Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

स्कील इंडिया की स्कॅम इंडिया?

$
0
0

भावेश ब्राह्मणकर, नाशिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्कील इंडियाची हाक दिल्यानंतर देशपातळीवर स्कील डेव्हलपमेंटला झपाट्याने गती आली असली तरी प्रत्यक्षात या योजनेतून मोठा घोटाळा (स्कॅम) निर्माण होत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. प्राचार्य आणि शिक्षण संस्थांना हाताशी धरुन स्कील डेव्हलपमेंटच्या नावाखाली बक्कळ पैसा कमावण्याचा उद्योग सुरु झाल्याचे निदर्शनास येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मेक इन इंडिया' या महत्त्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत देशभरातील विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किल्सचे प्रशिक्षण देण्याचे जाहीर केले. यासंदर्भातील निर्देश केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जारी केल्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) देशातील सर्व विद्यापीठांना तसे सूचित केले. याचा आधार घेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठाने नुकतेच एक परिपत्रक प्रसिद्ध केले. स्कील बेस्ड कोर्सेस (४ क्रेडीट), ह्युमन राईटस (२ क्रेडीटस) आणि सायबर सिक्युरिटी किंवा इन्फॉर्मेशन सिक्युरिटी (४) असे १० क्रेडीट मिळविणे विद्यार्थ्यांना बंधनकारक केले आहे. या चार कोर्सेसची माहिती विद्यार्थ्यांना देण्यासाठी ट्रेनिंग, सेमिनार किंवा वर्कशॉप आयोजित करण्याचे सांगितले आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून ७०० रुपयांची फी आकारण्याचेही सक्तीचे करण्यात आले आहेत. याच बाबीचा आधार घेत विविध सेवाभावी संस्था-संघटना आणि व्यक्त‌िंनी या साऱ्या प्रकाराला आर्थिक देवाणघेवाणीचे स्वरुप दिले आहे. त्यामुळेच या चारही कोर्सेसचे एकदिवसीय किंवा ठराविक तासांसाठीचे ट्रेनिंग, सेमीनार किंवा वर्कशॉप या संस्थांकडून आयोजित केले जात आहेत. त्यापूर्वी संबंधित कॉलेजच्या प्राचार्य तसेच शिक्षण संस्थेशी आर्थिक बोलणीही केली जात आहे.

एखाद्या कॉलेजमध्ये १०० विद्यार्थी असल्यास विद्यार्थ्यांकडून ७० हजार रुपयांची फी जमा होते. त्या बदल्यात संबंधित शिक्षण संस्था किंवा कॉलेजला १० किंवा २० टक्के रक्कम दिली जात आहे. परिणामी, संबंधित सेवाभावी संस्थेला अवघ्या काही तासांच्या बदल्यात ५० ते ६० हजार रुपये प्राप्त होत आहेत. हाच प्रकार संपूर्ण देशात सुरु असल्याचे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. या प्रकाराची दखल घेत नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या चिफ ऑपरेटिंग ऑफिसरला कॉर्पोरेशनच्या वेबसाईटवरच खुलासा करण्याची वेळ आली आहे. स्कील इंडियाच्या अत्यंत व्यापक मोहिमेला आर्थिक देवाणघेवाणीतून काळीमा फासली जात असल्याचेही यानिमित्ताने उघड होत आहे. दरम्यान, केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजप आणि त्यांच्या नेत्यांशी निगडीत अनेक संस्था या साऱ्या प्रकारात असल्याचेही बोलले जात आहे. याप्रकरणी मात्र प्राचार्य किंवा शिक्षण संस्था चालकांनी न बोलणेच पसंत केल्याने त्याकडे अधिक संशय बळावत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पार्टी प्रकरणी हायकोर्टात जाणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विमानतळासारख्या महत्त्वाच्या सरकारी जागेत बांधकाम विभागाने मद्य पार्टी प्रकरणात कार्यकारी अभियंत्यावर कारवाई करण्याऐवजी त्याला चक्क विनंती बदली दिल्याचा सजग नागरिक मंचने निषेध केला आहे. चोर सोडून सन्याशाला फाशी देण्याचा हा प्रकार निंदनीय असल्याचे विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

कायदेशीर प्रशासकीय संकेत बाजूला ठेवून थेट मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने चार कनिष्ठ अभियंत्यांना निलंबित करून एकप्रकारे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप मंचने केला आहे. ही पार्टी आणि त्यानंतर झालेली कारवाई म्हणजे सामान्य माणसाची मती गुंग करणारे व निलाजऱ्या अभियंत्यांच्या बेशरमपणाद्वारे शासनाची लक्तरे वेशीवर टांगणारा हा प्रकार आहे. यापूर्वीही अशा पार्ट्या झाल्या असून त्यात उच्चपदस्थ अधिकारीही सहभागी झाल्याचा दावा मंचने केला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पार्टी प्रकरणात मुंबईहून आलेल्या चौकशी समितीने खातेनिहाय कागदपत्रे न बघता पोलिसी कारवाई दरम्यान झालेले जबाब व सांगोवांगी माहितीनुसार कारवाईचा अहवाल तयार केल्याचा मंचचा आरोप आहे. चौकशीचा फार्स, कनिष्ठांवर कारवाई, दोषींना वाचविण्याचा प्रयत्न अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. कार्यकारी अभियंत्यास वाचविण्याचा प्रयत्न कुणाच्या सांगण्यावरून झाला, या प्रकरणातील ठेकेदारास काळ्या यादीमध्ये का टाकले जात नाही, कुठलीही कारणे दाखवा नोटीस न बजावता व खातेनिहाय चौकशी न करता कनिष्ठ अभियंत्याचे निलंबन कुठल्या कायदेशीर तरतूदीनुसार झाले अशी विचारणा मंचने केली आहे. अधिकाराचा गैरवापर करून खात्याची प्रतिमा मलीन करणाऱ्या अभियंत्याविरुध्द व ठेकेदारांविरुध्द बांधकाम विभागाने स्वतंत्र फौजदारी गुन्हा का दाखल केला नाही, असे सवाल उपस्थित करण्यात आले आहेत.

कार्यकारी अभियंत्यास त्वरित निलंबित करावे, ठेकेदारास त्वरीत काळ्या यादीत टाकून या सर्वांविरोधात स्वतंत्र फौजदारी गुन्हा दाखल करावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. नागपूर येथील अधिवेशनात हे प्रकरण लावून धरतानाच उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा सजग नागरिक मंचचे सचिव अॅड. सिद्धार्थ वर्मा यांनी दिला आहे.

आम्हालाही द्या की पार्टीसाठी परवानगी

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर केलेल्या पार्टीस २२ मार्च रोजी ५० दिवस पूर्ण होत आहेत. या निमित्ताने नाशिकमधील निवडक ठेकेदार, सनदी अधिकारी, बांधकाम विभागातील अभियंते यांच्यासाठी ओझर विमानतळावर पार्टीचे आयोजन करण्याचा मानस सजग नागरिक मंचने व्यक्त केला आहे. सदरील जागा आपल्या ताब्यात असल्याने पार्टीस परवानगी द्यावी अशी उपरोधिक मागणी करण्यात आली आहे. नियोजित पार्टीचा विषय सुध्दा पूर्वी परवानगी दिलेल्या पार्टीशी संबंधित असल्याने नियोजित पार्टीस परवानगी द्याल असा विश्वास वाटतो, असे बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना ‌दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपला स्वकियांचाच विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्रातील भाजप सरकारने विरोधी पक्षांचा आक्षेप झुकारून लावत बहुचर्चित विमा कायदा (दुरुस्ती) विधेयक लोकसभेत मंजूर केले. मात्र, यास भाजपशी संलग्न भारतीय मजदूर संघांतर्गत कार्यरत असलेल्या आणि मित्रपक्ष शिवसेनेच्या विमा कर्मचारी संघटनांनी विरोध केला आहे. गडकरी चौकातील एलआयसीच्या जीवनप्रकाश या मुख्यालयासमोर भाजपचा सोमवारी जोरदार निषेध करण्यात आला.

