शहर आणि जिल्हाभरातील प्राथमिक शिक्षकांचे वेतन गत दोन महिन्यांपासून रखडले आहे. एकीकडे निवडणुकीसारख्या अतिरिक्त कामाचे ओझेही सरकारी यंत्रणेकडून शिक्षकांच्या माथी मारले जात आहे. तर, दुसरीकडे त्यांचे आहेत ते पगारही रखडवून ठेवण्यात आले आहेत.
शिक्षकांचे रखडले वेतन
↧
↧
कॉलेज रोडला वाहतूक कोंडी
शहराचा शॉपिंग स्ट्रिट व खवय्येगिरींसाठी प्रसिद्ध असलेला कॉलेज रोड संध्याकाळनंतर गर्दीने फुलू लागल्याने येथे प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते.
↧
राजकीय पुनर्वसनासाठी खटाटोप
मूळत: स्वभावाने मृदू असलेले गुलबाराव देवकर घरकुल घोटाळ्यात भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे तीन वर्षांपूर्वी अडचणीत आले आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीला जणू ब्रेकच लागला.
↧
गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी सज्ज
एखादी व्यक्ती गुन्हेगार आहे का? त्याने नक्की कोणता गुन्हा केला आहे? याबद्दलचा न्यायनिवाडा करण्यासाठी आपल्याकडे स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे. एक सामान्य नागरिक म्हणून आजही गुन्हा आणि चुकीतला फरक मला कायद्याप्रमाणे सांगता येणार नाही.
↧
हस्तकलेच्या वस्तूंचे दालन वेधतेय लक्ष
हस्तकला आणि कलाकुसरीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या वस्तूंचे ‘सृजन साधना’ प्रदर्शन कुसुमाग्रज स्मारकात आयोजित करण्यात आले आहे. गुरूवारी या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
↧
↧
देवळ्याचा कौल निर्णायक ठरणार
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या चांदवड देवळा मतदारसंघात यंदा बहुरंगी लढत पहावयास मिळत आहे. देवळ्यातून एकच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, चांदवडमधून मात्र उमेदवारांची भाऊगर्दी झाली आहे. देवळ्यातून कोण सर्वाधिक मताधिक्य घेते यावरच येथील उमेदवाराचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
↧
शांतता! इलेक्शन सुरू आहे...
विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असतानाही येवला मतदारसंघात समावेश असलेल्या लासलगाव- विंचूरसह ४२ गावांमध्ये निवडणूक रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर भयाण शांतता पहावयास मिळत आहे.
↧
येवल्याच्या विकासाचाच ध्यास
‘येवल्याचा सर्वाथाने विकास झाला आहे. आर्थिक चलन वाढले, बँका शहरात आल्या आहेत, ठेवी वाढल्या, छपराची जागा बंगल्यांनी घेतली आहे. येवल्याचा विकास हाच ध्यास असल्याने पुन्हा येवलेकरांच्या सेवेत दाखल झालो आहे.’ असे प्रतिपादन येवला विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार छगनराव भुजबळ यांनी केले.
↧
'भुजबळांचं पार्सल कुठे पाठवायचं ते ठरवा'
‘शिवसेनेने महाराष्ट्रात कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. जातीपातीचं राजकारण खंर तर या महाराष्ट्रात भुजबळांनीच आणलं. त्यांना योग्य जागा दाखविण्याची संधी येवलेकरांना विधानसभेच्या निमित्ताने मिळाली आहे. हे पार्सल कोठे पाठवायचे हे येवलेकरांनीच ठरवायचे आहे.’ असे प्रतिपादन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले.
↧
↧
हिंदीचा वापर वाढवा
‘पंतप्रधानांनी नुकत्याच केलेल्या विदेश दौऱ्यामध्ये विदेशी नेत्याबरोबर आपले संपूर्ण भाषण हिंदीमधून करून एक नवा आदर्श आपल्यासमोर निर्माण केला आहे. वायुसेना कर्मचाऱ्यांनीही आपल्या कार्यालयात जास्तीत जास्त हिंदीचा वापर करावा.’ असा सल्ला एअर कमोडोर सुनील पडेगावकर यांनी केले.
↧
साड्डा हक्क !
