फेब्रुवारी महिन्यापासून प्रलंबित असलेल्या
स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीला अखेर मुहूर्त सापडला आहे. ही निवडणूक ३०
जून रोजी सकाळी ११ वाजता पार पडणार असून निवडणुकीच्या निमित्ताने मनसे, शिवसेना
आणि भाजपात रस्सीखेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
स्थायी सभापतीपदाच्या निवडणुकीला मुहूर्त
↧
↧
आजचा रविवार परीक्षांचा
तलाठी, वाहनचालक आणि विविध पदांसाठी होणारी स्टाफ सिलेक्शनची लेखी परीक्षा रविवारी (२२ जून) होत आहे. जिल्ह्यातील तब्बल साडेचौदा हजार परीक्षार्थी त्यास पात्र ठरले असून प्रशासनाने त्याची ठोस तयारी केली आहे.
↧
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कमाफी
दुष्काळी भागात पिकांची आणेवारी पन्नास
पैशांपेक्षा कमी असल्याचे आढळल्याने यंदाही दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना
शैक्षणिक शुल्कमाफी जाहीर करण्यात आली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या या निर्णयाचा
फायदा राज्यभरातील सुमारे दहा हजार आणि नाशिक जिल्ह्यातील २६३ गावांना होणार
आहे.
↧
पोलिस भरतीसाठी आज लेखी परीक्षा
ग्रामीण पोलिस दलातील भरतीसाठी आडगाव येथील
ग्रामीण पोलिस मुख्यालयात पात्र उमेदवारांची आज लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
२४४ पदांसाठी घेण्यात येणाऱ्या या परीक्षेला २ हजार ४२७ उमेदवार सामोरे जाणार
आहेत. शहर पोलिस दलामध्ये सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत पहिल्या दिवशीच्या पात्र
४१६ उमेदवारांपैकी ३२३ उमेदवार १०० मीटर धावण्याच्या चाचणीला पुन्हा सामोरे गेले.
↧
नाशिक- महापालिकेचे वेतनाचे वांदे
एलबीटी (लोकल बॉडी टॅक्स) रद्द होणार अशा
प्रतीक्षेत असलेल्या व्यापारी उद्योजकांनी जून महिन्यात एलबीटी कर भरण्यास चालढकल
केली. २० जूनपर्यंत अवघा २८ कोटी रुपयांचा महसूल महापालिकेकडे जमा झाला आहे. पैसे
जमा होण्याचे प्रमाण इतके अल्प आहे की, कर्मचाऱ्यांचे वेतन होणार की नाही,
असा
प्रश्न यामुळे उपस्थित केला जात आहे.
↧
↧
... तर ठेकेदाराचे पेमेंट रोखणार
पांडवलेणी येथील दादासाहेब फाळके स्मारक आणि
बुद्ध विहार या ठिकाणी देखभाल आणि दुरुस्तीची कामे करणाऱ्या कामगारांशी चर्चा करून
त्यावर तोडगा काढावा. तसेच, नियमाप्रमाणे वेतन अदा करावे, अन्यथा
ठेकेदाराचे पेमेंट रोखण्यात येईल, असा इशारा महापौर अॅड. यतीन वाघ यांनी दिला
आहे.
↧
मतदार नोंदणीला संमिश्र प्रतिसाद
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी
तयार करण्यासाठी पहिल्या मतदार नोंदणी अभियानाला शनिवारपासून प्रारंभ झाला. काही
ठिकाणी या मोहिमेला उत्स्फुर्त तर काही ठिकाणी अल्प प्रतिसाद लाभला. आज, रविवारीही
मतदार नोंदणीची संधी मिळणार आहे.
↧
आता चांदवड, धुळ्यात टोलवाढ
पिंपळगाव बसवंत येथील टोलचे दर तिप्पट
झाल्यानंतर आता चांदवड आणि धुळे येथील टोलचे दरही वाढणार आहेत. येत्या १ जुलैपासून
टोलची दरवाढ करण्याचे इरकॉन सोमा टोलवे कंपनीने घोषित केले असून यामुळे
रेणुकादेवीच्या दर्शनासाठी चांदवडला जाणाऱ्या नाशिककरांना तब्बल २६५ रुपयांचा टोल
भरावा लागणार आहे.
↧
दाखल्यांसाठी सेतू केंद्रे गजबजली
दहावी व बारावीचे निकाल ऑनलाईन घोषित झाले
आहेत. निकालानंतर पालक आणि विद्यार्थ्यांची मिशन अॅडमिशनसाठी धावपळ सुरू आहे.
पुढील शैक्षणिक वर्षात आवश्यक दाखल्यांची जमवाजमव करण्यासाठी शहरातील सेतू सुविधा
केंद्रावर विद्यार्थी-पालकांची एकच गर्दी होऊ लागली आहे. शहरात प्रांत कार्यालयात
गर्दी होत आहे तर, ग्रामीण भागात सुरू केलेल्या महा-ई-सेवा सेतू
केंद्रांवरदेखील अशीच गर्दी पहायला मिळत आहे.
↧
↧
पिंपळगावातही ‘कॅम्पा कोला’
पिंपळगाव बसवंतमध्ये बांधण्यात आलेली विविध
प्रकारच्या बांधकामे ही बेकायदा असल्याचे खुद्द बिल्डरांनीच मान्य केले आहे.
त्यामुळेच नियमाप्रमाणे काही दंड किंवा अकृषिक सारा भरायचा असल्यास तो भरण्यास
आम्ही तयार आहोत. पण, ही बांधकामे नियमित करण्याची आर्जव बिल्डरांनी
मंडल अधिकाऱ्याकडे केली आहे.