संसदेत भाजपचे राज्यसभेच्या तुलनेत लोकसभेत संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे भाजपने राज्यसभेत विमा कायदा (दुरुस्ती) विधेयक २००८ प्रलंबित असतांना लोकसभेत तेच विधेयक मात्र नवीन नावाने मंजूर केले. सरकारच्या या कृतीचा निषेध करीत भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या नॅशनल ऑगनायझेशन ऑफ इन्शुरन्स वकर्स (एनओआयडब्ल्यू) आणि शिवसेनेशी संलग्न असलेल्या भारतीय विमा कर्मचारी संघटना (बीव्हीकेएस) यांनी विरोध केला आहे. या दोन्ही संघटनांनी डाव्यांचा प्रभाव असलेल्या विमा कर्मचारी संघटनेशी हातमिळवणी करीत विमा कर्मचारी संयुक्त कृती समितीची स्थापना केली आहे. या संयुक्त कृती समितीच्या वतीने लोकसभेत मंजूर झालेल्या विधेयकाला विरोध करण्यात आला. या विधेयकानुसार विमा क्षेत्रामध्ये थेट परकीय गुंतवणुकीची (एफडीआय) मर्यादा २६ टक्क्यांवरून ४९ टक्के इतकी वाढविण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे केंद्रात काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असतांना भाजपने विमा क्षेत्रात 'एफडीआय'ला विरोध केला होता. तसेच तब्बल १० वर्षे हे विधेयक संसदेत मंजूर होऊ दिले नव्हते. परंतु, सत्तेत आल्यानंतर भाजपने या विधेयकाचे समर्थक केल्याबद्दल शिवसेनेने भाजपवर दुटप्पीपणाचा आरोप केला आहे.

कामगार हितासाठीच विरोध

विमा कर्मचारी तसेच सामान्य विमाधारकांच्या हिताचा कोणताही विचार न करणारे हे विधेयक आहे. विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा वाढविल्यास त्याचा कामगारांप्रमाणेच सामान्य विमाधारकांवरही परिणाम होणार असल्याचा मुद्दा मांडत 'एनओआयडब्ल्यू' आणि 'बीव्हीकेएस' या दोन्ही संघटनांनी विरोध तीव्र केला आहे. सत्तेत असलो तरी सामान्यांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा सोडणार नाही, असेही या दोन्ही संघटनांनी स्पष्ट केले आहे.

भाजप आणि आमच्या संघटनेची विचारधारा समान असली तरी त्याची कामगार हिताच्या धोरणाशी तडजोड केली जाणार नाही. भाजपने सुधारित आणलेल्या विमा विधेयकाचा कर्मचाऱ्यांवर होणारा परिणाम समजावून सांगण्यासाठी संघटना यापुढीही प्रयत्न करणार आहे.

- प्रशांत पाटील, अध्यक्ष, 'एनओआयडब्ल्यू'

सत्तेत आल्यानंतर भाजपने दुटप्पीपणा दाखवून दिला आहे. काँग्रेस सरकारच्या काळात विरोध असलेल्या विमा विधेयकाला भाजपने आता सत्तेत आल्यानंतर पाठिंबा दिला आहे. मात्र, कामगार हितासाठी शिवसेना आपल्या भूमिकेत बदल करणार नाही. विमा विधेयकाला विरोध कायम राहणारच.

- नितीन विखार, राज्य सचिव, बीव्हीकेएस

विमा विधेयकामुळे एसआयसीचे आणि पर्यायाने सामान्य गुंतवणूकदारांचे भवितव्य धोक्यात सापडले आहे. सामान्य गुंतवणुकीदाराच्या हितासाठी संयुक्त समितीच्या माध्यमातून हा लढा अधिक तीव्र केला जाईल. यासाठी विमा कर्मचारी संघटनांचे सहकार्य घेतले जात आहे.

- कॉ. मोहन देशपांडे, सरचिटणीस, विमा कर्मचारी संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पार्टी प्रकरणी हायकोर्टात जाणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विमानतळासारख्या महत्त्वाच्या सरकारी जागेत बांधकाम विभागाने मद्य पार्टी प्रकरणात कार्यकारी अभियंत्यावर कारवाई करण्याऐवजी त्याला चक्क विनंती बदली दिल्याचा सजग नागरिक मंचने निषेध केला आहे. चोर सोडून सन्याशाला फाशी देण्याचा हा प्रकार निंदनीय असल्याचे विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

कायदेशीर प्रशासकीय संकेत बाजूला ठेवून थेट मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने चार कनिष्ठ अभियंत्यांना निलंबित करून एकप्रकारे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप मंचने केला आहे. ही पार्टी आणि त्यानंतर झालेली कारवाई म्हणजे सामान्य माणसाची मती गुंग करणारे व निलाजऱ्या अभियंत्यांच्या बेशरमपणाद्वारे शासनाची लक्तरे वेशीवर टांगणारा हा प्रकार आहे. यापूर्वीही अशा पार्ट्या झाल्या असून त्यात उच्चपदस्थ अधिकारीही सहभागी झाल्याचा दावा मंचने केला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पार्टी प्रकरणात मुंबईहून आलेल्या चौकशी समितीने खातेनिहाय कागदपत्रे न बघता पोलिसी कारवाई दरम्यान झालेले जबाब व सांगोवांगी माहितीनुसार कारवाईचा अहवाल तयार केल्याचा मंचचा आरोप आहे. चौकशीचा फार्स, कनिष्ठांवर कारवाई, दोषींना वाचविण्याचा प्रयत्न अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. कार्यकारी अभियंत्यास वाचविण्याचा प्रयत्न कुणाच्या सांगण्यावरून झाला, या प्रकरणातील ठेकेदारास काळ्या यादीमध्ये का टाकले जात नाही, कुठलीही कारणे दाखवा नोटीस न बजावता व खातेनिहाय चौकशी न करता कनिष्ठ अभियंत्याचे निलंबन कुठल्या कायदेशीर तरतूदीनुसार झाले अशी विचारणा मंचने केली आहे. अधिकाराचा गैरवापर करून खात्याची प्रतिमा मलीन करणाऱ्या अभियंत्याविरुध्द व ठेकेदारांविरुध्द बांधकाम विभागाने स्वतंत्र फौजदारी गुन्हा का दाखल केला नाही, असे सवाल उपस्थित करण्यात आले आहेत.

कार्यकारी अभियंत्यास त्वरित निलंबित करावे, ठेकेदारास त्वरीत काळ्या यादीत टाकून या सर्वांविरोधात स्वतंत्र फौजदारी गुन्हा दाखल करावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. नागपूर येथील अधिवेशनात हे प्रकरण लावून धरतानाच उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा सजग नागरिक मंचचे सचिव अॅड. सिद्धार्थ वर्मा यांनी दिला आहे.

