Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सुशोभिकरणाला मुर्हूत कधी?

$
0
0
नाशिकमध्ये अवघ्या काही दिवसांवर कुंभमेळा येऊन ठेपलेला असतांना शहरात विकासकामांनी अद्याप गती घेतली नसल्याचे दिसून येत आहे. अशाच प्रकारे भूमिपूजनाची औपचारिकता पार पडून चार महिने उलटले परंतु, सातपूर येथील बसस्थानकाच्या सुशोभिकरणाचे काम अद्याप सुरू झालेले नाही.

नागरिकांनीच बसवला पथदीप

$
0
0
मागील पाच महिन्यांपासून पथदीप बंद अवस्थेत आहेत. अनेकदा अर्ज विनंत्या केल्या. मात्र, कोणी ढुंकूनही पाहिले नाही. सुरक्षा महत्त्वाची असल्याने शेवटी एक पथदीप स्वखर्चाने सुरू केला.

सन्मानाने जगण्याचा अधिकार

$
0
0
तृतीयपंथीय असलो म्हणून काय झाले, प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. समाजाच्या नजरा अवहेलना करीत असल्या तरी त्याचे आम्हाला काय? आम्हीच आम्हाला सन्मान मिळवून देणार असा संदेश ‘हिजडा’ या नाटकातून प्रेक्षकांच्या समोर आला. आकांशा रंगभूमी प्रस्तुत आणि सागर लोधी लिखीत आणि दिग्दर्शित ‘हिजडा’ या नाटकाने प्रेक्षकांच्या हृदयाला हात घातला.

अनुकंपा भरतीसाठी प्रतीक्षा

$
0
0
महापालिका सेवेत असताना मृत्यू पावलेल्या नातेवाईकांचे डोळे अनुकंपाच्या भरतीसह राज्य सरकारच्या निर्णयाकडे लागले आहे. तब्बल ३० कर्मचाऱ्यांचे कुटुंब यामुळे अडचणीत असून सिंहस्थापूर्वी अनुकंप भरतीचा निर्णय होण्याची प्रशासनाला अपेक्षा आहे.

स्वामी विवेकानंद अन् शिक्षण

$
0
0
विवेकानंदांचा जन्म १२ जानेवारी १८६३ मध्ये झाला व ४ जुलै १९०२ ला त्यांचे महानिर्वाण झाले. मात्र, ११३ वर्षांनंतरही विवेकानंदांचे तेजस्वी विचार हे स्फूर्तीप्रद आणि प्रेरणेचा स्त्रोत आहेत. स्वामीजींचा काळ घोर अज्ञानाचा, पराकोटीच्या दारिद्र्याचा आणि परकीय राज्यसत्तेखाली पिचून गेलेल्या अशा अंधकारमय हिंदुस्थानचा होता.

गोदावरीचे भवितव्य अंधारात

$
0
0
दमणगंगा-पिंजाळ लिंक व पार-तापी-नर्मदा लिंक प्रकल्पास महाराष्ट्र सरकारमार्फत सहमती देण्याची शक्यता असून, त्यासाठी केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांनी मुंबईत खास बैठक घेतली. केंद्रामार्फत महाराष्ट्रावर प्रचंड दबाव टाकण्यात येत आहे.

आदिवासींची सेवाच बनली फॅशन

$
0
0
अत्यंत विपरीत आणि विदारक परिस्थितीमध्ये मेळघाटातील आदिवासी रहात होते. त्यांच्यासाठी काम करावे ही आमची इच्छा होती. हे काम आमच्यावर कुणी लादले नव्हते.

‘स्वरतरंग’ मध्ये रसिक मंत्रमुग्ध

$
0
0
हळूहळू नादमय होत जाणाऱ्या वातावरणात एकच मंजूळ नाद सुरू झाला तो जलतरंगांचा. या जलतरंगांनी वातावरणात रंग भरल्यानंतर रसिकांना रममाण केले ते नाट्यगीताच्या स्वरांनी.

