नाशिकला बेस्ट इमर्जिंग सिटी इन हेल्थ केअर हे बिरूद मिळाल्याने प्रत्येकाच्या नजरा मोठमोठाली हॉस्पिटल्स अन् सुपर स्पेशालिटी सुविधा देत असलेल्या हॉस्पिटल्सकडे वळतात. मात्र, या चिकित्सा पद्धतीपूर्वी नाशिकला आयुर्वेदाची मोठी परंपरा राहिली आहे. आजही शहरात आयुर्वेदाने आपला दर्जा राखला असून, आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे.
आयुर्वेद हेल्थ कल्चर व्हावं
↧
↧
हेल्थ केअर सर्वसमावेशक हवे
वैद्यकीय सेवांचा जवळपास ९० टक्के वाटा खाजगी वैद्यकीय क्षेत्राचा आहे. हल्ली कोणीही सरकारी आरोग्य सेवेकडे वळत नसल्याचे दिसते. सरकारी क्षेत्रावर नियंत्रण- व्यवस्थापन नसल्याने सरकारी हेल्थ केअरची वाताहत पहायला मिळते.
↧
शिक्षक संख्या वाढवा
इगतपुरी तालुक्यात शिक्षण आपल्या दारी या योजनेचा बोजवारा उडाला आहे. पाच वर्गांना एकच शिक्षक असल्याने शिक्षणाचे तीन तेरा नऊ बारा झाले आहेत. यामुळे पाचवीपर्यंत एक शिक्षक असलेल्या वर्गांसाठी तत्काळ शिक्षकांची संख्या वाढवावी, अशी मागणी तालुका युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
↧
मालेगावच्या उर्दू साहित्यविश्वाचा गौरव
मालेगाव शहरात उर्दू साहित्याची मोठी परंपरा आहे. या साहित्याचा व साहित्यिकांचा गौरव राज्य शासनाकडून होणार आहे. महाराष्ट्र राज्य शासन उर्दू साहित्य अकादमीच्या सन २0१३ च्या वार्षिक पुरस्कारांसाठी येथील इक्बाल बर्की, अश्पाक उमर, डॉ. इलियास सिद्दिकी, जाहीद अख्तर या चौघा लेखकांची निवड करण्यात आली आहे.
↧
विंचुरेचा जलकुंभ बनला शोभेचे बाहुले
विंचुरे (ता. बागलाण) येथील ग्रामपंचायतीने गेल्या सात वर्षांपासून उभारलेला पिण्याच्या पाण्याचा जलकुंभ केवळ शोभेचे बाहुले ठरले आहे. सुमारे ३५ लाख रुपये खर्च करून देखील या जलकुंभातून पाण्याचा एकही थेंब वितरित होत नाही. परिणामी गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
↧
↧
‘फळबाग योजनेला मुदतवाढ द्या’
राज्य शासनाच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेऐवजी पूर्वीचीच शंभर टक्के फळबाग अनुदान योजना लागू करण्यात यावी, या मागणीसाठी प्रतीक्षेत असलेल्या डाळिंब उत्पादकांनी अद्यापही फळ लागवड केलेली नाही.
↧
स्वस्त धान्य दुकानाविरोधात तक्रारी
येवला तालुक्यातील लौकीशिरस येथील तेजस्वी महिला बचत गटाच्या ताब्यात असलेल्या स्वस्त धान्य दुकानाविरोधात ग्रामस्थांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. यातच या महिला बचत गटाच्या स्वस्त धान्य दुकानाचा कारभार पाहणाऱ्या महिलांनी गावातील ग्रामस्थानंविरोधात येवला तालुका पोलिस स्टेशनमधे जातीवाचक व मारहाणीच्या तक्रारी दाखल करीत ग्रामस्थांवर गुन्हे दाखल झाल्याने तणावात भर पडली आहे.
↧
बॅकवॉटरमुळे तापीला पूर
गेल्या दीड महिन्यांंपासून दडी मारून बसलेल्या वरूणराजाने मंगळवारी रात्रीपासून खान्देशावर आपली कृषादृष्टी दाखवली आहे. मंगळवार रात्रीपासून रिमझिम तर बुधवारी पहाटे तीन वाजेपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे संपूर्ण खान्देशातील नदी नाल्यांना पाणी आले आहे.
↧
१४७ मिमी पावसाची चाळीसगावात नोंद
चाळीसगाव, भडगाव व पाचोरा तालुक्यात बुधवारी पहाटेपासून पावसाने हजेरी लावली असल्याने शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. संततधार पावसामुळे नोकरदारांसह विद्यार्थ्यांची चांगलीच गैरसोय झाली.