आम्हालाही द्या की पार्टीसाठी परवानगी

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर केलेल्या पार्टीस २२ मार्च रोजी ५० दिवस पूर्ण होत आहेत. या निमित्ताने नाशिकमधील निवडक ठेकेदार, सनदी अधिकारी, बांधकाम विभागातील अभियंते यांच्यासाठी ओझर विमानतळावर पार्टीचे आयोजन करण्याचा मानस सजग नागरिक मंचने व्यक्त केला आहे. सदरील जागा आपल्या ताब्यात असल्याने पार्टीस परवानगी द्यावी अशी उपरोधिक मागणी करण्यात आली आहे. नियोजित पार्टीचा विषय सुध्दा पूर्वी परवानगी दिलेल्या पार्टीशी संबंधित असल्याने नियोजित पार्टीस परवानगी द्याल असा विश्वास वाटतो, असे बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना ‌दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपला स्वकियांचाच विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्रातील भाजप सरकारने विरोधी पक्षांचा आक्षेप झुकारून लावत बहुचर्चित विमा कायदा (दुरुस्ती) विधेयक लोकसभेत मंजूर केले. मात्र, यास भाजपशी संलग्न भारतीय मजदूर संघांतर्गत कार्यरत असलेल्या आणि मित्रपक्ष शिवसेनेच्या विमा कर्मचारी संघटनांनी विरोध केला आहे. गडकरी चौकातील एलआयसीच्या जीवनप्रकाश या मुख्यालयासमोर भाजपचा सोमवारी जोरदार निषेध करण्यात आला.

संसदेत भाजपचे राज्यसभेच्या तुलनेत लोकसभेत संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे भाजपने राज्यसभेत विमा कायदा (दुरुस्ती) विधेयक २००८ प्रलंबित असतांना लोकसभेत तेच विधेयक मात्र नवीन नावाने मंजूर केले. सरकारच्या या कृतीचा निषेध करीत भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या नॅशनल ऑगनायझेशन ऑफ इन्शुरन्स वकर्स (एनओआयडब्ल्यू) आणि शिवसेनेशी संलग्न असलेल्या भारतीय विमा कर्मचारी संघटना (बीव्हीकेएस) यांनी विरोध केला आहे. या दोन्ही संघटनांनी डाव्यांचा प्रभाव असलेल्या विमा कर्मचारी संघटनेशी हातमिळवणी करीत विमा कर्मचारी संयुक्त कृती समितीची स्थापना केली आहे. या संयुक्त कृती समितीच्या वतीने लोकसभेत मंजूर झालेल्या विधेयकाला विरोध करण्यात आला. या विधेयकानुसार विमा क्षेत्रामध्ये थेट परकीय गुंतवणुकीची (एफडीआय) मर्यादा २६ टक्क्यांवरून ४९ टक्के इतकी वाढविण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे केंद्रात काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असतांना भाजपने विमा क्षेत्रात 'एफडीआय'ला विरोध केला होता. तसेच तब्बल १० वर्षे हे विधेयक संसदेत मंजूर होऊ दिले नव्हते. परंतु, सत्तेत आल्यानंतर भाजपने या विधेयकाचे समर्थक केल्याबद्दल शिवसेनेने भाजपवर दुटप्पीपणाचा आरोप केला आहे.

कामगार हितासाठीच विरोध

विमा कर्मचारी तसेच सामान्य विमाधारकांच्या हिताचा कोणताही विचार न करणारे हे विधेयक आहे. विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा वाढविल्यास त्याचा कामगारांप्रमाणेच सामान्य विमाधारकांवरही परिणाम होणार असल्याचा मुद्दा मांडत 'एनओआयडब्ल्यू' आणि 'बीव्हीकेएस' या दोन्ही संघटनांनी विरोध तीव्र केला आहे. सत्तेत असलो तरी सामान्यांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा सोडणार नाही, असेही या दोन्ही संघटनांनी स्पष्ट केले आहे.

भाजप आणि आमच्या संघटनेची विचारधारा समान असली तरी त्याची कामगार हिताच्या धोरणाशी तडजोड केली जाणार नाही. भाजपने सुधारित आणलेल्या विमा विधेयकाचा कर्मचाऱ्यांवर होणारा परिणाम समजावून सांगण्यासाठी संघटना यापुढीही प्रयत्न करणार आहे.

- प्रशांत पाटील, अध्यक्ष, 'एनओआयडब्ल्यू'

सत्तेत आल्यानंतर भाजपने दुटप्पीपणा दाखवून दिला आहे. काँग्रेस सरकारच्या काळात विरोध असलेल्या विमा विधेयकाला भाजपने आता सत्तेत आल्यानंतर पाठिंबा दिला आहे. मात्र, कामगार हितासाठी शिवसेना आपल्या भूमिकेत बदल करणार नाही. विमा विधेयकाला विरोध कायम राहणारच.

- नितीन विखार, राज्य सचिव, बीव्हीकेएस

विमा विधेयकामुळे एसआयसीचे आणि पर्यायाने सामान्य गुंतवणूकदारांचे भवितव्य धोक्यात सापडले आहे. सामान्य गुंतवणुकीदाराच्या हितासाठी संयुक्त समितीच्या माध्यमातून हा लढा अधिक तीव्र केला जाईल. यासाठी विमा कर्मचारी संघटनांचे सहकार्य घेतले जात आहे.

- कॉ. मोहन देशपांडे, सरचिटणीस, विमा कर्मचारी संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीओकडून ६३ वाहनांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी​, ना​शिक

प्रादेशिक परिवहन विभागाच्या महसूल सुरक्षा पथकाने मागील दहा दिवसात ६३ वाहनांवर कारवाई करून सुमारे १८ हजार रुपये दंड वसूल केला. यात ३२ स्कूल बसेसचा समावेश आहे.

जिल्ह्यात दोन ते २० मार्च या कालावधीत महसूल सुरक्षा पथकाने कारवाई करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले आहेत. अवैध व्यवसायामुळे राज्य सरकारचा बुडणारा महसूल वाचवण्यासाठी महसूल सुरक्षा पथक काम करते. परवाना नसताना वाहतूक करणे, परवान्यापेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणे, नियमबाह्य पध्दतीने वाहन चालवणे आदी कारणांसाठी महसूल सुरक्षा पथकाकडून कारवाई केली जाते.

२ मार्च ते १० मार्च या कालावधीत आतापर्यंत ८६ वाहनांची तपासणी करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. यात ४१ स्कूल बसेसचाही समावेश होता. ४१ पैकी ३२ स्कूल बसेसच्या कागदपत्रांमध्ये तसेच प्रतिबंधक उपायोजनांमध्ये त्रुटी आढळून आल्याने १ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर, तपासण्यात आलेल्या इतर ४५ वाहनांपैकी ३१ वाहने दोषी आढळून आल्याने त्यांच्याकडून १५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जिल्ह्याभरात तीन पथकांच्या माध्यमातून ही कारवाई सुरू असून, २० मार्चपर्यंत कारवाईचा वेग वाढवण्यात येणार असल्याचे आरटीओ विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवला पालिकेत बिनविरोध निवड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली. सभेचे अध्यासी अधिकारी म्हणून तहसीलदार शरद मंडलिक यांनी काम पाहिले. विशेष सभेपूर्वी दिलेल्या दोन तासांच्या निर्धारित वेळेत पालिका मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्याकडे प्रत्येक समिती सभापती पदासाठी एक एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने त्यानंतर झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सभापती निवडी बिनविरोध झाल्याची घोषणा शरद मंडलिक यांनी केली.

पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी शेख रिजवानउल्लाह सलीमुल्ला, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी जयश्री लोणारी, आरोग्य रक्षण व वैद्यकीय आरोग्य समिती सभापतीपदी मनोहर जावळे, नियोजन व विकास समितीचे पदसिद्ध सभापती म्हणून उपनगराध्यक्ष पंकज पारख, शिक्षण समिती सभापतीपदी आयोध्याबाई रामगोपाळ शर्मा तर पाणीपुरवठा व जलनिःस्सारण समितीच्या सभापतीपदी पदमा सुनील शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

येवला नगरपालिकेच्या याच विशेष सर्वसाधारण सभेत पालिकेच्या स्थायी समितीच्या नामनिर्देशित इतर ३ सदस्यांच्या नावावर देखील शिक्कामोर्तब करण्यात आले. राष्ट्रवादीच्या जेष्ठ नगरसेविका उषा शिंदे, रवींद्र जगताप व शिवसेनेचे सागर लोणारी यांची स्थायी समिती सदस्यपदी निवड झाली आहे. नगराध्यक्षा शबानाबानो शफीक शेख या स्थायी समितीच्या पदसिद्ध अध्यक्ष असून, विविध विषय समित्यांचे सभापती हे स्थायी समितीचे पदसिद्ध सदस्य असणार आहेत. पालिकेच्या या विशेष सर्वसाधारण सभेला पालिकेच्या २५ सदस्यांपैकी १५ सदस्य हजर होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर ‘अच्छे दिन’ दूर नाही!

$
0
0

मदन पारख, वाचक वार्ताहर

महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्रापासून अनेक मागण्यावर तीव्र आंदोलने झाल्याचे स्मरते. परंतु, गोवंश हत्या बंदी व्हावी यासाठी जनता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतांना कधीच दिसली नाही. अधूनमधून काही धार्मिक संस्था व संघटना ही मागणी करीत व त्याची छोटीशी बातमी कुठे तरी येत असे! जनतेच्या अनेक ज्वलंत मागण्यांना धूप न घालणाऱ्या सरकारने गोवंश हत्याबंदीच्या मागणीची दखल घेऊन त्यासाठी अत्यंत कठोर कायदा केला. याबद्दल महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन व कौतुक करावेसे वाटते! जनतेच्या अशाच इतरही अपेक्षांबाबत सरकार संवेदनशील झाले तर 'अच्छे दिन' खरंच दूर नाहीत.

यच्चयावत प्राणिमात्रांच्या देवाचे अस्तित्व मानणारा आपला धर्म आहे, तेव्हा फक्त गोवंश हत्येविरूद्ध कायदा व इतर प्राणिमात्रांबाबत वेगळा निकष का? असा प्रश्न काहींना पडल्यास त्यांना चूक म्हणता येणार नाही. आपलं नवीन सरकार हा भेदभाव चालू देणार नाही व मानव प्राण्यांसह इतर सर्व प्राणिमात्रांच्या हत्येविरूद्ध अत्यंत सकस कायदा लवकरात लवकर करीन, अशी खात्री वाटते.

गोवंश हत्या बंदी कायदा झाल्यामुळे सराकारवर मोठी जबाबदारी आली आहे. अमर्याद वाढत्या गोवंशाच्या निवाऱ्यासाठी मोठ्या प्रशस्त व सोयीच्या जागा लागतील. जंगलातील बरीचशी अनावश्यक झाडे झुडपे खाऊन गोवंश आपली समस्या काही प्रमाणात स्वत:च सोडवतील. पण सरकारने तातडीने एक वटहुकुम काढून महाराष्ट्रातील महामार्गांसह सर्वच रस्त्यांवर व चौकाचौकात गोवंश निवासासाठी आरक्षण टाकावे. गोमातेचे दर्शन सुलभ झाल्याने जनता पुण्य तर अर्जित करीलच पण जनता सत्शील झाल्याने भ्रष्टाचार, बलात्कार, चोऱ्या इत्यादी समस्यांनी त्रस्त सरकारला थोडी विश्रांती मिळेल. रस्त्यांवर गोवंशास मुक्तपणे वावरू दिल्यास बेदरकारपणे व अतिवेगाने वाहने हाकणाऱ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी येणारा सरकारी खर्च पण कमी होईल. काही आधुनिक विचारवंत व कोटीकोटीच्या गाड्या उडविणारे धनदांडगे याचा विरोध करतील पण हा गोरगरीब मतदारांचा देश आहे. याचा सरकारने कदापी विसर पडू देवू नये.

राज्य सरकारने समस्त स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने सर्व कचराकुंड्यांच्या आधुनिकीकरणाचे काम त्वरित हातात घ्यावे. गोवंशाला अत्यंत गलिच्छ परिस्थितीत अन्नग्रहण करावे लागते, हे यापुढे खपवून घेतले जाणार नाही. सरकारने वैज्ञानिकांना मोठे मानधन देऊन सहज पचणारे व पौष्टिक प्लॉस्टिक शोधन काढण्यास भाग पाडावे त्यामुळे गोवंश आजारी पडण्याच्या समस्येवर नियंत्रण येऊन सरकारला मोठे पुण्यकर्म केल्याचे समाधान प्राप्त होईल.

शेतीकामासोबतच इतर कामांसाठीपण फक्त गोवंशाचा म्हणजे बैलाचा वापर करण्याची सरकारने सर्वांसाठी सक्ती करावी. शेतीच्या यांत्रिकीकरणामुळे धनदांडग्या उद्योगपतींचेच फक्त भले होत आहे, हे आता थांबलेच पाहिजे. शेतीचे उत्पन्न कमी झाले तरी आम्ही नुकसान सोसू, अर्धपोटी राहू पण गोवंश वाचवू अशी प्रतिज्ञा करीत आहोत.

गोवंश हत्याबंदीमुळे महाराष्ट्रात ३० लाख लोकांचा रोजगार जाईल व त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल, अशी काही विरोधक बोंब मारतात. पण माणसांपेक्षा गोवंश वाचविणे किती महत्त्वाचे आहे व हे किती मोठे पुण्यकर्म आहे हे या नतद्रष्ट लोकांना कळत नाही. या सर्व लोकांना रोजगार हमी योजनेत सहज सामावून घेता येईल.

भविष्यात वाढत्या चाऱ्याची गरज बघता महाराष्ट्रातील काही द्रष्ट्या नेत्यांनी बिहारमधील काही तज्ज्ञांची मदत घेऊन या घास चाऱ्याच्या उत्पादनात क्रांती आणण्याची व या पुण्यकार्यात सरकारला पूर्णत: सहकार्य करण्याची तयारी केली आहे, ही त्याततल्या त्यात एक आशादायी घटना निदर्शनास आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रस्ता दुभाजकात टाकले डांबर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

महापालिकेकडून शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांची कामे सुरू आहेत. यात अंबड लिंकरोडवरील रस्ता रुंदीकरणात दुभाजकांमध्ये मातीऐवजी रस्त्यासाठी फोडलेल्या डांबर टाकण्यात आले आहे. याकडे महापालिकेच्या बांधकाम विभागाने लक्ष घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

शहरातील रस्तांच्या कामात अनेकविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परंतु, महापालिकेकडून सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांकडे बांधकाम विभाग लक्ष घालत नसल्याने ठेकेदार मनमर्जीपणे काम करीत असल्याचे दिसून येत आहे. यात अंबड लिंकरोडवरील सुरू असलेल्या रस्त्यांचा कामात रुंदीकरणात दुभाजक टाकण्याचे काम जोमाने सुरू आहे. परंतु, दुभाजकामध्ये माती टाकण्याऐवजी ठेकदाराकडून रस्त्यातून काढलेल्या डांबराचा वापर केला जात आहे. विशेष म्हणजे दुभाजकात महापालिकेकडून येत्या काही दिवसात झाडे लावली जाणार आहेत. दुभाजकात टाकलेल्या डांबरावर माती टाकल्यावर महापालिकेने लावणार असलेली झाडे जगतील काय? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. त्यातच रस्ता रुंदीकरणाच्या सुरू असलेल्या कामात महापालिकेच्या बांधकाम विभागातील कर्मचारी करतात, काय असा देखील सवाल यानिमित्ताने सर्वसामान्यांना पडत आहे.