संस्कृत जनभाषा व्हावी

$
0
0
संस्कृत ही सर्व भाषांची जननी असून, ती जनभाषा झाली तरच संस्कृतमधील विज्ञान जगासमोर येईल, असे प्रतिपादन आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी केले. दादासाहेब गायकवाड सभागृहात संस्कृत भारतीतर्फे आयोजित संस्कृत संमेलनात ते बोलत होते.

थकबाकीदारांविरोधात कारवाई

$
0
0
सूचनापत्र देऊनही घरपट्टी व पाणीपट्टीची थकबाकी भरण्यास टाळटाळ करणाऱ्या थकबाकीदारांविरोधात या आठवड्यात जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त आर. एम. बहिरम यांनी दिली. यात नळपट्टी कराच्या थकबाकीदारांचाही समावेश असणार आहे.

राज्यभरात तीन पथके रवाना

$
0
0
दापूर येथे बँक ऑफ महाराष्ट्रवर पडलेल्या दरोडा प्रकरणातील संशयितांनी पकडण्यासाठी राज्यात तीन पथके रवाना करण्यात आली आहेत. गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेले गॅस कटर तसेच सिलिंडरची टाकी पोलिसांना घटनास्थळी मिळून आली आहे.

एसीपींची वानवा सहा पदे रिक्त

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळा जवळ येत असताना शहरात पोलिस अधिकाऱ्यांची वाणवा जाणवू लागली आहे. शहरातील सहायक पोलिस आयुक्तांची तब्बल सहा पदे रिक्त असून त्यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था वाऱ्यावर आल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

अपघातात मुंबईच्या तिघांचा मृत्यू

$
0
0
शिंदेगावाजवळ र‌विवारी सकाळी साडेनऊला ट्रक आणि इनोव्हा यांचा भीषण अपघातात मुंबईचे तीनजण ठार तर दोनजण गंभीर जखमी झाले. नाशिकरोड पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अपघातामुळे नाशिक-पुणे महामार्गाची वाहतूक चार तास ठप्प झाली होती.

तक्रारदारांना मिळणार पोलिस संरक्षण

$
0
0
लाचलुचपत प्रकरणात अडकल्यानंतर सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून तक्रारदाराला धमकावण्याचे, त्रास देण्याचे प्रकार घडू शकतात. तक्रारदाराने आमच्या विभागाला माहिती द्यावी.

‘नंदिनी’चे अस्तित्वच धोक्यात

$
0
0
सातपूर येथील औद्योगिक वसाहतील कारखान्यातील रसायनयुक्त पाणी व शहरातील गटार व नाल्यांतील घाण पाणी सर्रासपणे नासर्डी नदीत सोडले जात असल्याने या नदीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

पाणीप्रश्नी भाजपला घरचा ‘आहेर’

$
0
0
केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील चर्चेनंतर दमणगंगा-पिंजाळ नदीजोड योजनेला मंजुरी देण्यात आल्यानंतर आता केंद्र व राज्यातील भाजप सरकारला घरचा आहेर मिळाला आहे.

सिंहस्थ आपत्तीचे ‘गुप्त नियोजन’

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी करावयाच्या आपत्ती व्यवस्थापनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी गुप्त बैठक घेऊन नियोजनास सुरुवात केली आहे.

पतसंस्था ठेवीदारांच्या आशा पल्लवित

$
0
0
जळगाव जिल्ह्यातील बंद सहकारी पतसंस्थांबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल सहकार विभागाच्या उपनिबंधकांनी तातडीने सादर करावा, अशी सूचना विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी सोमवारी विभागीय लोकशाही दिनात केली.

शिवरायांचे विचार आदर्शवत

$
0
0
स्वतःपेक्षा राष्ट्र महत्वाचे हा विचार समाजात रुजविणारे छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण मानवजातीसाठी आदर्श आहेत, असे प्रतिपादन पुणे येथील प्रसिद्ध वक्ते पांडूरंग बलकवडे यांनी केले.

उपचाराअभावी आईसह बाळाचा मृत्यू

$
0
0
लोहणेर प्राथमिक आरोग्य केंद्र व कळवण उपजिल्हा रुग्णालयात योग्य उपचार न मिळाल्याने ठेंगोडा येथील गरोदर महिलेचा बाळासह मृत्यू झाला.
Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images