माळीण येथे गतमहिन्यात ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे पर्यटकही धास्तावले आहेत. त्यामुळे जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील पर्यटन स्थळांकडे ५० टक्के पर्यटकांनी पाठ फिरविली आहे. परिणामी येथील हॉटेल्स, खाद्य पदार्थांच्या व्यावसायांवर विपरीत परिणाम झाला आहे.
माळशेजमध्ये घटला पर्यटकांचा ओघ
↧
↧
ऑगस्टीन पिंटोंचा अटकपूर्व जामीन रद्द करा
नाशिकच्या सत्र न्यायालयाने सेंट फ्रान्सिस शाळेचे संचालक ऑगस्टीन पिंटो यांना दिलेला अटकपूर्व जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी सेंट फ्रान्सिस शाळेच्या पालकांच्या बैठकीत करण्यात आली.
↧
पशुधन अधिकारी येवल्यात निलंबित
शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत आजारी शेळीगट वाटप केल्याप्रकरणी येवला पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी डॉ. डी. एच. अलकुंटे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी करण्यात येणार आहे.
↧
शहर विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही
कळवण शहरातील गटार व सांडपाणी प्रक्रियेसाठी ३ कोटी ५६ लाख रुपये मंजूर केले आहेत. शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयश्री पवार यांनी प्रकल्प भूमिपूजनप्रसंगी दिली.
↧
राज्यात आघाडीचीच सत्ता येणार
जातीयवादी, सांप्रदायिक शक्तींच्या हाती महाराष्ट्राची सूत्रे देवून महाराष्ट्रातील सुज्ञ जनता फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारसरणीशी प्रतारणा करणार नाही, असा विश्वास व्यक्त करून महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचेच सरकार येईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी केले.
↧
↧
ऑनलाईनच्या गोंधळात लटकले शिक्षकांचे पगार
पूर्वी ऑफलाईन पगाराचे काम होत असताना वारंवार पगाराला उशीर होत असल्याने सर्व शिक्षकांचे पगार 'ऑनलाईन' करण्याचे धोरण शासनाने आखले. मात्र, ऑनलाईन सिस्टीम होऊनही शिक्षकांना पगारासाठी दोन दोन महिने वाट पहावी लागत आहे.
↧
सटाण्यातील नववसाहतींमध्ये रस्त्यांची दुरवस्था
सटाणा नगरपरिषदेला कर स्वरुपात भरघोस उत्पन्न मिळवून देणाऱ्या शहरातील नववसाहतींमधील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
↧
गावित, कोकाटेंची भिस्त इगतपुरीवर
आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा बिगुल येत्या आठवडाभरात वाजणार असल्याने इगतपुरी तालुक्यात विकासकामांच्या माध्यमातून आमदार निर्मला गावित व माणिकराव कोकाटे यांनी गावोगावचा संपर्क वाढविण्यावर दिला आहे.
↧
साथीच्या आजारांनी नवे निरपूरकर त्रस्त
बागलाण तालुक्यातील नवे निरपूर परिसरात वातावरणातील बदलाबरोबरच दूषित पाण्यामुळे डेंग्यू, गॅस्टो व मलेरिया सारख्या साथींच्या आजारांनी डोकेवर काढले असून आरोग्य विभागाच्या पथकांनी या ठिकाणी विशेष यंत्रणा उभारली आहे.
↧
↧
‘टोमॅटो उत्पादकाला योग्य भाव मिळावा’
येवला बाजार समितीत व्यापारी कमी भावाने टोमॅटो खरेदी करीत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी शेजारील पिंपळगाव, लासलगाव येथे माल घेऊन जात असल्याचे चित्र पहायला मिळते.
↧
मालेगाव महापालिकेचा कौल जकातीला
एलबीटी की जकात? हा तिढा राज्य शासनाने न सोडवता तो चेंडू महापालिकाच्या कोर्टात टाकला होता. यानंतर मालेगाव मनपात नक्की एलबीटी की जकात याबद्दल निर्णय होणे बाकी होते. अखेर महापालिका कार्यक्षेत्रात एलबीटी रद्द करून पुन्हा जकात लागू करण्याचा ठराव मनपा विशेष महासभेत बहुमताने मंजूर करण्यात आला.