कुंभमेळ्यासाठी शहरात रस्त्यांची कामे वेगाने सुरू आहेत. परंतु, या कामांकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. अंबड लिंकरोडवर रुंदीकणात रस्ता दुभाजकामध्ये मातीऐवजी डांबर टाकण्याचा प्रकार होत आहे. याकडे महापालीकेच्या सक्षम अधिकाऱ्याने लक्ष घालण्याची गरज आहे. - मधुकर पाटील, रहिवाशी, अंबडलिंकरोड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विभागीय रोजगार मेळावा शुक्रवारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उपसंचालक रोजगार व स्वयंरोजगार विभाग नाशिक यांच्यावतीने शुक्रवारी (दि. १३) भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहाला हा मेळावा होणार असून त्यामध्ये ३० नामांकित औद्यागिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. मेळाव्यात अधिकाधिक बेरोजगारांनी सहभागी होऊन नोकरीच्या संधीचा लाभ घ्यावा,

असे आवाहन रोजगार व स्वयंरोजगार नाशिक विभागाचे उपसंचालक अनिल पवार यांनी केले आहे.

मेळाव्यात २९ उद्योजकांनी एकूण २ हजार ४५४ रिक्तपदांची मागणी नोंदविली असून त्यामध्ये एस. एस. सी. ते पदवीधर, अभियांत्रिकी क्षेत्रातील पदविकाधारक, पदवीधर, कृषी पदविकाधारकांसाठी विशेष संधी पलब्ध आहेत. १०० महिलांना प्रशिक्षणार्थी म्हणून संधी मिळणार आहे.

तसेच एल अॅण्ड टी कंपनीत पाचवी ते बारावी उत्तीर्ण पात्रता धारकांना तीन महिन्याचे विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना कंपनीच्या कामाच्या ठिकाणी लगेचच रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

त्यासाठी १८ ते ४० अशी वयोमर्यादा ठरविण्यात आली आहे. मेळाव्यात दे आसरा फाऊंडेशन या संस्थेकडून उद्योग, व्यवसायात स्वयंरोजगार करण्यास इच्छूक उमेदवारांना मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे. विभागीय रोजगार मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अधिसूचित रिक्त पदांच्या माहितीसाठी www.maharojgar.gov.in या वेबपोर्टलला नियमितपणे भेट द्यावी. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२५३-२४५०२९/२५००६५३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डाक सेवक युनियनचे बेमुदत कामबंद आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सर्व ग्रामीण डाक सेवकांना त्वरित खात्यात समाविष्ट करावे यांसह अनेक मागण्यांच्या पूर्ततेसाठी ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक युनियनने मंगळवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. मागण्यांची पूर्तता न करणाऱ्या सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. मात्र, या कामबंद आंदोलनामुळे ग्रामीण भागातील टपाल वितरणावर विपरित परिणाम होणार आहे.

केंद्र सरकारने माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण डाकसेवक कर्मचाऱ्यांसाठी वेतन पूनर्निधारण समिती स्थापन करण्याची मागणी फेटाळली आहे. त्यामुळे युनियनच्या केंद्रीय शाखेने संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. डाक सेवक वेतन समिती स्थापन करण्याचे लेखी आश्वासन तत्कालीन सरकारने संघटनेला दिले होते. मात्र, सत्तेवर आलेल्या नवीन सरकारला मागण्या मान्य नाही.

केंद्राने सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर वेतनात सुधारणा करण्यासाठी माजी न्यायमूर्ती प्रमुख असलेली समिती स्थापन करावी. प्रस्तावित खासगीकरण थांबवावे, ५० टक्के महागाई भत्ता वेतनात समाविष्ट करावा यांसह अनेक मागण्या आहेत. तसेच सरकारच्या चुकीच्या धोरणांना संघटनेचा कडाडून विरोध आहे. म्हणूनच हा विरोध दर्शविण्यासाठी संघटनेने बेमुदत बंदचे हत्यार उपसले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुदत संपलेली औषधे ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

सातपूर एमआयडीसीतील स्नायडर कंपनीच्या समोरील उघड्यावर नाल्यावर मुदत संपलेली औषधे टाकल्याचे वृत्त 'मटा'ने प्रसिद्ध केल्यांनतर महापालिकेच्या सातपूर आरोग्य विभागाने ती औषधे ताब्यात घेतली आहे. तसेच संबधित औषध कंपनीची माहिती घेऊन आरोग्य विभागाकडून कारवाई होणार असल्याचे विभागीय स्वच्छता निरिक्षक संजय गांगुर्डे यांनी 'मटा'ला सांगितले.

सातपूर व अंबड एमआयडीसीत मोकळ्या भूखंडावर फेकल्या जाणाऱ्या डेब्रिजबाबत अनेकदा उद्योजक तक्रारी करत असतात. परंतु, यात भर म्हणून की काय स्नायडर कंपनीच्या समोरील उघड्या नाल्याच्या बाजूला औषध कंपनीची मुदत संपलेली पॅकिंग औषधे फेकण्यात आली. याबाबत मटाने वृत्त प्रसिद्ध केल्यांनतर महापालिकेच्या सातपूर आरोग्य विभागाने ती औषधे ताब्यात घेतली. तसेच त्या औषधाच्या कंपनीवर कारवाई करणार असल्याचे स्वच्छता निरिक्षक गांगुर्डे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मेकहेव्हन’ राष्ट्रीय स्पर्धा उद्यापासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मेकॅनिकल क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा आविष्कार समजली जाणारी मेकहेव्हन ही राष्ट्रीय स्पर्धा के. के. वाघ इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये गुरुवारपासून (१२ मार्च) सुरू होत आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने देशभरातील विविध विद्यार्थ्यांचे नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर होणार आहेत. या स्पर्धेसाठी 'महाराष्ट्र टाइम्स' मीडीया पार्टनर आहे.

के. के. वाघ इंजिनीअरींग कॉलेजच्यावतीने गेल्या १५ वर्षांपासून मेकहेव्हन ही राष्ट्रीय स्पर्धा घेतली जाते. दरवर्षी मोठ्या प्रमाणात या स्पर्धेत देशाच्या विविध भागांतील विद्यार्थी सहभागी होतात. यंदा या स्पर्धेत मेकॅनिकल क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर होणार असल्याचे प्रा. एम. बी. मुरुगकर यांनी सांगितले. स्पर्धेत विजेत्या ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारची पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेची http://www.mecheaven15.com/ ही स्वतंत्र वेबसाइट शौनक चांदवडकर या विद्यार्थ्याने साकारली आहे.

हे असतील कार्यक्रम

मेकहेव्हनमध्ये रोबो रेस, रोबो सॉसर, कॉन्ट्रॅप्शन, टार्गेट्रिक्स, कॅड मास्टर, जी. के. क्वीझ, मेझ क्रेझ, लेथ वॉर, पोस्टर मेकिंग कॉम्पिटीशन, स्नॅपशॉप, बाईक मॅनिया, ट्रेझर हंट, पिक्सेलेज असे विविध प्रकारचे कार्यक्रम होणार असल्याची माहिती प्रा. एस. व्ही. कडभाने यांनी दिली आहे.