↧
↧
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
मंगळवार रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तापी नदीला महापूर येण्याची शक्यात असून आहे. हतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आला आहे.
↧
एसएमएस स्पर्धेचे विजेते जाहीर
महाराष्ट्र टाइम्सतर्फे अनवट या चित्रपटाची एसएमएस कॉन्टेस्ट घेण्यात आली होती. यावेळी प्रश्न होता आदिनाथ कोठारे व उर्मिला कानेटकर-कोठारे यांनी यापैकी कोणत्या चित्रपटात एकत्र काम केले आहे ? पर्याय होते a- झपाटलेला, b-दुभंग आणि c दुनियादारी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर होते दुभंग.
↧
कम्युनिटी कॉलेजअंतर्गत नवे अभ्यासक्रम
कम्युनिटी कॉलेज संकल्पनेंतर्गत केटीएचएम कॉलेजमध्ये तीन नव्या अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली आहे. यात बॅचलर ऑफ व्होकेशनल इन इंटेरिअर डिझाईन अॅण्ड प्रिंटींग टेक्नोलॉजी, सर्टीफिकेट/ डिप्लोमा कोर्स इन अॅनॅलिटीकल टेक्निक्स फॉर फार्मासुटिकल्स आणि नॅनो सायन्स व नॅनो टेक्नोलॉजी या विषयांचा समावेश आहे.
↧
परिसराला प्रदूषणाचा विळखा
प्रभाग १६ मधील आसाराम बापू आश्रम परिसर प्रदुषणाच्या विळख्यात सापडला आहे. येथील नदीपात्राच्या किनारी बरेचसे नाले फुटलेले असल्याने नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे.
↧
↧
डाटा एंट्रीच्या नावाखाली फसवणूक
डाटा एन्ट्रीच्या कामांसाठी सुमारे दोन लाख रुपये डिपॉझिट घेऊनही अस्तित्वात नसलेल्या कंपनीची कामे देऊन फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
↧
कामगारसेनेचे वेतनासाठी ठिय्या आंदोलन
सहाव्या वेतन आयोगाचा फरक व कामगारांना देय असलेली इतर रक्कम त्वरित मिळावी यासाठी बुधवारी कामगार संघटनांच्या वतीने महापालिका आयुक्तांच्या आंदोलनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी कामगारांना देय असलेली रक्कम दोन हप्त्यात देण्याचे आश्वासन प्रभारी आयुक्त संजीव कुमार यांनी दिले.
↧
‘बीएआय’ची उद्यापासून परिषद
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाची (बीएआय) दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेला येत्या शुक्रवारी प्रारंभ होणार आहे. या परिषदेत देशभरातील तब्बल हजार प्रतिनिधी सहभागी होणार असून, बांधकाम आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील संधी तसेच आव्हाने या विषयावर या परिषदेत विचारमंथन केले जाणार असल्याची माहिती संस्थेच्या पश्चिम विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
↧
`पोळ यांच्यावर गुन्हा दाखल करा
विवेक आणि विज्ञाननिष्ठेचा आयुष्यभर जागर करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनाचा तपास करताना पुण्याचे तत्कालीन पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी प्लँचेट या तथ्यहीन पध्दतीचा अवलंब केला. त्यामुळे त्यांच्यावर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
↧
↧
निमाच्या अध्यक्षपदी रवी वर्मा
तब्बल दोन दिवसांच्या चर्चा आणि वाटाघाटींनंतर नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या अध्यक्षपदाची माळ रवी वर्मा यांच्या गळ्यात पडली आहे. निमाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी बिनविरोध निवडीसाठी कसोशीचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत.
↧
महापालिकेत सत्ताधाऱ्यांचेच आंदोलन
नाशिक महापालिकेला राज्य सरकारने पूर्णवेळ आयुक्त द्यावा, या मागणीसाठी सत्ताधारी मनसेनेच महापालिकेसमोर आंदोलन केले. यावेळी महापालिकेत जाण्यास मज्जाव करण्यात आल्याने सकाळी दहावाजेपासून कामगार प्रवेशद्वाराजवळ उभे होते.
↧
टिप्पर गँगची कारागृहातही दहशत
जेलरोड येथील मध्यवर्ती कारागृहात टिप्पर गँगचा म्होरक्या समीर नासीर पठाणने इतर कैद्यांच्या मदतीने एका कैद्याला मारहाण केली. नाशिकरोड पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
↧