आयोजित कर्मवीर एक्स्पोला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. या स्पर्धेत देशभरातील तब्बल ९०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. विद्यार्थ्यांचे अत्यंत नावीन्यपूर्ण प्रकल्प यात सादर झाले असून, शनिवारी या एक्स्पोचा समारोप होणार आहे.

इलेक्ट्रिकल विभाग आणि आयईटी (युके) नाशिक लोकल नेटवर्क यांच्यावतीने या एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी या एक्स्पोच्या उद्घाटन समारंभप्रसंगी कॅटाफार्मा केमिकल्सचे चेअरमन डॉ. श्रीकांत कारवा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कल्पना तंत्रज्ञानाने बदलतील. स्वतःवर भरवसा ठेवून काम करायला हवे. एक दिवस तंत्रज्ञान बदलेल, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी एमएसएस इंडियाचे एमडी मंगेश नटाल, कोसो इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष उमेश वानखेडे, इलेक्ट्रो फॅबचे एमडी युत्कर्षा सांगवी, अविनाश शिरोडे, अजय कहाने, संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ आदी उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. केशव नांदूरकर यांनी एक्स्पोची माहिती दिली. केंद्र सरकारने मांडलेल्या मेक इन इंडिया या संकल्पनेला या एक्स्पोमध्ये अधिक चालना देण्यात आली आहे. देशाच्या विविध भागातील विद्यार्थी एक्स्पोत सहभागी झाले असून, त्यांनी खासकरून समाजोपयोगी व अपारंपरिक ऊर्जेवर आधारीत प्रकल्प सादर केले आहेत. स्पर्धेत विजेत्या ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे दिली जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बस डेपो कागदोपत्री पूर्ण

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड येथे नवीन बसडेपोचे काम पूर्ण झाल्याचा दावा एसटी महामंडळाकडून केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात दोन महिन्याहून अधिक काळापासून येथे पंप बसू शंकलेला नाही. आताही कामे पूर्ण झाल्याचे कागदीघोडे नाचविणारे महामंडळ लवकरच पंप बसविला जाईल, असेच सांगण्यात मश्गूल आहे. त्यामुळे कुंभमेळा तोंडावर आला असताना हे काम पूर्ण होणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

शहरात सर्व सरकारी विभागांनी सिंहस्थाच्या कामाचे सुक्ष्म नियोजन केले असताना महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचे काम मात्र संथगतिने सुरू आहे. शहरात सध्या दोन बस डेपो आहेत. त्यांच्या माध्यमातून शहर वाहतुकीचे नियोजन करण्यात येत असते. गेल्या काही वर्षात शहराचा भौगोलिक विस्तार वाढल्याने शहराला आणखी एका बस डेपोची गरज होती. ही गरज ओळखून सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड येथे नव्याने बस डेपो मंजूर करण्यात आला. त्याच्या कामाला देखील

सुरुवात करण्यात येऊन काही काम पूर्ण करण्यात आले. हा बस डेपो सुरु करण्यासाठी येथे पेट्रोल पंपाची आवश्यकता आहे.

या पेट्रोल पंपाचे काम अजून सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे पेट्रोल पंपाविना बस डेपो सुरू झाला, तर पेट्रोल भरण्यासाठी गाड्या नाशिकला येणार का असा प्रश्न आहे. नव्याने होत असलेल्या डेपोतील रस्ते मुरूम टाकून तयार करण्यात आले आहेत. पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर येथे गाड्या आणणे मुश्किल होणार आहे. त्यामुळे या डेपोतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करावे, अशी मागणी होत आहे. तसेच येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मुलभूत सुविधा देण्यात आलेल्या नाही.

त्यामुळे कर्मचारी येथे काम कसे करणार याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. सिंहस्थात डेपो सुरू झाल्यानंतर अडचणींचे निराकरण करण्यास अवघड जाईल. नवा एसटी डेपो टप्प्याटप्याने प्रायोगिक तत्वावर सुरू करावा नाशिकरोड व आसपासच्या गाड्या तेथून सुरू कराव्यात, अशी मागणी नागरिकांतर्फे करण्यात आली आहे.

