काळाराम मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे इंटरनेटद्वारे जोडण्याचे ट्रस्टच्या विचाराधीन आहे. पोलिसांना आयुक्तालयातूनच सीसीटीव्हीच्या माध्यमातूनच संशयास्पद हालचाली टिपता याव्यात यासाठी तेथेच कनेक्टीव्हिटी देण्याचे प्रयत्न ट्रस्टने सुरू केले आहेत.
'काळाराम'ची कनेक्टव्हिटी पो.आयुक्तालयात
↧
↧
भुजबळांनी वापरले सर्वाधिक 'आर्थिक बळ'
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील १५ मतदारसंघांमधून सर्वाधिक खर्च करणारे उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ ठरले आहेत. भुजबळ यांनी १९ लाख रुपये खर्च केला आहे.
↧
आमदार अडचणीत
राज्यातील सर्व आमदारांना आता जानेवारीतच निधी मिळणार असल्यनो स्थानिक पातळीवरील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी नागरिक भेटायला येत असले, तरी नूतन आमदारांना मात्र निधीअभावी ‘हाताची घडी तोंडावर बोट’च ठेवावे लागत आहे.
↧
डेंग्यूग्रस्तांना द्या मदत!
डेंग्यूबळींच्या आप्तांना भरपाई देण्याची मागणी विरोधकांनी मनपात महापौरांकडे केली.
↧
रेशनकार्ड नोंदीचे रजिस्टर गायब
नाशिकच्या धान्य वितरण कार्यालयातील रेशनकार्डच्या वितरणातील अनेक धक्कादायक बाबी उजेडात येत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून या कार्यालयातील रेशनकार्ड व त्याच्या युनिटच्या नोंदींचे रजिष्टरही गायब झाले आहे. मूग गिळून गप्प राहण्याच्या या प्रकाराने कार्यालयातील कामकाजाने बेशिस्तपणाचा कळस गाठला आहे.
↧
↧
फाईलला फुटले पाय
जिल्हा परिषदेच्या शाळा दुरूस्तीचा ८० लाख रुपयांचा निधी बेकायदेशीरपणे रस्त्यांच्या कामासाठी वळविण्याच्या निर्णयाची वादग्रस्त फाईल आता गायब झाल्याचे समोर आले आहे. शिक्षण विभागातून गायब झालेल्या फाईलचा शोध सुरू आहे.
↧
बिबट्याने धूम ठोकली
बागलाण तालुक्यातील कौतिकपाडे येथे रविवारी रात्री बिबट्या विहिरीत पडला होता. सोमवारी सकाळी ग्रामस्थांनी त्यास खाटेव्दारे विहिरीबाहेर काढण्यात यश मिळविले. मात्र, बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभाग व ग्रामस्थांना अपयश आले. विहिरीबाहेर येताच बिबट्याने धूम ठोकली. यामुळे बिबट्याची दहशत कायम आहे.
↧
रखडला ग्रामीण विकास
ग्रामंपचायत हद्दीतल्या जमिनींच्या खरेदी विक्रीतून मिळणाऱ्या मुद्रांक शुल्काचा आपल्या हिश्यातील परतावा गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना मिळालाच नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. निधी न मिळाल्याने ग्रामपंचायतींच्या विकासकामांवर परिणाम होत आहे.
↧
असुरक्षित मंदिर, भाविक
नाशिकमधील सोमेश्वर व नवश्या गणपती हे दोन्ही जागृत देवस्थान असून, येथे नेहमी भाविकांची गर्दी असते. गोदावरी तीरावरील या देवस्थानांना अलौकीक निसर्गसौंदर्य लाभले आहे. यामुळे पर्यटकांची गर्दी वाढत आहे. मात्र, या देवस्थांनाच्या सुरक्षेकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे.
↧
↧
मॉलसिटी मालेगाव
मालेगावने अन्य क्षेत्राप्रमाणे व्यापार व वाणिज्य क्षेत्रातही विकासाचा आलेख चढता ठेवला आहे. पन्नास वर्षे मागे वळून पाहिले तर मालेगावचे व्यापार क्षेत्र हे केवळ तीन गल्यांपर्यंत मर्यादित होते. मात्र, बदलत्या काळात मालेगावचे व्यापारी क्षेत्र विस्तारत जावून एक मोठे व्यापारी केंद्र म्हणून पुढे येते आहे.
↧
विखे पाटील स्कूलमध्ये डेंग्यूबाबत जनजागृतीसाठी रॅली
डॉ. विखे पाटील फाऊंडेशन संचलित अंबड येथील विखे पाटील मेमोरिअल स्कूलमध्ये स्पेशल सर्व्हिस कॅम्प अंतर्गत डेंग्यूजागृती विषयक प्रबोधनात्मक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत सहभागी विद्यार्थ्यांनी वृंदावन नगर येथील जॉगर्स पार्क परिसर स्वच्छ केला.