मेक इन इंडियावर भर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया ही संकल्पना जाहीर केली आहे. देशाला लागणाऱ्या विविध वस्तू, उपकरणे ही देशातच तयार व्हावीत, असे यात अपेक्षित आहे. या संकल्पनेला अधिक वाव या स्पर्धेत दिला जाणार आहे. देशांतर्गत उत्पादन होण्यासाठी जे प्रकल्प प्रभावी ठरू शकतात. त्या प्रकल्पांचे सादरीकरण या स्पर्धेत केले जाणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. के. एन. नांदूरकर यांनी दिली आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डिपेक्स’ला उदंड प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक इंजिनीअरींग क्लस्टरमध्ये सध्या सुरू असलेल्या डिपेक्स प्रदर्शनाला भेट देण्यासाठी मोठी रांग लागली असून, या प्रदर्शनाचा बुधवारी समारोप होणार आहे. डिपेक्समध्ये असलेल्या वैविध्यपूर्ण प्रकल्पांना पाहण्यांसाठी मोठी गर्दी होत आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन ट्रस्ट यांच्यावतीने डिपेक्स प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातील वैशिष्ट्यपूर्ण असे २७५ प्रकल्प सादर झाले आहेत. हे प्रकल्प पाहण्यासाठी शहरातील इंजिनीअरींग आणि विविध क्षेत्रातील कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांची व उद्योजकांची मोठी गर्दी होत आहे. इंजिनीअरींग, विज्ञान, कृषी अशा विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी केलेले संशोधन आणि त्यांनी साकारलेल्या विविध विज्ञान विषयक आविष्कार डिपेक्समध्ये मांडण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतानाच कौशल्यपूर्ण उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना देण्यासाठी डिपेक्स हे प्रदर्शन गेल्या २६ वर्षांपासून भरविले जाते. नाशकात १९९७ आणि १९९८ मध्ये हे प्रदर्शन झाले होते. त्यानंतर आता ते यंदा होत आहे.

वुमन सेफ्टी जॅकेट

मुंबईच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमधील कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या फरहीन कमल, रश्मी मोरे, मरलीन सीमोस व शगुफ्ता शेख यांनी 'वुमन सेफ्टी जॅकेट' तयार केले आहे. जॅकेट घातलेल्या महिलेची छेड काढण्याचा प्रयत्न केल्यास मायक्रो कंट्रोलिंग युनिटद्वारे बझर वाजतो. जॅकेटला हात लागताच विजेचा तीव्र झटका बसतो. जॅकेटला मायक्रोकंट्रोलर युनिट जोडलेले आहे. त्यातून बारीक तारांचे जाळीवजा कुंपण आहे. जबरदस्तीने झटापट करण्याचा प्रयत्न करताच कंट्रोलरचे बटण पुश-अप करायचे आहे. त्यानंतर बझर वाजतो आणि सेफ्टी जॅकेटला असलेल्या तारांमधून वीजप्रवाह वाहतो. तारांना हात लागताच विजेचा तीव्र झटका बसतो. कंट्रोल युनिटला ब्ल्यू-टूथ कनेक्ट असून ते अँड्रॉइड अॅपशी कनेक्ट आहे. जॅकेट घातल्यावर ब्लूटूथ आपल्या मोबाईलशी पेअर ठेवायचे आहे. कोणी जॅकेट ओढल्यास स्वीच बटण पुश होते. सेफ्टी जॅकेटचा बझर वाजतो. ब्ल्यू-टूथद्वारे अॅपशी कनेक्टिंग होते. आप्तांच्या इमर्जन्सी क्रमांकावर अलर्ट जातो. जीपीएसद्वारे ठिकाण ट्रॅप होते. या जॅकेटसाठी ९ हजार रुपये खर्च आल्याचे या विद्यार्थिनींनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदापासून क्रीडा शिष्यवृत्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे क्रीडा क्षेत्रातही योगदान रहावे, त्यांच्यातील क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने क्रीडा शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाचा २०१५-१६ साठीचा अर्थसंकल्प आणि सोळावा वार्षिक अहवाल मंगळवारी मंजूर करण्यात आला.

विद्यापीठाचा गेल्या वर्षाचा अर्थसंकल्प १४२ कोटी रुपयांचा होता. या अर्थसंकल्पात यंदा लक्षणीय वाढ झाली असून, तो यंदा २२५ कोटींचा आहे. विद्यापीठाचे एकत्रित उत्पन्न २२५.१४ कोटी रुपये अपेक्षित आहे. तर, खर्च २२८.६६ कोटी तर वित्तीय तूट ३.५२ कोटी रुपये अपेक्षित आहे. अर्थसंकल्प बैठकीला कुलगुरु डॉ. अरुण जामकर, प्रतिकुलगुरु डॉ. शेखर राजदेरकर, कुलसचिव डॉ. काशिनाथ गर्कळ उपस्थित होते. डॉ. गजानन एकबोटे यांनी अर्थसंकल्प सादर केला. विद्यापीठाचा पंधरावा वार्षिक अहवाल सदस्य डॉ. विठ्ठल धडके यांनी सादर केला. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. काशिनाथ गर्कळ यांनी सभेचे संचलन केले.

हे नवीन कोर्सेस सुरू होणार

शिक्षकांना वैद्यकीय शिक्षणात तज्ज्ञ करण्यासाठी ३ ते ५ वर्षांचा मास्टर इन हेल्थ प्रोफेशन एज्युकेशन हा कोर्स सुरू करण्यासाठी (१० लाख), जनुकीय आजारांबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी जेनेटिक कौन्सेलिंग हा १ वर्षांचा कोर्स सुरू करण्यासाठी (५ लाख), वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी अॅडव्हान्स डिप्लोमा इन हॉस्पिटल मॅनेजमेंट हा एक वर्षाचा अभ्यासक्रम करण्यासाठी (५ लाख).

मेक इन इंडियासाठी

वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक असलेली यंत्रसामग्री भारतातच निर्माण व्हावी तसेच आधुनिक यंत्रसामग्रीचा शोध लावण्यासाठी (२५ लाख), वैद्यकीय उपचार व उपचारांसाठी आवश्यक असलेली उपकरणे व साधनांची निर्मिती करण्यासाठी (१० लाख) तरतूद करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पातील विविध तरतुदी

क्रीडा शिष्यवृत्तीसाठी (२५ लाख), सर्वसमावेशक नवीन संशोधनासाठी (५० लाख), शिक्षकांसाठी कॉम्प्युटरद्वारे कार्यक्रम सुरु करण्यासाठी (५ लाख), गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींची जनुकीय माहिती गोळा करण्यासाठी डीएनए बँकिंग (१० लाख), रक्तपेशी कमी झाल्यामुळे अॅनेमिया होऊन शरीराची वाढ खुंटते. त्यावर संशोधन करण्यासाठी (५० लाख), कुपोषण असलेल्या भागात आयुर्वेद व अॅलोपॅथी उपचार पध्दतीची माहिती देण्यासाठीच्या त्रिवेणी कार्यक्रमासाठी (५ लाख), आयुष संशोन लॅब तयार करण्यासाठी (१५ लाख), स्वतंत्र मआविवि पंचकर्म केंद्राची स्थापना करण्यासाठी (२० लाख), युनेस्को जैव नीतिशास्त्र केंद्राची स्थापना करण्यासाठी (१० लाख), विद्यापीठ परिसरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी (५० लाख), ऐरोली येथे इनक्युबेशन सेंटर स्थापण्यासाठी (५ कोटी) दिले जाणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या विविध कल्याणकारी योजनांसाठी (२ कोटी १५ लाख), विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याकरीता विद्यापीठाचे क्रिडा संकूल बांधण्यासाठी (२५ लाख), विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन देण्यासाठी (६ लाख), मानसिक समुपदेशनासाठी (६ लाख), रॅगिंगला प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी (३ लाख) कुंभमेळ्यात आपत्कालीन प्रशिक्षणासाठी (७० लाख), ग्रामीण भागातील लोकांमध्ये आरोग्य व स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी विद्यापीठामार्फत राबविण्यात येणाऱ्या ग्राम दत्तक योजनेसाठी (२५ लाख), आंतर संस्थात्मक सर्वसमावेशक संशोधन केंद्रांतर्फे विविध संस्थांना एकत्रित करुन संशोधनाची माहिती समाजातील विविध घटकांना देण्यासाठी (५० लाख), विद्यापीठाला नॅकचा दर्जा मिळविण्यासाठी (२५ लाख), विद्यापीठ व संस्था दोघांच्या व्यवस्थापनाने प्र्रायोगिक तत्वावर होमिओपॅथी कॉलेज सुरु करण्यासाठी (२५ लाख), शिक्षक व विद्यार्थी यांना फेलोशीप देण्यासाठी (१ कोटी ५० लाख), शिक्षकांना संशोधनास प्रोत्साहन देण्यासाठी प्रवास खर्च व परदेश दौऱ्यासाठी (१० लाख) तरतूद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कालबाह्य हेलिकॉप्टर बदला

