परीक्षा संपल्यानंतर बाहेर गावी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वेने बुधवार (२ मार्च) पासून ते २८ जूनपर्यंत हॉलिडे स्पेशल रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सुट्यांमध्ये प्रवासाला जाणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
सुट्यांसाठी जादा गाड्यांचा दिलासा
↧
↧
‘आधी पुनर्वसन करा, मग अतिक्रमण काढा’
अतिक्रमण काढण्यापूर्वी महापालिकेने पुनर्वसन करावे, अन्यथा याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा गंगापूरोडवरील एसटी कॉलनीतील टपरीधारकांच्यावतीने जनहक्क संघटनेने दिला आहे.
↧
नाशिकरोड विभागाच्या घरपट्टी वसुलीत वाढ
महापालिकेच्या नाशिकरोड विभागाने सरत्या अर्थिक वर्षात घरपट्टीच्या वसुलीत मागील वर्षीपेक्षा २ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. २०१३-१४ या वर्षासाठी कर्मचाऱ्यांना १४ कोटी वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात १२ कोटीची वसुली झाली असून ती ८० टक्के इतकी आहे.
↧
कारसूळचे पुन्हा पंचनामे करा
निफाड तालुक्यातील कारसूळ परिसरात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे पुन्हा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार कारसूल परिसरातील ग्रामस्थ त्यांचे उपोषण मागे घेण्याची चिन्हे आहेत.
↧
एक खिडकी कक्षाचा बोजवारा
आचारसंहिता काळात राजकीय पक्ष आणि उमेदवारांना लागणाऱ्या विविध परवानग्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी कक्ष सुरू करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात या कक्षाचा बोजवारा उडाला आहे. जिल्ह्याच्या कुठल्याही भागात छोटी रॅली काढण्यासाठीही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना नाशिकची वाट धरावी लागत आहे.
↧
↧
विवाहितेचा विनयभंग
पत्नीचा छळ करणाऱ्या पतीसह विनयभंग करणाऱ्या सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयुर उत्तम घुगे याच्यासह तिघांवर सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो बदलापुर पोलिसांकडे वर्ग केला आहे. अक्षदा मयुर घुगे (रा. बदलापुर, सध्या पिंपळगाव बहुला) यांनी फिर्याद दिली आहे.
↧
पवन एक्सप्रेसमध्ये जुळ्यांना जन्म
नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर पवन एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या महिलेची प्रसूती होऊन तिने जुळ्यांना जन्म दिला. प्रसूती झालेल्या महिलेला नंतर नाशिकरोडच्या बिटको हॉस्पिटलमध्य़े दाखल करण्यात आले असून, दोन्ही बाळं व महिला सुखरुप आहे.
↧
‘एलईडी’चा आज फैसला
प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनीच्या लढाईत प्रतिष्ठेच्या बनलेल्या एलईडी प्रश्नावर हाय कोर्ट आज, बुधवारी फैसला सुनावणार आहे. ऑक्टोबर २०१३ पासून सुरू झालेल्या सुनावणीचा निकाल काय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
↧
आजपासून ‘मिशन नॉमिनेशन’
चैत्र मासारंभाने वातावरणातील पारा तापू लागला असतानाच लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या अर्ज दाखल प्रक्रियेमुळे आजपासून जिल्ह्यातील राजकीय वातावरणही तापणार आहे. आजपासून (बुधवार) प्रमुख पक्षांचे उमेदवार अर्ज दाखल होणार असल्याने खऱ्या अर्थाने रणधुमाळीस प्रारंभ होईल.
↧
↧
बुद्धीला पटेल तेच करणार!
पहिल्यांदाच मतदान करण्याचा हक्क ज्या तरुणांना मिळाला आहे, त्यांच्या दृष्टीनेही आगामी निवडणुकीला मोठे महत्त्व आहे. मतदार म्हणून पहिल्यांदा मत देणाऱ्या या युवकांवर पक्षांच्या विचारधारा, आश्वासने, मते-मतांतरे आणि चर्चांचा परिणामही होत आहे.
↧
फेरीवाल्यांवरील कारवाई थांबवा
राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी सुरू असताना महापालिकेने भद्रकाली परिसरातील हॉकर्सना हटवून कायद्याची पायमल्ली केली आहे. असा आरोप करीत महापालिकेने फेरीवाल्याविरोधातील कारवाई थांबवावी, अशी मागणी नाशिक जिल्हा हॉकर्स व टपरीधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीव गांधी भवनसमोर मंगळवारी आंदोलन करून केले.
