फ्रंट सीटवर बसवल्यास दंड
आज पालखी सोहळा
गोंदवलेकर महाराज जन्मोत्सव
३ हजार ५३ वाहने बेपत्ता
लवकरच नवे शिक्षक धोरण
देवळाली स्टेशनवाडीची वाट बिकट
‘त्या’ अधिकाऱ्यांवरही होणार कारवाई
निवडणूक प्रक्रियेत बदलाची गरज
BHR ठेवीदार घेणार पोलिस अधिकाऱ्यांची भेट
गॅस गळतीमुळे महिलेचा मृत्यू
सावरकर स्मारकासाठी ८० लाखांचा निधी
कर्जबाजारीपणामुळे खैरनार यांची आत्महत्या
५ लाख रुपयांची मिल्क पावडर जप्त
वाहन नोंदणीच्या नावाखाली लूट
बीफमार्केट बंद; उलाढाल ठप्प
राज्यभरातील सुमारे ३५० बीफ मटणविक्रेत्यांनी रविवार (ता. ९) मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेल्याने बीफ मटण व्यवसायाशी निगडीत आर्थिक व्यवहार थंडावले. बीफ मटण उपलब्ध न होऊ शकल्याने खानावळ व हॉटेल्स बंद होते.
देशात गोहत्या बंदीची मागणी जोर धरू लागल्यामुळे काही संघटनांकडून जनावरांची वाहतूक करणाऱ्या गाड्या अडविल्या जात असून या गाड्यांमधील ड्रायव्हर आणि अन्य कामगारांना मारहाण केली जात आहे. अशा घटनांमुळे बीफ मटन विक्रीचा व्यवसाय धोक्यात सापडला आहे. या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बेमुदत बंद पुकारत असल्याचे बीफ मर्चन्टर्स असोसिएशनने स्पष्ट केले. संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सध्या मुस्लिम समाजात लग्नसराई असून बीफ मटणाऐवजी जेवणावळीत बीफऐवजी चिकनचा पर्याय उरला आहे. त्यामुळे सोमवारी चिकनची मागणी वाढली असून किलोमागे दर ३० ते ४० रुपयांनी वाढला आहे.
टीपीसह आम्हाला डीपी द्या
शहर विकास आराखड्यावरून वादविवाद सुरू असतांनाच आता महापालिकेने शहरात टाऊन प्लॅनिंग स्किम लागू करण्याची तयारी सुरू केली आहे. येत्या महासभेत शहरात टीपी स्किम लागू करण्याचा ठराव केला जाणार आहे. तो प्रशासनासह सहसचांलकांना पाठविला जाणार आहे. टीपीसह शहरात डीपी लागू केल्यास महापालिकेचा जास्त फायदा होईल, असा दावा उपमहापौर गुरूमीत बग्गा यांनी केला आहे.
सध्या शहर विकास आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात असतांनाच आता महापालिकेच्या वतीने टीपीचा आग्रह धरला जात आहे. यासाठी महासभेचा ठराव करण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतला आहे. येत्या बुधवारी (दि. १८) आयोजित करण्यात आलेल्या महासभेत याबाबत सत्ताधाऱ्यांमार्फत ठराव मांडला जाणार आहे. शहरात टीपीसह डीपी द्यावा अशी सुधारित मागणी महापालिकेच्या वतीने प्रशासन व नगररचना विभागाचे सहसंचालकांना केली जाणार आहे. शहरात टीपी लागू झाल्यास नगररचना विभागाच्या वतीने झोनिंग करण्यात येईल. त्यामुळे महापालिकेला विकसित होणाऱ्या भागात जवळपास ५० टक्के जागा मिळणार आहे. त्यातून महापालिकेला काही जागा विकसितही करता येणार आहे. त्यामुळे टीपी स्किममध्ये महापालिका फायद्यात राहणार असल्याचा दावा उपमहापौर बग्गा यांनी केला आहे. यासाठी आपण स्वतःच ठराव मांडणार असल्याचे बग्गा यांनी सांगीतले आहे. त्यामुळे शहरात टीपी स्किम लागू करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनीच हालचाली सुरू केल्या आहेत.