↧
केटीवेअर बांधण्यास ग्रीन सिग्नल
इगतपुरी तालुक्यातील पूर्ण झालेल्या धरणांच्या धरणग्रस्तांच्या थकीत
पेमेंटबाबत पाठपुरावा सुरू आहे. तसेच, सुरू असलेल्या धरणांच्या कामाबाबतचा आढावा घेत
धरणांच्या कामाबरोबरच धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या कामांनाही गती द्या, असे आदेश महसूल आयुक्त एकनाथ डवले यांनी आढावा बैठकीत
दिले.
↧
वादग्रस्त गाळ्यांचा अखेर लिलाव
गेल्या अनेक महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात
सापडलेल्या सटाणा बाजार समितीच्या नामपूर उपबाजार समितीत बावीस व्यापारी गाळ्यांचा
अखेर शनिवारी जाहीर लिलाव करण्यात आला. भाडेपट्टीवर देण्यात येणाऱ्या या गाळ्यांची
प्रथमच जाहीर लिलाव प्रक्रिया राबविण्यात आल्यामुळे बाजार समितीला तबल १ कोटी ४९
लाख ७७ हजार रुपयांचे डिपॉझिट मिळाले आहे.
↧
पाटपाण्याच्या प्रश्नावर राजकारण नको
येवला तालुक्याच्या पाटपाण्याच्या प्रश्नावर
राजकारण न करता कामाची वस्तुस्थिती जनतेपुढे मांडली पाहिजे, असे आवाहन येवला
तालुका जलहक्क संघर्ष समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीतून करण्यात आले आहे.
↧
↧
‘ट्रॅक्टर जप्ती थांबवा’
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सुरू
केलेली ट्रॅक्टर जप्ती त्वरित थांबविण्यात यावी, कांद्याचे
निर्यातमूल्य शुन्य डॉलर झाले पाहिजे, आदी मागण्यांचे निवेदन नाशिक जिल्हा
स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
↧
सटाण्यातील गाळ्यांचा फेरलिलाव करा
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या आदेशाचे
अवमूल्यन करून सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी १ लाख रुपये
डिपॉझिट व नाममात्र भाड्याने वितरीत केलेल्या सटाणा येथील गाळ्यांचा करार रद्द
करून सक्षम अधिकाऱ्याच्या उपस्थित नव्याने व्यापारी गाळ्यांचा लिलाव करण्यात यावा,
अशी
मागणी काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. विलास बच्छाव यांनी पणन मंत्र्याकडे केली आहे. या
मागणीमुळे संबंधित गाळेधारकांचे धाबे दणाणले आहेत.
↧
पाण्याचा वापर काटकसरीने करा
पाणी गुणवत्ता टिकवायची असेल तर सर्वप्रथम गावातील पाणी स्त्रोत सुरक्षित
करायला हवे. पिण्याच्या पाण्याची गळती थांबवावी, पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवावा आणि पाण्याचा
काटकसरीने वापर करावा. शुद्ध पाणी हा जनतेचा अधिकार आहे, त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली आहे हे ओळखूनच आपले
कर्तव्य बजवावे, असे आवाहन कळवण गटविकास
अधिकारी एम. ए. शिरसाठ यांनी केले.
↧
एक दिवसात होणार योजना प्रकरण पूर्ण
संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभापासून
कुणीही गरजू वंचित राहू नये, यासाठी येवला उपविभागातील प्रत्येक
मंडळ ग्रामस्तरावर एका दिवसात योजना प्रकरण पूर्ण करणारी शिबिरे घेण्यात येणार
असल्याचे प्रतिपादन प्रांताधिकारी वासंती माळी यांनी केले.
↧
↧
‘डोलारखेडा’मधील वाघांचे अस्तित्व धोक्यात
जळगाव जिल्ह्यातील वढोदा रेंजमधील
डोलारखेडामधील (कंपार्टमेंट क्रमांक ५१८) वाघांचे अस्तित्व धोक्यात आले असून,
याच
भागात दोनशे एकरवर अतिक्रमण झाले आहे. तेथील झाडांना आगी लावून त्यांचा सफाया
करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे वनविभाग त्याची दखल घ्यायला तयार नसल्याचे
सातपुडा बचाव समितीचे निमंत्रक राजेंद्र नन्नवरे, अभय उजागरे
यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
↧
माती परीक्षणाचे मार्गदर्शन
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी
संलग्न असलेल्या कर्मयोगी दुलाजीनाना पाटील कृषी महाविद्यालय, मविप्र
नाशिक आयोजित ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषीदुतांकडून माती
परीक्षणासाठी लागणाऱ्या प्रातिनिधीक नमूना कशा प्रकारे घ्यावा, याबाबत
निफाड तालुक्यातील नांदुर्डीच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
↧
येवला तालुक्यात हरिण धोक्यात
येवला तालुक्यात चिचोंडी व पश्चिम भागात
हरिणांचा बळी जाण्याचे सत्र अजूनही सुरूच आहे. पाणी व अन्नाच्या शोधार्थ फिरणाऱ्या
हरणे कुत्र्यांची शिकार होत आहेत. उन्हाळ्यात सुमारे २५-३० हरणांचा या ना त्या
कारणाने बळी गेला आहे. याबाबत वन विभागाने कोणतीही ठोस योजना केली नसल्याने
वन्यप्रेमी नाराजी व्यक्त करीत आहेत.
↧
More Pages to Explore .....