↧
‘राम’ आणि ‘नाथ’ घोळ
सध्या निवडणुकांची धामधूम आहे. अर्ज भरण्याला सुरुवात झाली असून प्रत्येक उमेदवार आपल्या सोबत जास्तीत जास्त कार्यकर्ते कसे येतील याचा विचार करतोय. नुकतीच एका पक्षाने इदगाह मैदानावर सभा आयोजित केली होती. सभेला गर्दी करण्यात आयोजक चांगल्या प्रकारे यशस्वी झाले होते.
↧
हे कसले लोकप्रतिनिधी ?
एरवी लोकांचे प्रतिनिधी म्हणून साधेपणा मिरविणारे लोकप्रतिनिधी ज्यावेळी सर्वसामान्यांची फिकर बाळगत नाहीत त्यावेळी हे नक्की लोकांचेच प्रतिनिधी का असा प्रश्न निर्माण होतो.
↧
↧
जेईई मेनसाठी १४ हजारांची नोंदणी
राज्यातील शासकीय अनुदानित आणि खासगी विनाअनुदानित इंजिनीअरिंग कॉलेजमधील प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई (मेन) परीक्षा रविवार, ६ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. राज्यभरातून सुमारे अडीच लाख तर नाशिक जिल्ह्यातील साडेचौदा हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
↧
मतदारसंघाची तहान भागवणार
दिंडोरी मतदासंघात पाण्याचा गहन प्रश्न आहे. दळवळणासाठी चांगले रस्ते नाहीत. उच्चशिक्षणासाठी प्रयत्न झालेले नाहीत, या प्रश्नांबरोबरच महिलांची सुरक्षा, त्यांच्यासाठी व बेरोजगार तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून द्यायचे आहेत.
↧
सत्यजितसिंह गायकवाड यांची तलवार म्यान?
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे बडोद्याचे माजी खासदार सत्यजितसिंह गायकवाड राजेंनी धुळ्यामधून बंडखोरीची तलवार उपसली होती. मात्र, मंगळवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजेंना कानपिचक्या दिल्यामुळे बंडखोरीची तलवार म्यान झाली असल्याची जोरदार चर्चा आहे.
↧
युती की भीती?
शिवसेना व भारतीय जनता पक्ष यांची युती ही समान विचार धारेवर असलेली नैसर्गिक आणि आघाड्यांच्या राजकारणातील सर्वात जुनी युती असल्याचा दावा दोन्ही पक्षाचे नेते मोठ्या गर्वाने नेहमीच करीत असतात. जनसामान्यांना मात्र, ही युती की भीती? असा प्रश्न कायम पडतो.
↧
↧
हे गाव लई न्यारं...
आठ हजार लोकवस्तीचे गाव... सधन, शेती-व्यवसायाचे उत्पन्नही तसे ठिकठाक... सुशिक्षितांची आकडेवारीही तशी वाखाणण्याजोगी.. असे असतानाही... गेल्या तीस वर्षांपासून या गावात दररोज मुक्कामाला येणाऱ्या बसच्या वाहक व चालकाला तेथील ग्रामस्थांकडून दिली जाणारी वागणूक अतिशय भयंकर...
↧
रावेर परिसरात गौण खनिजांची चोरी
रावेर परिसरात मोठ्या प्रमाणात वाळू व मातीची चोरटी वाहतूक होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या मार्च महिन्यात अवैधरित्या गौण खनिज वाहतूक करणाऱ्या ९१ जणांवर तहसील विभागातर्फे कारवाई करण्यात आली आहे.
↧
विहिरीत ट्रॅक्टर कोसळून महिला ठार
तालुक्यातील खैरगव्हाण येथे विहिरीत ट्रॅक्टर कोसळून महिला ठार झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी, सकाळी अकरा वाजेच्या सुमारास खैरगव्हाण येथील विष्णू भगवंत सैद यांच्या ट्रॅक्टरवर शेतीकामासाठी रस्त्याने जात असलेली महिला गयाबाई एकनाथ सालमुठे (वय ६०) बसली.
↧
More Pages to Explore .....