राज ठाकरे यांनी नांदगांव मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवावी आणि मनमाडचा पाणीप्रश्न सोडवावा, अशी आग्रहाची मागणी राज ठाकरे यांच्याकडे केली जाणार आहे.
राज ठाकरे यांनी नांदगावमधून लढावे
↧
↧
नांदगावात उपरा उमेदवार नको
विधानसभेची निवडणूक जवळ येऊ लागल्याने इच्छुक तयारीला लागले आहेत. यामुळे नांदगाव मतदारसंघात सध्या राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. उमेदवारीसाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत.
↧
`टोळधाडी`चा बंदोबस्त करा
मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत येथील टोलनाक्यावर टोलच्या दरांत भरघोस वाढ करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील वाहनांना या टोलदरवाढीतून दिलासा देण्यात आला असला तरी इतर जिल्ह्यातील वाहनचालकांनी काय पाप केले आहे, म्हणून त्यांनी वाढीव टोल द्यावा.
↧
महापालिकेकडूनच पाण्याचा अपव्यय
जेलरोड येथील महापालिकेच्या कार्यालयावरील पाण्याच्या टाकीतून अनेक वर्षांपासून सकाळ-संध्याकाळ पाणी ओव्हरफ्लो होत असूनही कोणीच लक्ष देत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
↧
पोलिस ठाण्याला लागेना मुहूर्त
अंबड औद्योगिक वसाहतीतील पडून असलेल्या भूखंडावर पोलिस ठाण्याच्या उभारणीला मुहूर्त लागणार तरी कधी, असा सवाल उद्योजक उपस्थित करत आहेत. गेल्या वीस वर्षांपेक्षा अधिक काळापासून हा भूखंड विना वापर पडून आहे.
↧
↧
कृषी शिक्षणक्रमांचे प्रवेश सुरू
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषि विज्ञान विद्याशाखेंतर्गत सर्व शिक्षणक्रमांची प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्रातील ५७ कृषि शिक्षण केंद्रांवर सुरू करण्यात आली आहे.
↧
डीटीएडच्या अर्जविक्रीला सुरुवात
शैक्षणिक वर्ष सन् २०१४-१५ साठी डीटीएड (अध्यापन शिक्षण पदविका) अर्जविक्रीला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. ही अर्जविक्री १६ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. तर १७ जूनपर्यंत अर्ज स्वीकारले जातील, अशी माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य नितीन बच्छाव यांनी दिली.
↧
कॉपीच्या घटना घटल्या
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागातर्फे घेण्यात आलेल्या यंदाच्या बारावीच्या परीक्षेत नाशिक विभागात कॉपीच्या घटनांमध्ये तुलनेने मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षी २८१ कॉपीची प्रकरणे या विभागात उघडकीस आली होती. आता हे प्रमाण १४० वर आले आहे.
↧
समुपदेशकांशी संपर्क साधा
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळालेल्या किंवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नाशिक विभागीय मंडळाने हेल्पलाइनची सुविधा उपलब्ध करून दिले आहे.
↧
↧
नाशिक विभागात सायन्स अव्वल
बारावीच्या सोमवारी जाहीर झालेल्या निकालात सायन्सच्या विद्यार्थ्यांचा दबदबा कायम राहिला. गुणांच्या स्पर्धेत नाशिक विभागासह चारही जिल्ह्यांत सायन्सच्या विद्यार्थ्यांनी वर्चस्व मिळविल्याची माहिती एसएससी बोर्डाचे विभागीय अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी दिली.
↧
आमंत्रण आहे तुम्हा सर्वांना...
महाराष्ट्राच्या सुवर्ण त्रिकोणातील एक कोन म्हणून मुंबई, पुण्यापाठोपाठ झपाट्याने विकसित होणारे शहर असे नावलौकिक असणाऱ्या नाशिक महानगराला ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या रूपाने तीन वर्षांपूर्वी एक ‘स्मार्ट’ मित्र मिळाला. नाशिककरांच्या मनात घर करून बसलेला ‘मटा’ यंदा चौथ्या वर्षात पदार्पण करतोय.
↧
...अन् २५० कामे प्रलंबित
सिंहस्थ कुंभमेळ्या संदर्भातील कामे वगळता महापालिकेची इतर कामे पैशांअभावी ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. ठेकेदारांना तब्बल ४० कोटी रुपयांची देणी बाकी असल्याने नवीन कामांचे टेंडर अनेकदा प्रसिध्द करूनही ठेकेदार पुढे येत नाही.
↧
संपर्क नेत्याने टोचले कान
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवनियुक्त संपर्कप्रमुख अविनाश अभ्यंकर यांनी सोमवारी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जोरदार कानउघडणी केली.
↧
↧
शहराध्यक्षपदावरून धुसफूस
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार छगन भुजबळ यांचा पराभव झाल्यानंतर नाशिक शहराध्यक्षपदावरुन राष्ट्रवादीत धुसफूस सुरू झाली आहे.
↧
संतप्त शेतकऱ्यांनी सचिवाला कोंडले
शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची सूचना न देता सोमवारपासून तब्बल सात दिवस सटाणा बाजार समितीसह नामपूर उपबाजार अचानक बंद ठेवल्यामुळे संतप्त झालेल्या सत्तर शेतकऱ्यांनी सोमवारी सकाळी सटाणा बाजार समितीच्या मुख्य कार्यालयाला टाळे ठोकून तब्बल दोन तास सचिवाला डांबून ठेवले.
↧
निफाड तालुक्यात गारपीटचा दणका
मोसमातील पहिल्याच पावसाने निफाड तालुक्यात जोरदार हजेरी लावली. तालुक्यातील गोदाघाटसह उगाव, थेटाळे परिसरात सुमारे दीड तास गारपीटसह कोसळलेल्या पावसाने शेतपिकांसह घरांचेही मोठे नुकसान झाले आहे.
↧
वीज तारांमुळे कांदा चाळ आगीत खाक
जिल्ह्यात सोमवारी मान्सून पूर्व पावसाने जोरदार वाऱ्यासह हजेरी लावली. सिन्नर, निफाड, मालेगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले.
↧
↧
फ्रावशी अॅकॅडमीचा १०० टक्के निकाल
आर. एस. एज्युकेशन ट्रस्ट संचलित फ्रावशी अॅकॅडमी कॉलेजनेही उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखत १०० टक्के निकालाचा झेंडा रोवला. या कॉलेजमधील सायन्स आणि कॉमर्स या दोन्हीही शाखांमधील सर्व विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेत यश मिळाले आहे.
↧
संत नामदेवांचे स्मारक उभारू
‘महाराष्ट्र ते पंजाब भागवत धर्माचा प्रसार करणारे संत शिरोमणी नामदेव महाराजांचे स्मारक पंढरपूर येथे उभारण्यास सर्वोतपरी प्रयत्न करेन’ असे आश्वासन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. संत नामदेव समाजोन्नती परिषदेच्या ५३ व्या राज्यव्यापी अधिवेशनप्रसंगी ते बोलत होते.
↧
१६ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
शहरात परिमंडळ एकचे सहायक पोलिस आयुक्त म्हणून रवींद्र वाडेकर यांनी पदभार स्वीकारला आहे. याखेरीज १० पोलिस निरीक्षक आणि ६ सहायक पोलिस निरीक्षक पदावरील काही पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, काही अधिकारी ठरवून दिलेल्या ठिकाणी पदभार स्वीकारला आहे.
↧