काम पूर्ण झाल्याचा दावा

नाशिकरोडच्या डेपोचे काम पूर्ण झाल्याचा दावा एसटी प्रशासनाने ३१ जानेवारी रोजी दिवाकर रावते यांनी घेतलेल्या मिटिंगमध्ये केला होता. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनीही घेतलेल्या मिटिंगमध्ये काम पूर्ण झाल्याचा दावा महामंडळाने करून आपली पाठ थोपटून घेतली होती. महामंडळाच्या दृष्टीने काम पूर्ण झाले असेल, तर डेपो का सुरू केला जात नाही, असा सवाल नागरिकांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फार्मसी कंपन्यांमध्ये पीएचडी सेंटर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय किंवा बहुराष्ट्रीय पातळीवर औषधांचे उत्पादन करणाऱ्या फार्मसी कंपनीत संशोधन आणि विकासाचे काम चालत असेल तर तेथेच पीएचडीचे सेंटर सुरू करण्यास आरोग्य विज्ञान विद्यापीठ प्रयत्नशील असल्याची माहिती कुलगुरु डॉ. अरुण जामकर यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यात संशोधनाला अधिक चालना मिळणार आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी एज्युकेशन अॅड रिसर्च (नायपर) ही संस्था नाशिकला स्थापन करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. त्यापार्श्वभूमीवर आयोजित 'मटा राऊंड टेबल कॉन्फरन्स'मध्ये डॉ. जामकर बोलत होते. नाशिकमध्ये ग्लॅक्सो स्मिथक्लाइन या बहुराष्ट्रीय कंपनीचे अत्याधुनिक असा संशोधन आणि विकास विभाग (आर अँड डी) आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या विभागात विविध प्रकारच्या औषधांवर संशोधन करुन नवनवीन औषधे बाजारात आणली जात आहेत. अशा प्रकारचा विभाग हा त्या फार्मसी कंपनीची खऱ्या अर्थाने संपत्ती असते. ही बाब लक्षात घेऊन आणि संशोधनाला चालना मिळावी म्हणून त्या विभागालाच पीएचडी सेंटरची मान्यता देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे डॉ. जामकर यांनी सांगितले. विभागात काम करणारे अधिकारीच या सेंटरद्वारे विद्यार्थ्यांना गाईड म्हणून उपलब्ध होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शहरात किंवा गावातच पीएचडीची संधी उपलब्ध होऊ शकेल. इच्छूक कंपन्यांनी त्यांचा प्रस्ताव विद्यापीठाला सादर करावा, असे आवाहनही कुलगुरुंनी केले आहे. फार्मसी कंपन्यांना करावयाच्या संशोधनाचा विषय विद्यार्थ्यांना दिला तर विद्यार्थी याच विषयात प्रकल्प सादर करतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण असा विषय मिळेल तर कंपनीला त्या विषयातील संशोधन करुन माहिती उपलब्ध होईल. शिक्षण क्षेत्र आणि उद्योग यांची सांगड घालण्यास ही बाब अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वास डॉ. जामकर यांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवकाळी धिंगाणा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गुरुवार पाठोपाठ शुक्रवारीही जिल्ह्याच्या काही भागाला अवकाळी पाऊस व गारपिटीचा सामना करावा लागला. दिंडोरी तालुक्यात शुक्रवारी रात्री मुसळधार पावसासह तुफान गारपीट झाली. तसेच, येवला, नांदगाव व जिल्ह्याच्या इतर भागांतही जोरदार पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, द्राक्ष उत्पादकांचे धाबे दणाणले आहे. दिंडोरी तालुक्यात काही भागात चार इंचाचे गारांचे थर साचले होते. रात्री उशिरापर्यंत अवकाळीचे थैमान सुरूच होते. गहू, कांदा व भाजीपाल्याचेही मातेरे झाले आहे.

दिंडोरी तालुक्यात ओझरखेड, वणी-पिंपळगाव परिसर, मावडी फाटा, बहादुरी, तीसगाव येथे तुफान गारपीट झाली. शेतामध्ये सुमारे चार इंचाचा गारांचा थर साचला होता. शेतात पांढरी चादरच पसरल्याचे दृश्य दिसत होते. या भागात निर्यातक्षम द्राक्षे मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू असल्याने द्राक्ष उत्पादकांवर कु-हाडच कोसळली आहे.

निफाड तालुक्यात लासलगाव, विंचूर, नैताळे, शिवरे फाटा, निफाड, कोठुरे, पिंपळस, चांदोरी आदि भागात अवकाळी पावसाच्या सारी कोसळल्या आहेत. नांदगाव व येवला तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला. गेल्या मार्चची पुनरावृत्ती गेल्या वर्षी मार्च महिन्यातच तुफान गारपीट झाली होती. ४, ५, ६, ९ व १३ मार्च या काळातच अवकाळी पाऊस व गारपिटीचा मारा झाला होता. यंदा पुन्हा त्याची पुनरावृत्ती झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांद्याची विक्रमी आवक

0
0

म. टा. वृत्तसेवा, लासलगाव

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी लाल कांद्याची विक्रमी आवक झाली. दिवसभरात तब्बल ४५ हजार क्विंटल कांद्याची विक्रमी आवक झाली होती. कांदा विक्रीसाठी सुमारे २२०० वाहने बाजार समितीत दाखल झाल्याने बाजार आवर गर्दीने फुलून गेले होते.