↧
जुन्या वास्तूंचे होणार पुनरूज्जीवन
नाशिक शहराची ओळख असणाऱ्या जुन्या परिसरांच्या पुनरूज्जीवनासाठी आयडिया आर्किटेक्चर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी काही आयडिया मांडल्या आहेत. जुन्या नाशिकमधील वाडे, वास्तू, बाजारपेठा आणि एकंदरीत परिसरातील नागरी समस्या सोडविण्याच्या दृष्टीने आर्किटेक्चर अभ्यासक्रमाचा कसा उपयोग होऊ शकेल, ही दिशा घेऊन या विद्यार्थ्यांनी प्रकल्पांचे सादरीकरण केले.
↧
नदीकाठच्या २९ गावांना सावधानतेचा इशारा
नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून दमदार पाऊस होत असून धरणासाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. गंगापूर धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरणासाठा ९१ टक्के झाला असून धरणातून सकाळपासून ५२७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. हा विसर्ग रात्री आणखी वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठावरील जिल्ह्याच्या हद्दीतील २९ गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
↧
↧
काझी गढीतील रहिवाशांना तत्काळ स्थलांतरित करा
गोदावरी नदीकाठावर असलेल्या व महापालिका हद्दीतल्या काझी गढीवरील रहिवाशांचे तत्काळ स्थलांतर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी महापालिकेला दिले आहेत. येत्या ३० सप्टेंबरपर्यंत येथील रहिवाशांना पोलिसांच्या मदतीने स्थलांतरीत करण्यास सांगण्यात आले आहे.
↧
फ्रावशीवर कारवाईसाठी हालचाली
गंगापूर धरणक्षेत्रात असलेल्या आर. सी. लथ एज्युकेशन ट्रस्टच्या जमिनीसंदर्भात तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे यांनी दिलेला स्थगिती आदेश शासनाने मागे घेतला आहे. त्यामुळे संस्थेतर्फे संबंधीत जमिनीवर असलेले फ्रावशी शाळेचे बांधकाम पाडण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने हालचाली सुरू केल्या आहेत.
↧
दहीहंडी फोडणाऱ्या मद्यपीला कार्यकर्त्यांनी दिला चोप
देवळाली कॅम्प येथे दहीहंडी रंगात आली असताना क्रेनवर चढून ती फोडणाऱ्या मद्यपी युवकास कार्यकर्त्यांनी चोप दिला. शिवसेनेचे युवा नेते योगेश घोलप यांच्या जी फौंडेशनच्यावतीने जुन्या बसस्थानकावर दहीहंडी झाली.
↧
झेडटीसीसी हाती घेणार जनजागृती मोहीम
अवयव दानाची गरज असणाऱ्या पेशंटला झोनल ट्रान्सप्लान्ट को-ऑर्डिनेशन कमिटी (झेडटीसीसी) बाबत माहिती मिळावी तसेच कमिटीकडे नोंदणी कशी करावी याबाबत जनजागृतीसाठी नाशिकमध्ये लवकरच कार्यशाळा घेतली जाणार असल्याची माहिती झेडटीसीसीच्या समन्वयक आरती गोखले यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.
↧
↧
भ्रष्टाचार हजारो कोटींचा, तक्रार मात्र एकच!
आदिवासी विकास विभागातील हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी मुबंई उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीला तक्रारदारांची प्रतीक्षा आहे. समिती स्थापना होऊन पंधरा दिवस उलटले तरी आतापर्यंत एकच तक्रार दाखल होऊ शकली आहे.
↧
१० वीच्या विद्यार्थ्याला मुख्याध्यापिकेची मारहाण
सायखेडा मार्गावरील एका इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिकेने सकाळी लहान मुलीच्या डोक्यात आणि दुपारी दहावीच्या मुलाच्या डोक्यात बुक्की मारल्याने परिसरात तणाव होता. या मुख्याध्यापिकेविरुद्ध मारहाणीच्या सातत्याने तक्रारी असतात. गेल्या वर्षी तिने मारहाण केल्याने दहावीतील मुलगी बेशुद्ध पडली होती.
↧
घरकुलांना पुन्हा कात्री
महापालिकेला १६ हजार घरे देणे शक्य नाही. त्यामुळे उपब्लध पैसा, जमीन आणि कालावधी यांचा विचार करता ११ हजार २०० घरे महापालिकेने मार्च २०१५ पर्यंत बांधून पूर्ण करावीत, या मुंबई हायकोर्टाच्या निकालाला महापालिका ठेंगा दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
↧
More Pages to Explore .....