$
0
0


नाशिक : लष्करातील कालबाह्य चिता आणि चेतक या हेलिकॉप्टरच्या वापरावर बंदी घालावी आणि अत्याधुनिक हेलिकॉप्टरांचा समावेश करावा, या मागणीसाठी लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींच्या संघटनेचे शिष्टमंडळ बुधवारी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना भेटणार असल्याची माहिती मीनल वाघ-भोसले यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रेटर नाशिक!

$
0
0

साधारण ४३ वर्षांपूर्वी नवी मुंबईची संकल्पना तयार करण्यात आली होती. कारण मुंबई शहरावर दिवसेंदिवस वाढत असलेला जनसंख्येचा भार कमी व्हावा व काही प्रमाणात लोकसंख्या ही नवी मुंबईकडे वळवली जावी. ही गोष्ट लक्षात घेता त्यावेळी तसे नियोजन करून नवी मुंबईची संकल्पना अस्तिवात आली होती व अपेक्षा होती की नवी मुंबईची लोकसंख्या एका ठराविक स्तरापर्यंत जाऊ शकेल. पण, आज आपण जर त्याकडे लक्ष दिले तर नवी मुंबईच्या लोकसंख्येमध्ये ही पूर्वी केलेल्या नियोजनापेक्षा दुप्पट, तिप्पट पटीने वाढ झालेली आहे. नवी मुंबईचे क्षेत्र गर्दीचे झालेले आहे. साधारण १७ ते १८ वर्षापूर्वी मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे व नाशिक-मुंबई एक्सप्रेस हायवे ही संकल्पना उदयास आली. त्यावेळी प्रथम मुंबई-नाशिक एक्सप्रेस हायवे विकसित व्हावा ही संकल्पना आखण्यात आली. परंतु, पुरेसे राजकीय पाठबळ नसल्याने व राजकीय विरोधामुळे मुंबई-पुणे ह्या एक्सप्रेस हायवेला प्रथम मान्यता देण्यात आली. त्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे हा प्रथम उदयास आला. यामुळे मुंबईची बहुतांश लोकसंख्या ही ह्या मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेमुळे पुणे शहराकडे जास्त वळली व आज पुणे हे मोठे शहर म्हणून विकसित झाले आहे.

आज पुणे देखील अतिशय गर्दीचे शहर झाले आहे. कारण मुंबई हे एक असे शहर आहे ज्यात दिवसेंदिवस विकास होत आहे. भविष्यातही मुंबईचा विकास हा होत राहणार आहे. ह्या विकासामुळे लोकसंख्या व प्रदूषणातही मोठी वाढ होणार आहे. पण याला सोयीस्कर करण्यासाठी वेगवेगळे पर्याय काढणे फार आवश्यक झाले आहे. नुकतेच राज्य सरकारने कळवा येथे एक नवीन बिझनेस पार्क उभारण्यात येणार आहे, अशी संकल्पना जाहीर केली आहे. जे हुबेहूब वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स बिझनेस पार्क सारखी असेल पण ह्यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून नाशिक एकमेव शहर ठरू शकते. नाशिकच्या विकासाला कुठल्याही सीमा नाहीत. नाशिक शहर चारही बाजूने मोठ्या प्रमाणात विकसित होऊ शकते. वीज व पाणी मुबलक प्रमाणात नाशिकला उपलब्ध आहे. नाशिक हे धरणाचे शहर म्हणून ओळखले जाते. फक्त नाशिक शहराच्या विकासात बाधा येत आहे. गेली २० ते ३० वर्षांपासून कोणतेही राजकीय पाठबळ व इच्छाशक्ती लाभलेली नाही व कोणी ती दाखवलेली देखिल नाही की नाशिक ही एक ग्रेटर सिटी म्हणून व मुंबईची एक सॅटेलाईट सिटी म्हणून विकसित होऊ शकते.

राजकीय पाठबळ अभावमुळे नाशिकच्या रेल्वे, हवाई व रस्ते या मार्गात काही चांगला विकास झालेला नाही. आपण जर लक्ष दिले तर नाशिक-मुंबई एक्सप्रेस हायवेच्या तुलनेत मुंबई-पुणे व मुंबई-अहमदाबाद एक्सप्रेस हायवे खुपच सुंदर व सोयीस्कर झालेला आहे. त्यामुळे नाशिक-मुंबई महामार्ग हा विकसित होणे फार आवश्यक आहे. मुंबई - पुणे महामार्ग लवकरच १६ पदरी होणार आहे, पण नाशिक - मुंबई अजूनही ४ पदरी आहे. नाशिक- औरंगाबाद महामार्ग देखील विकसित होणे आवश्यक आहे. कारण आताची रस्त्याची परिस्थिती खूप वाईट आहे. गाड्यांचे खूप प्रमाणात नुकसान होत असते. सतत काही ना काही अपघात, दुर्घटना ह्या रस्त्यावर होत असतात. कारण रस्त्याची अतिशय बिकट परिस्थिती व लाईट व्यवस्था आणि पथदर्शिका देखील नसल्याने चालकास गाडी चालविणे ह्या मार्गावर अतिशय जिकरीचे होत आहे.

नाशिक-पुणे मार्गावर संगमनेर-नारायणगाव मार्गे जाणे अत्यंत जिकरीचे होते. लोक पुण्यासाठी नाशिक- ठाणे -नवी मुंबई एक्सप्रेस हायवे या मार्गाने प्रवास करणे पसंत करत आहेत. ह्या ज्या मुलभूत सुविधा आहेत ज्या एखाद्या सॅटेलाईट सिटीसाठी आवश्यक आहेत त्या मिळवून देण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती व पाठबळ असणे फार गरजेचे आहे. आपण सर्वांनी जर या गोष्टीकडे लक्ष केंद्रित केले नाही तर मुंबई शहराचा भार हा वाढतच राहणार. त्यामुळे मुंबईची गर्दीची समस्या दिवसेंदिवस वाढतच राहणार, म्हणून मुंबईला नाशिक सारखी सॅटेलाईट सिटी जोडणे हा पर्यायी मार्ग आहे. यासाठी नाशिकच्या राजकीय पुढाऱ्यांनी व मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी पुढाकार घेऊन जाणीवपूर्वक ही योजना राबविणे अनिवार्य आहे. दिंडोरी, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, येवला, सिन्नर यासारख्या शहरांना सामावून घेणाऱ्या ग्रेटर नाशिकसाठीच मेट्रोही प्रस्तावित आहे. नागपूर, पुणे आणि मुंबईची मेट्रो वेग घेत असताना ग्रेटर नाशिकची मेट्रोही कागदावरच राहिली आहे. याचा विचार व्हायला हवा.