एकाच दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणत आवक झाल्याने लासलगावच्या मुख्य रस्त्यांवर कांद्याच्या ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अनेकवेळा ट्रॅफिक जॅम झाल्याचे चित्र निर्माण झाल्याचे चित्र दिसत होते. सध्या निर्माण होत असलेल्या ढगाळ वातावरणाने कांदा उत्पादकांची चिंता वाढली आहे. तयार झालेला कांदा अवकाळी पावसात खराब होण्याची भीती असल्याने कांदा उत्पादक शेतकरी कांदा विक्रीसाठी गर्दी करताना दिसत आहे. त्यातच रविवारी साप्ताहिक सुट्टी व सोमवारी माथाडी कामगारांनी मुंबई येथे एक दिवसाचा संप करणार असल्याचे जाहीर केल्याने सोमवारीही बाजार समिती बंद राहणार आहे. सलग सुट्यांमुळे व बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांनी शुक्रवारी लासलगाव बाजार समितीत कांदा विक्रीसाठी एकच गर्दी केल्याचे चित्र दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पर्यटन वाढीसाठी सर्व्हेक्षण गरजेचे

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

टुरिझम वाढविण्यासाठी नामांकीत व्यावसायिक संस्थेकडून सर्व्हेक्षण व्हायला हवे. तसेच, हेरिटेज वॉकची संकल्पना अस्तित्वात आणायला हवी, असा सूर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि ट्रॅव्हल एजन्टस् असोसिएशन ऑफ नाशिक (तान) द्वारे आयोजित नाशिक टुरिझम कॉन्क्लेव्हच्या उद्घाटन सोहळ्यात उमटला.

हॉटेल एक्स्प्रेस इन येथे आयोजित तीन दिवसीय परिषदेचे उद्घाटन महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरमित बग्गा, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रामचंद्र भोगले, राधाकिसन चांडक आदी मान्यवरांच्या हस्ते झाले. पर्यटनवाढीसाठी टूर कंपन्यांनी नाशिकला प्राधान्य द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. परिषदेत देशरातील टूर कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

पर्यटनाच्या दृष्टीने ना‌शिकच्या वैशिष्ट्यांची माहिती त्यांना देण्यात आली. नाशि‌कमध्ये अजूनही हॉटेल्सची संख्या कमी आहे. ती वाढायला हवी, अशी अपेक्षा महापौर मुर्तडक यांनी व्यक्त केली. तर, पर्यटन वाढीसाठी पर्यटन विकास आराखडा तयार करून तो अंमलात आणता येऊ शकतो, असा विश्वास बग्गा यांनी व्यक्त केला. नाशिकमध्ये पर्यटनस्थळे आहेत. परंतु, अजूनही सोयी सुविधांची कमतरता असल्याची खंत आयुक्त डॉ. गेडाम यांनी व्यक्त केली.

हॉटेल गाईड या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. राधाकिसन चांडक, नारायण शेलार आणि महेंद्रपाल चौधरी यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाराष्ट्र चेंबर्सचे संतोष मंडलेचा, तानचे दत्ता, सिराज शेख आदींनी परिश्रम घेतले. उमेश पठारे, जयंत ठोंबरे, अनुराधा मटकरी यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभापती निवडीचा प्रस्ताव आयुक्तांकडे

0
0

म.टा.खास प्रतिनिधी,नाशिक

महापालिका स्थायी समितीच्या सभापती निवडीच्या प्रक्रियेला वेग आला असून, शुक्रवारी आयुक्तांकडून विभागीय आयुक्तांकडे निवडणूक प्रक्रिया राबविण्यासंदर्भातील प्रस्ताव रवाना झाला आहे. त्यामुळे २२ मार्चनंतर निवडणुुकीला मुहूर्त लागण्याची शक्यता आहे.

नगरसचिवांकडून शुक्रवारी विभागीय आयुक्तांकडे निवडणूक प्रक्रिया राबविण्यासंदर्भातील प्रस्ताव पाठविण्यात आला. समितीच्या १६ सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडली असून, सभापतींची निवड घोषित करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आयुक्तांकडून सोमवारी किंवा मंगळवारी निवडणूक तारीख घोषित होण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी कमीत कमी सात दिवसांचा कालावधी लागत असल्याने २२ तारखेनंतरची तारीख घोषित होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, स्थायीचा प्रस्ताव गेल्यानंतर राजकीय पक्षांनीही रणनीती आखायला सुरुवात केली आहे. मनसे, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपसह अपक्षांनीही उडी घेतली आहे. विशेषतः स्थायीत महिला उमेदवारांची संख्या १६ पैकी १० झाल्याने महिला सभापतीसाठीही प्रयत्न सुरू झाले आहेत. इच्छुकांनी सदस्यांना चाचपणीची मोहीम सुरू केली असून, मनसे आणि राष्ट्रवादीच्या वादात आता भाजपनेही उतरण्याची तयारी सुरू केली आहे. मनसेचे माजी पदाधिकारी व सध्या भाजपवासी झालेल्या माजी आमदार वसंत गिते यांनी भाजपचा सभापती होण्यासाठी आपल्या सर्वपक्षीय मैत्रीचा वापर करायला सुरुवात केली अाहे. मनसेला शह देवून भाजपमध्ये आपली ताकद वाढवण्यासाठी गिते प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दूषित पाण्यावरून तोडफोड

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंचवटीतील फुलेनगरमधील कालिका वसाहतीत ड्रेनेजचे पाणी घुसल्याने संतप्त महिलांनी शुक्रवारी थेट पंचवटी विभागीय कार्यालयात घुसून ड्रेनेज विभागात दूषित पाणी ओतले. एवढ्यावरच न थांबता महिलांनी कार्यालयातील टेबल खुर्च्या उलट्या करीत कर्मचाऱ्यांच्या अंगावरही दूषित पाणी फेकल्याने तणाव निर्माण झाला होता. विशेष म्हणजे मनसेचे नगरसेवक डॉ. विशाल घोलप यांच्या उपस्थितीत नागरिकांनी आंदोलन केल्याने मनसेलाही घरचा आहेर मिळाला.