भाविक मार्गासाठी आज बैठक
सिंहस्थात पर्वणीसाठी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात रामकुंडावर येत असल्याने ही गर्दी कमी करण्यासाठी पर्यायी आठ घाट उभारण्यात आले आहे. एकाच घाटावर गर्दी होऊ नये म्हणून बाहेरून येणाऱ्या भाविकांना वेगवेगळ्या घाटांवर थेट नेवून जाण्याचे नियोजन आहे.त्यासाठी स्वतंत्र ४० ते ४५ भाविक मार्ग निश्चित करण्यात आले आहे. त्याचे सादरीकरण मंगळवारी महापालिकेच्या वतीने साप्ताहिक बैठकीत करण्यात येणार आहे. या मार्गांवर चर्चा होऊन त्यास अंतिम रुप दिले जाणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ७५ कोटींचा निधी
काँग्रेसच्या आंदोलनामुळे ‘द्वारके’वर वाहतुकीचा खोळंबा
केंद्र व राज्य सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्यामुळे तसेच महागाईसह जनतेचे विविध प्रश्नांसंदर्भात सोमवारी शहर काँग्रेसच्या वतीने शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या द्वारका चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. काँग्रेस कमिटीचे सचिव श्यौराज वाल्मिकी यांच्या नेतृत्वात अर्धा तास चाललेल्या या आंदोलनामुळे मुबंई-आग्रा महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा होऊन सर्वसामान्यांचे हाल झाले.
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली. पोलिसांना काँग्रेसच्या सुमारे १०० कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना अटक करून नंतर सोडून दिले. शेतकऱ्यांना कर्जमाफी व थेट भरीव आर्थिक मदत तसेच कच्च्या तेलाच्या घटत्या किंमतीच्या प्रमाणात इंधनाचे दर कमी करण्यासह इतर विविध मागण्यांसंदर्भात काँग्रेसतर्फे राज्यव्यापी रस्तारोको आंदोलन करण्यात आले. भाजपष आणि शिवसेनेच्या केंद्र व राज्यातील सरकारकडे जनतेच्या विविध समस्यांकडे आणि मागण्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांनी दिलेली आश्वासने खोटी ठरली आहेत. जनतेमध्ये विशेषत: शेतकरी, सर्वसामान्य ग्राहक आणि कामगार वर्गात प्रचंड नाराजी व फसवणुकीची भावना आहे. जनतेच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्याकरिता आंदोलन पुकारण्यात आल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले.
शहरात मुबंई-आग्रा महामार्गावर द्वारका चौकात वाल्मिकी यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष शरद आहेर, आमदार सुधीर तांबे, नगरसेवक उत्तम कांबळे यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आंदोलन झाले. या आंदोलनामुळे प्रवाशांसह सामान्यांचा खोळंबा झाला. पुणे महामार्गासह सारडा सर्कलवरील वाहतूक ठप्प झाली.
सहापट TDR चा मुद्दा बारगळणार?
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या साधुग्रामसाठी लागणारी अतिरिक्त ६० एकर जागा भाडेतत्वावर संपादित करण्यात आल्याने साधुग्रामच्या जागेसाठी शेतकऱ्यांना देण्यात येणारा सहापट सिंहस्थ टीडीआरचा विषय आता बारगळण्याची शक्यता आहे. प्रशासनाला याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला असला तरी, भाडेतत्वाच्या जागेमुळे याची अमंलबजावणी होण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे टीडीआरचा बाजारातील दर कोसळण्याची शक्यताही कमीच आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या साधुग्रामसाठी कायमस्वरूपी जागा खरेदी करण्यासाठी येथील शेतकऱ्यांना जमिनीच्या मोबदल्यात सहापट टीडीआर देण्याचा ठराव करण्यात आला होता. सोबतच सरकारने ही जागा चालू सिंहस्थासाठी भाडेतत्वाने घेण्याचा निर्णय घेत शेतकऱ्यांना प्रतिएकर दहा लाख रुपये दर निश्चित करत जागाही ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.आतापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाने साधुग्रामसाठी ६० एकर जमीन ताब्यात घेतली आहे. त्यामुळे सध्या साधुग्रामच्या जागेचा वाद मिटला आहे. त्यामुळे सहापट टीडीआर देण्याचा विषय आता बारगळणार अशी चर्चा आहे. आता जागेचा वाद मिटल्याने या प्रस्तावाला प्रशासनाने मान्यता दिली तरी त्याची अमंलबजावणी आता होण्याची शक्यता कमीच आहे. सिंहस्थाचा टीडीआर मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार असल्याने सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या टीडीआरचे दर कोसळल्याची चर्चा आहे. मात्र, ही अफवा असल्याचा दावा विकासकांकडून केला जात आहे.