(लेखक आयटी उद्योजक आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

८० लाखांच्या व्याजावरून स्थायी वेठीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तेराव्या वित्त आयोगांतर्गत उपलब्ध झालेल्या सुमारे २१ कोटी रुपयांवरील ८० लाखांच्या व्याजाची तीन सदस्यांनी परस्पर पळवापळवी केल्याचा आरोप करीत उर्वरित सदस्यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा डोक्यावर घेतली. अखेर सर्व सदस्यांच्या पदरी व्याजातून उपलब्ध होणाऱ्या निधीचे दान पदरात पडल्यानंतर सभेवरील विषयांना पूर्णविराम मिळाला.

व्याजापोटी उपलब्ध झालेल्या निधीची परस्पर पळवापळवी अन् निधी लाटण्याचा प्रयत्न होत असल्याच्या आरोपांवरून सुमारे तासभरासाठी स्थायी सभेचे कामकाज खोळंबले होते. दरम्यान बंद दरवाजाआडच्या चर्चेनंतर खोळंबलेली स्थायी सभेची गाडी अखेर रूळावर धावली अन् सभेवरील विषयांना मंजूरी मिळाली.

तेराव्या वित्त आयोगांतर्गत नाशिक जिल्हा परिषदेला सुमारे २१ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. या निधीवर ८० लाख ५० हजार रुपयांचे व्याज जिल्हा परिषदेला मिळाले होते. या व्याजाचा निधी मोजक्या तिघा सदस्यांच्या पदरी पडण्यावरून स्थायी सभेत प्रश्नचिन्ह उभे राहण्याची शक्यता काही दिवसांपासून होती. सभेत मंजुरीसाठी विषयांच्या मांडणी अगोदरच निधीच्या पळवापळवी, लाटालाटी आणि असमान वाटपाचा मुद्दा उपस्थित करीत यासाठी कारणीभूत असणाऱ्या प्रक्रिया आणि घटकांच्या तपशीलाची मागणी केली. हा तपशील पुरविण्यासाठी संबंधित विभागांनी असमर्थता दर्शविल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देवरे, बाळासाहेब गुंड आदींनी बहिष्कार टाकून सभात्याग केला. यानंतर नाराज सदस्यांची मनधरणी करताना लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील पदाधिकाऱ्यांची बंद दाराआड चर्चा झाली. दरम्यान या कालावधीत सुमारे तासापेक्षाही अधिक कालावधीसाठी स्थायी सभेचे कामकाज खोळंबले होते. ही चर्चा यशस्वी झाल्यानंतर पुन्हा सभागृहात परतलेल्या नाराज सदस्यांना व्याजाच्या निधीचे समान वाटप करण्याचा ठराव या सभेच्या सुरुवातीला करण्यात आला. या निधीचे समान वाटप होईपर्यंत सर्व वर्क आर्डर थांबविण्याचे आदेशही जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंबळे यांनी दिले.

दरम्यान तेराव्या वित्त आयोगांतर्गत विकासकामांसाठी जिल्हा परिषदेला २ कोटी १० लाख, पंचायत समित्यांना सुमारे ४ कोटी आणि ग्रामपंचायतींसाठी १४ कोटी ७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती यावेळी सदस्यांना देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ट्रायकॉम’मधील आंदोलन अखेर मागे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

ट्रायकॉम कंपनीतील कामगारांचे बंद आंदोलन मंगळवारी अखेर मागे घेण्यात आले. कामगार उपायुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीत तीन महिन्याच्या आत वेतनवाढीची बोलणी करणे व उर्वरित कामगारांचा १० टक्के बोनस कंपनीने दोन टप्यात देण्याचे ठरविण्यात आले. यानंतर सिटू भवनात कामगारांच्या झालेल्या बैठकित सिटूचे उपाध्यक्ष सिताराम ठोंबरे यांनी कामगारांनी ११ मार्चला पहिल्या पाळीपासून कामाला जाण्यास सांगितले.

कामगार कायद्याच्या ‌विविध सुविधा वेळेवर मिळत नसल्याने सातपूर औद्योगिक वसाहतीतील असलेल्या ट्रायकॉम इंडिया प्रा. लिमिटेड कंपनीतील कामगारांनी सहा मार्चपासून कामबंद आंदोलन सुरू केले होते. दरम्यान, मागण्या मान्य होत नसल्याने कामगार उपायुक्त कार्यालयात कंपनी व्यावस्थापन व कामगार युनियन यांची संयुक्त बैठक झाली. यावेळी कंपनीचे संचालक उपस्थित नसल्याने १० मार्चला बैठक घेण्याचे ठरले होते. दरम्यान कामगार उपायुक्त आर. एस. जाधव यांच्या दालनात झालेल्या बैठकीत मध्यममार्ग काढण्यात आला. यात कामगारांचा उर्वरित १० टक्के बोनस ३१ मार्च व ३० मे असा दोन टप्प्यात देण्याचे कंपनी व्यवस्थापनाने मान्य केले. तर तीन महिन्याच्या आत कामगारांचा प्रलंबित असलेली वेतनवाढीची बोलणी करण्याचेही कामगार उपायुक्तांनी कंपनी व्यवस्थापनाला सांगितले. याप्रसंगी ट्रायकॉम कंपनीचे संचालक परेश पाठक, चेतन कोठारी, चिराग शर्मा, कामगार युनियनच्या सिटूचे उपाध्यक्ष सिताराम ठोंबरे, आर. एस. पांडे, कंपनीचे युनियन प्रतिनिधी कैलास सरज, पंकज बोरसे, राहुल पवार, रंजना चव्हाण यांसह कामगार उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिऱ्हाड आंदोलक आक्रमक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नोकरीत कायम करण्याच्या मागण्यासाठी तब्बल १४ दिवसांपासून आदिवासी आयुक्तालयावर मुक्काम ठोकलेल्या बिऱ्हाड आंदोलक आता आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्र्यासह आदिवासी विकास मंत्री आणि आदिवासी लोकप्रतिनिधी अहिंसक मार्गाने आंदोलन करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने, गुरुवारपासून (दि. १२) आंदोलन आक्रमक करण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलकांनी आता अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला असून प्रसंगी आत्मदहन आंदोलन सुरू करण्याचा पर्यायही निवडला आहे. त्यामुळे पोलिसांसह आदिवासी विभागाला धडकी भरली आहे.

गेल्या दोन महिन्यापासून शहरात विविध कारणास्तव येणाऱ्या मंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आंदोलकांनी प्रश्‍न मांडला. मात्र, त्यांना आश्‍वासनाव्यतिरिक्त काही मिळाले नाही. आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांच्याही झालेल्या चर्चेतूनही काही हाती आलेले नाही. त्यामुळे हताश झालेल्या आंदोलकांना अधिवेशनात निर्णय होण्याची अपेक्षा आहे. त्यांच्या प्रश्नाला आदिवासी लोकप्रतिनिधी वाचा फोडतील अशी त्यांना आशा होती. मात्र, राज्यभरातील आश्रमशाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आता आक्रमक होत गुरुवारी कामबंद आंदोलन अथवा प्रसंगी सामूहिक आत्महन करण्याचा इशारा दिला आहे. सोबतच साखळी उपोषणाचे रुपांतर आमरण उपोषणात करण्याचा निर्णय घेतला असून गुरुवारपासून सर्व आंदोलक अन्नत्याग करणार आहेत.

आम्ही गेल्या चौदा दिवसापासून अहिंसक मार्गाने आदोलन करत आहोत. मात्र, आमच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे बुधवार अल्टीमेटम असून गुरूवारपासून आंदोलन तीव्र होणार आहे. - संदीप भाबड, आंदोलक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images