फुलेनगरमधील जवळपास शंभर घरामंध्ये ड्रेनेजचे पाणी घुसत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी नगरसेवक डॉ. विशाल घोलप आणि पंचवटी विभागीय कार्यालयात केली होती. मात्र, त्याकडे यंत्रणेन दुर्लक्ष केले. त्यामुळे शुक्रवारी महिला आणि पुरूष पुन्हा डॉ. घोलप यांच्याकडे तक्रार घेऊन गेले. घोलप यांनी या सर्वांना घेऊन थेट पंचवटी विभागीय कार्यालय गाठले. यावेळी सुमारे शंभर महिला आणि पुरुषांनी ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याने महिलांच्या संतापाचा बांध फुटला. त्यांनी सोबत आणलेले दूषित पाणी थेट कार्यालयात ओतायला सुरुवात केली. तसेच गोंधळ घालत ड्रेनेज विभागातील टेबल व खुर्च्यांची मोडतोड करायला सुरुवात केली. उपस्थित कर्मचाऱ्यांच्या अंगावरही पाणी फेकले. कार्यालयातील खिडक्यांची काचेही फोडायला सुरुवात केली. विशेष म्हणजे सत्ताधारी मनसेच्या नगरसेवकांच्या उपस्थितीतच जवळपास अर्धा तास हा प्रकार कार्यालयात सुरू होता. त्यामुळे अधिकाऱ्यांनी थेट पोलिसांना पाचारण केले. पोलिस आल्यानंतर आंदोलक शांत झाले. कार्यालयाचे व फाईलींचेही नुकसान झाले आहे. या घंटनेची गंभीर दखल घेत अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. विभागीय अधिकारी ए. पी. वाघ यांच्यासोबत त्यांनी फुलेनगरमध्ये जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर तत्काळ ड्रेनेज बंद करण्याची कारवाई करण्याचे आदेश केले. आयुक्तांनीही या घटनेची गंभीर दखल घेत दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.

मनसेला घरचा आहेर

महापालिकेत मनसेची सत्ता असतानाही मनसेच्या नगरसेवकांच्या उपस्थितीत नागरिकांनी थेट विभागीय कार्यालयात धुडगूस घालत कार्यालयाचे नुकसान केले. त्यामुळे या आंदोलनाने मनसेलाच घरचा आहेर मिळाला आहे. मनसे सत्तेत असतानाही प्रश्न सोडविण्यासाठी नगरसेवकांना आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागत आहेत. तक्रार करूनही प्रश्न सुटत नसल्याने नागरिक नगरसेवकांच्या विनंतीलाही जुमानत नसल्याचे चित्र शहरात पहावयास मिळाले आहे.

घरामंध्ये पाणी घुसल्याच्या तक्रारी करून आठ दिवस लोटले तरी अधिकारी लक्ष देत नाही. त्यामुळे आज प्रशासनाविरोधात नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. नागरिक पाठपुरावा करतात मात्र अधिकारी दाद देत नसल्याचा अनुभव नगरसेवकांना येत आहे. याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे. - डॉ. विशाल घोलप, नगरसेवक

दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले आहे. नागरिकांनी तक्रार सोडवली नसल्याचे म्हटले आहे, तर अधिकाऱ्यांनी आंदोलनावेळी घटनास्थळी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा खुलासा केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. - डॉ. प्रवीण गेडाम, आयुक्त, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मवीर एक्स्पोला प्रारंभ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

के के वाघ इंजिनीअरींग कॉलेजच्या इलेक्ट्रिकल विभागाच्यावतीने आयोजित कर्मवीर एक्स्पोला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. या स्पर्धेत देशभरातील तब्बल ९०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. विद्यार्थ्यांचे अत्यंत नावीन्यपूर्ण प्रकल्प यात सादर झाले असून, शनिवारी या एक्स्पोचा समारोप होणार आहे.