चित्रपटसृष्टीवर नाशिककरांचा वारसाहक्क आहे ! कसा? कारण सुरुवातच नाशिकमधून आपल्या दादासाहेबांनी केली... मस्त ना ! पण नाशिकची इच्छुक तरूण मंडळी, कलाकार मंडळी तो हक्काने बजावत असताना दिसत नाहीत. म्हणजे म्हणावा तितका हक्क ! प्रयत्न आणि दिशा यात थोडा गोंधळ होतोय आपल्या वाटचं इथे खुप आहे पण ते इथे येऊनच मिळवावं लागेल.
↧
मतविभाजनाचा फायदा नक्की कुणाला?
युती आणि आघाडीच्या 'घटस्फोट' नाट्यावर अखेर पडदा पडल्यानंतर आणि अर्ज माघारीनंतरच मालेगाव बाह्य मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले. गेल्या दोन पंचवार्षिकमध्ये शिवसेनेची बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघात दादा भुसे यांना आव्हान कुणाचे? असा प्रश्न उपस्थित झाला होता.
↧
जातीय समीकरणेच ठरवणार आमदार
युती आणि आघाडीचा तिढा सुटण्याधीच सर्वच राजकीय पक्षांनी आपापली स्वतंत्र मोर्चेबांधणी जर कोणत्या मतदारसंघात सुरू केली असेल तर त्यासाठी मालेगाव मध्य याच मतदार संघाचे नाव घ्यावे लागेल.
↧
↧
प्राण्यांची भरली सभा!
प्रचारासाठी अवघं पाचच दिवस उरल्यानं ठकसेन अन् त्याची वर्कर सेना दिवसरात्र राबत होती. सगळ्या बाजूनं नुसतं इलेक्शन इलेक्शन असा मारा सुरू होता. मत द्या, मत द्या अशा आरोळ्यांनी डोक्स पिकायला झालं होतं.
↧
आघाडी सरकारमुळे जनतेला वनवास
केंद्रामध्ये तुम्ही परिवर्तन केले, आता महाराष्ट्रात परिवर्तन करण्याची वेळा आली आहे. महिला असुरक्षितता, शेतकरी आत्महत्या किंवा महाराष्ट्रातील बंद कारखानदारी असे सर्व प्रकार राज्यातील जनतेसाठी वनवास आहे.
↧
देशाच्या अखंडतेसाठी काँग्रेसला मते द्या
देशाची अखंडता जपण्यासाठी काँग्रेसला विजयी करा. गेल्या ६०-६५ वर्षांमध्ये देशाला अखंड ठेवण्याचे कार्य काँग्रेस पक्षाने केले आहे. आज पुन्हा एकदा देशात सांप्रदायिक शक्तींनीचे वर्चस्व वाढत आहे. देशाच्या अखंडतेसाठी गरज आहे, असे मत माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांनी व्यक्त केले.
↧
विजय देशपांडे यांचे निधन
शहरातील विजय मोटार ड्रायव्हींग स्कूलचे संचालक व मोटोक्रॉसमध्ये नाशिकचे नाव राष्ट्रीयस्तरावर पहिल्यांदी पोहचविणारे खेळाडू विजय देशपांडे (वय ५७) यांचे गुरुवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी (११ ऑक्टोबर) रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
↧
↧
पावसामुळे शहरात पुन्हा अंधार
शहरात गुरुवारी संध्याकाळी झालेल्या पावसामुळे शहरातील वीज पुरवठा पुन्हा खंडीत झाला. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने वीज जात असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत होते.
↧
इंजिनीअर्स अॅवॉर्ड जाहीर
द इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनीअर्सच्या नाशिक शाखेतर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या इंजिनिअर्स अॅवॉर्ड जाहीर झाले असून आऊटस्टॅँडिंग इंजिनीअर अॅवॉर्डसाठी संदीप फाऊंडेशनचे चेअरमन डॉ. संदीप झा यांची निवड करण्यात आली आहे. अन्य पुरस्कारांची घोषणाही पत्रकार परिषदेत करण्यात आली.
↧
...अन् बॅरिकेडस वाहून गेले
रामकुंड परिसरात गोदाकाठी लावण्यात आलेले बॅकिडस वाहून गेल्याने दसऱ्याच्या दिवशी वाहने धुण्यासाठी मोठी रांग लागल्याचा अजब खुलासा नाशिक महापालिकेने मुंबई हायकोर्टात केला आहे.
↧
More Pages to Explore .....