↧
संगणक अर्हता वाढवण्यासाठी मुदतवाढ
प्राथमिक शिक्षकांच्या संगणक अर्हता मुदतवाढ, शालेय पोषण आहार योजनेसाठी मध्यवर्ती स्वयंपाकगृह, शिक्षण हक्क कायद्यात आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबत सकारात्मक निर्णय शीघ्रतेने घेण्यात येईल, आश्वासन राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी प्राथमिक शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत सोमवारी (ता.२४) झालेल्या चर्चेत दिल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य कार्याध्यक्ष विजय कोंबे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिली आहे.
↧
येवल्यात स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ
शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगरपरिषदेतर्फे डेंग्यू, चिकनगुन्या व मलेरिया प्रतिबंधात्मक विशेष मोहीम राबविण्यात आली. यात ठिकठिकाणी जंतुनाशक पावडर व औषधांची फवारणी करण्यात आली.
↧
↧
सटाणा बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा ठिय्या
सटाणा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून १५ महिन्यांपूर्वी ३० क्विंटल कांद्यासह ट्रॅक्टर चोरीस गेला होता. याबाबत नुकसानभरपाई देण्याची कबुली देऊन १५ महिने उलटले तरी बाजार समितीने नुकसान भरपाई दिली नसल्याच्या कारणावरून राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे बाजार समितीचे प्रवेशद्वार बंद करून आंदोलन छेडण्यात आले.
↧
येवला विकास आराखड्याबाबत नागरिकांचा संभ्रम दूर करा
शहराच्या मंजूर विकास आराखड्याबाबत शहरवासीयांमध्ये असलेला संभ्रम नगररचना विभाग व पालिकेच्या बांधकाम विभागाने दूर करावा, अशी मागणी माजी नगरसेवक माणिक शर्मा यांनी एका निवेदनाद्वारे संबंधितांकडे केली आहे.
↧
अनधिकृत बांधकाम प्रशासनाने हटवले
सिन्नर तहसील कार्यालयाच्या आवारात असलेले स्टॅम्प व्हेंडराचे अनधिकृत बांधकाम मंगळवारी जिल्हा प्रशासनाने जमीनदोस्त केले. प्रांत शशिकांत मंगरुळे, तहसीलदार मनोज खैरनार, पोलिस निरीक्षक किशोर नवले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता काद्री यांच्या उपस्थितीत ही कारवाई झाली.
↧
काँग्रेस-जनता दलाची मालेगावी महासभेत एकी
आगामी डिसेंबर महिन्यात होणाऱ्या महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मालेगावी मनपाची महासभा संपन्न झाली. अपेक्षेप्रमाणे या महासभेला तिसरा महाजचे नगरसेवक अनुपस्थिती राहिले.
↧
↧
चलो, मंदिर चले हम!
कधीही पडेल अशी येवला तालुक्यातील वाईबोथी गावातील अंगणवाडी... जिवाच्या भीतीनं गावच्या मंदिरात शिकत असलेले चिमुकले... अन् ‘चलो स्कूल चले हम’ अशी आर्त हाक देत शाळेच्या स्थितीकडे दुर्लक्ष करणारे जिल्हा प्रशासन अन् सर्वकाही डोळ्यासमोर असताना आंधळ्यागत करणारे पुढारी मंडळी... विकासपुरूष आ. छगन भुजबळांच्या येवल्याच्या विकासाची राज्यभर चर्चा सुरू असताना...
↧
कधी थांबणार हे दुष्टचक्र?
यंदा वर्षभरात तब्बल २७ शेतकऱ्यांनी त्यांची जीवनयात्रा संपविली आहे. गेल्या तीन वर्षांची तुलना करता यंदाचा उच्चांक आहे. सरकार दरबारी मदत दिली जात असली तरी ती वेळेवर मिळत नसल्यानेच आत्महत्यांच्या घटनांना बळ मिळते आहे.
↧
यशासाठी हवे प्रभावी मार्केटिंग
‘कुठलाही व्यवसाय किंवा उद्योग यशस्वी करायचा असेल तर त्याचे प्रभावी मार्केटिंग करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.’ असे प्रतिपादन परपलचाय टेक्नॉलॉजीजच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैशाली शर्मा यांनी केले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉर्मस इंडस्ट्री अँण्ड अँग्रीकल्चरच्या वतीने व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी यांच्यासाठी आयोजित केलेल्या 'डिजिटल मार्केटिंग व एमएस एक्सल' या विषयावरील कार्यशाळेमध्ये त्या बोलत होत्या.
↧
More Pages to Explore .....