इलेक्ट्रिकल विभाग आणि आयईटी (युके) नाशिक लोकल नेटवर्क यांच्यावतीने या एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी या एक्स्पोच्या उद्घाटन समारंभप्रसंगी कॅटाफार्मा केमिकल्सचे चेअरमन डॉ. श्रीकांत कारवा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कल्पना तंत्रज्ञानाने बदलतील. स्वतःवर भरवसा ठेवून काम करायला हवे. एक दिवस तंत्रज्ञान बदलेल, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी एमएसएस इंडियाचे एमडी मंगेश नटाल, कोसो इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष उमेश वानखेडे, इलेक्ट्रो फॅबचे एमडी युत्कर्षा सांगवी, अविनाश शिरोडे, अजय कहाने, संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ आदी उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. केशव नांदूरकर यांनी एक्स्पोची माहिती दिली. केंद्र सरकारने मांडलेल्या मेक इन इंडिया या संकल्पनेला या एक्स्पोमध्ये अधिक चालना देण्यात आली आहे. देशाच्या विविध भागातील विद्यार्थी एक्स्पोत सहभागी झाले असून, त्यांनी खासकरून समाजोपयोगी व अपारंपरिक ऊर्जेवर आधारीत प्रकल्प सादर केले आहेत. स्पर्धेत विजेत्या ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे दिली जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बस डेपो कागदोपत्री पूर्ण

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड येथे नवीन बसडेपोचे काम पूर्ण झाल्याचा दावा एसटी महामंडळाकडून केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात दोन महिन्याहून अधिक काळापासून येथे पंप बसू शंकलेला नाही. आताही कामे पूर्ण झाल्याचे कागदीघोडे नाचविणारे महामंडळ लवकरच पंप बसविला जाईल, असेच सांगण्यात मश्गूल आहे. त्यामुळे कुंभमेळा तोंडावर आला असताना हे काम पूर्ण होणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

शहरात सर्व सरकारी विभागांनी सिंहस्थाच्या कामाचे सुक्ष्म नियोजन केले असताना महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचे काम मात्र संथगतिने सुरू आहे. शहरात सध्या दोन बस डेपो आहेत. त्यांच्या माध्यमातून शहर वाहतुकीचे नियोजन करण्यात येत असते. गेल्या काही वर्षात शहराचा भौगोलिक विस्तार वाढल्याने शहराला आणखी एका बस डेपोची गरज होती. ही गरज ओळखून सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड येथे नव्याने बस डेपो मंजूर करण्यात आला. त्याच्या कामाला देखील

सुरुवात करण्यात येऊन काही काम पूर्ण करण्यात आले. हा बस डेपो सुरु करण्यासाठी येथे पेट्रोल पंपाची आवश्यकता आहे.

या पेट्रोल पंपाचे काम अजून सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे पेट्रोल पंपाविना बस डेपो सुरू झाला, तर पेट्रोल भरण्यासाठी गाड्या नाशिकला येणार का असा प्रश्न आहे. नव्याने होत असलेल्या डेपोतील रस्ते मुरूम टाकून तयार करण्यात आले आहेत. पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर येथे गाड्या आणणे मुश्किल होणार आहे. त्यामुळे या डेपोतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करावे, अशी मागणी होत आहे. तसेच येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मुलभूत सुविधा देण्यात आलेल्या नाही.

त्यामुळे कर्मचारी येथे काम कसे करणार याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. सिंहस्थात डेपो सुरू झाल्यानंतर अडचणींचे निराकरण करण्यास अवघड जाईल. नवा एसटी डेपो टप्प्याटप्याने प्रायोगिक तत्वावर सुरू करावा नाशिकरोड व आसपासच्या गाड्या तेथून सुरू कराव्यात, अशी मागणी नागरिकांतर्फे करण्यात आली आहे.

काम पूर्ण झाल्याचा दावा

नाशिकरोडच्या डेपोचे काम पूर्ण झाल्याचा दावा एसटी प्रशासनाने ३१ जानेवारी रोजी दिवाकर रावते यांनी घेतलेल्या मिटिंगमध्ये केला होता. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनीही घेतलेल्या मिटिंगमध्ये काम पूर्ण झाल्याचा दावा महामंडळाने करून आपली पाठ थोपटून घेतली होती. महामंडळाच्या दृष्टीने काम पूर्ण झाले असेल, तर डेपो का सुरू केला जात नाही, असा सवाल नागरिकांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फार्मसी कंपन्यांमध्ये पीएचडी सेंटर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय किंवा बहुराष्ट्रीय पातळीवर औषधांचे उत्पादन करणाऱ्या फार्मसी कंपनीत संशोधन आणि विकासाचे काम चालत असेल तर तेथेच पीएचडीचे सेंटर सुरू करण्यास आरोग्य विज्ञान विद्यापीठ प्रयत्नशील असल्याची माहिती कुलगुरु डॉ. अरुण जामकर यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यात संशोधनाला अधिक चालना मिळणार आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी एज्युकेशन अॅड रिसर्च (नायपर) ही संस्था नाशिकला स्थापन करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. त्यापार्श्वभूमीवर आयोजित 'मटा राऊंड टेबल कॉन्फरन्स'मध्ये डॉ. जामकर बोलत होते. नाशिकमध्ये ग्लॅक्सो स्मिथक्लाइन या बहुराष्ट्रीय कंपनीचे अत्याधुनिक असा संशोधन आणि विकास विभाग (आर अँड डी) आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या विभागात विविध प्रकारच्या औषधांवर संशोधन करुन नवनवीन औषधे बाजारात आणली जात आहेत. अशा प्रकारचा विभाग हा त्या फार्मसी कंपनीची खऱ्या अर्थाने संपत्ती असते. ही बाब लक्षात घेऊन आणि संशोधनाला चालना मिळावी म्हणून त्या विभागालाच पीएचडी सेंटरची मान्यता देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे डॉ. जामकर यांनी सांगितले. विभागात काम करणारे अधिकारीच या सेंटरद्वारे विद्यार्थ्यांना गाईड म्हणून उपलब्ध होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शहरात किंवा गावातच पीएचडीची संधी उपलब्ध होऊ शकेल. इच्छूक कंपन्यांनी त्यांचा प्रस्ताव विद्यापीठाला सादर करावा, असे आवाहनही कुलगुरुंनी केले आहे. फार्मसी कंपन्यांना करावयाच्या संशोधनाचा विषय विद्यार्थ्यांना दिला तर विद्यार्थी याच विषयात प्रकल्प सादर करतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण असा विषय मिळेल तर कंपनीला त्या विषयातील संशोधन करुन माहिती उपलब्ध होईल. शिक्षण क्षेत्र आणि उद्योग यांची सांगड घालण्यास ही बाब अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वास डॉ. जामकर यांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवकाळी धिंगाणा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गुरुवार पाठोपाठ शुक्रवारीही जिल्ह्याच्या काही भागाला अवकाळी पाऊस व गारपिटीचा सामना करावा लागला. दिंडोरी तालुक्यात शुक्रवारी रात्री मुसळधार पावसासह तुफान गारपीट झाली. तसेच, येवला, नांदगाव व जिल्ह्याच्या इतर भागांतही जोरदार पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, द्राक्ष उत्पादकांचे धाबे दणाणले आहे. दिंडोरी तालुक्यात काही भागात चार इंचाचे गारांचे थर साचले होते. रात्री उशिरापर्यंत अवकाळीचे थैमान सुरूच होते. गहू, कांदा व भाजीपाल्याचेही मातेरे झाले आहे.

दिंडोरी तालुक्यात ओझरखेड, वणी-पिंपळगाव परिसर, मावडी फाटा, बहादुरी, तीसगाव येथे तुफान गारपीट झाली. शेतामध्ये सुमारे चार इंचाचा गारांचा थर साचला होता. शेतात पांढरी चादरच पसरल्याचे दृश्य दिसत होते. या भागात निर्यातक्षम द्राक्षे मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू असल्याने द्राक्ष उत्पादकांवर कु-हाडच कोसळली आहे.

निफाड तालुक्यात लासलगाव, विंचूर, नैताळे, शिवरे फाटा, निफाड, कोठुरे, पिंपळस, चांदोरी आदि भागात अवकाळी पावसाच्या सारी कोसळल्या आहेत. नांदगाव व येवला तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला. गेल्या मार्चची पुनरावृत्ती गेल्या वर्षी मार्च महिन्यातच तुफान गारपीट झाली होती. ४, ५, ६, ९ व १३ मार्च या काळातच अवकाळी पाऊस व गारपिटीचा मारा झाला होता. यंदा पुन्हा त्याची पुनरावृत्ती झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कांद्याची विक्रमी आवक

0
0

म. टा. वृत्तसेवा, लासलगाव

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी लाल कांद्याची विक्रमी आवक झाली. दिवसभरात तब्बल ४५ हजार क्विंटल कांद्याची विक्रमी आवक झाली होती. कांदा विक्रीसाठी सुमारे २२०० वाहने बाजार समितीत दाखल झाल्याने बाजार आवर गर्दीने फुलून गेले होते.

एकाच दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणत आवक झाल्याने लासलगावच्या मुख्य रस्त्यांवर कांद्याच्या ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अनेकवेळा ट्रॅफिक जॅम झाल्याचे चित्र निर्माण झाल्याचे चित्र दिसत होते. सध्या निर्माण होत असलेल्या ढगाळ वातावरणाने कांदा उत्पादकांची चिंता वाढली आहे. तयार झालेला कांदा अवकाळी पावसात खराब होण्याची भीती असल्याने कांदा उत्पादक शेतकरी कांदा विक्रीसाठी गर्दी करताना दिसत आहे. त्यातच रविवारी साप्ताहिक सुट्टी व सोमवारी माथाडी कामगारांनी मुंबई येथे एक दिवसाचा संप करणार असल्याचे जाहीर केल्याने सोमवारीही बाजार समिती बंद राहणार आहे. सलग सुट्यांमुळे व बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांनी शुक्रवारी लासलगाव बाजार समितीत कांदा विक्रीसाठी एकच गर्दी केल्याचे चित्र दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटन वाढीसाठी सर्व्हेक्षण गरजेचे

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

टुरिझम वाढविण्यासाठी नामांकीत व्यावसायिक संस्थेकडून सर्व्हेक्षण व्हायला हवे. तसेच, हेरिटेज वॉकची संकल्पना अस्तित्वात आणायला हवी, असा सूर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि ट्रॅव्हल एजन्टस् असोसिएशन ऑफ नाशिक (तान) द्वारे आयोजित नाशिक टुरिझम कॉन्क्लेव्हच्या उद्घाटन सोहळ्यात उमटला.

हॉटेल एक्स्प्रेस इन येथे आयोजित तीन दिवसीय परिषदेचे उद्घाटन महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरमित बग्गा, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रामचंद्र भोगले, राधाकिसन चांडक आदी मान्यवरांच्या हस्ते झाले. पर्यटनवाढीसाठी टूर कंपन्यांनी नाशिकला प्राधान्य द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. परिषदेत देशरातील टूर कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

पर्यटनाच्या दृष्टीने ना‌शिकच्या वैशिष्ट्यांची माहिती त्यांना देण्यात आली. नाशि‌कमध्ये अजूनही हॉटेल्सची संख्या कमी आहे. ती वाढायला हवी, अशी अपेक्षा महापौर मुर्तडक यांनी व्यक्त केली. तर, पर्यटन वाढीसाठी पर्यटन विकास आराखडा तयार करून तो अंमलात आणता येऊ शकतो, असा विश्वास बग्गा यांनी व्यक्त केला. नाशिकमध्ये पर्यटनस्थळे आहेत. परंतु, अजूनही सोयी सुविधांची कमतरता असल्याची खंत आयुक्त डॉ. गेडाम यांनी व्यक्त केली.

हॉटेल गाईड या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. राधाकिसन चांडक, नारायण शेलार आणि महेंद्रपाल चौधरी यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाराष्ट्र चेंबर्सचे संतोष मंडलेचा, तानचे दत्ता, सिराज शेख आदींनी परिश्रम घेतले. उमेश पठारे, जयंत ठोंबरे, अनुराधा मटकरी यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभापती निवडीचा प्रस्ताव आयुक्तांकडे

0
0

म.टा.खास प्रतिनिधी,नाशिक

महापालिका स्थायी समितीच्या सभापती निवडीच्या प्रक्रियेला वेग आला असून, शुक्रवारी आयुक्तांकडून विभागीय आयुक्तांकडे निवडणूक प्रक्रिया राबविण्यासंदर्भातील प्रस्ताव रवाना झाला आहे. त्यामुळे २२ मार्चनंतर निवडणुुकीला मुहूर्त लागण्याची शक्यता आहे.

नगरसचिवांकडून शुक्रवारी विभागीय आयुक्तांकडे निवडणूक प्रक्रिया राबविण्यासंदर्भातील प्रस्ताव पाठविण्यात आला. समितीच्या १६ सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडली असून, सभापतींची निवड घोषित करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आयुक्तांकडून सोमवारी किंवा मंगळवारी निवडणूक तारीख घोषित होण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी कमीत कमी सात दिवसांचा कालावधी लागत असल्याने २२ तारखेनंतरची तारीख घोषित होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, स्थायीचा प्रस्ताव गेल्यानंतर राजकीय पक्षांनीही रणनीती आखायला सुरुवात केली आहे. मनसे, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपसह अपक्षांनीही उडी घेतली आहे. विशेषतः स्थायीत महिला उमेदवारांची संख्या १६ पैकी १० झाल्याने महिला सभापतीसाठीही प्रयत्न सुरू झाले आहेत. इच्छुकांनी सदस्यांना चाचपणीची मोहीम सुरू केली असून, मनसे आणि राष्ट्रवादीच्या वादात आता भाजपनेही उतरण्याची तयारी सुरू केली आहे. मनसेचे माजी पदाधिकारी व सध्या भाजपवासी झालेल्या माजी आमदार वसंत गिते यांनी भाजपचा सभापती होण्यासाठी आपल्या सर्वपक्षीय मैत्रीचा वापर करायला सुरुवात केली अाहे. मनसेला शह देवून भाजपमध्ये आपली ताकद वाढवण्यासाठी गिते प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दूषित पाण्यावरून तोडफोड

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंचवटीतील फुलेनगरमधील कालिका वसाहतीत ड्रेनेजचे पाणी घुसल्याने संतप्त महिलांनी शुक्रवारी थेट पंचवटी विभागीय कार्यालयात घुसून ड्रेनेज विभागात दूषित पाणी ओतले. एवढ्यावरच न थांबता महिलांनी कार्यालयातील टेबल खुर्च्या उलट्या करीत कर्मचाऱ्यांच्या अंगावरही दूषित पाणी फेकल्याने तणाव निर्माण झाला होता. विशेष म्हणजे मनसेचे नगरसेवक डॉ. विशाल घोलप यांच्या उपस्थितीत नागरिकांनी आंदोलन केल्याने मनसेलाही घरचा आहेर मिळाला.

फुलेनगरमधील जवळपास शंभर घरामंध्ये ड्रेनेजचे पाणी घुसत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी नगरसेवक डॉ. विशाल घोलप आणि पंचवटी विभागीय कार्यालयात केली होती. मात्र, त्याकडे यंत्रणेन दुर्लक्ष केले. त्यामुळे शुक्रवारी महिला आणि पुरूष पुन्हा डॉ. घोलप यांच्याकडे तक्रार घेऊन गेले. घोलप यांनी या सर्वांना घेऊन थेट पंचवटी विभागीय कार्यालय गाठले. यावेळी सुमारे शंभर महिला आणि पुरुषांनी ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याने महिलांच्या संतापाचा बांध फुटला. त्यांनी सोबत आणलेले दूषित पाणी थेट कार्यालयात ओतायला सुरुवात केली. तसेच गोंधळ घालत ड्रेनेज विभागातील टेबल व खुर्च्यांची मोडतोड करायला सुरुवात केली. उपस्थित कर्मचाऱ्यांच्या अंगावरही पाणी फेकले. कार्यालयातील खिडक्यांची काचेही फोडायला सुरुवात केली. विशेष म्हणजे सत्ताधारी मनसेच्या नगरसेवकांच्या उपस्थितीतच जवळपास अर्धा तास हा प्रकार कार्यालयात सुरू होता. त्यामुळे अधिकाऱ्यांनी थेट पोलिसांना पाचारण केले. पोलिस आल्यानंतर आंदोलक शांत झाले. कार्यालयाचे व फाईलींचेही नुकसान झाले आहे. या घंटनेची गंभीर दखल घेत अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. विभागीय अधिकारी ए. पी. वाघ यांच्यासोबत त्यांनी फुलेनगरमध्ये जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर तत्काळ ड्रेनेज बंद करण्याची कारवाई करण्याचे आदेश केले. आयुक्तांनीही या घटनेची गंभीर दखल घेत दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.

मनसेला घरचा आहेर

महापालिकेत मनसेची सत्ता असतानाही मनसेच्या नगरसेवकांच्या उपस्थितीत नागरिकांनी थेट विभागीय कार्यालयात धुडगूस घालत कार्यालयाचे नुकसान केले. त्यामुळे या आंदोलनाने मनसेलाच घरचा आहेर मिळाला आहे. मनसे सत्तेत असतानाही प्रश्न सोडविण्यासाठी नगरसेवकांना आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागत आहेत. तक्रार करूनही प्रश्न सुटत नसल्याने नागरिक नगरसेवकांच्या विनंतीलाही जुमानत नसल्याचे चित्र शहरात पहावयास मिळाले आहे.

घरामंध्ये पाणी घुसल्याच्या तक्रारी करून आठ दिवस लोटले तरी अधिकारी लक्ष देत नाही. त्यामुळे आज प्रशासनाविरोधात नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. नागरिक पाठपुरावा करतात मात्र अधिकारी दाद देत नसल्याचा अनुभव नगरसेवकांना येत आहे. याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे. - डॉ. विशाल घोलप, नगरसेवक

दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले आहे. नागरिकांनी तक्रार सोडवली नसल्याचे म्हटले आहे, तर अधिकाऱ्यांनी आंदोलनावेळी घटनास्थळी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा खुलासा केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. - डॉ. प्रवीण गेडाम, आयुक्त, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्यात पिके झाली भुईसपाट

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

तेल ही गेले आणि तूपही गेले हाती धुपाटणे आले, अशी काहीशी गत बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. गत तीन दिवसांपासूनच्या अवकाळी पावसानंतर शनिवारी झालेल्या पावसाने सारे काही हिरावून नेले आहे.

बागलाण तालुक्यात गत तीन दिवसांपासून सातत्याने होणाऱ्या अवकाळी पावसाच्या संकटामुळे शेतीपिके पूर्णत: नष्ट झाली आहेत. अनेक ठिकाणी शेतीपिके पूर्णत: जमीनदोस्त झाली आहेत. पावसाळी वातावरणामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. द्राक्ष, डाळिंब, कांदा या सारख्या नगदी पिकांपासून भाजीपाला, गहू, हरभरा, ही सगळीच पिके हातची जाणार असल्याने तालुक्याला कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार आहे.

शनिवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास जोरदार सरींनी शहराला झोडपून काढले. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास देखील पुन्हा एकादा जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शहरातील जनजीवन काही काळ ठप्प झाले होते. बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी तालुक्यातील अनेक भागात जावून शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

तालुक्यात वादळी वारे व पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला असताना देखील गारपीट न झाल्याने आंबा पिकाला होणारी हानी टळली असल्याचा दावा कृषी विभागाकडून केला जात असताना गव्हाबरोबरच कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार, कृषी अधिकारी डी. के. कापडणीस यांना तातडीने तालुक्यातील शेती पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आपण विधानसभेत लक्षवेधी करणार असल्याची भूमिका देखील आमदार चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images